विकिपीडिया mrwiki https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.45.0-wmf.6 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा मसूदा मसूदा चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा त्र्यंबक बापूजी ठोंबरे 0 1337 2581404 2308735 2025-06-21T02:11:39Z 2409:4081:39E:E019:0:0:C28:C0A0 2581404 wikitext text/x-wiki {{बदल}} {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = {{लेखनाव}} | चित्र = | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी | पूर्ण_नाव =त्रंबक बापूजी ठोंबरे | टोपण_नाव = बाल कवी | जन्म_दिनांक = १३ ऑगस्ट १८९० | जन्म_स्थान = पातोंडा , [[महाराष्ट्र]], [[भारत]] | मृत्यू_दिनांक = ५ मे १९१८ | मृत्यू_स्थान = जळगाव, [[महाराष्ट्र]], [[भारत]] | कार्यक्षेत्र = [[साहित्य]] | राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | कार्यकाळ = | साहित्य_प्रकार = [[कविता]] | विषय = | चळवळ = | प्रसिद्ध_साहित्यकृती = | प्रभाव = | प्रभावित = | पुरस्कार = | वडील_नाव = बापूजी ठोंबरे | आई_नाव = | पती_नाव = | पत्नी_नाव = | अपत्ये = | स्वाक्षरी_चित्र = | संकेतस्थळ_दुवा = | तळटिपा = }} '''बालकवी''' ऊर्फ '''त्र्यंबक बापूजी ठोंबरे''' (१३ ऑगस्ट १८९० - ५ मे १९१८) हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. [[इ.स. १९०७]]मध्ये [[जळगांव|जळगावात]] पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [[कान्होबा रणछोडदास कीर्तिकर]] यांनी त्या संमेलनात ठोंबरेंना ''बालकवी'' ही उपाधी दिली. बालकवींची काव्यकारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती. मराठी लेखक आणि कवी रेव्हरंड [[नारायण वामन टिळक]] यांच्याबरोबर त्यांनी बालपणातील काही काळ घालवला . रेव्ह. ना.वा. टिळक यांनी त्र्यंबकमधील प्रतिभा ओळखून त्यांना आपल्या घरी आणले. [[लक्ष्मीबाई टिळक]] यांचे बालकवींबरोबर मातृत्वाचे संबंध होते. बालकवी जेव्हा टायफॉईडने आजारी होते तेव्हा रेव्ह. टिळकांनी व लक्ष्मीबाईंनी चाळीस दिवस त्यांची काळजी घेतली. लक्ष्मीबाईंनी त्यांच्या [[स्मृतिचित्रे]] या आत्मचरित्रात बालकवींच्या काही आठवणींचा उल्लेख केला आहे.<ref> स्मृतिचित्रे, लक्ष्मीबाई टिळक, पृष्ठे ३१८-३२२ </ref> ==काव्यपरिचय== बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात. म्हणजे हे निसर्गाचे मानवीकरण नाही किंवा अचेतन वस्तूवर चेतनारोप नाही. ‘फुलराणी’तील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रीतिकथा ह्या दृष्टीने लक्षणीय आहे. ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे. ‘अरुण’मध्ये पहाट फुलते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचे भान हरविणारे जाळे विणले आहे; पण त्या केवळ उत्प्रेक्षा नव्हेत. त्या घटनेत भाग घेणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टी तिथे सजीव होतात. इतकेच नव्हे तर कवितेच्या किमयेने रसिकही त्यांच्याशी एकरूप होतात. त्यांमागील दिव्य आणि मंगल यांच्या कवितेत अलौकिकाचा स्पर्श होतो. साध्या वर्णनात प्रतिकाची गहिरी सूचना लपलेली असते. <br /> [[बा.सी. मर्ढेकर|मर्ढेकरांच्या]] कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. अगदी अलीकडच्या ग्रेस आणि [[ना.धों. महानोर]] यांसारख्या परस्परांहून भिन्न प्रकृतीच्या कवींच्या घडणीतही बालकवींचा प्रभाव जाणवेल. ===रोमांचवादी संप्रदायाची तत्त्वे=== विषयांचे बंधन नको, निसर्गाचे वर्णन, अज्ञेयवाद आणि गूढगुंजन, ओसाड जागेचे व रात्रीच्या भयाणपणाचे तन्मयतेने वर्णन, अतिमाणूस व्यक्तींचे वर्णन, मरणाची उत्कंठा, स्वप्नाळू वृत्ती, दर्पयुक्त आशावाद, आत्मकेंद्रितता, समाजाविरुद्ध बंडखोरी, वस्तुजाताचे वर्णन करीत असताना वास्तववादाचा अवलंब न करता कल्पनावादाचा (आयडिअलिझम) अवलंब करणे. ===उदासीनता=== बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहग ह्या कविता त्यांपैकीच होत. जोपर्यंत बालकवींची तंद्री आनंदी होती तोपर्यंत त्यांची कविता म्हणजे ‘अलवार कोवळे अंग, जशि काय फुलांची मूस’ होती, पण जेव्हा ही तंद्री कोळपल्यासारखी झाली तेव्हा त्यांची कविता ‘उदासीनता’च झाली. ‘शून्य मनाच्या घुमटा’त ‘दिव्यरूपिणी सृष्टी’ भीषण रूप धारण करू लागली. काळाच्या ‘भोवऱ्या’त पडून ‘जीवित केवळ करुणासंकुल’ झाले, मनाचा पारवा ‘खिन्न नीरस एकांतगीत’ गाऊ लागला. ‘अस्मान’ ‘धरणी’ला मिळून ‘रात्रिचा’ ‘अवकाळ प्रहर’ ‘घोर’पणे ‘घुमा’यला लागला. ‘भरले घर ओके’ ‘मायेच्या हलकल्लोळा’त ‘मायेच्या हिरव्या राव्या’ला दुखवून ‘जडता पसरलेला’ जीव ‘देहाचे पंजर’ टाकून उडून गेला. ‘यमाचे दूत’ बोलावू लागले. {{ऐका | filename = Audumbar-Balkavi-Ganesh Dhamodkar.ogg | title = औदुंबर | description = बालकवींची औदुंबर ही कविता | pos = right }} ==बालकवींच्या प्रसिद्ध कविता== * [[आनंदी आनंद गडे]] * [[औदुंबर (निःसंदिग्धीकरण)|औदुंबर]] * [[फुलराणी]] * [[श्रावणमास]] ==बालकवींच्या कविता असलेली पुस्तके== * फुलराणी : बालकवींच्या निवडक कविता ([[कुसुमाग्रज]]- [[वि.वा. शिरवाडकर]]). ह्या संग्रहात ५७ कविता आहेत. * बालकवींच्या निवडक कविता (संपादक - [[ना.धों. महानोर]]). या संग्रहात ३१ कविता आहेत. शिवाय बालकवींनी लिहिलेली त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रेही आहेत. * बालकवींच्या बालकथा (आत्मकथन) * बालकवींच्या बालकविता (कवितासंग्रह, या संग्रहात २६ कविता आहेत) * बालविहग (कवितासंग्रह, संपादक - अनुराधा पोतदार, या संग्रहात एकूण ७५ कविता आहेत.) * समग्र बालकवी (संपादक - नंदा आपटे) ==बालकवींवर लिहिली गेलेली पुस्तके== * बालकवि (कृ.बा. मराठे) * बालकवी (विद्याधर भागवत) * बालकवी : मराठी कवी (व्यक्तिचित्रण, डॉ. दमयंती पांढरीपांडे) * बालकवी आणि सुमित्रानंदन पंत - एक अभ्यास (मराठी आणि हिंदीतील निसर्गकवी (पद्मावती जावळे) *त्रिदल : बालकवी, कुसुमाग्रज आणि इंदिरा संत यांच्या निवडक कविता (संपादक- डॉ. दत्तात्रय पुंडे; डॉ. स्नेहल तावरे, स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस-पुणे, प्रथमावृत्ती: १५ ऑगस्ट १९९३) या संग्रहामध्ये संपादकांनी बेचाळीस पृष्ठांची विस्तृत प्रस्तावना लिहिली असून त्यामध्ये उपरोक्त तिन्ही कवींच्या सोळा सोळा कवितांचा समावेश केला गेला आहे. [[वर्ग:कवी|ठोंबरे,त्र्यंबक बापूजी]] [[वर्ग:बालकवी|ठोंबरे,त्र्यंबक बापूजी]][[वर्ग : मराठी कवी]] ==अधिक वाचन== *[http://wikisource.org/wiki/Author:त्र्यंबक_बापूजी_ठोंबरे विकिस्रोतावर बालकवी यांच्या कविता] *[http://commons.wikimedia.org/wiki/File:Audumbar-Balkavi-Ganesh_Dhamodkar.ogg विकिमीडिया कॉमन्सवर औदुंबर या कवितेचे वाचन] ==संदर्भ== {{संदर्भयादी}} {{मराठी संगीत रंगभूमी}} {{मराठी साहित्यिक}} {{मराठी कवी}} [[वर्ग:मराठी कवी]] [[वर्ग:मराठी लेखक]] [[वर्ग:इ.स. १८९० मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९१८ मधील मृत्यू]] 8hf1us6fd0o5ff9d9oefv7j4jzih50w अहिल्यानगर 0 1856 2581365 2579112 2025-06-20T17:27:02Z Sandesh9822 66586 2581365 wikitext text/x-wiki {{जिल्हा शहर|ज= अहिल्यानगर जिल्हा|श=अहिल्यानगर}} {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार = शहर |नाव = अहिल्यानगर |स्थानिक_नाव = अहमदनगर |राज्य_नाव = महाराष्ट्र |आकाशदेखावा = Ahmednagarrailwaystation.jpg |आकाशदेखावा_शीर्षक = पुण्यश्लोक अहिल्यानगर रेल्वे स्थानक |अक्षांश = {{coord|19.08|N|74.73|E|display=inline,title}} |शोधक_स्थान = right |क्षेत्रफळ_एकूण = 85.14 |क्षेत्रफळ_आकारमान = |उंची = 656.54 |उंची_संदर्भ = |समुद्री_किनारा = |हवामान = |वर्षाव = |जिल्हा =अहिल्यानगर जिल्हा |लोकसंख्या_एकूण = 350905 |लोकसंख्या_वर्ष = २०११ |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = <ref name="GOI_2001">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = https://ahilyanagar.maharashtra.gov.in |title = अहिल्यानगर जिल्हा}}</ref> |लोकसंख्या_घनता = 8900 |लोकसंख्या_मेट्रो = |लोकसंख्या_मेट्रो_वर्ष = |लोकसंख्या_मेट्रो_संदर्भ = |लिंग_गुणोत्तर = 1.08 |साक्षरता = 77.52 |एसटीडी_कोड = २४१ |पिन_कोड = 414001 |प्रमुख पदाधिकारी = सौ. शीला शिंदे |पद = महापौर |आरटीओ_कोड = महा-१६, महा-१७ |संकेतस्थळ = https://ahilyanagar.maharashtra.gov.in |संकेतस्थळ_नाव = अहिल्यानगर संकेतस्थळ |तळटिपा = {{संदर्भयादी}} |इतर_नाव= |जवळचे_शहर= [[छत्रपती संभाजीनगर]], [[पुणे]],[[नाशिक]] |लोकसंख्या_शहरी= |लोकसंख्या_क्रमांक= |अधिकृत_भाषा=मराठी}} '''अहिल्यानगर''' (जुने नाव '''अहमदनगर''') हे शहर [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर [[छत्रपती संभाजीनगर]], [[पुणे]], [[मुंबई]], [[कल्याण (शहर)|कल्याण]], [[ठाणे]], [[सोलापूर]], [[धुळे]], [[बीड]] या शहरांना जोडले गेले आहे. == नामांतर == महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ रोजी १८ व्या शतकातील मराठा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे 'अहिल्यानगर' असे नामकरण करण्यास औपचारिक मान्यता दिली. त्यानंतर भारत सरकारने नाव बदलण्याचे सर्व निकष पूर्ण करून दिनांंक ४ ऑक्टोबर २०२४, अन्वयेे “अहमदनगर” शहराचेे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असेे केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने लगेच चार दिवसात राजपत्र काढून दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी हा जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गाव यांचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://ahilyanagar.maharashtra.gov.in|title=Ahilyanagar District website|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/ahmednagar-officially-renamed-ahilyanagar-a-tribute-to-warrior-queen-ahilyabai-holkar/articleshow/114095693.cms|title=Times of india|url-status=live}}</ref> == अहिल्यानगरचा इतिहास == निजामशाहीचे संस्थापक निजाम अहमदशाह होते. मध्ययुगीन कालखंडात दक्षिण भारत मध्ये ज्या पाच शाही होऊन गेल्या त्यामध्ये [[अहिल्यानगर जिल्हा]] निजामशाही ही स्वराज्याच्या पायाभरणीसाठी पूरक ठरली होती. भारत मध्ये मुस्लिम सत्तेची सुरुवात झाल्यानंतर विविध भागांत त्यांनी आपली सत्तास्थाने निर्माण केली होती. त्यासोबत अनेक वास्तूंची निर्मितीही झाली होती. आपल्या साम्राज्यविस्ताराचा एक भाग म्हणून त्यांनी संबंधित राजधानीला वा वास्तूला स्वतःची वा परिवाराची नावे दिली. त्यानुसार अहिल्यानगर हे नाव मिळाले. या निजामशाहीचा इतिहास मोठा रोमांचकारी आहे. [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] हे मूळचे शहर नसून प्रसंगानुसार त्याची उभारणी झालेली आहे. दौलताबाद वर स्थापन झालेल्या बहामनी राज्यात निजाम उल मुल्क पदवी धारण करणारे [[मलिक अहमद]] हा मूळचे हिंदू असून [[परभणी]] जिल्ह्यातील पाथरीच्या बहिरंभट कुलकर्णीचे नातू होते.त्यांच्या वडिलांनी-तिमाभटाने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मलिक अहमद हे तिमाभटाचा मुलगा असून [[बहामनी]] साम्राज्यात पराक्रम गाजवत ते सुभेदार पदापर्यंत पोहोचले. बहामनी साम्राज्याचा दिवाण महंमद गावानमुळे विस्तार झाला, परंतु राज्यकारभारावरील पकड ढिली होत गेल्याने बहामनी साम्राज्यातील प्रत्येक सुभेदाराने स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापले. मलिक अहमद यांनी [[जुन्नर]] या ठिकाणी राजधानी ठेवून स्वतःचे निजामशाही नावाचे स्वतंत्र राज्य झाल्याचे घोषित केले. तेव्हा बहामनीच्या फौजांनी मलिक अहमद यांच्यावर आक्रमण केले. तेव्हा [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] गावाजवळील इमाम घाटात त्यांनी बहामनी सैन्याचा दारुण पराभव केला. विजय मिळवून देणारा परिसर म्हणून याच ठिकाणी २८ मे १४९० रोजी त्यांनी एका शहराची स्थापना केली. त्याला नाव दिले [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]. विशेष म्हणजे मलिक अहमद यांच्या फौजेत असणाऱ्या राजा, सेनापती, प्रधान आणि काझी अशा सर्वांच्याच नावात अहमद होते. आपल्या मूळ पुरुषाच्या नावावरून या घराण्याने बहिरंभटावरून बहिरी नाव धारण केले तर पुढे प्रत्येक राजाने स्वतःला निजामशहा हा किताब लावला तर त्यांच्या साम्राज्याला निजामशाही म्हणले गेले. मलिक अहमद निजामशहा बहिरीने त्या ठिकाणी एका भुईकोट किल्ल्याची पायाभरणी केली आहे. त्यानुसार [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] मध्ये अंडाकृती किल्ला बांधला. या किल्ल्याचा परीघ मैलाचा असून किल्ल्याच्या भोवती मोठा खंदक, तर बाजूने २२ मोठे बुरूज आहेत. किल्ल्यामध्ये पाण्याकरिता गंगा, जमुना, मछलीबाई व शक्करबाई नावाच्या ४ विहिरी असून सोनमहल, मुल्कआबाद, गगन महल, मीना महल, [[बगदाद]] महल यांसारखे महाल बांधले. दिवसेंदिवस यात वाढ होत गेली. तत्कालीन कालखंडात या किल्ल्याच्या आजूबाजूला एका स्वतंत्र शहराची निर्मिती झाली. त्या भागाला कोट बाग ए निजाम म्हणले गेले. या कोट बाग ए निजामचे वैभव एवढे मोठे,अतिभव्य होते की,याची तुलना कैरो व [[पॅरिस] बगदाद सारख्या भव्य शहरांसोबत व्हायची. [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>च्या निजामशाहीत एकूण ११ निजाम होऊन गेले आहे. त्यापैकी चौघांचे खून झाले. १२५ वर्षे ही राजसत्ता टिकली. निजाम या शब्दाचा अर्थ होतो जमिनीची व्यवस्था पाहणारा, त्यामुळे संबंधित सुभेदाराला निजाम उल मुल्क ही पदवी असायची. अशी पदवी असणाऱ्या दोन सरदारांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. पहिले १४९०ची अहमदनगरची निजामशाही आणि दुसरी १७२४ची हैदराबादचे निजामशाही. या दोन सत्तांचा परस्पर काहीही संबंध नाही. निजामशाहीची देणगी म्हणजे हुसेन निजामशहानच्या काळात मुलुख मैदान/ मालिक - ए -मैदान जी रूमी खान दक्कनी यांनी बनवली ([[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] मध्ये तोफखाना आहे तिथे ही तोफ बनली होती; आजही हा भाग तोफखाना म्हटला जातो) जगातील भव्य असणारी तोफ. ५५ टन वजनाची ही तोफ बरेच दिवस परंड्याच्या किल्ल्यात होती.( हुसैन निजामशहा यांनी सुलताना चांद बीबी यांच्या लग्नात ही तोफ आदिल शहा यांना भेट म्हणून दिली होती) पुढे परंडा आदिलशहाकडे आल्यानंतर ऑगस्ट १६३२ साली ती बिजापूरला गेली. तोफ वाहून नेण्याकरिता १० हत्ती व ४०० बैल लागायचे. सोलापूर व [[बिजयनगर]]वर याचा वापर झाला. बिजापूरच्या उपली बुरुजावर मुलुखमैदान नावाची ही तोफ पर्यटकांचे आकर्षण आहे.शेवटचा निजामशहा मुर्तुजा (तिसरा) हा मुघलांच्या कैदेत गेले आणि १६३६ साली हे निजामशाही साम्राज्य बुडाले. तेव्हापासून १७५९ पर्यंत [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] निझाम शाही मुघलांच्या ताब्यात होते. शाहिस्तेखान, मिर्झाराजे जयसिंग आणि बादशाह औरंगजेबा यांनी छत्रपती [[शिवाजी महाराज]]<nowiki/>विरोधात मोहीम आखण्यापूर्वी बरेच दिवस [[अहिल्यानगर जिल्हा|अहमदनगर]]<nowiki/>मध्ये मुक्काम ठोकला होता/आहे. मोगलांचा बिजापूरकडे जाणारा रस्ता म्हणजे [[छत्रपती संभाजीनगर]], [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] , (परिनदा)परंडा, [[काटी]], जरखेड, मोहोळवरून पुढे जायचा. शिवाजी महाराजांनाही [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] चा किल्ला ताब्यात राहावा अशी इच्छा होती. म्हणून त्यांनी ३० मे १६६४ साली आक्रमण केले होते. मध्ययुगीन कालखंडातील प्रसिद्ध फेरिस्तासारखा इतिहासकार निजामशाहीतच घडला गेला. मराठा साम्राज्याच्या विरोधात मोहीम काढणारे बादशाह औरंगजेब आलमगीर शेवटी परत जाण्याकरिता निघाले तेव्हा १७०६ ते १७०७ या दरम्यान [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] मध्येच राहिले होते .त्यामुळे त्यांच्या कैदेत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पत्नी [[सकवारबाई]], शंभूराजांच्या पत्नी महाराणी [[येसूबाई भोसले|येसूबाई]], मुलगा [[शाहू पहिले|शाहू]]<nowiki/>सह अनेक मराठ्यांनी [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>चा पाहुणचार घेतलेला आहे. एवढेच नाही तर सतत २६ वर्षे दक्षिणेच्या मोहिमेवर असणारे बादशाह औरंगजेब आलमगीर वार्धक्यामुळे २० फेब्रुवारी १७०७ रोजी [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] मध्येच वारले आहे. पुढे १७५९ साली मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर तो महादजी शिंदेच्या जहागिरीत होता. मराठी साम्राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे नाना फडणिसांना [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>च्याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. पुढे १८१७ रोजी तो ब्रिटिशांनी जिंकल्याने त्यांनी [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>ला लष्करी छावणी उभारली. ती आजही कायम आहे. पहिल्या महायुद्धानंतर [[जर्मनी]]चे कैदी याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. ब्रिटिशांमुळे शहराच्या आधुनिकीकरणाला चालना मिळाली तर १९४२ला स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी काँग्रेसने आंदोलन उभे केले तेव्हा अनेक राजकीय कैदी [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>च्या किल्ल्यात डांबण्यात आले. पैकी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा मुक्काम दोन वर्षे होता. यादरम्यान त्यांनी ‘[[डिस्कवरी ऑफ इंडिया]]’ नावाचा ग्रंथ इथेच लिहिला. याच ठिकाणी तुरुंगात असताना आंबेडकरांनी ‘थॉट ऑफ 'पाकिस्तान' व मौलाना आझादांनी ‘गुबार -ए -खातीर’ लिहून काढला आहे. [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवरायां]]<nowiki/>चे एक विश्वासू सेनापती खंडेराव कदम [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>जवळील प्रवरा देवळालीचे रहिवासी. अशा रीतीने [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>ची निजामशाही म्हणजे हिंदू-मुस्लिमांचा मिलाफ होता. एवढेच नाही तर सुलतान अल्लाउद्दीन खिलजीनंतर दक्षिणेतील हिंदूंची तलवार म्यान झाली होती. तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम निजामशाहीत घडून आले. एका अर्थाने [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>ची निर्मिती स्वतः सूलतान मलिक अहमद यांनी केलेली असल्याने या शहराच्या नाव लौकिक जगभर होता . निजामांच्या सहिष्णुतेमुळेच अनेक मराठा सरदार तर पुढे आलेच शिवाय [[ज्ञानेश्वर]]<nowiki/>रांपासून ते [[शेख महंमद]] महाराज पर्यंतचे अनेक संत याच परिसरात निर्माण झाले. म्हणूनच संतकवी [[दासगणू महाराज|दासगणूंनी]] [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] विषयी लिहिताना म्हणले आहे की, मराठेशाहीचे जननस्थान पुण्यभूमी महापावन आहे. मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या उदयकाली [[विठोजीराजे भोसले|विठोजी भोसले]], [[मालोजी भोसले]], [[लखुजी जाधव|लखुजी जाधवराव निंबाळकर]], पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथे सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्यांच्या पदरी सेवेत होते. देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना [[साल्हेर]] आणि [[मुल्हेर]] हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवून दिल्याबद्दल देवळाली प्रवरा आणि रुई ही गावे [[इ.स. १५८०]] साली इनाम मिळाली होती. पुढे बिजापूरकारांशी लढताना बाजी कदमांचा बंकापूर ([[कर्नाटक]]) येथे मृत्यू झाला. आजही त्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि तिसरे बाजी हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. ह्यांच्याकडे [[राजगड]] किल्ल्याची तटसरनौबती होती. [[शिवाजी महाराज|शिवाजी]] महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत [[तामिळनाडू]] येथील वली गंडापुराम हा किल्ला जिंकला. ह्या किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. [[राजाराम भोसले|छत्रपती राजाराम]] महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी स्वराज्यासाठी आपले पूर्ण योगदान अर्पण केले. [[पानिपत]]च्या लढाईत ह्या घरातील सात पुरुष कामी आले. आजही कदमांकडे पारंपरिक आणि दुर्मिळ अशी जुनी शस्त्रे जपलेली आहेत. त्यांत धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, ढाली, बिचवे, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवकालीन शिवराया आणि इतर ऐतिहासिक साधने आहेत. == शिक्षण == ===विद्यापीठ=== *महात्मा फुले कृषी विद्यापीठ ता. राहुरी जि. अहिल्यानगर *संजीवनी विद्यापीठ ता.कोपरगाव जि. अहिल्यानगर ===अभियांत्रिकी महाविद्यालये=== * डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहिल्यानगर *प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी, प्रवरानगर,अहिल्यानगर *विश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, अहिल्यानगर *अडसूळ टेक्निकल कॅम्पस, चास, जिल्हा.अहिल्यानगर *श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, नेप्ती,अहिल्यानगर *राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्जुले हरिया ता.पारनेर, जि.अहिल्यानगर *अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर *संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर *विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय, बोटा, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर *मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालय ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर *श्री साईबाबा अभियांत्रिकी, संशोधन आणि संबंधित विज्ञान संस्था, ता.राहता, जि.अहिल्यानगर *समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय, ता. शेवगाव, जि.अहिल्यानगर === फार्मसी === *आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी फार्मसी, मु. बोधेगाव, शेवगाव, जि.अहिल्यानगर(५४१६) *अडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी जि.अहिल्यानगर(५५२२) *अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर, जि.अहिल्यानगर(५१९४) *अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेची अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, संगमनेर (५२८७) *अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, केडगाव (५४६१) *अशोक कॉलेज ऑफ फार्मसी (५५१९) *अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी, मांची हिल (५४७९) *धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे फार्मसी कॉलेज, वाळकी, अहिल्यानगर (५४६२) *डीके औटी कॉलेज ऑफ फार्मसी (५४९२) *डॉ इथापे इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी संगमनेर (५४८२) *डॉ. कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोळपेवाडी (५४६०) *डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी,अहिल्यानगर (५१९१) *मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (कॉलेज ऑफ फार्मसी)-परिक्रमा, काष्टी, श्रीगोंदा, अहिल्यानगर(५३०३) *कै.देवराव दिगंबर वरात कॉलेज ऑफ फार्मसी, साकत ता. जामखेड जि. अहिल्यानगर (५५३३) *काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे काकासाहेब मस्के कॉलेज ऑफ फार्मसी, नागापूर,अहिल्यानगर (५२८५) *लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी, आदिनाथनगर (५५२३) *मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी, कर्जुले हरिया ता.पारनेर, अहिल्यानगर(५४४६) *मातोश्री राधा कॉलेज ऑफ डी.फार्मसी, वीरगाव (5480) *श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ डी. फार्मसी, गणेगाव (५४८१) *मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी.सोनई (५१९३) *पी. व्ही. बेल्हेकर कॉलेज ऑफ फार्मसी, भानशिवारे (५५०७) *प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीरामपूर (५४२४) *प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (विद्यापीठ मानली जाते) - (U-0322), अहिल्यानगर - (तांत्रिक शिक्षण) (950322) *प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,लोणी खुर्द (5425) *प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरारानगर (५१८५) *राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण(५४७७) *राष्ट्रीय शिक्षण मंडळ एन एन सत्था कॉलेज ऑफ फार्मसी,अहिल्यानगर (5478) *रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्म) रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा. अहिल्यानगर (एमएस) (६९१७) *रत्नदीप फार्मसी कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर (५४६५) *रत्नदीप फार्मसी कॉलेज, रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर (५४८९) *साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,घारगाव, ता.श्रीगोंदा(५४७१) *साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी (५५१७) *संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च,कोपरगाव (5195) *सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. एन.जे. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा),अहिल्यानगर(५४५१) *शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर (5454) *शिवा ट्रस्ट, शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी, पाचेगाव ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर(५४६६) *श्रद्धा ग्रामीण वैद्यकीय सामाजिक कल्याण व शिक्षण सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (५३००) *श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बोटा (५४८४) *श्री. लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेज, ढोरजलगाव-पूर्व (५५४०) *श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, राहुरी फॅक्टरी, अहिल्यानगर(5211) *त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेज, खडके, ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर (५५४१) *विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा(५४६४) *विश्वभारती अकादमी,कॉलेज ऑफ फार्मसी, सारोदा बड्डी, अहिल्यानगर (5506) *वाणी कॉलेज ऑफ फार्मसी (५५१५) ===शेती(एग्रीकल्चर)=== *कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, A/p. मदडगाव, पोस्ट. भातोडी,ता. जि. अहिल्यानगर (१९२१२) *कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, चंद्रपूर रोड, I.T.I., फार्मसी कॅम्पस, मु. पोस्ट. लोणी बु., ता. ओ राहाता जि. अहिल्यानगर ४१३७१३.(१९१८३) *कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर-४२२६०८ (१५२०१) *कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मिरजगाव, ता.कर्जत जिल्हा अहिल्यानगर (१५१९९) *कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर. ४२२६०५ (१८२६४) *कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर ४१३७१३. (१८२७५) *कृषी महाविद्यालय, भानाशिवरा, ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर (११२९७) *कृषी महाविद्यालय, घारगाव, ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर (११२८२) *कृषी महाविद्यालय, मदडगाव (11313) *कृषी महाविद्यालय, प्रवरानगर, लोणी, ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर (11281) *कृषी महाविद्यालय, वडगाव गुप्ता (विळद घाट), पोस्ट. एमआयडीसी, जि. अहिल्यानगर(११२८७) *कृषी महाविद्यालय, सोनई, ता. नेवासा जिल्हा. अहिल्यानगर ४१४१०५.(१११३४) *अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, घारगाव, जिल्हा. अहिल्यानगर (१६२८५) *कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, खडके वेक. (१६३८३) *डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अ‍ॅग्री. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जिल्हा. अहिल्यानगर ४१३७२२. (१५१२४) *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर (११३०१) *सदगुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव, (टोल नाक्याजवळ) ता. कर्जत, जि. अहिल्यानगर ४१४४०१.(११२०८) *सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर (11308) *श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मु.मालदाड, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर-४२२६०८(११२०७) *श्रमशक्ती कॉलेज ऑफ फूड तंत्रज्ञान, मु. मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर-४२२६०८ (१६२१४) *वृंदावन कॉलेज ऑफ कृषी, गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर, जिल्हा-अहिल्यानगर (११३१५) == लष्करी छावणी == [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] येथे: * इंडियन आर्मर्ड कॉर्प्स सेंटर आणि स्कूल (ACC&S), * [[मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट|मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर (MIRC)]], * [https://en.wikipedia.org/wiki/Vehicle%20Research%20and%20Development%20Establishment वाहन संशोधन आणि विकास आस्थापना] (VRDE), * गुणवत्ता हमी वाहनांचे नियंत्रक (CQAV) भारतीय आर्मी आर्मर्ड कॉर्प्ससाठी प्रशिक्षण आणि भरती ACC&S येथे होते. पूर्वी, हे शहर इतर युनिट्ससह [[ब्रिटिश आर्मी|ब्रिटिश सैन्याच्या]] [https://en.wikipedia.org/wiki/Royal%20Tank%20Regiment रॉयल टँक कॉर्प्स] / इंडियन आर्मर्ड कॉर्प्सचे भारतीय तळ होते. या शहरामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लष्करी टँक आणि आशियातील सर्वात मोठे प्रदर्शन आहे.<ref>{{cite web |url=http://ahmednagar.nic.in/html_docs/history_of_ahmedngar_district.htm |title=The History of Ahmednagar |publisher=Ahmednagar.nic.in |date=15 August 1947 |access-date=23 November 2011 |archive-url=https://web.archive.org/web/20111007150425/http://ahmednagar.nic.in/html_docs/history_of_ahmedngar_district.htm |archive-date=7 October 2011 |url-status=dead }}</ref> == भूगोल == '''१. स्थान :-''' [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] शहराचे स्थान १९.०८° उत्तर अक्षांश, ७४.७३° पूर्व रेखांश असे आहे. शहराची समुद्रसपाटीपासून उंची ६४९ मीटर आहे.अहिल्यानगर हा क्षेत्रफळाने महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा जिल्हा आहे.या जिल्हाला सात जिल्ह्यांच्या सिमानी जोडले आहे/आहेत. '''२. जमिनीचे प्रकार :-''' [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]' जिल्ह्यात विविध प्रकारची जमीन आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीचा डोंगराळ भाग आहेत. त्यांना [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]], अदुला, बालेश्वर आणि [[हरिश्चंद्रगड|हरिश्र्चंद्रगड]] डोंगरी रांग म्हणतात. सह्याद्रीतील सर्वाधिक उंच शिखर [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]] हे [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] जिल्ह्यात आहे. [[हरिश्चंद्रगड]], [[रतनगड]], [[कुलंग]] आणि अजूबा हे जिल्ह्यातील काही शिखर आहेत. [[पुणे जिल्हा|पुणे]]-[[संगमनेर]] रोडवरील चांदापुरी घाटावरील रंधा धबधब्याच्या मार्गावर आपल्याला विटा घाट दिसेल. [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] जिल्ह्याच्या भोगोलिक रचनेनुसार तीन प्राकृतिक विभाग पडतात. १) पश्चिमी डोंगराळ क्षेत्र २) मध्यवर्ती पठार प्रदेश ३) उत्तरेकडील आणि दक्षिणी मैदानाचे क्षेत्र '''१. पश्चिमी डोंगराळ क्षेत्र :''' [[अकोले तालुका]] व [[संगमनेर तालुका|संगमनेर]] तालुक्यांचा या प्रदेशामध्ये समावेश होतो. या प्रदेशातील अदुला, बालेश्वर आणि हरिशचंद्रगडच्या पर्वत रांगांमध्ये एकाच भागात अनेक उच्च शिखरे आढळतात. सह्याद्रीतील ५४२७ फूट उंच असलेले सर्वोच्च शिखर कळसूबाई हे याच प्रदेशात आहे. '''२. मध्यवर्ती पठार प्रदेश :''' या क्षेत्रात [[पारनेर]], [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] तालुका आणि [[संगमनेर]],[[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] आणि [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]] तालुक्यातील काही भाग या क्षेत्रात येतो. '''३.उत्तर आणि दक्षिण मैदानाचे क्षेत्र :''' या क्षेत्रात उत्तरी [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]], [[राहाता तालुका|राहाता]], [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]], [[राहुरी तालुका|राहुरी]], [[शेवगाव तालुका|शेवगाव]], [[नेवासा तालुका|नेवास्याचा]] समावेश आहे. हा [[गोदावरी नदी|गोदावरी]] आणि [[प्रवरा नदी|प्रवरा]] नदीच्या खोरयाच भाग आहे. [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]], [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]], [[जामखेड तालुका|जामखेड]] या दक्षिणेकडील तालुक्यांचा भागही या भौतिक विभागात समाविष्ट केला आहे. या प्रदेशात [[घोड नदी|घोड]], [[भीमा नदी|भीमा]] आणि [[सीना नदी|सिना]] नद्यांचे खोरे आहे. == अहिल्यानगर जिल्ह्यातील नद्या == [[गोदावरी]] आणि [[भीमा]] ह्या जिल्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. [[भीमा नदी|भीमा]] ही [[कृष्णा]] नदीची उपनदी आहे. या नद्यांचे पाणलोट क्षेत्र [[हरिश्चंद्रगड|हरिश्चंद्रगडावर]] आणि जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेले आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या अन्य नद्या [[प्रवरा]], [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा]], [[सीना नदी|सिना]] आणि [[धोरा नदी|धोरा]] या आहेत. [[प्रवरा नदी|प्रवरा]] नदी [[गोदावरी नदी|गोदावरी]]<nowiki/>ची उपनदी आहे. [[प्रवरा नदी|प्रवरा]] नदीवर [[अकोले तालुका|अकोले]] तालुक्यात [[भंडारदरा]] येथे धरण बांधण्यात आले आहे. धरण परिसरात [[रंधा धबधबा]] आहे. [[मुळा नदी (भारत)|मुळा]] नदीवर [[राहुरी तालुका|राहुरी]] तालुक्यात बारागाव नांदूर येथे [[मुळा धरण]] बांधण्यात आले आहे. == वने == अहिल्या नगर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात जंगल आहे. [[साग]], [[बाभूळ]], [[धावडा]], हळदू आणि [[कडुलिंब|नीम]] ही या जंगलात आढळणारी प्रमुख झाडे आहेत. [[आंबा]], हळदी, [[आवळा]], [[बोर]], [[मोसंबी]], इत्यादी फळझाडे जिल्ह्यात आढळतात. == अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती == * [[संत ज्ञानेश्वर]] - यांनी [[नेवासा]] येथे पैस खांबाला टेकून [[ज्ञानेश्वरी]] लिहिली. * अहमदनगर निजाम शाही * [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] मध्ये हजरत मिरावली बाबा पहाड यांचा दरगाह आहे. * हजरत शाहशरीक यांचा दरगाह * हजरत दम बाराहजारी यांचा दरगाह * हजरत बाबा बंगाल शाह यांचा दरगाह * [[साईबाबा]] - राहाता तालुक्यातील [[शिर्डी]] हे संत साईबाबांची कर्मभूमी असणारे गाव आहे. * श्री संत मच्छिंद्रनाथ भाऊ महाराज * [[आनंदऋषीजी|आचार्य आनंद ऋषीजी महाराज]] * [[अवतार मेहेर बाबा]] * [[सदाशिव अमरापूरकर]] - प्रसिद्ध अभिनेते * [[रावसाहेब पटवर्धन]] - थोर स्वातंत्र्यसेनानी * [[अच्युतराव पटवर्धन]] - थोर स्वातंत्र्यसेनानी * [[सेनापती बापट]]- थोर स्वातंत्र्य सेनानी * [[त्र्यंबक शिवराम भारदे|बाळासाहेब भारदे]] * [[भाई सथ्था]] - कम्युनिस्ट नेते * सेनापती [[दादा चौधरी]] - कम्युनिस्ट नेते * [[मधू दंडवते]] - संसदपटू * कवी [[ना.वा. टिळक|नारायण वामन (रेव्हरंड) टिळक]] * [[लक्ष्मीबाई टिळक]] * [[अण्णा हजारे]] - ज्येष्ठ समाजसेवक * [[नरेंद्र फिरोदिया]] - उद्योजक * महानुभाव पंथाचे संस्थापक [[चक्रधर स्वामी]] यांची सर्वात जास्त चरणांकित स्थाने नगरमध्येच आहेत. * [[निवृत्तीनाथ महाराज देशमुख]] (इंदुरीकर महाराज) *[[भगवानबाबा|संत भगवान बाबा]] *डॉ. कुमार सप्तर्षी (सं. अध्यक्ष - युवक क्रांती दल ) * ऋषभ कोंडावार (अभिनेता) * [[अहिल्याबाई होळकर|पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर]] == वाहतूक व्यवस्था == [[मुंबई]] - [[विशाखापट्टणम]] [[राष्ट्रीय महामार्ग २२२]] [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] शहरातून जातो.[[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] शहर हे [[पुणे]] - [[छत्रपती संभाजीनगर]] - [[सोलापूर]] - [[बीड]] - [[धाराशिव जिल्हा|धाराशिव]] - [[नाशिक]] - [[धुळे]] - [[कल्याण (शहर)|कल्याण]] - [[मुंबई]] - [[ठाणे]] महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी राज्य महामार्गांने जोडले गेले आहे. [[दौंड]] - [[मनमाड]] लोहमार्गावरील अहमदनगर रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे . == अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे== *'हरेश्वर संस्थान डमाळवाडी (चिचोंडी)पाथर्डी * '''दुर्गादेवी मंदिर शिराळ''': पाथर्डी तालुक्यातील शिराळ हे गाव अहमदनगर पासून उत्तर - पूर्वेला सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर छत्रपती संभाजीनगर रोड वरील पांढरीचा पूल-करंजी या रोडवर आहे. शिराळ गावामध्ये पश्चिम-दक्षिणेस नदीकाठापासून सुमारे शंभर फूटावर आदिशक्ती श्री दुर्गा देवीचे भव्य-सुंदर मंदिर आहे. मंदिरासमोर एक मोठी दीपमाळ आहे. * [[शनी शिंगणापूर]] - ता. [[नेवासा]] येथे शनीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. येथे कुठल्याही घराला आणि बँकांनासुद्धा कुलपे नाहीत. शनिदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो अशी स्थानिक लोकांची अशी भावना आहे. * [[शिर्डी]] - हे ठिकाण साईबाबांच्या वास्तव्यासाठी आणि मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शिर्डीला छोटी मुंबई असे म्हणतात. शिर्डीला विमानतळ आहे. * [[सिद्धटेक]]-येथील सिद्धिविनायक मंदिर हे [[अष्टविनायक]] मंदिरांपैकी एक मंदिर आहे. *[[विशाल गणपती|विशाल गणपती मंदिर]] - हे नगरचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर अहिल्यानगर च्या माळीवाडा भागात आहे. * '''रेणुकामाता मंदिर (केडगांव)''' - केडगांव [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] रेल्वेस्थानकापासून साधारण पणे ३ किलोमीटरवर आणि lअहमदनगर बसस्थानकापासून सुमारे ५ किलोमीटरवर आहे/आहेत. * '''ब्रह्मनाथ''' - पाथर्डी तालुक्यातील सोनोशी गाव येथील तीर्थस्थान आहे. * [[भुईकोट किल्ला]] - इ.स. १९४२ साली [[जवाहरलाल नेहरू]] यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. तेथे त्यांनी "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" हे पुस्तक लिहिले. * [[हरिश्चंद्रगड]] - एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा अहमदनगर पासून अंदाजे १२५ किलोमीटर अंतरावर आहे. सुप्रसिद्ध कोकणकडा येथेच आहे. नाक्लेस फॉल सुप्रसिद्ध आहे. * [[भगवानगड]] - हे [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] तालुक्यातील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या [[धौम्य|धौम्य ऋषींचे]] मंदिर आहे. तसेच [[जनार्दनस्वामी]], [[भगवानबाबा]] व [[भीमसिंह महाराज]] यांच्या समाध्या येथे आहेत. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. * [[राहुरी]] तालुक्यातील ताहराबाद येथील श्री. संत कवी महिपती महाराज यांची समाधी आहे. * राहुरी तालुक्यातील [[मुळा धरण]] प्रसिद्ध आहे. * [[भंडारदरा धरण]] - [[अकोले तालुका|अकोले तालुक्यात]] हे धरण असून येथील नेकलेस स्वरूपातला धबधबा अद्भुत आहे. * शेषनारायण मंदिर हे भारतातील  सर्वात दुर्मिळ ( एकमेव शेषनारायण मंदिर ) मंदिर असून हे अकोले तालुका पासून ४ किलिमीटर अंतरावर कुंभेफळ येथे आहे . * [[राशिन]] - [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]] तालुक्यात येथे श्री जगदंबा यमाई देवी मंदिर आहे संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. पेशवा पहिले बाजीराव यांच्या घराण्याची कुलदैवता ही राशिनची देवी ओळखली जाते व श्री गोपिकाबाई पेशवीन आणि नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराला भेट दिली होती अशे इतिहासात पुरावे आहेत. * [[अहिल्याबाई होळकर|अहिल्यादेवी होळकर]] - यांचे जन्मस्थान [[जामखेड तालुका|जामखेड तालुक्यातील]] [[चोंडी]] येथे आहे. * [[देवगड (नेवासा)|देवगड]] - हे नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध असे श्री दत्तक्षेत्र असून अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील ठिकाण आहे. अहिल्यानगरपासून सुमारे ६६ कि.मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. सदर मंदिर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान प.प. श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला. == राजकारणशास्त्र == [[अहिल्यानगर जिल्हा परिषद]] २००३ मध्ये महानगरपालिकेत श्रेणीसुधारित करण्यात आली. २०२२ पर्यंत शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे या विद्यमान महापौर होत्या. अहिल्यानगर शहराचे प्रतिनिधित्व केंद्रीय आणि राज्य विधानसभेत अनुक्रमे [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] लोकसभा आणि [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] शहर विधानसभेद्वारे केले जाते. २०२२ पर्यंत विद्यमान खासदार [[सुजय विखे पाटील|डॉ. सुजय विखे पाटील]] होते, तर विद्यमान आमदार संग्राम जगताप होते. == हे सुद्धा पहा == * [[जोर्वे]] (पुरातत्त्व उत्खनन स्थळ) * [[अहिल्यानगर किल्ला]] == संदर्भ == {{संदर्भयादी}} ==बाह्य दुवे== * [http://ahmednagar.gov.in अहिल्यानगर जिल्हा] * [http://amc.gov.in/ अहिल्यानगर महानगरपालिका] {{अहमदनगर जिल्हा}} {{अहमदनगर जिल्ह्यातील तालुके}} {{महाराष्ट्रातील जिल्हे}} [[वर्ग:अहमदनगर जिल्हा]अहमदनगर शहर] qvyhp6xs8xe20bx7g70cpejdbfmelqx 2581366 2581365 2025-06-20T17:27:46Z Sandesh9822 66586 2581366 wikitext text/x-wiki {{जिल्हा शहर|ज= अहिल्यानगर जिल्हा|श=अहिल्यानगर}} {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार = शहर |नाव = अहिल्यानगर |स्थानिक_नाव = अहमदनगर |राज्य_नाव = महाराष्ट्र |आकाशदेखावा = Ahmednagarrailwaystation.jpg |आकाशदेखावा_शीर्षक = पुण्यश्लोक अहिल्यानगर रेल्वे स्थानक |अक्षांश = {{coord|19.08|N|74.73|E|display=inline,title}} |शोधक_स्थान = right |क्षेत्रफळ_एकूण = 85.14 |क्षेत्रफळ_आकारमान = |उंची = 656.54 |उंची_संदर्भ = |समुद्री_किनारा = |हवामान = |वर्षाव = |जिल्हा =अहिल्यानगर जिल्हा |लोकसंख्या_एकूण = 350905 |लोकसंख्या_वर्ष = २०११ |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = <ref name="GOI_2001">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = https://ahilyanagar.maharashtra.gov.in |title = अहिल्यानगर जिल्हा}}</ref> |लोकसंख्या_घनता = 8900 |लोकसंख्या_मेट्रो = |लोकसंख्या_मेट्रो_वर्ष = |लोकसंख्या_मेट्रो_संदर्भ = |लिंग_गुणोत्तर = 1.08 |साक्षरता = 77.52 |एसटीडी_कोड = २४१ |पिन_कोड = 414001 |प्रमुख पदाधिकारी = सौ. शीला शिंदे |पद = महापौर |आरटीओ_कोड = महा-१६, महा-१७ |संकेतस्थळ = https://ahilyanagar.maharashtra.gov.in |संकेतस्थळ_नाव = अहिल्यानगर संकेतस्थळ |तळटिपा = {{संदर्भयादी}} |इतर_नाव= |जवळचे_शहर= [[छत्रपती संभाजीनगर]], [[पुणे]],[[नाशिक]] |लोकसंख्या_शहरी= |लोकसंख्या_क्रमांक= |अधिकृत_भाषा=मराठी}} '''अहिल्यानगर''' (जुने नाव '''अहमदनगर''') हे शहर [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर [[छत्रपती संभाजीनगर]], [[पुणे]], [[मुंबई]], [[कल्याण (शहर)|कल्याण]], [[ठाणे]], [[सोलापूर]], [[धुळे]], [[बीड]] या शहरांना जोडले गेले आहे. == नामांतर == महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ रोजी १८ व्या शतकातील मराठा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे 'अहिल्यानगर' असे नामकरण करण्यास औपचारिक मान्यता दिली. त्यानंतर भारत सरकारने नाव बदलण्याचे सर्व निकष पूर्ण करून दिनांंक ४ ऑक्टोबर २०२४, अन्वयेे “अहमदनगर” शहराचेे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असेे केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने लगेच चार दिवसात राजपत्र काढून दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी हा जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गाव यांचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://ahilyanagar.maharashtra.gov.in|title=Ahilyanagar District website|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/ahmednagar-officially-renamed-ahilyanagar-a-tribute-to-warrior-queen-ahilyabai-holkar/articleshow/114095693.cms|title=Times of india|url-status=live}}</ref> == अहिल्यानगरचा इतिहास == निजामशाहीचे संस्थापक निजाम अहमदशाह होते. मध्ययुगीन कालखंडात दक्षिण भारत मध्ये ज्या पाच शाही होऊन गेल्या त्यामध्ये [[अहिल्यानगर जिल्हा]] निजामशाही ही स्वराज्याच्या पायाभरणीसाठी पूरक ठरली होती. भारत मध्ये मुस्लिम सत्तेची सुरुवात झाल्यानंतर विविध भागांत त्यांनी आपली सत्तास्थाने निर्माण केली होती. त्यासोबत अनेक वास्तूंची निर्मितीही झाली होती. आपल्या साम्राज्यविस्ताराचा एक भाग म्हणून त्यांनी संबंधित राजधानीला वा वास्तूला स्वतःची वा परिवाराची नावे दिली. त्यानुसार अहिल्यानगर हे नाव मिळाले. या निजामशाहीचा इतिहास मोठा रोमांचकारी आहे. [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] हे मूळचे शहर नसून प्रसंगानुसार त्याची उभारणी झालेली आहे. दौलताबाद वर स्थापन झालेल्या बहामनी राज्यात निजाम उल मुल्क पदवी धारण करणारे [[मलिक अहमद]] हा मूळचे हिंदू असून [[परभणी]] जिल्ह्यातील पाथरीच्या बहिरंभट कुलकर्णीचे नातू होते.त्यांच्या वडिलांनी-तिमाभटाने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मलिक अहमद हे तिमाभटाचा मुलगा असून [[बहामनी]] साम्राज्यात पराक्रम गाजवत ते सुभेदार पदापर्यंत पोहोचले. बहामनी साम्राज्याचा दिवाण महंमद गावानमुळे विस्तार झाला, परंतु राज्यकारभारावरील पकड ढिली होत गेल्याने बहामनी साम्राज्यातील प्रत्येक सुभेदाराने स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापले. मलिक अहमद यांनी [[जुन्नर]] या ठिकाणी राजधानी ठेवून स्वतःचे निजामशाही नावाचे स्वतंत्र राज्य झाल्याचे घोषित केले. तेव्हा बहामनीच्या फौजांनी मलिक अहमद यांच्यावर आक्रमण केले. तेव्हा [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] गावाजवळील इमाम घाटात त्यांनी बहामनी सैन्याचा दारुण पराभव केला. विजय मिळवून देणारा परिसर म्हणून याच ठिकाणी २८ मे १४९० रोजी त्यांनी एका शहराची स्थापना केली. त्याला नाव दिले [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]. विशेष म्हणजे मलिक अहमद यांच्या फौजेत असणाऱ्या राजा, सेनापती, प्रधान आणि काझी अशा सर्वांच्याच नावात अहमद होते. आपल्या मूळ पुरुषाच्या नावावरून या घराण्याने बहिरंभटावरून बहिरी नाव धारण केले तर पुढे प्रत्येक राजाने स्वतःला निजामशहा हा किताब लावला तर त्यांच्या साम्राज्याला निजामशाही म्हणले गेले. मलिक अहमद निजामशहा बहिरीने त्या ठिकाणी एका भुईकोट किल्ल्याची पायाभरणी केली आहे. त्यानुसार [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] मध्ये अंडाकृती किल्ला बांधला. या किल्ल्याचा परीघ मैलाचा असून किल्ल्याच्या भोवती मोठा खंदक, तर बाजूने २२ मोठे बुरूज आहेत. किल्ल्यामध्ये पाण्याकरिता गंगा, जमुना, मछलीबाई व शक्करबाई नावाच्या ४ विहिरी असून सोनमहल, मुल्कआबाद, गगन महल, मीना महल, [[बगदाद]] महल यांसारखे महाल बांधले. दिवसेंदिवस यात वाढ होत गेली. तत्कालीन कालखंडात या किल्ल्याच्या आजूबाजूला एका स्वतंत्र शहराची निर्मिती झाली. त्या भागाला कोट बाग ए निजाम म्हणले गेले. या कोट बाग ए निजामचे वैभव एवढे मोठे,अतिभव्य होते की,याची तुलना कैरो व [[पॅरिस] बगदाद सारख्या भव्य शहरांसोबत व्हायची. [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>च्या निजामशाहीत एकूण ११ निजाम होऊन गेले आहे. त्यापैकी चौघांचे खून झाले. १२५ वर्षे ही राजसत्ता टिकली. निजाम या शब्दाचा अर्थ होतो जमिनीची व्यवस्था पाहणारा, त्यामुळे संबंधित सुभेदाराला निजाम उल मुल्क ही पदवी असायची. अशी पदवी असणाऱ्या दोन सरदारांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. पहिले १४९०ची अहमदनगरची निजामशाही आणि दुसरी १७२४ची हैदराबादचे निजामशाही. या दोन सत्तांचा परस्पर काहीही संबंध नाही. निजामशाहीची देणगी म्हणजे हुसेन निजामशहानच्या काळात मुलुख मैदान/ मालिक - ए -मैदान जी रूमी खान दक्कनी यांनी बनवली ([[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] मध्ये तोफखाना आहे तिथे ही तोफ बनली होती; आजही हा भाग तोफखाना म्हटला जातो) जगातील भव्य असणारी तोफ. ५५ टन वजनाची ही तोफ बरेच दिवस परंड्याच्या किल्ल्यात होती.( हुसैन निजामशहा यांनी सुलताना चांद बीबी यांच्या लग्नात ही तोफ आदिल शहा यांना भेट म्हणून दिली होती) पुढे परंडा आदिलशहाकडे आल्यानंतर ऑगस्ट १६३२ साली ती बिजापूरला गेली. तोफ वाहून नेण्याकरिता १० हत्ती व ४०० बैल लागायचे. सोलापूर व [[बिजयनगर]]वर याचा वापर झाला. बिजापूरच्या उपली बुरुजावर मुलुखमैदान नावाची ही तोफ पर्यटकांचे आकर्षण आहे.शेवटचा निजामशहा मुर्तुजा (तिसरा) हा मुघलांच्या कैदेत गेले आणि १६३६ साली हे निजामशाही साम्राज्य बुडाले. तेव्हापासून १७५९ पर्यंत [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] निझाम शाही मुघलांच्या ताब्यात होते. शाहिस्तेखान, मिर्झाराजे जयसिंग आणि बादशाह औरंगजेबा यांनी छत्रपती [[शिवाजी महाराज]]<nowiki/>विरोधात मोहीम आखण्यापूर्वी बरेच दिवस [[अहिल्यानगर जिल्हा|अहमदनगर]]<nowiki/>मध्ये मुक्काम ठोकला होता/आहे. मोगलांचा बिजापूरकडे जाणारा रस्ता म्हणजे [[छत्रपती संभाजीनगर]], [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] , (परिनदा)परंडा, [[काटी]], जरखेड, मोहोळवरून पुढे जायचा. शिवाजी महाराजांनाही [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] चा किल्ला ताब्यात राहावा अशी इच्छा होती. म्हणून त्यांनी ३० मे १६६४ साली आक्रमण केले होते. मध्ययुगीन कालखंडातील प्रसिद्ध फेरिस्तासारखा इतिहासकार निजामशाहीतच घडला गेला. मराठा साम्राज्याच्या विरोधात मोहीम काढणारे बादशाह औरंगजेब आलमगीर शेवटी परत जाण्याकरिता निघाले तेव्हा १७०६ ते १७०७ या दरम्यान [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] मध्येच राहिले होते .त्यामुळे त्यांच्या कैदेत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पत्नी [[सकवारबाई]], शंभूराजांच्या पत्नी महाराणी [[येसूबाई भोसले|येसूबाई]], मुलगा [[शाहू पहिले|शाहू]]<nowiki/>सह अनेक मराठ्यांनी [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>चा पाहुणचार घेतलेला आहे. एवढेच नाही तर सतत २६ वर्षे दक्षिणेच्या मोहिमेवर असणारे बादशाह औरंगजेब आलमगीर वार्धक्यामुळे २० फेब्रुवारी १७०७ रोजी [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] मध्येच वारले आहे. पुढे १७५९ साली मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर तो महादजी शिंदेच्या जहागिरीत होता. मराठी साम्राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे नाना फडणिसांना [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>च्याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. पुढे १८१७ रोजी तो ब्रिटिशांनी जिंकल्याने त्यांनी [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>ला लष्करी छावणी उभारली. ती आजही कायम आहे. पहिल्या महायुद्धानंतर [[जर्मनी]]चे कैदी याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. ब्रिटिशांमुळे शहराच्या आधुनिकीकरणाला चालना मिळाली तर १९४२ला स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी काँग्रेसने आंदोलन उभे केले तेव्हा अनेक राजकीय कैदी [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>च्या किल्ल्यात डांबण्यात आले. पैकी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा मुक्काम दोन वर्षे होता. यादरम्यान त्यांनी ‘[[डिस्कवरी ऑफ इंडिया]]’ नावाचा ग्रंथ इथेच लिहिला. याच ठिकाणी तुरुंगात असताना आंबेडकरांनी ‘थॉट ऑफ 'पाकिस्तान' व मौलाना आझादांनी ‘गुबार -ए -खातीर’ लिहून काढला आहे. [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवरायां]]<nowiki/>चे एक विश्वासू सेनापती खंडेराव कदम [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>जवळील प्रवरा देवळालीचे रहिवासी. अशा रीतीने [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>ची निजामशाही म्हणजे हिंदू-मुस्लिमांचा मिलाफ होता. एवढेच नाही तर सुलतान अल्लाउद्दीन खिलजीनंतर दक्षिणेतील हिंदूंची तलवार म्यान झाली होती. तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम निजामशाहीत घडून आले. एका अर्थाने [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>ची निर्मिती स्वतः सूलतान मलिक अहमद यांनी केलेली असल्याने या शहराच्या नाव लौकिक जगभर होता . निजामांच्या सहिष्णुतेमुळेच अनेक मराठा सरदार तर पुढे आलेच शिवाय [[ज्ञानेश्वर]]<nowiki/>रांपासून ते [[शेख महंमद]] महाराज पर्यंतचे अनेक संत याच परिसरात निर्माण झाले. म्हणूनच संतकवी [[दासगणू महाराज|दासगणूंनी]] [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] विषयी लिहिताना म्हणले आहे की, मराठेशाहीचे जननस्थान पुण्यभूमी महापावन आहे. मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या उदयकाली [[विठोजीराजे भोसले|विठोजी भोसले]], [[मालोजी भोसले]], [[लखुजी जाधव|लखुजी जाधवराव निंबाळकर]], पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथे सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्यांच्या पदरी सेवेत होते. देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना [[साल्हेर]] आणि [[मुल्हेर]] हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवून दिल्याबद्दल देवळाली प्रवरा आणि रुई ही गावे [[इ.स. १५८०]] साली इनाम मिळाली होती. पुढे बिजापूरकारांशी लढताना बाजी कदमांचा बंकापूर ([[कर्नाटक]]) येथे मृत्यू झाला. आजही त्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि तिसरे बाजी हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. ह्यांच्याकडे [[राजगड]] किल्ल्याची तटसरनौबती होती. [[शिवाजी महाराज|शिवाजी]] महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत [[तामिळनाडू]] येथील वली गंडापुराम हा किल्ला जिंकला. ह्या किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. [[राजाराम भोसले|छत्रपती राजाराम]] महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी स्वराज्यासाठी आपले पूर्ण योगदान अर्पण केले. [[पानिपत]]च्या लढाईत ह्या घरातील सात पुरुष कामी आले. आजही कदमांकडे पारंपरिक आणि दुर्मिळ अशी जुनी शस्त्रे जपलेली आहेत. त्यांत धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, ढाली, बिचवे, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवकालीन शिवराया आणि इतर ऐतिहासिक साधने आहेत. == शिक्षण == ===विद्यापीठ=== *महात्मा फुले कृषी विद्यापीठ ता. राहुरी जि. अहिल्यानगर *संजीवनी विद्यापीठ ता.कोपरगाव जि. अहिल्यानगर ===अभियांत्रिकी महाविद्यालये=== * डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहिल्यानगर *प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी, प्रवरानगर,अहिल्यानगर *विश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, अहिल्यानगर *अडसूळ टेक्निकल कॅम्पस, चास, जिल्हा.अहिल्यानगर *श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, नेप्ती,अहिल्यानगर *राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्जुले हरिया ता.पारनेर, जि.अहिल्यानगर *अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर *संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर *विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय, बोटा, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर *मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालय ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर *श्री साईबाबा अभियांत्रिकी, संशोधन आणि संबंधित विज्ञान संस्था, ता.राहता, जि.अहिल्यानगर *समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय, ता. शेवगाव, जि.अहिल्यानगर === फार्मसी === *आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी फार्मसी, मु. बोधेगाव, शेवगाव, जि.अहिल्यानगर(५४१६) *अडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी जि.अहिल्यानगर(५५२२) *अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर, जि.अहिल्यानगर(५१९४) *अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेची अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, संगमनेर (५२८७) *अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, केडगाव (५४६१) *अशोक कॉलेज ऑफ फार्मसी (५५१९) *अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी, मांची हिल (५४७९) *धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे फार्मसी कॉलेज, वाळकी, अहिल्यानगर (५४६२) *डीके औटी कॉलेज ऑफ फार्मसी (५४९२) *डॉ इथापे इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी संगमनेर (५४८२) *डॉ. कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोळपेवाडी (५४६०) *डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी,अहिल्यानगर (५१९१) *मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (कॉलेज ऑफ फार्मसी)-परिक्रमा, काष्टी, श्रीगोंदा, अहिल्यानगर(५३०३) *कै.देवराव दिगंबर वरात कॉलेज ऑफ फार्मसी, साकत ता. जामखेड जि. अहिल्यानगर (५५३३) *काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे काकासाहेब मस्के कॉलेज ऑफ फार्मसी, नागापूर,अहिल्यानगर (५२८५) *लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी, आदिनाथनगर (५५२३) *मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी, कर्जुले हरिया ता.पारनेर, अहिल्यानगर(५४४६) *मातोश्री राधा कॉलेज ऑफ डी.फार्मसी, वीरगाव (5480) *श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ डी. फार्मसी, गणेगाव (५४८१) *मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी.सोनई (५१९३) *पी. व्ही. बेल्हेकर कॉलेज ऑफ फार्मसी, भानशिवारे (५५०७) *प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीरामपूर (५४२४) *प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (विद्यापीठ मानली जाते) - (U-0322), अहिल्यानगर - (तांत्रिक शिक्षण) (950322) *प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,लोणी खुर्द (5425) *प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरारानगर (५१८५) *राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण(५४७७) *राष्ट्रीय शिक्षण मंडळ एन एन सत्था कॉलेज ऑफ फार्मसी,अहिल्यानगर (5478) *रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्म) रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा. अहिल्यानगर (एमएस) (६९१७) *रत्नदीप फार्मसी कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर (५४६५) *रत्नदीप फार्मसी कॉलेज, रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर (५४८९) *साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,घारगाव, ता.श्रीगोंदा(५४७१) *साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी (५५१७) *संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च,कोपरगाव (5195) *सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. एन.जे. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा),अहिल्यानगर(५४५१) *शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर (5454) *शिवा ट्रस्ट, शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी, पाचेगाव ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर(५४६६) *श्रद्धा ग्रामीण वैद्यकीय सामाजिक कल्याण व शिक्षण सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (५३००) *श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बोटा (५४८४) *श्री. लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेज, ढोरजलगाव-पूर्व (५५४०) *श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, राहुरी फॅक्टरी, अहिल्यानगर(5211) *त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेज, खडके, ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर (५५४१) *विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा(५४६४) *विश्वभारती अकादमी,कॉलेज ऑफ फार्मसी, सारोदा बड्डी, अहिल्यानगर (5506) *वाणी कॉलेज ऑफ फार्मसी (५५१५) ===शेती(एग्रीकल्चर)=== *कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, A/p. मदडगाव, पोस्ट. भातोडी,ता. जि. अहिल्यानगर (१९२१२) *कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, चंद्रपूर रोड, I.T.I., फार्मसी कॅम्पस, मु. पोस्ट. लोणी बु., ता. ओ राहाता जि. अहिल्यानगर ४१३७१३.(१९१८३) *कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर-४२२६०८ (१५२०१) *कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मिरजगाव, ता.कर्जत जिल्हा अहिल्यानगर (१५१९९) *कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर. ४२२६०५ (१८२६४) *कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर ४१३७१३. (१८२७५) *कृषी महाविद्यालय, भानाशिवरा, ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर (११२९७) *कृषी महाविद्यालय, घारगाव, ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर (११२८२) *कृषी महाविद्यालय, मदडगाव (11313) *कृषी महाविद्यालय, प्रवरानगर, लोणी, ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर (11281) *कृषी महाविद्यालय, वडगाव गुप्ता (विळद घाट), पोस्ट. एमआयडीसी, जि. अहिल्यानगर(११२८७) *कृषी महाविद्यालय, सोनई, ता. नेवासा जिल्हा. अहिल्यानगर ४१४१०५.(१११३४) *अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, घारगाव, जिल्हा. अहिल्यानगर (१६२८५) *कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, खडके वेक. (१६३८३) *डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अ‍ॅग्री. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जिल्हा. अहिल्यानगर ४१३७२२. (१५१२४) *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर (११३०१) *सदगुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव, (टोल नाक्याजवळ) ता. कर्जत, जि. अहिल्यानगर ४१४४०१.(११२०८) *सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर (11308) *श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मु.मालदाड, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर-४२२६०८(११२०७) *श्रमशक्ती कॉलेज ऑफ फूड तंत्रज्ञान, मु. मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर-४२२६०८ (१६२१४) *वृंदावन कॉलेज ऑफ कृषी, गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर, जिल्हा-अहिल्यानगर (११३१५) == लष्करी छावणी == [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] येथे: * इंडियन आर्मर्ड कॉर्प्स सेंटर आणि स्कूल (ACC&S), * [[मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट|मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर (MIRC)]], * [https://en.wikipedia.org/wiki/Vehicle%20Research%20and%20Development%20Establishment वाहन संशोधन आणि विकास आस्थापना] (VRDE), * गुणवत्ता हमी वाहनांचे नियंत्रक (CQAV) भारतीय आर्मी आर्मर्ड कॉर्प्ससाठी प्रशिक्षण आणि भरती ACC&S येथे होते. पूर्वी, हे शहर इतर युनिट्ससह [[ब्रिटिश आर्मी|ब्रिटिश सैन्याच्या]] [https://en.wikipedia.org/wiki/Royal%20Tank%20Regiment रॉयल टँक कॉर्प्स] / इंडियन आर्मर्ड कॉर्प्सचे भारतीय तळ होते. या शहरामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लष्करी टँक आणि आशियातील सर्वात मोठे प्रदर्शन आहे.<ref>{{cite web |url=http://ahmednagar.nic.in/html_docs/history_of_ahmedngar_district.htm |title=The History of Ahmednagar |publisher=Ahmednagar.nic.in |date=15 August 1947 |access-date=23 November 2011 |archive-url=https://web.archive.org/web/20111007150425/http://ahmednagar.nic.in/html_docs/history_of_ahmedngar_district.htm |archive-date=7 October 2011 |url-status=dead }}</ref> == भूगोल == '''१. स्थान :-''' [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] शहराचे स्थान १९.०८° उत्तर अक्षांश, ७४.७३° पूर्व रेखांश असे आहे. शहराची समुद्रसपाटीपासून उंची ६४९ मीटर आहे.अहिल्यानगर हा क्षेत्रफळाने महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा जिल्हा आहे.या जिल्हाला सात जिल्ह्यांच्या सिमानी जोडले आहे/आहेत. '''२. जमिनीचे प्रकार :-''' [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]' जिल्ह्यात विविध प्रकारची जमीन आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीचा डोंगराळ भाग आहेत. त्यांना [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]], अदुला, बालेश्वर आणि [[हरिश्चंद्रगड|हरिश्र्चंद्रगड]] डोंगरी रांग म्हणतात. सह्याद्रीतील सर्वाधिक उंच शिखर [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]] हे [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] जिल्ह्यात आहे. [[हरिश्चंद्रगड]], [[रतनगड]], [[कुलंग]] आणि अजूबा हे जिल्ह्यातील काही शिखर आहेत. [[पुणे जिल्हा|पुणे]]-[[संगमनेर]] रोडवरील चांदापुरी घाटावरील रंधा धबधब्याच्या मार्गावर आपल्याला विटा घाट दिसेल. [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] जिल्ह्याच्या भोगोलिक रचनेनुसार तीन प्राकृतिक विभाग पडतात. १) पश्चिमी डोंगराळ क्षेत्र २) मध्यवर्ती पठार प्रदेश ३) उत्तरेकडील आणि दक्षिणी मैदानाचे क्षेत्र '''१. पश्चिमी डोंगराळ क्षेत्र :''' [[अकोले तालुका]] व [[संगमनेर तालुका|संगमनेर]] तालुक्यांचा या प्रदेशामध्ये समावेश होतो. या प्रदेशातील अदुला, बालेश्वर आणि हरिशचंद्रगडच्या पर्वत रांगांमध्ये एकाच भागात अनेक उच्च शिखरे आढळतात. सह्याद्रीतील ५४२७ फूट उंच असलेले सर्वोच्च शिखर कळसूबाई हे याच प्रदेशात आहे. '''२. मध्यवर्ती पठार प्रदेश :''' या क्षेत्रात [[पारनेर]], [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] तालुका आणि [[संगमनेर]],[[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] आणि [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]] तालुक्यातील काही भाग या क्षेत्रात येतो. '''३.उत्तर आणि दक्षिण मैदानाचे क्षेत्र :''' या क्षेत्रात उत्तरी [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]], [[राहाता तालुका|राहाता]], [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]], [[राहुरी तालुका|राहुरी]], [[शेवगाव तालुका|शेवगाव]], [[नेवासा तालुका|नेवास्याचा]] समावेश आहे. हा [[गोदावरी नदी|गोदावरी]] आणि [[प्रवरा नदी|प्रवरा]] नदीच्या खोरयाच भाग आहे. [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]], [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]], [[जामखेड तालुका|जामखेड]] या दक्षिणेकडील तालुक्यांचा भागही या भौतिक विभागात समाविष्ट केला आहे. या प्रदेशात [[घोड नदी|घोड]], [[भीमा नदी|भीमा]] आणि [[सीना नदी|सिना]] नद्यांचे खोरे आहे. == अहिल्यानगर जिल्ह्यातील नद्या == [[गोदावरी]] आणि [[भीमा]] ह्या जिल्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. [[भीमा नदी|भीमा]] ही [[कृष्णा]] नदीची उपनदी आहे. या नद्यांचे पाणलोट क्षेत्र [[हरिश्चंद्रगड|हरिश्चंद्रगडावर]] आणि जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेले आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या अन्य नद्या [[प्रवरा]], [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा]], [[सीना नदी|सिना]] आणि [[धोरा नदी|धोरा]] या आहेत. [[प्रवरा नदी|प्रवरा]] नदी [[गोदावरी नदी|गोदावरी]]<nowiki/>ची उपनदी आहे. [[प्रवरा नदी|प्रवरा]] नदीवर [[अकोले तालुका|अकोले]] तालुक्यात [[भंडारदरा]] येथे धरण बांधण्यात आले आहे. धरण परिसरात [[रंधा धबधबा]] आहे. [[मुळा नदी (भारत)|मुळा]] नदीवर [[राहुरी तालुका|राहुरी]] तालुक्यात बारागाव नांदूर येथे [[मुळा धरण]] बांधण्यात आले आहे. == वने == अहिल्या नगर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात जंगल आहे. [[साग]], [[बाभूळ]], [[धावडा]], हळदू आणि [[कडुलिंब|नीम]] ही या जंगलात आढळणारी प्रमुख झाडे आहेत. [[आंबा]], हळदी, [[आवळा]], [[बोर]], [[मोसंबी]], इत्यादी फळझाडे जिल्ह्यात आढळतात. == अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती == * [[संत ज्ञानेश्वर]] - यांनी [[नेवासा]] येथे पैस खांबाला टेकून [[ज्ञानेश्वरी]] लिहिली. * अहमदनगर निजाम शाही * [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] मध्ये हजरत मिरावली बाबा पहाड यांचा दरगाह आहे. * हजरत शाहशरीक यांचा दरगाह * हजरत दम बाराहजारी यांचा दरगाह * हजरत बाबा बंगाल शाह यांचा दरगाह * [[साईबाबा]] - राहाता तालुक्यातील [[शिर्डी]] हे संत साईबाबांची कर्मभूमी असणारे गाव आहे. * श्री संत मच्छिंद्रनाथ भाऊ महाराज * [[आनंदऋषीजी|आचार्य आनंद ऋषीजी महाराज]] * [[अवतार मेहेर बाबा]] * [[सदाशिव अमरापूरकर]] - प्रसिद्ध अभिनेते * [[रावसाहेब पटवर्धन]] - थोर स्वातंत्र्यसेनानी * [[अच्युतराव पटवर्धन]] - थोर स्वातंत्र्यसेनानी * [[सेनापती बापट]]- थोर स्वातंत्र्य सेनानी * [[त्र्यंबक शिवराम भारदे|बाळासाहेब भारदे]] * [[भाई सथ्था]] - कम्युनिस्ट नेते * सेनापती [[दादा चौधरी]] - कम्युनिस्ट नेते * [[मधू दंडवते]] - संसदपटू * कवी [[ना.वा. टिळक|नारायण वामन (रेव्हरंड) टिळक]] * [[लक्ष्मीबाई टिळक]] * [[अण्णा हजारे]] - ज्येष्ठ समाजसेवक * [[नरेंद्र फिरोदिया]] - उद्योजक * महानुभाव पंथाचे संस्थापक [[चक्रधर स्वामी]] यांची सर्वात जास्त चरणांकित स्थाने नगरमध्येच आहेत. * [[निवृत्तीनाथ महाराज देशमुख]] (इंदुरीकर महाराज) *[[भगवानबाबा|संत भगवान बाबा]] *डॉ. कुमार सप्तर्षी (सं. अध्यक्ष - युवक क्रांती दल ) * ऋषभ कोंडावार (अभिनेता) * [[अहिल्याबाई होळकर|पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर]] == वाहतूक व्यवस्था == [[मुंबई]] - [[विशाखापट्टणम]] [[राष्ट्रीय महामार्ग २२२]] [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] शहरातून जातो.[[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] शहर हे [[पुणे]] - [[छत्रपती संभाजीनगर]] - [[सोलापूर]] - [[बीड]] - [[धाराशिव जिल्हा|धाराशिव]] - [[नाशिक]] - [[धुळे]] - [[कल्याण (शहर)|कल्याण]] - [[मुंबई]] - [[ठाणे]] महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी राज्य महामार्गांने जोडले गेले आहे. [[दौंड]] - [[मनमाड]] लोहमार्गावरील अहमदनगर रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे . == अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे== *'हरेश्वर संस्थान डमाळवाडी (चिचोंडी)पाथर्डी * '''दुर्गादेवी मंदिर शिराळ''': पाथर्डी तालुक्यातील शिराळ हे गाव अहमदनगर पासून उत्तर - पूर्वेला सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर छत्रपती संभाजीनगर रोड वरील पांढरीचा पूल-करंजी या रोडवर आहे. शिराळ गावामध्ये पश्चिम-दक्षिणेस नदीकाठापासून सुमारे शंभर फूटावर आदिशक्ती श्री दुर्गा देवीचे भव्य-सुंदर मंदिर आहे. मंदिरासमोर एक मोठी दीपमाळ आहे. * [[शनी शिंगणापूर]] - ता. [[नेवासा]] येथे शनीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. येथे कुठल्याही घराला आणि बँकांनासुद्धा कुलपे नाहीत. शनिदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो अशी स्थानिक लोकांची अशी भावना आहे. * [[शिर्डी]] - हे ठिकाण साईबाबांच्या वास्तव्यासाठी आणि मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शिर्डीला छोटी मुंबई असे म्हणतात. शिर्डीला विमानतळ आहे. * [[सिद्धटेक]]-येथील सिद्धिविनायक मंदिर हे [[अष्टविनायक]] मंदिरांपैकी एक मंदिर आहे. *[[विशाल गणपती|विशाल गणपती मंदिर]] - हे नगरचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर अहिल्यानगर च्या माळीवाडा भागात आहे. * '''रेणुकामाता मंदिर (केडगांव)''' - केडगांव [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] रेल्वेस्थानकापासून साधारण पणे ३ किलोमीटरवर आणि lअहमदनगर बसस्थानकापासून सुमारे ५ किलोमीटरवर आहे/आहेत. * '''ब्रह्मनाथ''' - पाथर्डी तालुक्यातील सोनोशी गाव येथील तीर्थस्थान आहे. * [[भुईकोट किल्ला]] - इ.स. १९४२ साली [[जवाहरलाल नेहरू]] यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. तेथे त्यांनी "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" हे पुस्तक लिहिले. * [[हरिश्चंद्रगड]] - एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा अहमदनगर पासून अंदाजे १२५ किलोमीटर अंतरावर आहे. सुप्रसिद्ध कोकणकडा येथेच आहे. नाक्लेस फॉल सुप्रसिद्ध आहे. * [[भगवानगड]] - हे [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] तालुक्यातील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या [[धौम्य|धौम्य ऋषींचे]] मंदिर आहे. तसेच [[जनार्दनस्वामी]], [[भगवानबाबा]] व [[भीमसिंह महाराज]] यांच्या समाध्या येथे आहेत. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. * [[राहुरी]] तालुक्यातील ताहराबाद येथील श्री. संत कवी महिपती महाराज यांची समाधी आहे. * राहुरी तालुक्यातील [[मुळा धरण]] प्रसिद्ध आहे. * [[भंडारदरा धरण]] - [[अकोले तालुका|अकोले तालुक्यात]] हे धरण असून येथील नेकलेस स्वरूपातला धबधबा अद्भुत आहे. * शेषनारायण मंदिर हे भारतातील  सर्वात दुर्मिळ ( एकमेव शेषनारायण मंदिर ) मंदिर असून हे अकोले तालुका पासून ४ किलिमीटर अंतरावर कुंभेफळ येथे आहे . * [[राशिन]] - [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]] तालुक्यात येथे श्री जगदंबा यमाई देवी मंदिर आहे संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. पेशवा पहिले बाजीराव यांच्या घराण्याची कुलदैवता ही राशिनची देवी ओळखली जाते व श्री गोपिकाबाई पेशवीन आणि नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराला भेट दिली होती अशे इतिहासात पुरावे आहेत. * [[अहिल्याबाई होळकर|अहिल्यादेवी होळकर]] - यांचे जन्मस्थान [[जामखेड तालुका|जामखेड तालुक्यातील]] [[चोंडी]] येथे आहे. * [[देवगड (नेवासा)|देवगड]] - हे नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध असे श्री दत्तक्षेत्र असून अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील ठिकाण आहे. अहिल्यानगरपासून सुमारे ६६ कि.मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. सदर मंदिर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान प.प. श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला. == राजकारणशास्त्र == [[अहिल्यानगर जिल्हा परिषद]] २००३ मध्ये महानगरपालिकेत श्रेणीसुधारित करण्यात आली. २०२२ पर्यंत शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे या विद्यमान महापौर होत्या. अहिल्यानगर शहराचे प्रतिनिधित्व केंद्रीय आणि राज्य विधानसभेत अनुक्रमे [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] लोकसभा आणि [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] शहर विधानसभेद्वारे केले जाते. २०२२ पर्यंत विद्यमान खासदार [[सुजय विखे पाटील|डॉ. सुजय विखे पाटील]] होते, तर विद्यमान आमदार संग्राम जगताप होते. == हे सुद्धा पहा == * [[जोर्वे]] (पुरातत्त्व उत्खनन स्थळ) * [[अहिल्यानगर किल्ला]] == संदर्भ == {{संदर्भयादी}} ==बाह्य दुवे== * [http://ahmednagar.gov.in अहिल्यानगर जिल्हा] * [http://amc.gov.in/ अहिल्यानगर महानगरपालिका] {{अहमदनगर जिल्हा}} {{अहमदनगर जिल्ह्यातील तालुके}} {{महाराष्ट्रातील जिल्हे}} [[वर्ग:अहमदनगर जिल्हा|अहमदनगर शहर]] 2f1iq0njty3wo1ei2oi2af0kq20r7t2 इंद्रायणी नदी 0 3844 2581515 2577512 2025-06-21T06:30:57Z 2409:4081:1C44:3CE9:427F:2F0C:628E:E23E 2581515 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''इंद्रायणी नदी''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील नदी आहे. ही नदी [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यात]] [[लोणावळा|लोणावळ्याच्या]] कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=AX1AAAAAMAAJ&q=%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80&dq=%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiQ9Kmx7eXjAhWDfSsKHRHxDxEQ6AEIJzAA|title=Mahārāshṭa paricaya, arthāt, Sãyukta Mahārāshṭrācā jñānakośa|date=1954|publisher=Prasāda Prakāśana|language=mr}}</ref> पुढे टाटा धरणामुळे नदी लुप्त होते आणि धरणापासून परत सुरू होते. == प्रवाह == [[लोणावळा]] शहरातील इंद्रायणीचा प्रवाह साधारणपणे सुमारे ४ किलोमीटर लांबीचा आहे. शहरातले नदीपात्र अत्यंत अरुंद आहे. [[कामशेत रेल्वे स्थानक|कामशेत रेल्वे स्टेशनजवळ]] ते पात्र बऱ्यापैकी रुंद आहे. [[आळंदी]] गावातून वहात वहात पुढे जाऊन इंद्रायणी नदी ही [[भामा नदी]]ला घेऊन तुळापूर गावाजवळ [[भीमा नदी]]स मिळते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=t4ARAQAAIAAJ&q=%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80&dq=%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiQ9Kmx7eXjAhWDfSsKHRHxDxEQ6AEINzAE|title=Abhinava marathi jna|language=mr}}</ref> [[कुंडलिका नदी]] (किंवा कुंडली) ही इंद्रायणीची उपनदी आहे. त्यांचा संगम वडिवळे या गावाजवळ होतो. त्या संगमापासूनच इंद्रायणी नदी वाहती होते, वडिवळे धरण कुंडलिकावर आहे. कुंडलिका (कुंडली) व इंद्रायणी यांच्या संगमावर शंकराचे प्राचीन मंदिर आहे. शिवरात्रीला या मंदिरात भाविकांची खूप गर्दी होते. इंद्रायणीच्या वरच्या बाजूला धरणाजवळ कुबेरगंगा नावाची एक लहान नदी इंद्रायणीला मिळते. तेथे एक बेट झाले आहे, हेच सिद्धबेट म्हणून पुढे प्रसिद्ध झाले.{{संदर्भ हवा}} ===राम झरा=== राम झरा हा या इंद्रायणी नदीला मिळणारा मुख्य नाला आहे. या झऱ्याचा उगम पुणे जिल्ह्यातील चिखलीजवळच्या हरगुडे वस्ती येथे होतो व कुदळवाडीतून वाहत वाहात चिखली-मोई फाट्याजवळ तो इंद्रायणीत विलीन होतो. या झऱ्याचा उल्लेख तुकारामांच्या गाथांत आला आहे. हा झरा बाराही महिने वाहत असे, त्यामुळे या झऱ्यात जलचरांचा मोठा वावर होता. संत तुकाराम जेव्हा आळंदीला पायी वारी करायचे त्यावेळेस ते चिखली गावाजवळील ह्या झऱ्यावर आराम करून तेथे पाणी पिऊन पुढे जायचे. झऱ्याच्या दोन्ही बाजूला पोटखराबा जमीन आहे. हळूहळू या झऱ्याला गटारगंगेचे स्वरूप आले. चिखली, कुदळवाडी, जाधववाडी, हरगुडे वस्ती व तेथील बंदिस्त गोदामात रसायने साठविणारे सर्व व्यापारी, त्रिवेणी नगर व तेथील पावडर कोटिंग व्यवसाय करणारे यांचे रिकामे रसायन कंटेनर, पोती, बॅगा वगैरे गोष्टी भंगाराचा व्यवसाय करणारे व्यापारी घेतात व राजरोजपणे त्या वस्तू धुऊन त्यांतले घातक रसायनयुक्त पाणी बेधडकपणे राम झऱ्यात सोडून देतात. रासायनिक कंपनीतील रसायनांचे रिकामे बॅरेल्स नाल्याशेजारच्या भंगार शेडमध्ये धुऊन पुन्हा विकले जातात. कामशेत, वडिवळे, पाथरगांव, नाणे, नानोली, पारवडी या गावोगावच्या सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेली इंद्रायणी नदी, राम झऱ्यात सोडल्या जाणाऱ्या घातक रसायनांमुळे आणखीनच प्रदूषित होत आहे. राम झऱ्यामधे भिंती बांधूनही त्यावर व्यावसायिकांचे आक्रमण चालू आहे.{{संदर्भ हवा}} पहा : [[राम नदी]] ==राम नदी== पहा : [[राम नदी]] ==इंद्रायणी नदीकाठची गावे== देहू आळंदी मोई निघोजे == भूशास्त्रीय रचना == == इतिहास == ===पुरातत्त्वीय=== ===ऐतिहासिक घटना=== == धार्मिक वैशिष्ट्ये == इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले श्रीक्षेत्र [[आळंदी]] हे देवस्थान [[संत ज्ञानेश्वर]] यांच्या समाधी मंदिरामुळे विशेष प्रसिद्ध आहे.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=FoQJAAAAIAAJ&q=%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80&dq=%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwi8xOOS7uXjAhUOXisKHS60D9cQ6AEIQDAG|title=Bāpa Jñāneśvara samādhistha|last=Khole|first=Vilāsa|date=1996|publisher=Pratimā Prakāśana|language=mr}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=2h3iDQAAQBAJ&pg=PT123&dq=indrayani+river&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjlkpDK7-XjAhWKeisKHQ-lBW8Q6AEIRTAE#v=onepage&q=indrayani%20river&f=false|title=States of our Union- Maharashtra|last=Ranade|first=Prabha Shastri|publisher=Publications Division Ministry of Information & Broadcasting|isbn=9788123023120|language=en}}</ref> [[निवृत्तीनाथ]], ज्ञानेश्वर, [[सोपानदेव]] आणि [[मुक्ताबाई]] ही भावंडे आपल्या कुटुंबीयांसह आळंदी येथे राहत असल्याने या गावाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=3-81AAAAMAAJ&q=%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80&dq=%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwi8xOOS7uXjAhUOXisKHS60D9cQ6AEILzAC|title=Nāmā mhaṇe: Śrīnāmadeva-gāthetīla tīnaśe sahāsashṭa nivaḍaka abhāṅgāñce nirūpaṇa|last=Nāmadeva|date=1999|publisher=Snehala Prakāśana|language=mr}}</ref> == सांस्कृतिक वैशिष्ट्ये == इंद्रायणी नदीच्या काठी आळंदी येथे पंढरपूरला आषाढी वारीला जाणाऱ्या वारकरी समूहाचे सदस्य दरवर्षी एकत्रित होतात. या काळात इंद्रायणी नदीचा घाट आणि परिसर सर्व आलेल्या वारकरी मंडळींच्या गर्दीने भरलेला असतो.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.esakal.com/image-story-195390|title=संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तयारी|last=|first=|date=२३. ६. २०१९|work=|access-date=३. ८. २०१९|archive-url=https://web.archive.org/web/20190803045209/https://www.esakal.com/image-story-195390|archive-date=2019-08-03|dead-url=|url-status=dead}}</ref> == जल व्यवस्थापन == ===धरणे=== ===बंधारे=== ===कालवे=== == अर्थशास्त्रीय वैशिष्ट्ये == ===उपजीविका=== ====शेती==== ====मासेमारी==== ===उद्योग=== ===पर्यटन=== == पायाभूत सुविधा == ===पूल=== ===दळणवळण=== ===सांडपाणी व्यवस्थापन=== ===जल वाहिन्या=== ===व्यावसायिक वापर=== ===तीर्थक्षेत्र (घाट, इ.)=== संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधी मंदिर इंद्रायणी नदीच्या किनारी असल्याने येथील नदीकाठाला व त्यावर बांधलेल्या घाटांना पवित्र मानले गेले आहे.<ref name=":0" /> == पर्यावरण == === परिसंस्था === === जैव विविधता === === वनस्पती === === प्राणी === === बाहेरचे / आक्रमक वनस्पती व प्राणी === == पाण्याची गुणवत्ता == == प्रदूषण == === मैलापाणी वहन === === सांडपाणी === === घन कचरा === === राडारोडा === === उद्योगांद्वारे सोडलेले उत्सर्जन === === शेतीद्वारे होणारे उत्सर्जन === === उघड्यावर शौच === === सण, उत्सव, धार्मिक विधींमुळे होणारे प्रदूषण === == समाजावर होणारे परिणाम == == अतिक्रमणे == == घातक उद्योग == == इंद्रायणी नदी वर पुल पडला रविवार दिनांक 16 जून 2025 38 पर्यटक वाचले == == कार्यरत लोक चळवळी, संस्था, इ. == नदी आणि तिचे होणारे प्रदूषण याविषयी लोकजागृती करण्याच्या हेतूने इंद्रायणी नदीमधून पंढरपूरपर्यंत जलदिंडी आयोजित केली जाते. बारा दिवसात ही जलदिंडी पंढरपूर येथे पोहोचते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=buiFDQAAQBAJ&pg=PT14&dq=indrayani+river&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjlkpDK7-XjAhWKeisKHQ-lBW8Q6AEILjAB#v=onepage&q=indrayani%20river&f=false|title=Grandpa's Tales of Ahmednagar – Part 1|last=Chatterjee|first=Sukumar|date=2016-11-18|publisher=Notion Press|isbn=9781946280213|language=en}}</ref> [[आषाढ]] महिन्यातील [[पंढरपूर]] वारीसाठी दरवर्षी इंद्रायणी नदी आणि तिच्या घाटांची स्वच्छता स्वयंसेवी संस्थांच्या आणि ग्राम पंचायतीच्या माध्यमातून केली जाते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.esakal.com/pune/saathchal-pandharichi-wari-palkhi-five-hundred-toilets-dehu-127817|title=पाचशे फिरती स्वच्छतागृहे|last=|first=|date=३. ७. २०१८|work=|access-date=३. ८. २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> == शासकीय परिपत्रके, अहवाल, न्यायालयीन आदेश, इ. == == साहित्य == == कला == === नाटक === === चित्रपट === == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} {{विस्तार}} {{भारतातील नद्या}} {{पुणे जिल्ह्यातील नद्या}} [[वर्ग:भारतातील नद्या]] [[वर्ग:महाराष्ट्रातील नद्या]] [[वर्ग:पुणे जिल्ह्यातील नद्या]] [[वर्ग:विकिप्रकल्प जलबोध]] 5scyqj29edzroivknqoyl9ewuy3bm3l विकिपीडिया:आंतरविकि दूतावास 4 13035 2581512 2580982 2025-06-21T06:26:37Z Usernamekiran 29153 /* Time to delete */ re 2581512 wikitext text/x-wiki <!-- सुचालन चावडी साचा येथून हलवू नये. --> {{जुन्या चर्चा चौकट|search=yes| <center>[[विकिपीडिया:आंतरविकि दूतावास/जुनी चर्चा १|१]]</center> }} {{सुचालन चावडी}} <!-- चर्चांना येथून खाली सुरूवात करावी. --> <div style="float:center;border-style:solid;border-color:#fad67d;background-color:#faf6ed;border-width:2px;text-align:left;font-family: Trebuchet MS, sans-serif;padding:8px;" class="plainlinks"> [[#Welcome|सुस्वागतम्!]], मराठी विकिपीडिया आंतरविकि दूतावास मध्ये स्वागत आहे ! दूतावासाचे मुख्य पान [[:m:Wikimedia_Embassy|Wikimedia Embassy]] येथे आहे. {{en/begin}}Welcome to Wikipedia Embassy on Marathi Wikipedia for interwiki project collaborations. Main page on Meta [[:m:Wikimedia_Embassy|Wikimedia Embassy]]. * '''en:''' Requests for the [[m:bot|bot]] flag '''should not made be made on community page'''. Marathi Wikipedia does not use the [[m:bot policy|standard bot policy]], and '''does not''' allows [[m:bot policy#Global_bots|global bots]] and [[m:bot policy#Automatic_approval|automatic approval of certain types of bots]]. All bots should apply at [[:mr:विकिपीडिया:Bot|Marathi Wikipedia Local Bot Request]], and then [[:mr:विकिपीडिया:Bot|request access]] from a local bureaucrat if there is no objection. {{en/end}}</div> {{en/begin}} Wikimedia Foundation projects are multilingual, with wikis in hundreds of languages being actively worked on and plenty more ready to go. This Wikimedia Embassy is a central place for resources to help with cross-language issues — site-wide policy and software decisions that affect all of us and interlanguage linking. If you'd like to help, please set up an equivalent page on your own language's wiki and link them together, and list yourself as a Wikimedia Ambassador below. The Marathi Wikipedia embassy was started for communication between Marathi wikipedia and other language wikipedias. == JavaScript error == When loading the main page:<br style="margin-bottom:0.5em"/>JavaScript parse error (scripts need to be valid ECMAScript 5): Parse error: Missing ; before statement in file 'MediaWiki:Gadget-AdvancedSiteNotices.js' on line 17<br style="margin-bottom:0.5em"/>Ping interface administrators [[सदस्य:Tiven2240]] and [[सदस्य:अभय नातू]]. <span id="Alexis_Jazz:1659958968511:विकिपीडियाBWLCLNआंतरविकि_दूतावास" class="BawlCmt">[[सदस्य:Alexis Jazz|Alexis Jazz]] ([[सदस्य चर्चा:Alexis Jazz|चर्चा]]) १७:१२, ८ ऑगस्ट २०२२ (IST)</span> :Hi {{ping|Alexis Jazz}}, thanks for the report. Where did you find this error? Was it mobile view or desktop view. Are you still facing the error? --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १२:२८, ९ ऑगस्ट २०२२ (IST) ::[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]], desktop, Vector classic, also when logged out, yes. You are familiar with the [[w:en:Web development tools|console]]? <span id="Alexis_Jazz:1660037160732:विकिपीडियाBWLCLNआंतरविकि_दूतावास" class="BawlCmt">[[सदस्य:Alexis Jazz|Alexis Jazz]] ([[सदस्य चर्चा:Alexis Jazz|चर्चा]]) १४:५६, ९ ऑगस्ट २०२२ (IST)</span> == enable, configure wpcleaner == errors detected by [https://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:WikiProject_Check_Wikipedia Check Wiki project] can be fixed using [https://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:WPCleaner WPCleaner]. i assume it requies admin to enable and configure. i request to enable on our wiki. thank you. -[[सदस्य:రుద్రుడు|రుద్రుడు]] ([[सदस्य चर्चा:రుద్రుడు|चर्चा]]) ०८:४५, २१ फेब्रुवारी २०२३ (IST) == Mass deletion of files or mass cleanup of files == Hi! I made a post 10 years ago at [[विकिपीडिया:आंतरविकि_दूतावास/जुनी_चर्चा_१#चित्र:Anjanerikilla.jpg]] that all files need a license. The reply was that "Marathi Language Wikipedia comunity has clear understanding that we do not entertain request from Non Marathi language wikipedians in such respect unless required by Wikimedia Foundations direct intervention" Is that still the opinion on mr.wiki? If it is then it is a clear violation of [[:wmf:Resolution:Licensing_policy]] to allow non-licensed files. I hope you will help clean up files. For example * Send messages to the users that is still active. * Look through [[Special:UnusedFiles]] and delete files with no license (or non-free files) * Use a bot to add a license (if uploader make a clear statement about source and license) If central intervention is still required I will make a suggestio on meta to make a central mass deletion of files on mr.wiki. But I see no reason why that should be needed. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ०१:१८, २६ फेब्रुवारी २०२३ (IST) : Hello again! There are 19141 files on mr.wiki. About 1800 seems to have a license. Would anyone like to help save the remaining 17300 files? Ping [[सदस्य:अभय नातू]] and [[सदस्य:संतोष गोरे]]. We need local users and admins to help out. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १६:४१, १९ मार्च २०२३ (IST) ::{{साद|Tiven2240|Usernamekiran}} कृपया नोंद घ्यावी. या बद्दल मला फारशी माहिती नाही.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १९:५५, २० मार्च २०२३ (IST) *{{re|MGA73}} Hello. Thanks for the message, and apologies for the delayed response. Even though I am active on Wikipedia every day, I somehow missed your first post. I am not sure what you mean by "Would anyone like to help save the remaining 17300 files?" If the files do not have licences, there's not much we can do. Encouraging uninvolved editors to update licenses may inadvertently result in [[:commons:commons:License laundering|license laundering]]. All the files are hosted on Wikimedia's servers in US, so legally speaking the files come under American copyright laws. Even if we assume Indian copyright laws are applicable, even then non-public domain files, and the ones without appropriate licenses should be deleted. But given the large number of files, I think this should be discussed with wider audience. Maybe sending mass message to all recently active editors, and having a discussion at Marathi village pump would be a good start. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] २२:४२, २० मार्च २०२३ (IST) * {{re|Usernamekiran}} Thanks a lot for your reply. I agree that license laundering is to be avoided. What could be done is to send messages to uploaders and ask them to clarify if they are the photographers or not and if they is they can add a license. If the file shows a photo that is old enough it could be PD due to age. If a file is a modification of a file from Commons/Wikipedia then the file could probably be licensed the same way as the original. If the file is non-free then it could perhaps be used as fair use if a relevant rationale can be provided. : It will be a big work unless it is decided simply to mass delete all files without a license. But it could be done in steps. For exampe files in [[विशेष:न_वापरलेली_चित्रे]] is not in use so it will not be a very big loss if they are deleted. But we could also try to find out if any of the big uploaders are still active so they get a chance to add a source and license. : If you could make a notice at a better place and in local language that would be awesome. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २३:३४, २० मार्च २०२३ (IST) :: For example it seems that [[User:Archanapote]] is still active and have uploaded almost 500 files without a license. Sadly [[User:Priya Hiregange]] does not seem to be active (7380 uploads). --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २३:४१, २० मार्च २०२३ (IST) :Similar to Usernamekiran, I missed this message as well. I think it's a fair ask to verify licensing. IIRC, a whole lot of these files were added when a few users did a SD-card dump on here. Starting with a central message and following up with specific users seems to be a prudent two-pronged approach. We (w:mr admins) will come up with messaging as well as other ways to save any files we can over the next few days. cc:{{साद|संतोष गोरे|Usernamekiran|tiven2240}} :[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०४:५६, २१ मार्च २०२३ (IST) :: Thank you [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]]. I noticed that Priya Hiregange has an email on user page. Perhaps someone would like to send an email and ask? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २२:५९, २१ मार्च २०२३ (IST) It might be a good idea to have someone with a bot to add: <pre> {{Information |description = |date = |source = |author = |permission = |other_versions = }} </pre> To all files so users know where to add the information. If there is any text on the file page perhaps it could be added to the description field. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २३:०७, २१ मार्च २०२३ (IST) {{ping|MGA73}} Thank you. I sampled some images uploaded by Priya Hiregange, all the sampled images had meta-data, so it is safe to assume that the files were created by Priya Hiregange. Maybe can assume that all the image files with proper metadata are user-created and add a "CC BY-SA 4.0" to these files? Regarding the template to be added, do you mean to add that blank template to every file/image, or on the files that do not have licensing information? —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] ०९:०८, २३ मार्च २०२३ (IST) : {{ping|Usernamekiran}} I also think that it is very likely it is own work. But I do not think adding licenses for uploaders is a good idea. There could be exceptions. For example if we get a user to write a message on their talk page "Yes they are my work and I agree to cc-by-sa-4.0". So I think it would be better to try sending an email first and ask for a license. : On some wikis licenses have been added if [[मिडियाविकी:Uploadtext]] or whatever user saw during upload had a statement like "By uploading your file you agree to release the file as cc-by-sa-3.0". --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ११:३५, २३ मार्च २०२३ (IST) * {{ping|Usernamekiran}} I saw your message about having a bot to downsize non-free files. Thats a good idea. But first perhaps delete orphan non-free files? According to [[:वर्ग:All non-free media]] there are only 6 non-free files on mr.wiki :-D so I guess first step is to add {{tl|non-free media}} to all non-free license templates. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १८:४८, २३ मार्च २०२३ (IST) *:{{re|MGA73}} Hi. lol, yes, that's correct, but there are a lot of files that have no templates/tags at all. So we can't be sure how many non-free files we have here. A few hours ago, I created [[User:KiranBOT II/imagelist]] (it is transclusion of 4 pages, [[User:KiranBOT II/imagelist 1]] to 4). There are around 19k files hosted on mrwiki. I am not sure how to program the bot to see if a file has "satisfactory" metadata. Also, there are files uploaded by Priya Hiregange that don't have metadata, and follow nomenclature of facebook. e.g.: [[:File:1098177 4962377951143 1107498785 n.jpg]] —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] २१:१६, २३ मार्च २०२३ (IST) *:: {{ping|Usernamekiran}} Usually the first thing I do when I start to clean up a wiki is to try to find all license templates and add either {{tl|non-free media}} or {{tl|free media}}. Then I make a list of all files NOT in either [[:Category:All free media]] or [[:Category:All non-free media]] (example https://quarry.wmcloud.org/query/71493). If you know how to make quarries it should be possible to make a list of the templates used on the files and then you can look for templates that look like license templates (so they can be fixed too). Yeah the last file look like a Facebook file but sometimes users upload a file to Facebook and then later upload to Wikipedia. So it is not always a copyvio even if it is from Facebook. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २३:१२, २३ मार्च २०२३ (IST) *::: I think that the files in [[:Category:CC-BY-SA-4.0-disputed]] might be okay to move to Commons. The reason I added "-disputed" in the category name is because the license might have been added with a bot a few years ago. So before the files are moved it should be checked that it was not added by someone else. Also the template have changed content. Before 26 July 2015‎ it was a mixt of GFDL and a lot of cc-templates. After it is cc-by-sa-4.0. So I think it should be split up depending on upload date. If the uploaders are still active perhaps we could ask them to relicense the files to cc-by-sa-4.0. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ००:३६, २४ मार्च २०२३ (IST) *:::: I located a templates to fix: [[साचा:प्रताधिकारित संचिका]]. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ०१:२८, २४ मार्च २०२३ (IST) *:::::: {{ping|Usernamekiran}} Could you add {{tl|Non-free media}} to [[साचा:प्रताधिकारित संचिका]]? *:::::: Also I have send an email to Priya Hiregange and hope for a reply. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २२:१०, २५ मार्च २०२३ (IST) *:::::::{{ping|MGA73}} Hi. I could not understand what exactly you were asking, so I created [[सदस्य:MGA73/sandbox]]. Would you please edit it, and after it is done, I will copy-paste the entire contents to [[साचा:प्रताधिकारित संचिका]]. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] ११:१४, २७ मार्च २०२३ (IST) *::::::::{{ping|Usernamekiran}} sure, I made an edit. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १९:०५, २७ मार्च २०२३ (IST) *:::::::::{{ping|MGA73}} done. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] १५:४४, २८ मार्च २०२३ (IST) {{Outdent}} {{ping|Usernamekiran}} If you want there are some things you could do with your bot. For example: # Create a template like [[:oc:Modèl:No license]] and add that to all files that do not have a license # Add categories like "Files uploaded by <user xx>" to the files (you could start with the top 10 or 20 uploaders) # Add {{tl|Information}} on the files unless they have one (not on the non-free files) # Leave a notice on the user talk pages with a message that "You have uploaded one or more files without a license. Please add one or the file will be deleted." or "You have uploaded one or more files with a free license. Please help check that it has a good source and author." I think mr.wiki could give users for example 1 month to fix files without a license and if it is not fixed then all files should be deleted. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १९:४६, २९ मार्च २०२३ (IST) : What does the word "क्रिकॉमन्स" mean? I think that [[साचा:क्रिकॉमन्स]] should be replaced by standard templates like :<pre>{{self|GFDL|cc-by-sa-1.0|cc-by-2.0|cc-by-sa-2.0}}</pre> :There is no reason to include the NC and ND templates. But I would like to make sure that the template indicate own work. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १४:०४, १ एप्रिल २०२३ (IST) :: Hi {{ping|Usernamekiran}}! I noticed that on [[:चित्र:! flower 18.jpg]] there is what seems to be a template that was substed. I have seen other examples. Parhaps you can use your bot to find such cases and converte them to a real template? :: You asked earlier about metadata and there is an example on https://quarry.wmcloud.org/query/66549 where I made a list of files and their metadata. But you have to experiment a bit to find out how to look for the right metadata. Besides if file have no license then matadata will be of little use. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २२:२७, ५ एप्रिल २०२३ (IST) ::: It seems that there are 29 users that uploaded more than 50 unlicensed files each. The remaining 1090 files were uploaded by 200 different users. So if we put the files of the 29 biggest users in separate categories and the rest of the files in categories of ~100 files in each we will have 40 categories to check/fix/delete. ::: For example "Files to delete om May 1", "Files to delete on May 2"... "Files to delete on June 10". I think it is easier to handle if there are are not 17,000 files in one category. ::: Priya Hiregange uploaded 7,380 files and बहिर्जी नाईक uploaded 1,048 files. If the files look like own work there is not much we can do to save the files unless uploader post a message with a license. ::: If there are some uploaders that uploaded old photos then they might be PD due to age. And if the files were copied from other wikis then it may be possible to save the files. That could take some time. ::: In case someone would like to try to save the files but can't do it in time, then we could have a "Files to delete - on pause". Then any user can change "Files to delete on May x" to "Files to delete - on pause" and then we wait a little longer to delete the file (for example 2 weeks). --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १९:४७, ६ एप्रिल २०२३ (IST) {{Outdent}} I know it is not an easy task or an easy choice to make. But something has to happen. So unless someone have an idea/plan how to move on I think the only choice is to start deleting files. Should someone return one day it is possible to undelete the files. But keeping files without a license is not an option. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ००:५८, १३ एप्रिल २०२३ (IST) === Non free content policy === : Hi {{ping|Usernamekiran}}! I noticed that mr.wiki is not listed on [[:m:Non-free content]] as a wiki that allow fair use. But there is [[विकिपीडिया:अ-मुक्त सामग्री निकष]] and [[विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती]]. So I'm not sure if mr. wiki allow non-free content or not. [[wmf:Resolution:Licensing_policy]] is very clear: No non-free content unless there is a an Exemption Doctrine Policy (EDP). : If mr.wiki have no EDP then it is much easer to clean up because then all non-free files should just be deleted. That would also make it much easier to clean up files without a license because most files should simply be deleted. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १९:३०, १७ एप्रिल २०२३ (IST) :Ping [[User:संतोष गोरे]] too. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १९:३५, १७ एप्रिल २०२३ (IST) ::I do not know of any exemptions to non-free policies on w:mr. -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ११:३५, १८ एप्रिल २०२३ (IST) ::: [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] thank you. I think perhaps mr.wiki should discuss it and either chose to make an EDP or to chose not to allow non-free files. It is not a good solution to keep the status/policy unclear. If mr.wiki wants to allow non-free files make sure that a few users volunteer to monitor/check the files. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ०१:००, १९ एप्रिल २०२३ (IST) :I have resurrected the conversation and tagged admins on it. Per usual, I've set a 21 day limit to discussion, after which a definitive policy will be set. Regards -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०४:४५, १९ एप्रिल २०२३ (IST) :: [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] can you leave a note here when a policy have been set? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २१:४६, १५ मे २०२३ (IST) {{ping|Usernamekiran|अभय नातू|Tiven2240|संतोष गोरे}} Looking at [[विकिपीडिया:अ-मुक्त सामग्री निकष]] it seems that there is no debate there. I think that it is a clear sign that there are no users that have a strong wish to allow fair use on mr.wiki. Since there are only 391 files in [[:वर्ग:All non-free media]] it will only affect a few articles if all files are deleted. But it will make it much easier to clean up files without a license because most of them have to be deleted because uploaders are no longer active. If someone gives my bot a flag [[विकिपीडिया:सांगकाम्या/विनंत्या#सदस्य:MGA73bot]] I can help sort files in categories by uploader or by used/unused etc. Or if you prefer I can also just add the files to a list and you can mass delete files. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ०१:५३, २७ मे २०२३ (IST) :{{साद|MGA73}} :Bot flag granted for 3 months :[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २१:२५, २७ मे २०२३ (IST) === Cleanup in progress === Thank you for the bot flag [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]]! I have listed 7346 files on [[सदस्य:MGA73/Sandbox]] that were all taken by [[User:Priya Hiregange]] but are without a license and not in use. Since the user is no longer active it is not possible to save the files because only photographer can add a license. The files are not in use so if deleted the files will not leave red links in any articles. So I suggest that the files are all deleted. [[सदस्य:Tiven2240]] you have deleted some files recently so I ping you as info. If you prefer I can add {{tl|No license}}, {{tl|Oprhan file}} and [[:Category:Files uploaded by Priya Hiregange]] to the files but I was thinking that since there were so many I made a special list instead of adding templates etc. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ००:१२, २८ मे २०२३ (IST) :{{साद|MGA73}} :Thanks for the cleanup work. :Let's add this template <nowiki>{{पानकाढा|कारण=अप्रताधिकारित चित्र}}</nowiki> to the page, as a callout of last resort, to these pages and leave it on for 7 days. :At the end of the period (after midnight June 4th, UTC), remove these files. :[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०६:५७, २८ मे २०२३ (IST) ::{{साद|अभय नातू}}. Happy to help :-) I will add the template. I noticed that there are many files in [[:वर्ग:Non Licensed Images]] that allready have some sort of template/warning. I will just leave that so there are 2 warnings. If user return and would add a license we can always clean up and fix file page. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १३:१२, २८ मे २०२३ (IST) {{outdent}} I noticed that [[सदस्य:Rahuldeshmukh101]] is probably still actice and English speaking, so I made [[:वर्ग:Files uploaded by Rahuldeshmukh101]] and added all the uploads there and I also made a comment at [[सदस्य_चर्चा:Rahuldeshmukh101#License, source and author on your uploads]]. I think we can do something similar to all uploaders where there is a chance that they are still active. If some of them do not speak English I need someone help write a message. If user is long gone then I think we should just tag for deletion like with the files of Priya Hiregange. But I will not add more files for deletion untill the 7 days have passed and the files of Priya Hiregange are deleted. Files will drown if too many are marked for deletion at the same time. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १८:४८, २९ मे २०२३ (IST) :To my best knowledge Rahul can be helpful in getting contact with Priya. {{Ping|Rahuldeshmukh101}} can you help. --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १५:१८, ३० मे २०२३ (IST) :: [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]], that would be awesome! :: I also created [[:वर्ग:Files uploaded by Archanapote]] and added files to this category (and sub category). I hope [[सदस्य:Archanapote]] will notice and help fix the problem. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २३:४०, ३१ मे २०२३ (IST) ::: I later created [[:वर्ग:Files uploaded by Abhijitsathe]] (and sub category). I hope [[सदस्य:Abhijitsathe]] will notice and help fix the problem. ::: Also [[:Category:Files uploaded by Priya Hiregange - special]] where I added the few files that are in use (or may have a license). That would make it easier if Priya return and confirm the license. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:५२, १ जून २०२३ (IST) :::: [[:वर्ग:Files uploaded by Dr.sachin23]] was the last active user with 100+ uploads. I hope [[सदस्य:Dr.sachin23]] will notice and help fix the problem. :::::I think i have uploaded the files as per my kowlege and facility avilable at that time on wiki marathi. Surely you can delete the uploaded files but it responsibility of to provide alternative picts for the connected pages सचिन नवले :::: I think that [[User:Katyare]] and the other active users with less than 100 uploads could just check their own uploads at [[विशेष:चित्रयादी/]]. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २१:२१, १ जून २०२३ (IST) {{outdent}} {{साद|अभय नातू}} the 7 days are up. Would you like to delete the files now? I'm sorting files of the biggest uploaders in separate categories but I have not added the deletion tag yet. I was thinking it would be best to take them one at a time so we do not flood the deletion process. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २३:२७, ५ जून २०२३ (IST) :{{साद|MGA73}}, :Yes, let's start the deletion process. I recommend starting with smaller uploaders and ramping up to bigger ones with a target to complete deletion by 12-Jun-2023. :Thanks again! :[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०१:५२, ६ जून २०२३ (IST) :: {{साद|अभय नातू}} I can't delete files here on mr.wiki so you or one of the other admins have to delete the files. But I can tag them with my bot. :: I have allready put the files of the biggest uploaders in categories for example [[:वर्ग:Files uploaded by चित्रयादी/बहिर्जी नाईक]]. I just noticed that I made a mistake in the name because "चित्रयादी/" should not have been a part of the category name. However, I only added the deletion tag for the files of Priya ([[:Category:Files uploaded by Priya Hiregange]]). :: Just let me know how many files you would like to see tagged at a time and if you would like me to tag the smallest first or if I should finish the big ones that I allready put in categories. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ०२:०६, ६ जून २०२३ (IST) ::{{साद|MGA73}}, ::If you already started on bigger categories, let's continue that and tag ~250 pages at a time, until I test out mass-deletion. ::cc:{{साद|संतोष गोरे|Tiven2240|Usernamekiran|Sandesh9822}}, ::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०२:४१, ६ जून २०२३ (IST) :::{{ping|अभय नातू}} is there any option for mass-delete/batch delete on Marathi Wikipedia? (I think twinkle on enwiki has batch-delete) even if there isn't, I will try to delete the files. I will also see if AWB or pywikibot have some functions related to that. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] ०३:५१, ६ जून २०२३ (IST) ::{{साद|Usernamekiran}}, ::You should be able to do that using Twinkle. Let me know if you run into issues. -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०४:०८, ६ जून २०२३ (IST) :::{{साद|Usernamekiran}} With pywikipedia perhaps delete.py could work. I think it would be easier if you delete the files before I mark more files for deletion. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:३८, ६ जून २०२३ (IST) ::::{{साद|MGA73}}We can do mass delete I have done in the past. Abhay sir please provide temporary bot access so that it doesn't flood the recent changes. Once the list or category is ready kindly ping me for deletion --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०७:३२, ७ जून २०२३ (IST) {{outdent}} {{साद|Tiven2240}}, which account do you need bot flag for? I believe you control a bot previously created. Also, {{साद|MGA73}} has already tagged files to be deleted. See above for classification/criteria. Thanks. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०९:२७, ७ जून २०२३ (IST) : {{साद|Tiven2240}} yes there are allready 7,336 files in [[:वर्ग:लवकर वगळावे विनंत्या]]. I have also sorted files in categories at [[:वर्ग:विकिपीडिया_चित्रे]] (named "Files uploaded by..."). If you want you can take the categories one-by-one and mark the files for deletion when you are ready and then delete after 7 days. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १०:५७, ७ जून २०२३ (IST) :: {{साद|अभय नातू}} You can add temporary admin rights to [[User:TivenBot]] account. Or give temporary Bot flag to this account both works --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ११:२०, ७ जून २०२३ (IST) :Bot flag granted to {{साद|Tiven2240}} for a week. ::: I have added {{tl|No license}} to all the files (except a few that was protected). I added the files in category per user if user had 100 or more files. The files from users with fewer than 100 uploads was added to [[:वर्ग:Files uploaded 1-99 files]]. There is a link in the category so it is easy to see who uploaded the files. So all active users should check. If anyone would like to help you can give the active users a tip (in local language) so they can add source, author and license. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २३:५७, ७ जून २०२३ (IST) {{Done}}--[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १९:१५, १० जून २०२३ (IST) :{{साद|Tiven2240}} great! Do you tag the files for deletion yourself now? Or is there anything I should do? : Also there are a few files in [[:वर्ग:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]] and [[:वर्ग:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons]]. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १९:२४, १० जून २०२३ (IST) :: I tagged another category: [[:वर्ग:Files uploaded by Santoshgajre]]. Thats 675 files. :: I skipped [[:वर्ग:Files uploaded by चित्रयादी/बहिर्जी नाईक]] with 875 files because if mr.wiki allow fair use then some files with logos could be changed to fair use (if in use). --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १९:५६, १५ जून २०२३ (IST) :::{{साद|Tiven2240}} Hello! I think the next bunch of files is ready to delete. Could you have a look? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १९:३०, २६ जून २०२३ (IST) Anyone? There are a lot of files in [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]] to delete. If they need to be nominated for deletion in another way please let me know. But there are thousands of unused files without a license (see [[:वर्ग:Files not in use]]). It should not be that hard to delete those files. Uploaders had a chance to add a license if they were still active and wanted to save the files. Extra ping to give users a chance to check out the category in [[:वर्ग:विकिपीडिया चित्रे]]: # [[User:Abhijitsathe‎]] (1 C, 174 F) # [[User:Anna4u‎]] (240 F) # [[User:Archanapote‎]] (1 C, 490 F) # [[User:Bantee‎]] (585 F) # [[User:Cherishsantosh‎]] (586 F) # [[User:Dhiruraghuvanshi‎]] (534 F) # [[User:Dipesh Parab‎]] (448 F) # [[User:Dr.sachin23‎]] (1 C, 118 F) # [[User:Ghanshyam26‎]] (227 F) # [[User:Girishkedare‎]] (496 F) # [[User:Jayram‎]] (346 F) # [[User:Kaustubh‎]] (103 F) # [[User:Kselvarani‎]] (362 F) # [[User:Maihudon‎]] (303 F) # [[User:Pratham0613‎]] (180 F) # [[User:Priya Hiregange‎]] (1 C) # [[User:Rahuldeshmukh101‎]] (1 C, 211 F) # [[User:Sagarmarkal‎]] (320 F) # [[User:Santoshgajre‎]] (674 F) # [[User:Shreemarkal‎]] (383 F) # [[User:Suhasini shedge‎]] (365 F) # [[User:चित्रयादी/बहिर्जी नाईक‎]] (875 F) # [[User:संतोष दहिवळ‎]] (181 F) --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १८:०८, २३ जुलै २०२३ (IST) === Help needed with files === Hello! I could use help by local users to check the files in [[:वर्ग:Unidentified subjects in India]] ({{formatnum:{{PAGESINCATEGORY:Unidentified subjects in India|files}}|R}} files). The files should be okay to move to Commons. However a local user should help check if there is a good description of the file before the file is moved to Commons. If the file is low quality or if it is not possible to identify the subject then perhaps nominate the file for deletion. Perhaps admins can delete the files moved to Commons (the number after the category show the number of files in the category): * [[:वर्ग:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]] {{formatnum:{{PAGESINCATEGORY:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons‎|files}}|R}}. * [[:वर्ग:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons]] {{formatnum:{{PAGESINCATEGORY:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons|files}}|R}}. Also admins are needed to delete the files without a license (the number after the category show the number of files in the category): * No license ([[:Category:Files with no license]]): {{formatnum:{{PAGESINCATEGORY:Files with no license|files}}|R}}. ** Formaly nominated for deletion: [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]]: {{formatnum:{{PAGESINCATEGORY:उल्लेखनीयता रद्दीकरण|files}}|R}}. If they need to be nominated for deletion in another way please let me know. ** Unused files without a license: [[:वर्ग:Files not in use]]: {{formatnum:{{PAGESINCATEGORY:Files not in use|files}}|R}}. I'm currently checking the files in [[:वर्ग:CC-BY-SA-4.0-disputed]] ({{formatnum:{{PAGESINCATEGORY:CC-BY-SA-4.0-disputed|files}}|R}} files). When they are checked they are either added to [[:वर्ग:Unidentified subjects in India]] or a {{tl|No license}} is added depending on if the uploader added the license or someone else did. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २२:३२, २९ जुलै २०२३ (IST) : Can someone read this: [[:चित्र:उदाहरण.jpg]]? Is it just an example file? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १८:००, ३० जुलै २०२३ (IST) ::Yes, this is an example file-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १९:२५, ३० जुलै २०२३ (IST) ::: {{re|संतोष गोरे}} Thank you. First version of the file does not have a license. The rest of the versions are okay. Perhaps you can delete the first version? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २२:२८, ३० जुलै २०२३ (IST) ::::{{झाले}} done, only first virsion has been deleted-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:४५, ३० जुलै २०२३ (IST) ::::: {{re|संतोष गोरे}} Thank you. Perhaps you can make a small notice (translation) that files in [[:वर्ग:Unidentified subjects in India]] can be moved to Commons? Perhaps some local users would like to check and move the files? (There is a small help in the category that could be translated too) --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ०१:०८, ३१ जुलै २०२३ (IST) ::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]], [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] will help you.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०६:५४, १ ऑगस्ट २०२३ (IST) :Noted. Will make these changes shortly. -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०८:५६, १ ऑगस्ट २०२३ (IST) :: Thank you! I have now checked all the files in [[:वर्ग:CC-BY-SA-4.0-disputed]] and less than 50 files in [[:Category:All free media]] are not checked yet. It would help if someone could delete the 12 files that have been moved to Commons. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:११, १ ऑगस्ट २०२३ (IST) === Time to delete === Hello! It has been a few months since I last checked mr.wiki and there are still many unlicensed files left. We need an admin to delete all the files in these categories (some can be in more than one category): * [[:वर्ग:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]] {{formatnum:{{PAGESINCATEGORY:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons‎|files}}|R}}. * [[:वर्ग:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons]] {{formatnum:{{PAGESINCATEGORY:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons|files}}|R}}. * Unused files without a license: [[:वर्ग:Files not in use]]: {{formatnum:{{PAGESINCATEGORY:Files not in use|files}}|R}}. * Formaly nominated for deletion: [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]]: {{formatnum:{{PAGESINCATEGORY:उल्लेखनीयता रद्दीकरण|files}}|R}}. * No license ([[:Category:Files with no license]]): {{formatnum:{{PAGESINCATEGORY:Files with no license|files}}|R}}. I suggest to start from the top. I could also ask on Meta but it is always preferred if a local admin delete because they know the wiki and the language. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १८:४०, ११ डिसेंबर २०२३ (IST) : Hello again! I ping [[सदस्य:Tiven2240]], [[सदस्य:अभय नातू]] and [[सदस्य:संतोष गोरे]] to make sure you see this notice. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:५२, १० जानेवारी २०२४ (IST) ::[[सदस्य:MGA73|MGA73]], hi, the files tobe deleted are in big number and I have no bot to delete them. That's why I am not deleting them.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:५२, १० जानेवारी २०२४ (IST) Will do in upcoming weeks. --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) २२:१९, १० जानेवारी २०२४ (IST) :+1 ^^ -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २२:३१, १० जानेवारी २०२४ (IST) :: [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] sounds good. Thank you! Once the unused files are deleted we could wait a few days with the rest so there is time to check once more if any of the files could be saved. If you think :-) --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:१६, ११ जानेवारी २०२४ (IST) ::: [[सदस्य:अभय नातू]] I noticed you deleted a lot of files. Great! --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २३:५१, ६ फेब्रुवारी २०२४ (IST) :::: [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] and [[सदस्य:अभय नातू]] there are still files to delete. Perhaps you could have a look? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १५:२२, १० मार्च २०२४ (IST) :::::{{ping|MGA73}} I'll look into it tomorrow. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] २३:५५, ११ मार्च २०२४ (IST) :::::: Hi [[User:Usernamekiran|Usernamekiran]], [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] and [[सदस्य:अभय नातू]]! There are still more than 7,100 files in [[:वर्ग:Files not in use]]. Any chance you could delete the files? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २३:५९, १४ एप्रिल २०२४ (IST) :::::::{{ping|MGA73}} if they are unquestionable deletions, I'll start working on them in 20ish hours from now. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] ०१:५३, १५ एप्रिल २०२४ (IST) ::::::::{{ping|अभय नातू}} is it possible to make [[User:KiranBOT]] an admin for a month? I have created a script to delete files. But I am unable to test it as my account is not bot, and the bot account is not admin. I think it should be okay as the bot operator (me) already is an admin. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] १६:२१, १५ एप्रिल २०२४ (IST) ::{{साद|Usernamekiran}}, ::My preference is not to delete these with a bot. ::We can continue deleting in tranches, as we have been doing. ::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १०:०४, १६ एप्रिल २०२४ (IST) ::: It will flood recent changes but if thats what you prefer its fine with me. Normal practice is to delete unlicensed files within 7 or 14 days so I suggest not to make it small tranches because it will make it take much longer time. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ०१:५८, २७ एप्रिल २०२४ (IST) ::::I agree with [[सदस्य:MGA73|MGA73]] and [[सदस्य:Usernamekiran|Usernamekiran]] -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:४९, २७ एप्रिल २०२४ (IST) {{outdent}} [[User:Usernamekiran|Usernamekiran]] if the files are to be deleted with an account that does not have a bot flag then you should be able to use your main account with the bot. That way deletions will be done in the name of your main account and all deletions will be visible. Then you can still use the script but monitor the deletions? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ००:२७, २७ मे २०२४ (IST) :[[सदस्य:MGA73|MGA73]] I have deleted number of files and still gradually deleting as per my free time.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:३०, २८ मे २०२४ (IST) ::[[सदस्य:MGA73|MGA73]], * [[:वर्ग:Files not in use]]: {{formatnum:{{PAGESINCATEGORY:Files not in use|files}}|R}} Please remove this template and add a template of file for deletion. -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:१४, १ जून २०२४ (IST) :::[[User:संतोष गोरे]] Hello! My bot is now marking files for deletion. It will take some time. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ०१:३७, २ जून २०२४ (IST) {{Ping|MGA73}} Please do not use BOT on this Wiki without Bot Flag it is against out BOT policy. I have temporary blocked the account. Please respect local policies on this Wiki. Thanks for understanding --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १५:२४, २ जून २०२४ (IST) : {{re|Tiven2240}} Sorry about that. I made the edits because I was asked to do them. The edits are rather simple to make with a bot so it would be easy for a local bot operator to make them. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १५:३६, २ जून २०२४ (IST) : Please request for bot rights on [[विकिपीडिया:सांगकाम्या/विनंत्या]] --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १५:५८, २ जून २०२४ (IST) I will wait untill most of the files allready tagged is deleted. But I think perhaps a lille help would be useful so I asked [[:m:Steward_requests/Miscellaneous#Deleting_unlicensed_files_and_orphan_non-free_files_on_ur.wiki_and_mr.wiki|at meta]] if there are anyone who can help the local admins with the files. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:५२, १५ जून २०२४ (IST) Hello [[सदस्य:Tiven2240]], [[सदस्य:अभय नातू]] and [[सदस्य:संतोष गोरे]]! I forgot to tell that Stewards on Meta will only help if requested by community. So either local admins have to keep deleting files or you have to ask for assistance. Ur.wiki also had thousands of unlicensed files to delete but they just finished deleting the files. So it can be done with hard work (or a mass deleting script). --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ०१:०७, २३ ऑक्टोबर २०२४ (IST) Hi we are aware of such scripts we have done this in past. Let us discuss this internally with community members and get back to you. --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०८:५०, २३ ऑक्टोबर २०२४ (IST) :Correct. We have been deleting these files in batches over the last many months and will continue to do so. :Thanks for checking in. :[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०९:४७, २३ ऑक्टोबर २०२४ (IST) ::[[सदस्य:MGA73|MGA73]] hi, last batch is going to finish soon. Kindly add the template of file for deletion to new batch. -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:१३, २५ नोव्हेंबर २०२४ (IST) [[File:2.5M pageedits mr.wiki.png|thumb|right]] ::: Hi [[User:संतोष गोरे]]. I tried to create a request for a bot flag on [[विकिपीडिया:सांगकाम्या/विनंत्या#MGA73bot]]. I made it short because I marked files before. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २२:१९, २५ नोव्हेंबर २०२४ (IST) :::: Yay! 2.5 Million edits! I had to make a screenshot of this! --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ००:३५, २६ नोव्हेंबर २०२४ (IST) Hi [[User:संतोष गोरे]]. Still no bot flag. I will ping [[सदस्य:अभय नातू]] and if I get a flag I can mark the files. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १६:३०, २२ डिसेंबर २०२४ (IST) :{{साद|MGA73}} :To be clear, you need a botflag to mark files that need deletion with a template, is that correct? :Assuming so, if there are no objections in the next 24-38 hours, I will grant the flag. I have let the community know of the 24 hour timeline. :LMK if there are other uses/intentions for the bot. :[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १९:२२, २२ डिसेंबर २०२४ (IST) :: Hello [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]]! Yes it correct that I will mark the files for deletion. It is the files in [[:वर्ग:Files with no license]]. But if the files can be deleted without having to add a deletion template then I do not need the flag. :: I do not plan to use the bot for anything else. If one of the uploades af the files in the category ([https://usualsuspects.toolforge.org/?language=mr&project=wikipedia&category=Files_with_no_license&min_days=14&badboys=Bad+Boys click this link to see]) are still active they could ask that I add a license for them with my bot. But since they have had a long time to do so I do not think it is likely to happen. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १९:५२, २२ डिसेंबर २०२४ (IST) Hi [[User:संतोष गोरे]]. I have marked some files for deletion now. But its getting late here so will mark more tomorrow. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ०३:१४, २८ डिसेंबर २०२४ (IST) All unused files are now marked. So [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]] now have 4,080 files ready to delete. If the reason for deleting files in small batches are not to flood recent changes then perhaps [[:m:Meta:Flood flag|a flood flag]] could be a solution? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ०२:०७, १४ जानेवारी २०२५ (IST) When they are deleted there are still 1,000+ files in [[:वर्ग:Files with no license]]. But they are in use. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ०२:०७, १४ जानेवारी २०२५ (IST) :{{ping|MGA73}} Hello. I was off the Marathi Wikipedia for a very long time. Hopefully, I will be able to contribute now. Should I start manually deleting the files from [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]]? —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] ११:५६, २१ जून २०२५ (IST) === Active users can help === Thousands of unused files without a license have now been deleted and soon all will be gone thanks to [[सदस्य:संतोष गोरे]]. Next up are * Unused non-free files * Files that are likely taken from the Internet * Files in use that have no license All active users can help by clicking [https://usualsuspects.toolforge.org/?language=mr&project=wikipedia&category=Files_with_no_license&min_days=14&badboys=Bad+Boys this link to see who uploaded files without a license] and check if their name is on the list. If yes please check and fix. Or if you see an active user on the list write them a notice. All active users can also help by checking the unused (non-free) files to see if they should be added to an article. Files without a license should be deleted even if they are in use. Only chance to save them is 1) uploader add a valid free license 2) someone add a valid non-free license and rationale. If that does not happen the file should be deleted. All active users can help find a replacement file to use in the article instead. If all active users help it will be much easier. For example check 5 random photos and find replacements if relevant. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ११:०२, १९ जून २०२५ (IST) == Global ban proposal for Slowking4 == Hello. This is to notify the community that there is an ongoing global ban proposal for [[User:Slowking4]] who has been active on this wiki. You are invited to participate at [[metawiki:Requests for comment/Global ban for Slowking4 (2)|m:Requests for comment/Global ban for Slowking4 (2)]]. Thank you [[सदस्य:Seawolf35|Seawolf35]] ([[सदस्य चर्चा:Seawolf35|चर्चा]]) १८:३१, १५ मार्च २०२४ (IST) == Editing contest about Norway == Hello! Please excuse me from writing in English. If this post should be posted on a different page instead, please feel free to move it (or tell me to move it). I am Jon Harald Søby from the Norwegian Wikimedia chapter, [[wmno:|Wikimedia Norge]]. During the month of April, we are holding [[:no:Wikipedia:Konkurranser/Månedens konkurranse/2025-04|an editing contest]] about India on the Wikipedias in [[:nb:|Norwegian Bokmål]], [[:nn:|Norwegian Nynorsk]], [[:se:|Northern Sámi]] and [[:smn:|Inari Sámi]]̩, and we had the idea to also organize an "inverse" contest where contributors to Indian-language Wikipedias can write about Norway and Sápmi. Therefore, I would like to invite interested participants from the Marathi-language Wikipedia (it doesn't matter if you're from India or not) to join the contest by visiting [[:no:Wikipedia:Konkurranser/Månedens konkurranse/2025-04/For Indians|this page in the Norwegian Bokmål Wikipedia]] and following the instructions that are there. Hope to see you there! [[सदस्य:Jon Harald Søby (WMNO)|Jon Harald Søby (WMNO)]] ([[सदस्य चर्चा:Jon Harald Søby (WMNO)|चर्चा]]) १४:३८, ४ एप्रिल २०२५ (IST) g1u53o6rz1uxdgdjagtj8xlo59ctana वर्ग:सांगली जिल्ह्यातील तालुके 14 16326 2581406 1229204 2025-06-21T02:21:08Z 2409:40C2:7044:5F:8000:0:0:0 2581406 wikitext text/x-wiki * [[वर्ग: satara जिल्हा]] 3jeogz19rsx1hico43s3ulgcizk3wcg 2581407 2581406 2025-06-21T02:37:31Z संतोष गोरे 135680 [[Special:Contributions/2409:40C2:7044:5F:8000:0:0:0|2409:40C2:7044:5F:8000:0:0:0]] ([[User talk:2409:40C2:7044:5F:8000:0:0:0|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:सांगकाम्या|सांगकाम्या]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. 1229204 wikitext text/x-wiki * [[वर्ग:सांगली जिल्हा]] 77i8bzu9p5k3jpl3hmtzf9wngm1703v रीमा लागू 0 16862 2581313 2581120 2025-06-20T13:43:30Z संतोष गोरे 135680 2581313 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट अभिनेता | पार्श्वभूमी_रंग = | नाव = रीमा लागू | चित्र = Reema_Lagoo.jpg | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = रीमा लागू | पूर्ण_नाव = नयन भडभडे | जन्म_दिनांक = {{Birth date|1958|6|21|df=yes}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत|last1=Chaturvedi|first1=Vinita|title=Birthday celebrations make Reema Lagoo awkward|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/tv/news/hindi/Birthday-celebrations-make-Reema-Lagoo-awkward/articleshow/47743577.cms|work=द टाइम्स ऑफ इंडिया|accessdate=18 May 2017}}</ref> | जन्म_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] | मृत्यू_दिनांक = {{Death date and age|2017|5|18|1958|6|21}} | मृत्यू_स्थान = | इतर_नावे = | कार्यक्षेत्र = अभिनय | राष्ट्रीयत्व =[[भारतीय]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | कारकीर्द_काळ = | प्रमुख_नाटके = | प्रमुख_चित्रपट = | प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = | पुरस्कार = | वडील_नाव = | आई_नाव = मंदाकिनी भडभडे | पती_नाव = {{लग्न|[[विवेक लागू]]|1978|end=विभक्त}} | पत्नी_नाव = | अपत्ये = मृणमयी विनय वायकूळ (कन्या) | संकेतस्थळ = | तळटिपा = }} '''रीमा लागू''' (पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे; ([[२१ जून]] [[इ.स. १९५८|१९५८]] - [[१८ मे]], [[इ.स. २०१७|२०१७]]) या मराठी व हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री होत्या. सुमारे चार दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमाने अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले. [[मैने प्यार किया]], [[हम आपके हैं कौन..!|हम आपके हैं कौन]], [[हम साथ साथ हैं]] यासारख्या हिंदी चित्रपटातले तसेच तू तू मै मै या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम गाजले. == आरंभीचे आयुष्य == मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. मूळची मुंबईची असलेल्या नयन हिचा मुंबई-पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गिरगावातील चिकित्सक आणि कमळाबाई या शाळांमध्ये झाले. त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्राशी नाते जोडले, मात्र नंतर त्यांच्या आईने त्यांना अभ्यासासाठी या क्षेत्रापासून दूर राहायला सांगितले आणि नयन १९७० मध्ये पुण्यात शिक्षणासाठी आली. हुजूरपागा शाळेत तिने ८वीत प्रवेश घेतला. १९७४ मध्ये ती मॅट्रिक झाली. [[पुणे]] येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच तिच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. आंतरशालेय नाट्य स्पर्धामध्ये ती मराठी आणि हिंदी नाटकांतून भूमिका करून हमखास बक्षिसे मिळवून द्यायची. शाळेत असताना तिने ‘वीज म्हणाली धरतीला’ आणि ‘काबुलीवाला’ या नाटकांतून काम केले होते. ‘काबुलीवाला’ नाटकातील तिचा अभिनय पाहून समोर बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी यायचे. हरहुन्नरी नयनला शालेय नाटकामध्ये नेहमी पुरुष व्यक्तिरेखा साकाराव्या लागत असत. शाळेच्या अखेरच्या वर्षी अखरेच्या वर्षी तिने ‘नटसम्राट’ नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्या वयामध्ये तिच्यासारख्या मुलीने तात्यासाहेबांचे शब्द आपल्या अभिनयासह पेलणे हे खरेच कौतुकास्पद होते. नयन भडभडे यांनी मुंबईमध्ये विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला. ‘ती फुलराणी’द्वारे त्यांचा नाटकांमधील प्रवास सुरू झाला. त्यांनी श्याम बेनेगल यांच्या एका जाहिरातीमध्ये यादरम्यान काम केले. ही जाहिरात गाजली आणि मग त्यांनी अभिनय क्षेत्रात अधिक उत्साहाने काम करायला सुरुवात केली. या दरम्यान त्या बँकेतही नोकरी करत होत्या. मात्र बँकेतील नोकरी आणि अभिनयातील कारकीर्द या दोन्ही गोष्टींचा तोल सांभाळणे कठीण झाल्याने त्यांनी पूर्णपणे अभिनयासाठी वेळ दिला. या दरम्यान त्यांनी रंगकर्मी आणि बँकेतील सहकारी विवेक लागू यांच्याशी लग्न केले आणि नयन भडभडेची रीमा लागू झाली. त्यांचा हा विवाह फार काळ टिकला नाही. त्यानंतर रीमा लागू यांनी दीर्घ काळ रीमा लागू हीच ओळख कायम ठेवली. ==अभिनयाची व्यावसायिक कारकीर्द== रीमा लागू यांनी जाहिरातींमधून अभिनय क्षेत्राशी पहिली ओळख करून घेतली. महेश कोठारे यांच्यासोबत त्यांनी जाहिरातींमध्ये काम केले. ‘हा माझा मार्ग एकला’मध्येही त्यांनी लहानशी भूमिका केली होती. मात्र ती भूमिका फार प्रकाशात आली नाही. त्यांनी मास्टरजी या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. काही काळ रंगभूमीवरही त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. मात्र नंतर बराच काळ त्या अभिनय क्षेत्रापासून लांब होत्या. बालकलाकार म्हणून ‘दृष्टी आहे जगाची निराळी’ या चित्रपटातही त्यांनी महेश कोठारेंसोबत अभिनय केला. मात्र तो प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यानंतर लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. १९७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. नाट्य अभिनेते [[विवेक लागू]] यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव रीमा लागू झाले. रीमा लागू यांनी गुजराती नाटकांतून, तसेच कन्नड आणि भोजपुरी चित्रपटांमधूनही काम केले. १९८०-९० च्या दशकामध्ये आमीर खान, सलमान खान, करीश्मा कपूर या अभिनेत्यांचा उदय होत असताना त्यांना आईच्या भूमिका मिळायल्या लागल्या आणि त्यांनी गरीब बापुडवाण्या आईला ग्लॅमरस रूप दिले. कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, साजन, वास्तव, कुछ कुछ होता है अशा चित्रपटांमधून एक नवी आई प्रेक्षकांना दिसली. मैंने प्यार किया, साजन, हम साथ साथ हैं, जुडवा, पत्थर के फूल, शादी करके फस गया यार, निश्चय, कहीं प्यारना हो जाए यांसारख्या सिनेमांमध्ये रीमा यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली आहे. रीमा लागू यांनी आरके बॅनरसोबत हीना या चित्रपटातही भूमिका केली. खानदान, श्रीमान श्रीमती, तू तू मै मै या मालिकांनी त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. तू तू मै मै या विनोदी मालिकेला प्रेक्षक आजही पसंत करतात. ==रीमा लागू यांनी भूमिका केलेली मराठी नाटके== * के दिल अभी भरा नही * घर तिघांचं हवं * चल आटप लवकर * छाप काटा * झाले मोकळे आकाश * ती फुलराणी * तो एक क्षण * पुरुष * बुलंद * सविता दामोदर परांजपे * विठो रखुमाय * शांतेचं कार्टं चालू आहे * सासू माझी ढासू * सौजन्याची ऐशी तैशी ==रीमा लागू यांचे मराठी चित्रपट== * अरे संसार संसार * नवरा माझा नवसाचा * मान सन्मान * आईशपथ * आपलं घर * कवट्या महांकाळ * जिवलगा * दृष्टी आहे जगाची निराळी’ * धूसर * बिनधास्त * घो मला असला हवा * शुभ मंगल सावधान * सिंहासन * सैल * हा माझा मार्ग एकला ==रीमा लागू यांच्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका== * खानदान * तू तू मैं मैं * दो और दो पॉंच * नामकरण * श्रीमान श्रीमती ===चित्रपट=== {| class="wikitable" |- ! वर्ष !! चित्रपटाचे नाव !! भूमिका !! इतर |- |२०१६ |जाऊंद्या  ना  बाळासाहेब |आईसाहेब | |- | rowspan="2" | २०१५ || ''[[कट्यार काळजात घुसली (चित्रपट)]]'' || कट्यार || आवाज |- | | ''मै हू रजनीकांत'' || स्वतः विडंबन|| |- | २०१३ || ''४९८ए : द वेडिंग गिफ्ट'' || || |- | २०११ || ''मुंबई कटिंग'' || || |- | २०१० || ''मित्तल व्हर्सेस मित्तल'' || || |- | २००९ || ''आमरस'' <ref>[http://www.bollywoodhungama.com/movies/cast/13574/index.html Amras (Cast and Crew)]</ref> || || |- | rowspan="3" | २००८ || ''किडनॅंप'' || सोनियाची आजी || |- | ''महबूबा'' || राणीची आई || |- | सुपरस्टार || आई || |- | २००६ || ''[[आई शपथ]]''|| देवकी देसाई || |- | rowspan="5" | २००५ || '' डिव्होर्स नॉट बिटवीन हजबंड अँड वाईफ'' || न्यायाधीश || |- | ''सॅंन्डविच (चित्रपट)'' || || |- | '' शादी करके फस गया'' || || |- | ''हम तूम और मॉम'' || || |- | ''कोई मेरे दिल मे है'' || मिसेस विक्रम मल्होत्रा || |- | २००४ || ''हत्या (चित्रपट)'' || || |- | rowspan="5" | २००३ || ''[[कल होना हो]]'' ||मिसेस माथूर || |- | ''[[चुपके से]]'' || लक्ष्मी तिमघुरे || |- | ''मै प्रेम की दिवानी हूं'' || || |- | ''प्राण जाए पर शान न जा '' || || |- | ''[[कवट्या महाकाळ]]'' || || |- | २००२ || ''हत्यार (चित्रपट)'' || Shanta || |- | rowspan="4" | २००१ || ''तेरा मेरा साथ रहें'' || जानकी गुप्ता || |- | ''इंडियन (चित्रपट)'' || मिसेस सूर्यप्रताप सिंग|| |- | ''सेन्सार'' || || |- | ''हम दिवाने प्यार के'' || मिसेस चटर्जी|| |- | rowspan="5" | २००० || ''कहीं प्यारना हो जाए'' || मिसेस शर्मा|| |- | ''जिस देश में गंगा रहता है'' || लक्ष्मी || |- | ''दिवाने'' || || |- | ''निदान'' || सुहासिनी नाडकर्णी || |- | ''क्या कहना'' || || |- | rowspan="5" | १९९९ || ''दिल्लगी'' || || |- | ''[[Vaastav: The Reality|वास्तव : द रिऍलिटी]]'' || Shanta || |- | ''आरजू'' || Parvati|| |- | ''[[Bindhaast|बिनधास्त]]'' || Aasawari Patwardhan|| |- | ''[[Hum Saath-Saath Hain: We Stand United|हम  साथ - साथ  हैं]]'' || Mamta|| |- | rowspan="7" | १९९८||''[[Jhooth Bole Kauwa Kaate|झूट बोले कौवा काटे]]'' | Savitri Abhyankar|| |- | ''[[Kuch Kuch Hota Hai|कुछ  कुछ  होता  है]]'' || Anjali's mother|| |- | ''[[Aunty No. 1]]'' || Vijayalaxmi || |- | ''[[Deewana Hoon Pagal Nahi|दिवाना  हूं  पागल  नाही]]'' || || |- | ''[[Mere Do Anmol Ratan|मेरे  दो अनमोल  रतन]]'' || Suman || |- | ''[[Pyaar To Hona Hi Tha|प्यार तो होणा हि था]]'' || || |- | ''[[Tirchhi Topiwale|तिरछी टोपीवाले]]'' || || |- | rowspan="6" | १९९७|| ''[[Deewana Mastana|दीवाना मस्ताना]]'' || || |- | ''[[Betaabi]]'' || || |- | ''[[Yes Boss (film)|येस बॉस]]'' || || |- | ''[[Judwaa|जुडवा]]'' || || |- | ''[[Rui Ka Bojh]]'' || || |- | ''[[Uff! Yeh Mohabbat]]'' || || |- | rowspan="6" | १९९६ || ''दिल तेरा दिवाना'' ||Kumar's late wife and Ravi's late mom'' || |- | ''[[Maahir|माहीर]]'' || Asha || |- | ''[[Prem Granth|प्रेम ग्रंथ]]'' || Parvati || |- | ''[[Papa Kahte Hain|पापा केहते हैं]]'' || || |- | ''[[Vijeta]]'' || Mrs. Laxmi Prasad|| |- | ''[[Apne Dam Par|अपने दम पर]]'' || Mrs. Saxena|| |- | १९९५|| ''[[Rangeela (film)|रंगीला]]'' || || |- | rowspan="3" | १९९४|| ''[[Hum Aapke Hain Koun..!|हम  आपके  हैं  कौन ..!]]'' || ||Nisha's mom |- | ''[[Pathreela Raasta]]'' || || |- | ''[[Dilwale (1994 film)|दिलवाले]]'' || || |- | rowspan="7" | १९९३|| ''[[Pyaar Ka Tarana|प्यार  का  तराणा]]'' || || |- | ''[[Dil Hai Betaab|दिल  है  बेताब]]'' || || |- | ''[[Gumrah (1993 film)|गुमराह]]'' || Sharda Chadha|| |- | ''[[Aaj Kie Aurat|आज कि  औरत]]'' || Jail Warden Shanta Patil|| |- | ''[[Mahakaal|महाकाल]]'' || || |- | ''[[Sangram (1993 film)|संग्राम]]'' || || |- | ''[[Shreemaan Aashique|श्रीमान आशिक]]'' || Suman Mehra|| |- | rowspan="9" | १९९२|| ''[[Shubhmangal Savdhan|शुभमंगल  सावधान]]'' |- | ''[[Nishchaiy]]'' || Yashoda|| |- | ''[[Do Hanso Ka Joda|दो  हंसो  का  जोडा]]'' |- |''[[Qaid Mein Hai Bulbul|कैद में  है  बुलबुल]]'' | Guddo Choudhry|| |- | ''[[Shola Aur Shabnam (1992 film)|शोला  और  शबनम]]'' || Mrs. Sharda Thapa|| |- | ''[[Jeena Marna Tere Sang|जिना मरणा तेरे संग]]'' || || |- | ''[[Jiwalagaa|जिवलगा]]'' || || |- | ''[[Prem Deewane|प्रेम  दिवाने]]'' || Sumitra Singh|| |- | ''[[Sapne Sajan Ke|सपने  साजन  के]]'' || || |- | rowspan="5" | १९९१|| ''[[Saajan|साजन]]'' || Kamla Verma|| |- | ''[[Henna|हिना]]'' || || |- | ''[[First Love Letter|फर्स्ट लव्ह लेटर]]'' || || |- | ''[[Patthar Ke Phool|पत्थर के फूल]]'' || Mrs. Meera Verma|| |- | ''[[Pyar Bhara Dil|प्यार  भरा  दिल]]'' ||Sudha Sunderlal || |- | rowspan="3" | १९९०|| ''[[Pratibandh|प्रतिबंध]]'' || || |- | ''[[Aashiqui|आशिकी]]'' || || |- | ''[[Police Public|पोलीस  पब्लिक]]'' || || |- | १९८९|| ''[[Maine Pyar Kiya|मैने  प्यार  किया]]'' || Kaushalya Choudhary|| |- | rowspan="3" | १९८८|| ''[[Rihaee (1988 Film)|रिपाई]]'' || || |- | ''[[Qayamat Se Qayamat Tak|कयामत  से  कयामत  तक]]'' || || |- | ''[[Hamara Khandaan|हमारा  खानदान]]'' || Dr. Julie || |- | १९८५|| नसूर || Manjula Mohite|| |- | rowspan="2" | १९८०|| ''[[Aakrosh (1980 film)|आक्रोश]]'' || Nautaki dancer|| |- | ''[[Kalyug (1981 film)|कलयुग]]'' || Kiran|| |} ==निधन== रीमा लागू यांचे दिनांक [[१८ मे]] [[इ.स. २०१७]] रोजी कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५९ वर्षांच्या होत्या. त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारांआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. <ref>[http://zeenews.india.com/marathi/news/kallabaji/actress-reema-lagoo-passes-away/365221 रीमा लागू यांचे निधन]</ref> ==संदर्भ== {{आय.एम.डी.बी. नाव|0481363|रीमा लागू}} {{DEFAULTSORT:लागू, रीमा}} [[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]] [[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्री]] [[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]] [[वर्ग:इ.स. १९५८ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. २०१७ मधील मृत्यू]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] c4l5pzhazq3u0or9ayauueu7vajujpn व्हायोलेटा चमोरो 0 23166 2581385 2296937 2025-06-20T21:47:08Z अभय नातू 206 तारीख 2581385 wikitext text/x-wiki '''व्हायोलेटा बारियोस तोरेस दि चमोरो''' ([[ऑक्टोबर १८]], [[इ.स. १९२९]] - [[१४ जून]], [[इ.स. २०२५|२०२५]]) ही [[निकाराग्वा]]ची ४८वी राष्ट्राध्यक्ष होती. हिने [[एप्रिल महिना|एप्रिल]] [[इ.स. १९९०]] ते जानेवारी [[इ.स. १९९७]] दरम्यान राष्ट्राध्यक्षपद भूषविले. चमोरो निकाराग्वाची एकमेव व उत्तर अमेरिकेतील ([[नेदरलँड्स अँटिल्स]]च्या [[लुसिना दा कॉस्टा]] आणि [[डॉमिनिका]]च्या [[युजेनिया चार्ल्स]]नंतरची) तिसरी स्त्री राष्ट्राध्यक्ष होती. {{विस्तार}} {{DEFAULTSORT:चमोरो, व्हायोलेटा}} [[वर्ग:निकाराग्वाचे राष्ट्राध्यक्ष]] [[वर्ग:इ.स. १९२९ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. २०२५ मधील मृत्यू]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] 8izjyjdy416rd0gauu52yb37jlduwoc अतुल पेठे 0 38035 2581324 2554529 2025-06-20T14:50:47Z 2409:40C2:12A1:51FE:8000:0:0:0 2581324 wikitext text/x-wiki {{संदर्भहीन लेख}} {{माहितीचौकट अभिनेता | पार्श्वभूमी_रंग = | नाव = अतुल पेठे | चित्र = | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = अतुल पेठे | पूर्ण_नाव = अतुल पेठे | जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1964|7|14}} | जन्म_स्थान = | मृत्यू_दिनांक = | मृत्यू_स्थान = | इतर_नावे = | कार्यक्षेत्र = अभिनय | राष्ट्रीयत्व =[[भारतीय]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | कारकीर्द_काळ = | प्रमुख_नाटके = | प्रमुख_चित्रपट = | प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = | पुरस्कार = | वडील_नाव = | आई_नाव = | पती_नाव = | पत्नी_नाव = | अपत्ये = पर्ण पेठे (मुलगी) | संकेतस्थळ = | तळटीपा = }} अतुल सदाशिव पेठे (जन्म : १४ जुलै १९६४) हे एक मराठी नाट्यलेखक, नाट्य‍अभिनेते, नाट्यप्रशिक्षक, आरोग्यसंवादक व नाट्यदिग्दर्शक आहेत. ==विशेष== लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, छायाचित्रकार, माहितीपटकार, निर्माता, प्रशिक्षक अशीही अतुल पेठेंची ओळख आहे. त्यांची विचारशील प्रायोगिक नाटके राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवांत गाजली. १९९० नंतरच्या मराठी रंगभूमीवर जोरकसपणे काम करून स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. ज्या नाटक करायला अवघड होते, अशा काळात त्यांनी हिमतीने महाराष्ट्रभर स्वतःचे नाटक नेले. त्यावर चर्चा झाल्या आणि नवे नाटक पुन्हा रुजले गेले. त्यांनी अनेक नाट्यकार्यशाळा घेतल्या. त्यांतून नवे रंगकर्मी तयार झाले. आशयघन नाटके हा त्यांचा विशेष आहे. नाट्यगट, सांस्कृतिक मंडळे, काही संवेदनशील मंडळी आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्याद्वारेच पेठे त्यांचे नाट्यप्रयोग घडवून आणतात. ते नाटकाबरोबरच इतर क्षेत्रांतील लोकांकरिता कार्यशाळाही घेत असतात. आरोग्य क्षेत्र आणि त्यातून ‘आरोग्य-संवाद’ या संकल्पनेवर काम करणारे महाराष्ट्रात अत्यंत वेगळ्या रीतीने काम करणारे डॉक्टर्स आणि त्यांच्या संस्था आहेत. त्यांच्याशी जोडले जाऊन अतुल पेठे यांनी त्यांच्या कार्यशाळा घेतल्या. नाटक या माध्यमाचा वापर करून समाजप्रबोधन आणि विचारप्रसार करणे हे ज्यांचे उद्दिष्ट आहे अशा समकालीन मित्रमैत्रिणींच्या संघटनांकरताही त्यांनी कार्यशाळा घेतल्या. या साऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्ती या भारतीय राज्यघटनेला आणि लोकशाहीच्या मूल्यांना केंद्रस्थानी मानणाऱ्या होत्या. त्या धंदेवाईक उद्देशाने स्थापन झालेल्या नव्हत्या. त्यामुळे अशा स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करून हुकूमशाही, एकाधिकारशाही, धर्माधता आणि दहशत असा विषयांवरची नाटके अतुल पेठे यांनी स्वीकारली आणि सादर केली. त्यांना या मार्गाने वंचित, पीडित, शोषितांचे प्रश्न तळमळीने सोडवायचे आहेत. * ‘सत्यशोधक’ हे नाटक अतुल पेठे यांनी पुणे महापालिकेतील अभिनयाची पार्श्वभूमी नसलेल्या सफाई कामगारांना घेऊन केले. * ‘दलपतसिंग..’ हे माहितीचा अधिकार या विषयावरचे नाटक दुर्गम खेडय़ातील कलाकारांना घेऊन केले. * कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर अतुल पेठे यांनी ‘रिंगणनाट्य’ कार्यशाळा घेतल्या. त्यातून अडीचशे कार्यकर्त्यां कलावंतांनी १६ नाटके सादर केली. त्या नाटकांचे एक हजाराच्या आसपास प्रयोग झाले. 'रंगधर्मी'हे विशेषण विशेष गांभीर्याने लावता येईल अशी फार थोडी माणसे मराठी नाट्यसृष्टीत आहेत, त्यातले एक प्रमुख नाव म्हणजे अतुल पेठे. १९९० नंतरच्या तीन दशकांत त्यांनी किती विविध प्रकारची नाटके रंगमंचावर आणली आणि त्यांच्या उभारणीतही किती वैविध्य आहे, यावर दृष्टिक्षेप टाकला तर कोणीही जाणकार नाट्यप्रेमी चकितच होईल. त्यातही विशेष हे आहे की, नाट्यसृष्टीत नाव कमावलेल्या व यशस्वी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहानथोरांना मोह व्हावा किंवा त्यांनी प्रलोभनाला बळी पडावे असे दृकश्राव्य माध्यमातील कितीतरी पर्याय मागील तीन दशकांत उपलब्ध झालेले आहेत. तरीही अतुल पेठे नाटकच करतात. त्याचे कारण सांगताना ते असे म्हणतात की, "टीव्ही माणसाला आहे त्यापेक्षा लहान दाखवतो, सिनेमा माणसाला आहे त्यापेक्षा मोठा दाखवतो, नाटक मात्र माणसाला आहे तेवढाच दाखवते. ==अतुल पेठे यांनी लिहिलेली नाटके== * आनंदीगावचा गंमतराव (बालनाट्य) * दी ग्रेट गाढव सर्कस (बालनाट्य) * चेस * पाऊस आता थांबलाय * मंथन * यात्रा * अंक दुसरा * आविष्कार * गाणे गुलमोहोराचे * डायरीची दहा पाने * शोध अंधार अंधार * क्षितिज * अवशेष * शीतयुद्ध सदानंद (श्याम मनोहरांच्या कादंबरीचे नाट्यरूपांतर) * दलपतसिंग येती गावा (सहलेखक) ==अतुल पेठे यांची भूमिका असलेली आणि दिग्दर्शित केलेली नाटके== * चेस (एकांकिका) * पाऊस आता थांबलाय * मंथन * क्षितिज * सापत्‍नेकराचे मूल * पडघम * प्रलय * अतिरेकी * घाशीराम कोतवाल * वेटिंग फॉर गोदो * शीतयुद्ध सदानंद * प्रेमाची गोष्ट ? * मी जिंकलो - मी हरलो * ठोंब्या * गोळायुग * सूर्य पाहिलेला माणूस * समाजस्वास्थ्य * किमया (अभिवाचन) * तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य * परवा आमचा पोपट वारला * रेड रेबिट व्हाईट रेबिट * शब्दांची रोजनिशी * ताल-भवताल * अडलंय का ? * Confessions * डबर * अडोस पडोस - चित्रनाट्य खेळ * बागुलबुवा ==अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेली नाटके आणि प्रयोग * चेस (५०) * डायरीची दहा पाने (२५) * क्षितिज (१५) * शीतयुद्ध सदानंद (११) * बसस्टॉप (२५) * मामका:पांडवाश्चैव (२५) * वळण (१०) * टॅक्स फ्री (१०) * शीतयुद्ध सदानंद (५०) * वेटिंग फॉर गोदो (४५) * ऐस पैस सोयीने बैस (२५) * प्रेमाची गोष्ट ? (७७) * सूर्य पाहिलेला माणूस (१००) * आनंदओवरी (७०) * उजळल्या दिशा (६५) * चौक (सहदिग्दर्शक - मकरंद साठे)(३८) * गोळायुग (४) * मी ... माझ्याशी (४०) * दलपतसिंग येती गावा (२०) * सत्यशोधक (११८) * सत्यशोधक (कन्नड)(७५) * आषाढातील एक दिवस (७७) * तर्कांच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य (५२) * प्रोटेस्ट(१) * समाजस्वास्थ्य (७८) * किमया (४०) * परवा आमचा पोपट वारला (५५) * शहर - तूट के क्षण (४) * शब्दांची रोजनिशी (५९) * ताल-भवताल (६) * MallPractice and the show (२०) * बिगडे बिम्ब (६) * Confessions (१) * डबर (१) * अडोस पडोस - चित्रनाट्य खेळ (३) * बागुलबुवा (१) ==अतुल पेठे य़ांनी भूमिका असलेले चित्रपट== * कथा दोन गणपतरावांची * कलाकार * म्हादू * यकीन मानो ==आत्मचरित्रवजा आठवणी आणि अन्य लेखन== * चेस आणि इतर एकांकिका * नाटकवाल्यांचे प्रयोग (लेखक अतुल पेठे) * रिंगणनाट्य (सहलेखक : राजू इनामदार) इतर कामे : * कोसला (दिग्दर्शन,आकाशवाणी पुणे केंद्र २५ भाग) * हिंदू (वाचन स्टोरीटेल) * रिपोर्टिंगचे दिवस (वाचन स्टोरीटेल) * अज्ञात गांधी (वाचन स्टोरीटेल) * रानमित्र (वाचन स्टोरीटेल) * कुतूहलपोटी (वाचन स्टोरीटेल) * समांतर, रंगवाचा या नाट्यविषयक मासिकांचे संपादक मंडळात सहभाग * रंगसंगत नाट्यकार्यशाळेचे आयोजन. * नाटकघरतर्फे नाट्यप्रयोग आयोजन. * 'मानसरंग'नाट्य संकल्पना आणि नाट्यमहोत्सव ==अतुल पेठे यांना मिळालेले पुरस्कार== * पुरुषोत्तम करंडक - केशवराव दाते अभिनय नैपुण्य पुरस्कार * पुरुषोत्तम करंडक - गो.गं. पारखी लेखन पुरकार * नाट्यदर्पण - अरविंद देशपांडे दिग्दर्शन पुरस्कार - शीतयुद्ध सदानंद * रंगदर्पण गजानन सरपोतदार पुरस्कार * महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट व्यावसायिक दिग्दर्शक आणि संगीत - उजळल्या दिशा * बलराज साहनी पुरस्कार २०१० * सत्यशोधक पुरस्कार - पुणे म न पा कामगार युनियन * डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार * महाराष्ट्र फौंडेशनचा नाट्यगौरव पुरस्कार * मुंबई मराठी साहित्य संघाचा के.नारायण काळे पुरस्कार * मुंबई मराठी साहित्य संघाचा मो.ग.रांगणेकर पुरस्कार * मुंबई मराठी साहित्य संघाचा पार्श्वनाथ आळतेकर पुरस्कार * अखिल भारतीय नाट्य परिषदेचा चित्तरंजन कोल्हटकर पुरस्कार * प्रमोद कोपर्डे प्रतिष्ठान पुरस्कार, सातारा * बिष्णू बसू सन्मान, कोलकत्ता * अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार २०१७ * अस्मि कृतज्ञता सन्मान २०१८ * 'सूर्य पाहिलेला माणूस'ला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार * 'समाजस्वास्थ्य'नाटकातील भूमिकेकरता महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार २०१८ * प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार, नाशिक * 'तन्वीर सन्मान २०१८' - डॉ.श्रीराम लागू यांच्या 'रूपवेध' तर्फे मानाचा सन्मान * कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'गोदावरी गौरव पुरस्कार २०२२' * मुंबई मराठी साहित्य संघाचा के.ना.काळे पुरस्कार २०२२ * नंदकुमार रावते उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक पुरस्कार २०२३ * सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक आर्यन्स पुरस्कार २०२३ * महाराष्ट्र कल्चरल सेंटरचा डॉ. रवींद्र दामले स्मृती पुरस्कार २०२४ * चैत्र चाहूल तर्फे 'ध्यास सन्मान' पुरस्कार २०२४ * महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कमलाकर सारंग पुरस्कार २०२४ * राजारामबापू पाटील ललित कला अकादमी तर्फे प्रयोगशील रंगकर्मी राष्ट्रीय कलासन्मान २०२४ * समाज साहित्य प्रतिष्ठानचा कृष्णराव केळुसकर पुरस्कार २०२४ {{DEFAULTSORT:पेठे, अतुल}} [[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:मराठी अभिनेते]] bl99m0plshqa265rb7tlzf9gy6n712y नाग 0 46919 2581431 2414860 2025-06-21T04:41:58Z 2401:4900:AD2A:D9ED:4D88:F0CB:4B8C:619C 2581431 wikitext text/x-wiki {{जीवचौकट | नाव = नाग | चित्र = Cobra hood.jpg | चित्र_शीर्षक = नाग | regnum = [[प्राणी]] | वंश = [[कणाधारी प्राणी|कणाधारी]] | जात = [[सरपटणारे प्राणी]] | वर्ग = [[स्कामाटा]] | उपवर्ग = [[इलापिडी]] | कुळ = '''बंगारस''' |शास्त्रीय_नाव =बंगारस कीरुलियस |कुळ_अधिकारी = [[योहान गोटलिब श्नायडर]], १८०१ }} '''नाग''' हा एक विषारी [[साप]] आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=लोकसंस्कृतीः स्वरुप आणि विशेष|last=भोसले|first=डॉ..द.ता.|publisher=पद्मगंधा प्रकाशन|year=२००४|isbn=|location=पुणे|pages=६१}}</ref> नागाचा वावर मुख्यत्वे [[आशिया]] व [[आफ्रिका]] खंडातील उष्ण प्रदेशात आहे. == रचना == नागाची ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही [[बरगड्या]] अतिशय लवचीक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्यालायक असतात. फण्याच्या मागील बाजूस देखिल विविध खुणा असतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १०चा आकडा असतो, तर काहींना शून्याचा आकडा (monoclour) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहीत. नागाची लांबी बरीच, म्हणजे सरासरी लांबी १.२ ते २.५ मीटर असते. नागाच्या अंगावरील खवले हे घवाच्या(?) आकाराचे असतात == खाद्य == [[उंदीर]], [[बेडूक]], [[सरडा|सरडे]], इतर छोटे [[प्राणी]] व [[पक्षी]] हे नागाचे मुख्य खाद्य आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.wildlifeofpakistan.com/ReptilesofPakistan/cobra.htm |title=Spectacled or Indian Cobra, Black Pakistan Cobra, Central Asian/Oxus or Brown Cobra |access-date=2008-05-17 |archive-date=2020-02-03 |archive-url=https://web.archive.org/web/20200203175427/http://wildlifeofpakistan.com/ReptilesofPakistan/cobra.htm |url-status=dead }}</ref> आहेत. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडून नाग शेतकऱ्याला मदत करत असतात. [[माणूस]] हा नागाचा मुख्य शत्रू आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रूंमध्ये [[मुंगूस]], [[गरुड]], [[कोल्हा|कोल्हे]], [[खोकड]], [[अस्वल|अस्वले]] तसेच [[मोर]] इत्यादी आहेत. नाग शिकार करताना प्रामुख्याने आपल्या विषाचा उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बघगतो व भक्ष्य मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पूर्णपणे गिळतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.wildlife-tour-india.com/indian-wildlife/cobra.html |title=Cobra in India |access-date=2008-05-17 |archive-date=2008-05-31 |archive-url=https://web.archive.org/web/20080531150926/http://www.wildlife-tour-india.com/indian-wildlife/cobra.html |url-status=dead }}</ref> . नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो (आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे!) व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत पहारा देतो. == नागाच्या उपजाती== * '''[[भारतीय नाग]] '''''(Naja naja naja)''नागाची सर्वाधिक आढळणारी जात ही [[भारत|भारतीय]] उपखंडात आढळते. याच्या फण्याच्या मागील बाजूस १०चा आकडा असतो भारतातील [[हिमालय|हिमालयातील]] मध्यम ते उंच रांगा सोडून ही जात सर्वत्र आढळते. प्रामुख्याने हे नाग शुष्क वातावरण जास्त पसंत करतात परंतु तसे त्यांचा वावर सर्वत्र असतो. * '''[[काळा नाग]]''' ''(Naja naja karachiensis)'' ही मुख्य नागाचीच उपजात आहे. ही जात प्रामुख्याने [[पाकिस्तान]]मध्ये व [[राजस्थान]]मध्ये आढळते. याचे संपूर्ण शरीर काळे असते तसेच मुख्य नागापेक्षा लांबीने लहान असतो व फणादेखील लहान असतो. * [[शून्य आकडी नाग]] प्रामुख्याने दक्षिण भारतात व आशियातील इतर देशात आढळतात. याच्या फण्यामागे शून्याचा आकडा असतो. फण्यामागील आकडा सोडला तर इतर सर्व गोष्टी मुख्य नागासारख्याच आहेत. * '''[[थुंकणारा नाग]]''' हा प्रामुख्याने आग्नेय आशियात म्हणजे [[थायलंड]], [[मलेशिया]], [[व्हिएतनाम]] व [[चीन]] या देशांत आढळतो. घनदाट जंगले व भातराशी हे त्याचे निवासस्थान आहे. नावाप्रमाणेच हा नाग आपल्या विषारी दातांमधून विषाची चिळकांडी आपल्या भक्ष्यावर उडवतो. भक्ष्याचे डोळे हे त्याचे मुख्य लक्ष्य आहे. विषाच्या प्रभावाने भक्ष्य तात्पुरते अंध होते व त्याचा फायदा घेऊन हा भक्ष्याची शिकार साधतो. [[डिस्कव्हरी चॅनेल]] वरील क्षणचित्रांमध्ये कित्येक मीटरपर्यंत हे नाग चिळकांडी उडवू शकतात असे दाखवले आहे. [[चित्र:KingCobraFayrer.jpg|thumb|left|नागराज]] * '''[[नागराज]]''' (किंग कोब्रा) हा भारतातील पूर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मीळ साप आहे हा नावाप्रमाणेच नागराज आहे. लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात सर्वाधिक. याचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. दिसायला रुबाबदार असा हा साप लांबीला पाच ते साडेपाच मीटर असू शकतो. याचा फणा इतर नागांपेक्षा छोटा असतो. हा साप घनदाट जंगले पसंत करतो व कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतो. अभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहे. सापांमध्ये अतिशय दुर्मीळ असे सहचरी जीवन जगतो (काही काळापुरतेच) अंडी टाकण्यासाठी हा साप घरटे बांधतो. तसेच पिल्ले बाहेर येईपर्यंत अंड्याचे रक्षण करतो. ==नागाचे विष== दरवर्षी हजारो माणसे नागदंशाने मरण पावतात. नाग चावला आहे या भीतीनेच बहुतांशी माणसे दगावतात. नाग हे माणसावर स्वतःहून आक्रमण करत नाहीत, केलाच तर त्याच्यामागे वसंरक्षण हाच हेतू असतो.. जर नागाचा आमने सामने झालाच तर आपले चित्त स्थिर ठेवणे हे सर्वोत्तम. आपली हालचाल कमीत कमी ठेवणे व जास्ती जास्त स्थिर रहाणे. हालचाल करायची झाल्यास नागाच्या विरुद्ध दिशेला अतिशय हळूवारपणे करणे. सर्वच नागदंश हे जीवघेणे नसतात काही वेळा कोरडा दंश देखील होऊ शकतो. साधारणपणे १० टक्के नागदंश हे जीवघेणे असतात. नागाचे विष हे मुख्यत्वे [[संवेदन प्रणाली]]वर neural systemवर परिणाम करतात. दंशानंतर लवकर मदत मिळाली नाहितर दंश जीवघेणा ठरू शकतो. दंश झाल्यानंतर काही वेळाने दंश झालेला भाग हा असंवेदनशील होतो व हळूहळू शरीराचे इतर भाग असंवेदनशील होण्यास सुरुवात होते. विषबाधा झालेल्ला माणूस विषदंशाचा भाग हलवण्यास असमर्थ होतो. विष शरीरात पसरल्यावर इतरही भाग हलवण्यास तो असमर्थ होतो. जीव मुख्यत्वे [[मेंदू]]द्वारे नियंत्रित [[श्वसन प्रणाली]]चे कार्य बंद पडल्याने जातो. विषाचा प्रादुर्भावाने जीव जाण्यास एक तास ते दीड दिवस लागू शकतो. ===प्रतिविष=== नाग चावल्यानंतर सर्वांत पहिले प्रथमोपचार होणे गरजेचे आहे. (पहा [http://www.lfsru.org/firstaid.htm नाग चावल्यानंतरचे प्रथमोपचार ] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20080504002033/http://www.lfsru.org/firstaid.htm |date=2008-05-04 }})प्रथमोपचारानंतर साप चावलेल्या माणसाला प्रतिविषाचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. प्रतिविष हे विषाच्या रेणूंचा प्रादुर्भाव नाहिसा करते व शरीराच्या विषाचे रेणू शरीराच्या बाहेर काढायला मदत करते. विषाचे अंश शरीराच्या बाहेर पडेपर्यंत त्याचा प्रादुर्भाव रहातो. प्रतिविष हे देखिल नागाच्याच विषापासून बनवलेले असते <ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.engin.umich.edu/~CRE/web_mod/cobra/avenom.htm |title=Mechanism of antivenom |access-date=2008-05-17 |archive-date=2008-05-13 |archive-url=https://web.archive.org/web/20080513154848/http://www.engin.umich.edu/~CRE/web_mod/cobra/avenom.htm |url-status=dead }}</ref>. Tanishk more ==भारतीय संस्कृतीतील नागाचे स्थान== [[चित्र:Snake in basket.jpg|thumb|200 px|गारुड्याकडील नाग]] भारतीय संस्कृतीमध्ये नागाला भीतीयुक्त आदराचे स्थान आहे. महाराष्ट्रात [[श्रावण महिना|श्रावण महिन्यात]] [[नागपंचमी]] साजरी केली जाते. या दिवशी महिला जिवंत नागाची पूजा करतात व नागाला दुधाचा प्रसाद दिला जातो. नागोबाला [[दूध]] म्हणून आरोळी देत गारुडी लोक गावांगावांत फिरत असतात व त्यादिवशी लोकांकडून अन्न धान्य, कपडा-लत्ता, पैसे घेतात. [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यामधील]] [[३२ शिराळा]] या गावी दरवर्षी नागपंचमी निमित्त मोठा सण आयोजित केला जातो<ref>[http://www.indianetzone.com/1/nagpanchami.htm Nagpanchami, Indian Festival]</ref>. हजारो नाग या दिवसाकरिता पकडले जातात. कित्येक पर्यटक केवळ हा सण पहायला या गावी जातात. गारुड्यांकडून पकडलेल्या या नागांचे मोठ्या प्रमाणावर हाल केले जातात असे लक्षात आले आहे. अजूनही यावर कायदा केला गेला नाही. काही संघटनांनी केलेल्या कार्यामुळे काही ठिकाणी नागपंचमीला केवळ नागाच्या प्रतिमेची पूजा केली जावी असे आवाहन केले आहे. त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. समुद्रमंथनासाठी लागलेली [[मंदार पर्वत]]ापासून बनवलेली रवी घुसळण्यासाठी [[वासुकी]] नागाला दोरी म्हणून वापरले होते. हिंदू देवता [[शंकर]] यांनी [[समुद्रमंथन|सागरमंथना]] नंतर आलेल्या विषाचे प्राशन केले व त्यामुळे त्यांना गळ्यात प्रचंड जळजळ झाली. ह्या जळजळीपासून त्यांनी थंडावा मिळावा म्हणून नाग गळयाभोवती लपेटला व त्यांना विषप्राशन सहन करता आले, अशी कथा आहे. [[विष्णू]] हे सदैव [[शेषनाग|शेषनागाच्या]] शय्येवर विश्राम घेत असतात असे [[पुराण|पुराणात]] सांगितले आहे<ref>[http://www.webonautics.com/mythology/sheshnag.html%7Cशेषनाग]{{मृत दुवा|date=November 2022|bot=InternetArchiveBot|fix-attempted=yes}}</ref>.महाभारतातील [[अर्जुन]]ाने नाग जातीतील उलुपी नावाच्या मुलीशी लग्न केले होते. [[पंडू]]ची पत्‍नी]] [[कुंती नागवंशीय होती. डॉ. आंबेडकरांच्या मते महाराष्ट्रातील [[महार]] हे नागांचे वंशज आहेत. सातवाहन राजे नागकुलातले होते. ईशान्य भारतात बोलल्या जाणाऱ्या गारो, खासी, बोडो आदी भाषा या नाग परिवारातील भाषा समजल्या जातात. नाग जमातीचे लोक भारताचे नागरिक आहेत; त्यांची वस्ती प्रामुख्याने [[नागालॅंड]] प्रांतात आहे. हिंदू धर्मातील नवनाग स्तोत्रात नागाच्या नऊ नावांचा उल्लेख आहे. ते स्तोत्र खालीलप्रमाणे- अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभंच कंबलं | शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कलियं तथा|| एतानि नव नामानी नागानांच महात्मनां| सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः|| तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् | या स्तोत्रात अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालीय या नऊ प्रकारच्या नागांच्या नावांचा किंवा जातींचा उल्लेख आका आहे. ==भारतातील एक जमात== पुराणकाळात भारतात नाग नावाची एक जमात होती, अजूनही असावी. हल्लीच्या नागालॅंड प्रांतात ते मोठ्या प्रमाणात होते, == गैरसमज== नागाच्या बाबतीत समाजात गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहेत. खरेतर उंदरांसारख्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडणारे नाग माणसाचे मित्र आहेत. परंतु माणूस आपल्याच चुकीने त्यांना डिवचतो व कधी कधी जीव गमावून बसतो. भारतात नागाला देवतेसमान जरी मानत असले तरी नाग किंवा कुठलाही साप दिसला तर मारायचाच हा प्रघात पडलेला आहे. नागाचे विष हे माणूस व नागाच्या शत्रुत्वामधील मुख्य कारण असले तरी इतरही अनेक गैरसमज भारतात आहेत खालीलप्रमाणे<ref>[http://www.wildlifesos.com/rprotect/snakemyths.htm सापांबद्द्ल गैरसमज]</ref> * नाग दूध पितो - वास्तविक नाग हा सस्तन प्राणी नाही, त्यामुळे नाग दूध पीत नाही. * नाग गारुड्याच्या पुंगीपुढे डोलतो - वास्तविक सापांना कान नसतात त्यामुळे गारुडी काय वाजवतोय हे नागाला कधीच कळत नाही. गारुडी पुंगी घेउन स्वतः हालचाल करीत असतो व त्या हालचालीला नाग फक्त प्रतिसाद देतो. * नागिणीला मारले तर नाग त्याचा सूड घेतो. (या सूडाला '''डूख धरणे''' असे म्हणतात.) * नागाच्या डोक्यामध्ये नागमणी असतो. * नागाला अनेक फणे असू शकतात. ===चित्रपटातील गैरसमजुती=== अनेक हिंदी चित्रपटांनी नाग व सापांबद्द्ल गैरसमज वाढवण्यास मदत केली आहे. * सर्वांत प्रसिद्ध चित्रपट [[इ.स. १९८६|१९८६]] मधील [[श्रीदेवी]], [[अमरीश पुरी]] व [[ऋषी कपूर]]चा [[नागिन, चित्रपट|नागिन]] आहे, ज्यामध्ये श्रीदेवी ही नागाचे तसेच मानवी रूप धारण करू शकत असते. * [[जॅकी श्रॉफ]]चा 'दूध का कर्ज' हा चित्रपटसुद्धा नागांवर आधारित आहे. हा चित्रपट [[उपकार दुधाचे (चित्रपट)|उपकार दुधाचे]] या मूळ मराठी चित्रपटावरून घेतलेला आहे * [[जितेंद्र व रानी रॉय]]चा 'नागिन' हा चित्रपट नागाच्या मृत्युचा बदला वर आधारित आहे. साप 'डुख'धरतो, या गैरसमज वाढविन्यास कारणीभूत ठरतो. == संदर्भ== * The book of Indian Reptiles - by BNHS <references/> [[वर्ग:साप]] [[वर्ग:प्राणी]] [[वर्ग:सरपटणारे प्राणी]] [[वर्ग:विषारी साप]] [[en:Chinese cobra]] 46uc8r3rxxxftrky0djo5t9t8mafmpt तिसरे इंग्रज-मराठा युद्ध 0 48474 2581388 2580975 2025-06-20T21:58:05Z अभय नातू 206 दुवा 2581388 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट सैन्य संघर्ष | संघर्ष = तिसरे आंग्ल-मराठा युद्ध | या युद्धाचा भाग = | चित्र = | चित्र रुंदी = | चित्रवर्णन = खडकीची लढाई | दिनांक =[[नोव्हेंबर ५]] [[इ.स. १८१७|१८१७]] - [[इ.स. १८१९|१८१९]] | स्थान =[[मध्य भारत|मध्य]] आणि [[पश्चिम भारत (प्रदेश)|पश्चिम भारत]] | परिणती = ब्रिटिश विजय | सद्यस्थिती = सगळा प्रदेश [[भारतीय प्रजासत्ताक|भारतीय प्रजासत्ताकाचा]] भाग | प्रादेशिक बदल = [[पेशवे|पेशवाई]]चा अंत, मराठा संस्थानिक आणि [[राजपुताना एजन्सी|राजपुतान्यातील]] राजे ब्रिटिशांचे मांडलिक, [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]ला भारतात अनिर्बंध सत्ता | पक्ष१ = * [[Image:Flag of the Maratha Empire.svg|22px]] [[पेशवा]] * [[File:Flag of Gwalior (State).svg|23px]] [[ग्वाल्हेर संस्थान]] * [[File:Indore Flag.svg|23px]] [[इंदूर संस्थान]] * [[File:Nagpur State Flag.png|23px]] [[नागपूर संस्थान]] * [[File:Flag of the Maratha Empire.svg|23px]] [[पेंढारी]] | पक्ष२ = * [[चित्र:Flag of the British East India Company (1801).svg|22px|border]] [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] * [[File:Flag of the State of Hyderabad (18th century-1900).svg|23px]] [[हैदराबाद संस्थान|निझाम]] | सेनापती१ = * [[Image:Flag of the Maratha Empire.svg|22px]] [[दुसरे बाजीराव पेशवे|दुसरे बाजीराव]], [[बापू गोखले]], [[मोरोपंत दीक्षित]], [[त्र्यंबकजी डेंगळे]] * [[File:Indore Flag.svg|23px]] [[हरीराव होळकर]], [[तिसरे मल्हारराव होळकर]] * [[File:Nagpur State Flag.png|23px]] [[दुसरे मुधोजी भोसले]] * [[File:Flag of Gwalior (State).svg|23px]] [[दौलतराव शिंदे]] | सेनापती२ = - * [[चित्र:Flag of the British East India Company (1801).svg|22px|border]] [[फ्रांसिस रॉडोन-हेस्टिंग्स]], [[जॉन माल्कम]], [[थॉमस हिस्लॉप]] * [[File:Flag of the State of Hyderabad (18th century-1900).svg|23px]] [[तिसरा असफ जाह]] | सैन्यबळ१ =१८,००० [[घोडदळ]]<br /> ८,००० [[पायदळ सैनिक]] | सैन्यबळ२ =२,८०० घोडदळ | टिपा = }} '''तिसरे इंग्रज-मराठा युद्ध''' हे [[इ.स. १८१७]]-१८मध्ये [[मराठा साम्राज्य|मराठे]] व [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|इंग्रजांच्यात]] झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण [[भारत|भारतावर]] नियंत्रण मिळवले. या आधी झालेल्या [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध|दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर]] मराठ्यांना आणि ब्रिटिशांना उसंत मिळाली. त्या दरम्यान ब्रिटिशांनी भारतातील स्वतःची शक्ती वाढवली परंतु मराठ्यांनी एकोपा टिकवला नाही आणि ते ब्रिटिशांच्या तुलनेत मराठे राजनैतिक आणि लष्करीदृष्ट्या कमी पडत गेले. अशा पार्श्वभूमीवर [[भारताचे गव्हर्नर जनरल|गव्हर्नर जनरल]] [[लॉर्ड हेस्टिंग्स]]ची नियुक्ती झाली.<ref>http://www.britannica.com/EBchecked/topic/256745/Francis-Rawdon-Hastings-1st-marquess-of-Hastings</ref>. त्याने आपल्या कारकिर्दीत आक्रमक धोरणाचा अवलंब केला. [[इंग्रज-नेपाळ युद्ध|नेपाळ युद्धाच्या]] समाप्तीनंतर [[पेंढारी]] लोकांशी संघर्ष सुरू करून अप्रत्यक्षरीत्या मराठ्यांनाच आव्हान दिले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=https://dl.dropboxusercontent.com/spa/zohkohb0i282t94/Area%20Studies/public/SouthAsia/Ideas/pindaris.html#init |title=संग्रहित प्रत |access-date=2014-12-09 |archive-date=2016-04-03 |archive-url=https://web.archive.org/web/20160403073709/https://dl.dropboxusercontent.com/spa/zohkohb0i282t94/Area%20Studies/public/SouthAsia/Ideas/pindaris.html#init |url-status=dead }}</ref> या व इतर अनेक कारणांमुळे इंग्रज आणि मराठ्यांमध्ये पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पडली. अखेर पेशव्याने अंतिम युद्ध करण्याचा निर्णय घेतला.त्याला अप्पासाहेब भोसले आणि [[मल्हारराव होळकर]] ([[यशवंतराव होळकर|यशवंतराव होळकरांचा]] पुत्र) यांनी साथ दिली.पण युद्धात [[पेशवा]],[[भोसले]] आणि [[होळकर घराणे|होळकरांना]] एकत्र येऊ न देता त्यांना इंग्रजांनी वेगवेगळे पराभूत केले. [[सीताबर्डीची लढाई|सीताबर्डीच्या लढाईत]] [[नागपूरकर भ|भोसल्यांचा]], [[महिदपुरची लढाई|महिदपुरच्या लढाईत]] होळकरांचा आणि [[खडकीची लढाई|खडकी]]<ref name="sacred-texts.com">http://www.sacred-texts.com/hin/odd/odd29.htm</ref>, [[कोरेगाव]] व [[आष्टीची लढाई|आष्टा]] येथील लढाईत पेशव्यांचा पराभव झाला. अशा प्रकारे एक एक करीत मराठे इंग्रजांसमोर हरले व सर्वांनी शरणागती पत्करली. हेस्टिंग्सने भोसले, [[पेशवा]] [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीराव दुसरा]] आणि [[शिंदे घराणे|शिंदे]] यांना अपमानजनक तह स्वीकारण्यास भाग पडले. बाजीरावाला पेशवेपद सोडावे लागले आणि त्याचा प्रदेश इंग्रजांनी आपल्या साम्राज्यात विलीन केला. छत्रपतींचे [[सातारा]] राज्य व इतर [[मराठा]] सरदारांच्या प्रदेशावर [[ब्रिटिश]] नियंत्रण प्रस्थापित झाले आणि खऱ्या अर्थाने [[मराठा]] सत्तेची समाप्ती झाली. [[नागपूर संस्थान|नागपूरच्या]] [[मुधोजी भोसले दुसरे]] आणि [[इंदूर संस्थान|इंदूरचे]] [[मल्हारराव होळकर तिसरे]] यांच्या पाठिंब्याने [[पेशवा बाजीराव दुसरा|पेशवा बाजीराव दुसऱ्याच्या]] सैन्याने [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध]] जोरदार हल्ला केला. [[ग्वाल्हेर संस्थान|ग्वाल्हेरचे]] चौथे मोठे मराठा नेते [[दौलतराव शिंदे]] यांनी [[राजस्थान]]वरील नियंत्रण गमावले असले तरीही त्यांनी राजस्थानला दबाव आणि मुत्सद्देगिरीने तटस्थ राहण्याचे पटवून दिले. ब्रिटिशांच्या निर्णायक विजयाने [[मराठा साम्राज्य]] फुटले आणि स्वराज्याचा अंत झाला. पेशवेच्या सैन्याने शक्य तितका प्रतिकार करीत इंग्रजांना रोखण्यासाठी अनेक लहान लढाया लढल्या. शेवटी इंग्रजांनी पेशवाई ताब्यात घेतली आणि दुसऱ्या बाजीरावाला [[कानपूर]]जवळील [[बिठूर]] येथे एका लहान जहागिरीला तडीपार करण्यात आले आले. पेशवाईचा बहुतांश प्रदेश [[बॉम्बे प्रेसिडेन्सी|मुंबई प्रेसिडेंसीमध्ये]] विलीन केला गेला. साताराच्या महाराजांना त्यांच्या संस्थानावर कायम ठेवले गेले. १८४८ मध्ये [[लॉर्ड डलहौसी]]च्या [[डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स]]च्या बनावाखाली बॉम्बे प्रेसिडेन्सीने सातारा संस्थानसुद्धा खालसा केले. [[नागपूर मेट्रो|नागपूर]] व भोवतालच्या राजवटीचा उरलेला भाग, तसेच [[बुंदेलखंड]]मधील पेशव्याचे प्रदेश [[ब्रिटिश राज|ब्रिटिश भारताचे]] [[सौगोर प्रांत|सौगोर]] आणि [[नेरबुद्दा प्रांत]] म्हणून जोडले गेले. ब्रिटिशांनी होळकरांचे [[इंदूर संस्थान|इंदूर]] शिंद्यांचे [[ग्वाल्हेर संस्थान|ग्वाल्हेर]] व पेशव्यांच्या हुकुमतीतील [[झांंसी संस्थान|झांसी]] ही संस्थाने आपल्या अंमलात आणली. ==मराठे आणि इंग्रज== [[चित्र:Joppen1907India1805a-21.jpg|thumb|285x285px|दुसरे अँग्लो-मराठा युद्धानंतरचा १८०५मधील भारताचा नकाशा]] [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांनी]] १६७४ मध्ये स्थापन केलेल्या [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याने]] [[आदिलशाही|विजापूर]], [[निजामशाही|हैदराबाद]] आणि [[मुघल साम्राज्य|दिल्लीच्या मुस्लिस सल्तनतींच्या]] नाकावर टिच्चून स्वराज्य राखले होते. स्थापनेनंतर काही दशकांतच मराठा साम्राज्य भारतातील एक प्रमुख सत्ता झाले. [[रायगड (किल्ला)|रायगड]] किल्ल्यावर राजधानी असलेल्या या साम्राज्याचे व्यवस्थापन आठ मंत्र्यांच्या मंडळाद्वारे ([[अष्टप्रधान]]) केले जात असे. त्यांतील पंतप्रधान पदावर असलेल्या मंत्र्याला [[पेशवे]] हा खिताब होता. कालांतराने मराठा साम्राज्याची सत्ता पेशव्यांच्या हातात आली व [[छत्रपती]] हे नाममात्र राजे उरले. === ब्रिटिशांचा वाढता प्रभाव === [[चित्र:Sir Joshua Reynolds (1723-92) - Francis Rawdon-Hastings (1754-1826), Second Earl of Moira and First Marquess of Hastings - RCIN 407508 - Royal Collection.jpg|200px|इवलेसे|डावे|फ्रांसिस रॉडोन-हेस्टिंग्स, हेस्टिंग्सचा पहिला मार्क्वेस]] अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मराठे आणि [[मुघल साम्राज्य|मोगलांमध्ये]] भारतावरील वर्चस्वासाठी सतत लढाया होत होत्या. या दरम्यान ब्रिटिशांनी [[मुंबई]], [[मद्रास]] आणि [[कोलकाता]] येथे छोट्या छोट्या वखारी स्थापल्या व तेथून व्यापार व पुढे राजकारण करणे सुरू केले. मे १७३९ मध्ये मुंबईजवळील [[वसई]] येथे [[वसईची लढाई|मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केल्याचे]] पाहून ब्रिटिशांनी मुंबईतील आपली आरमारी शिबंदी मजबूत केली. मराठ्यांना मुंबईपासून दूर ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी मराठ्यांशी तहाची बोलणी करण्यासाठी दूत पाठवले. या वाटाघाटींमधून आणि १२ जुलै, १७३९ रोजी एक करार मंजूर झाला, ज्याकरवे [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]ला मराठ्यांच्या प्रदेशात मुक्त व्यापार करण्याचे अधिकार मिळाले. इंग्रज आणि मराठ्यांच्यातील करार पाहून दक्षिणेस [[हैदराबाद]]च्या [[निजामशाही|निजामने]] मराठ्यांविरूद्धच्या युद्धासाठी [[फ्रेंच भारत|फ्रेंच लोकांची]] मदत घेतली. यामुळे पुन्हा पेशव्यांनी इंग्रजांकडून मदत मागितली परंतु इंग्रजांनी त्याला नकार दिला. तरीसुद्धा मराठ्यांनी पुढील पाच वर्षांत निझामाचा पराभव करण्यास यश मिळविले. १७५० ते १७६१ च्या काळात ब्रिटिशांनी भारतात [[फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी]]चा पराभव केला आणि १७९३ पर्यंत त्यांनी पूर्वेकडील [[बंगाल वॉरियर्स|बंगाल]] व दक्षिणेत [[चेन्नई|मद्रास]]मध्ये आपली सत्ता ठाम केली. इकडे पश्चिमेकडे मराठ्यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांच्या महत्त्वाकांक्षेला आळा बसला होता. परंतु ते समुद्रामार्गे पश्चिम किनाऱ्यावरील [[सुरत]]मध्ये दाखल झाले. त्यांचे साम्राज्य वाढत असताना मराठ्यांनी [[सिंधु नदी|सिंधूच्या]] पलीकडे कूच केले. उत्तरेकडील विस्तारित मराठा साम्राज्याची जबाबदारी पेशव्यांनी [[शिंदे घराणे|शिंदे]] आणि [[इंदूर संस्थान|होळकराकडे]] सोपवली होती. पुढे जाता या दोन्ही संस्थानांनी मराठा साम्राज्याऐवजी स्वतःचे स्वार्थ पुढे करणे पसंत केले. त्यांनी साम्राज्याचा [[राजपूत]], [[जाट]] आणि [[रोहिला]] व इतर हिंदू राज्यकर्त्यांपासून बचाव केला असला तरी मुस्लिम आक्रमकांविरुद्ध ते निष्प्रभ होते. १४ जानेवारी, १७६१ रोजी [[पानिपतची तिसरी लढाई|पानिपत येथे]] अफगाण [[अहमद शाह अब्दाली]]विरुद्ध मराठा साम्राज्याचा सडकून पराभव झाला. त्यात मराठा सरदारांची एक संपूर्ण पिढी कापून काढली गेली व साम्राज्य मोडकळीस आले. त्यानंतर [[माधवराव पेशवे|माधवराव पेशव्यांच्या]] अंमलात १७६१ ते १७७३ दरम्यान मराठ्यांनी उत्तरेकडील घालवलेला मोठा प्रदेश परत मिळवला. === आंग्ल-मराठा संबंध === १९७७मध्ये पेशव्यांच्या कौटुंबिक कलह आणि सत्तासंघर्षातून [[नारायणराव पेशवे|मारायणराव पेशव्यांची]] [[नारायणराव पेशव्यांची हत्या|हत्या झाल्यावर]] पेशव्यांचे लक्ष उत्तर आणि मध्य भारताकडे नव्हते. त्यातच होळकर आणि शिंदे यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे [[पुणे|पुण्याची]] सत्ता मध्य भारतात नाममात्रच होती. नारायणरावानंतर पेशवेपदी आलेल्या [[रघुनाथराव पेशवे|रघुनाथरावाला]] वाटले की शिंदे-होळकर थेट पेशव्यांच्या सत्तेलाच आव्हान देतील. याला शह देण्यासाठी त्याने इंग्रजांकडून मदत मागितली. यासाठी इंग्रजांनी [[सुरतेचा करार|सुरतेला करार]] मान्य करून घेतला. यानुसार [[साळशेत बेट]] (आताच्या [[मुंबई]]चा मोठा भाग) आणि [[वसईचा किल्ला]] इंग्रजांच्या हवाली केले गेले आणि इंग्रजांनी पेशव्यांना पाठिंबा जाहीर केला. या कराराचा भारत आणि [[इंग्लंड]]मधील ब्रिटिश सत्तावर्तुळांमध्ये खळबळ माजली. [[ब्रिटिश राजतंत्र|ब्रिटिश राजतंत्राने]] [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीला]] भारतात व्यापार करण्याचा मक्ता दिलेला होता परंतु तेथील सार्वभौम राजांशी इंग्लंडच्या वतीने असे करार करणे हे कायदेबाह्य होते. या कराराच्या अटींवरून [[पहिले इंग्रज-मराठा युद्ध]] पेटले. दोन्ही बाजू तुल्यबळ असल्याने हे युद्ध अनेक वर्षे रखडले. शेवटी [[महादजी शिंदे|महादजी शिंद्यांनी]] मध्यस्थी करून १७८२मध्ये [[सालबाईचा करार]] घडवून हे युद्ध थांबवले. यात इंग्रजांची जरी थेट सरशी झाली नसली तरी [[वॉरेन हेस्टिंग्स]]ने दूरदृष्टी वापरून शिंदे, भोसले आणि पेशवे यांच्यात दुही निर्माण केली. १७८६मध्ये [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनी]]ने [[लॉर्ड कॉर्नवॉलिस]] याला [[भारताचे गव्हर्नर जनरल|भारतातील प्रदेशांचा गव्हर्नर जनरल]] म्हणून नेमले. त्यावेळी [[मराठा साम्राज्य]] मजबूत स्थितीतच होते. [[सालबाईचा तह|सालबाईच्या तहानंतर]] ब्रिटिशांनी [[उत्तर भारत|उत्तर भारतात]] कुरापती न काढता मराठ्यांच्या बरोबरीने राहण्याचे धोरण अवलंबिले. [[पुणे|पुण्यात]] या वेळी ११ वर्षांचा [[सवाई माधवराव पेशवे|सवाई माधवराव]] पेशवेपदावर होता व त्याच्या मंत्री [[नाना फडणवीस|नाना फडणवीसांनी]] मुत्सद्दीपणाने ब्रिटिश, [[निजामशाही|निजाम]], [[फ्रेंच भारत|फ्रेंच]], [[पोर्तुगीज भारत|पोर्तुगीज]], [[शिंदे घराणे|शिंदे]], [[इंदूर संस्थान|होळकर]] व इतर सत्तांशी समतोल साधून ठेवलेला होते. १८०० साली फडणवीसांच्या मृत्यूनंतर पेशवाईत अनागोंदी माजली. शिंदे-होळकर संघर्षात पेशव्यांनी शिंद्यांची बाजू घेतल्याचे वाटून होळकरांनी १८०१मध्ये थेट पुण्यावर हल्ला केला. [[दुसरे बाजीराव पेशवे|पेशवा दुसऱ्या बाजीरावाने]] पुण्यातून ब्रिटिश आरमाराच्या मदतीने पलायन केले. आपली पेशवाई आणि सत्ता गमावण्याची भीती वाटून बाजीरावाने [[वसईचा तह|वसईच्या तहावर]] शिक्कामोर्तब केले. यानुसार पेशवे आता खुद्द शासक न राहता इंग्रजधार्जिणे झाले. याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे आणि [[नागपूरकर भोसले|भोसल्यांनी]] इंग्रजांनी हल्ला केला व १८०३मध्ये [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध]] सुरू झाले. यात इंग्रजांनी मराठा सरदारांचा सडकून पराभव केला व मराठ्यांनी आपला बव्हंश प्रदेश इंग्रजांच्या स्वाधीन केला. === ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी === हजारो मैलांवरून आलेल्या ब्रिटिशांनी भारतीय भूगोलाचा अभ्यास केलेला होता आणि स्थानिक लोकांशी व्यापार करण्यासाठी आणि नंतर त्यांच्यावर सत्ता गाजविण्यासाठी येथील भाषा शिकून घेतलेल्या होत्या. त्यांच्याकडील त्याकाळील अद्ययावत असे तंत्रज्ञान होते आणि भारतातील परिस्थितीत प्रभावीपणे वापरण्यासाठीची शस्त्रे त्यांनी आणलेली होती. काही संशोधकांच्या मते जरी ब्रिटिशांकडे अद्ययावत तंत्रज्ञान नसते तरीही त्यांच्यातील शिस्त व संघटनेच्या जोरावर त्यांनी भारतीयांविरुद्धची बव्हंश युद्धे जिंकली असती. त्याचबरोबर त्यांचा मुत्सद्दीपणा आणि संधिसाधूपणाही त्यांच्या यशाला कारणीभूत होते. [[पहिले इंग्रज-मराठा युद्ध|पहिल्या इंग्रज-मराठा युद्धानंतर]] [[वॉरन हेस्टिंग्स|वॉरेन हेस्टिंग्स]]ने जाहीर केले की मराठ्यांबरोबरचा तह अनेक वर्ष अबाधित राहील. परंतु त्याचबरोबर त्याने [[पुणे|पुण्यातील]] [[पेशवे|पेशव्यांच्या]] दरबारात [[चार्ल्स मॅलेट]] या स्थानिक रीतीरिवाज माहिती असलेल्या व्यापाऱ्याला राजदूत म्हणून नेमले. यायोगे हेस्टिंग्सला पेशव्यांशी सतत संपर्क ठेवायचा होता तसेच तेथील बितंबातमीही काढून आणायची होती. == तिसऱ्या युद्धाची पार्श्वभूमी == [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर]] [[पेशवे|पेशव्यांची]] सत्ता मुख्यत्वे महाराष्ट्रात ''देशा''वर पसरलेली होती. [[कृष्णा नदी|कृष्णा]] आणि [[गोदावरी नदी|गोदावरी नद्यांची]] खोरी आणि त्यांमधील [[सह्याद्री]]च्या पठारावरील प्रदेश हा त्यांच्या थेट अंमलाचा प्रदेश होता. त्यांचे सरदार असलेले [[इंदूर संस्थान|होळकर]] [[इंदूर|इंदूरात]] असून त्यांची सत्ता [[नर्मदा खो|नर्मदा खोऱ्यात]] होती. [[शिंदे घराणे|शिंदे]] [[ग्वाल्हेर]] आणि [[बुंदेलखंड]], [[गंगेचे खोरे|गंगेच्या खोऱ्याच्या]] दक्षिणेकडील टेकड्या आणि सुपीक मैदाने तसेच आसपासच्या प्रदेशावर हुकुमत गाजवत होते. [[चंबळ नदी|चंबळच्या]] दऱ्या, जंगले, [[विंध्य पर्वतरांग|विंध्य पर्वतरांगेच्या]] उत्तरेस आणि आत्ताच्या [[मध्य प्रदेश]]च्या वायव्य भागातील प्रदेश, [[माळवा]] पठार या भागांतून पेंढाऱ्यांचे राज्य होते. === खिळखिळे होत चाललेले मराठा सैन्य === [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर]] मराठा साम्राज्याचा प्रभाव आणि शक्ती काही अंशाने कमी झाली होती.{{sfn|Chhabra|2005|p=39}} युद्धानंतर त्यांनी आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण करण्याकडे दुर्लक्ष केले आणि नवीन तंत्रज्ञान न अजमावता त्याच त्याच जुन्या, कालबाह्य युद्धनीतींवर भर दिला.{{sfn|Chhabra|2005|p=39}} मराठ्यांचा तोफखाना जुन्यापुराण्या तोफांवर भर देउन होता. यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे म्हणजे कठीण काम होते. याउलट युरोपीयनांचा तोफखाना गतिशील आणि भेदक होता. जरी काही प्रमाणात मराठ्यांनी नवीन शस्त्रे अंगिकारली असली तरी ती सगळी आयात केलेली होती. ही हाताळणारे कुशल लोक परदेशी होते. एतद्देशीयांनी ही शस्त्रे स्वतः तयार करण्याचा कधी प्रयत्न केला नाही किंवा त्यांचे तंत्रज्ञानही आत्मसात केले नाही. मराठ्यांचे गुप्तहेर खाते कुशल नव्हते आणि नाना फडणवीसांचा काळ सोडता त्यांच्याकडील मुत्सद्दी देशातील संपूर्ण चित्र पाहण्यास असमर्थ होते. मराठ्यांची घातक पथके [[पेंढारी]] व इतर भाडोत्री सैनिकांनी भरलेली होते. या साम्राज्याला एक वाली नव्हता. खुद्द छत्रपतींच्याही दोन गाद्या होत्या -- [[सातारा संस्थान|सातारा]] आणि [[कोल्हापूर संस्थान|कोल्हापूर]]. [[पश्चिम महाराष्ट्र]] सोडता इतर सगळे प्रदेश तेथील सरदारांच्या अंमलात होते आणि त्यांवर एकसूत्र थेट कारभार अशक्य होता. [[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांचे]] एकछत्री मराठा साम्राज्य आता कॉन्फेडरसी{{मराठी शब्द सुचवा}}मध्ये परिवर्तित झाले होते आणि एकजुटीने परकीय शत्रूशी युद्ध करण्यासाठीची एकता नष्ट झालेली होती.{{sfn|Chhabra|2005|p=39}} === ब्रिटिशांची कारस्थाने === [[चित्र:Mountstuart-Elphinstone.jpg|left|thumb|माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]] मराठा साम्राज्य ढासळत असताना [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनी]] आपली शक्ती वाढवत होती. दुसऱ्या युद्धातील आपल्या विजयाचा पुरेपूर उपयोग करून घेत त्यांनी मराठ्यांना आपल्या टाचेखाली ठेवले होते. जरी [[दुसरे बाजीराव पेशवे|दुसरा बाजीराव]] साम्राज्याचा पेशवा असला तरी पेशव्यांच्या बाजूने असलेले अनेक सरदार, जहागिरदार आणि संस्थानिक ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली किंवा संरक्षणाखाली गेलेले होते. याचा फायदा घेत ब्रिटिशांनी [[बडोदा संस्थान|बडोद्याच्या]] [[गायकवाड घराणे|गायकवाडांबरोबर]] करार करून त्यांच्या संस्थानातील महसूलाचा भाग पेशवाईपर्यंत पोचू नये अशी व्यवस्था केली. यामुळे भडकलेल्या पेशव्यांशी बोलणी करण्यासाठी गायकवाडांनी गंगाधर शास्त्री यांना आपले दूत म्हणून पुण्याला पाठवले. तेथे असताना त्यांची हत्या झाली. या हत्येमागे पेशवाईतील मंत्री [[त्र्यंबक डेंगळे]] असल्याचा संशय गायकवाड आणि ब्रिटिशांनी व्यक्त केला. या प्रकरणाला उचलून धरत ब्रिटिशांनी बाजीरावाला [[पुणे करार (१८८७)|एक करार]] करणे भाग पाडले.{{sfn|Naravane|2006|pp=79–80}} १३ जून, १८८७ रोजी शिक्कामोर्तब झालेल्या या करारानुसार बाजीरावाला गायकवाडांवरील वादावर पडदा टाकणे, त्र्यंबक डेंगळे यांनी गुन्हा कबूल करणे आणि बडोद्याच्या महसूलीवर पाणी सोडणे भाग पडले. याशिवाय पेशवाईने मोठा प्रदेश ब्रिटिशांच्या स्वाधीन केला. यात महाराष्ट्रातील अनेक बेलाग किल्ले आणि [[कोंकण|कोंकणातील]] किनारपट्टी ब्रिटिशांच्या घशात गेली आणि [[नर्मदा नदी|नर्मदेच्या]] उत्तरेस आणि [[तुंगभद्रा नदी|तुंगभद्रेच्या]] दक्षिणेकडील पेशवाईचा सगळा प्रदेश ब्रिटिश आधिपत्याखाली आला. आणि पेशव्यांनी भारतातील इतर कोणत्याही संस्थानाशी वाटाघाटी करू नये असेही मान्य करून घेतले.{{sfn|Chhabra|2005|p=17}} इतकेच नव्हे तर पेशवाईतील ब्रिटिश रेसिडेंट [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]]ने पेशव्यांना आपले घोडदळ बरखास्त करणे भाग पाडून मराठा सैन्याचे कंबरडेच मोडले.{{sfn|Chhabra|2005|p=17}}{{sfn|Naravane|2006|pp=79–80}} === पेंढारी === {{हेसुद्धा पाहा|पेंढारी}} [[File:Malwa_India_1823.png|thumb|१८२३ च्या भारतातील चित्रणात माळव्याचे स्थान. १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात पेंढारी या भागात होते]] पेंढारी किंवा पिंडारी या भारतात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत रयतेची लूटमार व वाटमार करणाऱ्या संघटित टोळ्या होत्या, ज्यात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाचे लोक होते. यांपैकी पेंढाऱ्यांच्या सशस्त्र संघटित टोळ्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने उदयास आल्या.{{sfn|Naravane|2006|pp=86–87}} घोड्यांवरून आपल्या कारवाया करणारे पेंढारी शिंदेशाही किंवा होळकरशाही असत. अंदाजे ३३,००० शिबंदी असलेल्या{{sfn|Naravane|2006|p=86}} पेंढाऱ्यांच्या सरदारांमध्ये चिटू, तुलसी, इमाम बक्ष, साहिब खान, कादिर बक्ष, नाथू आणि बापू हे होळकरशाही तर करीम खान, दोस्त मोहम्मद हे शिंदेशाही होते. [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर]] शिंदे व होळकर यांनी आपले बरेचसे प्रांत ब्रिटिशांच्या स्वाधीन केले. त्याचा वचपा म्हणून शिंदे आणि होळकरांनी पेंढाऱ्यांना ब्रिटिश प्रांतावर आक्रमण करण्यास उद्युक्त केले. यांच्या धाडींमुळे त्रस्त झालेल्या रयतेला आपले गुजराण करणे अशक्य झाले.{{sfn|Russell|1916|p=396}} उपासमारी किंवा पेंढाऱ्यांना जाउन मिळणे असे दोनच पर्याय त्यांना उरले. १८१५मध्ये सुमारे २५,००० पेंढाऱ्यांची टोळधाड [[मद्रास प्रेसिडेन्सी]]मधील [[कोरोमंडल|कोरोमांडल]] किनाऱ्यालगतच्या प्रदेशावर चालून गेली आणि तेथील ३०० गावे लुटून मारली. अजून एक धाड निजामाच्या हद्दीत तर तिसरी मलबारवर पडली व तेथेही त्यांनी अशीच जाळपोळ केली. १८१७ पर्यंत पेंढाऱ्यांनी ब्रिटिश प्रदेशात छापेमारी सुरू ठेवली. पेंढाऱ्यांचा नायनाट करणे हाच एक उपाय ब्रिटिशांना होता. == व्यूहरचना आणि नियोजन == === मराठा साम्राज्य === [[चित्र:RaigadFort1.jpg|thumb|रायगड किल्ल्यावर जुन्या वाड्याचे अवशेष]] [[पुणे करार (१८१३)|पुणे करारांतर्गत]] पेशव्यांनी आपले घोडदळ बरखास्त केले होते परंतु गुप्तपणे त्यांना सात महिन्यांचे आगाऊ वेतन देउन पेशवाईच्या दिमतीस येण्यास फर्मावले.{{sfn|Naravane|2006|p=80}} बाजीरावने [[बापू गोखले]] यांच्यावर येऊ घातलेल्या युद्धाच्या तयारीची जबाबदारी सोपविली.{{sfn|Duff|1921|pp=468–469}} गोखल्यांनी घोडदळाबरोबरच गुप्ततेतच पायदळाची सुद्ध भरती सुरू केली. यांत [[भिल्ल समाज|भिल्ल]] आणि [[रामोशी]] सैनिकांचा भरणा होता.{{sfn|Duff|1921|p=468}} अगदी पेंढाऱ्यांनाही भाडोत्री सैनिक होण्याचा प्रयत्न केला गेला.{{sfn|Duff|1921|p=468}} ऑगस्ट १८७१मध्ये त्यांनी [[सिंहगड]], [[पुरंदर किल्ला|पुरंदर]] आणि [[रायगड (किल्ला)|रायगड]] किल्ल्यांची डागडुजी करून ते भांडते केले.{{sfn|Duff|1921|p=468}} लष्करी तयारीबरोबरच काही मुत्सद्देगिरीचे ही प्रयत्न झाले. पेशव्यांनी भोसले, शिंदे आणि होळकर यांना पुन्हा आपल्या गोटात येण्याचे आवाहन केले. जसवंतराव घोरपडे सारख्या एल्फिन्स्टनच्या नोकरीतील नाराज एतद्देशीय लोकांचा माग काढून त्यांना गुप्तपणे भरती केले गेले. अशा इतर काही शिपायांनी पेशव्यांना नकार दिला आणि उलट आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पेशव्यांची आगळीक उघड केली.{{sfn|Duff|1921|p=474}}{{sfn|Duff|1921|p=470}} पेशव्यांनी थेट युरोपीयांच्यात फूट पाडणेही अजमावले परंतु ते मात्र शक्य झाले नाही.{{sfn|Duff|1921|p=470}} [[दुसरे बाजीराव पेशवे|पेशवा बाजीराव दुसऱ्याने]] १९ ऑक्टोबर, १८१७ रोजी [[विजयादशमी|दसऱ्याच्या]] उत्सवात मोठे सैन्य जमा केले.{{sfn|Naravane|2006|p=80}} कवायतीदरम्यान घोड्यावर स्वार असलेल्या सैनिकांनी एल्फिन्स्टनच्या दिशेने एल्गार केला परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी मोर्चा वळवला.{{Sfn|Duff|1921|p=471}} [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन|एल्फिन्स्टनला]] धाक दाखवणे आणि त्याच्या नोकरीत असलेल्या एतद्देशीय शिपायांना पेशव्यांच्या बाजूने लढण्यासाठी मनोबळ देणे हा या हिकमतीचा उद्देश होता.{{Sfn|Duff|1921|p=471}}{{sfn|Duff|1921|p=471}} पेशव्यांनी एल्फिन्स्टनची हत्या करण्याचाही कट रचला होता. [[बापू गोखले|गोखल्यांचा]] याला विरोध होता परंतु ही योजना पुढे चालली पण उघडकीला येण्याचा संशय आल्यावर उधळून टाकण्यात आली.{{sfn|Naravane|2006|p=80}} १८१७ च्या सुमारास मराठा साम्राज्याच्या सैन्यदलाचा अंदाज १ बर्टन यांच्या मते असा होता -- पायदळ: अंदाजे ८१,०००. घोडदळ: १,०६०००. तोफा: ५८९. [[पुणे|पुण्यामध्ये]] [[पेशवे|पेशव्यांकडे]] १४,००० शिपाई, २८,००० घोडेस्वार आणि ३७ तोफा होत्या. होळकरांकडे ८,००० सैनिक, २०,००० घोडेस्वार आणि १०७ तोफा होत्या. [[ग्वाल्हेर]]मध्ये [[शिंदे घराणे|शिंदे]] आणि [[इंदूर|इंदूरात]] [[इंदूर संस्थान|होळकरांकडे]] अनुक्रमे १६,००० आणि १८,००० सैनिक; १५,००० आणि १६,००० घोडेस्वार आणि एकूण सुमारे २०० तोफा होत्या. यांशिवाय अफगाण सरदार आमिर खानकडे [[राजपुताना|राजपुतान्यातील]] [[टोंक]] येथे १०,००० सैनिक, १२,००० घोडेस्वार आणि २०० तोफा होत्या{{sfn|Burton|1908|p=153}}{{sfn|Burton|1908|p=153}}{{sfn|Bakshi|Ralhan|2007|p=261}}{{sfn|United Service Institution of India|1901|p=96}} [[चंबळ नदी|चंबळ]] आणि [[माळवा]] तसेच [[नर्मदा खोरे|नर्मदा खोऱ्यांतील]] शिंदेशाही [[पेंढारी]] सरदार चिटू, करीम खान आणि दोस्त मोहम्मद यांच्याकडे अनुक्रमे १०,०००, ६,००० आणि ४,००० सैनिक होते परंतु यांच्याकडे शस्त्रे म्हणजे फक्त भाले होते. होळकरशाही पेंढारी सरदार तुळशी, इमाम बक्ष, साहिब खान, कादिर बक्ष, नथू आणि बापू यांच्यात मिळून २१,५०० सैनिक आणि सुमारे ४,००० घोडेस्वार होते.{{sfn|Naravane|2006|pp=86–87}} === ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी === गायकवाडांच्या राजदूत गंगाधर शास्त्री यांची हत्या म्हणजे पेशव्यांनी भारतातील ब्रिटिश सत्तेला दिलेले आव्हान समजून त्यांचे साम्राज्य गिळण्यासाठी [[फ्रांसिस रॉडोन-हेस्टिंग्स|रॉडोन-हेस्टिंग्सने]] भारतात मोठ्या सैन्याची जमवाजमव सुरू केली.<ref name="mapw">{{cite book |last1=Burton |first1=R.G. |title=The Mahratta And Pindari War |date=1910 |publisher=Government Press |location=Simla |url=https://archive.org/details/in.ernet.dli.2015.284400/mode/2up}}</ref> ब्रिटिशांची भारतातील तोपर्यंतची ही सगळ्यात मोठी फौज होती. १,२०,००० शिबंदी असलेल्या या सैन्याची रचना रॉडोन-हेस्टिंग्सच्या हाताखालील ग्रँड आर्मी तथा बेंगाल आर्मी आणि जनरल [[थॉमस हिस्लॉप]]च्या हाताखालील आर्मी ऑफ द डेक्कन या दोन सैन्यांची मिळवणी होती.{{sfn|Bakshi|Ralhan|2007|p=259}} यात एतद्देशीय सैनिकांच्या ६० बटालियन, ब्रिटिश सैन्याच्या रेजिमेंटमधून रचलेल्या अनेक बटालियन, घोडदळ आणि ड्रगूनच्या अनेक तुकड्या, तोफखाना, इ.चा समावेश होता. ग्रँड आर्मीच्या ४०,००० सैनिकांच्या या फौजेचे तीन विभाग आणि एक अतिरिक्त राखीव विभाग केले गेले. यांतील डाव्या विभागाचे नेतृत्त्व मेजर जनरल मार्शल, मध्य विभाग रॉडोन-हेस्टिंग्स कडे होेते. सैनिक, आर्मी ऑफ द डेक्कनचे ७०,००० सैनिक पाच विभागांत होते. यांचे नेतृत्त्व ब्रिगेडियर जनरल डव्हजन, जनरल हिस्लॉप, जनरल माल्कम ब्रिगेडियर जनरल स्मिथ आणि लेफ्टनंट कर्नल अॅडम्स यांच्याकडे असल्याची नोंद आहे. याव्यतिरिक्त [[चेन्नई|मद्रास]] आणि [[पुणे विमानतळ|पुणे]] येथे दोन बटालियन आणि तोफखान्याच्या तुकड्याही तैनात होत्या. [[मद्रास रेसिडेन्सी]]मध्ये ६ व्या बंगाल घोडदळातील अतिरिक्त तीन तुकड्याही तयारीत होत्या. या सगळ्या सैन्याकडे अद्ययावत शस्त्रे होती तसेच त्यांचे रसदमार्ग उत्तमपणे आखलेले होते. इकडे सैन्य गोळा करीत असताना ब्रिटिशांनी शिंदे, होळकर आणि आमिर खान यांच्याशी बोलणी सुरू केली. या तिन्ही संस्थानातील [[पेंढारी]] ब्रिटिश प्रदेशात धुमाकूळ घालत होते आणि या तिघांनीही [[नेपाळचे राजे|नेपाळच्या राजाबरोबर]] संधान साधून ब्रिटिशांविरुद्ध युती करण्याची बोलणी सुरू केलेली होती.{{sfn|Sinclair|1884|pp=194–195}} याबाबतचा गुप्त पत्रव्यवहार ब्रिटिशांनी पकडला. यावरून त्यांनी संस्थानिकांना पेचात पाडले आणि पेंढाऱ्यांविरुद्ध ब्रिटिशांना मदत करणे आणि पेंढाऱ्यांच्या नवीन टोळ्या उभ्या न होऊ देणे यासाठी ब्रिटिशांनी संस्थानिकांना [[ग्वाल्हेरचा करार|वचन देणे]] भाग पाडले. हा करार, प्रचंड मोठे सैन्याचा दबाव आणि मुत्सद्दीगिरी वापरून ब्रिटिशांनी शिंदे आणि होळकरांना युद्ध सुरू होण्याआधीच बाजूला केले. राजपुतान्यातील आमिर खानला त्याची टोंकची रियासत अबाधित ठेवण्याचे वचन देउन ब्रिटिशांनी त्यालाही परस्पर दूर केले. आमिर खानने ब्रिटिशांवर विश्वास ठेवून आपली सेना बरखास्त केली तोफा ब्रिटिशांना विकून टाकल्या. याशिवाय आपल्या प्रदेशातून पेंढाऱ्यांना हाकलून देण्याचेही कबूल केले.{{sfn|Sinclair|1884|pp=194–195}} ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीस ब्रिटिशांनी ग्रँड आर्मीचा एक विभाग [[सिंधुदुर्ग|सिंध]], दुसरा [[चंबळ विभाग|चंबळ]] आणि तिसरा [[नर्मदेचे खोरे|नर्मदेच्या खोऱ्याच्या]] पूर्व भागात पाठवला. यांचे काम शिंदे आणि होळकर तसेच पेशव्यांच्या मध्ये राखून त्यांची हातमिळवणी रोखणे हा होता. राखीव विभागाने [[राजपुताना|राजपुतान्यात]] आमिर खानच्या हालचालींवर नजर ठेवलेली होती. आर्मी ऑफ द डेक्कनचा पहिला आणि तिसरा विभाग [[हरदा]] येथे ठाण मांडून होता. तेथून ही फौज आसपासच्या किल्ल्यांना शह देउन होती. दुसरा विभाग [[मलारपूर]] येथून [[बेरार घाट|बेरार घाटावर]] लक्ष ठेवून होता तर चौथा विभाग [[पुणे]] आणि [[अमरावती]]च्या आसपासच्या प्रदेशांवर जरब ठेवीत होता. पाचवा विभाग [[होशंगाबाद]] येथे तैनात करण्यात आला. राखीव विभाग [[भीमा नदी|भीमा]] आणि [[कृष्णा नदी|कृष्णा नद्यांच्या]] दोआबात दबा धरून बसला होता. अशा प्रकारे ब्रिटिशांनी मराठ्यांची पूर्णपणे नाकेबंदी करून ठेवलेली होती. == युद्धातील प्रमुख लढाया == [[चित्र:Richard_Colley_Wellesley.jpg|thumb|[[रिचर्ड वेलस्ली (पहिला मार्क्वेस वेलस्ली)|रिचर्ड वेलेस्ली]], पहिला मार्क्वेस वेलेस्लीने आंग्ल-मराठा युद्धात विजय मिळवून कंपनीच्या प्रदेशाचा भारतात विस्तार केला]] काही इतिहासकारांच्या मते तिसरे युद्ध हे [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसऱ्या युद्धाचे]] खरकटे काढण्यासाठीचे होते. ब्रिटिशांना ते पूर्वीच संपवता आले नाही कारण त्यांचे पैसे आणि मनुष्यबळ त्या युद्धाच्या शेवटी कमी पडले.{{sfn|Black|2006|pp=77–78}} परंतु हे सुद्ध लक्षात घेण्याजोगे आहे की ब्रिटिशांनी तिसऱ्या युद्धासाठी कसून तयारी केली होती. त्यासाठी त्यांनी प्रचंड मनुष्यबळ, शस्त्रे, पैसे आणि व्यूहरचना खर्ची घातलेले होते. तिसऱ्या युद्धाची सुरुवात ब्रिटिशांनी पेंढाऱ्यांचा नायनाट करायचा या कथित उद्देशाने केली. === पेंढाऱ्यांवरील हल्ला === १८१७ च्या उन्हाळा व पावसाळ्यात मजबूत नाकेबंदी केल्यावर ब्रिटिश फौजांनी वर्ष संपताना [[पेंढारी|पेंढाऱ्यांच्या]] प्रदेशात आक्रमण केले. जंगलातून आणि खेड्यापाड्यातून राहणाऱ्या पेंढाऱ्यांशी समोरासमोर दोन हात करणे शक्य नाही हे ब्रिटिशांना कळून चुकले होते व त्यांनी व्यूहात्मक हालचाली करीत पेंढाऱ्यांना पश्चिम आणि दक्षिणेकडून दाबण्यास सुरुवात केली. पेंढाऱ्यांची लूटमार व जाळपोळ करण्याची पद्धत पाहून ब्रिटिशांना वाटले होते की या प्रदेशात रसद मिळणे अशक्य आहे म्हणून त्यांनी आपले रसदमार्ग भक्कम केलेले होते. पेंढारी प्रदेशात आल्यावर त्यांना येथे मुबलक प्रमाणात अन्नसाठा आणि इतर रसद मिळून आली व त्यामुळे त्यांची बाजू अधिकच भक्कम झाली.<ref name="mapw" /> पेंढाऱ्यांच्या एकेका गाव, वस्ती आणि अड्ड्यांना घेरा घालत जनरल हिस्लॉप दक्षिणेकडून चालून आला आणि त्याने पेंढाऱ्यांना नर्मदेपलीकडे हुसकावून लावले. रॉडोन-हेस्टिंग्स त्याच्या सैन्यासह येथे दबा धरून बसलेला होता.{{sfn|Sinclair|1884|pp=195–196}} या कचाट्यात सापडलेले करीम खानचे टोळके बेचिराख झाले. ब्रिटिशांनी मोक्याच्या ठिकाणी आपले सैन्य लावलेले असल्यामुळे पेंढाऱ्यांना त्यांच्याच प्रदेशत मुक्त संचार करणे अशक्य झाले व एकमेकांच्या मदतील ते येऊ शकले नाहीत. मुख्य रस्ते बंद झाल्याने त्यांच्या टोळधाडीही बंद झाल्या आणि ते विखुरले. फक्त भाल्यानिशी असलेल्या पेंढाऱ्यांचा प्रशिक्षित ब्रिटिश सैन्याच्या रायफली आणि तोफांसमोर टिकाव लागला नाही. त्यांचे छोट्या छोट्या टोळ्या करून ब्रिटिशांचा वेढा फोडण्याचे प्रयत्न सुद्धा फसले. आता ते पूर्णपणे कोपऱ्यात अडकलेले होते.{{citation needed|date=March 2022}} यापुढे ब्रिटिशांनी हा वेढा आवळायला सुरुवात केली आणि पेंढाऱ्यांच्या टोळ्यांना एक एक करून चेचणे सुरू केले. जरी त्यांचे २३,००० सैनिक उरले असले तरी त्यांच्याकडून एकसंध हल्ला होत नव्हता व केलेले हल्ले ब्रिटिश सैन्य लीलया परतवून लावत होते. पेंढाऱ्यांनी गावागावातून आश्रय घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या पूर्वीच्या क्रुरतेची आठवण ठेवून गावकऱ्यांनी त्यांना थारा दिला नाही. अनेक ठिकाणी त्यांनी पेंढाऱ्यांना पकडून ठार मारले.{{sfn|Sinclair|1884|pp=195–196}} पेंढाऱ्यांनी जंगलाकडे पळ काढला पण तरीही त्यांच्यामागचा ससेमिरा चुकला नाही. त्यांना अपेक्षित मराठ्यांची मदतही आली नाही कारण शिंदे आणि होळकरांना ब्रिटिशांनी ग्वाल्हेरच्या तहाने शह दिलेला होता. एकेकाळी बलाढ्य आणि दहशत पसरवणारे पेंढारी सरदारांचा आता शिकार सुरू झाला. फेब्रुवारी १८१८पर्यंत जवळजवळ सगळ्या मुख्य सरदारांची वासलात लावली गेली. करीम खानने रॉडोन-हेस्टिंग्ससमोर आत्मसमर्पण केले. त्याला गोरखपूर येथे छोटी जमीन देउन तडीपार करण्यात आले. वासिल खानने लढा सुरू ठेवला परंतु ब्रिटिशांच्या हातील लागण्याआधीच त्याने विष घेउन आत्महत्या करून घेतली.{{sfn|Keightley|1847|p=165}} जॉन माल्कमने सेतूचा पिच्छा पुरवला व एक-एक करीत त्याचे साथीदार टिपून मारले. एकटा पडलेल्या सेतूने जंगलात आश्रय घेतला आणि तेथे तो एका नरभक्षी वाघाचा शिकार झाला.{{sfn|Travers|1919|p=19}}{{sfn|Sinclair|1884|p=196}}{{sfn|Hunter|1909|p=495}} मध्य भारतातील गावकऱ्यांमध्ये दहशत पसरवणाऱ्या या पेंढाऱ्यांचा नायनाट केल्यामुळे त्यांच्याकडून ब्रिटिशांना सहानुभूती मिळाली. === खडकीची लढाई === [[File:Battle of Kirki, 1817.jpg|thumb|खडकीची लढाई, १८१७]] {{मुख्य लेख|खडकीची लढाई}} [[चित्र:Battle of khadaki.svg|left|thumb|300px| खडकीच्या लढाईतील दोन्ही सैन्यांची व्यूहरचना]] ब्रिटिश आपली फौज [[मध्य भारत|मध्य भारतात]] [[पेंढारी|पेंढाऱ्यांच्या]] मागावर लावत असल्याने त्यांची दक्षिणेतील कुमक कमी झाली होती. ही संधी साधत [[पेशवे|पेशव्यांनी]] [[पुणे|पुण्याजवळ]] त्यांच्यावर असावध असताना हल्ला करण्याचे ठरवले. या सुमारास ब्रिटिशांचे फक्त १,००० पायदळ सैनिक आणि २,००० घोडेस्वार तसेच ८ तोफा पुण्याजवळ दापोडी व बोपोडी येथे तैनात होते. पेशव्यांनी २०,००० घोडेस्वार आणि ८,००० पायदळ सैनिक पुण्यात जमा केले व दिमतीला २० तोफाही होत्या.<ref name="Naravane">{{cite book |last=Naravane |first=M. S. |title=Battles of the Honorourable East India Company (Making of the Raj) |publisher=A.P.H. Publishing Corporation |year=2014 |isbn=9788131300343 |location=New Delhi |pages=80–82}}</ref> ही सगळी हालचाल पेशवे पर्वती टेकडीवरून दुर्बिणीतून पहात होते. त्यांच्यासोबत हुजुरातीतील ५,००० घोडेस्वार आणि १,००० सैनिक होते. खडकीच्या टेकडीवर ब्रिटिशांचे टेहळे होते. चतुःश्रृंगी टेकडी आणि खडकी टेकडी यांच्यामधील गणेशखिंडीतून मराठ्यांची चाल होणार होती. अनेक ठिकाणी उथळ असलेली मुळा नदी ओलांडून तेथील ओढे व नाल्यांमधून पुढे सरकत ब्रिटिशांना मागून घेरण्याचा मराठ्यांचा व्यूह होता. ५ नोव्हेंबर, १८१७ रोजी संध्याकाळी ४ वाजता सरदार विंचूरकरांनी ब्रिटिश रेसिडेंट [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]]च्या बंगल्यावर हल्ला केला. हा बंगला आत्ताच्या [[शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे)|शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या]] आवारात होता. तोफांचा मारा सुरू होताच एल्फिन्स्टन पळून [[दापोडी]]कडे गेला. त्यानंतर लगेचच मराठे आवारात घुसले व नासधूस करून ते पेटवून दिले. एल्फिन्स्टन दापोडीला पोचताच त्याने [[बोपोडी]] येथील सैन्याला ताबडतोब कूच करून दापोडीला यायचा हुकुम दिला. ही फौज तेथून पुढे सरकली. मराठ्यांनी [[गणेशखिंड|गणेशखिंडीजवळून]] ब्रिटिशांच्या उजव्या अंगावर चाल केली. मराठ्यांना वाटले होते की इतकी प्रचंड (दहापट) सेना अचानक चाल करून येताना पाहून ब्रिटिश गांगरतील पण तसे न होता ब्रिटिश सैनिकांनी ठिय्या मारला आणि प्रतिकार सुरू केला. मराठ्यांनी हल्ला करायच्या सुरुवातीलाच त्यांचा जरी पटक्याचे निशाण मोडले होते. हा अपशकुन मनात होता म्हणून किंवा ब्रिटिशांचा आवेश पाहून मराठ्यांनी स्वतःच कच खाल्ली. हे पाहून सेनापती [[बापू गोखले]] स्वतः घोड्यावरून लढणाऱ्या तुकड्यांमधून फिरू लागले. त्यांनी सैनिकांना प्रोत्साहन देउन आणि प्रसंगी टोमणे मारून आपली फळी पुढ सरकावयचा प्रयत्न केला. ब्रिटिशांच्या उजव्या बाजूने पुढे सरकत त्यांना घेरण्याचा गोखल्यांचा बेत फसला. घोडेस्वारांचा हा एल्गार ब्रिटिशांसमोरच्या दलदलीत अडकला आणि शत्रूच्या रायफलांनी त्यांच्यावर निशाणबाजी सुरू केली. त्यातूनही सुटून काही मराठा स्वारांनी शत्रूवर धडक मारली परंतु तेथे ते संगीनींनी कापले गेले. उरलेल्या मराठ्यांनी पळ काढला. या गर्दीत गोखल्यांच्या घोड्याला गोळी लागली व त्यांना पायउतार व्हावे लागले. [[मोरोपंत दिक्षीत]] आणि सरदार रास्ते यांनी शत्रूच्या डाव्या फळीवर हल्ला चढवला पण तेथे आता ब्रिटिशांच्या रायफली सज्ज होत्या. मोरोपंत दिक्षीतांना रणांगणावर गोळ्या घालून मारण्यात आले. नेतृत्त्वहीन मराठ्यांनी तेथूनही माघार घेतली. संध्याकाळी ४ वाजता सुरू झालेली ही लढाई चार तासांत संपली. यात मराठ्यांचे सुमारे ५०० सैनिक आणि घोडेस्वार धारातीर्थी पडले तर ८६ ब्रिटिश सैनिक कामी आले.{{sfn|Murray|1901|p=324}}{{sfn|Chhabra|2005|p=19}} ब्रिटिशांनी ही संधी न दवडता लगेच पुण्यावर चाल करून शहराला वेढा घातला. === पेशव्यांचे पलायन === ब्रिटिशांनी [[पुणे|पुण्याकडे]] चाल केलेली पाहून [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीरावाने]] [[हुजुरत]] घेउन [[पुरंदर किल्ला|पुरंदरकडे]] पलायन केले.{{sfn|Duff|1921|p=482}} १३ नोव्हेंबरला जनरल स्मिथ सध्याच्या [[डेक्कन कॉलेज]]च्या जवळील आपल्या छावणीतून मुळा नदी ओलांडून [[घोरपडी]] येथे आला. पेशव्यांच्या पाठलाग रोखण्यासाठी [[बापू गोखले|बापू गोखल्यांनी]] त्याच्याशी झटापटी सुरू ठेवल्या. विंचूरकरांची ५,०००ची फौज मुळा-[[मुठा नदी|मुठेच्या]] फौजेला संगमावर थांबलेली होती. त्याला न जुमानता स्मिथ पुण्यात शिरला. पुण्यात त्याला काहीही प्रतिकार झाला नाही. १७ नोव्हेंबर, १८१७ रोजी ब्रिटिशांनी [[शनिवार वाडा|शनिवार वाड्यात]] प्रवेश करून त्यावर [[युनियन जॅक]] फडकाविला. इकडे पेशवे पुरंदरावरून [[सातारा|साताऱ्याकडे]] आणि नंतर [[कोरेगांव भीमा]] येथे गेले. कोतवाली चावडीवरील भगवे झेंडे तसेच ठेवले गेले. ते आष्टीच्या लढाईनंतर उतरवण्यात आले. १ जानेवारी, १८१८ रोजी ब्रिटिशांनी मराठ्यांना कोरेगावला गाठले. [[एफ‌.एफ. स्टाँटन|कॅप्टन स्टाँटन]] ५,००० शिपाई, २०० भाडोत्री घोडेस्वार आणि ३ किलोचे गोळे फेकणाऱ्या २ तोफा घेउन पुण्याच्या वायव्येस [[भीमा नदी]]च्या काठावरील या गावाजवळ आला. स्टाँटनच्या सैन्यात फक्त २४ युरोपियन होते ते सुद्धा तोफा चालवणारे होते. इतर सगळे एतद्देशीय सैनिक होती.{{sfn|Naravane|2006|p=81}} मराठ्यांनी गावाभोवती तटबंदी उभारून मोर्चेबांधणी केली होती. थंडीच्या मोसमात भीमा नदीत फारसे पाणी नव्हते आणि उथळ पाण्यातून ती सहज पार करता येत होती. स्टाँटनने लगेचच गावाचा ताबा घेतला पण मराठ्यांची तटबंदी त्याला सहजासहजी भेदता आली नाही. त्याने गावाचे व मराठ्यांचे पाणी तोडले. मराठ्यांनी तटबंदीतून बाहेर येउन लढाई सुरू केली. गल्ली-बोळांतून चाललेल्या या हातघाईच्या लढाईत प्रत्येक गल्ली दोन्ही पक्षांच्या हातात अनेकदा आली आणि निसटली. मराठ्यांनी ब्रिटिश तोफांचाही ताबा घेतला पण तो त्यांना राखता आला नाही. मराठा सरदार त्र्यंबकजीने लेफ्टनंट चिशोमला ठार मारले व चिशोमने बापू गोखल्यांचा एकुलता एक मुलगा गोविंदच्या मृत्यूचा वचपा काढला. मराठ्यांनी रातोरात गावातून पाय काढला आणि ते पसार झाले. दुसऱ्या ठिकाणी जाउन तेथे पुन्हा झुंजायचा गनिमी कावा त्यांनी अवलंबलिला होता. या लढाईत मराठ्यांचे ५००-६०० सैनिक कामी आले. जनरल स्टाँटनने आपली फौज घेउन पुण्याकडे कूच केली पण तेथ न जाता तो शिरुर येथेच थांबला. जरी या लढाईत ब्रिटिशांचा विजय झालेला दिसत असला तरी प्रत्यक्षात हा निसटताच होता असे त्यांच्या पत्रव्यवहारात दिसून येते. जानेवारी १८१८मधील नोंदींनुसार ''बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या दुसऱ्या बटालियनच्या १ल्या रेजिमेंटचा कमांडर स्टाँटन सुदैवाने आपला मोर्चा परत सेरूरमध्ये परतू शकला आहे. १२५ जखमी, गोरेगाव येथे ५० पुरले आणि तेथे १२ किंवा १५ सोडले, ते गंभीरपणे जखमी झाले; पेशवे दक्षिणेकडे पळत आहेत. जनरल स्मिथ त्यांच्या मागे लागला आहे, यामुळे कदाचित बटालियन वाचली.'' असे दिसते. लढाईनंतर पळालेले पेशवे [[सातारा|साताऱ्याकडे]] गेले.{{sfn|Duff|1921|p=487}} ब्रिटिशांनी पाठपुरावा केल्यावर{{sfn|Duff|1921|p=487}} ते तसेच दक्षिणेकडे जात राहिले. [[मैसूर संस्थान|मैसूरच्या राजाने]] थारा न दिल्याने ते परत फिरले.{{sfn|Duff|1921|p=483}}{{sfn|Duff|1921|p=488}} पाठलाग करणाऱ्या ब्रिटिशांना बगल देत ते परत [[सोलापूर]]कडे आले.{{sfn|Duff|1921|p=488}} २९ जानेवारीपर्यंत हा उंदीर-मांजराचा खेळ सुरू होता. ब्रिटिश पेशव्यांच्या जवळ आले की लगेच गोखल्यांची फिरती शिबंदी त्यांच्यावर बाहेरून हल्ले करीत त्यांना झुलवत नेत असे.{{sfn|Duff|1921|p=489}} अशा अनेक झटापटींनंतरही पेशवे ब्रिटिशांच्या हातील लागलेले नव्हते. === साताऱ्यात ब्रिटिश === ७ फेब्रुवारी रोजी जनरल स्मिथने [[सातारा|साताऱ्यात]] प्रवेश केला आणि [[सातारा संस्थान|छत्रपतींचा राजवाडा]] ताब्यात घेतला व तेथे आपल्या विजय जगाला दाखविण्यासाठी राजवाड्यावर युनियन जॅक चढविला.{{sfn|Duff|1921|p=489}} तेथील जनतेने भडकू नये म्हणून त्याने जाहीर केले की तो कोणत्याही धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. याशिवाय त्याने जाहीर केले की सर्व वतने, इनाम, निवृत्तीवेतन आणि वार्षिक भत्ते आधीप्रमाणेच सुरू ठेवण्यात येतील. हे ऐकून पेशव्यांच्या सेवेत असलेल्या व त्यांच्या बाजूने अद्यापही असलेल्यांनी ही माघार घेतली आणि ब्रिटिशांविरुद्ध कारवाया करणे बंद केले. === आष्टीची लढाई === {{मुख्य लेख|आष्टीची लढाई}} पेशव्यांचा पाठलाग करणाऱ्या जनरल स्मिथला १९ फेब्रुवारी रोजी कळले की पेशवे [[पंढरपूर]]कडे निघाले आहेत. त्याने या फौजेला वाटेत [[आष्टी (मोहोळ)|आष्टी]] गावाजवळ गाठले आणि निकराचा हल्ला केला. पेशवाईने झुंज घेतलेली ही शेवटची लढाई होती. या लढाईत पेशव्यांच्या बचाव करताना सेनापती बापू गोखले मृत्यू पावले. खुद्द [[दुसरे बाजीराव पेशवे|पेशवे]] तेथून निसटले पण [[सातारा संस्थान|साताऱ्याचे छत्रपती]] आणि त्यांच्या आई यांना स्मिथने बंदी केले. परागंदा झालेले पेशवे आणि ब्रिटिश बंदी झालेल्या छत्रपतींमागे एप्रिल १८१८पर्यंत मराठा साम्राज्य नेतृत्त्वहीन झालेले होते. ब्रिटिशांनी याचा फायदा घेत [[सिंहगड]] आणि [[पुरंदर किल्ला|पुरंदर किल्ले]] जिंकून घेतले.{{sfn|Duff|1921|p=517}} यातील सिंहगडाचा पाडाव अगदी केविलवाणा होता. १३ फेब्रुवारी, १८१८ रोजी माउंस्टुअर्ट एल्फिन्स्टनने आपल्या रोजनिशीत केलेल्या नोंदीनुसार सिंहगडावर एकही मराठा शिबंदी नव्हती. त्यांऐवजी किल्ल्याचा बचाव करण्यासाठी १०० [[अरब]], ६०० [[गोसावी]] आणि ४०० कोंकणी सैनिक होती. कोणी एक ११ वर्षांचा पोरगा किल्लेदार होता. किल्ला जिंकून घेतल्यावर तेथील शिबंदीला ब्रिटिशांनी मानाने वागवले. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात खजिना आणि संपत्ती होती आणि किल्लेदाराने जे आपले म्हणले ते त्याला देउन टाकण्यात आले.{{sfn|Duff|1921|p=517}} === नागपुरातील झटापट === [[चित्र:Sitabuldi_fort_gate.JPG|thumb|250x250px|सीताबर्डी किल्ला आज]] {{मुख्य लेख|सिताबर्डीचा किल्ला}} [[नागपूरकर भोसले|नागपूरचे]] नाममात्र राजे [[परसोजी भोसले]] यांच्या हत्येनंतर त्यांचा चुलतभाउ [[मुधोजी भोसले]] तथा ''अप्पासाहेब'' यांनी गादी बळकावली व आपली सत्ता मजबूत केली. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी २७ मे, १८१६ रोजी ब्रिटिशांशी तह केला.{{sfn|Naravane|2006|p=82}} त्यातील [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीरावाशी]] संपर्क न साधण्याचे कलम धुडकावून भोसल्यांनी पेशवाईशी वाटाघाटी सुरू केल्या. यात व्यत्यय आणण्यासाठी रेसिडेन्ट जेंकिन्सने अप्पासाहेबांना रेसिडेन्सीमध्ये बोलावून घेतले. अप्पासाहेबांनी त्याला नकार देउन उघडपणे पेशवाईला आपला पाठिंबा जाहीर केला. आता नागपूरकरांशी लढाई अटळ असल्याचे दिसत असल्याने जेंकिन्सने [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीच्या]] आसपासच्या ठाण्यांकडून मदत मागवली. त्याच्याकडे सुमारे १,५०० सैनिक होते{{sfn|Burton|1908|p=159}} व आता कर्नल अॅडम्स त्याची फौज घेउन नागपूरकडे निघाला.{{sfn|Naravane|2006|p=82}} नागपूरकरांकडे सुमारे १८,००० सैनिक होते.{{sfn|Burton|1908|p=160}} त्यातील काही तुकड्या अरब होत्या. हे त्यांच्या शूरतेसाठी प्रसिद्ध असले तरी त्यांच्यात शिस्त नव्हती व त्यांच्याकडे फक्त तलवारी आणि जुन्यापुराण्या बंदुका होत्या. ब्रिटिश रेसिडेन्सी [[सीताबर्डी किल्ला|सीताबर्डी किल्ल्याच्या]] पश्चिमेस साधारण २५०-३०० मीटर अंतरावर होती. ब्रिटिशांनी लढाईच्या सुरुवातीस टेकडीच्या उत्तर टोका वर ताबा मिळवला.{sfn|Naravane|2006|p=83}} मराठे व अरबांनी त्यांना तेथून दक्षिणेकडे हुसकावून लावले. यानंतर ब्रिटिशांची कुमक येण्यास सुरुवात झाली. आपल्या सर्व शक्तीनिशी ब्रिटिशांनी मराठ्यांवर हल्ला चढवला आणि मराठ्यांचा पराभव केला. यात ब्रिटिशांनी आपल्या २४ युरोपियन आणि एकूण सुमारे ३०० सैनिक गमावले. मराठ्यांचेही तितकेच नुकसान झाले. अप्पासाहेबांनी ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली. ९ जानेवारी रोजी ब्रिटिश आणि नागपूरकरांनी तह केला. त्यानुसार ब्रिटिशांनी भोसल्यांचा बहुतांश प्रदेश आणि किल्ले हिसकावून घेतले आणि त्यांना नाममात्र प्रदेशावर राज्य करण्याची, ते सुद्धा अनेक निर्बंध घालून, परवानगी दिली. ब्रिटिशांनी सीताबर्डी किल्ल्याजवळ अधिक तटबंदी उभारली. काही दिवसांनी काहीतरी कारण काढून अप्पासाहेबांना अटक करण्यात आली. त्यांनी तेथून पलायन केले. काही दिवसांनी आप्पासाहेबांना अटक करण्यात आली व त्यांना [[प्रयागराज|अलाहाबाद]] येथे नेण्यात आले. तेथे जात असताना त्यांनी पलायन केले आणि [[पंजाब]]मधील शीखांकडे आश्रय मागण्यासाठी त्या दिशेने निघाले. शीखांनी अप्पासाहेबांना थारा दिला नाही आणि ते [[जोधपूर]]जवळ पुन्हा ब्रिटिशांच्या हाती लागले. जोधपूरच्या राजा [[मान सिंग]] याने ब्रिटिशांना अप्पासाहेबांची हमी दिली व त्यांना आपल्या आश्रयास ठेवले. अप्पासाहेब वयाच्या ४४व्या वर्षी १५ जुलै, १८४९ रोजी मृत्यू पावले. === होळकरांचा पाडाव === [[File:Map of India 1823.jpg|thumb|तिसरे अँग्लो-मराठा युद्धानंतरचा भारताचा नकाशा, १८१९]] {{हेसुद्धा पाहा|महिदपूरची लढाई}} या सुमारास [[इंदूर संस्थान|इंदूरच्या]] [[होळकर|होळकरांचा]] दरबार रफादफा झालेला होता. ११ वर्षांचे [[तिसरे मल्हारराव होळकर]] आपल्या वडिलांच्या उपवस्त्र असलेल्या [[तुळशीबाई होळकर]] यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य करीत होते. तुळशीबाईने मल्हाररावांना ब्रिटिशांच्या आधीन होण्याचा सल्ला दिल्याने तिच्याच सैनिकांनी तिची हत्या केली. यानंतर ब्रिटिशांनी होळकरांवर चाल केली व इंदूरच्या उत्तरेस ४० किमी अंतरावर [[महिदपूर]] येथे होळकर सैन्याला गाठले. २१ डिसेंबर १८१७ रोजी सकाळी ९ वाजता ब्रिटिश आणि होळकर एकमेकांच्या पल्ल्यात आले.{{sfn|Hough|1853|p=71}} ब्रिटिशांचे नेतृत्त्व स्वतः लेफ्टनंट जनरल [[थॉमस हिस्लॉप]]कडे होते. या निकराच्या लढाईत होळकरांचे ३,००० सैनिक ठार किंवा जखमी झाले.{{sfn|Keightley|1847|p=165}} ब्रिटिशांनी ८०० सैनिक गमावले.{{sfn|Sarkar|Pati|2000|p=48}} यात होळकांच्या सैन्याचा नाश झाला.{{sfn|Prakash|2002|p=136}} त्यातील उरल्यासुरल्या तुकड्यांचा ब्रिटिशांनी दूरवर पाठलाग करून नायनाट केला. मल्हाररावांना अटक करण्यात आली. त्यांच्या मंत्र्यांनी तहाची बोलणी करून त्यांना सोडवायचा प्रयत्न केला. ६ जानेवारी, १८१८ रोजी होळकरांनी [[मंदेश्वरचा तह]] केला{{sfn|Sinclair|1884|pp=195–196}} आणि त्यात ब्रिटिशांची पूर्णपणे शरणागती मागितली.{{sfn|Prakash|2002|p=136}} ब्रिटिशांनी होळकरांचा खजिना लुटून नेला आणि मल्हाररावांना नाममात्र राजा म्हणून सत्तेवर ठेवले.{{sfn|Sinclair|1884|pp=195–196}} == किल्लेदारांचा प्रतिकार == [[File:Asirgarh Fort1.jpg|thumb|असिरगढचा किल्ला]] युद्ध संपताना १८१८ आणि १८१९मध्ये ब्रिटिशांनी जवळजवळ सगळ्या मराठा संस्थानिक आणि जहागिरदारांचा पाडाव केलेला होता परंतु किल्ल्या-किल्ल्यांमधून अद्यापही स्वातंत्र्याचे भगवे झेंडे फडकत होते. संस्थानिक आणि पेशव्यांनी शरणागती पत्करली असली तरी या किल्ल्यांचे किल्लेदार ब्रिटिशांच्या आधीन झालेले नव्हते. २७ फेब्रुवारी, १८१८ रोजी [[थॉमस हिस्लॉप|जनरल हिस्लॉप]] [[थळनेर किल्ला|थळनेरच्या किल्ल्याजवळ]] आला. त्याला वाटले होते की तेथील किल्लेदार मान तुकवून पुढे येईल परंतु थळनेरचे किल्लेदार [[तुळशीराम मामा]] यांनी आपल्या शिबंदीला ब्रिटिशांवर मारा करण्यास फर्मावले. संतापलेल्या हिस्लॉपने किल्ल्याला वेढा घातला व तोफांनी तो भाजून काढला. नंतर तो स्वतः किल्ल्यावर चालून गेला तेथील अरब आणि मराठा सैनिकांना हरवून किल्ला काबीज केला. मामांना विश्वासघात केल्याच्या आरोपाखाली एका झाडावर फाशी देण्यात आले.<ref>Deshpande, Arvind M., ''John Briggs in Maharashtra: A Study of District Administration Under Early British Rule'' (1987), Mittal Publications, {{isbn|978-0836422504}}, pg. 31</ref> त्यानंतर या प्रदेशातील नराळा आणि [[मालेगाव किल्ला|मालेगावचे किल्लेही]] ब्रिटिशांनी जिंकून घेतले. त्यातल्या त्यात मालेगावने त्यांना झुंजवले. १८१९ च्या मार्चमध्ये [[असिरगढ किल्ला|असिरगढचा किल्ला]] हे एकमेव स्वतंत्र ठिकाण होते. तेथील किल्लेदार [[जसवंत राव लार]]ने ब्रिटिशांना थोपवून धरलेले होते. मार्च्या मध्यावर ब्रिटिशांनी भलीथोरली फौज जमवून किल्ल्याला वेढा घातला आणि [[असिरगढ|शेजारील शहरात]] ठाण मांडले. किल्ल्यात फक्त १,२०० सैनिक होते. त्यांच्यावर सतत तोफांचा मारा करूनही ते बाहेर येत नाहीत हे पाहून ब्रिटिशांनी शेवटी ९ एप्रिल, १८१९ रोजी एल्गार केला आणि मराठा साम्राज्याचे शेवटचे ठाणे परास्त केले. या विजयानिशी ब्रिटिशांनी मोहीम संपवली आणि युद्धाचा अंत झाला<ref>{{cite book |last1=Cannon |first1=Richard |title=Historical Record of the 67th Foot |date=1849 |publisher=Parker, Furnivall & Parker |location=London |url=https://www.gutenberg.org/files/57663/57663-h/57663-h.htm#Page_14}}</ref><ref name="mapw" /> ==युद्धाचा अंत आणि त्याचे परिणाम== [[File:Nassak Diamond copy.jpg|thumb|ब्रिटिशांनी पेशव्याकडून नॅसॅक डायमंड ताब्यात घेऊन लंडनला पाठविला]] [[असिरगढ]]च्या पाडावानंतर मराठ्यांचा सगळा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात आला. [[सातारा संस्थान|साताऱ्याच्या छत्रपतींनी]] ब्रिटिशांचे आधिनत्व स्वीकारल्याने पेशवा हे पद बाद झाले. [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीरावाने]] याआधीच ३ जून, १८१८ रोजी शरणागती घेतली होती परंतु पेशवेपद काढून घेतल्यावर त्याने कायदेशीर आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण काहीही फायदा नव्हता. पेशव्यांना त्यांच्या लवाजम्यासकट [[उत्तर भारत|उत्तर भारतातील]] [[कानपूर]] शहराजवळ [[बिठूर]] येथे रवाना केले गेले.{{sfn|Duff|1921|pp=513–514}} बाजीरावाने वार्षिक ८,००,००० रुपयांचे निवृत्तीवेतन स्वीकारले.{{sfn|Duff|1921|p=513}} याशिवाय आपले सरदार, जहागिरदार, कुटुंब, आश्रित आणि देवस्थानांनाही वार्षिक उत्पन्न देण्याचे कबूल करून घेतले.{{sfn|Duff|1921|p=513}} उत्तरेकडे जाताना पेशव्यांनी आपला खजिना बरोबर नेला होता. त्या शिवाय ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात लूट करून प्रचंड संपत्ती नेली. यात [[नासक हिरा]]ही शामिल होता. बिठूरला गेल्यावर बाजीरावाने उरलेले आयुष्य धर्मकार्ये करण्यात, मद्यपानात आणि अजून लग्ने लावून घेण्यात घालवले.{{sfn|Chhabra|2005|p=21}} पेशव्यांच्या या विलासी जीवनशैलीमुळे त्यांच्याशी तह करणाऱ्या [[जॉन माल्कम]]वर टीका झाली. मराठ्यांचा पराभव आणि पेशव्यांची हकालपट्टीने [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]ला भारतात उत्तरेत [[सतलज नदी|सतलज]] नदीपासून [[दक्षिण भारत|दक्षिण भारतापर्यंत]] जवळजवळ अनिर्बंध सत्ता मिळाली. पेशवाईचा प्रदेश [[बॉम्बे प्रेसिडेन्सी]]मध्ये शामिल केला गेला तर पेंढाऱ्यांकडून जिंकलेला प्रदेश [[सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस]] म्हणून नवीन प्रांत केला गेला. [[शिंदे घराणे|शिंदे]] आणि [[होळकर घराणे|होळकरांची]] संस्थाने त्यांच्याकडेच राहिली आणि त्यांनी इंग्रजांचे सार्वभौमत्व स्वीकारले. [[राजपूताना]]मधील संस्थानिक नाममात्र राजे म्हणून ब्रिटिशांच्या सत्तेखाली आले. त्यांनी साताऱ्यामध्ये [[प्रतापसिंह भोसले]] यांना छत्रपती पदावर बसवले. होळकर कुटुंबातील अगदी लहान मुलाची [[नागपूर संस्थान|नागपूरच्या सिंहासनावर]] वर्णी लागली. [[त्र्यंबकजी डेंगळे]], ज्यांच्यावर गंगाधरशास्त्री यांच्या वधाचा आरोप होता व ज्याने हे प्रकरण हाताबाहेर चिघळले, यांना अटक करून बंगालमध्ये पाठवले गेले. सत्तेवर आल्यानंतर [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]]ने अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. नवीन कायद्यांबरोबरच त्याने प्रांतांची पुनर्रचना करून महसूल वसूलीसाठीची नवीन पद्धत आखली, ज्याने [[देशमुख]], [[पाटील]] आणि [[देशपांडे]] यांचे महत्व कमी झाले. ब्रिटिशांना कळले होते की इतक्या मोठ्या प्रदेशावर सत्ता गाजविण्यासाठी स्थानिक रीतीरिवाज आणि भाषेचा अभ्यास आणि आदर करणे गरजेचे आहे. एल्फिन्स्टनने १८२०मध्ये [[मराठी भाषा]] प्रमाणीकरण करण्याचेही सुरू केले. या युद्धानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धापर्यंत]] भारतावर अनिर्बंध सत्ता गाजवली. == हे सुद्धा पहा == * [[खडकीची लढाई]]<ref name="sacred-texts.com"/> * [[मराठा साम्राज्य]] * [[आष्टीची लढाई]] * [[भीमा कोरेगावची लढाई]] * [[मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी]] * [[पहिले इंग्रज-मराठा युद्ध]] * [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध]] * [[ब्रिटिश साम्राज्य]] * [[ब्रिटिश भारत]] * [[भारताचा इतिहास]] * [[शिवाजी महाराज]] {{क्रम |यादी=इंग्रज-मराठा युद्धे |पासून= |पर्यंत= |मागील= [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध]] |पुढील= --- }} == संदर्भ== {{संदर्भयादी}} {{मराठा साम्राज्य}} [[वर्ग:तिसरे इंग्रज-मराठा युद्ध| ]] [[वर्ग:मराठा साम्राज्य सहभागी असलेली युद्धे]] [[वर्ग:ब्रिटिश साम्राज्य]] [[वर्ग:महाराष्ट्रातील ब्रिटिश राजवट]] [[वर्ग:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सहभागी असलेली युद्धे]] ts69z468omsyb6xjum1y1nz6o3jhw2w 2581399 2581388 2025-06-20T22:26:05Z अभय नातू 206 दुवा 2581399 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट सैन्य संघर्ष | संघर्ष = तिसरे आंग्ल-मराठा युद्ध | या युद्धाचा भाग = | चित्र = | चित्र रुंदी = | चित्रवर्णन = खडकीची लढाई | दिनांक =[[नोव्हेंबर ५]] [[इ.स. १८१७|१८१७]] - [[इ.स. १८१९|१८१९]] | स्थान =[[मध्य भारत|मध्य]] आणि [[पश्चिम भारत (प्रदेश)|पश्चिम भारत]] | परिणती = ब्रिटिश विजय | सद्यस्थिती = सगळा प्रदेश [[भारतीय प्रजासत्ताक|भारतीय प्रजासत्ताकाचा]] भाग | प्रादेशिक बदल = [[पेशवे|पेशवाई]]चा अंत, मराठा संस्थानिक आणि [[राजपुताना एजन्सी|राजपुतान्यातील]] राजे ब्रिटिशांचे मांडलिक, [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]ला भारतात अनिर्बंध सत्ता | पक्ष१ = * [[Image:Flag of the Maratha Empire.svg|22px]] [[पेशवा]] * [[File:Flag of Gwalior (State).svg|23px]] [[ग्वाल्हेर संस्थान]] * [[File:Indore Flag.svg|23px]] [[इंदूर संस्थान]] * [[File:Nagpur State Flag.png|23px]] [[नागपूर संस्थान]] * [[File:Flag of the Maratha Empire.svg|23px]] [[पेंढारी]] | पक्ष२ = * [[चित्र:Flag of the British East India Company (1801).svg|22px|border]] [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] * [[File:Flag of the State of Hyderabad (18th century-1900).svg|23px]] [[हैदराबाद संस्थान|निझाम]] | सेनापती१ = * [[Image:Flag of the Maratha Empire.svg|22px]] [[दुसरे बाजीराव पेशवे|दुसरे बाजीराव]], [[बापू गोखले]], [[मोरोपंत दीक्षित]], [[त्र्यंबकजी डेंगळे]] * [[File:Indore Flag.svg|23px]] [[हरीराव होळकर]], [[तिसरे मल्हारराव होळकर]] * [[File:Nagpur State Flag.png|23px]] [[दुसरे मुधोजी भोसले]] * [[File:Flag of Gwalior (State).svg|23px]] [[दौलतराव शिंदे]] | सेनापती२ = - * [[चित्र:Flag of the British East India Company (1801).svg|22px|border]] [[फ्रांसिस रॉडोन-हेस्टिंग्स]], [[जॉन माल्कम]], [[थॉमस हिस्लॉप]] * [[File:Flag of the State of Hyderabad (18th century-1900).svg|23px]] [[तिसरा असफ जाह]] | सैन्यबळ१ =१८,००० [[घोडदळ]]<br /> ८,००० [[पायदळ सैनिक]] | सैन्यबळ२ =२,८०० घोडदळ | टिपा = }} '''तिसरे इंग्रज-मराठा युद्ध''' हे [[इ.स. १८१७]]-१८मध्ये [[मराठा साम्राज्य|मराठे]] व [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|इंग्रजांच्यात]] झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण [[भारत|भारतावर]] नियंत्रण मिळवले. या आधी झालेल्या [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध|दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर]] मराठ्यांना आणि ब्रिटिशांना उसंत मिळाली. त्या दरम्यान ब्रिटिशांनी भारतातील स्वतःची शक्ती वाढवली परंतु मराठ्यांनी एकोपा टिकवला नाही आणि ते ब्रिटिशांच्या तुलनेत मराठे राजनैतिक आणि लष्करीदृष्ट्या कमी पडत गेले. अशा पार्श्वभूमीवर [[भारताचे गव्हर्नर जनरल|गव्हर्नर जनरल]] [[लॉर्ड हेस्टिंग्स]]ची नियुक्ती झाली.<ref>http://www.britannica.com/EBchecked/topic/256745/Francis-Rawdon-Hastings-1st-marquess-of-Hastings</ref>. त्याने आपल्या कारकिर्दीत आक्रमक धोरणाचा अवलंब केला. [[इंग्रज-नेपाळ युद्ध|नेपाळ युद्धाच्या]] समाप्तीनंतर [[पेंढारी]] लोकांशी संघर्ष सुरू करून अप्रत्यक्षरीत्या मराठ्यांनाच आव्हान दिले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=https://dl.dropboxusercontent.com/spa/zohkohb0i282t94/Area%20Studies/public/SouthAsia/Ideas/pindaris.html#init |title=संग्रहित प्रत |access-date=2014-12-09 |archive-date=2016-04-03 |archive-url=https://web.archive.org/web/20160403073709/https://dl.dropboxusercontent.com/spa/zohkohb0i282t94/Area%20Studies/public/SouthAsia/Ideas/pindaris.html#init |url-status=dead }}</ref> या व इतर अनेक कारणांमुळे इंग्रज आणि मराठ्यांमध्ये पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पडली. अखेर पेशव्याने अंतिम युद्ध करण्याचा निर्णय घेतला.त्याला अप्पासाहेब भोसले आणि [[मल्हारराव होळकर]] ([[यशवंतराव होळकर|यशवंतराव होळकरांचा]] पुत्र) यांनी साथ दिली.पण युद्धात [[पेशवा]],[[भोसले]] आणि [[होळकर घराणे|होळकरांना]] एकत्र येऊ न देता त्यांना इंग्रजांनी वेगवेगळे पराभूत केले. [[सीताबर्डीची लढाई|सीताबर्डीच्या लढाईत]] [[नागपूरकर भोसले|भोसल्यांचा]], [[महिदपुरची लढाई|महिदपुरच्या लढाईत]] होळकरांचा आणि [[खडकीची लढाई|खडकी]]<ref name="sacred-texts.com">http://www.sacred-texts.com/hin/odd/odd29.htm</ref>, [[कोरेगाव]] व [[आष्टीची लढाई|आष्टा]] येथील लढाईत पेशव्यांचा पराभव झाला. अशा प्रकारे एक एक करीत मराठे इंग्रजांसमोर हरले व सर्वांनी शरणागती पत्करली. हेस्टिंग्सने भोसले, [[पेशवा]] [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीराव दुसरा]] आणि [[शिंदे घराणे|शिंदे]] यांना अपमानजनक तह स्वीकारण्यास भाग पडले. बाजीरावाला पेशवेपद सोडावे लागले आणि त्याचा प्रदेश इंग्रजांनी आपल्या साम्राज्यात विलीन केला. छत्रपतींचे [[सातारा]] राज्य व इतर [[मराठा]] सरदारांच्या प्रदेशावर [[ब्रिटिश]] नियंत्रण प्रस्थापित झाले आणि खऱ्या अर्थाने [[मराठा]] सत्तेची समाप्ती झाली. [[नागपूर संस्थान|नागपूरच्या]] [[मुधोजी भोसले दुसरे]] आणि [[इंदूर संस्थान|इंदूरचे]] [[मल्हारराव होळकर तिसरे]] यांच्या पाठिंब्याने [[पेशवा बाजीराव दुसरा|पेशवा बाजीराव दुसऱ्याच्या]] सैन्याने [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध]] जोरदार हल्ला केला. [[ग्वाल्हेर संस्थान|ग्वाल्हेरचे]] चौथे मोठे मराठा नेते [[दौलतराव शिंदे]] यांनी [[राजस्थान]]वरील नियंत्रण गमावले असले तरीही त्यांनी राजस्थानला दबाव आणि मुत्सद्देगिरीने तटस्थ राहण्याचे पटवून दिले. ब्रिटिशांच्या निर्णायक विजयाने [[मराठा साम्राज्य]] फुटले आणि स्वराज्याचा अंत झाला. पेशवेच्या सैन्याने शक्य तितका प्रतिकार करीत इंग्रजांना रोखण्यासाठी अनेक लहान लढाया लढल्या. शेवटी इंग्रजांनी पेशवाई ताब्यात घेतली आणि दुसऱ्या बाजीरावाला [[कानपूर]]जवळील [[बिठूर]] येथे एका लहान जहागिरीला तडीपार करण्यात आले आले. पेशवाईचा बहुतांश प्रदेश [[बॉम्बे प्रेसिडेन्सी|मुंबई प्रेसिडेंसीमध्ये]] विलीन केला गेला. साताराच्या महाराजांना त्यांच्या संस्थानावर कायम ठेवले गेले. १८४८ मध्ये [[लॉर्ड डलहौसी]]च्या [[डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स]]च्या बनावाखाली बॉम्बे प्रेसिडेन्सीने सातारा संस्थानसुद्धा खालसा केले. [[नागपूर मेट्रो|नागपूर]] व भोवतालच्या राजवटीचा उरलेला भाग, तसेच [[बुंदेलखंड]]मधील पेशव्याचे प्रदेश [[ब्रिटिश राज|ब्रिटिश भारताचे]] [[सौगोर प्रांत|सौगोर]] आणि [[नेरबुद्दा प्रांत]] म्हणून जोडले गेले. ब्रिटिशांनी होळकरांचे [[इंदूर संस्थान|इंदूर]] शिंद्यांचे [[ग्वाल्हेर संस्थान|ग्वाल्हेर]] व पेशव्यांच्या हुकुमतीतील [[झांंसी संस्थान|झांसी]] ही संस्थाने आपल्या अंमलात आणली. ==मराठे आणि इंग्रज== [[चित्र:Joppen1907India1805a-21.jpg|thumb|285x285px|दुसरे अँग्लो-मराठा युद्धानंतरचा १८०५मधील भारताचा नकाशा]] [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांनी]] १६७४ मध्ये स्थापन केलेल्या [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याने]] [[आदिलशाही|विजापूर]], [[निजामशाही|हैदराबाद]] आणि [[मुघल साम्राज्य|दिल्लीच्या मुस्लिस सल्तनतींच्या]] नाकावर टिच्चून स्वराज्य राखले होते. स्थापनेनंतर काही दशकांतच मराठा साम्राज्य भारतातील एक प्रमुख सत्ता झाले. [[रायगड (किल्ला)|रायगड]] किल्ल्यावर राजधानी असलेल्या या साम्राज्याचे व्यवस्थापन आठ मंत्र्यांच्या मंडळाद्वारे ([[अष्टप्रधान]]) केले जात असे. त्यांतील पंतप्रधान पदावर असलेल्या मंत्र्याला [[पेशवे]] हा खिताब होता. कालांतराने मराठा साम्राज्याची सत्ता पेशव्यांच्या हातात आली व [[छत्रपती]] हे नाममात्र राजे उरले. === ब्रिटिशांचा वाढता प्रभाव === [[चित्र:Sir Joshua Reynolds (1723-92) - Francis Rawdon-Hastings (1754-1826), Second Earl of Moira and First Marquess of Hastings - RCIN 407508 - Royal Collection.jpg|200px|इवलेसे|डावे|फ्रांसिस रॉडोन-हेस्टिंग्स, हेस्टिंग्सचा पहिला मार्क्वेस]] अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मराठे आणि [[मुघल साम्राज्य|मोगलांमध्ये]] भारतावरील वर्चस्वासाठी सतत लढाया होत होत्या. या दरम्यान ब्रिटिशांनी [[मुंबई]], [[मद्रास]] आणि [[कोलकाता]] येथे छोट्या छोट्या वखारी स्थापल्या व तेथून व्यापार व पुढे राजकारण करणे सुरू केले. मे १७३९ मध्ये मुंबईजवळील [[वसई]] येथे [[वसईची लढाई|मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केल्याचे]] पाहून ब्रिटिशांनी मुंबईतील आपली आरमारी शिबंदी मजबूत केली. मराठ्यांना मुंबईपासून दूर ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी मराठ्यांशी तहाची बोलणी करण्यासाठी दूत पाठवले. या वाटाघाटींमधून आणि १२ जुलै, १७३९ रोजी एक करार मंजूर झाला, ज्याकरवे [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]ला मराठ्यांच्या प्रदेशात मुक्त व्यापार करण्याचे अधिकार मिळाले. इंग्रज आणि मराठ्यांच्यातील करार पाहून दक्षिणेस [[हैदराबाद]]च्या [[निजामशाही|निजामने]] मराठ्यांविरूद्धच्या युद्धासाठी [[फ्रेंच भारत|फ्रेंच लोकांची]] मदत घेतली. यामुळे पुन्हा पेशव्यांनी इंग्रजांकडून मदत मागितली परंतु इंग्रजांनी त्याला नकार दिला. तरीसुद्धा मराठ्यांनी पुढील पाच वर्षांत निझामाचा पराभव करण्यास यश मिळविले. १७५० ते १७६१ च्या काळात ब्रिटिशांनी भारतात [[फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी]]चा पराभव केला आणि १७९३ पर्यंत त्यांनी पूर्वेकडील [[बंगाल वॉरियर्स|बंगाल]] व दक्षिणेत [[चेन्नई|मद्रास]]मध्ये आपली सत्ता ठाम केली. इकडे पश्चिमेकडे मराठ्यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांच्या महत्त्वाकांक्षेला आळा बसला होता. परंतु ते समुद्रामार्गे पश्चिम किनाऱ्यावरील [[सुरत]]मध्ये दाखल झाले. त्यांचे साम्राज्य वाढत असताना मराठ्यांनी [[सिंधु नदी|सिंधूच्या]] पलीकडे कूच केले. उत्तरेकडील विस्तारित मराठा साम्राज्याची जबाबदारी पेशव्यांनी [[शिंदे घराणे|शिंदे]] आणि [[इंदूर संस्थान|होळकराकडे]] सोपवली होती. पुढे जाता या दोन्ही संस्थानांनी मराठा साम्राज्याऐवजी स्वतःचे स्वार्थ पुढे करणे पसंत केले. त्यांनी साम्राज्याचा [[राजपूत]], [[जाट]] आणि [[रोहिला]] व इतर हिंदू राज्यकर्त्यांपासून बचाव केला असला तरी मुस्लिम आक्रमकांविरुद्ध ते निष्प्रभ होते. १४ जानेवारी, १७६१ रोजी [[पानिपतची तिसरी लढाई|पानिपत येथे]] अफगाण [[अहमद शाह अब्दाली]]विरुद्ध मराठा साम्राज्याचा सडकून पराभव झाला. त्यात मराठा सरदारांची एक संपूर्ण पिढी कापून काढली गेली व साम्राज्य मोडकळीस आले. त्यानंतर [[माधवराव पेशवे|माधवराव पेशव्यांच्या]] अंमलात १७६१ ते १७७३ दरम्यान मराठ्यांनी उत्तरेकडील घालवलेला मोठा प्रदेश परत मिळवला. === आंग्ल-मराठा संबंध === १९७७मध्ये पेशव्यांच्या कौटुंबिक कलह आणि सत्तासंघर्षातून [[नारायणराव पेशवे|मारायणराव पेशव्यांची]] [[नारायणराव पेशव्यांची हत्या|हत्या झाल्यावर]] पेशव्यांचे लक्ष उत्तर आणि मध्य भारताकडे नव्हते. त्यातच होळकर आणि शिंदे यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे [[पुणे|पुण्याची]] सत्ता मध्य भारतात नाममात्रच होती. नारायणरावानंतर पेशवेपदी आलेल्या [[रघुनाथराव पेशवे|रघुनाथरावाला]] वाटले की शिंदे-होळकर थेट पेशव्यांच्या सत्तेलाच आव्हान देतील. याला शह देण्यासाठी त्याने इंग्रजांकडून मदत मागितली. यासाठी इंग्रजांनी [[सुरतेचा करार|सुरतेला करार]] मान्य करून घेतला. यानुसार [[साळशेत बेट]] (आताच्या [[मुंबई]]चा मोठा भाग) आणि [[वसईचा किल्ला]] इंग्रजांच्या हवाली केले गेले आणि इंग्रजांनी पेशव्यांना पाठिंबा जाहीर केला. या कराराचा भारत आणि [[इंग्लंड]]मधील ब्रिटिश सत्तावर्तुळांमध्ये खळबळ माजली. [[ब्रिटिश राजतंत्र|ब्रिटिश राजतंत्राने]] [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीला]] भारतात व्यापार करण्याचा मक्ता दिलेला होता परंतु तेथील सार्वभौम राजांशी इंग्लंडच्या वतीने असे करार करणे हे कायदेबाह्य होते. या कराराच्या अटींवरून [[पहिले इंग्रज-मराठा युद्ध]] पेटले. दोन्ही बाजू तुल्यबळ असल्याने हे युद्ध अनेक वर्षे रखडले. शेवटी [[महादजी शिंदे|महादजी शिंद्यांनी]] मध्यस्थी करून १७८२मध्ये [[सालबाईचा करार]] घडवून हे युद्ध थांबवले. यात इंग्रजांची जरी थेट सरशी झाली नसली तरी [[वॉरेन हेस्टिंग्स]]ने दूरदृष्टी वापरून शिंदे, भोसले आणि पेशवे यांच्यात दुही निर्माण केली. १७८६मध्ये [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनी]]ने [[लॉर्ड कॉर्नवॉलिस]] याला [[भारताचे गव्हर्नर जनरल|भारतातील प्रदेशांचा गव्हर्नर जनरल]] म्हणून नेमले. त्यावेळी [[मराठा साम्राज्य]] मजबूत स्थितीतच होते. [[सालबाईचा तह|सालबाईच्या तहानंतर]] ब्रिटिशांनी [[उत्तर भारत|उत्तर भारतात]] कुरापती न काढता मराठ्यांच्या बरोबरीने राहण्याचे धोरण अवलंबिले. [[पुणे|पुण्यात]] या वेळी ११ वर्षांचा [[सवाई माधवराव पेशवे|सवाई माधवराव]] पेशवेपदावर होता व त्याच्या मंत्री [[नाना फडणवीस|नाना फडणवीसांनी]] मुत्सद्दीपणाने ब्रिटिश, [[निजामशाही|निजाम]], [[फ्रेंच भारत|फ्रेंच]], [[पोर्तुगीज भारत|पोर्तुगीज]], [[शिंदे घराणे|शिंदे]], [[इंदूर संस्थान|होळकर]] व इतर सत्तांशी समतोल साधून ठेवलेला होते. १८०० साली फडणवीसांच्या मृत्यूनंतर पेशवाईत अनागोंदी माजली. शिंदे-होळकर संघर्षात पेशव्यांनी शिंद्यांची बाजू घेतल्याचे वाटून होळकरांनी १८०१मध्ये थेट पुण्यावर हल्ला केला. [[दुसरे बाजीराव पेशवे|पेशवा दुसऱ्या बाजीरावाने]] पुण्यातून ब्रिटिश आरमाराच्या मदतीने पलायन केले. आपली पेशवाई आणि सत्ता गमावण्याची भीती वाटून बाजीरावाने [[वसईचा तह|वसईच्या तहावर]] शिक्कामोर्तब केले. यानुसार पेशवे आता खुद्द शासक न राहता इंग्रजधार्जिणे झाले. याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे आणि [[नागपूरकर भोसले|भोसल्यांनी]] इंग्रजांनी हल्ला केला व १८०३मध्ये [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध]] सुरू झाले. यात इंग्रजांनी मराठा सरदारांचा सडकून पराभव केला व मराठ्यांनी आपला बव्हंश प्रदेश इंग्रजांच्या स्वाधीन केला. === ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी === हजारो मैलांवरून आलेल्या ब्रिटिशांनी भारतीय भूगोलाचा अभ्यास केलेला होता आणि स्थानिक लोकांशी व्यापार करण्यासाठी आणि नंतर त्यांच्यावर सत्ता गाजविण्यासाठी येथील भाषा शिकून घेतलेल्या होत्या. त्यांच्याकडील त्याकाळील अद्ययावत असे तंत्रज्ञान होते आणि भारतातील परिस्थितीत प्रभावीपणे वापरण्यासाठीची शस्त्रे त्यांनी आणलेली होती. काही संशोधकांच्या मते जरी ब्रिटिशांकडे अद्ययावत तंत्रज्ञान नसते तरीही त्यांच्यातील शिस्त व संघटनेच्या जोरावर त्यांनी भारतीयांविरुद्धची बव्हंश युद्धे जिंकली असती. त्याचबरोबर त्यांचा मुत्सद्दीपणा आणि संधिसाधूपणाही त्यांच्या यशाला कारणीभूत होते. [[पहिले इंग्रज-मराठा युद्ध|पहिल्या इंग्रज-मराठा युद्धानंतर]] [[वॉरन हेस्टिंग्स|वॉरेन हेस्टिंग्स]]ने जाहीर केले की मराठ्यांबरोबरचा तह अनेक वर्ष अबाधित राहील. परंतु त्याचबरोबर त्याने [[पुणे|पुण्यातील]] [[पेशवे|पेशव्यांच्या]] दरबारात [[चार्ल्स मॅलेट]] या स्थानिक रीतीरिवाज माहिती असलेल्या व्यापाऱ्याला राजदूत म्हणून नेमले. यायोगे हेस्टिंग्सला पेशव्यांशी सतत संपर्क ठेवायचा होता तसेच तेथील बितंबातमीही काढून आणायची होती. == तिसऱ्या युद्धाची पार्श्वभूमी == [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर]] [[पेशवे|पेशव्यांची]] सत्ता मुख्यत्वे महाराष्ट्रात ''देशा''वर पसरलेली होती. [[कृष्णा नदी|कृष्णा]] आणि [[गोदावरी नदी|गोदावरी नद्यांची]] खोरी आणि त्यांमधील [[सह्याद्री]]च्या पठारावरील प्रदेश हा त्यांच्या थेट अंमलाचा प्रदेश होता. त्यांचे सरदार असलेले [[इंदूर संस्थान|होळकर]] [[इंदूर|इंदूरात]] असून त्यांची सत्ता [[नर्मदा खो|नर्मदा खोऱ्यात]] होती. [[शिंदे घराणे|शिंदे]] [[ग्वाल्हेर]] आणि [[बुंदेलखंड]], [[गंगेचे खोरे|गंगेच्या खोऱ्याच्या]] दक्षिणेकडील टेकड्या आणि सुपीक मैदाने तसेच आसपासच्या प्रदेशावर हुकुमत गाजवत होते. [[चंबळ नदी|चंबळच्या]] दऱ्या, जंगले, [[विंध्य पर्वतरांग|विंध्य पर्वतरांगेच्या]] उत्तरेस आणि आत्ताच्या [[मध्य प्रदेश]]च्या वायव्य भागातील प्रदेश, [[माळवा]] पठार या भागांतून पेंढाऱ्यांचे राज्य होते. === खिळखिळे होत चाललेले मराठा सैन्य === [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर]] मराठा साम्राज्याचा प्रभाव आणि शक्ती काही अंशाने कमी झाली होती.{{sfn|Chhabra|2005|p=39}} युद्धानंतर त्यांनी आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण करण्याकडे दुर्लक्ष केले आणि नवीन तंत्रज्ञान न अजमावता त्याच त्याच जुन्या, कालबाह्य युद्धनीतींवर भर दिला.{{sfn|Chhabra|2005|p=39}} मराठ्यांचा तोफखाना जुन्यापुराण्या तोफांवर भर देउन होता. यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे म्हणजे कठीण काम होते. याउलट युरोपीयनांचा तोफखाना गतिशील आणि भेदक होता. जरी काही प्रमाणात मराठ्यांनी नवीन शस्त्रे अंगिकारली असली तरी ती सगळी आयात केलेली होती. ही हाताळणारे कुशल लोक परदेशी होते. एतद्देशीयांनी ही शस्त्रे स्वतः तयार करण्याचा कधी प्रयत्न केला नाही किंवा त्यांचे तंत्रज्ञानही आत्मसात केले नाही. मराठ्यांचे गुप्तहेर खाते कुशल नव्हते आणि नाना फडणवीसांचा काळ सोडता त्यांच्याकडील मुत्सद्दी देशातील संपूर्ण चित्र पाहण्यास असमर्थ होते. मराठ्यांची घातक पथके [[पेंढारी]] व इतर भाडोत्री सैनिकांनी भरलेली होते. या साम्राज्याला एक वाली नव्हता. खुद्द छत्रपतींच्याही दोन गाद्या होत्या -- [[सातारा संस्थान|सातारा]] आणि [[कोल्हापूर संस्थान|कोल्हापूर]]. [[पश्चिम महाराष्ट्र]] सोडता इतर सगळे प्रदेश तेथील सरदारांच्या अंमलात होते आणि त्यांवर एकसूत्र थेट कारभार अशक्य होता. [[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांचे]] एकछत्री मराठा साम्राज्य आता कॉन्फेडरसी{{मराठी शब्द सुचवा}}मध्ये परिवर्तित झाले होते आणि एकजुटीने परकीय शत्रूशी युद्ध करण्यासाठीची एकता नष्ट झालेली होती.{{sfn|Chhabra|2005|p=39}} === ब्रिटिशांची कारस्थाने === [[चित्र:Mountstuart-Elphinstone.jpg|left|thumb|माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]] मराठा साम्राज्य ढासळत असताना [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनी]] आपली शक्ती वाढवत होती. दुसऱ्या युद्धातील आपल्या विजयाचा पुरेपूर उपयोग करून घेत त्यांनी मराठ्यांना आपल्या टाचेखाली ठेवले होते. जरी [[दुसरे बाजीराव पेशवे|दुसरा बाजीराव]] साम्राज्याचा पेशवा असला तरी पेशव्यांच्या बाजूने असलेले अनेक सरदार, जहागिरदार आणि संस्थानिक ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली किंवा संरक्षणाखाली गेलेले होते. याचा फायदा घेत ब्रिटिशांनी [[बडोदा संस्थान|बडोद्याच्या]] [[गायकवाड घराणे|गायकवाडांबरोबर]] करार करून त्यांच्या संस्थानातील महसूलाचा भाग पेशवाईपर्यंत पोचू नये अशी व्यवस्था केली. यामुळे भडकलेल्या पेशव्यांशी बोलणी करण्यासाठी गायकवाडांनी गंगाधर शास्त्री यांना आपले दूत म्हणून पुण्याला पाठवले. तेथे असताना त्यांची हत्या झाली. या हत्येमागे पेशवाईतील मंत्री [[त्र्यंबक डेंगळे]] असल्याचा संशय गायकवाड आणि ब्रिटिशांनी व्यक्त केला. या प्रकरणाला उचलून धरत ब्रिटिशांनी बाजीरावाला [[पुणे करार (१८८७)|एक करार]] करणे भाग पाडले.{{sfn|Naravane|2006|pp=79–80}} १३ जून, १८८७ रोजी शिक्कामोर्तब झालेल्या या करारानुसार बाजीरावाला गायकवाडांवरील वादावर पडदा टाकणे, त्र्यंबक डेंगळे यांनी गुन्हा कबूल करणे आणि बडोद्याच्या महसूलीवर पाणी सोडणे भाग पडले. याशिवाय पेशवाईने मोठा प्रदेश ब्रिटिशांच्या स्वाधीन केला. यात महाराष्ट्रातील अनेक बेलाग किल्ले आणि [[कोंकण|कोंकणातील]] किनारपट्टी ब्रिटिशांच्या घशात गेली आणि [[नर्मदा नदी|नर्मदेच्या]] उत्तरेस आणि [[तुंगभद्रा नदी|तुंगभद्रेच्या]] दक्षिणेकडील पेशवाईचा सगळा प्रदेश ब्रिटिश आधिपत्याखाली आला. आणि पेशव्यांनी भारतातील इतर कोणत्याही संस्थानाशी वाटाघाटी करू नये असेही मान्य करून घेतले.{{sfn|Chhabra|2005|p=17}} इतकेच नव्हे तर पेशवाईतील ब्रिटिश रेसिडेंट [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]]ने पेशव्यांना आपले घोडदळ बरखास्त करणे भाग पाडून मराठा सैन्याचे कंबरडेच मोडले.{{sfn|Chhabra|2005|p=17}}{{sfn|Naravane|2006|pp=79–80}} === पेंढारी === {{हेसुद्धा पाहा|पेंढारी}} [[File:Malwa_India_1823.png|thumb|१८२३ च्या भारतातील चित्रणात माळव्याचे स्थान. १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात पेंढारी या भागात होते]] पेंढारी किंवा पिंडारी या भारतात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत रयतेची लूटमार व वाटमार करणाऱ्या संघटित टोळ्या होत्या, ज्यात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाचे लोक होते. यांपैकी पेंढाऱ्यांच्या सशस्त्र संघटित टोळ्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने उदयास आल्या.{{sfn|Naravane|2006|pp=86–87}} घोड्यांवरून आपल्या कारवाया करणारे पेंढारी शिंदेशाही किंवा होळकरशाही असत. अंदाजे ३३,००० शिबंदी असलेल्या{{sfn|Naravane|2006|p=86}} पेंढाऱ्यांच्या सरदारांमध्ये चिटू, तुलसी, इमाम बक्ष, साहिब खान, कादिर बक्ष, नाथू आणि बापू हे होळकरशाही तर करीम खान, दोस्त मोहम्मद हे शिंदेशाही होते. [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर]] शिंदे व होळकर यांनी आपले बरेचसे प्रांत ब्रिटिशांच्या स्वाधीन केले. त्याचा वचपा म्हणून शिंदे आणि होळकरांनी पेंढाऱ्यांना ब्रिटिश प्रांतावर आक्रमण करण्यास उद्युक्त केले. यांच्या धाडींमुळे त्रस्त झालेल्या रयतेला आपले गुजराण करणे अशक्य झाले.{{sfn|Russell|1916|p=396}} उपासमारी किंवा पेंढाऱ्यांना जाउन मिळणे असे दोनच पर्याय त्यांना उरले. १८१५मध्ये सुमारे २५,००० पेंढाऱ्यांची टोळधाड [[मद्रास प्रेसिडेन्सी]]मधील [[कोरोमंडल|कोरोमांडल]] किनाऱ्यालगतच्या प्रदेशावर चालून गेली आणि तेथील ३०० गावे लुटून मारली. अजून एक धाड निजामाच्या हद्दीत तर तिसरी मलबारवर पडली व तेथेही त्यांनी अशीच जाळपोळ केली. १८१७ पर्यंत पेंढाऱ्यांनी ब्रिटिश प्रदेशात छापेमारी सुरू ठेवली. पेंढाऱ्यांचा नायनाट करणे हाच एक उपाय ब्रिटिशांना होता. == व्यूहरचना आणि नियोजन == === मराठा साम्राज्य === [[चित्र:RaigadFort1.jpg|thumb|रायगड किल्ल्यावर जुन्या वाड्याचे अवशेष]] [[पुणे करार (१८१३)|पुणे करारांतर्गत]] पेशव्यांनी आपले घोडदळ बरखास्त केले होते परंतु गुप्तपणे त्यांना सात महिन्यांचे आगाऊ वेतन देउन पेशवाईच्या दिमतीस येण्यास फर्मावले.{{sfn|Naravane|2006|p=80}} बाजीरावने [[बापू गोखले]] यांच्यावर येऊ घातलेल्या युद्धाच्या तयारीची जबाबदारी सोपविली.{{sfn|Duff|1921|pp=468–469}} गोखल्यांनी घोडदळाबरोबरच गुप्ततेतच पायदळाची सुद्ध भरती सुरू केली. यांत [[भिल्ल समाज|भिल्ल]] आणि [[रामोशी]] सैनिकांचा भरणा होता.{{sfn|Duff|1921|p=468}} अगदी पेंढाऱ्यांनाही भाडोत्री सैनिक होण्याचा प्रयत्न केला गेला.{{sfn|Duff|1921|p=468}} ऑगस्ट १८७१मध्ये त्यांनी [[सिंहगड]], [[पुरंदर किल्ला|पुरंदर]] आणि [[रायगड (किल्ला)|रायगड]] किल्ल्यांची डागडुजी करून ते भांडते केले.{{sfn|Duff|1921|p=468}} लष्करी तयारीबरोबरच काही मुत्सद्देगिरीचे ही प्रयत्न झाले. पेशव्यांनी भोसले, शिंदे आणि होळकर यांना पुन्हा आपल्या गोटात येण्याचे आवाहन केले. जसवंतराव घोरपडे सारख्या एल्फिन्स्टनच्या नोकरीतील नाराज एतद्देशीय लोकांचा माग काढून त्यांना गुप्तपणे भरती केले गेले. अशा इतर काही शिपायांनी पेशव्यांना नकार दिला आणि उलट आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पेशव्यांची आगळीक उघड केली.{{sfn|Duff|1921|p=474}}{{sfn|Duff|1921|p=470}} पेशव्यांनी थेट युरोपीयांच्यात फूट पाडणेही अजमावले परंतु ते मात्र शक्य झाले नाही.{{sfn|Duff|1921|p=470}} [[दुसरे बाजीराव पेशवे|पेशवा बाजीराव दुसऱ्याने]] १९ ऑक्टोबर, १८१७ रोजी [[विजयादशमी|दसऱ्याच्या]] उत्सवात मोठे सैन्य जमा केले.{{sfn|Naravane|2006|p=80}} कवायतीदरम्यान घोड्यावर स्वार असलेल्या सैनिकांनी एल्फिन्स्टनच्या दिशेने एल्गार केला परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी मोर्चा वळवला.{{Sfn|Duff|1921|p=471}} [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन|एल्फिन्स्टनला]] धाक दाखवणे आणि त्याच्या नोकरीत असलेल्या एतद्देशीय शिपायांना पेशव्यांच्या बाजूने लढण्यासाठी मनोबळ देणे हा या हिकमतीचा उद्देश होता.{{Sfn|Duff|1921|p=471}}{{sfn|Duff|1921|p=471}} पेशव्यांनी एल्फिन्स्टनची हत्या करण्याचाही कट रचला होता. [[बापू गोखले|गोखल्यांचा]] याला विरोध होता परंतु ही योजना पुढे चालली पण उघडकीला येण्याचा संशय आल्यावर उधळून टाकण्यात आली.{{sfn|Naravane|2006|p=80}} १८१७ च्या सुमारास मराठा साम्राज्याच्या सैन्यदलाचा अंदाज १ बर्टन यांच्या मते असा होता -- पायदळ: अंदाजे ८१,०००. घोडदळ: १,०६०००. तोफा: ५८९. [[पुणे|पुण्यामध्ये]] [[पेशवे|पेशव्यांकडे]] १४,००० शिपाई, २८,००० घोडेस्वार आणि ३७ तोफा होत्या. होळकरांकडे ८,००० सैनिक, २०,००० घोडेस्वार आणि १०७ तोफा होत्या. [[ग्वाल्हेर]]मध्ये [[शिंदे घराणे|शिंदे]] आणि [[इंदूर|इंदूरात]] [[इंदूर संस्थान|होळकरांकडे]] अनुक्रमे १६,००० आणि १८,००० सैनिक; १५,००० आणि १६,००० घोडेस्वार आणि एकूण सुमारे २०० तोफा होत्या. यांशिवाय अफगाण सरदार आमिर खानकडे [[राजपुताना|राजपुतान्यातील]] [[टोंक]] येथे १०,००० सैनिक, १२,००० घोडेस्वार आणि २०० तोफा होत्या{{sfn|Burton|1908|p=153}}{{sfn|Burton|1908|p=153}}{{sfn|Bakshi|Ralhan|2007|p=261}}{{sfn|United Service Institution of India|1901|p=96}} [[चंबळ नदी|चंबळ]] आणि [[माळवा]] तसेच [[नर्मदा खोरे|नर्मदा खोऱ्यांतील]] शिंदेशाही [[पेंढारी]] सरदार चिटू, करीम खान आणि दोस्त मोहम्मद यांच्याकडे अनुक्रमे १०,०००, ६,००० आणि ४,००० सैनिक होते परंतु यांच्याकडे शस्त्रे म्हणजे फक्त भाले होते. होळकरशाही पेंढारी सरदार तुळशी, इमाम बक्ष, साहिब खान, कादिर बक्ष, नथू आणि बापू यांच्यात मिळून २१,५०० सैनिक आणि सुमारे ४,००० घोडेस्वार होते.{{sfn|Naravane|2006|pp=86–87}} === ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी === गायकवाडांच्या राजदूत गंगाधर शास्त्री यांची हत्या म्हणजे पेशव्यांनी भारतातील ब्रिटिश सत्तेला दिलेले आव्हान समजून त्यांचे साम्राज्य गिळण्यासाठी [[फ्रांसिस रॉडोन-हेस्टिंग्स|रॉडोन-हेस्टिंग्सने]] भारतात मोठ्या सैन्याची जमवाजमव सुरू केली.<ref name="mapw">{{cite book |last1=Burton |first1=R.G. |title=The Mahratta And Pindari War |date=1910 |publisher=Government Press |location=Simla |url=https://archive.org/details/in.ernet.dli.2015.284400/mode/2up}}</ref> ब्रिटिशांची भारतातील तोपर्यंतची ही सगळ्यात मोठी फौज होती. १,२०,००० शिबंदी असलेल्या या सैन्याची रचना रॉडोन-हेस्टिंग्सच्या हाताखालील ग्रँड आर्मी तथा बेंगाल आर्मी आणि जनरल [[थॉमस हिस्लॉप]]च्या हाताखालील आर्मी ऑफ द डेक्कन या दोन सैन्यांची मिळवणी होती.{{sfn|Bakshi|Ralhan|2007|p=259}} यात एतद्देशीय सैनिकांच्या ६० बटालियन, ब्रिटिश सैन्याच्या रेजिमेंटमधून रचलेल्या अनेक बटालियन, घोडदळ आणि ड्रगूनच्या अनेक तुकड्या, तोफखाना, इ.चा समावेश होता. ग्रँड आर्मीच्या ४०,००० सैनिकांच्या या फौजेचे तीन विभाग आणि एक अतिरिक्त राखीव विभाग केले गेले. यांतील डाव्या विभागाचे नेतृत्त्व मेजर जनरल मार्शल, मध्य विभाग रॉडोन-हेस्टिंग्स कडे होेते. सैनिक, आर्मी ऑफ द डेक्कनचे ७०,००० सैनिक पाच विभागांत होते. यांचे नेतृत्त्व ब्रिगेडियर जनरल डव्हजन, जनरल हिस्लॉप, जनरल माल्कम ब्रिगेडियर जनरल स्मिथ आणि लेफ्टनंट कर्नल अॅडम्स यांच्याकडे असल्याची नोंद आहे. याव्यतिरिक्त [[चेन्नई|मद्रास]] आणि [[पुणे विमानतळ|पुणे]] येथे दोन बटालियन आणि तोफखान्याच्या तुकड्याही तैनात होत्या. [[मद्रास रेसिडेन्सी]]मध्ये ६ व्या बंगाल घोडदळातील अतिरिक्त तीन तुकड्याही तयारीत होत्या. या सगळ्या सैन्याकडे अद्ययावत शस्त्रे होती तसेच त्यांचे रसदमार्ग उत्तमपणे आखलेले होते. इकडे सैन्य गोळा करीत असताना ब्रिटिशांनी शिंदे, होळकर आणि आमिर खान यांच्याशी बोलणी सुरू केली. या तिन्ही संस्थानातील [[पेंढारी]] ब्रिटिश प्रदेशात धुमाकूळ घालत होते आणि या तिघांनीही [[नेपाळचे राजे|नेपाळच्या राजाबरोबर]] संधान साधून ब्रिटिशांविरुद्ध युती करण्याची बोलणी सुरू केलेली होती.{{sfn|Sinclair|1884|pp=194–195}} याबाबतचा गुप्त पत्रव्यवहार ब्रिटिशांनी पकडला. यावरून त्यांनी संस्थानिकांना पेचात पाडले आणि पेंढाऱ्यांविरुद्ध ब्रिटिशांना मदत करणे आणि पेंढाऱ्यांच्या नवीन टोळ्या उभ्या न होऊ देणे यासाठी ब्रिटिशांनी संस्थानिकांना [[ग्वाल्हेरचा करार|वचन देणे]] भाग पाडले. हा करार, प्रचंड मोठे सैन्याचा दबाव आणि मुत्सद्दीगिरी वापरून ब्रिटिशांनी शिंदे आणि होळकरांना युद्ध सुरू होण्याआधीच बाजूला केले. राजपुतान्यातील आमिर खानला त्याची टोंकची रियासत अबाधित ठेवण्याचे वचन देउन ब्रिटिशांनी त्यालाही परस्पर दूर केले. आमिर खानने ब्रिटिशांवर विश्वास ठेवून आपली सेना बरखास्त केली तोफा ब्रिटिशांना विकून टाकल्या. याशिवाय आपल्या प्रदेशातून पेंढाऱ्यांना हाकलून देण्याचेही कबूल केले.{{sfn|Sinclair|1884|pp=194–195}} ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीस ब्रिटिशांनी ग्रँड आर्मीचा एक विभाग [[सिंधुदुर्ग|सिंध]], दुसरा [[चंबळ विभाग|चंबळ]] आणि तिसरा [[नर्मदेचे खोरे|नर्मदेच्या खोऱ्याच्या]] पूर्व भागात पाठवला. यांचे काम शिंदे आणि होळकर तसेच पेशव्यांच्या मध्ये राखून त्यांची हातमिळवणी रोखणे हा होता. राखीव विभागाने [[राजपुताना|राजपुतान्यात]] आमिर खानच्या हालचालींवर नजर ठेवलेली होती. आर्मी ऑफ द डेक्कनचा पहिला आणि तिसरा विभाग [[हरदा]] येथे ठाण मांडून होता. तेथून ही फौज आसपासच्या किल्ल्यांना शह देउन होती. दुसरा विभाग [[मलारपूर]] येथून [[बेरार घाट|बेरार घाटावर]] लक्ष ठेवून होता तर चौथा विभाग [[पुणे]] आणि [[अमरावती]]च्या आसपासच्या प्रदेशांवर जरब ठेवीत होता. पाचवा विभाग [[होशंगाबाद]] येथे तैनात करण्यात आला. राखीव विभाग [[भीमा नदी|भीमा]] आणि [[कृष्णा नदी|कृष्णा नद्यांच्या]] दोआबात दबा धरून बसला होता. अशा प्रकारे ब्रिटिशांनी मराठ्यांची पूर्णपणे नाकेबंदी करून ठेवलेली होती. == युद्धातील प्रमुख लढाया == [[चित्र:Richard_Colley_Wellesley.jpg|thumb|[[रिचर्ड वेलस्ली (पहिला मार्क्वेस वेलस्ली)|रिचर्ड वेलेस्ली]], पहिला मार्क्वेस वेलेस्लीने आंग्ल-मराठा युद्धात विजय मिळवून कंपनीच्या प्रदेशाचा भारतात विस्तार केला]] काही इतिहासकारांच्या मते तिसरे युद्ध हे [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसऱ्या युद्धाचे]] खरकटे काढण्यासाठीचे होते. ब्रिटिशांना ते पूर्वीच संपवता आले नाही कारण त्यांचे पैसे आणि मनुष्यबळ त्या युद्धाच्या शेवटी कमी पडले.{{sfn|Black|2006|pp=77–78}} परंतु हे सुद्ध लक्षात घेण्याजोगे आहे की ब्रिटिशांनी तिसऱ्या युद्धासाठी कसून तयारी केली होती. त्यासाठी त्यांनी प्रचंड मनुष्यबळ, शस्त्रे, पैसे आणि व्यूहरचना खर्ची घातलेले होते. तिसऱ्या युद्धाची सुरुवात ब्रिटिशांनी पेंढाऱ्यांचा नायनाट करायचा या कथित उद्देशाने केली. === पेंढाऱ्यांवरील हल्ला === १८१७ च्या उन्हाळा व पावसाळ्यात मजबूत नाकेबंदी केल्यावर ब्रिटिश फौजांनी वर्ष संपताना [[पेंढारी|पेंढाऱ्यांच्या]] प्रदेशात आक्रमण केले. जंगलातून आणि खेड्यापाड्यातून राहणाऱ्या पेंढाऱ्यांशी समोरासमोर दोन हात करणे शक्य नाही हे ब्रिटिशांना कळून चुकले होते व त्यांनी व्यूहात्मक हालचाली करीत पेंढाऱ्यांना पश्चिम आणि दक्षिणेकडून दाबण्यास सुरुवात केली. पेंढाऱ्यांची लूटमार व जाळपोळ करण्याची पद्धत पाहून ब्रिटिशांना वाटले होते की या प्रदेशात रसद मिळणे अशक्य आहे म्हणून त्यांनी आपले रसदमार्ग भक्कम केलेले होते. पेंढारी प्रदेशात आल्यावर त्यांना येथे मुबलक प्रमाणात अन्नसाठा आणि इतर रसद मिळून आली व त्यामुळे त्यांची बाजू अधिकच भक्कम झाली.<ref name="mapw" /> पेंढाऱ्यांच्या एकेका गाव, वस्ती आणि अड्ड्यांना घेरा घालत जनरल हिस्लॉप दक्षिणेकडून चालून आला आणि त्याने पेंढाऱ्यांना नर्मदेपलीकडे हुसकावून लावले. रॉडोन-हेस्टिंग्स त्याच्या सैन्यासह येथे दबा धरून बसलेला होता.{{sfn|Sinclair|1884|pp=195–196}} या कचाट्यात सापडलेले करीम खानचे टोळके बेचिराख झाले. ब्रिटिशांनी मोक्याच्या ठिकाणी आपले सैन्य लावलेले असल्यामुळे पेंढाऱ्यांना त्यांच्याच प्रदेशत मुक्त संचार करणे अशक्य झाले व एकमेकांच्या मदतील ते येऊ शकले नाहीत. मुख्य रस्ते बंद झाल्याने त्यांच्या टोळधाडीही बंद झाल्या आणि ते विखुरले. फक्त भाल्यानिशी असलेल्या पेंढाऱ्यांचा प्रशिक्षित ब्रिटिश सैन्याच्या रायफली आणि तोफांसमोर टिकाव लागला नाही. त्यांचे छोट्या छोट्या टोळ्या करून ब्रिटिशांचा वेढा फोडण्याचे प्रयत्न सुद्धा फसले. आता ते पूर्णपणे कोपऱ्यात अडकलेले होते.{{citation needed|date=March 2022}} यापुढे ब्रिटिशांनी हा वेढा आवळायला सुरुवात केली आणि पेंढाऱ्यांच्या टोळ्यांना एक एक करून चेचणे सुरू केले. जरी त्यांचे २३,००० सैनिक उरले असले तरी त्यांच्याकडून एकसंध हल्ला होत नव्हता व केलेले हल्ले ब्रिटिश सैन्य लीलया परतवून लावत होते. पेंढाऱ्यांनी गावागावातून आश्रय घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या पूर्वीच्या क्रुरतेची आठवण ठेवून गावकऱ्यांनी त्यांना थारा दिला नाही. अनेक ठिकाणी त्यांनी पेंढाऱ्यांना पकडून ठार मारले.{{sfn|Sinclair|1884|pp=195–196}} पेंढाऱ्यांनी जंगलाकडे पळ काढला पण तरीही त्यांच्यामागचा ससेमिरा चुकला नाही. त्यांना अपेक्षित मराठ्यांची मदतही आली नाही कारण शिंदे आणि होळकरांना ब्रिटिशांनी ग्वाल्हेरच्या तहाने शह दिलेला होता. एकेकाळी बलाढ्य आणि दहशत पसरवणारे पेंढारी सरदारांचा आता शिकार सुरू झाला. फेब्रुवारी १८१८पर्यंत जवळजवळ सगळ्या मुख्य सरदारांची वासलात लावली गेली. करीम खानने रॉडोन-हेस्टिंग्ससमोर आत्मसमर्पण केले. त्याला गोरखपूर येथे छोटी जमीन देउन तडीपार करण्यात आले. वासिल खानने लढा सुरू ठेवला परंतु ब्रिटिशांच्या हातील लागण्याआधीच त्याने विष घेउन आत्महत्या करून घेतली.{{sfn|Keightley|1847|p=165}} जॉन माल्कमने सेतूचा पिच्छा पुरवला व एक-एक करीत त्याचे साथीदार टिपून मारले. एकटा पडलेल्या सेतूने जंगलात आश्रय घेतला आणि तेथे तो एका नरभक्षी वाघाचा शिकार झाला.{{sfn|Travers|1919|p=19}}{{sfn|Sinclair|1884|p=196}}{{sfn|Hunter|1909|p=495}} मध्य भारतातील गावकऱ्यांमध्ये दहशत पसरवणाऱ्या या पेंढाऱ्यांचा नायनाट केल्यामुळे त्यांच्याकडून ब्रिटिशांना सहानुभूती मिळाली. === खडकीची लढाई === [[File:Battle of Kirki, 1817.jpg|thumb|खडकीची लढाई, १८१७]] {{मुख्य लेख|खडकीची लढाई}} [[चित्र:Battle of khadaki.svg|left|thumb|300px| खडकीच्या लढाईतील दोन्ही सैन्यांची व्यूहरचना]] ब्रिटिश आपली फौज [[मध्य भारत|मध्य भारतात]] [[पेंढारी|पेंढाऱ्यांच्या]] मागावर लावत असल्याने त्यांची दक्षिणेतील कुमक कमी झाली होती. ही संधी साधत [[पेशवे|पेशव्यांनी]] [[पुणे|पुण्याजवळ]] त्यांच्यावर असावध असताना हल्ला करण्याचे ठरवले. या सुमारास ब्रिटिशांचे फक्त १,००० पायदळ सैनिक आणि २,००० घोडेस्वार तसेच ८ तोफा पुण्याजवळ दापोडी व बोपोडी येथे तैनात होते. पेशव्यांनी २०,००० घोडेस्वार आणि ८,००० पायदळ सैनिक पुण्यात जमा केले व दिमतीला २० तोफाही होत्या.<ref name="Naravane">{{cite book |last=Naravane |first=M. S. |title=Battles of the Honorourable East India Company (Making of the Raj) |publisher=A.P.H. Publishing Corporation |year=2014 |isbn=9788131300343 |location=New Delhi |pages=80–82}}</ref> ही सगळी हालचाल पेशवे पर्वती टेकडीवरून दुर्बिणीतून पहात होते. त्यांच्यासोबत हुजुरातीतील ५,००० घोडेस्वार आणि १,००० सैनिक होते. खडकीच्या टेकडीवर ब्रिटिशांचे टेहळे होते. चतुःश्रृंगी टेकडी आणि खडकी टेकडी यांच्यामधील गणेशखिंडीतून मराठ्यांची चाल होणार होती. अनेक ठिकाणी उथळ असलेली मुळा नदी ओलांडून तेथील ओढे व नाल्यांमधून पुढे सरकत ब्रिटिशांना मागून घेरण्याचा मराठ्यांचा व्यूह होता. ५ नोव्हेंबर, १८१७ रोजी संध्याकाळी ४ वाजता सरदार विंचूरकरांनी ब्रिटिश रेसिडेंट [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]]च्या बंगल्यावर हल्ला केला. हा बंगला आत्ताच्या [[शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे)|शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या]] आवारात होता. तोफांचा मारा सुरू होताच एल्फिन्स्टन पळून [[दापोडी]]कडे गेला. त्यानंतर लगेचच मराठे आवारात घुसले व नासधूस करून ते पेटवून दिले. एल्फिन्स्टन दापोडीला पोचताच त्याने [[बोपोडी]] येथील सैन्याला ताबडतोब कूच करून दापोडीला यायचा हुकुम दिला. ही फौज तेथून पुढे सरकली. मराठ्यांनी [[गणेशखिंड|गणेशखिंडीजवळून]] ब्रिटिशांच्या उजव्या अंगावर चाल केली. मराठ्यांना वाटले होते की इतकी प्रचंड (दहापट) सेना अचानक चाल करून येताना पाहून ब्रिटिश गांगरतील पण तसे न होता ब्रिटिश सैनिकांनी ठिय्या मारला आणि प्रतिकार सुरू केला. मराठ्यांनी हल्ला करायच्या सुरुवातीलाच त्यांचा जरी पटक्याचे निशाण मोडले होते. हा अपशकुन मनात होता म्हणून किंवा ब्रिटिशांचा आवेश पाहून मराठ्यांनी स्वतःच कच खाल्ली. हे पाहून सेनापती [[बापू गोखले]] स्वतः घोड्यावरून लढणाऱ्या तुकड्यांमधून फिरू लागले. त्यांनी सैनिकांना प्रोत्साहन देउन आणि प्रसंगी टोमणे मारून आपली फळी पुढ सरकावयचा प्रयत्न केला. ब्रिटिशांच्या उजव्या बाजूने पुढे सरकत त्यांना घेरण्याचा गोखल्यांचा बेत फसला. घोडेस्वारांचा हा एल्गार ब्रिटिशांसमोरच्या दलदलीत अडकला आणि शत्रूच्या रायफलांनी त्यांच्यावर निशाणबाजी सुरू केली. त्यातूनही सुटून काही मराठा स्वारांनी शत्रूवर धडक मारली परंतु तेथे ते संगीनींनी कापले गेले. उरलेल्या मराठ्यांनी पळ काढला. या गर्दीत गोखल्यांच्या घोड्याला गोळी लागली व त्यांना पायउतार व्हावे लागले. [[मोरोपंत दिक्षीत]] आणि सरदार रास्ते यांनी शत्रूच्या डाव्या फळीवर हल्ला चढवला पण तेथे आता ब्रिटिशांच्या रायफली सज्ज होत्या. मोरोपंत दिक्षीतांना रणांगणावर गोळ्या घालून मारण्यात आले. नेतृत्त्वहीन मराठ्यांनी तेथूनही माघार घेतली. संध्याकाळी ४ वाजता सुरू झालेली ही लढाई चार तासांत संपली. यात मराठ्यांचे सुमारे ५०० सैनिक आणि घोडेस्वार धारातीर्थी पडले तर ८६ ब्रिटिश सैनिक कामी आले.{{sfn|Murray|1901|p=324}}{{sfn|Chhabra|2005|p=19}} ब्रिटिशांनी ही संधी न दवडता लगेच पुण्यावर चाल करून शहराला वेढा घातला. === पेशव्यांचे पलायन === ब्रिटिशांनी [[पुणे|पुण्याकडे]] चाल केलेली पाहून [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीरावाने]] [[हुजुरत]] घेउन [[पुरंदर किल्ला|पुरंदरकडे]] पलायन केले.{{sfn|Duff|1921|p=482}} १३ नोव्हेंबरला जनरल स्मिथ सध्याच्या [[डेक्कन कॉलेज]]च्या जवळील आपल्या छावणीतून मुळा नदी ओलांडून [[घोरपडी]] येथे आला. पेशव्यांच्या पाठलाग रोखण्यासाठी [[बापू गोखले|बापू गोखल्यांनी]] त्याच्याशी झटापटी सुरू ठेवल्या. विंचूरकरांची ५,०००ची फौज मुळा-[[मुठा नदी|मुठेच्या]] फौजेला संगमावर थांबलेली होती. त्याला न जुमानता स्मिथ पुण्यात शिरला. पुण्यात त्याला काहीही प्रतिकार झाला नाही. १७ नोव्हेंबर, १८१७ रोजी ब्रिटिशांनी [[शनिवार वाडा|शनिवार वाड्यात]] प्रवेश करून त्यावर [[युनियन जॅक]] फडकाविला. इकडे पेशवे पुरंदरावरून [[सातारा|साताऱ्याकडे]] आणि नंतर [[कोरेगांव भीमा]] येथे गेले. कोतवाली चावडीवरील भगवे झेंडे तसेच ठेवले गेले. ते आष्टीच्या लढाईनंतर उतरवण्यात आले. १ जानेवारी, १८१८ रोजी ब्रिटिशांनी मराठ्यांना कोरेगावला गाठले. [[एफ‌.एफ. स्टाँटन|कॅप्टन स्टाँटन]] ५,००० शिपाई, २०० भाडोत्री घोडेस्वार आणि ३ किलोचे गोळे फेकणाऱ्या २ तोफा घेउन पुण्याच्या वायव्येस [[भीमा नदी]]च्या काठावरील या गावाजवळ आला. स्टाँटनच्या सैन्यात फक्त २४ युरोपियन होते ते सुद्धा तोफा चालवणारे होते. इतर सगळे एतद्देशीय सैनिक होती.{{sfn|Naravane|2006|p=81}} मराठ्यांनी गावाभोवती तटबंदी उभारून मोर्चेबांधणी केली होती. थंडीच्या मोसमात भीमा नदीत फारसे पाणी नव्हते आणि उथळ पाण्यातून ती सहज पार करता येत होती. स्टाँटनने लगेचच गावाचा ताबा घेतला पण मराठ्यांची तटबंदी त्याला सहजासहजी भेदता आली नाही. त्याने गावाचे व मराठ्यांचे पाणी तोडले. मराठ्यांनी तटबंदीतून बाहेर येउन लढाई सुरू केली. गल्ली-बोळांतून चाललेल्या या हातघाईच्या लढाईत प्रत्येक गल्ली दोन्ही पक्षांच्या हातात अनेकदा आली आणि निसटली. मराठ्यांनी ब्रिटिश तोफांचाही ताबा घेतला पण तो त्यांना राखता आला नाही. मराठा सरदार त्र्यंबकजीने लेफ्टनंट चिशोमला ठार मारले व चिशोमने बापू गोखल्यांचा एकुलता एक मुलगा गोविंदच्या मृत्यूचा वचपा काढला. मराठ्यांनी रातोरात गावातून पाय काढला आणि ते पसार झाले. दुसऱ्या ठिकाणी जाउन तेथे पुन्हा झुंजायचा गनिमी कावा त्यांनी अवलंबलिला होता. या लढाईत मराठ्यांचे ५००-६०० सैनिक कामी आले. जनरल स्टाँटनने आपली फौज घेउन पुण्याकडे कूच केली पण तेथ न जाता तो शिरुर येथेच थांबला. जरी या लढाईत ब्रिटिशांचा विजय झालेला दिसत असला तरी प्रत्यक्षात हा निसटताच होता असे त्यांच्या पत्रव्यवहारात दिसून येते. जानेवारी १८१८मधील नोंदींनुसार ''बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या दुसऱ्या बटालियनच्या १ल्या रेजिमेंटचा कमांडर स्टाँटन सुदैवाने आपला मोर्चा परत सेरूरमध्ये परतू शकला आहे. १२५ जखमी, गोरेगाव येथे ५० पुरले आणि तेथे १२ किंवा १५ सोडले, ते गंभीरपणे जखमी झाले; पेशवे दक्षिणेकडे पळत आहेत. जनरल स्मिथ त्यांच्या मागे लागला आहे, यामुळे कदाचित बटालियन वाचली.'' असे दिसते. लढाईनंतर पळालेले पेशवे [[सातारा|साताऱ्याकडे]] गेले.{{sfn|Duff|1921|p=487}} ब्रिटिशांनी पाठपुरावा केल्यावर{{sfn|Duff|1921|p=487}} ते तसेच दक्षिणेकडे जात राहिले. [[मैसूर संस्थान|मैसूरच्या राजाने]] थारा न दिल्याने ते परत फिरले.{{sfn|Duff|1921|p=483}}{{sfn|Duff|1921|p=488}} पाठलाग करणाऱ्या ब्रिटिशांना बगल देत ते परत [[सोलापूर]]कडे आले.{{sfn|Duff|1921|p=488}} २९ जानेवारीपर्यंत हा उंदीर-मांजराचा खेळ सुरू होता. ब्रिटिश पेशव्यांच्या जवळ आले की लगेच गोखल्यांची फिरती शिबंदी त्यांच्यावर बाहेरून हल्ले करीत त्यांना झुलवत नेत असे.{{sfn|Duff|1921|p=489}} अशा अनेक झटापटींनंतरही पेशवे ब्रिटिशांच्या हातील लागलेले नव्हते. === साताऱ्यात ब्रिटिश === ७ फेब्रुवारी रोजी जनरल स्मिथने [[सातारा|साताऱ्यात]] प्रवेश केला आणि [[सातारा संस्थान|छत्रपतींचा राजवाडा]] ताब्यात घेतला व तेथे आपल्या विजय जगाला दाखविण्यासाठी राजवाड्यावर युनियन जॅक चढविला.{{sfn|Duff|1921|p=489}} तेथील जनतेने भडकू नये म्हणून त्याने जाहीर केले की तो कोणत्याही धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. याशिवाय त्याने जाहीर केले की सर्व वतने, इनाम, निवृत्तीवेतन आणि वार्षिक भत्ते आधीप्रमाणेच सुरू ठेवण्यात येतील. हे ऐकून पेशव्यांच्या सेवेत असलेल्या व त्यांच्या बाजूने अद्यापही असलेल्यांनी ही माघार घेतली आणि ब्रिटिशांविरुद्ध कारवाया करणे बंद केले. === आष्टीची लढाई === {{मुख्य लेख|आष्टीची लढाई}} पेशव्यांचा पाठलाग करणाऱ्या जनरल स्मिथला १९ फेब्रुवारी रोजी कळले की पेशवे [[पंढरपूर]]कडे निघाले आहेत. त्याने या फौजेला वाटेत [[आष्टी (मोहोळ)|आष्टी]] गावाजवळ गाठले आणि निकराचा हल्ला केला. पेशवाईने झुंज घेतलेली ही शेवटची लढाई होती. या लढाईत पेशव्यांच्या बचाव करताना सेनापती बापू गोखले मृत्यू पावले. खुद्द [[दुसरे बाजीराव पेशवे|पेशवे]] तेथून निसटले पण [[सातारा संस्थान|साताऱ्याचे छत्रपती]] आणि त्यांच्या आई यांना स्मिथने बंदी केले. परागंदा झालेले पेशवे आणि ब्रिटिश बंदी झालेल्या छत्रपतींमागे एप्रिल १८१८पर्यंत मराठा साम्राज्य नेतृत्त्वहीन झालेले होते. ब्रिटिशांनी याचा फायदा घेत [[सिंहगड]] आणि [[पुरंदर किल्ला|पुरंदर किल्ले]] जिंकून घेतले.{{sfn|Duff|1921|p=517}} यातील सिंहगडाचा पाडाव अगदी केविलवाणा होता. १३ फेब्रुवारी, १८१८ रोजी माउंस्टुअर्ट एल्फिन्स्टनने आपल्या रोजनिशीत केलेल्या नोंदीनुसार सिंहगडावर एकही मराठा शिबंदी नव्हती. त्यांऐवजी किल्ल्याचा बचाव करण्यासाठी १०० [[अरब]], ६०० [[गोसावी]] आणि ४०० कोंकणी सैनिक होती. कोणी एक ११ वर्षांचा पोरगा किल्लेदार होता. किल्ला जिंकून घेतल्यावर तेथील शिबंदीला ब्रिटिशांनी मानाने वागवले. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात खजिना आणि संपत्ती होती आणि किल्लेदाराने जे आपले म्हणले ते त्याला देउन टाकण्यात आले.{{sfn|Duff|1921|p=517}} === नागपुरातील झटापट === [[चित्र:Sitabuldi_fort_gate.JPG|thumb|250x250px|सीताबर्डी किल्ला आज]] {{मुख्य लेख|सिताबर्डीचा किल्ला}} [[नागपूरकर भोसले|नागपूरचे]] नाममात्र राजे [[परसोजी भोसले]] यांच्या हत्येनंतर त्यांचा चुलतभाउ [[मुधोजी भोसले]] तथा ''अप्पासाहेब'' यांनी गादी बळकावली व आपली सत्ता मजबूत केली. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी २७ मे, १८१६ रोजी ब्रिटिशांशी तह केला.{{sfn|Naravane|2006|p=82}} त्यातील [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीरावाशी]] संपर्क न साधण्याचे कलम धुडकावून भोसल्यांनी पेशवाईशी वाटाघाटी सुरू केल्या. यात व्यत्यय आणण्यासाठी रेसिडेन्ट जेंकिन्सने अप्पासाहेबांना रेसिडेन्सीमध्ये बोलावून घेतले. अप्पासाहेबांनी त्याला नकार देउन उघडपणे पेशवाईला आपला पाठिंबा जाहीर केला. आता नागपूरकरांशी लढाई अटळ असल्याचे दिसत असल्याने जेंकिन्सने [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीच्या]] आसपासच्या ठाण्यांकडून मदत मागवली. त्याच्याकडे सुमारे १,५०० सैनिक होते{{sfn|Burton|1908|p=159}} व आता कर्नल अॅडम्स त्याची फौज घेउन नागपूरकडे निघाला.{{sfn|Naravane|2006|p=82}} नागपूरकरांकडे सुमारे १८,००० सैनिक होते.{{sfn|Burton|1908|p=160}} त्यातील काही तुकड्या अरब होत्या. हे त्यांच्या शूरतेसाठी प्रसिद्ध असले तरी त्यांच्यात शिस्त नव्हती व त्यांच्याकडे फक्त तलवारी आणि जुन्यापुराण्या बंदुका होत्या. ब्रिटिश रेसिडेन्सी [[सीताबर्डी किल्ला|सीताबर्डी किल्ल्याच्या]] पश्चिमेस साधारण २५०-३०० मीटर अंतरावर होती. ब्रिटिशांनी लढाईच्या सुरुवातीस टेकडीच्या उत्तर टोका वर ताबा मिळवला.{sfn|Naravane|2006|p=83}} मराठे व अरबांनी त्यांना तेथून दक्षिणेकडे हुसकावून लावले. यानंतर ब्रिटिशांची कुमक येण्यास सुरुवात झाली. आपल्या सर्व शक्तीनिशी ब्रिटिशांनी मराठ्यांवर हल्ला चढवला आणि मराठ्यांचा पराभव केला. यात ब्रिटिशांनी आपल्या २४ युरोपियन आणि एकूण सुमारे ३०० सैनिक गमावले. मराठ्यांचेही तितकेच नुकसान झाले. अप्पासाहेबांनी ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली. ९ जानेवारी रोजी ब्रिटिश आणि नागपूरकरांनी तह केला. त्यानुसार ब्रिटिशांनी भोसल्यांचा बहुतांश प्रदेश आणि किल्ले हिसकावून घेतले आणि त्यांना नाममात्र प्रदेशावर राज्य करण्याची, ते सुद्धा अनेक निर्बंध घालून, परवानगी दिली. ब्रिटिशांनी सीताबर्डी किल्ल्याजवळ अधिक तटबंदी उभारली. काही दिवसांनी काहीतरी कारण काढून अप्पासाहेबांना अटक करण्यात आली. त्यांनी तेथून पलायन केले. काही दिवसांनी आप्पासाहेबांना अटक करण्यात आली व त्यांना [[प्रयागराज|अलाहाबाद]] येथे नेण्यात आले. तेथे जात असताना त्यांनी पलायन केले आणि [[पंजाब]]मधील शीखांकडे आश्रय मागण्यासाठी त्या दिशेने निघाले. शीखांनी अप्पासाहेबांना थारा दिला नाही आणि ते [[जोधपूर]]जवळ पुन्हा ब्रिटिशांच्या हाती लागले. जोधपूरच्या राजा [[मान सिंग]] याने ब्रिटिशांना अप्पासाहेबांची हमी दिली व त्यांना आपल्या आश्रयास ठेवले. अप्पासाहेब वयाच्या ४४व्या वर्षी १५ जुलै, १८४९ रोजी मृत्यू पावले. === होळकरांचा पाडाव === [[File:Map of India 1823.jpg|thumb|तिसरे अँग्लो-मराठा युद्धानंतरचा भारताचा नकाशा, १८१९]] {{हेसुद्धा पाहा|महिदपूरची लढाई}} या सुमारास [[इंदूर संस्थान|इंदूरच्या]] [[होळकर|होळकरांचा]] दरबार रफादफा झालेला होता. ११ वर्षांचे [[तिसरे मल्हारराव होळकर]] आपल्या वडिलांच्या उपवस्त्र असलेल्या [[तुळशीबाई होळकर]] यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य करीत होते. तुळशीबाईने मल्हाररावांना ब्रिटिशांच्या आधीन होण्याचा सल्ला दिल्याने तिच्याच सैनिकांनी तिची हत्या केली. यानंतर ब्रिटिशांनी होळकरांवर चाल केली व इंदूरच्या उत्तरेस ४० किमी अंतरावर [[महिदपूर]] येथे होळकर सैन्याला गाठले. २१ डिसेंबर १८१७ रोजी सकाळी ९ वाजता ब्रिटिश आणि होळकर एकमेकांच्या पल्ल्यात आले.{{sfn|Hough|1853|p=71}} ब्रिटिशांचे नेतृत्त्व स्वतः लेफ्टनंट जनरल [[थॉमस हिस्लॉप]]कडे होते. या निकराच्या लढाईत होळकरांचे ३,००० सैनिक ठार किंवा जखमी झाले.{{sfn|Keightley|1847|p=165}} ब्रिटिशांनी ८०० सैनिक गमावले.{{sfn|Sarkar|Pati|2000|p=48}} यात होळकांच्या सैन्याचा नाश झाला.{{sfn|Prakash|2002|p=136}} त्यातील उरल्यासुरल्या तुकड्यांचा ब्रिटिशांनी दूरवर पाठलाग करून नायनाट केला. मल्हाररावांना अटक करण्यात आली. त्यांच्या मंत्र्यांनी तहाची बोलणी करून त्यांना सोडवायचा प्रयत्न केला. ६ जानेवारी, १८१८ रोजी होळकरांनी [[मंदेश्वरचा तह]] केला{{sfn|Sinclair|1884|pp=195–196}} आणि त्यात ब्रिटिशांची पूर्णपणे शरणागती मागितली.{{sfn|Prakash|2002|p=136}} ब्रिटिशांनी होळकरांचा खजिना लुटून नेला आणि मल्हाररावांना नाममात्र राजा म्हणून सत्तेवर ठेवले.{{sfn|Sinclair|1884|pp=195–196}} == किल्लेदारांचा प्रतिकार == [[File:Asirgarh Fort1.jpg|thumb|असिरगढचा किल्ला]] युद्ध संपताना १८१८ आणि १८१९मध्ये ब्रिटिशांनी जवळजवळ सगळ्या मराठा संस्थानिक आणि जहागिरदारांचा पाडाव केलेला होता परंतु किल्ल्या-किल्ल्यांमधून अद्यापही स्वातंत्र्याचे भगवे झेंडे फडकत होते. संस्थानिक आणि पेशव्यांनी शरणागती पत्करली असली तरी या किल्ल्यांचे किल्लेदार ब्रिटिशांच्या आधीन झालेले नव्हते. २७ फेब्रुवारी, १८१८ रोजी [[थॉमस हिस्लॉप|जनरल हिस्लॉप]] [[थळनेर किल्ला|थळनेरच्या किल्ल्याजवळ]] आला. त्याला वाटले होते की तेथील किल्लेदार मान तुकवून पुढे येईल परंतु थळनेरचे किल्लेदार [[तुळशीराम मामा]] यांनी आपल्या शिबंदीला ब्रिटिशांवर मारा करण्यास फर्मावले. संतापलेल्या हिस्लॉपने किल्ल्याला वेढा घातला व तोफांनी तो भाजून काढला. नंतर तो स्वतः किल्ल्यावर चालून गेला तेथील अरब आणि मराठा सैनिकांना हरवून किल्ला काबीज केला. मामांना विश्वासघात केल्याच्या आरोपाखाली एका झाडावर फाशी देण्यात आले.<ref>Deshpande, Arvind M., ''John Briggs in Maharashtra: A Study of District Administration Under Early British Rule'' (1987), Mittal Publications, {{isbn|978-0836422504}}, pg. 31</ref> त्यानंतर या प्रदेशातील नराळा आणि [[मालेगाव किल्ला|मालेगावचे किल्लेही]] ब्रिटिशांनी जिंकून घेतले. त्यातल्या त्यात मालेगावने त्यांना झुंजवले. १८१९ च्या मार्चमध्ये [[असिरगढ किल्ला|असिरगढचा किल्ला]] हे एकमेव स्वतंत्र ठिकाण होते. तेथील किल्लेदार [[जसवंत राव लार]]ने ब्रिटिशांना थोपवून धरलेले होते. मार्च्या मध्यावर ब्रिटिशांनी भलीथोरली फौज जमवून किल्ल्याला वेढा घातला आणि [[असिरगढ|शेजारील शहरात]] ठाण मांडले. किल्ल्यात फक्त १,२०० सैनिक होते. त्यांच्यावर सतत तोफांचा मारा करूनही ते बाहेर येत नाहीत हे पाहून ब्रिटिशांनी शेवटी ९ एप्रिल, १८१९ रोजी एल्गार केला आणि मराठा साम्राज्याचे शेवटचे ठाणे परास्त केले. या विजयानिशी ब्रिटिशांनी मोहीम संपवली आणि युद्धाचा अंत झाला<ref>{{cite book |last1=Cannon |first1=Richard |title=Historical Record of the 67th Foot |date=1849 |publisher=Parker, Furnivall & Parker |location=London |url=https://www.gutenberg.org/files/57663/57663-h/57663-h.htm#Page_14}}</ref><ref name="mapw" /> ==युद्धाचा अंत आणि त्याचे परिणाम== [[File:Nassak Diamond copy.jpg|thumb|ब्रिटिशांनी पेशव्याकडून नॅसॅक डायमंड ताब्यात घेऊन लंडनला पाठविला]] [[असिरगढ]]च्या पाडावानंतर मराठ्यांचा सगळा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात आला. [[सातारा संस्थान|साताऱ्याच्या छत्रपतींनी]] ब्रिटिशांचे आधिनत्व स्वीकारल्याने पेशवा हे पद बाद झाले. [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीरावाने]] याआधीच ३ जून, १८१८ रोजी शरणागती घेतली होती परंतु पेशवेपद काढून घेतल्यावर त्याने कायदेशीर आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण काहीही फायदा नव्हता. पेशव्यांना त्यांच्या लवाजम्यासकट [[उत्तर भारत|उत्तर भारतातील]] [[कानपूर]] शहराजवळ [[बिठूर]] येथे रवाना केले गेले.{{sfn|Duff|1921|pp=513–514}} बाजीरावाने वार्षिक ८,००,००० रुपयांचे निवृत्तीवेतन स्वीकारले.{{sfn|Duff|1921|p=513}} याशिवाय आपले सरदार, जहागिरदार, कुटुंब, आश्रित आणि देवस्थानांनाही वार्षिक उत्पन्न देण्याचे कबूल करून घेतले.{{sfn|Duff|1921|p=513}} उत्तरेकडे जाताना पेशव्यांनी आपला खजिना बरोबर नेला होता. त्या शिवाय ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात लूट करून प्रचंड संपत्ती नेली. यात [[नासक हिरा]]ही शामिल होता. बिठूरला गेल्यावर बाजीरावाने उरलेले आयुष्य धर्मकार्ये करण्यात, मद्यपानात आणि अजून लग्ने लावून घेण्यात घालवले.{{sfn|Chhabra|2005|p=21}} पेशव्यांच्या या विलासी जीवनशैलीमुळे त्यांच्याशी तह करणाऱ्या [[जॉन माल्कम]]वर टीका झाली. मराठ्यांचा पराभव आणि पेशव्यांची हकालपट्टीने [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]ला भारतात उत्तरेत [[सतलज नदी|सतलज]] नदीपासून [[दक्षिण भारत|दक्षिण भारतापर्यंत]] जवळजवळ अनिर्बंध सत्ता मिळाली. पेशवाईचा प्रदेश [[बॉम्बे प्रेसिडेन्सी]]मध्ये शामिल केला गेला तर पेंढाऱ्यांकडून जिंकलेला प्रदेश [[सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस]] म्हणून नवीन प्रांत केला गेला. [[शिंदे घराणे|शिंदे]] आणि [[होळकर घराणे|होळकरांची]] संस्थाने त्यांच्याकडेच राहिली आणि त्यांनी इंग्रजांचे सार्वभौमत्व स्वीकारले. [[राजपूताना]]मधील संस्थानिक नाममात्र राजे म्हणून ब्रिटिशांच्या सत्तेखाली आले. त्यांनी साताऱ्यामध्ये [[प्रतापसिंह भोसले]] यांना छत्रपती पदावर बसवले. होळकर कुटुंबातील अगदी लहान मुलाची [[नागपूर संस्थान|नागपूरच्या सिंहासनावर]] वर्णी लागली. [[त्र्यंबकजी डेंगळे]], ज्यांच्यावर गंगाधरशास्त्री यांच्या वधाचा आरोप होता व ज्याने हे प्रकरण हाताबाहेर चिघळले, यांना अटक करून बंगालमध्ये पाठवले गेले. सत्तेवर आल्यानंतर [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]]ने अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. नवीन कायद्यांबरोबरच त्याने प्रांतांची पुनर्रचना करून महसूल वसूलीसाठीची नवीन पद्धत आखली, ज्याने [[देशमुख]], [[पाटील]] आणि [[देशपांडे]] यांचे महत्व कमी झाले. ब्रिटिशांना कळले होते की इतक्या मोठ्या प्रदेशावर सत्ता गाजविण्यासाठी स्थानिक रीतीरिवाज आणि भाषेचा अभ्यास आणि आदर करणे गरजेचे आहे. एल्फिन्स्टनने १८२०मध्ये [[मराठी भाषा]] प्रमाणीकरण करण्याचेही सुरू केले. या युद्धानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धापर्यंत]] भारतावर अनिर्बंध सत्ता गाजवली. == हे सुद्धा पहा == * [[खडकीची लढाई]]<ref name="sacred-texts.com"/> * [[मराठा साम्राज्य]] * [[आष्टीची लढाई]] * [[भीमा कोरेगावची लढाई]] * [[मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी]] * [[पहिले इंग्रज-मराठा युद्ध]] * [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध]] * [[ब्रिटिश साम्राज्य]] * [[ब्रिटिश भारत]] * [[भारताचा इतिहास]] * [[शिवाजी महाराज]] {{क्रम |यादी=इंग्रज-मराठा युद्धे |पासून= |पर्यंत= |मागील= [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध]] |पुढील= --- }} == संदर्भ== {{संदर्भयादी}} {{मराठा साम्राज्य}} [[वर्ग:तिसरे इंग्रज-मराठा युद्ध| ]] [[वर्ग:मराठा साम्राज्य सहभागी असलेली युद्धे]] [[वर्ग:ब्रिटिश साम्राज्य]] [[वर्ग:महाराष्ट्रातील ब्रिटिश राजवट]] [[वर्ग:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सहभागी असलेली युद्धे]] tra9ihlu85rbjj9zeo89nqujops98c7 2581544 2581399 2025-06-21T08:40:36Z अभय नातू 206 /* पेंढारी */ 2581544 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट सैन्य संघर्ष | संघर्ष = तिसरे आंग्ल-मराठा युद्ध | या युद्धाचा भाग = | चित्र = | चित्र रुंदी = | चित्रवर्णन = खडकीची लढाई | दिनांक =[[नोव्हेंबर ५]] [[इ.स. १८१७|१८१७]] - [[इ.स. १८१९|१८१९]] | स्थान =[[मध्य भारत|मध्य]] आणि [[पश्चिम भारत (प्रदेश)|पश्चिम भारत]] | परिणती = ब्रिटिश विजय | सद्यस्थिती = सगळा प्रदेश [[भारतीय प्रजासत्ताक|भारतीय प्रजासत्ताकाचा]] भाग | प्रादेशिक बदल = [[पेशवे|पेशवाई]]चा अंत, मराठा संस्थानिक आणि [[राजपुताना एजन्सी|राजपुतान्यातील]] राजे ब्रिटिशांचे मांडलिक, [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]ला भारतात अनिर्बंध सत्ता | पक्ष१ = * [[Image:Flag of the Maratha Empire.svg|22px]] [[पेशवा]] * [[File:Flag of Gwalior (State).svg|23px]] [[ग्वाल्हेर संस्थान]] * [[File:Indore Flag.svg|23px]] [[इंदूर संस्थान]] * [[File:Nagpur State Flag.png|23px]] [[नागपूर संस्थान]] * [[File:Flag of the Maratha Empire.svg|23px]] [[पेंढारी]] | पक्ष२ = * [[चित्र:Flag of the British East India Company (1801).svg|22px|border]] [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] * [[File:Flag of the State of Hyderabad (18th century-1900).svg|23px]] [[हैदराबाद संस्थान|निझाम]] | सेनापती१ = * [[Image:Flag of the Maratha Empire.svg|22px]] [[दुसरे बाजीराव पेशवे|दुसरे बाजीराव]], [[बापू गोखले]], [[मोरोपंत दीक्षित]], [[त्र्यंबकजी डेंगळे]] * [[File:Indore Flag.svg|23px]] [[हरीराव होळकर]], [[तिसरे मल्हारराव होळकर]] * [[File:Nagpur State Flag.png|23px]] [[दुसरे मुधोजी भोसले]] * [[File:Flag of Gwalior (State).svg|23px]] [[दौलतराव शिंदे]] | सेनापती२ = - * [[चित्र:Flag of the British East India Company (1801).svg|22px|border]] [[फ्रांसिस रॉडोन-हेस्टिंग्स]], [[जॉन माल्कम]], [[थॉमस हिस्लॉप]] * [[File:Flag of the State of Hyderabad (18th century-1900).svg|23px]] [[तिसरा असफ जाह]] | सैन्यबळ१ =१८,००० [[घोडदळ]]<br /> ८,००० [[पायदळ सैनिक]] | सैन्यबळ२ =२,८०० घोडदळ | टिपा = }} '''तिसरे इंग्रज-मराठा युद्ध''' हे [[इ.स. १८१७]]-१८मध्ये [[मराठा साम्राज्य|मराठे]] व [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|इंग्रजांच्यात]] झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण [[भारत|भारतावर]] नियंत्रण मिळवले. या आधी झालेल्या [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध|दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर]] मराठ्यांना आणि ब्रिटिशांना उसंत मिळाली. त्या दरम्यान ब्रिटिशांनी भारतातील स्वतःची शक्ती वाढवली परंतु मराठ्यांनी एकोपा टिकवला नाही आणि ते ब्रिटिशांच्या तुलनेत मराठे राजनैतिक आणि लष्करीदृष्ट्या कमी पडत गेले. अशा पार्श्वभूमीवर [[भारताचे गव्हर्नर जनरल|गव्हर्नर जनरल]] [[लॉर्ड हेस्टिंग्स]]ची नियुक्ती झाली.<ref>http://www.britannica.com/EBchecked/topic/256745/Francis-Rawdon-Hastings-1st-marquess-of-Hastings</ref>. त्याने आपल्या कारकिर्दीत आक्रमक धोरणाचा अवलंब केला. [[इंग्रज-नेपाळ युद्ध|नेपाळ युद्धाच्या]] समाप्तीनंतर [[पेंढारी]] लोकांशी संघर्ष सुरू करून अप्रत्यक्षरीत्या मराठ्यांनाच आव्हान दिले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=https://dl.dropboxusercontent.com/spa/zohkohb0i282t94/Area%20Studies/public/SouthAsia/Ideas/pindaris.html#init |title=संग्रहित प्रत |access-date=2014-12-09 |archive-date=2016-04-03 |archive-url=https://web.archive.org/web/20160403073709/https://dl.dropboxusercontent.com/spa/zohkohb0i282t94/Area%20Studies/public/SouthAsia/Ideas/pindaris.html#init |url-status=dead }}</ref> या व इतर अनेक कारणांमुळे इंग्रज आणि मराठ्यांमध्ये पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पडली. अखेर पेशव्याने अंतिम युद्ध करण्याचा निर्णय घेतला.त्याला अप्पासाहेब भोसले आणि [[मल्हारराव होळकर]] ([[यशवंतराव होळकर|यशवंतराव होळकरांचा]] पुत्र) यांनी साथ दिली.पण युद्धात [[पेशवा]],[[भोसले]] आणि [[होळकर घराणे|होळकरांना]] एकत्र येऊ न देता त्यांना इंग्रजांनी वेगवेगळे पराभूत केले. [[सीताबर्डीची लढाई|सीताबर्डीच्या लढाईत]] [[नागपूरकर भोसले|भोसल्यांचा]], [[महिदपुरची लढाई|महिदपुरच्या लढाईत]] होळकरांचा आणि [[खडकीची लढाई|खडकी]]<ref name="sacred-texts.com">http://www.sacred-texts.com/hin/odd/odd29.htm</ref>, [[कोरेगाव]] व [[आष्टीची लढाई|आष्टा]] येथील लढाईत पेशव्यांचा पराभव झाला. अशा प्रकारे एक एक करीत मराठे इंग्रजांसमोर हरले व सर्वांनी शरणागती पत्करली. हेस्टिंग्सने भोसले, [[पेशवा]] [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीराव दुसरा]] आणि [[शिंदे घराणे|शिंदे]] यांना अपमानजनक तह स्वीकारण्यास भाग पडले. बाजीरावाला पेशवेपद सोडावे लागले आणि त्याचा प्रदेश इंग्रजांनी आपल्या साम्राज्यात विलीन केला. छत्रपतींचे [[सातारा]] राज्य व इतर [[मराठा]] सरदारांच्या प्रदेशावर [[ब्रिटिश]] नियंत्रण प्रस्थापित झाले आणि खऱ्या अर्थाने [[मराठा]] सत्तेची समाप्ती झाली. [[नागपूर संस्थान|नागपूरच्या]] [[मुधोजी भोसले दुसरे]] आणि [[इंदूर संस्थान|इंदूरचे]] [[मल्हारराव होळकर तिसरे]] यांच्या पाठिंब्याने [[पेशवा बाजीराव दुसरा|पेशवा बाजीराव दुसऱ्याच्या]] सैन्याने [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध]] जोरदार हल्ला केला. [[ग्वाल्हेर संस्थान|ग्वाल्हेरचे]] चौथे मोठे मराठा नेते [[दौलतराव शिंदे]] यांनी [[राजस्थान]]वरील नियंत्रण गमावले असले तरीही त्यांनी राजस्थानला दबाव आणि मुत्सद्देगिरीने तटस्थ राहण्याचे पटवून दिले. ब्रिटिशांच्या निर्णायक विजयाने [[मराठा साम्राज्य]] फुटले आणि स्वराज्याचा अंत झाला. पेशवेच्या सैन्याने शक्य तितका प्रतिकार करीत इंग्रजांना रोखण्यासाठी अनेक लहान लढाया लढल्या. शेवटी इंग्रजांनी पेशवाई ताब्यात घेतली आणि दुसऱ्या बाजीरावाला [[कानपूर]]जवळील [[बिठूर]] येथे एका लहान जहागिरीला तडीपार करण्यात आले आले. पेशवाईचा बहुतांश प्रदेश [[बॉम्बे प्रेसिडेन्सी|मुंबई प्रेसिडेंसीमध्ये]] विलीन केला गेला. साताराच्या महाराजांना त्यांच्या संस्थानावर कायम ठेवले गेले. १८४८ मध्ये [[लॉर्ड डलहौसी]]च्या [[डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स]]च्या बनावाखाली बॉम्बे प्रेसिडेन्सीने सातारा संस्थानसुद्धा खालसा केले. [[नागपूर मेट्रो|नागपूर]] व भोवतालच्या राजवटीचा उरलेला भाग, तसेच [[बुंदेलखंड]]मधील पेशव्याचे प्रदेश [[ब्रिटिश राज|ब्रिटिश भारताचे]] [[सौगोर प्रांत|सौगोर]] आणि [[नेरबुद्दा प्रांत]] म्हणून जोडले गेले. ब्रिटिशांनी होळकरांचे [[इंदूर संस्थान|इंदूर]] शिंद्यांचे [[ग्वाल्हेर संस्थान|ग्वाल्हेर]] व पेशव्यांच्या हुकुमतीतील [[झांंसी संस्थान|झांसी]] ही संस्थाने आपल्या अंमलात आणली. ==मराठे आणि इंग्रज== [[चित्र:Joppen1907India1805a-21.jpg|thumb|285x285px|दुसरे अँग्लो-मराठा युद्धानंतरचा १८०५मधील भारताचा नकाशा]] [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांनी]] १६७४ मध्ये स्थापन केलेल्या [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याने]] [[आदिलशाही|विजापूर]], [[निजामशाही|हैदराबाद]] आणि [[मुघल साम्राज्य|दिल्लीच्या मुस्लिस सल्तनतींच्या]] नाकावर टिच्चून स्वराज्य राखले होते. स्थापनेनंतर काही दशकांतच मराठा साम्राज्य भारतातील एक प्रमुख सत्ता झाले. [[रायगड (किल्ला)|रायगड]] किल्ल्यावर राजधानी असलेल्या या साम्राज्याचे व्यवस्थापन आठ मंत्र्यांच्या मंडळाद्वारे ([[अष्टप्रधान]]) केले जात असे. त्यांतील पंतप्रधान पदावर असलेल्या मंत्र्याला [[पेशवे]] हा खिताब होता. कालांतराने मराठा साम्राज्याची सत्ता पेशव्यांच्या हातात आली व [[छत्रपती]] हे नाममात्र राजे उरले. === ब्रिटिशांचा वाढता प्रभाव === [[चित्र:Sir Joshua Reynolds (1723-92) - Francis Rawdon-Hastings (1754-1826), Second Earl of Moira and First Marquess of Hastings - RCIN 407508 - Royal Collection.jpg|200px|इवलेसे|डावे|फ्रांसिस रॉडोन-हेस्टिंग्स, हेस्टिंग्सचा पहिला मार्क्वेस]] अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मराठे आणि [[मुघल साम्राज्य|मोगलांमध्ये]] भारतावरील वर्चस्वासाठी सतत लढाया होत होत्या. या दरम्यान ब्रिटिशांनी [[मुंबई]], [[मद्रास]] आणि [[कोलकाता]] येथे छोट्या छोट्या वखारी स्थापल्या व तेथून व्यापार व पुढे राजकारण करणे सुरू केले. मे १७३९ मध्ये मुंबईजवळील [[वसई]] येथे [[वसईची लढाई|मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केल्याचे]] पाहून ब्रिटिशांनी मुंबईतील आपली आरमारी शिबंदी मजबूत केली. मराठ्यांना मुंबईपासून दूर ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी मराठ्यांशी तहाची बोलणी करण्यासाठी दूत पाठवले. या वाटाघाटींमधून आणि १२ जुलै, १७३९ रोजी एक करार मंजूर झाला, ज्याकरवे [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]ला मराठ्यांच्या प्रदेशात मुक्त व्यापार करण्याचे अधिकार मिळाले. इंग्रज आणि मराठ्यांच्यातील करार पाहून दक्षिणेस [[हैदराबाद]]च्या [[निजामशाही|निजामने]] मराठ्यांविरूद्धच्या युद्धासाठी [[फ्रेंच भारत|फ्रेंच लोकांची]] मदत घेतली. यामुळे पुन्हा पेशव्यांनी इंग्रजांकडून मदत मागितली परंतु इंग्रजांनी त्याला नकार दिला. तरीसुद्धा मराठ्यांनी पुढील पाच वर्षांत निझामाचा पराभव करण्यास यश मिळविले. १७५० ते १७६१ च्या काळात ब्रिटिशांनी भारतात [[फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी]]चा पराभव केला आणि १७९३ पर्यंत त्यांनी पूर्वेकडील [[बंगाल वॉरियर्स|बंगाल]] व दक्षिणेत [[चेन्नई|मद्रास]]मध्ये आपली सत्ता ठाम केली. इकडे पश्चिमेकडे मराठ्यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांच्या महत्त्वाकांक्षेला आळा बसला होता. परंतु ते समुद्रामार्गे पश्चिम किनाऱ्यावरील [[सुरत]]मध्ये दाखल झाले. त्यांचे साम्राज्य वाढत असताना मराठ्यांनी [[सिंधु नदी|सिंधूच्या]] पलीकडे कूच केले. उत्तरेकडील विस्तारित मराठा साम्राज्याची जबाबदारी पेशव्यांनी [[शिंदे घराणे|शिंदे]] आणि [[इंदूर संस्थान|होळकराकडे]] सोपवली होती. पुढे जाता या दोन्ही संस्थानांनी मराठा साम्राज्याऐवजी स्वतःचे स्वार्थ पुढे करणे पसंत केले. त्यांनी साम्राज्याचा [[राजपूत]], [[जाट]] आणि [[रोहिला]] व इतर हिंदू राज्यकर्त्यांपासून बचाव केला असला तरी मुस्लिम आक्रमकांविरुद्ध ते निष्प्रभ होते. १४ जानेवारी, १७६१ रोजी [[पानिपतची तिसरी लढाई|पानिपत येथे]] अफगाण [[अहमद शाह अब्दाली]]विरुद्ध मराठा साम्राज्याचा सडकून पराभव झाला. त्यात मराठा सरदारांची एक संपूर्ण पिढी कापून काढली गेली व साम्राज्य मोडकळीस आले. त्यानंतर [[माधवराव पेशवे|माधवराव पेशव्यांच्या]] अंमलात १७६१ ते १७७३ दरम्यान मराठ्यांनी उत्तरेकडील घालवलेला मोठा प्रदेश परत मिळवला. === आंग्ल-मराठा संबंध === १९७७मध्ये पेशव्यांच्या कौटुंबिक कलह आणि सत्तासंघर्षातून [[नारायणराव पेशवे|मारायणराव पेशव्यांची]] [[नारायणराव पेशव्यांची हत्या|हत्या झाल्यावर]] पेशव्यांचे लक्ष उत्तर आणि मध्य भारताकडे नव्हते. त्यातच होळकर आणि शिंदे यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे [[पुणे|पुण्याची]] सत्ता मध्य भारतात नाममात्रच होती. नारायणरावानंतर पेशवेपदी आलेल्या [[रघुनाथराव पेशवे|रघुनाथरावाला]] वाटले की शिंदे-होळकर थेट पेशव्यांच्या सत्तेलाच आव्हान देतील. याला शह देण्यासाठी त्याने इंग्रजांकडून मदत मागितली. यासाठी इंग्रजांनी [[सुरतेचा करार|सुरतेला करार]] मान्य करून घेतला. यानुसार [[साळशेत बेट]] (आताच्या [[मुंबई]]चा मोठा भाग) आणि [[वसईचा किल्ला]] इंग्रजांच्या हवाली केले गेले आणि इंग्रजांनी पेशव्यांना पाठिंबा जाहीर केला. या कराराचा भारत आणि [[इंग्लंड]]मधील ब्रिटिश सत्तावर्तुळांमध्ये खळबळ माजली. [[ब्रिटिश राजतंत्र|ब्रिटिश राजतंत्राने]] [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीला]] भारतात व्यापार करण्याचा मक्ता दिलेला होता परंतु तेथील सार्वभौम राजांशी इंग्लंडच्या वतीने असे करार करणे हे कायदेबाह्य होते. या कराराच्या अटींवरून [[पहिले इंग्रज-मराठा युद्ध]] पेटले. दोन्ही बाजू तुल्यबळ असल्याने हे युद्ध अनेक वर्षे रखडले. शेवटी [[महादजी शिंदे|महादजी शिंद्यांनी]] मध्यस्थी करून १७८२मध्ये [[सालबाईचा करार]] घडवून हे युद्ध थांबवले. यात इंग्रजांची जरी थेट सरशी झाली नसली तरी [[वॉरेन हेस्टिंग्स]]ने दूरदृष्टी वापरून शिंदे, भोसले आणि पेशवे यांच्यात दुही निर्माण केली. १७८६मध्ये [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनी]]ने [[लॉर्ड कॉर्नवॉलिस]] याला [[भारताचे गव्हर्नर जनरल|भारतातील प्रदेशांचा गव्हर्नर जनरल]] म्हणून नेमले. त्यावेळी [[मराठा साम्राज्य]] मजबूत स्थितीतच होते. [[सालबाईचा तह|सालबाईच्या तहानंतर]] ब्रिटिशांनी [[उत्तर भारत|उत्तर भारतात]] कुरापती न काढता मराठ्यांच्या बरोबरीने राहण्याचे धोरण अवलंबिले. [[पुणे|पुण्यात]] या वेळी ११ वर्षांचा [[सवाई माधवराव पेशवे|सवाई माधवराव]] पेशवेपदावर होता व त्याच्या मंत्री [[नाना फडणवीस|नाना फडणवीसांनी]] मुत्सद्दीपणाने ब्रिटिश, [[निजामशाही|निजाम]], [[फ्रेंच भारत|फ्रेंच]], [[पोर्तुगीज भारत|पोर्तुगीज]], [[शिंदे घराणे|शिंदे]], [[इंदूर संस्थान|होळकर]] व इतर सत्तांशी समतोल साधून ठेवलेला होते. १८०० साली फडणवीसांच्या मृत्यूनंतर पेशवाईत अनागोंदी माजली. शिंदे-होळकर संघर्षात पेशव्यांनी शिंद्यांची बाजू घेतल्याचे वाटून होळकरांनी १८०१मध्ये थेट पुण्यावर हल्ला केला. [[दुसरे बाजीराव पेशवे|पेशवा दुसऱ्या बाजीरावाने]] पुण्यातून ब्रिटिश आरमाराच्या मदतीने पलायन केले. आपली पेशवाई आणि सत्ता गमावण्याची भीती वाटून बाजीरावाने [[वसईचा तह|वसईच्या तहावर]] शिक्कामोर्तब केले. यानुसार पेशवे आता खुद्द शासक न राहता इंग्रजधार्जिणे झाले. याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे आणि [[नागपूरकर भोसले|भोसल्यांनी]] इंग्रजांनी हल्ला केला व १८०३मध्ये [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध]] सुरू झाले. यात इंग्रजांनी मराठा सरदारांचा सडकून पराभव केला व मराठ्यांनी आपला बव्हंश प्रदेश इंग्रजांच्या स्वाधीन केला. === ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी === हजारो मैलांवरून आलेल्या ब्रिटिशांनी भारतीय भूगोलाचा अभ्यास केलेला होता आणि स्थानिक लोकांशी व्यापार करण्यासाठी आणि नंतर त्यांच्यावर सत्ता गाजविण्यासाठी येथील भाषा शिकून घेतलेल्या होत्या. त्यांच्याकडील त्याकाळील अद्ययावत असे तंत्रज्ञान होते आणि भारतातील परिस्थितीत प्रभावीपणे वापरण्यासाठीची शस्त्रे त्यांनी आणलेली होती. काही संशोधकांच्या मते जरी ब्रिटिशांकडे अद्ययावत तंत्रज्ञान नसते तरीही त्यांच्यातील शिस्त व संघटनेच्या जोरावर त्यांनी भारतीयांविरुद्धची बव्हंश युद्धे जिंकली असती. त्याचबरोबर त्यांचा मुत्सद्दीपणा आणि संधिसाधूपणाही त्यांच्या यशाला कारणीभूत होते. [[पहिले इंग्रज-मराठा युद्ध|पहिल्या इंग्रज-मराठा युद्धानंतर]] [[वॉरन हेस्टिंग्स|वॉरेन हेस्टिंग्स]]ने जाहीर केले की मराठ्यांबरोबरचा तह अनेक वर्ष अबाधित राहील. परंतु त्याचबरोबर त्याने [[पुणे|पुण्यातील]] [[पेशवे|पेशव्यांच्या]] दरबारात [[चार्ल्स मॅलेट]] या स्थानिक रीतीरिवाज माहिती असलेल्या व्यापाऱ्याला राजदूत म्हणून नेमले. यायोगे हेस्टिंग्सला पेशव्यांशी सतत संपर्क ठेवायचा होता तसेच तेथील बितंबातमीही काढून आणायची होती. == तिसऱ्या युद्धाची पार्श्वभूमी == [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर]] [[पेशवे|पेशव्यांची]] सत्ता मुख्यत्वे महाराष्ट्रात ''देशा''वर पसरलेली होती. [[कृष्णा नदी|कृष्णा]] आणि [[गोदावरी नदी|गोदावरी नद्यांची]] खोरी आणि त्यांमधील [[सह्याद्री]]च्या पठारावरील प्रदेश हा त्यांच्या थेट अंमलाचा प्रदेश होता. त्यांचे सरदार असलेले [[इंदूर संस्थान|होळकर]] [[इंदूर|इंदूरात]] असून त्यांची सत्ता [[नर्मदा खो|नर्मदा खोऱ्यात]] होती. [[शिंदे घराणे|शिंदे]] [[ग्वाल्हेर]] आणि [[बुंदेलखंड]], [[गंगेचे खोरे|गंगेच्या खोऱ्याच्या]] दक्षिणेकडील टेकड्या आणि सुपीक मैदाने तसेच आसपासच्या प्रदेशावर हुकुमत गाजवत होते. [[चंबळ नदी|चंबळच्या]] दऱ्या, जंगले, [[विंध्य पर्वतरांग|विंध्य पर्वतरांगेच्या]] उत्तरेस आणि आत्ताच्या [[मध्य प्रदेश]]च्या वायव्य भागातील प्रदेश, [[माळवा]] पठार या भागांतून पेंढाऱ्यांचे राज्य होते. === खिळखिळे होत चाललेले मराठा सैन्य === [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर]] मराठा साम्राज्याचा प्रभाव आणि शक्ती काही अंशाने कमी झाली होती.{{sfn|Chhabra|2005|p=39}} युद्धानंतर त्यांनी आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण करण्याकडे दुर्लक्ष केले आणि नवीन तंत्रज्ञान न अजमावता त्याच त्याच जुन्या, कालबाह्य युद्धनीतींवर भर दिला.{{sfn|Chhabra|2005|p=39}} मराठ्यांचा तोफखाना जुन्यापुराण्या तोफांवर भर देउन होता. यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे म्हणजे कठीण काम होते. याउलट युरोपीयनांचा तोफखाना गतिशील आणि भेदक होता. जरी काही प्रमाणात मराठ्यांनी नवीन शस्त्रे अंगिकारली असली तरी ती सगळी आयात केलेली होती. ही हाताळणारे कुशल लोक परदेशी होते. एतद्देशीयांनी ही शस्त्रे स्वतः तयार करण्याचा कधी प्रयत्न केला नाही किंवा त्यांचे तंत्रज्ञानही आत्मसात केले नाही. मराठ्यांचे गुप्तहेर खाते कुशल नव्हते आणि नाना फडणवीसांचा काळ सोडता त्यांच्याकडील मुत्सद्दी देशातील संपूर्ण चित्र पाहण्यास असमर्थ होते. मराठ्यांची घातक पथके [[पेंढारी]] व इतर भाडोत्री सैनिकांनी भरलेली होते. या साम्राज्याला एक वाली नव्हता. खुद्द छत्रपतींच्याही दोन गाद्या होत्या -- [[सातारा संस्थान|सातारा]] आणि [[कोल्हापूर संस्थान|कोल्हापूर]]. [[पश्चिम महाराष्ट्र]] सोडता इतर सगळे प्रदेश तेथील सरदारांच्या अंमलात होते आणि त्यांवर एकसूत्र थेट कारभार अशक्य होता. [[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांचे]] एकछत्री मराठा साम्राज्य आता कॉन्फेडरसी{{मराठी शब्द सुचवा}}मध्ये परिवर्तित झाले होते आणि एकजुटीने परकीय शत्रूशी युद्ध करण्यासाठीची एकता नष्ट झालेली होती.{{sfn|Chhabra|2005|p=39}} === ब्रिटिशांची कारस्थाने === [[चित्र:Mountstuart-Elphinstone.jpg|left|thumb|माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]] मराठा साम्राज्य ढासळत असताना [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनी]] आपली शक्ती वाढवत होती. दुसऱ्या युद्धातील आपल्या विजयाचा पुरेपूर उपयोग करून घेत त्यांनी मराठ्यांना आपल्या टाचेखाली ठेवले होते. जरी [[दुसरे बाजीराव पेशवे|दुसरा बाजीराव]] साम्राज्याचा पेशवा असला तरी पेशव्यांच्या बाजूने असलेले अनेक सरदार, जहागिरदार आणि संस्थानिक ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली किंवा संरक्षणाखाली गेलेले होते. याचा फायदा घेत ब्रिटिशांनी [[बडोदा संस्थान|बडोद्याच्या]] [[गायकवाड घराणे|गायकवाडांबरोबर]] करार करून त्यांच्या संस्थानातील महसूलाचा भाग पेशवाईपर्यंत पोचू नये अशी व्यवस्था केली. यामुळे भडकलेल्या पेशव्यांशी बोलणी करण्यासाठी गायकवाडांनी गंगाधर शास्त्री यांना आपले दूत म्हणून पुण्याला पाठवले. तेथे असताना त्यांची हत्या झाली. या हत्येमागे पेशवाईतील मंत्री [[त्र्यंबक डेंगळे]] असल्याचा संशय गायकवाड आणि ब्रिटिशांनी व्यक्त केला. या प्रकरणाला उचलून धरत ब्रिटिशांनी बाजीरावाला [[पुणे करार (१८८७)|एक करार]] करणे भाग पाडले.{{sfn|Naravane|2006|pp=79–80}} १३ जून, १८८७ रोजी शिक्कामोर्तब झालेल्या या करारानुसार बाजीरावाला गायकवाडांवरील वादावर पडदा टाकणे, त्र्यंबक डेंगळे यांनी गुन्हा कबूल करणे आणि बडोद्याच्या महसूलीवर पाणी सोडणे भाग पडले. याशिवाय पेशवाईने मोठा प्रदेश ब्रिटिशांच्या स्वाधीन केला. यात महाराष्ट्रातील अनेक बेलाग किल्ले आणि [[कोंकण|कोंकणातील]] किनारपट्टी ब्रिटिशांच्या घशात गेली आणि [[नर्मदा नदी|नर्मदेच्या]] उत्तरेस आणि [[तुंगभद्रा नदी|तुंगभद्रेच्या]] दक्षिणेकडील पेशवाईचा सगळा प्रदेश ब्रिटिश आधिपत्याखाली आला. आणि पेशव्यांनी भारतातील इतर कोणत्याही संस्थानाशी वाटाघाटी करू नये असेही मान्य करून घेतले.{{sfn|Chhabra|2005|p=17}} इतकेच नव्हे तर पेशवाईतील ब्रिटिश रेसिडेंट [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]]ने पेशव्यांना आपले घोडदळ बरखास्त करणे भाग पाडून मराठा सैन्याचे कंबरडेच मोडले.{{sfn|Chhabra|2005|p=17}}{{sfn|Naravane|2006|pp=79–80}} === पेंढारी === {{हेसुद्धा पाहा|पेंढारी}} [[File:Malwa_India_1823.png|thumb|१८२३ च्या भारतातील चित्रणात माळव्याचे स्थान. १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात पेंढारी या भागात होते]] पेंढारी किंवा पिंडारी या भारतात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत रयतेची लूटमार व वाटमारी करणाऱ्या संघटित टोळ्या होत्या, ज्यात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाचे लोक होते. यांपैकी पेंढाऱ्यांच्या सशस्त्र संघटित टोळ्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने उदयास आल्या.{{sfn|Naravane|2006|pp=86–87}} घोड्यांवरून आपल्या कारवाया करणारे पेंढारी शिंदेशाही किंवा होळकरशाही असत. अंदाजे ३३,००० शिबंदी असलेल्या{{sfn|Naravane|2006|p=86}} पेंढाऱ्यांच्या सरदारांमध्ये चिटू, तुलसी, इमाम बक्ष, साहिब खान, कादिर बक्ष, नाथू आणि बापू हे होळकरशाही तर करीम खान, दोस्त मोहम्मद हे शिंदेशाही होते. [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर]] शिंदे व होळकर यांनी आपले बरेचसे प्रांत ब्रिटिशांच्या स्वाधीन केले. त्याचा वचपा म्हणून शिंदे आणि होळकरांनी पेंढाऱ्यांना ब्रिटिश प्रांतावर आक्रमण करण्यास उद्युक्त केले. यांच्या धाडींमुळे त्रस्त झालेल्या रयतेला आपले गुजराण करणे अशक्य झाले.{{sfn|Russell|1916|p=396}} उपासमारी किंवा पेंढाऱ्यांना जाउन मिळणे असे दोनच पर्याय त्यांना उरले. १८१५मध्ये सुमारे २५,००० पेंढाऱ्यांची टोळधाड [[मद्रास प्रेसिडेन्सी]]मधील [[कोरोमंडल|कोरोमांडल]] किनाऱ्यालगतच्या प्रदेशावर चालून गेली आणि तेथील ३०० गावे लुटून मारली. अजून एक धाड निजामाच्या हद्दीत तर तिसरी मलबारवर पडली व तेथेही त्यांनी अशीच जाळपोळ केली. १८१७ पर्यंत पेंढाऱ्यांनी ब्रिटिश प्रदेशात छापेमारी सुरू ठेवली. पेंढाऱ्यांचा नायनाट करणे हाच एक उपाय ब्रिटिशांना होता. == व्यूहरचना आणि नियोजन == === मराठा साम्राज्य === [[चित्र:RaigadFort1.jpg|thumb|रायगड किल्ल्यावर जुन्या वाड्याचे अवशेष]] [[पुणे करार (१८१३)|पुणे करारांतर्गत]] पेशव्यांनी आपले घोडदळ बरखास्त केले होते परंतु गुप्तपणे त्यांना सात महिन्यांचे आगाऊ वेतन देउन पेशवाईच्या दिमतीस येण्यास फर्मावले.{{sfn|Naravane|2006|p=80}} बाजीरावने [[बापू गोखले]] यांच्यावर येऊ घातलेल्या युद्धाच्या तयारीची जबाबदारी सोपविली.{{sfn|Duff|1921|pp=468–469}} गोखल्यांनी घोडदळाबरोबरच गुप्ततेतच पायदळाची सुद्ध भरती सुरू केली. यांत [[भिल्ल समाज|भिल्ल]] आणि [[रामोशी]] सैनिकांचा भरणा होता.{{sfn|Duff|1921|p=468}} अगदी पेंढाऱ्यांनाही भाडोत्री सैनिक होण्याचा प्रयत्न केला गेला.{{sfn|Duff|1921|p=468}} ऑगस्ट १८७१मध्ये त्यांनी [[सिंहगड]], [[पुरंदर किल्ला|पुरंदर]] आणि [[रायगड (किल्ला)|रायगड]] किल्ल्यांची डागडुजी करून ते भांडते केले.{{sfn|Duff|1921|p=468}} लष्करी तयारीबरोबरच काही मुत्सद्देगिरीचे ही प्रयत्न झाले. पेशव्यांनी भोसले, शिंदे आणि होळकर यांना पुन्हा आपल्या गोटात येण्याचे आवाहन केले. जसवंतराव घोरपडे सारख्या एल्फिन्स्टनच्या नोकरीतील नाराज एतद्देशीय लोकांचा माग काढून त्यांना गुप्तपणे भरती केले गेले. अशा इतर काही शिपायांनी पेशव्यांना नकार दिला आणि उलट आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पेशव्यांची आगळीक उघड केली.{{sfn|Duff|1921|p=474}}{{sfn|Duff|1921|p=470}} पेशव्यांनी थेट युरोपीयांच्यात फूट पाडणेही अजमावले परंतु ते मात्र शक्य झाले नाही.{{sfn|Duff|1921|p=470}} [[दुसरे बाजीराव पेशवे|पेशवा बाजीराव दुसऱ्याने]] १९ ऑक्टोबर, १८१७ रोजी [[विजयादशमी|दसऱ्याच्या]] उत्सवात मोठे सैन्य जमा केले.{{sfn|Naravane|2006|p=80}} कवायतीदरम्यान घोड्यावर स्वार असलेल्या सैनिकांनी एल्फिन्स्टनच्या दिशेने एल्गार केला परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी मोर्चा वळवला.{{Sfn|Duff|1921|p=471}} [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन|एल्फिन्स्टनला]] धाक दाखवणे आणि त्याच्या नोकरीत असलेल्या एतद्देशीय शिपायांना पेशव्यांच्या बाजूने लढण्यासाठी मनोबळ देणे हा या हिकमतीचा उद्देश होता.{{Sfn|Duff|1921|p=471}}{{sfn|Duff|1921|p=471}} पेशव्यांनी एल्फिन्स्टनची हत्या करण्याचाही कट रचला होता. [[बापू गोखले|गोखल्यांचा]] याला विरोध होता परंतु ही योजना पुढे चालली पण उघडकीला येण्याचा संशय आल्यावर उधळून टाकण्यात आली.{{sfn|Naravane|2006|p=80}} १८१७ च्या सुमारास मराठा साम्राज्याच्या सैन्यदलाचा अंदाज १ बर्टन यांच्या मते असा होता -- पायदळ: अंदाजे ८१,०००. घोडदळ: १,०६०००. तोफा: ५८९. [[पुणे|पुण्यामध्ये]] [[पेशवे|पेशव्यांकडे]] १४,००० शिपाई, २८,००० घोडेस्वार आणि ३७ तोफा होत्या. होळकरांकडे ८,००० सैनिक, २०,००० घोडेस्वार आणि १०७ तोफा होत्या. [[ग्वाल्हेर]]मध्ये [[शिंदे घराणे|शिंदे]] आणि [[इंदूर|इंदूरात]] [[इंदूर संस्थान|होळकरांकडे]] अनुक्रमे १६,००० आणि १८,००० सैनिक; १५,००० आणि १६,००० घोडेस्वार आणि एकूण सुमारे २०० तोफा होत्या. यांशिवाय अफगाण सरदार आमिर खानकडे [[राजपुताना|राजपुतान्यातील]] [[टोंक]] येथे १०,००० सैनिक, १२,००० घोडेस्वार आणि २०० तोफा होत्या{{sfn|Burton|1908|p=153}}{{sfn|Burton|1908|p=153}}{{sfn|Bakshi|Ralhan|2007|p=261}}{{sfn|United Service Institution of India|1901|p=96}} [[चंबळ नदी|चंबळ]] आणि [[माळवा]] तसेच [[नर्मदा खोरे|नर्मदा खोऱ्यांतील]] शिंदेशाही [[पेंढारी]] सरदार चिटू, करीम खान आणि दोस्त मोहम्मद यांच्याकडे अनुक्रमे १०,०००, ६,००० आणि ४,००० सैनिक होते परंतु यांच्याकडे शस्त्रे म्हणजे फक्त भाले होते. होळकरशाही पेंढारी सरदार तुळशी, इमाम बक्ष, साहिब खान, कादिर बक्ष, नथू आणि बापू यांच्यात मिळून २१,५०० सैनिक आणि सुमारे ४,००० घोडेस्वार होते.{{sfn|Naravane|2006|pp=86–87}} === ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी === गायकवाडांच्या राजदूत गंगाधर शास्त्री यांची हत्या म्हणजे पेशव्यांनी भारतातील ब्रिटिश सत्तेला दिलेले आव्हान समजून त्यांचे साम्राज्य गिळण्यासाठी [[फ्रांसिस रॉडोन-हेस्टिंग्स|रॉडोन-हेस्टिंग्सने]] भारतात मोठ्या सैन्याची जमवाजमव सुरू केली.<ref name="mapw">{{cite book |last1=Burton |first1=R.G. |title=The Mahratta And Pindari War |date=1910 |publisher=Government Press |location=Simla |url=https://archive.org/details/in.ernet.dli.2015.284400/mode/2up}}</ref> ब्रिटिशांची भारतातील तोपर्यंतची ही सगळ्यात मोठी फौज होती. १,२०,००० शिबंदी असलेल्या या सैन्याची रचना रॉडोन-हेस्टिंग्सच्या हाताखालील ग्रँड आर्मी तथा बेंगाल आर्मी आणि जनरल [[थॉमस हिस्लॉप]]च्या हाताखालील आर्मी ऑफ द डेक्कन या दोन सैन्यांची मिळवणी होती.{{sfn|Bakshi|Ralhan|2007|p=259}} यात एतद्देशीय सैनिकांच्या ६० बटालियन, ब्रिटिश सैन्याच्या रेजिमेंटमधून रचलेल्या अनेक बटालियन, घोडदळ आणि ड्रगूनच्या अनेक तुकड्या, तोफखाना, इ.चा समावेश होता. ग्रँड आर्मीच्या ४०,००० सैनिकांच्या या फौजेचे तीन विभाग आणि एक अतिरिक्त राखीव विभाग केले गेले. यांतील डाव्या विभागाचे नेतृत्त्व मेजर जनरल मार्शल, मध्य विभाग रॉडोन-हेस्टिंग्स कडे होेते. सैनिक, आर्मी ऑफ द डेक्कनचे ७०,००० सैनिक पाच विभागांत होते. यांचे नेतृत्त्व ब्रिगेडियर जनरल डव्हजन, जनरल हिस्लॉप, जनरल माल्कम ब्रिगेडियर जनरल स्मिथ आणि लेफ्टनंट कर्नल अॅडम्स यांच्याकडे असल्याची नोंद आहे. याव्यतिरिक्त [[चेन्नई|मद्रास]] आणि [[पुणे विमानतळ|पुणे]] येथे दोन बटालियन आणि तोफखान्याच्या तुकड्याही तैनात होत्या. [[मद्रास रेसिडेन्सी]]मध्ये ६ व्या बंगाल घोडदळातील अतिरिक्त तीन तुकड्याही तयारीत होत्या. या सगळ्या सैन्याकडे अद्ययावत शस्त्रे होती तसेच त्यांचे रसदमार्ग उत्तमपणे आखलेले होते. इकडे सैन्य गोळा करीत असताना ब्रिटिशांनी शिंदे, होळकर आणि आमिर खान यांच्याशी बोलणी सुरू केली. या तिन्ही संस्थानातील [[पेंढारी]] ब्रिटिश प्रदेशात धुमाकूळ घालत होते आणि या तिघांनीही [[नेपाळचे राजे|नेपाळच्या राजाबरोबर]] संधान साधून ब्रिटिशांविरुद्ध युती करण्याची बोलणी सुरू केलेली होती.{{sfn|Sinclair|1884|pp=194–195}} याबाबतचा गुप्त पत्रव्यवहार ब्रिटिशांनी पकडला. यावरून त्यांनी संस्थानिकांना पेचात पाडले आणि पेंढाऱ्यांविरुद्ध ब्रिटिशांना मदत करणे आणि पेंढाऱ्यांच्या नवीन टोळ्या उभ्या न होऊ देणे यासाठी ब्रिटिशांनी संस्थानिकांना [[ग्वाल्हेरचा करार|वचन देणे]] भाग पाडले. हा करार, प्रचंड मोठे सैन्याचा दबाव आणि मुत्सद्दीगिरी वापरून ब्रिटिशांनी शिंदे आणि होळकरांना युद्ध सुरू होण्याआधीच बाजूला केले. राजपुतान्यातील आमिर खानला त्याची टोंकची रियासत अबाधित ठेवण्याचे वचन देउन ब्रिटिशांनी त्यालाही परस्पर दूर केले. आमिर खानने ब्रिटिशांवर विश्वास ठेवून आपली सेना बरखास्त केली तोफा ब्रिटिशांना विकून टाकल्या. याशिवाय आपल्या प्रदेशातून पेंढाऱ्यांना हाकलून देण्याचेही कबूल केले.{{sfn|Sinclair|1884|pp=194–195}} ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीस ब्रिटिशांनी ग्रँड आर्मीचा एक विभाग [[सिंधुदुर्ग|सिंध]], दुसरा [[चंबळ विभाग|चंबळ]] आणि तिसरा [[नर्मदेचे खोरे|नर्मदेच्या खोऱ्याच्या]] पूर्व भागात पाठवला. यांचे काम शिंदे आणि होळकर तसेच पेशव्यांच्या मध्ये राखून त्यांची हातमिळवणी रोखणे हा होता. राखीव विभागाने [[राजपुताना|राजपुतान्यात]] आमिर खानच्या हालचालींवर नजर ठेवलेली होती. आर्मी ऑफ द डेक्कनचा पहिला आणि तिसरा विभाग [[हरदा]] येथे ठाण मांडून होता. तेथून ही फौज आसपासच्या किल्ल्यांना शह देउन होती. दुसरा विभाग [[मलारपूर]] येथून [[बेरार घाट|बेरार घाटावर]] लक्ष ठेवून होता तर चौथा विभाग [[पुणे]] आणि [[अमरावती]]च्या आसपासच्या प्रदेशांवर जरब ठेवीत होता. पाचवा विभाग [[होशंगाबाद]] येथे तैनात करण्यात आला. राखीव विभाग [[भीमा नदी|भीमा]] आणि [[कृष्णा नदी|कृष्णा नद्यांच्या]] दोआबात दबा धरून बसला होता. अशा प्रकारे ब्रिटिशांनी मराठ्यांची पूर्णपणे नाकेबंदी करून ठेवलेली होती. == युद्धातील प्रमुख लढाया == [[चित्र:Richard_Colley_Wellesley.jpg|thumb|[[रिचर्ड वेलस्ली (पहिला मार्क्वेस वेलस्ली)|रिचर्ड वेलेस्ली]], पहिला मार्क्वेस वेलेस्लीने आंग्ल-मराठा युद्धात विजय मिळवून कंपनीच्या प्रदेशाचा भारतात विस्तार केला]] काही इतिहासकारांच्या मते तिसरे युद्ध हे [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसऱ्या युद्धाचे]] खरकटे काढण्यासाठीचे होते. ब्रिटिशांना ते पूर्वीच संपवता आले नाही कारण त्यांचे पैसे आणि मनुष्यबळ त्या युद्धाच्या शेवटी कमी पडले.{{sfn|Black|2006|pp=77–78}} परंतु हे सुद्ध लक्षात घेण्याजोगे आहे की ब्रिटिशांनी तिसऱ्या युद्धासाठी कसून तयारी केली होती. त्यासाठी त्यांनी प्रचंड मनुष्यबळ, शस्त्रे, पैसे आणि व्यूहरचना खर्ची घातलेले होते. तिसऱ्या युद्धाची सुरुवात ब्रिटिशांनी पेंढाऱ्यांचा नायनाट करायचा या कथित उद्देशाने केली. === पेंढाऱ्यांवरील हल्ला === १८१७ च्या उन्हाळा व पावसाळ्यात मजबूत नाकेबंदी केल्यावर ब्रिटिश फौजांनी वर्ष संपताना [[पेंढारी|पेंढाऱ्यांच्या]] प्रदेशात आक्रमण केले. जंगलातून आणि खेड्यापाड्यातून राहणाऱ्या पेंढाऱ्यांशी समोरासमोर दोन हात करणे शक्य नाही हे ब्रिटिशांना कळून चुकले होते व त्यांनी व्यूहात्मक हालचाली करीत पेंढाऱ्यांना पश्चिम आणि दक्षिणेकडून दाबण्यास सुरुवात केली. पेंढाऱ्यांची लूटमार व जाळपोळ करण्याची पद्धत पाहून ब्रिटिशांना वाटले होते की या प्रदेशात रसद मिळणे अशक्य आहे म्हणून त्यांनी आपले रसदमार्ग भक्कम केलेले होते. पेंढारी प्रदेशात आल्यावर त्यांना येथे मुबलक प्रमाणात अन्नसाठा आणि इतर रसद मिळून आली व त्यामुळे त्यांची बाजू अधिकच भक्कम झाली.<ref name="mapw" /> पेंढाऱ्यांच्या एकेका गाव, वस्ती आणि अड्ड्यांना घेरा घालत जनरल हिस्लॉप दक्षिणेकडून चालून आला आणि त्याने पेंढाऱ्यांना नर्मदेपलीकडे हुसकावून लावले. रॉडोन-हेस्टिंग्स त्याच्या सैन्यासह येथे दबा धरून बसलेला होता.{{sfn|Sinclair|1884|pp=195–196}} या कचाट्यात सापडलेले करीम खानचे टोळके बेचिराख झाले. ब्रिटिशांनी मोक्याच्या ठिकाणी आपले सैन्य लावलेले असल्यामुळे पेंढाऱ्यांना त्यांच्याच प्रदेशत मुक्त संचार करणे अशक्य झाले व एकमेकांच्या मदतील ते येऊ शकले नाहीत. मुख्य रस्ते बंद झाल्याने त्यांच्या टोळधाडीही बंद झाल्या आणि ते विखुरले. फक्त भाल्यानिशी असलेल्या पेंढाऱ्यांचा प्रशिक्षित ब्रिटिश सैन्याच्या रायफली आणि तोफांसमोर टिकाव लागला नाही. त्यांचे छोट्या छोट्या टोळ्या करून ब्रिटिशांचा वेढा फोडण्याचे प्रयत्न सुद्धा फसले. आता ते पूर्णपणे कोपऱ्यात अडकलेले होते.{{citation needed|date=March 2022}} यापुढे ब्रिटिशांनी हा वेढा आवळायला सुरुवात केली आणि पेंढाऱ्यांच्या टोळ्यांना एक एक करून चेचणे सुरू केले. जरी त्यांचे २३,००० सैनिक उरले असले तरी त्यांच्याकडून एकसंध हल्ला होत नव्हता व केलेले हल्ले ब्रिटिश सैन्य लीलया परतवून लावत होते. पेंढाऱ्यांनी गावागावातून आश्रय घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या पूर्वीच्या क्रुरतेची आठवण ठेवून गावकऱ्यांनी त्यांना थारा दिला नाही. अनेक ठिकाणी त्यांनी पेंढाऱ्यांना पकडून ठार मारले.{{sfn|Sinclair|1884|pp=195–196}} पेंढाऱ्यांनी जंगलाकडे पळ काढला पण तरीही त्यांच्यामागचा ससेमिरा चुकला नाही. त्यांना अपेक्षित मराठ्यांची मदतही आली नाही कारण शिंदे आणि होळकरांना ब्रिटिशांनी ग्वाल्हेरच्या तहाने शह दिलेला होता. एकेकाळी बलाढ्य आणि दहशत पसरवणारे पेंढारी सरदारांचा आता शिकार सुरू झाला. फेब्रुवारी १८१८पर्यंत जवळजवळ सगळ्या मुख्य सरदारांची वासलात लावली गेली. करीम खानने रॉडोन-हेस्टिंग्ससमोर आत्मसमर्पण केले. त्याला गोरखपूर येथे छोटी जमीन देउन तडीपार करण्यात आले. वासिल खानने लढा सुरू ठेवला परंतु ब्रिटिशांच्या हातील लागण्याआधीच त्याने विष घेउन आत्महत्या करून घेतली.{{sfn|Keightley|1847|p=165}} जॉन माल्कमने सेतूचा पिच्छा पुरवला व एक-एक करीत त्याचे साथीदार टिपून मारले. एकटा पडलेल्या सेतूने जंगलात आश्रय घेतला आणि तेथे तो एका नरभक्षी वाघाचा शिकार झाला.{{sfn|Travers|1919|p=19}}{{sfn|Sinclair|1884|p=196}}{{sfn|Hunter|1909|p=495}} मध्य भारतातील गावकऱ्यांमध्ये दहशत पसरवणाऱ्या या पेंढाऱ्यांचा नायनाट केल्यामुळे त्यांच्याकडून ब्रिटिशांना सहानुभूती मिळाली. === खडकीची लढाई === [[File:Battle of Kirki, 1817.jpg|thumb|खडकीची लढाई, १८१७]] {{मुख्य लेख|खडकीची लढाई}} [[चित्र:Battle of khadaki.svg|left|thumb|300px| खडकीच्या लढाईतील दोन्ही सैन्यांची व्यूहरचना]] ब्रिटिश आपली फौज [[मध्य भारत|मध्य भारतात]] [[पेंढारी|पेंढाऱ्यांच्या]] मागावर लावत असल्याने त्यांची दक्षिणेतील कुमक कमी झाली होती. ही संधी साधत [[पेशवे|पेशव्यांनी]] [[पुणे|पुण्याजवळ]] त्यांच्यावर असावध असताना हल्ला करण्याचे ठरवले. या सुमारास ब्रिटिशांचे फक्त १,००० पायदळ सैनिक आणि २,००० घोडेस्वार तसेच ८ तोफा पुण्याजवळ दापोडी व बोपोडी येथे तैनात होते. पेशव्यांनी २०,००० घोडेस्वार आणि ८,००० पायदळ सैनिक पुण्यात जमा केले व दिमतीला २० तोफाही होत्या.<ref name="Naravane">{{cite book |last=Naravane |first=M. S. |title=Battles of the Honorourable East India Company (Making of the Raj) |publisher=A.P.H. Publishing Corporation |year=2014 |isbn=9788131300343 |location=New Delhi |pages=80–82}}</ref> ही सगळी हालचाल पेशवे पर्वती टेकडीवरून दुर्बिणीतून पहात होते. त्यांच्यासोबत हुजुरातीतील ५,००० घोडेस्वार आणि १,००० सैनिक होते. खडकीच्या टेकडीवर ब्रिटिशांचे टेहळे होते. चतुःश्रृंगी टेकडी आणि खडकी टेकडी यांच्यामधील गणेशखिंडीतून मराठ्यांची चाल होणार होती. अनेक ठिकाणी उथळ असलेली मुळा नदी ओलांडून तेथील ओढे व नाल्यांमधून पुढे सरकत ब्रिटिशांना मागून घेरण्याचा मराठ्यांचा व्यूह होता. ५ नोव्हेंबर, १८१७ रोजी संध्याकाळी ४ वाजता सरदार विंचूरकरांनी ब्रिटिश रेसिडेंट [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]]च्या बंगल्यावर हल्ला केला. हा बंगला आत्ताच्या [[शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे)|शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या]] आवारात होता. तोफांचा मारा सुरू होताच एल्फिन्स्टन पळून [[दापोडी]]कडे गेला. त्यानंतर लगेचच मराठे आवारात घुसले व नासधूस करून ते पेटवून दिले. एल्फिन्स्टन दापोडीला पोचताच त्याने [[बोपोडी]] येथील सैन्याला ताबडतोब कूच करून दापोडीला यायचा हुकुम दिला. ही फौज तेथून पुढे सरकली. मराठ्यांनी [[गणेशखिंड|गणेशखिंडीजवळून]] ब्रिटिशांच्या उजव्या अंगावर चाल केली. मराठ्यांना वाटले होते की इतकी प्रचंड (दहापट) सेना अचानक चाल करून येताना पाहून ब्रिटिश गांगरतील पण तसे न होता ब्रिटिश सैनिकांनी ठिय्या मारला आणि प्रतिकार सुरू केला. मराठ्यांनी हल्ला करायच्या सुरुवातीलाच त्यांचा जरी पटक्याचे निशाण मोडले होते. हा अपशकुन मनात होता म्हणून किंवा ब्रिटिशांचा आवेश पाहून मराठ्यांनी स्वतःच कच खाल्ली. हे पाहून सेनापती [[बापू गोखले]] स्वतः घोड्यावरून लढणाऱ्या तुकड्यांमधून फिरू लागले. त्यांनी सैनिकांना प्रोत्साहन देउन आणि प्रसंगी टोमणे मारून आपली फळी पुढ सरकावयचा प्रयत्न केला. ब्रिटिशांच्या उजव्या बाजूने पुढे सरकत त्यांना घेरण्याचा गोखल्यांचा बेत फसला. घोडेस्वारांचा हा एल्गार ब्रिटिशांसमोरच्या दलदलीत अडकला आणि शत्रूच्या रायफलांनी त्यांच्यावर निशाणबाजी सुरू केली. त्यातूनही सुटून काही मराठा स्वारांनी शत्रूवर धडक मारली परंतु तेथे ते संगीनींनी कापले गेले. उरलेल्या मराठ्यांनी पळ काढला. या गर्दीत गोखल्यांच्या घोड्याला गोळी लागली व त्यांना पायउतार व्हावे लागले. [[मोरोपंत दिक्षीत]] आणि सरदार रास्ते यांनी शत्रूच्या डाव्या फळीवर हल्ला चढवला पण तेथे आता ब्रिटिशांच्या रायफली सज्ज होत्या. मोरोपंत दिक्षीतांना रणांगणावर गोळ्या घालून मारण्यात आले. नेतृत्त्वहीन मराठ्यांनी तेथूनही माघार घेतली. संध्याकाळी ४ वाजता सुरू झालेली ही लढाई चार तासांत संपली. यात मराठ्यांचे सुमारे ५०० सैनिक आणि घोडेस्वार धारातीर्थी पडले तर ८६ ब्रिटिश सैनिक कामी आले.{{sfn|Murray|1901|p=324}}{{sfn|Chhabra|2005|p=19}} ब्रिटिशांनी ही संधी न दवडता लगेच पुण्यावर चाल करून शहराला वेढा घातला. === पेशव्यांचे पलायन === ब्रिटिशांनी [[पुणे|पुण्याकडे]] चाल केलेली पाहून [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीरावाने]] [[हुजुरत]] घेउन [[पुरंदर किल्ला|पुरंदरकडे]] पलायन केले.{{sfn|Duff|1921|p=482}} १३ नोव्हेंबरला जनरल स्मिथ सध्याच्या [[डेक्कन कॉलेज]]च्या जवळील आपल्या छावणीतून मुळा नदी ओलांडून [[घोरपडी]] येथे आला. पेशव्यांच्या पाठलाग रोखण्यासाठी [[बापू गोखले|बापू गोखल्यांनी]] त्याच्याशी झटापटी सुरू ठेवल्या. विंचूरकरांची ५,०००ची फौज मुळा-[[मुठा नदी|मुठेच्या]] फौजेला संगमावर थांबलेली होती. त्याला न जुमानता स्मिथ पुण्यात शिरला. पुण्यात त्याला काहीही प्रतिकार झाला नाही. १७ नोव्हेंबर, १८१७ रोजी ब्रिटिशांनी [[शनिवार वाडा|शनिवार वाड्यात]] प्रवेश करून त्यावर [[युनियन जॅक]] फडकाविला. इकडे पेशवे पुरंदरावरून [[सातारा|साताऱ्याकडे]] आणि नंतर [[कोरेगांव भीमा]] येथे गेले. कोतवाली चावडीवरील भगवे झेंडे तसेच ठेवले गेले. ते आष्टीच्या लढाईनंतर उतरवण्यात आले. १ जानेवारी, १८१८ रोजी ब्रिटिशांनी मराठ्यांना कोरेगावला गाठले. [[एफ‌.एफ. स्टाँटन|कॅप्टन स्टाँटन]] ५,००० शिपाई, २०० भाडोत्री घोडेस्वार आणि ३ किलोचे गोळे फेकणाऱ्या २ तोफा घेउन पुण्याच्या वायव्येस [[भीमा नदी]]च्या काठावरील या गावाजवळ आला. स्टाँटनच्या सैन्यात फक्त २४ युरोपियन होते ते सुद्धा तोफा चालवणारे होते. इतर सगळे एतद्देशीय सैनिक होती.{{sfn|Naravane|2006|p=81}} मराठ्यांनी गावाभोवती तटबंदी उभारून मोर्चेबांधणी केली होती. थंडीच्या मोसमात भीमा नदीत फारसे पाणी नव्हते आणि उथळ पाण्यातून ती सहज पार करता येत होती. स्टाँटनने लगेचच गावाचा ताबा घेतला पण मराठ्यांची तटबंदी त्याला सहजासहजी भेदता आली नाही. त्याने गावाचे व मराठ्यांचे पाणी तोडले. मराठ्यांनी तटबंदीतून बाहेर येउन लढाई सुरू केली. गल्ली-बोळांतून चाललेल्या या हातघाईच्या लढाईत प्रत्येक गल्ली दोन्ही पक्षांच्या हातात अनेकदा आली आणि निसटली. मराठ्यांनी ब्रिटिश तोफांचाही ताबा घेतला पण तो त्यांना राखता आला नाही. मराठा सरदार त्र्यंबकजीने लेफ्टनंट चिशोमला ठार मारले व चिशोमने बापू गोखल्यांचा एकुलता एक मुलगा गोविंदच्या मृत्यूचा वचपा काढला. मराठ्यांनी रातोरात गावातून पाय काढला आणि ते पसार झाले. दुसऱ्या ठिकाणी जाउन तेथे पुन्हा झुंजायचा गनिमी कावा त्यांनी अवलंबलिला होता. या लढाईत मराठ्यांचे ५००-६०० सैनिक कामी आले. जनरल स्टाँटनने आपली फौज घेउन पुण्याकडे कूच केली पण तेथ न जाता तो शिरुर येथेच थांबला. जरी या लढाईत ब्रिटिशांचा विजय झालेला दिसत असला तरी प्रत्यक्षात हा निसटताच होता असे त्यांच्या पत्रव्यवहारात दिसून येते. जानेवारी १८१८मधील नोंदींनुसार ''बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या दुसऱ्या बटालियनच्या १ल्या रेजिमेंटचा कमांडर स्टाँटन सुदैवाने आपला मोर्चा परत सेरूरमध्ये परतू शकला आहे. १२५ जखमी, गोरेगाव येथे ५० पुरले आणि तेथे १२ किंवा १५ सोडले, ते गंभीरपणे जखमी झाले; पेशवे दक्षिणेकडे पळत आहेत. जनरल स्मिथ त्यांच्या मागे लागला आहे, यामुळे कदाचित बटालियन वाचली.'' असे दिसते. लढाईनंतर पळालेले पेशवे [[सातारा|साताऱ्याकडे]] गेले.{{sfn|Duff|1921|p=487}} ब्रिटिशांनी पाठपुरावा केल्यावर{{sfn|Duff|1921|p=487}} ते तसेच दक्षिणेकडे जात राहिले. [[मैसूर संस्थान|मैसूरच्या राजाने]] थारा न दिल्याने ते परत फिरले.{{sfn|Duff|1921|p=483}}{{sfn|Duff|1921|p=488}} पाठलाग करणाऱ्या ब्रिटिशांना बगल देत ते परत [[सोलापूर]]कडे आले.{{sfn|Duff|1921|p=488}} २९ जानेवारीपर्यंत हा उंदीर-मांजराचा खेळ सुरू होता. ब्रिटिश पेशव्यांच्या जवळ आले की लगेच गोखल्यांची फिरती शिबंदी त्यांच्यावर बाहेरून हल्ले करीत त्यांना झुलवत नेत असे.{{sfn|Duff|1921|p=489}} अशा अनेक झटापटींनंतरही पेशवे ब्रिटिशांच्या हातील लागलेले नव्हते. === साताऱ्यात ब्रिटिश === ७ फेब्रुवारी रोजी जनरल स्मिथने [[सातारा|साताऱ्यात]] प्रवेश केला आणि [[सातारा संस्थान|छत्रपतींचा राजवाडा]] ताब्यात घेतला व तेथे आपल्या विजय जगाला दाखविण्यासाठी राजवाड्यावर युनियन जॅक चढविला.{{sfn|Duff|1921|p=489}} तेथील जनतेने भडकू नये म्हणून त्याने जाहीर केले की तो कोणत्याही धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. याशिवाय त्याने जाहीर केले की सर्व वतने, इनाम, निवृत्तीवेतन आणि वार्षिक भत्ते आधीप्रमाणेच सुरू ठेवण्यात येतील. हे ऐकून पेशव्यांच्या सेवेत असलेल्या व त्यांच्या बाजूने अद्यापही असलेल्यांनी ही माघार घेतली आणि ब्रिटिशांविरुद्ध कारवाया करणे बंद केले. === आष्टीची लढाई === {{मुख्य लेख|आष्टीची लढाई}} पेशव्यांचा पाठलाग करणाऱ्या जनरल स्मिथला १९ फेब्रुवारी रोजी कळले की पेशवे [[पंढरपूर]]कडे निघाले आहेत. त्याने या फौजेला वाटेत [[आष्टी (मोहोळ)|आष्टी]] गावाजवळ गाठले आणि निकराचा हल्ला केला. पेशवाईने झुंज घेतलेली ही शेवटची लढाई होती. या लढाईत पेशव्यांच्या बचाव करताना सेनापती बापू गोखले मृत्यू पावले. खुद्द [[दुसरे बाजीराव पेशवे|पेशवे]] तेथून निसटले पण [[सातारा संस्थान|साताऱ्याचे छत्रपती]] आणि त्यांच्या आई यांना स्मिथने बंदी केले. परागंदा झालेले पेशवे आणि ब्रिटिश बंदी झालेल्या छत्रपतींमागे एप्रिल १८१८पर्यंत मराठा साम्राज्य नेतृत्त्वहीन झालेले होते. ब्रिटिशांनी याचा फायदा घेत [[सिंहगड]] आणि [[पुरंदर किल्ला|पुरंदर किल्ले]] जिंकून घेतले.{{sfn|Duff|1921|p=517}} यातील सिंहगडाचा पाडाव अगदी केविलवाणा होता. १३ फेब्रुवारी, १८१८ रोजी माउंस्टुअर्ट एल्फिन्स्टनने आपल्या रोजनिशीत केलेल्या नोंदीनुसार सिंहगडावर एकही मराठा शिबंदी नव्हती. त्यांऐवजी किल्ल्याचा बचाव करण्यासाठी १०० [[अरब]], ६०० [[गोसावी]] आणि ४०० कोंकणी सैनिक होती. कोणी एक ११ वर्षांचा पोरगा किल्लेदार होता. किल्ला जिंकून घेतल्यावर तेथील शिबंदीला ब्रिटिशांनी मानाने वागवले. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात खजिना आणि संपत्ती होती आणि किल्लेदाराने जे आपले म्हणले ते त्याला देउन टाकण्यात आले.{{sfn|Duff|1921|p=517}} === नागपुरातील झटापट === [[चित्र:Sitabuldi_fort_gate.JPG|thumb|250x250px|सीताबर्डी किल्ला आज]] {{मुख्य लेख|सिताबर्डीचा किल्ला}} [[नागपूरकर भोसले|नागपूरचे]] नाममात्र राजे [[परसोजी भोसले]] यांच्या हत्येनंतर त्यांचा चुलतभाउ [[मुधोजी भोसले]] तथा ''अप्पासाहेब'' यांनी गादी बळकावली व आपली सत्ता मजबूत केली. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी २७ मे, १८१६ रोजी ब्रिटिशांशी तह केला.{{sfn|Naravane|2006|p=82}} त्यातील [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीरावाशी]] संपर्क न साधण्याचे कलम धुडकावून भोसल्यांनी पेशवाईशी वाटाघाटी सुरू केल्या. यात व्यत्यय आणण्यासाठी रेसिडेन्ट जेंकिन्सने अप्पासाहेबांना रेसिडेन्सीमध्ये बोलावून घेतले. अप्पासाहेबांनी त्याला नकार देउन उघडपणे पेशवाईला आपला पाठिंबा जाहीर केला. आता नागपूरकरांशी लढाई अटळ असल्याचे दिसत असल्याने जेंकिन्सने [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीच्या]] आसपासच्या ठाण्यांकडून मदत मागवली. त्याच्याकडे सुमारे १,५०० सैनिक होते{{sfn|Burton|1908|p=159}} व आता कर्नल अॅडम्स त्याची फौज घेउन नागपूरकडे निघाला.{{sfn|Naravane|2006|p=82}} नागपूरकरांकडे सुमारे १८,००० सैनिक होते.{{sfn|Burton|1908|p=160}} त्यातील काही तुकड्या अरब होत्या. हे त्यांच्या शूरतेसाठी प्रसिद्ध असले तरी त्यांच्यात शिस्त नव्हती व त्यांच्याकडे फक्त तलवारी आणि जुन्यापुराण्या बंदुका होत्या. ब्रिटिश रेसिडेन्सी [[सीताबर्डी किल्ला|सीताबर्डी किल्ल्याच्या]] पश्चिमेस साधारण २५०-३०० मीटर अंतरावर होती. ब्रिटिशांनी लढाईच्या सुरुवातीस टेकडीच्या उत्तर टोका वर ताबा मिळवला.{sfn|Naravane|2006|p=83}} मराठे व अरबांनी त्यांना तेथून दक्षिणेकडे हुसकावून लावले. यानंतर ब्रिटिशांची कुमक येण्यास सुरुवात झाली. आपल्या सर्व शक्तीनिशी ब्रिटिशांनी मराठ्यांवर हल्ला चढवला आणि मराठ्यांचा पराभव केला. यात ब्रिटिशांनी आपल्या २४ युरोपियन आणि एकूण सुमारे ३०० सैनिक गमावले. मराठ्यांचेही तितकेच नुकसान झाले. अप्पासाहेबांनी ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली. ९ जानेवारी रोजी ब्रिटिश आणि नागपूरकरांनी तह केला. त्यानुसार ब्रिटिशांनी भोसल्यांचा बहुतांश प्रदेश आणि किल्ले हिसकावून घेतले आणि त्यांना नाममात्र प्रदेशावर राज्य करण्याची, ते सुद्धा अनेक निर्बंध घालून, परवानगी दिली. ब्रिटिशांनी सीताबर्डी किल्ल्याजवळ अधिक तटबंदी उभारली. काही दिवसांनी काहीतरी कारण काढून अप्पासाहेबांना अटक करण्यात आली. त्यांनी तेथून पलायन केले. काही दिवसांनी आप्पासाहेबांना अटक करण्यात आली व त्यांना [[प्रयागराज|अलाहाबाद]] येथे नेण्यात आले. तेथे जात असताना त्यांनी पलायन केले आणि [[पंजाब]]मधील शीखांकडे आश्रय मागण्यासाठी त्या दिशेने निघाले. शीखांनी अप्पासाहेबांना थारा दिला नाही आणि ते [[जोधपूर]]जवळ पुन्हा ब्रिटिशांच्या हाती लागले. जोधपूरच्या राजा [[मान सिंग]] याने ब्रिटिशांना अप्पासाहेबांची हमी दिली व त्यांना आपल्या आश्रयास ठेवले. अप्पासाहेब वयाच्या ४४व्या वर्षी १५ जुलै, १८४९ रोजी मृत्यू पावले. === होळकरांचा पाडाव === [[File:Map of India 1823.jpg|thumb|तिसरे अँग्लो-मराठा युद्धानंतरचा भारताचा नकाशा, १८१९]] {{हेसुद्धा पाहा|महिदपूरची लढाई}} या सुमारास [[इंदूर संस्थान|इंदूरच्या]] [[होळकर|होळकरांचा]] दरबार रफादफा झालेला होता. ११ वर्षांचे [[तिसरे मल्हारराव होळकर]] आपल्या वडिलांच्या उपवस्त्र असलेल्या [[तुळशीबाई होळकर]] यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य करीत होते. तुळशीबाईने मल्हाररावांना ब्रिटिशांच्या आधीन होण्याचा सल्ला दिल्याने तिच्याच सैनिकांनी तिची हत्या केली. यानंतर ब्रिटिशांनी होळकरांवर चाल केली व इंदूरच्या उत्तरेस ४० किमी अंतरावर [[महिदपूर]] येथे होळकर सैन्याला गाठले. २१ डिसेंबर १८१७ रोजी सकाळी ९ वाजता ब्रिटिश आणि होळकर एकमेकांच्या पल्ल्यात आले.{{sfn|Hough|1853|p=71}} ब्रिटिशांचे नेतृत्त्व स्वतः लेफ्टनंट जनरल [[थॉमस हिस्लॉप]]कडे होते. या निकराच्या लढाईत होळकरांचे ३,००० सैनिक ठार किंवा जखमी झाले.{{sfn|Keightley|1847|p=165}} ब्रिटिशांनी ८०० सैनिक गमावले.{{sfn|Sarkar|Pati|2000|p=48}} यात होळकांच्या सैन्याचा नाश झाला.{{sfn|Prakash|2002|p=136}} त्यातील उरल्यासुरल्या तुकड्यांचा ब्रिटिशांनी दूरवर पाठलाग करून नायनाट केला. मल्हाररावांना अटक करण्यात आली. त्यांच्या मंत्र्यांनी तहाची बोलणी करून त्यांना सोडवायचा प्रयत्न केला. ६ जानेवारी, १८१८ रोजी होळकरांनी [[मंदेश्वरचा तह]] केला{{sfn|Sinclair|1884|pp=195–196}} आणि त्यात ब्रिटिशांची पूर्णपणे शरणागती मागितली.{{sfn|Prakash|2002|p=136}} ब्रिटिशांनी होळकरांचा खजिना लुटून नेला आणि मल्हाररावांना नाममात्र राजा म्हणून सत्तेवर ठेवले.{{sfn|Sinclair|1884|pp=195–196}} == किल्लेदारांचा प्रतिकार == [[File:Asirgarh Fort1.jpg|thumb|असिरगढचा किल्ला]] युद्ध संपताना १८१८ आणि १८१९मध्ये ब्रिटिशांनी जवळजवळ सगळ्या मराठा संस्थानिक आणि जहागिरदारांचा पाडाव केलेला होता परंतु किल्ल्या-किल्ल्यांमधून अद्यापही स्वातंत्र्याचे भगवे झेंडे फडकत होते. संस्थानिक आणि पेशव्यांनी शरणागती पत्करली असली तरी या किल्ल्यांचे किल्लेदार ब्रिटिशांच्या आधीन झालेले नव्हते. २७ फेब्रुवारी, १८१८ रोजी [[थॉमस हिस्लॉप|जनरल हिस्लॉप]] [[थळनेर किल्ला|थळनेरच्या किल्ल्याजवळ]] आला. त्याला वाटले होते की तेथील किल्लेदार मान तुकवून पुढे येईल परंतु थळनेरचे किल्लेदार [[तुळशीराम मामा]] यांनी आपल्या शिबंदीला ब्रिटिशांवर मारा करण्यास फर्मावले. संतापलेल्या हिस्लॉपने किल्ल्याला वेढा घातला व तोफांनी तो भाजून काढला. नंतर तो स्वतः किल्ल्यावर चालून गेला तेथील अरब आणि मराठा सैनिकांना हरवून किल्ला काबीज केला. मामांना विश्वासघात केल्याच्या आरोपाखाली एका झाडावर फाशी देण्यात आले.<ref>Deshpande, Arvind M., ''John Briggs in Maharashtra: A Study of District Administration Under Early British Rule'' (1987), Mittal Publications, {{isbn|978-0836422504}}, pg. 31</ref> त्यानंतर या प्रदेशातील नराळा आणि [[मालेगाव किल्ला|मालेगावचे किल्लेही]] ब्रिटिशांनी जिंकून घेतले. त्यातल्या त्यात मालेगावने त्यांना झुंजवले. १८१९ च्या मार्चमध्ये [[असिरगढ किल्ला|असिरगढचा किल्ला]] हे एकमेव स्वतंत्र ठिकाण होते. तेथील किल्लेदार [[जसवंत राव लार]]ने ब्रिटिशांना थोपवून धरलेले होते. मार्च्या मध्यावर ब्रिटिशांनी भलीथोरली फौज जमवून किल्ल्याला वेढा घातला आणि [[असिरगढ|शेजारील शहरात]] ठाण मांडले. किल्ल्यात फक्त १,२०० सैनिक होते. त्यांच्यावर सतत तोफांचा मारा करूनही ते बाहेर येत नाहीत हे पाहून ब्रिटिशांनी शेवटी ९ एप्रिल, १८१९ रोजी एल्गार केला आणि मराठा साम्राज्याचे शेवटचे ठाणे परास्त केले. या विजयानिशी ब्रिटिशांनी मोहीम संपवली आणि युद्धाचा अंत झाला<ref>{{cite book |last1=Cannon |first1=Richard |title=Historical Record of the 67th Foot |date=1849 |publisher=Parker, Furnivall & Parker |location=London |url=https://www.gutenberg.org/files/57663/57663-h/57663-h.htm#Page_14}}</ref><ref name="mapw" /> ==युद्धाचा अंत आणि त्याचे परिणाम== [[File:Nassak Diamond copy.jpg|thumb|ब्रिटिशांनी पेशव्याकडून नॅसॅक डायमंड ताब्यात घेऊन लंडनला पाठविला]] [[असिरगढ]]च्या पाडावानंतर मराठ्यांचा सगळा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात आला. [[सातारा संस्थान|साताऱ्याच्या छत्रपतींनी]] ब्रिटिशांचे आधिनत्व स्वीकारल्याने पेशवा हे पद बाद झाले. [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीरावाने]] याआधीच ३ जून, १८१८ रोजी शरणागती घेतली होती परंतु पेशवेपद काढून घेतल्यावर त्याने कायदेशीर आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण काहीही फायदा नव्हता. पेशव्यांना त्यांच्या लवाजम्यासकट [[उत्तर भारत|उत्तर भारतातील]] [[कानपूर]] शहराजवळ [[बिठूर]] येथे रवाना केले गेले.{{sfn|Duff|1921|pp=513–514}} बाजीरावाने वार्षिक ८,००,००० रुपयांचे निवृत्तीवेतन स्वीकारले.{{sfn|Duff|1921|p=513}} याशिवाय आपले सरदार, जहागिरदार, कुटुंब, आश्रित आणि देवस्थानांनाही वार्षिक उत्पन्न देण्याचे कबूल करून घेतले.{{sfn|Duff|1921|p=513}} उत्तरेकडे जाताना पेशव्यांनी आपला खजिना बरोबर नेला होता. त्या शिवाय ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात लूट करून प्रचंड संपत्ती नेली. यात [[नासक हिरा]]ही शामिल होता. बिठूरला गेल्यावर बाजीरावाने उरलेले आयुष्य धर्मकार्ये करण्यात, मद्यपानात आणि अजून लग्ने लावून घेण्यात घालवले.{{sfn|Chhabra|2005|p=21}} पेशव्यांच्या या विलासी जीवनशैलीमुळे त्यांच्याशी तह करणाऱ्या [[जॉन माल्कम]]वर टीका झाली. मराठ्यांचा पराभव आणि पेशव्यांची हकालपट्टीने [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]ला भारतात उत्तरेत [[सतलज नदी|सतलज]] नदीपासून [[दक्षिण भारत|दक्षिण भारतापर्यंत]] जवळजवळ अनिर्बंध सत्ता मिळाली. पेशवाईचा प्रदेश [[बॉम्बे प्रेसिडेन्सी]]मध्ये शामिल केला गेला तर पेंढाऱ्यांकडून जिंकलेला प्रदेश [[सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस]] म्हणून नवीन प्रांत केला गेला. [[शिंदे घराणे|शिंदे]] आणि [[होळकर घराणे|होळकरांची]] संस्थाने त्यांच्याकडेच राहिली आणि त्यांनी इंग्रजांचे सार्वभौमत्व स्वीकारले. [[राजपूताना]]मधील संस्थानिक नाममात्र राजे म्हणून ब्रिटिशांच्या सत्तेखाली आले. त्यांनी साताऱ्यामध्ये [[प्रतापसिंह भोसले]] यांना छत्रपती पदावर बसवले. होळकर कुटुंबातील अगदी लहान मुलाची [[नागपूर संस्थान|नागपूरच्या सिंहासनावर]] वर्णी लागली. [[त्र्यंबकजी डेंगळे]], ज्यांच्यावर गंगाधरशास्त्री यांच्या वधाचा आरोप होता व ज्याने हे प्रकरण हाताबाहेर चिघळले, यांना अटक करून बंगालमध्ये पाठवले गेले. सत्तेवर आल्यानंतर [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]]ने अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. नवीन कायद्यांबरोबरच त्याने प्रांतांची पुनर्रचना करून महसूल वसूलीसाठीची नवीन पद्धत आखली, ज्याने [[देशमुख]], [[पाटील]] आणि [[देशपांडे]] यांचे महत्व कमी झाले. ब्रिटिशांना कळले होते की इतक्या मोठ्या प्रदेशावर सत्ता गाजविण्यासाठी स्थानिक रीतीरिवाज आणि भाषेचा अभ्यास आणि आदर करणे गरजेचे आहे. एल्फिन्स्टनने १८२०मध्ये [[मराठी भाषा]] प्रमाणीकरण करण्याचेही सुरू केले. या युद्धानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धापर्यंत]] भारतावर अनिर्बंध सत्ता गाजवली. == हे सुद्धा पहा == * [[खडकीची लढाई]]<ref name="sacred-texts.com"/> * [[मराठा साम्राज्य]] * [[आष्टीची लढाई]] * [[भीमा कोरेगावची लढाई]] * [[मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी]] * [[पहिले इंग्रज-मराठा युद्ध]] * [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध]] * [[ब्रिटिश साम्राज्य]] * [[ब्रिटिश भारत]] * [[भारताचा इतिहास]] * [[शिवाजी महाराज]] {{क्रम |यादी=इंग्रज-मराठा युद्धे |पासून= |पर्यंत= |मागील= [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध]] |पुढील= --- }} == संदर्भ== {{संदर्भयादी}} {{मराठा साम्राज्य}} [[वर्ग:तिसरे इंग्रज-मराठा युद्ध| ]] [[वर्ग:मराठा साम्राज्य सहभागी असलेली युद्धे]] [[वर्ग:ब्रिटिश साम्राज्य]] [[वर्ग:महाराष्ट्रातील ब्रिटिश राजवट]] [[वर्ग:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सहभागी असलेली युद्धे]] 9drhdoucxk0vj9b83zk6h1nhrb6r81y 2581546 2581544 2025-06-21T08:44:39Z अभय नातू 206 /* नागपुरातील झटापट */ 2581546 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट सैन्य संघर्ष | संघर्ष = तिसरे आंग्ल-मराठा युद्ध | या युद्धाचा भाग = | चित्र = | चित्र रुंदी = | चित्रवर्णन = खडकीची लढाई | दिनांक =[[नोव्हेंबर ५]] [[इ.स. १८१७|१८१७]] - [[इ.स. १८१९|१८१९]] | स्थान =[[मध्य भारत|मध्य]] आणि [[पश्चिम भारत (प्रदेश)|पश्चिम भारत]] | परिणती = ब्रिटिश विजय | सद्यस्थिती = सगळा प्रदेश [[भारतीय प्रजासत्ताक|भारतीय प्रजासत्ताकाचा]] भाग | प्रादेशिक बदल = [[पेशवे|पेशवाई]]चा अंत, मराठा संस्थानिक आणि [[राजपुताना एजन्सी|राजपुतान्यातील]] राजे ब्रिटिशांचे मांडलिक, [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]ला भारतात अनिर्बंध सत्ता | पक्ष१ = * [[Image:Flag of the Maratha Empire.svg|22px]] [[पेशवा]] * [[File:Flag of Gwalior (State).svg|23px]] [[ग्वाल्हेर संस्थान]] * [[File:Indore Flag.svg|23px]] [[इंदूर संस्थान]] * [[File:Nagpur State Flag.png|23px]] [[नागपूर संस्थान]] * [[File:Flag of the Maratha Empire.svg|23px]] [[पेंढारी]] | पक्ष२ = * [[चित्र:Flag of the British East India Company (1801).svg|22px|border]] [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] * [[File:Flag of the State of Hyderabad (18th century-1900).svg|23px]] [[हैदराबाद संस्थान|निझाम]] | सेनापती१ = * [[Image:Flag of the Maratha Empire.svg|22px]] [[दुसरे बाजीराव पेशवे|दुसरे बाजीराव]], [[बापू गोखले]], [[मोरोपंत दीक्षित]], [[त्र्यंबकजी डेंगळे]] * [[File:Indore Flag.svg|23px]] [[हरीराव होळकर]], [[तिसरे मल्हारराव होळकर]] * [[File:Nagpur State Flag.png|23px]] [[दुसरे मुधोजी भोसले]] * [[File:Flag of Gwalior (State).svg|23px]] [[दौलतराव शिंदे]] | सेनापती२ = - * [[चित्र:Flag of the British East India Company (1801).svg|22px|border]] [[फ्रांसिस रॉडोन-हेस्टिंग्स]], [[जॉन माल्कम]], [[थॉमस हिस्लॉप]] * [[File:Flag of the State of Hyderabad (18th century-1900).svg|23px]] [[तिसरा असफ जाह]] | सैन्यबळ१ =१८,००० [[घोडदळ]]<br /> ८,००० [[पायदळ सैनिक]] | सैन्यबळ२ =२,८०० घोडदळ | टिपा = }} '''तिसरे इंग्रज-मराठा युद्ध''' हे [[इ.स. १८१७]]-१८मध्ये [[मराठा साम्राज्य|मराठे]] व [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|इंग्रजांच्यात]] झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण [[भारत|भारतावर]] नियंत्रण मिळवले. या आधी झालेल्या [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध|दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर]] मराठ्यांना आणि ब्रिटिशांना उसंत मिळाली. त्या दरम्यान ब्रिटिशांनी भारतातील स्वतःची शक्ती वाढवली परंतु मराठ्यांनी एकोपा टिकवला नाही आणि ते ब्रिटिशांच्या तुलनेत मराठे राजनैतिक आणि लष्करीदृष्ट्या कमी पडत गेले. अशा पार्श्वभूमीवर [[भारताचे गव्हर्नर जनरल|गव्हर्नर जनरल]] [[लॉर्ड हेस्टिंग्स]]ची नियुक्ती झाली.<ref>http://www.britannica.com/EBchecked/topic/256745/Francis-Rawdon-Hastings-1st-marquess-of-Hastings</ref>. त्याने आपल्या कारकिर्दीत आक्रमक धोरणाचा अवलंब केला. [[इंग्रज-नेपाळ युद्ध|नेपाळ युद्धाच्या]] समाप्तीनंतर [[पेंढारी]] लोकांशी संघर्ष सुरू करून अप्रत्यक्षरीत्या मराठ्यांनाच आव्हान दिले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=https://dl.dropboxusercontent.com/spa/zohkohb0i282t94/Area%20Studies/public/SouthAsia/Ideas/pindaris.html#init |title=संग्रहित प्रत |access-date=2014-12-09 |archive-date=2016-04-03 |archive-url=https://web.archive.org/web/20160403073709/https://dl.dropboxusercontent.com/spa/zohkohb0i282t94/Area%20Studies/public/SouthAsia/Ideas/pindaris.html#init |url-status=dead }}</ref> या व इतर अनेक कारणांमुळे इंग्रज आणि मराठ्यांमध्ये पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पडली. अखेर पेशव्याने अंतिम युद्ध करण्याचा निर्णय घेतला.त्याला अप्पासाहेब भोसले आणि [[मल्हारराव होळकर]] ([[यशवंतराव होळकर|यशवंतराव होळकरांचा]] पुत्र) यांनी साथ दिली.पण युद्धात [[पेशवा]],[[भोसले]] आणि [[होळकर घराणे|होळकरांना]] एकत्र येऊ न देता त्यांना इंग्रजांनी वेगवेगळे पराभूत केले. [[सीताबर्डीची लढाई|सीताबर्डीच्या लढाईत]] [[नागपूरकर भोसले|भोसल्यांचा]], [[महिदपुरची लढाई|महिदपुरच्या लढाईत]] होळकरांचा आणि [[खडकीची लढाई|खडकी]]<ref name="sacred-texts.com">http://www.sacred-texts.com/hin/odd/odd29.htm</ref>, [[कोरेगाव]] व [[आष्टीची लढाई|आष्टा]] येथील लढाईत पेशव्यांचा पराभव झाला. अशा प्रकारे एक एक करीत मराठे इंग्रजांसमोर हरले व सर्वांनी शरणागती पत्करली. हेस्टिंग्सने भोसले, [[पेशवा]] [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीराव दुसरा]] आणि [[शिंदे घराणे|शिंदे]] यांना अपमानजनक तह स्वीकारण्यास भाग पडले. बाजीरावाला पेशवेपद सोडावे लागले आणि त्याचा प्रदेश इंग्रजांनी आपल्या साम्राज्यात विलीन केला. छत्रपतींचे [[सातारा]] राज्य व इतर [[मराठा]] सरदारांच्या प्रदेशावर [[ब्रिटिश]] नियंत्रण प्रस्थापित झाले आणि खऱ्या अर्थाने [[मराठा]] सत्तेची समाप्ती झाली. [[नागपूर संस्थान|नागपूरच्या]] [[मुधोजी भोसले दुसरे]] आणि [[इंदूर संस्थान|इंदूरचे]] [[मल्हारराव होळकर तिसरे]] यांच्या पाठिंब्याने [[पेशवा बाजीराव दुसरा|पेशवा बाजीराव दुसऱ्याच्या]] सैन्याने [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध]] जोरदार हल्ला केला. [[ग्वाल्हेर संस्थान|ग्वाल्हेरचे]] चौथे मोठे मराठा नेते [[दौलतराव शिंदे]] यांनी [[राजस्थान]]वरील नियंत्रण गमावले असले तरीही त्यांनी राजस्थानला दबाव आणि मुत्सद्देगिरीने तटस्थ राहण्याचे पटवून दिले. ब्रिटिशांच्या निर्णायक विजयाने [[मराठा साम्राज्य]] फुटले आणि स्वराज्याचा अंत झाला. पेशवेच्या सैन्याने शक्य तितका प्रतिकार करीत इंग्रजांना रोखण्यासाठी अनेक लहान लढाया लढल्या. शेवटी इंग्रजांनी पेशवाई ताब्यात घेतली आणि दुसऱ्या बाजीरावाला [[कानपूर]]जवळील [[बिठूर]] येथे एका लहान जहागिरीला तडीपार करण्यात आले आले. पेशवाईचा बहुतांश प्रदेश [[बॉम्बे प्रेसिडेन्सी|मुंबई प्रेसिडेंसीमध्ये]] विलीन केला गेला. साताराच्या महाराजांना त्यांच्या संस्थानावर कायम ठेवले गेले. १८४८ मध्ये [[लॉर्ड डलहौसी]]च्या [[डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स]]च्या बनावाखाली बॉम्बे प्रेसिडेन्सीने सातारा संस्थानसुद्धा खालसा केले. [[नागपूर मेट्रो|नागपूर]] व भोवतालच्या राजवटीचा उरलेला भाग, तसेच [[बुंदेलखंड]]मधील पेशव्याचे प्रदेश [[ब्रिटिश राज|ब्रिटिश भारताचे]] [[सौगोर प्रांत|सौगोर]] आणि [[नेरबुद्दा प्रांत]] म्हणून जोडले गेले. ब्रिटिशांनी होळकरांचे [[इंदूर संस्थान|इंदूर]] शिंद्यांचे [[ग्वाल्हेर संस्थान|ग्वाल्हेर]] व पेशव्यांच्या हुकुमतीतील [[झांंसी संस्थान|झांसी]] ही संस्थाने आपल्या अंमलात आणली. ==मराठे आणि इंग्रज== [[चित्र:Joppen1907India1805a-21.jpg|thumb|285x285px|दुसरे अँग्लो-मराठा युद्धानंतरचा १८०५मधील भारताचा नकाशा]] [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांनी]] १६७४ मध्ये स्थापन केलेल्या [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याने]] [[आदिलशाही|विजापूर]], [[निजामशाही|हैदराबाद]] आणि [[मुघल साम्राज्य|दिल्लीच्या मुस्लिस सल्तनतींच्या]] नाकावर टिच्चून स्वराज्य राखले होते. स्थापनेनंतर काही दशकांतच मराठा साम्राज्य भारतातील एक प्रमुख सत्ता झाले. [[रायगड (किल्ला)|रायगड]] किल्ल्यावर राजधानी असलेल्या या साम्राज्याचे व्यवस्थापन आठ मंत्र्यांच्या मंडळाद्वारे ([[अष्टप्रधान]]) केले जात असे. त्यांतील पंतप्रधान पदावर असलेल्या मंत्र्याला [[पेशवे]] हा खिताब होता. कालांतराने मराठा साम्राज्याची सत्ता पेशव्यांच्या हातात आली व [[छत्रपती]] हे नाममात्र राजे उरले. === ब्रिटिशांचा वाढता प्रभाव === [[चित्र:Sir Joshua Reynolds (1723-92) - Francis Rawdon-Hastings (1754-1826), Second Earl of Moira and First Marquess of Hastings - RCIN 407508 - Royal Collection.jpg|200px|इवलेसे|डावे|फ्रांसिस रॉडोन-हेस्टिंग्स, हेस्टिंग्सचा पहिला मार्क्वेस]] अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मराठे आणि [[मुघल साम्राज्य|मोगलांमध्ये]] भारतावरील वर्चस्वासाठी सतत लढाया होत होत्या. या दरम्यान ब्रिटिशांनी [[मुंबई]], [[मद्रास]] आणि [[कोलकाता]] येथे छोट्या छोट्या वखारी स्थापल्या व तेथून व्यापार व पुढे राजकारण करणे सुरू केले. मे १७३९ मध्ये मुंबईजवळील [[वसई]] येथे [[वसईची लढाई|मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केल्याचे]] पाहून ब्रिटिशांनी मुंबईतील आपली आरमारी शिबंदी मजबूत केली. मराठ्यांना मुंबईपासून दूर ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी मराठ्यांशी तहाची बोलणी करण्यासाठी दूत पाठवले. या वाटाघाटींमधून आणि १२ जुलै, १७३९ रोजी एक करार मंजूर झाला, ज्याकरवे [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]ला मराठ्यांच्या प्रदेशात मुक्त व्यापार करण्याचे अधिकार मिळाले. इंग्रज आणि मराठ्यांच्यातील करार पाहून दक्षिणेस [[हैदराबाद]]च्या [[निजामशाही|निजामने]] मराठ्यांविरूद्धच्या युद्धासाठी [[फ्रेंच भारत|फ्रेंच लोकांची]] मदत घेतली. यामुळे पुन्हा पेशव्यांनी इंग्रजांकडून मदत मागितली परंतु इंग्रजांनी त्याला नकार दिला. तरीसुद्धा मराठ्यांनी पुढील पाच वर्षांत निझामाचा पराभव करण्यास यश मिळविले. १७५० ते १७६१ च्या काळात ब्रिटिशांनी भारतात [[फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी]]चा पराभव केला आणि १७९३ पर्यंत त्यांनी पूर्वेकडील [[बंगाल वॉरियर्स|बंगाल]] व दक्षिणेत [[चेन्नई|मद्रास]]मध्ये आपली सत्ता ठाम केली. इकडे पश्चिमेकडे मराठ्यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांच्या महत्त्वाकांक्षेला आळा बसला होता. परंतु ते समुद्रामार्गे पश्चिम किनाऱ्यावरील [[सुरत]]मध्ये दाखल झाले. त्यांचे साम्राज्य वाढत असताना मराठ्यांनी [[सिंधु नदी|सिंधूच्या]] पलीकडे कूच केले. उत्तरेकडील विस्तारित मराठा साम्राज्याची जबाबदारी पेशव्यांनी [[शिंदे घराणे|शिंदे]] आणि [[इंदूर संस्थान|होळकराकडे]] सोपवली होती. पुढे जाता या दोन्ही संस्थानांनी मराठा साम्राज्याऐवजी स्वतःचे स्वार्थ पुढे करणे पसंत केले. त्यांनी साम्राज्याचा [[राजपूत]], [[जाट]] आणि [[रोहिला]] व इतर हिंदू राज्यकर्त्यांपासून बचाव केला असला तरी मुस्लिम आक्रमकांविरुद्ध ते निष्प्रभ होते. १४ जानेवारी, १७६१ रोजी [[पानिपतची तिसरी लढाई|पानिपत येथे]] अफगाण [[अहमद शाह अब्दाली]]विरुद्ध मराठा साम्राज्याचा सडकून पराभव झाला. त्यात मराठा सरदारांची एक संपूर्ण पिढी कापून काढली गेली व साम्राज्य मोडकळीस आले. त्यानंतर [[माधवराव पेशवे|माधवराव पेशव्यांच्या]] अंमलात १७६१ ते १७७३ दरम्यान मराठ्यांनी उत्तरेकडील घालवलेला मोठा प्रदेश परत मिळवला. === आंग्ल-मराठा संबंध === १९७७मध्ये पेशव्यांच्या कौटुंबिक कलह आणि सत्तासंघर्षातून [[नारायणराव पेशवे|मारायणराव पेशव्यांची]] [[नारायणराव पेशव्यांची हत्या|हत्या झाल्यावर]] पेशव्यांचे लक्ष उत्तर आणि मध्य भारताकडे नव्हते. त्यातच होळकर आणि शिंदे यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे [[पुणे|पुण्याची]] सत्ता मध्य भारतात नाममात्रच होती. नारायणरावानंतर पेशवेपदी आलेल्या [[रघुनाथराव पेशवे|रघुनाथरावाला]] वाटले की शिंदे-होळकर थेट पेशव्यांच्या सत्तेलाच आव्हान देतील. याला शह देण्यासाठी त्याने इंग्रजांकडून मदत मागितली. यासाठी इंग्रजांनी [[सुरतेचा करार|सुरतेला करार]] मान्य करून घेतला. यानुसार [[साळशेत बेट]] (आताच्या [[मुंबई]]चा मोठा भाग) आणि [[वसईचा किल्ला]] इंग्रजांच्या हवाली केले गेले आणि इंग्रजांनी पेशव्यांना पाठिंबा जाहीर केला. या कराराचा भारत आणि [[इंग्लंड]]मधील ब्रिटिश सत्तावर्तुळांमध्ये खळबळ माजली. [[ब्रिटिश राजतंत्र|ब्रिटिश राजतंत्राने]] [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीला]] भारतात व्यापार करण्याचा मक्ता दिलेला होता परंतु तेथील सार्वभौम राजांशी इंग्लंडच्या वतीने असे करार करणे हे कायदेबाह्य होते. या कराराच्या अटींवरून [[पहिले इंग्रज-मराठा युद्ध]] पेटले. दोन्ही बाजू तुल्यबळ असल्याने हे युद्ध अनेक वर्षे रखडले. शेवटी [[महादजी शिंदे|महादजी शिंद्यांनी]] मध्यस्थी करून १७८२मध्ये [[सालबाईचा करार]] घडवून हे युद्ध थांबवले. यात इंग्रजांची जरी थेट सरशी झाली नसली तरी [[वॉरेन हेस्टिंग्स]]ने दूरदृष्टी वापरून शिंदे, भोसले आणि पेशवे यांच्यात दुही निर्माण केली. १७८६मध्ये [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनी]]ने [[लॉर्ड कॉर्नवॉलिस]] याला [[भारताचे गव्हर्नर जनरल|भारतातील प्रदेशांचा गव्हर्नर जनरल]] म्हणून नेमले. त्यावेळी [[मराठा साम्राज्य]] मजबूत स्थितीतच होते. [[सालबाईचा तह|सालबाईच्या तहानंतर]] ब्रिटिशांनी [[उत्तर भारत|उत्तर भारतात]] कुरापती न काढता मराठ्यांच्या बरोबरीने राहण्याचे धोरण अवलंबिले. [[पुणे|पुण्यात]] या वेळी ११ वर्षांचा [[सवाई माधवराव पेशवे|सवाई माधवराव]] पेशवेपदावर होता व त्याच्या मंत्री [[नाना फडणवीस|नाना फडणवीसांनी]] मुत्सद्दीपणाने ब्रिटिश, [[निजामशाही|निजाम]], [[फ्रेंच भारत|फ्रेंच]], [[पोर्तुगीज भारत|पोर्तुगीज]], [[शिंदे घराणे|शिंदे]], [[इंदूर संस्थान|होळकर]] व इतर सत्तांशी समतोल साधून ठेवलेला होते. १८०० साली फडणवीसांच्या मृत्यूनंतर पेशवाईत अनागोंदी माजली. शिंदे-होळकर संघर्षात पेशव्यांनी शिंद्यांची बाजू घेतल्याचे वाटून होळकरांनी १८०१मध्ये थेट पुण्यावर हल्ला केला. [[दुसरे बाजीराव पेशवे|पेशवा दुसऱ्या बाजीरावाने]] पुण्यातून ब्रिटिश आरमाराच्या मदतीने पलायन केले. आपली पेशवाई आणि सत्ता गमावण्याची भीती वाटून बाजीरावाने [[वसईचा तह|वसईच्या तहावर]] शिक्कामोर्तब केले. यानुसार पेशवे आता खुद्द शासक न राहता इंग्रजधार्जिणे झाले. याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे आणि [[नागपूरकर भोसले|भोसल्यांनी]] इंग्रजांनी हल्ला केला व १८०३मध्ये [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध]] सुरू झाले. यात इंग्रजांनी मराठा सरदारांचा सडकून पराभव केला व मराठ्यांनी आपला बव्हंश प्रदेश इंग्रजांच्या स्वाधीन केला. === ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी === हजारो मैलांवरून आलेल्या ब्रिटिशांनी भारतीय भूगोलाचा अभ्यास केलेला होता आणि स्थानिक लोकांशी व्यापार करण्यासाठी आणि नंतर त्यांच्यावर सत्ता गाजविण्यासाठी येथील भाषा शिकून घेतलेल्या होत्या. त्यांच्याकडील त्याकाळील अद्ययावत असे तंत्रज्ञान होते आणि भारतातील परिस्थितीत प्रभावीपणे वापरण्यासाठीची शस्त्रे त्यांनी आणलेली होती. काही संशोधकांच्या मते जरी ब्रिटिशांकडे अद्ययावत तंत्रज्ञान नसते तरीही त्यांच्यातील शिस्त व संघटनेच्या जोरावर त्यांनी भारतीयांविरुद्धची बव्हंश युद्धे जिंकली असती. त्याचबरोबर त्यांचा मुत्सद्दीपणा आणि संधिसाधूपणाही त्यांच्या यशाला कारणीभूत होते. [[पहिले इंग्रज-मराठा युद्ध|पहिल्या इंग्रज-मराठा युद्धानंतर]] [[वॉरन हेस्टिंग्स|वॉरेन हेस्टिंग्स]]ने जाहीर केले की मराठ्यांबरोबरचा तह अनेक वर्ष अबाधित राहील. परंतु त्याचबरोबर त्याने [[पुणे|पुण्यातील]] [[पेशवे|पेशव्यांच्या]] दरबारात [[चार्ल्स मॅलेट]] या स्थानिक रीतीरिवाज माहिती असलेल्या व्यापाऱ्याला राजदूत म्हणून नेमले. यायोगे हेस्टिंग्सला पेशव्यांशी सतत संपर्क ठेवायचा होता तसेच तेथील बितंबातमीही काढून आणायची होती. == तिसऱ्या युद्धाची पार्श्वभूमी == [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर]] [[पेशवे|पेशव्यांची]] सत्ता मुख्यत्वे महाराष्ट्रात ''देशा''वर पसरलेली होती. [[कृष्णा नदी|कृष्णा]] आणि [[गोदावरी नदी|गोदावरी नद्यांची]] खोरी आणि त्यांमधील [[सह्याद्री]]च्या पठारावरील प्रदेश हा त्यांच्या थेट अंमलाचा प्रदेश होता. त्यांचे सरदार असलेले [[इंदूर संस्थान|होळकर]] [[इंदूर|इंदूरात]] असून त्यांची सत्ता [[नर्मदा खो|नर्मदा खोऱ्यात]] होती. [[शिंदे घराणे|शिंदे]] [[ग्वाल्हेर]] आणि [[बुंदेलखंड]], [[गंगेचे खोरे|गंगेच्या खोऱ्याच्या]] दक्षिणेकडील टेकड्या आणि सुपीक मैदाने तसेच आसपासच्या प्रदेशावर हुकुमत गाजवत होते. [[चंबळ नदी|चंबळच्या]] दऱ्या, जंगले, [[विंध्य पर्वतरांग|विंध्य पर्वतरांगेच्या]] उत्तरेस आणि आत्ताच्या [[मध्य प्रदेश]]च्या वायव्य भागातील प्रदेश, [[माळवा]] पठार या भागांतून पेंढाऱ्यांचे राज्य होते. === खिळखिळे होत चाललेले मराठा सैन्य === [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर]] मराठा साम्राज्याचा प्रभाव आणि शक्ती काही अंशाने कमी झाली होती.{{sfn|Chhabra|2005|p=39}} युद्धानंतर त्यांनी आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण करण्याकडे दुर्लक्ष केले आणि नवीन तंत्रज्ञान न अजमावता त्याच त्याच जुन्या, कालबाह्य युद्धनीतींवर भर दिला.{{sfn|Chhabra|2005|p=39}} मराठ्यांचा तोफखाना जुन्यापुराण्या तोफांवर भर देउन होता. यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे म्हणजे कठीण काम होते. याउलट युरोपीयनांचा तोफखाना गतिशील आणि भेदक होता. जरी काही प्रमाणात मराठ्यांनी नवीन शस्त्रे अंगिकारली असली तरी ती सगळी आयात केलेली होती. ही हाताळणारे कुशल लोक परदेशी होते. एतद्देशीयांनी ही शस्त्रे स्वतः तयार करण्याचा कधी प्रयत्न केला नाही किंवा त्यांचे तंत्रज्ञानही आत्मसात केले नाही. मराठ्यांचे गुप्तहेर खाते कुशल नव्हते आणि नाना फडणवीसांचा काळ सोडता त्यांच्याकडील मुत्सद्दी देशातील संपूर्ण चित्र पाहण्यास असमर्थ होते. मराठ्यांची घातक पथके [[पेंढारी]] व इतर भाडोत्री सैनिकांनी भरलेली होते. या साम्राज्याला एक वाली नव्हता. खुद्द छत्रपतींच्याही दोन गाद्या होत्या -- [[सातारा संस्थान|सातारा]] आणि [[कोल्हापूर संस्थान|कोल्हापूर]]. [[पश्चिम महाराष्ट्र]] सोडता इतर सगळे प्रदेश तेथील सरदारांच्या अंमलात होते आणि त्यांवर एकसूत्र थेट कारभार अशक्य होता. [[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांचे]] एकछत्री मराठा साम्राज्य आता कॉन्फेडरसी{{मराठी शब्द सुचवा}}मध्ये परिवर्तित झाले होते आणि एकजुटीने परकीय शत्रूशी युद्ध करण्यासाठीची एकता नष्ट झालेली होती.{{sfn|Chhabra|2005|p=39}} === ब्रिटिशांची कारस्थाने === [[चित्र:Mountstuart-Elphinstone.jpg|left|thumb|माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]] मराठा साम्राज्य ढासळत असताना [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनी]] आपली शक्ती वाढवत होती. दुसऱ्या युद्धातील आपल्या विजयाचा पुरेपूर उपयोग करून घेत त्यांनी मराठ्यांना आपल्या टाचेखाली ठेवले होते. जरी [[दुसरे बाजीराव पेशवे|दुसरा बाजीराव]] साम्राज्याचा पेशवा असला तरी पेशव्यांच्या बाजूने असलेले अनेक सरदार, जहागिरदार आणि संस्थानिक ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली किंवा संरक्षणाखाली गेलेले होते. याचा फायदा घेत ब्रिटिशांनी [[बडोदा संस्थान|बडोद्याच्या]] [[गायकवाड घराणे|गायकवाडांबरोबर]] करार करून त्यांच्या संस्थानातील महसूलाचा भाग पेशवाईपर्यंत पोचू नये अशी व्यवस्था केली. यामुळे भडकलेल्या पेशव्यांशी बोलणी करण्यासाठी गायकवाडांनी गंगाधर शास्त्री यांना आपले दूत म्हणून पुण्याला पाठवले. तेथे असताना त्यांची हत्या झाली. या हत्येमागे पेशवाईतील मंत्री [[त्र्यंबक डेंगळे]] असल्याचा संशय गायकवाड आणि ब्रिटिशांनी व्यक्त केला. या प्रकरणाला उचलून धरत ब्रिटिशांनी बाजीरावाला [[पुणे करार (१८८७)|एक करार]] करणे भाग पाडले.{{sfn|Naravane|2006|pp=79–80}} १३ जून, १८८७ रोजी शिक्कामोर्तब झालेल्या या करारानुसार बाजीरावाला गायकवाडांवरील वादावर पडदा टाकणे, त्र्यंबक डेंगळे यांनी गुन्हा कबूल करणे आणि बडोद्याच्या महसूलीवर पाणी सोडणे भाग पडले. याशिवाय पेशवाईने मोठा प्रदेश ब्रिटिशांच्या स्वाधीन केला. यात महाराष्ट्रातील अनेक बेलाग किल्ले आणि [[कोंकण|कोंकणातील]] किनारपट्टी ब्रिटिशांच्या घशात गेली आणि [[नर्मदा नदी|नर्मदेच्या]] उत्तरेस आणि [[तुंगभद्रा नदी|तुंगभद्रेच्या]] दक्षिणेकडील पेशवाईचा सगळा प्रदेश ब्रिटिश आधिपत्याखाली आला. आणि पेशव्यांनी भारतातील इतर कोणत्याही संस्थानाशी वाटाघाटी करू नये असेही मान्य करून घेतले.{{sfn|Chhabra|2005|p=17}} इतकेच नव्हे तर पेशवाईतील ब्रिटिश रेसिडेंट [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]]ने पेशव्यांना आपले घोडदळ बरखास्त करणे भाग पाडून मराठा सैन्याचे कंबरडेच मोडले.{{sfn|Chhabra|2005|p=17}}{{sfn|Naravane|2006|pp=79–80}} === पेंढारी === {{हेसुद्धा पाहा|पेंढारी}} [[File:Malwa_India_1823.png|thumb|१८२३ च्या भारतातील चित्रणात माळव्याचे स्थान. १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात पेंढारी या भागात होते]] पेंढारी किंवा पिंडारी या भारतात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत रयतेची लूटमार व वाटमारी करणाऱ्या संघटित टोळ्या होत्या, ज्यात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाचे लोक होते. यांपैकी पेंढाऱ्यांच्या सशस्त्र संघटित टोळ्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने उदयास आल्या.{{sfn|Naravane|2006|pp=86–87}} घोड्यांवरून आपल्या कारवाया करणारे पेंढारी शिंदेशाही किंवा होळकरशाही असत. अंदाजे ३३,००० शिबंदी असलेल्या{{sfn|Naravane|2006|p=86}} पेंढाऱ्यांच्या सरदारांमध्ये चिटू, तुलसी, इमाम बक्ष, साहिब खान, कादिर बक्ष, नाथू आणि बापू हे होळकरशाही तर करीम खान, दोस्त मोहम्मद हे शिंदेशाही होते. [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर]] शिंदे व होळकर यांनी आपले बरेचसे प्रांत ब्रिटिशांच्या स्वाधीन केले. त्याचा वचपा म्हणून शिंदे आणि होळकरांनी पेंढाऱ्यांना ब्रिटिश प्रांतावर आक्रमण करण्यास उद्युक्त केले. यांच्या धाडींमुळे त्रस्त झालेल्या रयतेला आपले गुजराण करणे अशक्य झाले.{{sfn|Russell|1916|p=396}} उपासमारी किंवा पेंढाऱ्यांना जाउन मिळणे असे दोनच पर्याय त्यांना उरले. १८१५मध्ये सुमारे २५,००० पेंढाऱ्यांची टोळधाड [[मद्रास प्रेसिडेन्सी]]मधील [[कोरोमंडल|कोरोमांडल]] किनाऱ्यालगतच्या प्रदेशावर चालून गेली आणि तेथील ३०० गावे लुटून मारली. अजून एक धाड निजामाच्या हद्दीत तर तिसरी मलबारवर पडली व तेथेही त्यांनी अशीच जाळपोळ केली. १८१७ पर्यंत पेंढाऱ्यांनी ब्रिटिश प्रदेशात छापेमारी सुरू ठेवली. पेंढाऱ्यांचा नायनाट करणे हाच एक उपाय ब्रिटिशांना होता. == व्यूहरचना आणि नियोजन == === मराठा साम्राज्य === [[चित्र:RaigadFort1.jpg|thumb|रायगड किल्ल्यावर जुन्या वाड्याचे अवशेष]] [[पुणे करार (१८१३)|पुणे करारांतर्गत]] पेशव्यांनी आपले घोडदळ बरखास्त केले होते परंतु गुप्तपणे त्यांना सात महिन्यांचे आगाऊ वेतन देउन पेशवाईच्या दिमतीस येण्यास फर्मावले.{{sfn|Naravane|2006|p=80}} बाजीरावने [[बापू गोखले]] यांच्यावर येऊ घातलेल्या युद्धाच्या तयारीची जबाबदारी सोपविली.{{sfn|Duff|1921|pp=468–469}} गोखल्यांनी घोडदळाबरोबरच गुप्ततेतच पायदळाची सुद्ध भरती सुरू केली. यांत [[भिल्ल समाज|भिल्ल]] आणि [[रामोशी]] सैनिकांचा भरणा होता.{{sfn|Duff|1921|p=468}} अगदी पेंढाऱ्यांनाही भाडोत्री सैनिक होण्याचा प्रयत्न केला गेला.{{sfn|Duff|1921|p=468}} ऑगस्ट १८७१मध्ये त्यांनी [[सिंहगड]], [[पुरंदर किल्ला|पुरंदर]] आणि [[रायगड (किल्ला)|रायगड]] किल्ल्यांची डागडुजी करून ते भांडते केले.{{sfn|Duff|1921|p=468}} लष्करी तयारीबरोबरच काही मुत्सद्देगिरीचे ही प्रयत्न झाले. पेशव्यांनी भोसले, शिंदे आणि होळकर यांना पुन्हा आपल्या गोटात येण्याचे आवाहन केले. जसवंतराव घोरपडे सारख्या एल्फिन्स्टनच्या नोकरीतील नाराज एतद्देशीय लोकांचा माग काढून त्यांना गुप्तपणे भरती केले गेले. अशा इतर काही शिपायांनी पेशव्यांना नकार दिला आणि उलट आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पेशव्यांची आगळीक उघड केली.{{sfn|Duff|1921|p=474}}{{sfn|Duff|1921|p=470}} पेशव्यांनी थेट युरोपीयांच्यात फूट पाडणेही अजमावले परंतु ते मात्र शक्य झाले नाही.{{sfn|Duff|1921|p=470}} [[दुसरे बाजीराव पेशवे|पेशवा बाजीराव दुसऱ्याने]] १९ ऑक्टोबर, १८१७ रोजी [[विजयादशमी|दसऱ्याच्या]] उत्सवात मोठे सैन्य जमा केले.{{sfn|Naravane|2006|p=80}} कवायतीदरम्यान घोड्यावर स्वार असलेल्या सैनिकांनी एल्फिन्स्टनच्या दिशेने एल्गार केला परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी मोर्चा वळवला.{{Sfn|Duff|1921|p=471}} [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन|एल्फिन्स्टनला]] धाक दाखवणे आणि त्याच्या नोकरीत असलेल्या एतद्देशीय शिपायांना पेशव्यांच्या बाजूने लढण्यासाठी मनोबळ देणे हा या हिकमतीचा उद्देश होता.{{Sfn|Duff|1921|p=471}}{{sfn|Duff|1921|p=471}} पेशव्यांनी एल्फिन्स्टनची हत्या करण्याचाही कट रचला होता. [[बापू गोखले|गोखल्यांचा]] याला विरोध होता परंतु ही योजना पुढे चालली पण उघडकीला येण्याचा संशय आल्यावर उधळून टाकण्यात आली.{{sfn|Naravane|2006|p=80}} १८१७ च्या सुमारास मराठा साम्राज्याच्या सैन्यदलाचा अंदाज १ बर्टन यांच्या मते असा होता -- पायदळ: अंदाजे ८१,०००. घोडदळ: १,०६०००. तोफा: ५८९. [[पुणे|पुण्यामध्ये]] [[पेशवे|पेशव्यांकडे]] १४,००० शिपाई, २८,००० घोडेस्वार आणि ३७ तोफा होत्या. होळकरांकडे ८,००० सैनिक, २०,००० घोडेस्वार आणि १०७ तोफा होत्या. [[ग्वाल्हेर]]मध्ये [[शिंदे घराणे|शिंदे]] आणि [[इंदूर|इंदूरात]] [[इंदूर संस्थान|होळकरांकडे]] अनुक्रमे १६,००० आणि १८,००० सैनिक; १५,००० आणि १६,००० घोडेस्वार आणि एकूण सुमारे २०० तोफा होत्या. यांशिवाय अफगाण सरदार आमिर खानकडे [[राजपुताना|राजपुतान्यातील]] [[टोंक]] येथे १०,००० सैनिक, १२,००० घोडेस्वार आणि २०० तोफा होत्या{{sfn|Burton|1908|p=153}}{{sfn|Burton|1908|p=153}}{{sfn|Bakshi|Ralhan|2007|p=261}}{{sfn|United Service Institution of India|1901|p=96}} [[चंबळ नदी|चंबळ]] आणि [[माळवा]] तसेच [[नर्मदा खोरे|नर्मदा खोऱ्यांतील]] शिंदेशाही [[पेंढारी]] सरदार चिटू, करीम खान आणि दोस्त मोहम्मद यांच्याकडे अनुक्रमे १०,०००, ६,००० आणि ४,००० सैनिक होते परंतु यांच्याकडे शस्त्रे म्हणजे फक्त भाले होते. होळकरशाही पेंढारी सरदार तुळशी, इमाम बक्ष, साहिब खान, कादिर बक्ष, नथू आणि बापू यांच्यात मिळून २१,५०० सैनिक आणि सुमारे ४,००० घोडेस्वार होते.{{sfn|Naravane|2006|pp=86–87}} === ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी === गायकवाडांच्या राजदूत गंगाधर शास्त्री यांची हत्या म्हणजे पेशव्यांनी भारतातील ब्रिटिश सत्तेला दिलेले आव्हान समजून त्यांचे साम्राज्य गिळण्यासाठी [[फ्रांसिस रॉडोन-हेस्टिंग्स|रॉडोन-हेस्टिंग्सने]] भारतात मोठ्या सैन्याची जमवाजमव सुरू केली.<ref name="mapw">{{cite book |last1=Burton |first1=R.G. |title=The Mahratta And Pindari War |date=1910 |publisher=Government Press |location=Simla |url=https://archive.org/details/in.ernet.dli.2015.284400/mode/2up}}</ref> ब्रिटिशांची भारतातील तोपर्यंतची ही सगळ्यात मोठी फौज होती. १,२०,००० शिबंदी असलेल्या या सैन्याची रचना रॉडोन-हेस्टिंग्सच्या हाताखालील ग्रँड आर्मी तथा बेंगाल आर्मी आणि जनरल [[थॉमस हिस्लॉप]]च्या हाताखालील आर्मी ऑफ द डेक्कन या दोन सैन्यांची मिळवणी होती.{{sfn|Bakshi|Ralhan|2007|p=259}} यात एतद्देशीय सैनिकांच्या ६० बटालियन, ब्रिटिश सैन्याच्या रेजिमेंटमधून रचलेल्या अनेक बटालियन, घोडदळ आणि ड्रगूनच्या अनेक तुकड्या, तोफखाना, इ.चा समावेश होता. ग्रँड आर्मीच्या ४०,००० सैनिकांच्या या फौजेचे तीन विभाग आणि एक अतिरिक्त राखीव विभाग केले गेले. यांतील डाव्या विभागाचे नेतृत्त्व मेजर जनरल मार्शल, मध्य विभाग रॉडोन-हेस्टिंग्स कडे होेते. सैनिक, आर्मी ऑफ द डेक्कनचे ७०,००० सैनिक पाच विभागांत होते. यांचे नेतृत्त्व ब्रिगेडियर जनरल डव्हजन, जनरल हिस्लॉप, जनरल माल्कम ब्रिगेडियर जनरल स्मिथ आणि लेफ्टनंट कर्नल अॅडम्स यांच्याकडे असल्याची नोंद आहे. याव्यतिरिक्त [[चेन्नई|मद्रास]] आणि [[पुणे विमानतळ|पुणे]] येथे दोन बटालियन आणि तोफखान्याच्या तुकड्याही तैनात होत्या. [[मद्रास रेसिडेन्सी]]मध्ये ६ व्या बंगाल घोडदळातील अतिरिक्त तीन तुकड्याही तयारीत होत्या. या सगळ्या सैन्याकडे अद्ययावत शस्त्रे होती तसेच त्यांचे रसदमार्ग उत्तमपणे आखलेले होते. इकडे सैन्य गोळा करीत असताना ब्रिटिशांनी शिंदे, होळकर आणि आमिर खान यांच्याशी बोलणी सुरू केली. या तिन्ही संस्थानातील [[पेंढारी]] ब्रिटिश प्रदेशात धुमाकूळ घालत होते आणि या तिघांनीही [[नेपाळचे राजे|नेपाळच्या राजाबरोबर]] संधान साधून ब्रिटिशांविरुद्ध युती करण्याची बोलणी सुरू केलेली होती.{{sfn|Sinclair|1884|pp=194–195}} याबाबतचा गुप्त पत्रव्यवहार ब्रिटिशांनी पकडला. यावरून त्यांनी संस्थानिकांना पेचात पाडले आणि पेंढाऱ्यांविरुद्ध ब्रिटिशांना मदत करणे आणि पेंढाऱ्यांच्या नवीन टोळ्या उभ्या न होऊ देणे यासाठी ब्रिटिशांनी संस्थानिकांना [[ग्वाल्हेरचा करार|वचन देणे]] भाग पाडले. हा करार, प्रचंड मोठे सैन्याचा दबाव आणि मुत्सद्दीगिरी वापरून ब्रिटिशांनी शिंदे आणि होळकरांना युद्ध सुरू होण्याआधीच बाजूला केले. राजपुतान्यातील आमिर खानला त्याची टोंकची रियासत अबाधित ठेवण्याचे वचन देउन ब्रिटिशांनी त्यालाही परस्पर दूर केले. आमिर खानने ब्रिटिशांवर विश्वास ठेवून आपली सेना बरखास्त केली तोफा ब्रिटिशांना विकून टाकल्या. याशिवाय आपल्या प्रदेशातून पेंढाऱ्यांना हाकलून देण्याचेही कबूल केले.{{sfn|Sinclair|1884|pp=194–195}} ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीस ब्रिटिशांनी ग्रँड आर्मीचा एक विभाग [[सिंधुदुर्ग|सिंध]], दुसरा [[चंबळ विभाग|चंबळ]] आणि तिसरा [[नर्मदेचे खोरे|नर्मदेच्या खोऱ्याच्या]] पूर्व भागात पाठवला. यांचे काम शिंदे आणि होळकर तसेच पेशव्यांच्या मध्ये राखून त्यांची हातमिळवणी रोखणे हा होता. राखीव विभागाने [[राजपुताना|राजपुतान्यात]] आमिर खानच्या हालचालींवर नजर ठेवलेली होती. आर्मी ऑफ द डेक्कनचा पहिला आणि तिसरा विभाग [[हरदा]] येथे ठाण मांडून होता. तेथून ही फौज आसपासच्या किल्ल्यांना शह देउन होती. दुसरा विभाग [[मलारपूर]] येथून [[बेरार घाट|बेरार घाटावर]] लक्ष ठेवून होता तर चौथा विभाग [[पुणे]] आणि [[अमरावती]]च्या आसपासच्या प्रदेशांवर जरब ठेवीत होता. पाचवा विभाग [[होशंगाबाद]] येथे तैनात करण्यात आला. राखीव विभाग [[भीमा नदी|भीमा]] आणि [[कृष्णा नदी|कृष्णा नद्यांच्या]] दोआबात दबा धरून बसला होता. अशा प्रकारे ब्रिटिशांनी मराठ्यांची पूर्णपणे नाकेबंदी करून ठेवलेली होती. == युद्धातील प्रमुख लढाया == [[चित्र:Richard_Colley_Wellesley.jpg|thumb|[[रिचर्ड वेलस्ली (पहिला मार्क्वेस वेलस्ली)|रिचर्ड वेलेस्ली]], पहिला मार्क्वेस वेलेस्लीने आंग्ल-मराठा युद्धात विजय मिळवून कंपनीच्या प्रदेशाचा भारतात विस्तार केला]] काही इतिहासकारांच्या मते तिसरे युद्ध हे [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसऱ्या युद्धाचे]] खरकटे काढण्यासाठीचे होते. ब्रिटिशांना ते पूर्वीच संपवता आले नाही कारण त्यांचे पैसे आणि मनुष्यबळ त्या युद्धाच्या शेवटी कमी पडले.{{sfn|Black|2006|pp=77–78}} परंतु हे सुद्ध लक्षात घेण्याजोगे आहे की ब्रिटिशांनी तिसऱ्या युद्धासाठी कसून तयारी केली होती. त्यासाठी त्यांनी प्रचंड मनुष्यबळ, शस्त्रे, पैसे आणि व्यूहरचना खर्ची घातलेले होते. तिसऱ्या युद्धाची सुरुवात ब्रिटिशांनी पेंढाऱ्यांचा नायनाट करायचा या कथित उद्देशाने केली. === पेंढाऱ्यांवरील हल्ला === १८१७ च्या उन्हाळा व पावसाळ्यात मजबूत नाकेबंदी केल्यावर ब्रिटिश फौजांनी वर्ष संपताना [[पेंढारी|पेंढाऱ्यांच्या]] प्रदेशात आक्रमण केले. जंगलातून आणि खेड्यापाड्यातून राहणाऱ्या पेंढाऱ्यांशी समोरासमोर दोन हात करणे शक्य नाही हे ब्रिटिशांना कळून चुकले होते व त्यांनी व्यूहात्मक हालचाली करीत पेंढाऱ्यांना पश्चिम आणि दक्षिणेकडून दाबण्यास सुरुवात केली. पेंढाऱ्यांची लूटमार व जाळपोळ करण्याची पद्धत पाहून ब्रिटिशांना वाटले होते की या प्रदेशात रसद मिळणे अशक्य आहे म्हणून त्यांनी आपले रसदमार्ग भक्कम केलेले होते. पेंढारी प्रदेशात आल्यावर त्यांना येथे मुबलक प्रमाणात अन्नसाठा आणि इतर रसद मिळून आली व त्यामुळे त्यांची बाजू अधिकच भक्कम झाली.<ref name="mapw" /> पेंढाऱ्यांच्या एकेका गाव, वस्ती आणि अड्ड्यांना घेरा घालत जनरल हिस्लॉप दक्षिणेकडून चालून आला आणि त्याने पेंढाऱ्यांना नर्मदेपलीकडे हुसकावून लावले. रॉडोन-हेस्टिंग्स त्याच्या सैन्यासह येथे दबा धरून बसलेला होता.{{sfn|Sinclair|1884|pp=195–196}} या कचाट्यात सापडलेले करीम खानचे टोळके बेचिराख झाले. ब्रिटिशांनी मोक्याच्या ठिकाणी आपले सैन्य लावलेले असल्यामुळे पेंढाऱ्यांना त्यांच्याच प्रदेशत मुक्त संचार करणे अशक्य झाले व एकमेकांच्या मदतील ते येऊ शकले नाहीत. मुख्य रस्ते बंद झाल्याने त्यांच्या टोळधाडीही बंद झाल्या आणि ते विखुरले. फक्त भाल्यानिशी असलेल्या पेंढाऱ्यांचा प्रशिक्षित ब्रिटिश सैन्याच्या रायफली आणि तोफांसमोर टिकाव लागला नाही. त्यांचे छोट्या छोट्या टोळ्या करून ब्रिटिशांचा वेढा फोडण्याचे प्रयत्न सुद्धा फसले. आता ते पूर्णपणे कोपऱ्यात अडकलेले होते.{{citation needed|date=March 2022}} यापुढे ब्रिटिशांनी हा वेढा आवळायला सुरुवात केली आणि पेंढाऱ्यांच्या टोळ्यांना एक एक करून चेचणे सुरू केले. जरी त्यांचे २३,००० सैनिक उरले असले तरी त्यांच्याकडून एकसंध हल्ला होत नव्हता व केलेले हल्ले ब्रिटिश सैन्य लीलया परतवून लावत होते. पेंढाऱ्यांनी गावागावातून आश्रय घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या पूर्वीच्या क्रुरतेची आठवण ठेवून गावकऱ्यांनी त्यांना थारा दिला नाही. अनेक ठिकाणी त्यांनी पेंढाऱ्यांना पकडून ठार मारले.{{sfn|Sinclair|1884|pp=195–196}} पेंढाऱ्यांनी जंगलाकडे पळ काढला पण तरीही त्यांच्यामागचा ससेमिरा चुकला नाही. त्यांना अपेक्षित मराठ्यांची मदतही आली नाही कारण शिंदे आणि होळकरांना ब्रिटिशांनी ग्वाल्हेरच्या तहाने शह दिलेला होता. एकेकाळी बलाढ्य आणि दहशत पसरवणारे पेंढारी सरदारांचा आता शिकार सुरू झाला. फेब्रुवारी १८१८पर्यंत जवळजवळ सगळ्या मुख्य सरदारांची वासलात लावली गेली. करीम खानने रॉडोन-हेस्टिंग्ससमोर आत्मसमर्पण केले. त्याला गोरखपूर येथे छोटी जमीन देउन तडीपार करण्यात आले. वासिल खानने लढा सुरू ठेवला परंतु ब्रिटिशांच्या हातील लागण्याआधीच त्याने विष घेउन आत्महत्या करून घेतली.{{sfn|Keightley|1847|p=165}} जॉन माल्कमने सेतूचा पिच्छा पुरवला व एक-एक करीत त्याचे साथीदार टिपून मारले. एकटा पडलेल्या सेतूने जंगलात आश्रय घेतला आणि तेथे तो एका नरभक्षी वाघाचा शिकार झाला.{{sfn|Travers|1919|p=19}}{{sfn|Sinclair|1884|p=196}}{{sfn|Hunter|1909|p=495}} मध्य भारतातील गावकऱ्यांमध्ये दहशत पसरवणाऱ्या या पेंढाऱ्यांचा नायनाट केल्यामुळे त्यांच्याकडून ब्रिटिशांना सहानुभूती मिळाली. === खडकीची लढाई === [[File:Battle of Kirki, 1817.jpg|thumb|खडकीची लढाई, १८१७]] {{मुख्य लेख|खडकीची लढाई}} [[चित्र:Battle of khadaki.svg|left|thumb|300px| खडकीच्या लढाईतील दोन्ही सैन्यांची व्यूहरचना]] ब्रिटिश आपली फौज [[मध्य भारत|मध्य भारतात]] [[पेंढारी|पेंढाऱ्यांच्या]] मागावर लावत असल्याने त्यांची दक्षिणेतील कुमक कमी झाली होती. ही संधी साधत [[पेशवे|पेशव्यांनी]] [[पुणे|पुण्याजवळ]] त्यांच्यावर असावध असताना हल्ला करण्याचे ठरवले. या सुमारास ब्रिटिशांचे फक्त १,००० पायदळ सैनिक आणि २,००० घोडेस्वार तसेच ८ तोफा पुण्याजवळ दापोडी व बोपोडी येथे तैनात होते. पेशव्यांनी २०,००० घोडेस्वार आणि ८,००० पायदळ सैनिक पुण्यात जमा केले व दिमतीला २० तोफाही होत्या.<ref name="Naravane">{{cite book |last=Naravane |first=M. S. |title=Battles of the Honorourable East India Company (Making of the Raj) |publisher=A.P.H. Publishing Corporation |year=2014 |isbn=9788131300343 |location=New Delhi |pages=80–82}}</ref> ही सगळी हालचाल पेशवे पर्वती टेकडीवरून दुर्बिणीतून पहात होते. त्यांच्यासोबत हुजुरातीतील ५,००० घोडेस्वार आणि १,००० सैनिक होते. खडकीच्या टेकडीवर ब्रिटिशांचे टेहळे होते. चतुःश्रृंगी टेकडी आणि खडकी टेकडी यांच्यामधील गणेशखिंडीतून मराठ्यांची चाल होणार होती. अनेक ठिकाणी उथळ असलेली मुळा नदी ओलांडून तेथील ओढे व नाल्यांमधून पुढे सरकत ब्रिटिशांना मागून घेरण्याचा मराठ्यांचा व्यूह होता. ५ नोव्हेंबर, १८१७ रोजी संध्याकाळी ४ वाजता सरदार विंचूरकरांनी ब्रिटिश रेसिडेंट [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]]च्या बंगल्यावर हल्ला केला. हा बंगला आत्ताच्या [[शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे)|शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या]] आवारात होता. तोफांचा मारा सुरू होताच एल्फिन्स्टन पळून [[दापोडी]]कडे गेला. त्यानंतर लगेचच मराठे आवारात घुसले व नासधूस करून ते पेटवून दिले. एल्फिन्स्टन दापोडीला पोचताच त्याने [[बोपोडी]] येथील सैन्याला ताबडतोब कूच करून दापोडीला यायचा हुकुम दिला. ही फौज तेथून पुढे सरकली. मराठ्यांनी [[गणेशखिंड|गणेशखिंडीजवळून]] ब्रिटिशांच्या उजव्या अंगावर चाल केली. मराठ्यांना वाटले होते की इतकी प्रचंड (दहापट) सेना अचानक चाल करून येताना पाहून ब्रिटिश गांगरतील पण तसे न होता ब्रिटिश सैनिकांनी ठिय्या मारला आणि प्रतिकार सुरू केला. मराठ्यांनी हल्ला करायच्या सुरुवातीलाच त्यांचा जरी पटक्याचे निशाण मोडले होते. हा अपशकुन मनात होता म्हणून किंवा ब्रिटिशांचा आवेश पाहून मराठ्यांनी स्वतःच कच खाल्ली. हे पाहून सेनापती [[बापू गोखले]] स्वतः घोड्यावरून लढणाऱ्या तुकड्यांमधून फिरू लागले. त्यांनी सैनिकांना प्रोत्साहन देउन आणि प्रसंगी टोमणे मारून आपली फळी पुढ सरकावयचा प्रयत्न केला. ब्रिटिशांच्या उजव्या बाजूने पुढे सरकत त्यांना घेरण्याचा गोखल्यांचा बेत फसला. घोडेस्वारांचा हा एल्गार ब्रिटिशांसमोरच्या दलदलीत अडकला आणि शत्रूच्या रायफलांनी त्यांच्यावर निशाणबाजी सुरू केली. त्यातूनही सुटून काही मराठा स्वारांनी शत्रूवर धडक मारली परंतु तेथे ते संगीनींनी कापले गेले. उरलेल्या मराठ्यांनी पळ काढला. या गर्दीत गोखल्यांच्या घोड्याला गोळी लागली व त्यांना पायउतार व्हावे लागले. [[मोरोपंत दिक्षीत]] आणि सरदार रास्ते यांनी शत्रूच्या डाव्या फळीवर हल्ला चढवला पण तेथे आता ब्रिटिशांच्या रायफली सज्ज होत्या. मोरोपंत दिक्षीतांना रणांगणावर गोळ्या घालून मारण्यात आले. नेतृत्त्वहीन मराठ्यांनी तेथूनही माघार घेतली. संध्याकाळी ४ वाजता सुरू झालेली ही लढाई चार तासांत संपली. यात मराठ्यांचे सुमारे ५०० सैनिक आणि घोडेस्वार धारातीर्थी पडले तर ८६ ब्रिटिश सैनिक कामी आले.{{sfn|Murray|1901|p=324}}{{sfn|Chhabra|2005|p=19}} ब्रिटिशांनी ही संधी न दवडता लगेच पुण्यावर चाल करून शहराला वेढा घातला. === पेशव्यांचे पलायन === ब्रिटिशांनी [[पुणे|पुण्याकडे]] चाल केलेली पाहून [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीरावाने]] [[हुजुरत]] घेउन [[पुरंदर किल्ला|पुरंदरकडे]] पलायन केले.{{sfn|Duff|1921|p=482}} १३ नोव्हेंबरला जनरल स्मिथ सध्याच्या [[डेक्कन कॉलेज]]च्या जवळील आपल्या छावणीतून मुळा नदी ओलांडून [[घोरपडी]] येथे आला. पेशव्यांच्या पाठलाग रोखण्यासाठी [[बापू गोखले|बापू गोखल्यांनी]] त्याच्याशी झटापटी सुरू ठेवल्या. विंचूरकरांची ५,०००ची फौज मुळा-[[मुठा नदी|मुठेच्या]] फौजेला संगमावर थांबलेली होती. त्याला न जुमानता स्मिथ पुण्यात शिरला. पुण्यात त्याला काहीही प्रतिकार झाला नाही. १७ नोव्हेंबर, १८१७ रोजी ब्रिटिशांनी [[शनिवार वाडा|शनिवार वाड्यात]] प्रवेश करून त्यावर [[युनियन जॅक]] फडकाविला. इकडे पेशवे पुरंदरावरून [[सातारा|साताऱ्याकडे]] आणि नंतर [[कोरेगांव भीमा]] येथे गेले. कोतवाली चावडीवरील भगवे झेंडे तसेच ठेवले गेले. ते आष्टीच्या लढाईनंतर उतरवण्यात आले. १ जानेवारी, १८१८ रोजी ब्रिटिशांनी मराठ्यांना कोरेगावला गाठले. [[एफ‌.एफ. स्टाँटन|कॅप्टन स्टाँटन]] ५,००० शिपाई, २०० भाडोत्री घोडेस्वार आणि ३ किलोचे गोळे फेकणाऱ्या २ तोफा घेउन पुण्याच्या वायव्येस [[भीमा नदी]]च्या काठावरील या गावाजवळ आला. स्टाँटनच्या सैन्यात फक्त २४ युरोपियन होते ते सुद्धा तोफा चालवणारे होते. इतर सगळे एतद्देशीय सैनिक होती.{{sfn|Naravane|2006|p=81}} मराठ्यांनी गावाभोवती तटबंदी उभारून मोर्चेबांधणी केली होती. थंडीच्या मोसमात भीमा नदीत फारसे पाणी नव्हते आणि उथळ पाण्यातून ती सहज पार करता येत होती. स्टाँटनने लगेचच गावाचा ताबा घेतला पण मराठ्यांची तटबंदी त्याला सहजासहजी भेदता आली नाही. त्याने गावाचे व मराठ्यांचे पाणी तोडले. मराठ्यांनी तटबंदीतून बाहेर येउन लढाई सुरू केली. गल्ली-बोळांतून चाललेल्या या हातघाईच्या लढाईत प्रत्येक गल्ली दोन्ही पक्षांच्या हातात अनेकदा आली आणि निसटली. मराठ्यांनी ब्रिटिश तोफांचाही ताबा घेतला पण तो त्यांना राखता आला नाही. मराठा सरदार त्र्यंबकजीने लेफ्टनंट चिशोमला ठार मारले व चिशोमने बापू गोखल्यांचा एकुलता एक मुलगा गोविंदच्या मृत्यूचा वचपा काढला. मराठ्यांनी रातोरात गावातून पाय काढला आणि ते पसार झाले. दुसऱ्या ठिकाणी जाउन तेथे पुन्हा झुंजायचा गनिमी कावा त्यांनी अवलंबलिला होता. या लढाईत मराठ्यांचे ५००-६०० सैनिक कामी आले. जनरल स्टाँटनने आपली फौज घेउन पुण्याकडे कूच केली पण तेथ न जाता तो शिरुर येथेच थांबला. जरी या लढाईत ब्रिटिशांचा विजय झालेला दिसत असला तरी प्रत्यक्षात हा निसटताच होता असे त्यांच्या पत्रव्यवहारात दिसून येते. जानेवारी १८१८मधील नोंदींनुसार ''बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या दुसऱ्या बटालियनच्या १ल्या रेजिमेंटचा कमांडर स्टाँटन सुदैवाने आपला मोर्चा परत सेरूरमध्ये परतू शकला आहे. १२५ जखमी, गोरेगाव येथे ५० पुरले आणि तेथे १२ किंवा १५ सोडले, ते गंभीरपणे जखमी झाले; पेशवे दक्षिणेकडे पळत आहेत. जनरल स्मिथ त्यांच्या मागे लागला आहे, यामुळे कदाचित बटालियन वाचली.'' असे दिसते. लढाईनंतर पळालेले पेशवे [[सातारा|साताऱ्याकडे]] गेले.{{sfn|Duff|1921|p=487}} ब्रिटिशांनी पाठपुरावा केल्यावर{{sfn|Duff|1921|p=487}} ते तसेच दक्षिणेकडे जात राहिले. [[मैसूर संस्थान|मैसूरच्या राजाने]] थारा न दिल्याने ते परत फिरले.{{sfn|Duff|1921|p=483}}{{sfn|Duff|1921|p=488}} पाठलाग करणाऱ्या ब्रिटिशांना बगल देत ते परत [[सोलापूर]]कडे आले.{{sfn|Duff|1921|p=488}} २९ जानेवारीपर्यंत हा उंदीर-मांजराचा खेळ सुरू होता. ब्रिटिश पेशव्यांच्या जवळ आले की लगेच गोखल्यांची फिरती शिबंदी त्यांच्यावर बाहेरून हल्ले करीत त्यांना झुलवत नेत असे.{{sfn|Duff|1921|p=489}} अशा अनेक झटापटींनंतरही पेशवे ब्रिटिशांच्या हातील लागलेले नव्हते. === साताऱ्यात ब्रिटिश === ७ फेब्रुवारी रोजी जनरल स्मिथने [[सातारा|साताऱ्यात]] प्रवेश केला आणि [[सातारा संस्थान|छत्रपतींचा राजवाडा]] ताब्यात घेतला व तेथे आपल्या विजय जगाला दाखविण्यासाठी राजवाड्यावर युनियन जॅक चढविला.{{sfn|Duff|1921|p=489}} तेथील जनतेने भडकू नये म्हणून त्याने जाहीर केले की तो कोणत्याही धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. याशिवाय त्याने जाहीर केले की सर्व वतने, इनाम, निवृत्तीवेतन आणि वार्षिक भत्ते आधीप्रमाणेच सुरू ठेवण्यात येतील. हे ऐकून पेशव्यांच्या सेवेत असलेल्या व त्यांच्या बाजूने अद्यापही असलेल्यांनी ही माघार घेतली आणि ब्रिटिशांविरुद्ध कारवाया करणे बंद केले. === आष्टीची लढाई === {{मुख्य लेख|आष्टीची लढाई}} पेशव्यांचा पाठलाग करणाऱ्या जनरल स्मिथला १९ फेब्रुवारी रोजी कळले की पेशवे [[पंढरपूर]]कडे निघाले आहेत. त्याने या फौजेला वाटेत [[आष्टी (मोहोळ)|आष्टी]] गावाजवळ गाठले आणि निकराचा हल्ला केला. पेशवाईने झुंज घेतलेली ही शेवटची लढाई होती. या लढाईत पेशव्यांच्या बचाव करताना सेनापती बापू गोखले मृत्यू पावले. खुद्द [[दुसरे बाजीराव पेशवे|पेशवे]] तेथून निसटले पण [[सातारा संस्थान|साताऱ्याचे छत्रपती]] आणि त्यांच्या आई यांना स्मिथने बंदी केले. परागंदा झालेले पेशवे आणि ब्रिटिश बंदी झालेल्या छत्रपतींमागे एप्रिल १८१८पर्यंत मराठा साम्राज्य नेतृत्त्वहीन झालेले होते. ब्रिटिशांनी याचा फायदा घेत [[सिंहगड]] आणि [[पुरंदर किल्ला|पुरंदर किल्ले]] जिंकून घेतले.{{sfn|Duff|1921|p=517}} यातील सिंहगडाचा पाडाव अगदी केविलवाणा होता. १३ फेब्रुवारी, १८१८ रोजी माउंस्टुअर्ट एल्फिन्स्टनने आपल्या रोजनिशीत केलेल्या नोंदीनुसार सिंहगडावर एकही मराठा शिबंदी नव्हती. त्यांऐवजी किल्ल्याचा बचाव करण्यासाठी १०० [[अरब]], ६०० [[गोसावी]] आणि ४०० कोंकणी सैनिक होती. कोणी एक ११ वर्षांचा पोरगा किल्लेदार होता. किल्ला जिंकून घेतल्यावर तेथील शिबंदीला ब्रिटिशांनी मानाने वागवले. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात खजिना आणि संपत्ती होती आणि किल्लेदाराने जे आपले म्हणले ते त्याला देउन टाकण्यात आले.{{sfn|Duff|1921|p=517}} === नागपुरातील झटापट === [[चित्र:Sitabuldi_fort_gate.JPG|thumb|250x250px|सीताबर्डी किल्ला आज]] {{मुख्य लेख|सिताबर्डीचा किल्ला}} [[नागपूरकर भोसले|नागपूरचे]] नाममात्र राजे [[परसोजी भोसले]] यांच्या हत्येनंतर त्यांचा चुलतभाउ [[मुधोजी भोसले]] तथा ''अप्पासाहेब'' यांनी गादी बळकावली व आपली सत्ता मजबूत केली. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी २७ मे, १८१६ रोजी ब्रिटिशांशी तह केला.{{sfn|Naravane|2006|p=82}} त्यातील [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीरावाशी]] संपर्क न साधण्याचे कलम धुडकावून भोसल्यांनी पेशवाईशी वाटाघाटी सुरू केल्या. यात व्यत्यय आणण्यासाठी रेसिडेन्ट जेंकिन्सने अप्पासाहेबांना रेसिडेन्सीमध्ये बोलावून घेतले. अप्पासाहेबांनी त्याला नकार देउन उघडपणे पेशवाईला आपला पाठिंबा जाहीर केला. आता नागपूरकरांशी लढाई अटळ असल्याचे दिसत असल्याने जेंकिन्सने [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीच्या]] आसपासच्या ठाण्यांकडून मदत मागवली. त्याच्याकडे सुमारे १,५०० सैनिक होते{{sfn|Burton|1908|p=159}} व आता कर्नल अॅडम्स त्याची फौज घेउन नागपूरकडे निघाला.{{sfn|Naravane|2006|p=82}} नागपूरकरांकडे सुमारे १८,००० सैनिक होते.{{sfn|Burton|1908|p=160}} त्यातील काही तुकड्या अरब होत्या. हे त्यांच्या शूरतेसाठी प्रसिद्ध असले तरी त्यांच्यात शिस्त नव्हती व त्यांच्याकडे फक्त तलवारी आणि जुन्यापुराण्या बंदुका होत्या. ब्रिटिश रेसिडेन्सी [[सीताबर्डी किल्ला|सीताबर्डी किल्ल्याच्या]] पश्चिमेस साधारण २५०-३०० मीटर अंतरावर होती. ब्रिटिशांनी [[सीताबर्डीची लढाई|लढाईच्या सुरुवातीस]] टेकडीच्या उत्तर टोका वर ताबा मिळवला.{{sfn|Naravane|2006|p=83}} मराठे व अरबांनी त्यांना तेथून दक्षिणेकडे हुसकावून लावले. यानंतर ब्रिटिशांची कुमक येण्यास सुरुवात झाली. आपल्या सर्व शक्तीनिशी ब्रिटिशांनी मराठ्यांवर हल्ला चढवला आणि मराठ्यांचा पराभव केला. यात ब्रिटिशांनी आपल्या २४ युरोपियन आणि एकूण सुमारे ३०० सैनिक गमावले. मराठ्यांचेही तितकेच नुकसान झाले. अप्पासाहेबांनी ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली. ९ जानेवारी रोजी ब्रिटिश आणि नागपूरकरांनी तह केला. त्यानुसार ब्रिटिशांनी भोसल्यांचा बहुतांश प्रदेश आणि किल्ले हिसकावून घेतले आणि त्यांना नाममात्र प्रदेशावर राज्य करण्याची, ते सुद्धा अनेक निर्बंध घालून, परवानगी दिली. ब्रिटिशांनी सीताबर्डी किल्ल्याजवळ अधिक तटबंदी उभारली. काही दिवसांनी काहीतरी कारण काढून अप्पासाहेबांना अटक करण्यात आली. त्यांनी तेथून पलायन केले. काही दिवसांनी आप्पासाहेबांना अटक करण्यात आली व त्यांना [[प्रयागराज|अलाहाबाद]] येथे नेण्यात आले. तेथे जात असताना त्यांनी पलायन केले आणि [[पंजाब]]मधील शीखांकडे आश्रय मागण्यासाठी त्या दिशेने निघाले. शीखांनी अप्पासाहेबांना थारा दिला नाही आणि ते [[जोधपूर]]जवळ पुन्हा ब्रिटिशांच्या हाती लागले. जोधपूरच्या राजा [[मान सिंग]] याने ब्रिटिशांना अप्पासाहेबांची हमी दिली व त्यांना आपल्या आश्रयास ठेवले. अप्पासाहेब वयाच्या ४४व्या वर्षी १५ जुलै, १८४९ रोजी मृत्यू पावले. === होळकरांचा पाडाव === [[File:Map of India 1823.jpg|thumb|तिसरे अँग्लो-मराठा युद्धानंतरचा भारताचा नकाशा, १८१९]] {{हेसुद्धा पाहा|महिदपूरची लढाई}} या सुमारास [[इंदूर संस्थान|इंदूरच्या]] [[होळकर|होळकरांचा]] दरबार रफादफा झालेला होता. ११ वर्षांचे [[तिसरे मल्हारराव होळकर]] आपल्या वडिलांच्या उपवस्त्र असलेल्या [[तुळशीबाई होळकर]] यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य करीत होते. तुळशीबाईने मल्हाररावांना ब्रिटिशांच्या आधीन होण्याचा सल्ला दिल्याने तिच्याच सैनिकांनी तिची हत्या केली. यानंतर ब्रिटिशांनी होळकरांवर चाल केली व इंदूरच्या उत्तरेस ४० किमी अंतरावर [[महिदपूर]] येथे होळकर सैन्याला गाठले. २१ डिसेंबर १८१७ रोजी सकाळी ९ वाजता ब्रिटिश आणि होळकर एकमेकांच्या पल्ल्यात आले.{{sfn|Hough|1853|p=71}} ब्रिटिशांचे नेतृत्त्व स्वतः लेफ्टनंट जनरल [[थॉमस हिस्लॉप]]कडे होते. या निकराच्या लढाईत होळकरांचे ३,००० सैनिक ठार किंवा जखमी झाले.{{sfn|Keightley|1847|p=165}} ब्रिटिशांनी ८०० सैनिक गमावले.{{sfn|Sarkar|Pati|2000|p=48}} यात होळकांच्या सैन्याचा नाश झाला.{{sfn|Prakash|2002|p=136}} त्यातील उरल्यासुरल्या तुकड्यांचा ब्रिटिशांनी दूरवर पाठलाग करून नायनाट केला. मल्हाररावांना अटक करण्यात आली. त्यांच्या मंत्र्यांनी तहाची बोलणी करून त्यांना सोडवायचा प्रयत्न केला. ६ जानेवारी, १८१८ रोजी होळकरांनी [[मंदेश्वरचा तह]] केला{{sfn|Sinclair|1884|pp=195–196}} आणि त्यात ब्रिटिशांची पूर्णपणे शरणागती मागितली.{{sfn|Prakash|2002|p=136}} ब्रिटिशांनी होळकरांचा खजिना लुटून नेला आणि मल्हाररावांना नाममात्र राजा म्हणून सत्तेवर ठेवले.{{sfn|Sinclair|1884|pp=195–196}} == किल्लेदारांचा प्रतिकार == [[File:Asirgarh Fort1.jpg|thumb|असिरगढचा किल्ला]] युद्ध संपताना १८१८ आणि १८१९मध्ये ब्रिटिशांनी जवळजवळ सगळ्या मराठा संस्थानिक आणि जहागिरदारांचा पाडाव केलेला होता परंतु किल्ल्या-किल्ल्यांमधून अद्यापही स्वातंत्र्याचे भगवे झेंडे फडकत होते. संस्थानिक आणि पेशव्यांनी शरणागती पत्करली असली तरी या किल्ल्यांचे किल्लेदार ब्रिटिशांच्या आधीन झालेले नव्हते. २७ फेब्रुवारी, १८१८ रोजी [[थॉमस हिस्लॉप|जनरल हिस्लॉप]] [[थळनेर किल्ला|थळनेरच्या किल्ल्याजवळ]] आला. त्याला वाटले होते की तेथील किल्लेदार मान तुकवून पुढे येईल परंतु थळनेरचे किल्लेदार [[तुळशीराम मामा]] यांनी आपल्या शिबंदीला ब्रिटिशांवर मारा करण्यास फर्मावले. संतापलेल्या हिस्लॉपने किल्ल्याला वेढा घातला व तोफांनी तो भाजून काढला. नंतर तो स्वतः किल्ल्यावर चालून गेला तेथील अरब आणि मराठा सैनिकांना हरवून किल्ला काबीज केला. मामांना विश्वासघात केल्याच्या आरोपाखाली एका झाडावर फाशी देण्यात आले.<ref>Deshpande, Arvind M., ''John Briggs in Maharashtra: A Study of District Administration Under Early British Rule'' (1987), Mittal Publications, {{isbn|978-0836422504}}, pg. 31</ref> त्यानंतर या प्रदेशातील नराळा आणि [[मालेगाव किल्ला|मालेगावचे किल्लेही]] ब्रिटिशांनी जिंकून घेतले. त्यातल्या त्यात मालेगावने त्यांना झुंजवले. १८१९ च्या मार्चमध्ये [[असिरगढ किल्ला|असिरगढचा किल्ला]] हे एकमेव स्वतंत्र ठिकाण होते. तेथील किल्लेदार [[जसवंत राव लार]]ने ब्रिटिशांना थोपवून धरलेले होते. मार्च्या मध्यावर ब्रिटिशांनी भलीथोरली फौज जमवून किल्ल्याला वेढा घातला आणि [[असिरगढ|शेजारील शहरात]] ठाण मांडले. किल्ल्यात फक्त १,२०० सैनिक होते. त्यांच्यावर सतत तोफांचा मारा करूनही ते बाहेर येत नाहीत हे पाहून ब्रिटिशांनी शेवटी ९ एप्रिल, १८१९ रोजी एल्गार केला आणि मराठा साम्राज्याचे शेवटचे ठाणे परास्त केले. या विजयानिशी ब्रिटिशांनी मोहीम संपवली आणि युद्धाचा अंत झाला<ref>{{cite book |last1=Cannon |first1=Richard |title=Historical Record of the 67th Foot |date=1849 |publisher=Parker, Furnivall & Parker |location=London |url=https://www.gutenberg.org/files/57663/57663-h/57663-h.htm#Page_14}}</ref><ref name="mapw" /> ==युद्धाचा अंत आणि त्याचे परिणाम== [[File:Nassak Diamond copy.jpg|thumb|ब्रिटिशांनी पेशव्याकडून नॅसॅक डायमंड ताब्यात घेऊन लंडनला पाठविला]] [[असिरगढ]]च्या पाडावानंतर मराठ्यांचा सगळा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात आला. [[सातारा संस्थान|साताऱ्याच्या छत्रपतींनी]] ब्रिटिशांचे आधिनत्व स्वीकारल्याने पेशवा हे पद बाद झाले. [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीरावाने]] याआधीच ३ जून, १८१८ रोजी शरणागती घेतली होती परंतु पेशवेपद काढून घेतल्यावर त्याने कायदेशीर आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण काहीही फायदा नव्हता. पेशव्यांना त्यांच्या लवाजम्यासकट [[उत्तर भारत|उत्तर भारतातील]] [[कानपूर]] शहराजवळ [[बिठूर]] येथे रवाना केले गेले.{{sfn|Duff|1921|pp=513–514}} बाजीरावाने वार्षिक ८,००,००० रुपयांचे निवृत्तीवेतन स्वीकारले.{{sfn|Duff|1921|p=513}} याशिवाय आपले सरदार, जहागिरदार, कुटुंब, आश्रित आणि देवस्थानांनाही वार्षिक उत्पन्न देण्याचे कबूल करून घेतले.{{sfn|Duff|1921|p=513}} उत्तरेकडे जाताना पेशव्यांनी आपला खजिना बरोबर नेला होता. त्या शिवाय ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात लूट करून प्रचंड संपत्ती नेली. यात [[नासक हिरा]]ही शामिल होता. बिठूरला गेल्यावर बाजीरावाने उरलेले आयुष्य धर्मकार्ये करण्यात, मद्यपानात आणि अजून लग्ने लावून घेण्यात घालवले.{{sfn|Chhabra|2005|p=21}} पेशव्यांच्या या विलासी जीवनशैलीमुळे त्यांच्याशी तह करणाऱ्या [[जॉन माल्कम]]वर टीका झाली. मराठ्यांचा पराभव आणि पेशव्यांची हकालपट्टीने [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]ला भारतात उत्तरेत [[सतलज नदी|सतलज]] नदीपासून [[दक्षिण भारत|दक्षिण भारतापर्यंत]] जवळजवळ अनिर्बंध सत्ता मिळाली. पेशवाईचा प्रदेश [[बॉम्बे प्रेसिडेन्सी]]मध्ये शामिल केला गेला तर पेंढाऱ्यांकडून जिंकलेला प्रदेश [[सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस]] म्हणून नवीन प्रांत केला गेला. [[शिंदे घराणे|शिंदे]] आणि [[होळकर घराणे|होळकरांची]] संस्थाने त्यांच्याकडेच राहिली आणि त्यांनी इंग्रजांचे सार्वभौमत्व स्वीकारले. [[राजपूताना]]मधील संस्थानिक नाममात्र राजे म्हणून ब्रिटिशांच्या सत्तेखाली आले. त्यांनी साताऱ्यामध्ये [[प्रतापसिंह भोसले]] यांना छत्रपती पदावर बसवले. होळकर कुटुंबातील अगदी लहान मुलाची [[नागपूर संस्थान|नागपूरच्या सिंहासनावर]] वर्णी लागली. [[त्र्यंबकजी डेंगळे]], ज्यांच्यावर गंगाधरशास्त्री यांच्या वधाचा आरोप होता व ज्याने हे प्रकरण हाताबाहेर चिघळले, यांना अटक करून बंगालमध्ये पाठवले गेले. सत्तेवर आल्यानंतर [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]]ने अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. नवीन कायद्यांबरोबरच त्याने प्रांतांची पुनर्रचना करून महसूल वसूलीसाठीची नवीन पद्धत आखली, ज्याने [[देशमुख]], [[पाटील]] आणि [[देशपांडे]] यांचे महत्व कमी झाले. ब्रिटिशांना कळले होते की इतक्या मोठ्या प्रदेशावर सत्ता गाजविण्यासाठी स्थानिक रीतीरिवाज आणि भाषेचा अभ्यास आणि आदर करणे गरजेचे आहे. एल्फिन्स्टनने १८२०मध्ये [[मराठी भाषा]] प्रमाणीकरण करण्याचेही सुरू केले. या युद्धानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धापर्यंत]] भारतावर अनिर्बंध सत्ता गाजवली. == हे सुद्धा पहा == * [[खडकीची लढाई]]<ref name="sacred-texts.com"/> * [[मराठा साम्राज्य]] * [[आष्टीची लढाई]] * [[भीमा कोरेगावची लढाई]] * [[मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी]] * [[पहिले इंग्रज-मराठा युद्ध]] * [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध]] * [[ब्रिटिश साम्राज्य]] * [[ब्रिटिश भारत]] * [[भारताचा इतिहास]] * [[शिवाजी महाराज]] {{क्रम |यादी=इंग्रज-मराठा युद्धे |पासून= |पर्यंत= |मागील= [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध]] |पुढील= --- }} == संदर्भ== {{संदर्भयादी}} {{मराठा साम्राज्य}} [[वर्ग:तिसरे इंग्रज-मराठा युद्ध| ]] [[वर्ग:मराठा साम्राज्य सहभागी असलेली युद्धे]] [[वर्ग:ब्रिटिश साम्राज्य]] [[वर्ग:महाराष्ट्रातील ब्रिटिश राजवट]] [[वर्ग:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सहभागी असलेली युद्धे]] 6y3y9gpsy5h1ewlk5run8y7nzjq8kye ए.डी. भोसले 0 57183 2581396 1279494 2025-06-20T22:22:24Z अभय नातू 206 साचा 2581396 wikitext text/x-wiki {{गल्लत|नागपूरचे दुसरे मुधोजी}} कॉम्रेड '''ए.डी. भोसले''' ऊर्फ '''अप्पासाहेब भोसले''' (? - [[नोव्हेंबर १९]], [[इ.स. २००२]]) हे [[मराठी]] कामगार चळवळीचे पुढारी, [[लाल निशाण पक्ष (लेनिनवादी)|लाल निशाण पक्षाचे (लेनिनवादी)]] संस्थापक अध्यक्ष होते. {{DEFAULTSORT:भोसले,ए. डी.}} [[वर्ग:मराठी कामगार चळवळकर्ते]] [[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]] [[वर्ग:इ.स. २००२ मधील मृत्यू]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 5eupgi0dad302ag0ldry6jjn48prbwy निबंध 0 58809 2581294 2581182 2025-06-20T12:56:42Z Khirid Harshad 138639 [[Special:Contributions/महा कट्टा|महा कट्टा]] ([[User talk:महा कट्टा|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:KiranBOT II|KiranBOT II]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. 2360507 wikitext text/x-wiki {{nobots}} {{collapse top|* निबंध विषयक माहिती शोधणाऱ्या '''विद्यार्थ्यांसाठी सूचना''' पहाण्यासाठी 'विस्तार' शब्दावर क्लिक करावे }} [[चित्र:Marathi Wikipedia ULS.webm|thumb|उजवे|250px|[[चित्र:WMF-Agora-Input settings-000000.svg|20px|link=विकिपीडिया:Input System]]''' [[विकिपीडिया:Input System|कॉंप्यूटरवर मराठीत लिहिता येणे हिच खरी साक्षरता ! मराठी मित्रांनो, मराठीत लिहिण्यास शिका]]'''<!--[[चित्र:WMF-Agora-input settings-000000.svg|20px|link=विकिपीडिया:Input System]]--> !! <br /><small>{{*}}[[विकिपीडिया:Input System|मराठी टायपिंग साहाय्य]]: [[:mw:Help:Extension:UniversalLanguageSelector/Input methods/mr-transliteration|अक्षरांतरण पद्धती]] {{*}}[[:mw:Help:Extension:UniversalLanguageSelector/Input methods/mr-inscript|इनस्क्रिप्ट पद्धती]]</small> ]]' * '''विद्यार्थ्यांना सूचना''' : निबंधासाठी माहिती शोधण्यासाठी आधी मराठीत शोध घेता आला पाहिजे आणि म्हणून मराठी टायपिंग कसे करावयाचे त्याची माहिती घेतली पाहिजे. उजवीकडे व्हीडिओ क्लिपेत दाखवल्याप्रमाणे मराठी टायपिंगची माहिती घ्या आणि मग [[विकिपीडिया:शोध|मराठीतून माहिती शोधा]]. * या विद्यार्थीप्रिय लेखात निबंधाबद्दल [[ज्ञानकोश|ज्ञानकोशीय]] माहिती आहे (थोडक्यात निबंध म्हणजे काय ? कसा असतो त्याचे प्रकार, घटक इत्यादी). निबंधांबद्दल ज्ञानकोशीय माहिती घेतल्यानंतर; <u>इच्छुक वाचक विद्यार्थ्यांसाठी मराठी विकिबुक्स या बंधुप्रकल्पात [[:b:निबंध लेखन कसे करावे ?|निबंधलेखन कसे करावे ?]] हा मार्गदर्शनपर लेख उपलब्ध आहे.</u> {{Collapse bottom}} [[निबंधलेखन|'''निबंध''']] हा आधुनिक गद्य [[लेखन|लेखनाचा]] प्रकार आहे.<ref name="रागजाधव" >{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand8/index.php/8-khand8/9616-2012-02-04-11-55-09?showall=1&limitstart=| title = निबंध | भाषा = मराठी| लेखक =[[रावसाहेब गणपतराव जाधव]] यांचे| प्रकाशक =[[मराठी विश्वकोश]](marathivishwakosh.maharashtra.gov.in) |ॲक्सेसदिनांक =मराठी विश्वकोशावरील निबंध- रा. ग. जाधव यांचा लेख दिनांक १४ जुलै २०१७ भाप्रवे सायंकाळी ४ वाजता}}</ref> निबंधाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत." '''नि+बन्ध = बांधणे''' "असा अर्थ विचाराला बांधणे आणि बंधन या अर्थाने वापरल जातो. निबंधात साधक-बाधक चर्चा असते.<ref name="मिपा_३">{{संकेतस्थळ स्रोत|url=|title=|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=ऑक्टोबर ६ २०१४|दुवा=http://www.misalpav.com/comment/619720#comment-619720|title=शालेय निबंध लेखन कसे करावे ? # निबंध लिहिणे एक कलाच आहे.|भाषा=मराठी|लेखक=प्रा.डॉ.दिलीप बिरुटे -|लेखकदुवा=http://www.misalpav.com/user/28|आडनाव=बिरुटे|पहिलेनाव=दिलीप|सहलेखक=|संपादक=|वर्ष=२०१४|महिना=ऑक्टोबर|दिनांक=Mon, 06/10/2014 - 09:55|फॉरमॅट=|आर्काइव्हदुवा=|आर्काइव्हदिनांक=|कृती=# निबंध लिहिणे एक कलाच आहे (प्रतिसाद)|पृष्ठे=|प्रकाशक=|अ‍ॅक्सेसवर्ष=|अ‍ॅक्सेसमहिनादिनांक=|अ‍ॅक्सेसदिनांकमहिना=|ॲक्सेसदिनांक=|अवतरण=}}</ref> '''निबंध''' हा एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे. '''निबंध''' म्हणजे नियमांनी बद्ध असणारा, उपयोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा तरीही संक्षिप्त, नीटपणे मांडलेला विचारांनी युक्त असा मुद्देसूद लेख. [[रावसाहेब गणपतराव जाधव]] यांच्या [[मराठी विश्वकोश|मराठी विश्वकोशातील]] मतानुसार," लक्षणेने एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले वा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध होत".<ref name="रागजाधव" /> यात निबंधलेखकाच्या व्यक्तिगत दृष्टिकोनांच्या मांडणीचासुद्धा समावेश असतो. वेगवेगळ्या परिच्छेदातून विविध बाजू निबंधात मांडलेल्या असतात. व्यवस्थित सुरुवात आणि विषयाची प्रयत्‍नपूर्वक मांडणी हे निबंधलेखनाचे प्रमुख उद्दिष्ट असते. '''निबंध''' या शब्दाचा अर्थ सांगतांना ज्येष्ठ समीक्षक [[मो.रा.वाळंबे]] म्हणतात 'निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे, असा आहे." निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणाऱ्या विचारांची. एखादा विषय निबंधलेखनाला दिला, की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करतात, पण ते सारेच विचार दुसऱ्याला सांगण्यासारखे असतात असे नाही, शिवाय सुचणारे विचार खूप विस्कळीत असतात, हे असे सुचणारे विचार निबंधामुळे एकत्रित होतात.' ==उपयोजन== निबंधातून अनेक विषय हाताळले जाताना दिसतात. उदा० साहित्यिक टीका, राजकीय जाहीरनामे, अभ्यासपूर्ण तर्क, दैनंदिन जीवनातील निरीक्षणे, लेखकांचे चिंतन आणि आठवणी. निबंधाची व्याख्या जराशी अस्पष्ट असते. बऱ्याचदा निबंधाचे लेख आणि लघुकथा लेखन शैलीशी साधर्म्य दिसून येते {{संदर्भ हवा}}. आधुनिक काळातील जवळपास सर्व निबंध गद्यस्वरूपाचे असतात परंतु क्वचित काही पद्यलेखांचेही वर्गीकरण निबंध या प्रकारात केले जाताना दिसून येते (उदाहरणार्थ [[अलेक्झांडर पोप]]'चे ''An Essay on Criticism'' आणि ''An Essay on Man''). संक्षीप्तता आणि नेमकेपणा हे निबंधाचे महत्त्वाचे गुण असले तरीही, जॉन लॉक (John Locke)'चे ''An Essay Concerning Human Understanding'' आणि [[थॉमस रॉबर्ट माल्थस|थॉमस माल्थस]]'चे ''An Essay on the Principle of Population'' ही अतिदीर्घ लेखनेही निबंध प्रकारात दिसून येतात. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचे भाषिक आणि लेखन कौशल्य विकास तसेच एखाद्या विषयाचा अभ्यास आणि आकलन समजून घेण्याच्या दृष्टीने, निबंधलेखनाचे कौशल्य अवगत करवून घेण्यास महत्त्व दिले जाते. यासाठी बहुधा आराखड्याचा सराव करून घेण्याचे स्वरूप वापरले जाताना दिसते. विद्यापीठांतून विशेषतः मानव्य आणि समाजशास्त्र शाखांतून बऱ्याचदा प्रवेश प्रक्रियेचा भाग म्हणून तर; शासकीय, सामाजिक आणि खासगी आस्थापनातून उमेदवार निवडीच्या स्तरावर निबंध लिहून घेतले जातात. निबंधरचना तंत्र आणि मंत्र या मार्गदर्शक ग्रंथाच्या लेखिका सुलभा प्रभुणे यांच्या मतानुसार निबंध लेखनाच्या सरावामुळे मुद्देसूद मांडणीचे वळण पडते जे भावी आयुष्यातील, जाहिरात, दूरदर्शन, वृत्तपत्रे इत्यादी विविध वृत्तमाध्यमे, संगणक सादरीकरणे अशा कार्यक्षेत्रात प्रभावी ठरू शकते.<ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4884359818277868638?BookName=Nibandharachana-Tantra-aani-मंत्र</ref> कलाक्षेत्रात संकल्पना अथवा विषयांच्या निबंधस्वरूप मांडणीसाठी लेखनापलीकडे जाऊन चित्र, छायाचित्रे, ध्वनी, संगीत, वृत्तचित्र (डॉक्युमेंटरी), अनुबोधपट, ही माध्यमेही वापरली जातात. ==व्याख्या== निबंधाची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. एक व्याख्या अशी आहे की, " '' चर्चित विषयाबद्दल लक्ष्यकेंद्रित गद्य रचना '' " किंवा " '' पद्धतीशीर दीर्घ प्रपाठ '' "<ref>http://www.gale.cengage.com/free_resources/glossary/glossary_de.htm</ref> एखादा निबंध नेमक्या कोणत्या साहित्यप्रकारात मोडेल हे सांगणे काही वेळा कठीण असू शकेल. निबंधकार [[:en ::Aldous Huxley|ऑल्डस हक्स्ली]], यांच्या मतानुसार "निबंध हे अगदी कादंबरी प्रमाणेच एक साहित्यिक साधन आहे.<ref name="Collected Essays, Preface"/> ह्यात बहुधा कोणत्याही विषयावर सर्व काही लिहिण्याची मुभा असते. निबंध लेखन हे परंपरेने आणि व्याख्येनेही लेखनाचा एक छोटा तुकडा असतो त्यामुळे एकच निबंध सर्वसमावेशक बनवता येईल हे जरासे अवघडच असते." ऑल्डस हक्स्ली पुढे लक्ष वेधतो, "परंतु निबंधांचा संग्रह केला तर दीर्घ कादंबरी प्रमाणेच विषयाचा सखोल ऊहापोह व्यापक परीघातही केला जाऊ शकतो." - मॉन्टेनचे तिसरे पुस्तक हे त्याचे उदाहरण असल्याचे हक्स्ले म्हणतो. हक्स्लेच्या मतानुसार निबंध या साहित्य प्रकाराचे वैविध्य समजण्यासाठी त्याचा ३ स्तरांमध्ये विचार करता येईल.<ref name="Collected Essays, Preface">''Collected Essays'', "Preface"</ref> हे तीन स्तर खालीलप्रामाणे : * व्यक्तिचित्रण अथवा आत्मचरित्रात्मक निबंध लेखन: यामध्ये प्रामुख्याने आत्मचरित्रात्मक/अनुभवपर लिखाण असते. अशा निबंधांमध्ये अनुभव कथनातून आजूबाजूच्या गोष्टींवर भाष्य केलेले असते. * वास्तव आणि वस्तुनिष्ठ: या स्तरावर, लेखक "स्वतःबद्दल न लिहिता, विज्ञान, साहित्य, राजकारण अशा विषयांवर लिहितात.". * अमूर्त-वैश्विक : या स्तरावर लेखक अत्यंत अमूर्त संकल्पनांबद्दल लिहितात. असे निबंध त्रयस्थपणे लिहिले जातात आणि त्यात क्वचितच वस्तुस्थितीतील किंवा अनुभवात्मक उदाहरणे असतात. हक्स्लीच्या मते जे निबंध या तीनही स्तरांचा सर्वोत्तम उपयोग करून घेतात तेच सर्वाधिक समृद्ध ठरतात. <!--Huxley adds that "the most richly satisfying essays are those which make the best not of one, not of two, but of all the three worlds in which it is possible for the essay to exist".--> [[File:Essais Titelblatt (1588).png|thumb|right|100px| [[Michel de Montaigne]]चे निबंध ]] ==व्युत्पत्ती == इंग्रजी ''essay'' या शब्दाचा उगम फ्रेंच भाषेतील ''essayer'' (प्रयत्न करणे) या शब्दापासून झाला. फ्रेंच लेखक मिशेल द मॉण्टेन याने ''स्वतःचे विचार कागदावर उतरवण्याचा प्रयत्न'' या अर्थाने त्याच्या लिखाणासाठी सर्वप्रथम essay हा शब्द वापरला. इंग्रजीतील essay या शब्दाचाच पर्यायशब्द ‘निबंध’ हा आहे. संस्कृत भाषेमध्ये प्राचीन काळापासून निबंधनामक ग्रंथ उपलब्ध आहेत. धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांमध्ये एखाद्या ग्रंथाची टीका, भाष्य या स्वरूपात नसलेल्या व स्वतंत्र रीतीने लिहिलेल्या पुस्तकास संस्कृतमध्ये ‘निबंध’ ही संज्ञा आहे. पण मराठीमध्ये निबंधाचा जो अधिकृतबंध रूढ झालेला आहे, त्याचे स्वरूप संस्कृतमधील निबंधाचे नाही. त्याचे स्वरूप हे इंग्रजीमधील ‘essay’ या गद्यप्रकाराचे आहे. इंग्रजी वैचारिक वाड्‌मयातील निबंध हा आधुनिक मराठी सुशिक्षित विचारवंतांनी मराठीमध्ये आणला आणि अनेक विद्यांच्या शाखोपशाखांनी तो समृद्ध होत गेला<ref name="मराठी विश्वकोश">[http://www.marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php मराठी विश्वकोश खंड १२, पान ३४ "मराठी साहित्य"]</ref>.   ==इतिहास== [[रावसाहेब गणपतराव जाधव]] यांच्या [[मराठी विश्वकोश|मराठी विश्वकोशातील]] नोंदीनुसार, संस्कृतात निबंध ही संज्ञा असली तरी, आधुनिक अर्थाने जी निबंधरचना अभिप्रेत आहे ती संस्कृतात नाही.<ref name="रागजाधव" /> ''धर्मनिबंधां''सारख्या बहुतांशी गद्यप्रकारांतील लेखनात हिंदू लोकांना आचार, व्यवहार, प्रायश्चित्ते इत्यादींसंबंधी मार्गदर्शन करणारे विवेचन केलेले आढळते. स्मृतिग्रंथांवरील टीका हासुद्धा निबंधलेखनाचाच एक प्रकार म्हणता येईल.<ref name="रागजाधव" /> आधुनिक निबंधसाहित्य हे गद्यातच असते. तथापि गद्यसाहित्याचा उदय होण्यापूर्वी सगळेच लेखन पद्यातून होत असे. आपल्याकडे ''महाभारता''तील राजधर्मासारखे (शांतिपर्व) प्रकरण हे पद्यातील निबंधसाहित्य म्हणता येईल.<ref name="रागजाधव" /> रामदासांनी लिहिलेली काही प्रकरणे - उदा., राजधर्म, सेवकधर्म - यांचे स्वरूप स्थूलमानाने निबंधवजाच म्हणता येईल.<ref name="रागजाधव" /> इंग्रजीत अठराव्या शतकात अलेक्झांडर पोप या कवीने ‘अ‍ॅन एसे ऑन क्रिटिसिझम’ व ‘अ‍ॅन एसे ऑन मॅन’ या नावांच्या कविताच लिहिलेल्या आहेत व त्यांत विचारप्रर्वतनालाच महत्त्व आहे.<ref name="रागजाधव" /> गद्य आणि पद्य ही माध्यमे निबंधाच्या हेतूशी संवादी असली, तरी प्रत्यक्षात मात्र निबंध साहित्यप्रकाराचा सोळाव्या शतकानंतरचा जो इतिहास आहे, तो गद्यातील निबंधासंबंधीचाच आहे.<ref name="रागजाधव" /> पश्चिमी साहित्यात निबंध हा लेखनप्रकार सोळाव्या शतकाच्या शेवटीशेवटी उदयास आला. त्याचा जनक ''मॉंतेन'' (१५३३–९२) हा फ्रेंच लेखक मानला जातो.<ref name="रागजाधव" /> रॉबर्ट बर्टन (१५७७-१६४०) आणि सर थॉमस ब्राऊन(१६०२-१६८२) हे इंग्रजी भाषेतील उल्लेखनीय निबंधकार मानले जातात. इ.स. १७०० आणि १८०० मध्ये एडमंड बर्क आणि सॅम्युअल टेलर कोलरिज यांनी सर्वसामान्य लोकांसाठी निबंध लिहिले. विसाव्या शतकात अनेक निबंधकारांनी कला आणि संस्कृतीतील नवीन प्रवाह उलगडून सांगण्यासाठी निबंध लिहिले (उदा. टी. एस. एलियट). ===मराठीतील निबंधांचा इतिहास=== मराठीमध्ये निबंधलेखनाची सुरुवात इंग्रजी शिक्षण घेतलेल्या पहिल्या पिढीपासून झाली. [[बाळशास्त्री जांभेकर]], भाऊ महाजन, [[गोपाळ हरी देशमुख|लोकहितवादी]], [[महादेव गोविंद रानडे]], महादेव मोरेश्वर कुंटे, [[दादोबा पांडुरंग तर्खडकर|दादोबा पांडुरंग]], स. म. दीक्षित, भारकर दामोदर पाळंदे, विश्वनाथ नारायण मंडलिक, गोविंद नारायण माडगावकर, विष्णूबुवा ब्रह्मचारी, बाबा पदमनजी, [[जोतीराव गोविंदराव फुले|जोतीराव फुले]], विष्णू परशुरामशास्त्री पंडित हे या पिढीतील काही निबंधकार होत. मराठी निबंधवाङ्‌मयाची मांडणी प्रथम मुख्यत: मराठी नियतकालिकांत सुरू झाली<ref name="मराठी विश्वकोश" />. १८३२ साली जांभेकरांनी 'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली. यातून त्यांनी विधवा पुनर्विवाहाबद्दल विचार मांडण्यासाठी आणि लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी अनेक लेख लिहिले. १८४१ साली भाऊ महाजन यांनी 'प्रभाकर' हे साप्ताहिक काढले. लोकहितवादींची गाजलेली शतपत्रे ही याच साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात मराठीमध्ये वेगवेगळी नियतकालिके सुरू झाली. या नियतकालिकांमधील लेख, स्फुटे, बातम्या आणि वाचकांची पत्रे, यांमधून मराठीत निबंध या लेखनप्रकाराची पायाभरणी झाली. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात निबंधांचा वापर जनजागृतीसाठी केला गेला. मराठी निबंध पाच टप्प्यांतून प्रकटत गेला आहे: (१) १८७०पूर्वीचा प्राथमिक निबंध, (२) चिपळूणकरी वळणाचा निबंध, (३) परांजपे वळणेाचा ललितगुणयुक्त निबंध (४) केळकरी वळणाचा प्रसन्न शैलीचा ललितगुणयुक्त निबंध आणि (५) लघुनिबंध. [[शिवराम महादेव परांजपे]] यांनी 'काळ' वृत्तपत्रातून वाचकांसाठी असंख्य निबंध लिहिले; त्यांतले फक्त काही निवडक निबंध 'काळातील निवडक निबंध' या दहा खंडी ग्रंथात समाविष्ट झाले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेही निबंध लेखन महत्त्वपूर्ण आहेत. मूकनायक, बहिष्कृत भारत यासारख्या वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केले आहे. [[ना.सी. फडके]] आणि [[अनंत काणेकर]] यांनी 'लघुनिबंध' हा नवीनच प्रकार मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय केला. [[ना,सी. फडके]] यांचे धूम्रवलये, गुजगोष्टी, नव्या गुजगोष्टी, निबंध सुगंध, आदी, आणि [[अनंत काणेकर]]ांचे उघड्या खिडक्या, तुटलेले तारे, पिकली पाने, शिंपले आणि मोती आदी लघुनिबंधसंग्रह प्रसिद्ध आहेत. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा निबंधमाला हा अनेक-खंडी ग्रंथ आहे श्री.कृ. कोल्हटकर यांनी मराठीत विनोदी निबंधांची सुरुवात केली. त्यांचे 'सुदाम्याचे पोहे' प्रसिद्ध आहे. [[आनंद यादव]] यांनी 'मराठी लघुनिबंधाचा इतिहास' नावाचा ग्रंथ लिहिला आहे. ==अध्यापनाचे साधन == [[File:Czythumbur.jpg|thumb|right|150px|विद्यापीठाच्या वाचनालयात शोधलेखन कराणाऱ्या या विद्यार्थ्यांप्रमाणे, are often assigned essays as a way to get them to synthesize what they have read.]] *अध्यापनाचे साधन (As a pedagogical tool) औपचारिक शिक्षण पद्धतीत निबंध हे एक महत्त्वाचे साधन बनले.माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांची लेखनशैली सुधारावी यासठी त्यांना साचेबद्ध पद्धतीचे निबंध लेखन करायला शिकविले जाते.माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात भाषेचे आकलन आणि प्रभुत्व पाहण्यासाठी निबंधाचा वापर केला जातो.निबंधाच्या माध्यमातून विद्यार्थ्याना स्पष्टीकरण, टीका या पद्धतीने एकाद्या विषयावर मत नोंदविण्यास सांगितले जाते. अभ्यासक्रमात विशेषत विद्यापीठीय विद्यार्थ्यांना दीर्घ निबंध लिहायला सांगितले जातात ज्यासाठी काही महिने वा आठवडे तयारी करावी लागते.या जोडीने मानवहितवाद आणि सामाजिक शास्त्रे यांच्या अभ्यासक्रमाच्या सहामाहीत अथवा वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्याना दोन ते तीन तास बसून एखादा निबंध लिहावा लागतो. साहित्यिक अंगाने लिहिल्या जाणा-या निबंधांपेक्षा अभ्यासावर अथवा संशोधनावर आधारित 'शोधनिबंधाचे' स्वरूप वेगळे असते.यामध्ये लेखकाला स्वतःची मते नोंदविता येतात तथापि ती प्रथम पुरुषी असू नयेत आणि त्याला संबंधित संदर्भांची जोड देऊन तर्कपद्धतीने त्यांची मांडणी केली जाते.क्रमिक दीर्घ निबंध (ज्यांची शब्दमर्यादा २००० ते ३००० इतकी असते ते बरेचदा विषयांतर करणारे ठरू शकतात.अशा निबंधात काही वेळा प्रारंभी ' त्या विशिष्ट विषयावर पूर्वी झालेल्या अभ्यासाचा आढावा ' सारांशरूपाने नोंदवलेला असतो. दीर्घ निबंधात बऱ्याच वेळा प्रस्तावनेचे एखादे पोान असते. त्यात निबंधाच्या शीर्षकाचे स्पष्टीकरण आणि संकल्पना नेमकेपणाने नोंदविलेल्या असतात. निबंधाचा विषय मांडताना पुरावा म्हणून जी उद्धरणे, साधने, संदर्भ मांडलेले असतील ते निबंधाच्या शेवटी 'संदर्भ ग्रंथ सूची ' किंवा 'संदर्भ सूची'या सदराखाली नोंदविले जावेत, असा बहुतेक सर्व शैक्षणिक संस्थांचवा आग्रह असतो. यामुळे एखाद्या अभ्यासपूर्ण निबंधाची सत्यता पटणे, त्यातील मुद्द्यांची शहानिशा करणे सोपे जाते. शिवाय त्या निबंधाचा वापर जे शिक्षक किंवा अभ्यासक करतात त्यांना त्या निबंधातील विचारामागील मूळ संदर्भ समजणे सोपे जाते व त्याआधारे त्या विचाराचे वा संकल्पनेचे मूल्यमापन पद्धतशीरपणे करणेही सोपे जाते.अशा प्रकारच्या अभ्यासाधीष्ठित निबंधामुळे विद्यार्थ्यांना त्यांची विचारप्रक्रिया त्यांना पद्धतशीरपणे मांडता येते का हे पाहिले जाते तसेच त्याच्या बौद्धिक क्षमतेचीही कल्पना येते. एका विद्यापीठीय प्रबंध मार्गदर्शकाने शोध निबंध आणि चर्चात्मक निबंध असा भेद नोंदविला आहे. शोध निबंधात संबंधित विषयाच्या बाबतीत आवश्यक अशा विषयाची व्याप्ती वैविध्यपूर्ण असू शकते.त्याची लांबी मोठी असू शकते आणि संबंधित विषयाची भरपूर माहिती त्यात समाविष्ट असू शकते. चर्चात्मक निबंधता मात्र अधिक नेमकेपणा असतो आणि त्यात संशोधनही असते, पण तो निबंध अधिक तार्किक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीचा असतो. विद्यापीठाच्या कामात येणारी एक समस्या म्हणजे बरेचसे विद्यार्थी स्वतःकाम करण्याऐवजी काही लोकांकडून असे निबंध विकत घेतात.अशा प्रकारची फसवणूक किंवा वाङमय चौर्य अपेक्षित नसल्याने अशा संशयास्पद निबंधांची तपासणी करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर संगणक प्रणाली आधारे हे काम तपासून घ्यावे लागते. ==प्रकार, पद्धती आणि शैली== [[File:Essays on Political Economy (Bastiat).djvu|thumb|right|150px| Bastiat'चा ''एसे ऑन पॉलीटीकल इकॉनॉमी'']] विद्यार्थी, अभ्यासक, व्यावसायिक निबंधकार त्यांच्या निबंध लेखनासाठी प्रकार, पद्धती, शैली आणि प्रारूपांचा वापर करत असतात. ===वर्णनात्मक निबंध=== [[वर्णनात्मक भाषाशास्त्र|वर्णनात्मक]] वर्णनात्मक निबंधात प्रामुख्याने वाचकाच्या शारीरिक, भावनिक,आणि बौद्धिक क्षमतांचा व संवेदनांचा विचार केलेला असतो. अशा वर्णनात लेखनाचा हेतू,वाचकांचा विचार, मुद्दा प्रभावीपणे मांडणे, ओघवती व वर्णनात्मक भाषा वापरणे अपेक्षित असतो. वर्णन हे साचेबद्ध असावे लागते पण ते काही वेळा पसरटही होऊ शकते. अशा वर्णनात भाव हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. भाषा, उपमा इ. सारखे भाषिक अलंकार यांचा वापर करून वर्णन अधिक आशयघन केले जाते. ===[[सण]] / उत्सव निबंध=== सण / उत्सव निबंध या प्रकारच्या निबंधात प्रामुख्याने भारतात साजरे केलेल्या निरनिराळ्या सणांवर लिहले जातात जसे कि दिवाळी, गेणेश उत्सव ई. ===वृतांतपर=== वृतांतपर निबंधात भूतकाळात घडलेल्या घटना, स्थित्यंतरे यांचा पाया मजबूत असावा लागतो ज्यामुळे कायम उत्कंठा वाढीला लागते. अशा निबंधाचा मुख्य गाभा म्हणजे त्याचे कथानक. असे कथानक रचताना लेखकाला नेहमी वाचकवर्ग, हेतू, संवाद याचा पूर्ण विचार करावा लागतो.अशा कथानकात घटनाक्रम हा कायम ठेवावा लागतो.. === सोदाहरण आणि दृष्टांतयुक्त=== अशा निबंधात सार्वत्रिकीकरण, प्रातिनिधिकता आणि पटतील अशी योग्य उदाहरणे, पूर्वेतिहास इ. नोंदवावी लागतात. लेखकाने वाचकांचा दृष्टिकोन, हेतू , महत्त्व, चपखल उदाहरणे आणि या सर्वांचे एकत्र व योग्य समायोजन याचा अपूर्ण विचार करावा लागतो. ===तुलना आणि विरोधाभास=== अशा निबंधात तुलना, विरोध आणि साम्य या मुद्द्यांचा विचार करावा लागतो.तुलनेमध्ये दोन समान गोष्टींमधील विचार असतो तर विरोधात त्या दोन गोष्टीमधील फरक सांगितला जातो.अशा निबंधात लेखकाला तुलना व फरक आणि साम्याचे मुद्दे , वाचकाची मानसिकता,हेतू अशा सर्व गोष्टींचा विचार करून एकत्रित निष्कर्ष मांडावा लागतो. === कारण आणि परिणाम=== या प्रकारच्या निबंधात घटनेचा साखळीक्रम, कालक्रम ,सावध भाषा आणि जोरकस मांडणी असावी लागते.अशी पद्धत वापरताना लेखकाला विषय, हेतू, मांडणी , भाषा परिणामांचे पडसाद वा कारणे, दुवे जोडणे अशा पद्धतीने विचार करत निष्कर्ष मांडावा लागतो. ===श्रेणीकरण आणि वर्गीकरण=== वर्गीकरण म्हणजे मोठ्या विषयांचे उपविभाग मांडणे तर श्रेणीकरण म्हणजे असे मोठे विषय लहान उपविषयांत नोंदविणे. ===व्याख्या निबंध=== 'व्याख्या निबंध एखाद्या वस्तुनिष्ठ अथवा काल्पनिक संज्ञेचा अर्थ विशद करतात.'<ref>Chapter 9: Definition Glenn, Cheryl. Making Sense: A Real World Rhetorical Reader. Ed. Denise B. Wydra, et al. Second ed. Boston, MA: Bedford/St. Martin's, 2005.</ref> <!--Definition essays explain a term's meaning. Some are written about concrete terms, such as trees, oceans, and dogs, while others talk about more abstract and hard-to-define terms, such as liberty, happiness, and virtue. --> ===युक्तिवाद शास्त्र=== अशा निबंधात तात्त्विक आणि तार्किक मांडणी अपेक्षित असते ज्यामध्ये वाद-प्रतिवाद अशी निबंधाची रचना केलेली दिसते.एखाद्या मुद्द्याला विरोध करताना व्यापक विचार करण्याचे स्वीकारशीलता यामध्ये अंतर्भूत असते. त्यामुळे समान विचारधारा मांडणे सुलभ जाते. ===इतर तर्कपूर्ण=== अशा पद्धतीच्या तर्कपूर्ण मांडणीने निबंधाचे कोणतेही स्वरूप आकार घेऊ शकते.विचार प्रक्रिया काय पद्धतीने मांडली गेली आहे हे समजल्यावर व्यक्त करण्याची क्षमता आणि एकूणच परिणामकारकता लक्षात घेता येते. अशा निबंधांचे स्वरूप सोपे करण्यासाठी त्यामध्ये आकृती, तार्किक स्पष्टीकरण यांचा समावेश होतो. त्यामुळे ठाशीव पद्धतीने हा निबंध सादर करता येतो व मुद्द्यांची सत्यासत्यता स्वीकारता येते. == वृत्तपत्रीय आणि नियतकालिकीय== [[चित्र:Harper's February (1897).jpg|इवलेसे|उजवे|150px|'हार्पर्स' या निबंध विषयक मासिकाच्या इ.स. १८९५ मधील आवृत्तीच्या मुखपृष्ठाचे छायाचित्र.]] वृत्तपत्रीय आणि नियतकालिकीय निबंधांचे स्वरूप सहसा वैचारिक स्वरूपाचे असते. वृत्तपत्रांच्या संपादकीय, संपादकीय पानावरील अथवा साप्ताहिक पुरवणीतील स्तंभलेखांत बऱ्याचदा वैचारिक अथवा माहितीपूर्ण निबंधांचा समावेश केला जातो . साप्ताहिक पुरवण्यांत आणि नियतकालिकांत ललित निबंध हा प्रकारही वापरला जातो. ==कारकीर्द निबंध== एखाद्या विशीष्ट कामासाठी एखादी विशिष्ट व्यक्ती निवडताना, व्यक्तीची पात्रता ज्ञान, कौशल्य, आणि क्षमता या कसोट्यांवर पडताळण्याच्या दृष्टीने संबंधित उमेदवारास त्यांच्या अनुभव आणि निवड झाल्यास तो काय आणि कशा प्रकारे काम निभावू शकेल (इच्छितोतात) या संबंधाने कारकीर्द निबंध (Employment essays) लिहिण्यास सांगितले जाऊ शकते. काही विशीष्ट क्षेत्रात क्वचीत शासकीय आणि एनजीओ इत्यादी क्षेत्रात नौकरीच्या अर्जासोबत कारकीर्द निबंध द्यावा लागू शकतो. ===अमेरिकेची संयुक्त संस्थाने=== [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या]] संघ सरकारच्या रिक्त पदांसाठी अर्ज करताना 'के.एस.ए' (ज्ञान, कौशल्य, आणि क्षमता) आणि ECQs (Executive Core Qualifications- आंतरिक कार्यकारी पात्रता) लिहावे लागतात 'के.एस.ए' , मध्ये आपल्या बायो डाटा सोबत, आपल्या ज्ञान, कौशल्य, आणि क्षमतांची योग्यता आणि आपल्या शैक्षणिक आणि कारकिर्दीची पार्श्वभूमी, संक्षीप्त आणि विषय-अनुलक्षीत series of narrative statements {{मराठी शब्द सुचवा}} निबंधाच्या माध्यमातून मांडावी लागते. 'ई.सी.क्यु.' (Executive Core Qualifications- आंतरिक कार्यकारी पात्रता) निबंध अधिक वरीष्ठ स्तरीय पदांसाठीच्या अर्जा सोबत लिहावे लागतात. == वाङमयेतर प्रकार== ===दृष्य कला=== दृष्यकलांमध्ये मुख्य चित्रण अथवा मुर्ती घडवण्यापुर्वी काढलेल्या प्राथमिक चित्र किंवा स्केचला "essay" असे म्हणतात. <!-- In the visual [[art]]s, an essay is a preliminary drawing or sketch upon which a final painting or sculpture is based, made as a test of the work's composition (this meaning of the term, like several of those following, comes from the word ''essay'''s meaning of "attempt" or "trial"). --> ===संगीत=== संगीतविषयक निबंधांत संगीतरचना आणि संगीत मजकुराच्या संबंधाने मांडणी केली जाते. सॅम्युएल बार्बर यांचे "एसेज फॉर ऑर्केस्ट्रा" संगीत निबंध प्रकारात मोडते. {{विस्तार}} <!-- In the realm of [[music]], composer [[Samuel Barber]] wrote a set of "Essays for Orchestra," relying on the form and content of the music to guide the listener's ear, rather than any [[program music|extra-musical plot or story]]. --> ===चित्रपट निबंध=== [[File:40 jaar oppasser in de Haagse dierentuin Weeknummer 43-28 - Open Beelden - 10112.ogv|thumb| प्राणिसंग्रहालयास भेट - मेंढपाळ आठवडा ([[हेग]])]] चित्रपट निबंध ("cinematic essays") एखाद्या प्लॉटच्या एवजी एखादी कल्पना किंवा एखादी विषयवस्तू (theme) उलगडत नेतात, अथवा एखाद्या निवेदकाने केलेल्या निबंध वाचनाला दिलेली लघुपट फितीची जणू सोबतच असते. वेगळ्या शब्दात, चित्रपट निबंधाची व्याख्या माहितीपटाच्या दृष्यास स्व-चित्रणाचे घटक असलेले भाष्य रूपाची (पण आत्मचरित्र नव्हे) जी जोड दिलेली असते, तिच्यात चित्रपट निर्मात्याची शैली (पण जीवनकथा नव्हे) प्रतिबिंबित होते. चित्रपट निबंध निर्मिती बहुतेक वेळा माहितीपट, fiction, आणि प्रायोगिक चित्रपट निर्मितीच्या छटा आणि संपादन शैली वापरून केलेली असते.<ref name="chicagomediaworks.com">http://www.chicagomediaworks.com/2instructworks/3editing_doc/3editing_docinematicessay.html</ref> या निबंध प्रकाराची निश्चित व्याख्या केली गेली नसली तरीही, [[Dziga Vertov]] सारखे [[सोव्हिएट]] लघुपट, सद्यकालीन चित्र्पट निर्माते जसे की Chris Marker, Agnes Varda, Michael Moore (''Roger and Me'', ''Bowling for Columbine'' आणि ''Fahrenheit 9/11''), Errol Morris (''The Thin Blue Line''), किंवा Morgan Spurlock (''Supersize Me: A Film of Epic Proportions''). Jean-Luc Godard सारखे सद्यकालीन चित्रपट निर्माते त्याच्या अलिकडील कामास "चित्रपट-निबंध" असे म्हणतात.<ref>[http://www.chicagomediaworks.com/2instructworks/3editing_doc/3editing_docinematicessay.html Discussion of film essays]</ref> George Melies आणि Bertolt Brecht या दोन चित्रपट निर्मात्यांचे कामाकडे चित्रपट निबंधांच्या पूर्वाश्रमीचे काम म्हणून निर्देश करता येतो. George Melies ने इस्वी १९०२ मध्ये Edward VIIच्या राज्याभिषेकावर माहितीपट बनवला होता ज्यात प्रसंग उभाकरण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष फुटेज वापरले होते. Bertolt Brecht या नाटककाराने त्याच्या नाटकातून विशीष्ट पद्धतीने चित्रपट अंश वापरण्याचे प्रयोग केले.<ref name="chicagomediaworks.com"/> डेव्हीड विंक्स ग्रे त्यांच्या "The essay film in action" लेखात म्हणतात "चित्रपट निबंध १९५० आणि ६० च्या दशकात (लघू)चित्रपट निर्मितीचा एक प्रकार म्हणून परिचीत झाले होते". ते म्हणतात, तेव्हा पासून चित्रपट निबंध चित्रपट 'निर्मितीक्षेत्राच्या परिघावर' आहेत. चित्रपट निबंढांना "एक वैशिष्ट्यपूर्ण शोध, आणि प्रश्नांची छटा असते" जी " डॉक्यूमेंटरी आणि कथा" या दोन्हीत कुठेतरी कोणत्याही एका गटात सहजतेने बसत नाही. 'ग्रे'च्या मतानुसार, चित्रपट निबंधसुद्धा अगदी लिखीत निबंधाप्रमाणे मार्गदर्शक निवेदकाचा (बहुतेक वेळा दिग्दर्शकाचा) आवाज अन्य व्यापक मांडणीत बेमालूम मिसळून सादरीकरण करतात. <ref>http://www.sf360.org/features/the-essay-film-in-action</ref> विस्कॉन्सिन विद्यापीठाची सिनेमॅटिक वेबसाईट 'ग्रे'प्रमाणेच काही मते व्यक्त करते. या वेबसाईटनुसार चित्रपट निबंध म्हणजे अशी "संकेतयुक्त आणि जिव्हाळ्याची" शैली जी " काल्पनिक चित्रपट आणि माहितीपटांच्या सीमारेषेवर "कल्पक, आनंदी खेळकर, आणि विलक्षण" उत्साहवर्धक पद्धतीने व्यक्त होणारी चित्रपट निर्मात्याच्या चिंताग्रस्त मनाची भावना पकडते.<ref>http://cinema.wisc.edu/series/2009_spring/essay.htm</ref> [[Image:Huahine, French Polynesia, Image - Scott Williams.jpg|thumb|right|400px|" फ्रेंच पोलेनिशियाच्या एका बीचवर शाळासुटल्यावर खेळणाऱ्या मुलांचा खेळ, कुणीतरी पकडलेला आणि वापस पाण्यात सोडलेला [[वाघोळे|स्टिंगरे (वाघोळे) मासा]] पाहण्यासाठी थांबतो आणि पुन्हा सुरू होतो; ते क्षण, स्कॉट विल्यम नावाच्या छायाचित्रकाराने ह्या एक सोप्या छायाचित्र निबंधाद्वारे टिपले आहेत]] विशिष्ट क्रमाशिवायसुद्धा असू शकतात. सर्व छायाचित्र निबंधांना हे छायाचित्र संग्रह म्हणता येते पण सर्व छायाचित्र संग्रहांना छायाचित्र निबंध म्हणता येत नाही छायाचित्र निबंध बऱ्याच वेळा विशिष्ट विषय, प्रसंग अथवा स्थळांचे वर्णन करतात. ==हे सुद्धा पाहा== ==अधिक वाचन== * [[Theodor W. Adorno]], ''The Essay as Form'' in: Theodor W. Adorno, The Adorno Reader, Blackwell Publishers 2000. * Beaujour, Michel. ''Miroirs d'encre: Rhétorique de l'autoportrait'. Paris: Seuil, 1980. [Poetics of the Literary Self-Portrait. Trans. Yara Milos. New York: NYU Press, 1991]. * Bensmaïa, Reda. ''The Barthes Effect: The Essay as Reflective Text''. Trans. Pat Fedkiew. Minneapolis: Univ. of Minnesota Press, 1987. * D'Agata, John (Editor), ''The Lost Origins of the Essay''. St Paul: Graywolf Press, 2009. * Giamatti, Louis. “The Cinematic Essay”, in ''Godard and the Others: Essays in Cinematic Form''. London, Tantivy Press, 1975. *Lopate, Phillip. “In Search of the Centaur: The Essay-Film”, in ''Beyond Document: Essays on Nonfiction Film''. Edited by Charles Warren, Wesleyan University Press, 1998. pages 243-270. *Warburton, Nigel. ''The basics of essay writing''. Routledge, 2006. ISBN 041524000X, ISBN 9780415240000 == बाह्य दुवे == {{wikibooks|How to write an essay}} ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:लेखन]] [[वर्ग:भाषा]] [[वर्ग:व्याकरण]] atyrgg34xiyab5ax1i13x2y96ain7bj शंकरराव काळे 0 66610 2581360 2458816 2025-06-20T17:20:59Z Sandesh9822 66586 "[[:en:Special:Redirect/revision/1289074661|Shankarrao Kale]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले 2581360 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट पदाधिकारी|जन्म_तारीख={{birth date|1921|04|06|df=y}}|मृत्युदिनांक={{death date and age|2012|11|05|1921|04|06|df=y}}|मतदारसंघ1=[[Parner Assembly constituency|Parner]]|मतदारसंघ=[[Kopargaon Lok Sabha constituency]]}} '''शंकरराव देवराम काळे''' (१९२१-२०१२) हे एक भारतीय राजकारणी होते. ते महाराष्ट्रातील [[अहिल्यानगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातील]] सहकार चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. १९७२ ते १९८० पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य. ते तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री [[शरद पवार]] यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. १९९१ ते १९९६ पर्यंत त्यांनी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी]] कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.outlookindia.com/newswire/story/congress-leader-shankarrao-kale-dead/780088|title=Congress Leader Shankarrao Kale Dead|date=6 November 2016|work=Outlook}}</ref> त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या कल्याणासाठी काम केले. गणपतराव औताडे यांनी १९५३ मध्ये कोळपेवाडी, [[अहिल्यानगर|अहमदनगर]] जिल्हा, [[महाराष्ट्र]] येथे कोपरगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेडची स्थापना केली. काळे हे संस्थापक संचालक मंडळांपैकी एक होते. त्यांनी [[अहिल्यानगर|अहमदनगर]] जिल्हा आणि [[महाराष्ट्र]] राज्यातही सहकारी चळवळीला शिखरावर नेले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.karmaveerkalesugar/|title=Founder Karmaveer Shankarrao Kale Sahakari Sakhar Karkhana}}</ref> ५ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचे निधन झाले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/news/maharashtra/congress-leader-shankarrao-kale-passes-away_809615.html|title=Congress leader Shankarrao Kale passes away|website=Zee News|language=en|access-date=2025-05-06}}</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == * आमदार आशुतोष काळे [https://www.ashutoshkale.com] * कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना [https://www.karmaveerkalesugar.com] [[वर्ग:१० वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:इ.स. २०१२ मधील मृत्यू]] [[वर्ग:मराठी व्यक्ती]] [[वर्ग:इ.स. १९२१ मधील जन्म]] [[वर्ग:महाराष्ट्रातील लोकसभा सदस्य]] [[वर्ग:अहिल्यानगर जिल्ह्यातील लोक]] [[वर्ग:महाराष्ट्रातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी]] 6cdycknuiyuxkrlb2bp9wb8wkj1vx8d 2581361 2581360 2025-06-20T17:21:55Z Sandesh9822 66586 2581361 wikitext text/x-wiki '''शंकरराव देवराम काळे''' (१९२१-२०१२) हे एक भारतीय राजकारणी होते. ते महाराष्ट्रातील [[अहिल्यानगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातील]] सहकार चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. १९७२ ते १९८० पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य. ते तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री [[शरद पवार]] यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. १९९१ ते १९९६ पर्यंत त्यांनी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी]] कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.outlookindia.com/newswire/story/congress-leader-shankarrao-kale-dead/780088|title=Congress Leader Shankarrao Kale Dead|date=6 November 2016|work=Outlook}}</ref> त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या कल्याणासाठी काम केले. गणपतराव औताडे यांनी १९५३ मध्ये कोळपेवाडी, [[अहिल्यानगर|अहमदनगर]] जिल्हा, [[महाराष्ट्र]] येथे कोपरगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेडची स्थापना केली. काळे हे संस्थापक संचालक मंडळांपैकी एक होते. त्यांनी [[अहिल्यानगर|अहमदनगर]] जिल्हा आणि [[महाराष्ट्र]] राज्यातही सहकारी चळवळीला शिखरावर नेले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.karmaveerkalesugar/|title=Founder Karmaveer Shankarrao Kale Sahakari Sakhar Karkhana}}</ref> ५ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचे निधन झाले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/news/maharashtra/congress-leader-shankarrao-kale-passes-away_809615.html|title=Congress leader Shankarrao Kale passes away|website=Zee News|language=en|access-date=2025-05-06}}</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == * आमदार आशुतोष काळे [https://www.ashutoshkale.com] * कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना [https://www.karmaveerkalesugar.com] [[वर्ग:१० वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:इ.स. २०१२ मधील मृत्यू]] [[वर्ग:मराठी व्यक्ती]] [[वर्ग:इ.स. १९२१ मधील जन्म]] [[वर्ग:महाराष्ट्रातील लोकसभा सदस्य]] [[वर्ग:अहिल्यानगर जिल्ह्यातील लोक]] [[वर्ग:महाराष्ट्रातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी]] pc51nw11y9fqle5r9mnqsupfttgf1qz 2581363 2581361 2025-06-20T17:23:10Z Sandesh9822 66586 2581363 wikitext text/x-wiki [[File:Kamaveer Shankarrao Kale.jpg|thumb|शंकरराव काळे]] '''शंकरराव देवराम काळे''' (१९२१-२०१२) हे एक भारतीय राजकारणी होते. ते महाराष्ट्रातील [[अहिल्यानगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातील]] सहकार चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. १९७२ ते १९८० पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य. ते तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री [[शरद पवार]] यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. १९९१ ते १९९६ पर्यंत त्यांनी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी]] कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.outlookindia.com/newswire/story/congress-leader-shankarrao-kale-dead/780088|title=Congress Leader Shankarrao Kale Dead|date=6 November 2016|work=Outlook}}</ref> त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या कल्याणासाठी काम केले. गणपतराव औताडे यांनी १९५३ मध्ये कोळपेवाडी, [[अहिल्यानगर|अहमदनगर]] जिल्हा, [[महाराष्ट्र]] येथे कोपरगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेडची स्थापना केली. काळे हे संस्थापक संचालक मंडळांपैकी एक होते. त्यांनी [[अहिल्यानगर|अहमदनगर]] जिल्हा आणि [[महाराष्ट्र]] राज्यातही सहकारी चळवळीला शिखरावर नेले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.karmaveerkalesugar/|title=Founder Karmaveer Shankarrao Kale Sahakari Sakhar Karkhana}}</ref> ५ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचे निधन झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/news/maharashtra/congress-leader-shankarrao-kale-passes-away_809615.html|title=Congress leader Shankarrao Kale passes away|website=Zee News|language=en|access-date=2025-05-06}}</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == * आमदार आशुतोष काळे [https://www.ashutoshkale.com] * कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना [https://www.karmaveerkalesugar.com] [[वर्ग:१० वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:इ.स. २०१२ मधील मृत्यू]] [[वर्ग:मराठी व्यक्ती]] [[वर्ग:इ.स. १९२१ मधील जन्म]] [[वर्ग:महाराष्ट्रातील लोकसभा सदस्य]] [[वर्ग:अहिल्यानगर जिल्ह्यातील लोक]] [[वर्ग:महाराष्ट्रातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी]] dzdjzfogskim9r0to459q4sn1qb179n औंध संस्थान 0 68971 2581516 2581189 2025-06-21T06:39:12Z 120.88.180.214 /* पौराणिक इतिहास */ 2581516 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भूतपूर्व देश | राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = | राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = औंध संस्थान | सुरुवात_वर्ष = इ.स. १६९९ | शेवट_वर्ष = इ.स. १९४८ | मागील१ = [[मराठा साम्राज्य]] | मागील_ध्वज१ = Flag of the Maratha Empire.svg | पुढील१ = भारत | पुढील_ध्वज१ = Flag of India.svg | राष्ट्र_ध्वज = Aundh_flag.svg | राष्ट्र_चिन्ह = | जागतिक_स्थान_नकाशा = Bombay_Prov_south_1909.jpg | ब्रीद_वाक्य = | राजधानी_शहर = [[औंध]] | सर्वात_मोठे_शहर = औंध | शासन_प्रकार = [[राजतंत्र]] | राष्ट्रप्रमुख_नाव = पहिला राजा: श्री परशुराम त्रिंबक पंत प्रतिनिधी (इ.स.१६९७-१७१७)<br />अंतिम राजा: श्री भवानराव श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी (इ.स. १९३७-४७) | पंतप्रधान_नाव = परशुरामराव पंत (इ.स.१९४४-१९४८) | राष्ट्रीय_भाषा = [[मराठी भाषा]] | इतर_प्रमुख_भाषा = | राष्ट्रीय_चलन = | क्षेत्रफळ_चौरस_किमी = 1,298 | लोकसंख्या_संख्या = 58,916 (इ.स.१८८१) | लोकसंख्या_घनता = ४५.४ }} '''औंध संस्थान''' [[महाराष्ट्र]]ातील एक संस्थान होते. महाराष्ट्रात ते सातारा औंध या नावाने परिचित आहे. औंध संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. या संस्थानाची स्थापना सन १६९९ या वर्षी झाली.या संस्थानाची पूर्वीची राजधानी कराड ही होती. == संस्थानिक == औंध संस्थानाची स्थापना परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी यांनी केली. ते [[देशस्थ ब्राह्मण]] होते. == औंध संस्थानाचे राजे == {| class="wikitable" ! colspan="5" | औंध संस्थानाची स्थापना |- | colspan="5" | <center>१६९०<ref name="worldstatesmen">[http://www.worldstatesmen.org/India_princes_A-J.html Worldstatesmen.org] Indiase prinsen A-J</ref> / १६९९<ref name="EncyclopædiaBritannica-11">[[Encyclopædia Britannica]], eleventh edition (1910-1911)</ref></center> |- ! colspan="5" | राजा पंतप्रतिनिधी (किताब)<ref name="worldstatesmen"/> |- | '''पासून''' || '''पर्यंत''' || '''नाव''' || '''जन्म''' || '''मृत्यू''' |- | [[इ.स. १६९७]] || [[मे २७]], [[इ.स. १७१८]] || [[परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी]] || [[इ.स. १६६०]] || [[इ.स. १७१८]] |- | [[इ.स. १७१८]] || [[नोव्हेंबर २५]], [[इ.स. १७४६]] || [[श्रीनिवासराव परशुराम "श्रीपतराव" पंतप्रतिनिधी]] || || [[इ.स. १७४६]] |- | [[इ.स. १७४६]] || [[इ.स. १७५४]] || [[जगजीवनराव परशुराम पंतप्रतिनिधी]] || || |- | [[इ.स. १७५४]] || [[एप्रिल ५]], [[इ.स. १७७६]] || [[श्रीनिवासराव गंगाधर पंतप्रतिनिधी]] || || [[इ.स. १७७६]] |- | [[इ.स. १७७६]] || [[ऑगस्ट ३०]], [[इ.स. १७७७]] || [[भवानराव पंतप्रतिनिधी]] || || [[इ.स. १७७७]] |- | [[ऑगस्ट ३०]], [[इ.स. १७७७]] || [[जून ११]], [[इ.स. १८४८]] || [[परशुरामराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी]] || [[इ.स. १७७७]] || [[इ.स. १८४८]] |- | [[जून ११]], [[इ.स. १८४८]] || [[इ.स. १९०१]] || [[श्रीनिवासराव परशुराम पंतप्रतिनिधी]] ''अण्णासाहेब'' || [[नोव्हेंबर २७]], [[इ.स. १८३३]]|| [[इ.स. १९०१]] |- | [[इ.स. १९०१]] || [[इ.स. १९०५]]|| [[दादासाहेब पंतप्रतिनिधी|परशुरामराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी]] "दादासाहेब" || [[फेब्रुवारी १७]], [[इ.स. १८५८]] || [[इ.स. १९०५]] |- | [[नोव्हेंबर ३]], [[इ.स. १९०५]] || [[नोव्हेंबर ४]], [[इ.स. १९०९]] || [[गोपाळकृष्णराव परशुराम पंतप्रतिनिधी]] ''नानासाहेब'' || || |- | [[नोव्हेंबर ४]], [[इ.स. १९०९]] || [[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९४७]] || [[भवानराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी]] ''बाळासाहेब'' || [[ऑक्टोबर २४]], [[इ.स. १८६८]]|| [[एप्रिल १३]], [[इ.स. १९५१]] |- ! colspan="5" |<center> पंतप्रधान<ref name="worldstatesmen"/></center> |- | '''पासून''' || '''पर्यंत''' || '''नाव''' || '''जन्म''' || '''मृत्यू''' |- | [[इ.स. १९४४]] || [[इ.स. १९४८]] || [[परशुराम राव पंत]] || [[सप्टेंबर ११]], [[इ.स. १९१२]] || [[ऑक्टोबर ५]], [[इ.स. १९९२]] |} == पौराणिक इतिहास == [[औंध संस्थान|औंध]] हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे मुख्य ठिकाण होते. त्या आगोदर औंधला जसा पौराणिक इतिहास आहे तसा मध्य युगीन इतिहासाच्या पाऊल खुणा पाहवयास मिळतात. त्याचा पुरावा म्हणजे औंध गावच्या नैऋत्य दिशेस एका लहानश्या टेकडीवर श्री मुळपीठ [[यमाई देवी मंदिर (औंध)|यमाई]] देवीचे जागृत स्थान आहे. शिवाय गावात पद्माळें, नागाळें व विशाळें ही तीन तळी अस्तित्वात होती, त्यापैकी विशाळे हे तळे बुझलेले आहे. उर्वरित दोन तळी अद्याप अस्तित्वात आहेत. इ.स. १००० ते ११५० पर्यंत औंध वरती देवगिरीच्या यादवांचा अंमल होता. सोळाव्या - सतराव्या शतकात आदिलशाहीचा अंमल कऱ्हाड, सातारा, करवीर या प्रांतावर होता. याच काळात मसूर व औंध या दोन परगण्यांची देशमुखी मसूरचे जगदाळे - पाटील यांच्याकडे होती. औंध परगण्यांत तेव्हा २७ गावे होती. तद्नंतर रक्ताजी रुपजी यांच्याकडे देशमुखी गेल्याचे उल्लेख आढळतात. १६ शतकात [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांनी]] बादशाही विरुद्ध उभारलेल्या बंडामुळे त्रस्त झालेल्या आदिलशाहीने महाराष्ट्र मराठी संस्कृती राज्य धुळीत मिळवण्याचा चंग बांधला होता. तेव्हा अफजलखानाने तुळजापूर व पंढरपूर ही ठिकाणे उध्वस्त केल्यानंतर कराड - रहिमतपूर मार्गे औंधकडे मोर्चा वळवला. तेव्हा औंधच्या पुजाऱ्यांनी श्री यमाई देवीच्या मूर्तीस लहानश्या देवळात बंदिस्त करून त्या देवळाला मस्जिदीचे रूप दिले. तेव्हापासून यमाईच्या पुजाऱ्यांपैकी एका शाखेस (फकीर) पुजारी असे म्हणतात. यावेळी औंध गावातील यमाई मंदिरासमोर असलेली महाराष्ट्रातील किंबहुना देशातील सर्वात उंच सुमारे ६५ फुट उंच असलेल्या दीपमाळेचे सौंदर्य व भव्यता पाहून हिंदू मंदिरे धुळीस मिळवणाऱ्या खुद्द अफजलखानाची देखील तिला हात लावायची हिम्मत झाली नाही; अशी बॉम्बे गॅझेट मध्ये नोंद आहे. इ.स. १७०१ ते १८०६ पर्यंत परशुराम पंतप्रतिनिधी औंधच्या गादीवर राज्य करीत होते. १८०६ साली पेशवाई जप्त झाल्यानंतर १८११ पर्यंतचा कालावधी वगळल्यास सर्वकाळ पंतप्रतिनिधींचा औंध संस्थानावर अंमल राहिला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.maayboli.com/node/44724|title=साताऱ्यातील प्रसिद्ध औंध संस्थान व मुळपीठ यमाई देवीचा रंजक इतिहास|last=चोरगे|first=दिनेश|date=2023-01-06|website=Pudhari News|language=mr|url-status=live|access-date=2025-06-20}}</ref> == भवानराव पंतप्रतिनिधी == औंध संस्थानचे राजे [[भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी|भवानराव पंतप्रतिनिधी]] हे धार्मिक होते, पण दैववादी नव्हते. त्यांची औंधच्या [[यमाई देवी मंदिर (औंध)|यमाई]] देवीवर नितांत श्रद्धा होती. सूर्योदयास यमाई देवीच्या दर्शनासाठी ते नित्य मूळपीठ डोंगरावर दर्शनासाठी जायचे. मानवी सामर्थ्यावर व कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता. उद्योगाचे महत्त्व त्यांना पुरेपूर पटलेले होते. बहात्तर खेडी आणि अठ्ठेचाळीस वाड्या एवढाच विस्तार असलेले आपले संस्थान उद्योग-व्यवसायांनी फुलावे, फळावे असे स्वप्न त्यांनी पाहिले. संस्थानांतील शाळांमधून तंत्रशिक्षण देण्यावर त्यांचा कटाक्ष होता.या संस्थानमधील श्री.श्री.विद्यालयातून साने गुरुजी ,ग.दि.माडगूळकर,व्यंकटेश माडगूळकर,शंकरराव खरात,मधुकर पाठक (चित्रपट क्षेत्रातील)यांनी शिक्षण घेतले. स्वदेशी वस्तू हा [[भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी|भवानराव पंतप्रतिनिधींचा]] जिव्हाळ्याचा विषय होता. संस्थानात शेतांत पिकलेले धान्यच त्यांच्या भोजनात असे. संस्थानामधील विणकरांनी विणलेली साधी वस्त्रेच ते परिधान करीत. सूर्यनमस्कार या जुन्या व्यायामप्रकाराचे त्यांनी शास्त्रशुद्ध संशोधन करून पुनरुज्जीवन केले. ते स्वतः सूर्यनमस्कार घालीत. संस्थानातील शालेय विद्यार्थीही हा व्यायाम करीत . त्यांच्या या सूर्यनमस्कार ‘वेडा’वर [[आचार्य अत्रे|आचार्य अत्र्यांनी]] ‘साष्टांग नमस्कार’ नावाचे नाटक लिहिले. [[भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी|भवानरावांनी]] ‘बिन भिंतीचा तुरुंग’ ही मॉरिस फ्रेडमन नावाच्या आयरिश माणसाची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. उघड्यावर असलेली ती खुनी गुन्हेगारांची वसाहत पुढे ‘स्वतंत्रपूर’ या नावाने ओळखली जाऊ लागली. [[व्ही.शांताराम]] यांनी याच संकल्पनेवर ‘दो ऑंखे बारा हाथ’ नावाचा हिंदी चित्रपट काढला. हा चित्रपट जगभरात नावाजला गेला.आजही आटपाडी येथे 'बिन भिंतीचा तुरुंग 'आहे . [[भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी|भवानरावांना]] साहित्य, संगीत, शिल्प, चित्र यांची विशेष आवड होती. दर वर्षी राजेसाहेब औंधमध्ये कला प्रदर्शन भरवीत. ते स्वतः चित्रकार होते .त्यांनी काढलेली चित्रे औंधच्या संग्रहालयात आजही आहेत.त्यांनी राजे-रजवाड्यांकडून जुनी चित्रे विकत घेतली. परदेशी जाऊन पाश्चात्य चित्रकारांची काही चित्रे भारतात आणली. काही दुर्मीळ चित्रांच्या नकला करवून आणल्या. आणि या चित्रा-शिल्पांसाठी औंधमध्ये ए्क वैशिष्ट्यपूर्ण [[संग्रहालय]] उभारले. {{विस्तार}} == संदर्भ आणि नोंदी == <references /> [[वर्ग:औंध संस्थान| ]] [[वर्ग:भारतातील संस्थाने]] [[वर्ग:डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या आधिपत्याखालील संस्थाने]] emrdbg3ofp4763kxvm0wt5wq2601v88 ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ 0 69084 2581330 2530659 2025-06-20T15:55:16Z 2409:40C2:104A:F6B3:8000:0:0:0 /* महाराष्ट्र विधानसभा निवडणुका */ 2581330 wikitext text/x-wiki '''ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ - १४६''' हा [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र राज्य विधानसभे]]<nowiki/>च्या [[महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी|२८८ मतदारसंघांपैकी]] एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार ओवळा-माजिवडा मतदारसंघात [[ठाणे जिल्हा|ठाणे जिल्ह्यातील]] [[मीरा-भाईंदर महानगरपालिका|मिरा भाईंदर महानगरपालिके]]<nowiki/>च्या वॉर्ड क्र. ९ ते १६, ३७ ते ४०, ४५ आणि [[ठाणे महानगरपालिका|ठाणे महानगरपालिके]]<nowiki/>च्या वॉर्ड क्र. ९ आणि ११ यांचा समावेश होतो. ओवळा-माजिवडा हा विधानसभा मतदारसंघ [[ठाणे लोकसभा मतदारसंघ|ठाणे लोकसभा मतदारसंघात]] मोडतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना|लेखक=|विदा संकेतस्थळ दुवा=https://web.archive.org/web/20090219014012/http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|विदा दिनांक=2009-02-19|दुवा=http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|कृती=|प्रकाशक=मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य|दिनांक=|अ‍ॅक्सेसदिनांक=१२ October २००९|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://eci.gov.in/files/file/3931-delimitation-of-parliamentary-assembly-constituencies-order-2008/|title=Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008|url-status=live}}</ref> [[शिवसेना|शिवसेनेचे]] [[प्रताप बाबूराव सरनाईक]] हे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mls.org.in/pdf2022/budget/%E0%A5%A7%E0%A5%AA%20%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%20%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF%20%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF.pdf|title=१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय|url-status=live}}</ref> == आमदार == {| class="wikitable" !वर्ष !आमदार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://eci.gov.in/statistical-report/statistical-reports/|title=STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)|url-status=live}}</ref> ! colspan="2" |पक्ष |- |[[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|२०१९]] | [[प्रताप बाबूराव सरनाईक]] | style="background-color: {{शिवसेना/meta/color}}" | |[[शिवसेना]] |- |[[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|२०१४]] | [[प्रताप बाबूराव सरनाईक]] | style="background-color: {{शिवसेना/meta/color}}" | |[[शिवसेना]] |- |[[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९|२००९]] | [[प्रताप बाबूराव सरनाईक]] | style="background-color: {{शिवसेना/meta/color}}" | |[[शिवसेना]] |} == निवडणूक निकाल == {|class="wikitable collapsible collapsed" ! colspan=3 width=600{{!}} [[महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९]] |- !colspan=3|ओवळा-माजीवडा |- |- !उमेदवार ![[पक्ष]] !मत |- |[[प्रताप भाउराव सरनाईक]] |[[शिवसेना]] |५२,३७३ |- | सुधाकर वामन चव्हाण |[[मनसे]] |४३,३३२ |- | दिलीप सदाशिव देहेरकर |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] |३४,०१८ |- | गंगाराम दोढा इंदिसे |[[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी]] |८,८४७ |- | दिलीप विष्णू पंडित |[[अपक्ष]] |१,११९ |- | बाबूकुमार काशीनाथ कांबळे |[[बहुजन समाज पक्ष|बसपा]] |१,०५२ |- | पठाण जावेद कमील |[[राष्ट्रीय क्रांतिकारी समाजवादी पार्टी]] |१,०३२ |- | हेमंत फुलचंद यादव |[[अपक्ष]] |५९५ |- |ASHA KISAN SHARNAGAT |[[भारीप बहुजन महासंघ|भाबम]] |५०१ |- |PRAMOD PRALHAD INGALE |[[अपक्ष]] |३८९ |- |JAGDISH MOTIRAM PATIL |[[अपक्ष]] |३७२ |- |MAHENDRA VASANT YELAVE |[[अखिल भारत हिंदु महासभा|अभाहिंम]] |३४७ |- |HEGISHTE BALCHANDRA NARAYAN |[[अपक्ष]] |३३७ |- |BALASAHEB BHIVA GAIKWAD |[[अपक्ष]] |२१५ |- |CHANDRAKANT DASHRATH GAIKWAD |[[अपक्ष]] |१८७ |- |UDAY M SHRUNGAPURE |[[अपक्ष]] |१७७ |- |GUPTA RHUSHIKANT HORILAL |[[अपक्ष]] |१७० |- |MAHESH RADHESHYAM RATHI |[[Rashtravadi Janata Party]] |१६२ |- |SHAIKH KAMAL JAHAN |[[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया|रिपाई (Democratic )]] |११७ |} ==[[महाराष्ट्र विधानसभा निवडणुका]]== ===विजयी=== *[[प्रताप सरनाईक]] - [[शिवसेना]] == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{महाराष्ट्र विधानसभा}} [[वर्ग:महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघ]] [[वर्ग:ठाणे जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ]] [[वर्ग:ठाणे लोकसभा मतदारसंघ]] [[वर्ग:ठाणे]] a5w111eigpe1a291j22ijae5i0c5j2t 2581332 2581330 2025-06-20T15:56:28Z 2409:40C2:104A:F6B3:8000:0:0:0 /* महाराष्ट्र विधानसभा निवडणुका */ 2581332 wikitext text/x-wiki '''ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ - १४६''' हा [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र राज्य विधानसभे]]<nowiki/>च्या [[महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी|२८८ मतदारसंघांपैकी]] एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार ओवळा-माजिवडा मतदारसंघात [[ठाणे जिल्हा|ठाणे जिल्ह्यातील]] [[मीरा-भाईंदर महानगरपालिका|मिरा भाईंदर महानगरपालिके]]<nowiki/>च्या वॉर्ड क्र. ९ ते १६, ३७ ते ४०, ४५ आणि [[ठाणे महानगरपालिका|ठाणे महानगरपालिके]]<nowiki/>च्या वॉर्ड क्र. ९ आणि ११ यांचा समावेश होतो. ओवळा-माजिवडा हा विधानसभा मतदारसंघ [[ठाणे लोकसभा मतदारसंघ|ठाणे लोकसभा मतदारसंघात]] मोडतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना|लेखक=|विदा संकेतस्थळ दुवा=https://web.archive.org/web/20090219014012/http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|विदा दिनांक=2009-02-19|दुवा=http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|कृती=|प्रकाशक=मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य|दिनांक=|अ‍ॅक्सेसदिनांक=१२ October २००९|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://eci.gov.in/files/file/3931-delimitation-of-parliamentary-assembly-constituencies-order-2008/|title=Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008|url-status=live}}</ref> [[शिवसेना|शिवसेनेचे]] [[प्रताप बाबूराव सरनाईक]] हे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mls.org.in/pdf2022/budget/%E0%A5%A7%E0%A5%AA%20%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%20%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF%20%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF.pdf|title=१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय|url-status=live}}</ref> == आमदार == {| class="wikitable" !वर्ष !आमदार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://eci.gov.in/statistical-report/statistical-reports/|title=STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)|url-status=live}}</ref> ! colspan="2" |पक्ष |- |[[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|२०१९]] | [[प्रताप बाबूराव सरनाईक]] | style="background-color: {{शिवसेना/meta/color}}" | |[[शिवसेना]] |- |[[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|२०१४]] | [[प्रताप बाबूराव सरनाईक]] | style="background-color: {{शिवसेना/meta/color}}" | |[[शिवसेना]] |- |[[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९|२००९]] | [[प्रताप बाबूराव सरनाईक]] | style="background-color: {{शिवसेना/meta/color}}" | |[[शिवसेना]] |} == निवडणूक निकाल == {|class="wikitable collapsible collapsed" ! colspan=3 width=600{{!}} [[महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९]] |- !colspan=3|ओवळा-माजीवडा |- |- !उमेदवार ![[पक्ष]] !मत |- |[[प्रताप भाउराव सरनाईक]] |[[शिवसेना]] |५२,३७३ |- | सुधाकर वामन चव्हाण |[[मनसे]] |४३,३३२ |- | दिलीप सदाशिव देहेरकर |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] |३४,०१८ |- | गंगाराम दोढा इंदिसे |[[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी]] |८,८४७ |- | दिलीप विष्णू पंडित |[[अपक्ष]] |१,११९ |- | बाबूकुमार काशीनाथ कांबळे |[[बहुजन समाज पक्ष|बसपा]] |१,०५२ |- | पठाण जावेद कमील |[[राष्ट्रीय क्रांतिकारी समाजवादी पार्टी]] |१,०३२ |- | हेमंत फुलचंद यादव |[[अपक्ष]] |५९५ |- |ASHA KISAN SHARNAGAT |[[भारीप बहुजन महासंघ|भाबम]] |५०१ |- |PRAMOD PRALHAD INGALE |[[अपक्ष]] |३८९ |- |JAGDISH MOTIRAM PATIL |[[अपक्ष]] |३७२ |- |MAHENDRA VASANT YELAVE |[[अखिल भारत हिंदु महासभा|अभाहिंम]] |३४७ |- |HEGISHTE BALCHANDRA NARAYAN |[[अपक्ष]] |३३७ |- |BALASAHEB BHIVA GAIKWAD |[[अपक्ष]] |२१५ |- |CHANDRAKANT DASHRATH GAIKWAD |[[अपक्ष]] |१८७ |- |UDAY M SHRUNGAPURE |[[अपक्ष]] |१७७ |- |GUPTA RHUSHIKANT HORILAL |[[अपक्ष]] |१७० |- |MAHESH RADHESHYAM RATHI |[[Rashtravadi Janata Party]] |१६२ |- |SHAIKH KAMAL JAHAN |[[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया|रिपाई (Democratic )]] |११७ |} ==[[महाराष्ट्र विधानसभा निवडणुका]]== * प्रताप सरनाईक - [[शिवसेना]] == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{महाराष्ट्र विधानसभा}} [[वर्ग:महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघ]] [[वर्ग:ठाणे जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ]] [[वर्ग:ठाणे लोकसभा मतदारसंघ]] [[वर्ग:ठाणे]] 4nuphp5zjutub0ycxkk0h3fyx14mcil विकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी 4 70318 2581462 2576536 2025-06-21T05:38:47Z Sachin s. sathe 172821 2581462 wikitext text/x-wiki <!--दाखवा-लपवा सूचना मथळा कोड चालू--> <div class="NavFrame" style="padding:0px; border-style: none;"> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px;"> <div class="NavHead" style="padding-bottom:3px; background: #F8EABA; text-align: centre; padding: 0px;"> <span style="font-size:120%">[[विकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी|'''करावयाच्या गोष्टींची यादी''']] </span>&nbsp;</br>(<small class="editlink noprint plainlinksneverexpand">[{{SERVER}}{{localurl:विकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी|action=edit}} संपादित/अद्ययावत] आणि रचना नेटकी करण्यास साहाय्य करा</small>)</div> <div class="NavContent" style="display: none; text-align: left; padding: 0px;"> <div style="background-color: white; text-align:left;border: 1px solid #c0c090;padding: 5px; margin-top: 5px;"> <!-- दाखवा-लपवा सूचना मथळा कोड समाप्त Display area is above --> <!--दाखवा-लपवा सूचना "हवे असलेले लेख/माहिती विनंत्या" कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>१. हवे असलेले लेख/माहिती विनंत्या </b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> {{विकिपीडिया:प्रकल्प/हवे असलेले लेख}} <!-- दाखवा-लपवा सूचना कोड "हवे असलेले लेख/माहिती विनंत्या" समाप्त Display area is above --> </div></div></div><br /> <!--दाखवा-लपवा सूचना १ कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>१. लेखात आणि मजकुरात भर </b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> #[[विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/यादी|यादी]]त नसलेल्या नावांची भर टाका. *प्राधान्याने करावयाची कामे #[[:वर्ग:करण्याजोग्या गोष्टी|करण्यासारख्या गोष्टींची मुख्य यादी]] #[[विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन|मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशित]] लेखांचे [[विकिपीडिया:शुद्धलेखन|शुद्धलेखन]], [[विकिपीडिया:विकिकरण|विकिकरण]], [[विकिपीडिया:लेख तपासणी आणि सुधारणा प्रकल्प|मूल्यमापन आणि मूल्यांकन]] प्राधान्याने करून हवे असते. #इंग्रजी विकिपीडियावर असलेल्या मराठीभाषक सदस्यांच्या चर्चा पानावर [[विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन]] आणि [[#निवड झालेले लेख|निवड झालेले लेख]] माहिती देण्याच्या दृष्टीने, इंग्रजी विकिपीडियावरील [[:en:Template:User interwiki infoboard mr|Template:User interwiki infoboard mr]] या साच्यास अद्ययावत ठेवण्यात आवर्जून हातभार लावावा. # # # *नित्य कामे #... #... # # # <!--दाखवा-लपवा सूचना १.१ कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>१.१. सूचना विस्तार</b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> स्थानिक नांव नमूद केल्यास ते कोणत्या प्रांतातील/स्थानातील आहे ते कंसात लिहा.(उदाहरण-कोंकण/विदर्भ/मराठवाडा/गडचिरोली/बालाघाट/मध्य प्रदेश/उत्तर प्रदेश/हिमाचल इ.) हे शक्यतोवर कराच. ह्या माहितीचा उपयोग वनस्पतींच्या शास्त्रप्रणीत आंतरराष्ट्रीय माहिती-भांडाराशी जुळवून घेण्यास मदतरूप होईल. शक्य असेल तेथे वनस्पतीचे इतर भारतीय भाषांमधील नावही द्या. </div></div></div><br /> <!-- दाखवा-लपवा सूचना कोड १.१ समाप्त Display area is above --> </div></div></div><br /> <!-- दाखवा-लपवा सूचना कोड १ समाप्त Display area is above --> #अडचण आल्यास-विकिपीडिया मदतचमू आपल्या पाठीशी आहे. <!--'''(pl.delete after reading-'''there are so many naming standards in it to name 'flora'.i think we should accept the 'International Standards'obviously.--> # [[विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ]] प्रकल्पांतर्गत समन्वयात सहकार्य करा <!--दाखवा-लपवा सूचना २ कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>२ विकिकरण</b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> *प्राधान्याने करावयाची कामे #... #... # # # *नित्य कामे #... #... # # #<!--('''pl.delete after reading-'''i think we all should prepare the classes(वर्गः .....) pre-hand to avoid confusion and ambigious names and stacking of too many uncatagorised writings.)--> </div></div></div><br /> <!-- दाखवा-लपवा सूचना कोड २ समाप्त Display area is above --> <!--दाखवा-लपवा सुचना ३ कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>३[[दालन:वनस्पती]] अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे</b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> *प्राधान्याने करावयाची कामे #... #... # # # *नित्य कामे #... #... # # # </div></div></div><br /> <!-- दाखवा-लपवा सूचना कोड ३ समाप्त Display area is above --> <!--दाखवा-लपवा सूचना ४ कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>४. वनस्पती प्रकल्प अंतर्गत प्रकल्पाची उपपाने अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे</b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> *प्राधान्याने करावयाची कामे #... #... # # # *नित्य कामे #[[विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/प्रकल्प वृत्त]] चे संपादन #... #... # # # </div></div></div><br /> <!-- दाखवा-लपवा सूचना कोड ४ समाप्त Display area is above --> <!--दाखवा-लपवा सुचना ४.१ कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>४.१ वनस्पती प्रकल्पातील अंतर्गत तंत्र आणि साचे अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे</b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> *प्राधान्याने करावयाची कामे #... #... # # # *नित्य कामे #... #... # # # </div></div></div><br /> <!-- दाखवा-लपवा सूचना कोड ४.१ समाप्त Display area is above --> <!--दाखवा-लपवा सुचना ५ कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>५. वनस्पती प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी सदस्यसंख्येत वाढ व्हायला हवी. त्यासाठी आजच्या सदस्यांनी इतरत्र संपर्क करून करावयाची कामे</b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> *प्राधान्याने करावयाची कामे #... #... # # # *नित्य कामे #... #... # # # </div></div></div><br /> <!-- दाखवा-लपवा सूचना कोड ५ समाप्त Display area is above --> <!--दाखवा-लपवा सूचना ६ कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>६. इंटरनेटवर न येणार्‍या त़ज्ज्ञांशी संपर्क करून सामग्रीची, प्रताधिकाराची व लेखाच्या तपासणीची कामे</b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> *प्राधान्याने करावयाची कामे #... #... # # # *नित्य कामे #... #... # # # </div></div></div><br /> <!-- दाखवा-लपवा सूचना कोड ६ समाप्त Display area is above --> </div> * हेसुद्धा पाहा [[विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/यादी|यादी]], * [[विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा/लेखांची यादी]] </div> </div> </div> </div> {{असे हवे}} [[वर्ग:करण्याजोग्या गोष्टी]] ===मला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे=== <!--आपल्याला हवा असलेली माहिती किंवा लेख आधीच उपलब्ध आहे का शोधण्याकरिता या संपादन खिडकीच्या वर दिलेले सहाय्य अभ्यासा; इच्छित माहिती लेख मराठी विकिपीडियात सध्या उपलब्ध नाही असे वाटले तर येथे खाली नोंदवा--> *मला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख : #... #... <!--खालील महिरपी कंसातील तंरंग चिन्हे(~~~~) वगळू नयेत त्या तरंगचिन्हाने आपोआप आपले सदस्य नाव उमटते आणि सहाय्य उपलब्ध करणे सोपे जाते. या खिडकीच्या खाली जतन करणे लिहिले आहे तेथे आवर्जून टिचकी मारून आपले हे लेखन येथे सेव्ह करावे. शंका मांडल्या बद्दल धन्यवाद --> :धन्यवाद! :माझे सदस्य नाव/टोपण नाव: :{{{1|[[सदस्य:Sachin s. sathe|Sachin s. sathe]] ([[सदस्य चर्चा:Sachin s. sathe|चर्चा]]) ११:०८, २१ जून २०२५ (IST)}}} <!--तुमच्या विनंतीस इतर सदस्य येथे खाली प्रतिसाद देतील, हेपान खाली 'जतन करा' येथे टिचकी मारून सेव्ह करावयाचे विसरू नका.--> *वरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे : : :धन्यवाद! :माझे सदस्य नाव/टोपण नाव: :{{{1|[[सदस्य:Sachin s. sathe|Sachin s. sathe]] ([[सदस्य चर्चा:Sachin s. sathe|चर्चा]]) ११:०८, २१ जून २०२५ (IST)}}} qp60876cr0yhe28ybr37mkz5m5mnxyh 2581482 2581462 2025-06-21T05:53:12Z Khirid Harshad 138639 [[Special:Contributions/Sachin s. sathe|Sachin s. sathe]] ([[User talk:Sachin s. sathe|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:Khirid Harshad|Khirid Harshad]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. 2576536 wikitext text/x-wiki <!--दाखवा-लपवा सूचना मथळा कोड चालू--> <div class="NavFrame" style="padding:0px; border-style: none;"> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px;"> <div class="NavHead" style="padding-bottom:3px; background: #F8EABA; text-align: centre; padding: 0px;"> <span style="font-size:120%">[[विकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी|'''करावयाच्या गोष्टींची यादी''']] </span>&nbsp;</br>(<small class="editlink noprint plainlinksneverexpand">[{{SERVER}}{{localurl:विकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी|action=edit}} संपादित/अद्ययावत] आणि रचना नेटकी करण्यास साहाय्य करा</small>)</div> <div class="NavContent" style="display: none; text-align: left; padding: 0px;"> <div style="background-color: white; text-align:left;border: 1px solid #c0c090;padding: 5px; margin-top: 5px;"> <!-- दाखवा-लपवा सूचना मथळा कोड समाप्त Display area is above --> <!--दाखवा-लपवा सूचना "हवे असलेले लेख/माहिती विनंत्या" कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>१. हवे असलेले लेख/माहिती विनंत्या </b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> {{विकिपीडिया:प्रकल्प/हवे असलेले लेख}} <!-- दाखवा-लपवा सूचना कोड "हवे असलेले लेख/माहिती विनंत्या" समाप्त Display area is above --> </div></div></div><br /> <!--दाखवा-लपवा सूचना १ कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>१. लेखात आणि मजकुरात भर </b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> #[[विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/यादी|यादी]]त नसलेल्या नावांची भर टाका. *प्राधान्याने करावयाची कामे #[[:वर्ग:करण्याजोग्या गोष्टी|करण्यासारख्या गोष्टींची मुख्य यादी]] #[[विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन|मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशित]] लेखांचे [[विकिपीडिया:शुद्धलेखन|शुद्धलेखन]], [[विकिपीडिया:विकिकरण|विकिकरण]], [[विकिपीडिया:लेख तपासणी आणि सुधारणा प्रकल्प|मूल्यमापन आणि मूल्यांकन]] प्राधान्याने करून हवे असते. #इंग्रजी विकिपीडियावर असलेल्या मराठीभाषक सदस्यांच्या चर्चा पानावर [[विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन]] आणि [[#निवड झालेले लेख|निवड झालेले लेख]] माहिती देण्याच्या दृष्टीने, इंग्रजी विकिपीडियावरील [[:en:Template:User interwiki infoboard mr|Template:User interwiki infoboard mr]] या साच्यास अद्ययावत ठेवण्यात आवर्जून हातभार लावावा. # # # *नित्य कामे #... #... # # # <!--दाखवा-लपवा सूचना १.१ कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>१.१. सूचना विस्तार</b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> स्थानिक नांव नमूद केल्यास ते कोणत्या प्रांतातील/स्थानातील आहे ते कंसात लिहा.(उदाहरण-कोंकण/विदर्भ/मराठवाडा/गडचिरोली/बालाघाट/मध्य प्रदेश/उत्तर प्रदेश/हिमाचल इ.) हे शक्यतोवर कराच. ह्या माहितीचा उपयोग वनस्पतींच्या शास्त्रप्रणीत आंतरराष्ट्रीय माहिती-भांडाराशी जुळवून घेण्यास मदतरूप होईल. शक्य असेल तेथे वनस्पतीचे इतर भारतीय भाषांमधील नावही द्या. </div></div></div><br /> <!-- दाखवा-लपवा सूचना कोड १.१ समाप्त Display area is above --> </div></div></div><br /> <!-- दाखवा-लपवा सूचना कोड १ समाप्त Display area is above --> #अडचण आल्यास-विकिपीडिया मदतचमू आपल्या पाठीशी आहे. <!--'''(pl.delete after reading-'''there are so many naming standards in it to name 'flora'.i think we should accept the 'International Standards'obviously.--> # [[विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ]] प्रकल्पांतर्गत समन्वयात सहकार्य करा <!--दाखवा-लपवा सूचना २ कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>२ विकिकरण</b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> *प्राधान्याने करावयाची कामे #... #... # # # *नित्य कामे #... #... # # #<!--('''pl.delete after reading-'''i think we all should prepare the classes(वर्गः .....) pre-hand to avoid confusion and ambigious names and stacking of too many uncatagorised writings.)--> </div></div></div><br /> <!-- दाखवा-लपवा सूचना कोड २ समाप्त Display area is above --> <!--दाखवा-लपवा सुचना ३ कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>३[[दालन:वनस्पती]] अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे</b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> *प्राधान्याने करावयाची कामे #... #... # # # *नित्य कामे #... #... # # # </div></div></div><br /> <!-- दाखवा-लपवा सूचना कोड ३ समाप्त Display area is above --> <!--दाखवा-लपवा सूचना ४ कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>४. वनस्पती प्रकल्प अंतर्गत प्रकल्पाची उपपाने अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे</b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> *प्राधान्याने करावयाची कामे #... #... # # # *नित्य कामे #[[विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/प्रकल्प वृत्त]] चे संपादन #... #... # # # </div></div></div><br /> <!-- दाखवा-लपवा सूचना कोड ४ समाप्त Display area is above --> <!--दाखवा-लपवा सुचना ४.१ कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>४.१ वनस्पती प्रकल्पातील अंतर्गत तंत्र आणि साचे अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे</b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> *प्राधान्याने करावयाची कामे #... #... # # # *नित्य कामे #... #... # # # </div></div></div><br /> <!-- दाखवा-लपवा सूचना कोड ४.१ समाप्त Display area is above --> <!--दाखवा-लपवा सुचना ५ कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>५. वनस्पती प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी सदस्यसंख्येत वाढ व्हायला हवी. त्यासाठी आजच्या सदस्यांनी इतरत्र संपर्क करून करावयाची कामे</b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> *प्राधान्याने करावयाची कामे #... #... # # # *नित्य कामे #... #... # # # </div></div></div><br /> <!-- दाखवा-लपवा सूचना कोड ५ समाप्त Display area is above --> <!--दाखवा-लपवा सूचना ६ कोड चालू--> <div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;"> <div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 85%;"> <div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>६. इंटरनेटवर न येणार्‍या त़ज्ज्ञांशी संपर्क करून सामग्रीची, प्रताधिकाराची व लेखाच्या तपासणीची कामे</b></font></div> <div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size: 150%;"> <!-- सूचना खाली आहे Display area is below --> *प्राधान्याने करावयाची कामे #... #... # # # *नित्य कामे #... #... # # # </div></div></div><br /> <!-- दाखवा-लपवा सूचना कोड ६ समाप्त Display area is above --> </div> * हेसुद्धा पाहा [[विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/यादी|यादी]], * [[विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा/लेखांची यादी]] </div> </div> </div> </div> {{असे हवे}} [[वर्ग:करण्याजोग्या गोष्टी]] khg1k8yrkgdknzkseuwpdlpnpwq78zn वाढदिवस 0 73235 2581295 2481055 2025-06-20T12:57:05Z 2409:40C0:79:5AB0:8000:0:0:0 मराठी भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा 2581295 wikitext text/x-wiki {{मट्रा अनुवादीत}} {{गल्लत|जयंती (इंद्र कन्या)}} '''वाढदिवस''' हा वापरात असणाऱ्या दिनदर्शिकांनुसार (जिवंत) व्यक्तीच्या जन्मापासून पूर्ण वर्षांनी येणाऱ्या विशिष्ट तारखेला येतो. ===भारतीय पारंपरिक प्रथा=== # वाढदिवसाच्या दिवशी अभ्यंगस्नान करून नवीन कपडे घालण्याची प्रथा आहे. # ज्याचा वाढदिवस असेल, तो आंघोळीनंतर आई-वडील, तसेच वडीलधाऱ्या व्यक्‍तींना नमस्कार करतो. # ज्याचा वाढदिवस असेल, त्याचे औक्षण करतात. (त्याला तुपाच्या दिव्याने ओवाळतात.) # औक्षण झाल्यावर वाढदिवस असलेल्याच्या डोक्यावर अक्षता टाकतात. # वाढदिवस असलेल्याला खाण्यास गोड पदार्थ देतात. # वाढदिवस असलेल्यांसाठी शुभेच्छा देतात. # ज्याचा वाढदिवस असेल त्याला एखादी भेटवस्तू आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. ====जयंती==== थोर पुरुष, संत/महात्मा वा आदरणीय व्यक्तीचा जन्मदिवस म्हणजे '''जयंती'''. जयंत्यांच्या यादीसाठी [[जयंत्या]] पहा. [[चित्र:Birthday cake28.jpg|thumb|430px|वाढदिवसासाठी केकवर पेटविलेल्या मेणबत्त्या]] [[चित्र:Birthday party.jpg|A child's birthday celebration, complete with cake|thumb|left|300px]] == हे सुद्धा पहा == * [[जयंत्या]] == संदर्भ == {{संदर्भयादी}} == [https://www.samarambh.com/2022/07/happy-birthday-wishes-2023.html?m=1 वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये] दुवे == [[वर्ग:वाढदिवस| ]] b99yf0r8o2t28fx9ooyev32zcfgwudl 2581298 2581295 2025-06-20T12:59:03Z Khirid Harshad 138639 [[Special:Contributions/2409:40C0:79:5AB0:8000:0:0:0|2409:40C0:79:5AB0:8000:0:0:0]] ([[User talk:2409:40C0:79:5AB0:8000:0:0:0|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:अभय नातू|अभय नातू]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. 2442464 wikitext text/x-wiki {{मट्रा अनुवादीत}} {{गल्लत|जयंती (इंद्र कन्या)}} '''वाढदिवस''' हा वापरात असणाऱ्या दिनदर्शिकांनुसार (जिवंत) व्यक्तीच्या जन्मापासून पूर्ण वर्षांनी येणाऱ्या विशिष्ट तारखेला येतो. ===भारतीय पारंपरिक प्रथा=== # वाढदिवसाच्या दिवशी अभ्यंगस्नान करून नवीन कपडे घालण्याची प्रथा आहे. # ज्याचा वाढदिवस असेल, तो आंघोळीनंतर आई-वडील, तसेच वडीलधाऱ्या व्यक्‍तींना नमस्कार करतो. # ज्याचा वाढदिवस असेल, त्याचे औक्षण करतात. (त्याला तुपाच्या दिव्याने ओवाळतात.) # औक्षण झाल्यावर वाढदिवस असलेल्याच्या डोक्यावर अक्षता टाकतात. # वाढदिवस असलेल्याला खाण्यास गोड पदार्थ देतात. # वाढदिवस असलेल्यांसाठी शुभेच्छा देतात. # ज्याचा वाढदिवस असेल त्याला एखादी भेटवस्तू आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. ====जयंती==== थोर पुरुष, संत/महात्मा वा आदरणीय व्यक्तीचा जन्मदिवस म्हणजे '''जयंती'''. जयंत्यांच्या यादीसाठी [[जयंत्या]] पहा. [[चित्र:Birthday cake28.jpg|thumb|430px|वाढदिवसासाठी केकवर पेटविलेल्या मेणबत्त्या]] [[चित्र:Birthday party.jpg|A child's birthday celebration, complete with cake|thumb|left|300px]] == हे सुद्धा पहा == * [[जयंत्या]] == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == [[वर्ग:वाढदिवस| ]] 61yq8c61l3ixcn7w3ec3u1c8lzblk2s मसूदा:सिलम्बम 118 75375 2581493 2183967 2025-06-21T06:03:36Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[सिलम्बम]] वरुन [[मसूदा:सिलम्बम]] ला हलविला 2183967 wikitext text/x-wiki {{मट्रा}} '''सिलम्बम (सिलम्बाट्टम)''' '''Silambam''' तमिळ: சிலம்பம் किंवा '''silambattam''' तमिळ :சிலம்பாட்டம், हा एक शस्त्र-आधारित द्रविड मार्शिअल आर्ट आहे जो दक्षिण भारतातील तमिळनाडूचा आहे पण मलेशियाचा तमिळ समुदायाद्वारेही तो अभ्यास करतो. तामिळ शब्दात शब्दाचा अर्थ 'सिलंबु' ह्या शैलीमध्ये वापरण्यात येणारे मुख्य शस्त्र आहे. इतर शस्त्रे देखील जसे वापरले जातात माडूव (हरण हॉर्न), ''कट्टी'' (चाकू) आणि तलवार. सिलम्बम इतर लढाई शैली, म्हणून ओळखले कुट्टू वरिसाई, [[साप]], [[बाघ]] आणि ईगल फॉर्म यासारख्या पशु चळवळींवर आधारित स्टंट्स आणि रूटीनचा वापर करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://silambam.asia |title=सिलंबम फेन्सिंग तंत्र आणि फरक |लेखक=गुरुजी मुरुगन, छिळ्याह |दिनांक=20 ऑक्टोबर 2012 |प्रकाशक= | संकेतस्थळ=सिलंबॅम आशिया |अ‍ॅक्सेसदिनांक= |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{Uncategorized|date=जानेवारी २०११}} 2ple2gf1wwdzgb3wp1lcxm35x8y0s6z मास्टर कृष्णराव 0 76607 2581362 2529804 2025-06-20T17:22:33Z 219.91.170.196 2581362 wikitext text/x-wiki {{विस्तार}} {{माहितीचौकट गायक | नाव = '''{{लेखनाव}}''' | चित्र = | चित्रशीर्षक = | उपाख्य = | टोपणनावे = मास्तर कृष्णराव / मास्तर कृष्णा / कृष्णा मास्तर / मास्तर | जन्म_दिनांक = [[जानेवारी २०]], [[इ.स. १८९८|१८९८]] | जन्म_स्थान = [[आळंदी]], [[पुणे]], [[भारत]] | मृत्यू_दिनांक = [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४|१९७४]] | मृत्यू_स्थान = [[पुणे]], [[भारत]] | मृत्यू_कारण = वृद्धापकाळ | धर्म = हिंदू | वांशिकत्व = | नागरिकत्व =[[भारत|भारतीय]] | मूळ_गाव = [[फुलंब्री]], [[औरंगाबाद]] [[महाराष्ट्र]] | देश = {{ध्वज|भारत}} | भाषा = [[मराठी]] | आई = मथुरा | वडील = गणेशपंत | जोडीदार = राधाबाई | अपत्ये = तीन | नातेवाईक = | शिक्षण = | प्रशिक्षण संस्था = | गुरू = पं. [[भास्करबुवा बखले]] | संगीत प्रकार = [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत]] | घराणे = आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर-अत्रौली | कार्य = शास्त्रीय गायक, संगीत नाटक गायक नट, चित्रपट नट, संगीतकार, बंदीशकार | पेशा = गायक | कार्य संस्था = पुणे भारत गायन समाज | विशेष कार्य = पुणे भारत गायन समाजाचे अध्यक्ष व सात भागांचे सरकारमान्य रागसंग्रहमाला लेखन, सुलभ संगीत व्याकरण पद्धतीचे निर्माते, स्वतंत्र संगीतरचना, अनवट राग, जोड राग व बंदीशींचे निर्माणकर्ते. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होण्याकरिता प्रखर सांगीतिक लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीनुसार बुद्धवंदना भारतात सर्वप्रथम संगीतबद्ध केली. | कार्यकाळ = सन १९११ ते १९७४ | विशेष उपाधी = संगीतकलानिधि | गौरव = संगीत नाटक अकादमी रत्न सदस्यत्व, विष्णूदास भावे सुवर्णपदक, बालगंधर्व सुवर्णपदक | पुरस्कार = पद्मभूषण | संकीर्ण = | तळटिप = | स्वाक्षरी = | संकेतस्थळ = www.masterkrishnarao.com }} '''कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर''' ऊर्फ ''मास्टर कृष्णराव ('मास्तर कृष्णराव' हे नाव अधिक प्रचलित)'' ([[जानेवारी २०]], [[इ.स. १८९८|१८९८]] - [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४|१९७४]]) हे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील]] गायक व [[मराठी भाषा|मराठी]] संगीतनाटकांमधील संगीतकार आणि गायक-अभिनेते होते. [[भास्करबुवा बखले|गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे]] ते पट्टशिष्य होते. ==पूर्वायुष्य== मास्तर कृष्णरावांचा जन्म [[पुणे]] जिल्ह्यात देवाची [[आळंदी]] येथे आजोळी झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ यजुर्वेदी ब्राम्हण होते व कृष्णरावांचे वडील गणेशपंत हे वेदपठण करणारे ज्ञानी पंडित होते. त्यांच्या अकाली निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत लहानग्या कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक या नाटक मंडळीत बाल गायकनटाचे काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' या नाट्यकला प्रवर्तक संगीत मंडळीच्या नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्व आणि ग्वाल्हेर घराण्याचे उस्ताद निसार हुसेन खाँ यांचे मार्गदर्शन लाभले. नाटकाच्या फिरत्या दौऱ्याने सवाई गंधर्वांना मास्टर कृष्णरावांना योग्य प्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडे देता येत नव्हते. संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून व गायन ऐकून भास्करबुवा फार खूष होते. [[इ.स. १९११]] मध्ये मास्तर कृष्णरावांनी पंडित [[भास्करबुवा बखले]] यांचे शिष्यत्व स्वीकारले स्वतः सवाई गंधर्वांनी मास्तरांना बुवांकडे सोपवले होते. ==सांगीतिक कारकीर्द== गुरुवर्य बखलेबुवांच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी १९१६ साली गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्वांबरोबर]] मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी '[[संगीत शारदा]]', '[[संगीत सौभद्र]]', '[[एकच प्याला]]' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष (गायक नट) भूमिका आणि बऱ्याच स्त्री (गायक नट) भूमिकाही केल्या. १९२२ साली झालेल्या गुरुवर्य बखलेबुवांच्या निधनानंतर गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'आशा-निराशा', 'नंदकुमार', 'विधीलिखित','अमृतसिद्धी', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]]ही त्यांना गुरुवर्य भास्करबुवा बखले यांच्या निर्वाणानंतर गुरुस्थानी मानायचे. नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा', 'कोणे एके काळी' यांमधील शास्त्रीय संगीतावर आधारित भावगीताच्या वळणाने जाणारी गाणी त्यांतील भाव, गेयता व सुमधुरतेसाठी वाखाणली गेली. मास्तर कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'वहॉं', 'गोपालकृष्ण', 'माणूस', 'अमरज्योती', 'शेजारी','लाखारानी' यांसारख्या प्रभात फिल्म कंपनीच्या चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या चित्रपटांतील व इतर संस्थांतर्फे निर्माण केलेल्या चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या 'वसंतसेना' चित्रपटाचा समावेश आहे तसेच माणिक चित्रसंस्थेच्या 'कीचकवध' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तिचा मळा' व 'मेरी अमानत'या चित्रपटांत भूमिकाही केल्या. त्यांनी भक्तिचा मळा या राजकमलने निर्माण केलेल्या चित्रपटात पडद्यावर संत सावता माळी ही प्रमुख भूमिका साकारली, त्या चित्रपटास संगीत दिले व संत सावता महाराजांच्या प्रमुख भूमिकेत अभिनय करते वेळी गायन देखील केले. या चित्रपटाची 'माली' ही हिंदी आवृत्तीदेखील राजकमलने निर्माण करून भारतभर प्रदर्शित केली. यात देखील कृष्णरावांनी संत सावता माळी ही प्रमुख भूमिका साकारली तसेच चित्रपटास संगीत दिले आणि प्रमुख भूमिकेतून गीतांचे गायनदेखील केले. मास्टर कृष्णरावांनी मेरी अमानत या हिंदी चित्रपटात शाळा मास्तरची भूमिका केली व गायन केले. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्तर कृष्णरावांनी [[इ.स. १९२२]] ते [[इ.स. १९५२]] दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच [[ठुमरी]], नाट्यगीत, [[भजन]] व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी संगीत दिलेले 'झिंझोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर पी एम ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली. अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील गायन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे [[इ.स. १९४०]] ते [[इ.स. १९७१]] या काळात लिहिलेले 'रागसंग्रहमाला' नामक सात खंड त्यात समाविष्ट आहेत. या रागसंग्रहमालेस भारत सरकारची मान्यता लाभलेली आहे. 'वंदे मातरम्' हे गीत बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरम् गीताला विविध चाली लावून, त्यातल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंची भेट घेतली व घटना समितीच्या सर्व सदस्यांसमोर संसदेत प्रात्यक्षिके सादर करून त्यांना पटवून देण्याचा प्रयत्‍न केला. पं.नेहरूंनी आधीच '''जन गण मन'' ' हे राष्ट्रगीत म्हणून निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु 'वंदे मातरम्'ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे निदान राष्ट्रीय गीत (National Song) म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला.या घटनेनंतर मास्तर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम् गीताची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक संस्था,जाहीर सभा-संमेलने वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याची ध्वनिमुद्रिका काढली. याकरिता मास्तर कृष्णरावांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये जाऊन पाली भाषेचा अभ्यास केला होता.ही ध्वनिमुद्रिका १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरमधील धर्मांतरण सोहळ्यात वाजवली गेली. पुणे आकाशवाणीच्या सल्लागार समितीचे सदस्य व आकाशवाणीवरील प्रमुख संगीतरचनाकार म्हणून देखील मास्तरांनी भरीव कामगिरी केली. पुणे येथे [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४]] रोजी त्यांचे स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. वीणा चिटको या त्यांच्या कन्येने काही काळ संगीतकार म्हणून कारकीर्द गाजवली. त्या मराठी भावगीत विश्वातील पहिल्या स्त्री संगीतकार म्हणून ओळखल्या जातात. मधुसूदन कानेटकर, सरस्वती राणे, हरिभाऊ देशपांडे, ए.पी. नारायणगांवकर, बापूराव अष्टेकर, दत्तोपंत भोपे, पित्रे बुवा, डॉ. पाबळकर, जयमाला शिलेदार, मोहन कर्वे, माणिकराव ठाकूरदास, सुरेश हळदणकर, आर.एन. करकरे, शिवराम गाडगीळ, बळवंत दीक्षित, धोंडूशास्त्री कस्तापूरकर उर्फ 'दुर्गा', राम मराठे, योगिनी जोगळेकर, अंजनीबाई कळगुटकर,जयश्री शांताराम, वसंत तुळजापूरकर, शोभना वाकणकर, रामभाऊ भावे, सुहास दातार, सुधाकर जोशी, रवींद्र जोशी, वीणा चिटको हे मास्तर कृष्णरावांच्या शिष्यवर्गापैंकी काही शिष्य होत. ==सन्मान व पुरस्कार== * करवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांचे हस्ते 'संगीतकलानिधि' ही पदवी प्रदान * देवासच्या महाराजांनी 'राजगंधर्व' पदवी प्रदान करून गौरवले. * [[पद्मभूषण पुरस्कार]], भारत सरकार * संगीत नाटक अकादमी फेलोशिप * [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]] सुवर्ण पदक * विष्णूदास भावे सुवर्ण पदक * पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मास्टर कृष्णराव यांचे स्मरणार्थ पुतळा उभारण्यात आला आहे. * [[जालना]] येथे एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. * पुणे भारत गायन समाजातर्फे दरवर्षी मास्टर कृष्णराव यांचा जन्मदिन व पुण्यतिथी साजरी केली जाते. * [[महाराष्ट्र साहित्य परिषद|मसाप]] तर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास/ग्रंथकारास 'संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार' देण्यात येतो. * [[महाराष्ट्र साहित्य परिषद]]ेच्या वतीने 'मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ग्रंथकार पुरस्कार २०१६' हा विशेष जाहीर केलेला पुरस्कार सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यावरील ’स्वरसंगत सरदार’ या ग्रंथास देण्यात आला. == बाह्य दुवे == * {{Webarchivis | url=http://archive.is/20130109061816/ulhaskashalkar.tripod.com/krishnar.htm | archive-is=20130109061816/ulhaskashalkar.tripod.com/krishnar.htm | text={{लेखनाव}} (इंग्रजी मजकूर)}} * [http://www.indianetzone.com/30/master_krishnarao_ganesh_phulambrikar_indian_theatre_personality.htm इंडिया नेट झोन संस्थळ](इंग्रजी मजकूर) * [http://courses.nus.edu.sg/course/ellpatke/Miscellany/krishnarao.htm ७८ आर पी एम ध्वनिमुद्रिकांची यादी] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110816163641/http://courses.nus.edu.sg/course/ellpatke/Miscellany/krishnarao.htm |date=2011-08-16 }} {{हिंदुस्तानी संगीत}} {{संगीतातील अपूर्ण लेख}} {{DEFAULTSORT:फुलंब्रीकर, कृष्णराव}} [[वर्ग:मराठी गायक]] [[वर्ग:हिंदुस्तानी गायक]] [[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक]] [[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]] [[वर्ग:इ.स. १८९८ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९७४ मधील मृत्यू]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 1s17mkrp979kccveg3guel9o4rbo7e6 2581364 2581362 2025-06-20T17:24:37Z 219.91.170.196 2581364 wikitext text/x-wiki {{विस्तार}} {{माहितीचौकट गायक | नाव = '''{{लेखनाव}}''' | चित्र = | चित्रशीर्षक = | उपाख्य = | टोपणनावे = मास्तर कृष्णराव / मास्तर कृष्णा / कृष्णा मास्तर / मास्तर | जन्म_दिनांक = [[जानेवारी २०]], [[इ.स. १८९८|१८९८]] | जन्म_स्थान = [[आळंदी]], [[पुणे]], [[भारत]] | मृत्यू_दिनांक = [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४|१९७४]] | मृत्यू_स्थान = [[पुणे]], [[भारत]] | मृत्यू_कारण = वृद्धापकाळ | धर्म = हिंदू | वांशिकत्व = | नागरिकत्व =[[भारत|भारतीय]] | मूळ_गाव = [[फुलंब्री]], [[औरंगाबाद]] [[महाराष्ट्र]] | देश = {{ध्वज|भारत}} | भाषा = [[मराठी]] | आई = मथुरा | वडील = गणेशपंत | जोडीदार = राधाबाई | अपत्ये = तीन | नातेवाईक = | शिक्षण = | प्रशिक्षण संस्था = | गुरू = पं. [[भास्करबुवा बखले]] | संगीत प्रकार = [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत]] | घराणे = आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर-अत्रौली | कार्य = शास्त्रीय गायक, संगीत नाटक गायक नट, चित्रपट नट, संगीतकार, बंदीशकार | पेशा = गायक | कार्य संस्था = पुणे भारत गायन समाज | विशेष कार्य = पुणे भारत गायन समाजाचे अध्यक्ष व सात भागांचे सरकारमान्य रागसंग्रहमाला लेखन, सुलभ संगीत व्याकरण पद्धतीचे निर्माते, स्वतंत्र संगीतरचना, अनवट राग, जोड राग व बंदीशींचे निर्माणकर्ते. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होण्याकरिता प्रखर सांगीतिक लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीनुसार बुद्धवंदना भारतात सर्वप्रथम संगीतबद्ध केली. | कार्यकाळ = सन १९११ ते १९७४ | विशेष उपाधी = संगीतकलानिधि | गौरव = संगीत नाटक अकादमी रत्न सदस्यत्व, विष्णूदास भावे सुवर्णपदक, बालगंधर्व सुवर्णपदक | पुरस्कार = पद्मभूषण | संकीर्ण = | तळटिप = | स्वाक्षरी = | संकेतस्थळ = www.masterkrishnarao.com }} '''कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर''' ऊर्फ ''मास्टर कृष्णराव ('मास्तर कृष्णराव' हे नाव अधिक प्रचलित)'' ([[जानेवारी २०]], [[इ.स. १८९८|१८९८]] - [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४|१९७४]]) हे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील]] गायक व [[मराठी भाषा|मराठी]] संगीतनाटकांमधील संगीतकार आणि गायक-अभिनेते होते. [[भास्करबुवा बखले|गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे]] ते पट्टशिष्य होते. ==पूर्वायुष्य== मास्तर कृष्णरावांचा जन्म [[पुणे]] जिल्ह्यात देवाची [[आळंदी]] येथे आजोळी झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ यजुर्वेदी ब्राम्हण होते व कृष्णरावांचे वडील गणेशपंत हे वेदपठण करणारे ज्ञानी पंडित होते. त्यांच्या अकाली निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत लहानग्या कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक या नाटक मंडळीत बाल गायकनटाचे काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' या नाट्यकला प्रवर्तक संगीत मंडळीच्या नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्व आणि ग्वाल्हेर घराण्याचे उस्ताद निसार हुसेन खाँ यांचे मार्गदर्शन लाभले. नाटकाच्या फिरत्या दौऱ्याने सवाई गंधर्वांना मास्टर कृष्णरावांना योग्य प्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडे देता येत नव्हते. संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून व गायन ऐकून भास्करबुवा फार खूष होते. [[इ.स. १९११]] मध्ये मास्तर कृष्णरावांनी पंडित [[भास्करबुवा बखले]] यांचे शिष्यत्व स्वीकारले स्वतः सवाई गंधर्वांनी मास्तरांना बुवांकडे सोपवले होते. ==सांगीतिक कारकीर्द== गुरुवर्य बखलेबुवांच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी १९१६ साली गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्वांबरोबर]] मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी '[[संगीत शारदा]]', '[[संगीत सौभद्र]]', '[[एकच प्याला]]' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष (गायक नट) भूमिका आणि बऱ्याच स्त्री (गायक नट) भूमिकाही केल्या. १९२२ साली झालेल्या गुरुवर्य बखलेबुवांच्या निधनानंतर गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'आशा-निराशा', 'नंदकुमार', 'विधीलिखित','अमृतसिद्धी', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]]ही त्यांना गुरुवर्य भास्करबुवा बखले यांच्या निर्वाणानंतर गुरुस्थानी मानायचे. नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा', 'कोणे एके काळी' यांमधील शास्त्रीय संगीतावर आधारित भावगीताच्या वळणाने जाणारी गाणी त्यांतील भाव, गेयता व सुमधुरतेसाठी वाखाणली गेली. मास्तर कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'वहॉं', 'गोपालकृष्ण', 'माणूस', 'अमरज्योती', 'शेजारी','लाखारानी' यांसारख्या प्रभात फिल्म कंपनीच्या चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या चित्रपटांतील व इतर संस्थांतर्फे निर्माण केलेल्या चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या 'वसंतसेना' चित्रपटाचा समावेश आहे तसेच माणिक चित्रसंस्थेच्या 'कीचकवध' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तिचा मळा' व 'मेरी अमानत'या चित्रपटांत भूमिकाही केल्या. त्यांनी भक्तिचा मळा या राजकमलने निर्माण केलेल्या चित्रपटात पडद्यावर संत सावता माळी ही प्रमुख भूमिका साकारली, त्या चित्रपटास संगीत दिले व संत सावता महाराजांच्या प्रमुख भूमिकेत अभिनय करते वेळी गायन देखील केले. या चित्रपटाची 'माली' ही हिंदी आवृत्तीदेखील राजकमलने निर्माण करून भारतभर प्रदर्शित केली. यात देखील कृष्णरावांनी संत सावता माळी ही प्रमुख भूमिका साकारली तसेच चित्रपटास संगीत दिले आणि प्रमुख भूमिकेतून गीतांचे गायनदेखील केले. मास्टर कृष्णरावांनी मेरी अमानत या हिंदी चित्रपटात शाळा मास्तरची भूमिका केली व गायन केले. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्तर कृष्णरावांनी [[इ.स. १९२२]] ते [[इ.स. १९५२]] दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच [[ठुमरी]], नाट्यगीत, [[भजन]] व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी संगीत दिलेले 'झिंझोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर पी एम ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली. अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील गायन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे [[इ.स. १९४०]] ते [[इ.स. १९७१]] या काळात लिहिलेले 'रागसंग्रहमाला' नामक सात खंड त्यात समाविष्ट आहेत. या रागसंग्रहमालेस भारत सरकारची मान्यता लाभलेली आहे. 'वंदे मातरम्' हे गीत बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरम् गीताला विविध चाली लावून, त्यातल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंची भेट घेतली व घटना समितीच्या सर्व सदस्यांसमोर संसदेत प्रात्यक्षिके सादर करून त्यांना पटवून देण्याचा प्रयत्‍न केला. पं.नेहरूंनी आधीच '''जन गण मन'' ' हे राष्ट्रगीत म्हणून निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु 'वंदे मातरम्'ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे निदान राष्ट्रीय गीत (National Song) म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला.या घटनेनंतर मास्तर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम् गीताची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक संस्था,जाहीर सभा-संमेलने वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याची ध्वनिमुद्रिका काढली. याकरिता मास्तर कृष्णरावांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये जाऊन पाली भाषेचा अभ्यास केला होता.ही ध्वनिमुद्रिका १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरमधील धर्मांतरण सोहळ्यात वाजवली गेली. पुणे आकाशवाणीच्या सल्लागार समितीचे सदस्य व आकाशवाणीवरील प्रमुख संगीतरचनाकार म्हणून देखील मास्तरांनी भरीव कामगिरी केली. पुणे येथे [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४]] रोजी त्यांचे स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. वीणा चिटको या त्यांच्या कन्येने काही काळ संगीतकार म्हणून कारकीर्द गाजवली. त्या मराठी भावगीत विश्वातील पहिल्या स्त्री संगीतकार म्हणून ओळखल्या जातात. मधुसूदन कानेटकर, सरस्वती राणे, हरिभाऊ देशपांडे, ए.पी. नारायणगांवकर, बापूराव अष्टेकर, दत्तोपंत भोपे, पित्रे बुवा, डॉ. पाबळकर, जयमाला शिलेदार, मोहन कर्वे, माणिकराव ठाकूरदास, सुरेश हळदणकर, आर.एन. करकरे, शिवराम गाडगीळ, बळवंत दीक्षित, धोंडूशास्त्री कस्तापूरकर उर्फ 'दुर्गा', राम मराठे, योगिनी जोगळेकर, अंजनीबाई कळगुटकर,जयश्री शांताराम, वसंत तुळजापूरकर, शोभना वाकणकर, रामभाऊ भावे, दैठणकर, बोरगावकर, सुहास दातार, सुधाकर जोशी, रवींद्र जोशी, वीणा चिटको हे मास्तर कृष्णरावांच्या शिष्यवर्गापैंकी काही शिष्य होत. ==सन्मान व पुरस्कार== * करवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांचे हस्ते 'संगीतकलानिधि' ही पदवी प्रदान * देवासच्या महाराजांनी 'राजगंधर्व' पदवी प्रदान करून गौरवले. * [[पद्मभूषण पुरस्कार]], भारत सरकार * संगीत नाटक अकादमी फेलोशिप * [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]] सुवर्ण पदक * विष्णूदास भावे सुवर्ण पदक * पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मास्टर कृष्णराव यांचे स्मरणार्थ पुतळा उभारण्यात आला आहे. * [[जालना]] येथे एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. * पुणे भारत गायन समाजातर्फे दरवर्षी मास्टर कृष्णराव यांचा जन्मदिन व पुण्यतिथी साजरी केली जाते. * [[महाराष्ट्र साहित्य परिषद|मसाप]] तर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास/ग्रंथकारास 'संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार' देण्यात येतो. * [[महाराष्ट्र साहित्य परिषद]]ेच्या वतीने 'मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ग्रंथकार पुरस्कार २०१६' हा विशेष जाहीर केलेला पुरस्कार सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यावरील ’स्वरसंगत सरदार’ या ग्रंथास देण्यात आला. == बाह्य दुवे == * {{Webarchivis | url=http://archive.is/20130109061816/ulhaskashalkar.tripod.com/krishnar.htm | archive-is=20130109061816/ulhaskashalkar.tripod.com/krishnar.htm | text={{लेखनाव}} (इंग्रजी मजकूर)}} * [http://www.indianetzone.com/30/master_krishnarao_ganesh_phulambrikar_indian_theatre_personality.htm इंडिया नेट झोन संस्थळ](इंग्रजी मजकूर) * [http://courses.nus.edu.sg/course/ellpatke/Miscellany/krishnarao.htm ७८ आर पी एम ध्वनिमुद्रिकांची यादी] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110816163641/http://courses.nus.edu.sg/course/ellpatke/Miscellany/krishnarao.htm |date=2011-08-16 }} {{हिंदुस्तानी संगीत}} {{संगीतातील अपूर्ण लेख}} {{DEFAULTSORT:फुलंब्रीकर, कृष्णराव}} [[वर्ग:मराठी गायक]] [[वर्ग:हिंदुस्तानी गायक]] [[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक]] [[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]] [[वर्ग:इ.स. १८९८ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९७४ मधील मृत्यू]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 55dnkzgrpzq5v55llrif41o1z66gjec 2581367 2581364 2025-06-20T17:44:18Z 219.91.170.196 2581367 wikitext text/x-wiki {{विस्तार}} {{माहितीचौकट गायक | नाव = '''{{लेखनाव}}''' | चित्र = | चित्रशीर्षक = | उपाख्य = | टोपणनावे = मास्तर कृष्णराव / मास्तर कृष्णा / कृष्णा मास्तर / मास्तर | जन्म_दिनांक = [[जानेवारी २०]], [[इ.स. १८९८|१८९८]] | जन्म_स्थान = [[आळंदी]], [[पुणे]], [[भारत]] | मृत्यू_दिनांक = [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४|१९७४]] | मृत्यू_स्थान = [[पुणे]], [[भारत]] | मृत्यू_कारण = वृद्धापकाळ | धर्म = हिंदू | वांशिकत्व = | नागरिकत्व =[[भारत|भारतीय]] | मूळ_गाव = [[फुलंब्री]], [[औरंगाबाद]] [[महाराष्ट्र]] | देश = {{ध्वज|भारत}} | भाषा = [[मराठी]] | आई = मथुरा | वडील = गणेशपंत | जोडीदार = राधाबाई | अपत्ये = तीन | नातेवाईक = | शिक्षण = | प्रशिक्षण संस्था = | गुरू = पं. [[भास्करबुवा बखले]] | संगीत प्रकार = [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत]] | घराणे = आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर-अत्रौली | कार्य = शास्त्रीय गायक, संगीत नाटक गायक नट, चित्रपट नट, संगीतकार, बंदीशकार | पेशा = गायक | कार्य संस्था = पुणे भारत गायन समाज | विशेष कार्य = पुणे भारत गायन समाजाचे अध्यक्ष व सात भागांचे सरकारमान्य रागसंग्रहमाला लेखन, सुलभ संगीत व्याकरण पद्धतीचे निर्माते, स्वतंत्र संगीतरचना, अनवट राग, जोड राग व बंदीशींचे निर्माणकर्ते. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होण्याकरिता प्रखर सांगीतिक लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीनुसार बुद्धवंदना भारतात सर्वप्रथम संगीतबद्ध केली. | कार्यकाळ = सन १९११ ते १९७४ | विशेष उपाधी = संगीतकलानिधि | गौरव = संगीत नाटक अकादमी रत्न सदस्यत्व, विष्णूदास भावे सुवर्णपदक, बालगंधर्व सुवर्णपदक | पुरस्कार = पद्मभूषण | संकीर्ण = | तळटिप = | स्वाक्षरी = | संकेतस्थळ = www.masterkrishnarao.com }} '''कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर''' ऊर्फ ''मास्टर कृष्णराव ('मास्तर कृष्णराव' हे नाव अधिक प्रचलित)'' ([[जानेवारी २०]], [[इ.स. १८९८|१८९८]] - [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४|१९७४]]) हे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील]] गायक व [[मराठी भाषा|मराठी]] संगीतनाटकांमधील संगीतकार आणि गायक-अभिनेते होते. [[भास्करबुवा बखले|गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे]] ते पट्टशिष्य होते. ==पूर्वायुष्य== मास्तर कृष्णरावांचा जन्म [[पुणे]] जिल्ह्यात देवाची [[आळंदी]] येथे आजोळी झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ यजुर्वेदी ब्राम्हण होते व कृष्णरावांचे वडील गणेशपंत हे वेदपठण करणारे ज्ञानी पंडित होते. त्यांच्या अकाली निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत लहानग्या कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक या नाटक मंडळीत बाल गायकनटाचे काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' या नाट्यकला प्रवर्तक संगीत मंडळीच्या नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्व आणि ग्वाल्हेर घराण्याचे उस्ताद निसार हुसेन खाँ यांचे मार्गदर्शन लाभले. नाटकाच्या फिरत्या दौऱ्याने सवाई गंधर्वांना मास्टर कृष्णरावांना योग्य प्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडे देता येत नव्हते. संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून व गायन ऐकून भास्करबुवा फार खूष होते. [[इ.स. १९११]] मध्ये मास्तर कृष्णरावांनी पंडित [[भास्करबुवा बखले]] यांचे शिष्यत्व स्वीकारले स्वतः सवाई गंधर्वांनी मास्तरांना बुवांकडे सोपवले होते. ==सांगीतिक कारकीर्द== वयाच्या दहाव्या वर्षी मास्तर कृष्णरावांनी बाल गायकनट म्हणून नाट्यकला प्रवर्तक संगीत नाटक मंडळीत प्रवेश केला. तिथे त्यांनी संगीत सखुबाई नाटकात विठोबाची भूमिका केली. त्या नाटक मंडळीत त्यांना नाट्यपदांसाठी सवाई गंधर्व आणि उस्ताद निसार हुसेन खाँ यांचे संगीत मार्गदर्शन लाभले.त्यांची विठोबाची भूमिका वाखाणली गेली आणि त्या भूमिकेतील 'भक्तजन हो सदा म्हणती दयासिंधु मला'हे भूप रागातील पद प्रचंड गाजले. गुरुवर्य बखलेबुवांच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी १९१६ साली गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्वांबरोबर]] मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी '[[संगीत शारदा]]', '[[संगीत सौभद्र]]', '[[एकच प्याला]]' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत पुरुष (गायक नट) भूमिका आणि स्त्री (गायक नट) भूमिकाही केल्या. १९२२ साली झालेल्या गुरुवर्य बखलेबुवांच्या निधनानंतर गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'आशा-निराशा', 'नंदकुमार', 'विधीलिखित','अमृतसिद्धी', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]]ही त्यांना गुरुवर्य भास्करबुवा बखले यांच्या निर्वाणानंतर गुरुस्थानी मानायचे. नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा', 'कोणे एके काळी' यांमधील शास्त्रीय संगीतावर आधारित भावगीताच्या वळणाने जाणारी गाणी त्यांतील भाव, गेयता व सुमधुरतेसाठी वाखाणली गेली. मास्तर कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'वहॉं', 'गोपालकृष्ण', 'माणूस', 'अमरज्योती', 'शेजारी','लाखारानी' यांसारख्या प्रभात फिल्म कंपनीच्या चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या चित्रपटांतील व इतर संस्थांतर्फे निर्माण केलेल्या चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या 'वसंतसेना' चित्रपटाचा समावेश आहे तसेच माणिक चित्रसंस्थेच्या 'कीचकवध' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तिचा मळा' व 'मेरी अमानत'या चित्रपटांत भूमिकाही केल्या. त्यांनी भक्तिचा मळा या राजकमलने निर्माण केलेल्या चित्रपटात संत सावता माळी ही प्रमुख भूमिका साकारली, त्या चित्रपटास संगीत दिले व संत सावता महाराजांच्या प्रमुख भूमिकेत अभिनय करते वेळी गायन देखील केले. या चित्रपटाची 'माली' ही हिंदी आवृत्तीदेखील राजकमलने निर्माण करून भारतभर प्रदर्शित केली. यात देखील कृष्णरावांनी संत सावता माळी ही प्रमुख भूमिका साकारली तसेच चित्रपटास संगीत दिले आणि प्रमुख भूमिकेतून गीतांचे गायनदेखील केले. मास्टर कृष्णरावांनी मेरी अमानत या हिंदी चित्रपटात शाळा मास्तरची भूमिका केली व गायन केले. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्तर कृष्णरावांनी [[इ.स. १९२२]] ते [[इ.स. १९५२]] दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच [[ठुमरी]], नाट्यगीत, [[भजन]] व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी संगीत दिलेले 'झिंझोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर पी एम ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली. अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील गायन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे [[इ.स. १९४०]] ते [[इ.स. १९७१]] या काळात लिहिलेले 'रागसंग्रहमाला' नामक सात खंड त्यात समाविष्ट आहेत. या रागसंग्रहमालेस भारत सरकारची मान्यता लाभलेली आहे. 'वंदे मातरम्' हे गीत बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरम् गीताला विविध चाली लावून, त्यातल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंची भेट घेतली व घटना समितीच्या सर्व सदस्यांसमोर संसदेत प्रात्यक्षिके सादर करून त्यांना पटवून देण्याचा प्रयत्‍न केला. पं.नेहरूंनी आधीच '''जन गण मन'' ' हे राष्ट्रगीत म्हणून निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु 'वंदे मातरम्'ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे निदान राष्ट्रीय गीत (National Song) म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला.या घटनेनंतर मास्तर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम् गीताची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक संस्था,जाहीर सभा-संमेलने वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याच्या दोन ध्वनिमुद्रिका काढल्या. बुद्धवंदनेतील मंत्र समजावेत याकरिता मास्तर कृष्णरावांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये जाऊन प्राचार्यांकडून पाली भाषा शिकून घेतली व पाली भाषेतील मंत्रांचा अभ्यास केला. ह्या ध्वनिमुद्रिका १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरमधील दीक्षा भूमीवर साजऱ्या झालेल्या धर्मांतरण सोहळ्यात वाजवल्या गेल्या. ऑल इंडिया रेडिओच्या सल्लागार समितीचे सदस्य व पुणे आकाशवाणी केंद्रावरील प्रमुख संगीतरचनाकार म्हणून देखील मास्तरांनी भरीव कामगिरी केली. पुणे येथे [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४]] रोजी ललिता पंचमीच्या दिवशी रामप्रहरी त्यांचे स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. वीणा चिटको या त्यांच्या कन्येने काही काळ संगीतकार म्हणून कारकीर्द गाजवली. त्या मराठी भावगीत विश्वातील पहिल्या स्त्री संगीतकार म्हणून ओळखल्या जातात. मधुसूदन कानेटकर, सरस्वती राणे, हरिभाऊ देशपांडे, ए.पी. नारायणगांवकर, बापूराव अष्टेकर, दत्तोपंत भोपे, पित्रे बुवा, डॉ. पाबळकर, जयमाला शिलेदार, मोहन कर्वे, माणिकराव ठाकूरदास, सुरेश हळदणकर, आर.एन. करकरे, शिवराम गाडगीळ, बळवंत दीक्षित, धोंडूशास्त्री कस्तापूरकर उर्फ 'दुर्गा', राम मराठे, योगिनी जोगळेकर, अंजनीबाई कळगुटकर,जयश्री शांताराम, वसंत तुळजापूरकर, शोभना वाकणकर, रामभाऊ भावे, दैठणकर, बोरगावकर, सुहास दातार, सुधाकर जोशी, रवींद्र जोशी, वीणा चिटको हे मास्तर कृष्णरावांच्या शिष्यवर्गापैंकी काही शिष्य होत. ==सन्मान व पुरस्कार== * करवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांचे हस्ते 'संगीतकलानिधि' ही पदवी प्रदान * देवासच्या महाराजांनी 'राजगंधर्व' पदवी प्रदान करून गौरवले. * [[पद्मभूषण पुरस्कार]], भारत सरकार * संगीत नाटक अकादमी फेलोशिप * [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]] सुवर्ण पदक * विष्णूदास भावे सुवर्ण पदक * पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मास्टर कृष्णराव यांचे स्मरणार्थ पुतळा उभारण्यात आला आहे. * [[जालना]] येथे एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. * पुणे भारत गायन समाजातर्फे दरवर्षी मास्टर कृष्णराव यांचा जन्मदिन व पुण्यतिथी साजरी केली जाते. * [[महाराष्ट्र साहित्य परिषद|मसाप]] तर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास/ग्रंथकारास 'संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार' देण्यात येतो. * [[महाराष्ट्र साहित्य परिषद]]ेच्या वतीने 'मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ग्रंथकार पुरस्कार २०१६' हा विशेष जाहीर केलेला पुरस्कार सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यावरील ’स्वरसंगत सरदार’ या ग्रंथास देण्यात आला. == बाह्य दुवे == * {{Webarchivis | url=http://archive.is/20130109061816/ulhaskashalkar.tripod.com/krishnar.htm | archive-is=20130109061816/ulhaskashalkar.tripod.com/krishnar.htm | text={{लेखनाव}} (इंग्रजी मजकूर)}} * [http://www.indianetzone.com/30/master_krishnarao_ganesh_phulambrikar_indian_theatre_personality.htm इंडिया नेट झोन संस्थळ](इंग्रजी मजकूर) * [http://courses.nus.edu.sg/course/ellpatke/Miscellany/krishnarao.htm ७८ आर पी एम ध्वनिमुद्रिकांची यादी] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110816163641/http://courses.nus.edu.sg/course/ellpatke/Miscellany/krishnarao.htm |date=2011-08-16 }} {{हिंदुस्तानी संगीत}} {{संगीतातील अपूर्ण लेख}} {{DEFAULTSORT:फुलंब्रीकर, कृष्णराव}} [[वर्ग:मराठी गायक]] [[वर्ग:हिंदुस्तानी गायक]] [[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक]] [[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]] [[वर्ग:इ.स. १८९८ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९७४ मधील मृत्यू]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] p0xnm7ex7nennsgfru3ictoiklzyxko 2581368 2581367 2025-06-20T17:48:13Z 219.91.170.196 2581368 wikitext text/x-wiki {{विस्तार}} {{माहितीचौकट गायक | नाव = '''{{लेखनाव}}''' | चित्र = | चित्रशीर्षक = | उपाख्य = | टोपणनावे = मास्तर कृष्णराव / मास्तर कृष्णा / कृष्णा मास्तर / मास्तर | जन्म_दिनांक = [[जानेवारी २०]], [[इ.स. १८९८|१८९८]] | जन्म_स्थान = [[आळंदी]], [[पुणे]], [[भारत]] | मृत्यू_दिनांक = [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४|१९७४]] | मृत्यू_स्थान = [[पुणे]], [[भारत]] | मृत्यू_कारण = वृद्धापकाळ | धर्म = हिंदू | वांशिकत्व = | नागरिकत्व =[[भारत|भारतीय]] | मूळ_गाव = [[फुलंब्री]], [[औरंगाबाद]] [[महाराष्ट्र]] | देश = {{ध्वज|भारत}} | भाषा = [[मराठी]] | आई = मथुरा | वडील = गणेशपंत | जोडीदार = राधाबाई | अपत्ये = तीन | नातेवाईक = | शिक्षण = | प्रशिक्षण संस्था = | गुरू = पं. [[भास्करबुवा बखले]] | संगीत प्रकार = [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत]] | घराणे = आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर-अत्रौली | कार्य = शास्त्रीय गायक, संगीत नाटक गायक नट, चित्रपट नट, संगीतकार, बंदीशकार | पेशा = गायक | कार्य संस्था = पुणे भारत गायन समाज | विशेष कार्य = पुणे भारत गायन समाजाचे अध्यक्ष व सात भागांचे सरकारमान्य रागसंग्रहमाला लेखन, सुलभ संगीत व्याकरण पद्धतीचे निर्माते, स्वतंत्र संगीतरचना, अनवट राग, जोड राग व बंदीशींचे निर्माणकर्ते. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होण्याकरिता प्रखर सांगीतिक लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीनुसार बुद्धवंदना भारतात सर्वप्रथम संगीतबद्ध केली. | कार्यकाळ = सन १९११ ते १९७४ | विशेष उपाधी = संगीतकलानिधि | गौरव = संगीत नाटक अकादमी रत्न सदस्यत्व, विष्णूदास भावे सुवर्णपदक, बालगंधर्व सुवर्णपदक | पुरस्कार = पद्मभूषण | संकीर्ण = | तळटिप = | स्वाक्षरी = | संकेतस्थळ = www.masterkrishnarao.com }} '''कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर''' ऊर्फ ''मास्टर कृष्णराव ('मास्तर कृष्णराव' हे नाव अधिक प्रचलित)'' ([[जानेवारी २०]], [[इ.स. १८९८|१८९८]] - [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४|१९७४]]) हे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील]] गायक व [[मराठी भाषा|मराठी]] संगीतनाटकांमधील संगीतकार आणि गायक-अभिनेते होते. [[भास्करबुवा बखले|गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे]] ते पट्टशिष्य होते. ==पूर्वायुष्य== मास्तर कृष्णरावांचा जन्म [[पुणे]] जिल्ह्यात देवाची [[आळंदी]] येथे आजोळी झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ यजुर्वेदी ब्राम्हण होते व कृष्णरावांचे वडील गणेशपंत हे वेदपठण करणारे ज्ञानी पंडित होते. त्यांच्या अकाली निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत लहानग्या कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक या नाटक मंडळीत बाल गायकनटाचे काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' या नाट्यकला प्रवर्तक संगीत मंडळीच्या नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्व आणि ग्वाल्हेर घराण्याचे उस्ताद निसार हुसेन खाँ यांचे मार्गदर्शन लाभले. नाटकाच्या फिरत्या दौऱ्याने सवाई गंधर्वांना मास्टर कृष्णरावांना योग्य प्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडे देता येत नव्हते. संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून व गायन ऐकून भास्करबुवा फार खूष होते. [[इ.स. १९११]] मध्ये मास्तर कृष्णरावांनी पंडित [[भास्करबुवा बखले]] यांचे शिष्यत्व स्वीकारले स्वतः सवाई गंधर्वांनी मास्तरांना बुवांकडे सोपवले होते. ==सांगीतिक कारकीर्द== वयाच्या दहाव्या वर्षी मास्तर कृष्णरावांनी बाल गायकनट म्हणून नाट्यकला प्रवर्तक संगीत नाटक मंडळीत प्रवेश केला. तिथे त्यांनी संगीत सखुबाई नाटकात विठोबाची भूमिका केली. त्यांची विठोबाची भूमिका वाखाणली गेली आणि त्या भूमिकेतील 'भक्तजन हो सदा म्हणती दयासिंधु मला'हे भूप रागातील पद प्रचंड गाजले. गुरुवर्य बखलेबुवांच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी १९१६ साली गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्वांबरोबर]] मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी '[[संगीत शारदा]]', '[[संगीत सौभद्र]]', '[[एकच प्याला]]' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत पुरुष (गायक नट) भूमिका आणि स्त्री (गायक नट) भूमिकाही केल्या. १९२२ साली झालेल्या गुरुवर्य बखलेबुवांच्या निधनानंतर गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'आशा-निराशा', 'नंदकुमार', 'विधीलिखित','अमृतसिद्धी', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]]ही त्यांना गुरुवर्य भास्करबुवा बखले यांच्या निर्वाणानंतर गुरुस्थानी मानायचे. नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा', 'कोणे एके काळी' यांमधील शास्त्रीय संगीतावर आधारित भावगीताच्या वळणाने जाणारी गाणी त्यांतील भाव, गेयता व सुमधुरतेसाठी वाखाणली गेली. मास्तर कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'वहॉं', 'गोपालकृष्ण', 'माणूस', 'अमरज्योती', 'शेजारी','लाखारानी' यांसारख्या प्रभात फिल्म कंपनीच्या चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या चित्रपटांतील व इतर संस्थांतर्फे निर्माण केलेल्या चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या 'वसंतसेना' चित्रपटाचा समावेश आहे तसेच माणिक चित्रसंस्थेच्या 'कीचकवध' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तिचा मळा' व 'मेरी अमानत'या चित्रपटांत भूमिकाही केल्या. त्यांनी भक्तिचा मळा या राजकमलने निर्माण केलेल्या चित्रपटात संत सावता माळी ही प्रमुख भूमिका साकारली, त्या चित्रपटास संगीत दिले व संत सावता महाराजांच्या प्रमुख भूमिकेत अभिनय करते वेळी गायन देखील केले. या चित्रपटाची 'माली' ही हिंदी आवृत्तीदेखील राजकमलने निर्माण करून भारतभर प्रदर्शित केली. यात देखील कृष्णरावांनी संत सावता माळी ही प्रमुख भूमिका साकारली तसेच चित्रपटास संगीत दिले आणि प्रमुख भूमिकेतून गीतांचे गायनदेखील केले. मास्टर कृष्णरावांनी मेरी अमानत या हिंदी चित्रपटात शाळा मास्तरची भूमिका केली व गायन केले. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्तर कृष्णरावांनी [[इ.स. १९२२]] ते [[इ.स. १९५२]] दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच [[ठुमरी]], नाट्यगीत, [[भजन]] व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी संगीत दिलेले 'झिंझोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर पी एम ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली. अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील गायन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे [[इ.स. १९४०]] ते [[इ.स. १९७१]] या काळात लिहिलेले 'रागसंग्रहमाला' नामक सात खंड त्यात समाविष्ट आहेत. या रागसंग्रहमालेस भारत सरकारची मान्यता लाभलेली आहे. 'वंदे मातरम्' हे गीत बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरम् गीताला विविध चाली लावून, त्यातल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंची भेट घेतली व घटना समितीच्या सर्व सदस्यांसमोर संसदेत प्रात्यक्षिके सादर करून त्यांना पटवून देण्याचा प्रयत्‍न केला. पं.नेहरूंनी आधीच '''जन गण मन'' ' हे राष्ट्रगीत म्हणून निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु 'वंदे मातरम्'ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे निदान राष्ट्रीय गीत (National Song) म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला.या घटनेनंतर मास्तर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम् गीताची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक संस्था,जाहीर सभा-संमेलने वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याच्या दोन ध्वनिमुद्रिका काढल्या. बुद्धवंदनेतील मंत्र समजावेत याकरिता मास्तर कृष्णरावांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये जाऊन प्राचार्यांकडून पाली भाषा शिकून घेतली व पाली भाषेतील मंत्रांचा अभ्यास केला. ह्या ध्वनिमुद्रिका १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरमधील दीक्षा भूमीवर साजऱ्या झालेल्या धर्मांतरण सोहळ्यात वाजवल्या गेल्या. ऑल इंडिया रेडिओच्या सल्लागार समितीचे सदस्य व पुणे आकाशवाणी केंद्रावरील प्रमुख संगीतरचनाकार म्हणून देखील मास्तरांनी भरीव कामगिरी केली. पुणे येथे [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४]] रोजी ललिता पंचमीच्या दिवशी रामप्रहरी त्यांचे स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. वीणा चिटको या त्यांच्या कन्येने काही काळ संगीतकार म्हणून कारकीर्द गाजवली. त्या मराठी भावगीत विश्वातील पहिल्या स्त्री संगीतकार म्हणून ओळखल्या जातात. मधुसूदन कानेटकर, सरस्वती राणे, हरिभाऊ देशपांडे, ए.पी. नारायणगांवकर, बापूराव अष्टेकर, दत्तोपंत भोपे, पित्रे बुवा, डॉ. पाबळकर, जयमाला शिलेदार, मोहन कर्वे, माणिकराव ठाकूरदास, सुरेश हळदणकर, आर.एन. करकरे, शिवराम गाडगीळ, बळवंत दीक्षित, धोंडूशास्त्री कस्तापूरकर उर्फ 'दुर्गा', राम मराठे, योगिनी जोगळेकर, अंजनीबाई कळगुटकर,जयश्री शांताराम, वसंत तुळजापूरकर, शोभना वाकणकर, रामभाऊ भावे, दैठणकर, बोरगावकर, सुहास दातार, सुधाकर जोशी, रवींद्र जोशी, वीणा चिटको हे मास्तर कृष्णरावांच्या शिष्यवर्गापैंकी काही शिष्य होत. ==सन्मान व पुरस्कार== * करवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांचे हस्ते 'संगीतकलानिधि' ही पदवी प्रदान * देवासच्या महाराजांनी 'राजगंधर्व' पदवी प्रदान करून गौरवले. * [[पद्मभूषण पुरस्कार]], भारत सरकार * संगीत नाटक अकादमी फेलोशिप * [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]] सुवर्ण पदक * विष्णूदास भावे सुवर्ण पदक * पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मास्टर कृष्णराव यांचे स्मरणार्थ पुतळा उभारण्यात आला आहे. * [[जालना]] येथे एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. * पुणे भारत गायन समाजातर्फे दरवर्षी मास्टर कृष्णराव यांचा जन्मदिन व पुण्यतिथी साजरी केली जाते. * [[महाराष्ट्र साहित्य परिषद|मसाप]] तर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास/ग्रंथकारास 'संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार' देण्यात येतो. * [[महाराष्ट्र साहित्य परिषद]]ेच्या वतीने 'मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ग्रंथकार पुरस्कार २०१६' हा विशेष जाहीर केलेला पुरस्कार सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यावरील ’स्वरसंगत सरदार’ या ग्रंथास देण्यात आला. == बाह्य दुवे == * {{Webarchivis | url=http://archive.is/20130109061816/ulhaskashalkar.tripod.com/krishnar.htm | archive-is=20130109061816/ulhaskashalkar.tripod.com/krishnar.htm | text={{लेखनाव}} (इंग्रजी मजकूर)}} * [http://www.indianetzone.com/30/master_krishnarao_ganesh_phulambrikar_indian_theatre_personality.htm इंडिया नेट झोन संस्थळ](इंग्रजी मजकूर) * [http://courses.nus.edu.sg/course/ellpatke/Miscellany/krishnarao.htm ७८ आर पी एम ध्वनिमुद्रिकांची यादी] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110816163641/http://courses.nus.edu.sg/course/ellpatke/Miscellany/krishnarao.htm |date=2011-08-16 }} {{हिंदुस्तानी संगीत}} {{संगीतातील अपूर्ण लेख}} {{DEFAULTSORT:फुलंब्रीकर, कृष्णराव}} [[वर्ग:मराठी गायक]] [[वर्ग:हिंदुस्तानी गायक]] [[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक]] [[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]] [[वर्ग:इ.स. १८९८ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९७४ मधील मृत्यू]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] tjavjocpgmjh4bwes53wt24r6lbhdag 2581369 2581368 2025-06-20T17:52:26Z 219.91.170.196 2581369 wikitext text/x-wiki {{विस्तार}} {{माहितीचौकट गायक | नाव = '''{{लेखनाव}}''' | चित्र = | चित्रशीर्षक = | उपाख्य = | टोपणनावे = मास्तर कृष्णराव / मास्तर कृष्णा / कृष्णा मास्तर / मास्तर | जन्म_दिनांक = [[जानेवारी २०]], [[इ.स. १८९८|१८९८]] | जन्म_स्थान = [[आळंदी]], [[पुणे]], [[भारत]] | मृत्यू_दिनांक = [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४|१९७४]] | मृत्यू_स्थान = [[पुणे]], [[भारत]] | मृत्यू_कारण = वृद्धापकाळ | धर्म = हिंदू | वांशिकत्व = | नागरिकत्व =[[भारत|भारतीय]] | मूळ_गाव = [[फुलंब्री]], [[छत्रपती संभाजीनगर मराठवाडा]] [[महाराष्ट्र]] | देश = {{ध्वज|भारत}} | भाषा = [[मराठी]] | आई = मथुरा | वडील = गणेशपंत | जोडीदार = राधाबाई | अपत्ये = तीन | नातेवाईक = | शिक्षण = | प्रशिक्षण संस्था = भारत गायन समाज | गुरू = पं. [[भास्करबुवा बखले]] | संगीत प्रकार = [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत]] | घराणे = आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर-अत्रौली | कार्य = शास्त्रीय गायक, संगीत नाटक गायक नट, चित्रपट नट, संगीतकार, बंदीशकार | पेशा = गायक | कार्य संस्था = पुणे भारत गायन समाज | विशेष कार्य = पुणे भारत गायन समाजाचे अध्यक्ष व सात भागांचे सरकारमान्य रागसंग्रहमाला लेखन, सुलभ संगीत व्याकरण पद्धतीचे निर्माते, स्वतंत्र संगीतरचना, अनवट राग, जोड राग व बंदीशींचे निर्माणकर्ते. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होण्याकरिता प्रखर सांगीतिक लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीनुसार बुद्धवंदना भारतात सर्वप्रथम संगीतबद्ध केली. | कार्यकाळ = सन १९११ ते १९७४ | विशेष उपाधी = संगीतकलानिधि | गौरव = संगीत नाटक अकादमी रत्न सदस्यत्व, विष्णूदास भावे सुवर्णपदक, बालगंधर्व सुवर्णपदक | पुरस्कार = पद्मभूषण | संकीर्ण = | तळटिप = | स्वाक्षरी = | संकेतस्थळ = www.masterkrishnarao.com }} '''कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर''' ऊर्फ ''मास्टर कृष्णराव ('मास्तर कृष्णराव' हे नाव अधिक प्रचलित)'' ([[जानेवारी २०]], [[इ.स. १८९८|१८९८]] - [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४|१९७४]]) हे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील]] गायक व [[मराठी भाषा|मराठी]] संगीतनाटकांमधील संगीतकार आणि गायक-अभिनेते होते. [[भास्करबुवा बखले|गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे]] ते पट्टशिष्य होते. ==पूर्वायुष्य== मास्तर कृष्णरावांचा जन्म [[पुणे]] जिल्ह्यात देवाची [[आळंदी]] येथे आजोळी झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ यजुर्वेदी ब्राम्हण होते व कृष्णरावांचे वडील गणेशपंत हे वेदपठण करणारे ज्ञानी पंडित होते. त्यांच्या अकाली निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत लहानग्या कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक या नाटक मंडळीत बाल गायकनटाचे काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' या नाट्यकला प्रवर्तक संगीत मंडळीच्या नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्व आणि ग्वाल्हेर घराण्याचे उस्ताद निसार हुसेन खाँ यांचे मार्गदर्शन लाभले. नाटकाच्या फिरत्या दौऱ्याने सवाई गंधर्वांना मास्टर कृष्णरावांना योग्य प्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडे देता येत नव्हते. संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून व गायन ऐकून भास्करबुवा फार खूष होते. [[इ.स. १९११]] मध्ये मास्तर कृष्णरावांनी पंडित [[भास्करबुवा बखले]] यांचे शिष्यत्व स्वीकारले स्वतः सवाई गंधर्वांनी मास्तरांना बुवांकडे सोपवले होते. ==सांगीतिक कारकीर्द== वयाच्या दहाव्या वर्षी मास्तर कृष्णरावांनी बाल गायकनट म्हणून नाट्यकला प्रवर्तक संगीत नाटक मंडळीत प्रवेश केला. तिथे त्यांनी संगीत सखुबाई नाटकात विठोबाची भूमिका केली. त्यांची विठोबाची भूमिका वाखाणली गेली आणि त्या भूमिकेतील 'भक्तजन हो सदा म्हणती दयासिंधु मला'हे भूप रागातील पद प्रचंड गाजले. गुरुवर्य बखलेबुवांच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी १९१६ साली गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्वांबरोबर]] मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी '[[संगीत शारदा]]', '[[संगीत सौभद्र]]', '[[एकच प्याला]]' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत पुरुष (गायक नट) भूमिका आणि स्त्री (गायक नट) भूमिकाही केल्या. १९२२ साली झालेल्या गुरुवर्य बखलेबुवांच्या निधनानंतर गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'आशा-निराशा', 'नंदकुमार', 'विधीलिखित','अमृतसिद्धी', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]]ही त्यांना गुरुवर्य भास्करबुवा बखले यांच्या निर्वाणानंतर गुरुस्थानी मानायचे. नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा', 'कोणे एके काळी' यांमधील शास्त्रीय संगीतावर आधारित भावगीताच्या वळणाने जाणारी गाणी त्यांतील भाव, गेयता व सुमधुरतेसाठी वाखाणली गेली. मास्तर कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'वहॉं', 'गोपालकृष्ण', 'माणूस', 'अमरज्योती', 'शेजारी','लाखारानी' यांसारख्या प्रभात फिल्म कंपनीच्या चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या चित्रपटांतील व इतर संस्थांतर्फे निर्माण केलेल्या चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या 'वसंतसेना' चित्रपटाचा समावेश आहे तसेच माणिक चित्रसंस्थेच्या 'कीचकवध' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तिचा मळा' व 'मेरी अमानत'या चित्रपटांत भूमिकाही केल्या. त्यांनी भक्तिचा मळा या राजकमलने निर्माण केलेल्या चित्रपटात संत सावता माळी ही प्रमुख भूमिका साकारली, त्या चित्रपटास संगीत दिले व संत सावता महाराजांच्या प्रमुख भूमिकेत अभिनय करते वेळी गायन देखील केले. या चित्रपटाची 'माली' ही हिंदी आवृत्तीदेखील राजकमलने निर्माण करून भारतभर प्रदर्शित केली. यात देखील कृष्णरावांनी संत सावता माळी ही प्रमुख भूमिका साकारली तसेच चित्रपटास संगीत दिले आणि प्रमुख भूमिकेतून गीतांचे गायनदेखील केले. मास्टर कृष्णरावांनी मेरी अमानत या हिंदी चित्रपटात शाळा मास्तरची भूमिका केली व गायन केले. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्तर कृष्णरावांनी [[इ.स. १९२२]] ते [[इ.स. १९५२]] दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच [[ठुमरी]], नाट्यगीत, [[भजन]] व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी संगीत दिलेले 'झिंझोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर पी एम ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली. अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील गायन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे [[इ.स. १९४०]] ते [[इ.स. १९७१]] या काळात लिहिलेले 'रागसंग्रहमाला' नामक सात खंड त्यात समाविष्ट आहेत. या रागसंग्रहमालेस भारत सरकारची मान्यता लाभलेली आहे. 'वंदे मातरम्' हे गीत बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरम् गीताला विविध चाली लावून, त्यातल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंची भेट घेतली व घटना समितीच्या सर्व सदस्यांसमोर संसदेत प्रात्यक्षिके सादर करून त्यांना पटवून देण्याचा प्रयत्‍न केला. पं.नेहरूंनी आधीच '''जन गण मन'' ' हे राष्ट्रगीत म्हणून निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु 'वंदे मातरम्'ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे निदान राष्ट्रीय गीत (National Song) म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला.या घटनेनंतर मास्तर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम् गीताची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक संस्था,जाहीर सभा-संमेलने वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याच्या दोन ध्वनिमुद्रिका काढल्या. बुद्धवंदनेतील मंत्र समजावेत याकरिता मास्तर कृष्णरावांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये जाऊन प्राचार्यांकडून पाली भाषा शिकून घेतली व पाली भाषेतील मंत्रांचा अभ्यास केला. ह्या ध्वनिमुद्रिका १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरमधील दीक्षा भूमीवर साजऱ्या झालेल्या धर्मांतरण सोहळ्यात वाजवल्या गेल्या. ऑल इंडिया रेडिओच्या सल्लागार समितीचे सदस्य व पुणे आकाशवाणी केंद्रावरील प्रमुख संगीतरचनाकार म्हणून देखील मास्तरांनी भरीव कामगिरी केली. पुणे येथे [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४]] रोजी ललिता पंचमीच्या दिवशी रामप्रहरी त्यांचे स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. वीणा चिटको या त्यांच्या कन्येने काही काळ संगीतकार म्हणून कारकीर्द गाजवली. त्या मराठी भावगीत विश्वातील पहिल्या स्त्री संगीतकार म्हणून ओळखल्या जातात. मधुसूदन कानेटकर, सरस्वती राणे, हरिभाऊ देशपांडे, ए.पी. नारायणगांवकर, बापूराव अष्टेकर, दत्तोपंत भोपे, पित्रे बुवा, डॉ. पाबळकर, जयमाला शिलेदार, मोहन कर्वे, माणिकराव ठाकूरदास, सुरेश हळदणकर, आर.एन. करकरे, शिवराम गाडगीळ, बळवंत दीक्षित, धोंडूशास्त्री कस्तापूरकर उर्फ 'दुर्गा', राम मराठे, योगिनी जोगळेकर, अंजनीबाई कळगुटकर,जयश्री शांताराम, वसंत तुळजापूरकर, शोभना वाकणकर, रामभाऊ भावे, दैठणकर, बोरगावकर, सुहास दातार, सुधाकर जोशी, रवींद्र जोशी, वीणा चिटको हे मास्तर कृष्णरावांच्या शिष्यवर्गापैंकी काही शिष्य होत. ==सन्मान व पुरस्कार== * करवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांचे हस्ते 'संगीतकलानिधि' ही पदवी प्रदान * देवासच्या महाराजांनी 'राजगंधर्व' पदवी प्रदान करून गौरवले. * [[पद्मभूषण पुरस्कार]], भारत सरकार * संगीत नाटक अकादमी फेलोशिप * [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]] सुवर्ण पदक * विष्णूदास भावे सुवर्ण पदक * पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मास्टर कृष्णराव यांचे स्मरणार्थ पुतळा उभारण्यात आला आहे. * [[जालना]] येथे एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. * पुणे भारत गायन समाजातर्फे दरवर्षी मास्टर कृष्णराव यांचा जन्मदिन व पुण्यतिथी साजरी केली जाते. * [[महाराष्ट्र साहित्य परिषद|मसाप]] तर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास/ग्रंथकारास 'संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार' देण्यात येतो. * [[महाराष्ट्र साहित्य परिषद]]ेच्या वतीने 'मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ग्रंथकार पुरस्कार २०१६' हा विशेष जाहीर केलेला पुरस्कार सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यावरील ’स्वरसंगत सरदार’ या ग्रंथास देण्यात आला. == बाह्य दुवे == * {{Webarchivis | url=http://archive.is/20130109061816/ulhaskashalkar.tripod.com/krishnar.htm | archive-is=20130109061816/ulhaskashalkar.tripod.com/krishnar.htm | text={{लेखनाव}} (इंग्रजी मजकूर)}} * [http://www.indianetzone.com/30/master_krishnarao_ganesh_phulambrikar_indian_theatre_personality.htm इंडिया नेट झोन संस्थळ](इंग्रजी मजकूर) * [http://courses.nus.edu.sg/course/ellpatke/Miscellany/krishnarao.htm ७८ आर पी एम ध्वनिमुद्रिकांची यादी] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110816163641/http://courses.nus.edu.sg/course/ellpatke/Miscellany/krishnarao.htm |date=2011-08-16 }} {{हिंदुस्तानी संगीत}} {{संगीतातील अपूर्ण लेख}} {{DEFAULTSORT:फुलंब्रीकर, कृष्णराव}} [[वर्ग:मराठी गायक]] [[वर्ग:हिंदुस्तानी गायक]] [[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक]] [[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]] [[वर्ग:इ.स. १८९८ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९७४ मधील मृत्यू]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] bbtfl4ub7ywu1c1fyb8pscfsg703ogr पोईसर नदी 0 76661 2581488 1925992 2025-06-21T05:58:38Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने पुनर्निर्देशन ठेउन लेख [[पोयसर नदी]] वरुन [[पोईसर नदी]] ला हलविला 1925992 wikitext text/x-wiki [[चित्र:River-Geography-Mumbai.png|इवलेसे|नकाशा]] '''पोयसर नदी''' ही [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक नदी आहे. मुंबईतल्या बोरीवली नॅशनल पार्कच्या बोरीवली बाजूच्या टोकाला हिचा उगम आहे. कांदिवली या उपनगरातून वहात वहात ती वरसोवा (वेसावे) खाडीला मिळते. कांदिवलीमधे एका चर्चला पोयसर चर्च म्हणतात. या नदीवर बांधलेला एक पूल कांदिवली आणि बोरीवलीची सरहद्द आहे. पोयसर हा पश्चिम कांदिवली उपनगराचा एक भाग आहे. या भागात पोयसर बस डेपो आणि पोयसर टेलिफोन ए्क्सचेंज आहे. {{मुंबईतील नद्या}} [[वर्ग:भारतातील नद्या]] [[वर्ग:महाराष्ट्रातील नद्या]] hsw1qdxitzvim0b2xffxpuollq54cau अझीझ इमाम 0 87454 2581303 2571711 2025-06-20T13:01:40Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने पुनर्निर्देशन ठेउन लेख [[आझीझ इमाम]] वरुन [[अझीझ इमाम]] ला हलविला 2571711 wikitext text/x-wiki '''आझीझ इमाम''' ( [[फेब्रुवारी २५]],[[इ.स. १९२५]]) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९७१]] आणि [[इ.स. १९८०]]च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[उत्तर प्रदेश]] राज्यातील [[मिर्झापूर (लोकसभा मतदारसंघ)|मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले. [[वर्ग:भारतीय राजकारणी]] [[वर्ग:५ वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:७ वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]] [[वर्ग:मिर्झापूरचे खासदार]] [[वर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:इ.स. १९७० मधील मृत्यू]] 95t4jt1d0m79wzpj3c9vo82ru3jbqnd सदस्य चर्चा:Ketaki Modak 3 118347 2581567 2562307 2025-06-21T10:20:56Z MediaWiki message delivery 38883 /* Feminism and Folklore 2025 - Local prize winners */ नवीन विभाग 2581567 wikitext text/x-wiki {{स्वागत}} == श्री.के. क्षीरसागर == नमस्कार, [[श्री.के. क्षीरसागर]] हा लेख आहे. नवीन '''प्रा. श्री.के. क्षीरसागर''' नावाने लेख बनवण्यापेक्षा आहे त्या लेखात आपणास भर घालता येईल. एक खुलासा- विकिपीडियावर व्यक्तिविषयक लेख पूर्ण नावाने ठेवण्याचा किंवा नवीन तयार करण्याचा संकेत आहे नावच्या आधी संबोधने जोडली जात नाहीत जसे की प्रा., डॉ., संबोधनाच्या नावाने पुनर्निर्देशने देता येतात. -[[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] १५:१३, १६ जानेवारी २०१२ (UTC) नमस्कार आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. योग्य ती कालजी घेईन. :नमस्कार केतकी ! [[किरण नगरकर]] या लेखात विकिकरणाच्या दृष्टीने व संदर्भ देण्याच्या दृष्टीने मी काही किरकोळ सुधारणा केल्या आहेत. [http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0&action=historysubmit&diff=921606&oldid=921166 येथे त्यांतील फरक] थोडक्यात दाखवला आहे. कृपया एकवार तिकडे नजर टाकावी, अशी विनंती. :--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १६:०१, १७ जानेवारी २०१२ (UTC) == कॉपीपेस्ट व प्रताधिकारभंग == नमस्कार केतकी ! लोकसत्तेत प्रकाशित झालेल्या [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=205104:2012-01-13-09-15-34&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117 या बातमीचा/सदराचा मजकूर]] तंतोतंत कॉपी करून [[श्रीधर व्यंकटेश केतकर]] या लेखात एका विभागात पेस्ट केल्याचे आढळल्यामुळे मी [[साचा:कॉपीपेस्ट]] लावला आहे. [[विकिपीडिया:प्रताधिकार]] धोरणांनुसार विकिपीडियावर लिहिली जाणारी माहिती प्रताधिकारमुक्त (कॉपीराइट-फ्री) असावी लागते अथवा संबंधित संस्थांकडून सार्वजनिक वापरासाठी खुली केली गेल्याचा अधिकृत जाहीरनामा लागतो. तसे नसल्यास असा कॉपीपेस्ट मजकूर प्रताधिकारभंगाचा मासला धरला जाऊ शकतो. विकिपीडियावरापण आपल्या स्वतःच्या लेखणीने माहिती लिहिणे अभिप्रेत आहे. तुम्ही एखाद्या वृत्तपत्रात/पुस्तकात/नियतकालिकात जे काही वाचले असेल, ते तुम्ही तुमच्या भाषेत मांडून लिहू शकता. किंबहुना तसेच करणे श्रेयस्कर. तुमच्या उत्साही सहभागाचे कौतुक आहेच; मात्र ही काही पथ्ये जरूर पाळावीत. --[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १६:१३, १७ जानेवारी २०१२ (UTC) :धन्यवाद केतकी. तुम्ही संपादलेल्या मजकुरात श्री.के. क्षीरसागरांची व्यक्तिगत टिप्पणी बरीच शिल्लक होती; त्यामुळे त्यांच्या टिप्पण्यांचा सारांश काढून तो [[श्रीधर व्यंकटेश केतकर]] येथे दोनेक वाक्यांत नोंदला आहे. तसेच त्या दोन ठिकाणी क्षीरसागरांच्या लोकसत्तेतल्या पुनर्प्रकाशित लेखाचे दुवेही दिले आहेत. एखाद्या व्यक्तीबद्दल अन्य विद्वान समीक्षकांनी नोंदलेली मते संक्षेपाने व सारांशाने लिहिण्याच्या संकेतास धरून हे बदल केले आहेत. शिवाय केतकरांच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दलची (शिक्षण वगैरे) माहिती एक नवीन उपविभाग बनवून भरली आहे. या सर्वांत तुम्हांला अजून काही भर घालता आली/संपादन करता आले, तर उत्तमच! :--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) ०३:००, २१ जानेवारी २०१२ (UTC) धन्यवाद संकल्प द्रविड, आपण केलेले संपादन मी बघितले. आणि त्यामुळे मला नेमके विकिपीडिया मध्ये कसे संपादन केले जाते ते कळले. यापुढे मी निश्चितच हे लक्षात ठेवीन. आपण मराठीसाठी हे जे कार्य करीत आहात त्यसाठी शुभेच्छा. ==सुधा मूर्ती== तुम्हाला बहुधा [[सुधा मूर्ती]] या लेखात भर घालायची आहे असे वाटते. इंग्रजी शीर्षकाचे लेख सहसा मराठी लिहित नाहीत. - [[सदस्य_चर्चा:कोल्हापुरी|कोल्हापुरी]] २२:०४, ६ फेब्रुवारी २०१२ (IST) नमस्कार केतकी, आपण मराठी विकिपीडियावर देत असलेले योगदान उत्तम आहे. आपण सुधा मूर्ती याचेवर बनवलेल्या लेखाच्या निमित्याने आपणास काही सूचना देत आहे. आशा आहे कि यामुळे भविष्यात आपणास लेख बनवणे अधिक सोपे पडेल. # मराठी विकिपिडीयावर लेख नाव हे मराठीतच आणि देवनागरी लिपीतच असावे असा संकेत आहे. # त्यामुळे रोमन लेख नावे देण्याचे टाळावे. # लेख लिहिण्या पूर्वी शोध यंत्रात जर संबंधित माहिती देऊन तपासले तर तशा आशयाचा लेख अगोदरच उपलब्द्ध आहेका ते दिसते. ह्या मुळे एकाच तर्हेचे दोन लेख तयार होण्याच्या धोक्या पासून वाचता येते. आपल्या पुढील संपादन कार्यास अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद [[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ०९:५१, ७ फेब्रुवारी २०१२ (IST) == "मराठी विकिस्रोत" चे उद्घाटन== सप्रेम नमस्कार. "मराठी भाषा दिवस" निमित्ताने दिनांक २५ फेब्रुवारी २०१२ रोजी पत्रकारिता विभाग - रानडे इंस्टीट्यूट, पत्रकार संघ आणि विकिमीडिया पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते श्री. अमोल पालेकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमात विकिपीडियाच्या माहिती बरोबर "[http://mr.wikisource.org मराठी विकिस्रोत]" चे उद्घाटन श्री. अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे. वेळ: दुपारी २:०० ते ५:३० (कृपया वेळेपूर्वी १० मिनिटे आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे) ठिकाण: पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे या शिवाय आपण मराठी विकिस्रोतचे सदस्य बनून मराठी विकिस्रोतला हातभार लावायला सुरुवात करू या. नमस्कार {{{1|{{PAGENAME}}}}}, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण [[विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन]] का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा]] आणि [[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी]] लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा. == वर्गीकरण व विकिकरण == एखाद्या लेखात वरील साचे लावल्यावर कोणास त्रास देण्याचा विचार किंवा कोणाची त्रुटी दाखविण्याचा विचार त्यामागे नसतो हे कृपया ध्यानात घ्यावे.विकिवर अनेक लेख लिहिण्यात येतात. त्या लेखांचे योग्य नियोजन व्हावे व ते योग्य वर्गात असावेत म्हणजे माहिती घेणार्‍यास ते सोपे होते. विकिच्या प्रथेप्रमाणे त्या लेखात योग्य दुवे असावेत. नंतर वेळ मिळेल तेंव्हा हे अपूर्ण काम करण्यास सोपे व्हावे म्हणुन हा उपद्व्याप करावा लागतो. आपण काढलेले संपादन मी उलवटले आहे यात गैरसमज नसावा ही विनंती.आपणास विकिवर पुढील लेखनास शुभेच्छा. [[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]]&nbsp;([[User talk:V.narsikar|चर्चा]]&nbsp;•&nbsp;[[Special:योगदान/V.narsikar|योगदान]]) ०९:२२, १४ जून २०१३ (IST) आता या लेखात मी केलेले बदल कृपया बघावेत. [[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]]&nbsp;([[User talk:V.narsikar|चर्चा]]&nbsp;•&nbsp;[[Special:योगदान/V.narsikar|योगदान]]) ०९:४९, १४ जून २०१३ (IST) ==नीरजा== कृपया नीरजा यांचे संपूर्ण नाव [[नीरजा]] या लेखात लिहावे ही विनंती.त्यायोगे त्यांची ओळख प्रदर्शित होईल. त्या लेखातील सध्याचे मजकूराने विशेष अर्थबोध होत नाही. धन्यवाद. तसेच आपण नुकतेच चढविलेले <nowiki>[[चित्र:Niraja.jpg ]]</nowiki>हे चित्र प्रताधिकारमुक्त आहे किंवा कसे याचा कृपया खुलासा त्या संचिकेच्या पानात करावा ही पण विनंती. [[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]]&nbsp;([[User talk:V.narsikar|चर्चा]]&nbsp;•&nbsp;[[Special:योगदान/V.narsikar|योगदान]]) १३:३२, २३ जून २०१३ (IST) == कमल देसाई == कृपया [[कमल देसाई]] हा लेख बघावा. त्यात मी किरकोळ बदल केलेले आहेत. त्यात संदर्भ टाकला आहे. तो कसा टाकला हे आपणास 'संपादन' वर टिचकी मारली असता कळेल. धन्यवाद. तसेच आपणास पुढील लेखनास शुभेच्छा. [[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]]&nbsp;([[User talk:V.narsikar|चर्चा]]&nbsp;•&nbsp;[[Special:योगदान/V.narsikar|योगदान]]) १४:२९, २३ जून २०१३ (IST) == विनंती == नमस्कार, मराठी विकिपीडियावर सध्या [[क्रियापद]] नावाचा लेख आहे सोबतच सदस्य:J [[मराठी भाषेतील धातू]] वरही काम करत आहेत.[[मराठी भाषेतील धातू]] मध्ये काही माहिती लेखन उपलब्ध होऊ शकल्यास तसेच यादीत सवडी नुसार अधून मधून बघावी अशी नम्र विनंती आहे. :[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ०८:४२, २७ जून २०१३ (IST) == धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन == {{विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली संदेश/यादी ५ साठी १ला संदेश}} :<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small> <!-- Message sent by User:Mahitgar@mrwiki using the list at http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A5%AB&oldid=1333364 --> == संचिका परवाने अद्ययावत करावेत == {{परवाना अद्ययावत करा}} :<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small> <!-- Message sent by User:Mahitgar@mrwiki using the list at http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A5%AB&oldid=1333364 --> == संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण == कृपया पहा आणि वापरा [[विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे]] अधिक माहितीसाठी पहा [[साचा:परवाना अद्ययावत करा|परवाना अद्ययावत करा]] हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार. :<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small> <!-- Message sent by User:Mahitgar@mrwiki using the list at https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A5%AB&oldid=1333364 --> == विकी लव्हज् वुमन २०२१ == [[File:Wiki Loves Women South Asia-mr.png|right|frameless]] प्रिय विकिसदस्य, '''[[विकिपीडिया:विकी लव्ह्‌ज वुमन दक्षिण आशिया २०२१|विकी लव्हज् वुमन दक्षिण आशिया]]''' ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. प्रकल्प पृष्ठ [[विकिपीडिया:विकी लव्ह्‌ज वुमन दक्षिण आशिया २०२१|येथे]] उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण '''पोस्टकार्ड, बार्नस्टार, तसेच $१२ USD ते $२५० USD पर्यंतचे बक्षीस''' आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. [[विकिपीडिया:विकी लव्ह्‌ज वुमन दक्षिण आशिया २०२१/ नोंदणी|येथे]] आपली नोंदणी करा. आणि [https://fountain.toolforge.org/editathons/wlwsa2021-mr हा दुवा] वापरून आपला लेख सादर करा. जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक [[सदस्य:Sandesh9822|संदेश हिवाळे]] किंवा [[सदस्य:Rockpeterson|Rockpeterson]] यांना संपर्क करावा. धन्यवाद. --[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) ११:०१, १६ सप्टेंबर २०२१ (IST) <!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/wlw&oldid=22025036 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य == नमस्कार, आपण '''वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य''' येथे लिखाण करत आहात. कृपया लक्षात घ्या, वर्ग हे शक्यतो रिकामे असतात. तेथील लिखाण इतर लेखात जोडल्यास जास्त बरे होईल. -[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;"> 💬</span>]] ) १०:५३, ३० नोव्हेंबर २०२१ (IST) :माहितीसाठी धन्यवाद. एक शंका - '''अरविंद घोष यांचे साहित्य''' याच नावाचे एक page करून तो मजकूर तेथे लिहू का? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १३:२७, ३० नोव्हेंबर २०२१ (IST) ::अरे वाह, का नाही... अजून विस्तृत माहिती टाकू शकता. -[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;"> 💬</span>]] ) १४:०३, ३० नोव्हेंबर २०२१ (IST) :::धन्यवाद. तसे करते. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १५:०१, ३० नोव्हेंबर २०२१ (IST) == विकिपीडिया आशियाई महिना २०२२ == [[चित्र:Wikipedia Asian Month 2022 Banner mr.svg|right|400px|frameless]] प्रिय विकिसदस्य, '''[[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२२|विकिपीडिया आशियाई महिना ]]''' हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रकल्प पृष्ठ [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२२|येथे]] उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण '''विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊ शकता तसेच डिजीटल बार्नस्टार''' देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२२/सहभागी|येथे]] आपली नोंदणी करा आणि [https://fountain.toolforge.org/editathons/wam-mr-2022 हा दुवा] वापरून आपला लेख सादर करा. जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक [[सदस्य:Sandesh9822|संदेश हिवाळे]], [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] किंवा [[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे ]] यांना संपर्क करावा. धन्यवाद. '''आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२२''' :<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small> <!-- सदस्य:Tiven2240@mrwiki ने https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Tiven2240/test&oldid=2192714 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == WikiConference India 2023: Program submissions and Scholarships form are now open == Dear Wikimedian, We are really glad to inform you that '''[[:m:WikiConference India 2023|WikiConference India 2023]]''' has been successfully funded and it will take place from 3 to 5 March 2023. The theme of the conference will be '''Strengthening the Bonds'''. We also have exciting updates about the Program and Scholarships. The applications for scholarships and program submissions are already open! You can find the form for scholarship '''[[:m:WikiConference India 2023/Scholarships|here]]''' and for program you can go '''[[:m:WikiConference India 2023/Program Submissions|here]]'''. For more information and regular updates please visit the Conference [[:m:WikiConference India 2023|Meta page]]. If you have something in mind you can write on [[:m:Talk:WikiConference India 2023|talk page]]. ‘‘‘Note’’’: Scholarship form and the Program submissions will be open from '''11 November 2022, 00:00 IST''' and the last date to submit is '''27 November 2022, 23:59 IST'''. Regards [[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १६:५५, १६ नोव्हेंबर २०२२ (IST) (on behalf of the WCI Organizing Committee) <!-- सदस्य:Nitesh Gill@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/WCI_2023_active_users,_scholarships_and_program&oldid=24082246 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == WikiConference India 2023: Open Community Call and Extension of program and scholarship submissions deadline == Dear Wikimedian, Thank you for supporting Wiki Conference India 2023. We are humbled by the number of applications we have received and hope to learn more about the work that you all have been doing to take the movement forward. In order to offer flexibility, we have recently extended our deadline for the Program and Scholarships submission- you can find all the details on our [[:m:WikiConference India 2023|Meta Page]]. COT is working hard to ensure we bring together a conference that is truly meaningful and impactful for our movement and one that brings us all together. With an intent to be inclusive and transparent in our process, we are committed to organizing community sessions at regular intervals for sharing updates and to offer an opportunity to the community for engagement and review. Following the same, we are hosting the first Open Community Call on the 3rd of December, 2022. We wish to use this space to discuss the progress and answer any questions, concerns or clarifications, about the conference and the Program/Scholarships. Please add the following to your respective calendars and we look forward to seeing you on the call * '''WCI 2023 Open Community Call''' * '''Date''': 3rd December 2022 * '''Time''': 1800-1900 (IST) * '''Google Link'''': https://meet.google.com/cwa-bgwi-ryx Furthermore, we are pleased to share the email id of the conference contact@wikiconferenceindia.org which is where you could share any thoughts, inputs, suggestions, or questions and someone from the COT will reach out to you. Alternatively, leave us a message on the Conference [[:m:Talk:WikiConference India 2023|talk page]]. Regards [[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) २१:५१, २ डिसेंबर २०२२ (IST) On Behalf of, WCI 2023 Core organizing team. <!-- सदस्य:Nitesh Gill@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/WCI_2023_active_users,_scholarships_and_program&oldid=24083503 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ == प्रिय विकिसदस्य, '''[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]]''' ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. [[:c:Commons:Wiki Loves Folklore 2023|विकी लव्हस फॉल्कलोर]] ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल. ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या [[सदस्य: संतोष गोरे|संतोष गोरे]] किंवा [[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]] यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा. कृपया या पृष्ठावरील [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३#नियम|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी]] या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा [[साचा:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|साचा]] वापरा. येथून [https://fountain.toolforge.org/editathons/fnf2023-mr हा दुवा] तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. :<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small> <!-- सदस्य:संतोष गोरे@mrwiki ने https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87/test&oldid=2236216 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ == प्रिय विकिसदस्य, '''[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]]''' ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. [[:c:Commons:Wiki Loves Folklore 2023|विकी लव्हस फॉल्कलोर]]ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल. ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या ([[सदस्य: संतोष गोरे|संतोष गोरे]] किंवा [[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]]) चर्चा पानावर संदेश लिहा. कृपया या पृष्ठावरील [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३#नियम|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी]] या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा [[साचा:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|साचा]] वापरा. येथून [https://fountain.toolforge.org/editathons/fnf2023-mr हा दुवा] तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद. :<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small> <!-- सदस्य:Sandesh9822@mrwiki ने https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Sandesh9822/test&oldid=2237804 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> नमस्कार, आनंदाची बातमी आहे. कृपया [[सदस्य_चर्चा:संतोष_गोरे#Feminism_and Folklore_2023_has_been extended |हे पहा]], सदरील स्पर्धेचा कालावधी १५ एप्रिल २०२३ पर्यंत वाढवण्यात आला आहे. आपण यात अजून लेखांची भर घालू शकता. यात स्त्री या विषयास मध्यवर्ती ठेवून लेख लिहावयाचे आहेत. आपल्या आता पर्यंत तपासल्या गेलेल्या लेखांच्या सूचना [https://fountain.toolforge.org/editathons/fnf2023-mr येथे] पहाता येतील. जर आपणास परीक्षकांनी काही बदल सुचवले असतील तर ते आवश्य करावेत ही विनंती.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:४२, ६ एप्रिल २०२३ (IST) :माहितीसाठी धन्यवाद!! आपण सांगितलेल्या पैकी काही सुधारणा केल्या आहेत, (नंतर केलेल्या या सुधारणा परत विचारात घेतल्या जातील का?) :नवीन लेखांची भर घालण्याचा प्रयत्न करते. पुनश्च धन्यवाद!! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १३:०४, ६ एप्रिल २०२३ (IST) ::निश्चितच, सूचना ह्या 'झालेली दुरुस्ती परत विचारात घेण्यासाठीच' केल्या जातात. काही शंका असल्यास आपण परत परत विचारू शकता.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:२४, ६ एप्रिल २०२३ (IST) :::धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २३:२६, ६ एप्रिल २०२३ (IST) ==विकिपीडिया स्त्रीवाद आणि लोकसाहित्य स्पर्धेचा निकाल== Ketaki Modak नमस्कार, [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|विकिपीडिया स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] साठी तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद. तुम्ही स्पर्धेत '''तृतीय क्रमांक''' पटकावला आहे. आम्ही सर्व मराठी विकिपीडिया समुदायाच्या वतीने तुमचे अभिनंदन करतो. विकिपीडिया स्त्रीवाद आणि लोकसाहित्यच्या नंतरच्या आवृत्तीसाठी आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी पाहण्यासाठी उत्सुक आहोत. धन्यवाद. --[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०५:५५, १६ मे २०२३ (IST) :धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १५:३०, १६ मे २०२३ (IST) == पूर्णयोग साचा == नमस्कार, सदरील साच्यात व्यक्तींच्या यादीत लाल दुव्यात पवित्र असे नाव येते, ते नक्की काय आहे? तसेच हा साचा संबंधित व्यक्ती आणि संस्थांच्या लेखात आपण वापरावा. सध्या तो केवळ श्री अरविंद या लेख पानात जोडलेला दिसतोय.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०६:०८, २२ मे २०२३ (IST) :०१) पवित्र हे श्रीअरविंद आश्रमाशी संबंधित एका साधकांचे टोपणनाव आहे. त्यांच्यावर एक लेख लिहायचा आहे. लाल दुव्यात असलेल्या सर्वच नावांशी संबंधित एकेक लेख लिहिण्याचा प्रयत्न आहे. :०२) होय. तोपूर्णयोग साचा आवश्यक तेथे सर्वत्र जोडते. धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १६:३६, २२ मे २०२३ (IST) ::पूर्णयोग साचा आवश्यक तेथे जोडला. धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १७:०७, २२ मे २०२३ (IST) :नमस्कार, शैक्षणिक संस्थांसाठी उपयुक्त ठरेल असा साचा तयार करण्याचा विचार आहे. :०१) शैक्षणिक संस्थांसाठी असा साचा आधी अस्तित्वात आहे का, कोठे पाहता येईल? :०२) पूर्णयोग साचा ज्या प्रकारचा आहे, तो माहितीचौकटीपेक्षा वेगळा आहे, त्याला काय नाव आहे? :कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती. धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १७:१२, २२ मे २०२३ (IST) ::#नक्की कसा साचा हवाय, माहिती चौकट का? ::#कोणताही साचा आपण '''साचा: अबक''' असे (अबक ऐवजी एखादा शब्द) शोधू शकता.- ::[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:४८, २२ मे २०२३ (IST) :::०१) ठीक आहे. शोधते. धन्यवाद ! :::०२) पूर्णयोग साचा हा माहितीचौकटीपेक्षा वेगळा आहे, त्याला काय म्हणतात? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २२:०१, २२ मे २०२३ (IST) ::::विकिच्या संदर्भात त्याला काही नाव असेल ना? ते हवे होते. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २२:०२, २२ मे २०२३ (IST) :::::साचा शोधताना नाव सापडले. त्याला 'मार्गक्रमण साचे' म्हणतात हे समजले. धन्यवाद!! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २२:१२, २२ मे २०२३ (IST) == Feminism and Folklore 2023 - Local prize winners == [[File:Feminism and Folklore 2023 logo.svg|centre|550px|frameless]] ::<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr"> ''{{int:please-translate}}'' Congratulations on your remarkable achievement of winning a local prize in the '''Feminism and Folklore 2023''' writing competition! We greatly appreciate your valuable contribution and the effort you put into documenting your local Folk culture and Women on Wikipedia. To ensure you receive your prize, please take a moment to complete the preferences form before the 1st of July 2023. You can access the form [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdWlxDwI6UgtPXPfjQTbVjgnAYUMSYqShA5kEe4P4N5zwxaEw/viewform?usp=sf_link by clicking here]. We kindly request you to submit the form before the deadline to avoid any potential disappointments. If you have any questions or require further assistance, please do not hesitate to contact us via talkpage or Email. We are more than happy to help. Best wishes, [[:m:Feminism and Folklore 2023|FNF 2023 International Team]] ::::Stay connected [[File:B&W Facebook icon.png|link=https://www.facebook.com/feminismandfolklore/|30x30px]]&nbsp; [[File:B&W Twitter icon.png|link=https://twitter.com/wikifolklore|30x30px]] [[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १६:१७, १० जून २०२३ (IST) </div> <!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf2023&oldid=25134473 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == Feminism and Folklore 2023 - A Heartfelt Appreciation for Your Impactful Contribution! == <div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr"> [[File:Feminism and Folklore 2023 logo.svg|center|500px]] {{int:please-translate}} Dear Wikimedian, We extend our sincerest gratitude to you for making an extraordinary impact in the '''[[m:Feminism and Folklore 2023|Feminism and Folklore 2023]]''' writing competition. Your remarkable dedication and efforts have been instrumental in bridging cultural and gender gaps on Wikipedia. We are truly grateful for the time and energy you've invested in this endeavor. As a token of our deep appreciation, we'd love to send you a special postcard. It serves as a small gesture to convey our immense thanks for your involvement in the competition. To ensure you receive this token of appreciation, kindly fill out [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeXZaej264LOTM0WQBq9QiGGAC1SWg_pbPByD7gp3sC4j7VKQ/viewform this form] by August 15th, 2023. Looking ahead, we are thrilled to announce that we'll be hosting Feminism and Folklore in 2024. We eagerly await your presence in the upcoming year as we continue our journey to empower and foster inclusivity. Once again, thank you for being an essential part of our mission to promote feminism and preserve folklore on Wikipedia. With warm regards, '''Feminism and Folklore International Team'''. --[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) ००:०७, २६ जुलै २०२३ (IST) </div> <!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf2023p&oldid=25345565 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == विकिपीडिया आशियाई महिना २०२३ == [[चित्र:Wikipedia Asian Month Logo Mr.svg|right|400px|frameless]] प्रिय विकिसदस्य, '''[[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३|विकिपीडिया आशियाई महिना ]]''' हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रकल्प पृष्ठ [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३|येथे]] उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण '''विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल''' तसेच '''डिजीटल बार्नस्टार''' देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३/सहभागी|येथे]] आपली नोंदणी करा आणि [https://fountain.toolforge.org/editathons/wam-mr-2023 हा दुवा] वापरून आपला लेख सादर करा. जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक [[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे ]], [[सदस्य:Sandesh9822|संदेश हिवाळे]] किंवा [[सदस्य:Tiven2240|टायविन]] यांना संपर्क करावा. धन्यवाद. :'''आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३''' :<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small> <!-- सदस्य:संतोष गोरे@mrwiki ने https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87/test&oldid=2341857 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == केतकी मोडक लेख == नमस्कार, तुम्ही मराठी विकिपीडियावर मौल्यवान योगदान देत आहात. तुम्ही स्वतःच [[केतकी मोडक]] नावाचा लेख लिहित असल्याचे आज पाहण्यात आले (ज्यावर मी जाहिरात साचा लावला आहे). कृपया हे समजून घ्यावे की विकिपीडियावर संपादकाने स्वतःचा लेख लिहिणे '''जाहिरात''' समजली जाते. अशाप्रकारची संपादने विकिपीडियावर मान्य नसतात, व ती हटवली जातात. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> ११:४७, १० फेब्रुवारी २०२४ (IST) :नमस्कार, माझ्या नावाचा लेख मी स्वत: तयार केला नाही, फक्त त्यामध्ये अलीकडे वस्तुस्थितीत झालेल्या बदलांचा नव्याने समावेश केला किंवा सुधारणा केली. :स्वत: बदल केला हे सत्य आहे, पण वस्तुस्थितीवर आधारित माहिती लिहिली आहे. त्यात जाहिरातीचा कोणताही हेतू नाही. अशी माहिती लिहायची झाल्यास काय करावे, तो साचा येऊ नये यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन करावे, ही विनंती. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २१:३२, १० फेब्रुवारी २०२४ (IST) ::::अभिप्रायासाठी धन्यवाद. मी लेखातून जाहिरात साचा काढला आहे. {{साद|अभय नातू|संतोष गोरे|Tiven2240}} स्वतःचा लेख संपादन करण्याबाबत नियम वा विशेष सुचना असतील तर कृपया स्पष्ट कराव्यात. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १०:४१, ११ फेब्रुवारी २०२४ (IST) :::::धन्यवाद. नियम कळले तर अधिक बरे होईल. म्हणजे खबरदारी घेता येईल. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १८:२२, ११ फेब्रुवारी २०२४ (IST) ::::::नमस्कार, आपल्या चर्चा पानावर स्वागत साचा जोडलेला आहे. त्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळेलच, तरीही काही प्रकल्प पानांची येथे यादी देऊ इच्छितो - [[विकिपीडिया:परिचय|परिचय]], [[विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन|नवीन सदस्यांना मार्गदर्शन]] तसेच [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे|विकिपीडिया काय नव्हे]]. ::::: तसेच [[चर्चा:केतकी मोडक]] येथे तसेही आपल्याला सांगितले होते त्यानुसार आपण माहिती चौकटीची माहिती, लेखातील व्याकरणाच्या छोट्या मोठ्या चुका, वर्ग अशी संपादने करू शकता. पण शक्यतो कमीत कमी वेळेस हे काम करावे (जेणेकरून नवीन सदस्यांपुढे आपण आपली आदर्श कृती मांडू शकू). -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १९:२३, ११ फेब्रुवारी २०२४ (IST) ::::::ठीक आहे. या पुढे काळजी घेईन. धन्यवाद !! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २२:३९, ११ फेब्रुवारी २०२४ (IST) == तयार केलेली पाने == नमस्कार, आपण तयार केलेली पाने [https://xtools.wmcloud.org/pages/mr.wikipedia.org/Ketaki%20Modak/all?uselang=mr येथे] पाहू शकता. यापैकी काही पाने अपूर्ण असावीत असे दिसते. जमल्यास पुन्हा तपासून त्यावर काम करावे. - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:४९, १२ एप्रिल २०२५ (IST) :अपूर्ण राहून गेलेली पाने लक्षात आणून दिल्याबददल धन्यवाद!! ती यथावकाश पूर्ण करते. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २३:०८, १२ एप्रिल २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[प्रीती घोष]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[कैलास झवेरी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ०६:३१, २९ एप्रिल २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[प्रीती घोष]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[कैलास झवेरी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[श्याम कुमारी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १३:३०, २९ एप्रिल २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[ॲस्टर पटेल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ११:३०, ३० एप्रिल २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[ज्युडिथ टायबर्ग]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[ॲनी मार्गारेट रॉबिन्सन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[अनु पुराणी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[शोभा मित्रा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[मेरी क्युरी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[कृष्णा चक्रवर्ती]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[धनवंती नागदा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[प्रीती दास गुप्ता]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[जनिना स्ट्रोका]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[स्वर्णलता भिशीकर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[लता जौहर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[सुप्रभा नहार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[सुझान कार्पेलेस]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[मॅरी हेलेन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[अ‍ॅनी नन्नली]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[सुनंदा पोद्दार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[झुमूर भट्टाचार्य]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[तेहमी मसालावाला]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[प्रल्हाद]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[शैलजादेवी वहिनीसाहेब प्रतिनिधी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[इरा सरकार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १६:३०, ३० एप्रिल २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[सुनयना पांडा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = लेखाची शब्दसंख्या १७७ आहे) * [[प्रमिला सेन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = लेखाची शब्दसंख्या 216 आहे) * [[गौरी पिंटो]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = लेखाची शब्दसंख्या 152 आहे) * [[खाल्डियन लोककथा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = लेखाची शब्दसंख्या 213 आहे) * [[सती अनसूया (तेलगू चित्रपट)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = लेखाची शब्दसंख्या 223 आहे) * [[परिपूर्ण दान (लोककथा)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = लेखाची शब्दसंख्या 217 आहे) * [[वेद]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[वेदांमधील संज्ञा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[वैदिक देवदेवता आणि दैत्यासुर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २१:३०, ३० एप्रिल २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[श्याम कुमारी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[ॲस्टर पटेल]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[ज्युडिथ टायबर्ग]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[ॲनी मार्गारेट रॉबिन्सन]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अनु पुराणी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[शोभा मित्रा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[मेरी क्युरी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[कृष्णा चक्रवर्ती]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[धनवंती नागदा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = Ok) * [[प्रीती दास गुप्ता]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = Ok) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १९:३०, ३ मे २०२५ (IST) == Feminism and Folklore 2025 - Local prize winners == [[File:Feminism and Folklore 2025 logo.svg|centre|550px|frameless]] ::<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr"> ''{{int:please-translate}}'' Dear Wikimedian, Congratulations on your outstanding achievement in winning a local prize in the '''Feminism and Folklore 2025''' writing competition! We truly appreciate your dedication and the valuable contribution you’ve made in documenting local folk culture and highlighting women’s representation on your local Wikipedia. To claim your prize, please complete the [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdONlpmv1iTrvXnXbHPlfFzUcuF71obJKtPGkycgjGObQ4ShA/viewform?usp=dialog prize form] by July 5th, 2025. Kindly note that after this date, the form will be closed and submissions will no longer be accepted. Please also note that all prizes will be awarded in the form of [https://www.tremendous.com/ Tremendous Vouchers] only. If you have any questions or need assistance, feel free to contact us via your talk page or email. We're happy to help. Warm regards, [[:m:Feminism and Folklore 2025|FNF 2025 International Team]] ::::Stay connected [[File:B&W Facebook icon.png|link=https://www.facebook.com/feminismandfolklore/|30x30px]]&nbsp; [[File:B&W Twitter icon.png|link=https://twitter.com/wikifolklore|30x30px]] </div> --[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १५:५०, २१ जून २०२५ (IST) <!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf25&oldid=28891702 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> 5gqscxph5f2tkmkmoqlln83chd20eum जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९२१ 0 126113 2581535 2230471 2025-06-21T07:03:50Z अभय नातू 206 साचा 2581535 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''१९२१ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा''' ही [[होजे राउल कापाब्लांका]] व [[इमॅन्युएल लास्कर]] यांत झाली. [[क्युबा]]च्या [[हवाना]] शहरात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत कापाब्लांका विजयी झाला. [[वर्ग:जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा]] [[वर्ग:इ.स. १९२१ मधील खेळ]] 1bgyk70fat5dvarswqnu7y3txbmhrs9 सदस्य चर्चा:Dharmadhyaksha 3 135396 2581566 2562309 2025-06-21T10:20:56Z MediaWiki message delivery 38883 /* Feminism and Folklore 2025 - Local prize winners */ नवीन विभाग 2581566 wikitext text/x-wiki {| class="wikitable floatright" |+ जुन्या चर्चा |- | * [[सदस्य चर्चा:Dharmadhyaksha/जुनी चर्चा १]] |- |} == माहितीचौकट अभिनेता == नमस्कार, ज्या लेखांमध्ये {{t|माहितीचौकट अभिनेता}} आहे तेथून हा साचा घालवून {{t|विकिडेटा माहितीचौकट}} हा साचा लावू नये. मूळ साच्यात काही डेटा आहे जो विकिडेटा माहितीचौकटीत नाही. धन्यवाद. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ११:४६, २३ जानेवारी २०२४ (IST) :तसा काही डेटा नसेल तर तो WikiData मध्ये टाकावा. पुर्ण WikiData Project चा उद्देश हाच आहे की वेगवेगळी माहिती अशी प्रत्येक विकि पानावर नसावी. [[सदस्य:Dharmadhyaksha|धर्माध्यक्ष]] ([[सदस्य चर्चा:Dharmadhyaksha|चर्चा]]) ११:४९, २३ जानेवारी २०२४ (IST) ::मी अभय नातू यांच्या मताशी बऱ्याच प्रमाणात सहमत आहे. यासोबत अजून काही मुद्दे मांडू इच्छितो.. ::#{{t|विकिडेटा माहितीचौकट}} मध्ये फार त्रोटक माहिती असते आणि त्यात सर्व सामान्य संपादकांना भर घालता येत नाही. मला स्वतःला देखील ते अवघड जाते. आणि मोबाईल वरून तर शक्यच नाही. ::#{{t|विकिडेटा माहितीचौकट}} साच्यामुळे निर्माण होणारी मुख्य लेखातील चौकट ही केवळ डेस्कटॉप वर नीट दिसते. मोबाईल दृश्यात ती चौकट नीट तर दिसत नाहीच नाही, यासोबत चित्रा सह काही माहिती जी की यात दिलेली असते ही मोबाईल दृश्यात वगळली जाते. आणि आपणास माहीत असेल कदाचित की आजच्या घडीस विकिपीडियास मोठ्या प्रमाणावर मोबाईल द्वारे वाचक आणि संपादक भेट देत असतात. :::सबब माझ्या नजरेस आलेल्या वरील दोन त्रुटी दूर सारून मग आपण काम करावे.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०९:३०, २४ जानेवारी २०२४ (IST) :{{साद|Dharmadhyaksha}} यांनी उत्तर दिलेले आत्ता लक्षात आले. :{{साद|संतोष गोरे}} यांच्या मुद्द्याव्यतिरिक्त मत -- :विकिडेटा ही प्रमाणित (form आणि content) असल्याने हे अधिकाधिक वापरले पाहिजे हे बरोबर परंतु त्यासाठी असलेल्या माहितीचा बळी नको. :मध्यममार्ग म्हणून दोन्ही साचे ठेवावे आणि विकिडेटावर नसलेली माहिती घाली गेल्यावर मूळ साचा काढावा. :धन्यवाद. :[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०९:४४, २४ जानेवारी २०२४ (IST) :{{साद|Tiven2240}} यांनी हे मुळ साचे बनवले होते. मला Module मधले फार काही समजत नाही. Tiven2240 ह्या बाबतील मदत करू शकतील तर बरे होईल. तो पर्यंत मी संतोष गोरेंनी सांगितलेली ही मोबाईल दृश्यातली समस्या मी [https://www.wikidata.org/wiki/Wikidata:Project_chat#Wikidata_usage_in_Infoboxes_of_different_Wikipedias Wikidata वर देखील] निदर्शनास आणून दिली आहे. <br> पण साधारणपणे, मला असे वाटते की हा साचा वापरल्याने लेखाला मदत होते, विशेषत: जेव्हा आपले लेख खूप लहान आहे आणि पूर्णपणे लिहिलेले नाही. मी तयार केलेले सर्व लेख पूर्णपणे न लिहिल्याबद्दल तुम्ही मला दोष देऊ शकता; पण माझे लक्ष त्यांच्यातील चांगल्या सामग्रीपेक्षा अधिक लेख तयार करण्यावर आहे. [[सदस्य:Dharmadhyaksha|धर्माध्यक्ष]] ([[सदस्य चर्चा:Dharmadhyaksha|चर्चा]]) १४:०२, २४ जानेवारी २०२४ (IST) ::सौम्य स्मरण, वरील चर्चे नुसार WikiData Project वर काही निर्णय घेण्यात आलाय का? - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:२४, ९ फेब्रुवारी २०२४ (IST) ::: क्षमस्व! तेथे कोणतीही मोठी चर्चा झाली नाही आणि आता [https://www.wikidata.org/wiki/Wikidata:Project_chat/Archive/2024/01#Wikidata_usage_in_Infoboxes_of_different_Wikipedias चर्चा संग्रहित आहे]. फक्त एका संपादकाने मला उत्तर दिले पण ते सर्व तांत्रिक गोष्टींशी संबंधित होते आणि मला ते समजलेही नाही. {{साद|Tiven2240}}, तुम्ही आजकाल सक्रिय असल्याने, तुम्ही मदत करू शकता का? किंवा मी en.wp वर कोणाची तरी मदत घेण्याचा प्रयत्न करतो. [[सदस्य:Dharmadhyaksha|धर्माध्यक्ष]] ([[सदस्य चर्चा:Dharmadhyaksha|चर्चा]]) १३:५८, ९ फेब्रुवारी २०२४ (IST) ::::@[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]], नमस्कार, तांत्रिक अडचणीत आपली नेहमीच मोलाची भूमिका राहिली आहे. कृपया यात लक्ष घालाल का. - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:०७, ९ फेब्रुवारी २०२४ (IST) :::::पाहतो धन्यवाद [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १६:१५, १२ फेब्रुवारी २०२४ (IST) ::::::@[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] सौम्य स्मरण.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १०:५२, १२ मार्च २०२४ (IST) == Congratulations to the Feminism and Folklore Prize Winner! == Dear Winner, We are thrilled to announce that you have been selected as one of the prize winners in the 2024 '''[[:m:Feminism and Folklore 2024|Feminism and Folklore]]''' Writing Contest! Your contributions have significantly enriched Wikipedia with articles that document the vibrant tapestry of folk cultures and highlight the crucial roles of women within these traditions. As a token of our appreciation, you will receive a gift coupon. To facilitate the delivery of your prize and gather valuable feedback on your experience, please fill out [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc9Rkv1803Q6DnAc1SLxyYy95KN22GNrGXeA7kNFT-u62MGyg/viewform?usp=sf_link the Winners Google Form]. In the form, kindly provide your details for receiving the gift coupon and share your thoughts about the project. Your dedication and hard work have not only helped bridge the gender gap on Wikipedia but also ensured that the cultural narratives of underrepresented communities are preserved for future generations. We look forward to your continued participation and contributions in the future. Congratulations once again, and thank you for being a vital part of this global initiative! Warm regards, '''The Feminism and Folklore Team''' [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १९:३४, २३ जून २०२४ (IST) == Invitation to Participate in the Wikimedia SAARC Conference Community Engagement Survey == Dear Community Members, I hope this message finds you well. Please excuse the use of English; we encourage translations into your local languages to ensure inclusivity. We are conducting a Community Engagement Survey to assess the sentiments, needs, and interests of South Asian Wikimedia communities in organizing the inaugural Wikimedia SAARC Regional Conference, proposed to be held in Kathmandu, Nepal. This initiative aims to bring together participants from eight nations to collaborate towards shared goals. Your insights will play a vital role in shaping the event's focus, identifying priorities, and guiding the strategic planning for this landmark conference. Survey Link: https://forms.gle/en8qSuCvaSxQVD7K6 We kindly request you to dedicate a few moments to complete the survey. Your feedback will significantly contribute to ensuring this conference addresses the community's needs and aspirations. Deadline to Submit the Survey: 20 January 2025 Your participation is crucial in shaping the future of the Wikimedia SAARC community and fostering regional collaboration. Thank you for your time and valuable input. Warm regards,<br> [[:m:User:Biplab Anand|Biplab Anand]] <!-- सदस्य:Biplab Anand@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Biplab_Anand/lists&oldid=28078122 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == सरन्या पोनवन्नन == माफ करा, अनवधानाने [[सरन्या पोनवन्नन]] लेखात मी किरकोळ बदल केले.– [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १९:४१, २४ फेब्रुवारी २०२५ (IST) == माहितीचौकट आणि वर्ग == नमस्कार, तुम्ही बहुतांशी मराठी/हिंदी चित्रपट लेखांतील माहितीचौकट हटवून विकिडेटा जोडत आहात, परंतु त्यामुळे नवीन अडचण निर्माण होतेय. माहितीचौकट मध्ये निर्मिती वर्ष टाकले असता आपोआप तो लेख हिंदी चित्रपटाच्या वर्गात जोडला जायचा, पण तुम्ही तो हटवून विकिडेटा जोडल्याने तो वर्ग हटवला गेला. असे अनेक लेख आहेत जे अचानक वर्गहीन/अवर्गीकृत झालेत. उदा. [[सिंघ इज किंग]] लेखात मी स्वतः नंतर वर्ग जोडला आहे. त्यामुळे यापुढे विकिडेटा जोडताना लेखातील वर्ग उडवल्या जात असेल, तर तोदेखील जोडावा ही विनंती. याआधी गायब झालेल्या वर्गाचे चित्रपट लेख कसे शोधावे? {{साद|संतोष गोरे}}, {{साद|अभय नातू}} [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ०९:२१, १८ मार्च २०२५ (IST) ::नमस्कार! लक्ष्यात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आता शक्य तिथे मी हे वर्ग जोडेले. [[सदस्य:Dharmadhyaksha|धर्माध्यक्ष]] ([[सदस्य चर्चा:Dharmadhyaksha|चर्चा]]) ११:११, १८ मार्च २०२५ (IST) :::@[[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]], सोपा उपाय नाही :-( -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०८:३१, १९ मार्च २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[डायना पेंटी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १९:३२, २५ मार्च २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[मंदाकिनी (अभिनेत्री)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २०:३०, २६ मार्च २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[डायना पेंटी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[मंदाकिनी (अभिनेत्री)]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[प्रनूतन बहल]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[रंजीता कौर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[झेबा बख्तियार]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अलिझेह अग्निहोत्री]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सबा कमर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अलाया एफ]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[आंद्रिया केविचुसा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[मधु (अभिनेत्री)]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[साध्वी ऋतंभरा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[स्त्रीवादी साहित्य]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[बामा (लेखिका)]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[कामिनी रॉय]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[ज्ञानदानंदिनी देवी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ०६:३१, २९ एप्रिल २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[प्रनूतन बहल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[रंजीता कौर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[झेबा बख्तियार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अलिझेह अग्निहोत्री]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सबा कमर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अलाया एफ]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[आंद्रिया केविचुसा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[मधु (अभिनेत्री)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[साध्वी ऋतंभरा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[स्त्रीवादी साहित्य]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[बामा (लेखिका)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[कामिनी रॉय]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[ज्ञानदानंदिनी देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[देवी (२०२० चित्रपट)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अँग्री इंडियन गॉडेसेस]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[हेतल दवे]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १३:३०, २९ एप्रिल २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[धक धक]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[नूर जहान (बंगाली चित्रपट)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सुनीती देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[फातिमा सना शेख]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सादिया खातीब]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[शिवालीका ओबेरॉय]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[शर्वरी वाघ]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[शर्मीन सेगल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अपर्णा बालमुरली]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[कीर्ती सुरेश]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ११:३०, ३० एप्रिल २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[मानसी पारेख]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सुरभी लक्ष्मी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[गीतांजली थापा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सरन्या पोनवन्नन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अनन्या चॅटर्जी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[उमाश्री]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[तारा (कन्नड अभिनेत्री)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[मिताली जगताप वराडकर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[देबश्री रॉय]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[ऋतुपर्णा सेनगुप्ता]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[अर्चना (अभिनेत्री)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[लक्ष्मी प्रिया चंद्रमौली]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[रेहाना सुलतान]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[मोनिषा उन्नी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[आयदा अल-काशेफ]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[लीशांगथेम टोंथोईंगाम्बी देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[डॉली आहलुवालिया]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[बलजिंदर कौर (अभिनेत्री)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[के.पी.ए.सी. ललिता]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[अनन्या खरे]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[शांता देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[अरणमुला पोन्नम्मा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[श्वेता त्रिपाठी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[आयेशा कपूर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[मेहेर विज]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[संजना कपूर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[रिंकी खन्ना]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[मेधा शंकर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[निधी अग्रवाल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[हर्षाली मल्होत्रा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[हर्षदीप कौर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[विभा सराफ]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[असीस कौर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[ध्वनी भानुशाली]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[ज्योतिका टांगरी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[निखिता गांधी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[रिचा शर्मा (गायिका)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[सपना मुखर्जी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[अनुष्का मनचंदा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[आय.आय.एफ.ए. पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[आय.आय.एफ.ए. पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[चित्राशी रावत]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[रीमा सेन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[रायमा सेन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[राजश्री ठाकूर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[आय.आय.एफ.ए. पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[दिव्यांका त्रिपाठी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[दृष्टी धामी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[सरिता जोशी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[सनाया इराणी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[रती पांडे]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[श्रीती झा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[मुग्धा चाफेकर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[संयुक्ता]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[देवोलीना भट्टाचार्य]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[आमना शरीफ]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[प्रीतिका राव]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[कृतिका सेंगर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[जेनिफर विंगेट]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[रुबीना दिलैक]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[सुरभी चंदना]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[रश्मी देसाई]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[हेली शाह]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[तारा (महाविद्या)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[दुर्गा सप्तशती]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[शाक्त उपनिषदे]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सीता उपनिषद]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १६:३०, ३० एप्रिल २०२५ (IST) **नमस्कार {{ping|Sandesh9822}}! वरील नमुद केलेल्या अनेक लेखांमध्ये तुम्ही "३०० पेक्षा कमी शब्द" अशी टिप्पणी दिली आहे. पण हे सर्व लेख ३०० पेक्षा जास्त शब्दांचे आहे. आपणे शब्द गणणेसाठी कोणते टूल वापरत आहात? [[सदस्य:Dharmadhyaksha|धर्माध्यक्ष]] ([[सदस्य चर्चा:Dharmadhyaksha|चर्चा]]) १७:०५, ३० एप्रिल २०२५ (IST) **:नमस्कार, तेथे नमूद केलेले "३०० शब्द" हे एखाद्या लेखाच्या एकूण शब्दसंख्येसंदर्भात नाहीत. ही नोंद फक्त अशा 'जून्या' लेखांबाबत आहे, ज्यामध्ये अलीकडील संपादनात नव्याने ३०० पेक्षा कमी शब्द जोडले गेले आहेत. [https://tools.wikilovesfolklore.org/campwiz/campaign/110 हे] टूल मी वापरत आहे. यात त्रुटी दिसत असल्यास अजून तपासतो. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १८:१३, ३० एप्रिल २०२५ (IST) सादर केलेल्या काही लेखांची एकूण शब्दसंख्या (संदर्भातील शब्द वगळून) 300 पेक्षा कमी आढळून येत आहे. आणि असे लेख नामंजूर करण्यात आले आहेत. तथापि, माझ्याकडून मोबाईलवर संपादन करताना काही लेखांवर "300 शब्द कमी असल्याची टीप" टाकली गेली, प्रत्यक्षात ते 300 पेक्षा जास्त शब्दांचे व '''मंजूरही''' झालेले लेख आहेत. अनावश्यक ठिकाणी असलेली ती टीप काढून टाकली जाईल. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> २१:०८, ३० एप्रिल २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[दीपिका सिंग]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सौभाग्यलक्ष्मी उपनिषद]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = लेखाची शब्दसंख्या १७७ आहे) * [[सरस्वती-रहस्य उपनिषद]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = लेखाची शब्दसंख्या २६८ आहे) * [[बह्वृच उपनिषद]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = लेखाची शब्दसंख्या 152 आहे) * [[त्रिपुरातापिनी उपनिषद]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = लेखाची शब्दसंख्या 152 आहे) * [[त्रिपुरा उपनिषद]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = लेखाची शब्दसंख्या 152 आहे) * [[देवी उपनिषद]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = लेखाची शब्दसंख्या 152 आहे) * [[भावना उपनिषद]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = लेखाची शब्दसंख्या 152 आहे) * [[अविका गोर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = लेखाची शब्दसंख्या 152 आहे) * [[प्रणाली राठोड]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = लेखाची शब्दसंख्या 152 आहे) * [[निया शर्मा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = लेखाची शब्दसंख्या 152 आहे) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २१:३०, ३० एप्रिल २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[देवी (२०२० चित्रपट)]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अँग्री इंडियन गॉडेसेस]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[हेतल दवे]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[धक धक]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[नूर जहान (बंगाली चित्रपट)]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सुनीती देवी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[फातिमा सना शेख]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सादिया खातीब]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[शिवालीका ओबेरॉय]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[शर्वरी वाघ]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[शर्मीन सेगल]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अपर्णा बालमुरली]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[कीर्ती सुरेश]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[मानसी पारेख]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सुरभी लक्ष्मी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[गीतांजली थापा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सरन्या पोनवन्नन]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अनन्या चॅटर्जी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[उमाश्री]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = Ok) * [[तारा (कन्नड अभिनेत्री)]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[मिताली जगताप वराडकर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[देबश्री रॉय]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[ऋतुपर्णा सेनगुप्ता]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[अर्चना (अभिनेत्री)]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[लक्ष्मी प्रिया चंद्रमौली]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[रेहाना सुलतान]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[मोनिषा उन्नी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १९:३०, ३ मे २०२५ (IST) == Feminism and Folklore 2025 - Local prize winners == [[File:Feminism and Folklore 2025 logo.svg|centre|550px|frameless]] ::<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr"> ''{{int:please-translate}}'' Dear Wikimedian, Congratulations on your outstanding achievement in winning a local prize in the '''Feminism and Folklore 2025''' writing competition! We truly appreciate your dedication and the valuable contribution you’ve made in documenting local folk culture and highlighting women’s representation on your local Wikipedia. To claim your prize, please complete the [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdONlpmv1iTrvXnXbHPlfFzUcuF71obJKtPGkycgjGObQ4ShA/viewform?usp=dialog prize form] by July 5th, 2025. Kindly note that after this date, the form will be closed and submissions will no longer be accepted. Please also note that all prizes will be awarded in the form of [https://www.tremendous.com/ Tremendous Vouchers] only. If you have any questions or need assistance, feel free to contact us via your talk page or email. We're happy to help. Warm regards, [[:m:Feminism and Folklore 2025|FNF 2025 International Team]] ::::Stay connected [[File:B&W Facebook icon.png|link=https://www.facebook.com/feminismandfolklore/|30x30px]]&nbsp; [[File:B&W Twitter icon.png|link=https://twitter.com/wikifolklore|30x30px]] </div> --[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १५:५०, २१ जून २०२५ (IST) <!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf25&oldid=28891702 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> j47floj315usflbf0v2klapsnopf80f विकिपीडिया:मोबाईल संपादन 4 145220 2581403 2504078 2025-06-21T01:54:34Z 2409:40C2:3010:1E9:8000:0:0:0 Dr Pandurang Kumbhar+917722004422+917744002255 2581403 wikitext text/x-wiki *'''मोबाईल संपादन''' ('''भ्रमणध्वनी संपादन''') म्हणजेच मोबाईलच्या माध्यमातून/मोबाईल वापरुन मराठी विकिपीडियाच्या मोबाईल आवृत्तीवर केलेले संपादन होय. *[https://mr.m.wikipedia.org मराठी विकिपीडियाची मोबाईल आवृत्ती येथे पाहा] * Dr Pandurang Kumbhar+917722004422+917744002255 #पुनर्निर्देशन [[विकिपीडिया:मोबाईल साहाय्य]] 64d9typfks9se1tvi225soexg82rsni 2581405 2581403 2025-06-21T02:20:43Z संतोष गोरे 135680 [[Special:Contributions/2409:40C2:3010:1E9:8000:0:0:0|2409:40C2:3010:1E9:8000:0:0:0]] ([[User talk:2409:40C2:3010:1E9:8000:0:0:0|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:Khirid Harshad|Khirid Harshad]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. 1863498 wikitext text/x-wiki *'''मोबाईल संपादन''' ('''भ्रमणध्वनी संपादन''') म्हणजेच मोबाईलच्या माध्यमातून/मोबाईल वापरुन मराठी विकिपीडियाच्या मोबाईल आवृत्तीवर केलेले संपादन होय. *[https://mr.m.wikipedia.org मराठी विकिपीडियाची मोबाईल आवृत्ती येथे पाहा] * #पुनर्निर्देशन [[विकिपीडिया:मोबाईल साहाय्य]] nn5owq5zuucydqnsl2elu04ehv0j5rj 2581421 2581405 2025-06-21T03:51:28Z 103.185.174.191 2581421 wikitext text/x-wiki *'''मोबाईल संपादन''' ('''भ्रमणध्वनी संपादन''') म्हणजेच मोबाईलच्या माध्यमातून/मोबाईल वापरुन मराठी विकिपीडियाच्या मोबाईल आवृत्तीवर केलेले संपादन होय. *[https://mr.m.wikipedia.org मराठी विकिपीडियाची मोबाईल आवृत्ती येथे पाहा] *[[विकिपीडिया:मोबाईल साहाय्य]] 3guxlm7pt1zh4hemvjzflr7ywd1rvea मसूदा:जे-की संग 118 159697 2581443 2525956 2025-06-21T04:59:13Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[जे-की संग]] वरुन [[मसूदा:जे-की संग]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 2525956 wikitext text/x-wiki {{मट्रा अनुवादीत}} {{बदल}} '''षेओङ् जेगि'''([[कोरिया]]: 성재기 [[नवी चिनी चित्रलिपी]]: 成在基, [[सप्टेंबर ११]], [[इ.स. १९६७]]:[[दैगू]] - [[जुलै २६]], [[इ.स. २०१३]]:[[सोल]]) [[दक्षिण कोरिया|दक्षिण कोरियन]] मानवाधिकार कार्यकर्ते<ref>[http://www.hani.co.kr/arti/english_edition/e_national/599060.html Han River rescue team struggles with increased suicide attempts] HanKyorye 2013.08.11 ([[इंग्रजी]])</ref>, स्वयंसेवी कार्यकर्ते<ref>[http://www.koreatimes.co.kr/www/news/culture/2014/03/141_154369.html 'Avengers' add to Mapo Bridge's strange history] koreatimes 2014.03.30 ([[इंग्रजी]]) </ref>, उदारमतवाद तत्त्वज्ञानी. [[इ.स. २००८]] [[कोरियन नर संघटना]](남성연대 男性連帶) या नेत्याचे आणि, त्याच्या उदारमतवाद लढणारा. [[इ.स. १९९९]] पर्यंत [[इ.स. २०१३]] तो उदारमतवाद चळवळ आणि लिंग लिबरेशन हालचाली होते. [[जुलै २६]], [[इ.स. २०१३]], तो [[सोल]] मध्ये आत्महत्या होता<ref>[http://www.koreatimes.co.kr/www/news/nation/2013/07/116_140056.html Activist missing for 3rd day] koreatimes 2013.07.28 ([[इंग्रजी]])</ref>, निषेध [[लिंग भेदभाव]] यानंतर [[पुरुष]] [[यौन उत्पीड़न]]. == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == * [http://stream.aljazeera.com/story/201307292238-0022943 South Korean channel films suicide] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20130801233640/http://stream.aljazeera.com/story/201307292238-0022943 |date=2013-08-01 }} aljazeera ([[इंग्रजी]]) * [http://www.koreatimes.co.kr/www/news/culture/2014/03/141_154369.html 'Avengers' add to Mapo Bridge's strange history] koreatimes 2014.03.30 ([[इंग्रजी]]) * [http://www.koreatimes.co.kr/www/news/nation/2013/07/116_140056.html Activist missing for 3rd day] koreatimes 2013.07.28 ([[इंग्रजी]]) * [http://khnews.kheraldm.com/view.php?ud=20130729000881&md=20130801004231_BK Body of Sung Jae-gi found in Han River] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20140819085213/http://khnews.kheraldm.com/view.php?ud=20130729000881&md=20130801004231_BK |date=2014-08-19 }} The Korea Herald 2013.07.29 ([[इंग्रजी]]) [[वर्ग:दक्षिण कोरियन व्यक्ती]] [[वर्ग:आत्महत्या]] [[वर्ग:तत्त्वज्ञ]] [[वर्ग:दक्षिण कोरिया]] 7ilf77xvtgpbmryneyzr8jk6bkh2rt0 मसूदा:कुणाल देशमुख 118 160123 2581501 2036987 2025-06-21T06:08:29Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[कुणाल देशमुख]] वरुन [[मसूदा:कुणाल देशमुख]] ला हलविला 2036987 wikitext text/x-wiki {{मट्रा अनुवादीत}} [[चित्र:Kunal Deshmukh.jpg|इवलेसे]] '''कुणाल देशमुख''' (जन्म : ४ मार्च १९८२ जन्मलेल्या मुंबई, महाराष्ट्र, भारत) हा एक भारतीय दिग्दर्शक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bollywoodhungama.com/|title=Bollywood News, New Hindi Movies, Reviews, Latest Videos, Images, Free HD Wallpapers - Bollywood Hungama|last=Hungama|first=Bollywood|language=en|access-date=2021-05-12}}</ref> कुणाल देशमुख भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि उपहारगृहाचा व्यवस्थापक किंवा मालक आहे. त्यांनी मुंबई, भारतात मोठा झाला . <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.mid-day.com/news/india-news/article/City-lures-film-director-into-a-tasty-business-41103|title=City lures film director into a tasty business|website=Mid-day|language=en|access-date=2021-05-12}}</ref> == पूर्व जीवन आणि शिक्षण == आर्य विद्या मंदिर, बांद्रा, मुंबई आणि जय हिंद, चर्च गेट येथील ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्याने एचआर कॉलेज येथे एक जाहिरात अभ्यासक्रम केला. पुढे filmmaking पदविका अभ्यासक्रम साठी अमेरिका गेला . == कारकीर्द == त्यांनी दिग्दर्शक मोहित सुरी आणि विशेष फिल्म्स अंतर्गत," जहर " मध्ये सहायक संचालक (२००५ ), कलयुग आणि वोह लम्हे (२००६ ) म्हणून कारकीर्द सुरू. ऑक्टोबर २००६ मध्ये त्यांनी स्क्रिप्ट काम त्याची नोकरी बाहेर या. त्यांनी विशेष फिल्म्स निर्मीत इम्रान हाश्मी , यामध्ये, २००८ मध्ये त्याच्या निदेशक पदार्पण जन्नत केली . जन्नत २००८ मध्ये प्रकाशीत आणि यशस्वी झाली .त्यांनी इम्रान हाश्मी आणि सोहा अली खान यामध्ये, २६ जुलै २००५ मुंबई पूर आधारित, २००९" तुम मिले" चित्रपट केले.२०१२ मध्ये जन्नत २ , जन्नत एक पर्यवसान प्रसिद्ध झाले आणि प्रचंड यश मिळाले. == चित्रपटांची सूची == * राजा नटवरलाल (२०१४ ) * जन्नत २ (२०१२ ) * तुम मिले (२००९ ) * जन्नत (२००८ ) * वोह लम्हे (२००६ ) (मुख्य सहाय्यक दिग्दर्शक) * कलयुग (२००५ ) (मुख्य सहाय्यक दिग्दर्शक) * जहर (२००५ ) (सहाय्यक दिग्दर्शक) == संदर्भ == <references /> [[वर्ग:चित्रपट दिग्दर्शक]] [[वर्ग:भारतीय चित्रपट दिग्दर्शक]] fwwm2zitc6srslin78gio149urhqzxh चर्चा:नरेंद्र मोदी 1 165308 2581549 2184201 2025-06-21T08:54:19Z Rajuvistaarr 172825 /* real estste */ नवीन विभाग 2581549 wikitext text/x-wiki == real estste == '''Shapoorji Pallonji Sector 46''' comfortable and convenient lifestyle. <mark>Shapoorji project housing development primum offering project-based -brainer, still here are a few signs that should tell you that a luxury apartment will benefit you: Your 3/4/ BHK</mark> apartment offering is builder-based ultra-luxury apartments. <mark>ranking on the first class of the sector and specifications 46 for relevant, liked your customers will find multiple projects when they look for a place in an</mark> <mark>apartment: Shapoorji Pallonji project properties have apartments with modern services or products they need.</mark> <mark>Shapoorji coming with luxurious Club house & more than offers Luxury 3/4 BHK Starts ₹5.77 Cr* competitors!</mark> {| class="wikitable" |https://shapoorjipallonjigurgaon46.wordpress.com/2025/06/21/shapoorji-pallonji-sector-46-gurgaon-booking-ready-in-city/ |} [[सदस्य:Rajuvistaarr|Rajuvistaarr]] ([[सदस्य चर्चा:Rajuvistaarr|चर्चा]]) १४:२४, २१ जून २०२५ (IST) 0187spvqnuoq7o15oummcwesimslyn2 2581551 2581549 2025-06-21T09:08:27Z अभय नातू 206 [[Special:Contributions/Rajuvistaarr|Rajuvistaarr]] ([[User talk:Rajuvistaarr|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:Rohini|Rohini]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. 2184201 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 मसूदा:हिब्रू विद्यापीठ (जेरुसलेम) 118 179399 2581510 2568856 2025-06-21T06:19:18Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[हिब्रू विद्यापीठ (जेरुसलेम)]] वरुन [[मसूदा:हिब्रू विद्यापीठ (जेरुसलेम)]] ला हलविला 1764461 wikitext text/x-wiki {{Coord|31|46|33|N|35|12|00|E|region:IL_type:city|display=title}} [[File:HebrewU-MtScopus.JPG|thumb|250px|right|alt=]] {{मट्रा}} '''जेरुसलेम येथील हिब्रू विद्यापीठ''' इस्राएल राष्ट्रीय विद्यापीठ आहे. हे [[यरुशलेम]] मध्ये स्थित आहे. तीन कँपस इस्राएल उघडण्यासाठी पहिल्या विद्यापीठ होते. == बाह्य दुवे == {{Commonscat|Hebrew University of Jerusalem}} * [http://www.huji.ac.il/huji/eng/index_e.htm Hebrew University] [[श्रेणी:विश्वविद्यालयहरू]] fdbm5lizqqcim9ycvgxoaruxjqrhlm8 आंबा (शाहूवाडी) 0 189937 2581310 2475584 2025-06-20T13:12:00Z Khirid Harshad 138639 2581310 wikitext text/x-wiki {{हा लेख|कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा गाव|आंबा (निःसंदिग्धीकरण)}} '''आंबा''' [[कोल्हापूर]]-[[रत्‍नागिरी]] रस्त्यावर [[आंबा घाट|आंबा घाटाच्या]] आधी हे गाव आहे. पर्यावरणदृष्ट्या जैवविविधतेने विशेष करून संपन्न आणि प्रसिद्ध असलेल्या पश्चिम घाटामध्ये आंबा हे गाव आहे.थंड हवा आणि निसर्गरम्य परिसर यामुळे हे गाव पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |जनगणना_स्थलनिर्देशांक=567026 |स्थानिक_नाव=आंबा |तालुका_नाव=शाहूवाडी |जिल्हा_नाव=कोल्हापूर |राज्य_नाव =महाराष्ट्र |विभाग= पुणे |जिल्हा=[[कोल्हापूर]] |तालुका_नावे =[[शाहूवाडी]] |जवळचे_शहर =[[मलकापूर]] |अक्षांश= 16.975 |रेखांश=73.796 |शोधक_स्थान =right |क्षेत्रफळ_एकूण=9.19 |उंची=599.81 |लोकसंख्या_एकूण=1195 |लोकसंख्या_वर्ष=२०११ |लोकसंख्या_घनता=130 |लोकसंख्या_पुरुष=619 |लोकसंख्या_स्त्री=576 |लिंग_गुणोत्तर=930 |अधिकृत_भाषा=[[मराठी]] }} [[चित्र:देवराई.jpg|इवलेसे|आंबेश्वर देवराई]] ==लोकसंख्या व भौगोलिक स्थान== आंबा गावाच्या सर्वात जवळचे शहर [[मलकापूर]] ११ किलोमीटर अंतरावर आहे. हे ९१९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २५६ कुटुंबे व एकूण ११९५ लोकसंख्या आहे. यामध्ये ६१९ पुरुष आणि ५७६ स्त्रिया आहेत. यामध्ये [[अनुसूचित जाती]]चे लोक ७८ असून [[अनुसूचित जमाती]]चे ११ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६७०२६ आहे.<ref>http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/DCHB.html</ref> == साक्षरता == * एकूण साक्षर लोकसंख्या: ८०१ * साक्षर पुरुष लोकसंख्या: ४४३ (७१.५७%) * साक्षर स्त्री लोकसंख्या: ३५८ (६२.१५%) ==व्यवसाय== गावातील बहुतेक लोकांचा [[शेती]] हा व्यवसाय असून ते पावसाच्या पाण्यावर भात, [[नाचणी]] अशी पिके घेतात. काही शेतकरी कलिंगड, बटाटे अशी पिके सुद्धा घेतात. गावात पर्यटन व्यवसायाला चांगली चालना मिळालेली असल्यामुळे अनेक लोक रिसॉर्टमध्ये काम करतात.काही गावकऱ्यांची स्वतःच्या मालकीची रिसॉर्टसुद्धा आहेत. ==जैवविविधता== हा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. ===वनस्पती=== आंबा आणि परिसरातील जंगलात [[आंबा]],[[जांभूळ]],[[पायर]],[[कदंब]],[[दालचिनी]],[[आवळा]],[[हिरडा]],[[बेहडा]],[[कडीलिंब]],[[बकुळ]],[[कुंकूफळ]],[[आळू]],[[सुरू]],[[साग]],[[बांबू]],[[तोरण]],[[कुंभा]],[[कोकम]],[[कटक वृक्ष]],[[कुडा|कुड्याचे]] चांदकुडा, पांढरा कुडा, कृष्ण कुडा, नागल कुडा हे प्रकार, राळधूप,[[सीतेचा अशोक]], काळा उंबर, भुई उंबर, साधा उंबर हे [[उंबर|उंबराचे प्रकार]],[[आवळा]] इ. वृक्ष आहेत. मोठ्या प्रमाणावर करवंदाच्या जाळ्या आहेत. ===प्राणी=== आंबा आणि परिसरातील जंगलात [[बिबट्या]],[[शेकरू]],[[गवा]],[[ससा]],[[अजगर]],[[साप]],[[खार]] इ. प्राणी आढळतात. ===पक्षी=== आंबा आणि परिसरातील जंगलात [[शिपाई बुलबुल]],[[लाल बुडाचा बुलबुल]], [[खाटीक]],[[वेडा राघू]], [[घार]], [[कापशी घार]],[[ब्राह्मणी घार]], [[मलबार धनेश]],[[मोठा भारतीय धनेश]], [[सर्पगरुड]], [[स्वर्गीय नर्तक]],[[हरीयल]],[[रान कोंबडा]],[[ब्राहमणी मैना]],[[काडीवाली पाकोळी]],[[टिटवी]] इ. पक्षी आढळतात. पायरच्या झाडाला फळे आली की मोठे भारतीय धनेश हमखास जंगलातून गावात फळे खाण्यासाठी येतात.[[भारतीय पिट्टा]] उर्फ [[नवरंग]], ब्लॅकबर्ड {{मराठी शब्द सुचवा}}, धोबी हे स्थलांतरीत पक्षी सुद्धा आढळतात. ===फुलपाखरे=== आंबा आणि परीसर विविध प्रकारच्या वनस्पतींनी समृद्ध असल्यामुळे येथे असंख्य जातींची फुलपाखरे आढळतात.महाराष्ट्राचे राज्य [[फुलपाखरू]] असलेले [[ब्लू मॉरमॉन|ब्ल्यू मॉरमॉन]] हे आकाराने बरेच मोठे असलेले आणि सुंदर फुलपाखरू सुद्धा येथे आढळते. ==पर्यटनस्थळे== [[चित्र:आंबेश्वर.jpg|इवलेसे|आंबेश्वर मंदिर]] ===आंबेश्वर देवालय === येथील आंबेश्वर देवालय महाराष्ट्रातील जुन्या देवरायांपैकी एका देवराईमध्ये आहे.सुमारे 4 एकर परिसरात ही देवराई पसरलेली आहे. सुमारे 300 ते 400 वर्षे जुनी आहे. [[देवराई]] मधील वृक्ष तोडले जात नसल्यामुळे ही देवराई घनदाट आहे आणि मानवी हस्तक्षेप कमी असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता सुद्धा आढळते. आंबेश्वर मंदिरात शंकराची पिंड आहे. हे ग्रामदैवत आहे. तसेच विठ्ठलाई, नवलाई, वाघजाई, खानजाई, चांदभैरी या इतर ग्रामदेवतांच्या मूर्ती मंदिरात आहेत.नवरात्रामध्ये उपास करणारे भक्त नऊ दिवस देवळातच मुक्काम करतात, अशी येथील प्रथा आहे. देवाला कौल लावण्याची प्रथा सुद्धा आहे. मंदिरासमोर एक दीपमाळ आहे. तसेच [[वीरगळ]] आहे. ====देवराईतील वनस्पती==== देवराईमध्ये [[सोनचाफा]], [[कोकम]], [[काटेसावर]],[[आंबा]],[[पिम्पारणी]],[[वड]],[[किंजळ]],[[बांबू]],[[कदंब]],[[सातवीण]] असे अतिशय उंच वाढलेले वृक्ष आढळतात. अनेक वनौषधींनी ही देवराई समृद्ध आहे. ===पावनखिंड === आंब्यापासून जवळच [[पावनखिंड]] हे [[बाजीप्रभू देशपांडे]] यांच्या शौर्यामुळे प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक ठिकाण आहे. * कोकण कडा * मानोली धरण ==शैक्षणिक सुविधा== आंब्यामध्ये ''आंबा हायस्कूल'' ही माध्यमिक शाळा आहे. ==माहिती केंद्र== पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या दृष्टीने आंबा हे महत्त्वाचे ठिकाण असल्यामुळे येथे वनखात्याच्या वतीने 'निसर्ग माहिती केंद्र' चालवले जाते. परिसरात आढळणाऱ्या जैव विविधतेविषयी माहिती येथे दिली जाते. == जमिनीचा वापर == [[चित्र:NrusinhMandir.jpg|इवलेसे|नृसिंह मंदिर]] आंबा ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): * [[वन]]: ३२०.६८ * बिगरशेती वापरात असलेली जमीन: १८.७७ * लागवडीयोग्य पडीक जमीन: १९.१३ * पिकांखालची जमीन: ५६०.४२ * एकूण कोरडवाहू जमीन: ७.४ * एकूण बागायती जमीन: ५५३.०२ == सण आणि उत्सव == दरवर्षी नृसिंह जयंतीच्या दिवशी गावात जत्रा भरवली जाते. == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} [[वर्ग:महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे]] [[वर्ग:जैवविविधता असलेली ठिकाणे]] [[वर्ग:पश्चिम घाटातील पर्यटन स्थळे]] [[वर्ग:शाहूवाडी तालुक्यातील गावे]] [[वर्ग:कोल्हापूर जिल्ह्यातील गावे]] t0c8g5nekm6aavd8xohk5rm0ipezwzw गिरगाव (शाहूवाडी) 0 192714 2581308 2475460 2025-06-20T13:10:26Z Khirid Harshad 138639 removed [[Category:कोल्हापूर]] - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581308 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |जनगणना_स्थलनिर्देशांक=567071 |स्थानिक_नाव=गिरगाव |तालुका_नाव=शाहूवाडी |जिल्हा_नाव=कोल्हापूर |राज्य_नाव =महाराष्ट्र |विभाग=पुणे |जिल्हा=[[कोल्हापूर]] |तालुका_नावे =[[शाहूवाडी]] |जवळचे_शहर =मलकापूर |अक्षांश= 16.824 |रेखांश= 73.860 |शोधक_स्थान =right |क्षेत्रफळ_एकूण=14.44 |उंची= 667.2 |लोकसंख्या_एकूण=603 |लोकसंख्या_वर्ष=२०११ |लोकसंख्या_घनता=41 |लोकसंख्या_पुरुष=299 |लोकसंख्या_स्त्री=304 |लिंग_गुणोत्तर=1016 |अधिकृत_भाषा=[[मराठी]] }} '''गिरगाव''' हे [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर]] जिल्ह्यातल्या [[शाहूवाडी|शाहूवाडी तालुक्यातील]] १४४३.६ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. ==लोकसंख्या== गिरगाव हे [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर]] जिल्ह्यातल्या [[शाहूवाडी|शाहूवाडी तालुक्यातील]] १४४३.६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १०८ कुटुंबे व एकूण ६०३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर मलकापूर २५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २९९ पुरुष आणि ३०४ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १३१ आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६७०७१ <ref>http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/DCHB.html</ref> आहे. == साक्षरता == * एकूण साक्षर लोकसंख्या: ३२३ * साक्षर पुरुष लोकसंख्या: १६६ (५५.५२%) * साक्षर स्त्री लोकसंख्या: १५७ (५१.६४%) == शैक्षणिक सुविधा == गावात दोन शासकीय [[पूर्व प्राथमिक शिक्षण|पूर्व-प्राथमिक]] [[शाळा]], तीन शासकीय [[प्राथमिक शाळा]] व एक शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. सर्वात जवळील [[माध्यमिक शाळा]] पानुंद्रे येथे १५ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील [[उच्च माध्यमिक शिक्षण|उच्च माध्यमिक शाळा]] मलकापूर येथे २८ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील [[महाविद्यालय|पदवी महाविद्यालय]],[[अभियांत्रिकी|अभियांत्रिकी महाविद्यालय]],वैद्यकीय महाविद्यालय,व्यवस्थापन संस्था,पॉलिटेक्निक व अपंगांसाठी खास शाळा [[कोल्हापूर]] येथे ५२ किलोमीटर अंतरावर आहे. == वैद्यकीय सुविधा (शासकीय) == सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील [[प्राथमिक आरोग्य केंद्र]] १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील [[प्रसूती|प्रसूति व बालकल्याण केंद्र]] १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील [[ॲलोपॅथी]] रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. == पिण्याचे पाणी == गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे.गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे.गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. == स्वच्छता == गावात गटारव्यवस्था नाही. सांडपाणी थेट जलनिस्सारण केंद्रात सोडले जाते.या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे.गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. == संपर्क व दळणवळण == गावात पोस्ट व तार ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट व तार ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावाचा [[पिन कोड]] ४१५१०१ आहे. गावात [[दूरध्वनी]] उपलब्ध नाही.सर्वात जवळील [[दूरध्वनी]] ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात शासकीय [[बस]] सेवा उपलब्ध आहे. [[राज्य महामार्ग (भारत)|राज्य महामार्ग]] गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील [[राज्य महामार्ग (भारत)|राज्य महामार्ग]] १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. सर्वात जवळील पक्का रस्ता ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. == बाजार व पतव्यवस्था == गावात एटीएम नाही. सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात व्यापारी बँक नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात [[सहकारी संस्था|सहकारी बँक]] उपलब्ध नाही.सर्वात जवळील [[सहकारी संस्था|सहकारी बँक]] १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध नाही.सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. गावात रेशन दुकान उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेशन दुकान ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. == आरोग्य == गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे.गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात [[आरोग्य|आशा]] स्वयंसेविका उपलब्ध नाही.सर्वात जवळील [[आरोग्य|आशा]] स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात [[विधानसभा मतदारसंघ|विधानसभा]] मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील [[विधानसभा मतदारसंघ|विधानसभा]] मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात [[जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी कायदा|जन्म व मृत्यु नोंदणी]] केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील [[जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी कायदा|जन्म व मृत्यु नोंदणी]] केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. == वीज == प्रतिदिवस १२ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. == जमिनीचा वापर == गिरगाव ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): * [[वन]]: ५३९.५९ * बिगरशेती वापरात असलेली जमीन: २.७५ * कायमस्वरूपी पडीक जमीन: ९३.७२ * पिकांखालची जमीन: ८०७.५४ * एकूण बागायती जमीन: ८०७.५४ [[File:150322-Bauxit.jpg|thumb|बॉक्साईट खनिज]] == खनिज उत्खनन== गावामध्ये बॉक्साईट खनिजाचे उत्खनन होते. == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} [[वर्ग:शाहूवाडी तालुक्यातील गावे]] [[वर्ग:कोल्हापूर जिल्ह्यातील गावे]] [[वर्ग:आशा स्वयंसेविका उपलब्ध नसलेली गावे]] geo56fqg0k28hqchuec8voeqfwri9pz धनगरवाडी (शाहूवाडी) 0 193765 2581307 2475449 2025-06-20T13:09:01Z Khirid Harshad 138639 removed [[Category:कोल्हापूर]] - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581307 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |जनगणना_स्थलनिर्देशांक=567038 |स्थानिक_नाव=धनगरवाडी |तालुका_नाव=शाहूवाडी |जिल्हा_नाव=कोल्हापूर |राज्य_नाव =महाराष्ट्र |विभाग=पुणे |जिल्हा=[[कोल्हापूर]] |तालुका_नावे =[[शाहूवाडी]] |जवळचे_शहर =मलकापूर |अक्षांश=16.911 |रेखांश=73.833 |शोधक_स्थान =right |क्षेत्रफळ_एकूण=6.13 |उंची=998.543 |लोकसंख्या_एकूण=312 |लोकसंख्या_वर्ष=२०११ |लोकसंख्या_घनता=50 |लोकसंख्या_पुरुष=159 |लोकसंख्या_स्त्री=153 |लिंग_गुणोत्तर=962 |अधिकृत_भाषा=[[मराठी]] }} '''धनगरवाडी''' हे [[कोल्हापूर जिल्हा | कोल्हापूर]] जिल्ह्यातल्या [[शाहूवाडी|शाहूवाडी तालुक्यातील]] ६१३ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. ==लोकसंख्या == धनगरवाडी हे [[कोल्हापूर जिल्हा | कोल्हापूर]] जिल्ह्यातल्या [[शाहूवाडी |शाहूवाडी तालुक्यातील]] ६१३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ६० कुटुंबे व एकूण ३१२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर मलकापूर १५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १५९ पुरुष आणि १५३ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक २१ आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६७०३८<ref>http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/DCHB.html</ref> आहे. == साक्षरता == * एकूण साक्षर लोकसंख्या: १६२ * साक्षर पुरुष लोकसंख्या: ८५ (५३.४६%) * साक्षर स्त्री लोकसंख्या: ७७ (५०.३३%) == शैक्षणिक सुविधा == गावात एक शासकीय [[पूर्व प्राथमिक शिक्षण|पूर्व-प्राथमिक]] [[शाळा]], एक शासकीय [[प्राथमिक शाळा]] आहे. जवळील शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा माण येथे ८ किमी अंतरावर आहे. सर्वात जवळील [[माध्यमिक शाळा]], [[उच्च माध्यमिक शिक्षण|उच्च माध्यमिक शाळा]] व [[महाविद्यालय|पदवी महाविद्यालय]] मलकापूर येथे १५ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, व्यवस्थापन संस्था व अपंगांसाठी खास शाळा कोल्हापूर येथे ६० किलोमीटर अंतरावर आहे. == वैद्यकीय सुविधा (शासकीय) == सर्वात जवळील [[प्राथमिक आरोग्य केंद्र]] १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील [[प्रसूती| प्रसूति व बालकल्याण केंद्र]] १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील [[ॲलोपॅथी]] रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. == पिण्याचे पाणी == गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. == स्वच्छता == गावात गटारव्यवस्था नाही. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. == जमिनीचा वापर == धनगरवाडी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): * [[वन]]: १९० * बिगरशेती वापरात असलेली जमीन: २ * ओसाड व लागवडीला अयोग्य जमीन: ५० * कुरणे व इतर चराऊ जमीन: १८० * लागवडीयोग्य पडीक जमीन: १०१ * पिकांखालची जमीन: ९० * एकूण कोरडवाहू जमीन: ४१ * एकूण बागायती जमीन: ४९ == [[सिंचन]] सुविधा == सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): * विहिरी / कूप नलिका: ४१ [[File:धनगरवाडी बॉक्साईट खाण.png|thumb|धनगरवाडी येथील बॉक्साईट खाण]] == खनिज उत्खनन== महाराष्ट्र सरकारच्या नागपूर येथील हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला, धनगरवाडी गावाच्या परिसरातील ४१.८० हेक्टर क्षेत्र बॉक्साईट या खनिजाच्या उत्खननासाठी लीजवर दिले आहे. हा लीज इ.स. २०३८ साली संपेल. [[वर्ग:शाहूवाडी तालुक्यातील गावे]] [[वर्ग:कोल्हापूर जिल्ह्यातील गावे]] [[वर्ग:पश्चिम घाटातील खनिज उत्खनन]] mcf4g0stobh3nsbg16rk800ka0nj8qz मसूदा:जस्टिन चाव 118 197815 2581381 2204572 2025-06-20T20:51:53Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[जस्टिन चाव]] वरुन [[मसूदा:जस्टिन चाव]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 2204572 wikitext text/x-wiki {{मट्रा}} {{माहितीचौकट मंत्री | सन्मानवाचक पूर्वप्रत्यय = | नाव = जस्टीन चाव | सन्मानवाचक प्रत्यय= | चित्र = Guang Hua Digital Plaza Launch Justin Chou.jpg | चित्र शीर्षक = २००८ चा चित्र | चित्र आकारमान= 220px | पद = | मागील = | पुढील = | कार्यकाळ_आरंभ = १ फेब्रुवारी २००५ | कार्यकाळ_समाप्ती = १ जानेवारी २००५ | पद1 = लेगीसलेटिव्ह युआन चा सदस्य | कार्यकाळ_आरंभ1 = | कार्यकाळ_समाप्ती1 = <!-- अंक बदलून आठ वेळा वापरू शकतो --> | मतदारसंघ1 =[[तैपेई]] | मागील1 = पासूया याओ | पुढील1 = <!-- अंक बदलून आठ वेळा वापरू शकतो --> | जन्मदिनांक = २७ ऑगस्ट १९६६ | जन्मस्थान = [[तैपेई]], [[तैवान]] | मृत्युदिनांक = | मृत्युस्थान = | राष्ट्रीयत्व = तैवानी | पक्ष = कुमिंटांग | इतरपक्ष = | पती = | पत्नी = | नाते = | अपत्ये = | निवास = | शाळा_महाविद्यालय = | व्यवसाय = | धंदा = | धर्म = | सही = | संकेतस्थळ = | तळटीपा = }} '''जस्टीन चाव''' (चीनी रूपांतर ={{zh|t=周守訓 |p=Zhōu Shǒuxùn}}; जन्म २७ ऑगस्ट १९६६) <big>एक तैवानी नेता आहे.</big> ==शिक्षण== चाव चीहीसो व यान पिंग विद्यापीठ मध्ये प्रतामिक शिक्षण करून शिन हिसन युनिव्हर्सिटी मधून पदवी घेतली . युनिट्ड स्टाइस मधली कॉर्नल युनिव्हर्सिटी पासून त्यांनी पीएचडी केली.<ref>{{स्रोत बातमी|title=Justin S. Chou (6)|दुवा=http://www.ly.gov.tw/en/03_leg/legIntro.action?lgno=00056&stage=6|agency=Legislative Yuan}}</ref> ==राजकीय कारकीर्द== चाव आपले राजनीतिक कामे कौमिंटांग पार्टीच्या प्रवक्ते म्हणून झाले तेच जास्तकरून पार्टीच्या संस्कृती आणि संवादाचे काम सांभाळायचे<ref>{{स्रोत बातमी|last1=Chuang|first1=Jimmy|title=KMT says cooking classes not corrupt|दुवा=http://www.taipeitimes.com/News/front/archives/2001/11/09/0000110738|accessdate=6 November 2016|work=Taipei Times|date=9 November 2001}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last1=Low|first1=Stephanie|title=KMT demands probe into stabilization fund's losses|दुवा=http://www.taipeitimes.com/News/front/archives/2001/11/20/0000112288|accessdate=6 November 2016|work=Taipei Times|date=20 November 2001}}</ref> नंतर ते कंमितीचे शिस्तन्त डायरेक्टर झाले.<ref>{{स्रोत बातमी|last1=Tsai|first1=Ting-i|title=Half the nation pleased with the way Chen rules|दुवा=http://www.taipeitimes.com/News/taiwan/archives/2002/05/17/0000136389|accessdate=6 November 2016|work=Taipei Times|date=17 May 2002}}</ref> पुढील वर्षी, चाव तारणावर चॅन आणि जेम्स सूनग २००४ राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संयुक्त तिकीट रिंगणात कोण प्रतिनिधित्व होते.<ref>{{स्रोत बातमी|last1=Huang|first1=Tai-lin|title=Lien's campaign TV ads to stress love for Taiwan|दुवा=http://www.taipeitimes.com/News/taiwan/archives/2003/10/07/2003070722|accessdate=6 November 2016|work=Taipei Times|date=17 October 2003}}</ref><ref>{{स्रोत बातमी|title=Lien Chan doesn't want his son to marry a foreigner|दुवा=http://www.taipeitimes.com/News/taiwan/archives/2004/03/05/2003101183|accessdate=6 November 2016|work=Taipei Times|date=5 March 2004}}</ref> चाव पहिल्या विधान युआनला पॅन-ब्लू युतीच्या राष्ट्रपती पदाच्या तिकीट नुकसान असूनही, की वर्षी विधान निवडणुकीत निवडून आले.<ref>{{स्रोत बातमी|last1=Lin|first1=Jean|title=Legislators say foreign aid should be monitored|दुवा=http://www.taipeitimes.com/News/taiwan/archives/2006/05/12/2003307514|accessdate=6 November 2016|work=Taipei Times|date=12 May 2006}}</ref> त्यानंतर पासूया याओ त्याच्या २०१२<ref>{{स्रोत बातमी|last1=Mo|first1=Yan-chih|title=Chen Yu-mei drops out of KMT Datong legislative primary|दुवा=http://www.taipeitimes.com/News/taiwan/archives/2011/04/06/2003500044|accessdate=6 November 2016|work=Taipei Times|date=6 April 2011}}</ref> पूर्ण मतदान बोली गमावले ती एप्रिल २०११.चाव बाहेर पडलो पर्यंत चाव चेन यु-मे विरोधात प्राथमिक चेहऱ्याचा<ref>{{स्रोत बातमी|last1=Shan|first1=Shelley|title=DPP criticizes NCC nomination|दुवा=http://www.taipeitimes.com/News/taiwan/archives/2012/12/09/2003549723|accessdate=6 November 2016|work=Taipei Times|date=9 December 2012}}</ref> आमदार म्हणून, चाव तैवान परराष्ट्र संबंध, इमिग्रेशन,आणि सार्वजनिक सुरक्षितता, शिक्षण। <ref>{{स्रोत बातमी|last1=Wang|first1=Yu-chung|title=Academia Historica officials disciplined over Deng ruckus|दुवा=http://www.taipeitimes.com/News/taiwan/archives/2010/12/12/2003490753|accessdate=6 November 2016|work=Taipei Times|date=12 December 2010}}</ref><ref>{{स्रोत बातमी|title=Cursive writing to be taught|दुवा=http://www.taipeitimes.com/News/taiwan/archives/2010/10/30/2003487279|accessdate=6 November 2016|work=Taipei Times|date=30 October 2010}}</ref> विषयांवर सहभाग होता. तो वारंवार आंतरराष्ट्रीय मंचावर तैवान त्याच्या दडपशाही चीन टीका केली आहे.<ref>{{स्रोत बातमी|last1=Hsu|first1=Jenny W.|last2=Shih|first2=Hsiu-chuan|title=Parties condemn ‘harassment’ of Taiwan student|दुवा=http://www.taipeitimes.com/News/front/archives/2009/12/09/2003460539|accessdate=6 November 2016|work=Taipei Times|date=9 December 2009}}</ref><ref>{{स्रोत बातमी|title=DPP, KMT slam Venezuela for refusing sports visas|दुवा=http://www.taipeitimes.com/News/front/archives/2007/08/09/2003373300|accessdate=6 November 2016|work=Taipei Times|date=9 August 2007}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last1=Shih|first1=Hsiu-chuan|last2=Lee|first2=I-chia|title=Global participation to be expanded ‘within a year’|दुवा=http://www.taipeitimes.com/News/taiwan/archives/2011/05/24/2003504027/1|accessdate=6 November 2016|work=Taipei Times|date=24 May 2011}}</ref> ==मनोरंजन व्यवसाय== चाव देखील एक गायक आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून मनोरंजन उद्योगातील सक्रिय आहेत.<ref>{{स्रोत बातमी|last1=Lee|first1=Vico|title=The rallying call of politics|दुवा=http://www.taipeitimes.com/News/feat/archives/2004/03/14/2003102470|accessdate=6 November 2016|work=Taipei Times|date=13 March 2004}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last1=Chen|first1=David|title=Pop stop|दुवा=http://www.taipeitimes.com/News/feat/archives/2010/08/13/2003480266|accessdate=6 November 2016|work=Taipei Times|date=13 August 2010}}</ref> तो लष्करी ऑस्ट्रेलियातील आदिवासी सदस्य याची खात्री करण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण मंत्रालय काम करून कास्ट वेई कटयार-शंग 2011 चित्रपट सिद्दिकी गासडी मदत केली स्क्रीनवर दिसेल बंद वेळ लागू शकतात <ref>{{स्रोत बातमी|title=MND to lend aboriginal servicemen for movie [Director drafts Aboriginal servicemen for new film]|दुवा=http://www.chinapost.com.tw/taiwan/arts-and-leisure/2009/05/07/207172/MND-to.htm|accessdate=6 November 2016|work=China Post Taipei Times|agency=Central News Agency|date=7 May 2009|archiveurl=https://web.archive.org/web/20161107154943/http://www.chinapost.com.tw/taiwan/arts-and-leisure/2009/05/07/207172/MND-to.htm|archivedate=2016-11-07|url-status=bot: unknown}}</ref> ==वैयक्तिक== चाव दूरदर्शन प्रस्तुतकर्ता वांग यांनी युंग हो लग्न केले आहे.<ref>{{स्रोत बातमी|last1=Shan|first1=Shelley|title=Transportation Committee dismisses session because of minister’s absence|दुवा=http://www.taipeitimes.com/News/taiwan/archives/2012/12/14/2003550120|accessdate=6 November 2016|काम=Taipei Times|date=14 December 2012}}</ref> वांग 2012 मध्ये राष्ट्रीय कम्युनिकेशन्स आयोग निवड झाली, पण तिच्या उमेदवारी आढावा सतत विधिमंडळात प्रसिद्ध झाले होते<ref>{{स्रोत बातमी|last1=Shan|first1=Shelley|title=NCC nominee review hits a snag|दुवा=http://www.taipeitimes.com/News/taiwan/archives/2013/01/11/2003552283|accessdate=28 November 2016|work=Taipei Times|date=11 January 2013}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last1=Wang|first1=Chris|last2=Shih|first2=Hsiu-chuan|title=Lawmakers approve all FTC nominees|दुवा=http://www.taipeitimes.com/News/taiwan/archives/2013/01/15/2003552569|accessdate=27 November 2016|work=Taipei Times|date=15 January 2013}}</ref> ==संदर्भ== {{संदर्भयादी|30em}} {{commons category|Justin Chou}} [[वर्ग:इ.स. १९६६ मधील जन्म]] [[वर्ग:संदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे]] k4aj74qq0ole54546xrbgmha3ozutam भारत राष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांची यादी 0 199262 2581375 2462818 2025-06-20T20:39:21Z अभय नातू 206 /* पुरुष कसोटी कर्णधार */ 2581375 wikitext text/x-wiki भारतीय क्रिकेट संघांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलेल्या क्रिकेट खेळाडूंची ही यादी आहे. सदर यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या [[भारतीय क्रिकेट संघ|पुरुष]], [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|महिला]] आणि [[भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघ|युवा]] संघांच्या सर्व कर्णधारांचा समावेश आहे. ३१ मे १९२६ रोजी भारत, इंपिरियल क्रिकेट कॉन्फरन्स (आताची [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]])चा सदस्य बनला. २५ जून १९३२ रोजी [[लॉर्ड्स]]वर इंग्लंड संघाविरुद्ध खेळल्यानंतर [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]], [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]], [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]], [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] आणि [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]]नंतर भारत सहावे कसोटी खेळणारे राष्ट्र बनले. दुसऱ्या महायुद्धाआधी भारत फक्त ७ कसोटी सामने खेळला, ते सर्व इंग्लंडविरुद्ध, ज्यामधील ५ सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला तर २ सामने अनिर्णित राहिले. इतर प्रतिस्पर्ध्यासोबत त्यांचा पहिला सामना झाला तो [[डॉन ब्रॅडमन|सर डॉन ब्रॅडमन]] यांच्या इनव्हिन्सिबल्सविरुद्ध ([[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ]]ाला त्यावेळे दिले गेलेले नाव). ==पुरुष क्रिकेट == <small>कसोटी मालिकेसमोर डॅगर (†) चिन्ह असल्यास, त्या मालिकेत त्या खेळाडूने कमीत कमी एका कसोटीत संघाचे नेतृत्व केले आहे, सदर खेळाडूने नियुक्त कर्णधाराचे प्रतिनिधित्व केले किंवा मालिकेमध्ये काही सामन्यांसाठी तो कर्णधार म्हणून नियुक्त केला गेला असे दर्शवते.</small> ===पुरुष कसोटी कर्णधार=== कमीत कमी एका कसोटी सामन्यामध्ये [[भारतीय क्रिकेट संघ]]ाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा ३२ कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. आता पर्यंत २७ विजयांसह [[महेंद्रसिंग धोणी]] हा सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार आहे. परदेशात मिळवलेल्या ११ विजयांसह तर [[सौरव गांगुली]] हा परदेशी सर्वात यशस्वी ठरलेला कसोटी कर्णधार आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/engine/stats/index.html?class=1;filter=advanced;groupby=captains;home_or_away=2;home_or_away=3;orderby=won;team=6;template=results;type=team|title=परदेशी सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार |लेखक=मार्टिन विल्यमसन |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=३ जानेवारी २०१७}}</ref> <small>निकालतक्ता २० डिसेंबर २०१६ पर्यंत अद्ययावत.</small> {| class="wikitable" width="90%" ! bgcolor="#ffff00" colspan=10 | भारतीय कसोटी कर्णधार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.cricinfo.com/guru?sdb=team;team=IND;class=testteam;filter=basic;opposition=0;notopposition=0;decade=0;homeaway=0;continent=0;country=0;notcountry=0;groundid=0;season=0;startdefault=1932-06-25;start=1932-06-25;enddefault=2007-05-22;end=2007-05-22;tourneyid=0;finals=0;daynight=0;toss=0;scheduledovers=0;scheduleddays=0;innings=0;followon=0;result=0;seriesresult=0;captainid=0;recent=;viewtype=summary;runslow=;runshigh=;wicketslow=;wicketshigh=;ballslow=;ballshigh=;overslow=;overshigh=;bpo=0;batevent=;conclow=;conchigh=;takenlow=;takenhigh=;ballsbowledlow=;ballsbowledhigh=;oversbowledlow=;oversbowledhigh=;bpobowled=0;bowlevent=;submit=1;.cgifields=viewtype|title=भारत – कसोटी|प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=३ जानेवारी २०१७}}</ref> |- bgcolor="#efefef" !क्रमांक ! colspan="2" | नाव !वर्ष!!प्रतिस्पर्धी!!स्थान!!सामने!!विजय!!पराभव!!अनिर्णित |- | rowspan=3 | १ | rowspan=3 |{{Css Image Crop |Image = 1932_Indian_Test_Cricket_team.jpg |bSize = 400 |cWidth = 50 |cHeight = 55 |oTop = 80 |oLeft =250 }} | rowspan=3 | [[सी.के. नायडू]] || १९३२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || १ ||० ||१ || ० |- || १९३३/३४ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ३ || ० || २ || १ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''४''' || '''०''' || '''३''' || '''१''' |- | rowspan=2 | २ | rowspan=2 | {{चित्र हवे}} | rowspan=2 | [[महाराजकुमार विजयानगरम]] || १९३६ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || '''३''' || '''०''' || '''२''' || '''१''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''३''' || '''०''' || '''२''' || '''१''' |- | rowspan=2 | ३ | rowspan=2 | [[File:Iftikhar Ali Khan Pataudi 1931cr.jpg|100px]] | rowspan=2 | [[इफ्तिखार अली खान पतौडी]] || १९४६ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || '''३''' || '''०''' || '''१''' || '''२''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''३''' || '''०''' || '''१''' || '''२''' |- | rowspan=4 | ४ | rowspan=4 | [[File:Lala Amarnath at Lord's 1936.jpg|100px|लाला अमरनाथ लॉर्डसवर १९३६]] | rowspan=4 | [[लाला अमरनाथ]] || १९४७/४८ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ५ || ० || ४ || १ |- || १९४८/४९ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ५ || ० || १ || ४ |- || १९५२/५३ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ५ || २ || १ || २ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१५''' || '''२''' || '''६''' || '''७''' |- | rowspan=4 | ५ | rowspan=4 | | rowspan=4 | [[विजय हजारे]] || १९५१/५२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ५ || १ || १ || ३ |- || १९५२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ४ || ० || ३ || १ |- || १९५२/५३ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ५ || ० || १ || ४ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१४''' || '''१''' || '''५''' || '''८''' |- | rowspan=3 | ६ | rowspan=3 |{{Css Image Crop |Image = Vinoo_Mankad_and_Pankaj_Roy_after_record_breaking_opening_stand_1956.jpg |bSize = 400 |cWidth = 50 |cHeight = 100 |oTop = 70 |oLeft =250 }} | rowspan=3 | [[विनू मंकड]] || १९५४/५५ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || ५ || ० || ० || ५ |- || १९५८/५९† || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || १ || ० || १ || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''६''' || '''०''' || '''१''' || '''५''' |- | rowspan=3 | ७ | rowspan=3 |{{चित्र हवे}} | rowspan=3 | [[गुलाम अहमद]] || १९५५/५६† || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || १ || ० || ० || १ |- || १९५८/५९ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || २ || ० || २ || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''३''' || '''०''' || '''२''' || '''१''' |- | rowspan=4 | ८ | rowspan=4 |[[File:Pollyumrigar.jpg|left|frameless]] | rowspan=4 | [[पॉली उम्रीगर]] || १९५५/५६ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ४ || २ || ० || २ |- || १९५६/५७ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ३ || ० || २ || १ |- || १९५८/५९† || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत|| १ || ० || ० || १ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''८''' || '''२''' || '''२''' || '''४''' |- | rowspan=2 | ९ | rowspan=2 | | rowspan=2 | [[हेमू अधिकारी]] || १९५८/९† || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || '''१''' || '''०''' || '''०''' || '''१''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''०''' || '''०''' || '''१''' |- | rowspan=2 | १० | rowspan=2 | | rowspan=2 | [[दत्ता गायकवाड]] || १९५९ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || '''४''' || '''०''' || '''४''' || '''०''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''४''' || '''०''' || '''४''' || '''०''' |- | rowspan=2 | ११ | rowspan=2 |{{Css Image Crop |Image = Vinoo_Mankad_and_Pankaj_Roy_after_record_breaking_opening_stand_1956.jpg |bSize = 400 |cWidth = 50 |cHeight = 100 |oTop = 70 |oLeft =165 }} | rowspan=2 | [[पंकज रॉय]] || १९५९† || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || '''१''' || '''०''' || '''१''' || '''०''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''०''' || '''१''' || '''०''' |- | rowspan=2 | १२ | rowspan=2 | | rowspan=2 | [[गुलाबराय रामचंद]] || १९५९/६० || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || '''५''' || '''१''' || '''२''' || '''२''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''५''' || '''१''' || '''२''' || '''२''' |- | rowspan=4 | १३ | rowspan=4 | | rowspan=4 | [[नरी कॉंट्रॅक्टर]] || १९६०/६१ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ५ || ० || ० || ५ |- || १९६१/६२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ५ || २ || ० || ३ |- || १९६१/६२† || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || २ || ० || २ || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१२''' || '''२''' || '''२''' || '''८''' |- | rowspan=12 | १४ | rowspan=12 | | rowspan=12 | [[मन्सूर अली खान पतौडी]] || १९६१/६२ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ३ || ० || ३ || ० |- || १९६३/६४ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ५ || ० || ० || ५ |- || १९६४/६५ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ३ || १ || १ || १ |- || १९६४/६५ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ४ || १ || ० || ३ |- || १९६६/६७ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ३ || ० || २ || १ |- || १९६७ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || ० || ३ || ० |- || १९६७/६८ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ३ || ० || ३ || ० |- || १९६७/६८ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || ४ || ३ || १ || ० |- || १९६९/७० || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ३ || १ || १ || १ |- || १९६९/७० || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ५ || १ || ३ || १ |- || १९७४/७५ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ४ || २ || २ || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''४०''' || '''९''' || '''१९''' || '''१२''' |- | rowspan=2 | १५ | rowspan=2 | | rowspan=2 | [[चंदू बोर्डे]] || १९६७/८† || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || '''१''' || '''०''' || '''१''' || '''०''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''०''' || '''१''' || '''०''' |- | rowspan=5 | १६ | rowspan=5 | | rowspan=5 | [[अजित वाडेकर]] || १९७०/७१ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ५ || १ || ० || ४ |- || १९७१ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || १ || ० || २ |- || १९७२/७३ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ५ || २ || १ || २ |- || १९७४ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || ० || ३ || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१६''' || '''४''' || '''४''' || '''८''' |- | rowspan=3 | १७ | rowspan=3 | | rowspan=3 | [[श्रीनिवास वेंकटराघवन]] || १९७४/७५† || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || १ || ० || १ || ० |- || १९७९ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ४ || ० || १ || ३ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''५''' || '''०''' || '''२''' || '''३''' |- | rowspan=13 | १८ | rowspan=13 |[[File:Sunny Gavaskar Sahara.jpg|100px|सुनील गावस्कर सहारा]] | rowspan=13 | [[सुनील गावस्कर]] || १९७५/७६† || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || १ || १ || ० || ० |- || १९७८/७९ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ६ || १ || ० || ५ |- || १९७९/८० || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ६ || २ || ० || ४ |- || १९७९/८० || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ५ || २ || ० || ३ |- || १९८०/८१ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ३ || १ || १ || १ |- || १९८०/८१ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || ३ || ० || १ || २ |- || १९८१/८२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ६ || १ || ० || ५ |- || १९८२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || ० || १ || २ |- || १९८२/८३ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || १ || ० || ० || १ |- || १९८२/८३ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || ६ || ० || ३ || ३ |- || १९८४/८५ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || २ || ० || ० || २ |- || १९८४/८५ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ५ || १ || २ || २ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण'''|| '''४७''' || '''९''' || '''८''' || '''३०''' |- | rowspan=7 | १९ | rowspan=7 | | rowspan=7 | [[बिशनसिंग बेदी]] || १९७५/७६ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || २ || ० || १ || १ |- || १९७५/७६ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ४ || १ || २ || १ |- || १९७६/७७ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ३ || २ || ० || १ |- || १९७६/७७ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ५ || १ || ३ || १ |- || १९७७/७८ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ५ || २ || ३ || ० |- || १९७८/७९ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || ३ || ० || २ || १ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''२२''' || '''६''' || '''११''' || '''५''' |- | rowspan=3 | २० | rowspan=3 | | rowspan=3 | [[गुंडप्पा विश्वनाथ]] | १९७९/८०† || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || १ || ० || ० || १ |- || १९७९/८० || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || १ || ० || १ || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''२''' || '''०''' || '''१''' || '''१''' |- | rowspan=10 | २१ | rowspan=10 |[[File:Kapil Dev at Equation sports auction.jpg|100px|कपिल देव]] | rowspan=10 | [[कपिल देव]] | १९८२/८३ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ५ || ० || २ || ३ |- || १९८३/८४ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ३ || ० || ० || ३ |- || १९८३/८४ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ६ || ० || ३ || ३ |- || १९८५ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || ३ || ० || १ || २ |- || १९८५/८६ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ३ || ० || ० || ३ |- || १९८६ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || २ || ० || १ |- || १९८६/८७ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ३ || ० || ० || २<ref name='tied'>एका कसोटी सामन्यात बरोबरी</ref> |- || १९८६/८७ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || ३ || २ || ० || १ |- || १९८६/८७ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ५ || ० || १ || ४ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''३४''' || '''४''' || '''७''' || '''२३'''<ref name='tied'/> |- | rowspan=4 | २२ | rowspan=4 | [[File:DilipVengsarkar.jpg|100px]] | rowspan=4 | [[दिलीप वेंगसरकर]] | १९८७/८८ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ३ || ० || १ || २ |- || १९८८/८९ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ३ || २ || १ || ० |- || १९८८/८९ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ४ || ० || ३ || १ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१०''' || '''२''' || '''५''' || '''३''' |- | rowspan=2 | २३ | rowspan=2 |[[File:RaviShastri.jpg|100px|रवि शास्त्री १]] | rowspan=2 | [[रवि शास्त्री]] || १९८७/८† || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || '''१''' || '''१''' || '''०'''|| '''०''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''१''' || '''०''' || '''०''' |- | rowspan=2 | २४ | rowspan=2 |[[File:Former cricketer K. Srikkanth meets PM Modi (cropped).jpg|100px]] | rowspan=2 | [[कृष्णम्माचारी श्रीकांत]] || १९८९/९० || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || '''४''' || '''०''' || '''०''' || '''४''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''४''' || '''०''' || '''०''' || '''४''' |- | rowspan=21 | २५ | rowspan=21 |[[File:Mohammad Azharuddin (1).jpg|100px]] | rowspan=21 | [[मोहम्मद अझरुद्दीन]] | १९८९/९० || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || ३ ||०||१||२ |- || १९९० || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ ||०||१||२ |- || १९९०/९१ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || १ || १ || ० || ० |- || १९९१/९२ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ५ ||०||४||१ |- || १९९२/९३ || [[झिम्बाब्वे क्रिकेट संघ|झिम्बाब्वे]] || झिम्बाब्वे || १ || ० || ० || १ |- || १९९२/९३ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || दक्षिण आफ्रिका || ४ || ० || १ || ३ |- || १९९२/९३ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ३ || ३ || ० || ० |- || १९९२/९३ || [[झिम्बाब्वे क्रिकेट संघ|झिम्बाब्वे]] || भारत || १ || १ || ० || ० |- || १९९३ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || ३ || १ || ० || २ |- || १९९३/९४ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || ३ || ३ || ० || ० |- || १९९३/९४ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || १ ||०||०||१ |- || १९९४/९५ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ३ ||१||१||१ |- || १९९५/९६ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ३ ||१|| ० ||२ |- || १९९६ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || ० || १ || २ |- || १९९७/९८ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ३ || २ || १ || ० |- || १९९८/९९ || [[झिम्बाब्वे क्रिकेट संघ|झिम्बाब्वे]] || झिम्बाब्वे || १ || ० || १ || ० |- || १९९८/९९ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || २ || ० || १ || १ |- || १९९८/९९ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || २ || १ || १ || ० |- || १९९८/९९<ref name='asian'>आशियाई कसोटी चॅंपियनशीप</ref> || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || १ || ० || १ || ० |- || १९९८/९९<ref name='asian'/> || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || १ || ० || ० || १ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''४७''' ||१४||१४||१९<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/ci/engine/series/62275.html|title=निकाल {{!}} जागतिक {{!}} इएसपीएन क्रिकइन्फो|संकेतस्थळ= इएसपीएन क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=३ जानेवारी २०१७}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/ci/engine/series/६२२९५.html|title= निकाल {{!}} जागतिक {{!}} इएसपीएन क्रिकइन्फो|संकेतस्थळ= इएसपीएन क्रिकइन्फो |ॲक्सेसदिनांक=३ जानेवारी २०१७}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/ci/engine/series/६२३२२.html|title= निकाल {{!}} जागतिक {{!}} इएसपीएन क्रिकइन्फो|संकेतस्थळ= इएसपीएन क्रिकइन्फो |ॲक्सेसदिनांक=३ जानेवारी २०१७}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.sportskeeda.com/cricket/mohammed-azharuddin-sourav-ganguly-ms-dhoni-india-best-captain|title=मोहम्मद अझरुद्दीन वि सौरव गांगुली वि महेंद्रसिंग धोणी – कोण आहे अलिकडच्या काळातील भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार?|दिनांक=१२ ऑगस्ट २०१४|ॲक्सेसदिनांक=३ जानेवारी २०१७}}</ref> |- | rowspan=10 | २६ | rowspan=10 |[[File:Sachin at Castrol Golden Spanner Awards.jpg|100px|सचिन तेंडुलकर]] | rowspan=10 | [[सचिन तेंडुलकर]] | १९९६/९७ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || १ || १ || ० || ० |- || १९९६/९७ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || भारत || ३ || २ || १ || ० |- || १९९६/९७ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || दक्षिण आफ्रिका || ३ || ० || २ || १ |- || १९९६/९७ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ५ || ० || १ || ४ |- || १९९७ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || २ || ० || ० || २ |- || १९९७/९८ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || ३ || ० || ० || ३ |- || १९९९/२००० || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ३ || १ || ० || २ |- || १९९९/२००० || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ३ || ० || ३ || ० |- || १९९९/२००० || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || भारत || २ || ० || २ || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''२५''' || '''४''' || '''९''' || '''१२''' |- | rowspan=21 | २७ | rowspan=21 |[[File:Sourav Ganguly closeup-2.jpg|100px|सौरव गांगुली]] | rowspan=21 | [[सौरव गांगुली]] | २०००/०१ || [[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]] || बांगलादेश || १ || १ || ० || ० |- || २०००/०१ || [[झिम्बाब्वे क्रिकेट संघ|झिम्बाब्वे]] || भारत || २ || १ || ० || १ |- || २०००/०१ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ३ || २ || १ || ० |- || २००१ || [[झिम्बाब्वे क्रिकेट संघ|झिम्बाब्वे]] || झिम्बाब्वे || २ || १ || १ || ० |- || २००१ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || ३ || १ || २ || ० |- || २००१/०२ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || दक्षिण आफ्रिका || २ || ० || १ || १ |- || २००१/०२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ३ || १ || ० || २ |- || २००१/०२ || [[झिम्बाब्वे क्रिकेट संघ|झिम्बाब्वे]] || भारत || २ || २ || ० || ० |- || २००१/०२ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ५ || १ || २ || २ |- || २००२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ४ || १ || १ || २ |- || २००२/०३ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ३ || २ || ० || १ |- || २००२/०३ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || २ || ० || २ || ० |- || २००३/०४ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || १ || ० || ० || १ |- || २००३/०४ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ४ || १ || १ || २ |- || २००३/०४ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || १ || १ || ० || ० |- || २००४/०५ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || २ || ० || १ || १ |- || २००४/०५ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] ||भारत || २ || १ || ० || १ |- || २००४/०५ || [[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]] || बांगलादेश || २ || २ || ० || ० |- || २००४/०५ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ३ || १ || १ || १ |- || २००५/०६ || [[झिम्बाब्वे क्रिकेट संघ|झिम्बाब्वे]] || झिम्बाब्वे || २ || २ || ० || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''४९''' || '''२१''' || '''१३''' || '''१५''' |- | rowspan=11 |२८ | rowspan=11 |[[File:Rahul Dravid at GQ Men Of The Year 2012 AWARD.jpg|100px|राहुल द्रविड]] | rowspan=11 | [[राहुल द्रविड]] | २००३/०४† || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || १ || ० || ० || १ |- || २००३/०४† || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || २ || १ || १ || ० |- || २००४/०५† || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || २ || १ || १ || ० |- || २००५/०६ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || २ || १ || ० || १ |- || २००५/०६ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || ३ || ० || १ || २ |- || २००५/०६ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ३ || १ || १ || १ |- || २००५/०६ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ४ || १ || ० || ३ |- || २००६/०७ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || दक्षिण आफ्रिका || ३ || १ || २ || ० |- || २००७ || [[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]] || बांगलादेश || २ || १|| ० || १ |- || २००७ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || १ || ० || २ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''२५''' || '''८''' || '''६''' || '''११''' |- | rowspan=5 | २९ | rowspan=5 |[[File:Virender Sehwag at the NDTV Marks for Sports event 13.jpg|100px|Virender Sehwag]] | rowspan=5 | [[विरेंद्र सेहवाग]] || २००५/६† || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || १ || १ || ० || ० |- || २००९† || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || १ || ० || ० || १ |- || २०१०† || [[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]] || बांगलादेश || १ || १ || ० || ० |- || २०१२† || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || १ || ० || १ || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''४''' || '''२''' || '''१''' || '''१''' |- | rowspan=6 | ३० | rowspan=6 |[[File:Anil Kumble.jpg|100px|अनिल कुंबळे]] | rowspan=6 | [[अनिल कुंबळे]] | २००७ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ३ || १ || ० || २ |- || २००७/०८ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ४ || १ || २ || १ |- || २००८ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || भारत || २ || ० || १ || १ |- || २००८ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || ३ || १ || २ || ० |- || २००८ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || २ || ० || ० || २ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१४''' || '''३''' || '''५''' || '''६''' |- | rowspan=24 | ३१ | rowspan=24 |[[File:Mahendra Singh Dhoni January 2016 (cropped).jpg|100px]] | rowspan=24 | [[महेंद्रसिंग धोणी]] || २००८† || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || भारत || १ || १ || ० || ० |- || २००८† || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || २ || २ || ० || ० |- || २००८ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || २ || १ || ० || १ |- || २००९ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || २ || १ || ० || १ |- || २००९ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || ३ || २ || ० || १ |- || २०१० || [[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]] || बांगलादेश || १ || १|| ० || ० |- || २०१० || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || भारत || २ || १ || १ || ० |- || २०१० || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || ३ || १|| १ || १ |- || २०१० || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || २ || २|| ० || ० |- || २०१० || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ३ || १|| ० || २ |- || २०१० || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || दक्षिण आफ्रिका || ३ || १ || १ || १ |- || २०११ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज|| ३ || १ || ० || २ |- || २०११ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड|| ४ || ० || ४ || ० |- || २०११ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत|| ३ || २ || ० || १ |- || २०११/१२ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया||३|| ० ||३|| ० |- || २०१२ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत|| २ || २ || ० || ० |- || २०१२/१३ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत|| ४ || १ || २ || १ |- || २०१२/१३ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ४ || ४ || ० || ० |- || २०१३/१४ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत|| २ || २ || ० || ० |- || २०१३/१४ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || दक्षिण आफ्रिका || २ || ० || १ || १ |- || २०१३/१४ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || २ || ० || १ || १ |- || २०१४ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ५ || १ || ३ || १ |- || २०१४/१५ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || २ || ० || १ || १ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''६०''' || '''२७''' || '''१८''' || '''१५''' |- | rowspan="10" | ३२ | rowspan="10" | [[File:Virat_Kohli_June_2016_(cropped).jpg|100px|विराट कोहली]] | rowspan="10" | [[विराट कोहली]] || २०१४/१५† || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || २ || ० || १ || १ |- || २०१५ || [[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]] || बांगलादेश || १ || ० || ० || १ |- || २०१५ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || ३ || २ || १ || ० |- || २०१५/१६ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || भारत || ४ || ३ || ० || १ |- || २०१६ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ४ || २ || ० || २ |- || २०१६/१७ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ३ || ३ || ० || ० |- || २०१६/१७ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ५ || ४ || ० || १ |- || २०१७ || [[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]] || भारत || १ || १ || ० || ० |- || २०१७ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ३ || १ || १ || १ |-bgcolor="#F5DEB3" | colspan="3" |'''एकूण'''||'''२६'''||'''१६'''|| '''३''' || '''७''' |- | rowspan="5" | ३३ | rowspan="5" | [[File:Ajinkya Rahane 2016 (cropped).jpg|75px|]] | rowspan="5" | [[अजिंक्य रहाणे]] |[[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७|२०१७]]† || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || १ || १ || ० || ० |- |[[अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८|२०१८]] ||[[अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ|अफगाणिस्तान]]||भारत || १ ||१ ||० ||० |- |[[भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१|२०२०-२१]]†||[[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] ||ऑस्ट्रेलिया ||३ || २ || ० || १ |- |[[न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२|२०२१-२२]]† |[[न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ|न्यू झीलंड]]||भारत||१||०||०||१ |- bgcolor="#F5DEB3" | colspan="3" | '''एकूण''' || '''६''' || '''४''' || '''०''' || '''२''' |- | rowspan="3" |३४ | rowspan="3" |[[चित्र:KL_Rahul_at_Femina_Miss_India_2018_Grand_Finale_(cropped).jpg|131x131अंश]] | rowspan="3" |[[लोकेश राहुल]] |[[भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२|२०२१-२२]]†||[[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] ||दक्षिण आफ्रिका||१||०||१||० |- |[[भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२२-२३|२०२२]]||[[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]]||बांगलादेश||२||२||०||० |-bgcolor="#F5DEB3" | colspan="3" |'''एकूण''' ||'''३''' ||'''२''' ||'''१'''||'''०''' |- | rowspan="7" |३५ | rowspan="7" |[[चित्र:Rohit_Sharma_2015_(cropped).jpg|100x100अंश]] | rowspan="7" |[[रोहित शर्मा]] |[[श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२|२०२२]] |[[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] |भारत |२ |२ |० |० |- |[[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३|२०२३]] |[[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] |भारत |४ |२ |१ |१ |- |[[२०२३ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल|२०२३]] |[[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] |इंग्लंड |१ |० |१ |० |- |[[भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२३|२०२३]] |[[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] |वेस्ट इंडीज |२ |१ |० |१ |- |[[भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२३-२४|२०२३]] |[[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] |दक्षिण आफ्रिका |२ |१ |१ |० |- |[[इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२३-२४|२०२४]] |[[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] |भारत |५ |४ |१ |० |-bgcolor="#F5DEB3" | colspan="3" |'''एकूण''' |'''१६''' |'''१०''' |'''४''' |'''२''' |- | rowspan="2" |३६ | rowspan="2" |[[चित्र:Jasprit_Bumrah_(4).jpg|100x100अंश]] | rowspan="2" |[[जसप्रीत बुमराह]] |[[भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१|२०२२]]† |[[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] |इंग्लंड |१ |० |१ |० |- | rowspan="2" |३७ | rowspan="2" | | rowspan="2" |[[शुभमन गिल]] |[[भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२५|२०२५]]† |[[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] |इंग्लंड |१ |० |० |० |-bgcolor="#F5DEB3" | colspan="3" |'''एकूण''' |'''१''' |'''०''' |'''१''' |'''०''' |- bgcolor="#DDEEFF" | colspan="6" align="left" | '''एकूण''' ||'''५७९'''||'''१७८'''|| '''१७८''' || '''२२३'''<ref name="tied" /> |} ===पुरुष आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार === कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये [[भारतीय क्रिकेट संघ]]ाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. {| class="wikitable sortable" width="90%" |- bgcolor="#efefef" !क्रमांक!!छायाचित्र!!नाव!!कालावधी!!सामने!!विजय!!पराभव!!बरोबरी!!अनिर्णित!!विजय %<ref name='winpercent'>विजय % = (जिंकलेले सामने+०.५*बरोबरीत सुटलेले सामने)/(खेळलेले सामने-रद्द सामने) आणि नजीकच्या क्रमांकाशी पूर्णांकित टक्केवारी</ref> |- ||१|| ||[[अजित वाडेकर]]||१९७४||२||०||२||०||०||०.०० |- ||२|| ||[[श्रीनिवास वेंकटराघवन]]||१९७५–७९||७||१||६||०||०||१४.२८ |- ||३|| ||[[बिशनसिंग बेदी]]||१९७५-७८||४||१||३||०||०||२५.०० |- ||४||[[File:Sunny Gavaskar Sahara.jpg|100px]]||[[सुनिल गावसकर]]||१९८०–८५||३७||१४||२१||०||२||४०.०० |- ||५|| ||[[गुंडप्पा विश्वनाथ]]||१९८०||१||०||१||०||०||०.०० |- ||६|| [[File:Kapil Dev at Equation sports auction.jpg|100px]] ||[[कपिल देव]]||१९८२–९२||७४||३९||३३||०||२||५४.१६ |- ||७|| [[File:Syed Mujtaba Hussain Kirmani.jpg|100px]]||[[सय्यद किरमाणी]]||१९८३||१||०||१||०||०||०.०० |- ||८||[[File:MohinderAmarnath.jpg|100px]] ||[[मोहिंदर अमरनाथ]]||१९८४||१||०||०||०||१||NA |- ||९|| [[File:Ravi_Shastri.jpg|100px]] ||[[रवि शास्त्री]]||१९८६–९१||११||४||७||०||०||३६.३६ |- ||१०|| [[File:DilipVengsarkar.jpg|100px]] ||[[दिलीप वेंगसरकर]]||१९८७–८८||१८||८||१०||०||०||४४.४४ |- ||११|| [[File:Former_cricketer_K._Srikkanth_meets_PM_Modi_(cropped).jpg|100px]] ||[[कृष्णम्माचारी श्रीकांत]]||१९८९/९०||१३||४||८||०||१||३३.३३ |- ||१२|| [[File:Mohammad Azharuddin (1).jpg|100px]] ||[[मोहम्मद अझरुद्दीन]]||१९८९–९९||१७४||९०||७२||८||४||५१.७२ |- ||१३|| [[File:Sachin at Castrol Golden Spanner Awards.jpg|100px]] ||[[सचिन तेंडुलकर]]||१९९६–९९||७३||२३||४३||१||६||३५.०७ |- ||१४|| [[File:Ajay_jadega.jpg|100px]] ||[[अजय जडेजा]]||१९९८–१९९९||१३||८||५||०||०||६१.५३ |- ||१५|| [[File:Sourav Ganguly closeup-2.jpg|100px]] ||[[सौरव गांगुली]]||१९९९–२००५||१४६<ref name='tsunami'>सौरव गांगुलीने विश्व क्रिकेट त्सुनामी अपिलसाठी १० जानेवारी २००५ रोजी आयसीसी विश्व एकादश संघाविरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात एसीसी आशियाई एकादश संघाचे सुद्धा नेतृत्व केले होते. एसीसी आशियाई एकादश संघाने सामना गमावला.</ref>||७६||६५<ref name='tsunami'/>||०||५||५३.९० |- ||१६|| [[File:Rahul Dravid at GQ Men Of The Year 2012 AWARD.jpg|100px]] ||[[राहुल द्रविड]]||२०००–०७||७९||४२||३३||०||४||५६.०० |- ||१७|| [[File:Anil Kumble.jpg|100px]] ||[[अनिल कुंबळे]]||२००२||१||१||०||०||०||१००.०० |- ||१८|| [[File:Virender Sehwag at the NDTV Marks for Sports event 13.jpg|100px]] ||[[विरेंद्र सेहवाग]]||२००३–२०११||१२||७||५||०||०||५८.३३ |- ||१९|| [[File:Mahendra Singh Dhoni receiving Padma Bhushan.jpg|100px]] ||[[महेंद्रसिंग धोणी]]||२००७–१८||१९९||११०||७४||४||११||५९.५७ |- ||२०|| [[File:Suresh Raina1.jpg|100px]] ||[[सुरेश रैना]]||२०१०–१४||१२||६||५||०||१||५४.५४ |- ||२१|| [[File:Gautam Gambhir (IPL 2014).jpg|100px]] ||[[गौतम गंभीर]]||२०१०–११||६||६||०||०||०||१००.०० |- ||२२|| [[File:Virat Kohli portrait.jpg|100px]] ||[[विराट कोहली]]||२०१३–२१||९५||६५||२७||१||२||६८.४२ |- ||२३|| [[File:Ajinkya Rahane 2016 (cropped).jpg|100px]] ||[[अजिंक्य रहाणे]] ||२०१५|| ३ ||३ || ० || ० || ० ||१००.०० |- ||२४||[[File:Rohit Sharma November 2016 (cropped).jpg|100px]] |[[रोहित शर्मा]] || २०१७–सद्य || ४५ || ३४ || १० || ० || १ || ७५.५५ |- ||२५||[[File:Shikhar Dhawan January 2016 (cropped).jpg|100px]] |[[शिखर धवन]] || २०२१-२२ || १२ || ७ || ३ || ० || २ || ५८.३३ |- ||२६||[[File:KL Rahul at Femina Miss India 2018 Grand Finale (cropped).jpg|100px]] |[[ लोकेश राहुल]] ||२०२२–२३ || १२ || ८ || ४ || ० || ० || ६६.६७ |- ||२७||[[File:Hardik Pandya (cropped).jpg|100px]] |[[हार्दिक पंड्या]] || २०२३ || ३ || २ || १ || ० || ० || ६६.६७ |-bgcolor=#DDEEFF class="sortbottom" | colspan="4" align="center" | '''एकूण'''||'''१०५५'''||'''५५९'''||'''४४३'''||'''९'''||'''४४''' |'''५२.९८''' |} === पुरुष आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० कर्णधार === कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये [[भारतीय क्रिकेट संघ]]ाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. {| class="wikitable sortable" width="90%" |- bgcolor="#efefef" !क्रमांक!!छायाचित्र!!नाव!!कालावधी!!सामने!!विजय!!पराभव!!बरोबरी!!अनिर्णित!!विजय %<ref name="winpercent"/> |- ||१||[[File:Virender Sehwag at the NDTV Marks for Sports event 13.jpg|100px]]||[[विरेंद्र सेहवाग]]||२००६||१||१||०||०||०||१००.०० |- ||२|| [[File:Mahendra Singh Dhoni January 2016 (cropped).jpg|100px]] ||[[महेंद्रसिंग धोणी|महेंद्रसिंग धोनी]]||२००७–१६||७२||४१||२८||१||२||५९.२८ |- ||३|| [[File:Suresh_Raina_grace_the_'Salaam_Sachin'_conclave.jpg|100px]] ||[[सुरेश रैना]]||२०१०–११||३||३||०||०||०||१००.०० |- ||४|| [[File:Ajinkya Rahane 2016 (cropped).jpg|100px]] ||[[अजिंक्य रहाणे]]||२०१५||२||१||१||०||०||५०.०० |- |५ || [[File:Virat Kohli in PMO New Delhi.jpg|100px]] ||[[विराट कोहली]] ||२०१७-२१|| ५० || ३० || १६ || २ || २ || ६६.६७ |- | ६ || [[File:Prime Minister Of Bharat Shri Narendra Damodardas Modi with Shri Rohit Gurunath Sharma (Cropped).jpg|100px]] ||[[रोहित शर्मा]] ||२०१७-२१|| ६२ || ४९ || १२ || १ || ० || ७९.०३ |- |७||[[File:Shikhar Dhawan January 2016 (cropped).jpg|100px]]||[[शिखर धवन]] ||२०२१|| ३ || १ || २ || ० || ० || ३३.३३ |- | ८ || [[File:Prime Minister Of Bharat Shri Narendra Modi with Rishabh Pant.jpg|100px]] || [[रिषभ पंत]] ||२०२२ || ५ || २ || २ || ० || १ || ५०.०० |- | ९ ||[[File:Hardik Pandya in PMO New Delhi.jpg|100px]]||[[हार्दिक पंड्या]]||२०२२-सद्य|| १६ || १० || ५ || १ || ० || ६५.५२ |- | १० ||[[File:KL Rahul at Femina Miss India 2018 Grand Finale (cropped).jpg|100px]]||[[लोकेश राहुल]]|| २०२२ || १ || १ || ० || ० || ० ||१००.०० |- | ११ ||[[File:Jasprit Bumrah in PMO New Delhi.jpg|100px]]||[[जसप्रीत बुमराह]] || २०२३ || २ || २ || ० || ० || ० || १००.०० |- | १२||[[File:No_image_available.svg|100px]]||[[ऋतुराज गायकवाड]]|| २०२३ || ३ || २ || ० || ० || १ || ६६.६७ |- |१३ ||[[File:Suryakumar Yadav in PMO New Delhi.jpg|100px]] ||[[सूर्यकुमार यादव]]|| २०२३ || ७ || ५ || २ || ० || ० || ७१.४२ |- | १४ || [[File:Shubman Gill 2023 (cropped).jpg|100px]]||[[शुभमन गिल]]||२०२४ || ५ || ४ || १ || ० || ० || ८०.०० |- |- bgcolor="#DDEEFF" class="sortbottom" | colspan="4" align="center" | '''एकूण'''||'''२३२'''||'''१५२'''||'''६९'''||'''५'''||'''६'''||'''६५.५१''' |} ==महिला क्रिकेट== <small>कसोटी मालिकेसमोर डॅगर (†) चिन्ह असल्यास, त्या मालिकेत त्या खेळाडूने कमीत कमी एका कसोटीत संघाचे नेतृत्व केले आहे, सदर खेळाडूने नियुक्त कर्णधाराचे प्रतिनिधित्व केले किंवा मालिकेमध्ये काही सामन्यांसाठी ती कर्णधार म्हणून नियुक्त केला गेला असे दर्शवते.</small> ===महिला कसोटी कर्णधार=== कमीत कमी एका कसोटी सामन्यामध्ये [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारतीय महिला क्रिकेट संघाचे]] नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. <small>११ सप्टेंबर २०१४ पर्यंत अद्ययावत.</small> {| class="wikitable" width="90%" ! colspan="10" bgcolor="#efefef" | भारतीय महिला कसोटी कर्णधार |- bgcolor="#efefef" !क्रमांक!!चित्र!!नाव!!वर्ष!!प्रतिस्पर्धी!!स्थान!!सामने!!विजय!!पराभव!!अनिर्णित !विजय % |- | rowspan=5 | १ | rowspan=5 | [[File:Shantha Rangaswamy (2017).jpg|100px]] | rowspan=5 | [[शांता रंगस्वामी]] | १९७६/७७ || [[वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ६ || १ || १ || ४ | rowspan="4" |८.३३ |- ||१९७६/७७ || [[न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || १ || ० || ० || १ |- || १९७६/७७ || [[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || १ || ० || १ || ० |- || १९८३/८४ || [[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ४ || ० || ० || ४ |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१२''' || '''१''' || '''२''' || '''९''' | |- | rowspan=2 | २ | rowspan=2 | | rowspan=2 | [[निलिमा जोगळेकर]] | १९८४/१९८५† || [[न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || १ || ० || ० || १ |००.०० |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''०''' || '''०''' || '''१''' | |- | rowspan=3 | ३ | rowspan=3 | | rowspan=3 | [[डायना एडूल्जी]] | १९८४/८५ || [[न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || २ || ० || ० || २ | rowspan="2" |००.०० |- || १९८६ || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || २ || ० || ० || २ |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''४''' || '''०''' || '''०''' || '''४''' | |- | rowspan=3 | ४ | rowspan=3 | | rowspan=3 | [[शुभांगी कुलकर्णी]] | १९८६† || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || १ || ० || ० || १ | rowspan="2" |०.०० |- || १९९०/९१ || [[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || २ || ० || १ || १ |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''३''' || '''०''' || '''१''' || '''२''' | |- | rowspan=2 | ५ | rowspan=2 | | rowspan=2 | [[संध्या अग्रवाल]] | १९९०/९१† || [[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || १ || ० || १ || ० |०.०० |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''०''' || '''१''' || '''०''' | |- | rowspan=3 | ६ | rowspan=3 | | rowspan=3 | [[पुर्णिमा राऊ]] | १९९४/९५ || [[न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || १ || ० || ० || १ | rowspan="2" |०.०० |- || १९९५/९६ || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || २ || ० || १ || १ |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''३''' || '''०''' || '''१''' || '''२''' | |- | rowspan=2 | ७ | rowspan=2 | | rowspan=2 | [[प्रमिला भट]] | १९९५/९६† || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || १ || ० || ० || १ |०.०० |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''०''' || '''०''' || '''१''' | |- | rowspan=2 | ८ | rowspan=2 | | rowspan=2 | [[चंद्रकांता कौल]] || १९९९ || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || १ || ० || ० || १ |०.०० |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''०''' || '''०''' || '''१''' | |- | rowspan=4 | ९ | rowspan=4 | [[File:Anjum Chopra (10 March 2009, Sydney).jpg|100px]] | rowspan=4 | [[अंजूम चोप्रा]] | २००१/०२ || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || १ || ० || ० || १ | rowspan="3" |३३.३३ |- || २००१/०२ || [[दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || दक्षिण आफ्रिका || १ || १ || ० || ० |- || २००२ || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || १ || ० || ० || १ |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''३''' || '''१''' || '''०''' || '''२''' | |- | rowspan=2 | १० | rowspan=2 | | rowspan=2 | [[ममता माबेन]] || २००३/०४ || [[न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || १ || ० || ० || १ |०.०० |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''०''' || '''०''' || '''१''' | |- | rowspan="8" | ११ | rowspan="8" | [[File:Mithali_Raj.png|100px]] | rowspan="8" | [[मिताली राज]] | २००५/०६ || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || १ || ० || ० || १ | rowspan="7" |३७.५० |- || २००५/०६ || [[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया|| १ || ० || १ || ० |- || २००६ || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || २|| १ || ० || १ |- || २०१४ || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || १|| १ || ० || ० |- |२०१४ |[[दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] |भारत |१ |१ |० |० |- |२०२१ |[[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] |इंग्लंड |१ |० |० |१ |- |२०२१ |[[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] |ऑस्ट्रेलिया |१ |० |० |२ |- bgcolor="#F5DEB3" | colspan="3" | '''एकूण''' || '''८''' || '''३''' || '''१''' || '''५''' | |- | rowspan="4" |१२ | rowspan="4" |[[File:Harmanpreet Kaur 2017 (sq cropped).jpg|100px]] | rowspan="4" |[[हरमनप्रीत कौर]] |२०२३ |[[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] |भारत |१ |१ |० |० | rowspan="4" |१००.०० |- |२०२३ |[[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] |भारत |१ |१ |० |० |- |२०२४ |[[दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] |भारत |१ |१ |० |० |-bgcolor="#F5DEB3" | colspan="3" |'''एकूण''' |'''३''' |'''३''' |'''०''' |'''०''' |- bgcolor="#DDEEFF" | colspan="5" align="center" | '''एकूण''' || '''४१''' || '''८''' || '''६''' || '''२७''' | |} ===महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार=== कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ]]ाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. {| class="wikitable sortable" width="90%" |- bgcolor="#efefef" !क्रमांक!!नाव!!कालावधी!!सामने!!विजय!!पराभव!!बरोबरी!!अनिर्णित!!विजय %<ref name='winpercent'/> |- ||१||[[डायना एडुल्जी]]||१९७८–९३||१८||७||११||०||०<ref>ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला संघाविरुद्ध १९९०/९१ मोसमातील [[मनुका ओव्हल]] ([[कॅनबेरा]]) येथील सामना रद्द करण्यात आला होता.(स्रोत: {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://cricketarchive.com/Archive/Scorecards/53/53914.html|title=ऑस्ट्रेलिया महिला वि भारत महिला – भारत महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा१९९०/९१ (एकमेव ए.दि.)|प्रकाशक=क्रिकेटआर्काइव्ह.कॉम |ॲक्सेसदिनांक=४ जानेवारी २०१७}}) परंतू सामना पुस्तकांमध्ये नोंदवला गेला नाही.</ref>||३८.८८ |- ||२||[[शांता रंगस्वामी]]||१९८२–८४||१६||४||१२||०||०||२५.०० |- ||३||[[शुभांगी कुलकर्णी]]||१९८६||१||०||१||०||०||०.०० |- ||४||[[पुर्णिमा राऊ]]||१९९५||८||५||३||०||०<ref>ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्धचा १९९४/९५ च्या मोसमातील स्मॉलबोन पार्क (रोटोरुआ) येथील सामना रद्द करण्यात आला. (स्रोत: {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://cricketarchive.com/Archive/Scorecards/60/60197.html|title=ऑस्ट्रेलिया महिला v भारत महिला – न्यू झीलंड महिला सेन्टेनरी स्पर्धा १९९४/९५||प्रकाशक=क्रिकेटआर्काइव्ह.कॉम |ॲक्सेसदिनांक=४ जानेवारी २०१७}}) परंतू सामना पुस्तकांमध्ये नोंदवला गेला नाही.</ref>||६२.५० |- ||५||[[प्रमिला भट]]||१९९५–९७||७||५||१||१<ref>भारत महिला आणि न्यू झीलंड महिला संघ यांच्या दरम्यानचा १९९७/९८ हिरो होंडा महिला क्रिकेट विश्वचषकाचा [[नेहरू स्टेडियम, इंदूर]] येथील सामना भारत १७६धावांवर सर्वबाद झाल्याने बरोबरीत सुटला महिला क्रिकेटमधील बरोबरीत सुटलेला हा भारताचा एकमेव सामना (स्रोत:{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.cricinfo.com/db/ARCHIVE/WORLD_CUPS/WWC97/IND-WOMEN_NZ-WOMEN_WWC97_WODI21_17DEC1997.html|title=भारत महिला वि न्यू झीलंड महिला, गट ब – हिरो होंडा महिला विश्वचषक, १९९७/९८, २१वा सामना |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=४ जानेवारी २०१७}})</ref>||०<ref>श्रीलंका महिला संघाविरुद्धचा १९९७/९८ हिरो होंडा महिला क्रिकेट विश्वचषकाचा [[फिरोजशाह कोटला]] ([[नवी दिल्ली]]) येथील सामना रद्द झाला.(स्रोत: {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://cricketarchive.com/Archive/Scorecards/६४/६४९७१.html|title=भारत महिला वि श्रीलंका महिला – हिरो होंडा महिला विश्वचषक १९९७/९८ (गट ब)|प्रकाशक=क्रिकेटआर्काइव्ह.कॉम|ॲक्सेसदिनांक=४ जानेवारी २०१७}}{{मृत दुवा|date=July 2023 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}) परंतू सामना पुस्तकांमध्ये नोंदवला गेला नाही.</ref>||७८.५७ |- ||६||[[चंद्रकांता कौल]]||१९९९||४||३||१||०||०||७५.०० |- ||७||[[अंजू जैन]]||२०००||८||५||३||०||०||६२.५० |- ||८||[[अंजूम चोप्रा]]||२००२<ref>न्यू झीलंड महिलांचा भारत दौरा रद्द करण्यात आला. दौर्‍यावर ५ एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते</ref>–१२||२८||१०||१७||०||१<ref>२००२ महिला त्रिकोणी मालिकेचे, इंग्लंड महिला संघ आणि आयर्लंड महिला संघ यांचा सहभाग असलेले भारताचे दोन सामने रद्द करण्यात आले. [[रिव्हरसाईड मैदान]] ([[चेस्टर-ल-स्ट्रीट]]) येथील सामना अधिकृत नोंदणी केला गेला परंतू फॉक्स लॉज क्रिकेट क्लब (स्ट्राबेन) येथील दुसरा सामना नोंदवला गेला नाही.</ref>||३७.०३ |- ||९||[[ममता माबेन]]||२००३–०४||१९||१४||५||०||०||७३.६८ |- ||१०||[[मिताली राज]]||२००४–२२||१५५||८९||६३|||०||३||५७.४१ |- ||११||[[झुलन गोस्वामी]]||२००८–११||२५||१२||१३||०||०||४८.०० |- ||१२||[[रुमेली धार]]||२००८||१||०||१||०||०||०.०० |- ||१३||[[हरमनप्रीत कौर]]||२०१३–सद्य||२०||१४||५||१||०||७०.०० |-bgcolor=#DDEEFF class="sortbottom" | colspan=3 align='center' | '''एकूण'''||'''३१०'''||'''१६८'''||'''१३६'''||'''२'''||'''४'''||'''५४.१९''' |} ===महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० कर्णधार=== कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यामध्ये [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ]]ाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/women/engine/records/individual/list_captains.html?class=10;id=1863;type=team|title=भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ – आंतरराष्ट्रीय ट्वेंटी २० |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=४ जानेवारी २०१७}}</ref> {| class="wikitable sortable" width="90%" |- !क्रमांक!!चित्र!!नाव!!कालावधी!!सामने!!विजय!!पराभव!!बरोबरी!!अनिर्णित!!विजय %<ref name="winpercent"/> |- ||१||[[File:Mithali_Raj.png|100px]]||[[मिताली राज]]||२००६–१६||३२||१७||१५||०||० |५३.१२ |- ||२||[[File:Ms._Jhulan_Goswami,_in_2012_(cropped).jpg|100px]]||[[झुलन गोस्वामी]]||२००८–१५||१८||८||१०||०||०||४४.४४ |- ||३||[[File:Anjum Chopra (10 March 2009, Sydney).jpg|100px]]||[[अंजुम चोप्रा]]||२०१२–१२||१०||३||७||०||०||३०.०० |- ||४||[[File:Harmanpreet Kaur 2017 (sq cropped).jpg|100px]]||[[हरमनप्रीत कौर]]||२०१२–सद्य||११४||६५||४३||१||५||५७.०१ |- ||५||[[File:Ms. Smriti Mandhana, Arjun Awardee (Cricket), in New Delhi on July 16, 2019 (cropped).jpg|100px]]||[[स्म्रिती मंधाना]]||२०१९–२३||१३||७||५||०||१||५३.८४ |-bgcolor=#DDEEFF class="sortbottom" | colspan=4 align='center' | '''एकूण'''||'''१८७'''||'''१००'''||'''८०'''||'''१'''||'''६'''||'''५३.४७''' |} ==युवा क्रिकेट== ===युवा कसोटी कर्णधार=== कमीत कमी एका १९-वर्षांखालील कसोटी सामन्यामध्ये [[भारत १९-वर्षांखालील क्रिकेट संघ]]ाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. १९-वर्षांखालील क्रिकेट रचनेमुळे कुणी युवा कर्णधार एका वर्षापेक्षा जास्त संघाचा कर्णधार राहु शकला नाही. श्रीकांत, शास्त्री, द्रविड आणि विराट हे पुढे जाऊन राष्ट्रीय संघाचेसुद्धा कर्णधार झाले. <small> खालील यादी ऑगस्ट २०१४ पर्यंत अद्ययावत आहे.<br> खेळाडूच्या नावापुढे असलेले </small>* <small>चिन्ह हे राष्ट्रीय संघाचे कमीतकमी एका आंतरराष्ट्रीय सामन्याचे (कसोटी, ए.दि. किंवा ट्वेंटी२०) नेतृत्व केल्याचे दर्शवते.</small> {| class="wikitable sortable" width="90%" |- bgcolor="#efefef" !क्रमांक!!नाव!!कालावधी!!class="unsortable"|प्रतिस्पर्धी!!class="unsortable"|स्थान!!सामने!!विजय!!पराभव!!अनिर्णित |- | १ || [[कृष्णाम्माचारी श्रीकांत]]* || १९७८/७९† || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || २ || ० || ० || २ |- || २ || [[वेदराज चौहान]] || १९७८/७९ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ३ || ० || ० || ३ |- || ३ || [[रवि शास्त्री]]* || १९८१ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || ० || ० || ३ |- || ४ || [[साबा करीम]]* || १९८४/८५ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || २ || ० || १ || १ |- || ५ || [[अंजु मुद्कवी]] || १९८४/८५† || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || १ || ० || ० || १ |- || ६ || [[अमिकर दयाल]] || १९८६/८७ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ३ || ० || २ || १ |- || ७ || [[मायलुआहनन सेंथिलनाथन]] || १९८७/८८ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || १ || ० || १ || ० |- || ८ || [[जनार्दन रामदास]] || १९८८/८९ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || ४ || १ || ० || ३ |- || ९ || [[रणजीब बिस्वाल]] || १९८९/९० || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ४ || १ || ० || ३ |- || १० || [[राहुल द्रविड]]* || १९९१/९२ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || २ || १ || ० || १ |- || ११ || [[मनोज जोगळेकर]] || १९९२/९३ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ३ || १ || १ || १ |- || १२ || [[श्रीधरन श्रीराम]]* || १९९३/९४ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ३ || १ || १ || १ |- || १३ || [[अमित शर्मा]] || १९९४ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || १ || ० || २ |- || १४ || [[किरण पोवार]] || १९९४/९५ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ३ || ० || २ || १ |- || १५ || [[संजय राऊल]] || १९९५/९६ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || भारत || ३ || १ || १ || १ |- || १६ || [[अजित आगरकर]]* || १९९६/९७† || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || १ || १ || ० || ० |- || १७ || [[ज्योती यादव]] || १९९६/९७ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || २ || १ || ० || १ |- || १८ || [[रीतिंदर सोढी]]* || १९९८/९९ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || १ || ० || ० || १ |- || १९ || [[अजय रात्रा]]* || २००३/०४ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ३ || १ || ० || २ |- || २० || [[मनविंदर बिसला]] || २००२† || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || १ || ० || ० || १ |- || २१ || [[यालीका ग्ननेश्वर राव]] || २००२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || २ || ० || १ || १ |- || २२ || [[अंबाटी रायुडू]]* || २००४/०५ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ३ || ३ || ० || ० |- | rowspan=3 | २३ | rowspan=3 | [[तन्मय श्रीवास्तव]] | २००६ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || १ || ० || २ |- | २००७ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || २ || १ || ० || १ |- | colspan=3 | '''एकूण''' || '''५''' || '''२''' || '''०''' || '''३''' |- | rowspan=3 | २४ | rowspan=3 | [[पियुष चावला]]* | २००६ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || २ || २ || ० || ० |- | २००७ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ३ || १ || १ || १ |- | colspan=3 | '''एकूण''' || '''५''' || '''३''' || '''१''' || '''१''' |- || २५ || [[विराट कोहली]]* || २००८ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || दक्षिण आफ्रिका || २ || १ || ० || १ |- || २६ || [[अशोक मेनारिया]] || २००९ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || २ || १ || १ || ० |- || २७ || [[विजय झोल]] || २०१४ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || २ || ० || ० || २ |- bgcolor=#DDEEFF class="sortbottom" | colspan=5 align='center' | '''एकूण''' || '''६९''' || '''२०''' || '''१२''' || '''३७''' |} === युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार === कमीत कमी एका १९-वर्षांखालील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये [[भारत १९-वर्षांखालील क्रिकेट संघ]]ाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. भारतला पहिले १९-वर्षांखालील क्रिकेट मध्ये मोठे यश मिळाले ते १९९९/२००० मध्ये, जेव्हा संघाने [[मोहम्मद कैफ]]च्या नेतृत्वाखाली १९-वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. ह्या यशाची पुनरावृत्ती झाली ती २००८/०९ आणि २०१२ मध्ये अनुक्रमे [[विराट कोहली]] आणि [[उन्मुक्त चंद]] नेतृत्वाखाली. <small>खालील यादी १६ ऑगस्ट २०१४ अद्ययावत आहे.<br> खेळाडूच्या नावापुढे असलेले </small>* <small>चिन्ह हे राष्ट्रीय संघाचे कमीतकमी एका आंतरराष्ट्रीय सामन्याचे (कसोटी, ए.दि. किंवा ट्वेंटी२०) प्रतिनिधित्व केल्याचे दर्शवते.</small></small> {| class="wikitable sortable" width="90%" |- bgcolor="#efefef" !क्रमांक!! नाव!!कालावधी!!सामने!!विजय!!पराभव!!बरोबरी!!अनिर्णित!!विजय %<ref name='winpercent'/> |- ||१|| [[रवि शास्त्री]]*||१९८१||१||०||१||०||०||०.०० |- ||२||[[साबा करीम]]*||१९८५||३||०||३||०||०||०.०० |- ||३||[[अंजु मुद्कवी]]||१९८५||१||०||१||०||०||०.०० |- ||४||[[अमिकर दयाल]]||१९८६||३||१||२||०||०||३३.३३ |- ||५||[[मायलुआहनन सेंथिलनाथन]]||१९८८||८||५||३||०||०||६२.५० |- ||६||[[अर्जुन क्रिपाल सिंग]]||१९८८||१||०||१||०||०||०.०० |- ||७||[[रणजीब बिस्वाल]]||१९८९/९०||५||४||१||०||०||८०.०० |- ||८||[[राहुल द्रविड]]*||१९९२||३||२||१||०||०||६६.६६ |- ||९||[[मनोज जोगळेकर]]||१९९३||३||३||०||०||०||१००.०० |- ||१०||[[अमित शर्मा]]||१९९४||५||२||३||०||०||४०.०० |- ||११||[[किरण पोवार]]||१९९५||३||१||२||०||०||३३.३३ |- ||१२||[[संजय राऊल]]||१९९६||३||३||०||०||०||१००.०० |- ||१३||[[ज्योती यादव]]||१९९७/८||३||१||२||०||०||३३.३३ |- ||१४||[[अमित पागनीस]]||१९९७||६||४||२||०||०||६६.६६ |- ||१५|| [[रीतिंदर सोढी]]*||१९९९||३||३||०||०||०||१००.०० |- ||१६|| [[मोहम्मद कैफ]]*||१९९९/००||९||९||०||०||०||१००.०० |- ||१७|| [[अजय रात्रा]]* ||२००१||३||२||१||०||०||६६.६६ |- ||१८|| [[पार्थिव पटेल]]*||२००२||७||४||३||०||०||५७.१४ |- ||१९||[[यालीका ग्ननेश्वर राव]]||२००२||३||३||०||०||०||१००.०० |- ||२०||[[अंबाटी रायुडू]]*||२००३/०४||१०||८||२||०||०||८०.०० |- ||२१|| [[दिनेश कार्तिक]]*||२००४||१||०||१||०||०||०.०० |- ||२२||[[मनोज तिवारी]]*||२००५||५||४||१||०||०||८०.०० |- ||२३||[[रविकांत शुक्ला]]||२००५/०६||१७||१५||२||०||०||८८.२३ |- ||२४||[[तन्मय श्रीवास्तव]]||२००६/०७||७||७||०||०||०||१००.०० |- ||२५||[[पियुष चावला]]*||२००६/०७||१२||११||१||०||०||९१.६६ |- ||२६|| [[रवींद्र जडेजा]]*||२००७||१||१||०||०||०||१००.०० |- ||२७|| [[विराट कोहली]]*||२००८||११||११||०||०||०||१००.०० |- ||२८||[[अशोक मेनारिया]]||२००९/१०||१२||८||४||०||०||६६.६६ |- ||२९||[[उन्मुक्त चंद]]||२०११/१२||२१||१५||५||१||०||७३.८० |- ||३०||[[विजय झोल]]||२०१३/१४||२२||१८||३||०||१||८५.७१ |- ||३१|| [[संजू सॅमसन]]*||२०१४||१||१||०||०||०||१००.०० |- ||३२|| [[रिकी भुई]] ||२०१५||४||४||०||०||०||१००.०० |- ||३३|| [[विराट सिंग]] ||२०१५||१||१||०||०||०||१००.०० |- ||३४|| [[रिशभ पंत]] ||२०१५||१||१||०||०||०||१००.०० |- ||३५|| [[इशान किशन]] ||२०१५||८||७||१||०||०||८७.५० |- bgcolor=#DDEEFF class="sortbottom" | colspan=3 align='center' | '''एकूण'''||'''१९३'''||'''१४५'''||'''४५'''||'''१'''||'''२'''||'''७६.१७''' |} == संदर्भ ग्रंथाची यादी == * [[सूर्य प्रकाश चतुर्वेदी]],''हमारे कप्तान: नायडू से धोनी तक'', राजकमल प्रकाशन,२०१० ==संदर्भ आणि नोंदी== {{संदर्भयादी|2}}{{refbegin}} *http://stats.espncricinfo.com/ci/engine/stats/index.html?captain_involve=7593;class=1;filter=advanced;orderby=won;result=1;result=2;result=3;result=4;team=6;template=results;type=team *http://stats.espncricinfo.com/ci/engine/records/individual/list_captains.html?class=1;id=6;type=team {{refend}} ==बाह्यदुवे== *[http://www.cricketarchive.com/ क्रिकेट आर्काइव्ह] *[http://www.cricinfo.com/ क्रिकइन्फो] [[वर्ग:भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार|*]] [[वर्ग:भारत आंतरराष्ट्रीय क्रिकेट|राष्ट्रीय]] [[वर्ग:भारतीय क्रिकेट खेळाडू|भारत कर्णधार]] [[वर्ग:क्रिकेट कर्णधार|भारत]] [[वर्ग:चित्रसमस्या असणारी पाने तात्पुरता]] aqlsrsv46yypx8emzopp9ndii2glthh 2581376 2581375 2025-06-20T20:41:25Z अभय नातू 206 [[Special:Contributions/अभय नातू|अभय नातू]] ([[User talk:अभय नातू|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:सांगकाम्या|सांगकाम्या]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. 2462818 wikitext text/x-wiki भारतीय क्रिकेट संघांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलेल्या क्रिकेट खेळाडूंची ही यादी आहे. सदर यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या [[भारतीय क्रिकेट संघ|पुरुष]], [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|महिला]] आणि [[भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघ|युवा]] संघांच्या सर्व कर्णधारांचा समावेश आहे. ३१ मे १९२६ रोजी भारत, इंपिरियल क्रिकेट कॉन्फरन्स (आताची [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]])चा सदस्य बनला. २५ जून १९३२ रोजी [[लॉर्ड्स]]वर इंग्लंड संघाविरुद्ध खेळल्यानंतर [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]], [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]], [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]], [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] आणि [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]]नंतर भारत सहावे कसोटी खेळणारे राष्ट्र बनले. दुसऱ्या महायुद्धाआधी भारत फक्त ७ कसोटी सामने खेळला, ते सर्व इंग्लंडविरुद्ध, ज्यामधील ५ सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला तर २ सामने अनिर्णित राहिले. इतर प्रतिस्पर्ध्यासोबत त्यांचा पहिला सामना झाला तो [[डॉन ब्रॅडमन|सर डॉन ब्रॅडमन]] यांच्या इनव्हिन्सिबल्सविरुद्ध ([[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ]]ाला त्यावेळे दिले गेलेले नाव). ==पुरुष क्रिकेट == <small>कसोटी मालिकेसमोर डॅगर (†) चिन्ह असल्यास, त्या मालिकेत त्या खेळाडूने कमीत कमी एका कसोटीत संघाचे नेतृत्व केले आहे, सदर खेळाडूने नियुक्त कर्णधाराचे प्रतिनिधित्व केले किंवा मालिकेमध्ये काही सामन्यांसाठी तो कर्णधार म्हणून नियुक्त केला गेला असे दर्शवते.</small> ===पुरुष कसोटी कर्णधार=== कमीत कमी एका कसोटी सामन्यामध्ये [[भारतीय क्रिकेट संघ]]ाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा ३२ कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. आता पर्यंत २७ विजयांसह [[महेंद्रसिंग धोणी]] हा सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार आहे. परदेशात मिळवलेल्या ११ विजयांसह तर [[सौरव गांगुली]] हा परदेशी सर्वात यशस्वी ठरलेला कसोटी कर्णधार आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/engine/stats/index.html?class=1;filter=advanced;groupby=captains;home_or_away=2;home_or_away=3;orderby=won;team=6;template=results;type=team|title=परदेशी सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार |लेखक=मार्टिन विल्यमसन |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=३ जानेवारी २०१७}}</ref> <small>निकालतक्ता २० डिसेंबर २०१६ पर्यंत अद्ययावत.</small> {| class="wikitable" width="90%" ! bgcolor="#ffff00" colspan=10 | भारतीय कसोटी कर्णधार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.cricinfo.com/guru?sdb=team;team=IND;class=testteam;filter=basic;opposition=0;notopposition=0;decade=0;homeaway=0;continent=0;country=0;notcountry=0;groundid=0;season=0;startdefault=1932-06-25;start=1932-06-25;enddefault=2007-05-22;end=2007-05-22;tourneyid=0;finals=0;daynight=0;toss=0;scheduledovers=0;scheduleddays=0;innings=0;followon=0;result=0;seriesresult=0;captainid=0;recent=;viewtype=summary;runslow=;runshigh=;wicketslow=;wicketshigh=;ballslow=;ballshigh=;overslow=;overshigh=;bpo=0;batevent=;conclow=;conchigh=;takenlow=;takenhigh=;ballsbowledlow=;ballsbowledhigh=;oversbowledlow=;oversbowledhigh=;bpobowled=0;bowlevent=;submit=1;.cgifields=viewtype|title=भारत – कसोटी|प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=३ जानेवारी २०१७}}</ref> |- bgcolor="#efefef" !क्रमांक ! colspan="2" | नाव !वर्ष!!प्रतिस्पर्धी!!स्थान!!सामने!!विजय!!पराभव!!अनिर्णित |- | rowspan=3 | १ | rowspan=3 |{{Css Image Crop |Image = 1932_Indian_Test_Cricket_team.jpg |bSize = 400 |cWidth = 50 |cHeight = 55 |oTop = 80 |oLeft =250 }} | rowspan=3 | [[सी.के. नायडू]] || १९३२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || १ ||० ||१ || ० |- || १९३३/३४ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ३ || ० || २ || १ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''४''' || '''०''' || '''३''' || '''१''' |- | rowspan=2 | २ | rowspan=2 | {{चित्र हवे}} | rowspan=2 | [[महाराजकुमार विजयानगरम]] || १९३६ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || '''३''' || '''०''' || '''२''' || '''१''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''३''' || '''०''' || '''२''' || '''१''' |- | rowspan=2 | ३ | rowspan=2 | [[File:Iftikhar Ali Khan Pataudi 1931cr.jpg|100px]] | rowspan=2 | [[इफ्तिखार अली खान पतौडी]] || १९४६ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || '''३''' || '''०''' || '''१''' || '''२''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''३''' || '''०''' || '''१''' || '''२''' |- | rowspan=4 | ४ | rowspan=4 | [[File:Lala Amarnath at Lord's 1936.jpg|100px|लाला अमरनाथ लॉर्डसवर १९३६]] | rowspan=4 | [[लाला अमरनाथ]] || १९४७/४८ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ५ || ० || ४ || १ |- || १९४८/४९ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ५ || ० || १ || ४ |- || १९५२/५३ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ५ || २ || १ || २ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१५''' || '''२''' || '''६''' || '''७''' |- | rowspan=4 | ५ | rowspan=4 | | rowspan=4 | [[विजय हजारे]] || १९५१/५२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ५ || १ || १ || ३ |- || १९५२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ४ || ० || ३ || १ |- || १९५२/५३ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ५ || ० || १ || ४ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१४''' || '''१''' || '''५''' || '''८''' |- | rowspan=3 | ६ | rowspan=3 |{{Css Image Crop |Image = Vinoo_Mankad_and_Pankaj_Roy_after_record_breaking_opening_stand_1956.jpg |bSize = 400 |cWidth = 50 |cHeight = 100 |oTop = 70 |oLeft =250 }} | rowspan=3 | [[विनू मंकड]] || १९५४/५५ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || ५ || ० || ० || ५ |- || १९५८/५९† || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || १ || ० || १ || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''६''' || '''०''' || '''१''' || '''५''' |- | rowspan=3 | ७ | rowspan=3 |{{चित्र हवे}} | rowspan=3 | [[गुलाम अहमद]] || १९५५/५६† || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || १ || ० || ० || १ |- || १९५८/५९ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || २ || ० || २ || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''३''' || '''०''' || '''२''' || '''१''' |- | rowspan=4 | ८ | rowspan=4 |[[File:Pollyumrigar.jpg|left|frameless]] | rowspan=4 | [[पॉली उम्रीगर]] || १९५५/५६ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ४ || २ || ० || २ |- || १९५६/५७ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ३ || ० || २ || १ |- || १९५८/५९† || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत|| १ || ० || ० || १ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''८''' || '''२''' || '''२''' || '''४''' |- | rowspan=2 | ९ | rowspan=2 | | rowspan=2 | [[हेमू अधिकारी]] || १९५८/९† || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || '''१''' || '''०''' || '''०''' || '''१''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''०''' || '''०''' || '''१''' |- | rowspan=2 | १० | rowspan=2 | | rowspan=2 | [[दत्ता गायकवाड]] || १९५९ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || '''४''' || '''०''' || '''४''' || '''०''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''४''' || '''०''' || '''४''' || '''०''' |- | rowspan=2 | ११ | rowspan=2 |{{Css Image Crop |Image = Vinoo_Mankad_and_Pankaj_Roy_after_record_breaking_opening_stand_1956.jpg |bSize = 400 |cWidth = 50 |cHeight = 100 |oTop = 70 |oLeft =165 }} | rowspan=2 | [[पंकज रॉय]] || १९५९† || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || '''१''' || '''०''' || '''१''' || '''०''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''०''' || '''१''' || '''०''' |- | rowspan=2 | १२ | rowspan=2 | | rowspan=2 | [[गुलाबराय रामचंद]] || १९५९/६० || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || '''५''' || '''१''' || '''२''' || '''२''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''५''' || '''१''' || '''२''' || '''२''' |- | rowspan=4 | १३ | rowspan=4 | | rowspan=4 | [[नरी कॉंट्रॅक्टर]] || १९६०/६१ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ५ || ० || ० || ५ |- || १९६१/६२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ५ || २ || ० || ३ |- || १९६१/६२† || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || २ || ० || २ || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१२''' || '''२''' || '''२''' || '''८''' |- | rowspan=12 | १४ | rowspan=12 | | rowspan=12 | [[मन्सूर अली खान पतौडी]] || १९६१/६२ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ३ || ० || ३ || ० |- || १९६३/६४ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ५ || ० || ० || ५ |- || १९६४/६५ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ३ || १ || १ || १ |- || १९६४/६५ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ४ || १ || ० || ३ |- || १९६६/६७ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ३ || ० || २ || १ |- || १९६७ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || ० || ३ || ० |- || १९६७/६८ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ३ || ० || ३ || ० |- || १९६७/६८ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || ४ || ३ || १ || ० |- || १९६९/७० || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ३ || १ || १ || १ |- || १९६९/७० || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ५ || १ || ३ || १ |- || १९७४/७५ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ४ || २ || २ || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''४०''' || '''९''' || '''१९''' || '''१२''' |- | rowspan=2 | १५ | rowspan=2 | | rowspan=2 | [[चंदू बोर्डे]] || १९६७/८† || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || '''१''' || '''०''' || '''१''' || '''०''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''०''' || '''१''' || '''०''' |- | rowspan=5 | १६ | rowspan=5 | | rowspan=5 | [[अजित वाडेकर]] || १९७०/७१ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ५ || १ || ० || ४ |- || १९७१ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || १ || ० || २ |- || १९७२/७३ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ५ || २ || १ || २ |- || १९७४ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || ० || ३ || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१६''' || '''४''' || '''४''' || '''८''' |- | rowspan=3 | १७ | rowspan=3 | | rowspan=3 | [[श्रीनिवास वेंकटराघवन]] || १९७४/७५† || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || १ || ० || १ || ० |- || १९७९ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ४ || ० || १ || ३ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''५''' || '''०''' || '''२''' || '''३''' |- | rowspan=13 | १८ | rowspan=13 |[[File:Sunny Gavaskar Sahara.jpg|100px|सुनील गावस्कर सहारा]] | rowspan=13 | [[सुनील गावस्कर]] || १९७५/७६† || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || १ || १ || ० || ० |- || १९७८/७९ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ६ || १ || ० || ५ |- || १९७९/८० || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ६ || २ || ० || ४ |- || १९७९/८० || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ५ || २ || ० || ३ |- || १९८०/८१ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ३ || १ || १ || १ |- || १९८०/८१ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || ३ || ० || १ || २ |- || १९८१/८२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ६ || १ || ० || ५ |- || १९८२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || ० || १ || २ |- || १९८२/८३ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || १ || ० || ० || १ |- || १९८२/८३ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || ६ || ० || ३ || ३ |- || १९८४/८५ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || २ || ० || ० || २ |- || १९८४/८५ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ५ || १ || २ || २ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण'''|| '''४७''' || '''९''' || '''८''' || '''३०''' |- | rowspan=7 | १९ | rowspan=7 | | rowspan=7 | [[बिशनसिंग बेदी]] || १९७५/७६ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || २ || ० || १ || १ |- || १९७५/७६ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ४ || १ || २ || १ |- || १९७६/७७ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ३ || २ || ० || १ |- || १९७६/७७ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ५ || १ || ३ || १ |- || १९७७/७८ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ५ || २ || ३ || ० |- || १९७८/७९ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || ३ || ० || २ || १ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''२२''' || '''६''' || '''११''' || '''५''' |- | rowspan=3 | २० | rowspan=3 | | rowspan=3 | [[गुंडप्पा विश्वनाथ]] | १९७९/८०† || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || १ || ० || ० || १ |- || १९७९/८० || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || १ || ० || १ || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''२''' || '''०''' || '''१''' || '''१''' |- | rowspan=10 | २१ | rowspan=10 |[[File:Kapil Dev at Equation sports auction.jpg|100px|कपिल देव]] | rowspan=10 | [[कपिल देव]] | १९८२/८३ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ५ || ० || २ || ३ |- || १९८३/८४ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ३ || ० || ० || ३ |- || १९८३/८४ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ६ || ० || ३ || ३ |- || १९८५ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || ३ || ० || १ || २ |- || १९८५/८६ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ३ || ० || ० || ३ |- || १९८६ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || २ || ० || १ |- || १९८६/८७ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ३ || ० || ० || २<ref name='tied'>एका कसोटी सामन्यात बरोबरी</ref> |- || १९८६/८७ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || ३ || २ || ० || १ |- || १९८६/८७ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ५ || ० || १ || ४ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''३४''' || '''४''' || '''७''' || '''२३'''<ref name='tied'/> |- | rowspan=4 | २२ | rowspan=4 | [[File:DilipVengsarkar.jpg|100px]] | rowspan=4 | [[दिलीप वेंगसरकर]] | १९८७/८८ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ३ || ० || १ || २ |- || १९८८/८९ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ३ || २ || १ || ० |- || १९८८/८९ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ४ || ० || ३ || १ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१०''' || '''२''' || '''५''' || '''३''' |- | rowspan=2 | २३ | rowspan=2 |[[File:RaviShastri.jpg|100px|रवि शास्त्री १]] | rowspan=2 | [[रवि शास्त्री]] || १९८७/८† || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || '''१''' || '''१''' || '''०'''|| '''०''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''१''' || '''०''' || '''०''' |- | rowspan=2 | २४ | rowspan=2 |[[File:Former cricketer K. Srikkanth meets PM Modi (cropped).jpg|100px]] | rowspan=2 | [[कृष्णम्माचारी श्रीकांत]] || १९८९/९० || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || '''४''' || '''०''' || '''०''' || '''४''' |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''४''' || '''०''' || '''०''' || '''४''' |- | rowspan=21 | २५ | rowspan=21 |[[File:Mohammad Azharuddin (1).jpg|100px]] | rowspan=21 | [[मोहम्मद अझरुद्दीन]] | १९८९/९० || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || ३ ||०||१||२ |- || १९९० || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ ||०||१||२ |- || १९९०/९१ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || १ || १ || ० || ० |- || १९९१/९२ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ५ ||०||४||१ |- || १९९२/९३ || [[झिम्बाब्वे क्रिकेट संघ|झिम्बाब्वे]] || झिम्बाब्वे || १ || ० || ० || १ |- || १९९२/९३ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || दक्षिण आफ्रिका || ४ || ० || १ || ३ |- || १९९२/९३ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ३ || ३ || ० || ० |- || १९९२/९३ || [[झिम्बाब्वे क्रिकेट संघ|झिम्बाब्वे]] || भारत || १ || १ || ० || ० |- || १९९३ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || ३ || १ || ० || २ |- || १९९३/९४ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || ३ || ३ || ० || ० |- || १९९३/९४ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || १ ||०||०||१ |- || १९९४/९५ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ३ ||१||१||१ |- || १९९५/९६ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ३ ||१|| ० ||२ |- || १९९६ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || ० || १ || २ |- || १९९७/९८ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ३ || २ || १ || ० |- || १९९८/९९ || [[झिम्बाब्वे क्रिकेट संघ|झिम्बाब्वे]] || झिम्बाब्वे || १ || ० || १ || ० |- || १९९८/९९ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || २ || ० || १ || १ |- || १९९८/९९ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || २ || १ || १ || ० |- || १९९८/९९<ref name='asian'>आशियाई कसोटी चॅंपियनशीप</ref> || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || १ || ० || १ || ० |- || १९९८/९९<ref name='asian'/> || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || १ || ० || ० || १ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''४७''' ||१४||१४||१९<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/ci/engine/series/62275.html|title=निकाल {{!}} जागतिक {{!}} इएसपीएन क्रिकइन्फो|संकेतस्थळ= इएसपीएन क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=३ जानेवारी २०१७}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/ci/engine/series/६२२९५.html|title= निकाल {{!}} जागतिक {{!}} इएसपीएन क्रिकइन्फो|संकेतस्थळ= इएसपीएन क्रिकइन्फो |ॲक्सेसदिनांक=३ जानेवारी २०१७}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/ci/engine/series/६२३२२.html|title= निकाल {{!}} जागतिक {{!}} इएसपीएन क्रिकइन्फो|संकेतस्थळ= इएसपीएन क्रिकइन्फो |ॲक्सेसदिनांक=३ जानेवारी २०१७}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.sportskeeda.com/cricket/mohammed-azharuddin-sourav-ganguly-ms-dhoni-india-best-captain|title=मोहम्मद अझरुद्दीन वि सौरव गांगुली वि महेंद्रसिंग धोणी – कोण आहे अलिकडच्या काळातील भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार?|दिनांक=१२ ऑगस्ट २०१४|ॲक्सेसदिनांक=३ जानेवारी २०१७}}</ref> |- | rowspan=10 | २६ | rowspan=10 |[[File:Sachin at Castrol Golden Spanner Awards.jpg|100px|सचिन तेंडुलकर]] | rowspan=10 | [[सचिन तेंडुलकर]] | १९९६/९७ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || १ || १ || ० || ० |- || १९९६/९७ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || भारत || ३ || २ || १ || ० |- || १९९६/९७ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || दक्षिण आफ्रिका || ३ || ० || २ || १ |- || १९९६/९७ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ५ || ० || १ || ४ |- || १९९७ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || २ || ० || ० || २ |- || १९९७/९८ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || ३ || ० || ० || ३ |- || १९९९/२००० || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ३ || १ || ० || २ |- || १९९९/२००० || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ३ || ० || ३ || ० |- || १९९९/२००० || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || भारत || २ || ० || २ || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''२५''' || '''४''' || '''९''' || '''१२''' |- | rowspan=21 | २७ | rowspan=21 |[[File:Sourav Ganguly closeup-2.jpg|100px|सौरव गांगुली]] | rowspan=21 | [[सौरव गांगुली]] | २०००/०१ || [[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]] || बांगलादेश || १ || १ || ० || ० |- || २०००/०१ || [[झिम्बाब्वे क्रिकेट संघ|झिम्बाब्वे]] || भारत || २ || १ || ० || १ |- || २०००/०१ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ३ || २ || १ || ० |- || २००१ || [[झिम्बाब्वे क्रिकेट संघ|झिम्बाब्वे]] || झिम्बाब्वे || २ || १ || १ || ० |- || २००१ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || ३ || १ || २ || ० |- || २००१/०२ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || दक्षिण आफ्रिका || २ || ० || १ || १ |- || २००१/०२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ३ || १ || ० || २ |- || २००१/०२ || [[झिम्बाब्वे क्रिकेट संघ|झिम्बाब्वे]] || भारत || २ || २ || ० || ० |- || २००१/०२ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ५ || १ || २ || २ |- || २००२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ४ || १ || १ || २ |- || २००२/०३ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ३ || २ || ० || १ |- || २००२/०३ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || २ || ० || २ || ० |- || २००३/०४ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || १ || ० || ० || १ |- || २००३/०४ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ४ || १ || १ || २ |- || २००३/०४ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || १ || १ || ० || ० |- || २००४/०५ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || २ || ० || १ || १ |- || २००४/०५ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] ||भारत || २ || १ || ० || १ |- || २००४/०५ || [[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]] || बांगलादेश || २ || २ || ० || ० |- || २००४/०५ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ३ || १ || १ || १ |- || २००५/०६ || [[झिम्बाब्वे क्रिकेट संघ|झिम्बाब्वे]] || झिम्बाब्वे || २ || २ || ० || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''४९''' || '''२१''' || '''१३''' || '''१५''' |- | rowspan=11 |२८ | rowspan=11 |[[File:Rahul Dravid at GQ Men Of The Year 2012 AWARD.jpg|100px|राहुल द्रविड]] | rowspan=11 | [[राहुल द्रविड]] | २००३/०४† || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || १ || ० || ० || १ |- || २००३/०४† || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || २ || १ || १ || ० |- || २००४/०५† || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || २ || १ || १ || ० |- || २००५/०६ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || २ || १ || ० || १ |- || २००५/०६ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || ३ || ० || १ || २ |- || २००५/०६ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ३ || १ || १ || १ |- || २००५/०६ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ४ || १ || ० || ३ |- || २००६/०७ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || दक्षिण आफ्रिका || ३ || १ || २ || ० |- || २००७ || [[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]] || बांगलादेश || २ || १|| ० || १ |- || २००७ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || १ || ० || २ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''२५''' || '''८''' || '''६''' || '''११''' |- | rowspan=5 | २९ | rowspan=5 |[[File:Virender Sehwag at the NDTV Marks for Sports event 13.jpg|100px|Virender Sehwag]] | rowspan=5 | [[विरेंद्र सेहवाग]] || २००५/६† || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || १ || १ || ० || ० |- || २००९† || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || १ || ० || ० || १ |- || २०१०† || [[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]] || बांगलादेश || १ || १ || ० || ० |- || २०१२† || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || १ || ० || १ || ० |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''४''' || '''२''' || '''१''' || '''१''' |- | rowspan=6 | ३० | rowspan=6 |[[File:Anil Kumble.jpg|100px|अनिल कुंबळे]] | rowspan=6 | [[अनिल कुंबळे]] | २००७ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ३ || १ || ० || २ |- || २००७/०८ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ४ || १ || २ || १ |- || २००८ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || भारत || २ || ० || १ || १ |- || २००८ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || ३ || १ || २ || ० |- || २००८ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || २ || ० || ० || २ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१४''' || '''३''' || '''५''' || '''६''' |- | rowspan=24 | ३१ | rowspan=24 |[[File:Mahendra Singh Dhoni January 2016 (cropped).jpg|100px]] | rowspan=24 | [[महेंद्रसिंग धोणी]] || २००८† || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || भारत || १ || १ || ० || ० |- || २००८† || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || २ || २ || ० || ० |- || २००८ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || २ || १ || ० || १ |- || २००९ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || २ || १ || ० || १ |- || २००९ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || ३ || २ || ० || १ |- || २०१० || [[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]] || बांगलादेश || १ || १|| ० || ० |- || २०१० || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || भारत || २ || १ || १ || ० |- || २०१० || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || ३ || १|| १ || १ |- || २०१० || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || २ || २|| ० || ० |- || २०१० || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ३ || १|| ० || २ |- || २०१० || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || दक्षिण आफ्रिका || ३ || १ || १ || १ |- || २०११ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज|| ३ || १ || ० || २ |- || २०११ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड|| ४ || ० || ४ || ० |- || २०११ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत|| ३ || २ || ० || १ |- || २०११/१२ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया||३|| ० ||३|| ० |- || २०१२ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत|| २ || २ || ० || ० |- || २०१२/१३ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत|| ४ || १ || २ || १ |- || २०१२/१३ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ४ || ४ || ० || ० |- || २०१३/१४ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत|| २ || २ || ० || ० |- || २०१३/१४ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || दक्षिण आफ्रिका || २ || ० || १ || १ |- || २०१३/१४ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || २ || ० || १ || १ |- || २०१४ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ५ || १ || ३ || १ |- || २०१४/१५ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || २ || ० || १ || १ |-bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''६०''' || '''२७''' || '''१८''' || '''१५''' |- | rowspan="10" | ३२ | rowspan="10" | [[File:Virat_Kohli_June_2016_(cropped).jpg|100px|विराट कोहली]] | rowspan="10" | [[विराट कोहली]] || २०१४/१५† || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || २ || ० || १ || १ |- || २०१५ || [[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]] || बांगलादेश || १ || ० || ० || १ |- || २०१५ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || ३ || २ || १ || ० |- || २०१५/१६ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || भारत || ४ || ३ || ० || १ |- || २०१६ || [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज || ४ || २ || ० || २ |- || २०१६/१७ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ३ || ३ || ० || ० |- || २०१६/१७ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ५ || ४ || ० || १ |- || २०१७ || [[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]] || भारत || १ || १ || ० || ० |- || २०१७ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ३ || १ || १ || १ |-bgcolor="#F5DEB3" | colspan="3" |'''एकूण'''||'''२६'''||'''१६'''|| '''३''' || '''७''' |- | rowspan="5" | ३३ | rowspan="5" | [[File:Ajinkya Rahane 2016 (cropped).jpg|75px|]] | rowspan="5" | [[अजिंक्य रहाणे]] |[[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७|२०१७]]† || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || १ || १ || ० || ० |- |[[अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८|२०१८]] ||[[अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ|अफगाणिस्तान]]||भारत || १ ||१ ||० ||० |- |[[भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१|२०२०-२१]]†||[[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] ||ऑस्ट्रेलिया ||३ || २ || ० || १ |- |[[न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२|२०२१-२२]]† |[[न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ|न्यू झीलंड]]||भारत||१||०||०||१ |- bgcolor="#F5DEB3" | colspan="3" | '''एकूण''' || '''६''' || '''४''' || '''०''' || '''२''' |- | rowspan="3" |३४ | rowspan="3" |[[चित्र:KL_Rahul_at_Femina_Miss_India_2018_Grand_Finale_(cropped).jpg|131x131अंश]] | rowspan="3" |[[लोकेश राहुल]] |[[भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२|२०२१-२२]]†||[[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] ||दक्षिण आफ्रिका||१||०||१||० |- |[[भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२२-२३|२०२२]]||[[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]]||बांगलादेश||२||२||०||० |-bgcolor="#F5DEB3" | colspan="3" |'''एकूण''' ||'''३''' ||'''२''' ||'''१'''||'''०''' |- | rowspan="7" |३५ | rowspan="7" |[[चित्र:Rohit_Sharma_2015_(cropped).jpg|100x100अंश]] | rowspan="7" |[[रोहित शर्मा]] |[[श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२|२०२२]] |[[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] |भारत |२ |२ |० |० |- |[[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३|२०२३]] |[[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] |भारत |४ |२ |१ |१ |- |[[२०२३ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल|२०२३]] |[[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] |इंग्लंड |१ |० |१ |० |- |[[भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२३|२०२३]] |[[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] |वेस्ट इंडीज |२ |१ |० |१ |- |[[भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२३-२४|२०२३]] |[[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] |दक्षिण आफ्रिका |२ |१ |१ |० |- |[[इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२३-२४|२०२४]] |[[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] |भारत |५ |४ |१ |० |-bgcolor="#F5DEB3" | colspan="3" |'''एकूण''' |'''१६''' |'''१०''' |'''४''' |'''२''' |- | rowspan="2" |३६ | rowspan="2" |[[चित्र:Jasprit_Bumrah_(4).jpg|100x100अंश]] | rowspan="2" |[[जसप्रीत बुमराह]] |[[भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१|२०२२]]† |[[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] |इंग्लंड |१ |० |१ |० |-bgcolor="#F5DEB3" | colspan="3" |'''एकूण''' |'''१''' |'''०''' |'''१''' |'''०''' |- bgcolor="#DDEEFF" | colspan="6" align="left" | '''एकूण''' ||'''५७९'''||'''१७८'''|| '''१७८''' || '''२२३'''<ref name="tied" /> |} ===पुरुष आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार === कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये [[भारतीय क्रिकेट संघ]]ाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. {| class="wikitable sortable" width="90%" |- bgcolor="#efefef" !क्रमांक!!छायाचित्र!!नाव!!कालावधी!!सामने!!विजय!!पराभव!!बरोबरी!!अनिर्णित!!विजय %<ref name='winpercent'>विजय % = (जिंकलेले सामने+०.५*बरोबरीत सुटलेले सामने)/(खेळलेले सामने-रद्द सामने) आणि नजीकच्या क्रमांकाशी पूर्णांकित टक्केवारी</ref> |- ||१|| ||[[अजित वाडेकर]]||१९७४||२||०||२||०||०||०.०० |- ||२|| ||[[श्रीनिवास वेंकटराघवन]]||१९७५–७९||७||१||६||०||०||१४.२८ |- ||३|| ||[[बिशनसिंग बेदी]]||१९७५-७८||४||१||३||०||०||२५.०० |- ||४||[[File:Sunny Gavaskar Sahara.jpg|100px]]||[[सुनिल गावसकर]]||१९८०–८५||३७||१४||२१||०||२||४०.०० |- ||५|| ||[[गुंडप्पा विश्वनाथ]]||१९८०||१||०||१||०||०||०.०० |- ||६|| [[File:Kapil Dev at Equation sports auction.jpg|100px]] ||[[कपिल देव]]||१९८२–९२||७४||३९||३३||०||२||५४.१६ |- ||७|| [[File:Syed Mujtaba Hussain Kirmani.jpg|100px]]||[[सय्यद किरमाणी]]||१९८३||१||०||१||०||०||०.०० |- ||८||[[File:MohinderAmarnath.jpg|100px]] ||[[मोहिंदर अमरनाथ]]||१९८४||१||०||०||०||१||NA |- ||९|| [[File:Ravi_Shastri.jpg|100px]] ||[[रवि शास्त्री]]||१९८६–९१||११||४||७||०||०||३६.३६ |- ||१०|| [[File:DilipVengsarkar.jpg|100px]] ||[[दिलीप वेंगसरकर]]||१९८७–८८||१८||८||१०||०||०||४४.४४ |- ||११|| [[File:Former_cricketer_K._Srikkanth_meets_PM_Modi_(cropped).jpg|100px]] ||[[कृष्णम्माचारी श्रीकांत]]||१९८९/९०||१३||४||८||०||१||३३.३३ |- ||१२|| [[File:Mohammad Azharuddin (1).jpg|100px]] ||[[मोहम्मद अझरुद्दीन]]||१९८९–९९||१७४||९०||७२||८||४||५१.७२ |- ||१३|| [[File:Sachin at Castrol Golden Spanner Awards.jpg|100px]] ||[[सचिन तेंडुलकर]]||१९९६–९९||७३||२३||४३||१||६||३५.०७ |- ||१४|| [[File:Ajay_jadega.jpg|100px]] ||[[अजय जडेजा]]||१९९८–१९९९||१३||८||५||०||०||६१.५३ |- ||१५|| [[File:Sourav Ganguly closeup-2.jpg|100px]] ||[[सौरव गांगुली]]||१९९९–२००५||१४६<ref name='tsunami'>सौरव गांगुलीने विश्व क्रिकेट त्सुनामी अपिलसाठी १० जानेवारी २००५ रोजी आयसीसी विश्व एकादश संघाविरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात एसीसी आशियाई एकादश संघाचे सुद्धा नेतृत्व केले होते. एसीसी आशियाई एकादश संघाने सामना गमावला.</ref>||७६||६५<ref name='tsunami'/>||०||५||५३.९० |- ||१६|| [[File:Rahul Dravid at GQ Men Of The Year 2012 AWARD.jpg|100px]] ||[[राहुल द्रविड]]||२०००–०७||७९||४२||३३||०||४||५६.०० |- ||१७|| [[File:Anil Kumble.jpg|100px]] ||[[अनिल कुंबळे]]||२००२||१||१||०||०||०||१००.०० |- ||१८|| [[File:Virender Sehwag at the NDTV Marks for Sports event 13.jpg|100px]] ||[[विरेंद्र सेहवाग]]||२००३–२०११||१२||७||५||०||०||५८.३३ |- ||१९|| [[File:Mahendra Singh Dhoni receiving Padma Bhushan.jpg|100px]] ||[[महेंद्रसिंग धोणी]]||२००७–१८||१९९||११०||७४||४||११||५९.५७ |- ||२०|| [[File:Suresh Raina1.jpg|100px]] ||[[सुरेश रैना]]||२०१०–१४||१२||६||५||०||१||५४.५४ |- ||२१|| [[File:Gautam Gambhir (IPL 2014).jpg|100px]] ||[[गौतम गंभीर]]||२०१०–११||६||६||०||०||०||१००.०० |- ||२२|| [[File:Virat Kohli portrait.jpg|100px]] ||[[विराट कोहली]]||२०१३–२१||९५||६५||२७||१||२||६८.४२ |- ||२३|| [[File:Ajinkya Rahane 2016 (cropped).jpg|100px]] ||[[अजिंक्य रहाणे]] ||२०१५|| ३ ||३ || ० || ० || ० ||१००.०० |- ||२४||[[File:Rohit Sharma November 2016 (cropped).jpg|100px]] |[[रोहित शर्मा]] || २०१७–सद्य || ४५ || ३४ || १० || ० || १ || ७५.५५ |- ||२५||[[File:Shikhar Dhawan January 2016 (cropped).jpg|100px]] |[[शिखर धवन]] || २०२१-२२ || १२ || ७ || ३ || ० || २ || ५८.३३ |- ||२६||[[File:KL Rahul at Femina Miss India 2018 Grand Finale (cropped).jpg|100px]] |[[ लोकेश राहुल]] ||२०२२–२३ || १२ || ८ || ४ || ० || ० || ६६.६७ |- ||२७||[[File:Hardik Pandya (cropped).jpg|100px]] |[[हार्दिक पंड्या]] || २०२३ || ३ || २ || १ || ० || ० || ६६.६७ |-bgcolor=#DDEEFF class="sortbottom" | colspan="4" align="center" | '''एकूण'''||'''१०५५'''||'''५५९'''||'''४४३'''||'''९'''||'''४४''' |'''५२.९८''' |} === पुरुष आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० कर्णधार === कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये [[भारतीय क्रिकेट संघ]]ाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. {| class="wikitable sortable" width="90%" |- bgcolor="#efefef" !क्रमांक!!छायाचित्र!!नाव!!कालावधी!!सामने!!विजय!!पराभव!!बरोबरी!!अनिर्णित!!विजय %<ref name="winpercent"/> |- ||१||[[File:Virender Sehwag at the NDTV Marks for Sports event 13.jpg|100px]]||[[विरेंद्र सेहवाग]]||२००६||१||१||०||०||०||१००.०० |- ||२|| [[File:Mahendra Singh Dhoni January 2016 (cropped).jpg|100px]] ||[[महेंद्रसिंग धोणी|महेंद्रसिंग धोनी]]||२००७–१६||७२||४१||२८||१||२||५९.२८ |- ||३|| [[File:Suresh_Raina_grace_the_'Salaam_Sachin'_conclave.jpg|100px]] ||[[सुरेश रैना]]||२०१०–११||३||३||०||०||०||१००.०० |- ||४|| [[File:Ajinkya Rahane 2016 (cropped).jpg|100px]] ||[[अजिंक्य रहाणे]]||२०१५||२||१||१||०||०||५०.०० |- |५ || [[File:Virat Kohli in PMO New Delhi.jpg|100px]] ||[[विराट कोहली]] ||२०१७-२१|| ५० || ३० || १६ || २ || २ || ६६.६७ |- | ६ || [[File:Prime Minister Of Bharat Shri Narendra Damodardas Modi with Shri Rohit Gurunath Sharma (Cropped).jpg|100px]] ||[[रोहित शर्मा]] ||२०१७-२१|| ६२ || ४९ || १२ || १ || ० || ७९.०३ |- |७||[[File:Shikhar Dhawan January 2016 (cropped).jpg|100px]]||[[शिखर धवन]] ||२०२१|| ३ || १ || २ || ० || ० || ३३.३३ |- | ८ || [[File:Prime Minister Of Bharat Shri Narendra Modi with Rishabh Pant.jpg|100px]] || [[रिषभ पंत]] ||२०२२ || ५ || २ || २ || ० || १ || ५०.०० |- | ९ ||[[File:Hardik Pandya in PMO New Delhi.jpg|100px]]||[[हार्दिक पंड्या]]||२०२२-सद्य|| १६ || १० || ५ || १ || ० || ६५.५२ |- | १० ||[[File:KL Rahul at Femina Miss India 2018 Grand Finale (cropped).jpg|100px]]||[[लोकेश राहुल]]|| २०२२ || १ || १ || ० || ० || ० ||१००.०० |- | ११ ||[[File:Jasprit Bumrah in PMO New Delhi.jpg|100px]]||[[जसप्रीत बुमराह]] || २०२३ || २ || २ || ० || ० || ० || १००.०० |- | १२||[[File:No_image_available.svg|100px]]||[[ऋतुराज गायकवाड]]|| २०२३ || ३ || २ || ० || ० || १ || ६६.६७ |- |१३ ||[[File:Suryakumar Yadav in PMO New Delhi.jpg|100px]] ||[[सूर्यकुमार यादव]]|| २०२३ || ७ || ५ || २ || ० || ० || ७१.४२ |- | १४ || [[File:Shubman Gill 2023 (cropped).jpg|100px]]||[[शुभमन गिल]]||२०२४ || ५ || ४ || १ || ० || ० || ८०.०० |- |- bgcolor="#DDEEFF" class="sortbottom" | colspan="4" align="center" | '''एकूण'''||'''२३२'''||'''१५२'''||'''६९'''||'''५'''||'''६'''||'''६५.५१''' |} ==महिला क्रिकेट== <small>कसोटी मालिकेसमोर डॅगर (†) चिन्ह असल्यास, त्या मालिकेत त्या खेळाडूने कमीत कमी एका कसोटीत संघाचे नेतृत्व केले आहे, सदर खेळाडूने नियुक्त कर्णधाराचे प्रतिनिधित्व केले किंवा मालिकेमध्ये काही सामन्यांसाठी ती कर्णधार म्हणून नियुक्त केला गेला असे दर्शवते.</small> ===महिला कसोटी कर्णधार=== कमीत कमी एका कसोटी सामन्यामध्ये [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारतीय महिला क्रिकेट संघाचे]] नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. <small>११ सप्टेंबर २०१४ पर्यंत अद्ययावत.</small> {| class="wikitable" width="90%" ! colspan="10" bgcolor="#efefef" | भारतीय महिला कसोटी कर्णधार |- bgcolor="#efefef" !क्रमांक!!चित्र!!नाव!!वर्ष!!प्रतिस्पर्धी!!स्थान!!सामने!!विजय!!पराभव!!अनिर्णित !विजय % |- | rowspan=5 | १ | rowspan=5 | [[File:Shantha Rangaswamy (2017).jpg|100px]] | rowspan=5 | [[शांता रंगस्वामी]] | १९७६/७७ || [[वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] || भारत || ६ || १ || १ || ४ | rowspan="4" |८.३३ |- ||१९७६/७७ || [[न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || १ || ० || ० || १ |- || १९७६/७७ || [[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || १ || ० || १ || ० |- || १९८३/८४ || [[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ४ || ० || ० || ४ |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१२''' || '''१''' || '''२''' || '''९''' | |- | rowspan=2 | २ | rowspan=2 | | rowspan=2 | [[निलिमा जोगळेकर]] | १९८४/१९८५† || [[न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || १ || ० || ० || १ |००.०० |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''०''' || '''०''' || '''१''' | |- | rowspan=3 | ३ | rowspan=3 | | rowspan=3 | [[डायना एडूल्जी]] | १९८४/८५ || [[न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || २ || ० || ० || २ | rowspan="2" |००.०० |- || १९८६ || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || २ || ० || ० || २ |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''४''' || '''०''' || '''०''' || '''४''' | |- | rowspan=3 | ४ | rowspan=3 | | rowspan=3 | [[शुभांगी कुलकर्णी]] | १९८६† || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || १ || ० || ० || १ | rowspan="2" |०.०० |- || १९९०/९१ || [[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || २ || ० || १ || १ |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''३''' || '''०''' || '''१''' || '''२''' | |- | rowspan=2 | ५ | rowspan=2 | | rowspan=2 | [[संध्या अग्रवाल]] | १९९०/९१† || [[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || १ || ० || १ || ० |०.०० |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''०''' || '''१''' || '''०''' | |- | rowspan=3 | ६ | rowspan=3 | | rowspan=3 | [[पुर्णिमा राऊ]] | १९९४/९५ || [[न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || १ || ० || ० || १ | rowspan="2" |०.०० |- || १९९५/९६ || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || २ || ० || १ || १ |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''३''' || '''०''' || '''१''' || '''२''' | |- | rowspan=2 | ७ | rowspan=2 | | rowspan=2 | [[प्रमिला भट]] | १९९५/९६† || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || १ || ० || ० || १ |०.०० |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''०''' || '''०''' || '''१''' | |- | rowspan=2 | ८ | rowspan=2 | | rowspan=2 | [[चंद्रकांता कौल]] || १९९९ || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || १ || ० || ० || १ |०.०० |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''०''' || '''०''' || '''१''' | |- | rowspan=4 | ९ | rowspan=4 | [[File:Anjum Chopra (10 March 2009, Sydney).jpg|100px]] | rowspan=4 | [[अंजूम चोप्रा]] | २००१/०२ || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || १ || ० || ० || १ | rowspan="3" |३३.३३ |- || २००१/०२ || [[दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || दक्षिण आफ्रिका || १ || १ || ० || ० |- || २००२ || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || १ || ० || ० || १ |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''३''' || '''१''' || '''०''' || '''२''' | |- | rowspan=2 | १० | rowspan=2 | | rowspan=2 | [[ममता माबेन]] || २००३/०४ || [[न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || १ || ० || ० || १ |०.०० |- bgcolor="#F5DEB3" | colspan=3 | '''एकूण''' || '''१''' || '''०''' || '''०''' || '''१''' | |- | rowspan="8" | ११ | rowspan="8" | [[File:Mithali_Raj.png|100px]] | rowspan="8" | [[मिताली राज]] | २००५/०६ || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || १ || ० || ० || १ | rowspan="7" |३७.५० |- || २००५/०६ || [[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया|| १ || ० || १ || ० |- || २००६ || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || २|| १ || ० || १ |- || २०१४ || [[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || १|| १ || ० || ० |- |२०१४ |[[दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] |भारत |१ |१ |० |० |- |२०२१ |[[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] |इंग्लंड |१ |० |० |१ |- |२०२१ |[[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] |ऑस्ट्रेलिया |१ |० |० |२ |- bgcolor="#F5DEB3" | colspan="3" | '''एकूण''' || '''८''' || '''३''' || '''१''' || '''५''' | |- | rowspan="4" |१२ | rowspan="4" |[[File:Harmanpreet Kaur 2017 (sq cropped).jpg|100px]] | rowspan="4" |[[हरमनप्रीत कौर]] |२०२३ |[[इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|इंग्लंड]] |भारत |१ |१ |० |० | rowspan="4" |१००.०० |- |२०२३ |[[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] |भारत |१ |१ |० |० |- |२०२४ |[[दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] |भारत |१ |१ |० |० |-bgcolor="#F5DEB3" | colspan="3" |'''एकूण''' |'''३''' |'''३''' |'''०''' |'''०''' |- bgcolor="#DDEEFF" | colspan="5" align="center" | '''एकूण''' || '''४१''' || '''८''' || '''६''' || '''२७''' | |} ===महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार=== कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ]]ाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. {| class="wikitable sortable" width="90%" |- bgcolor="#efefef" !क्रमांक!!नाव!!कालावधी!!सामने!!विजय!!पराभव!!बरोबरी!!अनिर्णित!!विजय %<ref name='winpercent'/> |- ||१||[[डायना एडुल्जी]]||१९७८–९३||१८||७||११||०||०<ref>ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला संघाविरुद्ध १९९०/९१ मोसमातील [[मनुका ओव्हल]] ([[कॅनबेरा]]) येथील सामना रद्द करण्यात आला होता.(स्रोत: {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://cricketarchive.com/Archive/Scorecards/53/53914.html|title=ऑस्ट्रेलिया महिला वि भारत महिला – भारत महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा१९९०/९१ (एकमेव ए.दि.)|प्रकाशक=क्रिकेटआर्काइव्ह.कॉम |ॲक्सेसदिनांक=४ जानेवारी २०१७}}) परंतू सामना पुस्तकांमध्ये नोंदवला गेला नाही.</ref>||३८.८८ |- ||२||[[शांता रंगस्वामी]]||१९८२–८४||१६||४||१२||०||०||२५.०० |- ||३||[[शुभांगी कुलकर्णी]]||१९८६||१||०||१||०||०||०.०० |- ||४||[[पुर्णिमा राऊ]]||१९९५||८||५||३||०||०<ref>ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्धचा १९९४/९५ च्या मोसमातील स्मॉलबोन पार्क (रोटोरुआ) येथील सामना रद्द करण्यात आला. (स्रोत: {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://cricketarchive.com/Archive/Scorecards/60/60197.html|title=ऑस्ट्रेलिया महिला v भारत महिला – न्यू झीलंड महिला सेन्टेनरी स्पर्धा १९९४/९५||प्रकाशक=क्रिकेटआर्काइव्ह.कॉम |ॲक्सेसदिनांक=४ जानेवारी २०१७}}) परंतू सामना पुस्तकांमध्ये नोंदवला गेला नाही.</ref>||६२.५० |- ||५||[[प्रमिला भट]]||१९९५–९७||७||५||१||१<ref>भारत महिला आणि न्यू झीलंड महिला संघ यांच्या दरम्यानचा १९९७/९८ हिरो होंडा महिला क्रिकेट विश्वचषकाचा [[नेहरू स्टेडियम, इंदूर]] येथील सामना भारत १७६धावांवर सर्वबाद झाल्याने बरोबरीत सुटला महिला क्रिकेटमधील बरोबरीत सुटलेला हा भारताचा एकमेव सामना (स्रोत:{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.cricinfo.com/db/ARCHIVE/WORLD_CUPS/WWC97/IND-WOMEN_NZ-WOMEN_WWC97_WODI21_17DEC1997.html|title=भारत महिला वि न्यू झीलंड महिला, गट ब – हिरो होंडा महिला विश्वचषक, १९९७/९८, २१वा सामना |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=४ जानेवारी २०१७}})</ref>||०<ref>श्रीलंका महिला संघाविरुद्धचा १९९७/९८ हिरो होंडा महिला क्रिकेट विश्वचषकाचा [[फिरोजशाह कोटला]] ([[नवी दिल्ली]]) येथील सामना रद्द झाला.(स्रोत: {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://cricketarchive.com/Archive/Scorecards/६४/६४९७१.html|title=भारत महिला वि श्रीलंका महिला – हिरो होंडा महिला विश्वचषक १९९७/९८ (गट ब)|प्रकाशक=क्रिकेटआर्काइव्ह.कॉम|ॲक्सेसदिनांक=४ जानेवारी २०१७}}{{मृत दुवा|date=July 2023 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}) परंतू सामना पुस्तकांमध्ये नोंदवला गेला नाही.</ref>||७८.५७ |- ||६||[[चंद्रकांता कौल]]||१९९९||४||३||१||०||०||७५.०० |- ||७||[[अंजू जैन]]||२०००||८||५||३||०||०||६२.५० |- ||८||[[अंजूम चोप्रा]]||२००२<ref>न्यू झीलंड महिलांचा भारत दौरा रद्द करण्यात आला. दौर्‍यावर ५ एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते</ref>–१२||२८||१०||१७||०||१<ref>२००२ महिला त्रिकोणी मालिकेचे, इंग्लंड महिला संघ आणि आयर्लंड महिला संघ यांचा सहभाग असलेले भारताचे दोन सामने रद्द करण्यात आले. [[रिव्हरसाईड मैदान]] ([[चेस्टर-ल-स्ट्रीट]]) येथील सामना अधिकृत नोंदणी केला गेला परंतू फॉक्स लॉज क्रिकेट क्लब (स्ट्राबेन) येथील दुसरा सामना नोंदवला गेला नाही.</ref>||३७.०३ |- ||९||[[ममता माबेन]]||२००३–०४||१९||१४||५||०||०||७३.६८ |- ||१०||[[मिताली राज]]||२००४–२२||१५५||८९||६३|||०||३||५७.४१ |- ||११||[[झुलन गोस्वामी]]||२००८–११||२५||१२||१३||०||०||४८.०० |- ||१२||[[रुमेली धार]]||२००८||१||०||१||०||०||०.०० |- ||१३||[[हरमनप्रीत कौर]]||२०१३–सद्य||२०||१४||५||१||०||७०.०० |-bgcolor=#DDEEFF class="sortbottom" | colspan=3 align='center' | '''एकूण'''||'''३१०'''||'''१६८'''||'''१३६'''||'''२'''||'''४'''||'''५४.१९''' |} ===महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० कर्णधार=== कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यामध्ये [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ]]ाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/women/engine/records/individual/list_captains.html?class=10;id=1863;type=team|title=भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ – आंतरराष्ट्रीय ट्वेंटी २० |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=४ जानेवारी २०१७}}</ref> {| class="wikitable sortable" width="90%" |- !क्रमांक!!चित्र!!नाव!!कालावधी!!सामने!!विजय!!पराभव!!बरोबरी!!अनिर्णित!!विजय %<ref name="winpercent"/> |- ||१||[[File:Mithali_Raj.png|100px]]||[[मिताली राज]]||२००६–१६||३२||१७||१५||०||० |५३.१२ |- ||२||[[File:Ms._Jhulan_Goswami,_in_2012_(cropped).jpg|100px]]||[[झुलन गोस्वामी]]||२००८–१५||१८||८||१०||०||०||४४.४४ |- ||३||[[File:Anjum Chopra (10 March 2009, Sydney).jpg|100px]]||[[अंजुम चोप्रा]]||२०१२–१२||१०||३||७||०||०||३०.०० |- ||४||[[File:Harmanpreet Kaur 2017 (sq cropped).jpg|100px]]||[[हरमनप्रीत कौर]]||२०१२–सद्य||११४||६५||४३||१||५||५७.०१ |- ||५||[[File:Ms. Smriti Mandhana, Arjun Awardee (Cricket), in New Delhi on July 16, 2019 (cropped).jpg|100px]]||[[स्म्रिती मंधाना]]||२०१९–२३||१३||७||५||०||१||५३.८४ |-bgcolor=#DDEEFF class="sortbottom" | colspan=4 align='center' | '''एकूण'''||'''१८७'''||'''१००'''||'''८०'''||'''१'''||'''६'''||'''५३.४७''' |} ==युवा क्रिकेट== ===युवा कसोटी कर्णधार=== कमीत कमी एका १९-वर्षांखालील कसोटी सामन्यामध्ये [[भारत १९-वर्षांखालील क्रिकेट संघ]]ाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. १९-वर्षांखालील क्रिकेट रचनेमुळे कुणी युवा कर्णधार एका वर्षापेक्षा जास्त संघाचा कर्णधार राहु शकला नाही. श्रीकांत, शास्त्री, द्रविड आणि विराट हे पुढे जाऊन राष्ट्रीय संघाचेसुद्धा कर्णधार झाले. <small> खालील यादी ऑगस्ट २०१४ पर्यंत अद्ययावत आहे.<br> खेळाडूच्या नावापुढे असलेले </small>* <small>चिन्ह हे राष्ट्रीय संघाचे कमीतकमी एका आंतरराष्ट्रीय सामन्याचे (कसोटी, ए.दि. किंवा ट्वेंटी२०) नेतृत्व केल्याचे दर्शवते.</small> {| class="wikitable sortable" width="90%" |- bgcolor="#efefef" !क्रमांक!!नाव!!कालावधी!!class="unsortable"|प्रतिस्पर्धी!!class="unsortable"|स्थान!!सामने!!विजय!!पराभव!!अनिर्णित |- | १ || [[कृष्णाम्माचारी श्रीकांत]]* || १९७८/७९† || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || २ || ० || ० || २ |- || २ || [[वेदराज चौहान]] || १९७८/७९ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ३ || ० || ० || ३ |- || ३ || [[रवि शास्त्री]]* || १९८१ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || ० || ० || ३ |- || ४ || [[साबा करीम]]* || १९८४/८५ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || २ || ० || १ || १ |- || ५ || [[अंजु मुद्कवी]] || १९८४/८५† || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || १ || ० || ० || १ |- || ६ || [[अमिकर दयाल]] || १९८६/८७ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ३ || ० || २ || १ |- || ७ || [[मायलुआहनन सेंथिलनाथन]] || १९८७/८८ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || न्यू झीलंड || १ || ० || १ || ० |- || ८ || [[जनार्दन रामदास]] || १९८८/८९ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || पाकिस्तान || ४ || १ || ० || ३ |- || ९ || [[रणजीब बिस्वाल]] || १९८९/९० || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || ४ || १ || ० || ३ |- || १० || [[राहुल द्रविड]]* || १९९१/९२ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || २ || १ || ० || १ |- || ११ || [[मनोज जोगळेकर]] || १९९२/९३ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ३ || १ || १ || १ |- || १२ || [[श्रीधरन श्रीराम]]* || १९९३/९४ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || भारत || ३ || १ || १ || १ |- || १३ || [[अमित शर्मा]] || १९९४ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || १ || ० || २ |- || १४ || [[किरण पोवार]] || १९९४/९५ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || ३ || ० || २ || १ |- || १५ || [[संजय राऊल]] || १९९५/९६ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || भारत || ३ || १ || १ || १ |- || १६ || [[अजित आगरकर]]* || १९९६/९७† || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || १ || १ || ० || ० |- || १७ || [[ज्योती यादव]] || १९९६/९७ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || २ || १ || ० || १ |- || १८ || [[रीतिंदर सोढी]]* || १९९८/९९ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || भारत || १ || ० || ० || १ |- || १९ || [[अजय रात्रा]]* || २००३/०४ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ३ || १ || ० || २ |- || २० || [[मनविंदर बिसला]] || २००२† || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || १ || ० || ० || १ |- || २१ || [[यालीका ग्ननेश्वर राव]] || २००२ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || २ || ० || १ || १ |- || २२ || [[अंबाटी रायुडू]]* || २००४/०५ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || भारत || ३ || ३ || ० || ० |- | rowspan=3 | २३ | rowspan=3 | [[तन्मय श्रीवास्तव]] | २००६ || [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] || इंग्लंड || ३ || १ || ० || २ |- | २००७ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || २ || १ || ० || १ |- | colspan=3 | '''एकूण''' || '''५''' || '''२''' || '''०''' || '''३''' |- | rowspan=3 | २४ | rowspan=3 | [[पियुष चावला]]* | २००६ || [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]] || भारत || २ || २ || ० || ० |- | २००७ || [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] || भारत || ३ || १ || १ || १ |- | colspan=3 | '''एकूण''' || '''५''' || '''३''' || '''१''' || '''१''' |- || २५ || [[विराट कोहली]]* || २००८ || [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिका]] || दक्षिण आफ्रिका || २ || १ || ० || १ |- || २६ || [[अशोक मेनारिया]] || २००९ || [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया || २ || १ || १ || ० |- || २७ || [[विजय झोल]] || २०१४ || [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]] || श्रीलंका || २ || ० || ० || २ |- bgcolor=#DDEEFF class="sortbottom" | colspan=5 align='center' | '''एकूण''' || '''६९''' || '''२०''' || '''१२''' || '''३७''' |} === युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार === कमीत कमी एका १९-वर्षांखालील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये [[भारत १९-वर्षांखालील क्रिकेट संघ]]ाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. भारतला पहिले १९-वर्षांखालील क्रिकेट मध्ये मोठे यश मिळाले ते १९९९/२००० मध्ये, जेव्हा संघाने [[मोहम्मद कैफ]]च्या नेतृत्वाखाली १९-वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. ह्या यशाची पुनरावृत्ती झाली ती २००८/०९ आणि २०१२ मध्ये अनुक्रमे [[विराट कोहली]] आणि [[उन्मुक्त चंद]] नेतृत्वाखाली. <small>खालील यादी १६ ऑगस्ट २०१४ अद्ययावत आहे.<br> खेळाडूच्या नावापुढे असलेले </small>* <small>चिन्ह हे राष्ट्रीय संघाचे कमीतकमी एका आंतरराष्ट्रीय सामन्याचे (कसोटी, ए.दि. किंवा ट्वेंटी२०) प्रतिनिधित्व केल्याचे दर्शवते.</small></small> {| class="wikitable sortable" width="90%" |- bgcolor="#efefef" !क्रमांक!! नाव!!कालावधी!!सामने!!विजय!!पराभव!!बरोबरी!!अनिर्णित!!विजय %<ref name='winpercent'/> |- ||१|| [[रवि शास्त्री]]*||१९८१||१||०||१||०||०||०.०० |- ||२||[[साबा करीम]]*||१९८५||३||०||३||०||०||०.०० |- ||३||[[अंजु मुद्कवी]]||१९८५||१||०||१||०||०||०.०० |- ||४||[[अमिकर दयाल]]||१९८६||३||१||२||०||०||३३.३३ |- ||५||[[मायलुआहनन सेंथिलनाथन]]||१९८८||८||५||३||०||०||६२.५० |- ||६||[[अर्जुन क्रिपाल सिंग]]||१९८८||१||०||१||०||०||०.०० |- ||७||[[रणजीब बिस्वाल]]||१९८९/९०||५||४||१||०||०||८०.०० |- ||८||[[राहुल द्रविड]]*||१९९२||३||२||१||०||०||६६.६६ |- ||९||[[मनोज जोगळेकर]]||१९९३||३||३||०||०||०||१००.०० |- ||१०||[[अमित शर्मा]]||१९९४||५||२||३||०||०||४०.०० |- ||११||[[किरण पोवार]]||१९९५||३||१||२||०||०||३३.३३ |- ||१२||[[संजय राऊल]]||१९९६||३||३||०||०||०||१००.०० |- ||१३||[[ज्योती यादव]]||१९९७/८||३||१||२||०||०||३३.३३ |- ||१४||[[अमित पागनीस]]||१९९७||६||४||२||०||०||६६.६६ |- ||१५|| [[रीतिंदर सोढी]]*||१९९९||३||३||०||०||०||१००.०० |- ||१६|| [[मोहम्मद कैफ]]*||१९९९/००||९||९||०||०||०||१००.०० |- ||१७|| [[अजय रात्रा]]* ||२००१||३||२||१||०||०||६६.६६ |- ||१८|| [[पार्थिव पटेल]]*||२००२||७||४||३||०||०||५७.१४ |- ||१९||[[यालीका ग्ननेश्वर राव]]||२००२||३||३||०||०||०||१००.०० |- ||२०||[[अंबाटी रायुडू]]*||२००३/०४||१०||८||२||०||०||८०.०० |- ||२१|| [[दिनेश कार्तिक]]*||२००४||१||०||१||०||०||०.०० |- ||२२||[[मनोज तिवारी]]*||२००५||५||४||१||०||०||८०.०० |- ||२३||[[रविकांत शुक्ला]]||२००५/०६||१७||१५||२||०||०||८८.२३ |- ||२४||[[तन्मय श्रीवास्तव]]||२००६/०७||७||७||०||०||०||१००.०० |- ||२५||[[पियुष चावला]]*||२००६/०७||१२||११||१||०||०||९१.६६ |- ||२६|| [[रवींद्र जडेजा]]*||२००७||१||१||०||०||०||१००.०० |- ||२७|| [[विराट कोहली]]*||२००८||११||११||०||०||०||१००.०० |- ||२८||[[अशोक मेनारिया]]||२००९/१०||१२||८||४||०||०||६६.६६ |- ||२९||[[उन्मुक्त चंद]]||२०११/१२||२१||१५||५||१||०||७३.८० |- ||३०||[[विजय झोल]]||२०१३/१४||२२||१८||३||०||१||८५.७१ |- ||३१|| [[संजू सॅमसन]]*||२०१४||१||१||०||०||०||१००.०० |- ||३२|| [[रिकी भुई]] ||२०१५||४||४||०||०||०||१००.०० |- ||३३|| [[विराट सिंग]] ||२०१५||१||१||०||०||०||१००.०० |- ||३४|| [[रिशभ पंत]] ||२०१५||१||१||०||०||०||१००.०० |- ||३५|| [[इशान किशन]] ||२०१५||८||७||१||०||०||८७.५० |- bgcolor=#DDEEFF class="sortbottom" | colspan=3 align='center' | '''एकूण'''||'''१९३'''||'''१४५'''||'''४५'''||'''१'''||'''२'''||'''७६.१७''' |} == संदर्भ ग्रंथाची यादी == * [[सूर्य प्रकाश चतुर्वेदी]],''हमारे कप्तान: नायडू से धोनी तक'', राजकमल प्रकाशन,२०१० ==संदर्भ आणि नोंदी== {{संदर्भयादी|2}}{{refbegin}} *http://stats.espncricinfo.com/ci/engine/stats/index.html?captain_involve=7593;class=1;filter=advanced;orderby=won;result=1;result=2;result=3;result=4;team=6;template=results;type=team *http://stats.espncricinfo.com/ci/engine/records/individual/list_captains.html?class=1;id=6;type=team {{refend}} ==बाह्यदुवे== *[http://www.cricketarchive.com/ क्रिकेट आर्काइव्ह] *[http://www.cricinfo.com/ क्रिकइन्फो] [[वर्ग:भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार|*]] [[वर्ग:भारत आंतरराष्ट्रीय क्रिकेट|राष्ट्रीय]] [[वर्ग:भारतीय क्रिकेट खेळाडू|भारत कर्णधार]] [[वर्ग:क्रिकेट कर्णधार|भारत]] [[वर्ग:चित्रसमस्या असणारी पाने तात्पुरता]] 5ilkwdvzzfatawr1s1pfshg51ly66wc महसूल विभाग (महाराष्ट्र शासन) 0 208998 2581593 2536487 2025-06-21T11:58:32Z 2401:4900:7972:2AE8:0:0:A3A:DDE आपण महाराष्ट्राचे महसूल मंत्री म्हणून बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव दिलेले असून ते चुकीचे आहे सध्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री हे चंद्रशेखर बावनकुळे आहेत 2581593 wikitext text/x-wiki {{Infobox government agency | agency_name = महसूल विभाग <br> [[महाराष्ट्र शासन]] | स्थानिक नाव = | स्थानिक नाव अ = | स्थानिक नाव र = | प्रकार = खाते | seal = File:Seal of Maharashtra.png | seal_width = 100px | seal_caption = महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह | logo = | logo_width = | logo_caption = | निर्माण = {{Start date and age|df=yes|1950|05|01}} | jurisdiction = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[महाराष्ट्र शासन]] | headquarters = महसूल विभाग मंत्रालय <br> मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,<br> मुंबई | budget = महाराष्ट्र शासन नियोजन |region_code = IN |minister1_name = [[चंद्रशेखर बावनकुळे]] |minister1_pfo = [[महाराष्ट्र शासन|कॅबिनेट मंत्री]] महसूल विभाग |website = {{url|https://mha.gov.in/|महसूल विभाग मंत्रालय}} |chief1_name=|chief1_position= |chief2_name=|chief2_position= |chief3_name=|chief3_position= |chief4_name=|chief4_position= |chief5_name=|chief5_position= |chief6_name=|chief6_position= |chief7_name=|chief7_position= |chief8_name=|chief8_position= |chief9_name=|chief9_position= |parent_department= |minister2_name= कोण नाही |minister2_pfo= राज्यमंत्री महसूल विभाग | parent_department = | type = Ministry | native_name_r = | child1_agency = | child2_agency = | child3_agency = | child4_agency = | child5_agency = | child6_agency = | child7_agency = | child8_agency = | chief6_name = | chief6_position = | chief7_name = | chief7_position = | chief8_name = | chief8_position = | chief9_name = | chief9_position = | child9_agency = | child10_agency = }} '''महसूल विभाग मंत्रालय ''' हे [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनचे]] एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. [[राधाकृष्ण विखे-पाटील]] हे सध्या महसूल विभाग [[महाराष्ट्र शासन|कॅबिनेट मंत्री]] आहेत.<ref>{{Cite news|url=https://www.firstpost.com/politics/maharashtra-cabinet-portfolios-announced-dy-cm-ajit-pawar-gets-finance-aaditya-thackeray-allotted-tourism-and-environment-ministry-7861731.html |title= Maharashtra Cabinet portfolios announced}}</ref><ref>{{Cite news|url=https://marathi.abplive.com/news/mumbai/maharashtra-cabinet-ministry-list-governor-approved-allocation-of-portfolios-proposed-by-cm-uddhav-thackeray-729069 |title= महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर}}</ref> ==कार्यालय== {{माहितीचौकट अधिकृत हुद्दा | post = महसूल विभाग मंत्री <br>[[महाराष्ट्र शासन]] | body = महाराष्ट्र | native_name = <sub>Minister Revenue of Maharashtra</sub> | flag = | flagsize = | flagborder = | flagcaption = | insignia = Seal of Maharashtra.png | insigniasize = 120px | insigniacaption = | image = | imagesize = 250px | alt = | incumbent = [[राधाकृष्ण विखे-पाटील]] | acting = | incumbentsince = १४ ऑगस्ट २०२२ | type = | status = महसूल विभाग मंत्री | department = [[महाराष्ट्र सरकार]] | style = | member_of = *'''राज्य मंत्रिमंडल''' *'''महाराष्ट्राचे विधिमंडळ''' (विधानसभा किंवा विधान परिषद) | reports_to = | residence = सागर निवास, मुंबई | seat = मंत्रालय, मुंबई | nominator = [[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]] | appointer = [[महाराष्ट्राचे राज्यपाल]] | appointer_qualified = | termlength = ५ वर्ष | termlength_qualified = | constituting_instrument = | precursor = [[बाळासाहेब थोरात]] <br>(२०१९ - २०२२) | formation = १ मे १९६० | first = [[वसंतराव नाईक]] (१९६०-१९६२) | last = | abolished = | succession = | abbreviation = | unofficial_names = | deputy = 29 जून 2022 पासून रिक्त | salary = | website = }} ==कॅबिनेट मंत्र्यांची यादी== * ०१) '''[[वसंतराव नाईक]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ०१ मे १९६० - ०८ मार्च १९६२ * ०२) '''[[वसंतराव नाईक]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ०८ मार्च १९६२ - १९ नोव्हेंबर १९६२ * ०३) '''[[बाळासाहेब देसाई]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] २० नोव्हेंबर १९६२ - २४ नोव्हेंबर १९६३ * ०४) '''अब्दुल कादर सालेभॉय''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] २५ नोव्हेंबर १९६३ - ०४ डिसेंबर १९६३ * ०५) '''[[वसंतदादा पाटील]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ०५ डिसेंबर १९६३ - ०१ मार्च १९६७ * ०६) '''[[वसंतराव नाईक]]''' ([[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी|मुख्यमंत्री]]) , <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ०१ मार्च १९६७ - १३ मार्च १९७२ * ०७) '''[[शंकरराव चव्हाण]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] १३ मार्च १९७२ - २० फेब्रुवारी १९७५ * ०८) '''[[रफिक झकेरिया]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] २१ फेब्रुवारी १९७५ - १६ एप्रिल १९७७ * ०९) '''[[मधुकरराव चौधरी]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] १७ एप्रिल १९७७ - ०६ मार्च १९७८ * १०) '''[[मधुकरराव चौधरी]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ०७ मार्च १९७८ - १८ जुलै १९७८ * ११) '''[[उत्तमराव पाटील]]''' <br>[[जनता पक्ष]] १८ जुलै १९७८ - १८ फेब्रुवारी १९८० * १२) '''[[शालिनी पाटील]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ०९ जून १९८० - १२ जानेवारी १९८२ * १३) '''[[बाबासाहेब भोसले]]''' ([[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी|मुख्यमंत्री]]) , <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] १३ जानेवारी १९८२ - ०१ फेब्रुवारी १९८३ * १४) '''[[शांताराम घोलप]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ०७ फेब्रुवारी १९८३ - ०५ मार्च १९८५ * १५) '''[[सुधाकरराव नाईक]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] १२ मार्च १९८५ - ०१ जून १९८५ * १६) '''[[सुधाकरराव नाईक]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ०४ जून १९८५ - ०६ मार्च १९८६ * १७) '''[[विलासराव देशमुख]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] १२ मार्च १९८६ - २६ जून १९८८ * १८) '''[[प्रभा राऊळ]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] २६ जून १९८८ - ०३ मार्च १९९० * १९) '''[[सुधाकरराव नाईक]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ०४ मार्च १९९० - २४ जून १९९१ * २०) '''[[शंकरराव कोल्हे]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] २८ जून १९९१ - २६ डिसेंबर १९९१ * २१) '''[[छगन भुजबळ]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] २६ डिसेंबर १९९१ - २२ फेब्रुवारी १९९३ * २२) '''[[विलासराव देशमुख]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ०६ मार्च १९९३ - १४ मार्च १९९५ * २३) '''[[सुधीर जोशी]]''' <br>[[शिवसेना]] १४ मार्च १९९५ - ३१ जानेवारी १९९९ * २४) '''[[नारायण राणे]]''' ([[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी|मुख्यमंत्री]]) , <br>[[शिवसेना]] ०१ फेब्रुवारी १९९९ - १७ ऑक्टोबर १९९९ * २५) '''[[अशोक चव्हाण]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] २७ ऑक्टोबर १९९९ - १६ जानेवारी २००३ * २६) '''[[सुशीलकुमार शिंदे]]''' ([[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी|मुख्यमंत्री]]) , <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] १८ जानेवारी २००३ - १९ ऑक्टोबर २००४ * २७) '''[[विलासराव देशमुख]]''' ([[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी|मुख्यमंत्री]]) ,<br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ०१ नोव्हेंबर २००४ - ०४ डिसेंबर २००८ * २८) '''[[पतंगराव कदम]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ०८ डिसेंबर २००८ - ०७ नोव्हेंबर २००९ * २९) '''[[नारायण राणे]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ०७ नोव्हेंबर २००९ - १० नोव्हेंबर २०१० * ३०) '''[[बाळासाहेब थोरात]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ११ नोव्हेंबर २०१० - २६ सप्टेंबर २०१४ * ३१) '''[[एकनाथ खडसे]]''' , <br>[[भारतीय जनता पार्टी]] ३१ ऑक्टोबर २०१४ - ०४ जून २०१६ * ३२) '''[[चंद्रकांत बच्चू पाटील]]''' , <br>[[भारतीय जनता पार्टी]] ०४ जून २०१६ - ०८ नोव्हेंबर २०१९ ''प्रभारी '''[[देवेंद्र फडणवीस]]''' ,([[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी|मुख्यमंत्री]]) [[भारतीय जनता पार्टी]] २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९'' * ३३) '''[[बाळासाहेब थोरात]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] २८ नोव्हेंबर २०१९ - ३० डिसेंबर २०१९ * ३४) '''[[बाळासाहेब थोरात]]''' <br>[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ३० डिसेंबर २०१९ - २९ जून २०२२ ''प्रभारी '''[[एकनाथ शिंदे]]''' ([[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी|मुख्यमंत्री]]) ,[[शिवसेना|बालासाहेबंची शिवसेना]] ३० जून २०२२ ते १४ ऑगस्ट २०२२ '' * 35) '''[[चंद्रशेखर बावनकुळे|राधाकृष्ण विखे पाटील]]''' <br>[[भारतीय जनता पार्टी]] १४) ऑगस्ट २०२२ - पासुन ==राज्यमंत्र्यांची यादी== ==प्रधान सचिवांची यादीमहसूल विभाग == == अंतर्गत विभाग == *महसूल विभाग *भूमिअभिलेख *महाभूलेख *महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण *नोंदणी व मुद्रांक विभाग == हे सुद्धा पहा == * [[महाराष्ट्र सरकार]] * [[महाराष्ट्र शासनाचे विभाग]] == अधिकृत संकेतस्थळ == [[वर्ग:महाराष्ट्र शासनाचे विभाग]] [[वर्ग:अत्यंत छोटी पाने]] 3q5s3r4j3w3c72go2hzyziji0fkf071 मसूदा:मिमिक्यू 118 213689 2581513 2503323 2025-06-21T06:30:30Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[मिमिक्यू]] वरुन [[मसूदा:मिमिक्यू]] ला हलविला 2503323 wikitext text/x-wiki {{मट्रा}} '''मिमिक्यू''' (इंग्रजी: Mimikyu जपानी: ミミッキュ हेपबर्न: ''Mimikkyu'') निटोन्डो आणि गेम फिकरचे पोकेमॉन फ्रेंचायझीमध्ये पोकीमोन प्रजाती आहे हे प्रथम पोकेमॉन सूर्य आणि चंद्र मध्ये सुरू करण्यात आले. त्याला "भेसळ पोकॉमॉन" असे म्हणले जाते, कारण हे पोकेमोन आहे ज्यामुळे मित्र बनविण्यासाठी पिकाचुसारखे दिसले जाते. == डिझाइन आणि वैशिष्ट्ये == मिमिकू एक लहान पोकॉमॉन आहे, उंच उंच आठ इंच उंचीवर आहे, आणि लपण्याची भोवताली जवळजवळ पूर्णपणे लपलेले आहे. त्याचे काळे डोळे आहेत ज्याला त्याच्या भेडीच्या शरीरातून दिसता येते, आणि त्याच्या कपड्याच्या कपाळावर पाय किंवा निचरा शरीराची अस्पष्ट प्रतिबिंब दिसून येते. हे कधीकधी कपड्याच्या खालच्या बाजूला एक काळा ॲपेन्डेज वाढवेल. पिकाचु सारखा दिसणारे त्याचे भान, काळे डोळे, पिवळे गाल आणि एक काळे तोंड आहे आणि त्याच्या कानाचे कवरे रंगीत काळा आहेत. एक पूंछ सारखा असणे मिमिकू देखील एक विद्युल्लता बोल्ट आकार स्टिक वाहून आहे. अधिकृत पोकीमॉन वेबसाइटच्या मते, मिमिकू "धूर्तपणे एकटे" आहे आणि पिकाचुची लोकप्रियता अनुकरण करण्याच्या प्रयत्नात, मित्र बनविण्यासाठी पिकाचु सारखी वेशभूषा वापरली जाते. मिमीकोय गडद किंवा अंधाराच्या प्रकाशाच्या क्षेत्रांकडे आकर्षित आहे आणि सूर्यप्रकाशात उघड झाल्यास त्याचे आरोग्य कमी होईल. == दिसणे == === व्हिडिओ गेममध्ये === पोमीमोन सूर्य आणि चंद्र मध्ये दुहेरी-प्रकारचे भूत/फेयरी पोकीमोन म्हणून मिमिकू आढळते आणि एखाद्या आक्रमणाद्वारे मारल्यावर त्याचे स्वरूप बदलते. त्याची विशेष क्षमता, "भंगारा", त्यास एखाद्या शत्रूच्या आक्रमणाने कोणतेही नुकसान टाळण्यास अनुमती देते, परंतु युद्धाच्या वेळी ते फक्त या क्षमतेचाच वापर करू शकतात. मिलिमियू अॉलोलान प्रदेशात उल्ला'ला बेटावर आढळून येतो. === ऍनिमी मध्ये === मिमीकोय एनीम पोकेमोनमध्ये दिसतो: सूर्य आणि चंद्र, आणि जेसी, जेम्स आणि टीम रॉकेटचा मेओथ यांचा सामना करत आहे. मिमिक्युला समजून घेण्याइतके मोगुई, तो ज्या गोष्टी ऐकत नाहीत त्या गोष्टींमुळे घाबरतो, आणि जेव्हा ते युद्ध सुरू होते, तेव्हा मिमिकूने आपल्या भेगा उचलून जवळजवळ मेवथला त्याच्या खऱ्या रूपात पाहतांना ठार केले. हे नंतर टीम रॉकेट सह मित्रांसह ज्यांनी त्यांना एश केचंपच्या पिकाचुवर हल्ला करताना बघितले आहे, पिकाचुचा द्वेषभावना व्यक्त करतो कारण ते पोकेमोनच्या रूपात कसे अनुकरण करतात हे जेसीच्या लक्झरी बॉलचा वापर करते तेव्हा तो पुढील भागामध्ये टीम रॉकेटशी जोडला जातो, ज्यामुळे तिला दुर्मीळने न पडता तिला मिठी मारण्याची परवानगी मिळते. === इतर सामने === मिमिकू जपानी मध्ये स्वतः बद्दल गाणे रॅप, अधिकृत पोकेमॅन YouTube चॅनेलवर अपलोड त्याच्या स्वतःच्या संगीत व्हिडिओ दिसते. == रिसेप्शन == कोटकू "मिमिक्यू" असे म्हणले जाते की "गेम फिकर्सची सर्वात उज्ज्वल आणि अत्यंत क्लेशकारक पोकेमॉन" ज्यांच्याशी आपण कधीही चढलो आहोत ", आणि मिमिकुच्या मोठ्या इंटरनेट फॅनबद्दल कर्ट्रिना डेनिस ऑफ व्युर्व्हस यांनी हे देखील असेच लिहिले आहे की, "एक जोडीने [पिकमन] फॅन्डम एका आसपासच्या [मिमिक्यू]च्या आसपास पसरलेल्या एक नवीन, तात्काळ भरून निघाला आहे जो खेळाडूंच्या हृदयावर आधारित आहे". पेस्टीनच्या जनीन हॉकिन्सने वर्णनाच्या डिझाइनचा परिणाम म्हणून ऑनलाइन लक्ष समजावून सांगितले की "प्रशंसकोंने [त्याच्या] उघडकीच्या भेद्यतेमुळे स्पष्टपणे प्राणाली स्वीकारली आहेत... एमिमिकाय आम्हाला भावनात्मकरीत्या भाग पाडण्यासाठी तयार करण्यात आले होते आणि ते आधीच अस्तित्वात आहेत एक प्रचंड यश". विकटॉक्डॉइड मिमिकुऊ हे त्याच्या कर्मचाऱ्यांपैकी एक अलाओन पोकेमोन असे म्हणले आहे की "कदाचित बहुतेक लोकांसाठी जनरल सातवा ताराचा तारा असेल". बहुभुजमधील ॲलेल्ग्रा फ्रँक यांनी लिहिले की "मीमीक्य्यू" या मालिकेत कधीही सहभागी होण्याकरिता सर्वात अनोखा, उत्साही पोकीमोनपैकी एक असू शकतो "आणि मरी सुच्या जेसिका लखेनॉलने असे लिहिले की," मिमिकू हे एक रहस्यमय आहे कारण ते आल्हादक आहे". ipbxe7ndvxsvdgih9hzckb5ywgtp11y आंबा (गाव) 0 216026 2581309 2423016 2025-06-20T13:11:11Z Khirid Harshad 138639 [[आंबा (शाहूवाडी)]] कडे पुनर्निर्देशित 2581309 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[आंबा (शाहूवाडी)]] k7bd4290dq1jhsb7m4684d9yvrfqs1k मसूदा:२०१७ तैवान अंधारपट 118 217905 2581439 2562262 2025-06-21T04:52:55Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[२०१७ तैवान अंधारपट]] वरुन [[मसूदा:२०१७ तैवान अंधारपट]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 2562262 wikitext text/x-wiki {{मट्रा अनुवादीत}} {{बदल}} [[चित्र:Apartment Buildings of Minsheng Community without Light in Blackout 20170815.jpg|thumb|मिनशेनमध्ये अंधारात असलेली इमारती]] १५ ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी ४:५२ वाजता, [[चीनचे प्रजासत्ताक|तैवानच्या]] उत्तरेकडील अर्ध्या भागात मोठ्या प्रमाणावर अंधार पडला; यामुळे ६६.८ लक्ष कुटुंबे प्रभावित झाली. सकाळी ६:०० वाजता विद्युत शिधावाटप कार्यान्वित करण्यात आला आणि अंधार पूर्णतः ९:४० वाजता संपला.<ref>http://www.focustaiwan.tw/news/aeco/201708150033.aspx</ref> == घटना == सीपीसी कॉन्ट्रॅक्टच्या कंत्राटदाराने तायवान शहरातील गुआनिन जिल्ह्यातील टाटान पॉवर प्लांटमधील मीटरेशन स्टेशनच्या नियंत्रण प्रणालीसाठी वीज पुरवठा उपकरणांच्या प्रतिस्थापनेदरम्यान करत होते, कामगाराने स्वयंचलित मोडमध्ये स्विच केले नाही यांनी दोन गॅस पुरवठाचे पाईप वाल्व्ह दोन मिनिटसाठी बंद झाले.<ref>https://www.bloomberg.com/news/articles/2017-08-16/taiwan-s-president-apologizes-for-blackout-affecting-millions</ref>. वीज प्रकल्पाचे सहा जनरेटर्स पूर्णपणे संपुष्टात झाले, ज्यांनी 4 गीगावॅट वीजच्या पुरवठात अडथळा आला.<ref>https://topics.amcham.com.tw/2017/10/keeping-taiwan-going-dark/</ref> == प्रतिक्रिया == तैपॉवर प्रत्येक घरगुती बिल पासून एक दिवस वीज शुल्क आकार देत द्वारे प्रतिसाद दिला, जे NT$२७० दशलक्ष दशलक्ष कंपनीला महसूल तोटा. राष्ट्रपती [[त्साय इंग-वेन]] यांनी आपल्या [[फेसबुक]] पेजच्या माध्यमातून तैवानी लोकांच्या माफी मागितली, व वीज पुरवठा राष्ट्रीय सुरक्षा समस्या आहे असे म्हणले.<ref>http://time.com/4902500/taiwan-power-cut/</ref> आर्थिक व्यवहार मंत्री [[चिह-कुंग ली]] यांनी राजीनामा दिला आणि नंतर जबाबदारी घेतली. [[प्रीमियर लिन चुआन]] ने उपमंत्रालयाची स्थापना केली. लीऐवजी [[सिन जोंग-चिन]] अभिनय मंत्री म्हणून निवडले. सीपीसी कॉर्पोरेशन अध्यक्ष चेन चिन-टी यांनी तीन दिवसांनंतर राजीनामा दिला. यानंतर त्याऐवजी कार्यकारी अध्यक्ष यंग वेई-फू यांनी जबाबदारी स्वीकारली.<ref>https://www.reuters.com/article/taiwan-power-outage/update-1-chief-of-taiwan-gas-supplier-cpc-resigns-after-power-blackout-idUSL4N1L41UF</ref> [[प्रीमियर लिन]] यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला होता.<ref>https://www.reuters.com/article/us-taiwan-power-outage/taiwan-accepts-resignation-of-gas-supplier-chief-after-blackout-idUSKCN1AY0B8</ref> == नुकसान == अंधारामुळे कमीत कमी US$३ दशलक्ष नुकसान झाले, जे एकूण औद्योगिक पार्क आणि निर्यात प्रक्रिया क्षेत्रातील १५० पेक्षा अधिक कंपन्यांना नुकसान होता.<ref>https://www.reuters.com/article/us-taiwan-power-outages/taiwan-power-outage-affected-151-companies-caused-3-million-in-damages-idUSKCN1AX0S3</ref> == परिणाम == राष्ट्रपती [[त्साय इंग-वेन]]नी वचन दिले की तिच्या प्रशासन तैवान विद्युत ग्रीड एक व्यापक आढावा आयोजित करेल ज्यांनी ते अजून मजबूत होईल.<ref>https://www.reuters.com/article/us-taiwan-power-outages/taiwan-power-outage-affected-151-companies-caused-3-million-in-damages-idUSKCN1AX0S3</ref> ==संदर्भ== {{संदर्भयादी}} {{commons category|2017 Taiwan Massive Blackout}} [[वर्ग:तैवानमधील कंपन्या]] mud2aig95ywkwag66ymio1y5vkt0uxb मसूदा चर्चा:२०१७ तैवान अंधारपट 119 217951 2581441 1527140 2025-06-21T04:52:55Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:२०१७ तैवान अंधारपट]] वरुन [[मसूदा चर्चा:२०१७ तैवान अंधारपट]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 1527140 wikitext text/x-wiki {{WAM लेख २०१७}} {{बदल}} :{{साद|Tiven2240}}, :तुम्ही बदल साचा लेखातून येथे स्थानांतरित का केला? :[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १८:२१, २१ नोव्हेंबर २०१७ (IST) {{साद|अभय नातू}} करण लेखात मी काही बदल करेल त्यामुळे. हे चुकीचा आहे का? --[[User:Tiven2240|'''<span style="background color: black; color: orange">टाय</span><span style="color: blue">वीन</span>'''<span style="color: green">२२४०</span>]]<sup>[[User talk:Tiven2240|<span style="color: maroon">माझ्याशी बोला</span>]]</sup> १८:३१, २१ नोव्हेंबर २०१७ (IST) :बदल झाल्यानंतर मग तो साचा काढावा. बदल केल्याबद्दल धन्यवाद. :[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १८:४७, २१ नोव्हेंबर २०१७ (IST) j2kd4l2i2qbe41ndzhzi2yia9xavm3i मसूदा:रॉयल भूतान पोलीस 118 218661 2581518 2208099 2025-06-21T06:40:23Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[रॉयल भूतान पोलीस]] वरुन [[मसूदा:रॉयल भूतान पोलीस]] ला हलविला 2208099 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट कायद्याची अंमलबजावणी संस्था | agencyname = रॉयल भूतान पोलिस | nativename = {{lang|dz|{{bo-textonly|རྒྱལ་གཞུང་འབྲུག་གི་འགག་སྡེ}}}} | commonname = | abbreviation = | patch = Buthan police.png | patchcaption = | logo = | center | 300px | logocaption = | badge = | badgecaption = | flag = | flagcaption = | imagesize = | motto = | mottotranslated = सत्य, सेवा आणि सुरक्षा | mission = गुन्हे प्रतिबंध | formedyear = १९५१ A.D. (२००७ B.S.) | formedmonthday = | preceding1 = | dissolved = | superseding = | employees = | volunteers = | budget = | national = | federal = | international = | divtype = | divname = | divdab = | subdivtype = | subdivname = | subdivdab = | map = | mapcaption = | sizearea = | sizepopulation = | country = भूतान | countryabbr = Np | legaljuris = {{flag|Bhutan}} | governingbody = भूतान रॉयल सरकार | governingbodyscnd = गृह आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालय (भूतान) | constitution1 = रॉयल भूतान पोलिस कायदा, २००९ | police = yes | local = yes | headquarters = [[थिंफू]], [[भूतान]] | military = | provost = | gendarmerie = | religious = | speciality1 = | secret = | overviewtype = | overviewbody = | hqlocmap = | hqlocmapwidth = | hqlocmapheight = | hqlocmapborder = | hqlocleft = | hqloctop = | hqlocmappopशीर्षक = | sworntype = | sworn = | unsworntype = | unsworn = | multinational = | electeetype = | minister1name = | minister1pfo = | chief1name = ब्रिगेडियर किपचू नमाग्येल | chief1position = पोलीस प्रमुख | chief2name = | chief2position = अतिरिक्त पोलिस महाअधिक्षक (AIGP) | parentagency = | child1agency = | unittype = | unitname = | officetype = | officename = | provideragency = | uniformedas = | stationtype = | stations = | airbases = | lockuptype = | lockups = | vehicle1type = | vehicles1 = | boat1type = | boats1 = | aircraft1type = | aircraft1 = | animal1type = | animals1 = | person1name = | person1reason = | person1type = | programme1 = | activity1name = | activitytype = | anniversary1 = | award1 = | website = {{Url|http://www.rbp.gov.bt/}} | footnotes = | reference = }}{{मट्रा अनुवादीत}} [[भूतान]]मधील कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याचे संरक्षण करण्यासाठी '''रॉयल भूतान पोलिस''' जबाबदार आहे.<ref name="C27">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.constitution.bt/TsaThrim%20Eng%20(A5).pdf |title=The Constitution of the Kingdom of Bhutan |chapter=Article 27 |format=PDF |दिनांक=2008-07-18 |प्रकाशक=Government of Bhutan |accessdate=2010-10-08 |भाषा=इंग्लिश |archive-date=2011-07-06 |archive-url=https://web.archive.org/web/20110706162637/http://www.constitution.bt/TsaThrim%20Eng%20%28A5%29.pdf |url-status=dead }}</ref> १ सप्टेंबर १९७५ रोजी याची स्थापना झाली. रॉयल भुतान आर्मीकडून ५५५ कर्मचाऱ्यांची नेमणूक यात करण्यात आली. त्यास "भूतान फ्रंटियर गार्डस" असे म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.rbp.gov.bt/hist.php |title=History of Royal Bhutan Police |work=Royal Bhutan Police |भाषा=इंग्लिश |access-date=2017-11-18 |archive-date=2013-03-20 |archive-url=https://web.archive.org/web/20130320165535/http://www.rbp.gov.bt/hist.php |url-status=dead }}</ref> त्याचा स्वातंत्र वैधानिक आधार प्रथम १९८० च्या रॉयल भूतान पोलिस अधिनियमाशी कोडित करण्यात आला. या फ्रेमवर्कची पुनरावृत्ती झाली व २००९ च्या रॉयल भूतान पोलिस कायद्याद्वारे ती पूर्णपणे बदलण्यात अली.<ref name=PA09>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.nationalcouncil.bt/images/stories/RBP_Eng_Dzo_09.pdf |format=PDF |title=Royal Bhutan Police Act 2009 |प्रकाशक=[[Government of Bhutan]] |वर्ष=2009|भाषा=इंग्लिश |accessdate=2011-01-07}}{{मृत दुवा}}</ref> == रॉयल भूतान पोलिस == कायद्याची अंमलबजावणी करण्याव्यतिरिक्त, रॉयल भूतान पोलिसांच्या जनादेशात २००९ पासून कायदेशीररित्या तुरुंगाचे व्यवस्थापन, युवा विकास आणि पुनर्वसन सुविधा, आणि आपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश करण्यात आला आहे.<ref group=nb>पोलिस कायदा २००९: ¶¶ १२४–१२५</ref> २००९ च्या कायद्यामुळे रॉयल भूतान पोलिसांना न्यायाधिकारक्षेत्रासाठी एक ठोस आणि प्रक्रियात्मक आराखडा दिला जातो, (सह आणि विना वॉरंट) अटक शक्ती, तपास, फिर्यादी, शोध आणि जप्ती, साक्षीदारांना बोलावणे, आणि सार्वजनिक सभा आणि सार्वजनिक उपद्रव नियमन.<ref group=nb>पोलिस कायदा २००९: ¶¶ ६८–७८, ९०–११३</ref> हे सार्वजनिक तक्रारी प्राप्त करण्यासाठी एक चौकट तयार करतात.<ref group=nb>पोलिस कायदा २००९: ¶¶ ८६–८९</ref> पोलिसांना "शांततेच्या गोंधळामुळे दडपण्यासाठी किंवा अवैध गैरव्यवहार करण्यास प्रवृत्त करण्यास भाग पाडले गेले आहे, जे एकतर विखुरण्यास नकार द्यायचे किंवा पांगणे नाही असे निदान दर्शविते" तथापि "परिस्थीतीस किमान प्राणघातक शस्त्र" वापरून शक्तीचा वापर "शक्य तितक्या जास्त" मर्यादित करणे आवश्यक आहे.<ref group=nb>पोलिस कायदा २००९: ¶¶ ७९–८०</ref> घातक शक्तीच्या आधी वापरलेल्या प्राणघातक उपाययोजनांमध्ये पाणीचे तोफे, धूर धुवून धूर, दंगाची चोचण आणि रबर गोळ्या असतात. गर्दीवर थेट गोळी मारणे हे विमानात चेतावणी शॉट्स फायरिंगनंतर अधिकृत आहे.<ref group=nb>पोलिस कायदा २००९: ¶¶ ८१–८४</ref> २००९ च्या कायद्यात आचारसंहिता, कर्तव्ये, निवडणूक दरम्यान विशेष कर्तव्ये आणि आपत्तींचा समावेश आणि राजकीय कार्यात गुंतण्यास प्रतिबंध आहे.<ref group=nb>पोलिस कायदा २००९: ¶¶ ३९–४४</ref> हे पोलिस आणि नागरीक दोघांनाही बंदुकांचे नियमन करते, ज्यात पोलिसांशी खाजगी बंदुकांची नोंदणी आवश्यक आहे.<ref group=nb>पोलिस कायदा २००९: ¶¶ ६३–६७</ref> == स्थान आणि पदनाम == २००९ च्या अधिनियमात खालील पदांवर व पदनाम स्थापित केले आहेत <ref group=nb>पोलिस कायदा २००९: ¶¶ १६, २११</ref> पोलिस ऑफिसर आणि आदीशनल{{मराठी शब्द सुचवा}} व डेप्युटी चीफ्स{{मराठी शब्द सुचवा}} यांची नियुक्ती [[डर्क गेलपो]] यांनी केली आहे. वरिष्ठता, पात्रता आणि क्षमतेवर आधारित पोलिस सेवा बोर्डातर्फे सादर करण्यात आलेल्या यादींपैकी प्रधान मंत्री यांनी शिफारस केलेल्या नावेंपैकी एक यादीतून हे पद नियुक्त केले आहे.<ref group=nb>पोलिस कायदा २००९: ¶ १८</ref> पोलीस सेवा मंडळाच्या शिफारशीवर उपरोक्त कोणतेही इतर नियुक्त्या, तसेच प्रशिक्षण संस्थांचे संचालक यांची नेमणूक केली जाते.<ref group=nb>पोलिस कायदा २००९: ¶¶ ३–९</ref> राज्याच्या मुख्य पोलिस अधिकाऱ्यास रॉयल भूतान पोलिसांच्या आदेशानुसार अर्थसंकल्पीय बाबींचा समावेश आहे; धोरण निर्णय; सेवेच्या मंडळांच्या सल्ल्यानुसार पदोन्नती, पुरस्काराचे आणि दंडासंदर्भात पोलिसांच्या कारभाराशी संबंधित काहीही आदेश देण्यात येत आहेत; आणि त्याच्या अधिकारांचे अधिकार म्हणून तो समंजस वाटते.<ref group=nb>पोलिस कायदा २००९: ¶¶ २१–२३, १८०–१८९, १९५–१९६</ref> तो गृह व सांस्कृतिक व्यवहार मंत्री यांना कळवतो. अधिकारी कमांडिंग व ऑफिसर्स पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधीक्षकांना दररोज आणि इतर नियमित अहवाल सादर करतात,जे थिम्फूमधील पोलीस मुख्यालयाला अशा प्रकारचे अहवाल सादर करते.<ref group=nb>पोलिस कायदा २००९: ¶ ४५</ref> दोन्ही स्तरांवरील अधिकार्यांक, पत्रकारितेच्या प्रकरणे, सीझर, अटक, फरारं, कस्टडी, आणि गाव आणि ग्राम माहिती यांत व्यापक रजिस्टर्स आणि डायरीज ठेवतात.<ref group=nb>पोलिस कायदा २००९: ¶¶ ४९–५८</ref> अधिकारी कमांडिंग व ऑफिसर्स इन चार्ज{{मराठी शब्द सुचवा}} कमिशनने अधिकाऱ्यांकडून [[झोंगखाग]] आणि [[डंगखाग]] स्तरावर समान अहवाल देणे आवश्यक आहे.<ref group=nb>पोलिस कायदा २००९: ¶ ५९</ref> == ब्युरो == इन्व्हेस्टिगेशन ब्युरचे{{मराठी शब्द सुचवा}} संचालक त्सा-वा-बेम विरुद्ध गुन्हेगारी आणि विध्वंसक कारवायांशी संबंधित गुप्तचर आणि माहिती गोळा करण्यासाठी पोलीस प्रमुख यांच्यामाखाली कार्यरत आहेत आणि त्याचे प्रमुख उपमुख्यमंत्री (आयबी) आहेत.<ref group=nb>पोलिस कायदा २००९: ¶ ११६</ref> पोलिस मुख्यालयातील नॅशनल सेंट्रल ब्युरो अन्य इंटरपोल सदस्य देश आणि उप-प्रादेशिक ब्यूरो यांच्याशी संलग्न आहे. हे इन्व्हेस्टिगेशन{{मराठी शब्द सुचवा}} ब्युरोला मदत करते.<ref group=nb>पोलिस कायदा २००९: ¶ ११९</ref> == नोंद == {{संदर्भयादी|group=nb}} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:भूतान]] lituzfm2pm8fey6ywiyqgmfgue85ghq मसूदा चर्चा:रॉयल भूतान पोलीस 119 218745 2581520 2154598 2025-06-21T06:40:24Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:रॉयल भूतान पोलीस]] वरुन [[मसूदा चर्चा:रॉयल भूतान पोलीस]] ला हलविला 1526415 wikitext text/x-wiki {{WAM लेख २०१७}} b7d6hl2hwmsqs5mfnitlir2q2gpxly0 मसूदा चर्चा:जस्टिन चाव 119 219594 2581383 2154634 2025-06-20T20:51:54Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:जस्टिन चाव]] वरुन [[मसूदा चर्चा:जस्टिन चाव]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 1530734 wikitext text/x-wiki {{WAM लेख २०१६}} jn9zqf3c67y706k575zhgk2ymr0nmsu मसूदा:लेझर कटर 118 222239 2581379 2089891 2025-06-20T20:48:59Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[लेझर कटर]] वरुन [[मसूदा:लेझर कटर]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 2089891 wikitext text/x-wiki {{मट्रा|इंग्रजी}} [[File:LaserCutter.jpg|thumb|लेझर कटरची आकृती]] [[File:Laser Cutter.jpg|thumb|Laser Cutter]] [[File:"Optimum TT" laser cutting machine during the "Armiya 2021" exhibition.ogg|thumb|प्रदर्शन लेझर कटिंग मशीन"लष्कर-2021]] '''लेझर कटिंग''' हे तंत्रज्ञान आहे जे साहित्य कापून घेण्यासाठी लेझरचा वापर करते, आणि विशेषतः औद्योगिक उत्पादन अनुप्रयोगांसाठी वापरले जाते, परंतु शाळा, लघु उद्योगांसाठी आणि छंद छातीद्वारे देखील वापरणे सुरू आहे. लेसरच्या कपाटामध्ये हाय-पॉवर लेझरचे ऑप्टीक्सद्वारे सामान्यतः आउटपुट निर्देशित करते. लेझर ऑप्टिक आणि सीएनसी (कॉम्प्यूटर न्युमेरिकल कंट्रोल) वापरल्या जातात. [[कापड]] साहित्याचा एक सामान्य व्यावसायिक लेसर सामग्रीवर कापला जाण्यासाठी नमुना सीएनसी किंवा जी-कोडचे अनुसरण करण्यासाठी गति नियंत्रण प्रणाली आहे. केंद्रित लेसर बीम सामग्रीवर दिग्दर्शित केला जातो, जो नंतर एकतर वितळतो, बर्न्स करतो, वाफेल जाते किंवा गॅसच्या जेटने दूर उडतो,उच्च दर्जाच्या पृष्ठभागावर धरून असलेली एक धार औद्योगिक लेसर कपाटाचा वापर फ्लॅट-चाट सामग्री तसेच स्ट्रक्चरल आणि पाईपिंग साहित्य करण्यासाठी केला जातो.विज्ञान आश्रम मध्ये फॅब लॅब या विभागात लेझर कटरचा वापर केला जातो . [[वर्ग:संगणक नियंत्रित यंत्रे]] aqs6dzcna1dp3gyx4c18wlyl352vtjg सदस्य:Aditya tamhankar 2 230209 2581463 2581130 2025-06-21T05:38:58Z Aditya tamhankar 80177 /* चार्जिंग नोंदवही */ 2581463 wikitext text/x-wiki {{Location map+|India|width=300|float=right|caption=सदस्य आदित्य ताम्हनकर राहत असलेले शहर|places= {{Location map~|India|lat_deg=18|lat_min=63|lon_deg=73|lon_min=79|position=right|background=|label=[[चिंचवड]]}} }} {{Location map+|India|width=300|float=right|caption=सदस्य आदित्य ताम्हनकर यांचे मुळ गाव|places= {{Location map~|India|lat_deg=15|lat_min=99|lon_deg=73|lon_min=59|position=right|background=|label=[[चेंदवण|निरोखेवाडी]], [[चेंदवण]]}} }} {{User Wikipedian for|year=2017|month=6|day=22}}{{द्रुतमाघारकार}} {{१०,००० संपादने}} {{२०,००० संपादने}} {{३०,००० संपादने}} {| style="border: 1px solid gray; background-color: #fdffe7;" |rowspan="2" style="vertical-align:middle;" | [[Image:Cricket-barnstar-small.png|100px]] |rowspan="2" | |style="font-size: x-large; padding: 0; vertical-align: middle; height: 1.1em;" | '''The Cricket Star''' |} {{col-begin|width=}} {{col-2}} {| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap" |- ! Over ! Run ! Wicket ! Over ! Run ! Wicket ! Over ! Run ! Wicket ! Over ! Run ! Wicket |- | 0.1 || || || 5.1 || || || 10.1 || || || 15.1 || || |- | 0.2 || || || 5.2 || || || 10.2 || || || 15.2 || || |- | 0.3 || || || 5.3 || || || 10.3 || || || 15.3 || || |- | 0.4 || || || 5.4 || || || 10.4 || || || 15.4 || || |- | 0.5 || || || 5.5 || || || 10.5 || || || 15.5 || || |- | 1.0 || || || 6.0 || || || 11.0 || || || 16.0 || || |- | 1.1 || || || 6.1 || || || 11.1 || || || 16.1 || || |- | 1.2 || || || 6.2 || || || 11.2 || || || 16.2 || || |- | 1.3 || || || 6.3 || || || 11.3 || || || 16.3 || || |- | 1.4 || || || 6.4 || || || 11.4 || || || 16.4 || || |- | 1.5 || || || 6.5 || || || 11.5 || || || 16.5 || || |- | 2.0 || || || 7.0 || || || 12.0 || || || 17.0 || || |- | 2.1 || || || 7.1 || || || 12.1 || || || 17.1 || || |- | 2.2 || || || 7.2 || || || 12.2 || || || 17.2 || || |- | 2.3 || || || 7.3 || || || 12.3 || || || 17.3 || || |- | 2.4 || || || 7.4 || || || 12.4 || || || 17.4 || || |- | 2.5 || || || 7.5 || || || 12.5 || || || 17.5 || || |- | 3.0 || || || 8.0 || || || 13.0 || || || 18.0 || || |- | 3.1 || || || 8.1 || || || 13.1 || || || 18.1 || || |- | 3.2 || || || 8.2 || || || 13.2 || || || 18.2 || || |- | 3.3 || || || 8.3 || || || 13.3 || || || 18.3 || || |- | 3.4 || || || 8.4 || || || 13.4 || || || 18.4 || || |- | 3.5 || || || 8.5 || || || 13.5 || || || 18.5 || || |- | 4.0 || || || 9.0 || || || 14.0 || || || 19.0 || || |- | 4.1 || || || 9.1 || || || 14.1 || || || 19.1 || || |- | 4.2 || || || 9.2 || || || 14.2 || || || 19.2 || || |- | 4.3 || || || 9.3 || || || 14.3 || || || 19.3 || || |- | 4.4 || || || 9.4 || || || 14.4 || || || 19.4 || || |- | 4.5 || || || 9.5 || || || 14.5 || || || 19.5 || || |- | 5.0 || || || 10.0 || || || 15.0 || || || 20.0 || || |} '''Total -‌ ‌''' महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुके *पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) अकोले > २) जामखेड > ३) कर्जत > ४) कोपरगाव > ५) नगर > ६) नेवासा > ७) पारनेर > ८) पाथर्डी > ९) रहाटा > १०) राहुरी > ११) संगमनेर > १२) शेवगाव > १३) श्रीगोंदा > १४) श्रीरामपूर *अकोला जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) अकोट > २) तेलहारा > ३) अकोला > ४) बालापूर > ५) पतूर > ६) बारशीटाकळी > ७) मुर्तिझापूर *अमरावती जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) अमरावती > २) भातुकली > ३) नांदगाव खांदेश्वर > ४) अंजनगाव > ५) दऱ्यापूर > ६) अचलपूर > ७) चंदूर बाझार > ८) वरूड > ९) मोर्शी > १०) धरणी > ११) चिखलदरा > १२) चांदूर रेल्वे > १३) तिवसा > १४) धामणगाव रेल्वे *छत्रपती संभाजीनगर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) कन्नड > २) सोयगाव > ३) सिल्लोड > ४) फुलंब्री > ५) औरंगाबाद > ६) खुलताबाद > ७) वैजापूर > ८) गंगापूर > ९) पैठण *बीड जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) बीड > २) आष्टी > ३) पाटोदा > ४) शिरुर कासर > ५) गेवराई > ६) आंबेजोगाई > ७) वडवाणी > ८) केज > ९) धरुर > १०) परळी > ११) माजलगाव *भंडारा जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) भंडारा > २) तुमसर > ३) पौनी > ४) मोहाडी > ५) साकोळी > ६) लखानी > ७) लखनदूर *बुलढाणा जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) बुलढाणा > २) चिखली > ३) देऊळगाव राजा > ४) खामगाव > ५) शेगाव > ६) मलकापूर > ७) मोटाला > ८) नंदुरा > ९) मेहकर > १०) लोणार > ११) सिंदखेड राजा > १२) जळगाव जामोद > १३) संग्रामपूर *चंद्रपूर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) चंद्रपूर > २) भद्रावती > ३) वरोरा > ४) चिमूर > ५) नागभीड > ६) ब्रह्मपुरी > ७) सिंदेवही > ८) मुल > ९) सावली > १०) गोंडपिंपरी > ११) राजुरा > १२) कोर्पाना > १३) पोमबुर्ना > १४) बल्लारपूर > १५) जिवती *धुळे जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) धुळे > २) शिरपूर > ३) साक्री > ४) सिंदखेडा *गडचिरोली जिल्हा (स्थापना: २६ ऑगस्ट १९८२)* * तालुके : > १) गडचिरोली > २) आरमोरी > ३) चामोर्शी > ४) मुलचेरा > ५) अहेरी > ६) सिरोंचा > ७) एटापल्ली > ८) भामरागड > ९) देसाईगंज > १०) धानोरा > ११) कुरखेडा > १२) कोर्ची *गोंदिया जिल्हा (स्थापना: १ मे १९९९)* * तालुके : > १) गोंदिया > २) गोरेगाव > ३) तिरोरा > ४) अर्जुनी मोरगाव > ५) देवरी > ६) आमगाव > ७) सालेकासा > ८) सडक अर्जुनी *हिंगोली जिल्हा (स्थापना: १ मे १९९९)* * तालुके : > १) हिंगोली > २) कळमनुरी > ३) सेनगाव > ४) औंढा नागनाथ > ५) बसमठ *जळगाव जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) जळगाव > २) धरणगाव > ३) अंमळनेर > ४) भदगाव > ५) भुसावळ > ६) बोडवड > ७) चाळीसगाव > ८) चोपडा > ९) एरणडोल > १०) जामनेर > ११) मुक्ताईनगर > १२) पाचोरा > १३) परोळा > १४) रावेर > १५) यवळ *जालना जिल्हा (स्थापना: १ मे १९८१)* * तालुके : > १) जालना > २) अंबड > ३) भोकरदन > ४) बदनापूर > ५) धनसावंगी > ६) परतूर > ७) मंथा > ८) जाफ्राबाद *कोल्हापूर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) गडहिंग्लज > २) करवीर > ३) भुदरगड > ४) पन्हाळा > ५) कागल > ६) शिरोळ > ७) हातकणंगले > ८) आजरा > ९) चंदगड > १०) गगनबावडा > ११) राधानगरी > १२) शाहूवाडी *लातूर जिल्हा (स्थापना: १६ ऑगस्ट १९८२)* * तालुके : > १) लातूर > २) उदगीर > ३) अहमदपूर > ४) देवणी > ५) शिरुर अनंतपाळ > ६) जळकोट > ७) औसा > ८) निलंगा > ९) रेणापूर > १०) चाकूर *मुंबई शहर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) कुलाबा > २) फोर्ट > ३) मलाबार हिल्स > ४) भायखळा > ५) दादर > ६) धारावी *मुंबई उपनगर जिल्हा (स्थापना: १ ऑक्टोबर १९९०)* * तालुके : > १) कुर्ला > २) अंधेरी > ३) बोरिवली > ४) वांद्रे > ५) मुलुंड *नागपूर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) नागपूर > २) नागपूर ग्रामीण > ३) रामटेक > ४) उमरेड > ५) कळमेश्वर > ६) काटोल > ७) कामठी > ८) कुही > ९) नरखेड > १०) परसावनी > ११) भिवापूर > १२) मावडा > १३) सावनेर > १४) हिंगणा *नांदेड जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) नांदेड > २) अर्धापूर > ३) भोकर > ४) बिलोली > ५) देगलूर > ६) किनवट > ७) लोहा > ८) माहूर > ९) मुदखेड > १०) धर्माबाद > ११) मुखेड > १२) हदगाव > १३) हिमायतनगर > १४) नायगाव > १५) कंधार > १६) उमरी *नंदूरबार जिल्हा (स्थापना: १ जुलै १९९८)* * तालुके : > १) नंदूरबार > २) शहादा > ३) नवापूर > ४) तळोदे > ५) अक्कलकुवा > ६) धडगाव *नाशिक जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) नाशिक > २) सिन्नर > ३) इगतपुरी > ४) त्र्यंबक > ५) निफाड > ६) येवला > ७) पेठ > ८) दिंडोरी > ९) चांदवड > १०) बागलाण > ११) देवला > १२) कळवण > १३) मालेगाव > १४) नांदगाव > १५) सुरगणा *धाराशिव जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) उस्मानाबाद > २) उमरगा > ३) तुळजापूर > ४) लोहार > ५) कळंब > ६) भूम > ७) परांडा > ८) वाशी *पालघर जिल्हा (स्थापना: १ ऑगस्ट २०१४)* * तालुके : > १) वसई > २) पालघर > ३) डहाणू > ४) तलासरी > ५) जव्हार > ६) मोखाडा > ७) वाडा > ८) विक्रमगड *परभणी जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) परभणी > २) गंगाखेड > ३) सोनपेठ > ४) पाथरी > ५) मनवठ > ६) पालम > ७) सैलू > ८) जिंतूर > ९) पुर्णा *पुणे जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) पुणे शहर > २) हवेली > ३) मुळशी > ४) वेल्हे > ५) भोर > ६) पुरंदर > ७) बारामती > ८) दौंड > ९) इंदापूर > १०) मावळ > ११) खेड > १२) शिरुर > १३) आंबेगाव > १४) जुन्नर *रायगड जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) अलिबाग > २) मुरुड > ३) पेण > ४) पनवेल > ५) उरण > ६) कर्जत > ७) खालापूर > ८) रोहा > ९) सुधागड > १०) माणगाव > ११) तळा > १२) श्रीवर्धन > १३) म्हसाळा > १४) महाड > १५) पोलादपूर *रत्नागिरी जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) रत्नागिरी > २) मंडणगड > ३) दापोली > ४) खेड > ५) चिपळूण > ६) गुहागर > ७) संगमेश्वर > ८) लांजा > ९) राजापूर *सांगली जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) बत्तीस शिराळा > २) वाळवा > ३) पलूस > ४) कडेगाव > ५) खानापूर-विटा > ६) आटपाडी > ७) तासगाव > ८) मिरज > ९) कवठे महांकाळ > १०) जत *सातारा जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) सातारा > २) कराड > ३) वाई > ४) कोरेगाव > ५) जावळी > ६) महाबळेश्वर > ७) खंडाळा > ८) पाटण > ९) फलटण > १०) खटाव > ११) माण ==चार्जिंग नोंदवही== {| class="wikitable sortable" style="text-align:center;" |+ टाटा टियागो ई.व्ही. चार्जिंग सुची ! दिनांक ! शहर ! चार्जिंग केंद्र ! चार्जिंग कंपनी ! एकूण बिल |- | १६/०४/२०२३ | मु.पो. वंगळी, [[इंदापूर तालुका|ता. इंदापूर]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]] | शिवकृपा संकुल | निकॉल-ईव्ही | २९७.२५ |- | १७/०४/२०२३ | मु.पो. अणादूर, [[तुळजापूर तालुका|ता. तुळजापूर]], [[धाराशिव जिल्हा|जि. धाराशिव]], [[महाराष्ट्र]] | लाईफलाईन हॉस्पिटल | ई.व्ही. पंप | २९६.०१ |- | १९/०४/२०२३ | मु.पो. वंगळी, [[इंदापूर तालुका|ता. इंदापूर]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]] | शिवकृपा संकुल | निकॉल-ईव्ही | ३००.०१ |- | २२/०४/२०२३ | मु.पो. भादलवाडी, [[इंदापूर तालुका|ता. इंदापूर]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल श्री व्हेज | चार्जझोन | ३७५.७१ |- | १८/०७/२०२३ | मु.पो. भुयाचीवाडी, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | माई मंगलम कार्यालय | ई-फिल | १३१.०२ |- | १८/०७/२०२३ | मु.पो. भुयाचीवाडी, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | माई मंगलम कार्यालय | ई-फिल | २४२.०४ |- | २९/०३/२०२४ | मु.पो. [[सुरूर]], [[वाई तालुका|ता. वाई]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल साई पार्क इन | चार्जझोन | १५३.०५ |- | २३/०६/२०२४ | मु.पो. वळवण, [[लोणावळा]], [[मावळ तालुका|ता. मावळ]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]] | वॅक्स म्युझियम | इन्स्टा चार्ज | १९९.४८ |- | १५/०७/२०२४ | मु.पो. [[कराड]], [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल संगम | टाटा पॉवर ई.झेड | ४००.५८ |- | १६/०७/२०२४ | मु.पो. [[सुरूर]], [[वाई तालुका|ता. वाई]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल साई पार्क इन | चार्जझोन | ४२२.०३ |- | १६/०७/२०२४ | मु.पो. [[कोल्हापूर]], [[करवीर तालुका|ता. करवीर]], [[कोल्हापूर जिल्हा|जि. कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल ओपल | बिजलीफाय | २७५.०० |- | १६/०७/२०२४ | मु.पो. [[कोल्हापूर]], [[करवीर तालुका|ता. करवीर]], [[कोल्हापूर जिल्हा|जि. कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल ओपल | बिजलीफाय | ६६.१६ |- | २४/०८/२०२४ | मु.पो. मालेगाव, [[नेरळ]], [[कर्जत तालुका|ता. कर्जत]], [[रायगड जिल्हा|जि. रायगड]], [[महाराष्ट्र]] | सगुणा बाग ॲग्रो रिसॉर्ट | टाटा पॉवर ई.झेड | २४५.८६ |- | ०४/०९/२०२४ | मु.पो. [[चिंचवड]], [[हवेली तालुका|ता. हवेली]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]] | एल्प्रो मॉल | जियो बीपी प्लस | २८४.४७ |- | ०९/०९/२०२४ | मु.पो. [[चिंचवड]], [[हवेली तालुका|ता. हवेली]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]] | एल्प्रो मॉल | जियो बीपी प्लस | ३८५.८६ |- | १७/०९/२०२४ | मु.पो. [[चिंचवड]], [[हवेली तालुका|ता. हवेली]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]] | एल्प्रो मॉल | जियो बीपी प्लस | १७५.६१ |- | १६/११/२०२४ | मु.पो. चौक, [[कर्जत तालुका|ता. कर्जत]], [[रायगड जिल्हा|जि. रायगड]], [[महाराष्ट्र]] | एच.पी.सी.एल. पेट्रोल पंप | टाटा पॉवर ई.झेड | २९४.७४ |- | २४/१२/२०२४ | मु.पो. [[सुरूर]], [[वाई तालुका|ता. वाई]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल साई पार्क इन | चार्जझोन | १८२.६१ |- | २४/१२/२०२४ | मु.पो. काले, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल एच.आर. रिसॉर्ट | ग्लिडा | २७४.८९ |- | २५/१२/२०२४ | मु.पो. कोडवली, [[राजापूर तालुका|ता. राजापूर]], [[रत्नागिरी जिल्हा|जि. रत्नागिरी]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल गुरुमाऊली | चार्जझोन | ३०२.४५ |- | २६/१२/२०२४ | मु.पो. भोम, [[सावंतवाडी तालुका|ता. सावंतवाडी]], [[सिंधुदुर्ग जिल्हा|जि. सिंधुदुर्ग]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल आराध्य सिनेमा | चार्जझोन | २२७.२३ |- | २८/१२/२०२४ | मु.पो. भोम, [[सावंतवाडी तालुका|ता. सावंतवाडी]], [[सिंधुदुर्ग जिल्हा|जि. सिंधुदुर्ग]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल आराध्य सिनेमा | चार्जझोन | २२१.९४ |- | २८/१२/२०२४ | मु.पो. सुळगाव, [[आजरा तालुका|ता. आजरा]], [[कोल्हापूर जिल्हा|जि. कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल पॅरेडाईस | टाटा पॉवर ई.झेड | २७७.४४ |- | २८/१२/२०२४ | मु.पो. काले, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल एच.आर. रिसॉर्ट | ग्लिडा | ३७७.७१ |- | २८/१२/२०२४ | मु.पो. [[हिंजवडी]], [[मुळशी तालुका|ता. मुळशी]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]] | श्रीनाथ कृपा चार्जिंग संकुल | चार्जझोन | ५२.२९ |- | ५/१/२०२५ | मु.पो. खालापूर, [[खालापूर तालुका|ता. खालापूर]], [[रायगड जिल्हा|जि. रायगड]], [[महाराष्ट्र]] | एच.पी.सी.एल. पेट्रोल पंप | एच.पी. ई-चार्ज | २२८.८९ |- | २३/०३/२०२५ | मु.पो. [[सुरूर]], [[वाई तालुका|ता. वाई]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल साई पार्क इन | चार्जझोन | १७९.५७ |- | २३/०३/२०२५ | मु.पो. नारायणवाडी, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल साई कॅफे आणि रेस्ट्राँ | झियॉन चार्जिंग | ३१६.३९ |- | २३/०३/२०२५ | मु.पो. कोडवली, [[राजापूर तालुका|ता. राजापूर]], [[रत्नागिरी जिल्हा|जि. रत्नागिरी]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल गुरुमाऊली | चार्जझोन | ४७४.२१ |- | २३/०३/२०२५ | मु.पो. [[सावंतवाडी]], [[सावंतवाडी तालुका|ता. सावंतवाडी]], [[सिंधुदुर्ग जिल्हा|जि. सिंधुदुर्ग]], [[महाराष्ट्र]] | खासकीलवाडा | झियॉन चार्जिंग | ४३८.४१ |- | २४/०३/२०२५ | मु.पो. भोम, [[सावंतवाडी तालुका|ता. सावंतवाडी]], [[सिंधुदुर्ग जिल्हा|जि. सिंधुदुर्ग]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल आराध्य सिनेमा | चार्जझोन | ८९.५१ |- | २४/०३/२०२५ | मु.पो. सुळगाव, [[आजरा तालुका|ता. आजरा]], [[कोल्हापूर जिल्हा|जि. कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल पॅरेडाईस | टाटा पॉवर ई.झेड | ३००.४८ |- | २४/०३/२०२५ | मु.पो. मुंडे, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल द फर्न रेसिडन्सी | जियो बी.पी. प्लस | ४३२.८२ |} {| class="wikitable sortable" style="text-align:center;" |+ २०२५ मध्ये मी पाहिलेले चित्रपट/वेब सिरिज इत्यादी. ! नाव ! प्रकार ! भाषा ! प्रदर्शित झालेले साल ! कुठे बघितला |- | मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी | चित्रपट | मराठी | २०२५ | सिनेमागृह |- | ९-१-१ ''सीझन ८'' | वेब सिरिज | इंग्रजी | २०२४ | डिस्ने+हॉटस्टार |- | द मार्शियन | चित्रपट | इंग्रजी | २०१५ | डिस्ने+हॉटस्टार |- | लाईक आणि सबस्क्राइब | चित्रपट | मराठी | २०२४ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | बंदीश बॅंडिट्स ''सीझन २'' | वेब सिरीज | हिंदी | २०२४ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | उंडा | चित्रपट | मल्याळम | २०१९ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | द बिग बुल | चित्रपट | हिंदी | २०२१ | डिस्ने+हॉटस्टार |- | सिंघम अगेन | चित्रपट | हिंदी | २०२४ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | यात्रा | चित्रपट | तेलुगू | २०१९ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | यात्रा २ | चित्रपट | तेलुगू | २०२४ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | स्क्वीड गेम ''सीझन २'' | वेब सिरीज | कोरियन | २०२४ | नेटफ्लिक्स |- | [[चाचा विधायक हैं हमारे]] ''सीझन १'' | वेब सिरीज | हिंदी | २०१८ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | [[चाचा विधायक हैं हमारे]] ''सीझन २'' | वेब सिरीज | हिंदी | २०२१ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | [[चाचा विधायक हैं हमारे]] ''सीझन ३'' | वेब सिरीज | हिंदी | २०२४ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | [[फसक्लास दाभाडे!]] | चित्रपट | मराठी | २०२५ | सिनेमागृह |- | द क्राऊन ''सीझन १'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०१६ | नेटफ्लिक्स |- | द क्राऊन ''सीझन २'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०१७ | नेटफ्लिक्स |- | इमरजंसी | चित्रपट | हिंदी | २०२५ | नेटफ्लिक्स |- | हिसाब बराबर | चित्रपट | हिंदी | २०२५ | झी५ |- | द क्राऊन ''सीझन ३'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०१९ | नेटफ्लिक्स |- | [[छावा (चित्रपट)|छावा]] | चित्रपट | हिंदी | २०२५ | नेटफ्लिक्स |- | द क्राऊन ''सीझन ४'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०२० | नेटफ्लिक्स |- | द क्राऊन ''सीझन ५'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०२२ | नेटफ्लिक्स |- | गेला माधव कुणीकडे? | नाटक | मराठी | | नाट्यगृह |- | द क्राऊन ''सीझन ६'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०२३ | नेटफ्लिक्स |- | गेम चेंजर | चित्रपट | तेलुगू | २०२५ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | [[जवान (चित्रपट)|जवान]] | चित्रपट | हिंदी | २०२३ | नेटफ्लिक्स |- | पुरुष | नाटक | मराठी | | नाट्यगृह |- | कालापानी | वेब सिरीज | हिंदी | २०२३ | नेटफ्लिक्स |- | खाकी : द बिहार चॅप्टर | वेब सिरीज | हिंदी | २०२२ | नेटफ्लिक्स |- | सेक्टर ३६ | चित्रपट | हिंदी | २०२४ | नेटफ्लिक्स |- | पाताल लोक ''सीझन २'' | वेब सिरीज | हिंदी | २०२५ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | ९-१-१ : लोन स्टार ''सीझन ५'' | वेब सिरिज | इंग्रजी | २०२४-२५ | डिस्ने+हॉटस्टार |- | द गुड डॉक्टर ''सीझन ४'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०२० | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | भूमिका | नाटक | मराठी | | नाट्यगृह |- | द गुड डॉक्टर ''सीझन ५'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०२१-२२ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | मांझी : द माऊंटन मॅन | चित्रपट | हिंदी | २०१५ | डिस्ने+हॉटस्टार |- | [[गुलकंद (चित्रपट)|गुलकंद]] | चित्रपट | मराठी | २०२५ | सिनेमागृह |- | द डिप्लोमॅट | चित्रपट | हिंदी | २०२५ | नेटफ्लिक्स |- | खाकी : द बंगाल चॅप्टर | वेब सिरीज | हिंदी | २०२५ | नेटफ्लिक्स |- | [[लक्ष्य (चित्रपट)|लक्ष्य]] | चित्रपट | हिंदी | २००४ | नेटफ्लिक्स |- | ब्लॅक वॉरंट | वेब सिरीज | हिंदी | २०२५ | नेटफ्लिक्स |- | जामतारा : सबका नंबर आएगा ''सीझन १'' | वेब सिरीज | हिंदी | २०२० | नेटफ्लिक्स |- | डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर ''सीझन १'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०१६-१७ | नेटफ्लिक्स |- | स्काय फोर्स | चित्रपट | हिंदी | २०२५ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | [[आनंद (चित्रपट)|आनंद]] | चित्रपट | हिंदी | १९७१ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | मिशन मजनू | चित्रपट | हिंदी | २०२३ | नेटफ्लिक्स |- | [[डंकी (चित्रपट)|डंकी]] | चित्रपट | हिंदी | २०२३ | नेटफ्लिक्स |- | डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर ''सीझन २'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०१७ | नेटफ्लिक्स |- | [[बावर्ची]] | चित्रपट | हिंदी | १९७२ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | चिकी चिकी बुबूम बूम | चित्रपट | मराठी | २०२५ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |} enblv5gr5cxswthy36la5dhm69oj47f मसूदा:कॉमिक बुक 118 230651 2581377 2455851 2025-06-20T20:46:30Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[कॉमिक बुक]] वरुन [[मसूदा:कॉमिक बुक]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 2455851 wikitext text/x-wiki {{मट्रा}} [[File:MuseoFerrocarrilSLP19.JPG|thumb|२० व्या शतकाच्या पहिल्या सहामाहीत रेल्वे स्थानक स्टोअरमध्ये कसे प्रदर्शित केले जावे हे दर्शविणारी एक संग्रहालय येथे प्रदर्शित होणारी कॉमिक पुस्तके.]] कॉमिक बुक किंवा कॉमिकबुक,ला कॉमिक मॅगझिन किंवा फक्त कॉमिक असेही म्हणले जाते, हे एक प्रकाशन आहे ज्यामध्ये कॉमिक आर्टमध्ये अनुक्रमिक जुळलेल पॅनल्सच्या स्वरूपात असते जे व्यक्तिगत दृश्यांना प्रतिनिधित्व करतात. पॅनेलला सहसा संक्षिप्त वर्णनात्मक गद्य आणि लिखित लेख दिले जाते, सहसा कॉमिक्स कला स्वरूपाच्या शब्दाशब्दाचा शब्द फुगेमध्ये समाविष्ट होता. १८ व्या शतकातील जपानमध्ये कॉमिक्सची उत्पत्ति झाली. १९३० च्या दशकात अमेरिकेत आणि युनायटेड किंग्डममध्ये कॉमिक पुस्तके लोकप्रिय झाली. पहिले आधुनिक कॉमिक पुस्तक, प्रसिद्ध फनिंझ, १९३३ साली अमेरिकेत प्रकाशित झाले होते आणि आधीच्या वृत्तपत्रातील विनोद कॉमिक स्ट्रिप्सचे पुनर्मुद्रण होते, ज्याने कॉमिक्समध्ये वापरण्यात येणारी अनेक कथा-सांगणारी साधने स्थापित केली होती. कॉमिक बुक हा अमेरिकन कॉमिक पुस्तकेतून आला आहे एकदा विनोदी स्वरांच्या कॉमिक स्ट्रिपचे संकलन होते. या सराव सर्व शैलीच्या कथा वैशिष्ट्यीकृत बदलले होते, टोन मध्ये सहसा विनोदी नव्हते. {{कॉमिक्स}} [[वर्ग:मशिन ट्रान्सलेशन]] sa1wi8iit2c9485tkb5hmkk8q6mnuai मसूदा:फिलिपिन्समधील धर्म 118 236289 2581435 2317160 2025-06-21T04:48:35Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[फिलिपिन्समधील धर्म]] वरुन [[मसूदा:फिलिपिन्समधील धर्म]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 2317160 wikitext text/x-wiki {{मट्रा अनुवादीत}} [[फिलिपाईन्स]] हा [[आग्नेय आशिया]]मधील एक [[देश]] आहे. या देशात किमान ९२% लोक [[ख्रिश्चन धर्म]]ीय आहेत.<ref name=NSO2014>{{संकेतस्थळ स्रोत |url=https://www.census.gov.ph/sites/default/files/2014%20PIF.pdf |title=Philippines in Figures : 2014 |access-date=2018-11-23 |archive-date=2014-09-12 |archive-url=https://web.archive.org/web/20140912101528/http://www.census.gov.ph/sites/default/files/2014%20PIF.pdf |url-status=bot: unknown }}</ref> पैकी ८१% [[रोमन कॅथोलिक]] व ११% [[प्रोटेस्टंट]], [[ऑर्थोडॉक्स]] व रेस्टोरिस्टिस्ट आणि बाकीचे लोक इग्लेसिया फिलिपिना इंडिपीएन्टें, इग्लेसियानी क्रिस्टो, सेव्हेंथ-डे ॲडवेंटिस्ट चर्च, फिलीपीन्स आणि इव्हेंजेनिकल मधील युनायटेड चर्च ऑफ ख्राईस्ट इत्यादी स्वतंत्र कॅथोलिक संप्रदायाचे आहेत. अधिकृतपणे, फिलीपाईन्स हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यांच्या राज्यघटनेने चर्च आणि राज्यकारभार विभक्त करण्याची हमी दिली आहे, त्यामुळे सरकारला सर्व धर्मांचा समान आदर करावा लागतो. राष्ट्रीय धार्मिक सर्वेक्षणानुसार, फिलिपाईन्समध्ये एकूण लोकसंख्येच्या ५.६% लोक [[मुसलमान]] असून, [[इस्लाम]]ला देशाचा दुसरा सर्वात मोठ्या धर्माचा दर्जा मिळाला आहे. २०१२ च्या राष्ट्रीय मुस्लिम फिलिपीनो आयोगाच्या (एनसीएमएफ) अंदाजानुसार, देशात १ कोटी म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या ११ टक्के लोक मुसलमान होते.<ref name=2013ifr>{{cite report|दुवा=https://www.state.gov/j/drl/rls/irf/2013/eap/222161.htm|title=Philippines|at=SECTION I. RELIGIOUS DEMOGRAPHY|work=2013 Report on International Religious Freedom|date=July 28, 2014|publisher=United States Department of State|quote=The 2000 survey states that Islam is the largest minority religion, constituting approximately 5 percent of the population. A 2012 estimate by the National Commission on Muslim Filipinos (NCMF), however, states that there are 10.7 million Muslims, which is approximately 11 percent of the total population.|access-date=2017-06-25|archive-दुवा=https://web.archive.org/web/20170625162207/https://www.state.gov/j/drl/rls/irf/2013/eap/222161.htm#|archivedate=2017-06-25|deadurl=no|df=}}</ref> बहुतेक मुसलमान मिंदानाओ, पालवान आणि सुलू द्वीपसमूहांच्या काही भागात राहतात - बंगास्मारो किंवा मोरो क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे हे क्षेत्र आहे.<ref>[http://www.philstar.com/Article.aspx?articleId=472375&publicationSubCategoryId=205 RP closer to becoming observer-state in Organization of Islamic Conference] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20160603143753/http://www.philstar.com/Article.aspx?articleId=472375&publicationSubCategoryId=205 |date=2016-06-03 }}. (2009-05-29). ''[[The Philippine Star]]''. Retrieved 2009-07-10, "Eight million Muslim Filipinos, representing 10 percent of the total Philippine population, ...".</ref> काही मुसलमान देशातील शहरी आणि ग्रामीण भागात स्थलांतरित झाले आहेत. बहुतेक मुस्लिम फिलिपिनो [[सुन्नी इस्लाम]]चे पालन करतात.<ref name=McAmis>{{पुस्तक स्रोत|दुवा=https://books.google.com/books?id=59PnSwurWj8C&pg=PA18|title=Malay Muslims: The History and Challenge of Resurgent Islam in Southeast Asia|author=McAmis, Robert Day|publisher=Wm. B. Eerdmans Publishing|year=2002|pages=18–24, 53–61|isbn=0-8028-4945-8|accessdate=2010-01-07}}</ref> देशात काही [[अहमदिया]] मुसलमानसुद्धा आहेत.<ref name="R Michael Feener, Terenjit Sevea 144">{{स्रोत पुस्तक |दुवा=https://books.google.com/books?id=2MyHnPaox9MC&pg=PA144&dq&hl=en&sa=X&ei=zMGSU6nvIsmM7QaY-YCoAg&ved=0CCsQ6AEwAA#v=onepage&q&f=false |title=Islamic Connections: Muslim Societies in South and Southeast Asia |author1=R Michael Feener |author2=Terenjit Sevea |page=144 |accessdate=June 7, 2014}}</ref> ख्रिश्चन आणि मुसलमानांव्यतिरिक्त देशात २% लोक [[बौद्ध धर्म|बौद्ध]], [[शीख]], [[हिंदू धर्म|हिंदू]], [[ज्यू लोक|यहूदी]], बहाई, [[आदिवासी]] गट किंवा कॅथोलिक/ख्रिश्चन किंवा इस्लामिक धर्मांपासून पारंपरिक धर्मांत परतलेले लोक आहेत.<ref>[http://www.globalreligiousfutures.org/countries/philippines/religious_demography%20Pew%20Research%20Center's%20Religion%20&%20Public%20Life%20Project:%20Philippines]{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Religions in Philippines {{!}} PEW-GRF|दुवा=http://www.globalreligiousfutures.org/countries/philippines/religious_demography#/|संकेतस्थळ=www.globalreligiousfutures.org|ॲक्सेसदिनांक=२३ नोव्हेंबर २०१८|भाषा=en|archive-date=2014-07-08|archive-url=https://web.archive.org/web/20140708193611/http://www.globalreligiousfutures.org/countries/philippines/religious_demography#/|url-status=dead}}</ref> शिवाय १०% पेक्षा जास्त लोक निधर्मी आहेत. {| class="wikitable sortable" style="text-align:right;font-size:85%;background-color:white;line-height:1.30em;" |+ style="font-size:100%;" | धार्मिक संबंधाद्वारे लोकसंख्या (२०१०) |- ! scope="col" style="text-align:left;" | मान्यता ! scope="col" style="text-align:center;" colspan="3" | संख्या |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|रोमन कॅथॉलिक, ''कॅथोलिक करिश्माईक इत्यादींसह''}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:74,211,896|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#000040}} | ७४,२११,८९६ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | इस्लामधर्मी | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:5,127,085|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#404070}} | ५,१२७,०८४ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|इव्हॅंजेलिकल ([[Philippine Council of Evangelical Churches|PCEC]])}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:2,469,957|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#9494AF}} | २,४६९,९५७ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[इग्लेसिया नि क्रिस्टो]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:2,251,941|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#AFAFC3}} | २,२५१,९४१ |- class="sortbottom" ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|''गैर-रोमन कॅथॉलिक आणि [[Protestantism in the Philippines|प्रोटेस्टंट]]'' ([[National Council of Churches in the Philippines|NCCP]])}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:1,071,686|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#C3C3D2}} | १,०७१,६८६ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | [[फिलिपाईन्समध्ये ब्राझिलियन कॅथोलिक चर्च|इग्रेजा कॅटोलिका अपोस्टोलिका ब्रासिलिरा नास फिलिपीन्स]] | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:5,000|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#404070}} | ५,००० |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | [[एग्लीपायन चर्च|एग्लीपायन]] | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:916,639|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#D2D2DE}} | ९१६,६३९ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[सातवा दिवस ॲडव्हेंस्टिस्ट]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:681,216|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#DEDEE6}} | ६८१,२१६ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[बाप्टिस्ट|बायबल बाप्टिस्ट चर्च]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:480,409|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#E6E6EC}} | ४८०,४०९ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[युनायटेड चर्च ऑफ ख्राईस्ट इन फिलिपाईन्स]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:449,028|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | ४४९,०२८ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[Jehovah's Witnesses]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:410,957|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | ४१०,९५७ |- class="sortbottom" ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|''Other Protestants''}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:287,734|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | २८७,७३४ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[Church of Christ]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:258,176|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | २५८,१७६ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[Jesus Is Lord Church Worldwide]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:207,246|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | २०७,२४६ |- class="sortbottom" ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|''Tribal Religions''}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:177,147|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | १७७,१४७ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[United Pentecostal Church International|United Pentecostal Church (Philippines) Inc.]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:169,956|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | १६९,९५६ |- class="sortbottom" ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|''Other Baptists''}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:154,686|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | १५४,६८६ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[Philippine Independent Catholic Church]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:138,364|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | १३८,३६४ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[Unión Espiritista Cristiana de Filipinas, Inc.]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:137,885|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | १३७,८८५ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[The Church of Jesus Christ of Latter-day Saints]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:133,814|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | १३३,८१४ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[Association of Fundamental Baptist Churches in the Philippines]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:106,509|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | १०६,५०९ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[Evangelical Christian Outreach Foundation]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:96,102|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | ९६,१०२ |- class="sortbottom" ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|''None''}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:73,248|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | ७३,२४८ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[Convention of Philippine Baptist Churches|Convention of the Philippine Baptist Church]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:65,008|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | ६५,००८ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[Crusaders of the Divine Church of Christ Inc.]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:53,146|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | ५३,१४६ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | [[Buddhist]] | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:46,558|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | ४६,५५८ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[Lutheran Church in the Philippines]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:46,558|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | ४६,५५८ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[Iglesia sa Dios Espiritu Santo Inc.]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:45,000|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | ४५,००० |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[Philippine Benevolent Missionaries Association]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:42,796|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | ४२,७९६ |- ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | {{nowrap|[[Faith Tabernacle Church (Living Rock Ministries)]]}} | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:36,230|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | ३६,२३० |- class="sortbottom" ! scope="row" style="text-align:left;background-color:initial;" | ''इतर'' | style="font-weight:bold;" | {{bartable|{{rnd|{{#expr:100 * {{formatnum:299,399|R}} / {{formatnum:92,097,978|R}}}}|2}}||||background-color:#ECECF1}} | २९९,३९९ |- class="sortbottom" style="border-top:double grey;" ! scope="col" style="text-align:left;letter-spacing:0.02em;" colspan="3" | एकूण ! scope="col" style="text-align:right;" | ९२,०९७,९७८ |- class="sortbottom" | style="font-style:italic;" colspan="4" | स्रोत: [[फिलीपीन सांख्यिकी प्राधिकरण]]<ref name="PSA-2015PSY">{{जर्नल स्रोत|title=Table 1.10; Household Population by Religious Affiliation and by Sex; 2010|journal=2015 Philippine Statistical Yearbook|date=October 2015|pages=1–30|दुवा=https://psa.gov.ph/sites/default/files/2015%20PSY%20PDF.pdf#56|accessdate=15 August 2016|publisher=[[Philippine Statistics Authority]]|location=East Avenue, Diliman, Quezon City, Philippines|issn=0118-1564}}</ref> |} == रोमन कॅथोलिक धर्म == फिलिपाईन्समध्ये एक मोठी स्पॅनिश कॅथोलिक परंपरा आहे, त्यामुळे या देशात कॅथलिक धर्म संस्कृतीमध्ये स्पॅनिश शैली मिसळली आहे.<ref>{{स्रोत बातमी|title=MAP: Catholicism in the Philippines|दुवा=https://www.rappler.com/newsbreak/iq/81162-map-catholicism-philippines|ॲक्सेसदिनांक=२३ नोव्हेंबर २०१८|काम=Rappler|भाषा=इंग्लिश}}</ref> === पोपच्या भेटी === * वर्ष १९७० मध्ये [[पोप पॉल सहावा|पोप पॉल सहावे]] यांचे फिलिपिन्समधील मनिला आंतरराष्ट्रीय विमानतळावर हत्येच्या प्रयत्नांचा उद्देश झाला होता. ''बेंजामिन मेन्दोझा वाई आमोर फ्लॉरेस'' नावाच्या बोलिव्हियन अवास्तविक चित्रकाराने हल्ला केला, तो पोप पॉलकडे क्रिस घेऊन गेला, पण तो पराभूत झाला. * [[पोप जॉन पॉल दुसरा]] यांनी १९८१ आणि १९९५ मध्ये दोनदा या देशाला भेट दिली. कार्यक्रमाचे अंतिम मिसाबलिदानात ४ दशलक्ष लोक उपस्थित होते आणि त्या वेळीचे इतिहासातील सर्वात मोठा पापल गर्दी होती. * [[पोप बेनेडिक्ट सोळावा]]ने कार्डिनल गौडेन्सियो रोसलेस आणि सीबीसीपीचे अध्यक्ष एंजेल लगदामे यांनी दिलेल्या आमंत्रण नाकारले. * [[पोप फ्रान्सिस]]ने जानेवारी २०१५ मध्ये या देशाला भेट दिली आणि क्विरिनो ग्रॅंडस्टॅंड येथील अंतिम मिसा केले. ते जवळजवळ वीस वर्षांपूर्वी त्याच जागेवर जिथे पोप जॉन पॉल यांनी मिसाबलिदान केले होते. त्या मिसात पूर्वीचा रेकॉर्ड तोडून ६ दशलक्ष भावर्ती उपस्थित होते. ==बौद्ध धर्म== फिलीपिन्समध्ये [[बौद्ध धर्म]] एक अल्पसंख्य धर्म आहे. बौद्ध संदर्भांसह कर्जपत्र फिलीपीन्सच्या भाषांमध्ये आढळतात. पुरातत्व शोधांमध्ये बौद्ध कलाकृतींचा समावेश आहे, त्या शैलींवर [[वज्रयान]] बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. २०१० च्या जनगणनेनुसार फिलीपिन्सची बौद्ध लोकसंख्या ४६,५५८ इतकी आहे.<ref>https://psa.gov.ph/sites/default/files/2015%20PSY%20PDF.pdf</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.globalreligiousfutures.org/countries/philippines/religious_demography#/?affiliations_religion_id=0&affiliations_year=2010 |title=संग्रहित प्रत |access-date=2018-11-30 |archive-date=2014-07-08 |archive-url=https://web.archive.org/web/20140708193611/http://www.globalreligiousfutures.org/countries/philippines/religious_demography#/?affiliations_religion_id=0&affiliations_year=2010 |url-status=dead }}</ref> == हिंदू धर्म == श्रीलिजय साम्राज्याने आणि माजापहट साम्राज्याने म्हणजे आता असलेल्या [[मलेशिया]]ने व [[इंडोनेशिया]]ने हिंदू आणि बौद्ध धर्मांना फिलिपाईन्स बेटांवर आणले. फिलपाईन्समध्ये इ.स. २०० ते १२०० सालच्या हिंदू-बौद्ध देवतांचे प्राचीन पुतळे आढळतात.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Some Aspects of Asia and Culture|प्रकाशक=Abhinav Publications|वर्ष=1986|last=Thakur|first=Upendra}}</ref> == इस्लाम धर्म == इस्लाम धर्म १४व्या शतकात फारसी खाडी, दक्षिणी भारत आणि मुस्लिम दक्षिणपूर्वी आशियातील अनेक सल्तनत सरकारमधील मुसलमान व्यापार्यांच्या आगमनाने फिलिपिन्स येथे पोहोचला. इस्लामचे प्रामुख्याने मनिला खाडीच्या किनार्यापर्यंत अनेक मुस्लिम साम्राज्यांकडे पोहोचले. दक्षिणी फिलिपिनो जमाती ही काही स्वदेशी फिलिपिनो समुदायांमध्ये होती ज्यांनी रोमन कॅथलिक धर्माला स्पॅनिश नियम व रुपांतर करण्यास विरोध केला. फिलीपिन्समधील बहुसंख्य मुस्लिम शिया आणि अहमदाय्या अल्पसंख्यकांबरोबर न्यायशास्त्राच्या शफी शाळेच्या सुन्नी इस्लामचे अनुसरण करतात.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.com/books?id=2MyHnPaox9MC&pg=PA144&dq&hl=en&sa=X&ei=zMGSU6nvIsmM7QaY-YCoAg&ved=0CCsQ6AEwAA#v=onepage&q&f=false|title=Islamic Connections: Muslim Societies in South and Southeast Asia|last=Feener|first=R. Michael|last2=Sevea|first2=Terenjit|date=2009|publisher=Institute of Southeast Asian Studies|isbn=9789812309235|language=en}}</ref> फिलिपिन्समध्ये इस्लाम हा सर्वात जुने एकोव्हेस्टीक धर्म आहे. == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:फिलिपिन्स]] [[वर्ग:देशानुसार धर्म]] 7rkjbgadgpsgvmxu1aik1kdibusudxo मसूदा:रोशनी थिनकरन 118 236455 2581522 2550456 2025-06-21T06:45:57Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[रोशनी थिनकरन]] वरुन [[मसूदा:रोशनी थिनकरन]] ला हलविला 2550456 wikitext text/x-wiki {{मट्रा|इंग्लिश}} '''रोशनी थिनकरन''' एक [[:en:National_Geographic_Society|National Geographic]] तसेच [[:en:TED_(conference)|TED]] Global यांची शिष्यवृत्ती धारक आहे . एक तरुण, धाडसी डॉक्यूमेंटरी चित्रपट निर्माती म्हणून ती प्रसिद्ध आहे. ती मुळात [[श्रीलंका]] येथील असून नंतर ती [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|युनायटेड स्टेट्स]] येथे राहात आहे.<ref name=":0">{{जर्नल स्रोत|last=Johnson|first=Michelle|date=November 2007|title=Viewing War Through Women's Eyes|दुवा=http://search.ebscohost.com/login.aspx?direct=true&db=lfh&AN=27450460&site=ehost-live|journal=World Literature Today|volume=81|issue=6|pages=10-12|doi=|pmid=|access-date=22 December 2015|subscription=yes}}</ref> तिने चित्रपट निर्मितीत स्त्री केंन्द्री लघुपटांची निर्मिती केली आहे. == चरित्र == रोशनी थिनकरनचा जन्म श्रीलंकेचा , पण ती वयाच्या सातव्या वर्षी अमेरिकेला गेली .<ref name=":0"/> त्यावेळी चालू असलेल्या श्रीलंकेतील [[श्रीलंकन यादवी युद्ध|यादवी युद्धामुळे]] तिचे कुटुंब अमेरिकेत स्थलांतरित झाले.<ref name=":2">{{स्रोत बातमी|last=Sklarew|first=Renee|date=September 2009|work=Northern Virginia Magazine|access-date=22 December 2015|via=}}</ref> थिनकरन हिने जॉर्ज मेसन विद्यापीठात शिक्षण घेतले.<ref name=":2" /> तिने MS in Real Estate and Finance ही पदवी प्राप्त केली. रोशनी श्रीलंका आणि सिंगापूर येथे Plurogen Therapeutics साठी प्रकल्प प्रमुख म्हणून काम करत होती. कंपनीच्या त्या त्या भागातील पार्टनरसाठी ती काम करत असे. तसेच तिने US-media company साठी काम केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.linkedin.com/in/roshini-thinakaran-16077a37|title=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-दुवा=|archive-date=|dead-दुवा=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> == काम == रोशनीने [[एलेन जॉन्सन-सर्लिफ|Ellen Johnson Sirleaf]], अध्यक्ष, लायबेरिया यांच्यावर पहिला लघुपट केला होता .<ref name=":2"/> ह्या चित्रपटाची लांबी खूपच लहान होती, पण National Geographic या मान्यवर संस्थेचे लक्ष तिने आपल्याकडे खेचून घेतले ."<ref name=":2" /> त्यामुळे ती National Geographic Society's Emerging Explorers Programची भाग बनली. आणि तिला $10,000चे अनुदान प्राप्त झाले.<ref name=":3">{{स्रोत बातमी|last=Rayasam|first=Renuka|date=1 October 2008|work=Washingtonian|access-date=22 December 2015|via=}}</ref> तिने तिचे लक्ष [[इराक]], [[लायबेरिया]], [[लेबेनॉन|लेबनॉन]] आणि [[अफगाणिस्तान]] येथील संघर्षाला सामोरे जाणाऱ्या महिलांचे जगणे या विषयातील संशोधन करणे आणि त्यांचे चरित्रचित्रण यावर केंद्रित केले. <ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://peacemedia.usip.org/resource/women-forefront-examining-impact-conflict-women|last=|पहिले नाव=|title=संग्रहित प्रत|access-date=2018-11-26|archive-date=2016-09-02|archive-url=https://web.archive.org/web/20160902083240/http://peacemedia.usip.org/resource/women-forefront-examining-impact-conflict-women|url-status=dead}}</ref> तिने 2005 मध्ये, एक मल्टिमिडीया प्रकल्प करतांना महिलांच्या दृष्टिकोनातून युद्धाचे विश्लेषण केले.<ref name=":1" /> रोशनीने 14 महिने इराक आणि आजूबाजूचे परिसर यामध्ये वास्तव्य करून ''Women at the Forefront याची निर्मिती केली''.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.nationalgeographic.com/explorers/bios/roshini-thinakaran/|last=|पहिले नाव=}}</ref> या चित्रपटातून तिने, जुलुम आणि त्रासावर मात करत उभ्या राहिलेल्या कणखर महिला चळवळींना जगासमोर आणले. ''What Was Promised (2008) या'' तिच्या माहितीपटात तिने , अमेरिकेच्या पुढाकाराने इराकी महिलांना इराकी सुरक्षा बल यामध्ये समाविष्ट केले गेले त्यावर भाष्य केले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Gender, Power, and Military Occupations: Asia Pacific and the Middle East Since 1945|last=Hristova|first=Stefka|publisher=Routledge|year=2012|isbn=9780415891837|editor-last=de Matos|editor-first=Christine|location=New York|pages=192|chapter=Abu Ghraib: A Ghostly Story|editor-last2=Ward|editor-first2=Rowena}}</ref> त्याचा पहिला प्रयोग National Geographic All Roads Film Project याच्या अंतर्गत सादर करण्यात आला.<ref name=":3"/> रोशनीच्या कामाचा भर युद्धाने उद्धवस्त झालेल्या प्रदेशांवर दिला आहे. तिच्या आजवरच्या प्रवासातून तिने आयुष्यातल्या संकटावर मात करणाऱ्या, आपल्या कुटुंबाला आधार असणाऱ्या, स्वतःचे निवासप्रदेश अधिक सक्षम करणाऱ्या स्त्रियांची व्यक्तिचित्रे चित्रपटातून साकारली आहेत. ती म्हणते की , आपल्या देशामध्ये वेगळे काम करून, ज्या मुले आणि मुली दोन्हींसाठी उदाहरण समोर ठेवत आहेत, अशा स्त्रियांना जगासमोर आणून महिलांना सजग करणे हे तिच्या कामामागचे उद्दिष्ट आहे. जर आज आपण माणसांना योग्य ते शिक्षण आणि शिकवण देऊन सक्षम केले नाही तर समाज मोडून पडतील. == चित्रपट == * महिला आघाडीवर (2005) * काय वचन दिले होते (2008) * प्रवास OnEarth (चित्रपट मालिका, 2011)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://voices.nationalgeographic.com/2012/01/18/after-the-gas-rush-part-2/|last=Howley|पहिले नाव=Andrew|title=संग्रहित प्रत|access-date=2018-11-26|archive-date=2015-12-23|archive-url=https://web.archive.org/web/20151223103739/http://voices.nationalgeographic.com/2012/01/18/after-the-gas-rush-part-2/|url-status=dead}}</ref> == संदर्भ == <references group="" responsive=""></references> == बाह्य दुवे == * [http://www.womenattheforefront.com महिला आघाडीवर] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20210309133006/http://www.womenattheforefront.com/ |date=2021-03-09 }} * [http://www.nationalgeographic.com/field/explorers/roshini-thinakaran/ राष्ट्रीय भौगोलिक उदयोन्मुख एक्सप्लोरर प्रोफाइल] * [http://www.ted.com/pages/view/id/437 टेड ग्लोबल सहकारी प्रोफाइल][http://www.catherinebradfordshow.com/archives/shows/?id=100145 मी] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20160303191718/http://www.catherinebradfordshow.com/archives/shows/?id=100145 |date=2016-03-03 }} * [http://www.catherinebradfordshow.com/archives/shows/?id=100145 मुलाखत वर ''संपर्क Talk रेडिओ'' , 15 सप्टेंबर 2009]{{मृत दुवा|date=March 2025 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }} [[वर्ग:श्रीलंकन स्त्री चित्रपट निर्माती]] epyirl5xt2w35ke3et59ah8waz0qvvo मसूदा चर्चा:फिलिपिन्समधील धर्म 119 237225 2581437 2117172 2025-06-21T04:48:36Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:फिलिपिन्समधील धर्म]] वरुन [[मसूदा चर्चा:फिलिपिन्समधील धर्म]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 1648781 wikitext text/x-wiki {{WAM लेख २०१८}} ea7huloq5s6d12x0x12tl9lp3qbzo5v मसूदा चर्चा:रोशनी थिनकरन 119 237227 2581524 1648785 2025-06-21T06:45:58Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:रोशनी थिनकरन]] वरुन [[मसूदा चर्चा:रोशनी थिनकरन]] ला हलविला 1648785 wikitext text/x-wiki {{WAM लेख २०१८}} ea7huloq5s6d12x0x12tl9lp3qbzo5v मसूदा:कलात्मक सायकलिंग 118 238596 2581527 1662460 2025-06-21T06:52:47Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[कलात्मक सायकलिंग]] वरुन [[मसूदा:कलात्मक सायकलिंग]] ला हलविला 1662460 wikitext text/x-wiki {{मट्रा}} कलात्मक सायकलिंग स्पर्धात्मक इनडोर सायकलिंगचे एक प्रकार आहे. ज्यामध्ये एथलीट बॅले किंवा जिम्नॅस्टिकसारख्या स्वरूपात वैशिष्ट्यीकृत, निश्चित-गीअर बाइकच्या बिंदूंसाठी युक्त्या (व्यायाम म्हटल्या जातात) चालवतात. व्यायाम, जोड्या, चार-किंवा सहा-पुरुष संघाने पाच मिनिटांच्या फेरीत न्यायाधीशांसमोर केले जातात. <br /> == इतिहास == 1888 मध्ये स्विस-अमेरिकन निकोलस एडवर्ड कौफॅनन यांनी कलात्मक सायकलिंगमध्ये प्रथम अनौपचारिक [[जागतिक चॅम्पियनशिप]] आयोजित केली. मुख्यत्वे त्याच्या युक्ती सायकल चालविण्याच्या प्रदर्शनासाठी प्रसिद्धी होती. kddj9agdl3278fv036n7no1pjpcv7nd मसूदा:कलिका प्रसाद भट्टाचार्य 118 239840 2581529 2511147 2025-06-21T06:55:12Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[कलिका प्रसाद भट्टाचार्य]] वरुन [[मसूदा:कलिका प्रसाद भट्टाचार्य]] ला हलविला 2511147 wikitext text/x-wiki {{मट्रा}} '''कालिक प्रसाद भट्टाचार्य''' (११ सप्टेंबर १९७० - ७ मार्च २०१७) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.thedailystar.net/arts-entertainment/tv/bhuban-majhi-screening-today-1460164|title=“Bhuban Majhi” screening today|दिनांक=2017-09-11|संकेतस्थळ=The Daily Star|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2019-01-28}}</ref> भारतीय लोक गायक आणि संशोधक होते. त्यांचा जन्म आसाममधील सिलचर येथे झाला. जादवपूर विद्यापीठातील तुलनात्मक साहित्य अभ्यास करण्यास त्यांनी सुरुवात केली. संगीत प्रेरणा म्हणजे त्यांचे काका अनंत भट्टाचार्य. १९९९  मध्ये त्यांनी उत्तर आणि पूर्व बंगालच्या लोक [[संगीत]] परंपरेला पुनरुज्जीवित करण्याचे उद्दीष्ट असलेल्या बँड दोहरची सह-स्थापना केली. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये संगीत देखील केले. त्यांचा शेवटचा चित्रपट भुबन माशी (२०१७) होता. ते लोकप्रिय बंगाली संगीत रियलिटी शो झी बांगला सा रे गा मा मा, यांच्याशी निगडीत होते. बागुईहती [[कृषी]] मेळामध्ये त्यांचा शेवटचा मैफिल होता. == जीवन आणि कारकीर्द == '''प्रारंभिक जीवन''' आसाममधील सिलचर येथे संगीत भट्टाचार्य यांच्या घराचा एक आंतरिक भाग होता. तबला खेळणे,शिकणे हे नैसर्गिकरित्या घडले कारण त्याने त्याचे पहिले पायउतार पाऊल उचलले. तबला नंतर हळूहळू त्याला विविध जातीच्या परिक्रमाकडे वळविण्यात आले. हे [[खेळ]] शिकत असताना त्यांनी स्वर संगीत देखील शिकवले. पारंपारिक लोक गाण्यांसाठी त्यांनी शोध सुरू केला जे जीवंत, मधुर आणि सर्वसमावेशक लोक धुन आहेत जे नेहमी अनोळखी आणि अज्ञात होते. १९९५ मध्ये त्यांनी तुलनात्मक साहित्य विभागामध्ये जादवपूर विद्यापीठात प्रवेश घेतला. १९९८ मध्ये त्यांना "इंडियन्स फाउंडेशन फॉर आर्ट्स" कडून " <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://indiaifa.org/kalika-prasad-bhattacharya.html|title=Kalika Prasad Bhattacharya {{!}} India Foundation for the Arts|संकेतस्थळ=indiaifa.org|ॲक्सेसदिनांक=2019-01-28}}</ref>औद्योगिकीकरण आणि लोक संगीत" साठी संशोधन अनुदान मिळाले आणि बंगलोर गेले. '''दोहर''' एका लोकसंगीतमध्ये भट्टाचार्याने १९९९ मध्ये लोक संगीतकारांचे एक गट दोहर <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://doharfolk.com/about-2/|title=About – Dohar|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-01-28|archive-date=2019-01-16|archive-url=https://web.archive.org/web/20190116081943/http://doharfolk.com/about-2/|url-status=dead}}</ref> बनवले, १९९९  मध्ये अनोळखी लोक गाणे चालू ठेवण्यासाठी अत्युत्तम लोक त्याच्या सर्जनशील दिशेने असंख्य लोकांपर्यंत पोहोचले. दोहरचे प्रस्तुतीकरण अद्वितीय आहे. त्यांची कामगिरी शहरी भावनांना मुळांना त्यांच्या वचनबद्धतेसह आश्चर्यकारकपणे विलीन करते; संशोधन आणि [[मनोरंजन]], अविभाज्यपणे गुंतलेली आहे. दोहर यांनी कोंकॉर्डच्या कॉनकॉर्ड रेकॉर्ड्स, सोनी म्युझिक अँड सा रे गा मा (एचएमव्ही) मधील निर्देशित लोक गाण्याचे नऊ अल्बम रिलीज केले आहेत. दोहरचा चौथा अल्बम - "बांगला" हा रवींद्र संगीत आणि लोक गाण्याचे संकलन आहे. अल्बमची संकल्पना रवींद्र संगीत आणि [[लोकसंगीत]] यांच्यातील विषयगत वाचन यांच्यात संवाद आहे. भारतीय कौन्सिल फॉर सांस्कृतिक संबंध (आयसीसीआर) यांनी दोहर यांना अंमलात आणला. '''संगीत कारकीर्द''' भट्टाचार्य यांनी हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काही प्लेबॅक गाणी गायली. हिंदी चित्रपटातील त्यांच्या गाण्यांमध्ये अशोक विश्वनाथन यांनी दिग्दर्शित गुमशुदाचा समावेश केला आहे. २००७  मध्ये त्यांनी सुमन मुखोपाध्याय यांनी दिग्दर्शित बंगाली चित्रपट चतुरंगासाठी गायन केले. २००८ साली त्यांनी बंगाली चित्रपट मोनर मूनश (सुवर्ण मोर पुरस्कार विजेता) गायन केले जे गौतम घोष यांनी दिग्दर्शित भारत-बांग्लादेश संयुक्त प्रकल्प आहे. फकीर लालन शाहच्या आयुष्याविषयी आणि तत्त्वज्ञानावर सुनील गंगोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित हे एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहे. बंगाली चित्रपट जातिश्वर हे राष्ट्रीय पुरस्कार (रजत कमल) होते जे दिग्दर्शित श्रीजीत मुखर्जी यांनी दिग्दर्शित केले, जिथे भट्टाचार्य यांनी २०१४  मध्ये गायन केले. २०१२ मध्ये, भट्टाचार्य यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल आणि वृत्तपत्रात प्रकाशित केलेल्या विविध संशोधनात्मक लेख लिहिले. त्यांनी नंदीकर, कल्याणी नाट्य चर्च आणि त्रितियो सुत्रो सारख्या प्रख्यात थिएटर गटांसाठी संगीत केले. याशिवाय, ढाका येथील कार्यक्रमादरम्यान डॉ. हजारिका यांच्या एका सेमीनारमध्ये भट्टाचार्य प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. अनेक लोकप्रिय बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये प्लेबॅकव्यतिरिक्त त्यांनी सोव्हन तारफदार यांनी दिग्दर्शित "सेल्फी", फख्रुल आरेफिन (बांग्लादेश) यांनी दिग्दर्शित "भुबन माशी", <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.newagebd.net/article/10334/liberation-war-based-film-bhuban-majhi-premiered|title=Liberation War-based film Bhuban Majhi premiered|संकेतस्थळ=New Age {{!}} The Most Popular Outspoken Daily English Newpaper in Bangladesh|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2019-01-28}}</ref>"बिशोरजन" निर्देशित केलेल्या चित्रपटातील संगीत दिग्दर्शन दिले आहे. कौशिक गंगुली, <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.kolkatabengalinfo.com/2017/01/bisarjan-bengali-film-cast-story-review-abir-chatterjee-joya-ahsan-visarjan.html|title=Bisarjan Bengali Film Cast & Story Review – Abir Chatterjee & Joya Ahsan’s Visarjan Cinema Halls Showing|last=Kumar|पहिले नाव=S.|ॲक्सेसदिनांक=2019-01-28}}</ref> पावेल यांनी दिग्दर्शित "रोसोगोला" आणि आशिष रॉय यांनी दिग्दर्शित "सितारा". == पुरस्कार == २०१३ मध्ये भट्टाचार्य यांना पश्चिम बंगाल सरकारकडून "संगीत सन्मान पुरस्कार" प्राप्त झाला. त्यांनी २०१३ मध्ये गुवाहाटीतील बट्टिक्रम ग्रुपमधून उत्तरपूर्व पुरस्कारांचे सांस्कृतिक राजदूत प्राप्त केले. == लोक संगीत भक्ती == लोक संगीत भक्ती भट्टाचार्य ग्रामीण बंगालच्या आत्म्याच्या आणि हृदयाच्या गाण्यांसाठी पूर्णपणे समर्पित होते. वार्षिक मूळ संगीत महोत्सव, भारतातील एक प्रकारचे विविधता, कलांचे लोक रूप व विविधता साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. कलिका यांना टॅगोरियन विद्वान म्हणूनही सुरक्षितपणे जबाबदार केले जाऊ शकते. त्यांचे "अबु कुद्रती" हे टागोरसह लालान फकीरचे एक पैलू संबंधित नाट्यपूर्ण सादरीकरण आहे. नाट्यमय कारकिर्दीतही त्याच्या अद्वितीय नाविन्यपूर्ण कल्पना आहेत. टीव्ही चॅनल झी बांगला यांनी अशी स्थापना केली की भट्टाचार्यची प्रतिभा फक्त बंगाली लोकांपर्यंतच मर्यादित असली पाहिजेच, पण पंजाबी भाषा लोकगीतांसारख्या भाषेतील अडथळा दूर करणाऱ्या लोकांपर्यंत देखील वाढविली पाहिजे. त्यांनी 'सा रे गा मा पा' या कार्यक्रमात बंगाली लोक संगीताची जाहिरात केली. भुपेन हजारिका यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश सरकारने एक स्मरणशक्ती कार्यक्रम आयोजित केला, ज्यात भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली दहेर यांनी डॉ हजारारीकाची अविस्मरणीय संख्या काढून टाकली. == मृत्यू == ७ मार्च २०१७ रोजी हुगली जिल्ह्यातील गुरूप गावाजवळ ४५ वयाचे असताना भट्टाचार्यचा मृत्यू झाला. '''<br />''' == संदर्भ == <references /> [[वर्ग:गायक]] gd3l5q56oxc9w4e2pun5znfwevjt9pz खडीकोळवण 0 240437 2581285 2581266 2025-06-20T12:04:06Z Wikimarathi999 172574 2581285 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले श्री मार्लेश्वर गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. खडीकोळवण हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या होळी, शिमगा, व गणपती उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली, ग्रामस्थ एकमताने निर्णय घेतले जात. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा उद्भव झाला आहे. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[आंबा घाट]] * दक्षिणेस [[ओझरे]] व [[निनावे]] व [[कलकदरा]] * पूर्वेस [[बामणोली]] व [[मार्लेश्वर]] * उत्तरेस [[कळंब]] व [[गायमुख]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाच्या मुख्य सीमेला लागून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात फिरू लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px|जंगल सफारी]]</center> == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''श्री देव गांगेश्वर हे ग्रामदैवत, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि गौर गणपती यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने सत्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी कडून वार्षिक सत्यनारायण पुजन असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या उत्तरेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे श्री मार्लेश्वर शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px|हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''१४ जानेवारीला'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी/रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px| खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार श्री. सुभाष बने]] * [[सभापती श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच अध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला. त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरु केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरु केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] खडीकोळवण गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg|[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg|[[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] kqg38ltfeevq35edxlcso75ywkp1w7l 2581286 2581285 2025-06-20T12:04:08Z KiranBOT II 140753 शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय ([[सदस्य:KiranBOT II/typos#पररूप संधी - इक प्रत्यय|अधिक माहिती]]); शुद्धलेखन — योग्य उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#योग्य उकार|अधिक माहिती]]) 2581286 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले श्री मार्लेश्वर गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. खडीकोळवण हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या होळी, शिमगा, व गणपती उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली, ग्रामस्थ एकमताने निर्णय घेतले जात. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा उद्भव झाला आहे. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[आंबा घाट]] * दक्षिणेस [[ओझरे]] व [[निनावे]] व [[कलकदरा]] * पूर्वेस [[बामणोली]] व [[मार्लेश्वर]] * उत्तरेस [[कळंब]] व [[गायमुख]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाच्या मुख्य सीमेला लागून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात फिरू लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px|जंगल सफारी]]</center> == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''श्री देव गांगेश्वर हे ग्रामदैवत, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि गौर गणपती यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने सत्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी कडून वार्षिक सत्यनारायण पुजन असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या उत्तरेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे श्री मार्लेश्वर शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px|हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''१४ जानेवारीला'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी/रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px| खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार श्री. सुभाष बने]] * [[सभापती श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला. त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] खडीकोळवण गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg|[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg|[[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] 8kacsfin281mrg2im72e2jxub5pm0hn 2581287 2581286 2025-06-20T12:05:07Z Wikimarathi999 172574 /* कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण */ 2581287 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले श्री मार्लेश्वर गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. खडीकोळवण हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या होळी, शिमगा, व गणपती उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली, ग्रामस्थ एकमताने निर्णय घेतले जात. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा उद्भव झाला आहे. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[आंबा घाट]] * दक्षिणेस [[ओझरे]] व [[निनावे]] व [[कलकदरा]] * पूर्वेस [[बामणोली]] व [[मार्लेश्वर]] * उत्तरेस [[कळंब]] व [[गायमुख]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाच्या मुख्य सीमेला लागून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात फिरू लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px|जंगल सफारी]]</center> == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''श्री देव गांगेश्वर हे ग्रामदैवत, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि गौर गणपती यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने सत्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी कडून वार्षिक सत्यनारायण पुजन असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या उत्तरेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे श्री मार्लेश्वर शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px|हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''१४ जानेवारीला'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी/रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px| खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार श्री. सुभाष बने]] * [[सभापती श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] खडीकोळवण गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg|[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg|[[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] m2blyygjfaei9ksc6p4jwb22undytt6 2581289 2581287 2025-06-20T12:15:17Z Wikimarathi999 172574 /* रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा */ 2581289 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले श्री मार्लेश्वर गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. खडीकोळवण हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या होळी, शिमगा, व गणपती उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली, ग्रामस्थ एकमताने निर्णय घेतले जात. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा उद्भव झाला आहे. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[बामणोली]] * दक्षिणेस [[निवधे]] * पूर्वेस [[ओझरे]] * उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाच्या मुख्य सीमेला लागून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात फिरू लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px|जंगल सफारी]]</center> == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''श्री देव गांगेश्वर हे ग्रामदैवत, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि गौर गणपती यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने सत्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी कडून वार्षिक सत्यनारायण पुजन असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या उत्तरेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे श्री मार्लेश्वर शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px|हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''१४ जानेवारीला'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी/रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px| खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार श्री. सुभाष बने]] * [[सभापती श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] खडीकोळवण गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg|[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg|[[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] sm16dhwvn904m18fo7pz4iqlr43b7zq 2581291 2581289 2025-06-20T12:30:04Z Wikimarathi999 172574 2581291 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले श्री मार्लेश्वर गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. खडीकोळवण हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या होळी, शिमगा, व गणपती उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली, ग्रामस्थ एकमताने निर्णय घेतले जात. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा उद्भव झाला आहे. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[बामणोली]] * दक्षिणेस [[निवधे]] * पूर्वेस [[ओझरे]] * उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाच्या मुख्य सीमेला लागून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात फिरू लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px|जंगल सफारी]]</center> [[File:गावात जाणारा रस्ता - पावसातील मोहक दृश्य.jpg|centerpx गावात जाणारा रस्ता - पावसातील मोहक दृश्य]] == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''श्री देव गांगेश्वर हे ग्रामदैवत, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि गौर गणपती यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने सत्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी कडून वार्षिक सत्यनारायण पुजन असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या उत्तरेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे श्री मार्लेश्वर शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px|हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''१४ जानेवारीला'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी/रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px| खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार श्री. सुभाष बने]] * [[सभापती श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] खडीकोळवण गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg|[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg|[[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] 1y2x1wnsdx3sb6yqnox5jxq1hzho9rw 2581292 2581291 2025-06-20T12:31:28Z Wikimarathi999 172574 2581292 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले श्री मार्लेश्वर गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. खडीकोळवण हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या होळी, शिमगा, व गणपती उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली, ग्रामस्थ एकमताने निर्णय घेतले जात. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा उद्भव झाला आहे. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[बामणोली]] * दक्षिणेस [[निवधे]] * पूर्वेस [[ओझरे]] * उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाच्या मुख्य सीमेला लागून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात फिरू लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px|जंगल सफारी]]</center> [[File:गावात जाणारा रस्ता - पावसातील मोहक दृश्य.jpg|center|600px गावात जाणारा रस्ता - पावसातील मोहक दृश्य]] == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''श्री देव गांगेश्वर हे ग्रामदैवत, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि गौर गणपती यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने सत्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी कडून वार्षिक सत्यनारायण पुजन असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या उत्तरेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे श्री मार्लेश्वर शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px|हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''१४ जानेवारीला'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी/रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px| खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार श्री. सुभाष बने]] * [[सभापती श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] खडीकोळवण गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg|[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg|[[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] 0cl7ggh5k96bzydygloc9mh6372qysu 2581293 2581292 2025-06-20T12:32:17Z Wikimarathi999 172574 2581293 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले श्री मार्लेश्वर गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. खडीकोळवण हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या होळी, शिमगा, व गणपती उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली, ग्रामस्थ एकमताने निर्णय घेतले जात. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा उद्भव झाला आहे. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[बामणोली]] * दक्षिणेस [[निवधे]] * पूर्वेस [[ओझरे]] * उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाच्या मुख्य सीमेला लागून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात फिरू लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px|जंगल सफारी]]</center> == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''श्री देव गांगेश्वर हे ग्रामदैवत, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि गौर गणपती यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने सत्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी कडून वार्षिक सत्यनारायण पुजन असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या उत्तरेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे श्री मार्लेश्वर शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px|हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''१४ जानेवारीला'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी/रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px| खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार श्री. सुभाष बने]] * [[सभापती श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] खडीकोळवण गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg|[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg|[[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] sm16dhwvn904m18fo7pz4iqlr43b7zq 2581548 2581293 2025-06-21T08:49:04Z Wikimarathi999 172574 /* भातशेतीचे प्रमुख शेतमळे */ 2581548 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले श्री मार्लेश्वर गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. खडीकोळवण हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या होळी, शिमगा, व गणपती उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली, ग्रामस्थ एकमताने निर्णय घेतले जात. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा उद्भव झाला आहे. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[बामणोली]] * दक्षिणेस [[निवधे]] * पूर्वेस [[ओझरे]] * उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाच्या मुख्य सीमेला लागून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात फिरू लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px|जंगल सफारी]]</center> == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''श्री देव गांगेश्वर हे ग्रामदैवत, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि गौर गणपती यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने सत्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी कडून वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडीतील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या उत्तरेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे श्री मार्लेश्वर शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px|हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''१४ जानेवारीला'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी/रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px| खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार श्री. सुभाष बने]] * [[सभापती श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] खडीकोळवण गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg|[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg|[[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] 1c4uoumm1kyv0pmtc85y057wdazyqf2 2581581 2581548 2025-06-21T11:30:23Z Wikimarathi999 172574 2581581 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा संभ्रम निर्माण झाला. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[बामणोली]] * दक्षिणेस [[निवधे]] * पूर्वेस [[ओझरे]] * उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px|जंगल सफारी]]</center> == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''[[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px|हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''[[१४ जानेवारीला]]'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px| खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार श्री. सुभाष बने]] * [[सभापती श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] [[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील '''लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन''', पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार '''आबा पाटील''' यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg|[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg|[[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] gmofs8lt05kwtn056gmk2gnlpcbr7dz 2581582 2581581 2025-06-21T11:33:06Z Wikimarathi999 172574 /* भौगोलिक माहीती */ 2581582 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा संभ्रम निर्माण झाला. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[बामणोली]] * दक्षिणेस [[निवधे]] * पूर्वेस [[ओझरे]] * उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px जंगल सफारी]]</center> == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''[[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px|हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''[[१४ जानेवारीला]]'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px| खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार श्री. सुभाष बने]] * [[सभापती श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] [[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील '''लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन''', पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार '''आबा पाटील''' यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg|[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg|[[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] iur740xld2hkxkzon3wk8x9nv3xephm 2581583 2581582 2025-06-21T11:33:43Z Wikimarathi999 172574 /* शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व */ 2581583 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा संभ्रम निर्माण झाला. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[बामणोली]] * दक्षिणेस [[निवधे]] * पूर्वेस [[ओझरे]] * उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px जंगल सफारी]]</center> == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''[[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''[[१४ जानेवारीला]]'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px| खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार श्री. सुभाष बने]] * [[सभापती श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] [[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील '''लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन''', पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार '''आबा पाटील''' यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg|[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg|[[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] hi91hvba1zam3bz99enze7fie6og0ps 2581584 2581583 2025-06-21T11:38:03Z Wikimarathi999 172574 /* मान्यवर व पाहुणे */ 2581584 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा संभ्रम निर्माण झाला. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[बामणोली]] * दक्षिणेस [[निवधे]] * पूर्वेस [[ओझरे]] * उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px जंगल सफारी]]</center> == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''[[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''[[१४ जानेवारीला]]'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px| खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]] * [[सभापती - श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] [[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील '''लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन''', पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार '''आबा पाटील''' यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg|[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg|[[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] jiqruvkx6bytp4at2x4txjq10rj0x6f 2581585 2581584 2025-06-21T11:39:55Z Wikimarathi999 172574 /* चित्रदालन */ 2581585 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा संभ्रम निर्माण झाला. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[बामणोली]] * दक्षिणेस [[निवधे]] * पूर्वेस [[ओझरे]] * उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px जंगल सफारी]]</center> == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''[[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''[[१४ जानेवारीला]]'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px| खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]] * [[सभापती - श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] [[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील '''लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन''', पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार '''आबा पाटील''' यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg [[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg [[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg [[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg [[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg|[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg|[[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] hur8yoxwgfd9lnho12j8t4g4k41qswo 2581586 2581585 2025-06-21T11:41:09Z Wikimarathi999 172574 /* चित्रदालन */ 2581586 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा संभ्रम निर्माण झाला. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[बामणोली]] * दक्षिणेस [[निवधे]] * पूर्वेस [[ओझरे]] * उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px जंगल सफारी]]</center> == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''[[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''[[१४ जानेवारीला]]'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px| खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]] * [[सभापती - श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] [[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील '''लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन''', पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार '''आबा पाटील''' यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg [[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg [[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg [[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg [[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg|[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] d9qeahjb3c9uvnaic5yhp7gsdyvdm6y 2581587 2581586 2025-06-21T11:42:37Z Wikimarathi999 172574 /* चित्रदालन */ 2581587 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा संभ्रम निर्माण झाला. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[बामणोली]] * दक्षिणेस [[निवधे]] * पूर्वेस [[ओझरे]] * उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px जंगल सफारी]]</center> == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''[[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''[[१४ जानेवारीला]]'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px| खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]] * [[सभापती - श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] [[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील '''लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन''', पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार '''आबा पाटील''' यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg|[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] 6bm18pug7vl9cjvvji4kt93oovs39fj 2581588 2581587 2025-06-21T11:43:31Z Wikimarathi999 172574 /* चित्रदालन */ 2581588 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा संभ्रम निर्माण झाला. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[बामणोली]] * दक्षिणेस [[निवधे]] * पूर्वेस [[ओझरे]] * उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px जंगल सफारी]]</center> == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''[[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''[[१४ जानेवारीला]]'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px| खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]] * [[सभापती - श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] [[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील '''लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन''', पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार '''आबा पाटील''' यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] t2r7dj68lvwv32r3tgo2mpoyt1fq30s 2581590 2581588 2025-06-21T11:47:51Z Wikimarathi999 172574 /* शैक्षणिक सुविधा */ 2581590 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा संभ्रम निर्माण झाला. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[बामणोली]] * दक्षिणेस [[निवधे]] * पूर्वेस [[ओझरे]] * उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px जंगल सफारी]]</center> == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''[[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''[[१४ जानेवारीला]]'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]] * [[सभापती - श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] [[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील '''लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन''', पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार '''आबा पाटील''' यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] 3whce3t76u8gupcsfoftxthzkic7g3i 2581592 2581590 2025-06-21T11:54:27Z Wikimarathi999 172574 /* प्रेक्षणीय स्थळे */ 2581592 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा =20 |तापमान_उन्हाळा =35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ८८ |साक्षरता_स्त्री = ९५ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} '''खडीकोळवण''' हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्यात आहे. खडीकोळवण हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते. गावाच्या परिसरात '''श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर''' यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. == '''इतिहास व नावाची उत्पत्ती''' == गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले. गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक वादांचा संभ्रम निर्माण झाला. == '''भौगोलिक माहीती''' == ===रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा=== * पश्चिमेस [[बामणोली]] * दक्षिणेस [[निवधे]] * पूर्वेस [[ओझरे]] * उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]] खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref> https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड. <center>[[File:जंगल सफारी.jpg|center|600px जंगल सफारी]]</center> == '''शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व''' == गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "'''निवय'''" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे. === '''गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत'''=== १. कळ्याची निवय २. गुरवयाची निवय ३. वाड्याची निवय ४. कोबीची निवय ५. बोडणी निवय ६. पन्हाळ्याची निवय ७. बावळ्याची निवय ८. महारलाईची निवय ९. वतन निवय १०. आघाडा निवय ११. मैची निवय १२. पालडीयो निवय १३. केळीची निवय १४. घाणमरा निवय १५. जागलदरा निवय या साऱ्या '''निवय''' भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग '''अभयारण्य क्षेत्रात''' रूपांतरित होत आहेत. === '''भातशेतीचे प्रमुख शेतमळे''' === भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. ठोंगळीचा मळा २. अत्रालीचा मळा ३. पयलीकडचा मळा ४. साकव मळा ५. वाड्याकडचा मळा ६. भाजीचा मळा ७. वाज्या फणसाचा मळा ८. भूरावणीचा मळा ९. नवोरलाचा मळा १०. देवरायचा मळा ११. खोप्याचा कातळमळा १२. जलावंडा मळा १३. पायरवणं १४. पासोडीचा मळा १५. किजळवन मळा १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून '''भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके''' घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी '''ठोंगळी'''पासून '''सह्याद्रीच्या''' कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार '''संवर्धन क्षेत्र''' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, '''[[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत''' या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता '''श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत'''. गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे. <center>[[File:हिरवा निसर्ग.jpg|center|600px हिरवा निसर्ग]]</center> == '''दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास''' == [[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या. ३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात '''कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ''' ४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == '''गावात पहिली एस.टी. सेवा सुरु''' == १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, '''श्री. धर्माजी घोलम''' यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – '''"गाडी आली! गाडी आली!"''' पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण '''गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला.'''कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा सुरू झाली. == '''आजची वाहतूक सेवा''' == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>[[चित्र:देव_गांगेश्वर.jpg|अल्ट=देव गांगेश्वर|मध्यवर्ती|इवलेसे|800x800अंश|'''खडीकोळवण गावातील प्रसिद्ध - श्री. गांगेश्वर, कुलाचार देऊळ''']] =='''हवामान'''== <center>[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|center|600px गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]]</center> कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == '''स्थान''' == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध ''मार्लेश्वर मंदिर'' आहे. मार्लेश्वर हे ''श्री शंकराचे'' एक गुहामंदिर असून दरवर्षी ''[[१४ जानेवारीला]]'' येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक ''धार्मिक पर्यटनस्थळ'' आहे. == '''धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये''' == <center>[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|center|600px खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]</center> गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] '''श्री देव गांगेश्वर''' – ग्रामदैवत. '''अत्राल देवीचे देऊळ''' – नवसाला पावणारी देवी. '''ठोंगळ देवीचे देऊळ''' – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === '''गरम पाण्याचे स्त्रोत''' === [[File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|thumb|गरम पाण्याचे स्त्रोत्र]] गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == '''गावातील वाड्या''' == खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] # [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]] # [[घोलम - खालची वाडी]] # [[खाडे वाडी]] # [[बौद्धवाडी]] # [[रामवाडी]] == '''गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने''' == '''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी. '''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान. == '''बाराबलुतेदार पद्धती''' == पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref> [[File:शेती आणि स्थलांतर.jpg|thumb|शेती आणि स्थलांतर]] १) '''[[शेतकरी]] - [[कुणबी]]''' - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) '''[[गुरव]]''' - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) '''[[सुतार]]''' - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) '''[[सोनार]]''' - दागिन्यांची निर्मिती ५) '''[[वाणी]]'''- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) '''[[गांधी]]''' - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा. हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == '''गावात पहिला दुधाचा चहा''' == गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले '''सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५''' च्या सुमारास.गावातील '''सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी)''' दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात. == '''परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन''' == <center>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|center|600px गावा लगतची भातशेती]]</center> खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते '''पानपाट''' काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी '''एकाच शिवारात शेती''' करत असल्याने, '''मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई''', आणि तेथील '''मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, '''महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या''', हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.''' २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, '''पिरश्याच्या शेकोटीवर''' कपडे वाळवले जात. '''भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले''' जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, व'''न्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया''', हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर '''घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई.''' ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == '''नाचणी शेती व 'सापाड' परंपरा''' == [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला '''भांगलन''' म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर ''''सापाड'''' नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी '''शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.''' ''''कामगत'''' (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते. == '''रानभाज्या व रानमेवा''' == गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये '''शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो ''' === '''पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या''' === '''अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं”''' यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच '''“रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर,''' बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == '''पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत''' == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. '''नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद''' ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत. == '''बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे''' == १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना '''"गौरंग", "तरणा", "हातगा'''" अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, '''नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा''' इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == '''प्रेक्षणीय स्थळे''' == [[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]] * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == '''आसपासचे गड-किल्ले''' == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == '''प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी''' == गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == '''शैक्षणिक सुविधा''' == <center>[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|center|600px खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]</center> गावात ''जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा'' आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == '''जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव''' == [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक '''१२ नोव्हेंबर १९४६''' रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === '''कार्यक्रमाचे स्वरूप''' === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === '''मान्यवर व पाहुणे''' === * [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]] * [[सभापती - श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात '''श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली'''. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === '''ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य''' === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * '''[[माझी शाळा, माझा अनुभव]]''' या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == ''''''खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे'''''' == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: === '''कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण''' === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य '''प.पू. जयराम बाबा शिवगण''' हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी '''कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन''' यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात '''प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना''' झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "'''एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू'''" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == '''शिक्षणक्षेत्रातील योगदान''' == '''तुकाराम सखाराम भोवड''' १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे '''भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला'''. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == '''वन्यजीवनातील निपुणता''' == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले. == '''उल्लेखनीय व्यक्तिमत्व''' == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही '''कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम''' यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == '''समसामयिक सामाजिक स्थिती''' == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] [[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता. '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. '''स्त्रिय'''- रोजच्या वापरासाठी स्त्रिया नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "'''बामणोली पद्धतीने'''" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == '''खाद्यसंस्कृती''' == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. ''' == '''सदर जोडलेली काही माहीती ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेली मौखिक माहीती''' == ''' == '''सामाजिक व सांस्कृतिक जीवन''' == गावातील '''लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन''', पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]] == '''गावातील सांस्कृतिक परंपरा''' == === '''नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय''' === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार '''आबा पाटील''' यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख '''ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव''' पुढीलप्रमाणे: '''आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे'''. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण '''सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.''' गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः '''श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा''' या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात. == '''निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान''' == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == '''जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली''' == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == '''शेती आणि स्थलांतर''' == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == '''मिरगाची राखण - रखवाली''' == [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - '''"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."''' या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' - शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी ''''रोवलीत'''' बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे. == '''परंपरागत जलव्यवस्था''' == '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "बाव" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे '''"बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक"''' काय आहे याची कल्पनाही येत नाही. == '''गावातील वहाळा व जलस्रोत''' == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- '''लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ''' इत्यादी.''' हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. == '''मासेमारीची पारंपरिक पद्धत''' == ग्रामस्थ '''जुलै–ऑगस्ट''' महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "'''चढणीचे मासे'''" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == '''पारंपरिक साकव व शेती कामकाज''' == पूर्वी पावसाळ्यात '''नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव''' उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == '''इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती''' == १. '''विस्मरणात गेलेली कुटुंबे''' - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "'''जोयशाचा फणस'''" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - '''टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.''' ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: '''मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला''' इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == '''सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन''' == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == '''सामाजिक चळवळ व मंडळे''' == खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली. '''स्थापना:''' '''१ सप्टेंबर १९९९''' रोजी गावात '''गर्जना मित्र मंडळ''' या नावाने '''सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना''' झाली. संस्थापक सदस्यांमध्ये – '''कै. नामदेव जयराम शिवगण,''' '''अनिल शांताराम घोलम,''' '''समीर सखाराम घोलम,''' '''विश्वनाथ अनंत घोलम,''' '''संजय (नित्या) सिताराम गुरव,''' '''संतोष नारायण घोलम,''' '''रवींद्र राजाराम घोलम,''' यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले. == '''गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव''' == ९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ '''गर्जना मित्र मंडळ'''. == '''सामाजिक उपक्रम''' == १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == '''भविष्याचा विचार''' == खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल. == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:गरम पाण्याचे स्त्रोत्र.png|[[गरम पाण्याचे स्त्रोत्र]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] </gallery> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] piiwvlfewhdqy74cwie9hx5h4pfghr4 मसूदा:फॅशन-प्रदर्शन 118 241061 2581531 2062454 2025-06-21T06:57:44Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[फॅशन-प्रदर्शन]] वरुन [[मसूदा:फॅशन-प्रदर्शन]] ला हलविला 2062454 wikitext text/x-wiki {{मट्रा अनुवादीत}} {{संदर्भहीन लेख}} स्त्रीपुरुषांच्या पोशाखाचे किंवा [[वेशभूषा|वेशभूषे]]<nowiki/>चे नावीन्यपूर्ण प्रकार जाहीरपणे सादर करण्याचा सुविहित कार्यक्रम.कापड आणि कपडे यांच्या निर्मितीत नित्य नवे प्रकार व प्रयोग केले जातात,तसेच स्त्रीपुरुषांच्या वस्त्रप्रसाधनात नव्या टूम किंवा फॅशन अखंडपणे निर्माण होत असतात. वेशभूषेतील नावीन्याविषयी एकाप्रकारचे नैसर्गिक आकर्षण सामान्यपणे सर्व स्त्रीपुरुषांना असते. म्हणूनच वस्त्रनिर्माते, पोशाखनिर्माते, कल्पक [[शिंपी]] आणि शिवण संस्था, कपड्यांचे व्यापारी, वितरक आणि दुकानदार, फॅशन संस्था किंवा फॅशनविषयक प्रकाशन संस्था इ. फॅशन-प्रदर्शनांची योजना करतात. नव्या प्रकारचे कापड व कपडे घातलेल्या देखण्या स्त्रीपुरुषांना आकर्षक रीतीने रंगमंचावर मिरवून आपल्या मालाची लोकप्रियता व खप वाढविणे, हा [[फॅशन (२००८ चित्रपट)|फॅशन]]-प्रदर्शकांचा मुख्य हेतू असतो, तथापि कापड व कपडे यांविषयी समाजाची कलात्मक अभिरुची किंवा सौंदर्यदृष्टी वाढावी,अशा व्यवहारनिरपेक्ष उद्दिष्टानेही फॅशन-प्रदर्शने आयोजित केली जातात.पूर्वी राजघराण्यातील स्त्रीपुरुष,धनाढ्य व्यापारी,सरदारदरकदार इ.अशा प्रदर्शनांकडे आकृष्ट होत.आधुनिक काळात छोटेमोठे [[व्यापारी]],वितरक, दुकानदार तसेच सर्वसामान्य हौशी व्यक्ती हे या प्रदर्शनाचे प्रेक्षक होत.ते आपापल्या गरजांनुसार नव्या वस्त्रप्रकारांची मागणी पोशाख वा वस्त्रनिर्मात्यांकडे नोंदवितात. अत्याधुनिक स्त्री-पेहेराव : [[मुंबई]]<nowiki/>च्या फॅशन-प्रदर्शनातील एक दृश्य.अत्याधुनिक स्त्री-पेहेराव : मुंबईच्या फॅशन-प्रदर्शनातील एक दृश्य.फॅशन-प्रदर्शनांचा उगम गेल्या शतकात यूरोपमध्ये विशेषतः यूरोपीय फॅशनप्रकारांचे केंद्र असलेल्या पॅरिसमध्ये झाला. तेथील कल्पक शिंपी आपापल्या दुकानातूनच नवे व विशेषतः ऋतुमानानुसार असे पोशाखप्रकार देखण्या स्त्रीपुरुषांद्वारा ग्राहकांना दाखवीत. या खाजगी स्वरूपाच्या प्रदर्शनाचेच पुढे अधिक मोठ्या व सार्वजनिक स्वरूपाच्या प्रदर्शनात रूपांतर झाले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तर त्यास नवे परिणाम प्राप्त होऊन फॅशन-समारंभाचे (फॅशन-शोचे) स्वरूपच प्राप्त झाले. फॅशन-समारंभ हा एखाद्या छोट्या [[नाटक|नाट्य]]<nowiki/>प्रयोगाप्रमाणे मनोरंजक असा रंगमंचावरील प्रयोग असतो. केवळ देखण्या स्त्रीपुरुषांनी अभिनव वेशभूषा करून रंगमंचावर मिरवण्यापुरताच तो मर्यादित नसतो. त्यात एखाद्या नाट्यप्रयोगाप्रमाणे संगीत, नृत्य, रंगमंचावरील प्रकाशयोजना व देखावे आणि पुष्कळदा तर स्वतंत्र नृत्यप्रयोगही अंतर्भूत असतात. पोशाखप्रदर्शकांचे रंगमंचावरील पदन्यास सुविहित असतात. हा कलात्मक प्रयोग निश्चित करताना प्रदर्शनीय पोशाख प्रकारांची संख्याही विचारात घेतली जाते. प्रत्येक वेशभूषा ही रंगमंचावर साधारणपणे ३० ते ४० सेकंद सादर करण्यात येते. अनुरूप अशा [[संगीता]]<nowiki/>ची व प्रदर्शकांच्या पदन्यासाची तिला जोड दिली जाते. प्रदर्शक स्त्रीपुरुषांना यासाठी योग्य ते प्रशिक्षणही देण्यात येते. ज्यावेळी प्रदर्शन करणाऱ्या देखण्या [[मुलगी|मुली]] (मॅनेक्विन्स) प्रेक्षकांसमोरून जाऊ लागतात, त्यावेळी त्यांच्या अंगावरील विशिष्ट फॅशनचे दर्शन, पोशाखाचे मूल्य, कापडउत्पादकाचे उल्लेख व कापड वैशिष्ट्य यांसंबंधीची निवेदकाकडून माहिती दिली जाते. थोडक्यात फॅशन- प्रदर्शन हा केवळ एक व्यापारी स्वरूपाचा कार्यक्रम व म्हणून तो कंटाळवाणा होऊ नये, यासाठी त्यास विविध प्रकारे मनोरंजक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जातो. फ्रान्समधील खिश्चन डायोर, पायरे कार्डिन, सेंट लॉरेंट आणि इटलीतील निना रिच्ची इ. यूरोपीय फॅशन संस्था अग्रेसर आहेत. भारतात [[स्वातंत्र्य|स्वातंत्र्यो]]<nowiki/>त्तर काळातच फॅशनप्रदर्शनांची सुरुवात झाली. मुबंईच्या फेमिना ह्या इंग्लिश पाक्षिकाच्या साह्याने हेलेन कर्टिस या सुगंधी द्रव्य उत्पादक उद्योग समूहातर्फे येथे प्रथमच १९६५ साली फॅशन-समारंभ आयोजित करण्यात आला होता. फेमिनाखेरीज ‘स्वॅंक इंडिया’ ही दिल्लीतील आणि [[इंडिया|‘इंडिया]] ऑन शो’ व ‘फॅशन इंडिया’ या मुंबईतील व्यावसायिक संस्था भारतातील मोठमोठ्या शहरी नियमितपणे फॅशन- समारंभ आयोजित करीत असतात. पहा : तयार कपडे; [[पोशाख]] व [[वेशभूषा]]; फॅशन. mqhtnv76ec7ye556veqko6nign3pv2s मसूदा:सिल्व्हियो बेनेदेत्तो 118 241785 2581533 2201802 2025-06-21T07:01:34Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[सिल्व्हियो बेनेडेटो]] वरुन [[मसूदा:सिल्व्हियो बेनेदेत्तो]] ला हलविला: शुद्धलेखन 2201802 wikitext text/x-wiki {{मट्रा}} [[चित्र:Silvio Benedetto.jpg|thumb|उजवे|180 px|सिल्व्हियो बेनेडेटो]] '''सिल्व्हियो बेनेडिक्टो बेनेडेट्टो'''अर्जेंटाइन चित्रकार, शिल्पकार आणि थिएटर डायरेक्टर आहेत. 1956 मध्ये, सिल्व्हियो Benedetto 18 वर्षे 2 ° Biennale डि Arte Sacra Panamericana (पॅन-अमेरिकन धार्मिक कला 2 द्वैवार्षिक) ब्युनोस आयर्स मध्ये प्रथम पारितोषिक वयाच्या जिंकले. 1957 आणि 1961 दरम्यान तो म्युजिओ प्रांतिक दे बेलास आर्टेस (ललित कला प्रांतिक संग्रहालय, आता म्युजिओ प्रांतिक दे बेलास आर्टेस Timoteo Navarro) टुकुमान येथे समावेश, इटली अनेक सोलो प्रदर्शन उघडले. 1 9 61 मध्ये ते इटलीला स्थायिक झाले आणि रोम, टुरिन, बोलोग्ना आणि मिलान येथे असंख्य गॅलरीमध्ये एकल प्रदर्शन केले. 60 मध्ये, Benedetto Polyforum सांस्कृतिक Siqueiros, वर्ल्ड ट्रेड सेंटर मेक्सिको सिटी एक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक स्थापना भिंतीचाला Marcha देला Humanidad (माणुसकीच्या मार्च) वर काम केले. मेक्सिकन क्यूर्नावाका त्याच्या कामे सत्तर त्याला नंतर नावाच्या एक संग्रहालय, ग्रान्दे deposizione फसवणे Cristo देल Mantegna (ख्रिस्ताची ग्रँड क्रॉस, Mantegna) समावेश प्रदर्शनावर आहेत. 60च्या दशकाच्या मध्यात ते नब्बेच्या सुरुवातीपासून रोममध्ये असंख्य रंगद्रव्य आणि लिथोग्राफ तयार केले आणि अनेक युरोपियन शहरात प्रदर्शित केले. 1992 त्याच्या पहिल्या शिल्पकला प्रदर्शनला Metafora della Montagna मिलान Palazzo देई Normanni (डोंगराच्या रूपकाच्या) त्याऐवजी घडली होती. 1 99 8 मध्ये त्यांनी कुएनस्टर्लहॉस वियन मधील सियालोजा 6 एला कुन्स्टर्लहॉस यांच्याद्वारे त्यांची स्थापना प्रदर्शित केली. प्रेरणा Radicondoli सण, येथे पहा specchio उच्चार Mefistofele (Mefistofeleच्या मिरर, रोम मध्ये सादर), Faust संगीत नाटक गेल्या महिन्यात (Rovigo रंगमंच येथे Faust 'गेल्या संगीत नाटक) आणि Faust: 1996 पासून, एक थिएटर दिग्दर्शक म्हणून आणले कामगिरी तीन वेगवेगळ्या तुकडे गोएथचे फॉस्ट. == संदर्भ == * http://www.silviobenedetto.com/sb/ing/index.eng.htm * https://www.mtnero.com/artist-silvio-benedetto-the-riomaggiore-municipal-mural/{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }} [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] i8as3xu1dc4bif73sr2tl4w0q94k1kv योगेश गौर 0 256089 2581317 2089138 2025-06-20T14:41:40Z अभय नातू 206 असलेला लेख 2581317 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[योगेश (गीतकार)]] 7asyioxdpvfti18z43oz3sihy6favec भारतीय रिपब्लिकन पक्ष (संयुक्त) 0 257331 2581335 2546542 2025-06-20T15:58:05Z 2409:40C2:104A:F6B3:8000:0:0:0 /* 3] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली */ 2581335 wikitext text/x-wiki {{बदल}} == रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे == ==1]विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला राजकीय पक्ष == ===1.1] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी === पोलिंग एजंट ते डेप्युटी सरपंच व डेप्युटी सरपंच ते नगरसेवक आणि नगर सेवक ते राष्ट्रीय नेता अशा आपल्या जीवनयापनाच्या प्रवासातील भारतातील राजकारणातील विविध भूमिका बजावणा-या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय नेते गंगाराम इंदिसे उर्फ नानासाहेब इंदिसे होय. विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारानुसार नानासाहेब इंदिसे यांनी घेतलेला युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा,तसेच भारतीय राजकारणातील रिपब्लिकन पार्टी आफॅ इंडियावर टाकलेला प्रकाशझोत === 1.2] नानासाहेब इंदिसे यांचे बालपण === रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय नेते नानासाहेब इंदिसे यांचा जन्म दिनांक 5/3/1942 साली धुळे जिल्हयातील तळोजा तालुक्यातील प्रतापपुर येथे झाला.त्यांचे वडील दोधा कृष्णा इंदिसे हे 1952 साली शे.का.फे.चे पुर्वीच्या खानदेश नंतरचा धुळे आणि आत्ताच्या नंदुरबार जिल्हयातल्या तळोजा या तालुक्याचे तालुका अध्यक्ष होते.त्याकाळी षे.का.फे अन् प्रजासमाजवादीचे अशोक मेहता हे होते.तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणुन अण्णासाहेब नहनकर हे देखील धुळयाचेच होते. 1952 सालच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत नानांचे वय अवघे 10वर्षे होते.परंतु हत्ती अन् वडाचे झाड या निवडणुकितील दोन निशाणी त्यांना राजकारणाचेच धडे देत होते.त्यातच नानांचे पाय राजकारणात ओढले गेले. त्या सार्वत्रिक निवडणुकितुनच बालपणीच त्यांना राजकारणाचे बालकडु चाखावयास मिळाले.वडिल व्यापारी व शेतकरी असल्याने वडिलांबरोबरच त्यांचा सतत रहिवास असल्याने व्यापारानिमित्त वडिलांबरोबरच तेही बैलगाडी अथवा घोडयावरून शहरात जात असत.त्यामुळे त्यांचे शहराविषयी आकर्षण आणखीणच वाढले.1962 साली विधानसभेच्या निवडणुकीत केशव गोविंद वळवी हे आरपीआयच्या तिकिटावर तळोजा अक्कलकुवा या मतदार संघातुन उभे होते. त्यावेळी नानासाहेबांनी त्या निवडणुकीत पोलिंग एजंटचेही काम केले. === 1.3] ठाणे येथे प्रयाण=== नानासाहेब जुन्या अकरावी नंतर 1963 साली शहरी जिवनाच्या आकर्षणापायी ठाणे जिल्हयातील कळवा येथे स्थलांतरीत झाले. 1964 साली नानासाहेब इंदिसे हे ठाणे जिल्हयातील वाडा तालुक्यात फॉरेस्ट खात्यात नोकरीस लागले.1965ला वसईतील गोखीवरा येथे नानासाहेब इंदिसे रहावयास गेले.1966ला नानासाहेब इंदिसे पुन्हा ठाणे येथील येऊरला येऊन स्थायिक झाले. === 1.4] भारतीय राजकरणात प्रवेश === वडिलांकडुनच बालपणा पासून राजकारणाचे धडे मिळाल्याने नानांचे मन नोकरीत रमेना आणि 1967ला त्यांनी नोकरीचा राजिनामा देऊन राजकिय चळवळीत पूर्णवेळ सक्रिय सहभाग घेतला.ऑक्टोंबर 1966ला कर्मविर दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना रा.सु.गवई हे विद्यमान आमदार होते 1968 साली रा.सु.गवई हे उपसभापती झाले.तेव्हापासून नानासाहेब इंदिसे यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सक्रिय कार्य मोठया उत्साहात भरारी घेत जोमाने चालले होते. === 1.5] ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच === 1971 साली आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत माजीवडा येथे नानासाहेब इंदिसे हे डेप्युटी सरपंच झाले.1978 साली नानासाहेब इंदिसे हे माजीवडा येथे ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच म्हणुनच राजकारणात कार्यरत होते.1979ला नानासाहेब इंदिसे माजीवडा पंचायत समितीच्या निवडणुकिस उभे राहिले परंतु त्यांना अपयश आले.1985च्या ठाणे बेलापुर विधानसभा मतदार संघातुन नानासाहेब इंदिसे यांना अपयशाला सामोरे जावे लागले. === 1.6 ठाणे महानगर्पालिकेवर निर्वाचित === 1988ला नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकितही अपयशाला सामोरे जावे लागले.1992 मध्ये नानासाहेब इंदिसे यांनी ठाणे महानगर पालिकेत निर्वाचीत यश संपादन केले. नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेने परिवहन समितीचे चेअरमनपद देऊन सन्मान केला.या काळात त्यांनी अनेक गरजुंना नोकरीस लावले.त्याचा फायदा डॉक्टर, शिक्षक,बालवाडी शिक्षक,आया,कंडक्टर,ड्रायव्हर, बिगारी, शिपाई, हेल्पर,सुशिक्षीत बेरोजगार आदींचा उदरनिर्वाहणार्थ रोजगार उपलब्ध करून देऊन या पदाचा योग्य उपयोग केला.1997च्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत नानासाहेब इंदिसे यांना पुन्हा एकदा अपयशाला सामोरे जावे लागले. === 1.7] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना  === 2000 सालापासून नानासाहेब इंदिसे हे कळत नकळत ऐक्याच्या भुमीकेवर ठाम राहिले.2009 मध्ये पुन्हा माजिवडा विधानसभा मतदार संघात नानासाहेब इंदिसे यांना अपयश पचवावा लागला.निवडुन न येण्याची कारणे मला माहित होती परंतु आंबेडकरी समाज इतरांच्या दावणीला बांधला जाऊ नये या उद्येशाने विधानसभा निवडणुका लढविल्या. तदनंतर आज पर्यंत रिपाइचे वेगवेगळया गटातटाचे राजकारण चालुच आहे.त्या नंतर रिपब्लिकन पार्टीची अशी अवस्था पाहुन निळया निशाणाखाली सर्वांचे ऐक्य व्हावे याच उद्येशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारांच्या प्रेरणेतुनच नानासाहेब इंदिसे यांनी 20 डिसेंबर 2008 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना केली.या मध्ये शिवराम मोघा,कुमारसेन बौद्ध,उत्तमराव खडसे,प्रल्हाद सोनवणे, दौलतराम आदी.निष्ठावंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतानुसार नानासाहेबांबरोबर सक्रिय कार्य करू लागले. पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन युगप्रवर्तक,विष्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभुमी महु (आंबेडकर नगर) येथे भरविण्यात आले.यामध्ये आंबेडकरी चळवळीतले बहुतांश नेते,कार्यकर्ते यांना निमंत्रीत करण्यात आले. == 2] विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी व ऐतिहासिक घडामोडींचा परामर्श == तत्पुर्वी विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी वऐतिहासिक घडामोडींचा परामर्श खालिलप्रमाणे 20/7/1924 रोजी बहिष्कृत हितकारीणी संस्था स्थापन केली.3/3/1927 रोजी समता सैनिक दल स्थापन केले 20/3/1927 रोजी महाडचा सत्याग्रह, 26/7/1927 रोजी अंबादेवी मंदिर सत्याग्रह, 14/6/1928ला भारतीय बहिष्कृतशिक्षण मंडळ स्थापले, 22/9/1929 रोजी पर्वती पुणे सत्याग्रह,2/3/1930ला काळाराम मंदिर सत्याग्रह,4/10/1930डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृष्यांचा प्रतिनिधी म्हणुन गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला रवाना,7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931ला दुस-या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांना स्वतंत्र मतदार संघावरून गांधी आंबेडकरांत तिव्र मतभेद,23/9/1931ला मुखेडचा सत्याग्रह केला.24 सप्टेंबर 1932 पुणे करार, जानेवारी 1933 तिस-या गोलमेज परिषदेहुन भारतात रवाना,1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट लागु.13/10/1935 येवले मुक्कामी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘मी जरी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही’’ही घोषणा केली.15/8/1936ला स्वतंत्र मजुर पक्ष स्थापन केला.1937 मुंबई विधिमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे डॉ.आंबेडकरांसहित 14 उमेदवार निवडुन आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी पक्ष नेते होते.तर सभागृह उपनेते आर.आर.भोळे होते. या मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे शामराव परूळेकर, करंदीकर,जमनादास मेहता,झाबवाला आदी खंदे सदस्य होते.मोठा पक्ष म्हणुन मुस्लिम लिग हा होता त्यांचे नेते सर देहलवी हे होते 12/2/1939 मोहाडी धुळे सत्याग्रह,2/7/1942ला प्रथमच एक अस्पृष्य केंद्रिय मंत्रीमंडळात मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेबांचा भारताच्या व्हाइसरॉय कार्यकारी मंडळात समावेश झाला.19/7/1942ला शेडयुल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली,27/7/1942ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मजुरमंत्रीपदाचा कारभार सोपविण्यात आला. 8/7/1945 पिपिल्स ऐज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.4/6/1946 पुणे कौन्सील मोर्चा सत्याग्रह,27/6/1946 सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना,19/7/1946डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगाल विधिमंडळातुन घटना समितीवर निवडुन आले. 3/9/1946ला नागपुर सत्याग्रह, 5/9/1946डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश पार्लमेंटच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये कॉन्झर्वेटीव्ह इंडियन कमिटी समोर पुणे करार रद्द करण्याची व ब्रिटिश सरकारचा जातिय निवाडा लागु करण्याची मागणी केली.11/12/1946डॉ.राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 2/3/1947ला लखनौ सत्याग्रह केला.15 मार्च 1947 बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘स्टेटस अॅन्ड मायनॉरिटीज’’हा ग्रंथ प्रकाशीत केला.29 एपिंल 1947 रोजी घटनेतुन अस्पृष्यता निवारण्याविषयी सतरावे कलम संमत केले. 22 जुलै 1947 रोजी भारतीय ध्वज समितीचे सदस्य म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतुन अशोक चक्रांकित तिरंगा झेडा राष्ट्रध्वज म्हणुन निश्चित केला.23 जुलै 1947डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवर निवड झाली.3/8/1947 भारताचे कायदा मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्रीमंडळात समावेश15ऑगष्टला1947 भारत स्वतंत्र झाला.30/8/1947ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड.26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान भारतास अर्पण,8 मे 1950 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणुन शपथ घेतली.26 जानेवारी 1950ला भारतीय प्रजासत्ताक दिन. या दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासारख्या खंडप्राय देशात राज्यघटनेद्वारे लोकभिमुख लोकशाही पेरली सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे महत्त्व पटवुन ‘‘एक व्यक्ती,एक मुल्य,एक मत’’ याचा सिद्धांत घटनेत मांडुन सर्वांना एका किंमतीत आणले,त्याच बरोबर न्याय,स्वातंत्र्य,समता मैत्रीबंधुत्व ही नितीतत्त्वे राज्य घटनेच्या माध्यमातुन लोकशाही बळकट होण्यासाठी रूजवली अन् भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. 5 फेब्रुवारी 1951डॉ..आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लोकसभेत मांडले.27 सप्टेंबर हिंदुकोड बिल फेटाळल्याच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा त्याग केला.5 जानेवारी 1952 मुंबई लोकसभेत अपयश9 मार्च 1952डॉ. आंबेडकरांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. मे 1954 भंडारा लोकसभेच्या राखीव मतदार संघातील पोटनिवडणुकित अपयश आले.1954ला भारतीय बौद्धमहासभेची स्थापना केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत खोती बिल, महार वतन बिल, हिंदुकोड बिल, मंत्र्यांचे वेतन बिल, लोकप्रतिनिधि बिल,कामगारांचे किमान वेतन बिल सादर केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 13ऑक्टोंबर 1935 साली येवले मुक्कामी हिंदुधर्म त्यागाची चळवळ हाती घेऊन केलेल्या भिष्मप्रतिज्ञेच्या अनुशंगाने21वर्षे सातत्याने सर्व धर्माचा अभ्यास केला.अभ्यासपुर्वक निर्णयातुन त्यांनी निसर्गनियमांना अनुसरून,विज्ञाणाचा आधार घेऊन,सत्य व वास्तव यांची सांगड घालुन सम्यक ज्ञानाची कसोटी घेऊन 14ऑक्टोंबर 1956 रोजी अशोक विजया दशमी दिनी नागपुर येथे भन्ते चंद्रमणी यांच्या कडुन स्वतः भारतातीलच असलेल्या बौद्ध धम्माची धम्मदिक्षा घेऊन आपल्या समवेत असलेल्या सुमारे पाच लक्ष अनुयायांना त्यानी स्वतः बौद्ध धम्माची दिक्षा दिली. 20 नोव्हेंबर 1956 रोजी काठमांडु येथे जागतिक बौद्ध महापरिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘बुद्ध की,कार्लमार्क्स’’या विषयावर भाषण केले असता बौद्ध महापरिषदेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ‘राजा इ मलाला’यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना‘‘बोधिसत्व’’हि पदवी तेथेच बहाल केली. 24 नोव्हेंबर 1956 रोजी सारनाथ, आग्रा आणि दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.25 नोव्हेंबर 1956 रोजी सकाळी काशी विद्यापिठातील विद्यार्थी व आचार्यगणांसमोरभाषण केले तर सायंकाळी बनारस येथे महाबोधी संस्थेच्या सभेत शेवटचे भाषण केले. ==3] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली == रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 8/9 डिसेंबर 1955 मध्ये औरंगाबाद येथील वास्तव्यात पहिल्यांदा बोलुन दाखविला होता. भारतीय राज्य घटना ख-याखु-या अर्थाने राबविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाला भाग पाडणे तसेच सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान राजकीय पक्षांचे एकीकरण करून प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्षाला प्रस्थापीत करणे हा रिपब्लिकन पक्षाचा उद्येश असल्याचे त्यांनी सांगीतले.(जनता -10 डिसेंबर 1955 ) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 29/30 सप्टेंबर 1956 रोजी 26,अलिपुर रोड दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी त्यांच्याच अध्यक्षतेखाली शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकीतशेकाफे बरखास्त करून ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’या नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला अन् रिपाइ अस्तित्वात आल्याची घोषणा समारोपाच्या भाषणात केली.ज्या मध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जातीविरहित,धर्मविहिन चळवळ चालवुन या देषात असणारी विभिन्न विषमता नष्ट करण्यासाठी आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्रांती घडवुन आणुन वर्गविहिन,जातीविहिन समाजव्यवस्था निर्माण करतील व समाजवादी व आर्थिक पूनर्रचना करतील अशी त्यांना अपेक्षा होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घोषीत केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची ‘‘हत्ती’’ ही निशाणी ठेवण्यामागची भूमिका काय होती हे देखील समजावुन घेणे महत्त्वाचे आहे.हत्ती हा महाकाय प्राणी असल्याने आणि माझा समाज हा अडाणी समाज असल्याने इतर निशाणी ओळखण्यापेक्षा महाकाय हत्तीची निशाणी त्यांना तत्काळ ओळखता यावी म्हणुनच ‘‘हत्ती’’या निशाणीची निवड केली. तसेच शेडयुल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष मर्यादीत व ठराविक जातीपुरताच असल्याने 1952च्या लोकसभेत अन् 1954च्या भंडारा मधील पोटनिवडणुकीत उच्चजातीयांनी जातीय मानसिकतेतुन शे.का.फे.ला एकटे पाडल्याने आलेल्याअपयशाच्या कारणमीमांसेने ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’प्रजासत्ताक पक्ष म्हणुन स्थापन करणे संदर्भी पक्षाची घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहुन काढली होती.या पक्षात भारतीय जनतेला सामील होण्यासाठी खुल्ले पत्रही लिहिले होते.त्यांना आपल्या या पक्षाला विशिष्ट जातीचे लेबल लावुन हा पक्ष चालवायचा नव्हता.यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत नमुद पक्षाची ध्येय,उद्यिष्ट व तत्त्वप्रणाली नमुद केलेली आपणास आढळुन येतील.भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे तीच भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या घटनेत समाविष्ट करून घटना बनविण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचा तत्त्वज्ञानात्मक आधार, पक्षाची ध्येय,उद्दिष्टे व कार्यक्रम तसेच पक्ष सुदृढतेच्या कसोटया याचे अध्ययन केल्यास हा पक्ष भारतात अस्तित्वात असलेल्या अन्य कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा सर्वच बाबतीत सरस आहे हे दिसुन येते. मात्र पक्षाच्या या वैशिष्ट्याचीशिकवण सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहचविण्यात रिपब्लिकन पक्षाचे नेते,विचारवंत,पक्षावियी सहानूभुती असलेले बुद्धीजिवी,लेखक, सामाजिक कार्यकर्ते कमी पडले असे खेदाने म्हणावेसे वाटते. दिनांक 29/30 सप्टेंबर 1956 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या बैठकीत 26 अलीपुर रोड दिल्ली येथील आपल्या राहत्या घरी केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीवादी, ब्राम्हणवादी आणि कम्युनिस्ट या तिन विचारधारांना नाकारून रिपब्लिकन नावाची निख्खळ लोकशाहीवादी चौथी राजकीय संकल्पना भारतीय राजकारणाच्या पटलावर निर्माण केली मात्र त्यांच्या घोषणेतील राजकीय कृती प्रत्यक्षात उतरविण्यापुर्विच त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दुर्देवाने परिनिर्वाण झाल्याने पक्ष स्थापनेसाठी रिपब्लिकन पार्टीचा निर्णय अस्तित्वात येऊ शकला नाही.. == 4] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा == रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा या विषयावर टाकलेल्या प्रकाशझोतात रिपाइ एक्याबाबतच्या अनेक घडामोडींचा नानासाहेबांनी घेतलेला परामर्श आपल्याला बरेचसेकाही सांगुन जातो बऱ्याच जणांना माहित असेल परंतु आजच्या पिढीला माहित व्हावे या उद्देशानेच त्याचे सिंहावलोकन करीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणा नंतर मुंबई मध्ये दादर येथील चैत्यभुमीवर त्यांचे अंतीम संस्कार करण्यात आले.सदर प्रसंगी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी बाबासाहेबांच्या चित्तेवर शपथ घेऊन समतेचा रथ पुढे नेईन परंतु तो तसुभरही मागे घेणार नाही. त्या प्रमाणे 29 डिसेंबर 1956 रोजी अहमदनगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची प्रेसीडियमची बैठक झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली.दुस-या फळीतील नेत्यांमध्ये नेतृत्वावरून अहमहमिका लागली.दलित चळवळीचे नेतृत्व आपल्याकडे यावे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होती.परंतु शिल्लक राहिलेले सर्वच नेते तुल्यबळ असल्याने बाबासाहेबांच्या समवेत असणारे दादासाहेब गायकवाड, राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, बी.सी.कांबळे आदी नेत्यांनी चतुराईतुन सामूहिक नेतृत्वाचा मार्ग काढुन 1 जाने 1957 रोजी आपले पहिले अध्यक्षीय मंडळ स्थापन केले 1957च्या सार्वत्रिक निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्याच नावाने लढण्याचा आग्रह होता.परंतु त्यावेळी मुंबईसह महाराष्ट्र यासाठी काँग्रेस खेरीज जनसंघासहीत सर्व आघाडीत होते.ही आघाडीही तत्कालीन शे.का.फे.चाच एक भाग होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने व रिपाइ नवीन पक्ष असल्याने नानासाहेब गोरे,प्र.के.अत्रे यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्त्व नसल्याने आणि ज्या काळात शे.का.फे. होता त्या काळात रिपाइ कळायला उशीर झाल्यामुळे तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हे लक्ष पूर्ण होणार नसल्याचे घटक पक्षाने कर्मविर दादासाहेब गायकवाडांकडे आग्रह धरला. शेवटी निर्णया अंती या समितीतील घटक पक्षांनी आपल्या पुर्वीच्याच शेकाफेच्या नावाने निवडणुका लढवाव्या असा निर्णय जाहिर केला.कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी शे.का.फे.च्या माध्यमातुन एकास एक उमेदवार राहिल अशी संयुक्त महाराष्ट्र कृती समितीने काळजी घ्यावी असे ठरवुन महाराष्ट्र कृतीसमितीशी आघाडी करून निवडणुकीस सामोरे गेले.त्या निवडणुकीत कृतीसमितीला घवघवीत यश मिळाले. कृती समिती महाराष्ट्रात सत्तेत आली नाही परंतु प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन उदयास आली असल्याने केंद्र सरकारला 1 मे 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यास भाग पाडले.1957च्या निवडणुकीत शे.का.फे.च्या नावाने 1)कर्मविर दादासाहेब गायकवाड - नाशिक लोकसभा मतदार संघ,2)अॅड.बी.सी.कांबळे - नगर,3)जी.के.माने - मुंबई, 4)हरिहर सोनुले - नांदेड,5) ह.भा.साळुंखे (33वर्षाचे सर्वात लहान)- भोर तालुका,6)दिघे -कोल्हापुर बहुजन समाज, 7)परमार - अहमदाबाद, 8) दत्ता कट्टी - कर्नाटक,चिकोडी मतदार संघ, 9)एन शिवराज - चेन्नई असे 9 खासदार आणि महाराराष्ट्रातुन बहुतांशी आमदार निवडुन आले आणि शेकाफे हा पक्ष देशात 1957 साली दोन नंबरचा पक्ष म्हणुन राहिला.त्यावेळेस गट नेते कर्मविर दादासाहेब गायकवाड होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपाइ लवकरात लवकर कार्यरत व्हावी अशी खंत डॉ.बाबासाहेबांच्या समकालीन नेत्यांच्या मनात होती. पावसाळयामुळे ही प्रक्रिया थांबली अन् 2ऑक्टोंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे बॅ.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आले. 3/10/1957च्या रिपाइ च्याराष्ट्रीयअध्यक्षपदासाठी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी महाराष्ट्र व्यतिरिक्त दुस-या प्रांतात हा पक्ष जावा म्हणुन एन.शिवराज यांचे नाव घोषीत केल्याने ते एकमताने निवडुन आले.14 मे 1959 रोजी बी.सी.कांबळे रिपाइतुन बाहेर पडुन त्यांनी दुरूस्त रिपब्लिकन पक्ष स्थापन केला.अन रिपाइच्या बेकीचे बीज तेथेच रूजले गेले.परंतु महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता बी.सी.कांबळे (बापुसाहेब कांबळे)संपूर्ण महाराष्ट्रात कोठेच चालले नाही.1960 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला निर्वाचन आयोगाकडुन मान्यता मिळाली.ऑक्टोंबर 1962ला पुन्हा रिपाइचे दुसरे ऐक्य झाले.या ऐक्यातुन एन.शिवराज,कर्मविर दादासाहेब गायकवाड,राजाभाऊ खोब्रागडे,बि.पी.मौर्य,भय्यासाहेब आंबेडकर, शांताबाई दाणी,इ. समकालीन नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाचा झंझावात देशात सुरू केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राश्ट्रिय अधिवेशने काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत झाली.30 सप्टेंबर 1964ला एन शिवराज यांचे दिल्ली येथील मोर्च्याच्या वेळी दादासाहेब गायकवाडांच्या निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले.तदनंतर ऑक्टो 1964 मध्ये कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी रिपाइचे बॅरीस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत अशा आषयाची सूचना मांडली परंतु समकालीन नेत्यांनी ही सूचना अमान्य करून कर्मविर दादासाहेब गायकवाडांचीच रिपाइचे राष्ट्रीयअध्यक्ष म्हणुन निवड केली. कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी 6 डिसेंबर 1964ला 14 कलमी डिमांड घेऊन भूमीहिन सत्याग्रह करण्याची घोषणा केली त्यात एक घोष वाक्य होते.‘‘कसेल त्याची जमिन,नसेल त्याचे काय ? राहिल त्याचे घर,नसेल त्याचे काय ?’’हा सत्याग्रह जवळपास दोन महिने चालला.देशभरात सुमारे 3 लाख 65 हजारांच्यावर लोक तुरूंगात गेले. तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी फेब्रुवारी महिन्यात शिष्टमंडळास पाचारण केले. त्या शिष्टमंडळात कर्मविर दादासाहेब गायकवाड,बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे,दत्ता कट्टी,अषोक निळे,रा.सु.गवई,अनसुमंतराव गायकवाड आदी नेते होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक अन् भुमीहिनांचा, झोपडपट्टयांचा प्रश्न आदी प्रश्न सोडवले जाऊन दिनांक 5 फेब्रुवारी 1965ला हा सत्याग्रह यशस्वी झाला. 1962 साली उत्तर प्रदेश मधुन रिपाइचे 3 खासदार निवडुन आले होते.पंजाब मध्ये अकाली दल आणि आरपीआयची पहिली सत्ता स्थापन झाली त्यामध्ये दोन मंत्री हे आरपीआयचे होते.1965 साली आरपीआय सत्तेत होती याचे कारण बी.पी.मौर्य,संघप्रिय गौतम आणि कादरखान हे तिन नेते बाबासाहेबांच्या विचाराच्या दिशेने प्रामाणिक काम करीत होते.या काळात उत्तरप्रदेशात आरपीआय आणि एस.व्हि.डी. यांचे सरकार होते.चैधरी चरणसिंग तेव्हा मुख्यंत्री झाले.त्या सरकार मध्येही आरपीआयचे तिन मंत्री होते. 1967 साली रिपब्लिकन पक्षाला चांगले मतदान मिळाले.काही राज्यात रिपब्लिकन पक्षाला मंत्रीमंडळात मिळालेले स्थान हे केवळ रिपब्लिकन पक्षाच्या मतसंख्येच्या आधारे मिळाले होते.मागणी न करता मंत्रीमंडळात रिपब्लिकन पक्षाच्या आमदारांना घेतले जात होते.इतका दबदबा या पक्षाचा होता.पंजाब राज्यात धानुलिया यांना कॅबिनेटमंत्री म्हणुन घेण्यात आले.उत्तरप्रदेश मध्ये एक कॅबिनेट मंत्री घेण्याऐवजी असरार अहमद आणि शमीम आलम या दोन आमदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आले.हा पक्ष केवळ बौद्धांपुरता मर्यादीत नव्हता तर या पक्षाचे मंत्री मुस्लिमही होते. बिहारमध्ये रिपब्लिकन पक्षाची एवढी ताकद होती की,तेथे लाल पासवान नावाचा एकच उमेदवार निवडुन आला असला तरी त्याला मंत्रीमंडळात स्थान देण्याशिवाय गत्यंतर नव्हते.महाराष्ट्राशिवाय उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार,हरियाना या उत्तर भारतीय राज्यात रिपब्लिकन पक्ष हा एक समर्थ पक्ष होता. .   ऑक्टो.1968ला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे रिपाइतुन बाहेर पडले अन् स्वतंत्र खोब्रागडे गटाची निर्मिती केली.कर्मविर दादासाहेब गायकवाडांना अर्धांगवायुचा झटका आल्याने 29 डिसेंबर 1971ला कर्मविर दादासाहेब गायकवाड यांचे निर्वाण झाले.1972 मध्ये कोल्हापुरातील बावडा गावात गवई बंधुंचे डोळे काढण्यात आले.त्यावेळेस डॉ.बाबासाहेबांची विचारधारा अन् नांव ऐकुन असलेले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपले उद्धारकर्ते असल्याचे समजत असतानाही युक्रांत समाजवाद्यांच्या (कम्युनिस्ट)चळवळीत प्रॅक्टिकल रितीने काम करणाऱ्यांनीच अन्याय अत्याचाराचे निमित्त साधुन कळत नकळत रिपाइला नेस्तनाबुत करण्यासाठी सर्वांच्या मदतीने दलितपॅंथर्सची निर्मिती केली.26 जाने 1974ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तिसरे ऐक्य झाले.सी.आर.मोघम, बॅ.राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, रा.सु.गवई, बी.सी.कांबळे,शांताबाई दाणी हे ऐक्यात सामील झाले. पहिले 35 लोकांचे ऐक्याचे प्रेसीडियम झाले.मुंबईत पहाटे चार वाजेपर्यंत वसाहतीत मिटींग चालु झाल्या.पहिल्या प्रेसीडियमची बैठक सी.आर.मोघम यांनी बंगलोर येथे बोलवली तर दुसरी अमरावतीत झाली दुस-या बैठकीतुन बॅ.राजाभाऊ खोब्रागडे अन् त्यांचे सहकारी भय्यासाहेब आंबेडकर,घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,दत्ता कट्टी हे बाहेर पडले.तदनंतर बापुसाहेब कांबळे हे देखील बाहेर पडल्याने सी.आर.मोघम,रा.सु.गवई,वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,आर.जी.खरात,शांताबाई दाणी,अॅड.बाजीराव कांबळे ऐवढेच रिपाइत शेष राहिले. वर्ष सहा महिन्याच्या आतच ही ऐक्य प्रक्रिया संपुष्टात आली. 1975च्या दरम्यान खोब्रागडे गटातुनही भय्यासाहेब आंबेडकर, घनश्याम तळवटकर, सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके,प्रा.रमाकांत यादव, हे बाहेर पडले.1976च्या दरम्यान शांताबाई दाणी व त्यांचे सहकारी भाऊसाहेब चव्हाण,दादासाहेब रोहम,हे रिपाइ तुन बाहेर पडले.अशा त-हेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची वाताहत झाली. दुर्देवाने 17/9/1977ला मुंबईच्या के.ई.एम.रूग्णालयात भय्यासाहेब आंबेडकरांची प्राणज्योत मालवली.1976 ते 1978 पर्यंत रिपाइचे गटातटाचे राजकारण चालुच होते.1978च्या हिवाळयात दादासाहेब रोहम,रा.सु.गवई समवेत एन.एस.कुभारे,व सी.आर.मोघम हे दिल्ली येथे आमरण उपोषणास बसले.1978च्या सरते शेवटी भारतीय दलित पॅंथर्सने रिपब्लिकन पक्षाच्या पुढा-यांस लक्ष अन् भक्ष ठरविले.भारतीय दलित पॅंथर्सचा गवगवा झाल्याने त्यांनी सवर्ण बहुजनांचा अर्वाचीत शिवराळ भाषेत उद्धार केला.आणि नामांतराचा लढा हाती घेतला.त्यांच्या बरोबरीने नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रिंसिपल पद न मिळाल्याने प्रा.जोगेंद्र कवाडे सरांनी लॉंग मार्च दलित मुक्ति सेना स्थापन केली.त्यांच्यातल्याच त्यांच्या अहमहमिकेतुन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पावसाळी अधिवेशनात नांमातराची घोषणा केली. निमित्त नामांतराचे होते परंतु सवर्ण बहुजनांना राग होता तो त्यांच्या शिवराळ भाषेचा अन् त्यामुळेच मराठवाडा दंगल पेटली. दंगलीत सबंध मराठवाडा पेटला त्यात 649 पेक्षाही जास्त मृतांचा शासनाचा आकडा होता.सबंध मराठवाडयात मातंग,बौद्ध समाजाच्या वसाहती जळाल्या.त्यात पोचीराम कांबळे सारख्या मातंग समाजाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरी अनुयायाच्या शरिराचे छिन्नविछिन्न तुकडे करण्यात आले तरीही शेवटच्या श्वासाच्या क्षणापर्यंत ‘जयभिम’चा नारा त्यांनी सोडला नाही. अष्याही परिस्थितीत भारतीय दलित पॅंथर्सला भावनिक चळवळ वाढवायचीच होती. मात्र छत्रपती शाहु महाराज,महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सिद्धांता नुसार रिपाइतील रा.सु.गवई,दादासाहेब रोहम यांनी सामाजिक भान ठेवुन आपले बौद्धिक कौशल्य पणाला लावुन सहा महिन्याच्या आतच मराठवाडयात जातीय सलोखा निर्माण करून पुर्ववत मराठवाडयातील दलित वस्त्या शासनाच्या मदतीने पुर्ववत केल्या.वसाहती वसवुन समझोताही केला.उद्धवस्त झालेले संसारही त्यांनी बसविले. 1983 -84च्या कालखंडात तत्कालीन महाराष्ट्र राज्य सेवेतील सिनिअरमोस्ट सनदी बुद्धिस्ट अधिकारी यांनी आणखी एक गट निर्माण केला.या वादळाला अकोला,पॅटर्न,नांदेड पॅटर्न असे संबोधु लागले.1984ला अकोल्यातुन भारीपचे प्रकाशराव आंबेडकर यांना निवडणुकित अपयश आले.9 सप्टेंबर 1984 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने निधन दिल्ली येथे झाले.दिनांक 18/19 जानेवारी 1985 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे ज्येष्ट सहकारी दत्ता कट्टी अन् त्यांचे सहकारी व रा.सु.गवई यांचे सहकारी म्हणजेच वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,पी.टी.मधाळे - माजी आमदार सांगली,खंडेराव सावंत -माजी आमदार सातारा,दादासाहेब रोहम -माजी आमदार संगमनेर नगर,दादासाहेबब शिर्के -कोल्हापुर, तसेच शांताबाई दाणी,अॅड. बाजीराव कांबळे -कर्जत सातारा,भाऊसाहेब चव्हाण,एम.डी.शेवाळे,के.बी.श्रृंगारे -नाशिक,देवीदास वाघपांजार -दर्यापुर अमरावती, नानासाहेब उर्फ गंगाराम इंदिसे,व्हि.बी.ससाणे - ठाणे,आदींचे 18/19 जानेवारीत नागपूरच्या आमदार निवासात ऐक्या संदर्भात म्हणजेच गवई व खोब्रागडे गटात बैठक झाली.त्या ऐक्यातुन दत्ताजी कट्टी अध्यक्ष अन् रा.सु.गवई कार्याध्यक्ष झाले. आणि 1985च्या मार्च महिन्यातील सार्वत्रिक विधान सभेच्या निवडणुकीस सामोरे जावे लागले. सहा महिन्यातच दत्ता कट्टी गेले अन् ऐक्य फुटले.सहा महिन्याच्या आतच या ऐक्यप्रक्रियेची फाटाफुट झाली परंतु देशातील बहुतांषी बॅरिस्टर राजाभाऊंना माननारा वर्ग हा दादासाहेब रोहम व रा.सु.गवई यांच्या बरोबरच राहिला.त्या ऐक्यप्रक्रियेतुन दत्ता कट्टी हे एकटे बाहेर फेकले गेले.घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके, प्रा.रमाकांत यादव हे दादासाहेब रोहम,रा.सु.गवई यांच्या सोबत राहिले. तदनंतर पुन्हा एकदा1995 साली रिपाइचे पाचवे ऐक्य झाले अन् चार खासदार संसदेत निवडुन आले.तेही ऐक्य लवकरच फूटले. 1988ला ऐन पावसाळयात रिडल्स प्रकरण घडले.6 डिसेंबर 1988ला रा.सु.गवईंनी दिल्ली येथील बोटक्लब वर लाक्षणीक अशा भव्य मोर्च्याचे आयोजन केले असता ‘न भूतो न भविष्यती अशामोर्च्यात सुमारे 6 ते 7 लक्ष अनुयायांनी सहभाग घेतला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष कर्मविर दादासाहेब गायकवाड ते एन.शिवराज यांच्या नंतर गल्ली ते घराघरा पर्यंत वाटला गेला.जो,तो उठतो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव अन् निळे निशाण घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुढे अबकड लावुन संघटना तयार करून पुढारपणाच्या नावाखाली आपल पुढारपण आणि आपल्या घराची व्यवस्था कशी होईल या प्रवृत्तीने वागायला लागले आहेत. त्यामुळे दिवसेगणिक आंबेडकरी जनतेवर, मायभगिनींनीवर, मागासवस्त्यांवर, अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत.अन्याय,अत्याचार झाल्यानंतर पुढारी अश्रु पुसावयास जातात परंतु त्यांचे मुळ शोधत नाहीत.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पने प्रमाणे ‘‘माझा समाज सत्तास्थानी व सत्ताधारी असला पाहिजे’’ या उलट आज पुढा-यांची दशा झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या संकल्पनेचा विसर पडुन ते आज शिवसेना,बि.जे.पी.चे स्वप्न साकार करावयास निघालेत या सारखी दुर्देवाची बाब कोणती ? मग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत अन् संकल्पना हे प्रात्यक्षिक वास्तव्यात आणावयाचे असेल तर आमच्या कार्यकर्त्यांनी‘‘नेता छोडो समाज जोडो !’’हे अभियान सुरू केले आहे.समाज जागृत आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरी विचारांशी एकनिष्ठ आहे.समाजात एकसंघ खंबीर नेतृत्व नसल्याने समाज दिषाहिन झालेला आहे.‘‘ नेत्यांचे ऐक्य करण्या ऐवजी समाजाचे ऐक्य व्हावे ’’ हाच खरा उद्येश असल्याने या पक्ष स्थापने मागची नानासाहेब इंदिसे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना रिपब्लिकन पक्ष एक व्हावा.हीच भूमिका पक्ष स्थापनेमागची होती आणि आजही त्या भुमिकेवर मी ठाम आहे.मला अध्यक्षपदाचा हव्यास मुळीच नाही.म्हणुनच मी कुमारसेन बौद्ध (दिल्ली) यांना अध्यक्ष केले होते.परंतु दुर्देवाने ते या कामी सपशेल अपयशी ठरले.ऐक्यासाठी मी आर.पी.आय.नेते रामदासजी आठवले,प्रा.जोगेंद्र कवाडे सर,बाळासाहेब आंबेडकर,व इतरही लहाणमोठया गटनेत्यीशी बोललो चर्चा केल्या परंतु त्यातुन ऐक्य काही घडुन आले नाही.मी आठवले व कवाडे सरांना दिल्ली येथील बैठकीत सांगीतले निदान तिघे तरी आपण प्रथम एकत्रित येऊ परंतु तांत्रिक कारणे पुढे करून या नेत्यांनी या ऐक्याला फाटा दिला.मी नामवंत आंबेडकरी कलावंत यांच्या माध्यमातुन नागपूर,पुणे,भिमा कोरेगांव, महाड,मुंबई,ठाणे,औरंगाबाद,दिल्ली,अहमदाबाद,सुरत,बडोदा इत्यादी शहरांमध्ये मेळावे आयोजीत करून जनतेला हाक दिली.जनतेलाही ऐक्य हवे आहेपरंतु जनतेत नेत्यांचीच विश्वासार्हता कमी झालेली आहे.कारण अनेक वेळा ऐक्यफुटणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले उद्यिष्ट साध्य करता आले नाही.याची खंत माझ्या सहित देशातील तमाम आंबेडकरी समाजाला आहे.आम्ही एकत्रित आलो तर बहुजन समाजही आमचे बरोबर एकत्रित येईल.तसा विश्वास त्यांच्यात निर्माण करता येईल.मी आशावादी आहे आणि निश्चयी सुद्धा आहे.म्हणुन मला आशा आहे की एक दिवस इतर पक्षाच्या चाक-या सोडुन नेते नक्कीच एकत्र येतील.तेव्हाएका डोळयात बुद्धांची शांती तर दुस-या डोळयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भिमक्रांती तेवत ठेवा.तसेच बुद्धधम्माचे अन् बावीस प्रतिज्ञांचे पालन करून बुद्धविहारात एकत्रित बसुन लोकशाही प्रमाणे आम्हास या देशाची शासनकर्ती जमात बनावयास पाहीजे असा आपण सम्यक संकल्प केला पाहिजे. आपण सर्व मैत्रीबंधुभावनेने एकदिलाने,एकविचाराने प्रज्ञारूपी सूर्याचे सूर्यकिरणे बनुन या महामानवाने बदललेल्या इतिहासाला साक्षी ठेवुन या भारत देशात परिवर्तन घडवुन आणु अन् आपल्या हाताच्या ओंजळीनेच पाणी पिऊ.आपण आपल्याच ऐक्याच्या कर्तुत्वाने उजाळु अन् शासनकर्ती जमात बनु तेव्हाच ख-या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची,राज्यघटनेची आणि भारत देषाची महती जगाला कळेल.हाच खरा कोटी-कोटी प्रणाम महापुरूष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांस आपल्या सर्वांच्यांच निश्चयातुन लाभेल. . - नानासाहेब इंदिसे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी !!! जयभिम !!! [[वर्ग:आंबेडकरवादी राजकीय पक्ष]] [[वर्ग:भारतीय रिपब्लिकन पक्ष]] htb4z3b3dornjbafgse2gntjw6qkhax 2581337 2581335 2025-06-20T16:02:24Z 2409:40C2:104A:F6B3:8000:0:0:0 /* 3] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली */ 2581337 wikitext text/x-wiki {{बदल}} == रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे == ==1]विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला राजकीय पक्ष == ===1.1] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी === पोलिंग एजंट ते डेप्युटी सरपंच व डेप्युटी सरपंच ते नगरसेवक आणि नगर सेवक ते राष्ट्रीय नेता अशा आपल्या जीवनयापनाच्या प्रवासातील भारतातील राजकारणातील विविध भूमिका बजावणा-या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय नेते गंगाराम इंदिसे उर्फ नानासाहेब इंदिसे होय. विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारानुसार नानासाहेब इंदिसे यांनी घेतलेला युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा,तसेच भारतीय राजकारणातील रिपब्लिकन पार्टी आफॅ इंडियावर टाकलेला प्रकाशझोत === 1.2] नानासाहेब इंदिसे यांचे बालपण === रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय नेते नानासाहेब इंदिसे यांचा जन्म दिनांक 5/3/1942 साली धुळे जिल्हयातील तळोजा तालुक्यातील प्रतापपुर येथे झाला.त्यांचे वडील दोधा कृष्णा इंदिसे हे 1952 साली शे.का.फे.चे पुर्वीच्या खानदेश नंतरचा धुळे आणि आत्ताच्या नंदुरबार जिल्हयातल्या तळोजा या तालुक्याचे तालुका अध्यक्ष होते.त्याकाळी षे.का.फे अन् प्रजासमाजवादीचे अशोक मेहता हे होते.तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणुन अण्णासाहेब नहनकर हे देखील धुळयाचेच होते. 1952 सालच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत नानांचे वय अवघे 10वर्षे होते.परंतु हत्ती अन् वडाचे झाड या निवडणुकितील दोन निशाणी त्यांना राजकारणाचेच धडे देत होते.त्यातच नानांचे पाय राजकारणात ओढले गेले. त्या सार्वत्रिक निवडणुकितुनच बालपणीच त्यांना राजकारणाचे बालकडु चाखावयास मिळाले.वडिल व्यापारी व शेतकरी असल्याने वडिलांबरोबरच त्यांचा सतत रहिवास असल्याने व्यापारानिमित्त वडिलांबरोबरच तेही बैलगाडी अथवा घोडयावरून शहरात जात असत.त्यामुळे त्यांचे शहराविषयी आकर्षण आणखीणच वाढले.1962 साली विधानसभेच्या निवडणुकीत केशव गोविंद वळवी हे आरपीआयच्या तिकिटावर तळोजा अक्कलकुवा या मतदार संघातुन उभे होते. त्यावेळी नानासाहेबांनी त्या निवडणुकीत पोलिंग एजंटचेही काम केले. === 1.3] ठाणे येथे प्रयाण=== नानासाहेब जुन्या अकरावी नंतर 1963 साली शहरी जिवनाच्या आकर्षणापायी ठाणे जिल्हयातील कळवा येथे स्थलांतरीत झाले. 1964 साली नानासाहेब इंदिसे हे ठाणे जिल्हयातील वाडा तालुक्यात फॉरेस्ट खात्यात नोकरीस लागले.1965ला वसईतील गोखीवरा येथे नानासाहेब इंदिसे रहावयास गेले.1966ला नानासाहेब इंदिसे पुन्हा ठाणे येथील येऊरला येऊन स्थायिक झाले. === 1.4] भारतीय राजकरणात प्रवेश === वडिलांकडुनच बालपणा पासून राजकारणाचे धडे मिळाल्याने नानांचे मन नोकरीत रमेना आणि 1967ला त्यांनी नोकरीचा राजिनामा देऊन राजकिय चळवळीत पूर्णवेळ सक्रिय सहभाग घेतला.ऑक्टोंबर 1966ला कर्मविर दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना रा.सु.गवई हे विद्यमान आमदार होते 1968 साली रा.सु.गवई हे उपसभापती झाले.तेव्हापासून नानासाहेब इंदिसे यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सक्रिय कार्य मोठया उत्साहात भरारी घेत जोमाने चालले होते. === 1.5] ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच === 1971 साली आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत माजीवडा येथे नानासाहेब इंदिसे हे डेप्युटी सरपंच झाले.1978 साली नानासाहेब इंदिसे हे माजीवडा येथे ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच म्हणुनच राजकारणात कार्यरत होते.1979ला नानासाहेब इंदिसे माजीवडा पंचायत समितीच्या निवडणुकिस उभे राहिले परंतु त्यांना अपयश आले.1985च्या ठाणे बेलापुर विधानसभा मतदार संघातुन नानासाहेब इंदिसे यांना अपयशाला सामोरे जावे लागले. === 1.6 ठाणे महानगर्पालिकेवर निर्वाचित === 1988ला नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकितही अपयशाला सामोरे जावे लागले.1992 मध्ये नानासाहेब इंदिसे यांनी ठाणे महानगर पालिकेत निर्वाचीत यश संपादन केले. नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेने परिवहन समितीचे चेअरमनपद देऊन सन्मान केला.या काळात त्यांनी अनेक गरजुंना नोकरीस लावले.त्याचा फायदा डॉक्टर, शिक्षक,बालवाडी शिक्षक,आया,कंडक्टर,ड्रायव्हर, बिगारी, शिपाई, हेल्पर,सुशिक्षीत बेरोजगार आदींचा उदरनिर्वाहणार्थ रोजगार उपलब्ध करून देऊन या पदाचा योग्य उपयोग केला.1997च्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत नानासाहेब इंदिसे यांना पुन्हा एकदा अपयशाला सामोरे जावे लागले. === 1.7] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना  === 2000 सालापासून नानासाहेब इंदिसे हे कळत नकळत ऐक्याच्या भुमीकेवर ठाम राहिले.2009 मध्ये पुन्हा माजिवडा विधानसभा मतदार संघात नानासाहेब इंदिसे यांना अपयश पचवावा लागला.निवडुन न येण्याची कारणे मला माहित होती परंतु आंबेडकरी समाज इतरांच्या दावणीला बांधला जाऊ नये या उद्येशाने विधानसभा निवडणुका लढविल्या. तदनंतर आज पर्यंत रिपाइचे वेगवेगळया गटातटाचे राजकारण चालुच आहे.त्या नंतर रिपब्लिकन पार्टीची अशी अवस्था पाहुन निळया निशाणाखाली सर्वांचे ऐक्य व्हावे याच उद्येशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारांच्या प्रेरणेतुनच नानासाहेब इंदिसे यांनी 20 डिसेंबर 2008 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना केली.या मध्ये शिवराम मोघा,कुमारसेन बौद्ध,उत्तमराव खडसे,प्रल्हाद सोनवणे, दौलतराम आदी.निष्ठावंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतानुसार नानासाहेबांबरोबर सक्रिय कार्य करू लागले. पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन युगप्रवर्तक,विष्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभुमी महु (आंबेडकर नगर) येथे भरविण्यात आले.यामध्ये आंबेडकरी चळवळीतले बहुतांश नेते,कार्यकर्ते यांना निमंत्रीत करण्यात आले. == 2] विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी व ऐतिहासिक घडामोडींचा परामर्श == तत्पुर्वी विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी वऐतिहासिक घडामोडींचा परामर्श खालिलप्रमाणे 20/7/1924 रोजी बहिष्कृत हितकारीणी संस्था स्थापन केली.3/3/1927 रोजी समता सैनिक दल स्थापन केले 20/3/1927 रोजी महाडचा सत्याग्रह, 26/7/1927 रोजी अंबादेवी मंदिर सत्याग्रह, 14/6/1928ला भारतीय बहिष्कृतशिक्षण मंडळ स्थापले, 22/9/1929 रोजी पर्वती पुणे सत्याग्रह,2/3/1930ला काळाराम मंदिर सत्याग्रह,4/10/1930डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृष्यांचा प्रतिनिधी म्हणुन गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला रवाना,7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931ला दुस-या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांना स्वतंत्र मतदार संघावरून गांधी आंबेडकरांत तिव्र मतभेद,23/9/1931ला मुखेडचा सत्याग्रह केला.24 सप्टेंबर 1932 पुणे करार, जानेवारी 1933 तिस-या गोलमेज परिषदेहुन भारतात रवाना,1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट लागु.13/10/1935 येवले मुक्कामी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘मी जरी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही’’ही घोषणा केली.15/8/1936ला स्वतंत्र मजुर पक्ष स्थापन केला.1937 मुंबई विधिमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे डॉ.आंबेडकरांसहित 14 उमेदवार निवडुन आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी पक्ष नेते होते.तर सभागृह उपनेते आर.आर.भोळे होते. या मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे शामराव परूळेकर, करंदीकर,जमनादास मेहता,झाबवाला आदी खंदे सदस्य होते.मोठा पक्ष म्हणुन मुस्लिम लिग हा होता त्यांचे नेते सर देहलवी हे होते 12/2/1939 मोहाडी धुळे सत्याग्रह,2/7/1942ला प्रथमच एक अस्पृष्य केंद्रिय मंत्रीमंडळात मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेबांचा भारताच्या व्हाइसरॉय कार्यकारी मंडळात समावेश झाला.19/7/1942ला शेडयुल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली,27/7/1942ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मजुरमंत्रीपदाचा कारभार सोपविण्यात आला. 8/7/1945 पिपिल्स ऐज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.4/6/1946 पुणे कौन्सील मोर्चा सत्याग्रह,27/6/1946 सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना,19/7/1946डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगाल विधिमंडळातुन घटना समितीवर निवडुन आले. 3/9/1946ला नागपुर सत्याग्रह, 5/9/1946डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश पार्लमेंटच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये कॉन्झर्वेटीव्ह इंडियन कमिटी समोर पुणे करार रद्द करण्याची व ब्रिटिश सरकारचा जातिय निवाडा लागु करण्याची मागणी केली.11/12/1946डॉ.राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 2/3/1947ला लखनौ सत्याग्रह केला.15 मार्च 1947 बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘स्टेटस अॅन्ड मायनॉरिटीज’’हा ग्रंथ प्रकाशीत केला.29 एपिंल 1947 रोजी घटनेतुन अस्पृष्यता निवारण्याविषयी सतरावे कलम संमत केले. 22 जुलै 1947 रोजी भारतीय ध्वज समितीचे सदस्य म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतुन अशोक चक्रांकित तिरंगा झेडा राष्ट्रध्वज म्हणुन निश्चित केला.23 जुलै 1947डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवर निवड झाली.3/8/1947 भारताचे कायदा मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्रीमंडळात समावेश15ऑगष्टला1947 भारत स्वतंत्र झाला.30/8/1947ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड.26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान भारतास अर्पण,8 मे 1950 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणुन शपथ घेतली.26 जानेवारी 1950ला भारतीय प्रजासत्ताक दिन. या दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासारख्या खंडप्राय देशात राज्यघटनेद्वारे लोकभिमुख लोकशाही पेरली सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे महत्त्व पटवुन ‘‘एक व्यक्ती,एक मुल्य,एक मत’’ याचा सिद्धांत घटनेत मांडुन सर्वांना एका किंमतीत आणले,त्याच बरोबर न्याय,स्वातंत्र्य,समता मैत्रीबंधुत्व ही नितीतत्त्वे राज्य घटनेच्या माध्यमातुन लोकशाही बळकट होण्यासाठी रूजवली अन् भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. 5 फेब्रुवारी 1951डॉ..आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लोकसभेत मांडले.27 सप्टेंबर हिंदुकोड बिल फेटाळल्याच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा त्याग केला.5 जानेवारी 1952 मुंबई लोकसभेत अपयश9 मार्च 1952डॉ. आंबेडकरांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. मे 1954 भंडारा लोकसभेच्या राखीव मतदार संघातील पोटनिवडणुकित अपयश आले.1954ला भारतीय बौद्धमहासभेची स्थापना केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत खोती बिल, महार वतन बिल, हिंदुकोड बिल, मंत्र्यांचे वेतन बिल, लोकप्रतिनिधि बिल,कामगारांचे किमान वेतन बिल सादर केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 13ऑक्टोंबर 1935 साली येवले मुक्कामी हिंदुधर्म त्यागाची चळवळ हाती घेऊन केलेल्या भिष्मप्रतिज्ञेच्या अनुशंगाने21वर्षे सातत्याने सर्व धर्माचा अभ्यास केला.अभ्यासपुर्वक निर्णयातुन त्यांनी निसर्गनियमांना अनुसरून,विज्ञाणाचा आधार घेऊन,सत्य व वास्तव यांची सांगड घालुन सम्यक ज्ञानाची कसोटी घेऊन 14ऑक्टोंबर 1956 रोजी अशोक विजया दशमी दिनी नागपुर येथे भन्ते चंद्रमणी यांच्या कडुन स्वतः भारतातीलच असलेल्या बौद्ध धम्माची धम्मदिक्षा घेऊन आपल्या समवेत असलेल्या सुमारे पाच लक्ष अनुयायांना त्यानी स्वतः बौद्ध धम्माची दिक्षा दिली. 20 नोव्हेंबर 1956 रोजी काठमांडु येथे जागतिक बौद्ध महापरिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘बुद्ध की,कार्लमार्क्स’’या विषयावर भाषण केले असता बौद्ध महापरिषदेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ‘राजा इ मलाला’यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना‘‘बोधिसत्व’’हि पदवी तेथेच बहाल केली. 24 नोव्हेंबर 1956 रोजी सारनाथ, आग्रा आणि दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.25 नोव्हेंबर 1956 रोजी सकाळी काशी विद्यापिठातील विद्यार्थी व आचार्यगणांसमोरभाषण केले तर सायंकाळी बनारस येथे महाबोधी संस्थेच्या सभेत शेवटचे भाषण केले. ==3] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली == रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 8/9 डिसेंबर 1955 मध्ये औरंगाबाद येथील वास्तव्यात पहिल्यांदा बोलुन दाखविला होता. भारतीय राज्य घटना ख-याखु-या अर्थाने राबविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाला भाग पाडणे तसेच सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान राजकीय पक्षांचे एकीकरण करून प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्षाला प्रस्थापीत करणे हा रिपब्लिकन पक्षाचा उद्येश असल्याचे त्यांनी सांगीतले.(जनता -10 डिसेंबर 1955 ) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 29/30 सप्टेंबर 1956 रोजी 26,अलिपुर रोड दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी त्यांच्याच अध्यक्षतेखाली शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकीतशेकाफे बरखास्त करून ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’या नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला अन् रिपाइ अस्तित्वात आल्याची घोषणा समारोपाच्या भाषणात केली.ज्या मध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जातीविरहित,धर्मविहिन चळवळ चालवुन या देषात असणारी विभिन्न विषमता नष्ट करण्यासाठी आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्रांती घडवुन आणुन वर्गविहिन,जातीविहिन समाजव्यवस्था निर्माण करतील व समाजवादी व आर्थिक पूनर्रचना करतील अशी त्यांना अपेक्षा होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घोषीत केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची ‘‘हत्ती’’ ही निशाणी ठेवण्यामागची भूमिका काय होती हे देखील समजावुन घेणे महत्त्वाचे आहे.हत्ती हा महाकाय प्राणी असल्याने आणि माझा समाज हा अडाणी समाज असल्याने इतर निशाणी ओळखण्यापेक्षा महाकाय हत्तीची निशाणी त्यांना तत्काळ ओळखता यावी म्हणुनच ‘‘हत्ती’’या निशाणीची निवड केली. तसेच शेडयुल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष मर्यादीत व ठराविक जातीपुरताच असल्याने 1952च्या लोकसभेत अन् 1954च्या भंडारा मधील पोटनिवडणुकीत उच्चजातीयांनी जातीय मानसिकतेतुन शे.का.फे.ला एकटे पाडल्याने आलेल्याअपयशाच्या कारणमीमांसेने ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’प्रजासत्ताक पक्ष म्हणुन स्थापन करणे संदर्भी पक्षाची घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहुन काढली होती.या पक्षात भारतीय जनतेला सामील होण्यासाठी खुल्ले पत्रही लिहिले होते.त्यांना आपल्या या पक्षाला विशिष्ट जातीचे लेबल लावुन हा पक्ष चालवायचा नव्हता.यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत नमुद पक्षाची ध्येय,उद्यिष्ट व तत्त्वप्रणाली नमुद केलेली आपणास आढळुन येतील.भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे तीच भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या घटनेत समाविष्ट करून घटना बनविण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचा तत्त्वज्ञानात्मक आधार, पक्षाची ध्येय,उद्दिष्टे व कार्यक्रम तसेच पक्ष सुदृढतेच्या कसोटया याचे अध्ययन केल्यास हा पक्ष भारतात अस्तित्वात असलेल्या अन्य कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा सर्वच बाबतीत सरस आहे हे दिसुन येते. मात्र पक्षाच्या या वैशिष्ट्याचीशिकवण सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहचविण्यात रिपब्लिकन पक्षाचे नेते,विचारवंत,पक्षावियी सहानूभुती असलेले बुद्धीजिवी,लेखक, सामाजिक कार्यकर्ते कमी पडले असे खेदाने म्हणावेसे वाटते. दिनांक 29/30 सप्टेंबर 1956 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या बैठकीत 26 अलीपुर रोड दिल्ली येथील आपल्या राहत्या घरी केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीवादी, ब्राम्हणवादी आणि कम्युनिस्ट या तिन विचारधारांना नाकारून रिपब्लिकन नावाची निख्खळ लोकशाहीवादी चौथी राजकीय संकल्पना भारतीय राजकारणाच्या पटलावर निर्माण केली मात्र त्यांच्या घोषणेतील राजकीय कृती प्रत्यक्षात उतरविण्यापुर्विच त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दुर्देवाने परिनिर्वाण झाल्याने पक्ष स्थापनेसाठी रिपब्लिकन पार्टीचा निर्णय अस्तित्वात येऊ शकला नाही.. == 4] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा == रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा या विषयावर टाकलेल्या प्रकाशझोतात रिपाइ एक्याबाबतच्या अनेक घडामोडींचा नानासाहेबांनी घेतलेला परामर्श आपल्याला बरेचसेकाही सांगुन जातो बऱ्याच जणांना माहित असेल परंतु आजच्या पिढीला माहित व्हावे या उद्देशानेच त्याचे सिंहावलोकन करीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणा नंतर मुंबई मध्ये दादर येथील चैत्यभुमीवर त्यांचे अंतीम संस्कार करण्यात आले.सदर प्रसंगी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी बाबासाहेबांच्या चित्तेवर शपथ घेऊन समतेचा रथ पुढे नेईन परंतु तो तसुभरही मागे घेणार नाही. त्या प्रमाणे 29 डिसेंबर 1956 रोजी अहमदनगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची प्रेसीडियमची बैठक झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली.दुस-या फळीतील नेत्यांमध्ये नेतृत्वावरून अहमहमिका लागली.दलित चळवळीचे नेतृत्व आपल्याकडे यावे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होती.परंतु शिल्लक राहिलेले सर्वच नेते तुल्यबळ असल्याने बाबासाहेबांच्या समवेत असणारे दादासाहेब गायकवाड, राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, बी.सी.कांबळे आदी नेत्यांनी चतुराईतुन सामूहिक नेतृत्वाचा मार्ग काढुन 1 जाने 1957 रोजी आपले पहिले अध्यक्षीय मंडळ स्थापन केले 1957च्या सार्वत्रिक निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्याच नावाने लढण्याचा आग्रह होता.परंतु त्यावेळी मुंबईसह महाराष्ट्र यासाठी काँग्रेस खेरीज जनसंघासहीत सर्व आघाडीत होते.ही आघाडीही तत्कालीन शे.का.फे.चाच एक भाग होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने व रिपाइ नवीन पक्ष असल्याने नानासाहेब गोरे,प्र.के.अत्रे यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्त्व नसल्याने आणि ज्या काळात शे.का.फे. होता त्या काळात रिपाइ कळायला उशीर झाल्यामुळे तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हे लक्ष पूर्ण होणार नसल्याचे घटक पक्षाने कर्मविर दादासाहेब गायकवाडांकडे आग्रह धरला. शेवटी निर्णया अंती या समितीतील घटक पक्षांनी आपल्या पुर्वीच्याच शेकाफेच्या नावाने निवडणुका लढवाव्या असा निर्णय जाहिर केला.कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी शे.का.फे.च्या माध्यमातुन एकास एक उमेदवार राहिल अशी संयुक्त महाराष्ट्र कृती समितीने काळजी घ्यावी असे ठरवुन महाराष्ट्र कृतीसमितीशी आघाडी करून निवडणुकीस सामोरे गेले.त्या निवडणुकीत कृतीसमितीला घवघवीत यश मिळाले. कृती समिती महाराष्ट्रात सत्तेत आली नाही परंतु प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन उदयास आली असल्याने केंद्र सरकारला 1 मे 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यास भाग पाडले.1957च्या निवडणुकीत शे.का.फे.च्या नावाने 1)कर्मविर दादासाहेब गायकवाड - नाशिक लोकसभा मतदार संघ,2)अॅड.बी.सी.कांबळे - नगर,3)जी.के.माने - मुंबई, 4)हरिहर सोनुले - नांदेड,5) ह.भा.साळुंखे (33वर्षाचे सर्वात लहान)- भोर तालुका,6)दिघे -कोल्हापुर बहुजन समाज, 7)परमार - अहमदाबाद, 8) दत्ता कट्टी - कर्नाटक,चिकोडी मतदार संघ, 9)एन शिवराज - चेन्नई असे 9 खासदार आणि महाराराष्ट्रातुन बहुतांशी आमदार निवडुन आले आणि शेकाफे हा पक्ष देशात 1957 साली दोन नंबरचा पक्ष म्हणुन राहिला.त्यावेळेस गट नेते कर्मविर दादासाहेब गायकवाड होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपाइ लवकरात लवकर कार्यरत व्हावी अशी खंत डॉ.बाबासाहेबांच्या समकालीन नेत्यांच्या मनात होती. पावसाळयामुळे ही प्रक्रिया थांबली अन् 2ऑक्टोंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे बॅ.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आले. 3/10/1957च्या रिपाइ च्याराष्ट्रीयअध्यक्षपदासाठी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी महाराष्ट्र व्यतिरिक्त दुस-या प्रांतात हा पक्ष जावा म्हणुन एन.शिवराज यांचे नाव घोषीत केल्याने ते एकमताने निवडुन आले.14 मे 1959 रोजी बी.सी.कांबळे रिपाइतुन बाहेर पडुन त्यांनी दुरूस्त रिपब्लिकन पक्ष स्थापन केला.अन रिपाइच्या बेकीचे बीज तेथेच रूजले गेले.परंतु महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता बी.सी.कांबळे (बापुसाहेब कांबळे)संपूर्ण महाराष्ट्रात कोठेच चालले नाही.1960 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला निर्वाचन आयोगाकडुन मान्यता मिळाली.ऑक्टोंबर 1962ला पुन्हा रिपाइचे दुसरे ऐक्य झाले.या ऐक्यातुन एन.शिवराज,कर्मविर दादासाहेब गायकवाड,राजाभाऊ खोब्रागडे,बि.पी.मौर्य,भय्यासाहेब आंबेडकर, शांताबाई दाणी,इ. समकालीन नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाचा झंझावात देशात सुरू केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राश्ट्रिय अधिवेशने काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत झाली.30 सप्टेंबर 1964ला एन शिवराज यांचे दिल्ली येथील मोर्च्याच्या वेळी दादासाहेब गायकवाडांच्या निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले.तदनंतर ऑक्टो 1964 मध्ये कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी रिपाइचे बॅरीस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत अशा आषयाची सूचना मांडली परंतु समकालीन नेत्यांनी ही सूचना अमान्य करून कर्मविर दादासाहेब गायकवाडांचीच रिपाइचे राष्ट्रीयअध्यक्ष म्हणुन निवड केली. कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी 6 डिसेंबर 1964ला 14 कलमी डिमांड घेऊन भूमीहिन सत्याग्रह करण्याची घोषणा केली त्यात एक घोष वाक्य होते.‘‘कसेल त्याची जमिन,नसेल त्याचे काय ? राहिल त्याचे घर,नसेल त्याचे काय ?’’हा सत्याग्रह जवळपास दोन महिने चालला.देशभरात सुमारे 3 लाख 65 हजारांच्यावर लोक तुरूंगात गेले. तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी फेब्रुवारी महिन्यात शिष्टमंडळास पाचारण केले. त्या शिष्टमंडळात कर्मविर दादासाहेब गायकवाड,बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे,दत्ता कट्टी,अषोक निळे,रा.सु.गवई,अनसुमंतराव गायकवाड आदी नेते होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक अन् भुमीहिनांचा, झोपडपट्टयांचा प्रश्न आदी प्रश्न सोडवले जाऊन दिनांक 5 फेब्रुवारी 1965ला हा सत्याग्रह यशस्वी झाला. 1962 साली उत्तर प्रदेश मधुन रिपाइचे 3 खासदार निवडुन आले होते.पंजाब मध्ये अकाली दल आणि आरपीआयची पहिली सत्ता स्थापन झाली त्यामध्ये दोन मंत्री हे आरपीआयचे होते.1965 साली आरपीआय सत्तेत होती याचे कारण बी.पी.मौर्य,संघप्रिय गौतम आणि कादरखान हे तिन नेते बाबासाहेबांच्या विचाराच्या दिशेने प्रामाणिक काम करीत होते.या काळात उत्तरप्रदेशात आरपीआय आणि एस.व्हि.डी. यांचे सरकार होते.चैधरी चरणसिंग तेव्हा मुख्यंत्री झाले.त्या सरकार मध्येही आरपीआयचे तिन मंत्री होते. 1967 साली रिपब्लिकन पक्षाला चांगले मतदान मिळाले.काही राज्यात रिपब्लिकन पक्षाला मंत्रीमंडळात मिळालेले स्थान हे केवळ रिपब्लिकन पक्षाच्या मतसंख्येच्या आधारे मिळाले होते.मागणी न करता मंत्रीमंडळात रिपब्लिकन पक्षाच्या आमदारांना घेतले जात होते.इतका दबदबा या पक्षाचा होता.पंजाब राज्यात धानुलिया यांना कॅबिनेटमंत्री म्हणुन घेण्यात आले.उत्तरप्रदेश मध्ये एक कॅबिनेट मंत्री घेण्याऐवजी असरार अहमद आणि शमीम आलम या दोन आमदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आले.हा पक्ष केवळ बौद्धांपुरता मर्यादीत नव्हता तर या पक्षाचे मंत्री मुस्लिमही होते. बिहारमध्ये रिपब्लिकन पक्षाची एवढी ताकद होती की,तेथे लाल पासवान नावाचा एकच उमेदवार निवडुन आला असला तरी त्याला मंत्रीमंडळात स्थान देण्याशिवाय गत्यंतर नव्हते.महाराष्ट्राशिवाय उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार,हरियाना या उत्तर भारतीय राज्यात रिपब्लिकन पक्ष हा एक समर्थ पक्ष होता. .   ऑक्टो.1968ला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे रिपाइतुन बाहेर पडले अन् स्वतंत्र खोब्रागडे गटाची निर्मिती केली.कर्मविर दादासाहेब गायकवाडांना अर्धांगवायुचा झटका आल्याने 29 डिसेंबर 1971ला कर्मविर दादासाहेब गायकवाड यांचे निर्वाण झाले.1972 मध्ये कोल्हापुरातील बावडा गावात गवई बंधुंचे डोळे काढण्यात आले.त्यावेळेस डॉ.बाबासाहेबांची विचारधारा अन् नांव ऐकुन असलेले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपले उद्धारकर्ते असल्याचे समजत असतानाही युक्रांत समाजवाद्यांच्या (कम्युनिस्ट)चळवळीत प्रॅक्टिकल रितीने काम करणाऱ्यांनीच अन्याय अत्याचाराचे निमित्त साधुन कळत नकळत रिपाइला नेस्तनाबुत करण्यासाठी सर्वांच्या मदतीने दलितपॅंथर्सची निर्मिती केली.26 जाने 1974ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तिसरे ऐक्य झाले.सी.आर.मोघम, बॅ.राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, रा.सु.गवई, बी.सी.कांबळे,शांताबाई दाणी हे ऐक्यात सामील झाले. पहिले 35 लोकांचे ऐक्याचे प्रेसीडियम झाले.मुंबईत पहाटे चार वाजेपर्यंत वसाहतीत मिटींग चालु झाल्या.पहिल्या प्रेसीडियमची बैठक सी.आर.मोघम यांनी बंगलोर येथे बोलवली तर दुसरी अमरावतीत झाली दुस-या बैठकीतुन बॅ.राजाभाऊ खोब्रागडे अन् त्यांचे सहकारी भय्यासाहेब आंबेडकर,घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,दत्ता कट्टी हे बाहेर पडले.तदनंतर बापुसाहेब कांबळे हे देखील बाहेर पडल्याने सी.आर.मोघम,रा.सु.गवई,वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,आर.जी.खरात,शांताबाई दाणी,अॅड.बाजीराव कांबळे ऐवढेच रिपाइत शेष राहिले. वर्ष सहा महिन्याच्या आतच ही ऐक्य प्रक्रिया संपुष्टात आली. 1975च्या दरम्यान खोब्रागडे गटातुनही भय्यासाहेब आंबेडकर, घनश्याम तळवटकर, सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके,प्रा.रमाकांत यादव, हे बाहेर पडले.1976च्या दरम्यान शांताबाई दाणी व त्यांचे सहकारी भाऊसाहेब चव्हाण,दादासाहेब रोहम,हे रिपाइ तुन बाहेर पडले.अशा त-हेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची वाताहत झाली. दुर्देवाने 17/9/1977ला मुंबईच्या के.ई.एम.रूग्णालयात भय्यासाहेब आंबेडकरांची प्राणज्योत मालवली.1976 ते 1978 पर्यंत रिपाइचे गटातटाचे राजकारण चालुच होते.1978च्या हिवाळयात दादासाहेब रोहम,रा.सु.गवई समवेत एन.एस.कुभारे,व सी.आर.मोघम हे दिल्ली येथे आमरण उपोषणास बसले.1978च्या सरते शेवटी भारतीय दलित पॅंथर्सने रिपब्लिकन पक्षाच्या पुढा-यांस लक्ष अन् भक्ष ठरविले.भारतीय दलित पॅंथर्सचा गवगवा झाल्याने त्यांनी सवर्ण बहुजनांचा अर्वाचीत शिवराळ भाषेत उद्धार केला.आणि नामांतराचा लढा हाती घेतला.त्यांच्या बरोबरीने नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रिंसिपल पद न मिळाल्याने प्रा.जोगेंद्र कवाडे सरांनी लॉंग मार्च दलित मुक्ति सेना स्थापन केली.त्यांच्यातल्याच त्यांच्या अहमहमिकेतुन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पावसाळी अधिवेशनात नांमातराची घोषणा केली. निमित्त नामांतराचे होते परंतु सवर्ण बहुजनांना राग होता तो त्यांच्या शिवराळ भाषेचा अन् त्यामुळेच मराठवाडा दंगल पेटली. दंगलीत सबंध मराठवाडा पेटला त्यात 649 पेक्षाही जास्त मृतांचा शासनाचा आकडा होता.सबंध मराठवाडयात मातंग,बौद्ध समाजाच्या वसाहती जळाल्या.त्यात पोचीराम कांबळे सारख्या मातंग समाजाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरी अनुयायाच्या शरिराचे छिन्नविछिन्न तुकडे करण्यात आले तरीही शेवटच्या श्वासाच्या क्षणापर्यंत ‘जयभिम’चा नारा त्यांनी सोडला नाही. अष्याही परिस्थितीत भारतीय दलित पॅंथर्सला भावनिक चळवळ वाढवायचीच होती. मात्र छत्रपती शाहु महाराज,महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सिद्धांता नुसार रिपाइतील रा.सु.गवई,दादासाहेब रोहम यांनी सामाजिक भान ठेवुन आपले बौद्धिक कौशल्य पणाला लावुन सहा महिन्याच्या आतच मराठवाडयात जातीय सलोखा निर्माण करून पुर्ववत मराठवाडयातील दलित वस्त्या शासनाच्या मदतीने पुर्ववत केल्या.वसाहती वसवुन समझोताही केला.उद्धवस्त झालेले संसारही त्यांनी बसविले. 1983 -84च्या कालखंडात तत्कालीन महाराष्ट्र राज्य सेवेतील सिनिअरमोस्ट सनदी बुद्धिस्ट अधिकारी यांनी आणखी एक गट निर्माण केला.या वादळाला अकोला,पॅटर्न,नांदेड पॅटर्न असे संबोधु लागले.1984ला अकोल्यातुन भारीपचे प्रकाशराव आंबेडकर यांना निवडणुकित अपयश आले.9 सप्टेंबर 1984 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने निधन दिल्ली येथे झाले.दिनांक 18/19 जानेवारी 1985 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे ज्येष्ट सहकारी दत्ता कट्टी अन् त्यांचे सहकारी व रा.सु.गवई यांचे सहकारी म्हणजेच वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,पी.टी.मधाळे - माजी आमदार सांगली,खंडेराव सावंत -माजी आमदार सातारा,दादासाहेब रोहम -माजी आमदार संगमनेर नगर,दादासाहेबब शिर्के -कोल्हापुर, तसेच शांताबाई दाणी,अॅड. बाजीराव कांबळे -कर्जत सातारा,भाऊसाहेब चव्हाण,एम.डी.शेवाळे,के.बी.श्रृंगारे -नाशिक,देवीदास वाघपांजार -दर्यापुर अमरावती, नानासाहेब उर्फ गंगाराम इंदिसे,व्हि.बी.ससाणे - ठाणे,आदींचे 18/19 जानेवारीत नागपूरच्या आमदार निवासात ऐक्या संदर्भात म्हणजेच गवई व खोब्रागडे गटात बैठक झाली.त्या ऐक्यातुन दत्ताजी कट्टी अध्यक्ष अन् रा.सु.गवई कार्याध्यक्ष झाले. आणि 1985च्या मार्च महिन्यातील सार्वत्रिक विधान सभेच्या निवडणुकीस सामोरे जावे लागले. सहा महिन्यातच दत्ता कट्टी गेले अन् ऐक्य फुटले.सहा महिन्याच्या आतच या ऐक्यप्रक्रियेची फाटाफुट झाली परंतु देशातील बहुतांषी बॅरिस्टर राजाभाऊंना माननारा वर्ग हा दादासाहेब रोहम व रा.सु.गवई यांच्या बरोबरच राहिला.त्या ऐक्यप्रक्रियेतुन दत्ता कट्टी हे एकटे बाहेर फेकले गेले.घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके, प्रा.रमाकांत यादव हे दादासाहेब रोहम,रा.सु.गवई यांच्या सोबत राहिले. तदनंतर पुन्हा एकदा1995 साली रिपाइचे पाचवे ऐक्य झाले अन् चार खासदार संसदेत निवडुन आले.तेही ऐक्य लवकरच फूटले. 1988ला ऐन पावसाळयात रिडल्स प्रकरण घडले.6 डिसेंबर 1988ला रा.सु.गवईंनी दिल्ली येथील बोटक्लब वर लाक्षणीक अशा भव्य मोर्च्याचे आयोजन केले असता ‘न भूतो न भविष्यती अशामोर्च्यात सुमारे 6 ते 7 लक्ष अनुयायांनी सहभाग घेतला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष कर्मविर दादासाहेब गायकवाड ते एन.शिवराज यांच्या नंतर गल्ली ते घराघरा पर्यंत वाटला गेला.जो,तो उठतो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव अन् निळे निशाण घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुढे अबकड लावुन संघटना तयार करून पुढारपणाच्या नावाखाली आपल पुढारपण आणि आपल्या घराची व्यवस्था कशी होईल या प्रवृत्तीने वागायला लागले आहेत. त्यामुळे दिवसेगणिक आंबेडकरी जनतेवर, मायभगिनींनीवर, मागासवस्त्यांवर, अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत.अन्याय,अत्याचार झाल्यानंतर पुढारी अश्रु पुसावयास जातात परंतु त्यांचे मुळ शोधत नाहीत.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पने प्रमाणे ‘‘माझा समाज सत्तास्थानी व सत्ताधारी असला पाहिजे’’ या उलट आज पुढा-यांची दशा झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या संकल्पनेचा विसर पडुन ते आज शिवसेना,बि.जे.पी.चे स्वप्न साकार करावयास निघालेत या सारखी दुर्देवाची बाब कोणती ? मग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत अन् संकल्पना हे प्रात्यक्षिक वास्तव्यात आणावयाचे असेल तर आमच्या कार्यकर्त्यांनी‘‘नेता छोडो समाज जोडो !’’हे अभियान सुरू केले आहे.समाज जागृत आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरी विचारांशी एकनिष्ठ आहे.समाजात एकसंघ खंबीर नेतृत्व नसल्याने समाज दिषाहिन झालेला आहे.‘‘ नेत्यांचे ऐक्य करण्या ऐवजी समाजाचे ऐक्य व्हावे ’’ हाच खरा उद्येश असल्याने या पक्ष स्थापने मागची नानासाहेब इंदिसे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना रिपब्लिकन पक्ष एक व्हावा.हीच भूमिका पक्ष स्थापनेमागची होती आणि आजही त्या भुमिकेवर मी ठाम आहे.मला अध्यक्षपदाचा हव्यास मुळीच नाही.म्हणुनच मी कुमारसेन बौद्ध (दिल्ली) यांना अध्यक्ष केले होते.परंतु दुर्देवाने ते या कामी सपशेल अपयशी ठरले.ऐक्यासाठी मी आर.पी.आय.नेते रामदासजी आठवले,प्रा.जोगेंद्र कवाडे सर,बाळासाहेब आंबेडकर,व इतरही लहाणमोठया गटनेत्यीशी बोललो चर्चा केल्या परंतु त्यातुन ऐक्य काही घडुन आले नाही.मी आठवले व कवाडे सरांना दिल्ली येथील बैठकीत सांगीतले निदान तिघे तरी आपण प्रथम एकत्रित येऊ परंतु तांत्रिक कारणे पुढे करून या नेत्यांनी या ऐक्याला फाटा दिला.मी नामवंत आंबेडकरी कलावंत यांच्या माध्यमातुन नागपूर,पुणे,भिमा कोरेगांव, महाड,मुंबई,ठाणे,औरंगाबाद,दिल्ली,अहमदाबाद,सुरत,बडोदा इत्यादी शहरांमध्ये मेळावे आयोजीत करून जनतेला हाक दिली.जनतेलाही ऐक्य हवे आहेपरंतु जनतेत नेत्यांचीच विश्वासार्हता कमी झालेली आहे.कारण अनेक वेळा ऐक्यफुटणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले उद्यिष्ट साध्य करता आले नाही.याची खंत माझ्या सहित देशातील तमाम आंबेडकरी समाजाला आहे.आम्ही एकत्रित आलो तर बहुजन समाजही आमचे बरोबर एकत्रित येईल.तसा विश्वास त्यांच्यात निर्माण करता येईल.मी आशावादी आहे आणि निश्चयी सुद्धा आहे.म्हणुन मला आशा आहे की एक दिवस इतर पक्षाच्या चाक-या सोडुन नेते नक्कीच एकत्र येतील.तेव्हाएका डोळयात बुद्धांची शांती तर दुस-या डोळयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भिमक्रांती तेवत ठेवा.तसेच बुद्धधम्माचे अन् बावीस प्रतिज्ञांचे पालन करून बुद्धविहारात एकत्रित बसुन लोकशाही प्रमाणे आम्हास या देशाची शासनकर्ती जमात बनावयास पाहीजे असा आपण सम्यक संकल्प केला पाहिजे. आपण सर्व मैत्रीबंधुभावनेने एकदिलाने,एकविचाराने प्रज्ञारूपी सूर्याचे सूर्यकिरणे बनुन या महामानवाने बदललेल्या इतिहासाला साक्षी ठेवुन या भारत देशात परिवर्तन घडवुन आणु अन् आपल्या हाताच्या ओंजळीनेच पाणी पिऊ.आपण आपल्याच ऐक्याच्या कर्तुत्वाने उजाळु अन् शासनकर्ती जमात बनु तेव्हाच ख-या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची,राज्यघटनेची आणि भारत देषाची महती जगाला कळेल.हाच खरा कोटी-कोटी प्रणाम महापुरूष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांस आपल्या सर्वांच्यांच निश्चयातुन लाभेल. . - नानासाहेब इंदिसे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी !!! जयभिम !!! [[वर्ग:आंबेडकरवादी राजकीय पक्ष]] [[वर्ग:भारतीय रिपब्लिकन पक्ष]] av9rav4c33gnpj7bbwlco7pur20zhtk 2581338 2581337 2025-06-20T16:02:49Z 2409:40C2:104A:F6B3:8000:0:0:0 /* 3] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली */ 2581338 wikitext text/x-wiki {{बदल}} == रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे == ==1]विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला राजकीय पक्ष == ===1.1] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी === पोलिंग एजंट ते डेप्युटी सरपंच व डेप्युटी सरपंच ते नगरसेवक आणि नगर सेवक ते राष्ट्रीय नेता अशा आपल्या जीवनयापनाच्या प्रवासातील भारतातील राजकारणातील विविध भूमिका बजावणा-या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय नेते गंगाराम इंदिसे उर्फ नानासाहेब इंदिसे होय. विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारानुसार नानासाहेब इंदिसे यांनी घेतलेला युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा,तसेच भारतीय राजकारणातील रिपब्लिकन पार्टी आफॅ इंडियावर टाकलेला प्रकाशझोत === 1.2] नानासाहेब इंदिसे यांचे बालपण === रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय नेते नानासाहेब इंदिसे यांचा जन्म दिनांक 5/3/1942 साली धुळे जिल्हयातील तळोजा तालुक्यातील प्रतापपुर येथे झाला.त्यांचे वडील दोधा कृष्णा इंदिसे हे 1952 साली शे.का.फे.चे पुर्वीच्या खानदेश नंतरचा धुळे आणि आत्ताच्या नंदुरबार जिल्हयातल्या तळोजा या तालुक्याचे तालुका अध्यक्ष होते.त्याकाळी षे.का.फे अन् प्रजासमाजवादीचे अशोक मेहता हे होते.तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणुन अण्णासाहेब नहनकर हे देखील धुळयाचेच होते. 1952 सालच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत नानांचे वय अवघे 10वर्षे होते.परंतु हत्ती अन् वडाचे झाड या निवडणुकितील दोन निशाणी त्यांना राजकारणाचेच धडे देत होते.त्यातच नानांचे पाय राजकारणात ओढले गेले. त्या सार्वत्रिक निवडणुकितुनच बालपणीच त्यांना राजकारणाचे बालकडु चाखावयास मिळाले.वडिल व्यापारी व शेतकरी असल्याने वडिलांबरोबरच त्यांचा सतत रहिवास असल्याने व्यापारानिमित्त वडिलांबरोबरच तेही बैलगाडी अथवा घोडयावरून शहरात जात असत.त्यामुळे त्यांचे शहराविषयी आकर्षण आणखीणच वाढले.1962 साली विधानसभेच्या निवडणुकीत केशव गोविंद वळवी हे आरपीआयच्या तिकिटावर तळोजा अक्कलकुवा या मतदार संघातुन उभे होते. त्यावेळी नानासाहेबांनी त्या निवडणुकीत पोलिंग एजंटचेही काम केले. === 1.3] ठाणे येथे प्रयाण=== नानासाहेब जुन्या अकरावी नंतर 1963 साली शहरी जिवनाच्या आकर्षणापायी ठाणे जिल्हयातील कळवा येथे स्थलांतरीत झाले. 1964 साली नानासाहेब इंदिसे हे ठाणे जिल्हयातील वाडा तालुक्यात फॉरेस्ट खात्यात नोकरीस लागले.1965ला वसईतील गोखीवरा येथे नानासाहेब इंदिसे रहावयास गेले.1966ला नानासाहेब इंदिसे पुन्हा ठाणे येथील येऊरला येऊन स्थायिक झाले. === 1.4] भारतीय राजकरणात प्रवेश === वडिलांकडुनच बालपणा पासून राजकारणाचे धडे मिळाल्याने नानांचे मन नोकरीत रमेना आणि 1967ला त्यांनी नोकरीचा राजिनामा देऊन राजकिय चळवळीत पूर्णवेळ सक्रिय सहभाग घेतला.ऑक्टोंबर 1966ला कर्मविर दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना रा.सु.गवई हे विद्यमान आमदार होते 1968 साली रा.सु.गवई हे उपसभापती झाले.तेव्हापासून नानासाहेब इंदिसे यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सक्रिय कार्य मोठया उत्साहात भरारी घेत जोमाने चालले होते. === 1.5] ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच === 1971 साली आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत माजीवडा येथे नानासाहेब इंदिसे हे डेप्युटी सरपंच झाले.1978 साली नानासाहेब इंदिसे हे माजीवडा येथे ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच म्हणुनच राजकारणात कार्यरत होते.1979ला नानासाहेब इंदिसे माजीवडा पंचायत समितीच्या निवडणुकिस उभे राहिले परंतु त्यांना अपयश आले.1985च्या ठाणे बेलापुर विधानसभा मतदार संघातुन नानासाहेब इंदिसे यांना अपयशाला सामोरे जावे लागले. === 1.6 ठाणे महानगर्पालिकेवर निर्वाचित === 1988ला नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकितही अपयशाला सामोरे जावे लागले.1992 मध्ये नानासाहेब इंदिसे यांनी ठाणे महानगर पालिकेत निर्वाचीत यश संपादन केले. नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेने परिवहन समितीचे चेअरमनपद देऊन सन्मान केला.या काळात त्यांनी अनेक गरजुंना नोकरीस लावले.त्याचा फायदा डॉक्टर, शिक्षक,बालवाडी शिक्षक,आया,कंडक्टर,ड्रायव्हर, बिगारी, शिपाई, हेल्पर,सुशिक्षीत बेरोजगार आदींचा उदरनिर्वाहणार्थ रोजगार उपलब्ध करून देऊन या पदाचा योग्य उपयोग केला.1997च्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत नानासाहेब इंदिसे यांना पुन्हा एकदा अपयशाला सामोरे जावे लागले. === 1.7] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना  === 2000 सालापासून नानासाहेब इंदिसे हे कळत नकळत ऐक्याच्या भुमीकेवर ठाम राहिले.2009 मध्ये पुन्हा माजिवडा विधानसभा मतदार संघात नानासाहेब इंदिसे यांना अपयश पचवावा लागला.निवडुन न येण्याची कारणे मला माहित होती परंतु आंबेडकरी समाज इतरांच्या दावणीला बांधला जाऊ नये या उद्येशाने विधानसभा निवडणुका लढविल्या. तदनंतर आज पर्यंत रिपाइचे वेगवेगळया गटातटाचे राजकारण चालुच आहे.त्या नंतर रिपब्लिकन पार्टीची अशी अवस्था पाहुन निळया निशाणाखाली सर्वांचे ऐक्य व्हावे याच उद्येशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारांच्या प्रेरणेतुनच नानासाहेब इंदिसे यांनी 20 डिसेंबर 2008 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना केली.या मध्ये शिवराम मोघा,कुमारसेन बौद्ध,उत्तमराव खडसे,प्रल्हाद सोनवणे, दौलतराम आदी.निष्ठावंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतानुसार नानासाहेबांबरोबर सक्रिय कार्य करू लागले. पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन युगप्रवर्तक,विष्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभुमी महु (आंबेडकर नगर) येथे भरविण्यात आले.यामध्ये आंबेडकरी चळवळीतले बहुतांश नेते,कार्यकर्ते यांना निमंत्रीत करण्यात आले. == 2] विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी व ऐतिहासिक घडामोडींचा परामर्श == तत्पुर्वी विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी वऐतिहासिक घडामोडींचा परामर्श खालिलप्रमाणे 20/7/1924 रोजी बहिष्कृत हितकारीणी संस्था स्थापन केली.3/3/1927 रोजी समता सैनिक दल स्थापन केले 20/3/1927 रोजी महाडचा सत्याग्रह, 26/7/1927 रोजी अंबादेवी मंदिर सत्याग्रह, 14/6/1928ला भारतीय बहिष्कृतशिक्षण मंडळ स्थापले, 22/9/1929 रोजी पर्वती पुणे सत्याग्रह,2/3/1930ला काळाराम मंदिर सत्याग्रह,4/10/1930डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृष्यांचा प्रतिनिधी म्हणुन गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला रवाना,7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931ला दुस-या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांना स्वतंत्र मतदार संघावरून गांधी आंबेडकरांत तिव्र मतभेद,23/9/1931ला मुखेडचा सत्याग्रह केला.24 सप्टेंबर 1932 पुणे करार, जानेवारी 1933 तिस-या गोलमेज परिषदेहुन भारतात रवाना,1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट लागु.13/10/1935 येवले मुक्कामी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘मी जरी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही’’ही घोषणा केली.15/8/1936ला स्वतंत्र मजुर पक्ष स्थापन केला.1937 मुंबई विधिमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे डॉ.आंबेडकरांसहित 14 उमेदवार निवडुन आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी पक्ष नेते होते.तर सभागृह उपनेते आर.आर.भोळे होते. या मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे शामराव परूळेकर, करंदीकर,जमनादास मेहता,झाबवाला आदी खंदे सदस्य होते.मोठा पक्ष म्हणुन मुस्लिम लिग हा होता त्यांचे नेते सर देहलवी हे होते 12/2/1939 मोहाडी धुळे सत्याग्रह,2/7/1942ला प्रथमच एक अस्पृष्य केंद्रिय मंत्रीमंडळात मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेबांचा भारताच्या व्हाइसरॉय कार्यकारी मंडळात समावेश झाला.19/7/1942ला शेडयुल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली,27/7/1942ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मजुरमंत्रीपदाचा कारभार सोपविण्यात आला. 8/7/1945 पिपिल्स ऐज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.4/6/1946 पुणे कौन्सील मोर्चा सत्याग्रह,27/6/1946 सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना,19/7/1946डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगाल विधिमंडळातुन घटना समितीवर निवडुन आले. 3/9/1946ला नागपुर सत्याग्रह, 5/9/1946डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश पार्लमेंटच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये कॉन्झर्वेटीव्ह इंडियन कमिटी समोर पुणे करार रद्द करण्याची व ब्रिटिश सरकारचा जातिय निवाडा लागु करण्याची मागणी केली.11/12/1946डॉ.राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 2/3/1947ला लखनौ सत्याग्रह केला.15 मार्च 1947 बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘स्टेटस अॅन्ड मायनॉरिटीज’’हा ग्रंथ प्रकाशीत केला.29 एपिंल 1947 रोजी घटनेतुन अस्पृष्यता निवारण्याविषयी सतरावे कलम संमत केले. 22 जुलै 1947 रोजी भारतीय ध्वज समितीचे सदस्य म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतुन अशोक चक्रांकित तिरंगा झेडा राष्ट्रध्वज म्हणुन निश्चित केला.23 जुलै 1947डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवर निवड झाली.3/8/1947 भारताचे कायदा मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्रीमंडळात समावेश15ऑगष्टला1947 भारत स्वतंत्र झाला.30/8/1947ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड.26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान भारतास अर्पण,8 मे 1950 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणुन शपथ घेतली.26 जानेवारी 1950ला भारतीय प्रजासत्ताक दिन. या दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासारख्या खंडप्राय देशात राज्यघटनेद्वारे लोकभिमुख लोकशाही पेरली सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे महत्त्व पटवुन ‘‘एक व्यक्ती,एक मुल्य,एक मत’’ याचा सिद्धांत घटनेत मांडुन सर्वांना एका किंमतीत आणले,त्याच बरोबर न्याय,स्वातंत्र्य,समता मैत्रीबंधुत्व ही नितीतत्त्वे राज्य घटनेच्या माध्यमातुन लोकशाही बळकट होण्यासाठी रूजवली अन् भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. 5 फेब्रुवारी 1951डॉ..आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लोकसभेत मांडले.27 सप्टेंबर हिंदुकोड बिल फेटाळल्याच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा त्याग केला.5 जानेवारी 1952 मुंबई लोकसभेत अपयश9 मार्च 1952डॉ. आंबेडकरांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. मे 1954 भंडारा लोकसभेच्या राखीव मतदार संघातील पोटनिवडणुकित अपयश आले.1954ला भारतीय बौद्धमहासभेची स्थापना केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत खोती बिल, महार वतन बिल, हिंदुकोड बिल, मंत्र्यांचे वेतन बिल, लोकप्रतिनिधि बिल,कामगारांचे किमान वेतन बिल सादर केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 13ऑक्टोंबर 1935 साली येवले मुक्कामी हिंदुधर्म त्यागाची चळवळ हाती घेऊन केलेल्या भिष्मप्रतिज्ञेच्या अनुशंगाने21वर्षे सातत्याने सर्व धर्माचा अभ्यास केला.अभ्यासपुर्वक निर्णयातुन त्यांनी निसर्गनियमांना अनुसरून,विज्ञाणाचा आधार घेऊन,सत्य व वास्तव यांची सांगड घालुन सम्यक ज्ञानाची कसोटी घेऊन 14ऑक्टोंबर 1956 रोजी अशोक विजया दशमी दिनी नागपुर येथे भन्ते चंद्रमणी यांच्या कडुन स्वतः भारतातीलच असलेल्या बौद्ध धम्माची धम्मदिक्षा घेऊन आपल्या समवेत असलेल्या सुमारे पाच लक्ष अनुयायांना त्यानी स्वतः बौद्ध धम्माची दिक्षा दिली. 20 नोव्हेंबर 1956 रोजी काठमांडु येथे जागतिक बौद्ध महापरिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘बुद्ध की,कार्लमार्क्स’’या विषयावर भाषण केले असता बौद्ध महापरिषदेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ‘राजा इ मलाला’यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना‘‘बोधिसत्व’’हि पदवी तेथेच बहाल केली. 24 नोव्हेंबर 1956 रोजी सारनाथ, आग्रा आणि दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.25 नोव्हेंबर 1956 रोजी सकाळी काशी विद्यापिठातील विद्यार्थी व आचार्यगणांसमोरभाषण केले तर सायंकाळी बनारस येथे महाबोधी संस्थेच्या सभेत शेवटचे भाषण केले. ==3] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली == रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 8/9 डिसेंबर 1955 मध्ये औरंगाबाद येथील वास्तव्यात पहिल्यांदा बोलुन दाखविला होता. भारतीय राज्य घटना ख-याखु-या अर्थाने राबविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाला भाग पाडणे तसेच सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान राजकीय पक्षांचे एकीकरण करून प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्षाला प्रस्थापीत करणे हा रिपब्लिकन पक्षाचा उद्येश असल्याचे त्यांनी सांगीतले.(जनता -10 डिसेंबर 1955 ) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 29/30 सप्टेंबर 1956 रोजी 26,अलिपुर रोड दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी त्यांच्याच अध्यक्षतेखाली शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकीतशेकाफे बरखास्त करून ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’या नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला अन् रिपाइ अस्तित्वात आल्याची घोषणा समारोपाच्या भाषणात केली.ज्या मध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जातीविरहित,धर्मविहिन चळवळ चालवुन या देषात असणारी विभिन्न विषमता नष्ट करण्यासाठी आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्रांती घडवुन आणुन वर्गविहिन,जातीविहिन समाजव्यवस्था निर्माण करतील व समाजवादी व आर्थिक पूनर्रचना करतील अशी त्यांना अपेक्षा होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घोषीत केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची ‘‘हत्ती’’ ही निशाणी ठेवण्यामागची भूमिका काय होती हे देखील समजावुन घेणे महत्त्वाचे आहे.हत्ती हा महाकाय प्राणी असल्याने आणि माझा समाज हा अडाणी समाज असल्याने इतर निशाणी ओळखण्यापेक्षा महाकाय हत्तीची निशाणी त्यांना तत्काळ ओळखता यावी म्हणुनच ‘‘हत्ती’’या निशाणीची निवड केली. तसेच शेडयुल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष मर्यादीत व ठराविक जातीपुरताच असल्याने 1952च्या लोकसभेत अन् 1954च्या भंडारा मधील पोटनिवडणुकीत उच्चजातीयांनी जातीय मानसिकतेतुन शे.का.फे.ला एकटे पाडल्याने आलेल्याअपयशाच्या कारणमीमांसेने ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’प्रजासत्ताक पक्ष म्हणुन स्थापन करणे संदर्भी पक्षाची घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहुन काढली होती.या पक्षात भारतीय जनतेला सामील होण्यासाठी खुल्ले पत्रही लिहिले होते.त्यांना आपल्या या पक्षाला विशिष्ट जातीचे लेबल लावुन हा पक्ष चालवायचा नव्हता.यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत नमुद पक्षाची ध्येय,उद्यिष्ट व तत्त्वप्रणाली नमुद केलेली आपणास आढळुन येतील.भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे तीच भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या घटनेत समाविष्ट करून घटना बनविण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचा तत्त्वज्ञानात्मक आधार, पक्षाची ध्येय,उद्दिष्टे व कार्यक्रम तसेच पक्ष सुदृढतेच्या कसोटया याचे अध्ययन केल्यास हा पक्ष भारतात अस्तित्वात असलेल्या अन्य कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा सर्वच बाबतीत सरस आहे हे दिसुन येते. मात्र पक्षाच्या या वैशिष्ट्याचीशिकवण सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहचविण्यात रिपब्लिकन पक्षाचे नेते,विचारवंत,पक्षावियी सहानूभुती असलेले बुद्धीजिवी,लेखक, सामाजिक कार्यकर्ते कमी पडले असे खेदाने म्हणावेसे वाटते. दिनांक 29/30 सप्टेंबर 1956 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या बैठकीत 26 अलीपुर रोड दिल्ली येथील आपल्या राहत्या घरी केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीवादी, ब्राम्हणवादी आणि कम्युनिस्ट या तिन विचारधारांना नाकारून रिपब्लिकन नावाची निख्खळ लोकशाहीवादी चौथी राजकीय संकल्पना भारतीय राजकारणाच्या पटलावर निर्माण केली मात्र त्यांच्या घोषणेतील राजकीय कृती प्रत्यक्षात उतरविण्यापुर्विच त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दुर्देवाने परिनिर्वाण झाल्याने पक्ष स्थापनेसाठी रिपब्लिकन पार्टीचा निर्णय अस्तित्वात येऊ शकला नाही.. == 4] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा == रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा या विषयावर टाकलेल्या प्रकाशझोतात रिपाइ एक्याबाबतच्या अनेक घडामोडींचा नानासाहेबांनी घेतलेला परामर्श आपल्याला बरेचसेकाही सांगुन जातो बऱ्याच जणांना माहित असेल परंतु आजच्या पिढीला माहित व्हावे या उद्देशानेच त्याचे सिंहावलोकन करीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणा नंतर मुंबई मध्ये दादर येथील चैत्यभुमीवर त्यांचे अंतीम संस्कार करण्यात आले.सदर प्रसंगी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी बाबासाहेबांच्या चित्तेवर शपथ घेऊन समतेचा रथ पुढे नेईन परंतु तो तसुभरही मागे घेणार नाही. त्या प्रमाणे 29 डिसेंबर 1956 रोजी अहमदनगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची प्रेसीडियमची बैठक झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली.दुस-या फळीतील नेत्यांमध्ये नेतृत्वावरून अहमहमिका लागली.दलित चळवळीचे नेतृत्व आपल्याकडे यावे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होती.परंतु शिल्लक राहिलेले सर्वच नेते तुल्यबळ असल्याने बाबासाहेबांच्या समवेत असणारे दादासाहेब गायकवाड, राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, बी.सी.कांबळे आदी नेत्यांनी चतुराईतुन सामूहिक नेतृत्वाचा मार्ग काढुन 1 जाने 1957 रोजी आपले पहिले अध्यक्षीय मंडळ स्थापन केले 1957च्या सार्वत्रिक निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्याच नावाने लढण्याचा आग्रह होता.परंतु त्यावेळी मुंबईसह महाराष्ट्र यासाठी काँग्रेस खेरीज जनसंघासहीत सर्व आघाडीत होते.ही आघाडीही तत्कालीन शे.का.फे.चाच एक भाग होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने व रिपाइ नवीन पक्ष असल्याने नानासाहेब गोरे,प्र.के.अत्रे यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्त्व नसल्याने आणि ज्या काळात शे.का.फे. होता त्या काळात रिपाइ कळायला उशीर झाल्यामुळे तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हे लक्ष पूर्ण होणार नसल्याचे घटक पक्षाने कर्मविर दादासाहेब गायकवाडांकडे आग्रह धरला. शेवटी निर्णया अंती या समितीतील घटक पक्षांनी आपल्या पुर्वीच्याच शेकाफेच्या नावाने निवडणुका लढवाव्या असा निर्णय जाहिर केला.कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी शे.का.फे.च्या माध्यमातुन एकास एक उमेदवार राहिल अशी संयुक्त महाराष्ट्र कृती समितीने काळजी घ्यावी असे ठरवुन महाराष्ट्र कृतीसमितीशी आघाडी करून निवडणुकीस सामोरे गेले.त्या निवडणुकीत कृतीसमितीला घवघवीत यश मिळाले. कृती समिती महाराष्ट्रात सत्तेत आली नाही परंतु प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन उदयास आली असल्याने केंद्र सरकारला 1 मे 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यास भाग पाडले.1957च्या निवडणुकीत शे.का.फे.च्या नावाने 1)कर्मविर दादासाहेब गायकवाड - नाशिक लोकसभा मतदार संघ,2)अॅड.बी.सी.कांबळे - नगर,3)जी.के.माने - मुंबई, 4)हरिहर सोनुले - नांदेड,5) ह.भा.साळुंखे (33वर्षाचे सर्वात लहान)- भोर तालुका,6)दिघे -कोल्हापुर बहुजन समाज, 7)परमार - अहमदाबाद, 8) दत्ता कट्टी - कर्नाटक,चिकोडी मतदार संघ, 9)एन शिवराज - चेन्नई असे 9 खासदार आणि महाराराष्ट्रातुन बहुतांशी आमदार निवडुन आले आणि शेकाफे हा पक्ष देशात 1957 साली दोन नंबरचा पक्ष म्हणुन राहिला.त्यावेळेस गट नेते कर्मविर दादासाहेब गायकवाड होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपाइ लवकरात लवकर कार्यरत व्हावी अशी खंत डॉ.बाबासाहेबांच्या समकालीन नेत्यांच्या मनात होती. पावसाळयामुळे ही प्रक्रिया थांबली अन् 2ऑक्टोंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे बॅ.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आले. 3/10/1957च्या रिपाइ च्याराष्ट्रीयअध्यक्षपदासाठी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी महाराष्ट्र व्यतिरिक्त दुस-या प्रांतात हा पक्ष जावा म्हणुन एन.शिवराज यांचे नाव घोषीत केल्याने ते एकमताने निवडुन आले.14 मे 1959 रोजी बी.सी.कांबळे रिपाइतुन बाहेर पडुन त्यांनी दुरूस्त रिपब्लिकन पक्ष स्थापन केला.अन रिपाइच्या बेकीचे बीज तेथेच रूजले गेले.परंतु महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता बी.सी.कांबळे (बापुसाहेब कांबळे)संपूर्ण महाराष्ट्रात कोठेच चालले नाही.1960 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला निर्वाचन आयोगाकडुन मान्यता मिळाली.ऑक्टोंबर 1962ला पुन्हा रिपाइचे दुसरे ऐक्य झाले.या ऐक्यातुन एन.शिवराज,कर्मविर दादासाहेब गायकवाड,राजाभाऊ खोब्रागडे,बि.पी.मौर्य,भय्यासाहेब आंबेडकर, शांताबाई दाणी,इ. समकालीन नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाचा झंझावात देशात सुरू केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राश्ट्रिय अधिवेशने काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत झाली.30 सप्टेंबर 1964ला एन शिवराज यांचे दिल्ली येथील मोर्च्याच्या वेळी दादासाहेब गायकवाडांच्या निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले.तदनंतर ऑक्टो 1964 मध्ये कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी रिपाइचे बॅरीस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत अशा आषयाची सूचना मांडली परंतु समकालीन नेत्यांनी ही सूचना अमान्य करून कर्मविर दादासाहेब गायकवाडांचीच रिपाइचे राष्ट्रीयअध्यक्ष म्हणुन निवड केली. कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी 6 डिसेंबर 1964ला 14 कलमी डिमांड घेऊन भूमीहिन सत्याग्रह करण्याची घोषणा केली त्यात एक घोष वाक्य होते.‘‘कसेल त्याची जमिन,नसेल त्याचे काय ? राहिल त्याचे घर,नसेल त्याचे काय ?’’हा सत्याग्रह जवळपास दोन महिने चालला.देशभरात सुमारे 3 लाख 65 हजारांच्यावर लोक तुरूंगात गेले. तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी फेब्रुवारी महिन्यात शिष्टमंडळास पाचारण केले. त्या शिष्टमंडळात कर्मविर दादासाहेब गायकवाड,बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे,दत्ता कट्टी,अषोक निळे,रा.सु.गवई,अनसुमंतराव गायकवाड आदी नेते होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक अन् भुमीहिनांचा, झोपडपट्टयांचा प्रश्न आदी प्रश्न सोडवले जाऊन दिनांक 5 फेब्रुवारी 1965ला हा सत्याग्रह यशस्वी झाला. 1962 साली उत्तर प्रदेश मधुन रिपाइचे 3 खासदार निवडुन आले होते.पंजाब मध्ये अकाली दल आणि आरपीआयची पहिली सत्ता स्थापन झाली त्यामध्ये दोन मंत्री हे आरपीआयचे होते.1965 साली आरपीआय सत्तेत होती याचे कारण बी.पी.मौर्य,संघप्रिय गौतम आणि कादरखान हे तिन नेते बाबासाहेबांच्या विचाराच्या दिशेने प्रामाणिक काम करीत होते.या काळात उत्तरप्रदेशात आरपीआय आणि एस.व्हि.डी. यांचे सरकार होते.चैधरी चरणसिंग तेव्हा मुख्यंत्री झाले.त्या सरकार मध्येही आरपीआयचे तिन मंत्री होते. 1967 साली रिपब्लिकन पक्षाला चांगले मतदान मिळाले.काही राज्यात रिपब्लिकन पक्षाला मंत्रीमंडळात मिळालेले स्थान हे केवळ रिपब्लिकन पक्षाच्या मतसंख्येच्या आधारे मिळाले होते.मागणी न करता मंत्रीमंडळात रिपब्लिकन पक्षाच्या आमदारांना घेतले जात होते.इतका दबदबा या पक्षाचा होता.पंजाब राज्यात धानुलिया यांना कॅबिनेटमंत्री म्हणुन घेण्यात आले.उत्तरप्रदेश मध्ये एक कॅबिनेट मंत्री घेण्याऐवजी असरार अहमद आणि शमीम आलम या दोन आमदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आले.हा पक्ष केवळ बौद्धांपुरता मर्यादीत नव्हता तर या पक्षाचे मंत्री मुस्लिमही होते. बिहारमध्ये रिपब्लिकन पक्षाची एवढी ताकद होती की,तेथे लाल पासवान नावाचा एकच उमेदवार निवडुन आला असला तरी त्याला मंत्रीमंडळात स्थान देण्याशिवाय गत्यंतर नव्हते.महाराष्ट्राशिवाय उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार,हरियाना या उत्तर भारतीय राज्यात रिपब्लिकन पक्ष हा एक समर्थ पक्ष होता. .   ऑक्टो.1968ला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे रिपाइतुन बाहेर पडले अन् स्वतंत्र खोब्रागडे गटाची निर्मिती केली.कर्मविर दादासाहेब गायकवाडांना अर्धांगवायुचा झटका आल्याने 29 डिसेंबर 1971ला कर्मविर दादासाहेब गायकवाड यांचे निर्वाण झाले.1972 मध्ये कोल्हापुरातील बावडा गावात गवई बंधुंचे डोळे काढण्यात आले.त्यावेळेस डॉ.बाबासाहेबांची विचारधारा अन् नांव ऐकुन असलेले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपले उद्धारकर्ते असल्याचे समजत असतानाही युक्रांत समाजवाद्यांच्या (कम्युनिस्ट)चळवळीत प्रॅक्टिकल रितीने काम करणाऱ्यांनीच अन्याय अत्याचाराचे निमित्त साधुन कळत नकळत रिपाइला नेस्तनाबुत करण्यासाठी सर्वांच्या मदतीने दलितपॅंथर्सची निर्मिती केली.26 जाने 1974ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तिसरे ऐक्य झाले.सी.आर.मोघम, बॅ.राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, रा.सु.गवई, बी.सी.कांबळे,शांताबाई दाणी हे ऐक्यात सामील झाले. पहिले 35 लोकांचे ऐक्याचे प्रेसीडियम झाले.मुंबईत पहाटे चार वाजेपर्यंत वसाहतीत मिटींग चालु झाल्या.पहिल्या प्रेसीडियमची बैठक सी.आर.मोघम यांनी बंगलोर येथे बोलवली तर दुसरी अमरावतीत झाली दुस-या बैठकीतुन बॅ.राजाभाऊ खोब्रागडे अन् त्यांचे सहकारी भय्यासाहेब आंबेडकर,घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,दत्ता कट्टी हे बाहेर पडले.तदनंतर बापुसाहेब कांबळे हे देखील बाहेर पडल्याने सी.आर.मोघम,रा.सु.गवई,वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,आर.जी.खरात,शांताबाई दाणी,अॅड.बाजीराव कांबळे ऐवढेच रिपाइत शेष राहिले. वर्ष सहा महिन्याच्या आतच ही ऐक्य प्रक्रिया संपुष्टात आली. 1975च्या दरम्यान खोब्रागडे गटातुनही भय्यासाहेब आंबेडकर, घनश्याम तळवटकर, सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके,प्रा.रमाकांत यादव, हे बाहेर पडले.1976च्या दरम्यान शांताबाई दाणी व त्यांचे सहकारी भाऊसाहेब चव्हाण,दादासाहेब रोहम,हे रिपाइ तुन बाहेर पडले.अशा त-हेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची वाताहत झाली. दुर्देवाने 17/9/1977ला मुंबईच्या के.ई.एम.रूग्णालयात भय्यासाहेब आंबेडकरांची प्राणज्योत मालवली.1976 ते 1978 पर्यंत रिपाइचे गटातटाचे राजकारण चालुच होते.1978च्या हिवाळयात दादासाहेब रोहम,रा.सु.गवई समवेत एन.एस.कुभारे,व सी.आर.मोघम हे दिल्ली येथे आमरण उपोषणास बसले.1978च्या सरते शेवटी भारतीय दलित पॅंथर्सने रिपब्लिकन पक्षाच्या पुढा-यांस लक्ष अन् भक्ष ठरविले.भारतीय दलित पॅंथर्सचा गवगवा झाल्याने त्यांनी सवर्ण बहुजनांचा अर्वाचीत शिवराळ भाषेत उद्धार केला.आणि नामांतराचा लढा हाती घेतला.त्यांच्या बरोबरीने नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रिंसिपल पद न मिळाल्याने प्रा.जोगेंद्र कवाडे सरांनी लॉंग मार्च दलित मुक्ति सेना स्थापन केली.त्यांच्यातल्याच त्यांच्या अहमहमिकेतुन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पावसाळी अधिवेशनात नांमातराची घोषणा केली. निमित्त नामांतराचे होते परंतु सवर्ण बहुजनांना राग होता तो त्यांच्या शिवराळ भाषेचा अन् त्यामुळेच मराठवाडा दंगल पेटली. दंगलीत सबंध मराठवाडा पेटला त्यात 649 पेक्षाही जास्त मृतांचा शासनाचा आकडा होता.सबंध मराठवाडयात मातंग,बौद्ध समाजाच्या वसाहती जळाल्या.त्यात पोचीराम कांबळे सारख्या मातंग समाजाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरी अनुयायाच्या शरिराचे छिन्नविछिन्न तुकडे करण्यात आले तरीही शेवटच्या श्वासाच्या क्षणापर्यंत ‘जयभिम’चा नारा त्यांनी सोडला नाही. अष्याही परिस्थितीत भारतीय दलित पॅंथर्सला भावनिक चळवळ वाढवायचीच होती. मात्र छत्रपती शाहु महाराज,महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सिद्धांता नुसार रिपाइतील रा.सु.गवई,दादासाहेब रोहम यांनी सामाजिक भान ठेवुन आपले बौद्धिक कौशल्य पणाला लावुन सहा महिन्याच्या आतच मराठवाडयात जातीय सलोखा निर्माण करून पुर्ववत मराठवाडयातील दलित वस्त्या शासनाच्या मदतीने पुर्ववत केल्या.वसाहती वसवुन समझोताही केला.उद्धवस्त झालेले संसारही त्यांनी बसविले. 1983 -84च्या कालखंडात तत्कालीन महाराष्ट्र राज्य सेवेतील सिनिअरमोस्ट सनदी बुद्धिस्ट अधिकारी यांनी आणखी एक गट निर्माण केला.या वादळाला अकोला,पॅटर्न,नांदेड पॅटर्न असे संबोधु लागले.1984ला अकोल्यातुन भारीपचे प्रकाशराव आंबेडकर यांना निवडणुकित अपयश आले.9 सप्टेंबर 1984 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने निधन दिल्ली येथे झाले.दिनांक 18/19 जानेवारी 1985 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे ज्येष्ट सहकारी दत्ता कट्टी अन् त्यांचे सहकारी व रा.सु.गवई यांचे सहकारी म्हणजेच वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,पी.टी.मधाळे - माजी आमदार सांगली,खंडेराव सावंत -माजी आमदार सातारा,दादासाहेब रोहम -माजी आमदार संगमनेर नगर,दादासाहेबब शिर्के -कोल्हापुर, तसेच शांताबाई दाणी,अॅड. बाजीराव कांबळे -कर्जत सातारा,भाऊसाहेब चव्हाण,एम.डी.शेवाळे,के.बी.श्रृंगारे -नाशिक,देवीदास वाघपांजार -दर्यापुर अमरावती, नानासाहेब उर्फ गंगाराम इंदिसे,व्हि.बी.ससाणे - ठाणे,आदींचे 18/19 जानेवारीत नागपूरच्या आमदार निवासात ऐक्या संदर्भात म्हणजेच गवई व खोब्रागडे गटात बैठक झाली.त्या ऐक्यातुन दत्ताजी कट्टी अध्यक्ष अन् रा.सु.गवई कार्याध्यक्ष झाले. आणि 1985च्या मार्च महिन्यातील सार्वत्रिक विधान सभेच्या निवडणुकीस सामोरे जावे लागले. सहा महिन्यातच दत्ता कट्टी गेले अन् ऐक्य फुटले.सहा महिन्याच्या आतच या ऐक्यप्रक्रियेची फाटाफुट झाली परंतु देशातील बहुतांषी बॅरिस्टर राजाभाऊंना माननारा वर्ग हा दादासाहेब रोहम व रा.सु.गवई यांच्या बरोबरच राहिला.त्या ऐक्यप्रक्रियेतुन दत्ता कट्टी हे एकटे बाहेर फेकले गेले.घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके, प्रा.रमाकांत यादव हे दादासाहेब रोहम,रा.सु.गवई यांच्या सोबत राहिले. तदनंतर पुन्हा एकदा1995 साली रिपाइचे पाचवे ऐक्य झाले अन् चार खासदार संसदेत निवडुन आले.तेही ऐक्य लवकरच फूटले. 1988ला ऐन पावसाळयात रिडल्स प्रकरण घडले.6 डिसेंबर 1988ला रा.सु.गवईंनी दिल्ली येथील बोटक्लब वर लाक्षणीक अशा भव्य मोर्च्याचे आयोजन केले असता ‘न भूतो न भविष्यती अशामोर्च्यात सुमारे 6 ते 7 लक्ष अनुयायांनी सहभाग घेतला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष कर्मविर दादासाहेब गायकवाड ते एन.शिवराज यांच्या नंतर गल्ली ते घराघरा पर्यंत वाटला गेला.जो,तो उठतो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव अन् निळे निशाण घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुढे अबकड लावुन संघटना तयार करून पुढारपणाच्या नावाखाली आपल पुढारपण आणि आपल्या घराची व्यवस्था कशी होईल या प्रवृत्तीने वागायला लागले आहेत. त्यामुळे दिवसेगणिक आंबेडकरी जनतेवर, मायभगिनींनीवर, मागासवस्त्यांवर, अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत.अन्याय,अत्याचार झाल्यानंतर पुढारी अश्रु पुसावयास जातात परंतु त्यांचे मुळ शोधत नाहीत.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पने प्रमाणे ‘‘माझा समाज सत्तास्थानी व सत्ताधारी असला पाहिजे’’ या उलट आज पुढा-यांची दशा झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या संकल्पनेचा विसर पडुन ते आज शिवसेना,बि.जे.पी.चे स्वप्न साकार करावयास निघालेत या सारखी दुर्देवाची बाब कोणती ? मग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत अन् संकल्पना हे प्रात्यक्षिक वास्तव्यात आणावयाचे असेल तर आमच्या कार्यकर्त्यांनी‘‘नेता छोडो समाज जोडो !’’हे अभियान सुरू केले आहे.समाज जागृत आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरी विचारांशी एकनिष्ठ आहे.समाजात एकसंघ खंबीर नेतृत्व नसल्याने समाज दिषाहिन झालेला आहे.‘‘ नेत्यांचे ऐक्य करण्या ऐवजी समाजाचे ऐक्य व्हावे ’’ हाच खरा उद्येश असल्याने या पक्ष स्थापने मागची नानासाहेब इंदिसे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना रिपब्लिकन पक्ष एक व्हावा.हीच भूमिका पक्ष स्थापनेमागची होती आणि आजही त्या भुमिकेवर मी ठाम आहे.मला अध्यक्षपदाचा हव्यास मुळीच नाही.म्हणुनच मी कुमारसेन बौद्ध (दिल्ली) यांना अध्यक्ष केले होते.परंतु दुर्देवाने ते या कामी सपशेल अपयशी ठरले.ऐक्यासाठी मी आर.पी.आय.नेते रामदासजी आठवले,प्रा.जोगेंद्र कवाडे सर,बाळासाहेब आंबेडकर,व इतरही लहाणमोठया गटनेत्यीशी बोललो चर्चा केल्या परंतु त्यातुन ऐक्य काही घडुन आले नाही.मी आठवले व कवाडे सरांना दिल्ली येथील बैठकीत सांगीतले निदान तिघे तरी आपण प्रथम एकत्रित येऊ परंतु तांत्रिक कारणे पुढे करून या नेत्यांनी या ऐक्याला फाटा दिला.मी नामवंत आंबेडकरी कलावंत यांच्या माध्यमातुन नागपूर,पुणे,भिमा कोरेगांव, महाड,मुंबई,ठाणे,औरंगाबाद,दिल्ली,अहमदाबाद,सुरत,बडोदा इत्यादी शहरांमध्ये मेळावे आयोजीत करून जनतेला हाक दिली.जनतेलाही ऐक्य हवे आहेपरंतु जनतेत नेत्यांचीच विश्वासार्हता कमी झालेली आहे.कारण अनेक वेळा ऐक्यफुटणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले उद्यिष्ट साध्य करता आले नाही.याची खंत माझ्या सहित देशातील तमाम आंबेडकरी समाजाला आहे.आम्ही एकत्रित आलो तर बहुजन समाजही आमचे बरोबर एकत्रित येईल.तसा विश्वास त्यांच्यात निर्माण करता येईल.मी आशावादी आहे आणि निश्चयी सुद्धा आहे.म्हणुन मला आशा आहे की एक दिवस इतर पक्षाच्या चाक-या सोडुन नेते नक्कीच एकत्र येतील.तेव्हाएका डोळयात बुद्धांची शांती तर दुस-या डोळयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भिमक्रांती तेवत ठेवा.तसेच बुद्धधम्माचे अन् बावीस प्रतिज्ञांचे पालन करून बुद्धविहारात एकत्रित बसुन लोकशाही प्रमाणे आम्हास या देशाची शासनकर्ती जमात बनावयास पाहीजे असा आपण सम्यक संकल्प केला पाहिजे. आपण सर्व मैत्रीबंधुभावनेने एकदिलाने,एकविचाराने प्रज्ञारूपी सूर्याचे सूर्यकिरणे बनुन या महामानवाने बदललेल्या इतिहासाला साक्षी ठेवुन या भारत देशात परिवर्तन घडवुन आणु अन् आपल्या हाताच्या ओंजळीनेच पाणी पिऊ.आपण आपल्याच ऐक्याच्या कर्तुत्वाने उजाळु अन् शासनकर्ती जमात बनु तेव्हाच ख-या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची,राज्यघटनेची आणि भारत देषाची महती जगाला कळेल.हाच खरा कोटी-कोटी प्रणाम महापुरूष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांस आपल्या सर्वांच्यांच निश्चयातुन लाभेल. . - नानासाहेब इंदिसे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी !!! जयभिम !!! [[वर्ग:आंबेडकरवादी राजकीय पक्ष]] [[वर्ग:भारतीय रिपब्लिकन पक्ष]] g6s73cl0jdsmrdtkoqbqjmt8ple5ykc 2581352 2581338 2025-06-20T16:15:52Z 2409:40C2:104A:F6B3:8000:0:0:0 /* 4] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा */ 2581352 wikitext text/x-wiki {{बदल}} == रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे == ==1]विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला राजकीय पक्ष == ===1.1] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी === पोलिंग एजंट ते डेप्युटी सरपंच व डेप्युटी सरपंच ते नगरसेवक आणि नगर सेवक ते राष्ट्रीय नेता अशा आपल्या जीवनयापनाच्या प्रवासातील भारतातील राजकारणातील विविध भूमिका बजावणा-या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय नेते गंगाराम इंदिसे उर्फ नानासाहेब इंदिसे होय. विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारानुसार नानासाहेब इंदिसे यांनी घेतलेला युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा,तसेच भारतीय राजकारणातील रिपब्लिकन पार्टी आफॅ इंडियावर टाकलेला प्रकाशझोत === 1.2] नानासाहेब इंदिसे यांचे बालपण === रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय नेते नानासाहेब इंदिसे यांचा जन्म दिनांक 5/3/1942 साली धुळे जिल्हयातील तळोजा तालुक्यातील प्रतापपुर येथे झाला.त्यांचे वडील दोधा कृष्णा इंदिसे हे 1952 साली शे.का.फे.चे पुर्वीच्या खानदेश नंतरचा धुळे आणि आत्ताच्या नंदुरबार जिल्हयातल्या तळोजा या तालुक्याचे तालुका अध्यक्ष होते.त्याकाळी षे.का.फे अन् प्रजासमाजवादीचे अशोक मेहता हे होते.तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणुन अण्णासाहेब नहनकर हे देखील धुळयाचेच होते. 1952 सालच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत नानांचे वय अवघे 10वर्षे होते.परंतु हत्ती अन् वडाचे झाड या निवडणुकितील दोन निशाणी त्यांना राजकारणाचेच धडे देत होते.त्यातच नानांचे पाय राजकारणात ओढले गेले. त्या सार्वत्रिक निवडणुकितुनच बालपणीच त्यांना राजकारणाचे बालकडु चाखावयास मिळाले.वडिल व्यापारी व शेतकरी असल्याने वडिलांबरोबरच त्यांचा सतत रहिवास असल्याने व्यापारानिमित्त वडिलांबरोबरच तेही बैलगाडी अथवा घोडयावरून शहरात जात असत.त्यामुळे त्यांचे शहराविषयी आकर्षण आणखीणच वाढले.1962 साली विधानसभेच्या निवडणुकीत केशव गोविंद वळवी हे आरपीआयच्या तिकिटावर तळोजा अक्कलकुवा या मतदार संघातुन उभे होते. त्यावेळी नानासाहेबांनी त्या निवडणुकीत पोलिंग एजंटचेही काम केले. === 1.3] ठाणे येथे प्रयाण=== नानासाहेब जुन्या अकरावी नंतर 1963 साली शहरी जिवनाच्या आकर्षणापायी ठाणे जिल्हयातील कळवा येथे स्थलांतरीत झाले. 1964 साली नानासाहेब इंदिसे हे ठाणे जिल्हयातील वाडा तालुक्यात फॉरेस्ट खात्यात नोकरीस लागले.1965ला वसईतील गोखीवरा येथे नानासाहेब इंदिसे रहावयास गेले.1966ला नानासाहेब इंदिसे पुन्हा ठाणे येथील येऊरला येऊन स्थायिक झाले. === 1.4] भारतीय राजकरणात प्रवेश === वडिलांकडुनच बालपणा पासून राजकारणाचे धडे मिळाल्याने नानांचे मन नोकरीत रमेना आणि 1967ला त्यांनी नोकरीचा राजिनामा देऊन राजकिय चळवळीत पूर्णवेळ सक्रिय सहभाग घेतला.ऑक्टोंबर 1966ला कर्मविर दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना रा.सु.गवई हे विद्यमान आमदार होते 1968 साली रा.सु.गवई हे उपसभापती झाले.तेव्हापासून नानासाहेब इंदिसे यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सक्रिय कार्य मोठया उत्साहात भरारी घेत जोमाने चालले होते. === 1.5] ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच === 1971 साली आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत माजीवडा येथे नानासाहेब इंदिसे हे डेप्युटी सरपंच झाले.1978 साली नानासाहेब इंदिसे हे माजीवडा येथे ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच म्हणुनच राजकारणात कार्यरत होते.1979ला नानासाहेब इंदिसे माजीवडा पंचायत समितीच्या निवडणुकिस उभे राहिले परंतु त्यांना अपयश आले.1985च्या ठाणे बेलापुर विधानसभा मतदार संघातुन नानासाहेब इंदिसे यांना अपयशाला सामोरे जावे लागले. === 1.6 ठाणे महानगर्पालिकेवर निर्वाचित === 1988ला नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकितही अपयशाला सामोरे जावे लागले.1992 मध्ये नानासाहेब इंदिसे यांनी ठाणे महानगर पालिकेत निर्वाचीत यश संपादन केले. नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेने परिवहन समितीचे चेअरमनपद देऊन सन्मान केला.या काळात त्यांनी अनेक गरजुंना नोकरीस लावले.त्याचा फायदा डॉक्टर, शिक्षक,बालवाडी शिक्षक,आया,कंडक्टर,ड्रायव्हर, बिगारी, शिपाई, हेल्पर,सुशिक्षीत बेरोजगार आदींचा उदरनिर्वाहणार्थ रोजगार उपलब्ध करून देऊन या पदाचा योग्य उपयोग केला.1997च्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत नानासाहेब इंदिसे यांना पुन्हा एकदा अपयशाला सामोरे जावे लागले. === 1.7] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना  === 2000 सालापासून नानासाहेब इंदिसे हे कळत नकळत ऐक्याच्या भुमीकेवर ठाम राहिले.2009 मध्ये पुन्हा माजिवडा विधानसभा मतदार संघात नानासाहेब इंदिसे यांना अपयश पचवावा लागला.निवडुन न येण्याची कारणे मला माहित होती परंतु आंबेडकरी समाज इतरांच्या दावणीला बांधला जाऊ नये या उद्येशाने विधानसभा निवडणुका लढविल्या. तदनंतर आज पर्यंत रिपाइचे वेगवेगळया गटातटाचे राजकारण चालुच आहे.त्या नंतर रिपब्लिकन पार्टीची अशी अवस्था पाहुन निळया निशाणाखाली सर्वांचे ऐक्य व्हावे याच उद्येशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारांच्या प्रेरणेतुनच नानासाहेब इंदिसे यांनी 20 डिसेंबर 2008 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना केली.या मध्ये शिवराम मोघा,कुमारसेन बौद्ध,उत्तमराव खडसे,प्रल्हाद सोनवणे, दौलतराम आदी.निष्ठावंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतानुसार नानासाहेबांबरोबर सक्रिय कार्य करू लागले. पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन युगप्रवर्तक,विष्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभुमी महु (आंबेडकर नगर) येथे भरविण्यात आले.यामध्ये आंबेडकरी चळवळीतले बहुतांश नेते,कार्यकर्ते यांना निमंत्रीत करण्यात आले. == 2] विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी व ऐतिहासिक घडामोडींचा परामर्श == तत्पुर्वी विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी वऐतिहासिक घडामोडींचा परामर्श खालिलप्रमाणे 20/7/1924 रोजी बहिष्कृत हितकारीणी संस्था स्थापन केली.3/3/1927 रोजी समता सैनिक दल स्थापन केले 20/3/1927 रोजी महाडचा सत्याग्रह, 26/7/1927 रोजी अंबादेवी मंदिर सत्याग्रह, 14/6/1928ला भारतीय बहिष्कृतशिक्षण मंडळ स्थापले, 22/9/1929 रोजी पर्वती पुणे सत्याग्रह,2/3/1930ला काळाराम मंदिर सत्याग्रह,4/10/1930डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृष्यांचा प्रतिनिधी म्हणुन गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला रवाना,7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931ला दुस-या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांना स्वतंत्र मतदार संघावरून गांधी आंबेडकरांत तिव्र मतभेद,23/9/1931ला मुखेडचा सत्याग्रह केला.24 सप्टेंबर 1932 पुणे करार, जानेवारी 1933 तिस-या गोलमेज परिषदेहुन भारतात रवाना,1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट लागु.13/10/1935 येवले मुक्कामी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘मी जरी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही’’ही घोषणा केली.15/8/1936ला स्वतंत्र मजुर पक्ष स्थापन केला.1937 मुंबई विधिमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे डॉ.आंबेडकरांसहित 14 उमेदवार निवडुन आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी पक्ष नेते होते.तर सभागृह उपनेते आर.आर.भोळे होते. या मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे शामराव परूळेकर, करंदीकर,जमनादास मेहता,झाबवाला आदी खंदे सदस्य होते.मोठा पक्ष म्हणुन मुस्लिम लिग हा होता त्यांचे नेते सर देहलवी हे होते 12/2/1939 मोहाडी धुळे सत्याग्रह,2/7/1942ला प्रथमच एक अस्पृष्य केंद्रिय मंत्रीमंडळात मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेबांचा भारताच्या व्हाइसरॉय कार्यकारी मंडळात समावेश झाला.19/7/1942ला शेडयुल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली,27/7/1942ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मजुरमंत्रीपदाचा कारभार सोपविण्यात आला. 8/7/1945 पिपिल्स ऐज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.4/6/1946 पुणे कौन्सील मोर्चा सत्याग्रह,27/6/1946 सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना,19/7/1946डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगाल विधिमंडळातुन घटना समितीवर निवडुन आले. 3/9/1946ला नागपुर सत्याग्रह, 5/9/1946डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश पार्लमेंटच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये कॉन्झर्वेटीव्ह इंडियन कमिटी समोर पुणे करार रद्द करण्याची व ब्रिटिश सरकारचा जातिय निवाडा लागु करण्याची मागणी केली.11/12/1946डॉ.राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 2/3/1947ला लखनौ सत्याग्रह केला.15 मार्च 1947 बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘स्टेटस अॅन्ड मायनॉरिटीज’’हा ग्रंथ प्रकाशीत केला.29 एपिंल 1947 रोजी घटनेतुन अस्पृष्यता निवारण्याविषयी सतरावे कलम संमत केले. 22 जुलै 1947 रोजी भारतीय ध्वज समितीचे सदस्य म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतुन अशोक चक्रांकित तिरंगा झेडा राष्ट्रध्वज म्हणुन निश्चित केला.23 जुलै 1947डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवर निवड झाली.3/8/1947 भारताचे कायदा मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्रीमंडळात समावेश15ऑगष्टला1947 भारत स्वतंत्र झाला.30/8/1947ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड.26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान भारतास अर्पण,8 मे 1950 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणुन शपथ घेतली.26 जानेवारी 1950ला भारतीय प्रजासत्ताक दिन. या दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासारख्या खंडप्राय देशात राज्यघटनेद्वारे लोकभिमुख लोकशाही पेरली सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे महत्त्व पटवुन ‘‘एक व्यक्ती,एक मुल्य,एक मत’’ याचा सिद्धांत घटनेत मांडुन सर्वांना एका किंमतीत आणले,त्याच बरोबर न्याय,स्वातंत्र्य,समता मैत्रीबंधुत्व ही नितीतत्त्वे राज्य घटनेच्या माध्यमातुन लोकशाही बळकट होण्यासाठी रूजवली अन् भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. 5 फेब्रुवारी 1951डॉ..आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लोकसभेत मांडले.27 सप्टेंबर हिंदुकोड बिल फेटाळल्याच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा त्याग केला.5 जानेवारी 1952 मुंबई लोकसभेत अपयश9 मार्च 1952डॉ. आंबेडकरांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. मे 1954 भंडारा लोकसभेच्या राखीव मतदार संघातील पोटनिवडणुकित अपयश आले.1954ला भारतीय बौद्धमहासभेची स्थापना केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत खोती बिल, महार वतन बिल, हिंदुकोड बिल, मंत्र्यांचे वेतन बिल, लोकप्रतिनिधि बिल,कामगारांचे किमान वेतन बिल सादर केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 13ऑक्टोंबर 1935 साली येवले मुक्कामी हिंदुधर्म त्यागाची चळवळ हाती घेऊन केलेल्या भिष्मप्रतिज्ञेच्या अनुशंगाने21वर्षे सातत्याने सर्व धर्माचा अभ्यास केला.अभ्यासपुर्वक निर्णयातुन त्यांनी निसर्गनियमांना अनुसरून,विज्ञाणाचा आधार घेऊन,सत्य व वास्तव यांची सांगड घालुन सम्यक ज्ञानाची कसोटी घेऊन 14ऑक्टोंबर 1956 रोजी अशोक विजया दशमी दिनी नागपुर येथे भन्ते चंद्रमणी यांच्या कडुन स्वतः भारतातीलच असलेल्या बौद्ध धम्माची धम्मदिक्षा घेऊन आपल्या समवेत असलेल्या सुमारे पाच लक्ष अनुयायांना त्यानी स्वतः बौद्ध धम्माची दिक्षा दिली. 20 नोव्हेंबर 1956 रोजी काठमांडु येथे जागतिक बौद्ध महापरिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘बुद्ध की,कार्लमार्क्स’’या विषयावर भाषण केले असता बौद्ध महापरिषदेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ‘राजा इ मलाला’यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना‘‘बोधिसत्व’’हि पदवी तेथेच बहाल केली. 24 नोव्हेंबर 1956 रोजी सारनाथ, आग्रा आणि दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.25 नोव्हेंबर 1956 रोजी सकाळी काशी विद्यापिठातील विद्यार्थी व आचार्यगणांसमोरभाषण केले तर सायंकाळी बनारस येथे महाबोधी संस्थेच्या सभेत शेवटचे भाषण केले. ==3] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली == रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 8/9 डिसेंबर 1955 मध्ये औरंगाबाद येथील वास्तव्यात पहिल्यांदा बोलुन दाखविला होता. भारतीय राज्य घटना ख-याखु-या अर्थाने राबविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाला भाग पाडणे तसेच सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान राजकीय पक्षांचे एकीकरण करून प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्षाला प्रस्थापीत करणे हा रिपब्लिकन पक्षाचा उद्येश असल्याचे त्यांनी सांगीतले.(जनता -10 डिसेंबर 1955 ) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 29/30 सप्टेंबर 1956 रोजी 26,अलिपुर रोड दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी त्यांच्याच अध्यक्षतेखाली शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकीतशेकाफे बरखास्त करून ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’या नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला अन् रिपाइ अस्तित्वात आल्याची घोषणा समारोपाच्या भाषणात केली.ज्या मध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जातीविरहित,धर्मविहिन चळवळ चालवुन या देषात असणारी विभिन्न विषमता नष्ट करण्यासाठी आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्रांती घडवुन आणुन वर्गविहिन,जातीविहिन समाजव्यवस्था निर्माण करतील व समाजवादी व आर्थिक पूनर्रचना करतील अशी त्यांना अपेक्षा होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घोषीत केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची ‘‘हत्ती’’ ही निशाणी ठेवण्यामागची भूमिका काय होती हे देखील समजावुन घेणे महत्त्वाचे आहे.हत्ती हा महाकाय प्राणी असल्याने आणि माझा समाज हा अडाणी समाज असल्याने इतर निशाणी ओळखण्यापेक्षा महाकाय हत्तीची निशाणी त्यांना तत्काळ ओळखता यावी म्हणुनच ‘‘हत्ती’’या निशाणीची निवड केली. तसेच शेडयुल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष मर्यादीत व ठराविक जातीपुरताच असल्याने 1952च्या लोकसभेत अन् 1954च्या भंडारा मधील पोटनिवडणुकीत उच्चजातीयांनी जातीय मानसिकतेतुन शे.का.फे.ला एकटे पाडल्याने आलेल्याअपयशाच्या कारणमीमांसेने ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’प्रजासत्ताक पक्ष म्हणुन स्थापन करणे संदर्भी पक्षाची घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहुन काढली होती.या पक्षात भारतीय जनतेला सामील होण्यासाठी खुल्ले पत्रही लिहिले होते.त्यांना आपल्या या पक्षाला विशिष्ट जातीचे लेबल लावुन हा पक्ष चालवायचा नव्हता.यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत नमुद पक्षाची ध्येय,उद्यिष्ट व तत्त्वप्रणाली नमुद केलेली आपणास आढळुन येतील.भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे तीच भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या घटनेत समाविष्ट करून घटना बनविण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचा तत्त्वज्ञानात्मक आधार, पक्षाची ध्येय,उद्दिष्टे व कार्यक्रम तसेच पक्ष सुदृढतेच्या कसोटया याचे अध्ययन केल्यास हा पक्ष भारतात अस्तित्वात असलेल्या अन्य कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा सर्वच बाबतीत सरस आहे हे दिसुन येते. मात्र पक्षाच्या या वैशिष्ट्याचीशिकवण सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहचविण्यात रिपब्लिकन पक्षाचे नेते,विचारवंत,पक्षावियी सहानूभुती असलेले बुद्धीजिवी,लेखक, सामाजिक कार्यकर्ते कमी पडले असे खेदाने म्हणावेसे वाटते. दिनांक 29/30 सप्टेंबर 1956 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या बैठकीत 26 अलीपुर रोड दिल्ली येथील आपल्या राहत्या घरी केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीवादी, ब्राम्हणवादी आणि कम्युनिस्ट या तिन विचारधारांना नाकारून रिपब्लिकन नावाची निख्खळ लोकशाहीवादी चौथी राजकीय संकल्पना भारतीय राजकारणाच्या पटलावर निर्माण केली मात्र त्यांच्या घोषणेतील राजकीय कृती प्रत्यक्षात उतरविण्यापुर्विच त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दुर्देवाने परिनिर्वाण झाल्याने पक्ष स्थापनेसाठी रिपब्लिकन पार्टीचा निर्णय अस्तित्वात येऊ शकला नाही.. == 4] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा == रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा या विषयावर टाकलेल्या प्रकाशझोतात रिपाइ एक्याबाबतच्या अनेक घडामोडींचा नानासाहेबांनी घेतलेला परामर्श आपल्याला बरेचसेकाही सांगुन जातो बऱ्याच जणांना माहित असेल परंतु आजच्या पिढीला माहित व्हावे या उद्देशानेच त्याचे सिंहावलोकन करीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणा नंतर मुंबई मध्ये दादर येथील चैत्यभुमीवर त्यांचे अंतीम संस्कार करण्यात आले.सदर प्रसंगी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी बाबासाहेबांच्या चित्तेवर शपथ घेऊन समतेचा रथ पुढे नेईन परंतु तो तसुभरही मागे घेणार नाही. त्या प्रमाणे 29 डिसेंबर 1956 रोजी अहमदनगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची प्रेसीडियमची बैठक झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली.दुस-या फळीतील नेत्यांमध्ये नेतृत्वावरून अहमहमिका लागली.दलित चळवळीचे नेतृत्व आपल्याकडे यावे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होती.परंतु शिल्लक राहिलेले सर्वच नेते तुल्यबळ असल्याने बाबासाहेबांच्या समवेत असणारे दादासाहेब गायकवाड, राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, बी.सी.कांबळे आदी नेत्यांनी चतुराईतुन सामूहिक नेतृत्वाचा मार्ग काढुन 1 जाने 1957 रोजी आपले पहिले अध्यक्षीय मंडळ स्थापन केले 1957च्या सार्वत्रिक निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्याच नावाने लढण्याचा आग्रह होता.परंतु त्यावेळी मुंबईसह महाराष्ट्र यासाठी काँग्रेस खेरीज जनसंघासहीत सर्व आघाडीत होते.ही आघाडीही तत्कालीन शे.का.फे.चाच एक भाग होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने व रिपाइ नवीन पक्ष असल्याने नानासाहेब गोरे,प्र.के.अत्रे यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्त्व नसल्याने आणि ज्या काळात शे.का.फे. होता त्या काळात रिपाइ कळायला उशीर झाल्यामुळे तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हे लक्ष पूर्ण होणार नसल्याचे घटक पक्षाने कर्मविर दादासाहेब गायकवाडांकडे आग्रह धरला. शेवटी निर्णया अंती या समितीतील घटक पक्षांनी आपल्या पुर्वीच्याच शेकाफेच्या नावाने निवडणुका लढवाव्या असा निर्णय जाहिर केला.कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी शे.का.फे.च्या माध्यमातुन एकास एक उमेदवार राहिल अशी संयुक्त महाराष्ट्र कृती समितीने काळजी घ्यावी असे ठरवुन महाराष्ट्र कृतीसमितीशी आघाडी करून निवडणुकीस सामोरे गेले.त्या निवडणुकीत कृतीसमितीला घवघवीत यश मिळाले. कृती समिती महाराष्ट्रात सत्तेत आली नाही परंतु प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन उदयास आली असल्याने केंद्र सरकारला 1 मे 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यास भाग पाडले.1957च्या निवडणुकीत शे.का.फे.च्या नावाने 1)कर्मविर दादासाहेब गायकवाड - नाशिक लोकसभा मतदार संघ,2)अॅड.बी.सी.कांबळे - नगर,3)जी.के.माने - मुंबई, 4)हरिहर सोनुले - नांदेड,5) ह.भा.साळुंखे (33वर्षाचे सर्वात लहान)- भोर तालुका,6)दिघे -कोल्हापुर बहुजन समाज, 7)परमार - अहमदाबाद, 8) दत्ता कट्टी - कर्नाटक,चिकोडी मतदार संघ, 9)एन शिवराज - चेन्नई असे 9 खासदार आणि महाराराष्ट्रातुन बहुतांशी आमदार निवडुन आले आणि शेकाफे हा पक्ष देशात 1957 साली दोन नंबरचा पक्ष म्हणुन राहिला.त्यावेळेस गट नेते कर्मविर दादासाहेब गायकवाड होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपाइ लवकरात लवकर कार्यरत व्हावी अशी खंत डॉ.बाबासाहेबांच्या समकालीन नेत्यांच्या मनात होती. पावसाळयामुळे ही प्रक्रिया थांबली अन् 2ऑक्टोंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे बॅ.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आले. 3/10/1957च्या रिपाइ च्याराष्ट्रीयअध्यक्षपदासाठी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी महाराष्ट्र व्यतिरिक्त दुस-या प्रांतात हा पक्ष जावा म्हणुन एन.शिवराज यांचे नाव घोषीत केल्याने ते एकमताने निवडुन आले.14 मे 1959 रोजी बी.सी.कांबळे रिपाइतुन बाहेर पडुन त्यांनी दुरूस्त रिपब्लिकन पक्ष स्थापन केला.अन रिपाइच्या बेकीचे बीज तेथेच रूजले गेले.परंतु महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता बी.सी.कांबळे (बापुसाहेब कांबळे)संपूर्ण महाराष्ट्रात कोठेच चालले नाही.1960 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला निर्वाचन आयोगाकडुन मान्यता मिळाली.ऑक्टोंबर 1962ला पुन्हा रिपाइचे दुसरे ऐक्य झाले.या ऐक्यातुन एन.शिवराज,कर्मविर दादासाहेब गायकवाड,राजाभाऊ खोब्रागडे,बि.पी.मौर्य,भय्यासाहेब आंबेडकर, शांताबाई दाणी,इ. समकालीन नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाचा झंझावात देशात सुरू केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राश्ट्रिय अधिवेशने काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत झाली.30 सप्टेंबर 1964ला एन शिवराज यांचे दिल्ली येथील मोर्च्याच्या वेळी दादासाहेब गायकवाडांच्या निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले.तदनंतर ऑक्टो 1964 मध्ये कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी रिपाइचे बॅरीस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत अशा आषयाची सूचना मांडली परंतु समकालीन नेत्यांनी ही सूचना अमान्य करून कर्मविर दादासाहेब गायकवाडांचीच रिपाइचे राष्ट्रीयअध्यक्ष म्हणुन निवड केली. कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी 6 डिसेंबर 1964ला 14 कलमी डिमांड घेऊन भूमीहिन सत्याग्रह करण्याची घोषणा केली त्यात एक घोष वाक्य होते.‘‘कसेल त्याची जमिन,नसेल त्याचे काय ? राहिल त्याचे घर,नसेल त्याचे काय ?’’हा सत्याग्रह जवळपास दोन महिने चालला.देशभरात सुमारे 3 लाख 65 हजारांच्यावर लोक तुरूंगात गेले. तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी फेब्रुवारी महिन्यात शिष्टमंडळास पाचारण केले. त्या शिष्टमंडळात कर्मविर दादासाहेब गायकवाड,बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे,दत्ता कट्टी,अषोक निळे,रा.सु.गवई,अनसुमंतराव गायकवाड आदी नेते होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक अन् भुमीहिनांचा, झोपडपट्टयांचा प्रश्न आदी प्रश्न सोडवले जाऊन दिनांक 5 फेब्रुवारी 1965ला हा सत्याग्रह यशस्वी झाला. 1962 साली उत्तर प्रदेश मधुन रिपाइचे 3 खासदार निवडुन आले होते.पंजाब मध्ये अकाली दल आणि आरपीआयची पहिली सत्ता स्थापन झाली त्यामध्ये दोन मंत्री हे आरपीआयचे होते.1965 साली आरपीआय सत्तेत होती याचे कारण बी.पी.मौर्य,संघप्रिय गौतम आणि कादरखान हे तिन नेते बाबासाहेबांच्या विचाराच्या दिशेने प्रामाणिक काम करीत होते.या काळात उत्तरप्रदेशात आरपीआय आणि एस.व्हि.डी. यांचे सरकार होते.चैधरी चरणसिंग तेव्हा मुख्यंत्री झाले.त्या सरकार मध्येही आरपीआयचे तिन मंत्री होते. 1967 साली रिपब्लिकन पक्षाला चांगले मतदान मिळाले.काही राज्यात रिपब्लिकन पक्षाला मंत्रीमंडळात मिळालेले स्थान हे केवळ रिपब्लिकन पक्षाच्या मतसंख्येच्या आधारे मिळाले होते.मागणी न करता मंत्रीमंडळात रिपब्लिकन पक्षाच्या आमदारांना घेतले जात होते.इतका दबदबा या पक्षाचा होता.पंजाब राज्यात धानुलिया यांना कॅबिनेटमंत्री म्हणुन घेण्यात आले.उत्तरप्रदेश मध्ये एक कॅबिनेट मंत्री घेण्याऐवजी असरार अहमद आणि शमीम आलम या दोन आमदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आले.हा पक्ष केवळ बौद्धांपुरता मर्यादीत नव्हता तर या पक्षाचे मंत्री मुस्लिमही होते. बिहारमध्ये रिपब्लिकन पक्षाची एवढी ताकद होती की,तेथे लाल पासवान नावाचा एकच उमेदवार निवडुन आला असला तरी त्याला मंत्रीमंडळात स्थान देण्याशिवाय गत्यंतर नव्हते.महाराष्ट्राशिवाय उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार,हरियाना या उत्तर भारतीय राज्यात रिपब्लिकन पक्ष हा एक समर्थ पक्ष होता. .   ऑक्टो.1968ला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे रिपाइतुन बाहेर पडले अन् स्वतंत्र खोब्रागडे गटाची निर्मिती केली.कर्मविर दादासाहेब गायकवाडांना अर्धांगवायुचा झटका आल्याने 29 डिसेंबर 1971ला कर्मविर दादासाहेब गायकवाड यांचे निर्वाण झाले.1972 मध्ये कोल्हापुरातील बावडा गावात गवई बंधुंचे डोळे काढण्यात आले.त्यावेळेस डॉ.बाबासाहेबांची विचारधारा अन् नांव ऐकुन असलेले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपले उद्धारकर्ते असल्याचे समजत असतानाही युक्रांत समाजवाद्यांच्या (कम्युनिस्ट)चळवळीत प्रॅक्टिकल रितीने काम करणाऱ्यांनीच अन्याय अत्याचाराचे निमित्त साधुन कळत नकळत रिपाइला नेस्तनाबुत करण्यासाठी सर्वांच्या मदतीने दलितपॅंथर्सची निर्मिती केली.26 जाने 1974ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तिसरे ऐक्य झाले.सी.आर.मोघम, बॅ.राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, रा.सु.गवई, बी.सी.कांबळे,शांताबाई दाणी हे ऐक्यात सामील झाले. पहिले 35 लोकांचे ऐक्याचे प्रेसीडियम झाले.मुंबईत पहाटे चार वाजेपर्यंत वसाहतीत मिटींग चालु झाल्या.पहिल्या प्रेसीडियमची बैठक सी.आर.मोघम यांनी बंगलोर येथे बोलवली तर दुसरी अमरावतीत झाली दुस-या बैठकीतुन बॅ.राजाभाऊ खोब्रागडे अन् त्यांचे सहकारी भय्यासाहेब आंबेडकर,घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,दत्ता कट्टी हे बाहेर पडले.तदनंतर बापुसाहेब कांबळे हे देखील बाहेर पडल्याने सी.आर.मोघम,रा.सु.गवई,वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,आर.जी.खरात,शांताबाई दाणी,अॅड.बाजीराव कांबळे ऐवढेच रिपाइत शेष राहिले. वर्ष सहा महिन्याच्या आतच ही ऐक्य प्रक्रिया संपुष्टात आली. 1975च्या दरम्यान खोब्रागडे गटातुनही भय्यासाहेब आंबेडकर, घनश्याम तळवटकर, सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके,प्रा.रमाकांत यादव, हे बाहेर पडले.1976च्या दरम्यान शांताबाई दाणी व त्यांचे सहकारी भाऊसाहेब चव्हाण,दादासाहेब रोहम,हे रिपाइ तुन बाहेर पडले.अशा त-हेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची वाताहत झाली. दुर्देवाने 17/9/1977ला मुंबईच्या के.ई.एम.रूग्णालयात भय्यासाहेब आंबेडकरांची प्राणज्योत मालवली.1976 ते 1978 पर्यंत रिपाइचे गटातटाचे राजकारण चालुच होते.1978च्या हिवाळयात दादासाहेब रोहम,रा.सु.गवई समवेत एन.एस.कुभारे,व सी.आर.मोघम हे दिल्ली येथे आमरण उपोषणास बसले.1978च्या सरते शेवटी भारतीय दलित पॅंथर्सने रिपब्लिकन पक्षाच्या पुढा-यांस लक्ष अन् भक्ष ठरविले.भारतीय दलित पॅंथर्सचा गवगवा झाल्याने त्यांनी सवर्ण बहुजनांचा अर्वाचीत शिवराळ भाषेत उद्धार केला.आणि नामांतराचा लढा हाती घेतला.त्यांच्या बरोबरीने नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रिंसिपल पद न मिळाल्याने प्रा.जोगेंद्र कवाडे सरांनी लॉंग मार्च दलित मुक्ति सेना स्थापन केली. त्यांच्यातल्याच त्यांच्या अहमहमिकेतुन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पावसाळी अधिवेशनात नांमातराची घोषणा केली. निमित्त नामांतराचे होते परंतु सवर्ण बहुजनांना राग होता तो त्यांच्या शिवराळ भाषेचा अन् त्यामुळेच मराठवाडा दंगल पेटली. दंगलीत सबंध मराठवाडा पेटला त्यात 649 पेक्षाही जास्त मृतांचा शासनाचा आकडा होता.सबंध मराठवाडयात मातंग,बौद्ध समाजाच्या वसाहती जळाल्या.त्यात पोचीराम कांबळे सारख्या मातंग समाजाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरी अनुयायाच्या शरिराचे छिन्नविछिन्न तुकडे करण्यात आले तरीही शेवटच्या श्वासाच्या क्षणापर्यंत ‘जयभिम’चा नारा त्यांनी सोडला नाही. अष्याही परिस्थितीत भारतीय दलित पॅंथर्सला भावनिक चळवळ वाढवायचीच होती. मात्र छत्रपती शाहु महाराज,महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सिद्धांता नुसार रिपाइतील रा.सु.गवई,दादासाहेब रोहम यांनी सामाजिक भान ठेवुन आपले बौद्धिक कौशल्य पणाला लावुन सहा महिन्याच्या आतच मराठवाडयात जातीय सलोखा निर्माण करून पुर्ववत मराठवाडयातील दलित वस्त्या शासनाच्या मदतीने पुर्ववत केल्या.वसाहती वसवुन समझोताही केला.उद्धवस्त झालेले संसारही त्यांनी बसविले. 1983 -84च्या कालखंडात तत्कालीन महाराष्ट्र राज्य सेवेतील सिनिअरमोस्ट सनदी बुद्धिस्ट अधिकारी यांनी आणखी एक गट निर्माण केला.या वादळाला अकोला,पॅटर्न,नांदेड पॅटर्न असे संबोधु लागले.1984ला अकोल्यातुन भारीपचे प्रकाशराव आंबेडकर यांना निवडणुकित अपयश आले.9 सप्टेंबर 1984 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने निधन दिल्ली येथे झाले.दिनांक 18/19 जानेवारी 1985 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे ज्येष्ट सहकारी दत्ता कट्टी अन् त्यांचे सहकारी व रा.सु.गवई यांचे सहकारी म्हणजेच वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,पी.टी.मधाळे - माजी आमदार सांगली,खंडेराव सावंत -माजी आमदार सातारा,दादासाहेब रोहम -माजी आमदार संगमनेर नगर,दादासाहेबब शिर्के -कोल्हापुर, तसेच शांताबाई दाणी,अॅड. बाजीराव कांबळे -कर्जत सातारा,भाऊसाहेब चव्हाण,एम.डी.शेवाळे,के.बी.श्रृंगारे -नाशिक,देवीदास वाघपांजार -दर्यापुर अमरावती, नानासाहेब उर्फ गंगाराम इंदिसे,व्हि.बी.ससाणे - ठाणे,आदींचे 18/19 जानेवारीत नागपूरच्या आमदार निवासात ऐक्या संदर्भात म्हणजेच गवई व खोब्रागडे गटात बैठक झाली.त्या ऐक्यातुन दत्ताजी कट्टी अध्यक्ष अन् रा.सु.गवई कार्याध्यक्ष झाले. आणि 1985च्या मार्च महिन्यातील सार्वत्रिक विधान सभेच्या निवडणुकीस सामोरे जावे लागले. सहा महिन्यातच दत्ता कट्टी गेले अन् ऐक्य फुटले.सहा महिन्याच्या आतच या ऐक्यप्रक्रियेची फाटाफुट झाली परंतु देशातील बहुतांषी बॅरिस्टर राजाभाऊंना माननारा वर्ग हा दादासाहेब रोहम व रा.सु.गवई यांच्या बरोबरच राहिला.त्या ऐक्यप्रक्रियेतुन दत्ता कट्टी हे एकटे बाहेर फेकले गेले.घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके, प्रा.रमाकांत यादव हे दादासाहेब रोहम,रा.सु.गवई यांच्या सोबत राहिले. तदनंतर पुन्हा एकदा1995 साली रिपाइचे पाचवे ऐक्य झाले अन् चार खासदार संसदेत निवडुन आले.तेही ऐक्य लवकरच फूटले. 1988ला ऐन पावसाळयात रिडल्स प्रकरण घडले.6 डिसेंबर 1988ला रा.सु.गवईंनी दिल्ली येथील बोटक्लब वर लाक्षणीक अशा भव्य मोर्च्याचे आयोजन केले असता ‘न भूतो न भविष्यती अशामोर्च्यात सुमारे 6 ते 7 लक्ष अनुयायांनी सहभाग घेतला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष कर्मविर दादासाहेब गायकवाड ते एन.शिवराज यांच्या नंतर गल्ली ते घराघरा पर्यंत वाटला गेला.जो,तो उठतो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव अन् निळे निशाण घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुढे अबकड लावुन संघटना तयार करून पुढारपणाच्या नावाखाली आपल पुढारपण आणि आपल्या घराची व्यवस्था कशी होईल या प्रवृत्तीने वागायला लागले आहेत. त्यामुळे दिवसेगणिक आंबेडकरी जनतेवर, मायभगिनींनीवर, मागासवस्त्यांवर, अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत.अन्याय,अत्याचार झाल्यानंतर पुढारी अश्रु पुसावयास जातात परंतु त्यांचे मुळ शोधत नाहीत.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पने प्रमाणे ‘‘माझा समाज सत्तास्थानी व सत्ताधारी असला पाहिजे’’ या उलट आज पुढा-यांची दशा झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या संकल्पनेचा विसर पडुन ते आज शिवसेना,बि.जे.पी.चे स्वप्न साकार करावयास निघालेत या सारखी दुर्देवाची बाब कोणती ? मग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत अन् संकल्पना हे प्रात्यक्षिक वास्तव्यात आणावयाचे असेल तर आमच्या कार्यकर्त्यांनी‘‘नेता छोडो समाज जोडो !’’हे अभियान सुरू केले आहे.समाज जागृत आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरी विचारांशी एकनिष्ठ आहे.समाजात एकसंघ खंबीर नेतृत्व नसल्याने समाज दिषाहिन झालेला आहे. ‘‘नेत्यांचे ऐक्य करण्या ऐवजी समाजाचे ऐक्य व्हावे’’ हाच खरा उद्येश असल्याने या पक्ष स्थापने मागची नानासाहेब इंदिसे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना रिपब्लिकन पक्ष एक व्हावा.हीच भूमिका पक्ष स्थापनेमागची होती आणि आजही त्या भुमिकेवर मी ठाम आहे.मला अध्यक्षपदाचा हव्यास मुळीच नाही.म्हणुनच मी कुमारसेन बौद्ध (दिल्ली) यांना अध्यक्ष केले होते.परंतु दुर्देवाने ते या कामी सपशेल अपयशी ठरले.ऐक्यासाठी मी आर.पी.आय.नेते रामदासजी आठवले,प्रा.जोगेंद्र कवाडे सर,बाळासाहेब आंबेडकर,व इतरही लहाणमोठया गटनेत्यीशी बोललो चर्चा केल्या परंतु त्यातुन ऐक्य काही घडुन आले नाही.मी आठवले व कवाडे सरांना दिल्ली येथील बैठकीत सांगीतले निदान तिघे तरी आपण प्रथम एकत्रित येऊ परंतु तांत्रिक कारणे पुढे करून या नेत्यांनी या ऐक्याला फाटा दिला.मी नामवंत आंबेडकरी कलावंत यांच्या माध्यमातुन नागपूर, पुणे, भिमा-कोरेगांव, महाड, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, दिल्ली, अहमदाबाद, सुरत, बडोदा इ. शहरांमध्ये मेळावे आयोजीत करून जनतेला हाक दिली. जनतेलाही ऐक्य हवे आहेपरंतु जनतेत नेत्यांचीच विश्वासार्हता कमी झालेली आहे. कारण अनेक वेळा ऐक्यफुटणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले उद्यिष्ट साध्य करता आले नाही. याची खंत माझ्या सहित देशातील तमाम आंबेडकरी समाजाला आहे. आम्ही एकत्रित आलो तर बहुजन समाजही आमचे बरोबर एकत्रित येईल. तसा विश्वास त्यांच्यात निर्माण करता येईल. मी आशावादी आहे आणि निश्चयी सुद्धा आहे. म्हणुन मला आशा आहे की एक दिवस इतर पक्षाच्या चाक-या सोडुन नेते नक्कीच एकत्र येतील. तेव्हा एका डोळयात बुद्धांची शांती तर दुस-या डोळयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भिमक्रांती तेवत ठेवा. तसेच बुद्धधम्माचे अन् बावीस प्रतिज्ञांचे पालन करून बुद्धविहारात एकत्रित बसुन लोकशाही प्रमाणे आम्हास या देशाची शासनकर्ती जमात बनावयास पाहीजे असा आपण सम्यक संकल्प केला पाहिजे. आपण सर्व मैत्रीबंधुभावनेने एकदिलाने,एकविचाराने प्रज्ञारूपी सूर्याचे सूर्यकिरणे बनुन या महामानवाने बदललेल्या इतिहासाला साक्षी ठेवुन या भारत देशात परिवर्तन घडवुन आणु अन् आपल्या हाताच्या ओंजळीनेच पाणी पिऊ.आपण आपल्याच ऐक्याच्या कर्तुत्वाने उजाळु अन् शासनकर्ती जमात बनु तेव्हाच ख-या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची,राज्यघटनेची आणि भारत देषाची महती जगाला कळेल. हाच खरा कोटी-कोटी प्रणाम महापुरूष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांस आपल्या सर्वांच्यांच निश्चयातुन लाभेल. . - नानासाहेब इंदिसे, राष्ट्रीय अध्यक्ष- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी) !!! जयभिम !!! [[वर्ग:आंबेडकरवादी राजकीय पक्ष]] [[वर्ग:भारतीय रिपब्लिकन पक्ष]] t1i3dl0hthsgqxmv6vns2x9n2vwug8x 2581356 2581352 2025-06-20T16:20:44Z 2409:40C2:104A:F6B3:8000:0:0:0 2581356 wikitext text/x-wiki {{बदल}} == रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे == ==1]विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला राजकीय पक्ष == ===1.1] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी === पोलिंग एजंट ते डेप्युटी सरपंच व डेप्युटी सरपंच ते नगरसेवक आणि नगर सेवक ते राष्ट्रीय नेता अशा आपल्या जीवनयापनाच्या प्रवासातील भारतातील राजकारणातील विविध भूमिका बजावणा-या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय नेते गंगाराम इंदिसे उर्फ नानासाहेब इंदिसे होय. विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारानुसार नानासाहेब इंदिसे यांनी घेतलेला युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा,तसेच भारतीय राजकारणातील रिपब्लिकन पार्टी आफॅ इंडियावर टाकलेला प्रकाशझोत === 1.2] नानासाहेब इंदिसे यांचे बालपण === रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय नेते नानासाहेब इंदिसे यांचा जन्म दिनांक 5/3/1942 साली धुळे जिल्हयातील तळोजा तालुक्यातील प्रतापपुर येथे झाला.त्यांचे वडील दोधा कृष्णा इंदिसे हे 1952 साली शे.का.फे.चे पुर्वीच्या खानदेश नंतरचा धुळे आणि आत्ताच्या नंदुरबार जिल्हयातल्या तळोजा या तालुक्याचे तालुका अध्यक्ष होते.त्याकाळी षे.का.फे अन् प्रजासमाजवादीचे अशोक मेहता हे होते.तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणुन अण्णासाहेब नहनकर हे देखील धुळयाचेच होते. 1952 सालच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत नानांचे वय अवघे 10वर्षे होते.परंतु हत्ती अन् वडाचे झाड या निवडणुकितील दोन निशाणी त्यांना राजकारणाचेच धडे देत होते.त्यातच नानांचे पाय राजकारणात ओढले गेले. त्या सार्वत्रिक निवडणुकितुनच बालपणीच त्यांना राजकारणाचे बालकडु चाखावयास मिळाले.वडिल व्यापारी व शेतकरी असल्याने वडिलांबरोबरच त्यांचा सतत रहिवास असल्याने व्यापारानिमित्त वडिलांबरोबरच तेही बैलगाडी अथवा घोडयावरून शहरात जात असत.त्यामुळे त्यांचे शहराविषयी आकर्षण आणखीणच वाढले.1962 साली विधानसभेच्या निवडणुकीत केशव गोविंद वळवी हे आरपीआयच्या तिकिटावर तळोजा अक्कलकुवा या मतदार संघातुन उभे होते. त्यावेळी नानासाहेबांनी त्या निवडणुकीत पोलिंग एजंटचेही काम केले. === 1.3] ठाणे येथे प्रयाण=== नानासाहेब जुन्या अकरावी नंतर 1963 साली शहरी जिवनाच्या आकर्षणापायी ठाणे जिल्हयातील कळवा येथे स्थलांतरीत झाले. 1964 साली नानासाहेब इंदिसे हे ठाणे जिल्हयातील वाडा तालुक्यात फॉरेस्ट खात्यात नोकरीस लागले.1965ला वसईतील गोखीवरा येथे नानासाहेब इंदिसे रहावयास गेले.1966ला नानासाहेब इंदिसे पुन्हा ठाणे येथील येऊरला येऊन स्थायिक झाले. === 1.4] भारतीय राजकरणात प्रवेश === वडिलांकडुनच बालपणा पासून राजकारणाचे धडे मिळाल्याने नानांचे मन नोकरीत रमेना आणि 1967ला त्यांनी नोकरीचा राजिनामा देऊन राजकिय चळवळीत पूर्णवेळ सक्रिय सहभाग घेतला.ऑक्टोंबर 1966ला कर्मविर दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना रा.सु.गवई हे विद्यमान आमदार होते 1968 साली रा.सु.गवई हे उपसभापती झाले.तेव्हापासून नानासाहेब इंदिसे यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सक्रिय कार्य मोठया उत्साहात भरारी घेत जोमाने चालले होते. === 1.5] ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच === 1971 साली आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत माजीवडा येथे नानासाहेब इंदिसे हे डेप्युटी सरपंच झाले.1978 साली नानासाहेब इंदिसे हे माजीवडा येथे ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच म्हणुनच राजकारणात कार्यरत होते.1979ला नानासाहेब इंदिसे माजीवडा पंचायत समितीच्या निवडणुकिस उभे राहिले परंतु त्यांना अपयश आले.1985च्या ठाणे बेलापुर विधानसभा मतदार संघातुन नानासाहेब इंदिसे यांना अपयशाला सामोरे जावे लागले. === 1.6 ठाणे महानगर्पालिकेवर निर्वाचित === 1988ला नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकितही अपयशाला सामोरे जावे लागले.1992 मध्ये नानासाहेब इंदिसे यांनी ठाणे महानगर पालिकेत निर्वाचीत यश संपादन केले. नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेने परिवहन समितीचे चेअरमनपद देऊन सन्मान केला.या काळात त्यांनी अनेक गरजुंना नोकरीस लावले.त्याचा फायदा डॉक्टर, शिक्षक,बालवाडी शिक्षक,आया,कंडक्टर,ड्रायव्हर, बिगारी, शिपाई, हेल्पर,सुशिक्षीत बेरोजगार आदींचा उदरनिर्वाहणार्थ रोजगार उपलब्ध करून देऊन या पदाचा योग्य उपयोग केला.1997च्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत नानासाहेब इंदिसे यांना पुन्हा एकदा अपयशाला सामोरे जावे लागले. === 1.7] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना  === 2000 सालापासून नानासाहेब इंदिसे हे कळत नकळत ऐक्याच्या भुमीकेवर ठाम राहिले.2009 मध्ये पुन्हा माजिवडा विधानसभा मतदार संघात नानासाहेब इंदिसे यांना अपयश पचवावा लागला.निवडुन न येण्याची कारणे मला माहित होती परंतु आंबेडकरी समाज इतरांच्या दावणीला बांधला जाऊ नये या उद्येशाने विधानसभा निवडणुका लढविल्या. तदनंतर आज पर्यंत रिपाइचे वेगवेगळया गटातटाचे राजकारण चालुच आहे.त्या नंतर रिपब्लिकन पार्टीची अशी अवस्था पाहुन निळया निशाणाखाली सर्वांचे ऐक्य व्हावे याच उद्येशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारांच्या प्रेरणेतुनच नानासाहेब इंदिसे यांनी 20 डिसेंबर 2008 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना केली.या मध्ये शिवराम मोघा,कुमारसेन बौद्ध,उत्तमराव खडसे,प्रल्हाद सोनवणे, दौलतराम आदी.निष्ठावंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतानुसार नानासाहेबांबरोबर सक्रिय कार्य करू लागले. पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन युगप्रवर्तक,विष्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभुमी महु (आंबेडकर नगर) येथे भरविण्यात आले.यामध्ये आंबेडकरी चळवळीतले बहुतांश नेते,कार्यकर्ते यांना निमंत्रीत करण्यात आले. == 2] विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी व ऐतिहासिक घडामोडींचा परामर्श == तत्पुर्वी विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी वऐतिहासिक घडामोडींचा परामर्श खालिलप्रमाणे 20/7/1924 रोजी बहिष्कृत हितकारीणी संस्था स्थापन केली.3/3/1927 रोजी समता सैनिक दल स्थापन केले 20/3/1927 रोजी महाडचा सत्याग्रह, 26/7/1927 रोजी अंबादेवी मंदिर सत्याग्रह, 14/6/1928ला भारतीय बहिष्कृतशिक्षण मंडळ स्थापले, 22/9/1929 रोजी पर्वती पुणे सत्याग्रह,2/3/1930ला काळाराम मंदिर सत्याग्रह,4/10/1930डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृष्यांचा प्रतिनिधी म्हणुन गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला रवाना,7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931ला दुस-या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांना स्वतंत्र मतदार संघावरून गांधी आंबेडकरांत तिव्र मतभेद,23/9/1931ला मुखेडचा सत्याग्रह केला.24 सप्टेंबर 1932 पुणे करार, जानेवारी 1933 तिस-या गोलमेज परिषदेहुन भारतात रवाना,1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट लागु.13/10/1935 येवले मुक्कामी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘मी जरी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही’’ही घोषणा केली.15/8/1936ला स्वतंत्र मजुर पक्ष स्थापन केला.1937 मुंबई विधिमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे डॉ.आंबेडकरांसहित 14 उमेदवार निवडुन आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी पक्ष नेते होते.तर सभागृह उपनेते आर.आर.भोळे होते. या मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे शामराव परूळेकर, करंदीकर,जमनादास मेहता,झाबवाला आदी खंदे सदस्य होते.मोठा पक्ष म्हणुन मुस्लिम लिग हा होता त्यांचे नेते सर देहलवी हे होते 12/2/1939 मोहाडी धुळे सत्याग्रह,2/7/1942ला प्रथमच एक अस्पृष्य केंद्रिय मंत्रीमंडळात मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेबांचा भारताच्या व्हाइसरॉय कार्यकारी मंडळात समावेश झाला.19/7/1942ला शेडयुल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली,27/7/1942ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मजुरमंत्रीपदाचा कारभार सोपविण्यात आला. 8/7/1945 पिपिल्स ऐज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.4/6/1946 पुणे कौन्सील मोर्चा सत्याग्रह,27/6/1946 सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना,19/7/1946डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगाल विधिमंडळातुन घटना समितीवर निवडुन आले. 3/9/1946ला नागपुर सत्याग्रह, 5/9/1946डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश पार्लमेंटच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये कॉन्झर्वेटीव्ह इंडियन कमिटी समोर पुणे करार रद्द करण्याची व ब्रिटिश सरकारचा जातिय निवाडा लागु करण्याची मागणी केली.11/12/1946डॉ.राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 2/3/1947ला लखनौ सत्याग्रह केला.15 मार्च 1947 बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘स्टेटस अॅन्ड मायनॉरिटीज’’हा ग्रंथ प्रकाशीत केला.29 एपिंल 1947 रोजी घटनेतुन अस्पृष्यता निवारण्याविषयी सतरावे कलम संमत केले. 22 जुलै 1947 रोजी भारतीय ध्वज समितीचे सदस्य म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतुन अशोक चक्रांकित तिरंगा झेडा राष्ट्रध्वज म्हणुन निश्चित केला.23 जुलै 1947डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवर निवड झाली.3/8/1947 भारताचे कायदा मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्रीमंडळात समावेश15ऑगष्टला1947 भारत स्वतंत्र झाला.30/8/1947ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड.26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान भारतास अर्पण,8 मे 1950 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणुन शपथ घेतली.26 जानेवारी 1950ला भारतीय प्रजासत्ताक दिन. या दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासारख्या खंडप्राय देशात राज्यघटनेद्वारे लोकभिमुख लोकशाही पेरली सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे महत्त्व पटवुन ‘‘एक व्यक्ती,एक मुल्य,एक मत’’ याचा सिद्धांत घटनेत मांडुन सर्वांना एका किंमतीत आणले,त्याच बरोबर न्याय,स्वातंत्र्य,समता मैत्रीबंधुत्व ही नितीतत्त्वे राज्य घटनेच्या माध्यमातुन लोकशाही बळकट होण्यासाठी रूजवली अन् भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. 5 फेब्रुवारी 1951डॉ..आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लोकसभेत मांडले.27 सप्टेंबर हिंदुकोड बिल फेटाळल्याच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा त्याग केला.5 जानेवारी 1952 मुंबई लोकसभेत अपयश9 मार्च 1952डॉ. आंबेडकरांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. मे 1954 भंडारा लोकसभेच्या राखीव मतदार संघातील पोटनिवडणुकित अपयश आले.1954ला भारतीय बौद्धमहासभेची स्थापना केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत खोती बिल, महार वतन बिल, हिंदुकोड बिल, मंत्र्यांचे वेतन बिल, लोकप्रतिनिधि बिल,कामगारांचे किमान वेतन बिल सादर केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 13ऑक्टोंबर 1935 साली येवले मुक्कामी हिंदुधर्म त्यागाची चळवळ हाती घेऊन केलेल्या भिष्मप्रतिज्ञेच्या अनुशंगाने21वर्षे सातत्याने सर्व धर्माचा अभ्यास केला.अभ्यासपुर्वक निर्णयातुन त्यांनी निसर्गनियमांना अनुसरून,विज्ञाणाचा आधार घेऊन,सत्य व वास्तव यांची सांगड घालुन सम्यक ज्ञानाची कसोटी घेऊन 14ऑक्टोंबर 1956 रोजी अशोक विजया दशमी दिनी नागपुर येथे भन्ते चंद्रमणी यांच्या कडुन स्वतः भारतातीलच असलेल्या बौद्ध धम्माची धम्मदिक्षा घेऊन आपल्या समवेत असलेल्या सुमारे पाच लक्ष अनुयायांना त्यानी स्वतः बौद्ध धम्माची दिक्षा दिली. 20 नोव्हेंबर 1956 रोजी काठमांडु येथे जागतिक बौद्ध महापरिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘बुद्ध की,कार्लमार्क्स’’या विषयावर भाषण केले असता बौद्ध महापरिषदेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ‘राजा इ मलाला’यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना‘‘बोधिसत्व’’हि पदवी तेथेच बहाल केली. 24 नोव्हेंबर 1956 रोजी सारनाथ, आग्रा आणि दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.25 नोव्हेंबर 1956 रोजी सकाळी काशी विद्यापिठातील विद्यार्थी व आचार्यगणांसमोरभाषण केले तर सायंकाळी बनारस येथे महाबोधी संस्थेच्या सभेत शेवटचे भाषण केले. ==3] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली == रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 8/9 डिसेंबर 1955 मध्ये औरंगाबाद येथील वास्तव्यात पहिल्यांदा बोलुन दाखविला होता. भारतीय राज्य घटना ख-याखु-या अर्थाने राबविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाला भाग पाडणे तसेच सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान राजकीय पक्षांचे एकीकरण करून प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्षाला प्रस्थापीत करणे हा रिपब्लिकन पक्षाचा उद्येश असल्याचे त्यांनी सांगीतले.(जनता -10 डिसेंबर 1955 ) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 29/30 सप्टेंबर 1956 रोजी 26,अलिपुर रोड दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी त्यांच्याच अध्यक्षतेखाली शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकीतशेकाफे बरखास्त करून ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’या नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला अन् रिपाइ अस्तित्वात आल्याची घोषणा समारोपाच्या भाषणात केली.ज्या मध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जातीविरहित,धर्मविहिन चळवळ चालवुन या देषात असणारी विभिन्न विषमता नष्ट करण्यासाठी आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्रांती घडवुन आणुन वर्गविहिन,जातीविहिन समाजव्यवस्था निर्माण करतील व समाजवादी व आर्थिक पूनर्रचना करतील अशी त्यांना अपेक्षा होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घोषीत केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची ‘‘हत्ती’’ ही निशाणी ठेवण्यामागची भूमिका काय होती हे देखील समजावुन घेणे महत्त्वाचे आहे.हत्ती हा महाकाय प्राणी असल्याने आणि माझा समाज हा अडाणी समाज असल्याने इतर निशाणी ओळखण्यापेक्षा महाकाय हत्तीची निशाणी त्यांना तत्काळ ओळखता यावी म्हणुनच ‘‘हत्ती’’या निशाणीची निवड केली. तसेच शेडयुल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष मर्यादीत व ठराविक जातीपुरताच असल्याने 1952च्या लोकसभेत अन् 1954च्या भंडारा मधील पोटनिवडणुकीत उच्चजातीयांनी जातीय मानसिकतेतुन शे.का.फे.ला एकटे पाडल्याने आलेल्याअपयशाच्या कारणमीमांसेने ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’प्रजासत्ताक पक्ष म्हणुन स्थापन करणे संदर्भी पक्षाची घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहुन काढली होती.या पक्षात भारतीय जनतेला सामील होण्यासाठी खुल्ले पत्रही लिहिले होते.त्यांना आपल्या या पक्षाला विशिष्ट जातीचे लेबल लावुन हा पक्ष चालवायचा नव्हता.यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत नमुद पक्षाची ध्येय,उद्यिष्ट व तत्त्वप्रणाली नमुद केलेली आपणास आढळुन येतील.भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे तीच भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या घटनेत समाविष्ट करून घटना बनविण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचा तत्त्वज्ञानात्मक आधार, पक्षाची ध्येय,उद्दिष्टे व कार्यक्रम तसेच पक्ष सुदृढतेच्या कसोटया याचे अध्ययन केल्यास हा पक्ष भारतात अस्तित्वात असलेल्या अन्य कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा सर्वच बाबतीत सरस आहे हे दिसुन येते. मात्र पक्षाच्या या वैशिष्ट्याचीशिकवण सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहचविण्यात रिपब्लिकन पक्षाचे नेते,विचारवंत,पक्षावियी सहानूभुती असलेले बुद्धीजिवी,लेखक, सामाजिक कार्यकर्ते कमी पडले असे खेदाने म्हणावेसे वाटते. दिनांक 29/30 सप्टेंबर 1956 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या बैठकीत 26 अलीपुर रोड दिल्ली येथील आपल्या राहत्या घरी केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीवादी, ब्राम्हणवादी आणि कम्युनिस्ट या तिन विचारधारांना नाकारून रिपब्लिकन नावाची निख्खळ लोकशाहीवादी चौथी राजकीय संकल्पना भारतीय राजकारणाच्या पटलावर निर्माण केली मात्र त्यांच्या घोषणेतील राजकीय कृती प्रत्यक्षात उतरविण्यापुर्विच त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दुर्देवाने परिनिर्वाण झाल्याने पक्ष स्थापनेसाठी रिपब्लिकन पार्टीचा निर्णय अस्तित्वात येऊ शकला नाही.. == 4] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा == रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा या विषयावर टाकलेल्या प्रकाशझोतात रिपाइ एक्याबाबतच्या अनेक घडामोडींचा नानासाहेबांनी घेतलेला परामर्श आपल्याला बरेचसेकाही सांगुन जातो बऱ्याच जणांना माहित असेल परंतु आजच्या पिढीला माहित व्हावे या उद्देशानेच त्याचे सिंहावलोकन करीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणा नंतर मुंबई मध्ये दादर येथील चैत्यभुमीवर त्यांचे अंतीम संस्कार करण्यात आले.सदर प्रसंगी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी बाबासाहेबांच्या चित्तेवर शपथ घेऊन समतेचा रथ पुढे नेईन परंतु तो तसुभरही मागे घेणार नाही. त्या प्रमाणे 29 डिसेंबर 1956 रोजी अहमदनगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची प्रेसीडियमची बैठक झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली.दुस-या फळीतील नेत्यांमध्ये नेतृत्वावरून अहमहमिका लागली.दलित चळवळीचे नेतृत्व आपल्याकडे यावे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होती.परंतु शिल्लक राहिलेले सर्वच नेते तुल्यबळ असल्याने बाबासाहेबांच्या समवेत असणारे दादासाहेब गायकवाड, राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, बी.सी.कांबळे आदी नेत्यांनी चतुराईतुन सामूहिक नेतृत्वाचा मार्ग काढुन 1 जाने 1957 रोजी आपले पहिले अध्यक्षीय मंडळ स्थापन केले 1957च्या सार्वत्रिक निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्याच नावाने लढण्याचा आग्रह होता.परंतु त्यावेळी मुंबईसह महाराष्ट्र यासाठी काँग्रेस खेरीज जनसंघासहीत सर्व आघाडीत होते.ही आघाडीही तत्कालीन शे.का.फे.चाच एक भाग होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने व रिपाइ नवीन पक्ष असल्याने नानासाहेब गोरे,प्र.के.अत्रे यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्त्व नसल्याने आणि ज्या काळात शे.का.फे. होता त्या काळात रिपाइ कळायला उशीर झाल्यामुळे तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हे लक्ष पूर्ण होणार नसल्याचे घटक पक्षाने कर्मविर दादासाहेब गायकवाडांकडे आग्रह धरला. शेवटी निर्णया अंती या समितीतील घटक पक्षांनी आपल्या पुर्वीच्याच शेकाफेच्या नावाने निवडणुका लढवाव्या असा निर्णय जाहिर केला.कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी शे.का.फे.च्या माध्यमातुन एकास एक उमेदवार राहिल अशी संयुक्त महाराष्ट्र कृती समितीने काळजी घ्यावी असे ठरवुन महाराष्ट्र कृतीसमितीशी आघाडी करून निवडणुकीस सामोरे गेले.त्या निवडणुकीत कृतीसमितीला घवघवीत यश मिळाले. कृती समिती महाराष्ट्रात सत्तेत आली नाही परंतु प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन उदयास आली असल्याने केंद्र सरकारला 1 मे 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यास भाग पाडले.1957च्या निवडणुकीत शे.का.फे.च्या नावाने 1)कर्मविर दादासाहेब गायकवाड - नाशिक लोकसभा मतदार संघ,2)अॅड.बी.सी.कांबळे - नगर,3)जी.के.माने - मुंबई, 4)हरिहर सोनुले - नांदेड,5) ह.भा.साळुंखे (33वर्षाचे सर्वात लहान)- भोर तालुका,6)दिघे -कोल्हापुर बहुजन समाज, 7)परमार - अहमदाबाद, 8) दत्ता कट्टी - कर्नाटक,चिकोडी मतदार संघ, 9)एन शिवराज - चेन्नई असे 9 खासदार आणि महाराराष्ट्रातुन बहुतांशी आमदार निवडुन आले आणि शेकाफे हा पक्ष देशात 1957 साली दोन नंबरचा पक्ष म्हणुन राहिला.त्यावेळेस गट नेते कर्मविर दादासाहेब गायकवाड होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपाइ लवकरात लवकर कार्यरत व्हावी अशी खंत डॉ.बाबासाहेबांच्या समकालीन नेत्यांच्या मनात होती. पावसाळयामुळे ही प्रक्रिया थांबली अन् 2ऑक्टोंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे बॅ.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आले. 3/10/1957च्या रिपाइ च्याराष्ट्रीयअध्यक्षपदासाठी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी महाराष्ट्र व्यतिरिक्त दुस-या प्रांतात हा पक्ष जावा म्हणुन एन.शिवराज यांचे नाव घोषीत केल्याने ते एकमताने निवडुन आले.14 मे 1959 रोजी बी.सी.कांबळे रिपाइतुन बाहेर पडुन त्यांनी दुरूस्त रिपब्लिकन पक्ष स्थापन केला.अन रिपाइच्या बेकीचे बीज तेथेच रूजले गेले.परंतु महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता बी.सी.कांबळे (बापुसाहेब कांबळे)संपूर्ण महाराष्ट्रात कोठेच चालले नाही.1960 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला निर्वाचन आयोगाकडुन मान्यता मिळाली.ऑक्टोंबर 1962ला पुन्हा रिपाइचे दुसरे ऐक्य झाले.या ऐक्यातुन एन.शिवराज,कर्मविर दादासाहेब गायकवाड,राजाभाऊ खोब्रागडे,बि.पी.मौर्य,भय्यासाहेब आंबेडकर, शांताबाई दाणी,इ. समकालीन नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाचा झंझावात देशात सुरू केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राश्ट्रिय अधिवेशने काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत झाली.30 सप्टेंबर 1964ला एन शिवराज यांचे दिल्ली येथील मोर्च्याच्या वेळी दादासाहेब गायकवाडांच्या निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले.तदनंतर ऑक्टो 1964 मध्ये कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी रिपाइचे बॅरीस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत अशा आषयाची सूचना मांडली परंतु समकालीन नेत्यांनी ही सूचना अमान्य करून कर्मविर दादासाहेब गायकवाडांचीच रिपाइचे राष्ट्रीयअध्यक्ष म्हणुन निवड केली. कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी 6 डिसेंबर 1964ला 14 कलमी डिमांड घेऊन भूमीहिन सत्याग्रह करण्याची घोषणा केली त्यात एक घोष वाक्य होते.‘‘कसेल त्याची जमिन,नसेल त्याचे काय ? राहिल त्याचे घर,नसेल त्याचे काय ?’’हा सत्याग्रह जवळपास दोन महिने चालला.देशभरात सुमारे 3 लाख 65 हजारांच्यावर लोक तुरूंगात गेले. तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी फेब्रुवारी महिन्यात शिष्टमंडळास पाचारण केले. त्या शिष्टमंडळात कर्मविर दादासाहेब गायकवाड,बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे,दत्ता कट्टी,अषोक निळे,रा.सु.गवई,अनसुमंतराव गायकवाड आदी नेते होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक अन् भुमीहिनांचा, झोपडपट्टयांचा प्रश्न आदी प्रश्न सोडवले जाऊन दिनांक 5 फेब्रुवारी 1965ला हा सत्याग्रह यशस्वी झाला. 1962 साली उत्तर प्रदेश मधुन रिपाइचे 3 खासदार निवडुन आले होते.पंजाब मध्ये अकाली दल आणि आरपीआयची पहिली सत्ता स्थापन झाली त्यामध्ये दोन मंत्री हे आरपीआयचे होते.1965 साली आरपीआय सत्तेत होती याचे कारण बी.पी.मौर्य,संघप्रिय गौतम आणि कादरखान हे तिन नेते बाबासाहेबांच्या विचाराच्या दिशेने प्रामाणिक काम करीत होते.या काळात उत्तरप्रदेशात आरपीआय आणि एस.व्हि.डी. यांचे सरकार होते.चैधरी चरणसिंग तेव्हा मुख्यंत्री झाले.त्या सरकार मध्येही आरपीआयचे तिन मंत्री होते. 1967 साली रिपब्लिकन पक्षाला चांगले मतदान मिळाले.काही राज्यात रिपब्लिकन पक्षाला मंत्रीमंडळात मिळालेले स्थान हे केवळ रिपब्लिकन पक्षाच्या मतसंख्येच्या आधारे मिळाले होते.मागणी न करता मंत्रीमंडळात रिपब्लिकन पक्षाच्या आमदारांना घेतले जात होते.इतका दबदबा या पक्षाचा होता.पंजाब राज्यात धानुलिया यांना कॅबिनेटमंत्री म्हणुन घेण्यात आले.उत्तरप्रदेश मध्ये एक कॅबिनेट मंत्री घेण्याऐवजी असरार अहमद आणि शमीम आलम या दोन आमदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आले.हा पक्ष केवळ बौद्धांपुरता मर्यादीत नव्हता तर या पक्षाचे मंत्री मुस्लिमही होते. बिहारमध्ये रिपब्लिकन पक्षाची एवढी ताकद होती की,तेथे लाल पासवान नावाचा एकच उमेदवार निवडुन आला असला तरी त्याला मंत्रीमंडळात स्थान देण्याशिवाय गत्यंतर नव्हते.महाराष्ट्राशिवाय उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार,हरियाना या उत्तर भारतीय राज्यात रिपब्लिकन पक्ष हा एक समर्थ पक्ष होता. .   ऑक्टो.1968ला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे रिपाइतुन बाहेर पडले अन् स्वतंत्र खोब्रागडे गटाची निर्मिती केली.कर्मविर दादासाहेब गायकवाडांना अर्धांगवायुचा झटका आल्याने 29 डिसेंबर 1971ला कर्मविर दादासाहेब गायकवाड यांचे निर्वाण झाले.1972 मध्ये कोल्हापुरातील बावडा गावात गवई बंधुंचे डोळे काढण्यात आले.त्यावेळेस डॉ.बाबासाहेबांची विचारधारा अन् नांव ऐकुन असलेले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपले उद्धारकर्ते असल्याचे समजत असतानाही युक्रांत समाजवाद्यांच्या (कम्युनिस्ट)चळवळीत प्रॅक्टिकल रितीने काम करणाऱ्यांनीच अन्याय अत्याचाराचे निमित्त साधुन कळत नकळत रिपाइला नेस्तनाबुत करण्यासाठी सर्वांच्या मदतीने दलितपॅंथर्सची निर्मिती केली.26 जाने 1974ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तिसरे ऐक्य झाले.सी.आर.मोघम, बॅ.राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, रा.सु.गवई, बी.सी.कांबळे,शांताबाई दाणी हे ऐक्यात सामील झाले. पहिले 35 लोकांचे ऐक्याचे प्रेसीडियम झाले.मुंबईत पहाटे चार वाजेपर्यंत वसाहतीत मिटींग चालु झाल्या.पहिल्या प्रेसीडियमची बैठक सी.आर.मोघम यांनी बंगलोर येथे बोलवली तर दुसरी अमरावतीत झाली दुस-या बैठकीतुन बॅ.राजाभाऊ खोब्रागडे अन् त्यांचे सहकारी भय्यासाहेब आंबेडकर,घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,दत्ता कट्टी हे बाहेर पडले.तदनंतर बापुसाहेब कांबळे हे देखील बाहेर पडल्याने सी.आर.मोघम,रा.सु.गवई,वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,आर.जी.खरात,शांताबाई दाणी,अॅड.बाजीराव कांबळे ऐवढेच रिपाइत शेष राहिले. वर्ष सहा महिन्याच्या आतच ही ऐक्य प्रक्रिया संपुष्टात आली. 1975च्या दरम्यान खोब्रागडे गटातुनही भय्यासाहेब आंबेडकर, घनश्याम तळवटकर, सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके,प्रा.रमाकांत यादव, हे बाहेर पडले.1976च्या दरम्यान शांताबाई दाणी व त्यांचे सहकारी भाऊसाहेब चव्हाण,दादासाहेब रोहम,हे रिपाइ तुन बाहेर पडले.अशा त-हेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची वाताहत झाली. दुर्देवाने 17/9/1977ला मुंबईच्या के.ई.एम.रूग्णालयात भय्यासाहेब आंबेडकरांची प्राणज्योत मालवली. 1976 ते 1978 पर्यंत रिपाइंचे गटातटाचे राजकारण चालुच होते. 1978च्या हिवाळयात दादासाहेब रोहम,रा.सु.गवई समवेत एन.एस.कुभारे,व सी.आर.मोघम हे दिल्ली येथे आमरण उपोषणास बसले.1978च्या सरते शेवटी भारतीय दलित पॅंथर्सने रिपब्लिकन पक्षाच्या पुढा-यांस लक्ष अन् भक्ष ठरविले.भारतीय दलित पॅंथर्सचा गवगवा झाल्याने त्यांनी सवर्ण बहुजनांचा अर्वाचीत शिवराळ भाषेत उद्धार केला. आणि नामांतराचा लढा हाती घेतला. त्यांच्या बरोबरीने नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रिंसिपल पद न मिळाल्याने प्रा.जोगेंद्र कवाडे सरांनी लॉंग मार्च दलित मुक्ति सेना स्थापन केली. त्यांच्यातल्याच त्यांच्या अहमहमिकेतुन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पावसाळी अधिवेशनात नामांतराची घोषणा केली. निमित्त नामांतराचे होते. परंतु सवर्ण बहुजनांना राग होता तो त्यांच्या शिवराळ भाषेचा अन् त्यामुळेच मराठवाडा दंगल पेटली. दंगलीत सबंध मराठवाडा पेटला त्यात 649 पेक्षाही जास्त मृतांचा शासनाचा आकडा होता. सबंध मराठवाडयात मातंग, बौद्ध समाजाच्या वसाहती जळाल्या. त्यात पोचीराम कांबळे सारख्या मातंग समाजाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरी अनुयायाच्या शरिराचे छिन्नविछिन्न तुकडे करण्यात आले तरीही शेवटच्या श्वासाच्या क्षणापर्यंत ‘जयभिम’चा नारा त्यांनी सोडला नाही. अष्याही परिस्थितीत भारतीय दलित पॅंथर्सला भावनिक चळवळ वाढवायचीच होती. मात्र छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सिद्धांतानुसार रिपाइंतील रा.सु.गवई, दादासाहेब रोहम यांनी सामाजिक भान ठेवुन आपले बौद्धिक कौशल्य पणाला लावुन सहा महिन्याच्या आतच मराठवाडयात जातीय सलोखा निर्माण करून पुर्ववत मराठवाडयातील दलित वस्त्या शासनाच्या मदतीने पुर्ववत केल्या. वसाहती वसवुन समझोताही केला. उद्धवस्त झालेले संसारही त्यांनी बसविले. 1983 -84च्या कालखंडात तत्कालीन महाराष्ट्र राज्य सेवेतील सिनिअरमोस्ट सनदी बुद्धिस्ट अधिकारी यांनी आणखी एक गट निर्माण केला.या वादळाला अकोला,पॅटर्न,नांदेड पॅटर्न असे संबोधु लागले.1984ला अकोल्यातुन भारीपचे प्रकाशराव आंबेडकर यांना निवडणुकित अपयश आले.9 सप्टेंबर 1984 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने निधन दिल्ली येथे झाले.दिनांक 18/19 जानेवारी 1985 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे ज्येष्ट सहकारी दत्ता कट्टी अन् त्यांचे सहकारी व रा.सु.गवई यांचे सहकारी म्हणजेच वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,पी.टी.मधाळे - माजी आमदार सांगली,खंडेराव सावंत -माजी आमदार सातारा,दादासाहेब रोहम -माजी आमदार संगमनेर नगर,दादासाहेबब शिर्के -कोल्हापुर, तसेच शांताबाई दाणी,अॅड. बाजीराव कांबळे -कर्जत सातारा,भाऊसाहेब चव्हाण,एम.डी.शेवाळे,के.बी.श्रृंगारे -नाशिक,देवीदास वाघपांजार -दर्यापुर अमरावती, नानासाहेब उर्फ गंगाराम इंदिसे,व्हि.बी.ससाणे - ठाणे,आदींचे 18/19 जानेवारीत नागपूरच्या आमदार निवासात ऐक्या संदर्भात म्हणजेच गवई व खोब्रागडे गटात बैठक झाली.त्या ऐक्यातुन दत्ताजी कट्टी अध्यक्ष अन् रा.सु.गवई कार्याध्यक्ष झाले. आणि 1985च्या मार्च महिन्यातील सार्वत्रिक विधान सभेच्या निवडणुकीस सामोरे जावे लागले. सहा महिन्यातच दत्ता कट्टी गेले अन् ऐक्य फुटले.सहा महिन्याच्या आतच या ऐक्यप्रक्रियेची फाटाफुट झाली परंतु देशातील बहुतांषी बॅरिस्टर राजाभाऊंना माननारा वर्ग हा दादासाहेब रोहम व रा.सु.गवई यांच्या बरोबरच राहिला.त्या ऐक्यप्रक्रियेतुन दत्ता कट्टी हे एकटे बाहेर फेकले गेले.घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके, प्रा.रमाकांत यादव हे दादासाहेब रोहम,रा.सु.गवई यांच्या सोबत राहिले. तदनंतर पुन्हा एकदा1995 साली रिपाइचे पाचवे ऐक्य झाले अन् चार खासदार संसदेत निवडुन आले.तेही ऐक्य लवकरच फूटले. 1988ला ऐन पावसाळयात रिडल्स प्रकरण घडले.6 डिसेंबर 1988ला रा.सु.गवईंनी दिल्ली येथील बोटक्लब वर लाक्षणीक अशा भव्य मोर्च्याचे आयोजन केले असता ‘न भूतो न भविष्यती अशामोर्च्यात सुमारे 6 ते 7 लक्ष अनुयायांनी सहभाग घेतला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष कर्मविर दादासाहेब गायकवाड ते एन.शिवराज यांच्या नंतर गल्ली ते घराघरा पर्यंत वाटला गेला.जो,तो उठतो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव अन् निळे निशाण घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुढे अबकड लावुन संघटना तयार करून पुढारपणाच्या नावाखाली आपल पुढारपण आणि आपल्या घराची व्यवस्था कशी होईल या प्रवृत्तीने वागायला लागले आहेत. त्यामुळे दिवसेगणिक आंबेडकरी जनतेवर, मायभगिनींनीवर, मागासवस्त्यांवर, अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत. अन्याय,अत्याचार झाल्यानंतर पुढारी अश्रु पुसावयास जातात परंतु त्यांचे मुळ शोधत नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेप्रमाणे ‘‘माझा समाज सत्तास्थानी व सत्ताधारी असला पाहिजे’’ या उलट आज पुढा-यांची दशा झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या संकल्पनेचा विसर पडुन ते आज शिवसेना, बि.जे.पी.चे स्वप्न साकार करावयास निघालेत या सारखी दुर्देवाची बाब कोणती ? मग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत अन् संकल्पना हे प्रात्यक्षिक वास्तव्यात आणावयाचे असेल तर आमच्या कार्यकर्त्यांनी‘‘नेता छोडो समाज जोडो !’’हे अभियान सुरू केले आहे. समाजजागृत आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरी विचारांशी एकनिष्ठ आहे. समाजात एकसंघ खंबीर नेतृत्व नसल्याने समाज दिषाहिन झालेला आहे. ‘‘नेत्यांचे ऐक्य करण्या ऐवजी समाजाचे ऐक्य व्हावे’’ हाच खरा उद्येश असल्याने या पक्ष स्थापने मागची नानासाहेब इंदिसे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना रिपब्लिकन पक्ष एक व्हावा. हीच भूमिका पक्ष स्थापनेमागची होती आणि आजही त्या भुमिकेवर मी ठाम आहे. मला अध्यक्षपदाचा हव्यास मुळीच नाही. म्हणुनच मी कुमारसेन बौद्ध(दिल्ली) यांना अध्यक्ष केले होते. परंतु दुर्देवाने ते या कामी सपशेल अपयशी ठरले. ऐक्यासाठी मी आर.पी.आय.नेते रामदासजी आठवले,प्रा.जोगेंद्र कवाडे सर,बाळासाहेब आंबेडकर,व इतरही लहाणमोठया गटनेत्यीशी बोललो चर्चा केल्या परंतु त्यातुन ऐक्य काही घडुन आले नाही. मी आठवले व कवाडे सरांना दिल्ली येथील बैठकीत सांगीतले निदान तिघे तरी आपण प्रथम एकत्रित येऊ परंतु तांत्रिक कारणे पुढे करून या नेत्यांनी या ऐक्याला फाटा दिला.मी नामवंत आंबेडकरी कलावंत यांच्या माध्यमातुन नागपूर, पुणे, भिमा-कोरेगांव, महाड, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, दिल्ली, अहमदाबाद, सुरत, बडोदा इ. शहरांमध्ये मेळावे आयोजीत करून जनतेला हाक दिली. जनतेलाही ऐक्य हवे आहेपरंतु जनतेत नेत्यांचीच विश्वासार्हता कमी झालेली आहे. कारण अनेक वेळा ऐक्यफुटणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले उद्यिष्ट साध्य करता आले नाही. याची खंत माझ्या सहित देशातील तमाम आंबेडकरी समाजाला आहे. आम्ही एकत्रित आलो तर बहुजन समाजही आमचे बरोबर एकत्रित येईल. तसा विश्वास त्यांच्यात निर्माण करता येईल. मी आशावादी आहे आणि निश्चयी सुद्धा आहे. म्हणुन मला आशा आहे की एक दिवस इतर पक्षाच्या चाक-या सोडुन नेते नक्कीच एकत्र येतील. तेव्हा एका डोळयात बुद्धांची शांती तर दुस-या डोळयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भिमक्रांती तेवत ठेवा. तसेच बुद्धधम्माचे अन् बावीस प्रतिज्ञांचे पालन करून बुद्धविहारात एकत्रित बसुन लोकशाही प्रमाणे आम्हास या देशाची शासनकर्ती जमात बनावयास पाहीजे असा आपण सम्यक संकल्प केला पाहिजे. आपण सर्व मैत्रीबंधुभावनेने एकदिलाने,एकविचाराने प्रज्ञारूपी सूर्याचे सूर्यकिरणे बनुन या महामानवाने बदललेल्या इतिहासाला साक्षी ठेवुन या भारत देशात परिवर्तन घडवुन आणु अन् आपल्या हाताच्या ओंजळीनेच पाणी पिऊ.आपण आपल्याच ऐक्याच्या कर्तुत्वाने उजाळु अन् शासनकर्ती जमात बनु तेव्हाच ख-या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची,राज्यघटनेची आणि भारत देषाची महती जगाला कळेल. हाच खरा कोटी-कोटी प्रणाम महापुरूष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांस आपल्या सर्वांच्यांच निश्चयातुन लाभेल. . - नानासाहेब इंदिसे, राष्ट्रीय अध्यक्ष- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी) !!! जयभिम !!! [[वर्ग:आंबेडकरवादी राजकीय पक्ष]] [[वर्ग:भारतीय रिपब्लिकन पक्ष]] 41dl7ai240kfnumyzempupvghu0igu0 2581357 2581356 2025-06-20T16:22:31Z 2409:40C2:104A:F6B3:8000:0:0:0 /* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी) राष्ट्रीय अध्यक्ष- नानासाहेब इंदिसे */ 2581357 wikitext text/x-wiki {{बदल}} == रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी) राष्ट्रीय अध्यक्ष- नानासाहेब इंदिसे == ==1]विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला राजकीय पक्ष == ===1.1] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी === पोलिंग एजंट ते डेप्युटी सरपंच व डेप्युटी सरपंच ते नगरसेवक आणि नगर सेवक ते राष्ट्रीय नेता अशा आपल्या जीवनयापनाच्या प्रवासातील भारतातील राजकारणातील विविध भूमिका बजावणा-या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय नेते गंगाराम इंदिसे उर्फ नानासाहेब इंदिसे होय. विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारानुसार नानासाहेब इंदिसे यांनी घेतलेला युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा,तसेच भारतीय राजकारणातील रिपब्लिकन पार्टी आफॅ इंडियावर टाकलेला प्रकाशझोत === 1.2] नानासाहेब इंदिसे यांचे बालपण === रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय नेते नानासाहेब इंदिसे यांचा जन्म दिनांक 5/3/1942 साली धुळे जिल्हयातील तळोजा तालुक्यातील प्रतापपुर येथे झाला.त्यांचे वडील दोधा कृष्णा इंदिसे हे 1952 साली शे.का.फे.चे पुर्वीच्या खानदेश नंतरचा धुळे आणि आत्ताच्या नंदुरबार जिल्हयातल्या तळोजा या तालुक्याचे तालुका अध्यक्ष होते.त्याकाळी षे.का.फे अन् प्रजासमाजवादीचे अशोक मेहता हे होते.तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणुन अण्णासाहेब नहनकर हे देखील धुळयाचेच होते. 1952 सालच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत नानांचे वय अवघे 10वर्षे होते.परंतु हत्ती अन् वडाचे झाड या निवडणुकितील दोन निशाणी त्यांना राजकारणाचेच धडे देत होते.त्यातच नानांचे पाय राजकारणात ओढले गेले. त्या सार्वत्रिक निवडणुकितुनच बालपणीच त्यांना राजकारणाचे बालकडु चाखावयास मिळाले.वडिल व्यापारी व शेतकरी असल्याने वडिलांबरोबरच त्यांचा सतत रहिवास असल्याने व्यापारानिमित्त वडिलांबरोबरच तेही बैलगाडी अथवा घोडयावरून शहरात जात असत.त्यामुळे त्यांचे शहराविषयी आकर्षण आणखीणच वाढले.1962 साली विधानसभेच्या निवडणुकीत केशव गोविंद वळवी हे आरपीआयच्या तिकिटावर तळोजा अक्कलकुवा या मतदार संघातुन उभे होते. त्यावेळी नानासाहेबांनी त्या निवडणुकीत पोलिंग एजंटचेही काम केले. === 1.3] ठाणे येथे प्रयाण=== नानासाहेब जुन्या अकरावी नंतर 1963 साली शहरी जिवनाच्या आकर्षणापायी ठाणे जिल्हयातील कळवा येथे स्थलांतरीत झाले. 1964 साली नानासाहेब इंदिसे हे ठाणे जिल्हयातील वाडा तालुक्यात फॉरेस्ट खात्यात नोकरीस लागले.1965ला वसईतील गोखीवरा येथे नानासाहेब इंदिसे रहावयास गेले.1966ला नानासाहेब इंदिसे पुन्हा ठाणे येथील येऊरला येऊन स्थायिक झाले. === 1.4] भारतीय राजकरणात प्रवेश === वडिलांकडुनच बालपणा पासून राजकारणाचे धडे मिळाल्याने नानांचे मन नोकरीत रमेना आणि 1967ला त्यांनी नोकरीचा राजिनामा देऊन राजकिय चळवळीत पूर्णवेळ सक्रिय सहभाग घेतला.ऑक्टोंबर 1966ला कर्मविर दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना रा.सु.गवई हे विद्यमान आमदार होते 1968 साली रा.सु.गवई हे उपसभापती झाले.तेव्हापासून नानासाहेब इंदिसे यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सक्रिय कार्य मोठया उत्साहात भरारी घेत जोमाने चालले होते. === 1.5] ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच === 1971 साली आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत माजीवडा येथे नानासाहेब इंदिसे हे डेप्युटी सरपंच झाले.1978 साली नानासाहेब इंदिसे हे माजीवडा येथे ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच म्हणुनच राजकारणात कार्यरत होते.1979ला नानासाहेब इंदिसे माजीवडा पंचायत समितीच्या निवडणुकिस उभे राहिले परंतु त्यांना अपयश आले.1985च्या ठाणे बेलापुर विधानसभा मतदार संघातुन नानासाहेब इंदिसे यांना अपयशाला सामोरे जावे लागले. === 1.6 ठाणे महानगर्पालिकेवर निर्वाचित === 1988ला नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकितही अपयशाला सामोरे जावे लागले.1992 मध्ये नानासाहेब इंदिसे यांनी ठाणे महानगर पालिकेत निर्वाचीत यश संपादन केले. नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेने परिवहन समितीचे चेअरमनपद देऊन सन्मान केला.या काळात त्यांनी अनेक गरजुंना नोकरीस लावले.त्याचा फायदा डॉक्टर, शिक्षक,बालवाडी शिक्षक,आया,कंडक्टर,ड्रायव्हर, बिगारी, शिपाई, हेल्पर,सुशिक्षीत बेरोजगार आदींचा उदरनिर्वाहणार्थ रोजगार उपलब्ध करून देऊन या पदाचा योग्य उपयोग केला.1997च्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत नानासाहेब इंदिसे यांना पुन्हा एकदा अपयशाला सामोरे जावे लागले. === 1.7] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना  === 2000 सालापासून नानासाहेब इंदिसे हे कळत नकळत ऐक्याच्या भुमीकेवर ठाम राहिले.2009 मध्ये पुन्हा माजिवडा विधानसभा मतदार संघात नानासाहेब इंदिसे यांना अपयश पचवावा लागला.निवडुन न येण्याची कारणे मला माहित होती परंतु आंबेडकरी समाज इतरांच्या दावणीला बांधला जाऊ नये या उद्येशाने विधानसभा निवडणुका लढविल्या. तदनंतर आज पर्यंत रिपाइचे वेगवेगळया गटातटाचे राजकारण चालुच आहे.त्या नंतर रिपब्लिकन पार्टीची अशी अवस्था पाहुन निळया निशाणाखाली सर्वांचे ऐक्य व्हावे याच उद्येशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारांच्या प्रेरणेतुनच नानासाहेब इंदिसे यांनी 20 डिसेंबर 2008 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना केली.या मध्ये शिवराम मोघा,कुमारसेन बौद्ध,उत्तमराव खडसे,प्रल्हाद सोनवणे, दौलतराम आदी.निष्ठावंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतानुसार नानासाहेबांबरोबर सक्रिय कार्य करू लागले. पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन युगप्रवर्तक,विष्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभुमी महु (आंबेडकर नगर) येथे भरविण्यात आले.यामध्ये आंबेडकरी चळवळीतले बहुतांश नेते,कार्यकर्ते यांना निमंत्रीत करण्यात आले. == 2] विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी व ऐतिहासिक घडामोडींचा परामर्श == तत्पुर्वी विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी वऐतिहासिक घडामोडींचा परामर्श खालिलप्रमाणे 20/7/1924 रोजी बहिष्कृत हितकारीणी संस्था स्थापन केली.3/3/1927 रोजी समता सैनिक दल स्थापन केले 20/3/1927 रोजी महाडचा सत्याग्रह, 26/7/1927 रोजी अंबादेवी मंदिर सत्याग्रह, 14/6/1928ला भारतीय बहिष्कृतशिक्षण मंडळ स्थापले, 22/9/1929 रोजी पर्वती पुणे सत्याग्रह,2/3/1930ला काळाराम मंदिर सत्याग्रह,4/10/1930डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृष्यांचा प्रतिनिधी म्हणुन गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला रवाना,7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931ला दुस-या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांना स्वतंत्र मतदार संघावरून गांधी आंबेडकरांत तिव्र मतभेद,23/9/1931ला मुखेडचा सत्याग्रह केला.24 सप्टेंबर 1932 पुणे करार, जानेवारी 1933 तिस-या गोलमेज परिषदेहुन भारतात रवाना,1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट लागु.13/10/1935 येवले मुक्कामी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘मी जरी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही’’ही घोषणा केली.15/8/1936ला स्वतंत्र मजुर पक्ष स्थापन केला.1937 मुंबई विधिमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे डॉ.आंबेडकरांसहित 14 उमेदवार निवडुन आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी पक्ष नेते होते.तर सभागृह उपनेते आर.आर.भोळे होते. या मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे शामराव परूळेकर, करंदीकर,जमनादास मेहता,झाबवाला आदी खंदे सदस्य होते.मोठा पक्ष म्हणुन मुस्लिम लिग हा होता त्यांचे नेते सर देहलवी हे होते 12/2/1939 मोहाडी धुळे सत्याग्रह,2/7/1942ला प्रथमच एक अस्पृष्य केंद्रिय मंत्रीमंडळात मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेबांचा भारताच्या व्हाइसरॉय कार्यकारी मंडळात समावेश झाला.19/7/1942ला शेडयुल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली,27/7/1942ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मजुरमंत्रीपदाचा कारभार सोपविण्यात आला. 8/7/1945 पिपिल्स ऐज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.4/6/1946 पुणे कौन्सील मोर्चा सत्याग्रह,27/6/1946 सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना,19/7/1946डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगाल विधिमंडळातुन घटना समितीवर निवडुन आले. 3/9/1946ला नागपुर सत्याग्रह, 5/9/1946डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश पार्लमेंटच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये कॉन्झर्वेटीव्ह इंडियन कमिटी समोर पुणे करार रद्द करण्याची व ब्रिटिश सरकारचा जातिय निवाडा लागु करण्याची मागणी केली.11/12/1946डॉ.राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 2/3/1947ला लखनौ सत्याग्रह केला.15 मार्च 1947 बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘स्टेटस अॅन्ड मायनॉरिटीज’’हा ग्रंथ प्रकाशीत केला.29 एपिंल 1947 रोजी घटनेतुन अस्पृष्यता निवारण्याविषयी सतरावे कलम संमत केले. 22 जुलै 1947 रोजी भारतीय ध्वज समितीचे सदस्य म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतुन अशोक चक्रांकित तिरंगा झेडा राष्ट्रध्वज म्हणुन निश्चित केला.23 जुलै 1947डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवर निवड झाली.3/8/1947 भारताचे कायदा मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्रीमंडळात समावेश15ऑगष्टला1947 भारत स्वतंत्र झाला.30/8/1947ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड.26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान भारतास अर्पण,8 मे 1950 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणुन शपथ घेतली.26 जानेवारी 1950ला भारतीय प्रजासत्ताक दिन. या दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासारख्या खंडप्राय देशात राज्यघटनेद्वारे लोकभिमुख लोकशाही पेरली सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे महत्त्व पटवुन ‘‘एक व्यक्ती,एक मुल्य,एक मत’’ याचा सिद्धांत घटनेत मांडुन सर्वांना एका किंमतीत आणले,त्याच बरोबर न्याय,स्वातंत्र्य,समता मैत्रीबंधुत्व ही नितीतत्त्वे राज्य घटनेच्या माध्यमातुन लोकशाही बळकट होण्यासाठी रूजवली अन् भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. 5 फेब्रुवारी 1951डॉ..आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लोकसभेत मांडले.27 सप्टेंबर हिंदुकोड बिल फेटाळल्याच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा त्याग केला.5 जानेवारी 1952 मुंबई लोकसभेत अपयश9 मार्च 1952डॉ. आंबेडकरांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. मे 1954 भंडारा लोकसभेच्या राखीव मतदार संघातील पोटनिवडणुकित अपयश आले.1954ला भारतीय बौद्धमहासभेची स्थापना केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत खोती बिल, महार वतन बिल, हिंदुकोड बिल, मंत्र्यांचे वेतन बिल, लोकप्रतिनिधि बिल,कामगारांचे किमान वेतन बिल सादर केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 13ऑक्टोंबर 1935 साली येवले मुक्कामी हिंदुधर्म त्यागाची चळवळ हाती घेऊन केलेल्या भिष्मप्रतिज्ञेच्या अनुशंगाने21वर्षे सातत्याने सर्व धर्माचा अभ्यास केला.अभ्यासपुर्वक निर्णयातुन त्यांनी निसर्गनियमांना अनुसरून,विज्ञाणाचा आधार घेऊन,सत्य व वास्तव यांची सांगड घालुन सम्यक ज्ञानाची कसोटी घेऊन 14ऑक्टोंबर 1956 रोजी अशोक विजया दशमी दिनी नागपुर येथे भन्ते चंद्रमणी यांच्या कडुन स्वतः भारतातीलच असलेल्या बौद्ध धम्माची धम्मदिक्षा घेऊन आपल्या समवेत असलेल्या सुमारे पाच लक्ष अनुयायांना त्यानी स्वतः बौद्ध धम्माची दिक्षा दिली. 20 नोव्हेंबर 1956 रोजी काठमांडु येथे जागतिक बौद्ध महापरिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘बुद्ध की,कार्लमार्क्स’’या विषयावर भाषण केले असता बौद्ध महापरिषदेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ‘राजा इ मलाला’यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना‘‘बोधिसत्व’’हि पदवी तेथेच बहाल केली. 24 नोव्हेंबर 1956 रोजी सारनाथ, आग्रा आणि दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.25 नोव्हेंबर 1956 रोजी सकाळी काशी विद्यापिठातील विद्यार्थी व आचार्यगणांसमोरभाषण केले तर सायंकाळी बनारस येथे महाबोधी संस्थेच्या सभेत शेवटचे भाषण केले. ==3] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली == रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 8/9 डिसेंबर 1955 मध्ये औरंगाबाद येथील वास्तव्यात पहिल्यांदा बोलुन दाखविला होता. भारतीय राज्य घटना ख-याखु-या अर्थाने राबविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाला भाग पाडणे तसेच सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान राजकीय पक्षांचे एकीकरण करून प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्षाला प्रस्थापीत करणे हा रिपब्लिकन पक्षाचा उद्येश असल्याचे त्यांनी सांगीतले.(जनता -10 डिसेंबर 1955 ) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 29/30 सप्टेंबर 1956 रोजी 26,अलिपुर रोड दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी त्यांच्याच अध्यक्षतेखाली शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकीतशेकाफे बरखास्त करून ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’या नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला अन् रिपाइ अस्तित्वात आल्याची घोषणा समारोपाच्या भाषणात केली.ज्या मध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जातीविरहित,धर्मविहिन चळवळ चालवुन या देषात असणारी विभिन्न विषमता नष्ट करण्यासाठी आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्रांती घडवुन आणुन वर्गविहिन,जातीविहिन समाजव्यवस्था निर्माण करतील व समाजवादी व आर्थिक पूनर्रचना करतील अशी त्यांना अपेक्षा होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घोषीत केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची ‘‘हत्ती’’ ही निशाणी ठेवण्यामागची भूमिका काय होती हे देखील समजावुन घेणे महत्त्वाचे आहे.हत्ती हा महाकाय प्राणी असल्याने आणि माझा समाज हा अडाणी समाज असल्याने इतर निशाणी ओळखण्यापेक्षा महाकाय हत्तीची निशाणी त्यांना तत्काळ ओळखता यावी म्हणुनच ‘‘हत्ती’’या निशाणीची निवड केली. तसेच शेडयुल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष मर्यादीत व ठराविक जातीपुरताच असल्याने 1952च्या लोकसभेत अन् 1954च्या भंडारा मधील पोटनिवडणुकीत उच्चजातीयांनी जातीय मानसिकतेतुन शे.का.फे.ला एकटे पाडल्याने आलेल्याअपयशाच्या कारणमीमांसेने ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’प्रजासत्ताक पक्ष म्हणुन स्थापन करणे संदर्भी पक्षाची घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहुन काढली होती.या पक्षात भारतीय जनतेला सामील होण्यासाठी खुल्ले पत्रही लिहिले होते.त्यांना आपल्या या पक्षाला विशिष्ट जातीचे लेबल लावुन हा पक्ष चालवायचा नव्हता.यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत नमुद पक्षाची ध्येय,उद्यिष्ट व तत्त्वप्रणाली नमुद केलेली आपणास आढळुन येतील.भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे तीच भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या घटनेत समाविष्ट करून घटना बनविण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचा तत्त्वज्ञानात्मक आधार, पक्षाची ध्येय,उद्दिष्टे व कार्यक्रम तसेच पक्ष सुदृढतेच्या कसोटया याचे अध्ययन केल्यास हा पक्ष भारतात अस्तित्वात असलेल्या अन्य कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा सर्वच बाबतीत सरस आहे हे दिसुन येते. मात्र पक्षाच्या या वैशिष्ट्याचीशिकवण सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहचविण्यात रिपब्लिकन पक्षाचे नेते,विचारवंत,पक्षावियी सहानूभुती असलेले बुद्धीजिवी,लेखक, सामाजिक कार्यकर्ते कमी पडले असे खेदाने म्हणावेसे वाटते. दिनांक 29/30 सप्टेंबर 1956 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या बैठकीत 26 अलीपुर रोड दिल्ली येथील आपल्या राहत्या घरी केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीवादी, ब्राम्हणवादी आणि कम्युनिस्ट या तिन विचारधारांना नाकारून रिपब्लिकन नावाची निख्खळ लोकशाहीवादी चौथी राजकीय संकल्पना भारतीय राजकारणाच्या पटलावर निर्माण केली मात्र त्यांच्या घोषणेतील राजकीय कृती प्रत्यक्षात उतरविण्यापुर्विच त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दुर्देवाने परिनिर्वाण झाल्याने पक्ष स्थापनेसाठी रिपब्लिकन पार्टीचा निर्णय अस्तित्वात येऊ शकला नाही.. == 4] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा == रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा या विषयावर टाकलेल्या प्रकाशझोतात रिपाइ एक्याबाबतच्या अनेक घडामोडींचा नानासाहेबांनी घेतलेला परामर्श आपल्याला बरेचसेकाही सांगुन जातो बऱ्याच जणांना माहित असेल परंतु आजच्या पिढीला माहित व्हावे या उद्देशानेच त्याचे सिंहावलोकन करीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणा नंतर मुंबई मध्ये दादर येथील चैत्यभुमीवर त्यांचे अंतीम संस्कार करण्यात आले.सदर प्रसंगी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी बाबासाहेबांच्या चित्तेवर शपथ घेऊन समतेचा रथ पुढे नेईन परंतु तो तसुभरही मागे घेणार नाही. त्या प्रमाणे 29 डिसेंबर 1956 रोजी अहमदनगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची प्रेसीडियमची बैठक झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली.दुस-या फळीतील नेत्यांमध्ये नेतृत्वावरून अहमहमिका लागली.दलित चळवळीचे नेतृत्व आपल्याकडे यावे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होती.परंतु शिल्लक राहिलेले सर्वच नेते तुल्यबळ असल्याने बाबासाहेबांच्या समवेत असणारे दादासाहेब गायकवाड, राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, बी.सी.कांबळे आदी नेत्यांनी चतुराईतुन सामूहिक नेतृत्वाचा मार्ग काढुन 1 जाने 1957 रोजी आपले पहिले अध्यक्षीय मंडळ स्थापन केले 1957च्या सार्वत्रिक निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्याच नावाने लढण्याचा आग्रह होता.परंतु त्यावेळी मुंबईसह महाराष्ट्र यासाठी काँग्रेस खेरीज जनसंघासहीत सर्व आघाडीत होते.ही आघाडीही तत्कालीन शे.का.फे.चाच एक भाग होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने व रिपाइ नवीन पक्ष असल्याने नानासाहेब गोरे,प्र.के.अत्रे यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्त्व नसल्याने आणि ज्या काळात शे.का.फे. होता त्या काळात रिपाइ कळायला उशीर झाल्यामुळे तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हे लक्ष पूर्ण होणार नसल्याचे घटक पक्षाने कर्मविर दादासाहेब गायकवाडांकडे आग्रह धरला. शेवटी निर्णया अंती या समितीतील घटक पक्षांनी आपल्या पुर्वीच्याच शेकाफेच्या नावाने निवडणुका लढवाव्या असा निर्णय जाहिर केला.कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी शे.का.फे.च्या माध्यमातुन एकास एक उमेदवार राहिल अशी संयुक्त महाराष्ट्र कृती समितीने काळजी घ्यावी असे ठरवुन महाराष्ट्र कृतीसमितीशी आघाडी करून निवडणुकीस सामोरे गेले.त्या निवडणुकीत कृतीसमितीला घवघवीत यश मिळाले. कृती समिती महाराष्ट्रात सत्तेत आली नाही परंतु प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन उदयास आली असल्याने केंद्र सरकारला 1 मे 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यास भाग पाडले.1957च्या निवडणुकीत शे.का.फे.च्या नावाने 1)कर्मविर दादासाहेब गायकवाड - नाशिक लोकसभा मतदार संघ,2)अॅड.बी.सी.कांबळे - नगर,3)जी.के.माने - मुंबई, 4)हरिहर सोनुले - नांदेड,5) ह.भा.साळुंखे (33वर्षाचे सर्वात लहान)- भोर तालुका,6)दिघे -कोल्हापुर बहुजन समाज, 7)परमार - अहमदाबाद, 8) दत्ता कट्टी - कर्नाटक,चिकोडी मतदार संघ, 9)एन शिवराज - चेन्नई असे 9 खासदार आणि महाराराष्ट्रातुन बहुतांशी आमदार निवडुन आले आणि शेकाफे हा पक्ष देशात 1957 साली दोन नंबरचा पक्ष म्हणुन राहिला.त्यावेळेस गट नेते कर्मविर दादासाहेब गायकवाड होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपाइ लवकरात लवकर कार्यरत व्हावी अशी खंत डॉ.बाबासाहेबांच्या समकालीन नेत्यांच्या मनात होती. पावसाळयामुळे ही प्रक्रिया थांबली अन् 2ऑक्टोंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे बॅ.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आले. 3/10/1957च्या रिपाइ च्याराष्ट्रीयअध्यक्षपदासाठी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी महाराष्ट्र व्यतिरिक्त दुस-या प्रांतात हा पक्ष जावा म्हणुन एन.शिवराज यांचे नाव घोषीत केल्याने ते एकमताने निवडुन आले.14 मे 1959 रोजी बी.सी.कांबळे रिपाइतुन बाहेर पडुन त्यांनी दुरूस्त रिपब्लिकन पक्ष स्थापन केला.अन रिपाइच्या बेकीचे बीज तेथेच रूजले गेले.परंतु महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता बी.सी.कांबळे (बापुसाहेब कांबळे)संपूर्ण महाराष्ट्रात कोठेच चालले नाही.1960 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला निर्वाचन आयोगाकडुन मान्यता मिळाली.ऑक्टोंबर 1962ला पुन्हा रिपाइचे दुसरे ऐक्य झाले.या ऐक्यातुन एन.शिवराज,कर्मविर दादासाहेब गायकवाड,राजाभाऊ खोब्रागडे,बि.पी.मौर्य,भय्यासाहेब आंबेडकर, शांताबाई दाणी,इ. समकालीन नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाचा झंझावात देशात सुरू केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राश्ट्रिय अधिवेशने काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत झाली.30 सप्टेंबर 1964ला एन शिवराज यांचे दिल्ली येथील मोर्च्याच्या वेळी दादासाहेब गायकवाडांच्या निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले.तदनंतर ऑक्टो 1964 मध्ये कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी रिपाइचे बॅरीस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत अशा आषयाची सूचना मांडली परंतु समकालीन नेत्यांनी ही सूचना अमान्य करून कर्मविर दादासाहेब गायकवाडांचीच रिपाइचे राष्ट्रीयअध्यक्ष म्हणुन निवड केली. कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी 6 डिसेंबर 1964ला 14 कलमी डिमांड घेऊन भूमीहिन सत्याग्रह करण्याची घोषणा केली त्यात एक घोष वाक्य होते.‘‘कसेल त्याची जमिन,नसेल त्याचे काय ? राहिल त्याचे घर,नसेल त्याचे काय ?’’हा सत्याग्रह जवळपास दोन महिने चालला.देशभरात सुमारे 3 लाख 65 हजारांच्यावर लोक तुरूंगात गेले. तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी फेब्रुवारी महिन्यात शिष्टमंडळास पाचारण केले. त्या शिष्टमंडळात कर्मविर दादासाहेब गायकवाड,बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे,दत्ता कट्टी,अषोक निळे,रा.सु.गवई,अनसुमंतराव गायकवाड आदी नेते होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक अन् भुमीहिनांचा, झोपडपट्टयांचा प्रश्न आदी प्रश्न सोडवले जाऊन दिनांक 5 फेब्रुवारी 1965ला हा सत्याग्रह यशस्वी झाला. 1962 साली उत्तर प्रदेश मधुन रिपाइचे 3 खासदार निवडुन आले होते.पंजाब मध्ये अकाली दल आणि आरपीआयची पहिली सत्ता स्थापन झाली त्यामध्ये दोन मंत्री हे आरपीआयचे होते.1965 साली आरपीआय सत्तेत होती याचे कारण बी.पी.मौर्य,संघप्रिय गौतम आणि कादरखान हे तिन नेते बाबासाहेबांच्या विचाराच्या दिशेने प्रामाणिक काम करीत होते.या काळात उत्तरप्रदेशात आरपीआय आणि एस.व्हि.डी. यांचे सरकार होते.चैधरी चरणसिंग तेव्हा मुख्यंत्री झाले.त्या सरकार मध्येही आरपीआयचे तिन मंत्री होते. 1967 साली रिपब्लिकन पक्षाला चांगले मतदान मिळाले.काही राज्यात रिपब्लिकन पक्षाला मंत्रीमंडळात मिळालेले स्थान हे केवळ रिपब्लिकन पक्षाच्या मतसंख्येच्या आधारे मिळाले होते.मागणी न करता मंत्रीमंडळात रिपब्लिकन पक्षाच्या आमदारांना घेतले जात होते.इतका दबदबा या पक्षाचा होता.पंजाब राज्यात धानुलिया यांना कॅबिनेटमंत्री म्हणुन घेण्यात आले.उत्तरप्रदेश मध्ये एक कॅबिनेट मंत्री घेण्याऐवजी असरार अहमद आणि शमीम आलम या दोन आमदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आले.हा पक्ष केवळ बौद्धांपुरता मर्यादीत नव्हता तर या पक्षाचे मंत्री मुस्लिमही होते. बिहारमध्ये रिपब्लिकन पक्षाची एवढी ताकद होती की,तेथे लाल पासवान नावाचा एकच उमेदवार निवडुन आला असला तरी त्याला मंत्रीमंडळात स्थान देण्याशिवाय गत्यंतर नव्हते.महाराष्ट्राशिवाय उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार,हरियाना या उत्तर भारतीय राज्यात रिपब्लिकन पक्ष हा एक समर्थ पक्ष होता. .   ऑक्टो.1968ला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे रिपाइतुन बाहेर पडले अन् स्वतंत्र खोब्रागडे गटाची निर्मिती केली.कर्मविर दादासाहेब गायकवाडांना अर्धांगवायुचा झटका आल्याने 29 डिसेंबर 1971ला कर्मविर दादासाहेब गायकवाड यांचे निर्वाण झाले.1972 मध्ये कोल्हापुरातील बावडा गावात गवई बंधुंचे डोळे काढण्यात आले.त्यावेळेस डॉ.बाबासाहेबांची विचारधारा अन् नांव ऐकुन असलेले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपले उद्धारकर्ते असल्याचे समजत असतानाही युक्रांत समाजवाद्यांच्या (कम्युनिस्ट)चळवळीत प्रॅक्टिकल रितीने काम करणाऱ्यांनीच अन्याय अत्याचाराचे निमित्त साधुन कळत नकळत रिपाइला नेस्तनाबुत करण्यासाठी सर्वांच्या मदतीने दलितपॅंथर्सची निर्मिती केली.26 जाने 1974ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तिसरे ऐक्य झाले.सी.आर.मोघम, बॅ.राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, रा.सु.गवई, बी.सी.कांबळे,शांताबाई दाणी हे ऐक्यात सामील झाले. पहिले 35 लोकांचे ऐक्याचे प्रेसीडियम झाले.मुंबईत पहाटे चार वाजेपर्यंत वसाहतीत मिटींग चालु झाल्या.पहिल्या प्रेसीडियमची बैठक सी.आर.मोघम यांनी बंगलोर येथे बोलवली तर दुसरी अमरावतीत झाली दुस-या बैठकीतुन बॅ.राजाभाऊ खोब्रागडे अन् त्यांचे सहकारी भय्यासाहेब आंबेडकर,घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,दत्ता कट्टी हे बाहेर पडले.तदनंतर बापुसाहेब कांबळे हे देखील बाहेर पडल्याने सी.आर.मोघम,रा.सु.गवई,वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,आर.जी.खरात,शांताबाई दाणी,अॅड.बाजीराव कांबळे ऐवढेच रिपाइत शेष राहिले. वर्ष सहा महिन्याच्या आतच ही ऐक्य प्रक्रिया संपुष्टात आली. 1975च्या दरम्यान खोब्रागडे गटातुनही भय्यासाहेब आंबेडकर, घनश्याम तळवटकर, सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके,प्रा.रमाकांत यादव, हे बाहेर पडले.1976च्या दरम्यान शांताबाई दाणी व त्यांचे सहकारी भाऊसाहेब चव्हाण,दादासाहेब रोहम,हे रिपाइ तुन बाहेर पडले.अशा त-हेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची वाताहत झाली. दुर्देवाने 17/9/1977ला मुंबईच्या के.ई.एम.रूग्णालयात भय्यासाहेब आंबेडकरांची प्राणज्योत मालवली. 1976 ते 1978 पर्यंत रिपाइंचे गटातटाचे राजकारण चालुच होते. 1978च्या हिवाळयात दादासाहेब रोहम,रा.सु.गवई समवेत एन.एस.कुभारे,व सी.आर.मोघम हे दिल्ली येथे आमरण उपोषणास बसले.1978च्या सरते शेवटी भारतीय दलित पॅंथर्सने रिपब्लिकन पक्षाच्या पुढा-यांस लक्ष अन् भक्ष ठरविले.भारतीय दलित पॅंथर्सचा गवगवा झाल्याने त्यांनी सवर्ण बहुजनांचा अर्वाचीत शिवराळ भाषेत उद्धार केला. आणि नामांतराचा लढा हाती घेतला. त्यांच्या बरोबरीने नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रिंसिपल पद न मिळाल्याने प्रा.जोगेंद्र कवाडे सरांनी लॉंग मार्च दलित मुक्ति सेना स्थापन केली. त्यांच्यातल्याच त्यांच्या अहमहमिकेतुन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पावसाळी अधिवेशनात नामांतराची घोषणा केली. निमित्त नामांतराचे होते. परंतु सवर्ण बहुजनांना राग होता तो त्यांच्या शिवराळ भाषेचा अन् त्यामुळेच मराठवाडा दंगल पेटली. दंगलीत सबंध मराठवाडा पेटला त्यात 649 पेक्षाही जास्त मृतांचा शासनाचा आकडा होता. सबंध मराठवाडयात मातंग, बौद्ध समाजाच्या वसाहती जळाल्या. त्यात पोचीराम कांबळे सारख्या मातंग समाजाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरी अनुयायाच्या शरिराचे छिन्नविछिन्न तुकडे करण्यात आले तरीही शेवटच्या श्वासाच्या क्षणापर्यंत ‘जयभिम’चा नारा त्यांनी सोडला नाही. अष्याही परिस्थितीत भारतीय दलित पॅंथर्सला भावनिक चळवळ वाढवायचीच होती. मात्र छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सिद्धांतानुसार रिपाइंतील रा.सु.गवई, दादासाहेब रोहम यांनी सामाजिक भान ठेवुन आपले बौद्धिक कौशल्य पणाला लावुन सहा महिन्याच्या आतच मराठवाडयात जातीय सलोखा निर्माण करून पुर्ववत मराठवाडयातील दलित वस्त्या शासनाच्या मदतीने पुर्ववत केल्या. वसाहती वसवुन समझोताही केला. उद्धवस्त झालेले संसारही त्यांनी बसविले. 1983 -84च्या कालखंडात तत्कालीन महाराष्ट्र राज्य सेवेतील सिनिअरमोस्ट सनदी बुद्धिस्ट अधिकारी यांनी आणखी एक गट निर्माण केला.या वादळाला अकोला,पॅटर्न,नांदेड पॅटर्न असे संबोधु लागले.1984ला अकोल्यातुन भारीपचे प्रकाशराव आंबेडकर यांना निवडणुकित अपयश आले.9 सप्टेंबर 1984 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने निधन दिल्ली येथे झाले.दिनांक 18/19 जानेवारी 1985 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे ज्येष्ट सहकारी दत्ता कट्टी अन् त्यांचे सहकारी व रा.सु.गवई यांचे सहकारी म्हणजेच वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,पी.टी.मधाळे - माजी आमदार सांगली,खंडेराव सावंत -माजी आमदार सातारा,दादासाहेब रोहम -माजी आमदार संगमनेर नगर,दादासाहेबब शिर्के -कोल्हापुर, तसेच शांताबाई दाणी,अॅड. बाजीराव कांबळे -कर्जत सातारा,भाऊसाहेब चव्हाण,एम.डी.शेवाळे,के.बी.श्रृंगारे -नाशिक,देवीदास वाघपांजार -दर्यापुर अमरावती, नानासाहेब उर्फ गंगाराम इंदिसे,व्हि.बी.ससाणे - ठाणे,आदींचे 18/19 जानेवारीत नागपूरच्या आमदार निवासात ऐक्या संदर्भात म्हणजेच गवई व खोब्रागडे गटात बैठक झाली.त्या ऐक्यातुन दत्ताजी कट्टी अध्यक्ष अन् रा.सु.गवई कार्याध्यक्ष झाले. आणि 1985च्या मार्च महिन्यातील सार्वत्रिक विधान सभेच्या निवडणुकीस सामोरे जावे लागले. सहा महिन्यातच दत्ता कट्टी गेले अन् ऐक्य फुटले.सहा महिन्याच्या आतच या ऐक्यप्रक्रियेची फाटाफुट झाली परंतु देशातील बहुतांषी बॅरिस्टर राजाभाऊंना माननारा वर्ग हा दादासाहेब रोहम व रा.सु.गवई यांच्या बरोबरच राहिला.त्या ऐक्यप्रक्रियेतुन दत्ता कट्टी हे एकटे बाहेर फेकले गेले.घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके, प्रा.रमाकांत यादव हे दादासाहेब रोहम,रा.सु.गवई यांच्या सोबत राहिले. तदनंतर पुन्हा एकदा1995 साली रिपाइचे पाचवे ऐक्य झाले अन् चार खासदार संसदेत निवडुन आले.तेही ऐक्य लवकरच फूटले. 1988ला ऐन पावसाळयात रिडल्स प्रकरण घडले.6 डिसेंबर 1988ला रा.सु.गवईंनी दिल्ली येथील बोटक्लब वर लाक्षणीक अशा भव्य मोर्च्याचे आयोजन केले असता ‘न भूतो न भविष्यती अशामोर्च्यात सुमारे 6 ते 7 लक्ष अनुयायांनी सहभाग घेतला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष कर्मविर दादासाहेब गायकवाड ते एन.शिवराज यांच्या नंतर गल्ली ते घराघरा पर्यंत वाटला गेला.जो,तो उठतो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव अन् निळे निशाण घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुढे अबकड लावुन संघटना तयार करून पुढारपणाच्या नावाखाली आपल पुढारपण आणि आपल्या घराची व्यवस्था कशी होईल या प्रवृत्तीने वागायला लागले आहेत. त्यामुळे दिवसेगणिक आंबेडकरी जनतेवर, मायभगिनींनीवर, मागासवस्त्यांवर, अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत. अन्याय,अत्याचार झाल्यानंतर पुढारी अश्रु पुसावयास जातात परंतु त्यांचे मुळ शोधत नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेप्रमाणे ‘‘माझा समाज सत्तास्थानी व सत्ताधारी असला पाहिजे’’ या उलट आज पुढा-यांची दशा झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या संकल्पनेचा विसर पडुन ते आज शिवसेना, बि.जे.पी.चे स्वप्न साकार करावयास निघालेत या सारखी दुर्देवाची बाब कोणती ? मग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत अन् संकल्पना हे प्रात्यक्षिक वास्तव्यात आणावयाचे असेल तर आमच्या कार्यकर्त्यांनी‘‘नेता छोडो समाज जोडो !’’हे अभियान सुरू केले आहे. समाजजागृत आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरी विचारांशी एकनिष्ठ आहे. समाजात एकसंघ खंबीर नेतृत्व नसल्याने समाज दिषाहिन झालेला आहे. ‘‘नेत्यांचे ऐक्य करण्या ऐवजी समाजाचे ऐक्य व्हावे’’ हाच खरा उद्येश असल्याने या पक्ष स्थापने मागची नानासाहेब इंदिसे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना रिपब्लिकन पक्ष एक व्हावा. हीच भूमिका पक्ष स्थापनेमागची होती आणि आजही त्या भुमिकेवर मी ठाम आहे. मला अध्यक्षपदाचा हव्यास मुळीच नाही. म्हणुनच मी कुमारसेन बौद्ध(दिल्ली) यांना अध्यक्ष केले होते. परंतु दुर्देवाने ते या कामी सपशेल अपयशी ठरले. ऐक्यासाठी मी आर.पी.आय.नेते रामदासजी आठवले,प्रा.जोगेंद्र कवाडे सर,बाळासाहेब आंबेडकर,व इतरही लहाणमोठया गटनेत्यीशी बोललो चर्चा केल्या परंतु त्यातुन ऐक्य काही घडुन आले नाही. मी आठवले व कवाडे सरांना दिल्ली येथील बैठकीत सांगीतले निदान तिघे तरी आपण प्रथम एकत्रित येऊ परंतु तांत्रिक कारणे पुढे करून या नेत्यांनी या ऐक्याला फाटा दिला.मी नामवंत आंबेडकरी कलावंत यांच्या माध्यमातुन नागपूर, पुणे, भिमा-कोरेगांव, महाड, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, दिल्ली, अहमदाबाद, सुरत, बडोदा इ. शहरांमध्ये मेळावे आयोजीत करून जनतेला हाक दिली. जनतेलाही ऐक्य हवे आहेपरंतु जनतेत नेत्यांचीच विश्वासार्हता कमी झालेली आहे. कारण अनेक वेळा ऐक्यफुटणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले उद्यिष्ट साध्य करता आले नाही. याची खंत माझ्या सहित देशातील तमाम आंबेडकरी समाजाला आहे. आम्ही एकत्रित आलो तर बहुजन समाजही आमचे बरोबर एकत्रित येईल. तसा विश्वास त्यांच्यात निर्माण करता येईल. मी आशावादी आहे आणि निश्चयी सुद्धा आहे. म्हणुन मला आशा आहे की एक दिवस इतर पक्षाच्या चाक-या सोडुन नेते नक्कीच एकत्र येतील. तेव्हा एका डोळयात बुद्धांची शांती तर दुस-या डोळयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भिमक्रांती तेवत ठेवा. तसेच बुद्धधम्माचे अन् बावीस प्रतिज्ञांचे पालन करून बुद्धविहारात एकत्रित बसुन लोकशाही प्रमाणे आम्हास या देशाची शासनकर्ती जमात बनावयास पाहीजे असा आपण सम्यक संकल्प केला पाहिजे. आपण सर्व मैत्रीबंधुभावनेने एकदिलाने,एकविचाराने प्रज्ञारूपी सूर्याचे सूर्यकिरणे बनुन या महामानवाने बदललेल्या इतिहासाला साक्षी ठेवुन या भारत देशात परिवर्तन घडवुन आणु अन् आपल्या हाताच्या ओंजळीनेच पाणी पिऊ.आपण आपल्याच ऐक्याच्या कर्तुत्वाने उजाळु अन् शासनकर्ती जमात बनु तेव्हाच ख-या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची,राज्यघटनेची आणि भारत देषाची महती जगाला कळेल. हाच खरा कोटी-कोटी प्रणाम महापुरूष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांस आपल्या सर्वांच्यांच निश्चयातुन लाभेल. . - नानासाहेब इंदिसे, राष्ट्रीय अध्यक्ष- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी) !!! जयभिम !!! [[वर्ग:आंबेडकरवादी राजकीय पक्ष]] [[वर्ग:भारतीय रिपब्लिकन पक्ष]] s5s6u8poukux26upvdkqi7emnjrur2f 2581358 2581357 2025-06-20T16:22:50Z 2409:40C2:104A:F6B3:8000:0:0:0 /* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी), राष्ट्रीय अध्यक्ष- नानासाहेब इंदिसे */ 2581358 wikitext text/x-wiki {{बदल}} == रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी), राष्ट्रीय अध्यक्ष- नानासाहेब इंदिसे == ==1]विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला राजकीय पक्ष == ===1.1] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी === पोलिंग एजंट ते डेप्युटी सरपंच व डेप्युटी सरपंच ते नगरसेवक आणि नगर सेवक ते राष्ट्रीय नेता अशा आपल्या जीवनयापनाच्या प्रवासातील भारतातील राजकारणातील विविध भूमिका बजावणा-या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय नेते गंगाराम इंदिसे उर्फ नानासाहेब इंदिसे होय. विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारानुसार नानासाहेब इंदिसे यांनी घेतलेला युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा,तसेच भारतीय राजकारणातील रिपब्लिकन पार्टी आफॅ इंडियावर टाकलेला प्रकाशझोत === 1.2] नानासाहेब इंदिसे यांचे बालपण === रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय नेते नानासाहेब इंदिसे यांचा जन्म दिनांक 5/3/1942 साली धुळे जिल्हयातील तळोजा तालुक्यातील प्रतापपुर येथे झाला.त्यांचे वडील दोधा कृष्णा इंदिसे हे 1952 साली शे.का.फे.चे पुर्वीच्या खानदेश नंतरचा धुळे आणि आत्ताच्या नंदुरबार जिल्हयातल्या तळोजा या तालुक्याचे तालुका अध्यक्ष होते.त्याकाळी षे.का.फे अन् प्रजासमाजवादीचे अशोक मेहता हे होते.तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणुन अण्णासाहेब नहनकर हे देखील धुळयाचेच होते. 1952 सालच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत नानांचे वय अवघे 10वर्षे होते.परंतु हत्ती अन् वडाचे झाड या निवडणुकितील दोन निशाणी त्यांना राजकारणाचेच धडे देत होते.त्यातच नानांचे पाय राजकारणात ओढले गेले. त्या सार्वत्रिक निवडणुकितुनच बालपणीच त्यांना राजकारणाचे बालकडु चाखावयास मिळाले.वडिल व्यापारी व शेतकरी असल्याने वडिलांबरोबरच त्यांचा सतत रहिवास असल्याने व्यापारानिमित्त वडिलांबरोबरच तेही बैलगाडी अथवा घोडयावरून शहरात जात असत.त्यामुळे त्यांचे शहराविषयी आकर्षण आणखीणच वाढले.1962 साली विधानसभेच्या निवडणुकीत केशव गोविंद वळवी हे आरपीआयच्या तिकिटावर तळोजा अक्कलकुवा या मतदार संघातुन उभे होते. त्यावेळी नानासाहेबांनी त्या निवडणुकीत पोलिंग एजंटचेही काम केले. === 1.3] ठाणे येथे प्रयाण=== नानासाहेब जुन्या अकरावी नंतर 1963 साली शहरी जिवनाच्या आकर्षणापायी ठाणे जिल्हयातील कळवा येथे स्थलांतरीत झाले. 1964 साली नानासाहेब इंदिसे हे ठाणे जिल्हयातील वाडा तालुक्यात फॉरेस्ट खात्यात नोकरीस लागले.1965ला वसईतील गोखीवरा येथे नानासाहेब इंदिसे रहावयास गेले.1966ला नानासाहेब इंदिसे पुन्हा ठाणे येथील येऊरला येऊन स्थायिक झाले. === 1.4] भारतीय राजकरणात प्रवेश === वडिलांकडुनच बालपणा पासून राजकारणाचे धडे मिळाल्याने नानांचे मन नोकरीत रमेना आणि 1967ला त्यांनी नोकरीचा राजिनामा देऊन राजकिय चळवळीत पूर्णवेळ सक्रिय सहभाग घेतला.ऑक्टोंबर 1966ला कर्मविर दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना रा.सु.गवई हे विद्यमान आमदार होते 1968 साली रा.सु.गवई हे उपसभापती झाले.तेव्हापासून नानासाहेब इंदिसे यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सक्रिय कार्य मोठया उत्साहात भरारी घेत जोमाने चालले होते. === 1.5] ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच === 1971 साली आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत माजीवडा येथे नानासाहेब इंदिसे हे डेप्युटी सरपंच झाले.1978 साली नानासाहेब इंदिसे हे माजीवडा येथे ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच म्हणुनच राजकारणात कार्यरत होते.1979ला नानासाहेब इंदिसे माजीवडा पंचायत समितीच्या निवडणुकिस उभे राहिले परंतु त्यांना अपयश आले.1985च्या ठाणे बेलापुर विधानसभा मतदार संघातुन नानासाहेब इंदिसे यांना अपयशाला सामोरे जावे लागले. === 1.6 ठाणे महानगर्पालिकेवर निर्वाचित === 1988ला नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकितही अपयशाला सामोरे जावे लागले.1992 मध्ये नानासाहेब इंदिसे यांनी ठाणे महानगर पालिकेत निर्वाचीत यश संपादन केले. नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेने परिवहन समितीचे चेअरमनपद देऊन सन्मान केला.या काळात त्यांनी अनेक गरजुंना नोकरीस लावले.त्याचा फायदा डॉक्टर, शिक्षक,बालवाडी शिक्षक,आया,कंडक्टर,ड्रायव्हर, बिगारी, शिपाई, हेल्पर,सुशिक्षीत बेरोजगार आदींचा उदरनिर्वाहणार्थ रोजगार उपलब्ध करून देऊन या पदाचा योग्य उपयोग केला.1997च्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत नानासाहेब इंदिसे यांना पुन्हा एकदा अपयशाला सामोरे जावे लागले. === 1.7] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना  === 2000 सालापासून नानासाहेब इंदिसे हे कळत नकळत ऐक्याच्या भुमीकेवर ठाम राहिले.2009 मध्ये पुन्हा माजिवडा विधानसभा मतदार संघात नानासाहेब इंदिसे यांना अपयश पचवावा लागला.निवडुन न येण्याची कारणे मला माहित होती परंतु आंबेडकरी समाज इतरांच्या दावणीला बांधला जाऊ नये या उद्येशाने विधानसभा निवडणुका लढविल्या. तदनंतर आज पर्यंत रिपाइचे वेगवेगळया गटातटाचे राजकारण चालुच आहे.त्या नंतर रिपब्लिकन पार्टीची अशी अवस्था पाहुन निळया निशाणाखाली सर्वांचे ऐक्य व्हावे याच उद्येशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारांच्या प्रेरणेतुनच नानासाहेब इंदिसे यांनी 20 डिसेंबर 2008 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना केली.या मध्ये शिवराम मोघा,कुमारसेन बौद्ध,उत्तमराव खडसे,प्रल्हाद सोनवणे, दौलतराम आदी.निष्ठावंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतानुसार नानासाहेबांबरोबर सक्रिय कार्य करू लागले. पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन युगप्रवर्तक,विष्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभुमी महु (आंबेडकर नगर) येथे भरविण्यात आले.यामध्ये आंबेडकरी चळवळीतले बहुतांश नेते,कार्यकर्ते यांना निमंत्रीत करण्यात आले. == 2] विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी व ऐतिहासिक घडामोडींचा परामर्श == तत्पुर्वी विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी वऐतिहासिक घडामोडींचा परामर्श खालिलप्रमाणे 20/7/1924 रोजी बहिष्कृत हितकारीणी संस्था स्थापन केली.3/3/1927 रोजी समता सैनिक दल स्थापन केले 20/3/1927 रोजी महाडचा सत्याग्रह, 26/7/1927 रोजी अंबादेवी मंदिर सत्याग्रह, 14/6/1928ला भारतीय बहिष्कृतशिक्षण मंडळ स्थापले, 22/9/1929 रोजी पर्वती पुणे सत्याग्रह,2/3/1930ला काळाराम मंदिर सत्याग्रह,4/10/1930डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृष्यांचा प्रतिनिधी म्हणुन गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला रवाना,7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931ला दुस-या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांना स्वतंत्र मतदार संघावरून गांधी आंबेडकरांत तिव्र मतभेद,23/9/1931ला मुखेडचा सत्याग्रह केला.24 सप्टेंबर 1932 पुणे करार, जानेवारी 1933 तिस-या गोलमेज परिषदेहुन भारतात रवाना,1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट लागु.13/10/1935 येवले मुक्कामी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘मी जरी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही’’ही घोषणा केली.15/8/1936ला स्वतंत्र मजुर पक्ष स्थापन केला.1937 मुंबई विधिमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे डॉ.आंबेडकरांसहित 14 उमेदवार निवडुन आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी पक्ष नेते होते.तर सभागृह उपनेते आर.आर.भोळे होते. या मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे शामराव परूळेकर, करंदीकर,जमनादास मेहता,झाबवाला आदी खंदे सदस्य होते.मोठा पक्ष म्हणुन मुस्लिम लिग हा होता त्यांचे नेते सर देहलवी हे होते 12/2/1939 मोहाडी धुळे सत्याग्रह,2/7/1942ला प्रथमच एक अस्पृष्य केंद्रिय मंत्रीमंडळात मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेबांचा भारताच्या व्हाइसरॉय कार्यकारी मंडळात समावेश झाला.19/7/1942ला शेडयुल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली,27/7/1942ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मजुरमंत्रीपदाचा कारभार सोपविण्यात आला. 8/7/1945 पिपिल्स ऐज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.4/6/1946 पुणे कौन्सील मोर्चा सत्याग्रह,27/6/1946 सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना,19/7/1946डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगाल विधिमंडळातुन घटना समितीवर निवडुन आले. 3/9/1946ला नागपुर सत्याग्रह, 5/9/1946डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश पार्लमेंटच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये कॉन्झर्वेटीव्ह इंडियन कमिटी समोर पुणे करार रद्द करण्याची व ब्रिटिश सरकारचा जातिय निवाडा लागु करण्याची मागणी केली.11/12/1946डॉ.राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 2/3/1947ला लखनौ सत्याग्रह केला.15 मार्च 1947 बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘स्टेटस अॅन्ड मायनॉरिटीज’’हा ग्रंथ प्रकाशीत केला.29 एपिंल 1947 रोजी घटनेतुन अस्पृष्यता निवारण्याविषयी सतरावे कलम संमत केले. 22 जुलै 1947 रोजी भारतीय ध्वज समितीचे सदस्य म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतुन अशोक चक्रांकित तिरंगा झेडा राष्ट्रध्वज म्हणुन निश्चित केला.23 जुलै 1947डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवर निवड झाली.3/8/1947 भारताचे कायदा मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्रीमंडळात समावेश15ऑगष्टला1947 भारत स्वतंत्र झाला.30/8/1947ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड.26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान भारतास अर्पण,8 मे 1950 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणुन शपथ घेतली.26 जानेवारी 1950ला भारतीय प्रजासत्ताक दिन. या दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासारख्या खंडप्राय देशात राज्यघटनेद्वारे लोकभिमुख लोकशाही पेरली सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे महत्त्व पटवुन ‘‘एक व्यक्ती,एक मुल्य,एक मत’’ याचा सिद्धांत घटनेत मांडुन सर्वांना एका किंमतीत आणले,त्याच बरोबर न्याय,स्वातंत्र्य,समता मैत्रीबंधुत्व ही नितीतत्त्वे राज्य घटनेच्या माध्यमातुन लोकशाही बळकट होण्यासाठी रूजवली अन् भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. 5 फेब्रुवारी 1951डॉ..आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लोकसभेत मांडले.27 सप्टेंबर हिंदुकोड बिल फेटाळल्याच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा त्याग केला.5 जानेवारी 1952 मुंबई लोकसभेत अपयश9 मार्च 1952डॉ. आंबेडकरांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. मे 1954 भंडारा लोकसभेच्या राखीव मतदार संघातील पोटनिवडणुकित अपयश आले.1954ला भारतीय बौद्धमहासभेची स्थापना केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत खोती बिल, महार वतन बिल, हिंदुकोड बिल, मंत्र्यांचे वेतन बिल, लोकप्रतिनिधि बिल,कामगारांचे किमान वेतन बिल सादर केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 13ऑक्टोंबर 1935 साली येवले मुक्कामी हिंदुधर्म त्यागाची चळवळ हाती घेऊन केलेल्या भिष्मप्रतिज्ञेच्या अनुशंगाने21वर्षे सातत्याने सर्व धर्माचा अभ्यास केला.अभ्यासपुर्वक निर्णयातुन त्यांनी निसर्गनियमांना अनुसरून,विज्ञाणाचा आधार घेऊन,सत्य व वास्तव यांची सांगड घालुन सम्यक ज्ञानाची कसोटी घेऊन 14ऑक्टोंबर 1956 रोजी अशोक विजया दशमी दिनी नागपुर येथे भन्ते चंद्रमणी यांच्या कडुन स्वतः भारतातीलच असलेल्या बौद्ध धम्माची धम्मदिक्षा घेऊन आपल्या समवेत असलेल्या सुमारे पाच लक्ष अनुयायांना त्यानी स्वतः बौद्ध धम्माची दिक्षा दिली. 20 नोव्हेंबर 1956 रोजी काठमांडु येथे जागतिक बौद्ध महापरिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘बुद्ध की,कार्लमार्क्स’’या विषयावर भाषण केले असता बौद्ध महापरिषदेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ‘राजा इ मलाला’यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना‘‘बोधिसत्व’’हि पदवी तेथेच बहाल केली. 24 नोव्हेंबर 1956 रोजी सारनाथ, आग्रा आणि दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.25 नोव्हेंबर 1956 रोजी सकाळी काशी विद्यापिठातील विद्यार्थी व आचार्यगणांसमोरभाषण केले तर सायंकाळी बनारस येथे महाबोधी संस्थेच्या सभेत शेवटचे भाषण केले. ==3] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली == रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 8/9 डिसेंबर 1955 मध्ये औरंगाबाद येथील वास्तव्यात पहिल्यांदा बोलुन दाखविला होता. भारतीय राज्य घटना ख-याखु-या अर्थाने राबविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाला भाग पाडणे तसेच सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान राजकीय पक्षांचे एकीकरण करून प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्षाला प्रस्थापीत करणे हा रिपब्लिकन पक्षाचा उद्येश असल्याचे त्यांनी सांगीतले.(जनता -10 डिसेंबर 1955 ) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 29/30 सप्टेंबर 1956 रोजी 26,अलिपुर रोड दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी त्यांच्याच अध्यक्षतेखाली शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकीतशेकाफे बरखास्त करून ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’या नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला अन् रिपाइ अस्तित्वात आल्याची घोषणा समारोपाच्या भाषणात केली.ज्या मध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जातीविरहित,धर्मविहिन चळवळ चालवुन या देषात असणारी विभिन्न विषमता नष्ट करण्यासाठी आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्रांती घडवुन आणुन वर्गविहिन,जातीविहिन समाजव्यवस्था निर्माण करतील व समाजवादी व आर्थिक पूनर्रचना करतील अशी त्यांना अपेक्षा होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घोषीत केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची ‘‘हत्ती’’ ही निशाणी ठेवण्यामागची भूमिका काय होती हे देखील समजावुन घेणे महत्त्वाचे आहे.हत्ती हा महाकाय प्राणी असल्याने आणि माझा समाज हा अडाणी समाज असल्याने इतर निशाणी ओळखण्यापेक्षा महाकाय हत्तीची निशाणी त्यांना तत्काळ ओळखता यावी म्हणुनच ‘‘हत्ती’’या निशाणीची निवड केली. तसेच शेडयुल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष मर्यादीत व ठराविक जातीपुरताच असल्याने 1952च्या लोकसभेत अन् 1954च्या भंडारा मधील पोटनिवडणुकीत उच्चजातीयांनी जातीय मानसिकतेतुन शे.का.फे.ला एकटे पाडल्याने आलेल्याअपयशाच्या कारणमीमांसेने ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’प्रजासत्ताक पक्ष म्हणुन स्थापन करणे संदर्भी पक्षाची घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहुन काढली होती.या पक्षात भारतीय जनतेला सामील होण्यासाठी खुल्ले पत्रही लिहिले होते.त्यांना आपल्या या पक्षाला विशिष्ट जातीचे लेबल लावुन हा पक्ष चालवायचा नव्हता.यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत नमुद पक्षाची ध्येय,उद्यिष्ट व तत्त्वप्रणाली नमुद केलेली आपणास आढळुन येतील.भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे तीच भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या घटनेत समाविष्ट करून घटना बनविण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचा तत्त्वज्ञानात्मक आधार, पक्षाची ध्येय,उद्दिष्टे व कार्यक्रम तसेच पक्ष सुदृढतेच्या कसोटया याचे अध्ययन केल्यास हा पक्ष भारतात अस्तित्वात असलेल्या अन्य कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा सर्वच बाबतीत सरस आहे हे दिसुन येते. मात्र पक्षाच्या या वैशिष्ट्याचीशिकवण सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहचविण्यात रिपब्लिकन पक्षाचे नेते,विचारवंत,पक्षावियी सहानूभुती असलेले बुद्धीजिवी,लेखक, सामाजिक कार्यकर्ते कमी पडले असे खेदाने म्हणावेसे वाटते. दिनांक 29/30 सप्टेंबर 1956 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या बैठकीत 26 अलीपुर रोड दिल्ली येथील आपल्या राहत्या घरी केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीवादी, ब्राम्हणवादी आणि कम्युनिस्ट या तिन विचारधारांना नाकारून रिपब्लिकन नावाची निख्खळ लोकशाहीवादी चौथी राजकीय संकल्पना भारतीय राजकारणाच्या पटलावर निर्माण केली मात्र त्यांच्या घोषणेतील राजकीय कृती प्रत्यक्षात उतरविण्यापुर्विच त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दुर्देवाने परिनिर्वाण झाल्याने पक्ष स्थापनेसाठी रिपब्लिकन पार्टीचा निर्णय अस्तित्वात येऊ शकला नाही.. == 4] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा == रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा या विषयावर टाकलेल्या प्रकाशझोतात रिपाइ एक्याबाबतच्या अनेक घडामोडींचा नानासाहेबांनी घेतलेला परामर्श आपल्याला बरेचसेकाही सांगुन जातो बऱ्याच जणांना माहित असेल परंतु आजच्या पिढीला माहित व्हावे या उद्देशानेच त्याचे सिंहावलोकन करीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणा नंतर मुंबई मध्ये दादर येथील चैत्यभुमीवर त्यांचे अंतीम संस्कार करण्यात आले.सदर प्रसंगी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी बाबासाहेबांच्या चित्तेवर शपथ घेऊन समतेचा रथ पुढे नेईन परंतु तो तसुभरही मागे घेणार नाही. त्या प्रमाणे 29 डिसेंबर 1956 रोजी अहमदनगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची प्रेसीडियमची बैठक झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली.दुस-या फळीतील नेत्यांमध्ये नेतृत्वावरून अहमहमिका लागली.दलित चळवळीचे नेतृत्व आपल्याकडे यावे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होती.परंतु शिल्लक राहिलेले सर्वच नेते तुल्यबळ असल्याने बाबासाहेबांच्या समवेत असणारे दादासाहेब गायकवाड, राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, बी.सी.कांबळे आदी नेत्यांनी चतुराईतुन सामूहिक नेतृत्वाचा मार्ग काढुन 1 जाने 1957 रोजी आपले पहिले अध्यक्षीय मंडळ स्थापन केले 1957च्या सार्वत्रिक निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्याच नावाने लढण्याचा आग्रह होता.परंतु त्यावेळी मुंबईसह महाराष्ट्र यासाठी काँग्रेस खेरीज जनसंघासहीत सर्व आघाडीत होते.ही आघाडीही तत्कालीन शे.का.फे.चाच एक भाग होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने व रिपाइ नवीन पक्ष असल्याने नानासाहेब गोरे,प्र.के.अत्रे यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्त्व नसल्याने आणि ज्या काळात शे.का.फे. होता त्या काळात रिपाइ कळायला उशीर झाल्यामुळे तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हे लक्ष पूर्ण होणार नसल्याचे घटक पक्षाने कर्मविर दादासाहेब गायकवाडांकडे आग्रह धरला. शेवटी निर्णया अंती या समितीतील घटक पक्षांनी आपल्या पुर्वीच्याच शेकाफेच्या नावाने निवडणुका लढवाव्या असा निर्णय जाहिर केला.कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी शे.का.फे.च्या माध्यमातुन एकास एक उमेदवार राहिल अशी संयुक्त महाराष्ट्र कृती समितीने काळजी घ्यावी असे ठरवुन महाराष्ट्र कृतीसमितीशी आघाडी करून निवडणुकीस सामोरे गेले.त्या निवडणुकीत कृतीसमितीला घवघवीत यश मिळाले. कृती समिती महाराष्ट्रात सत्तेत आली नाही परंतु प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन उदयास आली असल्याने केंद्र सरकारला 1 मे 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यास भाग पाडले.1957च्या निवडणुकीत शे.का.फे.च्या नावाने 1)कर्मविर दादासाहेब गायकवाड - नाशिक लोकसभा मतदार संघ,2)अॅड.बी.सी.कांबळे - नगर,3)जी.के.माने - मुंबई, 4)हरिहर सोनुले - नांदेड,5) ह.भा.साळुंखे (33वर्षाचे सर्वात लहान)- भोर तालुका,6)दिघे -कोल्हापुर बहुजन समाज, 7)परमार - अहमदाबाद, 8) दत्ता कट्टी - कर्नाटक,चिकोडी मतदार संघ, 9)एन शिवराज - चेन्नई असे 9 खासदार आणि महाराराष्ट्रातुन बहुतांशी आमदार निवडुन आले आणि शेकाफे हा पक्ष देशात 1957 साली दोन नंबरचा पक्ष म्हणुन राहिला.त्यावेळेस गट नेते कर्मविर दादासाहेब गायकवाड होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपाइ लवकरात लवकर कार्यरत व्हावी अशी खंत डॉ.बाबासाहेबांच्या समकालीन नेत्यांच्या मनात होती. पावसाळयामुळे ही प्रक्रिया थांबली अन् 2ऑक्टोंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे बॅ.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आले. 3/10/1957च्या रिपाइ च्याराष्ट्रीयअध्यक्षपदासाठी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी महाराष्ट्र व्यतिरिक्त दुस-या प्रांतात हा पक्ष जावा म्हणुन एन.शिवराज यांचे नाव घोषीत केल्याने ते एकमताने निवडुन आले.14 मे 1959 रोजी बी.सी.कांबळे रिपाइतुन बाहेर पडुन त्यांनी दुरूस्त रिपब्लिकन पक्ष स्थापन केला.अन रिपाइच्या बेकीचे बीज तेथेच रूजले गेले.परंतु महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता बी.सी.कांबळे (बापुसाहेब कांबळे)संपूर्ण महाराष्ट्रात कोठेच चालले नाही.1960 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला निर्वाचन आयोगाकडुन मान्यता मिळाली.ऑक्टोंबर 1962ला पुन्हा रिपाइचे दुसरे ऐक्य झाले.या ऐक्यातुन एन.शिवराज,कर्मविर दादासाहेब गायकवाड,राजाभाऊ खोब्रागडे,बि.पी.मौर्य,भय्यासाहेब आंबेडकर, शांताबाई दाणी,इ. समकालीन नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाचा झंझावात देशात सुरू केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राश्ट्रिय अधिवेशने काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत झाली.30 सप्टेंबर 1964ला एन शिवराज यांचे दिल्ली येथील मोर्च्याच्या वेळी दादासाहेब गायकवाडांच्या निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले.तदनंतर ऑक्टो 1964 मध्ये कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी रिपाइचे बॅरीस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत अशा आषयाची सूचना मांडली परंतु समकालीन नेत्यांनी ही सूचना अमान्य करून कर्मविर दादासाहेब गायकवाडांचीच रिपाइचे राष्ट्रीयअध्यक्ष म्हणुन निवड केली. कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी 6 डिसेंबर 1964ला 14 कलमी डिमांड घेऊन भूमीहिन सत्याग्रह करण्याची घोषणा केली त्यात एक घोष वाक्य होते.‘‘कसेल त्याची जमिन,नसेल त्याचे काय ? राहिल त्याचे घर,नसेल त्याचे काय ?’’हा सत्याग्रह जवळपास दोन महिने चालला.देशभरात सुमारे 3 लाख 65 हजारांच्यावर लोक तुरूंगात गेले. तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी फेब्रुवारी महिन्यात शिष्टमंडळास पाचारण केले. त्या शिष्टमंडळात कर्मविर दादासाहेब गायकवाड,बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे,दत्ता कट्टी,अषोक निळे,रा.सु.गवई,अनसुमंतराव गायकवाड आदी नेते होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक अन् भुमीहिनांचा, झोपडपट्टयांचा प्रश्न आदी प्रश्न सोडवले जाऊन दिनांक 5 फेब्रुवारी 1965ला हा सत्याग्रह यशस्वी झाला. 1962 साली उत्तर प्रदेश मधुन रिपाइचे 3 खासदार निवडुन आले होते.पंजाब मध्ये अकाली दल आणि आरपीआयची पहिली सत्ता स्थापन झाली त्यामध्ये दोन मंत्री हे आरपीआयचे होते.1965 साली आरपीआय सत्तेत होती याचे कारण बी.पी.मौर्य,संघप्रिय गौतम आणि कादरखान हे तिन नेते बाबासाहेबांच्या विचाराच्या दिशेने प्रामाणिक काम करीत होते.या काळात उत्तरप्रदेशात आरपीआय आणि एस.व्हि.डी. यांचे सरकार होते.चैधरी चरणसिंग तेव्हा मुख्यंत्री झाले.त्या सरकार मध्येही आरपीआयचे तिन मंत्री होते. 1967 साली रिपब्लिकन पक्षाला चांगले मतदान मिळाले.काही राज्यात रिपब्लिकन पक्षाला मंत्रीमंडळात मिळालेले स्थान हे केवळ रिपब्लिकन पक्षाच्या मतसंख्येच्या आधारे मिळाले होते.मागणी न करता मंत्रीमंडळात रिपब्लिकन पक्षाच्या आमदारांना घेतले जात होते.इतका दबदबा या पक्षाचा होता.पंजाब राज्यात धानुलिया यांना कॅबिनेटमंत्री म्हणुन घेण्यात आले.उत्तरप्रदेश मध्ये एक कॅबिनेट मंत्री घेण्याऐवजी असरार अहमद आणि शमीम आलम या दोन आमदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आले.हा पक्ष केवळ बौद्धांपुरता मर्यादीत नव्हता तर या पक्षाचे मंत्री मुस्लिमही होते. बिहारमध्ये रिपब्लिकन पक्षाची एवढी ताकद होती की,तेथे लाल पासवान नावाचा एकच उमेदवार निवडुन आला असला तरी त्याला मंत्रीमंडळात स्थान देण्याशिवाय गत्यंतर नव्हते.महाराष्ट्राशिवाय उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार,हरियाना या उत्तर भारतीय राज्यात रिपब्लिकन पक्ष हा एक समर्थ पक्ष होता. .   ऑक्टो.1968ला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे रिपाइतुन बाहेर पडले अन् स्वतंत्र खोब्रागडे गटाची निर्मिती केली.कर्मविर दादासाहेब गायकवाडांना अर्धांगवायुचा झटका आल्याने 29 डिसेंबर 1971ला कर्मविर दादासाहेब गायकवाड यांचे निर्वाण झाले.1972 मध्ये कोल्हापुरातील बावडा गावात गवई बंधुंचे डोळे काढण्यात आले.त्यावेळेस डॉ.बाबासाहेबांची विचारधारा अन् नांव ऐकुन असलेले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपले उद्धारकर्ते असल्याचे समजत असतानाही युक्रांत समाजवाद्यांच्या (कम्युनिस्ट)चळवळीत प्रॅक्टिकल रितीने काम करणाऱ्यांनीच अन्याय अत्याचाराचे निमित्त साधुन कळत नकळत रिपाइला नेस्तनाबुत करण्यासाठी सर्वांच्या मदतीने दलितपॅंथर्सची निर्मिती केली.26 जाने 1974ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तिसरे ऐक्य झाले.सी.आर.मोघम, बॅ.राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, रा.सु.गवई, बी.सी.कांबळे,शांताबाई दाणी हे ऐक्यात सामील झाले. पहिले 35 लोकांचे ऐक्याचे प्रेसीडियम झाले.मुंबईत पहाटे चार वाजेपर्यंत वसाहतीत मिटींग चालु झाल्या.पहिल्या प्रेसीडियमची बैठक सी.आर.मोघम यांनी बंगलोर येथे बोलवली तर दुसरी अमरावतीत झाली दुस-या बैठकीतुन बॅ.राजाभाऊ खोब्रागडे अन् त्यांचे सहकारी भय्यासाहेब आंबेडकर,घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,दत्ता कट्टी हे बाहेर पडले.तदनंतर बापुसाहेब कांबळे हे देखील बाहेर पडल्याने सी.आर.मोघम,रा.सु.गवई,वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,आर.जी.खरात,शांताबाई दाणी,अॅड.बाजीराव कांबळे ऐवढेच रिपाइत शेष राहिले. वर्ष सहा महिन्याच्या आतच ही ऐक्य प्रक्रिया संपुष्टात आली. 1975च्या दरम्यान खोब्रागडे गटातुनही भय्यासाहेब आंबेडकर, घनश्याम तळवटकर, सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके,प्रा.रमाकांत यादव, हे बाहेर पडले.1976च्या दरम्यान शांताबाई दाणी व त्यांचे सहकारी भाऊसाहेब चव्हाण,दादासाहेब रोहम,हे रिपाइ तुन बाहेर पडले.अशा त-हेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची वाताहत झाली. दुर्देवाने 17/9/1977ला मुंबईच्या के.ई.एम.रूग्णालयात भय्यासाहेब आंबेडकरांची प्राणज्योत मालवली. 1976 ते 1978 पर्यंत रिपाइंचे गटातटाचे राजकारण चालुच होते. 1978च्या हिवाळयात दादासाहेब रोहम,रा.सु.गवई समवेत एन.एस.कुभारे,व सी.आर.मोघम हे दिल्ली येथे आमरण उपोषणास बसले.1978च्या सरते शेवटी भारतीय दलित पॅंथर्सने रिपब्लिकन पक्षाच्या पुढा-यांस लक्ष अन् भक्ष ठरविले.भारतीय दलित पॅंथर्सचा गवगवा झाल्याने त्यांनी सवर्ण बहुजनांचा अर्वाचीत शिवराळ भाषेत उद्धार केला. आणि नामांतराचा लढा हाती घेतला. त्यांच्या बरोबरीने नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रिंसिपल पद न मिळाल्याने प्रा.जोगेंद्र कवाडे सरांनी लॉंग मार्च दलित मुक्ति सेना स्थापन केली. त्यांच्यातल्याच त्यांच्या अहमहमिकेतुन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पावसाळी अधिवेशनात नामांतराची घोषणा केली. निमित्त नामांतराचे होते. परंतु सवर्ण बहुजनांना राग होता तो त्यांच्या शिवराळ भाषेचा अन् त्यामुळेच मराठवाडा दंगल पेटली. दंगलीत सबंध मराठवाडा पेटला त्यात 649 पेक्षाही जास्त मृतांचा शासनाचा आकडा होता. सबंध मराठवाडयात मातंग, बौद्ध समाजाच्या वसाहती जळाल्या. त्यात पोचीराम कांबळे सारख्या मातंग समाजाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरी अनुयायाच्या शरिराचे छिन्नविछिन्न तुकडे करण्यात आले तरीही शेवटच्या श्वासाच्या क्षणापर्यंत ‘जयभिम’चा नारा त्यांनी सोडला नाही. अष्याही परिस्थितीत भारतीय दलित पॅंथर्सला भावनिक चळवळ वाढवायचीच होती. मात्र छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सिद्धांतानुसार रिपाइंतील रा.सु.गवई, दादासाहेब रोहम यांनी सामाजिक भान ठेवुन आपले बौद्धिक कौशल्य पणाला लावुन सहा महिन्याच्या आतच मराठवाडयात जातीय सलोखा निर्माण करून पुर्ववत मराठवाडयातील दलित वस्त्या शासनाच्या मदतीने पुर्ववत केल्या. वसाहती वसवुन समझोताही केला. उद्धवस्त झालेले संसारही त्यांनी बसविले. 1983 -84च्या कालखंडात तत्कालीन महाराष्ट्र राज्य सेवेतील सिनिअरमोस्ट सनदी बुद्धिस्ट अधिकारी यांनी आणखी एक गट निर्माण केला.या वादळाला अकोला,पॅटर्न,नांदेड पॅटर्न असे संबोधु लागले.1984ला अकोल्यातुन भारीपचे प्रकाशराव आंबेडकर यांना निवडणुकित अपयश आले.9 सप्टेंबर 1984 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने निधन दिल्ली येथे झाले.दिनांक 18/19 जानेवारी 1985 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे ज्येष्ट सहकारी दत्ता कट्टी अन् त्यांचे सहकारी व रा.सु.गवई यांचे सहकारी म्हणजेच वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,पी.टी.मधाळे - माजी आमदार सांगली,खंडेराव सावंत -माजी आमदार सातारा,दादासाहेब रोहम -माजी आमदार संगमनेर नगर,दादासाहेबब शिर्के -कोल्हापुर, तसेच शांताबाई दाणी,अॅड. बाजीराव कांबळे -कर्जत सातारा,भाऊसाहेब चव्हाण,एम.डी.शेवाळे,के.बी.श्रृंगारे -नाशिक,देवीदास वाघपांजार -दर्यापुर अमरावती, नानासाहेब उर्फ गंगाराम इंदिसे,व्हि.बी.ससाणे - ठाणे,आदींचे 18/19 जानेवारीत नागपूरच्या आमदार निवासात ऐक्या संदर्भात म्हणजेच गवई व खोब्रागडे गटात बैठक झाली.त्या ऐक्यातुन दत्ताजी कट्टी अध्यक्ष अन् रा.सु.गवई कार्याध्यक्ष झाले. आणि 1985च्या मार्च महिन्यातील सार्वत्रिक विधान सभेच्या निवडणुकीस सामोरे जावे लागले. सहा महिन्यातच दत्ता कट्टी गेले अन् ऐक्य फुटले.सहा महिन्याच्या आतच या ऐक्यप्रक्रियेची फाटाफुट झाली परंतु देशातील बहुतांषी बॅरिस्टर राजाभाऊंना माननारा वर्ग हा दादासाहेब रोहम व रा.सु.गवई यांच्या बरोबरच राहिला.त्या ऐक्यप्रक्रियेतुन दत्ता कट्टी हे एकटे बाहेर फेकले गेले.घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके, प्रा.रमाकांत यादव हे दादासाहेब रोहम,रा.सु.गवई यांच्या सोबत राहिले. तदनंतर पुन्हा एकदा1995 साली रिपाइचे पाचवे ऐक्य झाले अन् चार खासदार संसदेत निवडुन आले.तेही ऐक्य लवकरच फूटले. 1988ला ऐन पावसाळयात रिडल्स प्रकरण घडले.6 डिसेंबर 1988ला रा.सु.गवईंनी दिल्ली येथील बोटक्लब वर लाक्षणीक अशा भव्य मोर्च्याचे आयोजन केले असता ‘न भूतो न भविष्यती अशामोर्च्यात सुमारे 6 ते 7 लक्ष अनुयायांनी सहभाग घेतला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष कर्मविर दादासाहेब गायकवाड ते एन.शिवराज यांच्या नंतर गल्ली ते घराघरा पर्यंत वाटला गेला.जो,तो उठतो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव अन् निळे निशाण घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुढे अबकड लावुन संघटना तयार करून पुढारपणाच्या नावाखाली आपल पुढारपण आणि आपल्या घराची व्यवस्था कशी होईल या प्रवृत्तीने वागायला लागले आहेत. त्यामुळे दिवसेगणिक आंबेडकरी जनतेवर, मायभगिनींनीवर, मागासवस्त्यांवर, अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत. अन्याय,अत्याचार झाल्यानंतर पुढारी अश्रु पुसावयास जातात परंतु त्यांचे मुळ शोधत नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेप्रमाणे ‘‘माझा समाज सत्तास्थानी व सत्ताधारी असला पाहिजे’’ या उलट आज पुढा-यांची दशा झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या संकल्पनेचा विसर पडुन ते आज शिवसेना, बि.जे.पी.चे स्वप्न साकार करावयास निघालेत या सारखी दुर्देवाची बाब कोणती ? मग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत अन् संकल्पना हे प्रात्यक्षिक वास्तव्यात आणावयाचे असेल तर आमच्या कार्यकर्त्यांनी‘‘नेता छोडो समाज जोडो !’’हे अभियान सुरू केले आहे. समाजजागृत आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरी विचारांशी एकनिष्ठ आहे. समाजात एकसंघ खंबीर नेतृत्व नसल्याने समाज दिषाहिन झालेला आहे. ‘‘नेत्यांचे ऐक्य करण्या ऐवजी समाजाचे ऐक्य व्हावे’’ हाच खरा उद्येश असल्याने या पक्ष स्थापने मागची नानासाहेब इंदिसे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना रिपब्लिकन पक्ष एक व्हावा. हीच भूमिका पक्ष स्थापनेमागची होती आणि आजही त्या भुमिकेवर मी ठाम आहे. मला अध्यक्षपदाचा हव्यास मुळीच नाही. म्हणुनच मी कुमारसेन बौद्ध(दिल्ली) यांना अध्यक्ष केले होते. परंतु दुर्देवाने ते या कामी सपशेल अपयशी ठरले. ऐक्यासाठी मी आर.पी.आय.नेते रामदासजी आठवले,प्रा.जोगेंद्र कवाडे सर,बाळासाहेब आंबेडकर,व इतरही लहाणमोठया गटनेत्यीशी बोललो चर्चा केल्या परंतु त्यातुन ऐक्य काही घडुन आले नाही. मी आठवले व कवाडे सरांना दिल्ली येथील बैठकीत सांगीतले निदान तिघे तरी आपण प्रथम एकत्रित येऊ परंतु तांत्रिक कारणे पुढे करून या नेत्यांनी या ऐक्याला फाटा दिला.मी नामवंत आंबेडकरी कलावंत यांच्या माध्यमातुन नागपूर, पुणे, भिमा-कोरेगांव, महाड, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, दिल्ली, अहमदाबाद, सुरत, बडोदा इ. शहरांमध्ये मेळावे आयोजीत करून जनतेला हाक दिली. जनतेलाही ऐक्य हवे आहेपरंतु जनतेत नेत्यांचीच विश्वासार्हता कमी झालेली आहे. कारण अनेक वेळा ऐक्यफुटणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले उद्यिष्ट साध्य करता आले नाही. याची खंत माझ्या सहित देशातील तमाम आंबेडकरी समाजाला आहे. आम्ही एकत्रित आलो तर बहुजन समाजही आमचे बरोबर एकत्रित येईल. तसा विश्वास त्यांच्यात निर्माण करता येईल. मी आशावादी आहे आणि निश्चयी सुद्धा आहे. म्हणुन मला आशा आहे की एक दिवस इतर पक्षाच्या चाक-या सोडुन नेते नक्कीच एकत्र येतील. तेव्हा एका डोळयात बुद्धांची शांती तर दुस-या डोळयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भिमक्रांती तेवत ठेवा. तसेच बुद्धधम्माचे अन् बावीस प्रतिज्ञांचे पालन करून बुद्धविहारात एकत्रित बसुन लोकशाही प्रमाणे आम्हास या देशाची शासनकर्ती जमात बनावयास पाहीजे असा आपण सम्यक संकल्प केला पाहिजे. आपण सर्व मैत्रीबंधुभावनेने एकदिलाने,एकविचाराने प्रज्ञारूपी सूर्याचे सूर्यकिरणे बनुन या महामानवाने बदललेल्या इतिहासाला साक्षी ठेवुन या भारत देशात परिवर्तन घडवुन आणु अन् आपल्या हाताच्या ओंजळीनेच पाणी पिऊ.आपण आपल्याच ऐक्याच्या कर्तुत्वाने उजाळु अन् शासनकर्ती जमात बनु तेव्हाच ख-या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची,राज्यघटनेची आणि भारत देषाची महती जगाला कळेल. हाच खरा कोटी-कोटी प्रणाम महापुरूष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांस आपल्या सर्वांच्यांच निश्चयातुन लाभेल. . - नानासाहेब इंदिसे, राष्ट्रीय अध्यक्ष- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी) !!! जयभिम !!! [[वर्ग:आंबेडकरवादी राजकीय पक्ष]] [[वर्ग:भारतीय रिपब्लिकन पक्ष]] fj4zgk33w447e829a7136t3tgi7xhta 2581359 2581358 2025-06-20T16:25:29Z 2409:40C2:104A:F6B3:8000:0:0:0 /* 1.2] नानासाहेब इंदिसे यांचे बालपण */ 2581359 wikitext text/x-wiki {{बदल}} == रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी), राष्ट्रीय अध्यक्ष- नानासाहेब इंदिसे == ==1]विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला राजकीय पक्ष == ===1.1] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी === पोलिंग एजंट ते डेप्युटी सरपंच व डेप्युटी सरपंच ते नगरसेवक आणि नगर सेवक ते राष्ट्रीय नेता अशा आपल्या जीवनयापनाच्या प्रवासातील भारतातील राजकारणातील विविध भूमिका बजावणा-या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय नेते गंगाराम इंदिसे उर्फ नानासाहेब इंदिसे होय. विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारानुसार नानासाहेब इंदिसे यांनी घेतलेला युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा,तसेच भारतीय राजकारणातील रिपब्लिकन पार्टी आफॅ इंडियावर टाकलेला प्रकाशझोत === 1.2] नानासाहेब इंदिसे यांचे बालपण === रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादीचे) राष्ट्रीय नेते नानासाहेब इंदिसे यांचा जन्म दिनांक 5/3/1942 साली धुळे जिल्हयातील तळोजा तालुक्यातील प्रतापपुर येथे झाला. त्यांचे वडील दोधा कृष्णा इंदिसे हे 1952 साली शे.का.फे.चे पुर्वीच्या खानदेश नंतरचा धुळे आणि आत्ताच्या नंदुरबार जिल्हयातल्या तळोजा या तालुक्याचे तालुका अध्यक्ष होते.त्याकाळी षे.का.फे अन् प्रजासमाजवादीचे अशोक मेहता हे होते.तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणुन अण्णासाहेब नहनकर हे देखील धुळयाचेच होते. 1952 सालच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत नानांचे वय अवघे 10वर्षे होते.परंतु हत्ती अन् वडाचे झाड या निवडणुकितील दोन निशाणी त्यांना राजकारणाचेच धडे देत होते.त्यातच नानांचे पाय राजकारणात ओढले गेले. त्या सार्वत्रिक निवडणुकितुनच बालपणीच त्यांना राजकारणाचे बालकडु चाखावयास मिळाले.वडिल व्यापारी व शेतकरी असल्याने वडिलांबरोबरच त्यांचा सतत रहिवास असल्याने व्यापारानिमित्त वडिलांबरोबरच तेही बैलगाडी अथवा घोडयावरून शहरात जात असत.त्यामुळे त्यांचे शहराविषयी आकर्षण आणखीणच वाढले.1962 साली विधानसभेच्या निवडणुकीत केशव गोविंद वळवी हे आरपीआयच्या तिकिटावर तळोजा अक्कलकुवा या मतदार संघातुन उभे होते. त्यावेळी नानासाहेबांनी त्या निवडणुकीत पोलिंग एजंटचेही काम केले. === 1.3] ठाणे येथे प्रयाण=== नानासाहेब जुन्या अकरावी नंतर 1963 साली शहरी जिवनाच्या आकर्षणापायी ठाणे जिल्हयातील कळवा येथे स्थलांतरीत झाले. 1964 साली नानासाहेब इंदिसे हे ठाणे जिल्हयातील वाडा तालुक्यात फॉरेस्ट खात्यात नोकरीस लागले.1965ला वसईतील गोखीवरा येथे नानासाहेब इंदिसे रहावयास गेले.1966ला नानासाहेब इंदिसे पुन्हा ठाणे येथील येऊरला येऊन स्थायिक झाले. === 1.4] भारतीय राजकरणात प्रवेश === वडिलांकडुनच बालपणा पासून राजकारणाचे धडे मिळाल्याने नानांचे मन नोकरीत रमेना आणि 1967ला त्यांनी नोकरीचा राजिनामा देऊन राजकिय चळवळीत पूर्णवेळ सक्रिय सहभाग घेतला.ऑक्टोंबर 1966ला कर्मविर दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना रा.सु.गवई हे विद्यमान आमदार होते 1968 साली रा.सु.गवई हे उपसभापती झाले.तेव्हापासून नानासाहेब इंदिसे यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सक्रिय कार्य मोठया उत्साहात भरारी घेत जोमाने चालले होते. === 1.5] ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच === 1971 साली आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत माजीवडा येथे नानासाहेब इंदिसे हे डेप्युटी सरपंच झाले.1978 साली नानासाहेब इंदिसे हे माजीवडा येथे ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच म्हणुनच राजकारणात कार्यरत होते.1979ला नानासाहेब इंदिसे माजीवडा पंचायत समितीच्या निवडणुकिस उभे राहिले परंतु त्यांना अपयश आले.1985च्या ठाणे बेलापुर विधानसभा मतदार संघातुन नानासाहेब इंदिसे यांना अपयशाला सामोरे जावे लागले. === 1.6 ठाणे महानगर्पालिकेवर निर्वाचित === 1988ला नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकितही अपयशाला सामोरे जावे लागले.1992 मध्ये नानासाहेब इंदिसे यांनी ठाणे महानगर पालिकेत निर्वाचीत यश संपादन केले. नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेने परिवहन समितीचे चेअरमनपद देऊन सन्मान केला.या काळात त्यांनी अनेक गरजुंना नोकरीस लावले.त्याचा फायदा डॉक्टर, शिक्षक,बालवाडी शिक्षक,आया,कंडक्टर,ड्रायव्हर, बिगारी, शिपाई, हेल्पर,सुशिक्षीत बेरोजगार आदींचा उदरनिर्वाहणार्थ रोजगार उपलब्ध करून देऊन या पदाचा योग्य उपयोग केला.1997च्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत नानासाहेब इंदिसे यांना पुन्हा एकदा अपयशाला सामोरे जावे लागले. === 1.7] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना  === 2000 सालापासून नानासाहेब इंदिसे हे कळत नकळत ऐक्याच्या भुमीकेवर ठाम राहिले.2009 मध्ये पुन्हा माजिवडा विधानसभा मतदार संघात नानासाहेब इंदिसे यांना अपयश पचवावा लागला.निवडुन न येण्याची कारणे मला माहित होती परंतु आंबेडकरी समाज इतरांच्या दावणीला बांधला जाऊ नये या उद्येशाने विधानसभा निवडणुका लढविल्या. तदनंतर आज पर्यंत रिपाइचे वेगवेगळया गटातटाचे राजकारण चालुच आहे.त्या नंतर रिपब्लिकन पार्टीची अशी अवस्था पाहुन निळया निशाणाखाली सर्वांचे ऐक्य व्हावे याच उद्येशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारांच्या प्रेरणेतुनच नानासाहेब इंदिसे यांनी 20 डिसेंबर 2008 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना केली.या मध्ये शिवराम मोघा,कुमारसेन बौद्ध,उत्तमराव खडसे,प्रल्हाद सोनवणे, दौलतराम आदी.निष्ठावंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतानुसार नानासाहेबांबरोबर सक्रिय कार्य करू लागले. पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन युगप्रवर्तक,विष्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभुमी महु (आंबेडकर नगर) येथे भरविण्यात आले.यामध्ये आंबेडकरी चळवळीतले बहुतांश नेते,कार्यकर्ते यांना निमंत्रीत करण्यात आले. == 2] विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी व ऐतिहासिक घडामोडींचा परामर्श == तत्पुर्वी विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी वऐतिहासिक घडामोडींचा परामर्श खालिलप्रमाणे 20/7/1924 रोजी बहिष्कृत हितकारीणी संस्था स्थापन केली.3/3/1927 रोजी समता सैनिक दल स्थापन केले 20/3/1927 रोजी महाडचा सत्याग्रह, 26/7/1927 रोजी अंबादेवी मंदिर सत्याग्रह, 14/6/1928ला भारतीय बहिष्कृतशिक्षण मंडळ स्थापले, 22/9/1929 रोजी पर्वती पुणे सत्याग्रह,2/3/1930ला काळाराम मंदिर सत्याग्रह,4/10/1930डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृष्यांचा प्रतिनिधी म्हणुन गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला रवाना,7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931ला दुस-या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांना स्वतंत्र मतदार संघावरून गांधी आंबेडकरांत तिव्र मतभेद,23/9/1931ला मुखेडचा सत्याग्रह केला.24 सप्टेंबर 1932 पुणे करार, जानेवारी 1933 तिस-या गोलमेज परिषदेहुन भारतात रवाना,1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट लागु.13/10/1935 येवले मुक्कामी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘मी जरी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही’’ही घोषणा केली.15/8/1936ला स्वतंत्र मजुर पक्ष स्थापन केला.1937 मुंबई विधिमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे डॉ.आंबेडकरांसहित 14 उमेदवार निवडुन आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी पक्ष नेते होते.तर सभागृह उपनेते आर.आर.भोळे होते. या मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे शामराव परूळेकर, करंदीकर,जमनादास मेहता,झाबवाला आदी खंदे सदस्य होते.मोठा पक्ष म्हणुन मुस्लिम लिग हा होता त्यांचे नेते सर देहलवी हे होते 12/2/1939 मोहाडी धुळे सत्याग्रह,2/7/1942ला प्रथमच एक अस्पृष्य केंद्रिय मंत्रीमंडळात मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेबांचा भारताच्या व्हाइसरॉय कार्यकारी मंडळात समावेश झाला.19/7/1942ला शेडयुल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली,27/7/1942ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मजुरमंत्रीपदाचा कारभार सोपविण्यात आला. 8/7/1945 पिपिल्स ऐज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.4/6/1946 पुणे कौन्सील मोर्चा सत्याग्रह,27/6/1946 सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना,19/7/1946डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगाल विधिमंडळातुन घटना समितीवर निवडुन आले. 3/9/1946ला नागपुर सत्याग्रह, 5/9/1946डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश पार्लमेंटच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये कॉन्झर्वेटीव्ह इंडियन कमिटी समोर पुणे करार रद्द करण्याची व ब्रिटिश सरकारचा जातिय निवाडा लागु करण्याची मागणी केली.11/12/1946डॉ.राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 2/3/1947ला लखनौ सत्याग्रह केला.15 मार्च 1947 बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘स्टेटस अॅन्ड मायनॉरिटीज’’हा ग्रंथ प्रकाशीत केला.29 एपिंल 1947 रोजी घटनेतुन अस्पृष्यता निवारण्याविषयी सतरावे कलम संमत केले. 22 जुलै 1947 रोजी भारतीय ध्वज समितीचे सदस्य म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतुन अशोक चक्रांकित तिरंगा झेडा राष्ट्रध्वज म्हणुन निश्चित केला.23 जुलै 1947डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवर निवड झाली.3/8/1947 भारताचे कायदा मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्रीमंडळात समावेश15ऑगष्टला1947 भारत स्वतंत्र झाला.30/8/1947ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड.26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान भारतास अर्पण,8 मे 1950 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणुन शपथ घेतली.26 जानेवारी 1950ला भारतीय प्रजासत्ताक दिन. या दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासारख्या खंडप्राय देशात राज्यघटनेद्वारे लोकभिमुख लोकशाही पेरली सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे महत्त्व पटवुन ‘‘एक व्यक्ती,एक मुल्य,एक मत’’ याचा सिद्धांत घटनेत मांडुन सर्वांना एका किंमतीत आणले,त्याच बरोबर न्याय,स्वातंत्र्य,समता मैत्रीबंधुत्व ही नितीतत्त्वे राज्य घटनेच्या माध्यमातुन लोकशाही बळकट होण्यासाठी रूजवली अन् भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. 5 फेब्रुवारी 1951डॉ..आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लोकसभेत मांडले.27 सप्टेंबर हिंदुकोड बिल फेटाळल्याच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा त्याग केला.5 जानेवारी 1952 मुंबई लोकसभेत अपयश9 मार्च 1952डॉ. आंबेडकरांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. मे 1954 भंडारा लोकसभेच्या राखीव मतदार संघातील पोटनिवडणुकित अपयश आले.1954ला भारतीय बौद्धमहासभेची स्थापना केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत खोती बिल, महार वतन बिल, हिंदुकोड बिल, मंत्र्यांचे वेतन बिल, लोकप्रतिनिधि बिल,कामगारांचे किमान वेतन बिल सादर केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 13ऑक्टोंबर 1935 साली येवले मुक्कामी हिंदुधर्म त्यागाची चळवळ हाती घेऊन केलेल्या भिष्मप्रतिज्ञेच्या अनुशंगाने21वर्षे सातत्याने सर्व धर्माचा अभ्यास केला.अभ्यासपुर्वक निर्णयातुन त्यांनी निसर्गनियमांना अनुसरून,विज्ञाणाचा आधार घेऊन,सत्य व वास्तव यांची सांगड घालुन सम्यक ज्ञानाची कसोटी घेऊन 14ऑक्टोंबर 1956 रोजी अशोक विजया दशमी दिनी नागपुर येथे भन्ते चंद्रमणी यांच्या कडुन स्वतः भारतातीलच असलेल्या बौद्ध धम्माची धम्मदिक्षा घेऊन आपल्या समवेत असलेल्या सुमारे पाच लक्ष अनुयायांना त्यानी स्वतः बौद्ध धम्माची दिक्षा दिली. 20 नोव्हेंबर 1956 रोजी काठमांडु येथे जागतिक बौद्ध महापरिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘बुद्ध की,कार्लमार्क्स’’या विषयावर भाषण केले असता बौद्ध महापरिषदेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ‘राजा इ मलाला’यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना‘‘बोधिसत्व’’हि पदवी तेथेच बहाल केली. 24 नोव्हेंबर 1956 रोजी सारनाथ, आग्रा आणि दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.25 नोव्हेंबर 1956 रोजी सकाळी काशी विद्यापिठातील विद्यार्थी व आचार्यगणांसमोरभाषण केले तर सायंकाळी बनारस येथे महाबोधी संस्थेच्या सभेत शेवटचे भाषण केले. ==3] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली == रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 8/9 डिसेंबर 1955 मध्ये औरंगाबाद येथील वास्तव्यात पहिल्यांदा बोलुन दाखविला होता. भारतीय राज्य घटना ख-याखु-या अर्थाने राबविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाला भाग पाडणे तसेच सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान राजकीय पक्षांचे एकीकरण करून प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्षाला प्रस्थापीत करणे हा रिपब्लिकन पक्षाचा उद्येश असल्याचे त्यांनी सांगीतले.(जनता -10 डिसेंबर 1955 ) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 29/30 सप्टेंबर 1956 रोजी 26,अलिपुर रोड दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी त्यांच्याच अध्यक्षतेखाली शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकीतशेकाफे बरखास्त करून ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’या नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला अन् रिपाइ अस्तित्वात आल्याची घोषणा समारोपाच्या भाषणात केली.ज्या मध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जातीविरहित,धर्मविहिन चळवळ चालवुन या देषात असणारी विभिन्न विषमता नष्ट करण्यासाठी आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्रांती घडवुन आणुन वर्गविहिन,जातीविहिन समाजव्यवस्था निर्माण करतील व समाजवादी व आर्थिक पूनर्रचना करतील अशी त्यांना अपेक्षा होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घोषीत केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची ‘‘हत्ती’’ ही निशाणी ठेवण्यामागची भूमिका काय होती हे देखील समजावुन घेणे महत्त्वाचे आहे.हत्ती हा महाकाय प्राणी असल्याने आणि माझा समाज हा अडाणी समाज असल्याने इतर निशाणी ओळखण्यापेक्षा महाकाय हत्तीची निशाणी त्यांना तत्काळ ओळखता यावी म्हणुनच ‘‘हत्ती’’या निशाणीची निवड केली. तसेच शेडयुल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष मर्यादीत व ठराविक जातीपुरताच असल्याने 1952च्या लोकसभेत अन् 1954च्या भंडारा मधील पोटनिवडणुकीत उच्चजातीयांनी जातीय मानसिकतेतुन शे.का.फे.ला एकटे पाडल्याने आलेल्याअपयशाच्या कारणमीमांसेने ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’प्रजासत्ताक पक्ष म्हणुन स्थापन करणे संदर्भी पक्षाची घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहुन काढली होती.या पक्षात भारतीय जनतेला सामील होण्यासाठी खुल्ले पत्रही लिहिले होते.त्यांना आपल्या या पक्षाला विशिष्ट जातीचे लेबल लावुन हा पक्ष चालवायचा नव्हता.यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत नमुद पक्षाची ध्येय,उद्यिष्ट व तत्त्वप्रणाली नमुद केलेली आपणास आढळुन येतील.भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे तीच भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या घटनेत समाविष्ट करून घटना बनविण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचा तत्त्वज्ञानात्मक आधार, पक्षाची ध्येय,उद्दिष्टे व कार्यक्रम तसेच पक्ष सुदृढतेच्या कसोटया याचे अध्ययन केल्यास हा पक्ष भारतात अस्तित्वात असलेल्या अन्य कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा सर्वच बाबतीत सरस आहे हे दिसुन येते. मात्र पक्षाच्या या वैशिष्ट्याचीशिकवण सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहचविण्यात रिपब्लिकन पक्षाचे नेते,विचारवंत,पक्षावियी सहानूभुती असलेले बुद्धीजिवी,लेखक, सामाजिक कार्यकर्ते कमी पडले असे खेदाने म्हणावेसे वाटते. दिनांक 29/30 सप्टेंबर 1956 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या बैठकीत 26 अलीपुर रोड दिल्ली येथील आपल्या राहत्या घरी केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीवादी, ब्राम्हणवादी आणि कम्युनिस्ट या तिन विचारधारांना नाकारून रिपब्लिकन नावाची निख्खळ लोकशाहीवादी चौथी राजकीय संकल्पना भारतीय राजकारणाच्या पटलावर निर्माण केली मात्र त्यांच्या घोषणेतील राजकीय कृती प्रत्यक्षात उतरविण्यापुर्विच त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दुर्देवाने परिनिर्वाण झाल्याने पक्ष स्थापनेसाठी रिपब्लिकन पार्टीचा निर्णय अस्तित्वात येऊ शकला नाही.. == 4] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा == रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा या विषयावर टाकलेल्या प्रकाशझोतात रिपाइ एक्याबाबतच्या अनेक घडामोडींचा नानासाहेबांनी घेतलेला परामर्श आपल्याला बरेचसेकाही सांगुन जातो बऱ्याच जणांना माहित असेल परंतु आजच्या पिढीला माहित व्हावे या उद्देशानेच त्याचे सिंहावलोकन करीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणा नंतर मुंबई मध्ये दादर येथील चैत्यभुमीवर त्यांचे अंतीम संस्कार करण्यात आले.सदर प्रसंगी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी बाबासाहेबांच्या चित्तेवर शपथ घेऊन समतेचा रथ पुढे नेईन परंतु तो तसुभरही मागे घेणार नाही. त्या प्रमाणे 29 डिसेंबर 1956 रोजी अहमदनगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची प्रेसीडियमची बैठक झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली.दुस-या फळीतील नेत्यांमध्ये नेतृत्वावरून अहमहमिका लागली.दलित चळवळीचे नेतृत्व आपल्याकडे यावे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होती.परंतु शिल्लक राहिलेले सर्वच नेते तुल्यबळ असल्याने बाबासाहेबांच्या समवेत असणारे दादासाहेब गायकवाड, राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, बी.सी.कांबळे आदी नेत्यांनी चतुराईतुन सामूहिक नेतृत्वाचा मार्ग काढुन 1 जाने 1957 रोजी आपले पहिले अध्यक्षीय मंडळ स्थापन केले 1957च्या सार्वत्रिक निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्याच नावाने लढण्याचा आग्रह होता.परंतु त्यावेळी मुंबईसह महाराष्ट्र यासाठी काँग्रेस खेरीज जनसंघासहीत सर्व आघाडीत होते.ही आघाडीही तत्कालीन शे.का.फे.चाच एक भाग होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने व रिपाइ नवीन पक्ष असल्याने नानासाहेब गोरे,प्र.के.अत्रे यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्त्व नसल्याने आणि ज्या काळात शे.का.फे. होता त्या काळात रिपाइ कळायला उशीर झाल्यामुळे तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हे लक्ष पूर्ण होणार नसल्याचे घटक पक्षाने कर्मविर दादासाहेब गायकवाडांकडे आग्रह धरला. शेवटी निर्णया अंती या समितीतील घटक पक्षांनी आपल्या पुर्वीच्याच शेकाफेच्या नावाने निवडणुका लढवाव्या असा निर्णय जाहिर केला.कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी शे.का.फे.च्या माध्यमातुन एकास एक उमेदवार राहिल अशी संयुक्त महाराष्ट्र कृती समितीने काळजी घ्यावी असे ठरवुन महाराष्ट्र कृतीसमितीशी आघाडी करून निवडणुकीस सामोरे गेले.त्या निवडणुकीत कृतीसमितीला घवघवीत यश मिळाले. कृती समिती महाराष्ट्रात सत्तेत आली नाही परंतु प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन उदयास आली असल्याने केंद्र सरकारला 1 मे 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यास भाग पाडले.1957च्या निवडणुकीत शे.का.फे.च्या नावाने 1)कर्मविर दादासाहेब गायकवाड - नाशिक लोकसभा मतदार संघ,2)अॅड.बी.सी.कांबळे - नगर,3)जी.के.माने - मुंबई, 4)हरिहर सोनुले - नांदेड,5) ह.भा.साळुंखे (33वर्षाचे सर्वात लहान)- भोर तालुका,6)दिघे -कोल्हापुर बहुजन समाज, 7)परमार - अहमदाबाद, 8) दत्ता कट्टी - कर्नाटक,चिकोडी मतदार संघ, 9)एन शिवराज - चेन्नई असे 9 खासदार आणि महाराराष्ट्रातुन बहुतांशी आमदार निवडुन आले आणि शेकाफे हा पक्ष देशात 1957 साली दोन नंबरचा पक्ष म्हणुन राहिला.त्यावेळेस गट नेते कर्मविर दादासाहेब गायकवाड होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपाइ लवकरात लवकर कार्यरत व्हावी अशी खंत डॉ.बाबासाहेबांच्या समकालीन नेत्यांच्या मनात होती. पावसाळयामुळे ही प्रक्रिया थांबली अन् 2ऑक्टोंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे बॅ.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आले. 3/10/1957च्या रिपाइ च्याराष्ट्रीयअध्यक्षपदासाठी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी महाराष्ट्र व्यतिरिक्त दुस-या प्रांतात हा पक्ष जावा म्हणुन एन.शिवराज यांचे नाव घोषीत केल्याने ते एकमताने निवडुन आले.14 मे 1959 रोजी बी.सी.कांबळे रिपाइतुन बाहेर पडुन त्यांनी दुरूस्त रिपब्लिकन पक्ष स्थापन केला.अन रिपाइच्या बेकीचे बीज तेथेच रूजले गेले.परंतु महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता बी.सी.कांबळे (बापुसाहेब कांबळे)संपूर्ण महाराष्ट्रात कोठेच चालले नाही.1960 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला निर्वाचन आयोगाकडुन मान्यता मिळाली.ऑक्टोंबर 1962ला पुन्हा रिपाइचे दुसरे ऐक्य झाले.या ऐक्यातुन एन.शिवराज,कर्मविर दादासाहेब गायकवाड,राजाभाऊ खोब्रागडे,बि.पी.मौर्य,भय्यासाहेब आंबेडकर, शांताबाई दाणी,इ. समकालीन नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाचा झंझावात देशात सुरू केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राश्ट्रिय अधिवेशने काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत झाली.30 सप्टेंबर 1964ला एन शिवराज यांचे दिल्ली येथील मोर्च्याच्या वेळी दादासाहेब गायकवाडांच्या निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले.तदनंतर ऑक्टो 1964 मध्ये कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी रिपाइचे बॅरीस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत अशा आषयाची सूचना मांडली परंतु समकालीन नेत्यांनी ही सूचना अमान्य करून कर्मविर दादासाहेब गायकवाडांचीच रिपाइचे राष्ट्रीयअध्यक्ष म्हणुन निवड केली. कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी 6 डिसेंबर 1964ला 14 कलमी डिमांड घेऊन भूमीहिन सत्याग्रह करण्याची घोषणा केली त्यात एक घोष वाक्य होते.‘‘कसेल त्याची जमिन,नसेल त्याचे काय ? राहिल त्याचे घर,नसेल त्याचे काय ?’’हा सत्याग्रह जवळपास दोन महिने चालला.देशभरात सुमारे 3 लाख 65 हजारांच्यावर लोक तुरूंगात गेले. तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी फेब्रुवारी महिन्यात शिष्टमंडळास पाचारण केले. त्या शिष्टमंडळात कर्मविर दादासाहेब गायकवाड,बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे,दत्ता कट्टी,अषोक निळे,रा.सु.गवई,अनसुमंतराव गायकवाड आदी नेते होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक अन् भुमीहिनांचा, झोपडपट्टयांचा प्रश्न आदी प्रश्न सोडवले जाऊन दिनांक 5 फेब्रुवारी 1965ला हा सत्याग्रह यशस्वी झाला. 1962 साली उत्तर प्रदेश मधुन रिपाइचे 3 खासदार निवडुन आले होते.पंजाब मध्ये अकाली दल आणि आरपीआयची पहिली सत्ता स्थापन झाली त्यामध्ये दोन मंत्री हे आरपीआयचे होते.1965 साली आरपीआय सत्तेत होती याचे कारण बी.पी.मौर्य,संघप्रिय गौतम आणि कादरखान हे तिन नेते बाबासाहेबांच्या विचाराच्या दिशेने प्रामाणिक काम करीत होते.या काळात उत्तरप्रदेशात आरपीआय आणि एस.व्हि.डी. यांचे सरकार होते.चैधरी चरणसिंग तेव्हा मुख्यंत्री झाले.त्या सरकार मध्येही आरपीआयचे तिन मंत्री होते. 1967 साली रिपब्लिकन पक्षाला चांगले मतदान मिळाले.काही राज्यात रिपब्लिकन पक्षाला मंत्रीमंडळात मिळालेले स्थान हे केवळ रिपब्लिकन पक्षाच्या मतसंख्येच्या आधारे मिळाले होते.मागणी न करता मंत्रीमंडळात रिपब्लिकन पक्षाच्या आमदारांना घेतले जात होते.इतका दबदबा या पक्षाचा होता.पंजाब राज्यात धानुलिया यांना कॅबिनेटमंत्री म्हणुन घेण्यात आले.उत्तरप्रदेश मध्ये एक कॅबिनेट मंत्री घेण्याऐवजी असरार अहमद आणि शमीम आलम या दोन आमदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आले.हा पक्ष केवळ बौद्धांपुरता मर्यादीत नव्हता तर या पक्षाचे मंत्री मुस्लिमही होते. बिहारमध्ये रिपब्लिकन पक्षाची एवढी ताकद होती की,तेथे लाल पासवान नावाचा एकच उमेदवार निवडुन आला असला तरी त्याला मंत्रीमंडळात स्थान देण्याशिवाय गत्यंतर नव्हते.महाराष्ट्राशिवाय उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार,हरियाना या उत्तर भारतीय राज्यात रिपब्लिकन पक्ष हा एक समर्थ पक्ष होता. .   ऑक्टो.1968ला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे रिपाइतुन बाहेर पडले अन् स्वतंत्र खोब्रागडे गटाची निर्मिती केली.कर्मविर दादासाहेब गायकवाडांना अर्धांगवायुचा झटका आल्याने 29 डिसेंबर 1971ला कर्मविर दादासाहेब गायकवाड यांचे निर्वाण झाले.1972 मध्ये कोल्हापुरातील बावडा गावात गवई बंधुंचे डोळे काढण्यात आले.त्यावेळेस डॉ.बाबासाहेबांची विचारधारा अन् नांव ऐकुन असलेले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपले उद्धारकर्ते असल्याचे समजत असतानाही युक्रांत समाजवाद्यांच्या (कम्युनिस्ट)चळवळीत प्रॅक्टिकल रितीने काम करणाऱ्यांनीच अन्याय अत्याचाराचे निमित्त साधुन कळत नकळत रिपाइला नेस्तनाबुत करण्यासाठी सर्वांच्या मदतीने दलितपॅंथर्सची निर्मिती केली.26 जाने 1974ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तिसरे ऐक्य झाले.सी.आर.मोघम, बॅ.राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, रा.सु.गवई, बी.सी.कांबळे,शांताबाई दाणी हे ऐक्यात सामील झाले. पहिले 35 लोकांचे ऐक्याचे प्रेसीडियम झाले.मुंबईत पहाटे चार वाजेपर्यंत वसाहतीत मिटींग चालु झाल्या.पहिल्या प्रेसीडियमची बैठक सी.आर.मोघम यांनी बंगलोर येथे बोलवली तर दुसरी अमरावतीत झाली दुस-या बैठकीतुन बॅ.राजाभाऊ खोब्रागडे अन् त्यांचे सहकारी भय्यासाहेब आंबेडकर,घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,दत्ता कट्टी हे बाहेर पडले.तदनंतर बापुसाहेब कांबळे हे देखील बाहेर पडल्याने सी.आर.मोघम,रा.सु.गवई,वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,आर.जी.खरात,शांताबाई दाणी,अॅड.बाजीराव कांबळे ऐवढेच रिपाइत शेष राहिले. वर्ष सहा महिन्याच्या आतच ही ऐक्य प्रक्रिया संपुष्टात आली. 1975च्या दरम्यान खोब्रागडे गटातुनही भय्यासाहेब आंबेडकर, घनश्याम तळवटकर, सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके,प्रा.रमाकांत यादव, हे बाहेर पडले.1976च्या दरम्यान शांताबाई दाणी व त्यांचे सहकारी भाऊसाहेब चव्हाण,दादासाहेब रोहम,हे रिपाइ तुन बाहेर पडले.अशा त-हेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची वाताहत झाली. दुर्देवाने 17/9/1977ला मुंबईच्या के.ई.एम.रूग्णालयात भय्यासाहेब आंबेडकरांची प्राणज्योत मालवली. 1976 ते 1978 पर्यंत रिपाइंचे गटातटाचे राजकारण चालुच होते. 1978च्या हिवाळयात दादासाहेब रोहम,रा.सु.गवई समवेत एन.एस.कुभारे,व सी.आर.मोघम हे दिल्ली येथे आमरण उपोषणास बसले.1978च्या सरते शेवटी भारतीय दलित पॅंथर्सने रिपब्लिकन पक्षाच्या पुढा-यांस लक्ष अन् भक्ष ठरविले.भारतीय दलित पॅंथर्सचा गवगवा झाल्याने त्यांनी सवर्ण बहुजनांचा अर्वाचीत शिवराळ भाषेत उद्धार केला. आणि नामांतराचा लढा हाती घेतला. त्यांच्या बरोबरीने नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रिंसिपल पद न मिळाल्याने प्रा.जोगेंद्र कवाडे सरांनी लॉंग मार्च दलित मुक्ति सेना स्थापन केली. त्यांच्यातल्याच त्यांच्या अहमहमिकेतुन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पावसाळी अधिवेशनात नामांतराची घोषणा केली. निमित्त नामांतराचे होते. परंतु सवर्ण बहुजनांना राग होता तो त्यांच्या शिवराळ भाषेचा अन् त्यामुळेच मराठवाडा दंगल पेटली. दंगलीत सबंध मराठवाडा पेटला त्यात 649 पेक्षाही जास्त मृतांचा शासनाचा आकडा होता. सबंध मराठवाडयात मातंग, बौद्ध समाजाच्या वसाहती जळाल्या. त्यात पोचीराम कांबळे सारख्या मातंग समाजाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरी अनुयायाच्या शरिराचे छिन्नविछिन्न तुकडे करण्यात आले तरीही शेवटच्या श्वासाच्या क्षणापर्यंत ‘जयभिम’चा नारा त्यांनी सोडला नाही. अष्याही परिस्थितीत भारतीय दलित पॅंथर्सला भावनिक चळवळ वाढवायचीच होती. मात्र छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सिद्धांतानुसार रिपाइंतील रा.सु.गवई, दादासाहेब रोहम यांनी सामाजिक भान ठेवुन आपले बौद्धिक कौशल्य पणाला लावुन सहा महिन्याच्या आतच मराठवाडयात जातीय सलोखा निर्माण करून पुर्ववत मराठवाडयातील दलित वस्त्या शासनाच्या मदतीने पुर्ववत केल्या. वसाहती वसवुन समझोताही केला. उद्धवस्त झालेले संसारही त्यांनी बसविले. 1983 -84च्या कालखंडात तत्कालीन महाराष्ट्र राज्य सेवेतील सिनिअरमोस्ट सनदी बुद्धिस्ट अधिकारी यांनी आणखी एक गट निर्माण केला.या वादळाला अकोला,पॅटर्न,नांदेड पॅटर्न असे संबोधु लागले.1984ला अकोल्यातुन भारीपचे प्रकाशराव आंबेडकर यांना निवडणुकित अपयश आले.9 सप्टेंबर 1984 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने निधन दिल्ली येथे झाले.दिनांक 18/19 जानेवारी 1985 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे ज्येष्ट सहकारी दत्ता कट्टी अन् त्यांचे सहकारी व रा.सु.गवई यांचे सहकारी म्हणजेच वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,पी.टी.मधाळे - माजी आमदार सांगली,खंडेराव सावंत -माजी आमदार सातारा,दादासाहेब रोहम -माजी आमदार संगमनेर नगर,दादासाहेबब शिर्के -कोल्हापुर, तसेच शांताबाई दाणी,अॅड. बाजीराव कांबळे -कर्जत सातारा,भाऊसाहेब चव्हाण,एम.डी.शेवाळे,के.बी.श्रृंगारे -नाशिक,देवीदास वाघपांजार -दर्यापुर अमरावती, नानासाहेब उर्फ गंगाराम इंदिसे,व्हि.बी.ससाणे - ठाणे,आदींचे 18/19 जानेवारीत नागपूरच्या आमदार निवासात ऐक्या संदर्भात म्हणजेच गवई व खोब्रागडे गटात बैठक झाली.त्या ऐक्यातुन दत्ताजी कट्टी अध्यक्ष अन् रा.सु.गवई कार्याध्यक्ष झाले. आणि 1985च्या मार्च महिन्यातील सार्वत्रिक विधान सभेच्या निवडणुकीस सामोरे जावे लागले. सहा महिन्यातच दत्ता कट्टी गेले अन् ऐक्य फुटले.सहा महिन्याच्या आतच या ऐक्यप्रक्रियेची फाटाफुट झाली परंतु देशातील बहुतांषी बॅरिस्टर राजाभाऊंना माननारा वर्ग हा दादासाहेब रोहम व रा.सु.गवई यांच्या बरोबरच राहिला.त्या ऐक्यप्रक्रियेतुन दत्ता कट्टी हे एकटे बाहेर फेकले गेले.घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके, प्रा.रमाकांत यादव हे दादासाहेब रोहम,रा.सु.गवई यांच्या सोबत राहिले. तदनंतर पुन्हा एकदा1995 साली रिपाइचे पाचवे ऐक्य झाले अन् चार खासदार संसदेत निवडुन आले.तेही ऐक्य लवकरच फूटले. 1988ला ऐन पावसाळयात रिडल्स प्रकरण घडले.6 डिसेंबर 1988ला रा.सु.गवईंनी दिल्ली येथील बोटक्लब वर लाक्षणीक अशा भव्य मोर्च्याचे आयोजन केले असता ‘न भूतो न भविष्यती अशामोर्च्यात सुमारे 6 ते 7 लक्ष अनुयायांनी सहभाग घेतला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष कर्मविर दादासाहेब गायकवाड ते एन.शिवराज यांच्या नंतर गल्ली ते घराघरा पर्यंत वाटला गेला.जो,तो उठतो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव अन् निळे निशाण घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुढे अबकड लावुन संघटना तयार करून पुढारपणाच्या नावाखाली आपल पुढारपण आणि आपल्या घराची व्यवस्था कशी होईल या प्रवृत्तीने वागायला लागले आहेत. त्यामुळे दिवसेगणिक आंबेडकरी जनतेवर, मायभगिनींनीवर, मागासवस्त्यांवर, अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत. अन्याय,अत्याचार झाल्यानंतर पुढारी अश्रु पुसावयास जातात परंतु त्यांचे मुळ शोधत नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेप्रमाणे ‘‘माझा समाज सत्तास्थानी व सत्ताधारी असला पाहिजे’’ या उलट आज पुढा-यांची दशा झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या संकल्पनेचा विसर पडुन ते आज शिवसेना, बि.जे.पी.चे स्वप्न साकार करावयास निघालेत या सारखी दुर्देवाची बाब कोणती ? मग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत अन् संकल्पना हे प्रात्यक्षिक वास्तव्यात आणावयाचे असेल तर आमच्या कार्यकर्त्यांनी‘‘नेता छोडो समाज जोडो !’’हे अभियान सुरू केले आहे. समाजजागृत आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरी विचारांशी एकनिष्ठ आहे. समाजात एकसंघ खंबीर नेतृत्व नसल्याने समाज दिषाहिन झालेला आहे. ‘‘नेत्यांचे ऐक्य करण्या ऐवजी समाजाचे ऐक्य व्हावे’’ हाच खरा उद्येश असल्याने या पक्ष स्थापने मागची नानासाहेब इंदिसे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना रिपब्लिकन पक्ष एक व्हावा. हीच भूमिका पक्ष स्थापनेमागची होती आणि आजही त्या भुमिकेवर मी ठाम आहे. मला अध्यक्षपदाचा हव्यास मुळीच नाही. म्हणुनच मी कुमारसेन बौद्ध(दिल्ली) यांना अध्यक्ष केले होते. परंतु दुर्देवाने ते या कामी सपशेल अपयशी ठरले. ऐक्यासाठी मी आर.पी.आय.नेते रामदासजी आठवले,प्रा.जोगेंद्र कवाडे सर,बाळासाहेब आंबेडकर,व इतरही लहाणमोठया गटनेत्यीशी बोललो चर्चा केल्या परंतु त्यातुन ऐक्य काही घडुन आले नाही. मी आठवले व कवाडे सरांना दिल्ली येथील बैठकीत सांगीतले निदान तिघे तरी आपण प्रथम एकत्रित येऊ परंतु तांत्रिक कारणे पुढे करून या नेत्यांनी या ऐक्याला फाटा दिला.मी नामवंत आंबेडकरी कलावंत यांच्या माध्यमातुन नागपूर, पुणे, भिमा-कोरेगांव, महाड, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, दिल्ली, अहमदाबाद, सुरत, बडोदा इ. शहरांमध्ये मेळावे आयोजीत करून जनतेला हाक दिली. जनतेलाही ऐक्य हवे आहेपरंतु जनतेत नेत्यांचीच विश्वासार्हता कमी झालेली आहे. कारण अनेक वेळा ऐक्यफुटणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले उद्यिष्ट साध्य करता आले नाही. याची खंत माझ्या सहित देशातील तमाम आंबेडकरी समाजाला आहे. आम्ही एकत्रित आलो तर बहुजन समाजही आमचे बरोबर एकत्रित येईल. तसा विश्वास त्यांच्यात निर्माण करता येईल. मी आशावादी आहे आणि निश्चयी सुद्धा आहे. म्हणुन मला आशा आहे की एक दिवस इतर पक्षाच्या चाक-या सोडुन नेते नक्कीच एकत्र येतील. तेव्हा एका डोळयात बुद्धांची शांती तर दुस-या डोळयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भिमक्रांती तेवत ठेवा. तसेच बुद्धधम्माचे अन् बावीस प्रतिज्ञांचे पालन करून बुद्धविहारात एकत्रित बसुन लोकशाही प्रमाणे आम्हास या देशाची शासनकर्ती जमात बनावयास पाहीजे असा आपण सम्यक संकल्प केला पाहिजे. आपण सर्व मैत्रीबंधुभावनेने एकदिलाने,एकविचाराने प्रज्ञारूपी सूर्याचे सूर्यकिरणे बनुन या महामानवाने बदललेल्या इतिहासाला साक्षी ठेवुन या भारत देशात परिवर्तन घडवुन आणु अन् आपल्या हाताच्या ओंजळीनेच पाणी पिऊ.आपण आपल्याच ऐक्याच्या कर्तुत्वाने उजाळु अन् शासनकर्ती जमात बनु तेव्हाच ख-या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची,राज्यघटनेची आणि भारत देषाची महती जगाला कळेल. हाच खरा कोटी-कोटी प्रणाम महापुरूष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांस आपल्या सर्वांच्यांच निश्चयातुन लाभेल. . - नानासाहेब इंदिसे, राष्ट्रीय अध्यक्ष- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी) !!! जयभिम !!! [[वर्ग:आंबेडकरवादी राजकीय पक्ष]] [[वर्ग:भारतीय रिपब्लिकन पक्ष]] c6z64ydddqk78davgwsnr63buw1j8p7 आष्टी बुद्रुक 0 259389 2581312 1855464 2025-06-20T13:17:07Z Khirid Harshad 138639 [[आष्टी (खेड)]] ला असणारे पुनर्निर्देशन हटविले 2581312 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''आष्टी बुद्रुक''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=सावनेर | जिल्हा = [[नागपूर जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} '''आष्टी बुद्रुक''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] [[सावनेर |सावनेर तालुक्यातील]] एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ #https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics #https://www.weather-atlas.com/en/india-climate [[वर्ग:सावनेर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील गावे]] 6e5das2kcabgbvxm2dzixcq4qh10r2n महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने 0 261064 2581563 2535785 2025-06-21T10:18:51Z 45.248.16.248 2581563 wikitext text/x-wiki महाराष्ट्र राज्यात ६ राष्ट्रीय उद्याने, ५२ अभयारण्ये, 6 संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण ५८ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ १००५४.१३ किमी<sup>२</sup> म्हणजे राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३.२६ टक्के इतके आहे. राज्यातील १९ संरक्षित क्षेत्रांचा समावेश करून (६ राष्ट्रीय उद्याने आणि १४ अभयारण्ये) [[ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प]], नागपूरचा [[पेंच व्याघ्र प्रकल्प]], अमरावतीचा [[मेळघाट व्याघ्र प्रकल्प]], कोल्हापूरचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, [[नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प]] आणि बोरचा व्याघ्र प्रकल्प असे सहा व्याघ्र राखीव क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. यापैकी बोर व्याघ्र प्रकल्पाची कार्यवाही सध्या सुरू आहे. ==राष्ट्रीय उद्याने== {| class="wikitable" width="100%" style="text-align:center;" ! अ.क्र. ! राष्ट्रीय उद्याने ! जिल्हा ! प्राणी/पक्षी ! क्षेत्र (किमी<sup>२</sup>) ! स्थापना |- | १. | ताडोबा राष्ट्रीय उद्यान ([[महाराष्ट्र|महाराष्ट्रतील]] पहिले [https://www.mahagovjobs.in/2020/11/national-parks-in-maharashtra.html उद्यान]{{मृत दुवा|date=December 2024 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}) | चंद्रपूर | वाघ | ११६.५५ | १९५५ |- | २. | नावेगाव बांध राष्ट्रीय उद्यान | गोंदिया | वाघ | १३३.८८ | १९७२ |- | ३. | पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान (पेंच) (लहान ) | [[नागपूर जिल्हा|नागपूर]] | वाघ | २७५ | १९८३ |- | ४. | संजय गांधी राष्ट्रीय उद्यान | मुंबई उपनगर (बोरीवली) | वाघ | १०४ | १९६९ |- | ५. | गुगामल राष्ट्रीय उद्यान (सर्वात मोठे) | अमरावती | वाघ | १६७३ | १९७४ |- | ६. | चांदोली राष्ट्रीय उद्यान | सांगली सातारा कोल्हापूर रत्‍नागिरी | वाघ | ३१७.६७ | २००४ |- |} == अभयारण्ये == {| class="wikitable" width="100%" style="text-align:center;" ! अ.क्र. ! अभयारण्ये ! जिल्हा ! प्राणी/पक्षी ! क्षेत्र (किमी<sup>२</sup>) ! स्थापना |- | १. | अंबाबरवा अभयारण्य | बुलढाणा | | १२७.११० | |- | २. | अंधारी अभयारण्य | चंद्रपूर |वाघ | ५०९.२७० | |- | ३. | अनेर डॅम अभयारण्य | धुळे | | ८२.९४० | |- | ४. | भामरागड अभयारण्य | गडचिरोली | | १०४.३८० | |- | ५. | भीमाशंकर अभयारण्य | पुणे-ठाणे | | १३०.७८० | |- | ६. | बोर अभयारण्य | वर्धा-नागपूर | | ६१.१०० | |- | ७. | चपराळा अभयारण्य | गडचिरोली | | १३४.७८० | |- | ८. | देऊळगाव-रेहेकूरी अभयारण्य | अहमदनगर | | २.१७० | |- | ९. | ज्ञानगंगा अभयारण्य | बुलढाणा | | २०५.२१० | |- | १०. | नान्नज माळढोक पक्षी अभयारण्य (पुनर्रचित) | सोलापूर-अहमदनगर | | १२२९.२४ | |- | ११. | गौताळा औत्रमघाट अभयारण्य | छत्रपती संभाजीनगर-जळगाव | | २६०.६१० | |- | १२. | गुगामल राष्ट्रीय उद्यान | अमरावती | | ३६१.२८० | |- | १३. | जायकवाडी पक्षी अभयारण्य | छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर | | ३४१.०५० | |- | १४. | कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य | अहमदनगर | | ३६१.७१० | |- | १५. | कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्य | वाशिम | | १८.३२१ | |- | १६. | कर्नाळा फोर्ट पक्षी अभयारण्य | रायगड | | १२.१५५ | |- | १७. | काटेपूर्णा अभयारण्य | अकोला | | ७३.६९० | |- | १८. | कोयना अभयारण्य | सातारा | | ४२३.५५० | |- | १९. | लोणार अभयारण्य | बुलढाणा | | ३.८३१ | |- | २०. |मालवण सागरी अभयारण्य |सिंधुदुर्ग | |२९.१२२ | |- | २१. |मयुरेश्वर सुपे अभयारण्य |पुणे | |५.१४५ | |- | २२. | मेळघाट अभयारण्य | अमरावती | | ७८८.७५० | |- | २३. | नायगाव मयूर अभयारण्य | बीड | | २९.९०१ | |- | २४. | नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य | नाशिक | | १००.१२० | |- | २५. | नरनाळा अभयारण्य | अकोला | | १२.३५० | |- | २६. | नागझिरा अभयारण्य | भंडारा-गोंदिया | | १५२.८१० | |- | २७. | पैनगंगा अभयारण्य | यवतमाळ-नांदेड | | ४२४.८९० | |- | २८. | फणसाड अभयारण्य | रायगड | | ६९.७९० | |- | २९. | दाजीपूर - राधानगरी अभयारण्य | कोल्हापूर |गवा | ३५१.१६० | |- | ३०. |सागरेश्वर अभयारण्य |सांगली | |१०.८७७ | |- | ३१. | तानसा अभयारण्य | ठाणे | | ३०४.८१० | |- | ३२. | टिपेश्वर अभयारण्य | यवतमाळ | | १४८.६३२ | |- | ३३. | तुंगारेश्वर अभयारण्य | पालघर | | ८५.७०० | |- | ३४. | वान अभयारण्य | अमरावती | | २११.००६ | |- | ३५. | पाल - यावल अभयारण्य | जळगाव | | १७७.५२० | |- | ३६. | येडशी रामलिंगघाट अभयारण्य | धाराशिव | | २२.३७४ | |- | ३७. | मानसिंगदेव अभयारण्य | नागपूर | | १८२.५८० | |- | ३८. | नागझिरा अभयारण्य | गोंदिया | | १५१.३३५ | |- | ३९. | नवेगाव अभयारण्य | गोंदिया | | १२२.७५६ | |- | ४०. | बोर अभयारण्य | नागपूर | | ६०.६९ | |- | ४१. | नवीन माळढोक पक्षी अभयारण्य | धाराशिव | | ०१.९८ | |- | ४२. | भोरगड संवर्धन राखीव क्षेत्र | नाशिक | | ३.४९३ | |- | ४३. | उमरेड कऱ्हांडला अभयारण्य | नागपूर-भंडारा | | १८९.२९ | |- | ४४. | कोलामार्का संवर्धन राखीव | गडचिरोली | | १८०.७२ | |- | ४५. | ताम्हिनी अभयारण्य | पुणे-रायगड | | ४९.६२ | |- | ४६. | कोका अभयारण्य | भंडारा | | ९७.६२४ | |- | ४७. | मुक्ताई भवानी अभयारण्य | जळगाव | | १२२.७४ | |- | ४८. | न्यू बोर विस्तारित अभयारण्य | वर्धा | | १६.३१ | |- | ४९. | मामडापूर संवर्धन राखीव | नाशिक | | ५४.४६ | |- | ५०. | प्राणहिता अभयारण्य | गडचिरोली | | ४२०.०६ | |- | ५१. | सुधागड अभयारण्य | रायगड-पुणे | | ७७.१२८ | |- | ५२. | ईसापूर अभयारण्य | यवतमाळ-हिंगोली | | ३७.८०३ | |- |} [[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]] q34ccizdf9zlqfdnojn5oy65f1fidax अल्लीपूर 0 264957 2581305 2164404 2025-06-20T13:03:42Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[अल्लीपुर]] वरुन [[अल्लीपूर]] ला हलविला 1982955 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''अल्लीपुर''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=बाभुळगाव | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' अल्लीपुर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] 9pls0o514o76h4km16r2gnokj8yqa01 श्रीरामपूर (पुसद) 0 266999 2581577 1984784 2025-06-21T10:43:33Z नरेश सावे 88037 2581577 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''श्रीरामपूर''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=पुसद | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' श्रीरामपूर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] se2kti9og0dr57dh6lgdhbi101l1ioc सिंगारवाडी 0 267000 2581576 1984874 2025-06-21T10:43:18Z नरेश सावे 88037 2581576 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''सिंगारवाडी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=पुसद | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' सिंगारवाडी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] jq21a7w41v121mr8t0iw6if2c3t7wjq सुकळी (पुसद) 0 267001 2581575 1984887 2025-06-21T10:43:05Z नरेश सावे 88037 2581575 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''सुकळी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=पुसद | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' सुकळी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] trv41brs40tbh5220tfbad7zs2f0uiu उदाडी 0 267002 2581574 1983063 2025-06-21T10:42:51Z नरेश सावे 88037 2581574 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''उदाडी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=पुसद | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' उदाडी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] gzz8aid9bilknt7rl2eg2p45ivcq8js उपवनवाडी 0 267003 2581573 1983066 2025-06-21T10:42:38Z नरेश सावे 88037 2581573 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''उपवनवाडी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=पुसद | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' उपवनवाडी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] ce8rywjszv00hwef04s9wrr2uil5fr7 उटी (पुसद) 0 267004 2581572 1983060 2025-06-21T10:42:26Z नरेश सावे 88037 2581572 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''उटी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=पुसद | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' उटी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] n98c0lz3m3qd4yym4unknaojq5259im वसंतपूर 0 267005 2581571 1984610 2025-06-21T10:42:13Z नरेश सावे 88037 2581571 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''वसंतपूर''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=पुसद | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' वसंतपूर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] hfo1blekgp3qnfi9put5v0vllnopg4u वसंतवाडी (पुसद) 0 267006 2581570 1984612 2025-06-21T10:42:00Z नरेश सावे 88037 2581570 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''वसंतवाडी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=पुसद | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' वसंतवाडी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] 9aaqvofluafcrhiqy3p971mguztv9kx वडगाव (पुसद) 0 267007 2581569 1984588 2025-06-21T10:41:46Z नरेश सावे 88037 2581569 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''वडगाव''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=पुसद | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' वडगाव''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] qythc8vnc85u8k23zw9iaccnymjnf3n शुभेच्छा 0 269319 2581429 2486251 2025-06-21T04:30:09Z 2409:40C0:1E:58D6:8000:0:0:0 वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये कशा असाव्यात याचे उदाहरण लिंक दिलेली आहे. 2581429 wikitext text/x-wiki {{बदल}} '''शुभेच्छा'''<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.quora.com/What-is-the-meaning-of-Marathi-word-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE-Shubheccha|title=What is the meaning of Marathi word शुभेच्छा (Shubheccha)? - Quora|website=www.quora.com|access-date=2020-12-06}}</ref> म्हणजे '''शुभ इच्छा'''. ज्याला शुभेच्छा देत आहोत त्याच्या हिताची कामना करणे.  '''उदा.'''<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.aamboli.com/dictionary/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE-meaning-in-english|title=शुभेच्छा meaning in English and Hindi, Meaning of शुभेच्छा in English : Aamboli Dictionary|website=www.aamboli.com|access-date=2020-12-06|archive-date=2021-01-18|archive-url=https://web.archive.org/web/20210118080715/https://www.aamboli.com/dictionary/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE-meaning-in-english|url-status=dead}}</ref> माझी शुभेच्छा आहे की तुम्ही सर्व सुखी रहा. तुमचा दिवस शुभ असावा. शुभेच्छा ह्या सणाच्या, वाढदिवसाच्या किव्हा विवाहाच्या देखील असू शकतात. सण आणि वाढदिवस हे वर्षातून एकदाच येणारे विशेष असे दिवस असल्याने या दिवशी आपण आपल्या जवळच्या माणसांना तो दिवस आनंददायक जावा अश्या शुभेच्छा देतो. नवीन विवाह झालेल्या जोडप्यांना त्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात आनंदाने करण्यासाठी आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा अश्या शुभेच्छा दिल्या जातात. शुभेच्छा दिल्याने त्या दिवसाचा आनंद द्विगुणित होतो आणि ज्याला शुभेच्छा देत आहोत त्या व्यक्तीबद्दलचा आपला आदर आणि प्रेमही ही व्यक्त होते. आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना विशेष असे महत्त्व आहे, आणि जर आपण कॅलेंडर पाहिले तर असे दिसते की प्रत्येक आठवड्याला एक मोठा सण हा आहेच. प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. '''एकादशी, चतुर्थी,''' रोज कोणाना कोणा महान व्यक्तीची '''जयंती, राष्ट्रीय दिवस''' आणि इतर बरेच महत्त्वाचे दिवस. म्हणूनच एकमेकांना शुभेच्छा देणे हा दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. == शुभेच्छा देण्याच्या पद्धती == शुभेच्छा ह्या प्रसंगानुरूप आणि विशेष वेळेनुसार बदलत जातात. ''उदा.'' प्रसंग जर एखाद्या स्पर्धा परीक्षेचा असेल तर त्या व्यक्तीला परीक्षेत उत्तम यश मिळावे अश्या शुभेच्छा दिल्या जातात. वाढदिवस असेल तर वाढदिवसाच्या दिल्या जाणाऱ्या हार्दिक शुभेच्छा आणि वेळेनुसार म्हंटले तर पहाटेच्या वेळी दिल्या जाणाऱ्या '''सकाळच्या शुभेच्छा''' आणि रात्रीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या '''शुभ रात्री शुभेच्छा'''. सोमवारी दिल्या जाणाऱ्या शुभ सोमवार अश्या शुभेच्छा. आजकाल तर वयानुसार देखील शुभेच्छा दिल्या जातात. जसे की, वयाची 60 वर्षे पूर्ण केल्याबद्दलच्या शुभेच्छा, '''50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा'''. अश्या वयाच्या पहिल्या वर्षांपासून ते व्यक्ती म्हातारा होईपर्यंत शुभेच्छा ह्या संपत नाहीत. '''वाढदिवसाच्या शुभेच्छांचा नमुना:''' ''आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,'' ''तुम्हाला उदंड आयुष्य लाभो,'' ''मनी हाच ध्यास आहे !'' ''यशस्वी व्हा, औक्षवंत व्हा,'' ''याच सदिच्छेसह..'' ''वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !'' ==[https://www.samarambh.com/2022/07/happy-birthday-wishes-2023.html?m=1 3. वाढदिवसाच्या शुभेच्छा]== {{संदर्भयादी}} 0qmjdqoh3bmhg5j75mbhrumgs5c2bkl 2581430 2581429 2025-06-21T04:31:08Z Quangkhanhhuynh 152187 Undid edits by [[Special:Contribs/2409:40C0:1E:58D6:8000:0:0:0|2409:40C0:1E:58D6:8000:0:0:0]] ([[User talk:2409:40C0:1E:58D6:8000:0:0:0|talk]]) to last version by संतोष गोरे 2581430 wikitext text/x-wiki {{बदल}} '''शुभेच्छा'''<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.quora.com/What-is-the-meaning-of-Marathi-word-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE-Shubheccha|title=What is the meaning of Marathi word शुभेच्छा (Shubheccha)? - Quora|website=www.quora.com|access-date=2020-12-06}}</ref> म्हणजे '''शुभ इच्छा'''. ज्याला शुभेच्छा देत आहोत त्याच्या हिताची कामना करणे.  '''उदा.'''<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.aamboli.com/dictionary/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE-meaning-in-english|title=शुभेच्छा meaning in English and Hindi, Meaning of शुभेच्छा in English : Aamboli Dictionary|website=www.aamboli.com|access-date=2020-12-06|archive-date=2021-01-18|archive-url=https://web.archive.org/web/20210118080715/https://www.aamboli.com/dictionary/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE-meaning-in-english|url-status=dead}}</ref> माझी शुभेच्छा आहे की तुम्ही सर्व सुखी रहा. तुमचा दिवस शुभ असावा. शुभेच्छा ह्या सणाच्या, वाढदिवसाच्या किव्हा विवाहाच्या देखील असू शकतात. सण आणि वाढदिवस हे वर्षातून एकदाच येणारे विशेष असे दिवस असल्याने या दिवशी आपण आपल्या जवळच्या माणसांना तो दिवस आनंददायक जावा अश्या शुभेच्छा देतो. नवीन विवाह झालेल्या जोडप्यांना त्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात आनंदाने करण्यासाठी आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा अश्या शुभेच्छा दिल्या जातात. शुभेच्छा दिल्याने त्या दिवसाचा आनंद द्विगुणित होतो आणि ज्याला शुभेच्छा देत आहोत त्या व्यक्तीबद्दलचा आपला आदर आणि प्रेमही ही व्यक्त होते. आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना विशेष असे महत्त्व आहे, आणि जर आपण कॅलेंडर पाहिले तर असे दिसते की प्रत्येक आठवड्याला एक मोठा सण हा आहेच. प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. '''एकादशी, चतुर्थी,''' रोज कोणाना कोणा महान व्यक्तीची '''जयंती, राष्ट्रीय दिवस''' आणि इतर बरेच महत्त्वाचे दिवस. म्हणूनच एकमेकांना शुभेच्छा देणे हा दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. == शुभेच्छा देण्याच्या पद्धती == शुभेच्छा ह्या प्रसंगानुरूप आणि विशेष वेळेनुसार बदलत जातात. ''उदा.'' प्रसंग जर एखाद्या स्पर्धा परीक्षेचा असेल तर त्या व्यक्तीला परीक्षेत उत्तम यश मिळावे अश्या शुभेच्छा दिल्या जातात. वाढदिवस असेल तर वाढदिवसाच्या दिल्या जाणाऱ्या हार्दिक शुभेच्छा आणि वेळेनुसार म्हंटले तर पहाटेच्या वेळी दिल्या जाणाऱ्या '''सकाळच्या शुभेच्छा''' आणि रात्रीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या '''शुभ रात्री शुभेच्छा'''. सोमवारी दिल्या जाणाऱ्या शुभ सोमवार अश्या शुभेच्छा. आजकाल तर वयानुसार देखील शुभेच्छा दिल्या जातात. जसे की, वयाची 60 वर्षे पूर्ण केल्याबद्दलच्या शुभेच्छा, '''50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा'''. अश्या वयाच्या पहिल्या वर्षांपासून ते व्यक्ती म्हातारा होईपर्यंत शुभेच्छा ह्या संपत नाहीत. '''वाढदिवसाच्या शुभेच्छांचा नमुना:''' ''आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,'' ''तुम्हाला उदंड आयुष्य लाभो,'' ''मनी हाच ध्यास आहे !'' ''यशस्वी व्हा, औक्षवंत व्हा,'' ''याच सदिच्छेसह..'' ''वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !'' ==संदर्भ== {{संदर्भयादी}} k00ak4m85as3sv5yw31nidl3u09jetn भारतातील किल्ल्यांची यादी 0 271609 2581290 2487094 2025-06-20T12:27:26Z 2409:40C2:18:7F07:8000:0:0:0 स्वप्नील घाटे 2581290 wikitext text/x-wiki ही '''भारतातील किल्ल्यांची''' यादी आहे . == आंध्र प्रदेश == === किनारी प्रदेश === {{div col|colwidth=30em}} # बेलामकोंडा किल्ला - गुंटूर जिल्हा # बॉबिली किल्ला - विजयनगरम जिल्हा # दुर्गम किल्ला - प्रकाशम जिल्हा (कानगिरी) # गजानन किल्ला - विशाखापट्टणम जिल्हा # गोंथिना किल्ला - विशाखापट्टणम जिल्हा # कोंडापल्ली किल्ला - कृष्णा जिल्हा # कोंडावेदु किल्ला - गुंटूर जिल्हा # मछलीपट्टनम किल्ला (१६ व्या शतकातील डच किल्ला) <ref>{{Citation|last=Tandavakrishna Tungala|title=Bandar Kota ( Machilipatnam Fort built by the Dutch, the French and the British )|date=2017-03-24|url=https://www.youtube.com/watch?v=iCQXXICC04w|accessdate=2017-11-21}}</ref> - कृष्णा जिल्हा # पार्थ किल्ला # उदयगिरी फोर्टसॅड - नेल्लोर जिल्हा # व्यंकटीगिरी किल्ला - नेल्लोर जिल्हा # विजयनगरम किल्ला - विजयनगरम जिल्हा {{div col end}} === रायलसीमा प्रदेश === {{div col|colwidth=30em}} # अडोनी किल्ला - कुर्नूल जिल्हा # चंद्रगिरी किल्ला - तिरुपती # चेन्नमपल्ली किल्ला - कुर्नूल जिल्हा # देवराया किल्ला - विजयनगरम जिल्हा # गंडिकोटा किल्ला - कडप्पा जिल्हा # गुटीचा किल्ला - अनंतपूर जिल्हा # गुरूरामकोंडा किल्ला - चित्तूर जिल्हा # कोंडा रेड्डी किल्ला - कुर्नूल जिल्हा # सिद्धवतम् किल्ला - कडप्पा जिल्हा {{div col end}} == अरुणाचल प्रदेश == {{div col|colwidth=30em}} # इटा किल्ला, इटानगर # भीष्माकनगर किल्ला, रोइंग # बोलुंग किल्ला, बोलुंग # गोम्सी किल्ला, पूर्व सियांग # रुक्मिणी किल्ला, रोइंग # तेजू किल्ला, रोइंग # बुरोई किल्ला, पापुम पारे {{div col end}} == आसाम == {{div col|colwidth=30em}} # [[गार्चुक लछित गड]] # गढ दोल # कारेंग घर # मटियाबाग पॅलेस # तलातल घर {{div col end}} ==बिहार == {{div col|colwidth=30em}} # बक्सर किल्ला # दरभंगा किल्ला # जगदीशपूर किल्ला # जलालगड किल्ला # मुंगेर किल्ला # रोहतासगड किल्ला # शेरगड किल्ला {{div col end}} == चंदीगड == {{div col|colwidth=30em}} # बुरैल किल्ला # मनिमाजरा किल्ला {{div col end}} == छत्तीसगड == {{div col|colwidth=30em}} # चैतूरगड # दुर्ग # जशपूर # कचुरी # खैरागड # रायगड # रतनपूर किल्ला # सरगुजा पॅलेस # शक्ती {{div col end}} == दादरा - नगर हवेली आणि दीव - दमण == {{div col|colwidth=30em}} # दीव किल्ला # फोर्ट सेंट ॲंथोनी ऑफ सिंबोर {{div col end}} == दिल्ली == {{div col|colwidth=30em}} # आदिलाबाद किल्ला # फिरोजशाह कोटला # जहांपनाह # नजफगड किल्ला # पुराना किला # किला राय पिथौरा # लाल किल्ला # सलीमगड किल्ला # सिरी किल्ला # किला लाल कोट # तुघलकाबाद किल्ला {{div col end}} == गोवा == {{div col|colwidth=30em}} # अगुआडा किल्ला # अलोर्ना किल्ला # अंजेदिवा किल्ला # बैतूल किल्ला # काबो दे रामा # चांदोर किल्ला # चपोरा किल्ला # कोळवले किल्ला # कोर्ज्यूम किल्ला # गॅसपार डायस किल्ला # मोरमुगिओ किल्ला # नानुझ किल्ला # नरोआ किल्ला # पालेसिओ डो काबो # पोंडा किल्ला # रचोल किल्ला # रीस मगोस # सँक्लेम किल्ला # बनस्तारीम किल्ल्याचे साओ टियागो # टिविम किल्ल्याचा साओ टोमे # सेंट एस्टेव्हम किल्ला # ट्रायकोल किल्ला {{div col end}} == गुजरात == {{div col|colwidth=30em}} # भद्रा किल्ला, [[अहमदाबाद]] # भुजिया किल्ला, भुज, जडेजा राजपूतचा # कानठकोट किल्ला, भाचाळ, सोलंकी आणि चावडा राजपूत यांचा व्याप # माणिक बुर्ज, अहमदाबाद # पावगड, चवडा राजपूतची # रोहा किल्ला, भुज, कच्छ राजपुतांचा काही कुळ # सोनगड किल्ला, तापी जिल्हा # सुरत वाडा, [[सुरत]] # तेरा किल्ला, कच्छ, जडेजा राजपूतचा # उपरकोट किल्ला, जुनागड, चुडासमा राजपूतचा # पाटण किल्ला, पाटण, सोलंकी राजपूतचा # इदार किल्ला, इदार, राठौर राव राजपूत यांचा # भरुच किल्ला, भरुच, सोलंकी राजपूतचा # दाभोईचा किल्ला, दाभोई, सोलंकी राजपूतचा # इंद्रगड किल्ला, पालिकरंबेली {{div col end}} == हरयाणा == {{div col|colwidth=30em}} # असीगड किल्ला (याला हांसी फोर्ट देखील म्हणतात), चौहान आणि तोमर राजपूत यांचा # बादशाहपूर किल्ला # बुरिया किल्ला # धोसी टेकडी किल्ला # फर्रुखनगर किल्ला # फतेहाबाद किल्ला # फिरोज शाह पॅलेस कॉम्प्लेक्स # इंदूर किल्ला # जिंद किल्ला # कैथल किल्ला # कोटला किल्ला # लोहारू किल्ला, शेखावत राजपूतचा # माधोगढ किल्ला, हरियाणा मधील माधोगढ किल्ला, कच्छवाह राजपूतचा # महेंद्रगड किल्ला # महाम किल्ला # नाहरसिंह महाल # पिंजोर किल्ला # रायपूर राणी किल्ला, चौहान राजपूतचा # सधौरा किल्ला # सिरसा फोर्ट मध्ये [[सिरसा]] <ref name="Hiltebeitel Hiltebeitel 1999 p. 174">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=uV-RrRoMzbgC&pg=PA174|title=Rethinking India's Oral and Classical Epics: Draupadi Among Rajputs, Muslims, and Dalits|last=Hiltebeitel|first=P.R.A.|last2=Hiltebeitel|first2=A.|publisher=University of Chicago Press|year=1999|isbn=978-0-226-34050-0|page=174|access-date=20 October 2018}}</ref> # तोशाम किल्ला, तोमर आणि चहान राजपूतचा # ठाणेसर किल्ला {{div col end}} == हिमाचल प्रदेश == {{div col|colwidth=30em}} # आर्की किल्ला # बेजा पॅलेस # जैटक किल्ला # कहलूर किल्ला # कमला किल्ला # कांगडा किल्ला # कुनिहार किल्ला # कुतलेहर किल्ला # महलॉग किल्ला # नादौन किल्ला, हमीरपूर {{div col end}} == जम्मू-काश्मीर == {{div col|colwidth=30em}} # [[अखनूर_किल्ला| अखनूर किल्ला]] # बहु किल्ला # भीमगड किल्ला # चिक्टन किल्ला # हरि परबत किल्ला # जसमरगड किल्ला # रामनगर किल्ला {{div col end}} == झारखंड == {{div col|colwidth=30em}} # पलामू किल्ला # शाहपूर किल्ला {{div col end}} == कर्नाटक == {{div col|colwidth=30em}} # मल्लियाबाद किल्ला # जलादुर्गा # बहाद्दूर बांडी किल्ला # कायडीगेरा किल्ला # बिदर किल्ला # बसवकल्याण किल्ला # भालकी किल्ला # मन्याखेटा किल्ला # किट्टूर किल्ला # परसगड किल्ला # बेळगाव किल्ला # सौंदट्टी किल्ला # रामदुर्ग किल्ला # बैलहोंगल किल्ला # हुली किल्ला # गोकाक किल्ला # शिरसांगी किल्ला # विजापूर किल्ला # गजेंद्रगड किल्ला # कोरलाहल्ली किल्ला # हॅमगी किल्ला # हेमागुड्डा किल्ला # मुंदरगी किल्ला # सिंगातलूर किल्ला # टिपपुरा किल्ला # नरगुंद किल्ला # मगडी किल्ला # जमलाबाद किल्ला # बरकूर किल्ला # दरिया-बहादुर्गगड किल्ला # कपू किल्ला # हवनूर किल्ला # मिर्जन किल्ला # सदाशिवगड किल्ला # अस्नोती # सांदुरू किल्ला # बेल्लारी किल्ला # आडोनी किल्ला # कोप्पळ किल्ला # अनेगुंडी किल्ला # कंपली किल्ला # इराकलगडा # गुलबर्गा किल्ला # सेदम किल्ला # शाहपूर किल्ला # आयहोल किल्ला # बादामी किल्ला # बांकापुरा किल्ला # सवानूर किल्ला # चित्रदुर्ग किल्ला # देवनाहल्ली किल्ला # वनादुर्ग किल्ला # चन्नागिरी किल्ला # कावळेदुर्ग किल्ला # बसवराज दुर्गा किल्ला # उचंगीदुर्ग किल्ला # [[बुदिकोटे]] # किल्ला अंजेडिवा # गुढीबांडा # वागींगेरा किल्ला # बंगलोर किल्ला # [[भीमगड किल्ला]] # कम्मतदुर्ग # पावागडा # माडीकेरी किल्ला # सावंदुर्गा # मकालिदुरगा # वनादुर्गा # सन्मुदगेरी # विशालगड # नगारा किल्ला # बसवराज किल्ला # रायदुर्ग # हुथ्रीदुर्ग # अंबाजीदुर्ग # मांजराबाद किल्ला # स्कंदगिरी # होसादुर्गा # नगारा किल्ला # सत्यमंगलम किल्ला # टेकलाकोटे किल्ला # तीर्थाहल्ली किल्ला # रायचूर किल्ला {{div col end}} == केरळ == {{div col|colwidth=30em}} # अंकुथेंगु किल्ला # [[बेक्कल किल्ला]] # [[चंद्रगिरीचा किल्ला]] # [[कोडंगल्लूर किल्ला]] (याला कोडुंगल्लूर किल्ला, कोट्टापुरम किल्ला देखील म्हणतात) # [[ईस्ट फोर्ट]] # किल्ला इमॅन्युएल # फोर्ट थॉमस # [[होसदुर्ग किल्ला]] # नेदुमकोट्टा, शहराची भिंत # [[पालघाटचा किल्ला]] # [[पल्लीपुरम किल्ला]] # [[कण्णूर किल्ला]] (कन्नूर किल्ला किंवा कन्नूर कोट्टा म्हणूनही ओळखला जातो) # [[तलचेरीचा किल्ला]] # विल्यम किल्ला (याला चेतुवा फोर्ट देखील म्हणतात) {{div col end}} == मध्य प्रदेश == {{div col|colwidth=30em}} # अटर किल्ला, भिंड (भदोरिया राजपूतचा) # रीवा किल्ला # अहिल्या किल्ला # असिरगड किल्ला # बजरानगड किल्ला # बंधवगड किल्ला # चंदेरी किल्ला # गिनोरगड किल्ला # दतिया किल्ला # धार किल्ला # गढ कुंदर # गडपहरा # गोहड किल्ला # गोविंदगड किल्ला # ग्वाल्हेर किल्ला # गुजरी महल, ग्वाल्हेरचा किल्ला # मान मंदिर, ग्वालियर किल्ला # तेली का मंदिर, ग्वाल्हेरचा किल्ला # सास बहु मंदिर, ग्वालियर किल्ला # गारौली किल्ला # हिंगलाजगड # कामकंदला किल्ला # मदन महल # मंदसौर किल्ला # मांडू किल्ला संकुल # नरवर किल्ला # ओरछा किल्ला परिसर # रायसेन किल्ला # रामपायली गड # सबलगड किल्ला (सबला गुर्जर) # नबालसिंह खंडेराव हाबली, साबळगड किल्ला # सिंधियाकलिन बंद, साबळगड किल्ला # श्योपुर # सेंधवा # विजयराघवगड # उटिला किल्ला {{div col end}} == [[महाराष्ट्र भोकरदन|महाराष्ट्र]] == {{div col|colwidth=16em}} # [[अंकाई]] # [[अंकाई-टंकाई]] # [[अंजनवेल]] # [[अंजनेरी]] # [[अंतूर किल्ला]] # [[अंबागड]] # [[अंमळनेरचा किल्ला]] # [[अचला]] # [[अजिंक्य पारगड]] # [[अजिंक्यतारा]] # [[अडसूळ]] # [[अर्नाळा]] # [[अर्नाळा किल्ला]] # [[अलंग]] # [[अलिबाग - हिराकोट]] # [[अलिबाग किल्ला]] # [[अवचितगड]] # [[अशीरगड]] # [[अशेरीगड]] # [[अहमदनगरचा भुईकोट किल्ला]] # [[अहिवंत]] # [[आंबोळगड]] # [[आजोबागड]] # [[आड (किल्ला)]] # [[आमनेरचा किल्ला]] # [[आसवगड]] # [[इंद्राई]] # [[इरशाळगड]] # [[उंदेरी किल्ला]] # [[उतवड किल्ला]] # [[औंढ]] # [[औसा किल्ला]] # [[कंक्राळा]] # [[कंचना]] # [[कंधारचा किल्ला]] # [[कण्हेरगड]] # [[कनकदुर्ग]] # [[कन्हेरगड]] # [[कमळगड]] # [[कर्नाळा]] # [[कऱ्हेगड]] # [[कलाडगड]] # [[कलानिधीगड]] # [[कल्याणगड]] # [[कांचनगड]] # [[कांचना]] # [[कानिफनाथ गड]] # [[कामनदुर्ग]] # [[कालानंदीगड]] # [[काळदुर्ग]] # [[कावनई किल्ला]] # [[कावळ्या किल्ला]] # [[कुंजरगड]] # [[कुर्डूगड - विश्रामगड]] # [[कुर्डूगड किल्ला]] # [[कुलंग]] # [[कुलाबा किल्ला]] # [[केंजळगड]] # [[केळवे किल्ला]] # [[कोथळीगड]] # [[कोथळ्याचा भैरवगड]] # [[कोरीगड - कोराईगड]] # [[कोर्लई]] # [[कोळधेर किल्ला]] # [[कोहोजगड]] # [[खांदेरी किल्ला]] # [[खैराई किल्ला]] # [[गंधर्वगड]] # [[गंभीरगड]] # [[गाळणा]] # [[गाविलगड]] # [[गुणवंतगड]] # [[गोंड राजाचा किल्ला]] # [[गोंदियाचा प्रतापगड]] # [[गोरक्षगड]] # [[गोरखगड]] # [[गोवागड]] # [[घनगड]] # [[घारगड]] # [[घोडबंदर किल्ला]] # [[घोसाळगड]] # [[चंदन - वंदन]] # [[चंद्रगड]] # [[चंद्रपूर किल्ला]] # [[चकदेव]] # [[चांभारगड]] # [[चाकणचा किल्ला]] # [[चावंड]] # [[चौरगड किल्ला]] # [[जंगली जयगड]] # [[जंजाळा किल्ला]] # [[जयगड]] # [[जीवधन]] # [[टंकाई]] # [[टकमक किल्ला]] # [[डांग्या किल्ला]] # [[डेरमाळ]] # [[ढाकोबा किल्ला]] # [[तळगड]] # [[तळागड]] # [[तांदूळवाडी]] # [[तारापूर किल्ला]] # [[तारामती (किल्ला)]] # [[ताहुली]] # [[तिकोना]] # [[तुंग]] # [[तुंगी किल्ला]] # [[तेरेखोल किल्ला]] # [[तेलबैला किल्ला]] # [[तोरणा]] # [[त्रिंगलवाडी किल्ला]] # [[थाळनेर किल्ला]] # [[दातिवरे किल्ला]] # [[दातेगड]] # [[दुर्ग - ढाकोबा]] # [[दुर्ग कलावंतीण]] # [[दुर्ग किल्ला]] # [[दुर्गाडी किल्ला]] # [[देवगड किल्ला]] # [[दौलतमंगळ]] # [[धोडप]] # [[नगरधाण]] # [[नळदुर्ग]] # [[निमगिरी किल्ला]] # [[निवती किल्ला]] # [[रमेश नेवसे]] # [[न्हावीगड]] # [[पट्टागड]] # [[पदरगड किल्ला]] # [[पद्मदुर्ग]] # [[पन्हाळा]] # [[परंडा किल्ला]] # [[पळसगड]] # [[पवनीचा किल्ला]] # [[पांडवगड]] # [[पाबरगड]] # [[पारोळ्याचा किल्ला]] # [[पिसोळ]] # [[पुरंदर किल्ला]] # [[पूर्णगड किल्ला]] # [[पेठ किल्ला]] # [[पेब]] # [[प्रचितगड]] # [[प्रतापगड]] # [[प्रबळगड - मुरंजन]] # [[चर्चा:प्रबळगड - मुरंजन]] # [[फणी किल्ला]] # [[फत्तेगड]] # [[बल्लारपूर किल्ला]] # [[बल्लाळगड]] # [[बसगड किल्ला]] # [[बहादरपूर किल्ला]] # [[बहादूरगड]] # [[बहादूरवाडी]] # [[बहिरगड]] # [[बहिरी - गडदचा बहिरी]] # [[बाणकोट]] # [[बाणूरगड]] # [[बानुरगड]] # [[बारडगड]] # [[बाळापूर किल्ला]] # [[बितनगड किल्ला]] # [[बिरवाडी किल्ला]] # [[ब्रह्मगिरी किल्ला]] # [[ब्रह्मा किल्ला]] # [[भंडारगड]] # [[भगवंतगड]] # [[भरतगड]] # [[भांगशीमाता गड]] # [[भिवगड]] # [[भीमगड किल्ला]] # [[भूपतगड किल्ला]] # [[भूषणगड]] # [[भैरवगड]] # [[भोंडगड]] # [[भोरगिरी किल्ला]] # [[मंगळगड]] # [[मच्छिंद्रगड]] # [[मदनगड]] # [[मधुमकरंदगड]] # [[मनरंजन किल्ला]] # [[मनसंतोषगड]] # [[मनोहरगड]] # [[मलंगगड]] # [[मल्हारगड]] # [[महिपतगड]] # [[महिमंडणगड]] # [[महिमानगड]] # [[मांगी - तुंगी]] # [[माणिकगड]] # [[मानगड]] # [[मार्कंडा किल्ला]] # [[मालेगावचा किल्ला]] # [[माहीमचा किल्ला]] # [[माहुलीगड]] # [[मुरुड जंजिरा]] # [[मुल्हेर]] # [[मोरागड]] # [[यशवंतगड (जैतापूर)]] # [[यशवंतगड (रेडी)]] # [[रतनगड]] # [[रत्‍नदुर्ग]] # [[रवळ्या-जवळ्या]] # [[रसाळगड]] # [[रांगणा]] # [[राजकोट आणि सर्जेकोट]] # [[राजकोट किल्ला]] # [[राजगड]] # [[राजधेर]] # [[राजमाची]] # [[रामगड]] # [[रामशेज किल्ला]] # [[रामसेज किल्ला]] # [[रायकोट]] # [[रायगड (किल्ला)]] # [[रायरीचा किल्ला]] # [[रायरेश्र्वर]] # [[रायरेश्वर]] # [[रेवदंडा किल्ला]] # [[रोहिडा]] # [[रोहिदास (किल्ला)]] # [[रोहिलागड]] # [[लळिंग किल्ला]] # [[लिंगाणा]] # [[लोंझा]] # [[लोंझा किल्ला]] # [[लोहगड]] # [[वज्रगड किल्ला]] # [[वर्धनगड]] # [[वसंतगड]] # [[वसईचा किल्ला]] # [[वांद्रेचा किल्ला]] # [[वाघेरा किल्ला]] # [[वारूगड]] # [[वासोटा]] # [[विजयगड]] # [[विजयदुर्ग]] # [[विलासगड]] # [[विशाळगड]] # [[विसापूर]] # [[वेताळगड]] # [[वेताळगड किल्ला]] # [[वैराटगड]] # [[शिरगावचा किल्ला]] # [[शिवगड]] # [[शिवडीचा किल्ला]] # [[शिवनेरी]] # [[शीवचा किल्ला]] # [[श्रीवर्धन किल्ला]] # [[संतोषगड]] # [[सज्जनगड]] # [[सदाशिवगड]] # [[सदाशिवगड (कराड)]] # [[सप्तशृंगी]] # [[सरसगड]] # [[सर्जेकोट]] # [[सांकशी किल्ला]] # [[सागरगड]] # [[सानगडीचा किल्ला]] # [[सामानगड]] # [[सालोटा किल्ला]] # [[साल्हेर]] # [[सिंदोळा किल्ला]] # [[सिंधुदुर्ग]] # [[सिंहगड]] # [[सिताबर्डीचा किल्ला]] # [[सिद्धगड]] # [[सुधागड]] # [[सुमारगड]] # [[सुरगड]] # [[सुवर्णदुर्ग]] # [[सोनगड]] # [[सोनगिर किल्ला]] # [[सोलापूरचा भुईकोट]] # [[हडसर]] # [[हरगड]] # [[हरिश्चंद्रगड]] # [[हरिहर किल्ला]] # [[हातगड]] {{div col end}} == मणिपूर == {{div col|colwidth=30em}} # बिहू लॉकॉन # कंगला किल्ला {{div col end}} == ओडिशा == {{div col|colwidth=30em}} # बाराबती किल्ला, [[कटक]] # चुडंगा गडा, [[भुवनेश्वर]] # पोटागड किल्ला, [[गंजम]] # रायबनिया किल्ला, [[बालासोर]] # सिसूपळगड, [[भुवनेश्वर]] {{div col end}} == पुडुचेरी == {{div col|colwidth=30em}} # फ्रेंच फोर्ट लुईस {{div col end}} == पंजाब == {{div col|colwidth=30em}} # गोबिंदगड किल्ला # बाजवारा किल्ला # किला मुबारक (भटिंडा किल्ला म्हणूनही ओळखले जाते) # केशगड किल्ला # शाहपूरकांडी किल्ला # लोधी किल्ला # मानौली किल्ला # फिल्लौर किल्ला # पायल किल्ला # मनी मजरा # बुरैल किल्ला # बहादूरगड किल्ला # फूल किल्ला (फुलकियन रॉयल फॅमिलीचा रहिवासी) # बहादूरगड किल्ला # पटियालाचा शीश महल # नाभाचा नाभ्याचा किल्ला # किला मुबारक, पटियाला # जींडन किल्ला (फूल रॉयल फॅमिलीच्या रघुचा रहिवासी) {{div col end}} == राजस्थान == {{div col|colwidth=16em}} # अभेदा महल किल्ला, [[कोटा जिल्हा|कोटा]] # खटोली किल्ला, [[कोटा जिल्हा|कोटा]] # कुनाडी किल्ला # पलेठा किल्ला # [[सिटी पॅलेस, जयपूर]] # [[हवामहाल|हवा महल]], [[जयपूर]] # जल महल, [[जयपूर]] # जग मंदिर, [[कोटा जिल्हा|कोटा]] # उम्मेद भवन पॅलेस, [[जोधपूर]] # जसवंत थडा, [[जोधपूर]] # सरदार सामंद प्लेस, [[जोधपूर]] # किल्ला खजेरला, [[जोधपूर]] # मंदोर किल्ला, जोधपूर # चान्व्हा किल्ला, लूनी # देवगड किल्ला, [[सीकर]] # सीकर गड किल्ला, [[सीकर]] # रघुनाथ गड किल्ला # राजा रायसल लामिया किल्ला, [[सीकर]] # दंता किल्ला, [[सीकर]] # बीकानेर किल्ला, [[बिकानेर|बीकानेर]] # खाबा किल्ला # कला किल्ला, [[अल्वर|अलवर]] # दधीकर किल्ला # राजगड किल्ला, [[अलवर]] # अचलगड किल्ला # अजबगारा किल्ला # अलवर किल्ला # अलवर सिटी पॅलेस # [[अंबरचा किल्ला|आमेरचा किल्ला]] # बाणसी किल्ला # बादलगड किल्ला, [https://www.google.com/search?q=Badalgarh+Fort+Jhunjhunu&stick=H4sIAAAAAAAAAONgecR4kpFb4OWPe8JS-xknrTl5jXEHIxdXcEZ-uWteSWZJpVAAFxuUpcIlKMWrn65vaJiWV5JcUllVqMEgxc-FKiSloMTFq85_REA0ne-DjpYQ533jx5oilsKWgrYv4pb-cXmcoxRh5LPr0rRzbG6CDECQEBjoIKWpJcTF7lnsk5-cmCO4pXZr1vdjG-y0hLk4QhIr8vPycyvBShkYPtgr8XECaYWJ-u32tiARLYamfSsOsbFwMAow8CxilXBKTEnMSU8sylBwyy8qUfDKKM3LAuJSAC_hTSvqAAAA&sa=X&ved=2ahUKEwit3uWOyc_rAhUr4XMBHRiaB24Q6RMwIXoECA4QAg&biw=1600&bih=789] # बाणसूर किल्ला # भद्राजन किल्ला # भैंसरोरगड # भानगड किल्ला # भटनेर किल्ला # बिजई गढ # चित्तोड किल्ला # चोमु पॅलेस # डीग पॅलेस # गॅग्रोन किल्ला # गुगोर किल्ला, बारण [https://www.google.com/search?bih=789&biw=1600&hl=en-US&ei=NkJSX-74DcvYz7sP-Li44A4&hotel_occupancy=&q=gugor+fort&oq=gugor+fort&gs_lcp=CgZwc3ktYWIQAzIGCAAQBxAeMgYIABAHEB4yBggAEAcQHjIGCAAQBxAeMgYIABAHEB4yBggAEAcQHjIGCAAQBxAeMgYIABAHEB4yBggAEAcQHjIGCAAQBxAeOgQIABBHOggIABAHEAoQHjoKCAAQCBAHEAoQHjoFCAAQkQI6BAguEEM6AggAOggILhCxAxCDAToFCAAQsQM6CAguEMcBEK8BOggIABCxAxCDAVDK5wRY2PoEYJH8BGgAcAF4AIABhgKIAdkPkgEFMC4xLjiYAQCgAQGqAQdnd3Mtd2l6wAEB&sclient=psy-ab&ved=0ahUKEwju67_Wzs_rAhVL7HMBHXgcDuwQ4dUDCA0&uact=5] # हिंडौन किल्ला # जयगड किल्ला # जैसलमेर किल्ला # जलोर किल्ला # झालावाड किल्ला (गढ पॅलेस) # जुनागड किल्ला # कणकवाडी # केसरोली टेकडी किल्ला # खंडार किल्ला # खेत्री महाल, [[झुनझुनू]] # कल्ला किल्ला, [[अलवर]] # कोटा किल्ला # कुचामन किल्ला # कुंभलगड किल्ला, कुंभलगड # खिमसर किल्ला # खेजरला किल्ला # खंडार फोर्ट # किशनगड किल्ला # केळवाडा किल्ला, बारण # लक्ष्मणगड किल्ला # लोहागड किल्ला # माधोगढ किल्ला # मानधोली किल्ला # [[मेहरानगढ|मेहरानगड किल्ला]] # मुकुंदगड किल्ला, मुकुंदगड # मुंदरू किल्ला # नागौर किल्ला # नुआ किल्ला, [https://www.google.com/search?q=Badalgarh+Fort+Jhunjhunu&stick=H4sIAAAAAAAAAONgecR4kpFb4OWPe8JS-xknrTl5jXEHIxdXcEZ-uWteSWZJpVAAFxuUpcIlKMWrn65vaJiWV5JcUllVqMEgxc-FKiSloMTFq85_REA0ne-DjpYQ533jx5oilsKWgrYv4pb-cXmcoxRh5LPr0rRzbG6CDECQEBjoIKWpJcTF7lnsk5-cmCO4pXZr1vdjG-y0hLk4QhIr8vPycyvBShkYPtgr8XECaYWJ-u32tiARLYamfSsOsbFwMAow8CxilXBKTEnMSU8sylBwyy8qUfDKKM3LAuJSAC_hTSvqAAAA&sa=X&ved=2ahUKEwit3uWOyc_rAhUr4XMBHRiaB24Q6RMwIXoECA4QAg&biw=1600&bih=789] # नाहरगड किल्ला # नीमराणा # पाटण किल्ला # पगारा किल्ला, बुंडी <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.google.com/search?q=pagara+fort&oq=pagara+fort&aqs=chrome..69i57j69i60l3.3042j0j9&sourceid=chrome&ie=UTF-8}}</ref> # फलोदी किल्ला # रणथंभोर किल्ला # रूपानगड किल्ला # सिवाना किल्ला # शेरगड किल्ला, [[धौलपूर]] # शहाबाद किल्ला, बारण # शेरगड किल्ला, बारण # तारागड किल्ला, [[अजमेर]] # तारागड किल्ला, बुंदी # तिजारा किल्ला # तिमन गड # सिटी पॅलेस, [[उदयपूर]] # विजय निवास पॅलेस, अजमेर (आता हेरिटेज हॉटेल) [https://www.tripadvisor.in/Hotel_Review-g317096-d302386-Reviews-Bijay_Niwas_Palace-Ajmer_Ajmer_District_Rajasthan.html] # किशनगड किल्ला, [[अजमेर]] # फूल महल पॅलेस, [[अजमेर]] # मोखम विलास, [[अजमेर]] # अधै दिन का झोनप्रा, [[अजमेर]] # रामबाग पॅलेस, [[जयपूर]] (आता एक हेरिटेज हॉटेल) # [[देवीगढ पॅलेस हॉटेल|देवीगड]], उदयपूर (आता एक हेरिटेज हॉटेल) # रणबांका पॅलेस, [[जोधपूर]] (आता एक हेरिटेज हॉटेल) # रतन विलास पॅलेस, [[जोधपूर]] # अजित भवन पॅलेस (आता एक हेरिटेज हॉटेल), [[जोधपूर]] # मान्सून पॅलेस सज्जनगड किल्ला, [[उदयपूर]] # जग मंदिर बेट पॅलेस, [[उदयपूर|उदयपुर]] # बागोर-की-हवेली, [[उदयपूर|उदयपुर]] # [[लेक पॅलेस]], [[उदयपूर]] # बुजरा किल्ला (आता एक हेरिटेज हॉटेल), [[उदयपूर|उदयपुर]] # फतेह प्रकाश राजवाडा, [[उदयपूर]] # अकबरी किल्ला आणि संग्रहालय, [[अजमेर]] # मसुदा किल्ला # झोरवारगड किल्ला, झुंझ्नू [https://www.google.com/search?q=zorawargarh+fort&oq=zorawargarh+fort&aqs=chrome..69i57j46l2j0l5.3600j0j7&sourceid=chrome&ie=UTF-8] {{div col end}} == सिक्किम == {{div col|colwidth=30em}} # बुडंग गारी किल्ला {{div col end}} == तामिळनाडू == {{div col|colwidth=30em}} # [[वेल्लूरचा किल्ला|वेल्लोर किल्ला]] # आलमपराई किल्ला # अंचेतीदुर्गम # अरंगांगी किल्ला # [[आत्तूरचा किल्ला|अतूर किल्ला]] # [[दिंडुक्कलचा किल्ला|दिंडीगुळ किल्ला]] # ड्रोग किल्ला, कुन्नूर # इरोड किल्ला # फोर्ट डॅनसबॉर्ग # फोर्ट गेल्ड्रिया # [[फोर्ट सेंट डेव्हिड, कडलूर|फोर्ट सेंट डेव्हिड]] # [[फोर्ट सेंट जॉर्ज, चेन्नई|फोर्ट सेंट जॉर्ज]] # किल्ला विजफ सिन्नेन # [[जिंजीचा किल्ला|जिंजी किल्ला]] # केनिलवर्थ किल्ला (होसूर) # कृष्णागिरी किल्ला # मनोरा किल्ला # नामक्कल किल्ला # पद्मनाभपुरम किल्ला # राजागिरी किल्ला # रांजणकुडी किल्ला # सदरा # संकगिरी किल्ला # टांग्राकोटाई # तिरुमायम किल्ला # [[रॉकफोर्ट (त्रिच्चीचा किल्ला)|तिरुचिरापल्ली रॉक किल्ला]] # तिरुचिराप्पल्ली किल्ला # उदयगिरी किल्ला # वट्टाकोटाई किल्ला {{div col end}} == तेलंगणा == {{div col|colwidth=30em}} # भोंगीर किल्ला # देवरकोंडा किल्ला # एल्गंडल किल्ला # गांधारी खिल्ल # [[गोवळकोंडा|गोलकोंडा किल्ला]] # खम्मम किल्ला # मेडक किल्ला # नागूनूर किल्ला # निजामाबाद किल्ला # रचकोंडा किल्ला # रामगिरी किल्ला # वारंगल किल्ला # अस्मानगड किल्ला # गडवाल किल्ला # जागातीय किल्ला # श्यामगड किल्ला # त्रिमूलघरी किल्ला {{div col end}} == उत्तर प्रदेश == {{div col|colwidth=30em}} # [[google:awahgarh+fort&oq=awahgarh+fort&aqs=chrome..69i57j46j0j46j0l3.3174j0j9&sourceid=chrome&ie=UTF-8|अवघ्रा किल्ला, एटा]] # आगोरी किल्ला # [[आग्‍ऱ्याचा किल्ला|आग्रा किल्ला]] # अलिगड किल्ला # अलाहाबाद किल्ला # बाटेश्वर किल्ला, आग्रा # बाह किल्ला, आग्रा # बदाऊं किल्ला # भरेह गड # बिजली पासी किल्ला # छप्पर घाटा किल्ला # चुनार किल्ला # फतेहगड किल्ला # [[फत्तेपूर सिक्री|फतेहपूर सीकरी]] # हाथरस किल्ला # हातकांत किल्ला, आग्रा # झांसी किल्ला # कालिंजार किल्ला # कुचेसर किल्ला # कोटर्मा किल्ला # कचोरा किल्ला # नौगांव किल्ला # पिनाहट किल्ला, पिनाहट # रामनगर किल्ला # [[google:raja+sumer+singh+fort&oq=raja+sumer+singh+fort&aqs=chrome..69i57j46j0l4.4204j0j9&sourceid=chrome&ie=UTF-8|राजा सुमेरसिंग किल्ला, इटावा]] # रुहिया किल्ला # सेनापती किल्ला # उंचगाव किल्ला # विजयगड किल्ला # अमेठी किल्ला {{div col end}} == उत्तराखंड == {{div col|colwidth=30em}} # चांदपूर किल्ला # चौखुतिया किल्ला # देवगड किल्ला # खगमारा किल्ला # लालमंडी किल्ला # मल्ला पॅलेस किल्ला # पिथौरागड किल्ला {{div col end}} == पश्चिम बंगाल == {{div col|colwidth=30em}} # बक्सा किल्ला # फोर्ट विल्यम # कुरुम्बेरा किल्ला # भुनिया किल्ला # फोर्ट मॉर्निंगटन # फोर्ट रेडिसन # [[व्हिक्टोरिया मेमोरियल]] # हजर्डुवारी प्लेस {{div col end}} ==संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:आशियातील किल्ल्यांच्या यादी|भारत]] [[वर्ग:भारतातील किल्ले]] [[वर्ग:भारतीय लष्कराशी संबंधित याद्या|भारतातील किल्ले]] [[वर्ग:देशानुसार किल्ल्यांच्या यादी|भारत]] 46o9aep8eibfj1uv8gj4mzm2tka5tlz 2581297 2581290 2025-06-20T12:58:55Z Khirid Harshad 138639 [[Special:Contributions/2409:40C2:18:7F07:8000:0:0:0|2409:40C2:18:7F07:8000:0:0:0]] ([[User talk:2409:40C2:18:7F07:8000:0:0:0|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:2409:40C2:116F:2BB7:F0C8:67FF:FE79:8035|2409:40C2:116F:2BB7:F0C8:67FF:FE79:8035]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. 2487094 wikitext text/x-wiki ही '''भारतातील किल्ल्यांची''' यादी आहे . == आंध्र प्रदेश == === किनारी प्रदेश === {{div col|colwidth=30em}} # बेलामकोंडा किल्ला - गुंटूर जिल्हा # बॉबिली किल्ला - विजयनगरम जिल्हा # दुर्गम किल्ला - प्रकाशम जिल्हा (कानगिरी) # गजानन किल्ला - विशाखापट्टणम जिल्हा # गोंथिना किल्ला - विशाखापट्टणम जिल्हा # कोंडापल्ली किल्ला - कृष्णा जिल्हा # कोंडावेदु किल्ला - गुंटूर जिल्हा # मछलीपट्टनम किल्ला (१६ व्या शतकातील डच किल्ला) <ref>{{Citation|last=Tandavakrishna Tungala|title=Bandar Kota ( Machilipatnam Fort built by the Dutch, the French and the British )|date=2017-03-24|url=https://www.youtube.com/watch?v=iCQXXICC04w|accessdate=2017-11-21}}</ref> - कृष्णा जिल्हा # पार्थ किल्ला # उदयगिरी फोर्टसॅड - नेल्लोर जिल्हा # व्यंकटीगिरी किल्ला - नेल्लोर जिल्हा # विजयनगरम किल्ला - विजयनगरम जिल्हा {{div col end}} === रायलसीमा प्रदेश === {{div col|colwidth=30em}} # अडोनी किल्ला - कुर्नूल जिल्हा # चंद्रगिरी किल्ला - तिरुपती # चेन्नमपल्ली किल्ला - कुर्नूल जिल्हा # देवराया किल्ला - विजयनगरम जिल्हा # गंडिकोटा किल्ला - कडप्पा जिल्हा # गुटीचा किल्ला - अनंतपूर जिल्हा # गुरूरामकोंडा किल्ला - चित्तूर जिल्हा # कोंडा रेड्डी किल्ला - कुर्नूल जिल्हा # सिद्धवतम् किल्ला - कडप्पा जिल्हा {{div col end}} == अरुणाचल प्रदेश == {{div col|colwidth=30em}} # इटा किल्ला, इटानगर # भीष्माकनगर किल्ला, रोइंग # बोलुंग किल्ला, बोलुंग # गोम्सी किल्ला, पूर्व सियांग # रुक्मिणी किल्ला, रोइंग # तेजू किल्ला, रोइंग # बुरोई किल्ला, पापुम पारे {{div col end}} == आसाम == {{div col|colwidth=30em}} # [[गार्चुक लछित गड]] # गढ दोल # कारेंग घर # मटियाबाग पॅलेस # तलातल घर {{div col end}} ==बिहार == {{div col|colwidth=30em}} # बक्सर किल्ला # दरभंगा किल्ला # जगदीशपूर किल्ला # जलालगड किल्ला # मुंगेर किल्ला # रोहतासगड किल्ला # शेरगड किल्ला {{div col end}} == चंदीगड == {{div col|colwidth=30em}} # बुरैल किल्ला # मनिमाजरा किल्ला {{div col end}} == छत्तीसगड == {{div col|colwidth=30em}} # चैतूरगड # दुर्ग # जशपूर # कचुरी # खैरागड # रायगड # रतनपूर किल्ला # सरगुजा पॅलेस # शक्ती {{div col end}} == दादरा - नगर हवेली आणि दीव - दमण == {{div col|colwidth=30em}} # दीव किल्ला # फोर्ट सेंट ॲंथोनी ऑफ सिंबोर {{div col end}} == दिल्ली == {{div col|colwidth=30em}} # आदिलाबाद किल्ला # फिरोजशाह कोटला # जहांपनाह # नजफगड किल्ला # पुराना किला # किला राय पिथौरा # लाल किल्ला # सलीमगड किल्ला # सिरी किल्ला # किला लाल कोट # तुघलकाबाद किल्ला {{div col end}} == गोवा == {{div col|colwidth=30em}} # अगुआडा किल्ला # अलोर्ना किल्ला # अंजेदिवा किल्ला # बैतूल किल्ला # काबो दे रामा # चांदोर किल्ला # चपोरा किल्ला # कोळवले किल्ला # कोर्ज्यूम किल्ला # गॅसपार डायस किल्ला # मोरमुगिओ किल्ला # नानुझ किल्ला # नरोआ किल्ला # पालेसिओ डो काबो # पोंडा किल्ला # रचोल किल्ला # रीस मगोस # सँक्लेम किल्ला # बनस्तारीम किल्ल्याचे साओ टियागो # टिविम किल्ल्याचा साओ टोमे # सेंट एस्टेव्हम किल्ला # ट्रायकोल किल्ला {{div col end}} == गुजरात == {{div col|colwidth=30em}} # भद्रा किल्ला, [[अहमदाबाद]] # भुजिया किल्ला, भुज, जडेजा राजपूतचा # कानठकोट किल्ला, भाचाळ, सोलंकी आणि चावडा राजपूत यांचा व्याप # माणिक बुर्ज, अहमदाबाद # पावगड, चवडा राजपूतची # रोहा किल्ला, भुज, कच्छ राजपुतांचा काही कुळ # सोनगड किल्ला, तापी जिल्हा # सुरत वाडा, [[सुरत]] # तेरा किल्ला, कच्छ, जडेजा राजपूतचा # उपरकोट किल्ला, जुनागड, चुडासमा राजपूतचा # पाटण किल्ला, पाटण, सोलंकी राजपूतचा # इदार किल्ला, इदार, राठौर राव राजपूत यांचा # भरुच किल्ला, भरुच, सोलंकी राजपूतचा # दाभोईचा किल्ला, दाभोई, सोलंकी राजपूतचा # इंद्रगड किल्ला, पालिकरंबेली {{div col end}} == हरयाणा == {{div col|colwidth=30em}} # असीगड किल्ला (याला हांसी फोर्ट देखील म्हणतात), चौहान आणि तोमर राजपूत यांचा # बादशाहपूर किल्ला # बुरिया किल्ला # धोसी टेकडी किल्ला # फर्रुखनगर किल्ला # फतेहाबाद किल्ला # फिरोज शाह पॅलेस कॉम्प्लेक्स # इंदूर किल्ला # जिंद किल्ला # कैथल किल्ला # कोटला किल्ला # लोहारू किल्ला, शेखावत राजपूतचा # माधोगढ किल्ला, हरियाणा मधील माधोगढ किल्ला, कच्छवाह राजपूतचा # महेंद्रगड किल्ला # महाम किल्ला # नाहरसिंह महाल # पिंजोर किल्ला # रायपूर राणी किल्ला, चौहान राजपूतचा # सधौरा किल्ला # सिरसा फोर्ट मध्ये [[सिरसा]] <ref name="Hiltebeitel Hiltebeitel 1999 p. 174">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=uV-RrRoMzbgC&pg=PA174|title=Rethinking India's Oral and Classical Epics: Draupadi Among Rajputs, Muslims, and Dalits|last=Hiltebeitel|first=P.R.A.|last2=Hiltebeitel|first2=A.|publisher=University of Chicago Press|year=1999|isbn=978-0-226-34050-0|page=174|access-date=20 October 2018}}</ref> # तोशाम किल्ला, तोमर आणि चहान राजपूतचा # ठाणेसर किल्ला {{div col end}} == हिमाचल प्रदेश == {{div col|colwidth=30em}} # आर्की किल्ला # बेजा पॅलेस # जैटक किल्ला # कहलूर किल्ला # कमला किल्ला # कांगडा किल्ला # कुनिहार किल्ला # कुतलेहर किल्ला # महलॉग किल्ला # नादौन किल्ला, हमीरपूर {{div col end}} == जम्मू-काश्मीर == {{div col|colwidth=30em}} # [[अखनूर_किल्ला| अखनूर किल्ला]] # बहु किल्ला # भीमगड किल्ला # चिक्टन किल्ला # हरि परबत किल्ला # जसमरगड किल्ला # रामनगर किल्ला {{div col end}} == झारखंड == {{div col|colwidth=30em}} # पलामू किल्ला # शाहपूर किल्ला {{div col end}} == कर्नाटक == {{div col|colwidth=30em}} # मल्लियाबाद किल्ला # जलादुर्गा # बहाद्दूर बांडी किल्ला # कायडीगेरा किल्ला # बिदर किल्ला # बसवकल्याण किल्ला # भालकी किल्ला # मन्याखेटा किल्ला # किट्टूर किल्ला # परसगड किल्ला # बेळगाव किल्ला # सौंदट्टी किल्ला # रामदुर्ग किल्ला # बैलहोंगल किल्ला # हुली किल्ला # गोकाक किल्ला # शिरसांगी किल्ला # विजापूर किल्ला # गजेंद्रगड किल्ला # कोरलाहल्ली किल्ला # हॅमगी किल्ला # हेमागुड्डा किल्ला # मुंदरगी किल्ला # सिंगातलूर किल्ला # टिपपुरा किल्ला # नरगुंद किल्ला # मगडी किल्ला # जमलाबाद किल्ला # बरकूर किल्ला # दरिया-बहादुर्गगड किल्ला # कपू किल्ला # हवनूर किल्ला # मिर्जन किल्ला # सदाशिवगड किल्ला # अस्नोती # सांदुरू किल्ला # बेल्लारी किल्ला # आडोनी किल्ला # कोप्पळ किल्ला # अनेगुंडी किल्ला # कंपली किल्ला # इराकलगडा # गुलबर्गा किल्ला # सेदम किल्ला # शाहपूर किल्ला # आयहोल किल्ला # बादामी किल्ला # बांकापुरा किल्ला # सवानूर किल्ला # चित्रदुर्ग किल्ला # देवनाहल्ली किल्ला # वनादुर्ग किल्ला # चन्नागिरी किल्ला # कावळेदुर्ग किल्ला # बसवराज दुर्गा किल्ला # उचंगीदुर्ग किल्ला # [[बुदिकोटे]] # किल्ला अंजेडिवा # गुढीबांडा # वागींगेरा किल्ला # बंगलोर किल्ला # [[भीमगड किल्ला]] # कम्मतदुर्ग # पावागडा # माडीकेरी किल्ला # सावंदुर्गा # मकालिदुरगा # वनादुर्गा # सन्मुदगेरी # विशालगड # नगारा किल्ला # बसवराज किल्ला # रायदुर्ग # हुथ्रीदुर्ग # अंबाजीदुर्ग # मांजराबाद किल्ला # स्कंदगिरी # होसादुर्गा # नगारा किल्ला # सत्यमंगलम किल्ला # टेकलाकोटे किल्ला # तीर्थाहल्ली किल्ला # रायचूर किल्ला {{div col end}} == केरळ == {{div col|colwidth=30em}} # अंकुथेंगु किल्ला # [[बेक्कल किल्ला]] # [[चंद्रगिरीचा किल्ला]] # [[कोडंगल्लूर किल्ला]] (याला कोडुंगल्लूर किल्ला, कोट्टापुरम किल्ला देखील म्हणतात) # [[ईस्ट फोर्ट]] # किल्ला इमॅन्युएल # फोर्ट थॉमस # [[होसदुर्ग किल्ला]] # नेदुमकोट्टा, शहराची भिंत # [[पालघाटचा किल्ला]] # [[पल्लीपुरम किल्ला]] # [[कण्णूर किल्ला]] (कन्नूर किल्ला किंवा कन्नूर कोट्टा म्हणूनही ओळखला जातो) # [[तलचेरीचा किल्ला]] # विल्यम किल्ला (याला चेतुवा फोर्ट देखील म्हणतात) {{div col end}} == मध्य प्रदेश == {{div col|colwidth=30em}} # अटर किल्ला, भिंड (भदोरिया राजपूतचा) # रीवा किल्ला # अहिल्या किल्ला # असिरगड किल्ला # बजरानगड किल्ला # बंधवगड किल्ला # चंदेरी किल्ला # गिनोरगड किल्ला # दतिया किल्ला # धार किल्ला # गढ कुंदर # गडपहरा # गोहड किल्ला # गोविंदगड किल्ला # ग्वाल्हेर किल्ला # गुजरी महल, ग्वाल्हेरचा किल्ला # मान मंदिर, ग्वालियर किल्ला # तेली का मंदिर, ग्वाल्हेरचा किल्ला # सास बहु मंदिर, ग्वालियर किल्ला # गारौली किल्ला # हिंगलाजगड # कामकंदला किल्ला # मदन महल # मंदसौर किल्ला # मांडू किल्ला संकुल # नरवर किल्ला # ओरछा किल्ला परिसर # रायसेन किल्ला # रामपायली गड # सबलगड किल्ला (सबला गुर्जर) # नबालसिंह खंडेराव हाबली, साबळगड किल्ला # सिंधियाकलिन बंद, साबळगड किल्ला # श्योपुर # सेंधवा # विजयराघवगड # उटिला किल्ला {{div col end}} == महाराष्ट्र == {{div col|colwidth=16em}} # [[अंकाई]] # [[अंकाई-टंकाई]] # [[अंजनवेल]] # [[अंजनेरी]] # [[अंतूर किल्ला]] # [[अंबागड]] # [[अंमळनेरचा किल्ला]] # [[अचला]] # [[अजिंक्य पारगड]] # [[अजिंक्यतारा]] # [[अडसूळ]] # [[अर्नाळा]] # [[अर्नाळा किल्ला]] # [[अलंग]] # [[अलिबाग - हिराकोट]] # [[अलिबाग किल्ला]] # [[अवचितगड]] # [[अशीरगड]] # [[अशेरीगड]] # [[अहमदनगरचा भुईकोट किल्ला]] # [[अहिवंत]] # [[आंबोळगड]] # [[आजोबागड]] # [[आड (किल्ला)]] # [[आमनेरचा किल्ला]] # [[आसवगड]] # [[इंद्राई]] # [[इरशाळगड]] # [[उंदेरी किल्ला]] # [[उतवड किल्ला]] # [[औंढ]] # [[औसा किल्ला]] # [[कंक्राळा]] # [[कंचना]] # [[कंधारचा किल्ला]] # [[कण्हेरगड]] # [[कनकदुर्ग]] # [[कन्हेरगड]] # [[कमळगड]] # [[कर्नाळा]] # [[कऱ्हेगड]] # [[कलाडगड]] # [[कलानिधीगड]] # [[कल्याणगड]] # [[कांचनगड]] # [[कांचना]] # [[कानिफनाथ गड]] # [[कामनदुर्ग]] # [[कालानंदीगड]] # [[काळदुर्ग]] # [[कावनई किल्ला]] # [[कावळ्या किल्ला]] # [[कुंजरगड]] # [[कुर्डूगड - विश्रामगड]] # [[कुर्डूगड किल्ला]] # [[कुलंग]] # [[कुलाबा किल्ला]] # [[केंजळगड]] # [[केळवे किल्ला]] # [[कोथळीगड]] # [[कोथळ्याचा भैरवगड]] # [[कोरीगड - कोराईगड]] # [[कोर्लई]] # [[कोळधेर किल्ला]] # [[कोहोजगड]] # [[खांदेरी किल्ला]] # [[खैराई किल्ला]] # [[गंधर्वगड]] # [[गंभीरगड]] # [[गाळणा]] # [[गाविलगड]] # [[गुणवंतगड]] # [[गोंड राजाचा किल्ला]] # [[गोंदियाचा प्रतापगड]] # [[गोरक्षगड]] # [[गोरखगड]] # [[गोवागड]] # [[घनगड]] # [[घारगड]] # [[घोडबंदर किल्ला]] # [[घोसाळगड]] # [[चंदन - वंदन]] # [[चंद्रगड]] # [[चंद्रपूर किल्ला]] # [[चकदेव]] # [[चांभारगड]] # [[चाकणचा किल्ला]] # [[चावंड]] # [[चौरगड किल्ला]] # [[जंगली जयगड]] # [[जंजाळा किल्ला]] # [[जयगड]] # [[जीवधन]] # [[टंकाई]] # [[टकमक किल्ला]] # [[डांग्या किल्ला]] # [[डेरमाळ]] # [[ढाकोबा किल्ला]] # [[तळगड]] # [[तळागड]] # [[तांदूळवाडी]] # [[तारापूर किल्ला]] # [[तारामती (किल्ला)]] # [[ताहुली]] # [[तिकोना]] # [[तुंग]] # [[तुंगी किल्ला]] # [[तेरेखोल किल्ला]] # [[तेलबैला किल्ला]] # [[तोरणा]] # [[त्रिंगलवाडी किल्ला]] # [[थाळनेर किल्ला]] # [[दातिवरे किल्ला]] # [[दातेगड]] # [[दुर्ग - ढाकोबा]] # [[दुर्ग कलावंतीण]] # [[दुर्ग किल्ला]] # [[दुर्गाडी किल्ला]] # [[देवगड किल्ला]] # [[दौलतमंगळ]] # [[धोडप]] # [[नगरधाण]] # [[नळदुर्ग]] # [[निमगिरी किल्ला]] # [[निवती किल्ला]] # [[रमेश नेवसे]] # [[न्हावीगड]] # [[पट्टागड]] # [[पदरगड किल्ला]] # [[पद्मदुर्ग]] # [[पन्हाळा]] # [[परंडा किल्ला]] # [[पळसगड]] # [[पवनीचा किल्ला]] # [[पांडवगड]] # [[पाबरगड]] # [[पारोळ्याचा किल्ला]] # [[पिसोळ]] # [[पुरंदर किल्ला]] # [[पूर्णगड किल्ला]] # [[पेठ किल्ला]] # [[पेब]] # [[प्रचितगड]] # [[प्रतापगड]] # [[प्रबळगड - मुरंजन]] # [[चर्चा:प्रबळगड - मुरंजन]] # [[फणी किल्ला]] # [[फत्तेगड]] # [[बल्लारपूर किल्ला]] # [[बल्लाळगड]] # [[बसगड किल्ला]] # [[बहादरपूर किल्ला]] # [[बहादूरगड]] # [[बहादूरवाडी]] # [[बहिरगड]] # [[बहिरी - गडदचा बहिरी]] # [[बाणकोट]] # [[बाणूरगड]] # [[बानुरगड]] # [[बारडगड]] # [[बाळापूर किल्ला]] # [[बितनगड किल्ला]] # [[बिरवाडी किल्ला]] # [[ब्रह्मगिरी किल्ला]] # [[ब्रह्मा किल्ला]] # [[भंडारगड]] # [[भगवंतगड]] # [[भरतगड]] # [[भांगशीमाता गड]] # [[भिवगड]] # [[भीमगड किल्ला]] # [[भूपतगड किल्ला]] # [[भूषणगड]] # [[भैरवगड]] # [[भोंडगड]] # [[भोरगिरी किल्ला]] # [[मंगळगड]] # [[मच्छिंद्रगड]] # [[मदनगड]] # [[मधुमकरंदगड]] # [[मनरंजन किल्ला]] # [[मनसंतोषगड]] # [[मनोहरगड]] # [[मलंगगड]] # [[मल्हारगड]] # [[महिपतगड]] # [[महिमंडणगड]] # [[महिमानगड]] # [[मांगी - तुंगी]] # [[माणिकगड]] # [[मानगड]] # [[मार्कंडा किल्ला]] # [[मालेगावचा किल्ला]] # [[माहीमचा किल्ला]] # [[माहुलीगड]] # [[मुरुड जंजिरा]] # [[मुल्हेर]] # [[मोरागड]] # [[यशवंतगड (जैतापूर)]] # [[यशवंतगड (रेडी)]] # [[रतनगड]] # [[रत्‍नदुर्ग]] # [[रवळ्या-जवळ्या]] # [[रसाळगड]] # [[रांगणा]] # [[राजकोट आणि सर्जेकोट]] # [[राजकोट किल्ला]] # [[राजगड]] # [[राजधेर]] # [[राजमाची]] # [[रामगड]] # [[रामशेज किल्ला]] # [[रामसेज किल्ला]] # [[रायकोट]] # [[रायगड (किल्ला)]] # [[रायरीचा किल्ला]] # [[रायरेश्र्वर]] # [[रायरेश्वर]] # [[रेवदंडा किल्ला]] # [[रोहिडा]] # [[रोहिदास (किल्ला)]] # [[रोहिलागड]] # [[लळिंग किल्ला]] # [[लिंगाणा]] # [[लोंझा]] # [[लोंझा किल्ला]] # [[लोहगड]] # [[वज्रगड किल्ला]] # [[वर्धनगड]] # [[वसंतगड]] # [[वसईचा किल्ला]] # [[वांद्रेचा किल्ला]] # [[वाघेरा किल्ला]] # [[वारूगड]] # [[वासोटा]] # [[विजयगड]] # [[विजयदुर्ग]] # [[विलासगड]] # [[विशाळगड]] # [[विसापूर]] # [[वेताळगड]] # [[वेताळगड किल्ला]] # [[वैराटगड]] # [[शिरगावचा किल्ला]] # [[शिवगड]] # [[शिवडीचा किल्ला]] # [[शिवनेरी]] # [[शीवचा किल्ला]] # [[श्रीवर्धन किल्ला]] # [[संतोषगड]] # [[सज्जनगड]] # [[सदाशिवगड]] # [[सदाशिवगड (कराड)]] # [[सप्तशृंगी]] # [[सरसगड]] # [[सर्जेकोट]] # [[सांकशी किल्ला]] # [[सागरगड]] # [[सानगडीचा किल्ला]] # [[सामानगड]] # [[सालोटा किल्ला]] # [[साल्हेर]] # [[सिंदोळा किल्ला]] # [[सिंधुदुर्ग]] # [[सिंहगड]] # [[सिताबर्डीचा किल्ला]] # [[सिद्धगड]] # [[सुधागड]] # [[सुमारगड]] # [[सुरगड]] # [[सुवर्णदुर्ग]] # [[सोनगड]] # [[सोनगिर किल्ला]] # [[सोलापूरचा भुईकोट]] # [[हडसर]] # [[हरगड]] # [[हरिश्चंद्रगड]] # [[हरिहर किल्ला]] # [[हातगड]] {{div col end}} == मणिपूर == {{div col|colwidth=30em}} # बिहू लॉकॉन # कंगला किल्ला {{div col end}} == ओडिशा == {{div col|colwidth=30em}} # बाराबती किल्ला, [[कटक]] # चुडंगा गडा, [[भुवनेश्वर]] # पोटागड किल्ला, [[गंजम]] # रायबनिया किल्ला, [[बालासोर]] # सिसूपळगड, [[भुवनेश्वर]] {{div col end}} == पुडुचेरी == {{div col|colwidth=30em}} # फ्रेंच फोर्ट लुईस {{div col end}} == पंजाब == {{div col|colwidth=30em}} # गोबिंदगड किल्ला # बाजवारा किल्ला # किला मुबारक (भटिंडा किल्ला म्हणूनही ओळखले जाते) # केशगड किल्ला # शाहपूरकांडी किल्ला # लोधी किल्ला # मानौली किल्ला # फिल्लौर किल्ला # पायल किल्ला # मनी मजरा # बुरैल किल्ला # बहादूरगड किल्ला # फूल किल्ला (फुलकियन रॉयल फॅमिलीचा रहिवासी) # बहादूरगड किल्ला # पटियालाचा शीश महल # नाभाचा नाभ्याचा किल्ला # किला मुबारक, पटियाला # जींडन किल्ला (फूल रॉयल फॅमिलीच्या रघुचा रहिवासी) {{div col end}} == राजस्थान == {{div col|colwidth=16em}} # अभेदा महल किल्ला, [[कोटा जिल्हा|कोटा]] # खटोली किल्ला, [[कोटा जिल्हा|कोटा]] # कुनाडी किल्ला # पलेठा किल्ला # [[सिटी पॅलेस, जयपूर]] # [[हवामहाल|हवा महल]], [[जयपूर]] # जल महल, [[जयपूर]] # जग मंदिर, [[कोटा जिल्हा|कोटा]] # उम्मेद भवन पॅलेस, [[जोधपूर]] # जसवंत थडा, [[जोधपूर]] # सरदार सामंद प्लेस, [[जोधपूर]] # किल्ला खजेरला, [[जोधपूर]] # मंदोर किल्ला, जोधपूर # चान्व्हा किल्ला, लूनी # देवगड किल्ला, [[सीकर]] # सीकर गड किल्ला, [[सीकर]] # रघुनाथ गड किल्ला # राजा रायसल लामिया किल्ला, [[सीकर]] # दंता किल्ला, [[सीकर]] # बीकानेर किल्ला, [[बिकानेर|बीकानेर]] # खाबा किल्ला # कला किल्ला, [[अल्वर|अलवर]] # दधीकर किल्ला # राजगड किल्ला, [[अलवर]] # अचलगड किल्ला # अजबगारा किल्ला # अलवर किल्ला # अलवर सिटी पॅलेस # [[अंबरचा किल्ला|आमेरचा किल्ला]] # बाणसी किल्ला # बादलगड किल्ला, [https://www.google.com/search?q=Badalgarh+Fort+Jhunjhunu&stick=H4sIAAAAAAAAAONgecR4kpFb4OWPe8JS-xknrTl5jXEHIxdXcEZ-uWteSWZJpVAAFxuUpcIlKMWrn65vaJiWV5JcUllVqMEgxc-FKiSloMTFq85_REA0ne-DjpYQ533jx5oilsKWgrYv4pb-cXmcoxRh5LPr0rRzbG6CDECQEBjoIKWpJcTF7lnsk5-cmCO4pXZr1vdjG-y0hLk4QhIr8vPycyvBShkYPtgr8XECaYWJ-u32tiARLYamfSsOsbFwMAow8CxilXBKTEnMSU8sylBwyy8qUfDKKM3LAuJSAC_hTSvqAAAA&sa=X&ved=2ahUKEwit3uWOyc_rAhUr4XMBHRiaB24Q6RMwIXoECA4QAg&biw=1600&bih=789] # बाणसूर किल्ला # भद्राजन किल्ला # भैंसरोरगड # भानगड किल्ला # भटनेर किल्ला # बिजई गढ # चित्तोड किल्ला # चोमु पॅलेस # डीग पॅलेस # गॅग्रोन किल्ला # गुगोर किल्ला, बारण [https://www.google.com/search?bih=789&biw=1600&hl=en-US&ei=NkJSX-74DcvYz7sP-Li44A4&hotel_occupancy=&q=gugor+fort&oq=gugor+fort&gs_lcp=CgZwc3ktYWIQAzIGCAAQBxAeMgYIABAHEB4yBggAEAcQHjIGCAAQBxAeMgYIABAHEB4yBggAEAcQHjIGCAAQBxAeMgYIABAHEB4yBggAEAcQHjIGCAAQBxAeOgQIABBHOggIABAHEAoQHjoKCAAQCBAHEAoQHjoFCAAQkQI6BAguEEM6AggAOggILhCxAxCDAToFCAAQsQM6CAguEMcBEK8BOggIABCxAxCDAVDK5wRY2PoEYJH8BGgAcAF4AIABhgKIAdkPkgEFMC4xLjiYAQCgAQGqAQdnd3Mtd2l6wAEB&sclient=psy-ab&ved=0ahUKEwju67_Wzs_rAhVL7HMBHXgcDuwQ4dUDCA0&uact=5] # हिंडौन किल्ला # जयगड किल्ला # जैसलमेर किल्ला # जलोर किल्ला # झालावाड किल्ला (गढ पॅलेस) # जुनागड किल्ला # कणकवाडी # केसरोली टेकडी किल्ला # खंडार किल्ला # खेत्री महाल, [[झुनझुनू]] # कल्ला किल्ला, [[अलवर]] # कोटा किल्ला # कुचामन किल्ला # कुंभलगड किल्ला, कुंभलगड # खिमसर किल्ला # खेजरला किल्ला # खंडार फोर्ट # किशनगड किल्ला # केळवाडा किल्ला, बारण # लक्ष्मणगड किल्ला # लोहागड किल्ला # माधोगढ किल्ला # मानधोली किल्ला # [[मेहरानगढ|मेहरानगड किल्ला]] # मुकुंदगड किल्ला, मुकुंदगड # मुंदरू किल्ला # नागौर किल्ला # नुआ किल्ला, [https://www.google.com/search?q=Badalgarh+Fort+Jhunjhunu&stick=H4sIAAAAAAAAAONgecR4kpFb4OWPe8JS-xknrTl5jXEHIxdXcEZ-uWteSWZJpVAAFxuUpcIlKMWrn65vaJiWV5JcUllVqMEgxc-FKiSloMTFq85_REA0ne-DjpYQ533jx5oilsKWgrYv4pb-cXmcoxRh5LPr0rRzbG6CDECQEBjoIKWpJcTF7lnsk5-cmCO4pXZr1vdjG-y0hLk4QhIr8vPycyvBShkYPtgr8XECaYWJ-u32tiARLYamfSsOsbFwMAow8CxilXBKTEnMSU8sylBwyy8qUfDKKM3LAuJSAC_hTSvqAAAA&sa=X&ved=2ahUKEwit3uWOyc_rAhUr4XMBHRiaB24Q6RMwIXoECA4QAg&biw=1600&bih=789] # नाहरगड किल्ला # नीमराणा # पाटण किल्ला # पगारा किल्ला, बुंडी <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.google.com/search?q=pagara+fort&oq=pagara+fort&aqs=chrome..69i57j69i60l3.3042j0j9&sourceid=chrome&ie=UTF-8}}</ref> # फलोदी किल्ला # रणथंभोर किल्ला # रूपानगड किल्ला # सिवाना किल्ला # शेरगड किल्ला, [[धौलपूर]] # शहाबाद किल्ला, बारण # शेरगड किल्ला, बारण # तारागड किल्ला, [[अजमेर]] # तारागड किल्ला, बुंदी # तिजारा किल्ला # तिमन गड # सिटी पॅलेस, [[उदयपूर]] # विजय निवास पॅलेस, अजमेर (आता हेरिटेज हॉटेल) [https://www.tripadvisor.in/Hotel_Review-g317096-d302386-Reviews-Bijay_Niwas_Palace-Ajmer_Ajmer_District_Rajasthan.html] # किशनगड किल्ला, [[अजमेर]] # फूल महल पॅलेस, [[अजमेर]] # मोखम विलास, [[अजमेर]] # अधै दिन का झोनप्रा, [[अजमेर]] # रामबाग पॅलेस, [[जयपूर]] (आता एक हेरिटेज हॉटेल) # [[देवीगढ पॅलेस हॉटेल|देवीगड]], उदयपूर (आता एक हेरिटेज हॉटेल) # रणबांका पॅलेस, [[जोधपूर]] (आता एक हेरिटेज हॉटेल) # रतन विलास पॅलेस, [[जोधपूर]] # अजित भवन पॅलेस (आता एक हेरिटेज हॉटेल), [[जोधपूर]] # मान्सून पॅलेस सज्जनगड किल्ला, [[उदयपूर]] # जग मंदिर बेट पॅलेस, [[उदयपूर|उदयपुर]] # बागोर-की-हवेली, [[उदयपूर|उदयपुर]] # [[लेक पॅलेस]], [[उदयपूर]] # बुजरा किल्ला (आता एक हेरिटेज हॉटेल), [[उदयपूर|उदयपुर]] # फतेह प्रकाश राजवाडा, [[उदयपूर]] # अकबरी किल्ला आणि संग्रहालय, [[अजमेर]] # मसुदा किल्ला # झोरवारगड किल्ला, झुंझ्नू [https://www.google.com/search?q=zorawargarh+fort&oq=zorawargarh+fort&aqs=chrome..69i57j46l2j0l5.3600j0j7&sourceid=chrome&ie=UTF-8] {{div col end}} == सिक्किम == {{div col|colwidth=30em}} # बुडंग गारी किल्ला {{div col end}} == तामिळनाडू == {{div col|colwidth=30em}} # [[वेल्लूरचा किल्ला|वेल्लोर किल्ला]] # आलमपराई किल्ला # अंचेतीदुर्गम # अरंगांगी किल्ला # [[आत्तूरचा किल्ला|अतूर किल्ला]] # [[दिंडुक्कलचा किल्ला|दिंडीगुळ किल्ला]] # ड्रोग किल्ला, कुन्नूर # इरोड किल्ला # फोर्ट डॅनसबॉर्ग # फोर्ट गेल्ड्रिया # [[फोर्ट सेंट डेव्हिड, कडलूर|फोर्ट सेंट डेव्हिड]] # [[फोर्ट सेंट जॉर्ज, चेन्नई|फोर्ट सेंट जॉर्ज]] # किल्ला विजफ सिन्नेन # [[जिंजीचा किल्ला|जिंजी किल्ला]] # केनिलवर्थ किल्ला (होसूर) # कृष्णागिरी किल्ला # मनोरा किल्ला # नामक्कल किल्ला # पद्मनाभपुरम किल्ला # राजागिरी किल्ला # रांजणकुडी किल्ला # सदरा # संकगिरी किल्ला # टांग्राकोटाई # तिरुमायम किल्ला # [[रॉकफोर्ट (त्रिच्चीचा किल्ला)|तिरुचिरापल्ली रॉक किल्ला]] # तिरुचिराप्पल्ली किल्ला # उदयगिरी किल्ला # वट्टाकोटाई किल्ला {{div col end}} == तेलंगणा == {{div col|colwidth=30em}} # भोंगीर किल्ला # देवरकोंडा किल्ला # एल्गंडल किल्ला # गांधारी खिल्ल # [[गोवळकोंडा|गोलकोंडा किल्ला]] # खम्मम किल्ला # मेडक किल्ला # नागूनूर किल्ला # निजामाबाद किल्ला # रचकोंडा किल्ला # रामगिरी किल्ला # वारंगल किल्ला # अस्मानगड किल्ला # गडवाल किल्ला # जागातीय किल्ला # श्यामगड किल्ला # त्रिमूलघरी किल्ला {{div col end}} == उत्तर प्रदेश == {{div col|colwidth=30em}} # [[google:awahgarh+fort&oq=awahgarh+fort&aqs=chrome..69i57j46j0j46j0l3.3174j0j9&sourceid=chrome&ie=UTF-8|अवघ्रा किल्ला, एटा]] # आगोरी किल्ला # [[आग्‍ऱ्याचा किल्ला|आग्रा किल्ला]] # अलिगड किल्ला # अलाहाबाद किल्ला # बाटेश्वर किल्ला, आग्रा # बाह किल्ला, आग्रा # बदाऊं किल्ला # भरेह गड # बिजली पासी किल्ला # छप्पर घाटा किल्ला # चुनार किल्ला # फतेहगड किल्ला # [[फत्तेपूर सिक्री|फतेहपूर सीकरी]] # हाथरस किल्ला # हातकांत किल्ला, आग्रा # झांसी किल्ला # कालिंजार किल्ला # कुचेसर किल्ला # कोटर्मा किल्ला # कचोरा किल्ला # नौगांव किल्ला # पिनाहट किल्ला, पिनाहट # रामनगर किल्ला # [[google:raja+sumer+singh+fort&oq=raja+sumer+singh+fort&aqs=chrome..69i57j46j0l4.4204j0j9&sourceid=chrome&ie=UTF-8|राजा सुमेरसिंग किल्ला, इटावा]] # रुहिया किल्ला # सेनापती किल्ला # उंचगाव किल्ला # विजयगड किल्ला # अमेठी किल्ला {{div col end}} == उत्तराखंड == {{div col|colwidth=30em}} # चांदपूर किल्ला # चौखुतिया किल्ला # देवगड किल्ला # खगमारा किल्ला # लालमंडी किल्ला # मल्ला पॅलेस किल्ला # पिथौरागड किल्ला {{div col end}} == पश्चिम बंगाल == {{div col|colwidth=30em}} # बक्सा किल्ला # फोर्ट विल्यम # कुरुम्बेरा किल्ला # भुनिया किल्ला # फोर्ट मॉर्निंगटन # फोर्ट रेडिसन # [[व्हिक्टोरिया मेमोरियल]] # हजर्डुवारी प्लेस {{div col end}} ==संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:आशियातील किल्ल्यांच्या यादी|भारत]] [[वर्ग:भारतातील किल्ले]] [[वर्ग:भारतीय लष्कराशी संबंधित याद्या|भारतातील किल्ले]] [[वर्ग:देशानुसार किल्ल्यांच्या यादी|भारत]] tcy74587y9upg4wdpzngjl4lsxizxb0 औंध (खटाव) 0 277469 2581552 2566927 2025-06-21T09:14:46Z 120.88.180.214 2581552 wikitext text/x-wiki '''औंध''' हे [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[खटाव|खटाव तालुक्यातील]] एक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार <ref>https://censusindia.gov.in/census.website/data/census-tables</ref>या गावाचा सेन्सस कोड ५६३५२७ असून या लेखातील माहिती या जनगणनेवर आधारित आहे. या गावाचे क्षेत्र ७९९.०१ हेक्टर असून येथील लोकसंख्या ५६५३ आहे. गावात १२९२ कुटुंबे राहतात. == पौराणिक इतिहास == [[औंध संस्थान|औंध]] हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे मुख्य ठिकाण होते. त्या आगोदर औंधला जसा पौराणिक इतिहास आहे तसा मध्य युगीन इतिहासाच्या पाऊल खुणा पाहवयास मिळतात. त्याचा पुरावा म्हणजे औंध गावच्या नैऋत्य दिशेस एका लहानश्या टेकडीवर श्री मुळपीठ [[यमाई देवी मंदिर (औंध)|यमाई]] देवीचे जागृत स्थान आहे. शिवाय गावात पद्माळें, नागाळें व विशाळें ही तीन तळी अस्तित्वात होती, त्यापैकी विशाळे हे तळे बुझलेले आहे. उर्वरित दोन तळी अद्याप अस्तित्वात आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.maayboli.com/node/44724|title=भ्रमंती : यमाई देवी मंदिर, औंध संस्थान {{!}} Maayboli|website=www.maayboli.com|access-date=2025-06-21}}</ref> इ.स. १००० ते ११५० पर्यंत औंध वरती देवगिरीच्या यादवांचा अंमल होता. सोळाव्या - सतराव्या शतकात आदिलशाहीचा अंमल कऱ्हाड, सातारा, करवीर या प्रांतावर होता. याच काळात मसूर व औंध या दोन परगण्यांची देशमुखी मसूरचे जगदाळे - पाटील यांच्याकडे होती. औंध परगण्यांत तेव्हा २७ गावे होती. तद्नंतर रक्ताजी रुपजी यांच्याकडे देशमुखी गेल्याचे उल्लेख आढळतात. १६ शतकात [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांनी]] बादशाही विरुद्ध उभारलेल्या बंडामुळे त्रस्त झालेल्या आदिलशाहीने महाराष्ट्र मराठी संस्कृती राज्य धुळीत मिळवण्याचा चंग बांधला होता. तेव्हा अफजलखानाने तुळजापूर व पंढरपूर ही ठिकाणे उध्वस्त केल्यानंतर कराड - रहिमतपूर मार्गे औंधकडे मोर्चा वळवला. तेव्हा औंधच्या पुजाऱ्यांनी श्री यमाई देवीच्या मूर्तीस लहानश्या देवळात बंदिस्त करून त्या देवळाला मस्जिदीचे रूप दिले. तेव्हापासून यमाईच्या पुजाऱ्यांपैकी एका शाखेस (फकीर) पुजारी असे म्हणतात. यावेळी औंध गावातील यमाई मंदिरासमोर असलेली महाराष्ट्रातील किंबहुना देशातील सर्वात उंच सुमारे ६५ फुट उंच असलेल्या दीपमाळेचे सौंदर्य व भव्यता पाहून हिंदू मंदिरे धुळीस मिळवणाऱ्या खुद्द अफजलखानाची देखील तिला हात लावायची हिम्मत झाली नाही; अशी बॉम्बे गॅझेट मध्ये नोंद आहे. इ.स. १७०१ ते १८०६ पर्यंत परशुराम पंतप्रतिनिधी औंधच्या गादीवर राज्य करीत होते. १८०६ साली पेशवाई जप्त झाल्यानंतर १८११ पर्यंतचा कालावधी वगळल्यास सर्वकाळ पंतप्रतिनिधींचा औंध संस्थानावर अंमल राहिला.{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|प्रकार=गाव|जनगणना_स्थलनिर्देशांक=५६३५२७|स्थानिक_नाव=औंध|तालुका_नाव=खटाव|जिल्हा_नाव=सातारा|राज्य_नाव=महाराष्ट्र|विभाग=|जिल्हा=[[सातारा ]]|तालुका_नावे=[[खटाव]]|अक्षांश=|रेखांश=|शोधक_स्थान=right|क्षेत्रफळ_एकूण=२०.७०|उंची=|लोकसंख्या_एकूण=५६५३|लोकसंख्या_वर्ष=२०११|लोकसंख्या_घनता=२७३.०९|लोकसंख्या_पुरुष=२८१४|लोकसंख्या_स्त्री=२८३९|लिंग_गुणोत्तर=१००९|अधिकृत_भाषा=[[मराठी]]}} == हवामान == येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा मोसम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. == लोकसंख्या == * एकूण लोकसंख्या:५६५३; पुरुष: २८१४; स्त्रिया: २८३९ * अनुसूचित जाती लोकसंख्या: ८७८; पुरुष: ४०८; स्त्रिया: ४७० * अनुसूचित जमाती लोकसंख्या:४२; पुरुष: २०; स्त्रिया: २२ == शैक्षणिक सुविधा == गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-६. प्राथमिक शाळा-६. कनिष्ठ माध्यमिक शाळा-२. माध्यमिक शाळा-२. उच्च माध्यमिक शाळा -१. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा -१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर : काही नाही ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय औंध येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय कराड येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र सातारा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा सातारा येथे आहे. == वैद्यकीय सुविधा == === सरकारी === असलेल्या सुविधा- कम्युनिटी हेल्थ सेंटर, -१, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र -१, क्षयरोग रुग्णालय -१, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय -१, दवाखाने -१, गुरांचे दवाखाने -१, कुटुंब कल्याण केन्द्र -१, नसलेल्या सुविधा - प्राथमिक आरोग्य केन्द्र प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय फिरते दवाखाने === बिगर-सरकारी === असलेल्या सुविधा- बाह्य रोगी विभाग -१, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग -१, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर -१, इतर पदवीधर डॉक्टर -१, औषधाची दुकाने -१, नसलेल्या सुविधा - धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय पदवी नसलेले डॉक्टर पारंपरिक वैद्य व वैदू इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा == पिण्याचे पाणी == असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा, नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, == स्वच्छता == असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्त्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, न्हाणीघराशिवाय सार्वजनिक स्वच्छता गृह, नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, == संचार == गावात असणाऱ्या सुविधा - पोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, खाजगी कूरियर, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, टॅक्सी, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. '''तळटीप'''- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, == बाजार व पतव्यवस्था == गावात असणाऱ्या सुविधा - व्यापारी बँका, सहकारी बँका, शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, मंडया / कायम बाजार, आठवड्याचा बाजार, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. == आरोग्य, आहार व करमणूक सुविधा == गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, समुदाय भवन (दूरचित्रवाणीसह अथवा विरहित), सार्वजनिक ग्रंथालय, सार्वजनिक वाचनालय, वृत्तपत्र पुरवठा, विधानसभा मतदान केन्द्र, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. == वीज पुरवठा == घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. == जमिनीचा वापर (हेक्टर) == * जंगल क्षेत्र : १२.० * बिगरशेतकी वापरातली जमीन: २२४.० * ओसाड व शेतीला अयोग्य जमीन: ०.० * कुरणे व इतर चराऊ जमीन: ०.० * फुटकळ झाडीखालची जमीन: ०.० * शेतीयोग्य पडीक जमीन: ६९९.० * कायमस्वरूपी पडीक जमीन: ०.० * ह्या वर्षीची पडीक जमीन: ०.० * पिकांखालची जमीन: ११३५.० * एकूण कोरडवाहू शेतजमीन: १५८.० * एकूण बागायती जमीन: ९७७.० == सिंचन सुविधा (क्षेत्रफळ हेक्टर मध्ये) == * कालवे : ० * विहिरी / कूप नलिका: १५८ * तलाव / तळी: ० * ओढे: ० * इतर : ० == संदर्भ <ref>https://villageinfo.in/</ref><ref>https://www.census2011.co.in/</ref><ref>http://tourism.gov.in/</ref><ref>https://www.incredibleindia.org/</ref><ref>https://www.india.gov.in/topics/travel-tourism</ref><ref>https://www.mapsofindia.com/</ref><ref>https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics</ref><ref>https://www.weather-atlas.com/en/india-climate</ref> == {{संदर्भ यादी}} [[वर्ग:खटाव तालुक्यातील गावे]] [[वर्ग:सातारा जिल्ह्यातील गावे]] m4nqlyicgs777i7erpy9k3g9kgktgd3 झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२०-२१ 0 282628 2581325 2345448 2025-06-20T14:52:48Z Khirid Harshad 138639 2581325 wikitext text/x-wiki {{Infobox award | image = ZMA 2020-21.webp | image_size = | image_upright = | caption = | awarded_for = | presenter = [[झी मराठी]] | country = [[भारत]] | firstawarded = | lastawarded = | reward = | former name = | network = [[झी मराठी]] | holder_label = सूत्रसंचालन | holder = [[शशांक केतकर]]<br>[[किरण गायकवाड]] | award1_type = सर्वाधिक विजेते | award1_winner = ''[[माझा होशील ना]]'' (८) | award2_type = सर्वाधिक नामांकने | award2_winner = ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' (२६) | award3_type = विजेती मालिका | award3_winner = ''[[माझा होशील ना]]'' | previous = [[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१९|२०१९]] | next = [[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२१|२०२१]] }} '''झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२०-२१''' ({{lang-en|Zee Marathi Utsav Natyancha Awards 2020-21}}) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०२०-२१ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. या सोहळ्याचा पूर्वार्ध २८ मार्च २०२१ रोजी आणि उत्तरार्ध ४ एप्रिल २०२१ रोजी संपन्न झाला. या सोहळ्याने ३.४ टीव्हीआर दोन्ही भागांत मिळवला. [[शशांक केतकर]] आणि [[किरण गायकवाड]] यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9marathi.com/entertainment/television/zee-marathi-awards-2020-21-part-2-full-winners-list-431569.html|title='माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान|date=2021-04-05|website=[[टीव्ही९ मराठी]]|access-date=2021-04-05}}</ref> == विजेते व नामांकने == {| class="wikitable" ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट मालिका]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट कुटुंब पुरस्कार|सर्वोत्कृष्ट कुटुंब]] |- | * '''''[[माझा होशील ना]]''''' ** ''[[लाडाची मी लेक गं!]]'' ** ''[[कारभारी लयभारी]]'' ** ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' ** ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' ** ''[[काय घडलं त्या रात्री?]]'' ** ''[[देवमाणूस]]'' | * '''ब्रह्मे – ''[[माझा होशील ना]]''''' ** लोखंडे – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' ** साटम – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' ** सूर्यवंशी – ''[[कारभारी लयभारी]]'' ** पाटील – ''[[कारभारी लयभारी]]'' ** खानविलकर – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' ** साळवी – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' ** कुलकर्णी – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' ** बिराजदार – ''[[माझा होशील ना]]'' ** पाटील – ''[[देवमाणूस]]'' |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट नायक]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट नायिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट नायिका]] |- | * '''शाल्व किंजवडेकर – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — ओंकार (ओम) खानविलकर''' ** आरोह वेलणकर – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — सौरभ साटम ** [[निखिल चव्हाण]] – ''[[कारभारी लयभारी]]'' — राजवीर सूर्यवंशी (वीरू) ** [[गिरीश ओक]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — अभिजीत राजे ** विराजस कुलकर्णी – ''[[माझा होशील ना]]'' — आदित्य कश्यप (देसाई) | * '''[[गौतमी देशपांडे]] – ''[[माझा होशील ना]]'' — सई कश्यप (देसाई)''' ** [[मिताली मयेकर]] – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — कस्तुरी साटम ** अनुष्का सरकटे – ''[[कारभारी लयभारी]]'' — प्रियांका सूर्यवंशी (पियू) ** अन्विता फलटणकर – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — अवनी (स्वीटू) साळवी ** [[निवेदिता सराफ]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — आसावरी राजे ** [[तेजश्री प्रधान]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — शुभ्रा कुलकर्णी ** [[मानसी साळवी]] – ''[[काय घडलं त्या रात्री?]]'' — रेवती बोरकर ** [[अस्मिता देशमुख]] – ''[[देवमाणूस]]'' — सागरिका (डिंपल) पाटील ** [[नेहा खान]] – ''[[देवमाणूस]]'' — दिव्या सिंग |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट जोडी पुरस्कार|सर्वोत्कृष्ट जोडी]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सून पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सून]] |- | * '''[[गौतमी देशपांडे]]-विराजस कुलकर्णी – ''[[माझा होशील ना]]'' — सई-आदित्य''' ** [[मिताली मयेकर]]-आरोह वेलणकर – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — कस्तुरी-सौरभ ** अनुष्का सरकटे-[[निखिल चव्हाण]] – ''[[कारभारी लयभारी]]'' — राजवीर-प्रियांका ** अन्विता फलटणकर-शाल्व किंजवडेकर – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — स्वीटू-ओम ** [[निवेदिता सराफ]]-[[गिरीश ओक]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — आसावरी-अभिजीत ** [[तेजश्री प्रधान]]-आशुतोष पत्की – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — शुभ्रा-सोहम | * '''[[तेजश्री प्रधान]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — शुभ्रा कुलकर्णी''' ** [[मिताली मयेकर]] – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — कस्तुरी साटम ** अनुष्का सरकटे – ''[[कारभारी लयभारी]]'' — प्रियांका सूर्यवंशी (पियू) ** [[निवेदिता सराफ]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — आसावरी राजे ** [[गौतमी देशपांडे]] – ''[[माझा होशील ना]]'' — सई कश्यप (देसाई) |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट खलनायक]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट खलनायिका]] |- | * '''[[किरण गायकवाड]] – ''[[देवमाणूस]]'' — अजितकुमार देव (देवीसिंग)''' ** – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — विश्वास ** अजय तपकीरे – ''[[कारभारी लयभारी]]'' — अंकुशराव पाटील ** महेश जाधव – ''[[कारभारी लयभारी]]'' — जगदीश पाटील (जग्गू) ** [[निखिल राऊत]] – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — मोहित परब ** आशुतोष पत्की – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — सोहम कुलकर्णी ** महेश कोकाटे – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — कमलाकर काटेकोर ** अतुल काळे – ''[[माझा होशील ना]]'' — शशिकांत बिराजदार (बबन) ** विजय निकम – ''[[काय घडलं त्या रात्री?]]'' — धनराज भालेकर | * '''[[अदिती सारंगधर]] – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — मालविका खानविलकर''' ** [[स्मिता तांबे]] – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — कामिनी (मम्मी) साटम ** [[पूजा पवार-साळुंखे]] – ''[[कारभारी लयभारी]]'' — कांचन सूर्यवंशी ** रश्मी पाटील – ''[[कारभारी लयभारी]]'' — सोनाली (शोना) पटकुरे ** संजीवनी साठे – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — प्रज्ञा कारखानीस ** [[सीमा देशमुख]] – ''[[माझा होशील ना]]'' — सिंधू ब्रह्मे ** सानिका गाडगीळ – ''[[माझा होशील ना]]'' — मेघना काशीकर ** [[स्मिता गोंदकर]] – ''[[काय घडलं त्या रात्री?]]'' — संजना राघव |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री]] |- | * '''[[किरण गायकवाड]] – ''[[देवमाणूस]]'' — अजितकुमार देव (देवीसिंग)''' ** आरोह वेलणकर – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — सौरभ साटम ** दीपक साठे – ''[[कारभारी लयभारी]]'' — साठे ** उदय साळवी – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — वसंत (दादा) साळवी ** [[मोहन जोशी]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — दत्तात्रय कुलकर्णी ** आशुतोष पत्की – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — सोहम कुलकर्णी ** [[अच्युत पोतदार]] – ''[[माझा होशील ना]]'' — विनायक (अप्पा) ब्रह्मे ** [[विद्याधर जोशी]] – ''[[माझा होशील ना]]'' — जगदीश (दादा) ब्रह्मे ** [[सुनील तावडे]] – ''[[माझा होशील ना]]'' — प्रभाकर (बंधू) ब्रह्मे ** [[विनय येडेकर]] – ''[[माझा होशील ना]]'' — जनार्दन (भाई) ब्रह्मे ** [[निखिल रत्नपारखी]] – ''[[माझा होशील ना]]'' — स्वानंद (पिंट्या) ब्रह्मे ** [[किशोर कदम]] – ''[[काय घडलं त्या रात्री?]]'' — राजन पर्वते ** [[सुशांत शेलार]] – ''[[काय घडलं त्या रात्री?]]'' — अजय देशमुख ** विजय निकम – ''[[काय घडलं त्या रात्री?]]'' — धनराज भालेकर | * '''रुक्मिणी सुतार – ''[[देवमाणूस]]'' — सरु पाटील''' ** [[मिताली मयेकर]] – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — कस्तुरी साटम ** [[शुभांगी गोखले]] – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — शकुंतला (शकू) खानविलकर ** [[अदिती सारंगधर]] – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — मालविका खानविलकर ** दीप्ती केतकर – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — नलिनी (नलू) साळवी ** [[निवेदिता सराफ]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — आसावरी राजे ** [[मानसी साळवी]] – ''[[काय घडलं त्या रात्री?]]'' — रेवती बोरकर ** [[अस्मिता देशमुख]] – ''[[देवमाणूस]]'' — सागरिका (डिंपल) पाटील |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री]] |- | * '''विरल माने – ''[[देवमाणूस]]'' — शुभंकर पाटील (टोण्या)''' ** मिलिंद पेमगिरीकर – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — शिवा ** – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — शरद ** दीपक साठे – ''[[कारभारी लयभारी]]'' — साठे ** उमेश बने – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — शरद साळवी ** मिलिंद जोशी – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — खानविलकर ** त्रियुग मंत्री – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — रॉकी ** राजेश भोसले – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — मंगेश (मंग्या) ** [[निखिल रत्नपारखी]] – ''[[माझा होशील ना]]'' — स्वानंद (पिंट्या) ब्रह्मे ** निलेश गवारे – ''[[देवमाणूस]]'' — नामदेव जाधव (नाम्या) ** किरण डांगे – ''[[देवमाणूस]]'' — बजरंग पाटील (बजा) | * '''रुक्मिणी सुतार – ''[[देवमाणूस]]'' — सरु पाटील''' ** अनुपमा ताकमोघे – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — कला ** तृप्ती शेडगे – ''[[कारभारी लयभारी]]'' — दीपा ** [[मीरा जगन्नाथ]]– ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — मोनिका (मोमो) राव ** भक्ती रत्नपारखी – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — मंदोदरी (मॅडी) परब ** मुग्धा पुराणिक – ''[[माझा होशील ना]]'' — नयना नाईक |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री]] |- | * '''अतुल काळे – ''[[माझा होशील ना]]'' — शशिकांत बिराजदार (बबन)''' ** रोहन सुर्वे – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — विजय लोखंडे ** कृष्णा जन्नू – ''[[कारभारी लयभारी]]'' — नाग्या ** महेश जाधव – ''[[कारभारी लयभारी]]'' — जगदीश पाटील (जग्गू) ** [[निखिल राऊत]] – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — मोहित परब ** उमेश बने – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — शरद साळवी ** अर्णव राजे – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — चिन्मय (चिन्या) साळवी ** [[जयवंत वाडकर]] – ''[[काय घडलं त्या रात्री?]]'' — रमाकांत ढवळे ** किरण डांगे – ''[[देवमाणूस]]'' — बजरंग पाटील (बजा) ** निलेश गवारे – ''[[देवमाणूस]]'' — नामदेव जाधव (नाम्या) | * '''शुभांगी भुजबळ – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — सुमन साळवी''' ** आकांशा गाडे – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — सिंधू ** प्रणित हाटे – ''[[कारभारी लयभारी]]'' — गंगा ** [[सुलेखा तळवलकर]] – ''[[माझा होशील ना]]'' — शर्मिला बिराजदार ** [[सीमा देशमुख]] – ''[[माझा होशील ना]]'' — सिंधू ब्रह्मे ** स्वाती लिमये – ''[[काय घडलं त्या रात्री?]]'' — शिवानी देसाई ** [[नेहा खान]] – ''[[देवमाणूस]]'' — दिव्या सिंग |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट वडील पुरस्कार|सर्वोत्कृष्ट वडील]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार|सर्वोत्कृष्ट आई]] |- | * '''उदय साळवी – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — वसंत (दादा) साळवी''' ** उमेश जगताप – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — हनुमंत लोखंडे ** अजय तपकीरे – ''[[कारभारी लयभारी]]'' — अंकुशराव पाटील ** [[गिरीश ओक]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — अभिजीत राजे ** अतुल काळे – ''[[माझा होशील ना]]'' — शशिकांत बिराजदार (बबन) ** अंकुश मांडेकर – ''[[देवमाणूस]]'' — बाबू पाटील | * '''[[शुभांगी गोखले]] – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — शकुंतला (शकू) खानविलकर''' ** राजश्री निकम – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — लक्ष्मी लोखंडे ** राधिका पिसाळ – ''[[कारभारी लयभारी]]'' — सुनंदा सूर्यवंशी ** दीप्ती केतकर – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — नलिनी (नलू) साळवी ** [[निवेदिता सराफ]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — आसावरी राजे ** अंजली जोगळेकर – ''[[देवमाणूस]]'' — मंगल पाटील |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सासरे पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सासरे]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सासू पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सासू]] |- | * '''[[विद्याधर जोशी]], [[सुनील तावडे]], [[विनय येडेकर]], [[निखिल रत्नपारखी]], [[अच्युत पोतदार]] – ''[[माझा होशील ना]]'' — ब्रह्मे सासरे''' ** रमेश रोकडे – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — प्रताप (भाई) साटम ** श्रीकांत केटी – ''[[कारभारी लयभारी]]'' — यशवंत सूर्यवंशी ** [[गिरीश ओक]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — अभिजीत राजे ** [[मोहन जोशी]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — दत्तात्रय कुलकर्णी | * '''[[निवेदिता सराफ]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — आसावरी राजे''' ** [[स्मिता तांबे]] – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — कामिनी (मम्मी) साटम ** [[पूजा पवार-साळुंखे]] – ''[[कारभारी लयभारी]]'' — कांचन सूर्यवंशी ** राधिका पिसाळ – ''[[कारभारी लयभारी]]'' — सुनंदा सूर्यवंशी ** रुक्मिणी सुतार – ''[[देवमाणूस]]'' — सरु पाटील |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत पुरस्कार|सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत]] ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट भावंडं पुरस्कार|सर्वोत्कृष्ट भावंडं]] |- | * '''''[[माझा होशील ना]]''''' ** ''[[लाडाची मी लेक गं!]]'' ** ''[[कारभारी लयभारी]]'' ** ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' ** ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' ** ''[[देवमाणूस]]'' | * '''[[विद्याधर जोशी]], [[सुनील तावडे]], [[विनय येडेकर]], [[निखिल रत्नपारखी]] – ''[[माझा होशील ना]]'' — ब्रह्मे बंधू''' ** [[मिताली मयेकर]]-रोहन सुर्वे – ''[[लाडाची मी लेक गं!]]'' — कस्तुरी-विजय ** [[निखिल चव्हाण]]-श्रीराम लोखंडे – ''[[कारभारी लयभारी]]'' — राजवीर-पृथ्वी ** अनुष्का सरकटे-महेश जाधव – ''[[कारभारी लयभारी]]'' — प्रियांका-जगदीश ** अन्विता फलटणकर-अर्णव राजे – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — स्वीटू-चिन्या ** [[अदिती सारंगधर]]-शाल्व किंजवडेकर – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — मालविका-ओमकार ** [[अस्मिता देशमुख]]-विरल माने – ''[[देवमाणूस]]'' — डिंपल-टोण्या |} ; विशेष पुरस्कार {| class="wikitable" !colspan=2| [[झी मराठी विशेष लक्षवेधी चेहरा पुरस्कार|वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा]] |- |colspan=2| *'''[[तन्वी मुंडले]] - ''[[पाहिले न मी तुला]]''''' |- !colspan=2| परफॉर्मन्स ऑफ द इयर |- |colspan=2| *'''[[मानसी साळवी]] - ''[[काय घडलं त्या रात्री?]]''''' |- !colspan=2| लक्स गोल्डन ब्युटी पुरस्कार |- |colspan=2| *'''अन्विता फलटणकर - ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]''''' |- !colspan=2| प्रभावशाली व्यक्तिरेखा |- |colspan=2| *'''[[शशांक केतकर]] - ''[[पाहिले नं मी तुला]]''''' |- !colspan=2| [[झी मराठी जीवनगौरव पुरस्कार|जीवन गौरव पुरस्कार]] |- |colspan=2| *'''[[अच्युत पोतदार]] - ''[[माझा होशील ना]]''''' |- !colspan=2| विशेष सन्मान (मालिका) |- |colspan=2| *'''''[[माझ्या नवऱ्याची बायको]]''''' |} ==विक्रम== {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक नामांकने ! नामांकने ! मालिका |- !२६ |''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' |- !२५ |''[[कारभारी लयभारी]]'' |- !२४ |''[[माझा होशील ना]]'' |- !२३ |''[[अग्गंबाई सासूबाई]]'' |- !२२ |''[[लाडाची मी लेक गं!]]'' |- !२० |''[[देवमाणूस]]'' |- !१० |''[[काय घडलं त्या रात्री?]]'' |} {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक विजेते ! पुरस्कार ! मालिका |- ! ८ | ''[[माझा होशील ना]]'' |- ! rowspan="2"| ५ | ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' |- | ''[[देवमाणूस]]'' |- ! २ | ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' |} {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक प्राप्तकर्ते !प्राप्तकर्ते !भूमिका !मालिका !पुरस्कार |- |[[किरण गायकवाड]] |अजितकुमार देव (देवीसिंग) |''[[देवमाणूस]]'' ! rowspan="4"|२ |- |रुक्मिणी सुतार |सरु पाटील |''[[देवमाणूस]]'' |- |[[गौतमी देशपांडे]] |सई बिराजदार |''[[माझा होशील ना]]'' |- |[[अच्युत पोतदार]], [[विद्याधर जोशी]], [[सुनील तावडे]], [[विनय येडेकर]], [[निखिल रत्नपारखी]] |सईचे पाच सासरे |''[[माझा होशील ना]]'' |} ==हे सुद्धा पहा== * [[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार]] == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:झी मराठी पुरस्कार|उत्सव]] 0zzczzl3zsleoy5hooqkkxxv5uayuu6 झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१९ 0 282740 2581320 2341635 2025-06-20T14:44:46Z Khirid Harshad 138639 2581320 wikitext text/x-wiki {{Infobox award | image = ZMA 2019.webp | image_size = | image_upright = | caption = | awarded_for = | presenter = [[झी मराठी]] | country = [[भारत]] | firstawarded = | lastawarded = | reward = | former name = | network = [[झी मराठी]] | holder_label = सूत्रसंचालन | holder = झी मराठी कुटुंब | award1_type = सर्वाधिक विजेते | award1_winner = ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' (९) | award2_type = सर्वाधिक नामांकने | award2_winner = ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' (२३) | award3_type = विजेती मालिका | award3_winner = ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' | previous = [[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१८|२०१८]] | next = [[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२०-२१|२०२०-२१]] }} '''झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१९''' ({{lang-en|Zee Marathi Utsav Natyancha Awards 2019}}) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१९ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा २० ऑक्टोबर २०१९ रोजी संपन्न झाला. या सोहळ्याने ५.८ टीव्हीआर मिळवला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/manoranjan-news/zee-marathi-awards-2019-full-list-of-winners-ssv-92-1992408/|title=‘झी मराठी अवॉर्ड्स २०१९’चा दैदिप्यमान सोहळा|date=2019-10-14|website=[[लोकसत्ता]]|access-date=2021-04-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/television/agabai-sasubai-and-ratris-khel-chale-2-receives-maximum-awards-zee-marathi-awards-2019/|title=या मालिकेने मारली झी मराठी अवॉर्ड्समध्ये बाजी, नुकतीच सुरू झालीय ही मालिका|date=2019-10-12|website=[[लोकमत]]|access-date=2021-04-05}}</ref> == विजेते व नामांकने == {| class="wikitable" ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट मालिका]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट कुटुंब पुरस्कार|सर्वोत्कृष्ट कुटुंब]] |- | * '''''[[अग्गंबाई सासूबाई]]''''' ** ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' ** ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' ** ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' ** ''[[भागो मोहन प्यारे]]'' ** ''[[अल्टी पल्टी सुमडीत कल्टी]]'' ** ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' | * '''कुलकर्णी – ''[[अग्गंबाई सासूबाई]]''''' ** मंत्री-पाटील – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' ** गायकवाड – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' ** सुभेदार – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' ** नाईक – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट नायक]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट नायिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट नायिका]] |- | * '''[[अतुल परचुरे]] – ''[[भागो मोहन प्यारे]]'' — मोहन अष्टपुत्रे''' ** तेजस बर्वे – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — समरसिंह मंत्री-पाटील ** [[हार्दिक जोशी]] – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — राजा राजगोंडा ** [[गिरीश ओक]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — अभिजीत राजे ** [[चेतन वडनेरे]] – ''[[अल्टी पल्टी सुमडीत कल्टी]]'' — अलंकार | * '''[[अमृता धोंगडे]] – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — सुमन (सुमी) मंत्री-पाटील''' ** अक्षया देवधर – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — अंजली गायकवाड ** [[अनिता दाते-केळकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — राधिका सुभेदार ** [[निवेदिता सराफ]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — आसावरी कुलकर्णी ** [[तेजश्री प्रधान]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — शुभ्रा कुलकर्णी ** दीप्ती केतकर – ''[[भागो मोहन प्यारे]]'' — मीरा गोडबोले ** [[शिवानी बावकर]] – ''[[अल्टी पल्टी सुमडीत कल्टी]]'' — पल्लवी |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट जोडी पुरस्कार|सर्वोत्कृष्ट जोडी]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सून पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सून]] |- | * '''[[निवेदिता सराफ]]-[[गिरीश ओक]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — आसावरी-अभिजीत''' ** [[अमृता धोंगडे]]-तेजस बर्वे – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — सुमी-समर ** अक्षया देवधर-[[हार्दिक जोशी]] – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — अंजली-राजा ** दीप्ती केतकर-[[अतुल परचुरे]] – ''[[भागो मोहन प्यारे]]'' — मीरा-मोहन ** [[शिवानी बावकर]]-[[चेतन वडनेरे]] – ''[[अल्टी पल्टी सुमडीत कल्टी]]'' — पल्लवी-अलंकार | * '''[[निवेदिता सराफ]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — आसावरी कुलकर्णी''' ** [[अमृता धोंगडे]] – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — सुमन (सुमी) मंत्री-पाटील ** अक्षया देवधर – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — अंजली गायकवाड ** [[अनिता दाते-केळकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — राधिका सुभेदार ** [[तेजश्री प्रधान]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — शुभ्रा कुलकर्णी ** प्राजक्ता वाड्ये – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — सरिता नाईक |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट खलनायक]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट खलनायिका]] |- | * '''[[माधव अभ्यंकर]] – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — हरी (अण्णा) नाईक''' ** अभिषेक कुलकर्णी – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — परेश (पप्या) पाटील ** [[अभिजीत खांडकेकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — गुरुनाथ सुभेदार (गॅरी) ** क्षितिज झवारे – ''[[भागो मोहन प्यारे]]'' — मदन म्हात्रे | * '''संजीवनी पाटील – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — वत्सला (वच्छी) नाईक''' ** राजश्री सावंत-वाड – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — अनुराधा मंत्री-पाटील ** धनश्री काडगांवकर – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — नंदिता गायकवाड ** [[ईशा केसकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — शनाया सुभेदार ** संजीवनी साठे – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — प्रज्ञा कारखानीस ** सरिता मेहेंदळे-जोशी – ''[[भागो मोहन प्यारे]]'' — मधुवंती |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री]] |- | * '''[[माधव अभ्यंकर]] – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — हरी (अण्णा) नाईक''' ** रोहित चव्हाण – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — बबन ** [[अभिजीत खांडकेकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — गुरुनाथ सुभेदार (गॅरी) ** [[अद्वैत दादरकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — सौमित्र बनहट्टी ** [[रवी पटवर्धन]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — दत्तात्रय कुलकर्णी ** [[गिरीश ओक]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — अभिजीत राजे ** [[अतुल परचुरे]] – ''[[भागो मोहन प्यारे]]'' — मोहन अष्टपुत्रे | * '''[[अपूर्वा नेमळेकर]] – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — कुमुदिनी (शेवंता) पाटणकर''' ** [[अमृता धोंगडे]] – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — सुमन (सुमी) मंत्री-पाटील ** [[ईशा केसकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — शनाया सुभेदार ** [[अनिता दाते-केळकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — राधिका सुभेदार ** [[निवेदिता सराफ]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — आसावरी कुलकर्णी ** [[तेजश्री प्रधान]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — शुभ्रा कुलकर्णी |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री]] |- | * '''[[अतुल परचुरे]] – ''[[भागो मोहन प्यारे]]'' — मोहन अष्टपुत्रे''' ** रोहित चव्हाण – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — बबन ** राजू बावडेकर – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — मामासाहेब (नरसू) ** राहुल बेलापूरकर – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — लक्ष्मण ** गजानन कुंभार – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — सुरेश मोरे ** नंदकिशोर चौघुले – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — पोपट ** हृदयनाथ जाधव – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — चोंट्या | * '''भक्ती रत्नपारखी – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — मंदोदरी (मॅडी) परब''' ** दीप्ती सोनावणे – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — चंदा ** [[ईशा केसकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — शनाया सुभेदार ** [[किशोरी अंबिये]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — सुलक्षणा सबनीस ** संजीवनी साठे – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — प्रज्ञा कारखानीस ** स्नेहल शिदम – ''[[भागो मोहन प्यारे]]'' — कामिनी लंके |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री]] |- | * '''हृदयनाथ जाधव – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — चोंट्या''' ** राजू बावडेकर – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — मामासाहेब (नरसू) ** अभिषेक कुलकर्णी – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — परेश (पप्या) पाटील ** राज हंचनाळे – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — सूरज गायकवाड ** मिहीर राजदा – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — आनंद शाह ** आशुतोष पत्की – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — सोहम कुलकर्णी ** सचिन शिर्के – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — काशिनाथ नाईक | * '''नम्रता पावसकर – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — छाया नाईक''' ** शर्मिला शिंदे – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — जेनी शाह ** श्वेता मेहेंदळे – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — रेवती गुप्ते ** प्रतिभा गोरेगांवकर – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — सुलभा सामंत ** संजीवनी पाटील – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — वत्सला (वच्छी) नाईक ** मंगल राणे – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — शोभा नाईक ** प्राजक्ता वाड्ये – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — सरिता नाईक |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट वडील पुरस्कार|सर्वोत्कृष्ट वडील]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार|सर्वोत्कृष्ट आई]] |- | * '''देवेंद्र दोडके – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — वसंत सुभेदार''' ** गजानन कुंभार – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — सुरेश मोरे ** सुनील शेट्ये – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — शेरसिंह मंत्री-पाटील ** मिलिंद दास्ताणे – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — प्रतापराव गायकवाड | * '''[[निवेदिता सराफ]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — आसावरी कुलकर्णी''' ** राजश्री सावंत-वाड – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — अनुराधा मंत्री-पाटील ** छाया सागांवकर – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — गोदाक्का ** [[अनिता दाते-केळकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — राधिका सुभेदार ** [[शकुंतला नरे]] – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — इंदुमती (माई) नाईक |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सासरे पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सासरे]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सासू पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सासू]] |- | * '''[[रवी पटवर्धन]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — दत्तात्रय कुलकर्णी''' ** सुनील शेट्ये – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — शेरसिंह मंत्री-पाटील ** मिलिंद दास्ताणे – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — प्रतापराव गायकवाड ** देवेंद्र दोडके – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — वसंत सुभेदार ** [[माधव अभ्यंकर]] – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — हरी (अण्णा) नाईक | * '''[[निवेदिता सराफ]] – ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' — आसावरी कुलकर्णी''' ** राजश्री सावंत-वाड – ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — अनुराधा मंत्री-पाटील ** भारती पाटील – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — सरिता सुभेदार ** [[शकुंतला नरे]] – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — इंदुमती (माई) नाईक |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत पुरस्कार|सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत]] ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट भावंडं पुरस्कार|सर्वोत्कृष्ट भावंडं]] |- | * '''''[[अग्गंबाई सासूबाई]]''''' ** ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' ** ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' ** ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' ** ''[[भागो मोहन प्यारे]]'' ** ''[[अल्टी पल्टी सुमडीत कल्टी]]'' ** ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' | * '''[[अमृता धोंगडे]]-रोहित चव्हाण — ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' — सुमी-बबन''' ** [[हार्दिक जोशी]]-राज हंचनाळे – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — राजा-सूरज ** अक्षया देवधर-अमोल नाईक – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — अंजली-बरकत ** [[अतुल परचुरे]]-विवेक जोशी – ''[[भागो मोहन प्यारे]]'' — मोहन-दादा |- ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार|सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम]] ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार|सर्वोत्कृष्ट बालकलाकार]] |- | * '''''राम राम महाराष्ट्र''''' ** ''[[आम्ही सारे खवय्ये]]'' ** ''[[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]'' | * '''राजवीरसिंह राजे — ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — लाडू''' ** आर्यन देवगिरी – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — अथर्व ** – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — पांडू ** – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — छाया ** – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — दत्ताराम ** – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — माधव ** – ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' — अभिराम |} ; विशेष पुरस्कार {| class="wikitable" !colspan=2| [[झी मराठी विशेष लक्षवेधी चेहरा पुरस्कार|वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा]] |- |colspan=2| *'''[[श्रेया बुगडे]] - ''[[चला हवा येऊ द्या]]''''' |- !colspan=2| परफॉर्मन्स ऑफ द इयर |- |colspan=2| *'''[[तेजश्री प्रधान]] - ''[[अग्गंबाई सासूबाई]]''''' |- !colspan=2| लक्स गोल्डन ब्युटी पुरस्कार |- |colspan=2| *'''सरिता मेहेंदळे-जोशी - ''[[भागो मोहन प्यारे]]''''' |- !colspan=2| प्रभावशाली व्यक्तिरेखा |- |colspan=2| *'''[[अनिता दाते-केळकर]] - ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]''''' |- !colspan=2| [[झी मराठी जीवनगौरव पुरस्कार|जीवन गौरव पुरस्कार]] |- |colspan=2| *'''[[रवी पटवर्धन]] - ''[[अग्गंबाई सासूबाई]]''''' |- !colspan=2| विशेष सन्मान (मालिका) |- |colspan=2| *'''''[[स्वराज्यरक्षक संभाजी]]''''' |- !colspan=2| विशेष सन्मान (कार्यक्रम) |- |colspan=2| *'''''[[चला हवा येऊ द्या]]''''' |} ==विक्रम== {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक नामांकने ! नामांकने ! मालिका |- !२३ |''[[रात्रीस खेळ चाले २]]'' |- !२२ |''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' |- ! rowspan="2"|२१ |''[[अग्गंबाई सासूबाई]]'' |- |''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' |- !१८ |''[[तुझ्यात जीव रंगला]]'' |- !११ |''[[भागो मोहन प्यारे]]'' |- !५ |''[[अल्टी पल्टी सुमडीत कल्टी]]'' |- ! rowspan="3"|१ |''[[आम्ही सारे खवय्ये]]'' |- |''[[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]'' |- |''राम राम महाराष्ट्र'' |} {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक विजेते ! पुरस्कार ! मालिका |- ! ९ | ''[[अग्गंबाई सासूबाई]]'' |- ! ६ | ''[[रात्रीस खेळ चाले २]]'' |- ! rowspan="2"|२ | ''[[भागो मोहन प्यारे]]'' |- | ''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' |- ! rowspan="3"|१ | ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' |- | ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' |- | ''राम राम महाराष्ट्र'' |} {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक प्राप्तकर्ते ! प्राप्तकर्ते ! भूमिका ! मालिका ! पुरस्कार |- |[[निवेदिता सराफ]] |आसावरी कुलकर्णी |''[[अग्गंबाई सासूबाई]]'' !४ |- |[[अतुल परचुरे]] |मोहन अष्टपुत्रे |''[[भागो मोहन प्यारे]]'' ! rowspan="4"|२ |- |[[माधव अभ्यंकर]] |अण्णा नाईक |''[[रात्रीस खेळ चाले २]]'' |- |[[अमृता धोंगडे]] |सुमन मंत्री-पाटील |''[[मिसेस मुख्यमंत्री]]'' |- |[[रवी पटवर्धन]] |दत्तात्रय कुलकर्णी |''[[अग्गंबाई सासूबाई]]'' |} ==हे सुद्धा पहा== * [[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार]] ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:झी मराठी पुरस्कार|उत्सव]] l63c0gp5r0zju1zfp6iet9ckub99kbq झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१८ 0 282947 2581319 2343174 2025-06-20T14:44:05Z Khirid Harshad 138639 2581319 wikitext text/x-wiki {{Infobox award | image = ZMA 2018.jpg | image_size = | image_upright = | caption = | awarded_for = | presenter = [[झी मराठी]] | country = [[भारत]] | firstawarded = | lastawarded = | reward = | former name = | network = [[झी मराठी]] | holder_label = सूत्रसंचालन | holder = [[संजय मोने]]<br>[[अभिजीत खांडकेकर]] | award1_type = सर्वाधिक विजेते | award1_winner = ''[[तुला पाहते रे]]'' (७) | award2_type = सर्वाधिक नामांकने | award2_winner = ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' (२२) | award3_type = विजेती मालिका | award3_winner = ''[[तुला पाहते रे]]'' | previous = [[झी मराठी पुरस्कार २०१७|२०१७]] | next = [[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१९|२०१९]] }} '''झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१८''' ({{lang-en|Zee Marathi Utsav Natyancha Awards 2018}}) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१८ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा २८ ऑक्टोबर २०१८ रोजी संपन्न झाला. या सोहळ्याने ८.० आणि ८.१ असे सर्वोच्च टीआरपी आणि टीव्हीआर मिळवून पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले. [[संजय मोने]] आणि [[अभिजीत खांडकेकर]] यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/television/zee-marathi-awards-2018-winners/|title=तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार|date=2018-10-29|website=[[लोकमत]]|access-date=2021-04-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/marathi/entertainment/zee-marathi-awards-2018-winner-list/449068|title=झी मराठी अवॉर्ड्स २०१८ च्या पुरस्कारांची यादी|date=2018-10-29|website=[[झी २४ तास]]|access-date=2021-04-05}}</ref> == विजेते व नामांकने == {| class="wikitable" ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट मालिका]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट कुटुंब पुरस्कार|सर्वोत्कृष्ट कुटुंब]] |- | * '''''[[तुला पाहते रे]]''''' ** ''[[लागिरं झालं जी]]'' ** ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' ** ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' ** ''[[जागो मोहन प्यारे]]'' ** ''[[बाजी (मालिका)|बाजी]]'' | * '''निमकर – ''[[तुला पाहते रे]]''''' ** पवार – ''[[लागिरं झालं जी]]'' ** गायकवाड – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' ** सुभेदार – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' ** सरंजामे – ''[[तुला पाहते रे]]'' |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट नायक]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट नायिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट नायिका]] |- | * '''[[सुबोध भावे]] – ''[[तुला पाहते रे]]'' — विक्रांत सरंजामे''' ** [[नितीश चव्हाण]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — अजिंक्य शिंदे (अज्या) ** [[हार्दिक जोशी]] – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — रणविजय (राणा) गायकवाड ** [[अतुल परचुरे]] – ''[[जागो मोहन प्यारे]]'' — मोहन म्हात्रे ** अभिजीत श्वेतचंद्र – ''[[बाजी (मालिका)|बाजी]]'' — बाजी | * '''[[अनिता दाते-केळकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — राधिका सुभेदार''' ** [[शिवानी बावकर]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — शीतल शिंदे ** अक्षया देवधर – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — अंजली गायकवाड ** [[गायत्री दातार]] – ''[[तुला पाहते रे]]'' — ईशा निमकर ** नुपूर दैठणकर – ''[[बाजी (मालिका)|बाजी]]'' — हिरा |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट जोडी पुरस्कार|सर्वोत्कृष्ट जोडी]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सून पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सून]] |- | * '''अक्षया देवधर-[[हार्दिक जोशी]] – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — अंजली-राणा''' ** [[शिवानी बावकर]]-[[नितीश चव्हाण]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — शीतल-अजिंक्य ** [[गायत्री दातार]]-[[सुबोध भावे]] – ''[[तुला पाहते रे]]'' — ईशा-विक्रांत ** सुप्रिया पाठारे-[[अतुल परचुरे]] – ''[[जागो मोहन प्यारे]]'' — शोभा-मोहन ** नुपूर दैठणकर-अभिजीत श्वेतचंद्र – ''[[बाजी (मालिका)|बाजी]]'' — हिरा-बाजी | * '''अक्षया देवधर – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — अंजली गायकवाड''' ** [[शिवानी बावकर]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — शीतल शिंदे ** [[अनिता दाते-केळकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — राधिका सुभेदार |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट खलनायक]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट खलनायिका]] |- | * '''[[किरण गायकवाड]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — हर्षवर्धन (भैय्यासाहेब) देशमुख''' ** [[अभिजीत खांडकेकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — गुरुनाथ सुभेदार (गॅरी) ** प्रखर सिंग – ''[[बाजी (मालिका)|बाजी]]'' — शेरा | * '''धनश्री काडगांवकर – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — नंदिता गायकवाड''' ** कल्याणी चौधरी – ''[[लागिरं झालं जी]]'' — पुष्पा भोईटे ** [[पूर्वा शिंदे]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — जयश्री भोईटे ** [[ईशा केसकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — शनाया सबनीस ** [[अभिज्ञा भावे]] – ''[[तुला पाहते रे]]'' — मायरा कारखानीस |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री]] |- | * '''मोहिनीराज गटणे – ''[[तुला पाहते रे]]'' — अरुण निमकर''' ** [[किरण गायकवाड]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — हर्षवर्धन (भैय्यासाहेब) देशमुख ** [[राहुल मगदूम]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — राहुल ताटे ** [[अद्वैत दादरकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — सौमित्र बनहट्टी ** उमेश जगताप – ''[[तुला पाहते रे]]'' — विलास झेंडे ** [[अतुल परचुरे]] – ''[[जागो मोहन प्यारे]]'' — मोहन म्हात्रे ** प्रखर सिंग – ''[[बाजी (मालिका)|बाजी]]'' — शेरा ** राजेश अहेर – ''[[बाजी (मालिका)|बाजी]]'' — दादाजी | * '''[[अनिता दाते-केळकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — राधिका सुभेदार''' ** छाया सागांवकर – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — गोदाक्का ** [[ईशा केसकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — शनाया सबनीस ** [[अभिज्ञा भावे]] – ''[[तुला पाहते रे]]'' — मायरा कारखानीस ** गार्गी फुले-थत्ते – ''[[तुला पाहते रे]]'' — पुष्पा निमकर ** [[श्रुती मराठे]] – ''[[जागो मोहन प्यारे]]'' — मोहिनी (भानुमती) ** [[सुप्रिया पाठारे]] – ''[[जागो मोहन प्यारे]]'' — शोभा म्हात्रे |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा]] ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट भावंडं पुरस्कार|सर्वोत्कृष्ट भावंडं]] |- | * '''[[राहुल मगदूम]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — राहुल ताटे''' ** दीप्ती सोनावणे – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — चंदा ** [[ईशा केसकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — शनाया सबनीस ** रोहिणी निनावे – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — केडीची मावशी ** गार्गी फुले-थत्ते – ''[[तुला पाहते रे]]'' — पुष्पा निमकर ** प्रथमेश देशपांडे – ''[[तुला पाहते रे]]'' — बिपीन टिल्लू ** मिलिंद पेमगिरीकर – ''[[बाजी (मालिका)|बाजी]]'' — बिनीवाले | * '''[[हार्दिक जोशी]]-राज हंचनाळे – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — राणा-सूरज''' ** [[अनिता दाते-केळकर]]-किरण माने – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — राधिका-शिरीष ** नुपूर दैठणकर-आदर्श कदम – ''[[बाजी (मालिका)|बाजी]]'' — हिरा-चिचोका |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री]] |- | * '''अमोल नाईक – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — बरकत''' ** राज हंचनाळे – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — सूरज गायकवाड ** [[अरुण नलावडे]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — रामचंद्र (नाना) दामले ** मिहीर राजदा – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — आनंद शहा ** आशुतोष गोखले – ''[[तुला पाहते रे]]'' — जयदीप सरंजामे ** – ''[[बाजी (मालिका)|बाजी]]'' — छब्बू | * '''श्वेता मेहेंदळे – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — रेवती गुप्ते''' ** [[पूर्वा शिंदे]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — जयश्री भोईटे ** ऋचा आपटे – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — सखी |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार|सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक]] |- | * '''''[[चला हवा येऊ द्या]]''''' ** ''[[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]'' ** ''[[आम्ही सारे खवय्ये]]'' ** ''[[तुमचं आमचं जमलं]]'' ** ''राम राम महाराष्ट्र'' | * '''[[संकर्षण कऱ्हाडे]] – ''[[आम्ही सारे खवय्ये]]''''' ** [[रोहित राऊत]] – ''[[तुमचं आमचं जमलं]]'' ** [[निलेश साबळे]] – ''[[चला हवा येऊ द्या]]'' ** [[आदेश बांदेकर]] – ''[[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]'' |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट वडील पुरस्कार|सर्वोत्कृष्ट वडील]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार|सर्वोत्कृष्ट आई]] |- | * '''मोहिनीराज गटणे – ''[[तुला पाहते रे]]'' — अरुण निमकर''' ** देवेंद्र देव – ''[[लागिरं झालं जी]]'' — सुरेंद्र (नाना) पवार ** मिलिंद दास्ताणे – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — प्रतापराव गायकवाड ** देवेंद्र दोडके – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — वसंत सुभेदार | * '''गार्गी फुले-थत्ते – ''[[तुला पाहते रे]]'' — पुष्पा निमकर''' ** दया एकसंबेकर – ''[[लागिरं झालं जी]]'' — उषा पवार ** छाया सागांवकर – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — गोदाक्का ** भारती पाटील – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — सरिता सुभेदार ** [[अनिता दाते-केळकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — राधिका सुभेदार ** विद्या करंजीकर – ''[[तुला पाहते रे]]'' — स्नेहलता सरंजामे (आईसाहेब) ** वीणा कट्टी – ''[[बाजी (मालिका)|बाजी]]'' — बाजीची आई |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सासरे पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सासरे]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सासू पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सासू]] |- | * '''देवेंद्र दोडके — ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — वसंत सुभेदार''' ** संतोष पाटील – ''[[लागिरं झालं जी]]'' — समाधान भोईटे ** मिलिंद दास्ताणे – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — प्रतापराव गायकवाड | * '''भारती पाटील – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — सरिता सुभेदार''' ** कमल ठोके – ''[[लागिरं झालं जी]]'' — जीजी भोईटे ** [[उषा नाईक]] – ''[[जागो मोहन प्यारे]]'' — लीलावती |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत पुरस्कार|सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत]] ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार|सर्वोत्कृष्ट बालकलाकार]] |- | * '''''[[तुला पाहते रे]]''''' ** ''[[लागिरं झालं जी]]'' ** ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' ** ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' ** ''[[चला हवा येऊ द्या]]'' ** ''[[जागो मोहन प्यारे]]'' ** ''[[बाजी (मालिका)|बाजी]]'' | * '''राजवीरसिंह राजे — ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — लाडू''' ** आर्यन देवगिरी – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — अथर्व सुभेदार ** मैथिली पटवर्धन – ''[[जागो मोहन प्यारे]]'' — माऊ ** आदर्श कदम – ''[[बाजी (मालिका)|बाजी]]'' — चिचोका |} ; विशेष पुरस्कार {| class="wikitable" !colspan=2| [[झी मराठी विशेष लक्षवेधी चेहरा पुरस्कार|वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा]] |- | *'''[[गायत्री दातार]] – ''[[तुला पाहते रे]]''''' |- !colspan=2| परफॉर्मन्स ऑफ द इयर |- | *'''[[अनिता दाते-केळकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]''''' |- !colspan=2| लक्स गोल्डन ब्युटी पुरस्कार |- | *'''अक्षया देवधर – ''[[तुझ्यात जीव रंगला]]''''' |- !colspan=2| प्रभावशाली व्यक्तिरेखा |- | *'''[[अनिता दाते-केळकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]''''' |- !colspan=2| [[झी मराठी जीवनगौरव पुरस्कार|जीवन गौरव पुरस्कार]] |- | *'''[[अशोक पत्की]]''' |- !colspan=2| विशेष सन्मान (मालिका) |- | *'''''[[स्वराज्यरक्षक संभाजी]]''''' |- !colspan=2| विशेष सन्मान (नायक) |- | *'''[[अमोल कोल्हे]] – ''[[स्वराज्यरक्षक संभाजी]]''''' |} ==विक्रम== {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक नामांकने ! नामांकने ! मालिका |- !२२ |''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' |- ! rowspan="3"|१८ |''[[लागिरं झालं जी]]'' |- |''[[तुझ्यात जीव रंगला]]'' |- |''[[तुला पाहते रे]]'' |- !१३ |''[[बाजी (मालिका)|बाजी]]'' |- !९ |''[[जागो मोहन प्यारे]]'' |- !३ |''[[चला हवा येऊ द्या]]'' |- ! rowspan="3"|२ |''[[आम्ही सारे खवय्ये]]'' |- |''[[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]'' |- |''[[तुमचं आमचं जमलं]]'' |- !१ |''राम राम महाराष्ट्र'' |} {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक विजेते ! पुरस्कार ! मालिका |- ! ७ | ''[[तुला पाहते रे]]'' |- ! ६ | ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' |- ! ५ | ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' |- ! २ | ''[[लागिरं झालं जी]]'' |- ! rowspan="2"| १ | ''[[चला हवा येऊ द्या]]'' |- | ''[[आम्ही सारे खवय्ये]]'' |} {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक प्राप्तकर्ते ! प्राप्तकर्ते ! भूमिका ! मालिका ! पुरस्कार |- |[[अनिता दाते-केळकर]] |राधिका सुभेदार |''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' ! rowspan="2"|३ |- |अक्षया देवधर |अंजली गायकवाड |''[[तुझ्यात जीव रंगला]]'' |- |[[हार्दिक जोशी]] |रणविजय (राणा) गायकवाड |''[[तुझ्यात जीव रंगला]]'' ! rowspan="2"|२ |- |मोहिनीराज गटणे |अरुण निमकर |''[[तुला पाहते रे]]'' |} == हे सुद्धा पहा == * [[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार]] == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:झी मराठी पुरस्कार|उत्सव]] rbouoxvlzk8xp1jh292mxreoqfezpxk झी मराठी पुरस्कार २०१७ 0 284364 2581321 2343175 2025-06-20T14:45:18Z Khirid Harshad 138639 2581321 wikitext text/x-wiki {{Infobox award | image = ZMA 2017.webp | image_size = | image_upright = | caption = | awarded_for = | presenter = [[झी मराठी]] | country = [[भारत]] | firstawarded = | lastawarded = | reward = | former name = | network = [[झी मराठी]] | holder_label = सूत्रसंचालन | holder = [[संजय मोने]]<br>[[अतुल परचुरे]] | award1_type = सर्वाधिक विजेते | award1_winner = ''[[लागिरं झालं जी]]'' (१०) | award2_type = सर्वाधिक नामांकने | award2_winner = ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' (२१) | award3_type = विजेती मालिका | award3_winner = ''[[लागिरं झालं जी]]''<br>''[[तुझ्यात जीव रंगला]]'' | previous = [[झी मराठी पुरस्कार २०१६|२०१६]] | next = [[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१८|२०१८]] }} '''झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१७''' ({{lang-en|Zee Marathi Utsav Natyancha Awards 2017}}) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१७ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा १५ ऑक्टोबर २०१७ रोजी संपन्न झाला. [[संजय मोने]] आणि [[अतुल परचुरे]] यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्याने ५.५ टीआरपी आणि ७.२ टीव्हीआर मिळवून तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/manoranjan-news/zee-marathi-awards-2017-winners-lagira-zhala-jee-grabs-10-awards-1567407/|title=झी मराठी अवॉर्ड्सवर ‘लागिरं झालं जी’ची ठसठशीत मोहोर|date=2017-10-10|website=[[लोकसत्ता]]|access-date=2021-06-17}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/amp/news/BOL-MB-lagir-zala-ji-bag-10-awards-here-is-the-list-of-zee-marathi-awards-2017-winners-5717289-PHO.html|title=राणा-शीतली ठरले सर्वोत्कृष्ट ॲक्टर-ॲक्ट्रेस, जाणून घ्या कुणीकुणी पटकावला झी मराठी अवॉर्ड|date=2017-10-15|website=[[दिव्य मराठी]]}}</ref> == विजेते व नामांकने == {| class="wikitable" ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट मालिका]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट कुटुंब पुरस्कार|सर्वोत्कृष्ट कुटुंब]] |- | * '''''[[लागिरं झालं जी]]''''' * '''''[[तुझ्यात जीव रंगला]]''''' ** ''[[जाडूबाई जोरात]]'' ** ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' ** ''[[गाव गाता गजाली]]'' ** ''[[नकटीच्या लग्नाला यायचं हं]]'' ** ''[[जागो मोहन प्यारे]]'' | * '''गायकवाड – ''[[तुझ्यात जीव रंगला]]''''' ** सामंत – ''[[जाडूबाई जोरात]]'' ** प्रधान – ''[[जाडूबाई जोरात]]'' ** पवार – ''[[लागिरं झालं जी]]'' ** भोईटे – ''[[लागिरं झालं जी]]'' ** सुभेदार – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' ** मिठबांव – ''[[गाव गाता गजाली]]'' ** देशपांडे – ''[[नकटीच्या लग्नाला यायचं हं]]'' |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट नायक]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट नायिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट नायिका]] |- | * '''[[हार्दिक जोशी]] – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — रणविजय (राणा) गायकवाड''' ** [[नितीश चव्हाण]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — अजिंक्य (अज्या) शिंदे ** [[अतुल परचुरे]] – ''[[जागो मोहन प्यारे]]'' — मोहन म्हात्रे | * '''[[शिवानी बावकर]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — शीतल पवार''' ** [[निर्मिती सावंत]] – ''[[जाडूबाई जोरात]]'' — जुई सामंत ** अक्षया देवधर – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — अंजली गायकवाड ** [[अनिता दाते-केळकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — राधिका सुभेदार ** [[प्राजक्ता माळी]] – ''[[नकटीच्या लग्नाला यायचं हं]]'' — नुपूर देशपांडे ** [[श्रुती मराठे]] – ''[[जागो मोहन प्यारे]]'' — मोहिनी (भानुमती) |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट जोडी पुरस्कार|सर्वोत्कृष्ट जोडी]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सून पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सून]] |- | * '''[[शिवानी बावकर]]-[[नितीश चव्हाण]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — शीतल-अजिंक्य''' ** [[निर्मिती सावंत]]-[[किशोरी शहाणे]] – ''[[जाडूबाई जोरात]]'' — जुई-मल्लिका ** अक्षया देवधर-[[हार्दिक जोशी]] – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — अंजली-राणा ** [[सुप्रिया पाठारे]]-[[अतुल परचुरे]] – ''[[जागो मोहन प्यारे]]'' — शोभा-मोहन | * '''अक्षया देवधर – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — अंजली गायकवाड''' ** [[निर्मिती सावंत]] – ''[[जाडूबाई जोरात]]'' – जुई सामंत ** [[अनिता दाते-केळकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — राधिका सुभेदार |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट खलनायक]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट खलनायिका]] |- | * '''[[अभिजीत खांडकेकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — गुरुनाथ (गॅरी) सुभेदार''' ** [[किरण गायकवाड]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — हर्षवर्धन (भैय्यासाहेब) देशमुख | * '''[[रसिका सुनील]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — शनाया सबनीस''' ** [[किशोरी शहाणे]] – ''[[जाडूबाई जोरात]]'' — मल्लिका प्रधान ** विद्या सावळे – ''[[लागिरं झालं जी]]'' — पुष्पा भोईटे ** [[किरण ढाणे]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — जयश्री भोईटे ** धनश्री काडगांवकर – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — नंदिता गायकवाड |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री]] |- | * '''[[राहुल मगदूम]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — राहुल ताटे''' ** मिलिंद दास्ताणे – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — प्रतापराव गायकवाड ** [[अरुण नलावडे]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — रामचंद्र (नाना) दामले ** दिगंबर नाईक – ''[[गाव गाता गजाली]]'' — सुहास ** – ''[[गाव गाता गजाली]]'' — संदीप ** – ''[[गाव गाता गजाली]]'' — वामन ** [[अतुल परचुरे]] – ''[[जागो मोहन प्यारे]]'' — मोहन म्हात्रे | * '''[[अनिता दाते-केळकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — राधिका सुभेदार''' ** [[निर्मिती सावंत]] – ''[[जाडूबाई जोरात]]'' — जुई सामंत ** [[किशोरी शहाणे]] – ''[[जाडूबाई जोरात]]'' — मल्लिका प्रधान ** छाया सागांवकर – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — गोदाक्का ** [[रसिका सुनील]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — शनाया सबनीस ** [[सुप्रिया पाठारे]] – ''[[जागो मोहन प्यारे]]'' — शोभा म्हात्रे ** [[श्रुती मराठे]] – ''[[जागो मोहन प्यारे]]'' — मोहिनी (भानुमती) |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा]] ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट भावंडं पुरस्कार|सर्वोत्कृष्ट भावंडं]] |- | * '''[[भालचंद्र कदम]] – ''[[चला हवा येऊ द्या]]''''' ** [[राहुल मगदूम]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — राहुल ताटे ** राज हंचनाळे – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — सूरज गायकवाड ** दीप्ती सोनावणे – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — चंदा ** [[सागर कारंडे]] – ''[[चला हवा येऊ द्या]]'' ** [[श्रेया बुगडे]] – ''[[चला हवा येऊ द्या]]'' ** [[कुशल बद्रिके]] – ''[[चला हवा येऊ द्या]]'' ** [[भारत गणेशपुरे]] – ''[[चला हवा येऊ द्या]]'' ** – ''[[गाव गाता गजाली]]'' — बैल ** आनंदा कारेकर – ''[[नकटीच्या लग्नाला यायचं हं]]'' — जयंत दिवटे | * '''[[हार्दिक जोशी]]-राज हंचनाळे – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — राणा-सूरज''' ** [[शिवानी बावकर]]-सौरभ भिसे-ध्रुव गोसावी – ''[[लागिरं झालं जी]]'' — शीतल-सौरभ-ध्रुव ** [[अनिता दाते-केळकर]]-किरण माने – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — राधिका-शिरीष ** रोहन कोटेकर-रोहित कोटेकर – ''[[गाव गाता गजाली]]'' — करण-अर्जुन ** [[प्राजक्ता माळी]]-अभिनय सावंत – ''[[नकटीच्या लग्नाला यायचं हं]]'' — नुपूर-यश |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री]] |- | * '''[[निखिल चव्हाण]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — विक्रम राऊत''' ** सिद्धार्थ खिरीड – ''[[जाडूबाई जोरात]]'' — ऋग्वेद प्रधान ** अतुल पाटील – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — भाल्या ** अमोल नाईक – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — बरकत ** सचिन देशपांडे – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — श्रेयस कुलकर्णी ** मिहीर राजदा – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — आनंद शहा ** रोहन सुर्वे – ''[[गाव गाता गजाली]]'' — मनोहर (बळी) ** – ''[[गाव गाता गजाली]]'' — बबन ** – ''[[गाव गाता गजाली]]'' — आबा ** – ''[[गाव गाता गजाली]]'' — नाम्या ** – ''[[गाव गाता गजाली]]'' — मास्तर ** अभिजीत आमकर – ''[[नकटीच्या लग्नाला यायचं हं]]'' — नीरज दिवटे | * '''[[किरण ढाणे]] – ''[[लागिरं झालं जी]]'' — जयश्री भोईटे''' ** संचिता कुलकर्णी – ''[[जाडूबाई जोरात]]'' — सायली सामंत ** – ''[[जाडूबाई जोरात]]'' — अनन्या ** छाया सागांवकर – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — गोदाक्का ** [[सुहिता थत्ते]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — भारती (नानी) दामले ** श्वेता मेहेंदळे – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — रेवती अभ्यंकर ** शुभांगी भुजबळ – ''[[गाव गाता गजाली]]'' — सविता ** – ''[[गाव गाता गजाली]]'' — गायत्री ** [[वर्षा दांदळे]] – ''[[नकटीच्या लग्नाला यायचं हं]]'' — लता देशपांडे |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार|सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक]] |- | * '''''[[चला हवा येऊ द्या]]''''' ** ''[[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]'' ** ''[[आम्ही सारे खवय्ये]]'' ** ''राम राम महाराष्ट्र'' | * '''[[निलेश साबळे]] – ''[[चला हवा येऊ द्या]]''''' ** अतुलशास्त्री भगरे – ''राम राम महाराष्ट्र'' ** [[संकर्षण कऱ्हाडे]] – ''[[आम्ही सारे खवय्ये]]'' ** [[आदेश बांदेकर]] – ''[[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]'' |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट वडील पुरस्कार|सर्वोत्कृष्ट वडील]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार|सर्वोत्कृष्ट आई]] |- | * '''देवेंद्र देव – ''[[लागिरं झालं जी]]'' — सुरेंद्र (नाना) पवार''' ** [[जयंत सावरकर]] – ''[[जाडूबाई जोरात]]'' — जुईचे बाबा ** मिलिंद दास्ताणे – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — प्रतापराव गायकवाड ** [[अरुण नलावडे]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — रामचंद्र (नाना) दामले ** दिगंबर नाईक – ''[[गाव गाता गजाली]]'' — सुहास ** असित रेडीज – ''[[नकटीच्या लग्नाला यायचं हं]]'' — चंद्रकांत देशपांडे | * '''छाया सागांवकर – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — गोदाक्का''' ** [[निर्मिती सावंत]] – ''[[जाडूबाई जोरात]]'' — जुई सामंत ** दया एकसंबेकर – ''[[लागिरं झालं जी]]'' — उषा पवार ** [[अनिता दाते-केळकर]] – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — राधिका सुभेदार ** – ''[[गाव गाता गजाली]]'' — क्रिशची आई ** [[पौर्णिमा तळवलकर]] – ''[[नकटीच्या लग्नाला यायचं हं]]'' — विजया देशपांडे |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सासरे पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सासरे]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सासू पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सासू]] |- | * '''मिलिंद दास्ताणे – ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' — प्रतापराव गायकवाड''' ** प्रदीप जोशी – ''[[जाडूबाई जोरात]]'' — जुईचे सासरे ** देवेंद्र दोडके – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — वसंत सुभेदार | * '''भारती पाटील – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — सरिता सुभेदार''' ** कमल ठोके – ''[[लागिरं झालं जी]]'' — जीजी भोईटे ** [[शकुंतला नरे]] – ''[[नकटीच्या लग्नाला यायचं हं]]'' — बाईसाहेब ** रागिणी सामंत – ''[[नकटीच्या लग्नाला यायचं हं]]'' — आईसाहेब ** [[उषा नाईक]] – ''[[जागो मोहन प्यारे]]'' — लीलावती |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत पुरस्कार|सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत]] ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार|सर्वोत्कृष्ट बालकलाकार]] |- | * '''''[[लागिरं झालं जी]]''''' ** ''[[जाडूबाई जोरात]]'' ** ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' ** ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' ** ''[[गाव गाता गजाली]]'' ** ''[[नकटीच्या लग्नाला यायचं हं]]'' ** ''[[जागो मोहन प्यारे]]'' | * '''ध्रुव गोसावी – ''[[लागिरं झालं जी]]'' — ध्रुव''' ** – ''[[जाडूबाई जोरात]]'' – अनन्या ** आर्यन देवगिरी – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — अथर्व ** – ''[[गाव गाता गजाली]]'' — क्रिश |- ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट आजी पुरस्कार|सर्वोत्कृष्ट आजी]] |- | * '''कमल ठोके – ''[[लागिरं झालं जी]]'' — जीजी भोईटे''' ** भारती पाटील – ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' — सरिता सुभेदार ** कल्पना सारंग – ''[[गाव गाता गजाली]]'' — सरकती आजी ** – ''[[गाव गाता गजाली]]'' — बहिरी आजी ** [[शकुंतला नरे]] – ''[[नकटीच्या लग्नाला यायचं हं]]'' — बाईसाहेब ** रागिणी सामंत – ''[[नकटीच्या लग्नाला यायचं हं]]'' — आईसाहेब |} ; विशेष पुरस्कार {| class="wikitable" !colspan=2| [[झी मराठी विशेष लक्षवेधी चेहरा पुरस्कार|वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा]] |- | *'''अक्षया देवधर – ''[[तुझ्यात जीव रंगला]]''''' |- !colspan=2| परफॉर्मन्स ऑफ द इयर |- | *'''साईंकित कामत – ''[[तुझं माझं ब्रेकअप]]''''' |- !colspan=2| लक्स गोल्डन ब्युटी पुरस्कार |- | *'''[[शिवानी बावकर]] – ''[[लागिरं झालं जी]]''''' |- !colspan=2| विशेष पदार्पण पुरस्कार |- | *'''[[शिवानी बावकर]] – ''[[लागिरं झालं जी]]''''' |} ==विक्रम== {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक नामांकने ! नामांकने ! मालिका |- !२१ |''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' |- ! rowspan="2"|२० |''[[लागिरं झालं जी]]'' |- |''[[गाव गाता गजाली]]'' |- !१९ |''[[तुझ्यात जीव रंगला]]'' |- !१६ |''[[जाडूबाई जोरात]]'' |- !१४ |''[[नकटीच्या लग्नाला यायचं हं]]'' |- !९ |''[[जागो मोहन प्यारे]]'' |- !७ |''[[चला हवा येऊ द्या]]'' |- ! rowspan="3"|२ |''[[आम्ही सारे खवय्ये]]'' |- |''[[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]'' |- |''राम राम महाराष्ट्र'' |} {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक विजेते ! पुरस्कार ! मालिका |- ! १० | ''[[लागिरं झालं जी]]'' |- ! ७ | ''[[तुझ्यात जीव रंगला]]'' |- ! ४ | ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' |- ! ३ | ''[[चला हवा येऊ द्या]]'' |} {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक प्राप्तकर्ते ! प्राप्तकर्ते ! भूमिका ! मालिका ! पुरस्कार |- |[[शिवानी बावकर]] |शीतल पवार |''[[लागिरं झालं जी]]'' !३ |- |अक्षया देवधर |अंजली गायकवाड |''[[तुझ्यात जीव रंगला]]'' ! rowspan="2"|२ |- |[[हार्दिक जोशी]] |रणविजय (राणा) गायकवाड |''[[तुझ्यात जीव रंगला]]'' |} ==हे सुद्धा पहा== * [[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार]] == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:झी मराठी पुरस्कार|उत्सव]] 37vod6z9joegnjc4fcob6ztjl4evmfn सदस्य चर्चा:संतोष गोरे 3 286003 2581568 2576208 2025-06-21T10:20:56Z MediaWiki message delivery 38883 /* Feminism and Folklore 2025 - Local prize winners */ नवीन विभाग 2581568 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=संतोष गोरे}} -- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १२:३५, ७ जुलै २०२१ (IST) == जुन्या चर्चा == {| class="wikitable" style="text-align: center" |- ! चर्चा क्रमांक ! पासून ! पर्यंत |- |[[सदस्य:संतोष गोरे/जुनी चर्चा१|जुनी चर्चा१]] | २०१५ | ३१ डिसेंबर २०२१ |- |[[सदस्य:संतोष गोरे/जुनी चर्चा२|जुनी चर्चा२]] | १ जानेवारी २०२२ | ३१ डिसेंबर २०२२ |} == विष्णुसहस्रनाम == हजारो पुनर्नावासह विष्णुसहस्रनाम भगवान विष्णूचे हे एक महत्त्वाचे स्थान आहे. हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि लोकप्रिय स्तोत्र आहे. विष्णू सहस्रनाम ही महाभारतात उपलब्ध असलेली सर्वात लोकप्रिय आवृत्ती आहे. पद्म पुराण किंवा मत्स्य पुराणात आणखी एक आवृत्ती उपलब्ध आहे. प्रत्येक नाव विष्णूचे असंख्य गुण दर्शवितो. अनेक हिंदू कुटुंबे पूजेच्या वेळी ते पाठ करतात. असे मानले जाते की ते ऐकणे किंवा वाचणे मानवी इच्छा पूर्ण करते. अनुशासनपर्व (महाभारत) धडा 9 ते 14, आजोबा कुरुक्षेत्र भीष्म युधिष्ठिर शिकवण देण्यात आली होती. [[सदस्य:Goresm|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे 💬</span>''']] ०९:५४, ९ फेब्रुवारी २०२१ (IST) == भाषांतर == नमस्कार, तुमची मदत हवी आहे. Section translation टूल वापरून नवीन पाने तयार करताना मला अडचण येत आहे. मागील अनेक पानांना Rahul Gandhi असे नाव येत आहे. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद. [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १४:२४, १६ जानेवारी २०२३ (IST) :कृपया [https://en.m.wikipedia.org/w/index.php?campaign=specialcx&title=Special:ContentTranslation#suggestions हा दुवा] वापरा तसेच पुढील भाषांतरा करिता बुक मार्क मध्ये जतन करून ठेवा. ::याशिवाय जर शक्य असेल तर नवीन tab उघडून त्याला ऑप्शन मध्ये जाऊन desktop site ला टिचकी देऊन [https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:ContentTranslation#suggestions हा दुवा] वापरा. फक्त हे थोडे नाजूक काम असेल. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १४:३७, १६ जानेवारी २०२३ (IST) ::आपण दिलेला दुवा वापरून [[८०वे गोल्डन ग्लोब पुरस्कार]] हा लेख तयार केला. तरीही तीच समस्या येत आहे. (तत्पूर्वी cache देखील clear केली होती.) [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १९:३७, १६ जानेवारी २०२३ (IST) : माझ्या बाबतीत पण समान समस्या आली होती. मी वेड चित्रपटाचे मराठीमध्ये भाषांतर केले असता शीर्षक नाव Prajakta Koli असे अचानक झाले. यामागचे कारण काय? [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:४४, १६ जानेवारी २०२३ (IST) ::आपल्या मोबाईलच्या सईमध्ये (cache मध्ये) जो जुना दुवा असतो, तो चुकून वापरल्या गेला की असे होते. असे होत असेल तरीही तुम्ही भाषांतर चालू असताना ते दुरुस्त करून योग्य ते मराठी शीर्षक देऊ शकता.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) :::{{साद|अमर राऊत}} तुमच्या दोघांची अडचण लक्षात घेऊन मी एक भाषांतर केले, जे की योग्य झाले. मी वरती दोन दुवे दिलेत. तर दुसरा दुवा वापरून भाषांतर करून पहा. फक्त एकच की तत्पूर्वी 'ब्राऊसर च्या पर्यायात' जाऊन desktop site वर टिचकी द्या आणि मग वरील दुव्यावर जा. तसेच भाषांतर करत असताना सर्वप्रथम वरती जे लेखनाव येते ते देखील एडिट करून घ्या. यामुळे नक्कीच तुमची समस्या दूर होईल. कृपया एक लेख अजून निर्माण करा.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:१०, १६ जानेवारी २०२३ (IST) :::{{ping| संतोष गोरे}} दुसरा दुवा वापरून [[हजारों ख्वाइशें ऐसी|एक लेख]] तयार केला आहे. आता ती समस्या नाही, पण अडचण अशी आहे की यावेळी मोबाईल फारच लोड घेतो. संकेतस्थळ उघडेपर्यंत फार वेळ वाट पहावी लागते. Section translation जसं सोईस्करपणे आणि वेगात होतं, तसं इथं आशय भाषांतर वापरताना होत नाही. असो. :::तुमच्या सहकार्यासाठी खूप आभार. :::~ [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १४:१९, १७ जानेवारी २०२३ (IST) :: आज पुन्हा तीच समस्या, [[पश्चिम दिल्ली जिल्हा]] पान‌ तयार करताना मराठीमध्ये शीर्षक नाव दिले होते आणि पब्लिश केल्यावर अचानक शीर्षक West Delhi झाले, मी तपासून घेतले असूनही पुन्हा तीच समस्या आली. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ००:००, २९ जानेवारी २०२३ (IST) :::{{साद|Tiven2240|label=टायविन}} यात आपली मदत हवी आहे. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:५५, २९ जानेवारी २०२३ (IST) == 2022 Wikipedia Asian Month Organizer Update == <div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr"> Dear all WAM organizers, Happy 2023! Thank you for updating the Ambassador list. We will '''start issuing the Barnstar''' to all eligible participants by late January. All ambassadors will received an additional special Barnstar. Please be sure to update '''[[:m:Wikipedia_Asian_Month_2022/Ambassadors|the list]]''' if you haven't done so. We also provide a '''[https://docs.google.com/document/d/1t1UEXwVkTsP5oP0sQmE74302M1SUDrlFW-kz2uTT5X0/edit?usp=sharing certificate template]''' for you to edit and print out to your participants. Once again, thank you for organizing and participating the 2022WAM, we like to hear your comment. Much appreciate for filling, and spreading out this [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd8Jo4ixbwKS1rC6KmfC1q6wW53nmoCQATbmsMatbZ4A1RCwA/viewform?usp=sf_link '''feedback survey''']. Look forward to seeing you again in 2023 WAM! best, Wikipedia Asian Month International Team </div> <!-- सदस्य:Joycewikiwiki@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Joycewikiwiki/WAM2022_Post_Campaign_Mass_Message_receiver&oldid=24259258 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == पाने वगळणे == [[Main other/doc]], [[साचा:Noping/doc]], [[चर्चा:Machindra Jayappa Galande]], [[“मोठी चोच असणारा कावळा"]], [[:वर्ग:Emoji असलेले लेख]], [[:वर्ग:इ.स. 2019 मधील मृत्यू]], [[:वर्ग:इ.स.ची वर्षे]], [[:वर्ग:सदस्य माहिती]], [[:वर्ग:मुक्तछंद]] कृपया ही पाने वगळावीत. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:२१, २० जानेवारी २०२३ (IST) :{{साद|Tiven2240}}, [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] यांनी सुचवलेली काही अनावश्यक पाने काढून टाकली आहेत. पैकी सुरुवातीची दोन पाने काढून टाकायची आहेत का राहू द्यावी, कृपया खुलासा करावा. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:३१, २० जानेवारी २०२३ (IST) :{{Done}} [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १७:३६, २० जानेवारी २०२३ (IST) [[Meena]], [[:वर्ग:वापरकर्ता भारत]], [[:वर्ग:महाराष्ट्रातील शुद्धिकरण न केलेल्या पाण्याचा पुरवठा होणारी गावे]], [[साचा:भारताच्या शासकीय योजना]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:१९, २१ जानेवारी २०२३ (IST) :{{झाले}} [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ११:३८, २१ जानेवारी २०२३ (IST) [[:वर्ग:इ.स. १९६६ मधील स्थापना]], [[:वर्ग:इ.स. १९६७ मधील स्थापना]], [[:वर्ग:प्राप्तिकरातुन बचत मिळ्णाऱ्या योजना]], [[चर्चा:विकिपीडिया प्रचालकांचा मनमानीपणा]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४९, ४ फेब्रुवारी २०२३ (IST) :{{झाले}} [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:५५, ४ फेब्रुवारी २०२३ (IST) [[:वर्ग:इ. स. १९०१]], [[सदस्य:Kishor salvi 9]], [[सदस्य:किशोर साळवी]], [[साचा:Infobox sports competition event]], [[विकिपीडिया चर्चा:Lakhan Kumare]], [[सदस्य चर्चा:चतुर]], [[सदस्य:चतुर]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २०:३६, २१ फेब्रुवारी २०२३ (IST) :{{झाले}}-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:३२, २२ फेब्रुवारी २०२३ (IST) [[२०२२-२३ स्पेन महिला तिरंगी मालिका]], [[साउथ एशिया वर्ल्ड]], [[सदस्य:मांडव्य ऋषी]], [[सदस्य चर्चा:मांडव्य ऋषी]], [[प्रा डॉ दिलीप चव्हाण]], [[नाथ (गोरक्षनाथ मंदिर)]], [[सदस्य:तुषार भांबरे]], [[सदस्य चर्चा:तुषार भांबरे]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १९:११, १७ मार्च २०२३ (IST) [[विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी]], [[2015-17 आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा]], [[2023 मणिपूर हिंसाचार]], [[सदस्य चर्चा:کوروش میهن بان]], [[कानडगाव]], [[कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, लातूर]], [[हा खेळ सावल्यांचा]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:२४, २७ जून २०२३ (IST) :यातील दोन लेख वगळले असून, तीन लेखात भर घातली आहे. तर इंग्रजी आकडे असलेले पुनर्निर्देशित लेख नाव तसेच ठेवावेत असे मला वाटते.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:१९, २८ जून २०२३ (IST) [[:वर्ग:भाषाविषयक नियतकालिके]], [[गॅव्हिन मॅकेना]], [[गेविन मॅकेना]], [[गेविन मॅकेन्ना]], [[मधुराणी गोखले प्रभुलक]], [[हिंदवी]], [[बीड जिल्ह्यात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा तालुका कोणता]], [[पुरंदर जिल्हा]], [[पद्दे ब्राह्मणाची आडनावे]], [[:वर्ग:तारखेनुसार वगळावयाचे लेख]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:३८, १३ ऑगस्ट २०२३ (IST) == Request for filling up Google Form for Feminism and Folklore 2023 == [[File:Feminism and Folklore 2023 logo.svg | logo.svg|right|frameless|300px]] Greetings Organisers, We appreciate your enthusiasm for '''Feminism and Folklore''' and your initiative in setting up the competition on your local wikipedia. We would want to learn more about the needs of your community and for that please fill out the google form ([https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScusayFXTzNWV-QgIiT3bRHQbAs_pVczvput2jehOcahnCdMg/viewform here]) as soon as possible so that we can plan and adapt the demands according to your specifications. By February 8, 2023, all entries for this form will be closed. Do share about the contest on your local Wikipedia. Ask your local administrator to add Feminism and Folklore to [[Mediawiki:Sitenotice]]. Create your own or see an example [[:m:User:Tiven2240/sn-fnf|on meta]] Also a reminder regarding the prior Google form sent for Internet and Childcare Support Financial Aid ([https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSea81OO0lVgUBd551iIiENXht7BRCISYZlKyBQlemZu_j2OHQ/viewform this]). Anyone who hasn't already filled it out has until February 5, 2023 to do so. Feel free to contact us via talkpage if you have any questions or concerns. Thanks and Regards, Feminism and Folklore 2023 International Team [[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) २०:११, ३० जानेवारी २०२३ (IST) <!-- सदस्य:Rockpeterson@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Rockpeterson/wlf2023&oldid=24455456 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == संदेश मिळाला == एकगठ्ठा पाठविलेला संदेश माझ्या चर्चा पानावर दिसत आहे. -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १०:२६, ७ फेब्रुवारी २०२३ (IST) : धन्यवाद. मी प्रथमच एकगठ्ठा संदेश प्रणाली वापरली आहे. कृपया सदरील संदेश मध्ये काही बदल/सुधारणा करावयास हवी होती किंवा पुढील काळात काय अपेक्षित आहे हे सुचवावे. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:२७, ७ फेब्रुवारी २०२३ (IST) == स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ == [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] या साठी पेज कसे सबमिट करायचं याचं मार्गदर्शन करा :कृपया [https://fountain.toolforge.org/editathons/fnf2023-mr येथे जाणे] आणि submit वर टिचकी देणे. तेथे तुमचा लेखनाव टाकून सबमिट करणे.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:३६, ७ फेब्रुवारी २०२३ (IST) धन्यवाद [[सदस्य:AShiv1212|AShiv1212]] ([[सदस्य चर्चा:AShiv1212|चर्चा]]) ०७:२६, ८ फेब्रुवारी २०२३ (IST) :या स्पर्धेत फक्त महिला चरित्रे (त्यापैकी १/२ महिला) या विषयावर लेख लिहिला तर सहभागी होता येईल का? किमान किती लेख लिहिले पाहिजेत?@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]] [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २१:०५, २० फेब्रुवारी २०२३ (IST) :{{साद|Ketaki Modak}} नमस्कार, आपण कमीत कमी एक नवीन लेख निर्माण केला किंवा असलेल्या लेखात ३,००० बाईटस पेक्षा जास्तीची भर घातली तरी चालेल. कृपया [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] या प्रकल्प पानावर जाऊन इतर माहिती व्यवस्थित समजून घेणे. येथे आपण पुरस्कार देखील प्राप्त करू शकता.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:०१, २१ फेब्रुवारी २०२३ (IST) ::माहितीसाठी धन्यवाद.!! प्रयत्न करते. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १५:१६, २१ फेब्रुवारी २०२३ (IST) ::नमस्कार, ::०१) मी नावनोंदणी करून As a trial 'अतिथी भगवान शंकर' नावाची लोककथा submit केली होती. पण मला ती माझ्या account वरून delete करायची आहे, ती कशी करता येईल? ::०२) मी माझ्या अन्य चालू असलेल्या पानांमध्ये भर घालून स्पर्धेत भाग घेऊ इच्छिते, म्हणजे असलेल्या पानात भर घातल्यावर त्याची लिंक शेवटी एकदाच पाठवायची, ना? मार्गदर्शन कराल काय? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) ०८:५५, २३ फेब्रुवारी २०२३ (IST) ::#नमस्कार, आपला लेख सदरील यादीतून हटवला आहे. ::#आपण जो नवीन लेख लिहिणार आहात किंवा लेखात भर घालणार आहात, तो ३१ मार्च पूर्वी कधीही सबमिट करू शकता. त्याला काही बंधन नाही. शक्यतो आपले लिखाण पूर्ण झाले की सबमिट करावे, जेणे करून परीक्षकांना तो तपासणे सोपे जाईल.-:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५४, २३ फेब्रुवारी २०२३ (IST) ::#:मनापासून धन्यवाद. आपण सांगितले तसे करते. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १४:४८, २३ फेब्रुवारी २०२३ (IST) ::#::स्त्रीवाद आणि लोकसाहित्य यामधील सहभाग आणि महिला संपादनेथॉन- २०२३ यातील सहभाग यामध्ये काही फरक आहे का? असेल तर काय, ते कळेल का? ::#::स्त्रीवाद आणि लोकसाहित्य यामधील सहभाग - यामध्ये स्त्रियांवरील लेखन ::#::आणि ::#::महिला संपादनेथॉन- २०२३ यामध्ये स्त्रियांनी केलेले लेखन असे अपेक्षित आहे का? ::#::कृपया मार्गदर्शन हवे आहे. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १२:०१, ४ मार्च २०२३ (IST) ::#:::दोन्ही प्रकल्प हे वेगवेगळे असून, [[विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२३|महिला संपादनेथॉन- २०२३]] येथील नियम तसेच परीक्षक देखील वेगवेगळे आहेत. अधिक माहितीसाठी वरील दुव्यावर टिचकी देऊन तेथील नियम समजून घेणे.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:५०, ४ मार्च २०२३ (IST) ::#::::धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २२:४३, ४ मार्च २०२३ (IST) == Wikipedia Asian Month 2022 Campaign Survey - We'd like to hear from you! == <div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr"> '''Dear WAM2022 organizors and participants,''' Once again, the WAM international team would like to hear your feedback by filling out the survey below. === [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd8Jo4ixbwKS1rC6KmfC1q6wW53nmoCQATbmsMatbZ4A1RCwA/viewform?usp=sf_link Wikipedia Asian Month 2022 Survey] === We apologize for the permission setting that was blocking many of you from open the survey, this problem have been fixed. Please share this survey with your community. We hope to see you again with a better version in the 2023 campaign. all the best, The WAM International Team </div> <!-- सदस्य:Joycewikiwiki@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Joycewikiwiki/WAM2022_Post_Campaign_Mass_Message_receiver&oldid=24259258 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == कृपया माझी माहिती डिलीट करू नये पद्माकर कुलकर्णी == माझे विकिपीडिया वरील माहिती कृपया डिलीट करू नये ही आपणास विनंती आहे [[सदस्य:पद्माकर कुलकर्णी|पद्माकर कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:पद्माकर कुलकर्णी|चर्चा]]) ००:०२, १८ मार्च २०२३ (IST) :नमस्कार, विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश असून ३२५+ भाषांत याचे लिखाण होते. सर्वत्र लिखाणाचे सारखे नियम असून त्यासाठी [[विकिपीडिया:परिचय]] आणि [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे]] किमान हे दोन लेख व्यवस्थित वाचावेत. तूर्तास इतकेच सांगू इच्छितो की विकिपीडियाचा वापर हा 'सोशल मीडिया' जसेकी फेसबुक, 'वैयक्तिक ब्लॉग', '' किंवा 'आत्मचरित्र लिखाण' यासाठी करता येत नाही. :न [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:५१, १८ मार्च २०२३ (IST) ::{{साद|पद्माकर कुलकर्णी}}, कृपया लक्षात घ्यावे की आपली संपादने, आपण निर्मिलेली चुकीची पाने वारंवार हटवल्या गेली आहेत. आपल्या चर्चा पानावर तसेच येथे माझ्या चर्चा पानावर देखील आपणास सूचना देण्यात आल्या आहेत. परत एकदा सांगत आहोत की विकिपीडिया हा एक जागतिक विश्वकोश असून याचे काही नियम आहेत. विकिपीडिया चा वापर वैयक्तिक ब्लॉग अथवा सोशल मीडिया प्रमाणे करता येत नाही. कृपया आपण येथे पूर्वीच्याच अस्तित्वात असलेल्या पानांवर छोटी छोटी संपादने करत आपला सहभाग वाढवावा.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १५:५७, ११ एप्रिल २०२३ (IST) == विकिडाटा दुरुस्ती == [[राजेश शृंगारपुरे]], [[नालासोपारा]], [[दुष्यंत वाघ]], [[बबन (चित्रपट)]], [[नाळ (चित्रपट)]], [[भारती आचरेकर]], [[आलोक राजवाडे]], [[रवी किशन]], [[गोंदिया जंक्शन रेल्वे स्थानक]], [[समीर आठल्ये]], [[चोरीचा मामला]] या पानांची विकिडेटा कलमे दुरुस्त करावीत. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:०८, २६ मार्च २०२३ (IST) :{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:२६, २७ मार्च २०२३ (IST) [[रेवती लेले]], [[पक पक पकाऽऽऽक]], [[धुरळा (चित्रपट)]], [[मोगरा फुलला]], [[लग्न पहावे करून]], [[असेही एकदा व्हावे]], [[धुमधडाका]], [[तू तिथं मी (चित्रपट)]], [[पछाडलेला]], [[नायका]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:१२, ४ एप्रिल २०२३ (IST) [[सुजय डहाके]], [[देविका दफ्तरदार]], [[खडवली रेल्वे स्थानक]], [[खर्डी रेल्वे स्थानक]], [[गार्गी बॅनर्जी]], [[बाळकृष्ण शिंदे]], [[पिस्तुल्या]], [[बेफाम (चित्रपट)]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २१:१९, ५ एप्रिल २०२३ (IST) :{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:३३, १२ एप्रिल २०२३ (IST) [[तुषार दळवी]], [[सक्षम कुलकर्णी]], [[कुंभ रास]], [[धनु रास]], [[मकर रास]], [[सिंह रास]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २०:४६, ५ मे २०२३ (IST) [[मच्छिंद्र कांबळी]], [[निपुण धर्माधिकारी]], [[पुष्कर जोग]], [[स्वप्नील बांदोडकर]], [[त्यागराज खाडिलकर]], [[अंशू गुप्ता]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:०८, २७ जून २०२३ (IST) [[नितीश चव्हाण]], [[प्रदीप शर्मा]], [[अर्नाळा किल्ला]], [[चतुरंग दंडासन]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४७, २७ ऑगस्ट २०२३ (IST) [[आमच्यासारखे आम्हीच]], [[सरीवर सरी (चित्रपट)]], [[साडे माडे तीन (चित्रपट)]], [[अग्निहोत्र (मालिका)]], [[शेम टू शेम]], [[नवरी मिळे नवऱ्याला (चित्रपट)]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १५:०७, २२ नोव्हेंबर २०२३ (IST) :{{झाले}} - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:०२, २३ नोव्हेंबर २०२३ (IST) == कार्यशाळा == श्री. संतोष गोरे सर नमस्कार, मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पीपल्स महाविद्यालय, नांदेड येथे दिय ३.४.२०२३ रोजी विकिपीडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त पान तयार करण्यात येत असताना ते आपल्याद्वारे नष्ट करण्यात येत आहे. तरी तसे करू नये ही विनंती. [[सदस्य:विकास कांबळे|विकास कांबळे]] ([[सदस्य चर्चा:विकास कांबळे|चर्चा]]) :{{साद|विकास कांबळे}} नमस्कार, कृपया कार्यशाळा घेतल्या नंतर पान बनवावे.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:०६, २७ मार्च २०२३ (IST) == Feminism and Folklore 2023 has been extended == [[File:Feminism and Folklore 2023 logo.svg | logo.svg|right|frameless|300px]] Greetings Organizers, Greetings from Feminism and Folklore International Team, We are pleased to inform you that [[m:Feminism and Folklore 2023|Feminism and Folklore]] an international writing contest on your local Wikipedia has been extended till the '''15th of April 2023'''. This is the last chance of the year to write about feminism, women biographies and gender-focused topics such as folk festivals, folk dances, folk music, folk activities, folk games, folk cuisine, folk wear, fairy tales, folk plays, folk arts, folk religion, mythology, folk artists, folk dancers, folk singers, folk musicians, folk game athletes, women in mythology, women warriors in folklore, witches and witch hunting, fairy tales and more We would like to have your immense participation in the writing contest to document your local Folk culture on Wikipedia. You can also help with the translation of [[m:Feminism and Folklore 2023|project pages]] and share a word in your local language. Organizers have been notified some instructions on mail. Please get in touch via email if you need any assistance. Best wishes, International Team Feminism and Folklore. --[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) ०९:५८, ३० मार्च २०२३ (IST) <!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Rockpeterson/wlf2023&oldid=24803574 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == घोडसगाव == [[घोडसगाव]] चे आचुक अक्षांश आणि रेखांश - 21°01'21"N 76°08'49"E हे आहेत, कृपया मराठी आणि ईंग्रजी विकी वर आपण हे अचूक पणे नोद्वावे.[[सदस्य:Rock Stone Gold Castle|Rock Stone Gold Castle]] ([[सदस्य चर्चा:Rock Stone Gold Castle|चर्चा]]) १५:५१, २१ एप्रिल २०२३ (IST) :[[घोडसगाव]] लेखावरील संपादनाच्या माहितीस्तव कृपया मराठी लेख [[वानर]] तसेच इंग्रजी लेख [[:en:Gray langur|Gray langur]] हे लेख पहावेत. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५३, २२ एप्रिल २०२३ (IST) == मराठी विकी == या विकीवर लेखकांची संख्या इतकी कमी का ? मराठी विकी लेखकानं लेखनासाठी हिंदी विकी वणी लॅपटॉप दान करते का ? [[सदस्य:Rock Stone Gold Castle|Rock Stone Gold Castle]] ([[सदस्य चर्चा:Rock Stone Gold Castle|चर्चा]]) १०:३३, २२ एप्रिल २०२३ (IST) :{{साद|Rock Stone Gold Castle}} :#नमस्कार, ढोबळ मानाने हिंदी भाषा ही भारत भर बोलली आणि लिहिली जाते तर मराठी भाषा ही महाराष्ट्र आणि गोवा येथे. सबब हिंदी विकिपीडियावर सदस्य संख्या मराठी पेक्षा जास्त आहे. परंतु आपणास माहीत आहे का, की मराठी विकिपीडिया हा लेख संख्येच्या हिशोबाने इतर विविध प्रांतीय विकिपीडियांना मागे टाकत एक एक पाऊल पुढे जात आहे. :#हिंदी किंवा इतर विकिपीडियावर मोफत लॅपटॉप पुरवल्या जातो का नाही हे मला माहीत नाही. जर तसे काही असेल तर तुम्ही तो मिळवण्यास स्वतंत्र आहात.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:४५, २२ एप्रिल २०२३ (IST) == मराठी गझलसंग्रह == :आपण मराठी गझलसंग्रह येथून काही एन्ट्री काढून टाकल्या आहेत. त्या का काढून टाकल्या ते कळेल का? माझी सोनचाफा ( इंदुजी) हि ७९ व्या ओळीतील एन्ट्री आपण का काढून टाकली? [[सदस्य:Induji.in|Induji.in]] ([[सदस्य चर्चा:Induji.in|चर्चा]]) १७:३३, २७ एप्रिल २०२३ (IST) :{{साद|Induji.in}}, नमस्कार आपण नक्की कोणत्या लेखाबद्दल बोलत आहात.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १९:३६, २७ एप्रिल २०२३ (IST) == Feminism and Folklore 2023 has ended, What's Next? == <div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">{{int:please-translate}} [[File:Feminism and Folklore 2023 logo.svg|right|350px]] Dear {{PAGENAME}}, '''[[m:Feminism and Folklore 2023|Feminism and Folklore 2023]]''' writing competition has ended. We thank you for organizing it on your local Wikipedia and help in document folk cultures and women in folklore in different regions of the world on Wikipedia. What's next? # Please complete the jury on or before 15th of May 2023. # Email us on [mailto:support@wikilovesfolklore.org support@wikilovesfolklore.org] the Wiki usernames of top three users with most accepted articles in local contest. # Write the information about the winners on the projects Meta Wiki '''[[:m:Feminism and Folklore 2023/Results|Results page]]''' # You can also put the names of the winners on your local project page. # We will be contacting the winners in phased manner for distribution of prizes. Feel free to contact us via mail or [[:m:Talk:Feminism and Folklore 2023|talkpage]] if you need any help, clarification or assistance. Thanks and regards, '''International Team'''<br /> '''Feminism and Folklore''' </div> <!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Rockpeterson/wlf2023&oldid=24803574 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == चुकीचे पुनरनिर्देशित असलेली पान == [[:en:Five_Pillars_of_Islam|Five Pillars of Islam]] या लेखाचे मराठी पुनरनिर्देशन [[इस्लाम]] या वर होत आहे, परंतु , [[इस्लाम]] हे इंग्रजी पुष्ट [[:en:Islam|Islam]] वरून पुनरनिर्देशित होत असल्याने गोंधळ निर्माण होत आहे, [[इस्लामचे पाच आधारस्तंभ]] नवीन पुष्ट तयार करून त्यास [[:en:Five_Pillars_of_Islam|Five Pillars of Islam]] ला पुनरनिर्देशित करण्याची गरज आहे. @[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]] अशा प्रकारच्या लेखांना दुरुस्त करण्यासाठी, तुम्हाला काळवण्या वैतीरिक्त अजून काय करता येईल? [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २२:०२, २८ मे २०२३ (IST) :होय, तुम्ही 'इस्लामचे पाच आधारस्तंभ' असा नवीन लेख लिहू शकता. इतर भाषेतील लेख मराठी लेखास जोडण्याच्या पद्धतीला आंतरविकीदुवा म्हणतात. ते तुम्हाला अनुभवाने जोडता येईल. तूर्तास कोणाही जाणकारास संदेश देऊन तुम्ही काम करून घेऊ शकता.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:४७, २९ मे २०२३ (IST) ::धन्यवाद! [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २३:२६, १ जून २०२३ (IST) == सफर (इस्लामीक दुसरा महिना) == [[सफर (इस्लामी दुसरा महिना)]] या पानावरील आपण केलेल्या बदल बद्दल येथे सांगाल? [[सफर (इस्लामीक दुसरा महिना)]] या नावाने मी पुष्ट तयार केले होते तुम्ही ते का हटवला व तसेच वर्ग देखील हटवले [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २३:३३, १ जून २०२३ (IST) :पान हटवले नाही, अभय नातू यांनी स्थानांतरित केले. तुम्ही निर्माण केले वर्ग हे अनावश्यक असून इंग्रजी वर्गाची नक्कल होती. तसेच अजून काही वर्गात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तूर्तास तुम्ही लिखाण करावे. वर्ग दुरुस्ती परत करता येईल. आणि हो, बरेच लेख हे भाषांतरित करताना अशुद्ध मराठीत लिहिले जात आहेत. अपेक्षा आहे तुमचे लेख आरामात वाचून, पुनर्लिखाण. कराल. [[मोहम्मद पैगंबर यांच्या बायका ]] मधील प्रस्तावना/ पाहिला परिच्छेद पहावा, तो मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:३३, २ जून २०२३ (IST)का ::होय, [[मोहम्मद पैगंबर यांच्या बायका]] हा लेख सध्या अपूर्ण आहे... अमराठी तर ठीक आहे परंतु वर्ग अनावश्यक आहे हे आपण कोणत्या आधारावर ठरवतात? [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) ०८:३९, ३ जून २०२३ (IST) :::अनेक कारणे आहेत. :::उदाहरणार्थ: वर्ग:अरबी भाषेतील मजकूर असलेले लेख - हा वर्ग त्याच लेखात जोडता येतो ज्यात अरबी भाषेतील विविध आयात, मोठा परिच्छेद लिहिलेला आहे. एक दोन शब्द अरबी भाषेत असतील तर त्याची गरज नाही. तसेच अनेक लेखात जर अरबी भाषेतील उतारे असतील तरच वर्ग बनवायचा असतो. त्या व्यतिरिक्त लेख नाव कसे ठेवायचे यासाठी इतर नावे तपासावित, जसे की हिंदी भाषेतील मजकूर / हिंदीतील मजकूर / हिंदी भाषेमधील मजकूर वगैरे वगैरे. हे वेगवेगळे अस्तित्वात असलेले वर्ग पाहून त्याला मिळता जुळता वर्ग बनवावा. याही पेक्षा महत्वाचे म्हणजे असा कोणता इतर वर्ग आहे का हे देखील पाहावे लागते. असे अनेक मुद्दे असतात. या करिता आपण केवळ लेख लिहावा आणि उपलब्ध असलेला वर्ग जोडावा. जर नवीन वर्गाची गरज असेल तर @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] जोडतील.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५३, ३ जून २०२३ (IST) ::::[[सदस्य:संतोष गोरे|@संतोष गोरे]] सांगितल्या बद्दल ध्यवाद, वर्ग जोडण्या बाबत मी @अभय नातू यांना कळवीन, परंतु एक वर्ग जोडणे आवश्क आहे "इस्लामी दिनदर्शिकेचे महिने " [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २३:१५, ३ जून २०२३ (IST) == Feminism and Folklore 2023 - A Heartfelt Appreciation for Your Impactful Contribution! == <div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr"> [[File:Feminism and Folklore 2023 logo.svg|center|500px]] {{int:please-translate}} Dear Wikimedian, We extend our sincerest gratitude to you for making an extraordinary impact in the '''[[m:Feminism and Folklore 2023|Feminism and Folklore 2023]]''' writing competition. Your remarkable dedication and efforts have been instrumental in bridging cultural and gender gaps on Wikipedia. We are truly grateful for the time and energy you've invested in this endeavor. As a token of our deep appreciation, we'd love to send you a special postcard. It serves as a small gesture to convey our immense thanks for your involvement in the competition. To ensure you receive this token of appreciation, kindly fill out [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeXZaej264LOTM0WQBq9QiGGAC1SWg_pbPByD7gp3sC4j7VKQ/viewform this form] by August 15th, 2023. Looking ahead, we are thrilled to announce that we'll be hosting Feminism and Folklore in 2024. We eagerly await your presence in the upcoming year as we continue our journey to empower and foster inclusivity. Once again, thank you for being an essential part of our mission to promote feminism and preserve folklore on Wikipedia. With warm regards, '''Feminism and Folklore International Team'''. --[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) ००:०७, २६ जुलै २०२३ (IST) </div> <!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf2023p&oldid=25345565 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == लेख नाव बदल == कृपया [[उस्मानाबाद]] आणि [[जेसलमेर]] ही पाने [[धाराशिव]] आणि [[जैसलमेर]] या नावांकडे स्थानांतरित करावी. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:५७, ७ ऑगस्ट २०२३ (IST) :{{झाले}} - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:११, ७ ऑगस्ट २०२३ (IST) ::जसे संदेश यांनी औरंगाबाद लेखाचे छत्रपती संभाजीनगर नावास स्थानांतरण केले, तसे वरील दोन्ही लेख अजून योग्य नावास स्थानांतिरत झाले नाहीत. कृपया ते करावे, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १३:५६, ८ ऑगस्ट २०२३ (IST) [[अ‍ॅन फ्रँक]] हा लेख सुद्धा [[ॲन फ्रँक]] या अचूक व योग्य नावाकडे स्थानांतरित करावा. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:१०, ११ ऑगस्ट २०२३ (IST) [[अंदमान आणि निकोबार]] या लेखाचे [[अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह]] या बरोबर नावाकडे स्थानांतरण करावे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:५९, २६ ऑगस्ट २०२३ (IST) :का, अंदमान आणि निकोबार बेटे ? अचूक नाव कोणते आहे?- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:५७, २६ ऑगस्ट २०२३ (IST) ::दोन्ही नावे योग्य आहेत, कोणत्याही एका नावाकडे स्थानांतरित करावे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४१, २७ ऑगस्ट २०२३ (IST) == Invitation to Rejoin the [https://mdwiki.org/wiki/WikiProjectMed:Translation_task_force Healthcare Translation Task Force] == [[File:Wiki Project Med Foundation logo.svg|right|frameless|125px]] You have been a [https://mdwiki.toolforge.org/prior/index.php medical translators within Wikipedia]. We have recently relaunched our efforts and invite you to [https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/index.php join the new process]. Let me know if you have questions. Best [[User:Doc James|<span style="color:#0000f1">'''Doc James'''</span>]] ([[User talk:Doc James|talk]] · [[Special:Contributions/Doc James|contribs]] · [[Special:EmailUser/Doc James|email]]) 12:34, 13 August 2023 (UTC) <!-- सदस्य:Doc James@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Top_translators/10&oldid=25451576 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == परतावा == आपण हे पृष्ठ परत करू शकता [[सुशोभन सोनू रॉय]] किंवा मी हे पृष्ठ पुन्हा तयार करू शकतो ? मराठी वृत्तपत्रांमध्येही त्यांच्या बातम्या आहेत। [[विशेष:योगदान/110.224.16.31|110.224.16.31]] १६:५४, १ सप्टेंबर २०२३ (IST) :क्षमा असावी, सदरील व्यक्ती ही अजून लेख लिहिण्या इतपत उल्लेखनीय नाही. सबब सध्या तरी यावर लेख लिहिला जाऊ शकत नाही.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:२१, १ सप्टेंबर २०२३ (IST) == नमस्कार... == नमस्कार [[सदस्य:Fulabai chavan|Fulabai chavan]] ([[सदस्य चर्चा:Fulabai chavan|चर्चा]]) १४:४८, २९ सप्टेंबर २०२३ (IST) :नमस्कार :- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:३५, २९ सप्टेंबर २०२३ (IST) ::दादोजी खोमणे हे मराठी पेज मी तयार केले आहे तर त्यात लोकं सारखे बदल करत आहेत....तर..ते पृष्ठ लॉक की करावे...ते मला कळेल का.. [[सदस्य:Fulabai chavan|Fulabai chavan]] ([[सदस्य चर्चा:Fulabai chavan|चर्चा]]) १६:२८, २ नोव्हेंबर २०२३ (IST) :::नमस्कार, विकिपीडिया वरील कोणताही लेख, कोणीही संपादित करू शकतो. अशाच प्रकारे त्यात अतिरिक्त माहितीची भर टाकली जाते.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:०३, २ नोव्हेंबर २०२३ (IST) == बॉटफ्लॅग == [[सदस्य:CommonsDelinker]] यांस इंग्लिश विकिपीडियावर बॉटफ्लॅग दिलेला आहे, त्यानुसार मराठी विकिपीडियावर सुद्धा त्यांना बॉटफ्लॅग देण्यात यावा म्हणजे त्यांची संपादने 'अलीकडील बदल' येथे दिसणार नाहीत, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १८:४३, २० जून २०२३ (IST) :करायला काही हरकत नाही. परंतु खरे तर याची संपादने अत्यल्प असून, याद्वारे एखाद्या लेखातून चित्र हटवल्याचे निदर्शनास येताच तिथे नवीन चित्र जोडता येते. सबब या दृष्टिकोनातून याला बॉट फ्लॅग नाही दिला तरी चालेल असे मला वाटते. तसेच @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]], कडे बॉट फ्लॅग चा अधिकार आहे. तेव्हा त्यांनी यावर आपले मत व्यक्त करावे असे मला वाटते.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:४७, ९ ऑक्टोबर २०२३ (IST) ::संतोष गोरे यांच्याशी सहमत. अद्याप या बॉटच्या कामाचा उपद्रव वाटत नाही. अधिक बदल होउन त्यामुळे इतरांचे बदल सारखे झाकले जाऊ लागले तर बॉटफ्लॅग देउयात. ::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २२:०६, ९ ऑक्टोबर २०२३ (IST) == Invite to Join Wikipedia Asian Month 2023 == <div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr"> ''You are receiving this message because you participated in the [[:m:Wikipedia Asian Month 2022|Wikipedia Asian Month 2022]] as an organizer or editor.'' [[File:Wikipedia Asian Month Logo.svg|thumb|Join the Wikipedia Asian Month 2023 ]] <big>Dear all,</big> <big>The '''[[:m:Wikipedia Asian Month Home|Wikipedia Asian Month 2023]]'''[1] is coming !</big> <big>The campaign start within a flexible 30 days from November to December. Following with the changes of the rules made by last year, the wish to have more people get to know Asia and Asian related topic is the same! </big>'''<big>Click [[:m:Wikipedia Asian Month 2023/Join an Event|"Here"]] to Organize/Join a WAM Event.</big>''' '''1. Propose "Focus Theme" related to Asia !''' If you are based somewhere in Asia, or have specific passion on an Asian topic, please propose your "Focus Theme" by October 25th. The WAM international team will select 5 themes. Please propose your focus theme through [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfPLz8kvSP_0LlI4vGRHAP2ydJPnLY__1hb9-p8AsRcS2R2NQ/viewform?usp=sf_link this link][2]. '''2. Enhancing existing articles can also count as part of campaign contribution.''' Any edits, including creating new articles or adding new content to existing articles, over 3000 bytes in total would be able to get a reward. Last year, due to this change of rules, the Programs & Events Dashboard was suggested. However, according to community survey of 2022, Fountain Tool is still the best platform for tracking edit and points. You don’t need to create any Dashboard. For the tracking of editing existing article, the international team is currently designing a form. Will soon publish to the main page of WAM 2023. '''3. More flexible campaign time''' The contribution duration would remain 30days, but we extended the overall campaign timeline to 2 months. All organizers can decide when to start their WAM as long as the whole duration is within November 1st to December 31th. It means that you can participate in WAM based on the needs of your local community. '''Timetable''' * October 1st, 2023 : Publish International Campaign Page of the Year * October 5th to 25th, 2023 : Call for focus themes of WAM 2023. * Before 29 October, 2023: Complete '''[[:m:Wikipedia Asian Month 2023/Join an Event|Registration]]''' [3] of Each language Wikipedia. * November 1st, UTC 00:00 to December 31th, UTC 00:00, 2023: Running the Campaign. (Find your local campaign for the actual event date.) * January 1st to March 15th, 2024: Auditing of each language Wikipedia. * March 30th, 2024: Deadline of reporting statistics and eligible editors to the International Team * April 1st to May 15th, 2024: The international team distributes Barnstars and Certificates to eligible editors of each event. For your information, the main page of Wikipedia Asian Month is currently undertaking a reconstruction for archiving purpose. For the 2023 event please bookmarked this page. We hope you will enjoy Wikipedia Asian Month! If you have any inquiry, feel free to contact us by info@asianmonth.wiki [4]. <big> We look forward to your participation. Cheers!!! WAM 2023 International Team</big> [1] https://meta.wikimedia.org/wiki/Wikipedia_Asian_Month_2023 [2] https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfPLz8kvSP_0LlI4vGRHAP2ydJPnLY__1hb9-p8AsRcS2R2NQ/viewform?usp=sf_link [3] https://meta.wikimedia.org/wiki/Wikipedia_Asian_Month_2023/Join_an_Event [4] info@asianmonth.wiki </div> <!-- सदस्य:Joycewikiwiki@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Joycewikiwiki/Wikipedia_Asian_Month_2023_Message_receiver_main&oldid=25753309 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> What are your plans to arrange Asian Month 2023 Marathi? I am interested to participate. [[सदस्य:Vikrantkorde|विक्रांत कोरडे]] ([[सदस्य चर्चा:Vikrantkorde|चर्चा]]) १७:२९, २१ ऑक्टोबर २०२३ (IST) :@[[सदस्य:Vikrantkorde|विक्रांत कोरडे]], नमस्कार, आपल्या सहभाग आणि उत्कंठेबद्दल धन्यवाद. लवकरच या प्रकल्पाबद्दल मराठी विपी वर सूचना देण्यात येईल. :cc:@[[सदस्य:Tiven2240|टायविन]] आणि @[[सदस्य:Sandesh9822|संदेश हिवाळे]] :- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १०:०३, २२ ऑक्टोबर २०२३ (IST) == नोव्हेंबर मुखपृष्ठ सदर == नमस्कार, नोव्हेंबर महिन्यात बदलून [[हंपी]] हा लेख सदर करावा असे सुचवत आहे. कृपया या लेखावर एकदा नजर घालावी व उचित बदल करावेत ही विनंती. [[विकिपीडिया:मुखपृष्ठ_सदर_लेख_नामनिर्देशन#हंपी]] धन्यवाद. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०६:१६, ३० ऑक्टोबर २०२३ (IST) :नमस्कार, लेख विस्तृत आणि सुंदर आहे, परंतु यात लाल दुवे तसेच भाषांतरामुळे काही व्याकरणाच्या चुका देखील झाल्या आहेत. तसे प्रमाण कमीच आहे. लेख बऱ्यापैकी व्यवस्थित झाला असे वाटले की मी आपल्याला तसे कळवतो. सध्या मी थोडा व्यस्त असल्याने, काम थोडे हळू हळू होईल असे वाटते.:- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०९:३५, ३० ऑक्टोबर २०२३ (IST) ::@[[सदस्य:Nitin.kunjir|Nitin.kunjir]] नमस्कार, यात आपले योगदान पण दिसून येत आहे. कृपया सदरील लेखावर एक नजर फिरवावी आणि काय कमी जास्त आहे ते सुचवावे.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०९:४२, ३० ऑक्टोबर २०२३ (IST) == विकिपीडिया आशियाई महिना २०२३ == [[चित्र:Wikipedia Asian Month Logo Mr.svg|right|400px|frameless]] प्रिय विकिसदस्य, '''[[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३|विकिपीडिया आशियाई महिना ]]''' हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रकल्प पृष्ठ [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३|येथे]] उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण '''विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल''' तसेच '''डिजीटल बार्नस्टार''' देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३/सहभागी|येथे]] आपली नोंदणी करा आणि [https://fountain.toolforge.org/editathons/wam-mr-2023 हा दुवा] वापरून आपला लेख सादर करा. जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक [[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे ]], [[सदस्य:Sandesh9822|संदेश हिवाळे]] किंवा [[सदस्य:Tiven2240|टायविन]] यांना संपर्क करावा. धन्यवाद. :'''आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३''' :<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small> <!-- सदस्य:संतोष गोरे@mrwiki ने https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87/test&oldid=2341857 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == आकाराम दादा पवार यांच्या विकिपीडिया पानाच्या पुनर्स्थापनेची विनंती == नमस्कर, काहि दिवसा अघोधर "[[आकाराम दादा पवार]]" या बद्दलच्या विकिपीडिया पानाला संदर्भांच्या अभावी हटवले आहे. मात्र, माझ्या मते, लिहिलेल्या माहितीची अचूकता सिद्ध करू शकणारे पुरेसे संदर्भ आहेत. [[आकाराम दादा पवार]] यांनी लोकांसाठी आणि देशासाठीही मोलाचे योगदान दिले आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल लोकांना माहिती असणे महत्त्वाचे आहे. मी विनंती करते की तुम्ही विकिपीडिया वर पान पुनर्स्थापीत करा . जर आवश्यक असेल तर, माहितीला आधार देणारे अतिरिक्त संदर्भ देण्यासाठी मी तयार आहे.[[आकाराम दादा पवार]] सारख्या व्यक्तींचे सकारात्मक योगदान ओळखणे आणि त्यावर प्रकाश टाकणे महतवाचे आहे . या विषयाकडे तुमचे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद. [[सदस्य:Manasi.M.Pawar|Manasi.M.Pawar]] ([[सदस्य चर्चा:Manasi.M.Pawar|चर्चा]]) १३:५०, १५ डिसेंबर २०२३ (IST) :{{साद|Manasi.M.Pawar}}, नमस्कार, आपल्या सदरील लेखावर संदेश हिवाळे यांनी [https://mr.m.wikipedia.org/wiki/सदस्य_चर्चा:Sandesh9822 त्यांच्या चर्चा पानावर] उत्तर दिले आहे. काही शंका असतील तर तेथे पुढील चर्चा करू शकता. -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:५९, १८ डिसेंबर २०२३ (IST) == Invitation to Organize Feminism and Folklore 2024 Writing Competition == <div style="border:8px maroon ridge;padding:6px;> [[File:Feminism and Folklore 2024 logo.svg|centre|550px|frameless]] ::<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr"> <center>''{{int:please-translate}}''</center> Dear {{PAGENAME}}, Hope you are doing well, Wishing you a Happy New Year!. We extend a heartfelt invitation to you to organize the '''[[:m:Feminism and Folklore 2024|Feminism and Folklore 2024]]''' writing competition, which is scheduled to take place from February 1, 2024, to March 31, 2024. This year's edition of Feminism and Folklore will concentrate on feminism, women's issues, and gender-focused topics, aligning with a Wiki Loves Folklore gender gap focus and featuring a folk culture theme on Wikipedia. This year we have created two new Tools for the Feminism and Folklore project. The tool is called '''Campwiz'''. This tool is created by the international Tech team of Wiki Loves Folkore especially crafted for Feminism and Folklore project. The tool works as same as fountain or dashboard but has extra abilities required for jury and submission of articles. To create a new campaign on Campwiz, organizers to follow these steps: # Go to the tool link: <nowiki>https://tools.wikilovesfolklore.org/</nowiki> # Select your wiki on which you want to organize the campaign (enter the name or short code, such as "{{CONTENTLANG}}" for {{#language:{{PAGELANGUAGE}}}} {{SITENAME}}). # Give your campaign a name example "Feminism and Folklore 2024 on {{#language:{{PAGELANGUAGE}}}} {{SITENAME}})". # Select the start and end dates (note: keep your start date as Feb 1 and end date as March 31). # Provide a description for your campaign (you can briefly describe the campaign in this section). # Make sure to keep the checkboxes ticked for "Allow users to submit articles that were not created but expanded." if you want to use the campaign for expanded articles also. # Keep minimum added bytes as 4000 and minimum added words as 400 and click next. # In the jury section, keep the checkboxes ticked for "Allow jury members to participate in the campaign" and "Prevent jury members from seeing each other's votes." As per your preference. # Under the jury search box, type the username of your jury and click on the "+" button to add; you can add multiple jury members. # Click next to review and then click on save. With this we have also created a '''Missing article tool'''. This tool identifies articles in the English Wikipedia that are absent from your native language Wikipedia. You can customize your selection criteria, and our tool will provide you with a table displaying the missing articles along with suggested titles. You also have the option to download the list in both CSV and wikitable formats. Both tools, the Missing Article Tool and the Campwiz Tool, are now available for public use during the Feminism and Folklore campaign. You can find more information about these tools here: <nowiki>https://tools.wikilovesfolklore.org/</nowiki> There are also some changes in the rules and criteria's. Please go through the rules below. # '''Minimum Length:''' The expanded or new article should have a minimum of '''''4000 bytes or 400 words''''', ensuring sufficient depth and coverage of the chosen topic. The local organizers are free to choose the minimum length criteria as per needs of their local Wikipedia and must be clearly mention on local project page. # '''Language Quality:''' Articles should not be poorly machine-translated, ensuring that language quality and readability are maintained at a high standard. # '''Timeline of Creation or Expansion:''' The article should be created or expanded between 1 February and 31 March, aligning with the specified contest timeline. # '''Theme Relevance''': Articles should directly address the theme of feminism and folklore, exploring connections between gender, cultural traditions, and intangible heritage. # '''No Orphaned Articles:''' Articles must not be orphaned, meaning they should be linked from at least one other article to ensure visibility within the Wikipedia ecosystem. # '''No Copyright violations:''' There should be no copyright violations, and articles should adhere to local Wikipedia policies on notability, ensuring that the content meets the standards for notability. # '''Adequate references and Citations:''' Each article should include proper references and citations following local Wikipedia policies, ensuring the reliability and credibility of the information presented. Learn more about the contest details and prizes on our project page [[:m:Feminism and Folklore 2024|here]]. Should you require any assistance, please feel free to contact us on our meta talk page or via email. We eagerly anticipate your enthusiastic coordination and participation in Feminism and Folklore 2024. Thank you and Best wishes, '''Feminism and Folklore 2024 International Team''' --[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १२:२१, १८ जानेवारी २०२४ (IST) </div></div> <!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf&oldid=26088038 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == Thank you for being a medical contributors! == <div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr"> {| style="background-color: #fdffe7; border: 1px solid #fceb92;" |rowspan="2" style="vertical-align: middle; padding: 5px;" | [[File:Wiki Project Med Foundation logo.svg|130px]] |style="font-size: x-large; padding: 3px 3px 0 3px; height: 1.5em;" |'''The 2023 Cure Award''' |- | style="vertical-align: middle; padding: 3px;" |In 2023 you '''[https://mdwiki.org/wiki/WikiProjectMed:WikiProject_Medicine/Stats/Top_medical_editors_2023_(all) were one of the top medical editors in your language]'''. Thank you from [[m:WikiProject_Med|Wiki Project Med]] for helping bring free, complete, accurate, up-to-date health information to the public. We really appreciate you and the vital work you do! Wiki Project Med Foundation is a [[meta:Wikimedia_thematic_organizations|thematic organization]] whose mission is to improve our health content. '''[https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdWfjVFbDO4ji-_qn2SsAgdCflhcOZychLnr1JUacsPaBr1eA/viewform Consider joining for 2024]''', there are no associated costs. Additionally one of our primary efforts revolves around translation of health content. We invite you to '''[https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/index.php try our new workflow]''' if you have not already. Our dashboard automatically [https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/leaderboard.php collects statistics] of your efforts and we are working on [https://mdwiki.toolforge.org/fixwikirefs.php tools to automatically improve formating]. |} Thanks again :-) -- [https://mdwiki.org/wiki/User:Doc_James <span style="color:#0000f1">'''Doc James'''</span>] along with the rest of the team at '''[[m:WikiProject_Med|Wiki Project Med Foundation]]''' ०३:५५, ४ फेब्रुवारी २०२४ (IST) </div> <!-- सदस्य:Doc James@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Top_Other_Language_Editors_2023&oldid=26173705 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == एक लेख जोडा == [[विकिपीडिया:मुखपृष्ठ अलीकडील मृत्यू]] या लेखात मला एक नाव जोडायचे आहे– 👉🏻[[हेगे गींगोब]]👈🏻, धन्यवाद! --[[सदस्य:Ayesha46|Ayesha46]] ([[सदस्य चर्चा:Ayesha46|चर्चा]]) ०८:१६, ५ फेब्रुवारी २०२४ (IST) :ठीक आहे जोडूया. याच सोबत [[फेब्रुवारी ४]] मध्ये मृत्यू या मथळ्या खाली आपण सदरील लेखनाव जोडू शकता.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:०८, ५ फेब्रुवारी २०२४ (IST) ::सल्ल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ते संपादन केले -- [[सदस्य:Ayesha46|Ayesha46]] ([[सदस्य चर्चा:Ayesha46|चर्चा]]) २३:००, ५ फेब्रुवारी २०२४ (IST) == कृपया इतर संपादकांना मदत करा == आपण अलीकडे [[सदस्य:Sohan wankhade]] यांचे सदस्य पान (Userpage) [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%3ASohan_wankhade&diff=2326837&oldid=2326800 पूर्णपणे रिक्त केले] होते [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%3ASohan_wankhade&diff=2327312&oldid=2327310 ते ही अनेक वेळा]. आपले कारण "विकिपीडिया चा वैयक्तिक वापर" होते. मी तुमचे लक्ष [[:en:WP:UPYES|WP:UPYES]] वर आणू इच्छितो, हे धोरण प्रत्येक विकिपीडियाच्या सदस्य पानांवर लागू होते (दुर्दैवाने ते मराठी विकिपीडियावर अस्तित्वात नाही, पण तरीही मराठी विकिपीडियावर लागू होते.) त्यात स्पष्टपणे "Non-article Wikipedia material such as reasonable Wikipedia humor, essays and perspectives, personal philosophy, comments on Wikipedia matters allowed" लिहिले आहे. त्यामुळे तुम्ही जे केले त्याऐवजी काही मजकूर तिथेच राहू द्यायला हवे होते आणि त्याला समजावून सांगायला हवे होते. तसे, मी ते केले आहे. धन्यवाद. (You recently had completely blanked User:Sohan wankhade's userpage multiple times. Your reason was "विकिपीडिया चा वैयक्तिक वापर". I would like to bring your notice to [[:en:WP:UPYES|WP:UPYES]], a policy applicable to all wikipedias' userpages (unfortunately it doesn't exist in marathi wikipedia, but is still applicable). It clearly says "Non-article Wikipedia material such as reasonable Wikipedia humor, essays and perspectives, personal philosophy, comments on Wikipedia matters allowed'. So you should rather have let some content stay there and explain him why you reduced it. By the way, I have did it. Thank you.) [[सदस्य:ExclusiveEditor|<span style="background:Orange;color:White;padding:2px;">Exclusive</span><span style="background:black; color:White; padding:2px;">Editor</span>]] [[सदस्य चर्चा:ExclusiveEditor|<sub>Notify Me!</sub>]] [[सदस्य:ExclusiveEditor|ExclusiveEditor]] १९:४३, १२ फेब्रुवारी २०२४ (IST) :{{साद|ExclusiveEditor}}नमस्कार, कृपया काही अतिरिक्त खुलासे कराल तर फार बरे होईल. :# ''कृपया इतर संपादकांना मदत करा'' - आजपर्यंत मी कुणाकुणाला मदत केली नाही त्यांची नावे येथे नमूद करावीत. :# ''Redundancy'' - आपण येथील संपादन सारांश मध्ये Redundancy (म्हणजे अतिरेक) असे नमूद केले आहे. मी नक्की कशाचा अतिरेक केला आहे? :# ''ते ही अनेक वेळा'' - मी नक्की सदरील सदस्याचे सदस्य पान कितीवेळा रिकामे केले याची निश्चित संख्या येथे नमूद केल्यास अजून बरे होईल. :# ''आणि त्याला समजावून सांगायला हवे होते. तसे, मी ते केले आहे'' - आपण Sohan wankhade यांचे चर्चा पान तपासले आहे का? उलट मी तरी त्यांना एकवेळा सूचना दिली आहे; आपण कधी आणि कुठे दिलीय? :::: अपेक्षा आहे की योग्य आणि मुद्देसूद उत्तरे द्याल.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:१८, १२ फेब्रुवारी २०२४ (IST) तुमच्या प्रश्नाची उत्तरे: # मी सहमत आहे की तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी खरोखरच एक प्रशंसनीय काम केले आहे आणि "'''कृपया इतर संपादकांना मदत करा'''" हे शीर्षक अंशतः चुकीचे असू शकते, परंतु मला असे म्हणायचे आहे की फक्त या एका प्रकरणात तुम्ही User:Sohan wankhade यांशी बोलायला हवे होते. # तुमच्या चर्चा पानावरील माझे दुसरे संपादन तांत्रिक(Technical) होते, ज्यात मी माझी 'डिझाइनशिवाय डुप्लिकेट स्वाक्षरी' काढून टाकली. त्यामुळे माझे संपादन सारांश 'Redundancy' होते आणि तुमच्याशी संबंधित नव्हते. # मी तुमचे पहिले संपादन "'''पूर्णपणे रिक्त केले'''" या शब्दासह ''विकिलंक'' केले आहे आणि सोबतच '''"ते ही अनेक वेळा'''" तुमच्या पुन्हा रिक्त केलेल्या संपादन सोबत ''wikilink'' केले होते. अशा प्रकारे मी तुमच्या दोन्ही संपादनांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केलेले आहे. # तुम्ही त्याला (UserːSohan Wankhade) सांगायला हवे होते की वापरकर्ता पानावर फक्त '''काही''' विकिपीडिया संबंधित नसलेल्या सामग्रीला '''परवानगी आहे'''. तुम्ही त्याच्यासाठी [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे|चुकीचा धोरणात्मक लेख]] देखील जोडले आहे, कारण त्यात त्याच्या प्रकरणाचा (कविता) कुठेही उल्लेख केलेला नाही, पण स्वत: लिहिलेल्या कवितांना परवानगी नाही या निष्कर्षावर तुम्ही कसे पोहोचलात हे देखील त्याला सांगितले नाही. # ''आपण कधी आणि कुठे दिलीय (सूचना)?''- कृपया माझे संपादन सारांश पहा: [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Sohan_wankhade&action=history UserːSohan wankhade's history] आणखी दोन गोष्टीː * मी मान्य करतो की मी लिहिण्यासाठी मशिन ट्रान्सलेशन वापरतो कारण मराठीत टाईप करण्यास खूप वेळ लागतो, तथापि मला मराठी माहित आहे, आणि माझे लेखन पुरेसे वाचनीय आहे. *मला तुमच्याशी वाद घालायचे नाही आणि तूम्ही माझे शत्रूही नाही आहात. मला फक्त तूम्च्याकडे या घटनेची नोंद करायची होती, आणि नवीन वापरकर्त्यांना ते स्वतः समस्याग्रस्त आहेत असे वाटणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे कारण त्यांना असे वाटल्यास ते मदत करणार नाहीत. (कोणतेही शब्दलेखन चुकीचे असल्यास क्षमस्व.) [[सदस्य:ExclusiveEditor|<span style="background:Orange;color:White;padding:2px;">Exclusive</span><span style="background:black; color:White; padding:2px;">Editor</span>]] [[सदस्य चर्चा:ExclusiveEditor|<sub>Notify Me!</sub>]] [[सदस्य:ExclusiveEditor|ExclusiveEditor]] १५:५७, १३ फेब्रुवारी २०२४ (IST) :* ३. ''पूर्णपणे रिक्त केले'' आणि ''ते ही अनेक वेळा'' - माफ करा, दोन वेळा (twice) आणि अनेकवेळा (multiple times) यात फरक आहे. मी सदरील सदस्याचे सप्टेंबर २०२३ मध्ये सदस्य पान केवळ दोन वेळा रिक्त केले आणि त्याच सोबत त्यांच्या चर्चा पानावर एक सूचना टाकली होती. त्यानंतर देखील सदरील सदस्य स्वतःचे सदस्य पान पुन्हा पुन्हा संपादत होते. जास्त गंभीर सूचना दिल्यास सदस्य विकिपीडियावर येणे कमी करू शकतो, म्हणून मी त्यांच्या कडे थोडे दुर्लक्ष केले. माझ्या मते असे करणे योग्य होते. :* ४. ''वापरकर्ता पानावर फक्त काही विकिपीडिया संबंधित नसलेल्या सामग्रीला परवानगी आहे. तुम्ही त्याच्यासाठी चुकीचा धोरणात्मक लेख देखील जोडले आहे'' - कृपया बारकाईने निरीक्षण करावे, सदरील सदस्य सात वर्षांपासून विकिपीडियावर असून या पूर्ण कार्यकाळात त्यांनी मराठी विपी वर आजपावेतो तब्बल २० संपादने केली असून ती सर्व केवळ स्वतःच्या सदस्य पानावरील आहेत. त्यांनी अजून एकही उपयुक्त संपादन केलेले नाही. याचा अर्थ सदरील सदस्य विकिपीडियाचा वापर [[अनुदिनी]] (personal blog) प्रमाणे करत आहे. यासाठी आपण त्यांच्या विकिमिडिया वरील संपादनाचा [https://commons.m.wikimedia.org/wiki/Commons:Deletion_requests/Files_uploaded_by_Sohan_wankhade हा इतिहास] पहावा. येथे त्या ठिकाणच्या प्रचालकानी Out of Scope, personal photo असा शेरा दिला आहे. हेच माझे म्हणणे मराठी विपी वरील संपदानाबाबत आहे. यासाठी मी तुम्हाला दोन दुवे देतो, इंग्रजी [[en:Wikipedia:User pages#What may I not have in my user pages?|What may I not have in my user pages?]] (तुम्हाला इंग्रजीचा सराव जास्त आहे म्हणून) आणि मराठी [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे#विकिपीडिया म्हणजे ब्लॉग, वेबस्पेस पुरवठादार कंपनी, सोशल नेटवर्क संकेतस्थळ अथवा कुणाचे स्मारक संकेतस्थळ नव्हे|विकिपीडिया म्हणजे ब्लॉग, वेबस्पेस पुरवठादार कंपनी, सोशल नेटवर्क संकेतस्थळ अथवा कुणाचे स्मारक संकेतस्थळ नव्हे]]. सदरील नियम मला जास्त महत्वाचा वाटतो. माझा सारांश - सदस्य विपिवर योगदान देत असल्यास त्याचा हेतू शुद्ध मानल्या जाऊ शकतो. अशा वेळी त्याने सदस्य पानावर माहिती चौकट साचा जोडणे, सुविचार, आपला विपत्र पत्ता देणे, फेसबुक सहित इतर समाज माध्यमांचे दुवे देणे चालू शकते (जसे की तुम्ही म्हणत आहात). परंतु जर तो केवळ सदस्य पानावर वारंवार संपादन करत असेल तर तो हेतू पूर्वक ब्लॉग प्रमाणे विपीचा दुरुपयोग करत असतो. :: ''वि. सु. - सप्टेंबर २०२३ पासून मी सदरील सदस्यांकडे ([[सदस्य:Sohan wankhade]]) दुर्लक्ष केले होते. परंतु तुम्ही आज तब्बल सहा महिन्यांनी अनाकलनीय रित्या त्यांची बाजू मांडत आहात म्हणून आता त्यांच्यावर जास्त लक्ष दिल्या जाईल. कदाचित ते प्रतिबंधित देखील होऊ शकतील. -:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:३८, १४ फेब्रुवारी २०२४ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[पूनम पांडे]] (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ०१:०४, १४ फेब्रुवारी २०२४ (IST) == Translation help == Hi, can you please translate (localize per your wiki) [[सदस्य:CampWiz Bot/wlf.json|these summaries]] in Marathi for the bot? [[सदस्य:Nokib Sarkar|Nokib Sarkar]] ([[सदस्य चर्चा:Nokib Sarkar|चर्चा]]) १२:५४, २२ फेब्रुवारी २०२४ (IST) :Hi, as per my opinion, most of the part is already translated in Marathi. Translation of the table isn't necessary. @[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] , am I right? - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १५:१९, २२ फेब्रुवारी २०२४ (IST) ::Just to confirm, are you talking about the edit summaries listed in [[सदस्य:CampWiz Bot/wlf.json]]? [[सदस्य:Nokib Sarkar|Nokib Sarkar]] ([[सदस्य चर्चा:Nokib Sarkar|चर्चा]]) १८:१८, २२ फेब्रुवारी २०२४ (IST) :::Yes. I am talking about the same. Which part do you want to translate in Marathi? As per my knowledge the table is a software programming language, about which I have no idea. For more kindly get the help from @[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] or @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]], they may help you. - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०६:३७, २३ फेब्रुवारी २०२४ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[पूनम पांडे]] (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ०२:०५, ३० मार्च २०२४ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[सुहानी भटनागर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १६:३०, २ जून २०२४ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[पूनम पांडे]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २०:३०, २ जून २०२४ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[सुहानी भटनागर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = 91 words) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २३:३०, ८ जून २०२४ (IST) == राजगड तालुका मॅप Add करा == https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/9/94/Velhe_tehsil_in_Pune_district.png [[विशेष:योगदान/2401:4900:550F:B8F7:75A6:5EFE:80ED:A4BA|2401:4900:550F:B8F7:75A6:5EFE:80ED:A4BA]] ०९:५१, १७ ऑगस्ट २०२४ (IST) :{{झाले}} - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५४, १७ ऑगस्ट २०२४ (IST) == अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा. == अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा. [[विशेष:योगदान/2401:4900:5195:ABC6:CC09:F959:C113:F5B9|2401:4900:5195:ABC6:CC09:F959:C113:F5B9]] १४:१९, ३१ ऑगस्ट २०२४ (IST) :प्रिय अनामिक सदस्य, प्रथम आपण सनोंद प्रवेश करून येथे चर्चा करावी. आपला ip अंकपत्ता नियमित बदलतो, तसेच सनोंद प्रवेश नसल्यास तुमच्याशी चर्चा करता येत नाही. सबब येथे सनोंद प्रवेश करून चर्चा करावी. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १३:२८, ७ सप्टेंबर २०२४ (IST) == अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा. == [[अनंतराव थोपटे]] [[विशेष:योगदान/2401:4900:36C4:605A:DD7E:3A78:DE79:8176|2401:4900:36C4:605A:DD7E:3A78:DE79:8176]] १३:१६, ७ सप्टेंबर २०२४ (IST) :प्रिय अनामिक सदस्य, प्रथम आपण सनोंद प्रवेश करून येथे चर्चा करावी. आपला ip अंकपत्ता नियमित बदलतो, तसेच सनोंद प्रवेश नसल्यास तुमच्याशी चर्चा करता येत नाही. सबब येथे सनोंद प्रवेश करून चर्चा करावी. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १३:२८, ७ सप्टेंबर २०२४ (IST) == विनाकारण माहिती आणि संदर्भ खोडल्याबद्दल == हुंडा या लेखात मी काही माहिती जोडली होती. ती माहिती खोडण्याचे काहीही सबब किंवा कारण दिलेले नाही. माहिती चुकीची होती का? याचा खुलासा आपण करावा [[सदस्य:Ranjeetrao.Deshmukh|Ranjeetrao.Deshmukh]] ([[सदस्य चर्चा:Ranjeetrao.Deshmukh|चर्चा]]) २०:५२, १३ सप्टेंबर २०२४ (IST) :# नमस्कार, काहीतरी कारण असेल म्हणून माहिती उडवली असेल ना, मग तिथे विनाकारण हा शब्द योग्य आहे का? असो, विषय बदलायला नको. :#आपण अनेक लेखात बशीर मोमीन कवठेकर यांची माहिती जोडली आहे. मुळात बशीर मोमीन कवठेकर या एकाच लेखात ती माहिती जोडणे अपेक्षित आहे. वेडात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट बशीर मोमीन कवठेकर यांच्या कादंबरीवर आधारित आहे सबब, तिथे माहिती जोडणे ठिक आहे. परंतु आपण [[हुंडा]] आणि [[भारतातील हुंडा प्रथा]] या दोन लेखात समान मजकूर जोडलात, हे अयोग्य आहे. हुंडा हा शब्द जिथे जिथे आला तिथे लगेच एकसमान माहिती जोडणे हे अपेक्षित नाही. :#आपण [[भारतातील हुंडा प्रथा]], [[हुंडा]], [[मराठी रंगभूमी]], [[आणीबाणी (भारत)]], [[वेडात मराठे वीर दौडले सात (चित्रपट)]], [[नाटक]], [[बशीर मोमीन (कवठेकर)]], [[इ.स. २०२१]] तसेच [[इ.स. १९४७]] या लेखात बशीर मोमीन कवठेकर यांची माहिती जोडली आहे. या पैकी [[वेडात मराठे वीर दौडले सात (चित्रपट)]], [[बशीर मोमीन (कवठेकर)]], [[इ.स. २०२१]] तसेच [[इ.स. १९४७]] या लेखात बशीर मोमीन कवठेकर यांची माहिती जोडणे हे योग्य आहे. परंतु बशीर मोमीन कवठेकर यांनी केलेले विविध कार्य प्रत्येक वेगवेगळ्या लेखात जोडण्या ऐवजी बशीर मोमीन कवठेकर या एकाच जोडणे अपेक्षित आहे. तरीही मी केवळ हुंडा आणि भारतातील हुंडा प्रथा या दोन लेखातील माहिती तितकी उडवली आहे. कृपया कवठेकर यांची योग्य ती विश्वकोशीय माहिती आपण त्यांच्या नावातील लेखात जोडताल असे अपेक्षित आहे. :[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:५०, १३ सप्टेंबर २०२४ (IST) ::नमस्कार, ::आधी माहिती खोडताना त्याचे कारण दिले नव्हते म्हणूनच विनाकारण म्हटले. एखाद्याला व्याकरण आवडणार नाही, एखाद्याला भाषातले शब्द प्रयोग आवडणार नाहीत ..असं बरच काही असू शकते. त्यामुळे, विशेषता, दुसऱ्याची माहिती जेव्हा आपण खोडतो तेव्हा थोडेसे स्पष्टीकरण देणे उचितच ठरेल. ::वाचक जेव्हा विकिपीडियावर कोणताही विषय वाचतो तर तेव्हा एकसंध आणि परिपूर्ण माहिती तेथे उपलब्ध असेल तर ते वाचकास निश्चितच फायद्याचे ठरते. त्यामुळे असे माहिती किंवा संदर्भ जोडणे यात गैर काही नाही. [[सदस्य:Ranjeetrao.Deshmukh|Ranjeetrao.Deshmukh]] ([[सदस्य चर्चा:Ranjeetrao.Deshmukh|चर्चा]]) २१:१५, १७ सप्टेंबर २०२४ (IST) == अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा. == [[अनंतराव थोपटे]] [[सदस्य:राहुलया|राहुलया]] ([[सदस्य चर्चा:राहुलया|चर्चा]]) १४:२३, १४ सप्टेंबर २०२४ (IST) [[अनंतराव थोपटे]] [[सदस्य:राहुलया|राहुलया]] ([[सदस्य चर्चा:राहुलया|चर्चा]]) १४:२७, १४ सप्टेंबर २०२४ (IST) :@[[सदस्य:राहुलया|राहुलया]], नमस्कार, अनंतराव थोपटे या लेखात माहिती चौकट जोडली आहे. आपण ती व्यवस्थित भरावी. काही शंका निर्माण झाल्या तर त्या येथे विचाराव्यात. कोणतीही घाई करू नये. तसेच सदरील लेख हा भाषण किंवा व्यक्ती चरित्र लिहल्या सारखा झाला आहे. जमल्यास [[विलासराव देशमुख]] या लेखाचा अभ्यास करून त्या प्रमाणे अनंतराव थोपटे हा लेख लिहावा. भाषा शैली विश्वकोशीय असावी, ललित लिखाण किंवा भाषणा प्रमाणे नसावी. योग्य ते संदर्भ जोडावेत. विशेषणे तसेच स्तुतीसुमने टाळावीत. आणि हो चुका होऊ द्या आपण त्या हळू हळू दुरुस्त करूया.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:१०, १४ सप्टेंबर २०२४ (IST) == अनंतराव थोपटे image upload करणे == <nowiki>https://atcbhor.com/img/founder.jpg</nowiki> [[विशेष:योगदान/2401:4900:5030:448E:4CF9:B046:7915:EB80|2401:4900:5030:448E:4CF9:B046:7915:EB80]] १६:१०, १५ सप्टेंबर २०२४ (IST) == अनंतराव थोपटे विकिपीडियावर image upload करणे == <nowiki>https:[[//atcbhor.com/img/founder.jpg</nowiki>]] [[सदस्य:राहुलया|राहुलया]] ([[सदस्य चर्चा:राहुलया|चर्चा]]) १६:२६, १५ सप्टेंबर २०२४ (IST) :@[[सदस्य:राहुलया|राहुलया]], आपण सनोंद (म्हणजे लाँग इन) करून येथे संपादने करावीत. अन्यथा ना लेख व्यवस्थित होईल ना तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. यापुढे दक्षता घेणे. आणि हो अकारण चुकीची संपादने चालूच ठेवल्यास कोणताही प्रचालक सदरील लेख कायम उडवेल, सबब सूचनांकडे दुर्लक्ष करू नये. याच बरोबर कोणत्याही संकेतस्थळावरील चित्र येथे जोडता येत नाही. यासाठी विकिमिडियावर ते उपलब्ध असावे लागते, आणि तेही स्वतः काढलेले प्रताधिकार मुक्त (म्हणजे कॉपी राईट फ्री) असावे लागते.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:२६, १५ सप्टेंबर २०२४ (IST) == Join the Wikipedia Asian Month Campaign 2024 == <div lang="en" dir="ltr"> Dear 2022 & 2023 WAM Organizers, Greetings from Wikipedia Asian Month User Group! The [[m:Wikipedia_Asian_Month_2024|Wikipedia Asian Month Campaign 2024]] is just around the corner. We invite you to register your language for the event on the "[[m:Wikipedia_Asian_Month_2024/Join_an_Event|Join an event]]" page and once again become an organizer for your language's Wikipedia. Additionally, this year we have selected [[m:Wikipedia_Asian_Month_User_Group/Ambassadors|ambassadors]] for various regions in Asia. If you encounter any issues and need support, feel free to reach out to the ambassador responsible for your area or contact me for further communication. We look forward to seeing you again this year. Thank you! [[File:Wikipedia Asian Month Logo.svg|thumb|100px|right]] [[m:User:Betty2407|Betty2407]] ([[m:User talk:Betty2407|talk]]) 11:00, 20 October 2024 (UTC) on behalf of [[m:Wikipedia_Asian_Month_2024/Team|Wikipedia Asian Month 2024 Team]] <small>You received this message because you was an organizer in the previous campaigns. - [[m:User:Betty2407/WAMMassMessagelist|Unsubscribe]]</small> </div> <!-- सदस्य:Betty2407@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Betty2407/WAMMassMessagelist&oldid=27632678 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == Invitation to Participate in the Wikimedia SAARC Conference Community Engagement Survey == Dear Community Members, I hope this message finds you well. Please excuse the use of English; we encourage translations into your local languages to ensure inclusivity. We are conducting a Community Engagement Survey to assess the sentiments, needs, and interests of South Asian Wikimedia communities in organizing the inaugural Wikimedia SAARC Regional Conference, proposed to be held in Kathmandu, Nepal. This initiative aims to bring together participants from eight nations to collaborate towards shared goals. Your insights will play a vital role in shaping the event's focus, identifying priorities, and guiding the strategic planning for this landmark conference. Survey Link: https://forms.gle/en8qSuCvaSxQVD7K6 We kindly request you to dedicate a few moments to complete the survey. Your feedback will significantly contribute to ensuring this conference addresses the community's needs and aspirations. Deadline to Submit the Survey: 20 January 2025 Your participation is crucial in shaping the future of the Wikimedia SAARC community and fostering regional collaboration. Thank you for your time and valuable input. Warm regards,<br> [[:m:User:Biplab Anand|Biplab Anand]] <!-- सदस्य:Biplab Anand@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Biplab_Anand/lists&oldid=28078122 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == Thank you for being a medical contributors! == <div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr"> {| style="background-color: #fdffe7; border: 1px solid #fceb92;" |rowspan="2" style="vertical-align: middle; padding: 5px;" | [[File:Wiki Project Med Foundation logo.svg|130px]] |style="font-size: x-large; padding: 3px 3px 0 3px; height: 1.5em;" |'''The 2024 Cure Award''' |- | style="vertical-align: middle; padding: 3px;" |In 2024 you '''[[mdwiki:WikiProjectMed:WikiProject_Medicine/Stats/Top_medical_editors_2024_(all)|were one of the top medical editors in your language]]'''. Thank you from [[m:WikiProject_Med|Wiki Project Med]] for helping bring free, complete, accurate, up-to-date health information to the public. We really appreciate you and the vital work you do! Wiki Project Med Foundation is a [[meta:Wikimedia_thematic_organizations|thematic organization]] whose mission is to improve our health content. '''[[meta:Wiki_Project_Med#People_interested|Consider joining for 2025]]''', there are no associated costs. Additionally one of our primary efforts revolves around translating health content. We invite you to '''[https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/index.php try our new workflow]''' if you have not already. Our dashboard automatically [https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/leaderboard.php collects statistics] of your efforts and we are working on [https://mdwiki.toolforge.org/fixwikirefs.php tools to automatically improve formating]. |} Thanks again :-) -- [[mdwiki:User:Doc_James|<span style="color:#0000f1">'''Doc James'''</span>]] along with the rest of the team at '''[[m:WikiProject_Med|Wiki Project Med Foundation]]''' ११:५४, २६ जानेवारी २०२५ (IST) </div> <!-- सदस्य:Doc James@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Top_Other_Language_Editors_2024&oldid=28172893 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == मार्गदर्शन हवे == ०१) मजकूर लिहून तो publish करत असताना, मराठी अनिवार्यता असा संदेश येत आहे. तो का? ते कळत नाहीये. कारण मजकूर मराठीमध्येच लिहीत आहे. तसा संदेश आल्यावर काय करावे? ०२) एखादा ब्लॉग official असेल तरीही त्याचा संदर्भ दिलेला चालत नाही का? (तेव्हाही 'मराठी अनिवार्यता' असा संदेश येत आहे. आणि मग dismiss करावे लागत आहे.) तुमच्या admin ला कळवा असे त्यात नमूद केले आहे. ते कोणाला व कसे कळवायचे हे कळत नाहीये. कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती. धन्यवाद! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १५:२५, ६ फेब्रुवारी २०२५ (IST) :सदरील अडचण [[ज्युडिथ टायबर्ग]] साठीची आहे का? मजकूर जोडताना त्यात संदर्भ नीट जोडला होता का? कदाचित त्यात काही गल्लत झाली असेल. मराठी विकिवर ब्लॉग आणि यूट्यूब वरील विशिष्ट लिंक पोस्ट होत नाहीत. जर ब्लॉग जोडायचा असेल तर माहिती चौकट किंवा बाह्य दुवे मध्ये जोडला जाऊ शकतो, इतरत्र नाही.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:००, ६ फेब्रुवारी २०२५ (IST) ::ता.क. तुम्ही संपादन करत असताना जुडिथ, थिओसिफिकल तसेच असे काही शब्द संपादन गाळणीने नेपाळी किंवा इतर भाषिक म्हणून ओळखल्या. याच सोबत वर्डप्रेसचा दुवा स्व प्रकाशित ब्लॉग म्हणून ओळखला. यावर उपाय म्हणजे इंग्रजी शब्द मराठी अक्षरात लिहिताना थोडे बहुत बदल करून लिहिणे. तसेच वर्डप्रेस किंवा इतर तत्सम दुवे जोडणे टाळावेत. - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:१०, ६ फेब्रुवारी २०२५ (IST) ::०१) हो, त्याच लेखाबाबत ही अडचण येत आहे. संदर्भ म्हणून ब्लॉग जोडायचा असेल तर कसे करावे? ::०२) <u>काही शब्द संपादन गाळणीने नेपाळी किंवा इतर भाषिक म्हणून ओळखल्या.</u> - मी काम तसेच पुढे चालू ठेवू ना? काही अडचण नाही ना? ::०३) <u>तसेच वर्डप्रेस किंवा इतर तत्सम दुवे जोडणे टाळावेत....</u> ते संदर्भ वगळता येण्यासारखे नाहीयेत. कारण त्यावरच अधिक authentic data उपलब्ध आहे. काय करावे? ::धन्यवाद! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २०:५८, ६ फेब्रुवारी २०२५ (IST) :::इतर भाषिक शब्द म्हणून जरी सूचना आली तरीही आपण काम चालू ठेवावे. काही हरकत नाही. वर्डप्रेस, समाज माध्यमे (सोशल मीडिया) आणि इतर सर्व अनुदिनी (ब्लॉग) संदर्भ म्हणून अजिबात जोडू नका. संदर्भ लगेच नाही मिळाला तरी चालेल.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:१५, ६ फेब्रुवारी २०२५ (IST) ::::ठीक. धन्यवाद!! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १०:३९, ७ फेब्रुवारी २०२५ (IST) == Khadaan (Marathi translation) == @[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]], I was editing the Marathi version of the article Khadaan [https://mr.wikipedia.org/wiki/Special:ContentTranslation?title=Special:ContentTranslation&campaign=contributions-page&from=en&to=mr&page=Khadaan&targettitle=%E0%A4%96%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8&revision=1275487694 <nowiki>[1]</nowiki>]. I shall be greatly obliged if you see the technical faults here and publish it. Thank you [[सदस्य:Chachajaan|Chachajaan]] ([[सदस्य चर्चा:Chachajaan|चर्चा]]) १९:०५, १३ फेब्रुवारी २०२५ (IST) == टूल == कॉपी आहे कि नाही चेक करण्यासाठी Tool असेल तर लिंक द्या सर [[सदस्य:AShiv1212|AShiv1212]] ([[सदस्य चर्चा:AShiv1212|चर्चा]]) १७:१४, ४ मार्च २०२५ (IST) :https://copyvios.toolforge.org/?lang=mr :फक्त एवढी काळजी घेणे की विकिपीडियावरून इतरत्र देखील मजकूर कॉपी पेस्ट केलेला असू शकतो. त्यामुळे इतर संकेतस्थळावरून विपी वर आलाय का विपी वरून इतरत्र गेलाय, याचा निर्णय विचार करून घ्यावा.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:५३, ४ मार्च २०२५ (IST) == नारी शक्ती पुरस्कार विजेते == नमस्कार, तुम्ही नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांवरील लेख तयार करीत असलेले पाहून आनंद झाला. या प्रत्येक विजेत्या आपल्या समाजासाठी उदाहरण आहेत. त्यांच्यावर लेखांद्वारे प्रकाशझोत घातल्याबद्दल धन्यवाद. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ००:०१, १५ मार्च २०२५ (IST) :धन्यवाद सर.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०६:५५, १५ मार्च २०२५ (IST) == Files without a license == Hi! It seems that you are the only one that is deleting files without a license. You may have told me earlier but what is the reason that you (or someone else) does not delete all of the files in one massdelete? If it is because of the flooding of recent changes then [[:m:Meta:Flood flag]] could be a solution. Or is the reason that you are doing some checks of the files before you delete them? [[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १७:१५, १६ मार्च २०२५ (IST) :Hi, my english is not so fair. So kindly ignore my mistakes. :# I have no bot as well don't know how to use it. :# there may be flooding of in recent changes. :# And yes I check properly every file before deleting it. ::That's why it takes more time. :[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:५४, १६ मार्च २०२५ (IST) :: Thank you! Your English is good enough for me. I'm not a native English speaker either :-) And even if I was I would not care about any errors. :: You do not need a bot to delete files faster. You can use a script (see tip at [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]]). But you would still flood recent changes unless you get flood flags implemented here. :: Checking files manually takes a lot of time. Too bad the other admins does not help you. Have you found any errors so far? If there are any known types of errors I might be able to have my bot remove the deletion template from similar files. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ००:१२, १७ मार्च २०२५ (IST) :::@[[सदस्य:MGA73|MGA73]] thanks for your valuable suggestion. Still now there are two problems. :::# it's flooding in recent changes. :::# as an admin, I am checking each and every file before deleting. ::::So, still it will take some time from my side. Once again thanks for your support.- :::[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १४:०३, १७ मार्च २०२५ (IST) ::::As long as more files are fixed/deleted than new files are uploaded it is good :-) I will try to move more files to Commons ([[:Category:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons ]] / [[:Category:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]]). --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १५:१५, १७ मार्च २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[शकुंतला मजुमदार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १४:३४, २६ मार्च २०२५ (IST) == विकीडाटा कलम दुरुस्ती == कृपया, खालील पानांची विकीडाटा कलमे दुरुस्त करावीत. # [[:वर्ग:गुजरात विधानसभा]] # [[:वर्ग:महाराष्ट्र विधानसभा]] # [[:वर्ग:महाराष्ट्र विधानसभा निवडणुका]] # [[:वर्ग:दिल्ली विधानसभा निवडणुका]] # [[:वर्ग:बिहार विधानसभा निवडणुका]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:१७, २६ एप्रिल २०२५ (IST) :{{Done}} --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १३:२४, २६ एप्रिल २०२५ (IST) ::# [[:वर्ग:२००२ राष्ट्रकुल खेळ]] ::# [[:वर्ग:२०१० राष्ट्रकुल खेळ]] ::# [[:वर्ग:उल्हासनगर]] ::# [[:वर्ग:कंदहार]] ::# [[:वर्ग:बीजिंग]] ::# [[:वर्ग:क्वांगचौ]] ::# [[:वर्ग:मस्कत]] ::# [[:वर्ग:जेरुसलेम]] ::# [[:वर्ग:आइसलँडमधील शहरे]] ::# [[:वर्ग:इराणमधील शहरे]] ::# [[:वर्ग:झांबियामधील शहरे]] ::# [[:वर्ग:सीरियामधील शहरे]] ::[[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १०:००, २ मे २०२५ (IST) :::{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ११:४१, ३ मे २०२५ (IST) ::::फक्त [[:वर्ग:आइसलँडमधील शहरे]] साठी अचूक वर्ग सापडला नाही. कदाचित [[:en:category:Municipalities of Iceland|Municipalities of Iceland]] असावा. @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] नक्की सांगाल का. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ११:४६, ३ मे २०२५ (IST) ::::: [[:वर्ग:आइसलँडमधील शहरे]] मी दुरुस्त केले आहे, फक्त [[:वर्ग:इराणमधील शहरे]] चुकीच्या पानाशी जोडले आहे. [[:en:category:Cities in Iran]] हे योग्य पान आहे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:१०, ३ मे २०२५ (IST) {{साद|संतोष गोरे}} # [[:वर्ग:सुदानमधील शहरे]] # [[:वर्ग:कोसोव्होमधील शहरे]] # [[:वर्ग:कँडी]] # [[:वर्ग:मेरठ]] # [[:वर्ग:हंपी]] # [[:वर्ग:आग्रा]] # [[:वर्ग:जोरहाट]] # [[:वर्ग:बंगळूर]] # [[:वर्ग:जाफना]] # [[:वर्ग:गुवाहाटी]] # [[:वर्ग:प्रयागराज]] # [[:वर्ग:विजयवाडा]] # [[:वर्ग:बेळगांव]] # [[:वर्ग:गुलबर्गा]] # [[:वर्ग:अलीगढ]] # [[:वर्ग:फैजाबाद]] # [[:वर्ग:तुलूझ]] # [[:वर्ग:नीस]] # [[:वर्ग:बोर्दू]] # [[:वर्ग:लेंस]] # [[:वर्ग:कराची]] # [[:वर्ग:नेपियर]] # [[:वर्ग:वेलिंग्टन]] # [[:वर्ग:विशाखापट्टणम]] # [[:वर्ग:मोरोक्कोमधील शहरे]] # [[:वर्ग:पनामामधील शहरे]] # [[:वर्ग:गोवा राज्यातील शहरे व गावे]] # [[:वर्ग:अरुणाचल प्रदेशमधील शहरे]] # [[शहाड]] # [[टिटवाळा]] # [[आसनगाव बुद्रुक]] # [[आसनगाव (डहाणू)]] # [[पळसदरी]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:०६, ४ मे २०२५ (IST) :{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:०९, ११ मे २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[शकुंतला मजुमदार]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सुकरी बोम्मागौडा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ०६:३१, २९ एप्रिल २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[सुकरी बोम्मागौडा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[बीना शेठ लष्करी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[वर्तिका नंदा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सीमा साखरे]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[नसीरा अख्तर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सुमिता घोष]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अनुराधा नाईक]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अमृता पाटील]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १३:३०, २९ एप्रिल २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[लॉरेन पॉवेल जॉब्स]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[ए. सीमा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[कलावती देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[दर्शना गुप्ता]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सोनिया जब्बार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सुनीता देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[मिझो हमेईछे इन्सुइहखावम पॉल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अंबिका बेरी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ११:३०, ३० एप्रिल २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[मिनी वासुदेवन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[दिदी कॉन्ट्रॅक्टर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[मुमताज काझी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[नंदिता शाह]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[सुभा वारियर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[मोनिका]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[निकिता ठुकराल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[स्नेहलता नाथ]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[बीना देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[चामी मुर्मू]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[लतिका ठुकराल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[प्रियंवदा सिंग]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[पुष्पा गिरिमाजी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[निल्झा वांगमो]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[कमल कुंभार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[मीरा ठाकूर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[मधु जैन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[सीमा मेहता]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[बानो हरालू]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[दीपिका कुंडजी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[वनस्त्री]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[लक्ष्मी गौतम]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[सुपर्णा बक्षी गांगुली]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[नंदिता कृष्णा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[रेवण्णा उमादेवी नागराज]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[स्मिता तंडी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[मालविका अय्यर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[साईलक्ष्मी बालीजेपल्ली]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली) * [[स्वराज विद्वान]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अनोयारा खातून]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[पी. कौसल्या]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[नेहा किरपाल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १६:३०, ३० एप्रिल २०२५ (IST) :@[[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]] नमस्कार, [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५ |स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५]] प्रकल्पात मी जे लेख लिहिलेत ते [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५#नियम|नियमांना]] अनुसरून आहेत असे मला वाटते. कृपया पहिला नियम पाहावा, त्यानुसार 'लेख विस्तारित किंवा नवीन लेखात किमान ३,००० बाइट्स किंवा ३०० शब्द असणे आवश्यक आहे.' यानुसार माझे सर्व लेख आहेत. परंतु आपण काही लेख रिजेक्ट केले आहेत अशी सूचना दिसून येत आहे. खुलासा कराल का..? - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:०१, ३० एप्रिल २०२५ (IST) ::नमस्कार, मी वापरत असलेल्या [https://tools.wikilovesfolklore.org/campwiz/campaign/110 या] टूलमध्ये लेखात नव्याने जोडलेली शब्दसंख्या ३०० पेक्षा कमी दाखवत आहे (नवीन लेखात किमान ३,००० बाइट्स किंवा ३०० शब्द). या कारणाने काही लेख नामंजूर केले आहेत, तथापि हा निकाल अंतिम समजू नये. टूल मधील त्रुटी शोधून लेखांना पुन्हा तपासले जाईल. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १८:२७, ३० एप्रिल २०२५ (IST) सादर केलेल्या काही लेखांची एकूण शब्दसंख्या (संदर्भातील शब्द वगळून) 300 पेक्षा कमी आढळून येत आहे. आणि असे लेख नामंजूर करण्यात आले आहेत. तथापि, माझ्याकडून मोबाईलवर संपादन करताना काही लेखांवर "300 पेक्षा कमी शब्द असल्याची टीप" टाकली गेली, प्रत्यक्षात ते 300 पेक्षा जास्त शब्दांचे व '''मंजूरही''' झालेले लेख आहेत. अनावश्यक ठिकाणी असलेली ती टीप काढून टाकली जाईल. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> २१:११, ३० एप्रिल २०२५ (IST) :'नवीन लेखात किमान ३,००० बाइट्स किंवा ३०० शब्द असणे आवश्यक आहे.' या नियमानुसार शब्द संख्या जरी ३०० भरली नाही तरी बाईट्स च्या नियमात सर्व लेख बसतात असे मला वाटते.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:५२, ३० एप्रिल २०२५ (IST) ::ठीक. मी लवकरच सर्व लेखांची पुनर्तपासनी करेन. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> ११:०७, ३ मे २०२५ (IST) :::@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]] Don't worry where the स्थिती = approved and note = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली. That is a system bug I feel because I am also facing the same. I will ask developer to fix it soon. [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १९:०९, ३ मे २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[सौरभ सुमन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = लेखाची शब्दसंख्या २६८ आहे) * [[बसंती देवी (पर्यावरणतज्ज्ञ)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[उत्तरा पडवार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[मीना शर्मा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[वासु प्रिमलानी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[कृष्णा यादव]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[छांव फाउंडेशन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[साधना महिला संघ]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २१:३०, ३० एप्रिल २०२५ (IST) == तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले == शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले: * [[बीना शेठ लष्करी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[वर्तिका नंदा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सीमा साखरे]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[नसीरा अख्तर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सुमिता घोष]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अनुराधा नाईक]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अमृता पाटील]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[लॉरेन पॉवेल जॉब्स]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[ए. सीमा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[कलावती देवी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[दर्शना गुप्ता]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सोनिया जब्बार]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[सुनीता देवी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[मिझो हमेईछे इन्सुइहखावम पॉल]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[अंबिका बेरी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ) * [[मिनी वासुदेवन]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[दिदी कॉन्ट्रॅक्टर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[मुमताज काझी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[नंदिता शाह]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[सुभा वारियर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[मोनिका]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[निकिता ठुकराल]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[स्नेहलता नाथ]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) * [[बीना देवी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.) कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १९:३०, ३ मे २०२५ (IST) == [[:वर्ग:Files uploaded by Archanapote]] == I see that you use the script to mass delete. That makes things easier :-) One of the users with many uploads is [[User:Archanapote]]. I have asked user to add a license because user was active. But I asked in English. If Archanapote confirm to be the photographer and confirm a license I can fix the files with my bot. Same if any other users are active. If you ask any users in local language and get a reply just let me know. [[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १९:४२, ८ मे २०२५ (IST) :{{झाले}}- sent her a message. Let's see what happens.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:५६, ८ मे २०२५ (IST) And now that you use "Files uploaded by ..." to delete files I have started removing those categories from all files with a license template. That should make it easier. I can also add a non-free template to logos. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:४५, १० मे २०२५ (IST) Removed... * Except [[:वर्ग:Files uploaded by Rahuldeshmukh101]] that seems to be active. So Rahuldeshmukh101 should be able to add a license. * Except [[:वर्ग:Files uploaded by Archanapote - cc]] that are all licensed Creative Commons but Archanapote could perhaps check the files. Perhaps you can leave a note to Rahuldeshmukh101 and skip those categories for now. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २१:०३, १० मे २०२५ (IST) :Thanks for your help. I need ''category:Files uploaded by...'' so that I can check and delete those files using the script to mass delete. And yes, it will be better if you make 50 to 100 files in each category.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:२२, १० मे २०२५ (IST) :: Okay. I will add a license to a number of logos first and then I can split up the files in smaller categories. Perhaps you can start with [[:वर्ग:Files uploaded by Kaustubh]]. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २१:३३, १० मे २०२५ (IST) Hi! Do you mean like with [[:वर्ग:Files uploaded by Bantee]] where I put files in smaller sub categories? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ००:१८, १४ मे २०२५ (IST) :Thanks, it will save my time and speed up the deletion.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:०८, १४ मे २०२५ (IST) ::Okay I will make more categories like this soon. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १२:१७, १४ मे २०२५ (IST) The files I nominated for deletion are in [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]] and I have only marked files that was unused when I marked them. The Files in "Files uploaded by..." also included files with a license but I removed them from the categories as written above. But I came to think that some files in "Files uploaded by..." may be in use. So my question is if you would like only to delete unused files or if you delete all unlicensed files? Since uploaders had months and years to add a license I doubt they will add one so the files should in my opinion be deleted even if in use. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १७:३०, १६ मे २०२५ (IST) :At presentI am deleting unused files, that's why I am spending more time to check every nominated file. I have no idea what to do with unlicensed used files. We will discuss it later after the deletion of unlicensed unused files. - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १९:५३, १६ मे २०२५ (IST) :: In that case I will move all the unused files in subcategories of "Files uploaded by..." and leave the files in use in the top category. Then it will be easier for you to see which files are in use. :: Unlicensed files is a violation of [[:wmf:Resolution:Licensing_policy]] so they should be deleted too even if they are in use. So they have to be deleted at some point too. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:०६, १६ मे २०२५ (IST) Perhaps you could have a look at the files in [[:वर्ग:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]]? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १८:४६, २२ मे २०२५ (IST) :Those files are may be moved on commons. What to do? Do we have to delete them from mrwiki..? [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:४३, २२ मे २०२५ (IST) :Just finished deleting category :Files uploaded by Maihudon. I think that this category includes files use on are.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:४४, २२ मे २०२५ (IST) ::It is much easier to clean up if we delete files locally that are also on Commons. About the files in use they should be in the top category and the unused in the sub categories. The category you mention is empty? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २२:५९, २२ मे २०२५ (IST) :::Emptied [[:वर्ग:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]] - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:०९, २४ मे २०२५ (IST) ::::Even [[:वर्ग:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons]] too cleared.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:२४, २४ मे २०२५ (IST) :::::Great! I added some more photos to the two categories. And I noticed that some photos were uploaded by Archanapote here and a few days later by Cherishsantosh. I do not know if it is the same user or what happend. I left a message at [[सदस्य_चर्चा:Archanapote#License,_source_and_author_on_your_uploads]]. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:५२, २४ मे २०२५ (IST) ::::::I marked the rest of the files to day and replaced the usage. So [[:वर्ग:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons]] should be ready to empty one last time. After that I will wait for the deletion of the files allready marked for deletion. When they are done we can figure out what to check next. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २३:२८, २५ मे २०२५ (IST) == 1,000 == I noticed we are getting closed to 1,000 in [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]]. Next time you delete the number should get below that number! I hope you have a beer ready or maybe Solkadhi? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १६:१९, ३० मे २०२५ (IST) == Feminism and Folklore 2025 - Local prize winners == [[File:Feminism and Folklore 2025 logo.svg|centre|550px|frameless]] ::<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr"> ''{{int:please-translate}}'' Dear Wikimedian, Congratulations on your outstanding achievement in winning a local prize in the '''Feminism and Folklore 2025''' writing competition! We truly appreciate your dedication and the valuable contribution you’ve made in documenting local folk culture and highlighting women’s representation on your local Wikipedia. To claim your prize, please complete the [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdONlpmv1iTrvXnXbHPlfFzUcuF71obJKtPGkycgjGObQ4ShA/viewform?usp=dialog prize form] by July 5th, 2025. Kindly note that after this date, the form will be closed and submissions will no longer be accepted. Please also note that all prizes will be awarded in the form of [https://www.tremendous.com/ Tremendous Vouchers] only. If you have any questions or need assistance, feel free to contact us via your talk page or email. We're happy to help. Warm regards, [[:m:Feminism and Folklore 2025|FNF 2025 International Team]] ::::Stay connected [[File:B&W Facebook icon.png|link=https://www.facebook.com/feminismandfolklore/|30x30px]]&nbsp; [[File:B&W Twitter icon.png|link=https://twitter.com/wikifolklore|30x30px]] </div> --[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १५:५०, २१ जून २०२५ (IST) <!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf25&oldid=28891702 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> ha3wqkgl8wpppqj4e46ete9cqdcux7e अंबुर्डी बुद्रुक 0 288816 2581301 2483260 2025-06-20T13:01:02Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[अंबुर्डीबुद्रुक]] वरुन [[अंबुर्डी बुद्रुक]] ला हलविला 2483260 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''अंबुर्डीबुद्रुक''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर= कळवण | जिल्हा = [[नाशिक जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} '''अंबुर्डीबुद्रुक''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यातील]] [[कळवण तालुका|कळवण तालुक्यातील]] एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० [[सेल्सियस]]पर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मिमी पर्यंत असते. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ #https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics #https://www.weather-atlas.com/en/india-climate [[वर्ग:कळवण तालुक्यातील गावे]] [[वर्ग:नाशिक जिल्ह्यातील गावे]] jq8jiy3eg9jus8kljt0tblz42wwnoqn अंबुर्डी खुर्द 0 288834 2581299 2483215 2025-06-20T13:00:49Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[अंबुर्डीखुर्द]] वरुन [[अंबुर्डी खुर्द]] ला हलविला 2483215 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''अंबुर्डीखुर्द''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर= कळवण | जिल्हा = [[नाशिक जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} '''अंबुर्डीखुर्द''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यातील]] [[कळवण तालुका|कळवण तालुक्यातील]] एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० [[सेल्सियस]]पर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मिमी पर्यंत असते. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ #https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics #https://www.weather-atlas.com/en/india-climate [[वर्ग:कळवण तालुक्यातील गावे]] [[वर्ग:नाशिक जिल्ह्यातील गावे]] mchg48zzsnp8jguwrl8b4ul9i2rdmf9 झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२१ 0 292458 2581322 2481355 2025-06-20T14:45:56Z Khirid Harshad 138639 2581322 wikitext text/x-wiki {{Infobox award | image = ZMA 2021.webp | image_size = | image_upright = | caption = | awarded_for = | presenter = [[झी मराठी]] | country = [[भारत]] | firstawarded = | lastawarded = | reward = | former name = | network = [[झी मराठी]] | holder_label = सूत्रसंचालन | holder = शाल्व किंजवडेकर<br>अन्विता फलटणकर | award1_type = सर्वाधिक विजेते | award1_winner = ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' (१२) | award2_type = सर्वाधिक नामांकने | award2_winner = ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' (३७) | award3_type = विजेती मालिका | award3_winner = ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' | previous = [[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२०-२१|२०२०-२१]] | next = [[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२२|२०२२]] }} '''झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२१''' ({{lang-en|Zee Marathi Utsav Natyancha Awards 2021}}) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०२१ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले आहे. हा सोहळा ३० ऑक्टोबर २०२१ रोजी संपन्न झाला. शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9marathi.com/entertainment/television/zee-marathi-awards-2021-yeu-kashi-tashi-me-nandayla-and-majhi-tuzi-reshimgath-wins-more-awards-570248.html/amp|title=‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!|date=2021-11-02|website=[[टीव्ही९ मराठी]]|access-date=2022-11-02}}</ref> == विजेते व नामांकने == {| class="wikitable" ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट मालिका]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट कुटुंब पुरस्कार|सर्वोत्कृष्ट कुटुंब]] |- | * '''[[माझी तुझी रेशीमगाठ]]''' ** ''[[घेतला वसा टाकू नको]]'' ** ''[[मन झालं बाजिंद]]'' ** ''[[मन उडू उडू झालं]]'' ** ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' ** ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' ** ''[[ती परत आलीये]]'' ** ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' | * '''देशमुख – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]''''' ** विधाते – ''[[मन झालं बाजिंद]]'' ** राऊत – ''[[मन झालं बाजिंद]]'' ** साळगांवकर – ''[[मन उडू उडू झालं]]'' ** देशपांडे – ''[[मन उडू उडू झालं]]'' ** खानविलकर – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' ** साळवी – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' ** चौधरी – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' ** मित्र – ''[[ती परत आलीये]]'' ** नाईक – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट नायक]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट नायिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट नायिका]] |- | * '''[[श्रेयस तळपदे]] – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — यशवर्धन (यश) चौधरी''' ** वैभव चव्हाण – ''[[मन झालं बाजिंद]]'' — रायबान (राया) विधाते ** [[अजिंक्य राऊत]] – ''[[मन उडू उडू झालं]]'' — इंद्रजित (इंद्रा) साळगांवकर ** शाल्व किंजवडेकर – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — ओंकार (ओम) खानविलकर ** [[हार्दिक जोशी]] – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — सिद्धार्थ देशमुख ** साईंकित कामत – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — अभिराम नाईक | * '''[[प्रार्थना बेहेरे]] – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — नेहा कामत''' ** श्वेता खरात – ''[[मन झालं बाजिंद]]'' — कृष्णा विधाते ** [[हृता दुर्गुळे]] – ''[[मन उडू उडू झालं]]'' — दीपिका (दीपू) देशपांडे ** अन्विता फलटणकर – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — अवनी (स्वीटू) परब ** [[अमृता पवार]] – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — अदिती करमरकर ** भाग्या नायर – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — कावेरी नाईक |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट जोडी पुरस्कार|सर्वोत्कृष्ट जोडी]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सून पुरस्कार|सर्वोत्कृष्ट भावी सून]] |- | * '''[[अजिंक्य राऊत]]-[[हृता दुर्गुळे]] – ''[[मन उडू उडू झालं]]'' — इंद्रा-दीपू''' ** वैभव चव्हाण-श्वेता खरात – ''[[मन झालं बाजिंद]]'' — राया-कृष्णा ** शाल्व किंजवडेकर-अन्विता फलटणकर – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — ओम-स्वीटू ** [[श्रेयस तळपदे]]-[[प्रार्थना बेहेरे]] – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — यश-नेहा ** [[हार्दिक जोशी]]-[[अमृता पवार]] – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — सिद्धार्थ-अदिती ** साईंकित कामत-भाग्या नायर – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — अभिराम-कावेरी ** [[माधव अभ्यंकर]]-[[अपूर्वा नेमळेकर]] – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — अण्णा-शेवंता | * '''अन्विता फलटणकर – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — अवनी (स्वीटू) परब''' ** श्वेता खरात – ''[[मन झालं बाजिंद]]'' — कृष्णा विधाते ** [[हृता दुर्गुळे]] – ''[[मन उडू उडू झालं]]'' — दीपिका (दीपू) देशपांडे ** [[प्रार्थना बेहेरे]] – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — नेहा कामत ** [[अमृता पवार]] – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — अदिती करमरकर ** भाग्या नायर – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — कावेरी नाईक |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट खलनायक]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट खलनायिका]] |- | * '''[[माधव अभ्यंकर]] – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — हरी (अण्णा) नाईक''' ** रियाझ मुलानी – ''[[मन झालं बाजिंद]]'' — हृतिक ** [[निखिल राऊत]] – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — मोहित परब ** चैतन्य चंद्रात्रे – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — राजन परांजपे | * '''[[अदिती सारंगधर]] – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — मालविका खानविलकर''' ** कल्याणी चौधरी – ''[[मन झालं बाजिंद]]'' — गुली ** कस्तुरी सारंग – ''[[मन उडू उडू झालं]]'' — स्नेहलता कानविंदे ** शीतल क्षीरसागर – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — सीमा (सिम्मी) चौधरी ** प्रिया कांबळे – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — महालक्ष्मी करमरकर ** [[अपूर्वा नेमळेकर]] – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — कुमुदिनी (शेवंता) पाटणकर |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री]] |- | * '''[[संकर्षण कऱ्हाडे]] – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — समीर''' ** [[तानाजी गळगुंडे]] – ''[[मन झालं बाजिंद]]'' — मनोज (मुंज्या) ** [[अरुण नलावडे]] – ''[[मन उडू उडू झालं]]'' — मनोहर देशपांडे ** [[निखिल राऊत]] – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — मोहित परब ** उदय साळवी – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — वसंत (दादा) साळवी ** [[मोहन जोशी]] – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — जग्गनाथ चौधरी ** अजित केळकर – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — बंडोपंत नाईक ** चारुदत्त कुलकर्णी – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — तात्या देशमुख ** श्रेयस राजे – ''[[ती परत आलीये]]'' — सतेज ** नचिकेत देवस्थळी – ''[[ती परत आलीये]]'' — विक्रांत (विकी) ** [[विजय कदम]] – ''[[ती परत आलीये]]'' — बाबुराव तांडेल ** साईंकित कामत – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — अभिराम नाईक | * '''मानसी मागीकर – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — अरुणा नाईक''' ** बीना सिद्धार्थ – ''[[मन झालं बाजिंद]]'' — आशा राऊत ** कल्याणी चौधरी – ''[[मन झालं बाजिंद]]'' — गुली ** [[रीना अग्रवाल]] – ''[[मन उडू उडू झालं]]'' — सानिका देशपांडे ** दीप्ती केतकर – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — नलिनी (नलू) साळवी ** [[शुभांगी गोखले]] – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — शकुंतला (शकू) खानविलकर ** [[अदिती सारंगधर]] – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — मालविका खानविलकर ** कुंजिका काळविंट – ''[[ती परत आलीये]]'' — सायली ** भाग्या नायर – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — कावेरी नाईक ** [[शकुंतला नरे]] – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — इंदुमती (माई) नाईक |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री]] |- | * '''[[संकर्षण कऱ्हाडे]] – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — समीर''' ** [[तानाजी गळगुंडे]] – ''[[मन झालं बाजिंद]]'' — मनोज (मुंज्या) ** भरत शिंदे – ''[[मन झालं बाजिंद]]'' — सोपान राऊत ** विनम्र बाभळ – ''[[मन उडू उडू झालं]]'' — सत्तू ** [[निखिल राऊत]] – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — मोहित परब ** उमेश बने – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — शरद साळवी ** त्रियुग मंत्री – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — रॉकी ** हेमंत देशपांडे – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — बापू देशमुख ** [[विजय कदम]] – ''[[ती परत आलीये]]'' — बाबुराव तांडेल ** [[प्रल्हाद कुडतरकर]] – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — पांडू | * '''काजल काटे – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — शेफाली''' ** शर्वरी कुलकर्णी – ''[[मन उडू उडू झालं]]'' — शलाका देशपांडे ** पूनम चव्हाण – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — नानी देशमुख ** प्राजक्ता वाड्ये – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — सरिता नाईक |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री]] |- | * '''महेश फाळके – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — सयाजी''' ** भरत शिंदे – ''[[मन झालं बाजिंद]]'' — सोपान राऊत ** रियाझ मुलानी – ''[[मन झालं बाजिंद]]'' — हृतिक ** अरबाज शेख – ''[[मन झालं बाजिंद]]'' — पप्या ** विनम्र बाभळ – ''[[मन उडू उडू झालं]]'' — सत्तू ** राजू बावडेकर – ''[[मन उडू उडू झालं]]'' — सोनटक्के ** त्रियुग मंत्री – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — रॉकी ** अर्णव राजे – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — चिन्मय (चिन्या) साळवी ** उमेश बने – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — शरद साळवी ** आनंद काळे – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — विश्वजीत चौधरी ** दिनेश कानडे – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — घारतोंडे ** धनंजय वाबळे – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — मिलिंद करमरकर ** प्रशांत गारूड – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — अप्पा देशमुख ** हेमंत देशपांडे – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — बापू देशमुख ** निवास मोरे – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — नाना देशमुख ** सलमान तांबोळी – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — बाळा देशमुख ** प्रतीक पाटील – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — सुहास देशमुख ** प्रथमेश शिवलकर – ''[[ती परत आलीये]]'' — टिकाराम चव्हाण ** समीर खांडेकर – ''[[ती परत आलीये]]'' — हनुमंत (हनम्या) ** सुहास शिरसाट – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — दत्ताराम नाईक | * '''अंजली जोशी – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — सुमित्रा (मोठ्याबाई) देशमुख''' ** सानिका काशीकर – ''[[मन झालं बाजिंद]]'' — अंतरा बोराटे ** रुपलक्ष्मी शिंदे – ''[[मन उडू उडू झालं]]'' — मालती देशपांडे ** शर्वरी कुलकर्णी – ''[[मन उडू उडू झालं]]'' — शलाका देशपांडे ** शुभांगी भुजबळ – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — सुमन साळवी ** [[प्रिया मराठे]] – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — मैथिली ** स्वाती देवल – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — मीनाक्षी कामत ** काजल काटे – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — शेफाली ** सुरेखा लहामगे-शर्मा – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — बयोबाई देशमुख ** अपर्णा क्षेमकल्याणी – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — रत्ना देशमुख ** चित्रा कुलकर्णी – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — ताई देशमुख ** पूनम चव्हाण – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — नानी देशमुख ** रेखा कांबळे – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — पल्लवी देशमुख ** कोमल शेटे – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — अर्चना देशमुख ** वैष्णवी करमरकर – ''[[ती परत आलीये]]'' – अनुजा ** तन्वी कुलकर्णी – ''[[ती परत आलीये]]'' – रोहिणी ** प्राजक्ता वाड्ये – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — सरिता नाईक ** पौर्णिमा डे – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — सुषमा पाटणकर |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट वडील पुरस्कार|सर्वोत्कृष्ट वडील]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार|सर्वोत्कृष्ट आई]] |- | * '''[[अरुण नलावडे]] – ''[[मन उडू उडू झालं]]'' — मनोहर देशपांडे''' ** भरत शिंदे – ''[[मन झालं बाजिंद]]'' — सोपान राऊत ** राजेश अहेर – ''[[मन झालं बाजिंद]]'' — भाऊसाहेब विधाते ** उदय साळवी – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — वसंत (दादा) साळवी ** प्रशांत गारूड – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — अप्पा देशमुख ** चारुदत्त कुलकर्णी – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — तात्या देशमुख | * '''[[प्रार्थना बेहेरे]] – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — नेहा कामत''' ** बीना सिद्धार्थ – ''[[मन झालं बाजिंद]]'' — आशा राऊत ** वैशाली राजेघाटगे – ''[[मन झालं बाजिंद]]'' — रंजना विधाते ** रुपलक्ष्मी शिंदे – ''[[मन उडू उडू झालं]]'' — मालती देशपांडे ** [[पौर्णिमा तळवलकर]] – ''[[मन उडू उडू झालं]]'' — जयश्री साळगांवकर ** दीप्ती केतकर – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — नलिनी (नलू) साळवी ** [[शुभांगी गोखले]] – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — शकुंतला (शकू) खानविलकर ** अंजली जोशी – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — सुमित्रा (मोठ्याबाई) देशमुख ** सुरेखा लहामगे-शर्मा – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — बयोबाई देशमुख ** [[शकुंतला नरे]] – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — इंदुमती (माई) नाईक |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सासरे पुरस्कार|सर्वोत्कृष्ट भावी सासरे]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सासू पुरस्कार|सर्वोत्कृष्ट भावी सासू]] |- | * '''उदय साळवी – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — वसंत (दादा) साळवी''' ** भरत शिंदे – ''[[मन झालं बाजिंद]]'' — सोपान राऊत ** राजेश अहेर – ''[[मन झालं बाजिंद]]'' — भाऊसाहेब विधाते ** [[अरुण नलावडे]] – ''[[मन उडू उडू झालं]]'' — मनोहर देशपांडे ** प्रशांत गारूड – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — अप्पा देशमुख | * '''[[शुभांगी गोखले]] – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — शकुंतला (शकू) खानविलकर''' ** बीना सिद्धार्थ – ''[[मन झालं बाजिंद]]'' — आशा राऊत ** वैशाली राजेघाटगे – ''[[मन झालं बाजिंद]]'' — रंजना विधाते ** रुपलक्ष्मी शिंदे – ''[[मन उडू उडू झालं]]'' — मालती देशपांडे ** [[पौर्णिमा तळवलकर]] – ''[[मन उडू उडू झालं]]'' — जयश्री साळगांवकर ** दीप्ती केतकर – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — नलिनी (नलू) साळवी ** अंजली जोशी – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — सुमित्रा (मोठ्याबाई) देशमुख ** [[शकुंतला नरे]] – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — इंदुमती (माई) नाईक |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत पुरस्कार|सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत]] ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार|सर्वोत्कृष्ट बालकलाकार]] |- | * '''[[माझी तुझी रेशीमगाठ]]''' ** ''[[घेतला वसा टाकू नको]]'' ** ''[[मन झालं बाजिंद]]'' ** ''[[मन उडू उडू झालं]]'' ** ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' ** ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' ** ''[[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]]'' ** ''[[ती परत आलीये]]'' | * '''मायरा वायकुळ – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — परी कामत''' ** वेद आंब्रे – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — पुष्कराज (पिकुचू) चौधरी ** सुहानी नाईक – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — आर्या देशमुख ** अर्जुन कुमठेकर – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — धृष्टद्युम्न (दुमन्या) देशमुख |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार|सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक]] |- | * '''''[[चला हवा येऊ द्या]]''''' ** ''[[वेध भविष्याचा]]'' ** ''[[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]'' ** ''[[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]]'' | * '''[[मृण्मयी देशपांडे]] – ''[[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]]''''' ** अतुलशास्त्री भगरे – ''[[वेध भविष्याचा]]'' ** [[आदेश बांदेकर]] – ''[[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]'' ** चारुदत्त आफळे – ''[[घेतला वसा टाकू नको]]'' ** [[निलेश साबळे]] – ''[[चला हवा येऊ द्या]]'' |- ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट आजी पुरस्कार|सर्वोत्कृष्ट आजी]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट आजोबा पुरस्कार|सर्वोत्कृष्ट आजोबा]] |- | * '''सुरेखा लहामगे-शर्मा – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — बयोबाई देशमुख''' ** कल्पना सारंग – ''[[मन झालं बाजिंद]]'' — फुई विधाते ** मानसी मागीकर – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — अरुणा नाईक ** [[शकुंतला नरे]] – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — इंदुमती (माई) नाईक | * '''[[मोहन जोशी]] – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — जग्गनाथ चौधरी''' ** अजित केळकर – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — बंडोपंत नाईक ** चारुदत्त कुलकर्णी – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — तात्या देशमुख |- ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट भावंडं पुरस्कार|सर्वोत्कृष्ट भावंडं]] ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट मैत्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट मैत्री]] |- | * '''अन्विता फलटणकर-अर्णव राजे – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — स्वीटू-चिन्या''' ** वैभव चव्हाण-रियाझ मुलानी – ''[[मन झालं बाजिंद]]'' — राया-हृतिक ** वैशाली राजेघाटगे-कल्याणी चौधरी – ''[[मन झालं बाजिंद]]'' — रंजना-गुली ** [[हृता दुर्गुळे]]-[[रीना अग्रवाल]]-शर्वरी कुलकर्णी – ''[[मन उडू उडू झालं]]'' — दीपिका-सानिका-शलाका ** [[अजिंक्य राऊत]]-ऋतुराज फडके-प्राजक्ता परब – ''[[मन उडू उडू झालं]]'' — इंद्रा-कार्तिक-मुक्ता ** उदय साळवी-उमेश बने – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — वसंत-शरद ** [[अदिती सारंगधर]]-शाल्व किंजवडेकर – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — मालविका-ओम ** आनंद काळे-अतुल महाजन – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — विश्वजीत-सत्यजित ** प्रशांत गारूड-हेमंत देशपांडे-निवास मोरे-सलमान तांबोळी-अपर्णा क्षेमकल्याणी – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — अप्पा-बापू-नाना-बाळा-रत्ना ** [[हार्दिक जोशी]]-प्रतीक पाटील-राधिका झनकर-सुहानी नाईक-अर्जुन कुमठेकर – ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' — सिद्धार्थ-सुहास-नमिता-आर्या-धृष्टदुम्न्य ** साईंकित कामत-सुहास शिरसाट-मंगेश साळवी-नम्रता पावसकर – ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' — अभिराम-दत्ता-माधव-छाया | * '''[[श्रेयस तळपदे]]-[[संकर्षण कऱ्हाडे]] – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — यश-समीर''' ** श्वेता खरात-[[तानाजी गळगुंडे]] – ''[[मन झालं बाजिंद]]'' — कृष्णा-मुंज्या ** वैभव चव्हाण-अरबाज शेख – ''[[मन झालं बाजिंद]]'' — राया-पप्या ** [[अजिंक्य राऊत]]-विनम्र बाभळ – ''[[मन उडू उडू झालं]]'' — इंद्रा-सत्तू ** दीप्ती केतकर-[[शुभांगी गोखले]] – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — नलू-शकू ** शाल्व किंजवडेकर-त्रियुग मंत्री-अर्णव राजे – ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' — ओम-रॉकी-चिन्या ** [[प्रार्थना बेहेरे]]-काजल काटे – ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' — नेहा-शेफाली ** मित्र – ''[[ती परत आलीये]]'' |} ; विशेष पुरस्कार {| class="wikitable" !colspan=2| [[झी मराठी विशेष लक्षवेधी चेहरा पुरस्कार|वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा]] |- |colspan=2| *'''[[प्रार्थना बेहेरे]] - ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]''''' |- !colspan=2| [[झी मराठी जीवनगौरव पुरस्कार|जीवन गौरव पुरस्कार]] |- |colspan=2| *'''[[मोहन जोशी]] - ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]''''' |- !colspan=2| [[झी फाईव्ह]] सर्वाधिक चर्चित व्यक्तिरेखा पुरुष |- |colspan=2| *'''[[अजिंक्य राऊत]] - ''[[मन उडू उडू झालं]]''''' |- !colspan=2| [[झी फाईव्ह]] सर्वाधिक चर्चित व्यक्तिरेखा स्त्री |- |colspan=2| *'''[[हृता दुर्गुळे]] - ''[[मन उडू उडू झालं]]''''' |} ==विक्रम== {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक नामांकने ! नामांकने ! मालिका |- !३७ |''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' |- !३४ |''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' |- !३२ |''[[मन झालं बाजिंद]]'' |- !२७ |''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' |- !२६ |''[[मन उडू उडू झालं]]'' |- !२२ |''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' |- !१३ |''[[ती परत आलीये]]'' |- ! rowspan="2"|३ |''[[घेतला वसा टाकू नको]]'' |- |''[[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]]'' |- ! rowspan="3"|२ |''[[चला हवा येऊ द्या]]'' |- |''[[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]'' |- |''[[वेध भविष्याचा]]'' |} {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक विजेते ! पुरस्कार ! मालिका |- ! १२ | ''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' |- ! ५ | ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' |- ! ३ | ''[[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]'' |- ! rowspan="2"| २ | ''[[रात्रीस खेळ चाले ३]]'' |- | ''[[मन उडू उडू झालं]]'' |- ! rowspan="2"| १ | ''[[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]]'' |- | ''[[चला हवा येऊ द्या]]'' |} {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक प्राप्तकर्ते ! प्राप्तकर्ते ! भूमिका ! मालिका ! पुरस्कार |- |[[संकर्षण कऱ्हाडे]] |समीर |''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' ! rowspan="2"|३ |- |[[प्रार्थना बेहेरे]] |नेहा कामत |''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' |- |[[श्रेयस तळपदे]] |यशवर्धन चौधरी |''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' ! rowspan="5"|२ |- |[[मोहन जोशी]] |जगन्नाथ चौधरी |''[[माझी तुझी रेशीमगाठ]]'' |- |[[हृता दुर्गुळे]] |दीपिका देशपांडे (दीपू) |''[[मन उडू उडू झालं]]'' |- |[[अजिंक्य राऊत]] |इंद्रजित साळगांवकर (इंद्रा) |''[[मन उडू उडू झालं]]'' |- |अन्विता फलटणकर |अवनी परब (स्वीटू) |''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' |} == हे सुद्धा पहा == * [[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार]] == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:झी मराठी पुरस्कार|उत्सव]] qixgiv236bs22gine99u829h1i6vibi यमाई देवी मंदिर (औंध) 0 294877 2581517 2581175 2025-06-21T06:39:43Z 120.88.180.214 /* पौराणिक इतिहास */ 2581517 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट हिंदू मंदिर | name = श्री यमाई देवी (मुळपीठ) | image = Yamai.jpg | image_size = 200px | alt = Goddess of wealth and beauty | caption = }} शिव-पार्वती यांचे एकत्रित पुजले जाणारे रूप म्हणजे यमाई. शिवशक्तीस्वरुपिनी यमाई देवीला पार्वती मातेचा त्याचबरोबर [[रेणुका|रेणुकादेवीचा]] अवतार मानले जाते. महाराष्ट्रात व अन्य राज्यांत यमाई देवीची अनेक उपपीठे (मंदिरे) आहेत; परंतु महाराष्ट्रातील [[सातारा जिल्हा|सातारा]] जिल्ह्यातील [[खटाव तालुका|खटाव]] तालुक्यातील [[औंध (खटाव)|औंध]] गावच्या डोंगरावरती वसलेले हे मंदिर '''यमाई देवी'''चे मुळ उगमस्थान असल्याने या ठिकाणास मुळपीठ त्याचबरोबर देवीलाही यमाईदेवी व्यतिरिक्त मुळपीठदेवी म्हणून देखील ओळखले जाते.'''<ref name="झी">{{cite web|url=https://zeenews.india.com/spirituality/yamai-devi-legend-behind-the-goddess-and-her-temple-in-aundh-1996837.html|title=Yamai Devi: Legend behind the goddess and her temple in Aundh!|date=Apr 17, 2017|website=[[झी न्युज]]|url-status=live|archive-url=https://archive.today/20170421021737/https://zeenews.india.com/spirituality/yamai-devi-legend-behind-the-goddess-and-her-temple-in-aundh-1996837.html|archive-date=April 21, 2017|access-date=१४ नोव्हेंबर २०२१}}</ref>''' औंधासूर राक्षसाचा भक्तजणांवर चाललेला अन्याय दूर करण्यासाठी दख्खनचा राजा श्री [[ज्योतिबा मंदिर|जोतिबा]] दक्षिणेस(सध्याचे औंध) पर्वतावर चालून आले. परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या शक्ती पुढे कमी पडू लागली. दिव्यस्मरण करताच या असुराचा वध आदिशक्तीच्या हातून घडणार हे नाथांस उमगले. तेव्हा जोतिबांनी आदिमायेस "ये माई" अशी साद घातली. जोतिबांनी घातलेली साद ऐकताच आदिमाया आदिशक्ती रेणुका मातेने यमाईदेवीचा अवतार धारण केला. आयुधे हातात घेऊन प्रकट झालेली भवानीमाता पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. देवीच्या हातात खड्ग, त्रिशूल, धनुष्य होते. पाठीवर बाणांनी भरलेला भात प्रत्येक टोकदार बाण असुराच्या रक्तासाठी तहानेने व्याकूळ झालेला. आग ओकणारे जगदंबेचे डोळे असुरांना शोधात होते. औंधसूराचे आणि देवीचे निकराचे तुंबळ युद्ध झाले. देवी प्रचंड क्रोधीत झाली होती. तिने उचललेला निर्वाणीचा शेवटचा बाण सळसळत औंधासुराजवळ गेला व क्षणात त्याने धड आणि डोके वेगळे केले. अशाप्रकारे मुळमाया यमाई देवीने औंधसूराचा वध केला आणि जनतेस भयमुक्त केले. टेकडीच्या पायथ्यापासून सुरू होणाऱ्या पायऱ्या वापरून किंवा ऐवजी घाटाचा रस्ता वापरून कारने टेकडीच्या माथ्यावर पोहोचता येते. आता रस्त्यांची स्थिती पहिल्या पेक्षा चांगली सुधारल्याने वाहने वरपर्यंत पोहोचू शकतात. वरच्या बाजूला पार्किंग उपलब्ध आहे. काळ्या पाषाणातील यमाई देवीची बैठी मूर्ती जवळपास दोन मीटर उंच असून, पायाची मांडी अढी घालून बसलेल्या स्थितीत आहे. हे मंदिर मोठ्या संख्येने मराठी कुटुंबांचे कुळ-दैवत आहे. मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांच्या प्रतिमा आणि मूर्ती आहेत. हे शहर आणि मंदिर अनेक शतकांपासून चालुक्य,यादव ,भोसले जगदाळे या शासकांशी गुरवघराणे कुंटूण्बाशी संबंधित आहे.अलीकडेच लोकवर्गनीतून देवीस या सोन्याचा कलश स्थापित केला आहे. टेकडीवरील मंदिरा व्यतिरिक्त यमाई देवीचं आणखी एक मंदिर खाली गावात आहे.<ref name=झी/><ref>{{cite book|last1=Pant|first1=Apa|title=A moment in time|year=1974|publisher=Orient Longman|location=Bombay Calcutta Madras New Delhi|pages=20|isbn=9780340147900|url=https://books.google.com/books?id=BpqYPSwKD2gC&q=temple&pg=PA7|access-date=१४ नोव्हेंबर २०२१}}{{मृत दुवा|date=January 2023 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref> == पौराणिक इतिहास == [[औंध संस्थान|औंध]] हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे मुख्य ठिकाण होते. त्या आगोदर औंधला जसा पौराणिक इतिहास आहे तसा मध्य युगीन इतिहासाच्या पाऊल खुणा पाहवयास मिळतात. त्याचा पुरावा म्हणजे औंध गावच्या नैऋत्य दिशेस एका लहानश्या टेकडीवर श्रीमुळपीठ यमाई देवीचे जागृत स्थान आहे. शिवाय गावात पद्माळें, नागाळें व विशाळें ही तीन तळी अस्तित्वात होती, त्यापैकी विशाळे हे तळे बुझलेले आहे. उर्वरित दोन तळी अद्याप अस्तित्वात आहेत. इ.स. १००० ते ११५० पर्यंत औंध वरती देवगिरीच्या यादवांचा अंमल होता. सोळाव्या - सतराव्या शतकात आदिलशाहीचा अंमल कऱ्हाड, सातारा, करवीर या प्रांतावर होता. याच काळात मसूर व औंध या दोन परगण्यांची देशमुखी मसूरचे जगदाळे - पाटील यांच्याकडे होती. औंध परगण्यांत तेव्हा २७ गावे होती. तद्नंतर रक्ताजी रुपजी यांच्याकडे देशमुखी गेल्याचे उल्लेख आढळतात. १६ शतकात [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांनी]] बादशाही विरुद्ध उभारलेल्या बंडामुळे त्रस्त झालेल्या आदिलशाहीने महाराष्ट्र मराठी संस्कृती राज्य धुळीत मिळवण्याचा चंग बांधला होता. तेव्हा अफजलखानाने तुळजापूर व पंढरपूर ही ठिकाणे उध्वस्त केल्यानंतर कराड - रहिमतपूर मार्गे औंधकडे मोर्चा वळवला. तेव्हा औंधच्या पुजाऱ्यांनी श्री यमाई देवीच्या मूर्तीस लहानश्या देवळात बंदिस्त करून त्या देवळाला मस्जिदीचे रूप दिले. तेव्हापासून यमाईच्या पुजाऱ्यांपैकी एका शाखेस (फकीर) पुजारी असे म्हणतात. यावेळी औंध गावातील यमाई मंदिरासमोर असलेली महाराष्ट्रातील किंबहुना देशातील सर्वात उंच सुमारे ६५ फुट उंच असलेल्या दीपमाळेचे सौंदर्य व भव्यता पाहून हिंदू मंदिरे धुळीस मिळवणाऱ्या खुद्द अफजलखानाची देखील तिला हात लावायची हिम्मत झाली नाही; अशी बॉम्बे गॅझेट मध्ये नोंद आहे. इ.स. १७०१ ते १८०६ पर्यंत परशुराम पंतप्रतिनिधी औंधच्या गादीवर राज्य करीत होते. १८०६ साली पेशवाई जप्त झाल्यानंतर १८११ पर्यंतचा कालावधी वगळल्यास सर्वकाळ पंतप्रतिनिधींचा औंध संस्थानावर अंमल राहिला. == श्री भवानी संग्रहालय == मंदिर संकुलात औंधच्या महाराजांच्या आपल्या खाजगी संग्रहातून स्थापन केलेले श्री भवानी संग्रहालय देखील आहे. संग्रहालयाची इमारत मंदिराच्या टेकडीच्या मध्यभागी वसलेली आहे. अभ्यागत पायऱ्या आणि रस्त्याने संग्रहालयापर्यंत पोहोचू शकतात. संग्रहालयात एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील प्रसिद्ध भारतीय कलाकार जसे की एमव्ही धुरंधर, बाबुराव पेंटर, माधव सातवळेकर आणि राजा रवि वर्मा तसेच ब्रिटिश कलाकार हेन्री मूर यांच्या प्रसिद्ध मदर आणि चाइल्ड स्टोन स्ट्रक्चरची चित्रे देखील आहेत.<ref>{{cite web|url=http://www.indiaart.com/Articles-and-Features/Articles-on-M-V-Dhurandhar-by-Nalini-Bhagwat/Articles-on-M-V-Dhurandhar-by-Nalini-Bhagwat.asp|title=M. V. Dhurandhar|last1=Bhagwat.|first1=Nalini|website=indiaart.com|access-date=१४ नोव्हेंबर २०२१}}</ref><ref>{{cite book|url=https://books.google.com/books?id=McSbSMhArFgC&q=Madhav+Satwalekar&pg=PA1|title=A History of Indian Painting: The modern period|last1=Chaitanya|first1=Krishna|date=1994|publisher=Abhinav Publications|isbn=81-7017-310-8|location=New Delhi|pages=273–274}}</ref><ref>{{cite web|url=http://www.thefreelibrary.com/Shivaji+designs+for+stained-glass+windows%3A+the+art+of+Ervin+Bossanyi.-a0253862098|title=Shivaji designs for stained-glass windows: the art of Ervin Bossanyi. - Free Online Library|publisher=Thefreelibrary.com|access-date=2013-05-09}}</ref> == श्री यमाई देवीची महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बारा पीठे == दैत्यसंहारासाठी व भक्तकल्याणासाठी यमाई देवीची अनेक ठिकाणी उपपीठे निर्माण झालेली आहेत व ती मुळपीठाइतकीच पूजनीय मानली जातात. त्यातील बारा प्रमुख मुळपीठ व उपपीठे खालीलप्रमाणे : '''१. मुळपीठ (उगमस्थान) : श्री यमाई देवी देवस्थान, औंध (मुळपीठ), ता. खटाव, जि. सातारा.''' * '''श्री यमाई देवीची प्रमुख उपपीठे :-''' '''२.''' श्री जगदंबा यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र [[राशिन]], ता. कर्जत, जि. अहमदनगर '''३.''' श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र [[ज्योतिबाचा डोंगर|जोतिबा डोंगर]] (वाडी रत्‍नागिरी), ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर '''४.''' श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र [[मार्डी]], ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर '''५.''' श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र [[कन्हेरसर]], ता. खेड, जि. पुणे '''६'''. श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र [[शिवरी]], ता. पुरंदर, जि. पुणे '''७.''' श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र [[कवठे यमाई]], ता. शिरूर, जि. पुणे '''८.''' श्री साखरगडनिवासिनी अंबाबाई - यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र [[किन्हई]], ता. कोरेगाव, जि. सातारा '''९.''' श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र हिंगणगाव, ता. परंडा, जि. धाराशिव '''१०.''' श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र [[हिप्परगाराव]], ता. उमरगा, जि. धाराशिव '''११.''' श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र [[महाळुंग (माळशिरस)|महाळुंग]], ता. माळशिरस, जि. सोलापूर '''१२.''' श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र कोरेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर == श्री यमाई देवीची अन्य प्रसिद्ध मंदिरे == # श्री क्षेत्र बिटले, ता. मोहोळ, जि. सोलापूर # श्री क्षेत्र मालेगाव खुर्द, ता. मावळ, जि. पुणे # श्री क्षेत्र राजुरी, ता. परांडा, जि. धाराशिव # श्री क्षेत्र टाकळी, ता. धाराशिव, जि. धाराशिव # श्री क्षेत्र जातेगांव, ता. गेवराई, जि. बीड # श्री क्षेत्र [[तुळजापूर]], ता. तुळजापूर, जि. धाराशिव -  ''महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई [[तुळजाभवानी मंदिर|तुळजाभवानी]] मंदिर परिसरात देखील श्री यमाई देवीचे जागृत स्थान आहे. यमाई देवीला तुळजाभवानीची मोठी बहीण मानली जाते. त्यामुळे बरेच भाविक तुळजाभवानी दर्शनानंतर जवळच असलेल्या मार्डी किंवा मुळपीठ म्हणजेच औंधच्या यमाई देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आज देखील पाळतात.'' # श्री क्षेत्र सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर ([[अंबिका मंदिर (सांगोला)|अंबिका मंदिर]]) - ''अंबिका मंदिर हे [[सोलापूर|सोलापूरच्या]] [[सांगोला]] शहरातील हिंदू मंदिर आहे. हे मंदिर १४ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते. एकाच सिंहासनावर अंबिका माता, तुकाई ([[तुळजाभवानी]]) आणि [[औंध|औंधची]] [[यमाई देवी मंदिर, औंध|यमाईदेवी]] येथे विराजमान आहे. मूळ अंबिका माता ग्रामदैवत असून त्यानंतर तत्कालीन मराठा साम्राज्य असताना महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुकाई अर्थात तुळजाभवानीची स्थापना करण्यात आली व पेशवे साम्राज्यात पेशवे घराण्याची कुलस्वामिनी औंधनिवासिनी यमाई देवीची स्थापना करण्यात आली. एकाच सिंहासनावर अंबिका, तुकाई आणि यमाई देवी विराजित असल्याने; या क्षेत्रास विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. सांगोला शहराचे हे ग्रामदैवत आहे.'' # श्री क्षेत्र कुळधरण, ता. कर्जत, जि. अहमदनगर # श्री क्षेत्र [[पंढरपूर]], ता. पंढरपूर, जि. सोलापूर (श्री यमाई - तुकाई देवस्थान) # श्री क्षेत्र केरळ, ता. पाटण, जि. सातारा # श्री क्षेत्र अतीत, ता. सातारा, जि. सातारा # श्री क्षेत्र कोरफळे, ता. बार्शी, जि. सोलापूर # श्री क्षेत्र सनपाने, ता. जावळी, जि. सातारा # श्री क्षेत्र कोनवडे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर # श्री क्षेत्र इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे (श्री यमाई देवी मंदिर मठ) # श्री क्षेत्र न्हावी, ता.भोर, जि. पुणे == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} [[वर्ग:सातारा जिल्हा]] [[वर्ग:हिंदू मंदिरे]] [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] [[वर्ग:हिंदू दैवते]] jvi540fe6wgvgpxt89nv4vh1jpadvxe आष्टी बुद्रुक (सावनेर) 0 315657 2581311 2187137 2025-06-20T13:16:59Z Khirid Harshad 138639 [[आष्टी बुद्रुक]] कडे पुनर्निर्देशित 2581311 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[आष्टी बुद्रुक]] nc8m6qz7ygo7no833s313t6nqaksvrl प्रताप सरनाईक 0 331752 2581328 2297906 2025-06-20T15:52:48Z 2409:40C2:104A:F6B3:8000:0:0:0 2581328 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट विधानसभा सदस्य |सन्मानवाचक पूर्वप्रत्यय= श्री. |नाव= प्रताप बाबुराव सरनाईक |कार्यकाळ_आरंभ= २००४ | चित्र नाव = | चित्र आकारमान = 250px |पक्ष = [[शिवसेना]] |कार्यकाळ_समाप्ती= |मागील पक्ष= |पुढील=आमदार |मतदारसंघ_विस1=[[ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ|ओवळा-माजिवडा]] |कार्यकाळ_आरंभ1=२००४ |निवास = |व्यवसाय = |छाया= }} '''प्रताप बाबूराव सरनाईक''' मराठी राजकारणी आहेत. हे [[ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ|ओवळा-माजिवडा मतदारसंघातून]] [[शिवसेना|शिवसेनेकडून]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[महाराष्ट्राची बारावी विधानसभा|बाराव्या]], [[महाराष्ट्राची तेरावी विधानसभा|तेराव्या]] आणि [[महाराष्ट्राची चौदावी विधानसभा|चौदाव्या विधानसभेवर]] निवडून गेले. {{विस्तार}} {{DEFAULTSORT:सरनाईक, प्रताप बाबूराव}} [[वर्ग:महाराष्ट्राचे विद्यमान आमदार]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:ओवळा-माजिवडाचे आमदार]] [[वर्ग:महाराष्ट्रातील आमदार]] [[वर्ग:शिवसेनेतील राजकारणी]] [[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] bxq1096cn0xwwhudjrnypxbx3bg8ct4 2581329 2581328 2025-06-20T15:53:09Z 2409:40C2:104A:F6B3:8000:0:0:0 2581329 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट विधानसभा सदस्य |सन्मानवाचक पूर्वप्रत्यय= श्री. |नाव= प्रताप सरनाईक |कार्यकाळ_आरंभ= २००४ | चित्र नाव = | चित्र आकारमान = 250px |पक्ष = [[शिवसेना]] |कार्यकाळ_समाप्ती= |मागील पक्ष= |पुढील=आमदार |मतदारसंघ_विस1=[[ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ|ओवळा-माजिवडा]] |कार्यकाळ_आरंभ1=२००४ |निवास = |व्यवसाय = |छाया= }} '''प्रताप बाबुराव सरनाईक''' मराठी राजकारणी आहेत. हे [[ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ|ओवळा-माजिवडा मतदारसंघातून]] [[शिवसेना|शिवसेनेकडून]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[महाराष्ट्राची बारावी विधानसभा|बाराव्या]], [[महाराष्ट्राची तेरावी विधानसभा|तेराव्या]] आणि [[महाराष्ट्राची चौदावी विधानसभा|चौदाव्या विधानसभेवर]] निवडून गेले. {{विस्तार}} {{DEFAULTSORT:सरनाईक, प्रताप बाबूराव}} [[वर्ग:महाराष्ट्राचे विद्यमान आमदार]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:ओवळा-माजिवडाचे आमदार]] [[वर्ग:महाराष्ट्रातील आमदार]] [[वर्ग:शिवसेनेतील राजकारणी]] [[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] b8m98hyf4ai3lvt05imax3p4eyvid9y झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२३ 0 337587 2581323 2481364 2025-06-20T14:46:19Z Khirid Harshad 138639 2581323 wikitext text/x-wiki {{Infobox award | image = ZMA 2023.jpg | image_size = | image_upright = | caption = | awarded_for = | presenter = [[झी मराठी]] | country = [[भारत]] | firstawarded = | lastawarded = | reward = | former name = | network = [[झी मराठी]] | holder_label = सूत्रसंचालन | holder = [[शिवानी रांगोळे]]<br>ऋषिकेश शेलार | award1_type = सर्वाधिक विजेते | award1_winner = ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' (९) | award2_type = सर्वाधिक नामांकने | award2_winner = ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' (२७) | award3_type = विजेती मालिका | award3_winner = ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' | previous = [[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२२|२०२२]] | next = [[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२४|२०२४]] }} '''झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२३''' ({{lang-en|Zee Marathi Utsav Natyancha Awards 2023}}) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०२३ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात येणार आहे. हा सोहळा ४ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न झाला. [[शिवानी रांगोळे]] आणि ऋषिकेश शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.<ref>{{Cite web|url=https://www.loksatta.com/manoranjan/television/zee-marathi-awards-2023-who-won-best-serial-actress-and-actor-here-is-the-full-list-of-award-winners-sva-00-4028863/|title=‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात ‘या’ मालिकेने मारली बाजी! सर्वोत्कृष्ट जोडी, नायक-नायिका आहेत|access-date=2023-11-04|website=[[लोकसत्ता]]}}</ref><ref>{{Cite web|url=https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/television-news/zee-marathi-award-2023-tula-shikvin-changlach-dhada-won-best-serial-best-hero-and-best-heroin-award-check-list-here/articleshow/104978073.cms|title=सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा|access-date=2023-11-04|website=[[महाराष्ट्र टाइम्स]]}}</ref> == विजेते व नामांकने == {| class="wikitable" ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट मालिका]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट कुटुंब पुरस्कार|सर्वोत्कृष्ट कुटुंब]] |- | * '''''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]''''' ** ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' ** ''[[तू चाल पुढं]]'' ** ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' ** ''[[नवा गडी नवं राज्य]]'' ** ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' ** ''[[३६ गुणी जोडी]]'' | * '''खोत – ''[[सारं काही तिच्यासाठी]]''''' ** कदम – ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' ** वाघमारे – ''[[तू चाल पुढं]]'' ** आमोणकर – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' ** सूर्यवंशी – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' ** कर्णिक – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' ** राजाध्यक्ष – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' ** वानखेडे – ''[[३६ गुणी जोडी]]'' ** तुंपलवार – ''[[३६ गुणी जोडी]]'' |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट नायक]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट नायिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट नायिका]] |- | * '''ऋषिकेश शेलार – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — अधिपती सूर्यवंशी''' ** रोहित परशुराम – ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' — अर्जुन कदम ** आदित्य वैद्य – ''[[तू चाल पुढं]]'' — श्रेयस वाघमारे ** [[अशोक शिंदे]] – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — रघुनाथ खोत (दादा) ** कश्यप परुळेकर – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — राघव कर्णिक ** अजिंक्य ननावरे – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — अद्वैत राजाध्यक्ष ** आयुष साळुंखे – ''[[३६ गुणी जोडी]]'' — वेदांत वानखेडे | * '''[[शिवानी रांगोळे]] – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — अक्षरा सूर्यवंशी''' ** शिवानी नाईक – ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' — अपर्णा कदम (अप्पी) ** [[दीपा परब]] – ''[[तू चाल पुढं]]'' — अश्विनी वाघमारे ** खुशबू तावडे – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — उमा खोत ** [[पल्लवी पाटील]] – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — आनंदी कर्णिक ** [[तितीक्षा तावडे]] – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — नेत्रा राजाध्यक्ष ** अनुष्का सरकटे – ''[[३६ गुणी जोडी]]'' — अमुल्या तुंपलवार |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट जोडी पुरस्कार|सर्वोत्कृष्ट जोडी]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सून पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सून]] |- | * '''ऋषिकेश शेलार-[[शिवानी रांगोळे]] – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — अधिपती-अक्षरा''' ** रोहित परशुराम-शिवानी नाईक – ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' — अर्जुन-अपर्णा ** आदित्य वैद्य-[[दीपा परब]] – ''[[तू चाल पुढं]]'' — श्रेयस-अश्विनी ** [[अशोक शिंदे]]-खुशबू तावडे – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — रघुनाथ-उमा ** कश्यप परुळेकर-[[पल्लवी पाटील]] – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — राघव-आनंदी ** अजिंक्य ननावरे-[[तितीक्षा तावडे]] – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — अद्वैत-नेत्रा ** आयुष साळुंखे-अनुष्का सरकटे – ''[[३६ गुणी जोडी]]'' — वेदांत-अमुल्या | * '''खुशबू तावडे – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — उमा खोत''' ** शिवानी नाईक – ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' — अपर्णा कदम (अप्पी) ** [[दीपा परब]] – ''[[तू चाल पुढं]]'' — अश्विनी वाघमारे ** [[शिवानी रांगोळे]] – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — अक्षरा सूर्यवंशी ** [[पल्लवी पाटील]] – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — आनंदी कर्णिक ** [[तितीक्षा तावडे]] – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — नेत्रा राजाध्यक्ष |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट खलनायक]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायिका पुरस्कार|सर्वोत्कृष्ट खलनायिका]] |- | * '''सुनील डोंगर – ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' — संकल्प ढोबळे''' ** [[मिलिंद शिंदे (अभिनेता)|मिलिंद शिंदे]] – ''[[३६ गुणी जोडी]]'' — पुरुषोत्तम गुडपल्लीवार | * '''[[कविता लाड-मेढेकर]] – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — भुवनेश्वरी सूर्यवंशी''' ** पुष्पा चौधरी – ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' — मनीषा ढोबळे ** धनश्री काडगांवकर – ''[[तू चाल पुढं]]'' — शिल्पी म्हात्रे ** रागिणी सामंत – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — दाईची खोत ** [[वर्षा दांदळे]] – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — सुलक्षणा कर्णिक ** [[ऐश्वर्या नारकर]] – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — रुपाली राजाध्यक्ष ** प्रज्ञा जावळे – ''[[३६ गुणी जोडी]]'' — नूतन वानखेडे |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री]] |- | * '''[[अशोक शिंदे]] – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — रघुनाथ खोत (दादा)''' ** प्रदीप कोथमिरे – ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' — हंबीर कदम (सरकार) ** राहुल मेहेंदळे – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — शेखर राजाध्यक्ष ** [[मिलिंद शिंदे (अभिनेता)|मिलिंद शिंदे]] – ''[[३६ गुणी जोडी]]'' — पुरुषोत्तम गुडपल्लीवार | * '''[[कविता लाड-मेढेकर]] – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — भुवनेश्वरी सूर्यवंशी''' ** खुशबू तावडे – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — उमा खोत ** [[अनिता दाते-केळकर]] – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — रमा कर्णिक ** [[ऐश्वर्या नारकर]] – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — रुपाली राजाध्यक्ष ** संयोगिता भावे – ''[[३६ गुणी जोडी]]'' — आजी |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री]] |- | * '''[[विजय गोखले]] – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — सत्यबोध फुलपगारे''' ** गणेश सरकटे – ''[[तू चाल पुढं]]'' — बबन पांडे ** संदेश उपशाम – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — श्रीकांत सावंत ** सचिन कांबळे – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — बबन ** मिलिंद शिरोळे – ''[[३६ गुणी जोडी]]'' — विजय पवार | * '''एकता डांगर – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — फाल्गुनी राजाध्यक्ष''' ** सिद्धीरूपा करमरकर – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — लालन सावंत ** दीप्ती सोनावणे – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — दुर्गेश्वरी ** [[अनिता दाते-केळकर]] – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — रमा कर्णिक |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री]] |- | * '''जयंत घाटे – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — भालचंद्र कुलकर्णी (आबा)''' ** ऋषभ कोंडावर – ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' — सुजय कदम ** दीपकार पारकर – ''[[तू चाल पुढं]]'' — विद्युत म्हात्रे ** अभिषेक गावकर – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — श्रीनिवास सावंत ** अक्षय विंचूरकर – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — कमल कानफाडे ** पंकज चेंबूरकर – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — पुरुषोत्तम पाटकर ** शेखर फडके – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — शिवानंद गावडे (नंदू) ** स्वानंद केतकर – ''[[३६ गुणी जोडी]]'' — विक्रांत वानखेडे ** [[अविनाश नारकर]] – ''[[३६ गुणी जोडी]]'' — आशिष तुंपलवार (अण्णा) | * '''वैष्णवी कल्याणकर – ''[[तू चाल पुढं]]'' — मयुरी वाघमारे''' ** दक्षता जोईल – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — निशिगंधा खोत ** रुची कदम – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — ओवी देसाई ** दीप्ती सोनावणे – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — दुर्गेश्वरी ** विरिषा नाईक – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — चंचला ** रुता काळे – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — इरा आमोणकर ** [[वर्षा दांदळे]] – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — सुलक्षणा कर्णिक ** किर्ती पेंढारकर – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — वर्षा कर्णिक ** श्वेता मेहेंदळे – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — इंद्राणी ** संजना काळे – ''[[३६ गुणी जोडी]]'' — आरती वानखेडे |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट वडील पुरस्कार|सर्वोत्कृष्ट वडील]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार|सर्वोत्कृष्ट आई]] |- | * '''[[अशोक शिंदे]] – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — रघुनाथ खोत (दादा)''' ** संतोष पाटील – ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' — सुरेश माने ** श्रीकांत केटी – ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' — विनायक कदम ** आदित्य वैद्य – ''[[तू चाल पुढं]]'' — श्रेयस वाघमारे ** देवेंद्र दोडके – ''[[तू चाल पुढं]]'' — प्रकाश वाघमारे ** देवेंद्र देव – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — जयदेव आमोणकर ** [[स्वप्नील राजशेखर]] – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — चारुहास सूर्यवंशी ** कश्यप परुळेकर – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — राघव कर्णिक ** राहुल मेहेंदळे – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — शेखर राजाध्यक्ष ** [[अविनाश नारकर]] – ''[[३६ गुणी जोडी]]'' — आशिष तुंपलवार (अण्णा) | * '''खुशबू तावडे – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — उमा खोत''' ** [[दीपा परब]] – ''[[तू चाल पुढं]]'' — अश्विनी वाघमारे ** रुपलक्ष्मी शिंदे – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — विद्या आमोणकर ** [[पल्लवी पाटील]] – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — आनंदी कर्णिक ** ऋजुता देशमुख – ''[[३६ गुणी जोडी]]'' — सुमन तुंपलवार |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सासरे पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सासरे]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सासू पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सासू]] |- | * '''देवेंद्र दोडके – ''[[तू चाल पुढं]]'' — प्रकाश वाघमारे''' ** श्रीकांत केटी – ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' — विनायक कदम ** देवेंद्र देव – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — जयदेव आमोणकर ** [[स्वप्नील राजशेखर]] – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — चारुहास सूर्यवंशी ** पंकज चेंबूरकर – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — पुरुषोत्तम पाटकर ** राहुल मेहेंदळे – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — शेखर राजाध्यक्ष | * '''[[वर्षा दांदळे]] – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — सुलक्षणा कर्णिक''' ** दया एकसंबेकर – ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' — रुक्मिणी कदम ** प्रतिभा गोरेगांवकर – ''[[तू चाल पुढं]]'' — उज्ज्वला वाघमारे ** रागिणी सामंत – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — दाईची खोत ** [[कविता लाड-मेढेकर]] – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — भुवनेश्वरी सूर्यवंशी ** [[ऐश्वर्या नारकर]] – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — रुपाली राजाध्यक्ष |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत पुरस्कार|सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत]] ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार|सर्वोत्कृष्ट बालकलाकार]] |- | * '''''[[तू चाल पुढं]]''''' ** ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' ** ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' ** ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' ** ''[[नवा गडी नवं राज्य]]'' ** ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' ** ''[[३६ गुणी जोडी]]'' | * '''आरोही सांबरे – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — रेवा (चिंगी) कर्णिक''' ** स्वरा पाटील – ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' — छकुली ** पिहू गोसावी – ''[[तू चाल पुढं]]'' — कुहू वाघमारे ** रेयांश जुवाटकर – ''[[तू चाल पुढं]]'' — संजय म्हात्रे ** स्वराज पवार – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — दुर्गेश खोत ** – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — विनय ** प्राजक्ता ढेरे – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — मिताली |- ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार|सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक]] |- | * '''''[[चला हवा येऊ द्या]]''''' ** ''[[वेध भविष्याचा]]'' ** ''[[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]'' ** ''[[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]]'' | * '''[[मृण्मयी देशपांडे]] – ''[[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]]''''' ** अतुलशास्त्री भगरे – ''[[वेध भविष्याचा]]'' ** [[आदेश बांदेकर]] – ''[[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]'' ** [[निलेश साबळे]] – ''[[चला हवा येऊ द्या]]'' |- ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट आजी पुरस्कार|सर्वोत्कृष्ट आजी]] ! style="background:#EEDD82;" |[[झी मराठी सर्वोत्कृष्ट आजोबा पुरस्कार|सर्वोत्कृष्ट आजोबा]] |- | * '''संध्या म्हात्रे – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — अधिपतीची आजी''' ** प्रतिभा गोरेगांवकर – ''[[तू चाल पुढं]]'' — उज्ज्वला वाघमारे ** रागिणी सामंत – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — दाईची खोत ** [[वर्षा दांदळे]] – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — सुलक्षणा कर्णिक ** रजनी वेलणकर – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — पद्मजा राजाध्यक्ष ** संयोगिता भावे – ''[[३६ गुणी जोडी]]'' — आजी | * '''पंकज चेंबूरकर – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — पुरुषोत्तम पाटकर''' ** देवेंद्र दोडके – ''[[तू चाल पुढं]]'' — प्रकाश वाघमारे ** जयंत घाटे – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — भालचंद्र कुलकर्णी (आबा) |- ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट भावंडं पुरस्कार|सर्वोत्कृष्ट भावंडं]] ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट मैत्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट मैत्री]] |- | * '''रुची कदम-दक्षता जोईल – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — ओवी-निशिगंधा''' ** शिवानी नाईक-आदित्य भोसले – ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' — अप्पी-दिप्या ** [[दीपा परब]]-दीपकार पारकर – ''[[तू चाल पुढं]]'' — अश्विनी-विद्युत ** धनश्री काडगांवकर-आदित्य वैद्य – ''[[तू चाल पुढं]]'' — शिल्पी-श्रेयस ** वैष्णवी कल्याणकर-पिहू गोसावी-रेयांश जुवाटकर – ''[[तू चाल पुढं]]'' — मयुरी-कुहू-संजू ** [[अशोक शिंदे]]-सिद्धीरूपा करमरकर-शशिकांत केरकर – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — रघुनाथ-लालन-राजाराम ** किर्ती पेंढारकर-कश्यप परुळेकर – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — वर्षा-राघव ** अजिंक्य ननावरे-प्रशांत केणी-अनिरुद्ध देवधर – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — अद्वैत-तेजस-तन्मय ** अनुष्का सरकटे-संजना काळे – ''[[३६ गुणी जोडी]]'' — अमुल्या-आरती ** आयुष साळुंखे-अक्षता आपटे-स्वानंद केतकर – ''[[३६ गुणी जोडी]]'' — वेदांत-आद्या-विक्रांत | * '''[[तितीक्षा तावडे]]-एकता डांगर – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — नेत्रा-फाल्गुनी''' ** रोहित परशुराम-शेखर सावंत – ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' — अर्जुन-विजय ** [[दीपा परब]]-सेंजाली मसंद – ''[[तू चाल पुढं]]'' — अश्विनी-जेनिफर ** आदित्य वैद्य-गणेश सरकटे – ''[[तू चाल पुढं]]'' — श्रेयस-बबन ** दक्षता जोईल-निकिता झेपाले – ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' — निशिगंधा-छाया ** ऋषिकेश शेलार-ओम राणे-प्रवीण प्रभाकर – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — अधिपती-ओंकार-पव्या ** [[पल्लवी पाटील]]-[[अनिता दाते-केळकर]] – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — आनंदी-रमा |- ! style="background:#EEDD82;" | [[झी मराठी सर्वोत्कृष्ट जावई पुरस्कार|सर्वोत्कृष्ट जावई]] |- | * '''ऋषिकेश शेलार – ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' — अधिपती सूर्यवंशी''' ** रोहित परशुराम – ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' — अर्जुन कदम ** कश्यप परुळेकर – ''[[नवा गडी नवं राज्य]]'' — राघव कर्णिक ** अजिंक्य ननावरे – ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' — अद्वैत राजाध्यक्ष |} ; विशेष पुरस्कार {| class="wikitable" !colspan=2| [[झी मराठी विशेष लक्षवेधी चेहरा पुरस्कार|वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा]] |- |colspan=2| *'''[[शिवानी रांगोळे]] - ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]''''' |} == विक्रम == {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक नामांकने ! नामांकने ! मालिका |- !२७ |''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' |- ! rowspan="2"|२५ |''[[नवा गडी नवं राज्य]]'' |- |''[[तू चाल पुढं]]'' |- !२३ |''[[सारं काही तिच्यासाठी]]'' |- !२१ |''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' |- !२० |''[[३६ गुणी जोडी]]'' |- !१९ |''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' |- ! rowspan="4"|२ |''[[वेध भविष्याचा]]'' |- |''[[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]'' |- |''[[चला हवा येऊ द्या]]'' |- |''[[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]]'' |} {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक विजेते ! पुरस्कार ! मालिका |- ! ९ | ''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' |- ! ६ | ''[[सारं काही तिच्यासाठी]]'' |- ! rowspan="3"| ३ | ''[[नवा गडी नवं राज्य]]'' |- | ''[[तू चाल पुढं]]'' |- | ''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' |- ! rowspan="3"| १ | ''[[चला हवा येऊ द्या]]'' |- | ''[[अप्पी आमची कलेक्टर]]'' |- | ''[[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]]'' |} {|class="wikitable" style="display:inline-table;" |+सर्वाधिक प्राप्तकर्ते ! प्राप्तकर्ते ! भूमिका ! मालिका ! पुरस्कार |- |ऋषिकेश शेलार |अधिपती सूर्यवंशी |''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' !३ |- |[[कविता लाड-मेढेकर]] |भुवनेश्वरी सूर्यवंशी |''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' ! rowspan="5"|२ |- |[[शिवानी रांगोळे]] |अक्षरा सूर्यवंशी |''[[तुला शिकवीन चांगलाच धडा]]'' |- |[[अशोक शिंदे]] |रघुनाथ खोत (दादा) |''[[सारं काही तिच्यासाठी]]'' |- |खुशबू तावडे |उमा खोत |''[[सारं काही तिच्यासाठी]]'' |- |एकता डांगर |फाल्गुनी राजाध्यक्ष |''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]'' |} == हे सुद्धा पहा == * [[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार]] == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:झी मराठी पुरस्कार|उत्सव]] 2wno5ay8u5su63d1qa0sgn29h1sjfww पारू (मालिका) 0 342807 2581506 2581105 2025-06-21T06:12:03Z CommonsDelinker 685 मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे. 2581506 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम | कार्यक्रम = पारू | चित्र = | लोगो_चित्र_शीर्षक = | उपशीर्षक = | प्रकार = | निर्माता = सरिता तेजेंद्र नेसवणकर | निर्मिती संस्था = ट्रम्प कार्ड प्रोडक्शन | दिग्दर्शक = राजू सावंत | क्रिएटीव्ह दिग्दर्शक = | सूत्रधार = | कलाकार = [[#कलाकार|खाली पहा]] | पंच = | आवाज = | अभिवाचक = | थीम संगीत संगीतकार = | शीर्षकगीत = | अंतिम संगीत = | संगीतकार = | देश = [[भारत]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | वर्ष संख्या = | एपिसोड संख्या = | कार्यकारी निर्माता = | सुपरवायझिंग निर्माता = | असोसिएट निर्माता = | सह निर्माता = | कथा संकलन = | संकलन = | स्थळ = | कॅमेरा = | चालण्याचा वेळ = दररोज संध्या. ७.३० वाजता | वाहिनी = [[झी मराठी]] | चित्र प्रकार = | ध्वनी प्रकार = | पहिला भाग = | प्रथम प्रसारण = १२ फेब्रुवारी २०२४ | शेवटचे प्रसारण = चालू | आधी = [[सावळ्याची जणू सावली]] | नंतर = [[लक्ष्मी निवास]] | सारखे = }} '''पारू''' ही [[झी मराठी]] वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा [[झी तेलुगू]]वरील '''मुद्धा मंदारम''' या तेलुगू मालिकेवर आधारित आहे. == कलाकार == * शरयू सोनावणे - पार्वती मारुती सेमसे (पारू) * [[प्रसाद जवादे]] - आदित्य श्रीकांत किर्लोस्कर * मुग्धा कर्णिक - अहिल्यादेवी श्रीकांत किर्लोस्कर * श्रुतकीर्ती सावंत - दामिनी मोहन किर्लोस्कर * विजय पटवर्धन - श्रीकांत किर्लोस्कर * अनुज साळुंखे - प्रीतम श्रीकांत किर्लोस्कर * संजना काळे - प्रिया प्रीतम किर्लोस्कर / प्रिया सयाजी भोसले * शंतनू गंगणे - मोहन किर्लोस्कर * [[सुनील बर्वे]] - सयाजी भोसले * [[पूर्वा शिंदे]] - दिशा * [[नागेश भोसले]] - विश्वंभर ठाकूर * [[भरत जाधव]] - सूर्यकांत कदम * देवदत्त घोणे - गणेश मारुती सेमसे * अतुल कासवा - मारुती सेमसे * निखिल झोपे - मिहीर राजशेखर * अक्षता उकिरडे - कियारा विश्वंभर ठाकूर * श्रीपाद पानसे - प्रताप सयाजी भोसले * प्राजक्ता वाड्ये - सावित्री * श्वेता खरात - अनुष्का * अर्जुन कुसुंबे - ऋषिकेश * [[परी तेलंग]] - मीरा * अनुप बेलवलकर - विशाल * सचिन देशपांडे - अजय * आतिश मोरे - हरीश * ऋग्वेद फडके - नानू == पुनर्निर्मिती == {|class="wikitable" ! भाषा ! नाव ! वाहिनी ! प्रकाशित |- | [[तेलुगू]] | मुद्धा मंदारम | [[झी तेलुगू]] | १७ नोव्हेंबर २०१४ - २७ डिसेंबर २०१९ |- | [[तमिळ]] | सेंबारुथी | [[झी तमिळ]] | १६ ऑक्टोबर २०१७ - ३१ जुलै २०२२ |- | [[मल्याळम]] | चेंबारथी | [[झी केरळम]] | २६ नोव्हेंबर २०१८ - २५ मार्च २०२२ |- | [[कन्नड]] | पारू | [[झी कन्नडा]] | ३ डिसेंबर २०१८ - १६ मार्च २०२४ |- | [[हिंदी]] | वसुधा | [[झी टीव्ही]] | १६ सप्टेंबर २०२४ - चालू |- | [[पंजाबी]] | काशनी | [[झी पंजाबी]] | ३१ मार्च २०२५ - ३१ मे २०२५ |- | [[बंगाली]] | कुसुम | [[झी बांग्ला]] | ४ जून २०२५ - चालू |} == बाह्य दुवे == {{झी मराठी संध्या. ७.३०च्या मालिका}} [[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] [[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] o1simrwy9d7v40keb574wscgco9yp56 शिवा (मालिका) 0 342822 2581505 2580949 2025-06-21T06:11:54Z CommonsDelinker 685 मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे. 2581505 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम | कार्यक्रम = शिवा | चित्र = | लोगो_चित्र_शीर्षक = | उपशीर्षक = | प्रकार = | निर्माता = [[अमोल कोल्हे]] | निर्मिती संस्था = जगदंब क्रिएशन्स | दिग्दर्शक = मारूती देसाई | क्रिएटीव्ह दिग्दर्शक = | सूत्रधार = | कलाकार = [[#कलाकार|खाली पहा]] | पंच = | आवाज = | अभिवाचक = | थीम संगीत संगीतकार = | शीर्षकगीत = | अंतिम संगीत = | संगीतकार = | देश = [[भारत]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | वर्ष संख्या = | एपिसोड संख्या = | कार्यकारी निर्माता = | सुपरवायझिंग निर्माता = | असोसिएट निर्माता = | सह निर्माता = | कथा संकलन = | संकलन = | स्थळ = | कॅमेरा = | चालण्याचा वेळ = * दररोज रात्री ९ वाजता * दररोज रात्री ९.३० वाजता (३० जून २०२५ पासून) | वाहिनी = [[झी मराठी]] | चित्र प्रकार = | ध्वनी प्रकार = | पहिला भाग = | प्रथम प्रसारण = १२ फेब्रुवारी २०२४ | शेवटचे प्रसारण = चालू | आधी = [[कमळी (मालिका)|कमळी]] | नंतर = [[देवमाणूस - मधला अध्याय]] | सारखे = }} '''शिवा''' ही [[झी मराठी]] वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा [[झी सार्थक]]वरील '''सिंदुरा बिंदू''' या उडिया मालिकेवर आधारित आहे. == कलाकार == * पूर्वा कौशिक - शिवानी कैलास पाटील /शिवानी आशुतोष देसाई (शिवा) * शाल्व किंजवडेकर - आशुतोष रामचंद्र देसाई (आशू) * समीर‌ पाटील / रमेश वाणी - रामचंद्र देसाई (भाऊ) * मीरा वेलणकर / स्नेहा रायकर - सीता रामचंद्र देसाई * मानसी म्हात्रे - कीर्ती रामचंद्र देसाई / कीर्ती सुहास शिर्के * सुनील तांबट - लक्ष्मण देसाई * आरती शिरोडकर - ऊर्मिला लक्ष्मण देसाई * वैष्णवी आंबवणे - संपदा लक्ष्मण देसाई * अंगद म्हसकर - सुहास शिर्के * वैभवी चव्हाण - प्रिया शिर्के * [[सविता मालपेकर]] - जनाबाई पाटील / साऊबाई गजानन म्हात्रे (बाईआजी) * गणेश यादव - कैलास हनुमंत पाटील * मृणालिनी जावळे - वंदना कैलास पाटील * सृष्टी बाहेकर - दिव्या कैलास पाटील / दिव्या चंदन शृंगारपुरे * तेजस महाजन - चंदन शृंगारपुरे * विपुल काळे - मंजुनाथ मांजरेकर (मांजा) * गीतांजली गणगे - रेणुका काटे (अंजली) * रमेश चांदणे - नाना फडतरे * अर्जुन वैंगणकर - सायलेन्सर * गौरव कालुष्टे - डिप्पर * विठ्ठल तळवलकर - अप्पर * हसन शेख - स्टेपनी * सुशांत दिवेकर - बॅटरी * दिवेश मेडगे - राकेश (रॉकी) * गौरी कुलकर्णी - अर्चना * गुरुराज अवधानी - गुरुजी * [[शरद पोंक्षे]] - दिनकर तांदळे * [[अमृता धोंगडे]] - नेहा * [[मेघना एरंडे]] - राणी * [[वर्षा उसगावकर]] - कावेरी * [[भारत गणेशपुरे]] - चौघुले * [[संजय मोने]] - अण्णा == पुनर्निर्मिती == {|class="wikitable" ! भाषा ! नाव ! वाहिनी ! प्रकाशित |- | [[उडिया]] | सिंदुरा बिंदू | [[झी सार्थक]] | ७ मार्च २०१५ - १५ फेब्रुवारी २०२० |- | [[बंगाली]] | बोकुल कोथा | [[झी बांग्ला]] | ४ डिसेंबर २०१७ - १ फेब्रुवारी २०२० |- | [[तमिळ]] | सत्या | [[झी तमिळ]] | ४ मार्च २०१९ - ९ ऑक्टोबर २०२२ |- | [[तेलुगू]] | सूर्यकांतम | [[झी तेलुगू]] | २२ जुलै २०१९ - ९ नोव्हेंबर २०२४ |- | [[मल्याळम]] | सत्या एन्ना पेनकुट्टी | [[झी केरळम]] | १८ नोव्हेंबर २०१९ - १७ एप्रिल २०२१ |- | [[कन्नड]] | सत्या | [[झी कन्नडा]] | ७ डिसेंबर २०२० - १० ऑगस्ट २०२४ |- | [[हिंदी]] | मीत: बदलेगी दुनिया की रीत | [[झी टीव्ही]] | २३ ऑगस्ट २०२१ - १४ नोव्हेंबर २०२३ |} == नव्या वेळेत == {| class="wikitable sortable" ! क्र. !! दिनांक !! वार !! वेळ |- | १ || १२ फेब्रुवारी २०२४ – ३१ मे २०२५ || rowspan="3"| दररोज || रात्री ९ |- | २ || २ – २९ जून २०२५ || रात्री ९ ते १० (एक तास) |- | ३ || ३० जून २०२५ – चालू || रात्री ९.३० |} == बाह्य दुवे == {{झी मराठी रात्री ९च्या मालिका}} {{झी मराठी रात्री ९.३०च्या मालिका}} [[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] [[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] cvu2s7kj2u9faba1r96wrpjmmck1par रोअरिंग फोर्क नदी 0 346142 2581487 2533358 2025-06-21T05:57:45Z Khirid Harshad 138639 removed [[Category:कॉलोराडो नदी]] - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581487 wikitext text/x-wiki {| class="infobox" ! colspan="2" class="infobox-above" style="background-color: #CEDEFF;" |रोअरिंग फोर्क नदी |- | colspan="2" class="infobox-image" |[[File:Hardwick_Bridge.jpg|250x250अंश]]<div class="infobox-caption">[[कार्बोन्डेल (कॉलोराडो)|कार्बोन्डेल]] आणि [[ग्लेनवूड स्प्रिंग्ज]]<nowiki/>च्या मध्ये असलेला हार्डविक पूल</div> |- | colspan="2" class="infobox-image" |[[File:Roaring_Fork_Colorado_basin_map.png|विनाचौकट]]<div class="infobox-caption">रोअरिंग फोर्क नदीचे पाणलोट क्षेत्र</div> |- ! colspan="2" class="infobox-header" style="background-color: #CEDEFF;" |Location |- style="padding: 0 0.6em 0.2em 0.6em;line-height: 1.2em;" ! class="infobox-label" scope="row" |देश | class="infobox-data" |[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] |- style="padding: 0 0.6em 0.2em 0.6em;line-height: 1.2em;" ! class="infobox-label" scope="row" |राज्य | class="infobox-data" |[[कॉलोराडो]] |- ! colspan="2" class="infobox-header" style="background-color: #CEDEFF;" |माहिती |- style="display:none;" | colspan="2" class="infobox-full-data" |<templatestyles src="Module:Infobox/styles.css"></templatestyles> |- ! class="infobox-label" scope="row" |उगम | class="infobox-data" |[[इन्डिपेन्डन्स लेक (कॉलोराडो)|इन्डिपेन्डन्स लेक]] |- style="padding: 0 0.6em 0.2em 0.6em;line-height: 1.2em;" ! class="infobox-label" scope="row" |<span style="font-weight:normal">&nbsp;•&nbsp;स्थळ</span> | class="infobox-data" |[[व्हाइट रिव्हर राष्ट्रीय वन]], [[पिटकिन काउंटी, कॉलोराडो|पिटकिन काउंटी]] |- style="padding: 0 0.6em 0.2em 0.6em;line-height: 1.2em;" ! class="infobox-label" scope="row" |<span style="font-weight:normal">&nbsp;•&nbsp;गुणक</span> | class="infobox-data" |<templatestyles src="Module:Coordinates/styles.css"></templatestyles><span class="geo-inline"><span class="plainlinks nourlexpansion load-gadget" data-gadget="WikiMiniAtlas">[https://geohack.toolforge.org/geohack.php?pagename=Roaring_Fork_River&params=39_08_38_N_106_34_04_W_ <span class="geo-default"><span class="geo-dms" title="Maps, aerial photos, and other data for this location"><span class="latitude">39°08′38″N</span> <span class="longitude">106°34′04″W</span></span></span><span class="geo-multi-punct"> / </span><span class="geo-nondefault"><span class="geo-dec" title="Maps, aerial photos, and other data for this location">39.14389°N 106.56778°W</span><span style="display:none"> / <span class="geo">39.14389; -106.56778</span></span></span>]</span></span> |- style="padding: 0 0.6em 0.2em 0.6em;line-height: 1.2em;" ! class="infobox-label" scope="row" |<span style="font-weight:normal">&nbsp;•&nbsp;उंची</span> | class="infobox-data" |१२,४९० फू (३,८१० मी) |- style="display:none" | colspan="2" | |- ! class="infobox-label" scope="row" |संगम | class="infobox-data" |[[कॉलोराडो नदी]] |- style="padding: 0 0.6em 0.2em 0.6em;line-height: 1.2em;" ! class="infobox-label" scope="row" |<div style="display:inline;font-weight:normal">&nbsp;•&nbsp;स्थळ</div> | class="infobox-data" |[[ग्लेनवूड स्प्रिंग्ज (कॉलोराडो)|ग्लेनवूड स्प्रिंग्ज]], [[गारफील्ड काउंटी, कॉलोराडो|गारफील्ड काउंटी]] |- style="padding: 0 0.6em 0.2em 0.6em;line-height: 1.2em;" ! class="infobox-label" scope="row" |<div style="display:inline;font-weight:normal">&nbsp;•&nbsp;गुणक</div> | class="infobox-data" |<templatestyles src="Module:Coordinates/styles.css"></templatestyles><span class="geo-inline"><span class="plainlinks nourlexpansion load-gadget" data-gadget="WikiMiniAtlas">[https://geohack.toolforge.org/geohack.php?pagename=Roaring_Fork_River&params=39_32_57_N_107_19_47_W_type:river <span class="geo-default"><span class="geo-dms" title="Maps, aerial photos, and other data for this location"><span class="latitude">39°32′57″N</span> <span class="longitude">107°19′47″W</span></span></span><span class="geo-multi-punct"> / </span><span class="geo-nondefault"><span class="geo-dec" title="Maps, aerial photos, and other data for this location">39.54917°N 107.32972°W</span><span style="display:none"> / <span class="geo">39.54917; -107.32972</span></span></span>]</span></span><indicator name="coordinates"><span id="coordinates">[[Geographic coordinate system|Coordinates]]: <templatestyles src="Module:Coordinates/styles.css"></templatestyles><span class="plainlinks nourlexpansion load-gadget" data-gadget="WikiMiniAtlas">[https://geohack.toolforge.org/geohack.php?pagename=Roaring_Fork_River&params=39_32_57_N_107_19_47_W_type:river <span class="geo-default"><span class="geo-dms" title="Maps, aerial photos, and other data for this location"><span class="latitude">39°32′57″N</span> <span class="longitude">107°19′47″W</span></span></span><span class="geo-multi-punct"> / </span><span class="geo-nondefault"><span class="geo-dec" title="Maps, aerial photos, and other data for this location">39.54917°N 107.32972°W</span><span style="display:none"> / <span class="geo">39.54917; -107.32972</span></span></span>]</span></span></indicator> |- style="padding: 0 0.6em 0.2em 0.6em;line-height: 1.2em;" ! class="infobox-label" scope="row" |<div style="display:inline;font-weight:normal">&nbsp;•&nbsp;उंची</div> | class="infobox-data" |५,७१८ फू(१,७४३ मी) |- style="padding: 0 0.6em 0.2em 0.6em;line-height: 1.2em;" ! class="infobox-label" scope="row" |लांबी | class="infobox-data" |७० मैल (११० किमी) |- ! class="infobox-label" scope="row" |पाणलोट क्षेत्र | class="infobox-data" |१,४५३ मैल<sup>२</sup> (४,७६० किमी<sup>२</sup>)<ref name="nwis">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://wdr.water.usgs.gov/wy2011/pdfs/09085000.2011.pdf|title=USGS Gage #09085000 on the Roaring Fork River at Glenwood Springs, CO|date=1905–2011|website=National Water Information System|publisher=U.S. Geological Survey|access-date=2012-02-27|archive-date=2020-10-31|archive-url=https://web.archive.org/web/20201031011235/https://wdr.water.usgs.gov/wy2011/pdfs/09085000.2011.pdf|url-status=dead}}</ref> |- style="display:none;" | colspan="2" class="infobox-full-data" |<templatestyles src="Module:Infobox/styles.css"></templatestyles> |- style="padding: 0 0.6em 0.2em 0.6em;line-height: 1.2em;" ! class="infobox-label" scope="row" |पाणलोट | class="infobox-data" |  |- style="padding: 0 0.6em 0.2em 0.6em;line-height: 1.2em;" ! class="infobox-label" scope="row" |<span style="font-weight:normal">&nbsp;•&nbsp;स्थळ</span> | class="infobox-data" |संगम<ref name="nwis" /> |- style="padding: 0 0.6em 0.2em 0.6em;line-height: 1.2em;" ! class="infobox-label" scope="row" |<span style="font-weight:normal">&nbsp;•&nbsp;सरासरी</span> | class="infobox-data" |१,२०६ फू<sup>३</sup>/से (३४.२ मी<sup>३</sup>/से)<ref name="nwis" /> |- style="padding: 0 0.6em 0.2em 0.6em;line-height: 1.2em;" ! class="infobox-label" scope="row" |<span style="font-weight:normal">&nbsp;•&nbsp;लघुत्तम</span> | class="infobox-data" |१८० फू<sup>३</sup>/से (५.१ फू<sup>३</sup>/से) |- style="padding: 0 0.6em 0.2em 0.6em;line-height: 1.2em;" ! class="infobox-label" scope="row" |<span style="font-weight:normal">&nbsp;•&nbsp;महत्तम</span> | class="infobox-data" |१३,००० फू<sup>३</sup>/से (३७० फू<sup>३</sup>/से) |- style="display:none" | colspan="2" | |- ! colspan="2" class="infobox-header" style="background-color: #CEDEFF;" |पाणलोट क्षेत्र |- style="padding: 0 0.6em 0.2em 0.6em;line-height: 1.2em;" ! class="infobox-label" scope="row" |उपनद्या | class="infobox-data" |  |- style="padding: 0 0.6em 0.2em 0.6em;line-height: 1.2em;" ! class="infobox-label" scope="row" |<span style="font-weight:normal">&nbsp;•&nbsp;डावीकडून</span> | class="infobox-data" |[[क्रिस्टल नदी (कॉलोराडो)|क्रिस्टल नदी]] |- style="padding: 0 0.6em 0.2em 0.6em;line-height: 1.2em;" ! class="infobox-label" scope="row" |<span style="font-weight:normal">&nbsp;•&nbsp;उजवीकडून</span> | class="infobox-data" |[[फ्राइंगपॅन नदी|फ्राइंगॅन नदी]] |} '''रोअरिंग फोर्क नदी''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कॉलोराडो]] राज्यातील [[कॉलोराडो नदी|कॉलोराडो नदीची]] [[उपनदी]] आहे. ही सुमारे {{Convert|70|mi|km|-1}} लांब असून [[रॉकी माउंटन]] पर्वतरांगेत उगम पावते आणि [[ग्लेनवूड स्प्रिंग्ज]] जवळ कॉलोराडो नदीला मिळते. या नदीच्या पाणलोट क्षेत्रात [[ॲस्पेन (कॉलोराडो)|ॲस्पेनसह]] अनेक गावे व शहरे आहेत. [[चित्र:Roaring_Fork_from_backyard.jpg|डावे|इवलेसे| [[वूडी क्रीक (कॉलोराडो)|वूडी क्रीक]] गावातील घराच्या अंगणातून दिसणारी रोअरिंग फोर्क नदी]] रोअरिंग फोर्क नदी [[पिटकिन काउंटी, कॉलोराडो|पिटकिन काउंटीमध्ये]] रॉकी माउंटनची उपरांग असलेल्या [[सावाच पर्वतरांग|सावाच पर्वतरांगेत]] [[इंडिपेंडन्स पास (कॉलोराडो)|इंडिपेंडन्स पासच्या]] पश्चिमेकडील [[खंडीय विभाजनरेषा|खंडीय विभाजनावर]] [[इन्डिपेन्डन्स लेक (कॉलोराडो)|इन्डिपेन्डन्स लेक]] सरोवरात उगम पावते उगवते. तेथून [[ॲस्पेन (कॉलोराडो)|ॲस्पेन,]] [[वुडी क्रीक (कॉलोराडो)|वूडी क्रीक]] आणि [[स्नोमास (कॉलोराडो)|स्नोमास]] जवळून वायव्येकडे वाहते. [[बेसाल्ट (कॉलोराडो)|बेसाल्ट]] येथे [[फ्राइंगपॅन नदी]] हिला मिळते तर [[कार्बोन्डेल (कॉलोराडो)|कार्बोन्डेलच्या]] {{Convert|1.5|mi|km|0}} दक्षिणेस [[क्रिस्टल नदी (कॉलोराडो)|क्रिस्टल नदी]] मिळते. रोअरिंग फोर्क नदी [[ग्लेनवूड स्प्रिंग्ज (कॉलोराडो)|ग्लेनवूड स्प्रिंग्स]] शहरात कॉलोराडो नदीला मिळते. या नदीचे पाणलोट. हे क्षेत्र {{Convert|1451|sqmi|km2}} असून साधारण आणि [[ऱ्होड आयलंड]] राज्याइतके आहे. नदी तिच्या बहुतेक मार्गावर खोल दरीतून वाहते. यातून [[व्हाइटवॉटर राफ्टिंग]] केले जाते. या नदीतील पाणी रॉकी माउंटनखालून केलेल्या बोगद्यातून खंडीय विभाजनरेषेच्या पूर्वेस आणले जाते व [[ट्विन लेक्स (कॉलोराडो)|ट्विन लेक्स]] सरोवरांमध्ये एकत्रित केले जाते. या नदीतील पाणी अतिशय स्वच्छ पाणी असते. जलद आणि खोल, शक्तिशाली प्रवाह असलेल्या या नदीवरून छोट्या होडक्यांतून प्रवास करता येतो. रोअरिंग फोर्क नदीचा सरासरी वार्षिक प्रवाह {{Convert|1206|cuft/s|m3/s|abbr=on}} आहे.<ref name="nwis"/> == हे सुद्धा पहा == * [[कॉलोराडोमधील नद्या]] * [[कॉलोराडो नदीच्या उपनद्या|कॉलोराडो नदीच्या उपनद्यांची यादी]] == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:कॉलोराडोमधील नद्या]] sn5gkeqwobcv5csi5tw6ixsjd0uk0gy लाखात एक आमचा दादा 0 349140 2581508 2578541 2025-06-21T06:12:35Z CommonsDelinker 685 मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे. 2581508 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम | कार्यक्रम = लाखात एक आमचा दादा | चित्र = | लोगो_चित्र_शीर्षक = | उपशीर्षक = | प्रकार = | निर्माता = [[श्वेता शिंदे]], संजय खांबे | निर्मिती संस्था = वज्र प्रोडक्शन | दिग्दर्शक = | क्रिएटीव्ह दिग्दर्शक = | सूत्रधार = | कलाकार = [[#कलाकार|खाली पहा]] | पंच = | आवाज = | अभिवाचक = | थीम संगीत संगीतकार = | शीर्षकगीत = | अंतिम संगीत = | संगीतकार = | देश = [[भारत]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | वर्ष संख्या = | एपिसोड संख्या = | कार्यकारी निर्माता = | सुपरवायझिंग निर्माता = | असोसिएट निर्माता = | सह निर्माता = | कथा संकलन = | संकलन = | स्थळ = | कॅमेरा = | चालण्याचा वेळ = * दररोज रात्री ८.३० वाजता * दररोज रात्री ९.३० वाजता (२३ डिसेंबरपासून) * दररोज संध्या. ६.३० वाजता (१७ मार्चपासून) | वाहिनी = [[झी मराठी]] | चित्र प्रकार = | ध्वनी प्रकार = | पहिला भाग = | प्रथम प्रसारण = ८ जुलै २०२४ | शेवटचे प्रसारण = चालू | आधी = [[तुला शिकवीन चांगलाच धडा]] | नंतर = [[सावळ्याची जणू सावली]] | सारखे = }} '''लाखात एक आमचा दादा''' ही [[झी मराठी]] वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा [[झी तमिळ]] वरील अण्णा या तमिळ मालिकेवर आधारित आहे. मराठी दूरचित्रवाणीवर पहिल्यांदा या मालिकेचा पूर्वरंग ७ जुलैला प्रसारित करण्यात आला होता. == कलाकार == * [[नितीश चव्हाण]] - सूर्यकांत शंकर जगताप (दादा) ** अथर्व गाडे - लहान सूर्या * दिशा परदेशी / मृण्मयी गोंधळेकर - तुळजा जालिंदर निंबाळकर / तुळजा सूर्यकांत जगताप ** अनन्या तांबे - लहान तुळजा * [[गिरीश ओक]] - जालिंदर निंबाळकर (डॅडी) * अतुल कुडले - शत्रुघ्न जालिंदर निंबाळकर * सुमेधा दातार - शालन जालिंदर निंबाळकर * कल्याणी चौधरी - मालन जालिंदर निंबाळकर * कोमल मोरे - तेजश्री शंकर जगताप / तेजश्री शत्रुघ्न निंबाळकर * प्रकाश टोपे - शंकर जगताप (तात्या) * राजश्री निकम - आशा शंकर जगताप * समृद्धी साळवी - धनश्री शंकर जगताप * ईशा संजय - राजश्री शंकर जगताप * जुई तनपुरे - भाग्यश्री शंकर जगताप * योगेश तनपुरे - शशिकांत सरनोबत * स्वप्नील पवार - सत्यजीत सरनोबत * स्मिता ओक - रंभा सरनोबत * आकाश पाटील - प्रसाद सरनोबत * अधोक्षज कऱ्हाडे - समीर निकम (पिंट्या) * ओंकार कारळे - व्यंकटेश * बिपीन सुर्वे - सिद्धार्थ * शुभम पाटील - दत्तात्रय * अपेक्षा चव्हाण - कामिनी * महेश जाधव - काजू * स्वप्नील कणसे - पुड्या * पुष्पा चौधरी - पुष्पा * सायली माने - पप्पी * शर्वरी धडावाई - यमू * वसु पाटील - सखा * रणजित रणदिवे - नाना * नीलिमा कामणे - नानी * वनराज कुमकर - छत्री == पुनर्निर्मिती == {|class="wikitable" ! भाषा ! नाव ! वाहिनी ! प्रकाशित |- | [[तमिळ]] | अण्णा | [[झी तमिळ]] | २२ मे २०२३ - चालू |- | [[तेलुगू]] | मा अन्नय्या | [[झी तेलुगू]] | २५ मार्च २०२४ - चालू |- | [[कन्नड]] | अन्नय्या | [[झी कन्नडा]] | १२ ऑगस्ट २०२४ - चालू |- | [[बंगाली]] | दादामोणी | [[झी बांग्ला]] | लवकरच... |} == नव्या वेळेत == {| class="wikitable sortable" ! क्र. !! दिनांक !! वार !! वेळ |- | १ || ७ जुलै – २२ डिसेंबर २०२४ || rowspan="3"| दररोज || रात्री ८.३० |- | २ || २३ डिसेंबर २०२४ – १४ मार्च २०२५ || रात्री ९.३० |- | ३ || १७ मार्च २०२५ – चालू || संध्या. ६.३० |} == बाह्य दुवे == {{झी मराठी रात्री ८.३०च्या मालिका}} {{झी मराठी रात्री ९.३०च्या मालिका}} {{झी मराठी संध्या. ६.३०च्या मालिका}} [[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] [[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] fr1t2j61kbwel43qi9xwvocecpb1p01 सदस्य:Vykati 2 349142 2581326 2414699 2025-06-20T14:54:33Z Vykati 164324 2581326 wikitext text/x-wiki [https://youtube.com/@75.14?si=0NigSSd3sy7ghvtJ Venkati Ankulwar] अंकुलवार किनवट तालुका जिल्हा नांदेड राहणार बोधडी खुर्द🙏 an5dd1rkd4vlgk395qadba81epk7m3r सावळ्याची जणू सावली 0 351821 2581504 2579758 2025-06-21T06:11:45Z CommonsDelinker 685 मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे. 2581504 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम | कार्यक्रम = सावळ्याची जणू सावली | चित्र = | लोगो_चित्र_शीर्षक = | उपशीर्षक = | प्रकार = | निर्माता = [[महेश कोठारे]], [[आदिनाथ कोठारे]] | निर्मिती संस्था = कोठारे प्रोडक्शन | दिग्दर्शक = | क्रिएटीव्ह दिग्दर्शक = | सूत्रधार = | कलाकार = [[#कलाकार|खाली पहा]] | पंच = | आवाज = | अभिवाचक = | थीम संगीत संगीतकार = | शीर्षकगीत = | अंतिम संगीत = | संगीतकार = | देश = [[भारत]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | वर्ष संख्या = | एपिसोड संख्या = | कार्यकारी निर्माता = | सुपरवायझिंग निर्माता = | असोसिएट निर्माता = | सह निर्माता = | कथा संकलन = | संकलन = | स्थळ = | कॅमेरा = | चालण्याचा वेळ = दररोज संध्या. ७ वाजता | वाहिनी = [[झी मराठी]] | चित्र प्रकार = | ध्वनी प्रकार = | पहिला भाग = | प्रथम प्रसारण = २३ सप्टेंबर २०२४ | शेवटचे प्रसारण = चालू | आधी = [[अप्पी आमची कलेक्टर]] | नंतर = [[पारू (मालिका)|पारू]] | सारखे = }} '''सावळ्याची जणू सावली''' ही [[झी मराठी]]वर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा [[झी बांग्ला]]वरील कृष्णकोळी या बंगाली मालिकेवर आधारित आहे. == कलाकार == * प्राप्ती रेडकर - सावली एकनाथ भागवत / सावली सारंग मेहेंदळे ** दुर्वा देवधर - लहान साऊ * साईंकीत कामत - सारंग चंद्रकांत मेहेंदळे * [[सुलेखा तळवलकर]] - तिलोत्तमा चंद्रकांत मेहेंदळे * [[वीणा जगताप]] - ऐश्वर्या नील मेहेंदळे * [[मेघा धाडे]] - भैरवी वझे * [[पुष्कर जोग]] - श्रीरंग * भाग्यश्री दळवी - तारा वझे * रमेश रोकडे - एकनाथ भागवत * पूनम चौधरी-पाटील - कान्हू एकनाथ भागवत * सर्वेश जाधव - अप्पू एकनाथ भागवत * रोहन पेडणेकर - सखदेव एकनाथ भागवत * गौरी किरण - जयंती सखदेव भागवत * आशिष कुलकर्णी - राजकुमार चंद्रकांत मेहेंदळे * मानसी नाईक - अमृता राजकुमार मेहेंदळे * सुप्रीत कदम - नील चंद्रकांत मेहेंदळे * गुरू दिवेकर - सोहम चंद्रकांत मेहेंदळे * [[नागेश भोसले]] - विश्वंभर ठाकूर * अक्षता उकिरडे - कियारा विश्वंभर ठाकूर * स्नेहलता माघाडे - अस्मी प्रधान * मयूर खांडगे - जगन्नाथ शास्त्री * अमृता मोडक - अलका जगन्नाथ शास्त्री * मयूर पवार - बबलू * निषाद भोईर - देवा * मुकेश जाधव - घोरपडे * अक्षय पाटील - आकार * राजेश भोसले * बीना सिद्धार्थ == पुनर्निर्मिती == {|class="wikitable" ! भाषा ! नाव ! वाहिनी ! प्रकाशित |- | [[बंगाली]] | कृष्णकोळी | [[झी बांग्ला]] | १८ जून २०१८ - ९ जानेवारी २०२२ |- | [[तेलुगू]] | कृष्ण तुलसी | [[झी तेलुगू]] | २२ फेब्रुवारी २०२१ - २६ नोव्हेंबर २०२२ |- | [[भोजपुरी]] | श्याम तुलसी | [[झी गंगा]] | २० सप्टेंबर २०२१ - २९ जुलै २०२२ |- | [[तमिळ]] | कार्थिगाई दीपम | [[झी तमिळ]] | ५ डिसेंबर २०२२ - चालू |- | [[मल्याळम]] | श्यामंबरम | [[झी केरळम]] | ६ फेब्रुवारी २०२३ - चालू |} == बाह्य दुवे == {{झी मराठी संध्या. ७च्या मालिका}} [[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] [[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] 1pfz19dtmqgoq0miw1e6qwk4x0puaih लक्ष्मी निवास 0 354506 2581507 2579530 2025-06-21T06:12:19Z CommonsDelinker 685 मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे. 2581507 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम | कार्यक्रम = लक्ष्मी निवास | चित्र = | लोगो_चित्र_शीर्षक = | उपशीर्षक = | प्रकार = | निर्माता = सुनील भोसले | निर्मिती संस्था = क्रिएटिव्ह माइंड्स प्रोडक्शन | दिग्दर्शक = | क्रिएटीव्ह दिग्दर्शक = | सूत्रधार = | कलाकार = [[#कलाकार|खाली पहा]] | पंच = | आवाज = | अभिवाचक = | थीम संगीत संगीतकार = | शीर्षकगीत = | अंतिम संगीत = | संगीतकार = | देश = [[भारत]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | वर्ष संख्या = | एपिसोड संख्या = | कार्यकारी निर्माता = | सुपरवायझिंग निर्माता = | असोसिएट निर्माता = | सह निर्माता = | कथा संकलन = | संकलन = | स्थळ = | कॅमेरा = | चालण्याचा वेळ = दररोज रात्री ८ ते ९ (१ तास) | वाहिनी = [[झी मराठी]] | चित्र प्रकार = | ध्वनी प्रकार = | पहिला भाग = | प्रथम प्रसारण = २३ डिसेंबर २०२४ | शेवटचे प्रसारण = चालू | आधी = [[पारू (मालिका)|पारू]] | नंतर = [[शिवा (मालिका)|शिवा]] | सारखे = }} '''लक्ष्मी निवास''' ही [[झी मराठी]] वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा [[झी कन्नडा]]वरील लक्ष्मी निवासा या कन्नड मालिकेवर आधारित आहे. == कलाकार == * [[हर्षदा खानविलकर]] - लक्ष्मी श्रीनिवास दळवी * [[तुषार दळवी]] - श्रीनिवास दळवी * अक्षया देवधर - भावना श्रीनिवास दळवी / भावना सिद्धीराज गाडे-पाटील * दिव्या पुगांवकर - जान्हवी श्रीनिवास दळवी / जान्हवी जयंत कानिटकर * स्वाती देवल - मंगल श्रीनिवास दळवी * निखिल राजेशिर्के - संतोष श्रीनिवास दळवी * मीनाक्षी राठोड - वीणा संतोष दळवी * अनुज ठाकरे - हरीश श्रीनिवास दळवी * तन्वी कोलते - सिंचना संपत गाडे-पाटील / सिंचना हरीश दळवी * पायल पांडे - आरती वेंकी दळवी * महेश फाळके - वेंकी श्रीनिवास दळवी * विनीता शिंदे - शांता दळवी * कुणाल शुक्ल - सिद्धीराज संपत गाडे-पाटील * [[मेघन जाधव]] - जयंत कानिटकर * [[पल्लवी वैद्य]] - रेणुका संपत गाडे-पाटील * राजदेव जमदाडे - संपत गाडे-पाटील * आनंद प्रभू - अधिराज संपत गाडे-पाटील * कल्याणी जाधव - निलांबरी अधिराज गाडे-पाटील * [[राजेश शृंगारपुरे]] - श्रीकांत इनामदार * राधिका विद्यासागर - वनजा इनामदार * अनन्या तांबे - आनंदी श्रीकांत इनामदार * कस्तुरी सारंग - सरोज मुकादम * सुप्रीती शिवलकर - सुपर्णा रवी मुकादम * [[दुष्यंत वाघ]] - रवी मुकादम * जगन्नाथ निवांगुणे - दिग्विजय देशमुख * श्रद्धा साटम - ललिता दिग्विजय देशमुख * अनुज प्रभू - विश्वा दिग्विजय देशमुख * सतीश सलगरे - गुणाजी भालेराव * जान्हवी तांबट - पूर्वी गुणाजी भालेराव * चंदनराज जमदाडे - प्रवीण खेडकर * [[अमृता देशमुख]] - सई * प्रसाद राजेंद्र - सुरेश * ऋषिकेश मोहिते - महेश * सुनील कदम - रमेश * चैतन्य चंद्रात्रे - निखिल * धनंजय जामदार - सोहम * तेजस पिंगुळकर - मनोहर * वर्षा सामंत - मालती * लीना पंडित - रत्ना * प्रफुल्ल सामंत * वीणा कट्टी == पुनर्निर्मिती == {|class="wikitable" ! भाषा ! नाव ! वाहिनी ! प्रकाशित |- | [[कन्नड]] | लक्ष्मी निवासा | [[झी कन्नडा]] | १६ जानेवारी २०२४ - चालू |- | [[मल्याळम]] | मनाथे कोट्टारम | [[झी केरळम]] | १२ ऑगस्ट २०२४ - चालू |- | [[तमिळ]] | गेट्टी मेलम | [[झी तमिळ]] | २० जानेवारी २०२५ - चालू |- | [[तेलुगू]] | लक्ष्मी निवासम | [[झी तेलुगू]] | ३ मार्च २०२५ - चालू |} == बाह्य दुवे == {{झी मराठी रात्री ८च्या मालिका}} [[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] [[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] h4y6rd14tf10f03f9qhnq4fikxb02ar अनुप अग्रवाल (राजकारणी) 0 357793 2581526 2504794 2025-06-21T06:48:55Z 2409:40C2:5059:25E6:8000:0:0:0 2581526 wikitext text/x-wiki '''अनुप ओमप्रकाश अग्रवाल''' हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४|२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत]] [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाकडून]] [[धुळे शहर विधानसभा मतदारसंघ|धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून]] [[महाराष्ट्राची पंधरावी विधानसभा|महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर]] निवडून गेले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/elections/assembly/story/dhule-city-maharashtra-assembly-election-results-2024-live-updates-maelb-2638102-2024-11-23|title=Dhule City, Maharashtra Assembly Election Results 2024 Highlights: BJP's Anup Agrawal defeats AIMIM's Shah Faruk Anwar with 27890 votes|date=2024-11-23|website=India Today|language=en|access-date=2024-11-23}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/elections/dhule-city-election-result-2024-live-leading-winner-mla-9129951.html|title=Dhule City Election Result 2024 LIVE: Agrawal Anupbhaiyya Omprakash of BJP Wins|website=News18|language=en|access-date=2024-11-23}}</ref> <ref name="Dhule City, Maharashtra Assembly Election Results 2024 Highlights: BJP's Anup Agrawal wins Dhule City with 116538 votes">{{स्रोत बातमी|last=India Today|url=https://www.indiatoday.in/elections/assembly/story/dhule-city-maharashtra-assembly-election-results-2024-live-updates-maelb-2638102-2024-11-23|title=Dhule City, Maharashtra Assembly Election Results 2024 Highlights: BJP's Anup Agrawal wins Dhule City with 116538 votes|date=23 November 2024|language=en|access-date=24 November 2024|archive-url=https://web.archive.org/web/20241124111338/https://www.indiatoday.in/elections/assembly/story/dhule-city-maharashtra-assembly-election-results-2024-live-updates-maelb-2638102-2024-11-23|archive-date=24 November 2024}}</ref> <ref name="Dhule city election results: BJP's Agrawal Anupbhaiyya Omprakash defeats AIMIM'S Shah Faruk Anwar by 45,750 votes">{{स्रोत बातमी|last=The Times of India|url=https://timesofindia.indiatimes.com/india/maharashtra-election-live-updates-dhule-city-election-results-bjp-agrawal-anupbhaiyya-omprakash-aimim-shah-faruk-anwar-shiv-sena-ubt-anil-anna-gote/articleshow/115595556.cms|title=Dhule city election results: BJP's Agrawal Anupbhaiyya Omprakash defeats AIMIM'S Shah Faruk Anwar by 45,750 votes|date=23 November 2024|access-date=24 November 2024|archive-url=https://web.archive.org/web/20241124111517/https://timesofindia.indiatimes.com/india/maharashtra-election-live-updates-dhule-city-election-results-bjp-agrawal-anupbhaiyya-omprakash-aimim-shah-faruk-anwar-shiv-sena-ubt-anil-anna-gote/articleshow/115595556.cms|archive-date=24 November 2024}}</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:धुळे शहरचे आमदार]] [[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]] [[वर्ग:महाराष्ट्रातील राजकारणी]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 5nusso6bi0kf0uv8unznh3q5l768qq6 संजय कपूर (उद्योजक) 0 366601 2581408 2581087 2025-06-21T02:42:58Z संतोष गोरे 135680 2581408 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''संजय कपूर''' ([[१५ ऑक्टोबर]], [[इ.स. १९७१|१९७१]] - [[१२ जून]], [[इ.स. २०२५|२०२५]]) हे एक [[भारतीय नागरिक|भारतीय वंशाचे]] बहुराष्ट्रीय उद्योगपती आणि अब्जाधीश होते. कपूर हे वाहनांचे सुटेभाग बनवणारी कंपनी सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. याच सोबत त्यांनी ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एसीएमए) चे अध्यक्षपद देखील भूषवले होते. [[प्रिन्स विल्यम]] यांचे जवळचे मित्र तसेच सोना ग्रुपचे संस्थापक उद्योगपती डॉ. सुरिंदर कपूर यांचे ते पुत्र अशी त्यांची ओळख होती.<ref name="लाइव्ह मिंट">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.livemint.com/entertainment/karisma-kapoor-in-white-heads-to-delhi-with-kids-samaira-and-kiaan-for-ex-husband-sunjay-kapurs-funeral-watch-11750308452364.html |title=Karisma Kapoor heads to Delhi with kids for ex-husband Sunjay Kapur's funeral, Kareena Kapoor and Saif Ali Khan join |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ= |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> == वैयक्तिक आयुष्य == संजय कपूर यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९७१ रोजी राणी कपूर आणि सुरिंदर कपूर यांच्या घरी दिल्ली<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.abplive.com/entertainment/bollywood/who-was-sanjay-kapur-karisma-kapoor-ex-husband-business-education-polo-player-know-everything-2961538 |title=बिजनेस वर्ल्ड के टाइकून्स में से एक थे करिश्मा कपूर के एक्स हसबैंड संजय कपूर, जानें एजुकेशन से प्रोफेशन तक सबकुछ |लेखक= |दिनांक=१९ जून २०२५ |संकेतस्थळ=एबीपी लाइव्ह|प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> येथे झाला.<ref name="toi">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/who-was-sunjay-kapur-karisma-kapoors-ex-husband-businessman-with-degrees-from-mit-and-harvard-and-polo-enthusiast/articleshow/121814960.cms |title= Who was Sunjay Kapur? Karisma Kapoor’s ex-husband, businessman with degrees from MIT and Harvard, and polo enthusiast |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=टाइम्स ऑफ इंडिया |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.nytimes.com/2025/06/13/business/sunjay-kapur-dead.html |title= Sunjay Kapur, Businessman and Ex-Husband of Bollywood Star, Dies at 53 |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=The New York Times |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कपूर हे उच्चशिक्षित होते. त्यांनी प्रथम देहरादून येथील [[द डून स्कूल]]मधून आणि नंतर मुंबईतील द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले. त्यांनी लंडनमधून कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि एचआरमध्ये बीबीए केले. यानंतर त्यांनी एमआयटी आणि [[हार्वर्ड बिझनेस स्कूल]]मधून प्रतिष्ठित एक्झिक्युटिव्ह कोर्सेस केले.<ref name="toi" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.jansatta.com/entertainment/who-was-sunjay-kapoor-knows-karishma-kapoor-ex-husband-married-life-child-business-education-family-tree/4005381/ |title= कौन थे संजय कपूर? जानिए करिश्मा के एक्स हसबैंड की वाइफ और बच्चों के बारे में सबकुछ |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=जनसत्ता |प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कपूर हे ऑटो कंपोनेंट बनवणाऱ्या सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. या कंपनीची स्थापना १९९७ मध्ये त्यांचे दिवंगत वडील सुरिंदर कपूर यांनी केली होती, जे भारतातील ऑटो कंपोनंट उद्योगातील एक अग्रणी होते. २०१५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर संजयने व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारली. सोना कॉमस्टारचे भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत नऊ कारखाने आहेत. हे इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी सुटे भाग पुरवते.<ref name="forbs">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.forbes.com/profile/sunjay-kapur/ |title=Sunjay Kapur |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=फोर्ब्स |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> अमेरिकन नागरिकत्व असलेल्या संजय यांनी २०२२ मध्ये जगातील अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले. फोर्ब्सच्या मते, त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची एकूण संपत्ती १.२ अब्ज डॉलर्स (म्हणजेच ₹ १०,३०० कोटी) होती. यातील मोठा वाटा गुरुग्राम येथील मुख्यालय असलेल्या सोना कॉमस्टारकडून येतो. ही कंपनी १२ उत्पादनांची निर्मिती करते. ही कंपनी भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत ५,००० हून अधिक लोकांना रोजगार पुरवते.<ref name="forbs" /><ref name="लाइव्ह मिंट२">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.livemint.com/companies/company-results/trent-investor-meeting-zudio-westside-star-bazaar-growth-target-dmart-max-fashion-reliance-retail-apparel-market-11750318478081.html |title=How much will Karisma Kapoor and Sunjay Kapur's children inherit of billionaire's ₹10,300 crore wealth? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=livemint |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> === वैवाहिक आयुष्य === कपूर यांचे पहिले लग्न दिल्लीतील डिझायनर-स्टायलिस्ट नंदिता महतानीशी १९९६ मध्ये झाले आणि २००० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. २००३ मध्ये त्यांनी करिश्मा कपूरशी लग्न केले. या जोडीला दोन मुले झाली, पैकी २००५ मध्ये मुलगी समायरा आणि २०११ मध्ये मुलगा कियान यांचा जन्म झाला होता. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर संजय आणि करिश्मा अधिकृतपणे २०१६ मध्ये वेगळे झाले. कपूर यांचा तिसरा विवाह प्रिया सचदेव सोबत २०१७ साली झाला. या जोडप्याला एक मुलगा अजारियस जन्माला आले.<ref name="लाइव्ह मिंट" /><ref name="लाइव्ह मिंट२" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.hindustantimes.com/entertainment/bollywood/who-is-sunjay-kapurs-wife-priya-sachdev-socialite-turned-actor-once-shared-screen-with-kareena-kapoor-karisma-kapoor-101749785157528.html |title=Who is Sunjay Kapur's wife Priya Sachdev? Socialite-turned actor once shared screen with Kareena Kapoor |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=हिंदुस्तान टाइम्स |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> == मृत्यू == १२ जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो सामन्यादरम्यान कोसळून त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते ५३ वर्षांचे होते. पोलो खेळत असताना मधमाशी गिळल्याने त्याचा अचानक मृत्यू झाल्याचे टेलिग्राफने वृत्त दिले आहे. एक मधमाशी अनवधानाने त्याच्या तोंडात शिरून चावल्याने त्यांना अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक आला होता.<ref name="लाइव्ह मिंट"/> == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == {{कॉमन्स वर्ग|Sunjay Kapur|संजय कपूर}} {{DEFAULTSORT:कपूर, संजय}} [[वर्ग:भारतीय उद्योगपती]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:इ.स. १९७१ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. २०२५ मधील मृत्यू]] [[वर्ग:अमेरिकन व्यक्ती]] s6t4mgsobyeg3gijk67cb3ew8cyi33a 2581409 2581408 2025-06-21T02:46:05Z संतोष गोरे 135680 2581409 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''संजय कपूर''' ([[१५ ऑक्टोबर]], [[इ.स. १९७१|१९७१]] - [[१२ जून]], [[इ.स. २०२५|२०२५]]) हे एक [[भारतीय नागरिक|भारतीय वंशाचे]] बहुराष्ट्रीय उद्योगपती आणि अब्जाधीश होते. कपूर हे वाहनांचे सुटेभाग बनवणारी कंपनी सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. याच सोबत त्यांनी ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एसीएमए) चे अध्यक्षपद देखील भूषवले होते. चित्रपट अभिनेत्री [[करिश्मा कपूर]]चे घटस्फोटीत पती, [[प्रिन्स विल्यम]] यांचे जवळचे मित्र तसेच सोना ग्रुपचे संस्थापक उद्योगपती डॉ. सुरिंदर कपूर यांचे ते पुत्र अशी त्यांची ओळख होती.<ref name="लाइव्ह मिंट">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.livemint.com/entertainment/karisma-kapoor-in-white-heads-to-delhi-with-kids-samaira-and-kiaan-for-ex-husband-sunjay-kapurs-funeral-watch-11750308452364.html |title=Karisma Kapoor heads to Delhi with kids for ex-husband Sunjay Kapur's funeral, Kareena Kapoor and Saif Ali Khan join |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ= |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> == वैयक्तिक आयुष्य == संजय कपूर यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९७१ रोजी राणी कपूर आणि सुरिंदर कपूर यांच्या घरी दिल्ली<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.abplive.com/entertainment/bollywood/who-was-sanjay-kapur-karisma-kapoor-ex-husband-business-education-polo-player-know-everything-2961538 |title=बिजनेस वर्ल्ड के टाइकून्स में से एक थे करिश्मा कपूर के एक्स हसबैंड संजय कपूर, जानें एजुकेशन से प्रोफेशन तक सबकुछ |लेखक= |दिनांक=१९ जून २०२५ |संकेतस्थळ=एबीपी लाइव्ह|प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> येथे झाला.<ref name="toi">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/who-was-sunjay-kapur-karisma-kapoors-ex-husband-businessman-with-degrees-from-mit-and-harvard-and-polo-enthusiast/articleshow/121814960.cms |title= Who was Sunjay Kapur? Karisma Kapoor’s ex-husband, businessman with degrees from MIT and Harvard, and polo enthusiast |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=टाइम्स ऑफ इंडिया |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.nytimes.com/2025/06/13/business/sunjay-kapur-dead.html |title= Sunjay Kapur, Businessman and Ex-Husband of Bollywood Star, Dies at 53 |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=The New York Times |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कपूर हे उच्चशिक्षित होते. त्यांनी प्रथम देहरादून येथील [[द डून स्कूल]]मधून आणि नंतर मुंबईतील द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले. त्यांनी लंडनमधून कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि एचआरमध्ये बीबीए केले. यानंतर त्यांनी एमआयटी आणि [[हार्वर्ड बिझनेस स्कूल]]मधून प्रतिष्ठित एक्झिक्युटिव्ह कोर्सेस केले.<ref name="toi" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.jansatta.com/entertainment/who-was-sunjay-kapoor-knows-karishma-kapoor-ex-husband-married-life-child-business-education-family-tree/4005381/ |title= कौन थे संजय कपूर? जानिए करिश्मा के एक्स हसबैंड की वाइफ और बच्चों के बारे में सबकुछ |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=जनसत्ता |प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कपूर हे ऑटो कंपोनेंट बनवणाऱ्या सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. या कंपनीची स्थापना १९९७ मध्ये त्यांचे दिवंगत वडील सुरिंदर कपूर यांनी केली होती, जे भारतातील ऑटो कंपोनंट उद्योगातील एक अग्रणी होते. २०१५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर संजयने व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारली. सोना कॉमस्टारचे भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत नऊ कारखाने आहेत. हे इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी सुटे भाग पुरवते.<ref name="forbs">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.forbes.com/profile/sunjay-kapur/ |title=Sunjay Kapur |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=फोर्ब्स |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> अमेरिकन नागरिकत्व असलेल्या संजय यांनी २०२२ मध्ये जगातील अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले. फोर्ब्सच्या मते, त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची एकूण संपत्ती १.२ अब्ज डॉलर्स (म्हणजेच ₹ १०,३०० कोटी) होती. यातील मोठा वाटा गुरुग्राम येथील मुख्यालय असलेल्या सोना कॉमस्टारकडून येतो. ही कंपनी १२ उत्पादनांची निर्मिती करते. ही कंपनी भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत ५,००० हून अधिक लोकांना रोजगार पुरवते.<ref name="forbs" /><ref name="लाइव्ह मिंट२">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.livemint.com/companies/company-results/trent-investor-meeting-zudio-westside-star-bazaar-growth-target-dmart-max-fashion-reliance-retail-apparel-market-11750318478081.html |title=How much will Karisma Kapoor and Sunjay Kapur's children inherit of billionaire's ₹10,300 crore wealth? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=livemint |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> === वैवाहिक आयुष्य === कपूर यांचे पहिले लग्न दिल्लीतील डिझायनर-स्टायलिस्ट नंदिता महतानीशी १९९६ मध्ये झाले आणि २००० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. २००३ मध्ये त्यांनी करिश्मा कपूरशी लग्न केले. या जोडीला दोन मुले झाली, पैकी २००५ मध्ये मुलगी समायरा आणि २०११ मध्ये मुलगा कियान यांचा जन्म झाला होता. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर संजय आणि करिश्मा अधिकृतपणे २०१६ मध्ये वेगळे झाले. कपूर यांचा तिसरा विवाह प्रिया सचदेव सोबत २०१७ साली झाला. या जोडप्याला एक मुलगा अजारियस जन्माला आले.<ref name="लाइव्ह मिंट" /><ref name="लाइव्ह मिंट२" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.hindustantimes.com/entertainment/bollywood/who-is-sunjay-kapurs-wife-priya-sachdev-socialite-turned-actor-once-shared-screen-with-kareena-kapoor-karisma-kapoor-101749785157528.html |title=Who is Sunjay Kapur's wife Priya Sachdev? Socialite-turned actor once shared screen with Kareena Kapoor |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=हिंदुस्तान टाइम्स |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> == मृत्यू == १२ जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो सामन्यादरम्यान कोसळून त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते ५३ वर्षांचे होते. पोलो खेळत असताना मधमाशी गिळल्याने त्याचा अचानक मृत्यू झाल्याचे टेलिग्राफने वृत्त दिले आहे. एक मधमाशी अनवधानाने त्याच्या तोंडात शिरून चावल्याने त्यांना अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक आला होता.<ref name="लाइव्ह मिंट"/> == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == {{कॉमन्स वर्ग|Sunjay Kapur|संजय कपूर}} {{DEFAULTSORT:कपूर, संजय}} [[वर्ग:भारतीय उद्योगपती]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:इ.स. १९७१ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. २०२५ मधील मृत्यू]] [[वर्ग:अमेरिकन व्यक्ती]] cj5s19yfvoyb45hjwa9l4ea33grpj78 2581410 2581409 2025-06-21T02:47:15Z संतोष गोरे 135680 2581410 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''संजय कपूर''' ([[१५ ऑक्टोबर]], [[इ.स. १९७१|१९७१]] - [[१२ जून]], [[इ.स. २०२५|२०२५]]) हे एक [[भारतीय नागरिक|भारतीय वंशाचे]] बहुराष्ट्रीय उद्योगपती आणि अब्जाधीश होते. कपूर हे वाहनांचे सुटेभाग बनवणारी कंपनी सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. याच सोबत त्यांनी ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एसीएमए) चे अध्यक्षपद देखील भूषवले होते. चित्रपट अभिनेत्री [[करिश्मा कपूर]]चे घटस्फोटीत पती, [[वेल्सचा राजकुमार विल्यम|प्रिन्स विल्यम]] यांचे जवळचे मित्र तसेच सोना ग्रुपचे संस्थापक उद्योगपती डॉ. सुरिंदर कपूर यांचे ते पुत्र अशी त्यांची ओळख होती.<ref name="लाइव्ह मिंट">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.livemint.com/entertainment/karisma-kapoor-in-white-heads-to-delhi-with-kids-samaira-and-kiaan-for-ex-husband-sunjay-kapurs-funeral-watch-11750308452364.html |title=Karisma Kapoor heads to Delhi with kids for ex-husband Sunjay Kapur's funeral, Kareena Kapoor and Saif Ali Khan join |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ= |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> == वैयक्तिक आयुष्य == संजय कपूर यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९७१ रोजी राणी कपूर आणि सुरिंदर कपूर यांच्या घरी दिल्ली<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.abplive.com/entertainment/bollywood/who-was-sanjay-kapur-karisma-kapoor-ex-husband-business-education-polo-player-know-everything-2961538 |title=बिजनेस वर्ल्ड के टाइकून्स में से एक थे करिश्मा कपूर के एक्स हसबैंड संजय कपूर, जानें एजुकेशन से प्रोफेशन तक सबकुछ |लेखक= |दिनांक=१९ जून २०२५ |संकेतस्थळ=एबीपी लाइव्ह|प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> येथे झाला.<ref name="toi">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/who-was-sunjay-kapur-karisma-kapoors-ex-husband-businessman-with-degrees-from-mit-and-harvard-and-polo-enthusiast/articleshow/121814960.cms |title= Who was Sunjay Kapur? Karisma Kapoor’s ex-husband, businessman with degrees from MIT and Harvard, and polo enthusiast |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=टाइम्स ऑफ इंडिया |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.nytimes.com/2025/06/13/business/sunjay-kapur-dead.html |title= Sunjay Kapur, Businessman and Ex-Husband of Bollywood Star, Dies at 53 |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=The New York Times |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कपूर हे उच्चशिक्षित होते. त्यांनी प्रथम देहरादून येथील [[द डून स्कूल]]मधून आणि नंतर मुंबईतील द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले. त्यांनी लंडनमधून कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि एचआरमध्ये बीबीए केले. यानंतर त्यांनी एमआयटी आणि [[हार्वर्ड बिझनेस स्कूल]]मधून प्रतिष्ठित एक्झिक्युटिव्ह कोर्सेस केले.<ref name="toi" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.jansatta.com/entertainment/who-was-sunjay-kapoor-knows-karishma-kapoor-ex-husband-married-life-child-business-education-family-tree/4005381/ |title= कौन थे संजय कपूर? जानिए करिश्मा के एक्स हसबैंड की वाइफ और बच्चों के बारे में सबकुछ |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=जनसत्ता |प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कपूर हे ऑटो कंपोनेंट बनवणाऱ्या सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. या कंपनीची स्थापना १९९७ मध्ये त्यांचे दिवंगत वडील सुरिंदर कपूर यांनी केली होती, जे भारतातील ऑटो कंपोनंट उद्योगातील एक अग्रणी होते. २०१५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर संजयने व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारली. सोना कॉमस्टारचे भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत नऊ कारखाने आहेत. हे इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी सुटे भाग पुरवते.<ref name="forbs">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.forbes.com/profile/sunjay-kapur/ |title=Sunjay Kapur |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=फोर्ब्स |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> अमेरिकन नागरिकत्व असलेल्या संजय यांनी २०२२ मध्ये जगातील अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले. फोर्ब्सच्या मते, त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची एकूण संपत्ती १.२ अब्ज डॉलर्स (म्हणजेच ₹ १०,३०० कोटी) होती. यातील मोठा वाटा गुरुग्राम येथील मुख्यालय असलेल्या सोना कॉमस्टारकडून येतो. ही कंपनी १२ उत्पादनांची निर्मिती करते. ही कंपनी भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत ५,००० हून अधिक लोकांना रोजगार पुरवते.<ref name="forbs" /><ref name="लाइव्ह मिंट२">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.livemint.com/companies/company-results/trent-investor-meeting-zudio-westside-star-bazaar-growth-target-dmart-max-fashion-reliance-retail-apparel-market-11750318478081.html |title=How much will Karisma Kapoor and Sunjay Kapur's children inherit of billionaire's ₹10,300 crore wealth? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=livemint |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> === वैवाहिक आयुष्य === कपूर यांचे पहिले लग्न दिल्लीतील डिझायनर-स्टायलिस्ट नंदिता महतानीशी १९९६ मध्ये झाले आणि २००० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. २००३ मध्ये त्यांनी करिश्मा कपूरशी लग्न केले. या जोडीला दोन मुले झाली, पैकी २००५ मध्ये मुलगी समायरा आणि २०११ मध्ये मुलगा कियान यांचा जन्म झाला होता. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर संजय आणि करिश्मा अधिकृतपणे २०१६ मध्ये वेगळे झाले. कपूर यांचा तिसरा विवाह प्रिया सचदेव सोबत २०१७ साली झाला. या जोडप्याला एक मुलगा अजारियस जन्माला आले.<ref name="लाइव्ह मिंट" /><ref name="लाइव्ह मिंट२" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.hindustantimes.com/entertainment/bollywood/who-is-sunjay-kapurs-wife-priya-sachdev-socialite-turned-actor-once-shared-screen-with-kareena-kapoor-karisma-kapoor-101749785157528.html |title=Who is Sunjay Kapur's wife Priya Sachdev? Socialite-turned actor once shared screen with Kareena Kapoor |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=हिंदुस्तान टाइम्स |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> == मृत्यू == १२ जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो सामन्यादरम्यान कोसळून त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते ५३ वर्षांचे होते. पोलो खेळत असताना मधमाशी गिळल्याने त्याचा अचानक मृत्यू झाल्याचे टेलिग्राफने वृत्त दिले आहे. एक मधमाशी अनवधानाने त्याच्या तोंडात शिरून चावल्याने त्यांना अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक आला होता.<ref name="लाइव्ह मिंट"/> == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == {{कॉमन्स वर्ग|Sunjay Kapur|संजय कपूर}} {{DEFAULTSORT:कपूर, संजय}} [[वर्ग:भारतीय उद्योगपती]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:इ.स. १९७१ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. २०२५ मधील मृत्यू]] [[वर्ग:अमेरिकन व्यक्ती]] o1ybs6jlj172ey1iumn7q3erhazahzr 2581411 2581410 2025-06-21T02:50:54Z संतोष गोरे 135680 2581411 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''संजय कपूर''' ([[१५ ऑक्टोबर]], [[इ.स. १९७१|१९७१]] - [[१२ जून]], [[इ.स. २०२५|२०२५]]) हे एक [[भारतीय नागरिक|भारतीय वंशाचे]] बहुराष्ट्रीय उद्योगपती आणि अब्जाधीश होते. कपूर हे वाहनांचे सुटेभाग बनवणारी कंपनी सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. याच सोबत त्यांनी ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एसीएमए) चे अध्यक्षपद देखील भूषवले होते. चित्रपट अभिनेत्री [[करिश्मा कपूर]]चे घटस्फोटीत पती, [[वेल्सचा राजकुमार विल्यम|प्रिन्स विल्यम]] यांचे जवळचे मित्र तसेच सोना ग्रुपचे संस्थापक उद्योगपती डॉ. सुरिंदर कपूर यांचे ते पुत्र अशी त्यांची ओळख होती.<ref name="लाइव्ह मिंट">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.livemint.com/entertainment/karisma-kapoor-in-white-heads-to-delhi-with-kids-samaira-and-kiaan-for-ex-husband-sunjay-kapurs-funeral-watch-11750308452364.html |title=Karisma Kapoor heads to Delhi with kids for ex-husband Sunjay Kapur's funeral, Kareena Kapoor and Saif Ali Khan join |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ= |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> == वैयक्तिक आयुष्य == संजय कपूर यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९७१ रोजी राणी कपूर आणि सुरिंदर कपूर यांच्या घरी दिल्ली<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.abplive.com/entertainment/bollywood/who-was-sanjay-kapur-karisma-kapoor-ex-husband-business-education-polo-player-know-everything-2961538 |title=बिजनेस वर्ल्ड के टाइकून्स में से एक थे करिश्मा कपूर के एक्स हसबैंड संजय कपूर, जानें एजुकेशन से प्रोफेशन तक सबकुछ |लेखक= |दिनांक=१९ जून २०२५ |संकेतस्थळ=एबीपी लाइव्ह|प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> येथे झाला.<ref name="toi">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/who-was-sunjay-kapur-karisma-kapoors-ex-husband-businessman-with-degrees-from-mit-and-harvard-and-polo-enthusiast/articleshow/121814960.cms |title= Who was Sunjay Kapur? Karisma Kapoor’s ex-husband, businessman with degrees from MIT and Harvard, and polo enthusiast |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=टाइम्स ऑफ इंडिया |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.nytimes.com/2025/06/13/business/sunjay-kapur-dead.html |title= Sunjay Kapur, Businessman and Ex-Husband of Bollywood Star, Dies at 53 |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=The New York Times |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कपूर हे उच्चशिक्षित होते. त्यांनी प्रथम देहरादून येथील [[द डून स्कूल]]मधून आणि नंतर मुंबईतील द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले. त्यांनी लंडनमधून कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि एचआरमध्ये बीबीए केले. यानंतर त्यांनी एमआयटी आणि [[हार्वर्ड बिझनेस स्कूल]]मधून प्रतिष्ठित कार्यनिष्‍पादनपरक अभ्यासक्रम (executive courses) पूर्ण केले.<ref name="toi" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.jansatta.com/entertainment/who-was-sunjay-kapoor-knows-karishma-kapoor-ex-husband-married-life-child-business-education-family-tree/4005381/ |title= कौन थे संजय कपूर? जानिए करिश्मा के एक्स हसबैंड की वाइफ और बच्चों के बारे में सबकुछ |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=जनसत्ता |प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कपूर हे ऑटो कंपोनेंट बनवणाऱ्या सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. या कंपनीची स्थापना १९९७ मध्ये त्यांचे दिवंगत वडील सुरिंदर कपूर यांनी केली होती, जे भारतातील ऑटो कंपोनंट उद्योगातील एक अग्रणी होते. २०१५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर संजयने व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारली. सोना कॉमस्टारचे भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत नऊ कारखाने आहेत. हे इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी सुटे भाग पुरवते.<ref name="forbs">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.forbes.com/profile/sunjay-kapur/ |title=Sunjay Kapur |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=फोर्ब्स |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> अमेरिकन नागरिकत्व असलेल्या संजय यांनी २०२२ मध्ये जगातील अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले. फोर्ब्सच्या मते, त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची एकूण संपत्ती १.२ अब्ज डॉलर्स (म्हणजेच ₹ १०,३०० कोटी) होती. यातील मोठा वाटा गुरुग्राम येथील मुख्यालय असलेल्या सोना कॉमस्टारकडून येतो. ही कंपनी १२ उत्पादनांची निर्मिती करते. ही कंपनी भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत ५,००० हून अधिक लोकांना रोजगार पुरवते.<ref name="forbs" /><ref name="लाइव्ह मिंट२">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.livemint.com/companies/company-results/trent-investor-meeting-zudio-westside-star-bazaar-growth-target-dmart-max-fashion-reliance-retail-apparel-market-11750318478081.html |title=How much will Karisma Kapoor and Sunjay Kapur's children inherit of billionaire's ₹10,300 crore wealth? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=livemint |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> === वैवाहिक आयुष्य === कपूर यांचे पहिले लग्न दिल्लीतील डिझायनर-स्टायलिस्ट नंदिता महतानीशी १९९६ मध्ये झाले आणि २००० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. २००३ मध्ये त्यांनी करिश्मा कपूरशी लग्न केले. या जोडीला दोन मुले झाली, पैकी २००५ मध्ये मुलगी समायरा आणि २०११ मध्ये मुलगा कियान यांचा जन्म झाला होता. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर संजय आणि करिश्मा अधिकृतपणे २०१६ मध्ये वेगळे झाले. कपूर यांचा तिसरा विवाह प्रिया सचदेव सोबत २०१७ साली झाला. या जोडप्याला एक मुलगा अजारियस जन्माला आले.<ref name="लाइव्ह मिंट" /><ref name="लाइव्ह मिंट२" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.hindustantimes.com/entertainment/bollywood/who-is-sunjay-kapurs-wife-priya-sachdev-socialite-turned-actor-once-shared-screen-with-kareena-kapoor-karisma-kapoor-101749785157528.html |title=Who is Sunjay Kapur's wife Priya Sachdev? Socialite-turned actor once shared screen with Kareena Kapoor |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=हिंदुस्तान टाइम्स |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> == मृत्यू == १२ जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो सामन्यादरम्यान कोसळून त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते ५३ वर्षांचे होते. पोलो खेळत असताना मधमाशी गिळल्याने त्याचा अचानक मृत्यू झाल्याचे टेलिग्राफने वृत्त दिले आहे. एक मधमाशी अनवधानाने त्याच्या तोंडात शिरून चावल्याने त्यांना अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक आला होता.<ref name="लाइव्ह मिंट"/> == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == {{कॉमन्स वर्ग|Sunjay Kapur|संजय कपूर}} {{DEFAULTSORT:कपूर, संजय}} [[वर्ग:भारतीय उद्योगपती]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:इ.स. १९७१ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. २०२५ मधील मृत्यू]] [[वर्ग:अमेरिकन व्यक्ती]] kk0xe5f9p3r5qsnuuejr12b8g91vugl 2581412 2581411 2025-06-21T02:55:47Z संतोष गोरे 135680 /* वैवाहिक आयुष्य */ 2581412 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''संजय कपूर''' ([[१५ ऑक्टोबर]], [[इ.स. १९७१|१९७१]] - [[१२ जून]], [[इ.स. २०२५|२०२५]]) हे एक [[भारतीय नागरिक|भारतीय वंशाचे]] बहुराष्ट्रीय उद्योगपती आणि अब्जाधीश होते. कपूर हे वाहनांचे सुटेभाग बनवणारी कंपनी सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. याच सोबत त्यांनी ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एसीएमए) चे अध्यक्षपद देखील भूषवले होते. चित्रपट अभिनेत्री [[करिश्मा कपूर]]चे घटस्फोटीत पती, [[वेल्सचा राजकुमार विल्यम|प्रिन्स विल्यम]] यांचे जवळचे मित्र तसेच सोना ग्रुपचे संस्थापक उद्योगपती डॉ. सुरिंदर कपूर यांचे ते पुत्र अशी त्यांची ओळख होती.<ref name="लाइव्ह मिंट">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.livemint.com/entertainment/karisma-kapoor-in-white-heads-to-delhi-with-kids-samaira-and-kiaan-for-ex-husband-sunjay-kapurs-funeral-watch-11750308452364.html |title=Karisma Kapoor heads to Delhi with kids for ex-husband Sunjay Kapur's funeral, Kareena Kapoor and Saif Ali Khan join |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ= |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> == वैयक्तिक आयुष्य == संजय कपूर यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९७१ रोजी राणी कपूर आणि सुरिंदर कपूर यांच्या घरी दिल्ली<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.abplive.com/entertainment/bollywood/who-was-sanjay-kapur-karisma-kapoor-ex-husband-business-education-polo-player-know-everything-2961538 |title=बिजनेस वर्ल्ड के टाइकून्स में से एक थे करिश्मा कपूर के एक्स हसबैंड संजय कपूर, जानें एजुकेशन से प्रोफेशन तक सबकुछ |लेखक= |दिनांक=१९ जून २०२५ |संकेतस्थळ=एबीपी लाइव्ह|प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> येथे झाला.<ref name="toi">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/who-was-sunjay-kapur-karisma-kapoors-ex-husband-businessman-with-degrees-from-mit-and-harvard-and-polo-enthusiast/articleshow/121814960.cms |title= Who was Sunjay Kapur? Karisma Kapoor’s ex-husband, businessman with degrees from MIT and Harvard, and polo enthusiast |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=टाइम्स ऑफ इंडिया |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.nytimes.com/2025/06/13/business/sunjay-kapur-dead.html |title= Sunjay Kapur, Businessman and Ex-Husband of Bollywood Star, Dies at 53 |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=The New York Times |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कपूर हे उच्चशिक्षित होते. त्यांनी प्रथम देहरादून येथील [[द डून स्कूल]]मधून आणि नंतर मुंबईतील द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले. त्यांनी लंडनमधून कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि एचआरमध्ये बीबीए केले. यानंतर त्यांनी एमआयटी आणि [[हार्वर्ड बिझनेस स्कूल]]मधून प्रतिष्ठित कार्यनिष्‍पादनपरक अभ्यासक्रम (executive courses) पूर्ण केले.<ref name="toi" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.jansatta.com/entertainment/who-was-sunjay-kapoor-knows-karishma-kapoor-ex-husband-married-life-child-business-education-family-tree/4005381/ |title= कौन थे संजय कपूर? जानिए करिश्मा के एक्स हसबैंड की वाइफ और बच्चों के बारे में सबकुछ |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=जनसत्ता |प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कपूर हे ऑटो कंपोनेंट बनवणाऱ्या सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. या कंपनीची स्थापना १९९७ मध्ये त्यांचे दिवंगत वडील सुरिंदर कपूर यांनी केली होती, जे भारतातील ऑटो कंपोनंट उद्योगातील एक अग्रणी होते. २०१५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर संजयने व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारली. सोना कॉमस्टारचे भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत नऊ कारखाने आहेत. हे इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी सुटे भाग पुरवते.<ref name="forbs">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.forbes.com/profile/sunjay-kapur/ |title=Sunjay Kapur |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=फोर्ब्स |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> अमेरिकन नागरिकत्व असलेल्या संजय यांनी २०२२ मध्ये जगातील अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले. फोर्ब्सच्या मते, त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची एकूण संपत्ती १.२ अब्ज डॉलर्स (म्हणजेच ₹ १०,३०० कोटी) होती. यातील मोठा वाटा गुरुग्राम येथील मुख्यालय असलेल्या सोना कॉमस्टारकडून येतो. ही कंपनी १२ उत्पादनांची निर्मिती करते. ही कंपनी भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत ५,००० हून अधिक लोकांना रोजगार पुरवते.<ref name="forbs" /><ref name="लाइव्ह मिंट२">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.livemint.com/companies/company-results/trent-investor-meeting-zudio-westside-star-bazaar-growth-target-dmart-max-fashion-reliance-retail-apparel-market-11750318478081.html |title=How much will Karisma Kapoor and Sunjay Kapur's children inherit of billionaire's ₹10,300 crore wealth? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=livemint |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> === वैवाहिक आयुष्य === कपूर यांचे पहिले लग्न दिल्लीतील ''शैली अभिकल्पक'' (फॅशनेबल स्टायलिस्ट) [[नंदिता महतानी]]शी १९९६ मध्ये झाले आणि २००० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. २००३ मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट अभिनेत्री [[करिश्मा कपूर]]शी लग्न केले. या जोडीला दोन मुले झाली, पैकी २००५ मध्ये मुलगी समायरा आणि २०११ मध्ये मुलगा कियान यांचा जन्म झाला होता. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर संजय आणि करिश्मा अधिकृतपणे २०१६ मध्ये वेगळे झाले. कपूर यांचा तिसरा विवाह [[प्रिया सचदेव]] सोबत २०१७ साली झाला. या जोडप्याला एक मुलगा अजारियस जन्माला आले.<ref name="लाइव्ह मिंट" /><ref name="लाइव्ह मिंट२" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.hindustantimes.com/entertainment/bollywood/who-is-sunjay-kapurs-wife-priya-sachdev-socialite-turned-actor-once-shared-screen-with-kareena-kapoor-karisma-kapoor-101749785157528.html |title=Who is Sunjay Kapur's wife Priya Sachdev? Socialite-turned actor once shared screen with Kareena Kapoor |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=हिंदुस्तान टाइम्स |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> == मृत्यू == १२ जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो सामन्यादरम्यान कोसळून त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते ५३ वर्षांचे होते. पोलो खेळत असताना मधमाशी गिळल्याने त्याचा अचानक मृत्यू झाल्याचे टेलिग्राफने वृत्त दिले आहे. एक मधमाशी अनवधानाने त्याच्या तोंडात शिरून चावल्याने त्यांना अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक आला होता.<ref name="लाइव्ह मिंट"/> == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == {{कॉमन्स वर्ग|Sunjay Kapur|संजय कपूर}} {{DEFAULTSORT:कपूर, संजय}} [[वर्ग:भारतीय उद्योगपती]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:इ.स. १९७१ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. २०२५ मधील मृत्यू]] [[वर्ग:अमेरिकन व्यक्ती]] 4qoahdiych61kd0ng50pjp7jxysifh2 मंझिलें और भी हैं 0 366612 2581314 2581148 2025-06-20T14:36:45Z अभय नातू 206 removed [[Category:इ.स. १९७४ मधील चित्रपट]] - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581314 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''''मंझिलीं और भी हैं''''' हा १९७४ चा [[महेश भट्ट]] दिग्दर्शित [[बॉलीवूड]] क्राइम थ्रिलर चित्रपट आहे आणि त्यात [[कबीर बेदी]], [[प्रेमा नारायण]] आणि गुलशन अरोरा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.{{Sfn|Narwekar|1994|p=48}} भट्टयांच्या दिग्दर्शनातील हा पहिला चित्रपट दोन पळालेल्या अपराद्यांबद्दाल आणि एका वेश्येशी असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल होता. हा चित्रपट १९७२ मध्ये बनवण्यात आला होता आणि सुरुवातीला त्याला सेन्सॉर प्रमाणपत्र नाकारण्यात आले होते आणि "विवाहाच्या पवित्र संस्थेची खिल्ली उडवल्याबद्दल" [[केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ|भारतीय सेन्सॉर बोर्डाने]] त्यावर बंदी घातली होती.{{Sfn|Somaaya|Kothari|Madangarli|2013}} त्यामुळे चित्रपट १४ महिने रोखण्यात आला होता.{{Sfn|Ganti|2004}} तथापि, दीर्घ विलंबानंतर सरकारने हस्तक्षेप केला, बोर्डाला रद्दबातल ठरवले आणि इतर चार बंदी घातलेल्या चित्रपटांसह ह्या चित्रपटाला मान्यता दिली.{{Sfn|Wanted: a realistic censor policy|1974}} १९७४ मध्ये जेव्हा तो अखेर प्रदर्शित झाला तेव्हा त्याला ना टीकात्मक यश मिळाले ना व्यावसायिक यश.<ref name="today">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://indiatoday.intoday.in/story/jism-2-manzilein-aur-bhi-hain-pooja-bhatt-arth/1/210942.html|title=Pooja keen to re-look Manzilein Aur Bhi Hain|date=30 July 2012|publisher=India Today|access-date=2014-05-11}}</ref> भट्ट यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून [[राज खोसला]] यांच्यासोबत केली.{{Sfn|Ganti|2004}} त्यानंतर १९७२ मध्ये, निर्माता आणि मित्र जॉनी बक्षी यांनी भट्ट यांना ह्या चित्रपटाची कथा एकवली व त्यांनी काम स्वीकारले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.indiawest.com/news/5301-interview-with-mahesh-bhatt-stories-of-his-life.html|title=Interview with Mahesh Bhatt: Stories of His Life|date=2 July 2012|publisher=IndiaWest|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140513011908/http://www.indiawest.com/news/5301-interview-with-mahesh-bhatt-stories-of-his-life.html|archive-date=13 May 2014|access-date=2014-05-11}}</ref> चित्रपटाचे संवाद प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक आणि नाटककार [[सत्यदेव दुबे]] यांनी लिहिले होते.{{Sfn|Somaaya|Kothari|Madangarli|2013}} चित्रपटाचे संगीत भूपेंद्र सोनी यांचे होते, तर गीते योगेश यांनी लिहिली होती. [[आशा भोसले]] आणि [[भूपेन्द्र सिंह (संगीतकार)|भूपेन्द्र सिंह]] यांनी गाणी गायली आहे. == गाणी == # "आज नये गीत साजे मेरी पायल मे" - [[आशा भोसले]] # "हर एक सांस है मेहमान" - भूपेन्द्र सिंह # "मंझिले और भी है" - भूपेन्द्र सिंह # "ए दिल तू झूम के चल" - भूपेन्द्र सिंह == संदर्भ == {{संदर्भयादी}} ;संदर्भग्रंथ * {{cite book|last=Narwekar|first=Sanjit|title=Directory of Indian film-makers and films|url=https://books.google.com/books?id=UYUjAQAAIAAJ|year=1994|publisher=Flicks Books|isbn=9780948911408}} * {{cite book|author1=Gulazar|last2=Nihalani|first2=Govind|last3=Chatterjee|first3=Saibal|title=Encyclopaedia of Hindi Cinema|url=https://books.google.com/books?id=8y8vN9A14nkC&pg=PT555|year=2003|publisher=Popular Prakashan|isbn=978-81-7991-066-5}} * {{cite book|last=Ganti|first=Tejaswini|title=Bollywood: A Guidebook to Popular Hindi Cinema|url=https://books.google.com/books?id=GTEa93azj9EC&pg=PA105|year=2004|publisher=Psychology Press|isbn=978-0-415-28854-5}} * {{cite book|last1=Somaaya|first1=Bhawana |first2=Jigna |last2=Kothari |first3=Supriya |last3=Madangarli |title=Mother Maiden Mistress|url=https://books.google.com/books?id=Dtec0Ykfo1sC&pg=PA1972|year= 2013|publisher=HarperCollins Publishers|isbn=978-93-5029-485-7}} * {{cite book |ref={{harvid|Wanted: a realistic censor policy|1974}} |chapter=Wanted: a realistic censor policy |title=Organiser |url=https://books.google.com/books?id=dCNBAQAAIAAJ |date=30 March 1974 |publisher=Bharat Prakashan}} [[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:इ.स. १९७४ मधील हिंदी चित्रपट]] fq5hyoeutmo3hh3curzhw3pg4b81lt2 मासूम (१९८३ चित्रपट) 0 366614 2581315 2581228 2025-06-20T14:38:34Z अभय नातू 206 removed [[Category:इ.स. १९८२ मधील चित्रपट]] - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581315 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''''मासूम''''' हा १९८३ चा भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील [[नाट्य (चित्रपट आणि दूरचित्रवाणी)|नाट्य चित्रपट]] आहे, ज्याच्यासोबत [[शेखर कपूर]] यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://movies.nytimes.com/person/191017/Shekhar-Kapur/biography|title=Shekhar Kapur – Biography|last=Andrea LeVasseur|date=2007|website=[[The New York Times]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20071021134227/http://movies.nytimes.com/person/191017/Shekhar-Kapur/biography|archive-date=21 October 2007|access-date=27 Jan 2012}}</ref> हे १९८० च्या एरिक सेगल यांची कादंबरी ''मॅन, वुमन अँड चाइल्ड'' चे रूपांतर आहे. ह्याच कादंबरीच्या आधारे ''ओलंगल'' (१९८२) हा मल्याळम चित्रपट आणि ''मॅन, वुमन अँड चाइल्ड'' (१९८३) हा अमेरिकन चित्रपटातही होते.<ref name="toi">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Mini-from-Shekhar-Kapurs-Masoom-traced-in-Delhi/articleshow/29976112.cms|title=Mini from Shekhar Kapur's Masoom traced in Delhi|last=Vickey Lalwani|date=7 February 2014|website=The Times of India|access-date=2014-09-07}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ibnlive.in.com/news/childrens-day-seven-films-to-bring-out-the-innocent-child-in-you/305473-5.html|title=Children's Day: Seven films to bring out the innocent child in you|date=14 November 2012|website=CNN-IBN|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140907110212/http://ibnlive.in.com/news/childrens-day-seven-films-to-bring-out-the-innocent-child-in-you/305473-5.html|archive-date=7 September 2014|access-date=2014-09-07}}</ref> या चित्रपटात [[शबाना आझमी]], [[नसीरुद्दीन शाह]] आणि [[सईद जाफरी]] मुख्य भूमिकेत आहेत, तर [[तनुजा]] आणि [[सुप्रिया पाठक]] विशेष भूमिकेत आहेत. यात [[ऊर्मिला मातोंडकर|उर्मिला मातोंडकर]], आराधना आणि जुगल हंसराज बालकलाकार म्हणून पदार्पण करत आहेत. चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते [[गुलजार]] यांनी लिहिली आहेत तर संगीत [[राहुल देव बर्मन|आर.डी. बर्मन]] यांचे आहे. == गीते == चित्रपटाचे संगीत [[राहुल देव बर्मन|आर.डी. बर्मन]] यांनी दिले होते आणि गीते प्रसिद्ध गीतकार [[गुलजार]] यांनी लिहिली होती आणि त्यांनी चित्रपटाची पटकथा देखील लिहिली होती. या चित्रपटासाठी बर्मन यांना [[फिल्मफेर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट संगीताचा फिल्मफेर पुरस्कार]] मिळाला. {{Track listing|extra_column=गायक|title1=दो नैना और एक कहानी|extra1=[[आरती मुखर्जी]]|length1=05:26|title2=हुजूर इस कदर|extra2=[[सुरेश वाडकर]], [[भूपेन्द्र सिंह (संगीतकार)|भूपेन्द्र सिंह]]|length2=03:53|title3=तुझसे नाराज नहीं जिंदगी (पुरुष)|extra3=अनुप घोशाल|length3=05:41|title4=तुझसे नाराज नहीं जिंदगी (स्त्री)|extra4=[[लता मंगेशकर]]|length4=03:37|title5=लकडी की काठी|extra5=वनिता मिश्रा, गौरी बापट, गुरप्रीत कौर|length5=03:57}} == पुरस्कार == {| class="wikitable" !पुरस्कार ! श्रेणी ! नामांकित व्यक्ती ! निकाल |- | rowspan="8" | ३१ वे फिल्मफेअर पुरस्कार | [[फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार|सर्वोत्कृष्ट चित्रपट]] | ''मासूम'' || {{Nom}} |- | [[फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)]] | rowspan="2" | [[शेखर कपूर]] || {{Won}} |- | [[फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक]] || {{Nom}} |- | [[फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट अभिनेता]] | [[नसीरुद्दीन शाह]] || {{Won}} |- | [[फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट अभिनेत्री]] | [[शबाना आझमी]] || {{Nom}} |- | [[फिल्मफेर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक]] | [[राहुल देव बर्मन|आर.डी. बर्मन]] || {{Won}} |- | [[फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार|सर्वोत्कृष्ट गीतकार]] | "तुझसे नाराज नहीं" साठी [[गुलजार]] || {{Won}} |- | [[फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका]] | "दो नैना एक कहानी" साठी आरती मुखर्जी || {{Won}} |- |} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:इ.स. १९८२ मधील हिंदी चित्रपट]] [[वर्ग:व्यभिचाराबद्दल चित्रपट]] [[वर्ग:शेखर कपूर दिग्दर्शित चित्रपट]] twd5c9h4viw2oowjr7lxgpxkn2otb8b 2581316 2581315 2025-06-20T14:40:58Z 103.185.174.168 2581316 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''''मासूम''''' हा १९८३ चा भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील [[नाट्य (चित्रपट आणि दूरचित्रवाणी)|नाट्य चित्रपट]] आहे, ज्याच्यासोबत [[शेखर कपूर]] यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://movies.nytimes.com/person/191017/Shekhar-Kapur/biography|title=Shekhar Kapur – Biography|last=Andrea LeVasseur|date=2007|website=The New York Times|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20071021134227/http://movies.nytimes.com/person/191017/Shekhar-Kapur/biography|archive-date=21 October 2007|access-date=27 Jan 2012}}</ref> हे १९८० च्या एरिक सेगल यांची कादंबरी ''मॅन, वुमन अँड चाइल्ड'' चे रूपांतर आहे. ह्याच कादंबरीच्या आधारे ''ओलंगल'' (१९८२) हा मल्याळम चित्रपट आणि ''मॅन, वुमन अँड चाइल्ड'' (१९८३) हा अमेरिकन चित्रपटातही होते.<ref name="toi">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Mini-from-Shekhar-Kapurs-Masoom-traced-in-Delhi/articleshow/29976112.cms|title=Mini from Shekhar Kapur's Masoom traced in Delhi|last=Vickey Lalwani|date=7 February 2014|website=The Times of India|access-date=2014-09-07}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ibnlive.in.com/news/childrens-day-seven-films-to-bring-out-the-innocent-child-in-you/305473-5.html|title=Children's Day: Seven films to bring out the innocent child in you|date=14 November 2012|website=CNN-IBN|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140907110212/http://ibnlive.in.com/news/childrens-day-seven-films-to-bring-out-the-innocent-child-in-you/305473-5.html|archive-date=7 September 2014|access-date=2014-09-07}}</ref> या चित्रपटात [[शबाना आझमी]], [[नसीरुद्दीन शाह]] आणि [[सईद जाफरी]] मुख्य भूमिकेत आहेत, तर [[तनुजा]] आणि [[सुप्रिया पाठक]] विशेष भूमिकेत आहेत. यात [[ऊर्मिला मातोंडकर|उर्मिला मातोंडकर]], आराधना आणि जुगल हंसराज बालकलाकार म्हणून पदार्पण करत आहेत. चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते [[गुलजार]] यांनी लिहिली आहेत तर संगीत [[राहुल देव बर्मन|आर.डी. बर्मन]] यांचे आहे. == गीते == चित्रपटाचे संगीत [[राहुल देव बर्मन|आर.डी. बर्मन]] यांनी दिले होते आणि गीते प्रसिद्ध गीतकार [[गुलजार]] यांनी लिहिली होती आणि त्यांनी चित्रपटाची पटकथा देखील लिहिली होती. या चित्रपटासाठी बर्मन यांना [[फिल्मफेर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट संगीताचा फिल्मफेर पुरस्कार]] मिळाला. {{Track listing|extra_column=गायक|title1=दो नैना और एक कहानी|extra1=[[आरती मुखर्जी]]|length1=05:26|title2=हुजूर इस कदर|extra2=[[सुरेश वाडकर]], [[भूपिंदर सिंह (संगीतकार)|भूपिंदर सिंह]]|length2=03:53|title3=तुझसे नाराज नहीं जिंदगी (पुरुष)|extra3=अनुप घोशाल|length3=05:41|title4=तुझसे नाराज नहीं जिंदगी (स्त्री)|extra4=[[लता मंगेशकर]]|length4=03:37|title5=लकडी की काठी|extra5=वनिता मिश्रा, गौरी बापट, गुरप्रीत कौर|length5=03:57}} == पुरस्कार == {| class="wikitable" !पुरस्कार ! श्रेणी ! नामांकित व्यक्ती ! निकाल |- | rowspan="8" | ३१ वे फिल्मफेअर पुरस्कार | [[फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार|सर्वोत्कृष्ट चित्रपट]] | ''मासूम'' || {{Nom}} |- | [[फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)]] | rowspan="2" | [[शेखर कपूर]] || {{Won}} |- | [[फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक]] || {{Nom}} |- | [[फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट अभिनेता]] | [[नसीरुद्दीन शाह]] || {{Won}} |- | [[फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट अभिनेत्री]] | [[शबाना आझमी]] || {{Nom}} |- | [[फिल्मफेर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक]] | [[राहुल देव बर्मन|आर.डी. बर्मन]] || {{Won}} |- | [[फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार|सर्वोत्कृष्ट गीतकार]] | "तुझसे नाराज नहीं" साठी [[गुलजार]] || {{Won}} |- | [[फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका]] | "दो नैना एक कहानी" साठी आरती मुखर्जी || {{Won}} |- |} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:इ.स. १९८३ मधील हिंदी चित्रपट]] [[वर्ग:व्यभिचाराबद्दल चित्रपट]] [[वर्ग:शेखर कपूर दिग्दर्शित चित्रपट]] jdfz3lm1jd71s9nqlug4x8zh73csmie योगेश (गीतकार) 0 366616 2581318 2581150 2025-06-20T14:43:04Z अभय नातू 206 इतरत्र सापडलेला मजकूर येथे हलवला 2581318 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''योगेश गौर''', '''योगेश गौड''' <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://huntmylyrics.com/lyricist/yogesh-gaud/|title=Yogesh Gaud – Lyricist – All Songs Lyrics – Videos – Biography}}</ref> ([[१९ मार्च]], [[इ.स. १९४३|१९४३]]:लखनौ, उत्तर प्रदेश, भारत - [[२९ मे]], [[इ.स. २०२०|२०२०]]:[[गोरेगांव]], [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]),<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/lyricist-yogesh-gaur-passes-away-6433187/|title=Lyricist Yogesh passes away|date=30 May 2020}}</ref> हे एक भारतीय लेखक आणि गीतकार होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.dnaindia.com/lifestyle/report_the-nawab-of-words_1247081|title=The Nawab of words|date=12 April 2009}}</ref> बॉलीवूडमधील त्यांच्या योगदानासाठी ते ओळखले जात होते, ''[[आनंद (चित्रपट)|आनंद]]'' (१९७१) चित्रपटातील "कहां दूर जब दिन ढल जाये" आणि "जिंदगी कैसी है पहली", तसेच ''[[रजनीगंधा (चित्रपट)|रजनीगंधा]]'' (१९७४) चित्रपटातील "रजनीगंधा फूल तुम्हारा" ही गाणी त्यांनी लिहीली होती.<ref>{{स्रोत बातमी|last=Salam|first=Ziya Us|url=http://www.thehindu.com/life-and-style/metroplus/article3722291.ece|title=Anonymity, a writer's fate|date=3 August 2012|work=The Hindu}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://theprint.in/india/veteran-lyricist-yogesh-who-penned-songs-for-anand-and-rajnigandha-dies-at-77/432078/|title=Veteran lyricist Yogesh, who penned songs for 'Anand' and 'Rajnigandha', dies at 77|date=29 May 2020}}</ref> ==काही प्रसिद्ध गाणी== * आज कोई नहीं अपना किसे गम ये सुनायें * ऐ रंगभरी महफिल फ़िर होश में क्या आना * ओ मेरी प्राण सजनी चंपावती * ओ शाम आयी रंगों मे रंगी (हिंदी चित्रपटगीत; चित्रपट - जीना यहाँ; गायिका - [[लता मंगेशकर]]; संगीतकार - [[सलिल चौधरी]]); * कई बार पहले बरसा था ये सावन (हिंदी चित्रपटगीत; चित्रपट - यूँही कभी; गायक/गायिका - उदित नारायण+कविता कृष्णमूर्ती; संगीतकार - निखिल-विनय) * कईं बार यूंही देखा है * कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे * कहीं दूर जब दिन मिल जाएँ * किसे ख़बर कहाँ डगर जीवन की ले जायें * कैसे दिन जीवन में आये हुए वो * कोई रोकोना दीवाने को (चिय्रपट - प्रियतमा; गायक - किशोरकुमार; संगीतकार - राजेश रोशन) * गाओ मरे मन * गुज़र जायें दिन दिन दिन * चलो हँसीन गीत एक बनायें * चाँद बन के तुम गगन से * जब भी कहीं कंगना बोले पायल झलक जाये * जाईये हम से ख़फ़ा हो जाइये * जानेमन जानेमन तेरे दो नयन * ज़िंदगी कैसी है ये पहेली * जीवन है एक सपना * तुम जो आओ तो प्यार आ जायें * तेरी आशिकी में हम दिल तो क्या है * तेरी गलियों में हम आयें * दिन हैं बहार के फूल चुन ले प्यार के * न जाने क्यूँ होता है ज़िंदगी के साथ * न बोले तुम न मैंने कुछ कहा * निसदिन निसदिन मेरा ज़ुल्मी सजन * नैन हमारे साँझ सकारे * प्रेम है पिया मन की मधुर एक भावना * बडी सूनी सूनी है ज़िंदगी ये ज़िंदगी * मन करे याद वो दिन, तेरे संग बीते थे जो पल रंगीन (चित्रपट - आखरी बदला. गायक - किशोरकुमार; संगीतकार - सलिल चौधरी) * माना कि है ज़िंदगी ये सफ़र * मानो मेरे हँसी सनम तू रश्क-ए-माहताब है (हिंदी चित्रपट - दि ॲडव्हेंचर्स ऑफ राॅबिन हूड; गायक - मोहम्मद रफी; संगीतकार - जी.एस. कोहली) * मैं कौनसा गीत सुनाऊ‍ँ * मैने कहा, फूलों से से हँसो तो * यूँही कभी कुछ मिल गया हैं * ये जबसे हुई जिया की चोरी * ये दिन क्या आयें लगे फूल हँसने * रजनीगंधा फूल तुम्हारे * रात उजियारी दिन अंधेरा है * रातों के सायें घने जब बोझ दिलपर * रिमझिम गिरे सावन * श्याम रंग रंगा रे हर पल मेरा रे * सौ बार बना कर मालिक ने * हम तुमको मना रहे हैं * हमें याद कभी तुम कर लेना * हाय रे आज की रैना == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:भारतीय गीतकार]] [[वर्ग:हिंदी कवी]] [[वर्ग:इ.स. २०२० मधील मृत्यु]] [[वर्ग:इ.स. १९४३ मधील जन्म]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 212r60cfc4213wkeabci3ndhtmiw107 जैश-ए-मोहम्मद 0 366627 2581331 2581176 2025-06-20T15:56:20Z अभय नातू 206 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581331 wikitext text/x-wiki '''जैश-ए-मोहम्मद''' ('''JeM''') (जेईएम) हा [[काश्मीर]]मध्ये सक्रिय असलेला एक [[पाकिस्तान]]ी [[देवबंदी]] जिहादी इस्लामी दहशतवादी गट आहे.<ref>{{Cite news|last=भट्टचर्जी|first=युधीजीत|date=१० मार्च २०२०|trans-title=द टेररिस्ट हू गॉट अवे|title=The Terrorist Who Got Away|language=en-US|work=द न्यूयॉर्क टाइम्स|url=https://www.nytimes.com/2020/03/19/magazine/masood-azhar-jaish.html|access-date=२० जून २०२५|issn=0362-4331|archive-date=२१ ऑक्टोबर २०२०|archive-url=https://web.archive.org/web/20201021222739/https://www.nytimes.com/2020/03/19/magazine/masood-azhar-jaish.html|url-status=live}}</ref><ref name="Jaffrelot intro">{{harvp|Jaffrelot, ''The Pakistan Paradox''|2015|p=520}}: "सुटका होताच, मसूद अझहर पाकिस्तानात परतला जिथे त्याने जैश-ए-मोहम्मद ही एक नवीन जिहादी चळवळ स्थापन केली, जी काश्मीर आणि इतरत्र आयएसआयने वापरलेल्या जिहादी गटांपैकी एक बनली."</ref><ref name="congressional">{{harvp|Cronin et al., Foreign Terrorist Organizations (FTOs)|2004|pp=40–43}}</ref> या गटाचा मुख्य हेतू [[जम्मू आणि काश्मीर]]ला भारतापासून वेगळे करणे आणि [[पाकिस्तान]]मध्ये विलीन करणे आहे.<ref>{{Cite web |author=अल जझीरा स्टाफ |trans-title=भारत पाकिस्तानवर कोणत्या सशस्त्र गटांना पाठिंबा देण्याचा आरोप करतो?|title=Who are the armed groups India accuses Pakistan of backing? |url=https://www.aljazeera.com/news/2025/5/9/who-are-the-armed-groups-india-accuses-pakistan-of-backing |access-date=२० जून २०२५|website=अल जझीरा |language=en}}</ref> इ.स. २००० मध्ये स्थापनेपासून, या गटाने भारतातील नागरी, आर्थिक आणि लष्करी लक्ष्यांवर अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत.<ref name="bbcprofile">{{cite news|trans-title=जैश-ए-मोहम्मद: प्रोफाइल|title=Jaish-e-Mohammad: A profile |publisher=बीबीसी न्यूज |date=६ फेब्रुवारी २००२ |url=http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/1804228.stm |access-date=२० जून २०२५ |archive-date=२८ एप्रिल २०२२ |archive-url=https://web.archive.org/web/20220428060751/http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/1804228.stm |url-status=live }}</ref><ref>{{cite web |url=http://www.spacewar.com/reports/Attack_May_Spoil_Kashmir_Summit.html |trans-title=हल्ल्यामुळे काश्मीर शिखर परिषदेला धोका निर्माण होऊ शकतो|title=Attack May Spoil Kashmir Summit |publisher=SpaceWar.com |access-date=२० जून २०२५ |archive-date=११ फेब्रुवारी २०२१|archive-url=https://web.archive.org/web/20210211181801/https://www.spacewar.com/reports/Attack_May_Spoil_Kashmir_Summit.html |url-status=live }}</ref> हा गट काश्मीरला संपूर्ण भारताचे "प्रवेशद्वार" म्हणून चित्रित करते, आणि येथील मुस्लिमांना मुक्त होण्याची आवश्यकता आहे असे मानतो. ह्या गटाचे [[तालिबान]], [[अल-कायदा]], [[लष्कर-ए-तैयबा]], [[हिजबूल मुजाहिद्दीन]], [[हरकत-उल-मुजाहिद्दीन]], [[अन्सार गजवत-उल-हिंद]], [[इंडियन मुजाहिद्दीन]] यांच्याशी जवळचे संबंध आणि युती आहे.<ref name=Moj2>{{harvp|Moj, Deoband Madrassah Movement|2015|p=98}}: "काश्मीरमधील गनिमी कारवायांव्यतिरिक्त, जैश-ए-मोहम्मदने तालिबान तसेच अफगाणिस्तानातील अल-कायदाशी जवळचे संबंध ठेवले."</ref>{{sfnp|Popovic, The Perils of Weak Organization|2015|pp=921, 925, 926}}<ref name="Riedel Al-Qaeda">{{harvp|रिडेल, डेडली एम्ब्रास|२०१२}}: "उत्तर हे आहे कि जैश-ए-मोहम्मदचा मित्र आणि सहयोगी, ओसामा बिन लादेनचा अल कायदा." (पृ. ६९) "किंवा पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी म्हटल्याप्रमाणे, "ते — लष्कर-ए-जांगवी, सिपाह-ए-सोहबा पाकिस्तान आणि जैश-ए-मोहम्मद - तालिबान आणि अल कायदाचे सहयोगी आहेत" आणि खरोखरच त्यांचे ध्येय सामान आहेत." (पृ. १००)</ref> ==नोंदी== {{notelist}} ==संदर्भयादी== {{संदर्भयादी}} [[वर्ग:दहशतवादी संघटना]] 3htvq7y20za493t7f5e6r8sf4x5r95e 2581333 2581331 2025-06-20T15:56:29Z अभय नातू 206 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581333 wikitext text/x-wiki '''जैश-ए-मोहम्मद''' ('''JeM''') (जेईएम) हा [[काश्मीर]]मध्ये सक्रिय असलेला एक [[पाकिस्तान]]ी [[देवबंदी]] जिहादी इस्लामी दहशतवादी गट आहे.<ref>{{Cite news|last=भट्टचर्जी|first=युधीजीत|date=१० मार्च २०२०|trans-title=द टेररिस्ट हू गॉट अवे|title=The Terrorist Who Got Away|language=en-US|work=द न्यूयॉर्क टाइम्स|url=https://www.nytimes.com/2020/03/19/magazine/masood-azhar-jaish.html|access-date=२० जून २०२५|issn=0362-4331|archive-date=२१ ऑक्टोबर २०२०|archive-url=https://web.archive.org/web/20201021222739/https://www.nytimes.com/2020/03/19/magazine/masood-azhar-jaish.html|url-status=live}}</ref><ref name="Jaffrelot intro">{{harvp|Jaffrelot, ''The Pakistan Paradox''|2015|p=520}}: "सुटका होताच, मसूद अझहर पाकिस्तानात परतला जिथे त्याने जैश-ए-मोहम्मद ही एक नवीन जिहादी चळवळ स्थापन केली, जी काश्मीर आणि इतरत्र आयएसआयने वापरलेल्या जिहादी गटांपैकी एक बनली."</ref><ref name="congressional">{{harvp|Cronin et al., Foreign Terrorist Organizations (FTOs)|2004|pp=40–43}}</ref> या गटाचा मुख्य हेतू [[जम्मू आणि काश्मीर]]ला भारतापासून वेगळे करणे आणि [[पाकिस्तान]]मध्ये विलीन करणे आहे.<ref>{{Cite web |author=अल जझीरा स्टाफ |trans-title=भारत पाकिस्तानवर कोणत्या सशस्त्र गटांना पाठिंबा देण्याचा आरोप करतो?|title=Who are the armed groups India accuses Pakistan of backing? |url=https://www.aljazeera.com/news/2025/5/9/who-are-the-armed-groups-india-accuses-pakistan-of-backing |access-date=२० जून २०२५|website=अल जझीरा |language=en}}</ref> इ.स. २००० मध्ये स्थापनेपासून, या गटाने भारतातील नागरी, आर्थिक आणि लष्करी लक्ष्यांवर अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत.<ref name="bbcprofile">{{cite news|trans-title=जैश-ए-मोहम्मद: प्रोफाइल|title=Jaish-e-Mohammad: A profile |publisher=बीबीसी न्यूज |date=६ फेब्रुवारी २००२ |url=http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/1804228.stm |access-date=२० जून २०२५ |archive-date=२८ एप्रिल २०२२ |archive-url=https://web.archive.org/web/20220428060751/http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/1804228.stm |url-status=live }}</ref><ref>{{cite web |url=http://www.spacewar.com/reports/Attack_May_Spoil_Kashmir_Summit.html |trans-title=हल्ल्यामुळे काश्मीर शिखर परिषदेला धोका निर्माण होऊ शकतो|title=Attack May Spoil Kashmir Summit |publisher=SpaceWar.com |access-date=२० जून २०२५ |archive-date=११ फेब्रुवारी २०२१|archive-url=https://web.archive.org/web/20210211181801/https://www.spacewar.com/reports/Attack_May_Spoil_Kashmir_Summit.html |url-status=live }}</ref> हा गट काश्मीरला संपूर्ण भारताचे "प्रवेशद्वार" म्हणून चित्रित करते, आणि येथील मुस्लिमांना मुक्त होण्याची आवश्यकता आहे असे मानतो. ह्या गटाचे [[तालिबान]], [[अल-कायदा]], [[लष्कर-ए-तैयबा]], [[हिजबूल मुजाहिद्दीन]], [[हरकत-उल-मुजाहिद्दीन]], [[अन्सार गजवत-उल-हिंद]], [[इंडियन मुजाहिद्दीन]] यांच्याशी जवळचे संबंध आणि युती आहे.<ref name=Moj2>{{harvp|Moj, Deoband Madrassah Movement|2015|p=98}}: "काश्मीरमधील गनिमी कारवायांव्यतिरिक्त, जैश-ए-मोहम्मदने तालिबान तसेच अफगाणिस्तानातील अल-कायदाशी जवळचे संबंध ठेवले."</ref>{{sfnp|Popovic, The Perils of Weak Organization|2015|pp=921, 925, 926}}<ref name="Riedel Al-Qaeda">{{harvp|रिडेल, डेडली एम्ब्रास|२०१२}}: "उत्तर हे आहे कि जैश-ए-मोहम्मदचा मित्र आणि सहयोगी, ओसामा बिन लादेनचा अल कायदा." (पृ. ६९) "किंवा पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी म्हटल्याप्रमाणे, "ते — लष्कर-ए-जांगवी, सिपाह-ए-सोहबा पाकिस्तान आणि जैश-ए-मोहम्मद - तालिबान आणि अल कायदाचे सहयोगी आहेत" आणि खरोखरच त्यांचे ध्येय सामान आहेत." (पृ. १००)</ref> ==नोंदी== {{notelist}} ==संदर्भयादी== {{संदर्भयादी}} [[वर्ग:दहशतवादी संघटना]] [[वर्ग:इस्लामी दहशतवाद]] tg3grxdcq33oipubkjzepnrbiwat8kl 2581334 2581333 2025-06-20T15:56:36Z अभय नातू 206 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581334 wikitext text/x-wiki '''जैश-ए-मोहम्मद''' ('''JeM''') (जेईएम) हा [[काश्मीर]]मध्ये सक्रिय असलेला एक [[पाकिस्तान]]ी [[देवबंदी]] जिहादी इस्लामी दहशतवादी गट आहे.<ref>{{Cite news|last=भट्टचर्जी|first=युधीजीत|date=१० मार्च २०२०|trans-title=द टेररिस्ट हू गॉट अवे|title=The Terrorist Who Got Away|language=en-US|work=द न्यूयॉर्क टाइम्स|url=https://www.nytimes.com/2020/03/19/magazine/masood-azhar-jaish.html|access-date=२० जून २०२५|issn=0362-4331|archive-date=२१ ऑक्टोबर २०२०|archive-url=https://web.archive.org/web/20201021222739/https://www.nytimes.com/2020/03/19/magazine/masood-azhar-jaish.html|url-status=live}}</ref><ref name="Jaffrelot intro">{{harvp|Jaffrelot, ''The Pakistan Paradox''|2015|p=520}}: "सुटका होताच, मसूद अझहर पाकिस्तानात परतला जिथे त्याने जैश-ए-मोहम्मद ही एक नवीन जिहादी चळवळ स्थापन केली, जी काश्मीर आणि इतरत्र आयएसआयने वापरलेल्या जिहादी गटांपैकी एक बनली."</ref><ref name="congressional">{{harvp|Cronin et al., Foreign Terrorist Organizations (FTOs)|2004|pp=40–43}}</ref> या गटाचा मुख्य हेतू [[जम्मू आणि काश्मीर]]ला भारतापासून वेगळे करणे आणि [[पाकिस्तान]]मध्ये विलीन करणे आहे.<ref>{{Cite web |author=अल जझीरा स्टाफ |trans-title=भारत पाकिस्तानवर कोणत्या सशस्त्र गटांना पाठिंबा देण्याचा आरोप करतो?|title=Who are the armed groups India accuses Pakistan of backing? |url=https://www.aljazeera.com/news/2025/5/9/who-are-the-armed-groups-india-accuses-pakistan-of-backing |access-date=२० जून २०२५|website=अल जझीरा |language=en}}</ref> इ.स. २००० मध्ये स्थापनेपासून, या गटाने भारतातील नागरी, आर्थिक आणि लष्करी लक्ष्यांवर अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत.<ref name="bbcprofile">{{cite news|trans-title=जैश-ए-मोहम्मद: प्रोफाइल|title=Jaish-e-Mohammad: A profile |publisher=बीबीसी न्यूज |date=६ फेब्रुवारी २००२ |url=http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/1804228.stm |access-date=२० जून २०२५ |archive-date=२८ एप्रिल २०२२ |archive-url=https://web.archive.org/web/20220428060751/http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/1804228.stm |url-status=live }}</ref><ref>{{cite web |url=http://www.spacewar.com/reports/Attack_May_Spoil_Kashmir_Summit.html |trans-title=हल्ल्यामुळे काश्मीर शिखर परिषदेला धोका निर्माण होऊ शकतो|title=Attack May Spoil Kashmir Summit |publisher=SpaceWar.com |access-date=२० जून २०२५ |archive-date=११ फेब्रुवारी २०२१|archive-url=https://web.archive.org/web/20210211181801/https://www.spacewar.com/reports/Attack_May_Spoil_Kashmir_Summit.html |url-status=live }}</ref> हा गट काश्मीरला संपूर्ण भारताचे "प्रवेशद्वार" म्हणून चित्रित करते, आणि येथील मुस्लिमांना मुक्त होण्याची आवश्यकता आहे असे मानतो. ह्या गटाचे [[तालिबान]], [[अल-कायदा]], [[लष्कर-ए-तैयबा]], [[हिजबूल मुजाहिद्दीन]], [[हरकत-उल-मुजाहिद्दीन]], [[अन्सार गजवत-उल-हिंद]], [[इंडियन मुजाहिद्दीन]] यांच्याशी जवळचे संबंध आणि युती आहे.<ref name=Moj2>{{harvp|Moj, Deoband Madrassah Movement|2015|p=98}}: "काश्मीरमधील गनिमी कारवायांव्यतिरिक्त, जैश-ए-मोहम्मदने तालिबान तसेच अफगाणिस्तानातील अल-कायदाशी जवळचे संबंध ठेवले."</ref>{{sfnp|Popovic, The Perils of Weak Organization|2015|pp=921, 925, 926}}<ref name="Riedel Al-Qaeda">{{harvp|रिडेल, डेडली एम्ब्रास|२०१२}}: "उत्तर हे आहे कि जैश-ए-मोहम्मदचा मित्र आणि सहयोगी, ओसामा बिन लादेनचा अल कायदा." (पृ. ६९) "किंवा पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी म्हटल्याप्रमाणे, "ते — लष्कर-ए-जांगवी, सिपाह-ए-सोहबा पाकिस्तान आणि जैश-ए-मोहम्मद - तालिबान आणि अल कायदाचे सहयोगी आहेत" आणि खरोखरच त्यांचे ध्येय सामान आहेत." (पृ. १००)</ref> ==नोंदी== {{notelist}} ==संदर्भयादी== {{संदर्भयादी}} [[वर्ग:दहशतवादी संघटना]] [[वर्ग:इस्लामी दहशतवाद]] [[वर्ग:काश्मीर]] etvxlkn7o6r20444krim2g0ooaoerh1 कबीर बेदी 0 366634 2581336 2581195 2025-06-20T15:59:47Z अभय नातू 206 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581336 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''कबीर बेदी''' (जन्म: १६ जानेवारी १९४६) हा एक भारतीय अभिनेता आहे. त्यांची कारकीर्द भारत, अमेरिका आणि विशेषतः इटलीसह इतर पाश्चात्य देशांसह तीन खंडांमध्ये पसरलेली आहे व अनेक माध्यमांमध्ये जसे चित्रपट, दूरदर्शन आणि नाटक.<ref>{{cite news|url=https://www.msn.com/en-in/entertainment/news/kabir-bedi-birthday-2024-tracing-the-actor-s-international-film-journey/ar-AA1n2T8C|title=Kabir Bedi Birthday 2024: Tracing the actor's international film journey|date=16 January 2024|work=MSN|access-date=5 February 2024}}</ref><ref>{{cite news|url=https://timesofindia.indiatimes.com/videos/entertainment/hindi/kabir-bedi-reveals-he-is-a-17th-generation-descendant-of-guru-nanak-as-he-commemorates-his-550th-birth-anniversary/videoshow/72032599.cms|title=Kabir Bedi reveals he is a '17th generation descendant' of Guru Nanak as he commemorates his 550th birth anniversary|date=13 November 2019|work=The Times of India|access-date=5 February 2024|archive-url=https://web.archive.org/web/20240205120104/https://timesofindia.indiatimes.com/videos/entertainment/hindi/kabir-bedi-reveals-he-is-a-17th-generation-descendant-of-guru-nanak-as-he-commemorates-his-550th-birth-anniversary/videoshow/72032599.cms|archive-date=5 February 2024|url-status=live}}</ref> ब्लॉकबस्टर ''[[खून भारी मांग]]'' (१९८८) या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या संजय वर्माच्या खलनायकी भूमिकेसाठी आणि ''ताज महल: एन इटर्नल लव्ह स्टोरी'' (२००५) मधील [[शाह जहान|सम्राट शाहजहानच्या]] भूमिकेसाठी ते प्रसिद्ध आहेत. इटली आणि युरोपमध्ये तो लोकप्रिय इटालियन टीव्ही लघु मालिकांमध्ये समुद्री चाच्या ''संदोकनची'' भूमिका करण्यासाठी आणि १९८३ च्या [[जेम्स बाँड]] चित्रपट ''[[ऑक्टोपसी|ऑक्टोपसीमध्ये]]'' खलनायक गोविंदाची भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. बेदी [[मुंबई|मुंबईत]] राहतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.kabirbedi.com/contact-me/|title=Residence of Kabir bedi|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20151221130124/http://www.kabirbedi.com/contact-me|archive-date=21 December 2015}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.theartsguild.com/kabir-bedi-lisa-ray-discuss-taj/|title=Kabir Bedi & Lisa Ray Discuss 'TAJ'|date=16 October 2013|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140714132936/http://www.theartsguild.com/kabir-bedi-lisa-ray-discuss-taj/|archive-date=14 July 2014|access-date=11 July 2014}}</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:दिल्ली विद्यापीठाचे माजी विद्यार्थी]] [[वर्ग:इ.स. १९४६ मधील जन्म]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:इंग्लिश चित्रपट अभिनेते]] tuy9sz8otouahwv54awvgsqeabylnpu 2581339 2581336 2025-06-20T16:03:55Z अभय नातू 206 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581339 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''कबीर बेदी''' (जन्म: १६ जानेवारी १९४६) हा एक भारतीय अभिनेता आहे. त्यांची कारकीर्द भारत, अमेरिका आणि विशेषतः इटलीसह इतर पाश्चात्य देशांसह तीन खंडांमध्ये पसरलेली आहे व अनेक माध्यमांमध्ये जसे चित्रपट, दूरदर्शन आणि नाटक.<ref>{{cite news|url=https://www.msn.com/en-in/entertainment/news/kabir-bedi-birthday-2024-tracing-the-actor-s-international-film-journey/ar-AA1n2T8C|title=Kabir Bedi Birthday 2024: Tracing the actor's international film journey|date=16 January 2024|work=MSN|access-date=5 February 2024}}</ref><ref>{{cite news|url=https://timesofindia.indiatimes.com/videos/entertainment/hindi/kabir-bedi-reveals-he-is-a-17th-generation-descendant-of-guru-nanak-as-he-commemorates-his-550th-birth-anniversary/videoshow/72032599.cms|title=Kabir Bedi reveals he is a '17th generation descendant' of Guru Nanak as he commemorates his 550th birth anniversary|date=13 November 2019|work=The Times of India|access-date=5 February 2024|archive-url=https://web.archive.org/web/20240205120104/https://timesofindia.indiatimes.com/videos/entertainment/hindi/kabir-bedi-reveals-he-is-a-17th-generation-descendant-of-guru-nanak-as-he-commemorates-his-550th-birth-anniversary/videoshow/72032599.cms|archive-date=5 February 2024|url-status=live}}</ref> ब्लॉकबस्टर ''[[खून भारी मांग]]'' (१९८८) या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या संजय वर्माच्या खलनायकी भूमिकेसाठी आणि ''ताज महल: एन इटर्नल लव्ह स्टोरी'' (२००५) मधील [[शाह जहान|सम्राट शाहजहानच्या]] भूमिकेसाठी ते प्रसिद्ध आहेत. इटली आणि युरोपमध्ये तो लोकप्रिय इटालियन टीव्ही लघु मालिकांमध्ये समुद्री चाच्या ''संदोकनची'' भूमिका करण्यासाठी आणि १९८३ च्या [[जेम्स बाँड]] चित्रपट ''[[ऑक्टोपसी|ऑक्टोपसीमध्ये]]'' खलनायक गोविंदाची भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. बेदी [[मुंबई|मुंबईत]] राहतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.kabirbedi.com/contact-me/|title=Residence of Kabir bedi|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20151221130124/http://www.kabirbedi.com/contact-me|archive-date=21 December 2015}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.theartsguild.com/kabir-bedi-lisa-ray-discuss-taj/|title=Kabir Bedi & Lisa Ray Discuss 'TAJ'|date=16 October 2013|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140714132936/http://www.theartsguild.com/kabir-bedi-lisa-ray-discuss-taj/|archive-date=14 July 2014|access-date=11 July 2014}}</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:दिल्ली विद्यापीठाचे माजी विद्यार्थी]] [[वर्ग:इ.स. १९४६ मधील जन्म]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:इंग्लिश चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:इटालियन दूरचित्रवाणी अभिनेते]] hi0gq74lwxkjtioxn249jw2ioks4lj0 2581340 2581339 2025-06-20T16:06:58Z अभय नातू 206 दुवा 2581340 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''कबीर बेदी''' (जन्म: १६ जानेवारी १९४६) हा एक भारतीय अभिनेता आहे. त्यांची कारकीर्द भारत, अमेरिका आणि विशेषतः इटलीसह इतर पाश्चात्य देशांसह तीन खंडांमध्ये पसरलेली आहे व अनेक माध्यमांमध्ये जसे चित्रपट, दूरदर्शन आणि नाटक.<ref>{{cite news|url=https://www.msn.com/en-in/entertainment/news/kabir-bedi-birthday-2024-tracing-the-actor-s-international-film-journey/ar-AA1n2T8C|title=Kabir Bedi Birthday 2024: Tracing the actor's international film journey|date=16 January 2024|work=MSN|access-date=5 February 2024}}</ref><ref>{{cite news|url=https://timesofindia.indiatimes.com/videos/entertainment/hindi/kabir-bedi-reveals-he-is-a-17th-generation-descendant-of-guru-nanak-as-he-commemorates-his-550th-birth-anniversary/videoshow/72032599.cms|title=Kabir Bedi reveals he is a '17th generation descendant' of Guru Nanak as he commemorates his 550th birth anniversary|date=13 November 2019|work=The Times of India|access-date=5 February 2024|archive-url=https://web.archive.org/web/20240205120104/https://timesofindia.indiatimes.com/videos/entertainment/hindi/kabir-bedi-reveals-he-is-a-17th-generation-descendant-of-guru-nanak-as-he-commemorates-his-550th-birth-anniversary/videoshow/72032599.cms|archive-date=5 February 2024|url-status=live}}</ref> ब्लॉकबस्टर ''[[खून भरी मांग]]'' (१९८८) या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या संजय वर्माच्या खलनायकी भूमिकेसाठी आणि ''ताज महल: एन इटर्नल लव्ह स्टोरी'' (२००५) मधील [[शाह जहान|सम्राट शाहजहानच्या]] भूमिकेसाठी ते प्रसिद्ध आहेत. इटली आणि युरोपमध्ये तो लोकप्रिय इटालियन टीव्ही लघु मालिकांमध्ये समुद्री चाच्या ''संदोकनची'' भूमिका करण्यासाठी आणि १९८३ च्या [[जेम्स बाँड]] चित्रपट ''[[ऑक्टोपसी|ऑक्टोपसीमध्ये]]'' खलनायक गोविंदाची भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. बेदी [[मुंबई|मुंबईत]] राहतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.kabirbedi.com/contact-me/|title=Residence of Kabir bedi|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20151221130124/http://www.kabirbedi.com/contact-me|archive-date=21 December 2015}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.theartsguild.com/kabir-bedi-lisa-ray-discuss-taj/|title=Kabir Bedi & Lisa Ray Discuss 'TAJ'|date=16 October 2013|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140714132936/http://www.theartsguild.com/kabir-bedi-lisa-ray-discuss-taj/|archive-date=14 July 2014|access-date=11 July 2014}}</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:बेदी, कबीर}} [[वर्ग:दिल्ली विद्यापीठाचे माजी विद्यार्थी]] [[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:इंग्लिश चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:इटालियन दूरचित्रवाणी अभिनेते]] [[वर्ग:इ.स. १९४६ मधील जन्म]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] bip34nd4vk8nzwhdzp6vowalb4lqitv खून भरी मांग 0 366635 2581341 2581198 2025-06-20T16:07:25Z अभय नातू 206 removed [[Category:इ.स. १९८८ मधील चित्रपट]] - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581341 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''''खून भरी मांग''''' हा १९८८ चा भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे जो [[राकेश रोशन]] यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केला आहे. हा ऑस्ट्रेलियन मिनी-मालिका ''रिटर्न टू ईडन'' (१९८३) वर आधारित असून,<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thenationalnews.com/arts-culture/film/the-law-is-catching-up-but-is-it-enough-to-deter-bollywood-plagiarism-1.763483?outputType=amp|title=The law is catching up but is it enough to deter Bollywood plagiarism?|date=26 August 2018}}</ref> यामध्ये [[रेखा]] एका श्रीमंत विधवेची भूमिका साकारते जिला तिच्या दुसऱ्या पतीने जवळजवळ मारले आहे आणि ती त्याचा बदला घेण्यासाठी तयार होते. हा चित्रपट रेखासाठी पुनरागमनाचा एक उपक्रम होता आणि तो समीक्षात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला. ३४ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला सात नामांकने मिळाली, ज्यात रोशनसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि [[फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा]] समावेश होता आणि रेखाला तिचा दुसरा [[फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा]] पुरस्कार मिळाला. ''खून भरी मांग'' १२ ऑगस्ट १९८८ रोजी प्रदर्शित झाला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://news.google.com/newspapers?nid=P9oYG7HA76QC&dat=19880812&printsec=frontpage&hl=en|title=Khoon Bhari Maang|date=12 August 1988|work=[[The Indian Express]]|page=4|access-date=6 November 2020}}</ref> == संगीत == या चित्रपटात [[राजेश रोशन]] यांनी संगीतबद्ध केलेली चार गाणी आहेत: * "हसते हसते कट जायें रस्ते" - [[नितीन मुकेश]], [[साधना सरगम]] * "जीने के बहने लाखों हैं" - [[आशा भोसले]] * "मैं हसीना गजब की" - आशा भोसले, साधना सरगम * "मैं तेरी हूं जानम" - साधना सरगम * "हसते हसते कट जायें रस्ते" - साधना सरगम, सोनाली "मैं तेरी हूं जानम" या गाण्याची चाल ब्रिटीश चित्रपट ''चॅरियट्स ऑफ फायरच्या'' थीम सॉंगमधून कॉपी केले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://movies.ndtv.com/music/world-music-day-10-hit-songs-bollywood-copied-from-abroad-640166|title=World Music Day: 10 Hit Songs Bollywood Copied From Abroad|date=21 June 2014|website=[[NDTV]]|access-date=14 July 2017}}</ref> == पुरस्कार == '''जिंकले''' * [[फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट अभिनेत्री]] - [[रेखा]] * [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री]] - [[सोनू वालिया]] * सर्वोत्कृष्ट संपादन - संजय वर्मा '''नामांकित''' * [[फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार|सर्वोत्कृष्ट चित्रपट]] - [[राकेश रोशन]] * [[फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक]] - राकेश रोशन * [[फिल्मफेर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक]] - [[राजेश रोशन]] * [[फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका]] - [[साधना सरगम]] "मैं तेरी हूँ जानम" साठी == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:भारतीय अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट]] [[वर्ग:इ.स. १९८८ मधील हिंदी चित्रपट]] [[वर्ग:राकेश रोशन दिग्दर्शित चित्रपट]] 841zhe67smjctvdrgm8rr27628er8ty करण अर्जुन 0 366642 2581344 2581246 2025-06-20T16:10:29Z अभय नातू 206 removed [[Category:इ.स. १९९५ मधील चित्रपट]] - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581344 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''''करण अर्जुन''''' हा १९९५ चा भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील काल्पनिक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे जो [[राकेश रोशन]] दिग्दर्शित आणि निर्मित आहे. ह्यामध्ये [[सलमान खान]], [[शाहरुख खान]], [[राखी गुलजार]], [[ममता कुलकर्णी]] आणि [[काजोल]] यांच्या प्रमुख भूमिका आहेत. [[अमरीश पुरी]] हे मुख्य खलनायक आहेत, तर [[जॉनी लीवर|जॉनी लिव्हर]], अर्जुन, जॅक गौड, रणजीत आणि आसिफ शेख हे सहाय्यक भूमिकेत दिसतात. हा चित्रपट दोन भावांची कथा आहे जे त्यांच्या लोभी काकांकडून आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी प्रयत्न करतात पण मारले जातात आणि बदला पूर्ण करण्यासाठी त्यांना पुनर्जन्म मिळतो. ''करण अर्जुन'' हा चित्रपट १३ जानेवारी १९९५ रोजी भारतात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि त्याने ४५० दशलक्ष रु <ref name="boi95">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://boxofficeindia.com/showProd.php?itemCat=201&catName=MTk5NQ==|title=Box Office 1995|publisher=[[Box Office India]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20090130220613/http://boxofficeindia.com/showProd.php?itemCat=201&catName=MTk5NQ==|archive-date=30 January 2009|access-date=26 August 2018}}</ref> ( {{USD|{{#expr:640/32.418074 round 0}} million}} ) कमावले, <ref name="exchange95">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ofx.com/en-gb/forex-news/historical-exchange-rates/yearly-average-rates/|title=32.418074 INR per USD in 1995|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20170713183556/https://www.ofx.com/en-gb/forex-news/historical-exchange-rates/yearly-average-rates/|archive-date=13 July 2017|access-date=3 November 2017}}</ref> आणि १९९५ मध्ये ''[[दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे]]'' (शाहरुख खान, काजोल आणि अमरीश पुरी यांच्याही भूमिका) नंतर दुसरा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला.<ref>{{cite web|url=https://www.bollywoodhungama.com/news/bollywood/breaking-rakesh-roshans-karan-arjun-re-release-november-22-salman-khan-shah-rukh-khan-starrer-creates-history-becoming-first-film-re-release-worldwide/|title=BREAKING: Rakesh Roshan’s Karan Arjun to re-release on November 22; Salman Khan – Shah Rukh Khan starrer creates history by becoming the FIRST film to re-release WORLDWIDE|work=Bollywood Hungama|access-date=28 October 2024}}</ref> ४१ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, ''करण अर्जुनला'' [[फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार|सर्वोत्कृष्ट चित्रपट]], [[फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक]] (रोशन), [[फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट अभिनेता]] (सलमान खान) आणि [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री]] (राखी) असे १० नामांकने मिळाली आणि त्याने सर्वोत्कृष्ट संपादन आणि सर्वोत्कृष्ट कृती असे २ पुरस्कार जिंकले. == निर्मीती == संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण [[राजस्थान|राजस्थानमध्ये]] झाले आहे. चित्रपटात दाखवलेले गाव राजस्थानमधील [[अल्वर|अलवर]] जिल्ह्यातील भानगढ नावाचे एक गाव आहे.<ref name="production2">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.oneshotoneplace.com/2011/09/13/shah-rukh-khansalman-khan-and-hrithik-roshan-in-1995/|title=Salman Khan, Shahrukh Khan & Hrithik Roshan on the sets of Karan Arjun in 1995|website=One Shot One Place|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20120102005032/http://www.oneshotoneplace.com/2011/09/13/shah-rukh-khansalman-khan-and-hrithik-roshan-in-1995/|archive-date=2 January 2012}}</ref> एका गाण्यात करण अर्जुन प्रार्थना करतो ते दुर्गा मंदिर [[अजमेर|अजमेरजवळील]] [[पुष्कर]] येथे आहे.<ref name="production2" /> सरिस्का पॅलेसचा वापर ठाकूर दुर्जन सिंह यांचे घर म्हणून केला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bollylocations.com/movies/Karan-Arjun|title=Bollywood Movie Karan Arjun Shooting Location|website=bollylocations.com|language=en-gb|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20170614204011/http://www.bollylocations.com/movies/Karan-Arjun|archive-date=14 June 2017|access-date=2017-05-25}}</ref> == संगीत == संगीत आणि पार्श्वसंगीत [[राजेश रोशन]] यांनी दिले होते आणि सर्व गाण्यांचे बोल [[इंदीवर]] यांनी लिहिले होते. संगीत हक्क मूळतः टाइम मॅग्नेटिक्स (आता टिप्स म्युझिक ) ने विकत घेतले होते. {| class="wikitable sortable" !शीर्षक ! गायक ! लांबी |- | "ये बंधन तो" | उदित नारायण, कुमार सानू आणि अलका याज्ञिक | ०५:४० |- | "ये बंधन तो" (२) | [[उदित नारायण]] | ०१:३८ |- | "भांगडा पाले" | मोहम्मद अजीज, सुदेश भोसले आणि साधना सरगम | ०७:०७ |- | "एक मुंडा" | [[लता मंगेशकर]] | ०७:३८ |- | "जय माँ काली" | [[कुमार सानू]], [[अलका याज्ञिक]] आणि [[अमरीश पुरी]] | ०७:०७ |- | "गप चूप गप चूप" | [[अलका याज्ञिक]] आणि [[ईला अरुण|इला अरुण]] | ०६:०२ |- | "जाती हूं मैं" | [[कुमार सानू]] आणि [[अलका याज्ञिक]] | ०६:२४ |} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:भारतीय ॲक्शन ड्रामा चित्रपट]] [[वर्ग:राकेश रोशन दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:इ.स. १९९५ मधील हिंदी चित्रपट]] l44gfn1s8srqvhdrpjkt7ly4jxbky42 कोयला (चित्रपट) 0 366643 2581345 2581263 2025-06-20T16:11:36Z अभय नातू 206 removed [[Category:इ.स. १९९७ मधील चित्रपट]] - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581345 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''''कोयला''''' हा १९९७ चा भारतीय हिंदी भाषेतील अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे जो [[राकेश रोशन]] यांनी दिग्दर्शित, सह-लेखन आणि निर्मिती केला आहे. या चित्रपटात [[शाहरुख खान]], [[माधुरी दीक्षित]] आणि [[अमरीश पुरी]] यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर [[जॉनी लीवर|जॉनी लिव्हर]], [[अशोक सराफ]], सलीम घौस, दीपशिखा आणि [[हिमानी शिवपुरी]] सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत; [[मोहनीश बहल|मोहनीश बहलची]] खास उपस्थिती. हा चित्रपट १८ एप्रिल १९९७ रोजी जगभरात प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई करणारा चित्रपट म्हणून घोषित झाला. त्याने जगभरात २८.०५ {{INR}} कमाई केली, तर त्याचे बजेट {{INR}} ११.९० कोटी होते. १९९७ मध्ये ''कोयला'' हा भारतातील ८ वा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला.<ref>{{Cite web|url=https://www.boxofficeindia.com/hit-down.php?txtYearlyData=1990-1999&year=1997|title=Top Hits 1997 - - Box Office India}}</ref><ref>{{cite book|url=https://books.google.com/books?id=7OxBCwAAQBAJ&dq=Koyla+Shah+Rukh&pg=PT212|title=Shah Rukh Can: The Story of the Man and Star Called Shah Rukh Khan|publisher=Om Books International|isbn=9788187108269}}</ref> या चित्रपटाने अमरीश पुरी यांना ४३ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट खलनायकाचे नामांकनही मिळवून दिले. काही दृश्ये [[अरुणाचल प्रदेश|अरुणाचल प्रदेशातील]] [[तवांग]] येथे चित्रित करण्यात आली.<ref>{{cite news|last1=Riba|first1=Moji|url=https://arunachaltimes.in/index.php/2019/06/30/lights-camera-and-anticipation/|title=Lights, camera and anticipation {{!}} The Arunachal Times|date=30 June 2019|publisher=The Arunachal Times|access-date=15 July 2022}}</ref><ref>{{cite web|url=https://www.beontheroad.com/2011/01/jung-falls-sensational-setting.html|title=Jung Falls: A Sensational Setting! - Be On The Road {{!}} Live your Travel Dream!|website=www.beontheroad.com|access-date=15 July 2022}}</ref> == गीत == "देखा तुझे तो" आणि "घुंगटे में चंदा" हे गाणे खूप लोकप्रिय झाले. {| class="wikitable sortable" style="font-size:95%;" !# ! शीर्षक ! गायक ! लांबी |- | १. | "देखा तुझे तो" | [[कुमार सानू]], [[अलका याज्ञिक]] | ०७:३२ |- | २. | "घूंगते में चंदा" | [[उदित नारायण]] | ०६:१७ |- | ३. | "बदन जुदा होते" | कुमार सानू, प्रीती सिंग | १०:३० |- | ४. | "सांसो की माला" | [[कविता कृष्णमूर्ती]] | ०६:४७ |- | ५. | "तनहाई तनहाई" | उदित नारायण, अलका याज्ञिक | ०५:३५ |- | ६. | "भांग के नशे" | अलका याज्ञिक | ०६:०७ |} == संदर्भ == <references /> [[वर्ग:राकेश रोशन दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:भारतीय अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट]] [[वर्ग:इ.स. १९९७ मधील हिंदी चित्रपट]] lw2b0u5c7ed4tzyphfzra1767i894yw सदस्य चर्चा:Kanhaiyya 3 366646 2581288 2025-06-20T12:08:40Z साहाय्य चमू 25365 नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 2581288 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Kanhaiyya}} -- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १७:३८, २० जून २०२५ (IST) drlrmau7zgnam2kir6q09vgnmoqzpvh अंबुर्डीखुर्द 0 366647 2581300 2025-06-20T13:00:49Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[अंबुर्डीखुर्द]] वरुन [[अंबुर्डी खुर्द]] ला हलविला 2581300 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[अंबुर्डी खुर्द]] e2fitb9z6c51lccgiu3g2t6oewuc44c अंबुर्डीबुद्रुक 0 366648 2581302 2025-06-20T13:01:02Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[अंबुर्डीबुद्रुक]] वरुन [[अंबुर्डी बुद्रुक]] ला हलविला 2581302 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[अंबुर्डी बुद्रुक]] grvwn0odl7vdwhrh5u1jhgo0s7dmltb आझीझ इमाम 0 366649 2581304 2025-06-20T13:01:40Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने पुनर्निर्देशन ठेउन लेख [[आझीझ इमाम]] वरुन [[अझीझ इमाम]] ला हलविला 2581304 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[अझीझ इमाम]] nalnm5nrl10ym0cwic9cbovla4hds3w अल्लीपुर 0 366650 2581306 2025-06-20T13:03:42Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[अल्लीपुर]] वरुन [[अल्लीपूर]] ला हलविला 2581306 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[अल्लीपूर]] tgo18ufqsknve92ih64btlivieipisi मेरा गाव मेरा देश 0 366651 2581327 2025-06-20T15:51:54Z अभय नातू 206 लेखनभेद 2581327 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मेरा गाँव मेरा देश]] mrp79ooxqpxyyeqyknsmht0t8an6zqb झीह्ल नदी 0 366652 2581342 2025-06-20T16:07:40Z Vikrantkorde 7381 "[[:en:Special:Redirect/revision/1269839529|Sihl]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले 2581342 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट नदी|name=झिह|mouth_coordinates={{coord|47.3826|8.5382|display=it|region:CH_type:river}}|progression={{RLimmat}}|नदी_नाव=झिह|नदी_चित्र=OberhalbSihlbrugg.jpg|नदी_चित्र_शीर्षक=झिहब्रग जवळील झिह नदीचा फोटो|नदी_नकाशा=Karte Sihl.png|स्थान=[[स्वित्झर्लंड]]}}'''झिह''' ही [[स्वित्झर्लंड|स्विसमधील]] एक [[नदी]] आहे. या नदीचा उगम ड्रूझबर्ग पर्वतामध्ये होतो. हा पर्वत [[श्वित्स (राज्य)|श्विझ कॅन्टन]] मध्ये आहे. तिचा शेवट [[लिमाट नदी|लिमाट]] नदीत होतो. [[लिमाट नदी|लिमाट]] ही नदी केंद्रात [[झ्युरिक|झ्युरिक शहर]] पार केल्यानंतर झ्यूरिख-विंटरथुर रेल्वे येथे आहे. तीची लांबी {{Convert|73|km|mi|abbr=on}} आहे. यामध्ये झिहसी जलाशयातील लांबीसुध्दा गणलेली आहे, ज्यातून ही नदी वाहते. झिहसी येथे नदीतून पाणी काढले जाते, ज्यामुळे डाउनस्ट्रीम पाण्याचा प्रवाह कमी होतो आणि परिणामी पाण्याची गुणवत्ता कमी होते.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref> ही नदी [[श्वित्स (राज्य)|श्विझ]], [[झ्युरिक (राज्य)|झ्यूरिख]] आणि [[त्सुग (राज्य)|झुग]] या भागातून वाहते. या नदीचे झिह खोरे हे सर्व [[झ्युरिक]]<nowiki/>कॅन्टनमध्ये आहेत. झिह नदीच्या खोऱ्यात लंगनाऊ ॲम अल्बिस आणि ॲडलिसविल, तसेच झ्यूरिख शहराचा दक्षिण-पश्चिम भाग येतो. लंगनाऊ ॲम अल्बिसच्या वर काही भाग लिमट नदीच्या संगमस्थानापासून {{Convert|13|km|abbr=on}} अंतरावर आहे. नदीच्या बाजूला कोणतीही मोठी वसाहत नाही. फक्त काही लहान गावे आहेत. तर एन्सिएडेलन शहर झिहसीच्या जवळ स्थित आहे. ते एका उपनदी नदीच्या खोऱ्यात आहे. == व्युत्पत्ती == झिह या नावाचा पहिला लिखित संदर्भ १०१८ चा आहे. त्याचा उल्लेख सिलाहा असा आहे. हे नाव असू शकते. जुने युरोपियन किंवा [[सेल्टिक भाषासमूह|सेल्टिक]] मूळ असलेला शब्द झिला ("शांत जलप्रवाह", सिल = "ट्रिकल, वेट") > [[रोमान्स भाषासमूह|प्रेमसंबंध]] सिला जुन्या उच्च जर्मन घटकाच्या जोडीसह आहा म्हणजे "वाहणारे पाणी" असा आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ortsnamen.ch/Texte/Lunnern2010.pdf|title=Lunnern. Londons Zwilling im Reusstal. Eine sprach- und kulturgeschichtliche Verortung von Siedlungsnamen|last=Daniel Gut|date=2010|language=German|access-date=27 September 2015}}</ref> == नदीचा मार्ग == [[चित्र:Sihlsee_-_Willerzell_-_Etzel_Kulm_2010-10-21_16-50-28.JPG|उजवे|इवलेसे|झिहसी, झिहची वरची दरी आणि ड्रूझबर्ग पर्वत]] ड्रूझबर्ग पर्वताच्या उत्तर-पूर्व बाजूला या नदीचा उगम होतो. हा भाग उंटेरबर्गची नगरपालिका, [[श्वित्स (राज्य)|श्विझ कॅन्टन]] येथे आहे. त्यानंतर ती स्टुडेन गावाच्या उत्तरेकडे वाहते. स्टुडेनच्या खाली {{Convert|2|km|mi|abbr=on}} अंतरावर ही नदी कृत्रिम झिहसी जलाशयात प्रवेश करते. जवळच, मिंस्टर नावाची नदी झिहसी जलाशयात मध्ये येते. हा जलाशय बांधण्यापूर्वी ती नही झिहची थेट उपनदी होती. [[Eubach|युबाख]], [[Rickentalbach|रिकेन्टलबाख]] आणि [[Grossbach (Sihl)|ग्रॉसबाख]] हे प्रवाह देखील झिहसी जलाशयामार्गे झिहमध्ये मिसळतात.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref> झिहसी जलाशय {{Convert|8.5|km|mi|abbr=on}} लांब आहे. तो एन्सिएडेलन शहराच्या जवळ आहे. हे स्वित्झर्लंडचे सर्वात मोठे कृत्रिम सरोवर आहे. यात एक {{Convert|33|m|ft|0|adj=on}} लांबीचे धरण आहे. झिहसी येथून एक बोगद्यातून खाली पाणी वळवून वीज निर्माण केली जाते. ज्याची पाण्याची पातळी {{Convert|889|m|ft|abbr=on}} आहे. [[Etzelwerk|एट्झेलवर्क]] कंपनीतर्फेयेथील [[जलविद्युत]] वीज केंद्र चालवले जाते. हे केंद्र आल्टेंडॉर्फ येथे आहे. त्यानंतर ते पाणी झ्युरिक सरोवरात सोडले जाते. या सरोवरातील पाण्याची पातळी {{Convert|406|m|ft|abbr=on}} आहे. यामुळे धरणाच्या खाली पाण्याचा प्रवाह कमी होते. ज्याचा पाण्याच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो. हिवाळ्यात कमी प्रवाहामुळे नदी काही ठिकाणी कोरडी होते.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.sbb.ch/sbb-konzern/sbb-als-geschaeftspartnerin/angebote-fuer-evus/energie/erzeugung/wasserkraftwerke/etzelwerk.html|title=Wasserkraftwerk Etzelwerk|publisher=[[Swiss Federal Railways]]|language=German|trans-title=Etzelwerk Hydro-electric Power Station|access-date=23 June 2015}}</ref> [[चित्र:Sihl_Unterhalb_Sihlsprung_1.JPG|उजवे|इवलेसे|झिहस्प्रुंग रॅपिड्स]] == पूराचा धोका == झिहसी तलावातून जवळपास {{Convert|50|km|mi|0}} लांबीची ही नदी वाहते. हा भाग झ्युरिक शहराच्या मध्यभागी आहे. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की धरण फुटल्यास २ तासांच्या आत {{Convert|8|m|ft|0|adj=on}} उंचीची लाटेने शहरात पाणी शिरु शकते. नदी झ्यूरिख हाॅपबॅनहॉफ स्टेशनमधून नदीच्या प्रवाहाची क्षमता मर्यादित करण्यासाठी एका बोगद्यातून वळवलेली आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बोगद्याच्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली जाते. या धोक्यामुळे झ्युरिक शहराच्या महानगरपालिकेने शहरातील प्रभावित भागांसाठी स्थलांतर योजना विकसित, प्रकाशित आणि चाचणी केली आहे.<ref name="ethmodel">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.vaw.ethz.ch/people/fb/hifloria/projects/data/fb_sihldurchlaesse_hbz_im_hyd_modellversuch|title=Physical model experiments on the Sihl culverts at Zurich main station|publisher=ETH Zürich|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150604145929/http://www.vaw.ethz.ch/people/fb/hifloria/projects/data/fb_sihldurchlaesse_hbz_im_hyd_modellversuch|archive-date=2015-06-04|access-date=4 June 2015}}</ref><ref name="cozwa">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.stadt-zuerich.ch/content/dam/stzh/pd/Deutsch/Schutz%20und%20Rettung/Zivilschutz/Publikationen%20und%20Broschueren/3.4.8_Wasseralarm.pdf|title=Wasseralarm Sihlsee|publisher=Stadt Zürich|language=German|access-date=4 June 2015}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|last=Bruen|first=M.|last2=Krahe|first2=P.|last3=Zappa|first3=M.|last4=Olsson|first4=J.|last5=Vehvilainen|first5=B.|last6=Kok|first6=K.|last7=Daamen|first7=K.|year=2010|title=Visualizing flood forecasting uncertainty: some current European EPS platforms—COST731 working group 3|url=http://researchrepository.ucd.ie/bitstream/10197/2330/1/162%20corrected%20version.pdf|journal=Atmospheric Science Letters|volume=11|issue=2|pages=92–99|doi=10.1002/asl.258|doi-access=free}}</ref> ६, ८०५२ झ्युरिक स्वित्झर्लंड इलेक्ट्रो झ्युरिक == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == * {{Commonscat-inline|Sihl}} * Sihl in German, French and Italian in the online Historical Dictionary of Switzerland. * [http://www.momstotszurich.com/2013/04/bike-path-along-sihl-ch-zh.html झिहच्या खालच्या बाजूला असलेल्या सायकल मार्गाचे वर्णन] * [https://web.archive.org/web/20031210235152/http://www.sihlsee.ch.vu/] * http://www.sihlwald.ch [[वर्ग:झ्युरिकचा भूगोल]] [[वर्ग:स्वित्झर्लंडमधील नद्या]] [[वर्ग:झ्युरिकच्या कॅन्टोनमधील नद्या]] o1pjn96e3f4aujdvhh85rix1wlsstno 2581343 2581342 2025-06-20T16:07:43Z KiranBOT II 140753 शुद्धलेखन ([[सदस्य:KiranBOT II/typos#गट १|अधिक माहिती]]) 2581343 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट नदी|name=झिह|mouth_coordinates={{coord|47.3826|8.5382|display=it|region:CH_type:river}}|progression={{RLimmat}}|नदी_नाव=झिह|नदी_चित्र=OberhalbSihlbrugg.jpg|नदी_चित्र_शीर्षक=झिहब्रग जवळील झिह नदीचा फोटो|नदी_नकाशा=Karte Sihl.png|स्थान=[[स्वित्झर्लंड]]}}'''झिह''' ही [[स्वित्झर्लंड|स्विसमधील]] एक [[नदी]] आहे. या नदीचा उगम ड्रूझबर्ग पर्वतामध्ये होतो. हा पर्वत [[श्वित्स (राज्य)|श्विझ कॅन्टन]] मध्ये आहे. तिचा शेवट [[लिमाट नदी|लिमाट]] नदीत होतो. [[लिमाट नदी|लिमाट]] ही नदी केंद्रात [[झ्युरिक|झ्युरिक शहर]] पार केल्यानंतर झ्यूरिख-विंटरथुर रेल्वे येथे आहे. तीची लांबी {{Convert|73|km|mi|abbr=on}} आहे. यामध्ये झिहसी जलाशयातील लांबीसुद्धा गणलेली आहे, ज्यातून ही नदी वाहते. झिहसी येथे नदीतून पाणी काढले जाते, ज्यामुळे डाउनस्ट्रीम पाण्याचा प्रवाह कमी होतो आणि परिणामी पाण्याची गुणवत्ता कमी होते.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref> ही नदी [[श्वित्स (राज्य)|श्विझ]], [[झ्युरिक (राज्य)|झ्यूरिख]] आणि [[त्सुग (राज्य)|झुग]] या भागातून वाहते. या नदीचे झिह खोरे हे सर्व [[झ्युरिक]]<nowiki/>कॅन्टनमध्ये आहेत. झिह नदीच्या खोऱ्यात लंगनाऊ ॲम अल्बिस आणि ॲडलिसविल, तसेच झ्यूरिख शहराचा दक्षिण-पश्चिम भाग येतो. लंगनाऊ ॲम अल्बिसच्या वर काही भाग लिमट नदीच्या संगमस्थानापासून {{Convert|13|km|abbr=on}} अंतरावर आहे. नदीच्या बाजूला कोणतीही मोठी वसाहत नाही. फक्त काही लहान गावे आहेत. तर एन्सिएडेलन शहर झिहसीच्या जवळ स्थित आहे. ते एका उपनदी नदीच्या खोऱ्यात आहे. == व्युत्पत्ती == झिह या नावाचा पहिला लिखित संदर्भ १०१८ चा आहे. त्याचा उल्लेख सिलाहा असा आहे. हे नाव असू शकते. जुने युरोपियन किंवा [[सेल्टिक भाषासमूह|सेल्टिक]] मूळ असलेला शब्द झिला ("शांत जलप्रवाह", सिल = "ट्रिकल, वेट") > [[रोमान्स भाषासमूह|प्रेमसंबंध]] सिला जुन्या उच्च जर्मन घटकाच्या जोडीसह आहा म्हणजे "वाहणारे पाणी" असा आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ortsnamen.ch/Texte/Lunnern2010.pdf|title=Lunnern. Londons Zwilling im Reusstal. Eine sprach- und kulturgeschichtliche Verortung von Siedlungsnamen|last=Daniel Gut|date=2010|language=German|access-date=27 September 2015}}</ref> == नदीचा मार्ग == [[चित्र:Sihlsee_-_Willerzell_-_Etzel_Kulm_2010-10-21_16-50-28.JPG|उजवे|इवलेसे|झिहसी, झिहची वरची दरी आणि ड्रूझबर्ग पर्वत]] ड्रूझबर्ग पर्वताच्या उत्तर-पूर्व बाजूला या नदीचा उगम होतो. हा भाग उंटेरबर्गची नगरपालिका, [[श्वित्स (राज्य)|श्विझ कॅन्टन]] येथे आहे. त्यानंतर ती स्टुडेन गावाच्या उत्तरेकडे वाहते. स्टुडेनच्या खाली {{Convert|2|km|mi|abbr=on}} अंतरावर ही नदी कृत्रिम झिहसी जलाशयात प्रवेश करते. जवळच, मिंस्टर नावाची नदी झिहसी जलाशयात मध्ये येते. हा जलाशय बांधण्यापूर्वी ती नही झिहची थेट उपनदी होती. [[Eubach|युबाख]], [[Rickentalbach|रिकेन्टलबाख]] आणि [[Grossbach (Sihl)|ग्रॉसबाख]] हे प्रवाह देखील झिहसी जलाशयामार्गे झिहमध्ये मिसळतात.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref> झिहसी जलाशय {{Convert|8.5|km|mi|abbr=on}} लांब आहे. तो एन्सिएडेलन शहराच्या जवळ आहे. हे स्वित्झर्लंडचे सर्वात मोठे कृत्रिम सरोवर आहे. यात एक {{Convert|33|m|ft|0|adj=on}} लांबीचे धरण आहे. झिहसी येथून एक बोगद्यातून खाली पाणी वळवून वीज निर्माण केली जाते. ज्याची पाण्याची पातळी {{Convert|889|m|ft|abbr=on}} आहे. [[Etzelwerk|एट्झेलवर्क]] कंपनीतर्फेयेथील [[जलविद्युत]] वीज केंद्र चालवले जाते. हे केंद्र आल्टेंडॉर्फ येथे आहे. त्यानंतर ते पाणी झ्युरिक सरोवरात सोडले जाते. या सरोवरातील पाण्याची पातळी {{Convert|406|m|ft|abbr=on}} आहे. यामुळे धरणाच्या खाली पाण्याचा प्रवाह कमी होते. ज्याचा पाण्याच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो. हिवाळ्यात कमी प्रवाहामुळे नदी काही ठिकाणी कोरडी होते.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.sbb.ch/sbb-konzern/sbb-als-geschaeftspartnerin/angebote-fuer-evus/energie/erzeugung/wasserkraftwerke/etzelwerk.html|title=Wasserkraftwerk Etzelwerk|publisher=[[Swiss Federal Railways]]|language=German|trans-title=Etzelwerk Hydro-electric Power Station|access-date=23 June 2015}}</ref> [[चित्र:Sihl_Unterhalb_Sihlsprung_1.JPG|उजवे|इवलेसे|झिहस्प्रुंग रॅपिड्स]] == पूराचा धोका == झिहसी तलावातून जवळपास {{Convert|50|km|mi|0}} लांबीची ही नदी वाहते. हा भाग झ्युरिक शहराच्या मध्यभागी आहे. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की धरण फुटल्यास २ तासांच्या आत {{Convert|8|m|ft|0|adj=on}} उंचीची लाटेने शहरात पाणी शिरु शकते. नदी झ्यूरिख हाॅपबॅनहॉफ स्टेशनमधून नदीच्या प्रवाहाची क्षमता मर्यादित करण्यासाठी एका बोगद्यातून वळवलेली आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बोगद्याच्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली जाते. या धोक्यामुळे झ्युरिक शहराच्या महानगरपालिकेने शहरातील प्रभावित भागांसाठी स्थलांतर योजना विकसित, प्रकाशित आणि चाचणी केली आहे.<ref name="ethmodel">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.vaw.ethz.ch/people/fb/hifloria/projects/data/fb_sihldurchlaesse_hbz_im_hyd_modellversuch|title=Physical model experiments on the Sihl culverts at Zurich main station|publisher=ETH Zürich|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150604145929/http://www.vaw.ethz.ch/people/fb/hifloria/projects/data/fb_sihldurchlaesse_hbz_im_hyd_modellversuch|archive-date=2015-06-04|access-date=4 June 2015}}</ref><ref name="cozwa">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.stadt-zuerich.ch/content/dam/stzh/pd/Deutsch/Schutz%20und%20Rettung/Zivilschutz/Publikationen%20und%20Broschueren/3.4.8_Wasseralarm.pdf|title=Wasseralarm Sihlsee|publisher=Stadt Zürich|language=German|access-date=4 June 2015}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|last=Bruen|first=M.|last2=Krahe|first2=P.|last3=Zappa|first3=M.|last4=Olsson|first4=J.|last5=Vehvilainen|first5=B.|last6=Kok|first6=K.|last7=Daamen|first7=K.|year=2010|title=Visualizing flood forecasting uncertainty: some current European EPS platforms—COST731 working group 3|url=http://researchrepository.ucd.ie/bitstream/10197/2330/1/162%20corrected%20version.pdf|journal=Atmospheric Science Letters|volume=11|issue=2|pages=92–99|doi=10.1002/asl.258|doi-access=free}}</ref> ६, ८०५२ झ्युरिक स्वित्झर्लंड इलेक्ट्रो झ्युरिक == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == * {{Commonscat-inline|Sihl}} * Sihl in German, French and Italian in the online Historical Dictionary of Switzerland. * [http://www.momstotszurich.com/2013/04/bike-path-along-sihl-ch-zh.html झिहच्या खालच्या बाजूला असलेल्या सायकल मार्गाचे वर्णन] * [https://web.archive.org/web/20031210235152/http://www.sihlsee.ch.vu/] * http://www.sihlwald.ch [[वर्ग:झ्युरिकचा भूगोल]] [[वर्ग:स्वित्झर्लंडमधील नद्या]] [[वर्ग:झ्युरिकच्या कॅन्टोनमधील नद्या]] s4aopochs8m8c5e1u5x1chg1mggmrg5 2581346 2581343 2025-06-20T16:14:20Z Vikrantkorde 7381 वर्ग टाकले 2581346 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट नदी|name=झिह|mouth_coordinates={{coord|47.3826|8.5382|display=it|region:CH_type:river}}|progression={{RLimmat}}|नदी_नाव=झिह|नदी_चित्र=OberhalbSihlbrugg.jpg|नदी_चित्र_शीर्षक=झिहब्रग जवळील झिह नदीचा फोटो|नदी_नकाशा=Karte Sihl.png|स्थान=[[स्वित्झर्लंड]]}}'''झिह''' ही [[स्वित्झर्लंड|स्विसमधील]] एक [[नदी]] आहे. या नदीचा उगम ड्रूझबर्ग पर्वतामध्ये होतो. हा पर्वत [[श्वित्स (राज्य)|श्विझ कॅन्टन]] मध्ये आहे. तिचा शेवट [[लिमाट नदी|लिमाट]] नदीत होतो. [[लिमाट नदी|लिमाट]] ही नदी केंद्रात [[झ्युरिक|झ्युरिक शहर]] पार केल्यानंतर झ्यूरिख-विंटरथुर रेल्वे येथे आहे. तीची लांबी {{Convert|73|km|mi|abbr=on}} आहे. यामध्ये झिहसी जलाशयातील लांबीसुद्धा गणलेली आहे, ज्यातून ही नदी वाहते. झिहसी येथे नदीतून पाणी काढले जाते, ज्यामुळे डाउनस्ट्रीम पाण्याचा प्रवाह कमी होतो आणि परिणामी पाण्याची गुणवत्ता कमी होते.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref> ही नदी [[श्वित्स (राज्य)|श्विझ]], [[झ्युरिक (राज्य)|झ्यूरिख]] आणि [[त्सुग (राज्य)|झुग]] या भागातून वाहते. या नदीचे झिह खोरे हे सर्व [[झ्युरिक]]<nowiki/>कॅन्टनमध्ये आहेत. झिह नदीच्या खोऱ्यात लंगनाऊ ॲम अल्बिस आणि ॲडलिसविल, तसेच झ्यूरिख शहराचा दक्षिण-पश्चिम भाग येतो. लंगनाऊ ॲम अल्बिसच्या वर काही भाग लिमट नदीच्या संगमस्थानापासून {{Convert|13|km|abbr=on}} अंतरावर आहे. नदीच्या बाजूला कोणतीही मोठी वसाहत नाही. फक्त काही लहान गावे आहेत. तर एन्सिएडेलन शहर झिहसीच्या जवळ स्थित आहे. ते एका उपनदी नदीच्या खोऱ्यात आहे. == व्युत्पत्ती == झिह या नावाचा पहिला लिखित संदर्भ १०१८ चा आहे. त्याचा उल्लेख सिलाहा असा आहे. हे नाव असू शकते. जुने युरोपियन किंवा [[सेल्टिक भाषासमूह|सेल्टिक]] मूळ असलेला शब्द झिला ("शांत जलप्रवाह", सिल = "ट्रिकल, वेट") > [[रोमान्स भाषासमूह|प्रेमसंबंध]] सिला जुन्या उच्च जर्मन घटकाच्या जोडीसह आहा म्हणजे "वाहणारे पाणी" असा आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ortsnamen.ch/Texte/Lunnern2010.pdf|title=Lunnern. Londons Zwilling im Reusstal. Eine sprach- und kulturgeschichtliche Verortung von Siedlungsnamen|last=Daniel Gut|date=2010|language=German|access-date=27 September 2015}}</ref> == नदीचा मार्ग == [[चित्र:Sihlsee_-_Willerzell_-_Etzel_Kulm_2010-10-21_16-50-28.JPG|उजवे|इवलेसे|झिहसी, झिहची वरची दरी आणि ड्रूझबर्ग पर्वत]] ड्रूझबर्ग पर्वताच्या उत्तर-पूर्व बाजूला या नदीचा उगम होतो. हा भाग उंटेरबर्गची नगरपालिका, [[श्वित्स (राज्य)|श्विझ कॅन्टन]] येथे आहे. त्यानंतर ती स्टुडेन गावाच्या उत्तरेकडे वाहते. स्टुडेनच्या खाली {{Convert|2|km|mi|abbr=on}} अंतरावर ही नदी कृत्रिम झिहसी जलाशयात प्रवेश करते. जवळच, मिंस्टर नावाची नदी झिहसी जलाशयात मध्ये येते. हा जलाशय बांधण्यापूर्वी ती नही झिहची थेट उपनदी होती. [[Eubach|युबाख]], [[Rickentalbach|रिकेन्टलबाख]] आणि [[Grossbach (Sihl)|ग्रॉसबाख]] हे प्रवाह देखील झिहसी जलाशयामार्गे झिहमध्ये मिसळतात.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref> झिहसी जलाशय {{Convert|8.5|km|mi|abbr=on}} लांब आहे. तो एन्सिएडेलन शहराच्या जवळ आहे. हे स्वित्झर्लंडचे सर्वात मोठे कृत्रिम सरोवर आहे. यात एक {{Convert|33|m|ft|0|adj=on}} लांबीचे धरण आहे. झिहसी येथून एक बोगद्यातून खाली पाणी वळवून वीज निर्माण केली जाते. ज्याची पाण्याची पातळी {{Convert|889|m|ft|abbr=on}} आहे. [[Etzelwerk|एट्झेलवर्क]] कंपनीतर्फेयेथील [[जलविद्युत]] वीज केंद्र चालवले जाते. हे केंद्र आल्टेंडॉर्फ येथे आहे. त्यानंतर ते पाणी झ्युरिक सरोवरात सोडले जाते. या सरोवरातील पाण्याची पातळी {{Convert|406|m|ft|abbr=on}} आहे. यामुळे धरणाच्या खाली पाण्याचा प्रवाह कमी होते. ज्याचा पाण्याच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो. हिवाळ्यात कमी प्रवाहामुळे नदी काही ठिकाणी कोरडी होते.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.sbb.ch/sbb-konzern/sbb-als-geschaeftspartnerin/angebote-fuer-evus/energie/erzeugung/wasserkraftwerke/etzelwerk.html|title=Wasserkraftwerk Etzelwerk|publisher=[[Swiss Federal Railways]]|language=German|trans-title=Etzelwerk Hydro-electric Power Station|access-date=23 June 2015}}</ref> [[चित्र:Sihl_Unterhalb_Sihlsprung_1.JPG|उजवे|इवलेसे|झिहस्प्रुंग रॅपिड्स]] == पूराचा धोका == झिहसी तलावातून जवळपास {{Convert|50|km|mi|0}} लांबीची ही नदी वाहते. हा भाग झ्युरिक शहराच्या मध्यभागी आहे. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की धरण फुटल्यास २ तासांच्या आत {{Convert|8|m|ft|0|adj=on}} उंचीची लाटेने शहरात पाणी शिरु शकते. नदी झ्यूरिख हाॅपबॅनहॉफ स्टेशनमधून नदीच्या प्रवाहाची क्षमता मर्यादित करण्यासाठी एका बोगद्यातून वळवलेली आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बोगद्याच्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली जाते. या धोक्यामुळे झ्युरिक शहराच्या महानगरपालिकेने शहरातील प्रभावित भागांसाठी स्थलांतर योजना विकसित, प्रकाशित आणि चाचणी केली आहे.<ref name="ethmodel">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.vaw.ethz.ch/people/fb/hifloria/projects/data/fb_sihldurchlaesse_hbz_im_hyd_modellversuch|title=Physical model experiments on the Sihl culverts at Zurich main station|publisher=ETH Zürich|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150604145929/http://www.vaw.ethz.ch/people/fb/hifloria/projects/data/fb_sihldurchlaesse_hbz_im_hyd_modellversuch|archive-date=2015-06-04|access-date=4 June 2015}}</ref><ref name="cozwa">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.stadt-zuerich.ch/content/dam/stzh/pd/Deutsch/Schutz%20und%20Rettung/Zivilschutz/Publikationen%20und%20Broschueren/3.4.8_Wasseralarm.pdf|title=Wasseralarm Sihlsee|publisher=Stadt Zürich|language=German|access-date=4 June 2015}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|last=Bruen|first=M.|last2=Krahe|first2=P.|last3=Zappa|first3=M.|last4=Olsson|first4=J.|last5=Vehvilainen|first5=B.|last6=Kok|first6=K.|last7=Daamen|first7=K.|year=2010|title=Visualizing flood forecasting uncertainty: some current European EPS platforms—COST731 working group 3|url=http://researchrepository.ucd.ie/bitstream/10197/2330/1/162%20corrected%20version.pdf|journal=Atmospheric Science Letters|volume=11|issue=2|pages=92–99|doi=10.1002/asl.258|doi-access=free}}</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == * {{Commonscat-inline|Sihl}} * Sihl in German, French and Italian in the online Historical Dictionary of Switzerland. * [http://www.momstotszurich.com/2013/04/bike-path-along-sihl-ch-zh.html झिहच्या खालच्या बाजूला असलेल्या सायकल मार्गाचे वर्णन] * [https://web.archive.org/web/20031210235152/http://www.sihlsee.ch.vu/] * http://www.sihlwald.ch [[वर्ग:झ्युरिकचा भूगोल]] [[वर्ग:स्वित्झर्लंडमधील नद्या]] [[वर्ग:झ्युरिकच्या कॅन्टोनमधील नद्या]] [[वर्ग:झिह| ]] [[वर्ग:श्विज कॅन्टोनमधील नद्या]] [[वर्ग:झ्युरिच कॅन्टोनमधील नद्या]] ri735v80n70fp2w6dt69fx1ar8lm6fd 2581348 2581346 2025-06-20T16:15:10Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[झिह]] वरुन [[झीह्ल नदी]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत 2581346 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट नदी|name=झिह|mouth_coordinates={{coord|47.3826|8.5382|display=it|region:CH_type:river}}|progression={{RLimmat}}|नदी_नाव=झिह|नदी_चित्र=OberhalbSihlbrugg.jpg|नदी_चित्र_शीर्षक=झिहब्रग जवळील झिह नदीचा फोटो|नदी_नकाशा=Karte Sihl.png|स्थान=[[स्वित्झर्लंड]]}}'''झिह''' ही [[स्वित्झर्लंड|स्विसमधील]] एक [[नदी]] आहे. या नदीचा उगम ड्रूझबर्ग पर्वतामध्ये होतो. हा पर्वत [[श्वित्स (राज्य)|श्विझ कॅन्टन]] मध्ये आहे. तिचा शेवट [[लिमाट नदी|लिमाट]] नदीत होतो. [[लिमाट नदी|लिमाट]] ही नदी केंद्रात [[झ्युरिक|झ्युरिक शहर]] पार केल्यानंतर झ्यूरिख-विंटरथुर रेल्वे येथे आहे. तीची लांबी {{Convert|73|km|mi|abbr=on}} आहे. यामध्ये झिहसी जलाशयातील लांबीसुद्धा गणलेली आहे, ज्यातून ही नदी वाहते. झिहसी येथे नदीतून पाणी काढले जाते, ज्यामुळे डाउनस्ट्रीम पाण्याचा प्रवाह कमी होतो आणि परिणामी पाण्याची गुणवत्ता कमी होते.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref> ही नदी [[श्वित्स (राज्य)|श्विझ]], [[झ्युरिक (राज्य)|झ्यूरिख]] आणि [[त्सुग (राज्य)|झुग]] या भागातून वाहते. या नदीचे झिह खोरे हे सर्व [[झ्युरिक]]<nowiki/>कॅन्टनमध्ये आहेत. झिह नदीच्या खोऱ्यात लंगनाऊ ॲम अल्बिस आणि ॲडलिसविल, तसेच झ्यूरिख शहराचा दक्षिण-पश्चिम भाग येतो. लंगनाऊ ॲम अल्बिसच्या वर काही भाग लिमट नदीच्या संगमस्थानापासून {{Convert|13|km|abbr=on}} अंतरावर आहे. नदीच्या बाजूला कोणतीही मोठी वसाहत नाही. फक्त काही लहान गावे आहेत. तर एन्सिएडेलन शहर झिहसीच्या जवळ स्थित आहे. ते एका उपनदी नदीच्या खोऱ्यात आहे. == व्युत्पत्ती == झिह या नावाचा पहिला लिखित संदर्भ १०१८ चा आहे. त्याचा उल्लेख सिलाहा असा आहे. हे नाव असू शकते. जुने युरोपियन किंवा [[सेल्टिक भाषासमूह|सेल्टिक]] मूळ असलेला शब्द झिला ("शांत जलप्रवाह", सिल = "ट्रिकल, वेट") > [[रोमान्स भाषासमूह|प्रेमसंबंध]] सिला जुन्या उच्च जर्मन घटकाच्या जोडीसह आहा म्हणजे "वाहणारे पाणी" असा आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ortsnamen.ch/Texte/Lunnern2010.pdf|title=Lunnern. Londons Zwilling im Reusstal. Eine sprach- und kulturgeschichtliche Verortung von Siedlungsnamen|last=Daniel Gut|date=2010|language=German|access-date=27 September 2015}}</ref> == नदीचा मार्ग == [[चित्र:Sihlsee_-_Willerzell_-_Etzel_Kulm_2010-10-21_16-50-28.JPG|उजवे|इवलेसे|झिहसी, झिहची वरची दरी आणि ड्रूझबर्ग पर्वत]] ड्रूझबर्ग पर्वताच्या उत्तर-पूर्व बाजूला या नदीचा उगम होतो. हा भाग उंटेरबर्गची नगरपालिका, [[श्वित्स (राज्य)|श्विझ कॅन्टन]] येथे आहे. त्यानंतर ती स्टुडेन गावाच्या उत्तरेकडे वाहते. स्टुडेनच्या खाली {{Convert|2|km|mi|abbr=on}} अंतरावर ही नदी कृत्रिम झिहसी जलाशयात प्रवेश करते. जवळच, मिंस्टर नावाची नदी झिहसी जलाशयात मध्ये येते. हा जलाशय बांधण्यापूर्वी ती नही झिहची थेट उपनदी होती. [[Eubach|युबाख]], [[Rickentalbach|रिकेन्टलबाख]] आणि [[Grossbach (Sihl)|ग्रॉसबाख]] हे प्रवाह देखील झिहसी जलाशयामार्गे झिहमध्ये मिसळतात.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref> झिहसी जलाशय {{Convert|8.5|km|mi|abbr=on}} लांब आहे. तो एन्सिएडेलन शहराच्या जवळ आहे. हे स्वित्झर्लंडचे सर्वात मोठे कृत्रिम सरोवर आहे. यात एक {{Convert|33|m|ft|0|adj=on}} लांबीचे धरण आहे. झिहसी येथून एक बोगद्यातून खाली पाणी वळवून वीज निर्माण केली जाते. ज्याची पाण्याची पातळी {{Convert|889|m|ft|abbr=on}} आहे. [[Etzelwerk|एट्झेलवर्क]] कंपनीतर्फेयेथील [[जलविद्युत]] वीज केंद्र चालवले जाते. हे केंद्र आल्टेंडॉर्फ येथे आहे. त्यानंतर ते पाणी झ्युरिक सरोवरात सोडले जाते. या सरोवरातील पाण्याची पातळी {{Convert|406|m|ft|abbr=on}} आहे. यामुळे धरणाच्या खाली पाण्याचा प्रवाह कमी होते. ज्याचा पाण्याच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो. हिवाळ्यात कमी प्रवाहामुळे नदी काही ठिकाणी कोरडी होते.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.sbb.ch/sbb-konzern/sbb-als-geschaeftspartnerin/angebote-fuer-evus/energie/erzeugung/wasserkraftwerke/etzelwerk.html|title=Wasserkraftwerk Etzelwerk|publisher=[[Swiss Federal Railways]]|language=German|trans-title=Etzelwerk Hydro-electric Power Station|access-date=23 June 2015}}</ref> [[चित्र:Sihl_Unterhalb_Sihlsprung_1.JPG|उजवे|इवलेसे|झिहस्प्रुंग रॅपिड्स]] == पूराचा धोका == झिहसी तलावातून जवळपास {{Convert|50|km|mi|0}} लांबीची ही नदी वाहते. हा भाग झ्युरिक शहराच्या मध्यभागी आहे. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की धरण फुटल्यास २ तासांच्या आत {{Convert|8|m|ft|0|adj=on}} उंचीची लाटेने शहरात पाणी शिरु शकते. नदी झ्यूरिख हाॅपबॅनहॉफ स्टेशनमधून नदीच्या प्रवाहाची क्षमता मर्यादित करण्यासाठी एका बोगद्यातून वळवलेली आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बोगद्याच्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली जाते. या धोक्यामुळे झ्युरिक शहराच्या महानगरपालिकेने शहरातील प्रभावित भागांसाठी स्थलांतर योजना विकसित, प्रकाशित आणि चाचणी केली आहे.<ref name="ethmodel">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.vaw.ethz.ch/people/fb/hifloria/projects/data/fb_sihldurchlaesse_hbz_im_hyd_modellversuch|title=Physical model experiments on the Sihl culverts at Zurich main station|publisher=ETH Zürich|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150604145929/http://www.vaw.ethz.ch/people/fb/hifloria/projects/data/fb_sihldurchlaesse_hbz_im_hyd_modellversuch|archive-date=2015-06-04|access-date=4 June 2015}}</ref><ref name="cozwa">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.stadt-zuerich.ch/content/dam/stzh/pd/Deutsch/Schutz%20und%20Rettung/Zivilschutz/Publikationen%20und%20Broschueren/3.4.8_Wasseralarm.pdf|title=Wasseralarm Sihlsee|publisher=Stadt Zürich|language=German|access-date=4 June 2015}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|last=Bruen|first=M.|last2=Krahe|first2=P.|last3=Zappa|first3=M.|last4=Olsson|first4=J.|last5=Vehvilainen|first5=B.|last6=Kok|first6=K.|last7=Daamen|first7=K.|year=2010|title=Visualizing flood forecasting uncertainty: some current European EPS platforms—COST731 working group 3|url=http://researchrepository.ucd.ie/bitstream/10197/2330/1/162%20corrected%20version.pdf|journal=Atmospheric Science Letters|volume=11|issue=2|pages=92–99|doi=10.1002/asl.258|doi-access=free}}</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == * {{Commonscat-inline|Sihl}} * Sihl in German, French and Italian in the online Historical Dictionary of Switzerland. * [http://www.momstotszurich.com/2013/04/bike-path-along-sihl-ch-zh.html झिहच्या खालच्या बाजूला असलेल्या सायकल मार्गाचे वर्णन] * [https://web.archive.org/web/20031210235152/http://www.sihlsee.ch.vu/] * http://www.sihlwald.ch [[वर्ग:झ्युरिकचा भूगोल]] [[वर्ग:स्वित्झर्लंडमधील नद्या]] [[वर्ग:झ्युरिकच्या कॅन्टोनमधील नद्या]] [[वर्ग:झिह| ]] [[वर्ग:श्विज कॅन्टोनमधील नद्या]] [[वर्ग:झ्युरिच कॅन्टोनमधील नद्या]] ri735v80n70fp2w6dt69fx1ar8lm6fd 2581353 2581348 2025-06-20T16:17:07Z अभय नातू 206 साचा 2581353 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट नदी|name=झिह|mouth_coordinates={{coord|47.3826|8.5382|display=it|region:CH_type:river}}|progression={{RLimmat}}|नदी_नाव=झिह|नदी_चित्र=OberhalbSihlbrugg.jpg|नदी_चित्र_शीर्षक=झिहब्रग जवळील झिह नदीचा फोटो|नदी_नकाशा=Karte Sihl.png|स्थान=[[स्वित्झर्लंड]]}} {{बदल}} '''झिह''' ही [[स्वित्झर्लंड]]मधील एक [[नदी]] आहे. या नदीचा उगम ड्रूझबर्ग पर्वतामध्ये होतो. हा पर्वत [[श्वित्स (राज्य)|श्विझ कॅन्टन]] मध्ये आहे. तिचा शेवट [[लिमाट नदी|लिमाट]] नदीत होतो. [[लिमाट नदी|लिमाट]] ही नदी केंद्रात [[झ्युरिक|झ्युरिक शहर]] पार केल्यानंतर झ्यूरिख-विंटरथुर रेल्वे येथे आहे. तीची लांबी {{Convert|73|km|mi|abbr=on}} आहे. यामध्ये झिहसी जलाशयातील लांबीसुद्धा गणलेली आहे, ज्यातून ही नदी वाहते. झिहसी येथे नदीतून पाणी काढले जाते, ज्यामुळे डाउनस्ट्रीम पाण्याचा प्रवाह कमी होतो आणि परिणामी पाण्याची गुणवत्ता कमी होते.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref> ही नदी [[श्वित्स (राज्य)|श्विझ]], [[झ्युरिक (राज्य)|झ्यूरिख]] आणि [[त्सुग (राज्य)|झुग]] या भागातून वाहते. या नदीचे झिह खोरे हे सर्व [[झ्युरिक]]<nowiki/>कॅन्टनमध्ये आहेत. झिह नदीच्या खोऱ्यात लंगनाऊ ॲम अल्बिस आणि ॲडलिसविल, तसेच झ्यूरिख शहराचा दक्षिण-पश्चिम भाग येतो. लंगनाऊ ॲम अल्बिसच्या वर काही भाग लिमट नदीच्या संगमस्थानापासून {{Convert|13|km|abbr=on}} अंतरावर आहे. नदीच्या बाजूला कोणतीही मोठी वसाहत नाही. फक्त काही लहान गावे आहेत. तर एन्सिएडेलन शहर झिहसीच्या जवळ स्थित आहे. ते एका उपनदी नदीच्या खोऱ्यात आहे. == व्युत्पत्ती == झिह या नावाचा पहिला लिखित संदर्भ १०१८ चा आहे. त्याचा उल्लेख सिलाहा असा आहे. हे नाव असू शकते. जुने युरोपियन किंवा [[सेल्टिक भाषासमूह|सेल्टिक]] मूळ असलेला शब्द झिला ("शांत जलप्रवाह", सिल = "ट्रिकल, वेट") > [[रोमान्स भाषासमूह|प्रेमसंबंध]] सिला जुन्या उच्च जर्मन घटकाच्या जोडीसह आहा म्हणजे "वाहणारे पाणी" असा आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ortsnamen.ch/Texte/Lunnern2010.pdf|title=Lunnern. Londons Zwilling im Reusstal. Eine sprach- und kulturgeschichtliche Verortung von Siedlungsnamen|last=Daniel Gut|date=2010|language=German|access-date=27 September 2015}}</ref> == नदीचा मार्ग == [[चित्र:Sihlsee_-_Willerzell_-_Etzel_Kulm_2010-10-21_16-50-28.JPG|उजवे|इवलेसे|झिहसी, झिहची वरची दरी आणि ड्रूझबर्ग पर्वत]] ड्रूझबर्ग पर्वताच्या उत्तर-पूर्व बाजूला या नदीचा उगम होतो. हा भाग उंटेरबर्गची नगरपालिका, [[श्वित्स (राज्य)|श्विझ कॅन्टन]] येथे आहे. त्यानंतर ती स्टुडेन गावाच्या उत्तरेकडे वाहते. स्टुडेनच्या खाली {{Convert|2|km|mi|abbr=on}} अंतरावर ही नदी कृत्रिम झिहसी जलाशयात प्रवेश करते. जवळच, मिंस्टर नावाची नदी झिहसी जलाशयात मध्ये येते. हा जलाशय बांधण्यापूर्वी ती नही झिहची थेट उपनदी होती. [[Eubach|युबाख]], [[Rickentalbach|रिकेन्टलबाख]] आणि [[Grossbach (Sihl)|ग्रॉसबाख]] हे प्रवाह देखील झिहसी जलाशयामार्गे झिहमध्ये मिसळतात.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref> झिहसी जलाशय {{Convert|8.5|km|mi|abbr=on}} लांब आहे. तो एन्सिएडेलन शहराच्या जवळ आहे. हे स्वित्झर्लंडचे सर्वात मोठे कृत्रिम सरोवर आहे. यात एक {{Convert|33|m|ft|0|adj=on}} लांबीचे धरण आहे. झिहसी येथून एक बोगद्यातून खाली पाणी वळवून वीज निर्माण केली जाते. ज्याची पाण्याची पातळी {{Convert|889|m|ft|abbr=on}} आहे. [[Etzelwerk|एट्झेलवर्क]] कंपनीतर्फेयेथील [[जलविद्युत]] वीज केंद्र चालवले जाते. हे केंद्र आल्टेंडॉर्फ येथे आहे. त्यानंतर ते पाणी झ्युरिक सरोवरात सोडले जाते. या सरोवरातील पाण्याची पातळी {{Convert|406|m|ft|abbr=on}} आहे. यामुळे धरणाच्या खाली पाण्याचा प्रवाह कमी होते. ज्याचा पाण्याच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो. हिवाळ्यात कमी प्रवाहामुळे नदी काही ठिकाणी कोरडी होते.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.sbb.ch/sbb-konzern/sbb-als-geschaeftspartnerin/angebote-fuer-evus/energie/erzeugung/wasserkraftwerke/etzelwerk.html|title=Wasserkraftwerk Etzelwerk|publisher=[[Swiss Federal Railways]]|language=German|trans-title=Etzelwerk Hydro-electric Power Station|access-date=23 June 2015}}</ref> [[चित्र:Sihl_Unterhalb_Sihlsprung_1.JPG|उजवे|इवलेसे|झिहस्प्रुंग रॅपिड्स]] == पूराचा धोका == झिहसी तलावातून जवळपास {{Convert|50|km|mi|0}} लांबीची ही नदी वाहते. हा भाग झ्युरिक शहराच्या मध्यभागी आहे. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की धरण फुटल्यास २ तासांच्या आत {{Convert|8|m|ft|0|adj=on}} उंचीची लाटेने शहरात पाणी शिरु शकते. नदी झ्यूरिख हाॅपबॅनहॉफ स्टेशनमधून नदीच्या प्रवाहाची क्षमता मर्यादित करण्यासाठी एका बोगद्यातून वळवलेली आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बोगद्याच्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली जाते. या धोक्यामुळे झ्युरिक शहराच्या महानगरपालिकेने शहरातील प्रभावित भागांसाठी स्थलांतर योजना विकसित, प्रकाशित आणि चाचणी केली आहे.<ref name="ethmodel">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.vaw.ethz.ch/people/fb/hifloria/projects/data/fb_sihldurchlaesse_hbz_im_hyd_modellversuch|title=Physical model experiments on the Sihl culverts at Zurich main station|publisher=ETH Zürich|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150604145929/http://www.vaw.ethz.ch/people/fb/hifloria/projects/data/fb_sihldurchlaesse_hbz_im_hyd_modellversuch|archive-date=2015-06-04|access-date=4 June 2015}}</ref><ref name="cozwa">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.stadt-zuerich.ch/content/dam/stzh/pd/Deutsch/Schutz%20und%20Rettung/Zivilschutz/Publikationen%20und%20Broschueren/3.4.8_Wasseralarm.pdf|title=Wasseralarm Sihlsee|publisher=Stadt Zürich|language=German|access-date=4 June 2015}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|last=Bruen|first=M.|last2=Krahe|first2=P.|last3=Zappa|first3=M.|last4=Olsson|first4=J.|last5=Vehvilainen|first5=B.|last6=Kok|first6=K.|last7=Daamen|first7=K.|year=2010|title=Visualizing flood forecasting uncertainty: some current European EPS platforms—COST731 working group 3|url=http://researchrepository.ucd.ie/bitstream/10197/2330/1/162%20corrected%20version.pdf|journal=Atmospheric Science Letters|volume=11|issue=2|pages=92–99|doi=10.1002/asl.258|doi-access=free}}</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == * {{Commonscat-inline|Sihl}} * Sihl in German, French and Italian in the online Historical Dictionary of Switzerland. * [http://www.momstotszurich.com/2013/04/bike-path-along-sihl-ch-zh.html झिहच्या खालच्या बाजूला असलेल्या सायकल मार्गाचे वर्णन] * [https://web.archive.org/web/20031210235152/http://www.sihlsee.ch.vu/] * http://www.sihlwald.ch [[वर्ग:झ्युरिकचा भूगोल]] [[वर्ग:स्वित्झर्लंडमधील नद्या]] [[वर्ग:झ्युरिकच्या कॅन्टोनमधील नद्या]] [[वर्ग:झिह| ]] [[वर्ग:श्विज कॅन्टोनमधील नद्या]] [[वर्ग:झ्युरिच कॅन्टोनमधील नद्या]] tjdjf1n3ha3l2vg68hh205c7gtm2f4f 2581354 2581353 2025-06-20T16:18:24Z अभय नातू 206 removed [[Category:झ्युरिच कॅन्टोनमधील नद्या]]; नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581354 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट नदी|name=झिह|mouth_coordinates={{coord|47.3826|8.5382|display=it|region:CH_type:river}}|progression={{RLimmat}}|नदी_नाव=झिह|नदी_चित्र=OberhalbSihlbrugg.jpg|नदी_चित्र_शीर्षक=झिहब्रग जवळील झिह नदीचा फोटो|नदी_नकाशा=Karte Sihl.png|स्थान=[[स्वित्झर्लंड]]}} {{बदल}} '''झिह''' ही [[स्वित्झर्लंड]]मधील एक [[नदी]] आहे. या नदीचा उगम ड्रूझबर्ग पर्वतामध्ये होतो. हा पर्वत [[श्वित्स (राज्य)|श्विझ कॅन्टन]] मध्ये आहे. तिचा शेवट [[लिमाट नदी|लिमाट]] नदीत होतो. [[लिमाट नदी|लिमाट]] ही नदी केंद्रात [[झ्युरिक|झ्युरिक शहर]] पार केल्यानंतर झ्यूरिख-विंटरथुर रेल्वे येथे आहे. तीची लांबी {{Convert|73|km|mi|abbr=on}} आहे. यामध्ये झिहसी जलाशयातील लांबीसुद्धा गणलेली आहे, ज्यातून ही नदी वाहते. झिहसी येथे नदीतून पाणी काढले जाते, ज्यामुळे डाउनस्ट्रीम पाण्याचा प्रवाह कमी होतो आणि परिणामी पाण्याची गुणवत्ता कमी होते.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref> ही नदी [[श्वित्स (राज्य)|श्विझ]], [[झ्युरिक (राज्य)|झ्यूरिख]] आणि [[त्सुग (राज्य)|झुग]] या भागातून वाहते. या नदीचे झिह खोरे हे सर्व [[झ्युरिक]]<nowiki/>कॅन्टनमध्ये आहेत. झिह नदीच्या खोऱ्यात लंगनाऊ ॲम अल्बिस आणि ॲडलिसविल, तसेच झ्यूरिख शहराचा दक्षिण-पश्चिम भाग येतो. लंगनाऊ ॲम अल्बिसच्या वर काही भाग लिमट नदीच्या संगमस्थानापासून {{Convert|13|km|abbr=on}} अंतरावर आहे. नदीच्या बाजूला कोणतीही मोठी वसाहत नाही. फक्त काही लहान गावे आहेत. तर एन्सिएडेलन शहर झिहसीच्या जवळ स्थित आहे. ते एका उपनदी नदीच्या खोऱ्यात आहे. == व्युत्पत्ती == झिह या नावाचा पहिला लिखित संदर्भ १०१८ चा आहे. त्याचा उल्लेख सिलाहा असा आहे. हे नाव असू शकते. जुने युरोपियन किंवा [[सेल्टिक भाषासमूह|सेल्टिक]] मूळ असलेला शब्द झिला ("शांत जलप्रवाह", सिल = "ट्रिकल, वेट") > [[रोमान्स भाषासमूह|प्रेमसंबंध]] सिला जुन्या उच्च जर्मन घटकाच्या जोडीसह आहा म्हणजे "वाहणारे पाणी" असा आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ortsnamen.ch/Texte/Lunnern2010.pdf|title=Lunnern. Londons Zwilling im Reusstal. Eine sprach- und kulturgeschichtliche Verortung von Siedlungsnamen|last=Daniel Gut|date=2010|language=German|access-date=27 September 2015}}</ref> == नदीचा मार्ग == [[चित्र:Sihlsee_-_Willerzell_-_Etzel_Kulm_2010-10-21_16-50-28.JPG|उजवे|इवलेसे|झिहसी, झिहची वरची दरी आणि ड्रूझबर्ग पर्वत]] ड्रूझबर्ग पर्वताच्या उत्तर-पूर्व बाजूला या नदीचा उगम होतो. हा भाग उंटेरबर्गची नगरपालिका, [[श्वित्स (राज्य)|श्विझ कॅन्टन]] येथे आहे. त्यानंतर ती स्टुडेन गावाच्या उत्तरेकडे वाहते. स्टुडेनच्या खाली {{Convert|2|km|mi|abbr=on}} अंतरावर ही नदी कृत्रिम झिहसी जलाशयात प्रवेश करते. जवळच, मिंस्टर नावाची नदी झिहसी जलाशयात मध्ये येते. हा जलाशय बांधण्यापूर्वी ती नही झिहची थेट उपनदी होती. [[Eubach|युबाख]], [[Rickentalbach|रिकेन्टलबाख]] आणि [[Grossbach (Sihl)|ग्रॉसबाख]] हे प्रवाह देखील झिहसी जलाशयामार्गे झिहमध्ये मिसळतात.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref> झिहसी जलाशय {{Convert|8.5|km|mi|abbr=on}} लांब आहे. तो एन्सिएडेलन शहराच्या जवळ आहे. हे स्वित्झर्लंडचे सर्वात मोठे कृत्रिम सरोवर आहे. यात एक {{Convert|33|m|ft|0|adj=on}} लांबीचे धरण आहे. झिहसी येथून एक बोगद्यातून खाली पाणी वळवून वीज निर्माण केली जाते. ज्याची पाण्याची पातळी {{Convert|889|m|ft|abbr=on}} आहे. [[Etzelwerk|एट्झेलवर्क]] कंपनीतर्फेयेथील [[जलविद्युत]] वीज केंद्र चालवले जाते. हे केंद्र आल्टेंडॉर्फ येथे आहे. त्यानंतर ते पाणी झ्युरिक सरोवरात सोडले जाते. या सरोवरातील पाण्याची पातळी {{Convert|406|m|ft|abbr=on}} आहे. यामुळे धरणाच्या खाली पाण्याचा प्रवाह कमी होते. ज्याचा पाण्याच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो. हिवाळ्यात कमी प्रवाहामुळे नदी काही ठिकाणी कोरडी होते.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.sbb.ch/sbb-konzern/sbb-als-geschaeftspartnerin/angebote-fuer-evus/energie/erzeugung/wasserkraftwerke/etzelwerk.html|title=Wasserkraftwerk Etzelwerk|publisher=[[Swiss Federal Railways]]|language=German|trans-title=Etzelwerk Hydro-electric Power Station|access-date=23 June 2015}}</ref> [[चित्र:Sihl_Unterhalb_Sihlsprung_1.JPG|उजवे|इवलेसे|झिहस्प्रुंग रॅपिड्स]] == पूराचा धोका == झिहसी तलावातून जवळपास {{Convert|50|km|mi|0}} लांबीची ही नदी वाहते. हा भाग झ्युरिक शहराच्या मध्यभागी आहे. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की धरण फुटल्यास २ तासांच्या आत {{Convert|8|m|ft|0|adj=on}} उंचीची लाटेने शहरात पाणी शिरु शकते. नदी झ्यूरिख हाॅपबॅनहॉफ स्टेशनमधून नदीच्या प्रवाहाची क्षमता मर्यादित करण्यासाठी एका बोगद्यातून वळवलेली आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बोगद्याच्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली जाते. या धोक्यामुळे झ्युरिक शहराच्या महानगरपालिकेने शहरातील प्रभावित भागांसाठी स्थलांतर योजना विकसित, प्रकाशित आणि चाचणी केली आहे.<ref name="ethmodel">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.vaw.ethz.ch/people/fb/hifloria/projects/data/fb_sihldurchlaesse_hbz_im_hyd_modellversuch|title=Physical model experiments on the Sihl culverts at Zurich main station|publisher=ETH Zürich|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150604145929/http://www.vaw.ethz.ch/people/fb/hifloria/projects/data/fb_sihldurchlaesse_hbz_im_hyd_modellversuch|archive-date=2015-06-04|access-date=4 June 2015}}</ref><ref name="cozwa">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.stadt-zuerich.ch/content/dam/stzh/pd/Deutsch/Schutz%20und%20Rettung/Zivilschutz/Publikationen%20und%20Broschueren/3.4.8_Wasseralarm.pdf|title=Wasseralarm Sihlsee|publisher=Stadt Zürich|language=German|access-date=4 June 2015}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|last=Bruen|first=M.|last2=Krahe|first2=P.|last3=Zappa|first3=M.|last4=Olsson|first4=J.|last5=Vehvilainen|first5=B.|last6=Kok|first6=K.|last7=Daamen|first7=K.|year=2010|title=Visualizing flood forecasting uncertainty: some current European EPS platforms—COST731 working group 3|url=http://researchrepository.ucd.ie/bitstream/10197/2330/1/162%20corrected%20version.pdf|journal=Atmospheric Science Letters|volume=11|issue=2|pages=92–99|doi=10.1002/asl.258|doi-access=free}}</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == * {{Commonscat-inline|Sihl}} * Sihl in German, French and Italian in the online Historical Dictionary of Switzerland. * [http://www.momstotszurich.com/2013/04/bike-path-along-sihl-ch-zh.html झिहच्या खालच्या बाजूला असलेल्या सायकल मार्गाचे वर्णन] * [https://web.archive.org/web/20031210235152/http://www.sihlsee.ch.vu/] * http://www.sihlwald.ch [[वर्ग:झ्युरिकचा भूगोल]] [[वर्ग:स्वित्झर्लंडमधील नद्या]] [[वर्ग:झ्युरिकच्या कॅन्टोनमधील नद्या]] [[वर्ग:झिह| ]] [[वर्ग:श्विज कॅन्टोनमधील नद्या]] [[वर्ग:झ्युरिक कॅन्टनमधील नद्या]] rrpqooa5qw7gv2fbzobdg66simrolrn 2581355 2581354 2025-06-20T16:18:37Z अभय नातू 206 removed [[Category:झ्युरिक कॅन्टनमधील नद्या]] - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581355 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट नदी|name=झिह|mouth_coordinates={{coord|47.3826|8.5382|display=it|region:CH_type:river}}|progression={{RLimmat}}|नदी_नाव=झिह|नदी_चित्र=OberhalbSihlbrugg.jpg|नदी_चित्र_शीर्षक=झिहब्रग जवळील झिह नदीचा फोटो|नदी_नकाशा=Karte Sihl.png|स्थान=[[स्वित्झर्लंड]]}} {{बदल}} '''झिह''' ही [[स्वित्झर्लंड]]मधील एक [[नदी]] आहे. या नदीचा उगम ड्रूझबर्ग पर्वतामध्ये होतो. हा पर्वत [[श्वित्स (राज्य)|श्विझ कॅन्टन]] मध्ये आहे. तिचा शेवट [[लिमाट नदी|लिमाट]] नदीत होतो. [[लिमाट नदी|लिमाट]] ही नदी केंद्रात [[झ्युरिक|झ्युरिक शहर]] पार केल्यानंतर झ्यूरिख-विंटरथुर रेल्वे येथे आहे. तीची लांबी {{Convert|73|km|mi|abbr=on}} आहे. यामध्ये झिहसी जलाशयातील लांबीसुद्धा गणलेली आहे, ज्यातून ही नदी वाहते. झिहसी येथे नदीतून पाणी काढले जाते, ज्यामुळे डाउनस्ट्रीम पाण्याचा प्रवाह कमी होतो आणि परिणामी पाण्याची गुणवत्ता कमी होते.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref> ही नदी [[श्वित्स (राज्य)|श्विझ]], [[झ्युरिक (राज्य)|झ्यूरिख]] आणि [[त्सुग (राज्य)|झुग]] या भागातून वाहते. या नदीचे झिह खोरे हे सर्व [[झ्युरिक]]<nowiki/>कॅन्टनमध्ये आहेत. झिह नदीच्या खोऱ्यात लंगनाऊ ॲम अल्बिस आणि ॲडलिसविल, तसेच झ्यूरिख शहराचा दक्षिण-पश्चिम भाग येतो. लंगनाऊ ॲम अल्बिसच्या वर काही भाग लिमट नदीच्या संगमस्थानापासून {{Convert|13|km|abbr=on}} अंतरावर आहे. नदीच्या बाजूला कोणतीही मोठी वसाहत नाही. फक्त काही लहान गावे आहेत. तर एन्सिएडेलन शहर झिहसीच्या जवळ स्थित आहे. ते एका उपनदी नदीच्या खोऱ्यात आहे. == व्युत्पत्ती == झिह या नावाचा पहिला लिखित संदर्भ १०१८ चा आहे. त्याचा उल्लेख सिलाहा असा आहे. हे नाव असू शकते. जुने युरोपियन किंवा [[सेल्टिक भाषासमूह|सेल्टिक]] मूळ असलेला शब्द झिला ("शांत जलप्रवाह", सिल = "ट्रिकल, वेट") > [[रोमान्स भाषासमूह|प्रेमसंबंध]] सिला जुन्या उच्च जर्मन घटकाच्या जोडीसह आहा म्हणजे "वाहणारे पाणी" असा आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ortsnamen.ch/Texte/Lunnern2010.pdf|title=Lunnern. Londons Zwilling im Reusstal. Eine sprach- und kulturgeschichtliche Verortung von Siedlungsnamen|last=Daniel Gut|date=2010|language=German|access-date=27 September 2015}}</ref> == नदीचा मार्ग == [[चित्र:Sihlsee_-_Willerzell_-_Etzel_Kulm_2010-10-21_16-50-28.JPG|उजवे|इवलेसे|झिहसी, झिहची वरची दरी आणि ड्रूझबर्ग पर्वत]] ड्रूझबर्ग पर्वताच्या उत्तर-पूर्व बाजूला या नदीचा उगम होतो. हा भाग उंटेरबर्गची नगरपालिका, [[श्वित्स (राज्य)|श्विझ कॅन्टन]] येथे आहे. त्यानंतर ती स्टुडेन गावाच्या उत्तरेकडे वाहते. स्टुडेनच्या खाली {{Convert|2|km|mi|abbr=on}} अंतरावर ही नदी कृत्रिम झिहसी जलाशयात प्रवेश करते. जवळच, मिंस्टर नावाची नदी झिहसी जलाशयात मध्ये येते. हा जलाशय बांधण्यापूर्वी ती नही झिहची थेट उपनदी होती. [[Eubach|युबाख]], [[Rickentalbach|रिकेन्टलबाख]] आणि [[Grossbach (Sihl)|ग्रॉसबाख]] हे प्रवाह देखील झिहसी जलाशयामार्गे झिहमध्ये मिसळतात.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref> झिहसी जलाशय {{Convert|8.5|km|mi|abbr=on}} लांब आहे. तो एन्सिएडेलन शहराच्या जवळ आहे. हे स्वित्झर्लंडचे सर्वात मोठे कृत्रिम सरोवर आहे. यात एक {{Convert|33|m|ft|0|adj=on}} लांबीचे धरण आहे. झिहसी येथून एक बोगद्यातून खाली पाणी वळवून वीज निर्माण केली जाते. ज्याची पाण्याची पातळी {{Convert|889|m|ft|abbr=on}} आहे. [[Etzelwerk|एट्झेलवर्क]] कंपनीतर्फेयेथील [[जलविद्युत]] वीज केंद्र चालवले जाते. हे केंद्र आल्टेंडॉर्फ येथे आहे. त्यानंतर ते पाणी झ्युरिक सरोवरात सोडले जाते. या सरोवरातील पाण्याची पातळी {{Convert|406|m|ft|abbr=on}} आहे. यामुळे धरणाच्या खाली पाण्याचा प्रवाह कमी होते. ज्याचा पाण्याच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो. हिवाळ्यात कमी प्रवाहामुळे नदी काही ठिकाणी कोरडी होते.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=[[Historical Dictionary of Switzerland]]|language=French|access-date=23 June 2015}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.sbb.ch/sbb-konzern/sbb-als-geschaeftspartnerin/angebote-fuer-evus/energie/erzeugung/wasserkraftwerke/etzelwerk.html|title=Wasserkraftwerk Etzelwerk|publisher=[[Swiss Federal Railways]]|language=German|trans-title=Etzelwerk Hydro-electric Power Station|access-date=23 June 2015}}</ref> [[चित्र:Sihl_Unterhalb_Sihlsprung_1.JPG|उजवे|इवलेसे|झिहस्प्रुंग रॅपिड्स]] == पूराचा धोका == झिहसी तलावातून जवळपास {{Convert|50|km|mi|0}} लांबीची ही नदी वाहते. हा भाग झ्युरिक शहराच्या मध्यभागी आहे. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की धरण फुटल्यास २ तासांच्या आत {{Convert|8|m|ft|0|adj=on}} उंचीची लाटेने शहरात पाणी शिरु शकते. नदी झ्यूरिख हाॅपबॅनहॉफ स्टेशनमधून नदीच्या प्रवाहाची क्षमता मर्यादित करण्यासाठी एका बोगद्यातून वळवलेली आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बोगद्याच्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली जाते. या धोक्यामुळे झ्युरिक शहराच्या महानगरपालिकेने शहरातील प्रभावित भागांसाठी स्थलांतर योजना विकसित, प्रकाशित आणि चाचणी केली आहे.<ref name="ethmodel">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.vaw.ethz.ch/people/fb/hifloria/projects/data/fb_sihldurchlaesse_hbz_im_hyd_modellversuch|title=Physical model experiments on the Sihl culverts at Zurich main station|publisher=ETH Zürich|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150604145929/http://www.vaw.ethz.ch/people/fb/hifloria/projects/data/fb_sihldurchlaesse_hbz_im_hyd_modellversuch|archive-date=2015-06-04|access-date=4 June 2015}}</ref><ref name="cozwa">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.stadt-zuerich.ch/content/dam/stzh/pd/Deutsch/Schutz%20und%20Rettung/Zivilschutz/Publikationen%20und%20Broschueren/3.4.8_Wasseralarm.pdf|title=Wasseralarm Sihlsee|publisher=Stadt Zürich|language=German|access-date=4 June 2015}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|last=Bruen|first=M.|last2=Krahe|first2=P.|last3=Zappa|first3=M.|last4=Olsson|first4=J.|last5=Vehvilainen|first5=B.|last6=Kok|first6=K.|last7=Daamen|first7=K.|year=2010|title=Visualizing flood forecasting uncertainty: some current European EPS platforms—COST731 working group 3|url=http://researchrepository.ucd.ie/bitstream/10197/2330/1/162%20corrected%20version.pdf|journal=Atmospheric Science Letters|volume=11|issue=2|pages=92–99|doi=10.1002/asl.258|doi-access=free}}</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == * {{Commonscat-inline|Sihl}} * Sihl in German, French and Italian in the online Historical Dictionary of Switzerland. * [http://www.momstotszurich.com/2013/04/bike-path-along-sihl-ch-zh.html झिहच्या खालच्या बाजूला असलेल्या सायकल मार्गाचे वर्णन] * [https://web.archive.org/web/20031210235152/http://www.sihlsee.ch.vu/] * http://www.sihlwald.ch [[वर्ग:झ्युरिकचा भूगोल]] [[वर्ग:स्वित्झर्लंडमधील नद्या]] [[वर्ग:झ्युरिकच्या कॅन्टोनमधील नद्या]] [[वर्ग:झिह| ]] [[वर्ग:श्विज कॅन्टोनमधील नद्या]] h5k9v659puocam5nzo5dhpafbct6swh 2581472 2581355 2025-06-21T05:49:01Z Khirid Harshad 138639 removed [[Category:झिह]] - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581472 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट नदी|name=झीह्ल|mouth_coordinates={{coord|47.3826|8.5382|display=it|region:CH_type:river}}|progression={{RLimmat}}|नदी_नाव=झीह्ल|नदी_चित्र=OberhalbSihlbrugg.jpg|नदी_चित्र_शीर्षक=झिहब्रग जवळील झीह्ल नदीचा फोटो|नदी_नकाशा=Karte Sihl.png|स्थान=[[स्वित्झर्लंड]]}} {{बदल}} '''झीह्ल''' ही [[स्वित्झर्लंड]]मधील एक [[नदी]] आहे. या नदीचा उगम ड्रूझबर्ग पर्वतामध्ये होतो. हा पर्वत [[श्वित्स (राज्य)|श्विझ कॅन्टन]] मध्ये आहे. तिचा शेवट [[लिमाट नदी|लिमाट]] नदीत होतो. [[लिमाट नदी|लिमाट]] ही नदी केंद्रात [[झ्युरिक|झ्युरिक शहर]] पार केल्यानंतर झ्यूरिख-विंटरथुर रेल्वे येथे आहे. तिची लांबी {{Convert|73|km|mi|abbr=on}} आहे. यामध्ये झिहसी जलाशयातील लांबीसुद्धा गणलेली आहे, ज्यातून ही नदी वाहते. झिहसी येथे नदीतून पाणी काढले जाते, ज्यामुळे डाउनस्ट्रीम पाण्याचा प्रवाह कमी होतो आणि परिणामी पाण्याची गुणवत्ता कमी होते.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=Historical Dictionary of Switzerland|language=French|access-date=23 June 2015}}</ref> ही नदी [[श्वित्स (राज्य)|श्विझ]], [[झ्युरिक (राज्य)|झ्युरिक]] आणि [[त्सुग (राज्य)|झुग]] या भागातून वाहते. या नदीचे झिह खोरे हे सर्व [[झ्युरिक]] कॅन्टनमध्ये आहेत. झीह्ल नदीच्या खोऱ्यात लंगनाऊ ॲम अल्बिस आणि ॲडलिसविल, तसेच झ्युरिक शहराचा दक्षिण-पश्चिम भाग येतो. लंगनाऊ ॲम अल्बिसच्या वर काही भाग लिमट नदीच्या संगमस्थानापासून {{Convert|13|km|abbr=on}} अंतरावर आहे. नदीच्या बाजूला कोणतीही मोठी वसाहत नाही. फक्त काही लहान गावे आहेत. तर एन्सिएडेलन शहर झिहसीच्या जवळ स्थित आहे. ते एका उपनदी नदीच्या खोऱ्यात आहे. == व्युत्पत्ती == झीह्ल या नावाचा पहिला लिखित संदर्भ १०१८ चा आहे. त्याचा उल्लेख सिलाहा असा आहे. हे नाव असू शकते. जुने युरोपियन किंवा [[सेल्टिक भाषासमूह|सेल्टिक]] मूळ असलेला शब्द झिला ("शांत जलप्रवाह", सिल = "ट्रिकल, वेट") > [[रोमान्स भाषासमूह|प्रेमसंबंध]] सिला जुन्या उच्च जर्मन घटकाच्या जोडीसह आहा म्हणजे "वाहणारे पाणी" असा आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ortsnamen.ch/Texte/Lunnern2010.pdf|title=Lunnern. Londons Zwilling im Reusstal. Eine sprach- und kulturgeschichtliche Verortung von Siedlungsnamen|last=Daniel Gut|date=2010|language=German|access-date=27 September 2015}}</ref> == नदीचा मार्ग == [[चित्र:Sihlsee_-_Willerzell_-_Etzel_Kulm_2010-10-21_16-50-28.JPG|उजवे|इवलेसे|झिहसी, झिहची वरची दरी आणि ड्रूझबर्ग पर्वत]] ड्रूझबर्ग पर्वताच्या उत्तर-पूर्व बाजूला या नदीचा उगम होतो. हा भाग उंटेरबर्गची नगरपालिका, [[श्वित्स (राज्य)|श्विझ कॅन्टन]] येथे आहे. त्यानंतर ती स्टुडेन गावाच्या उत्तरेकडे वाहते. स्टुडेनच्या खाली {{Convert|2|km|mi|abbr=on}} अंतरावर ही नदी कृत्रिम झिहसी जलाशयात प्रवेश करते. जवळच, मिंस्टर नावाची नदी झिहसी जलाशयात मध्ये येते. हा जलाशय बांधण्यापूर्वी ती नही झिहची थेट उपनदी होती. [[Eubach|युबाख]], [[Rickentalbach|रिकेन्टलबाख]] आणि [[Grossbach (Sihl)|ग्रॉसबाख]] हे प्रवाह देखील झिहसी जलाशयामार्गे झिहमध्ये मिसळतात.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=Historical Dictionary of Switzerland|language=French|access-date=23 June 2015}}</ref> झिहसी जलाशय {{Convert|8.5|km|mi|abbr=on}} लांब आहे. तो एन्सिएडेलन शहराच्या जवळ आहे. हे स्वित्झर्लंडचे सर्वात मोठे कृत्रिम सरोवर आहे. यात एक {{Convert|33|m|ft|0|adj=on}} लांबीचे धरण आहे. झिहसी येथून एक बोगद्यातून खाली पाणी वळवून वीज निर्माण केली जाते. ज्याची पाण्याची पातळी {{Convert|889|m|ft|abbr=on}} आहे. [[एट्झेलवर्क]] कंपनीतर्फेयेथील [[जलविद्युत]] वीज केंद्र चालवले जाते. हे केंद्र आल्टेंडॉर्फ येथे आहे. त्यानंतर ते पाणी झ्युरिक सरोवरात सोडले जाते. या सरोवरातील पाण्याची पातळी {{Convert|406|m|ft|abbr=on}} आहे. यामुळे धरणाच्या खाली पाण्याचा प्रवाह कमी होते. ज्याचा पाण्याच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो. हिवाळ्यात कमी प्रवाहामुळे नदी काही ठिकाणी कोरडी होते.<ref name="HDS_Sihl">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hls-dhs-dss.ch/textes/f/F8778.php|title=Sihl|date=2 May 2013|website=Historical Dictionary of Switzerland|language=French|access-date=23 June 2015}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.sbb.ch/sbb-konzern/sbb-als-geschaeftspartnerin/angebote-fuer-evus/energie/erzeugung/wasserkraftwerke/etzelwerk.html|title=Wasserkraftwerk Etzelwerk|publisher=Swiss Federal Railways|language=German|trans-title=Etzelwerk Hydro-electric Power Station|access-date=23 June 2015}}</ref> [[चित्र:Sihl_Unterhalb_Sihlsprung_1.JPG|उजवे|इवलेसे|झिहस्प्रुंग रॅपिड्स]] == पूराचा धोका == झिहसी तलावातून जवळपास {{Convert|50|km|mi|0}} लांबीची ही नदी वाहते. हा भाग झ्युरिक शहराच्या मध्यभागी आहे. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की धरण फुटल्यास २ तासांच्या आत {{Convert|8|m|ft|0|adj=on}} उंचीची लाटेने शहरात पाणी शिरु शकते. नदी झ्युरिक हाॅपबॅनहॉफ स्टेशनमधून नदीच्या प्रवाहाची क्षमता मर्यादित करण्यासाठी एका बोगद्यातून वळवलेली आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बोगद्याच्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली जाते. या धोक्यामुळे झ्युरिक शहराच्या महानगरपालिकेने शहरातील प्रभावित भागांसाठी स्थलांतर योजना विकसित, प्रकाशित आणि चाचणी केली आहे.<ref name="ethmodel">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.vaw.ethz.ch/people/fb/hifloria/projects/data/fb_sihldurchlaesse_hbz_im_hyd_modellversuch|title=Physical model experiments on the Sihl culverts at Zurich main station|publisher=ETH Zürich|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150604145929/http://www.vaw.ethz.ch/people/fb/hifloria/projects/data/fb_sihldurchlaesse_hbz_im_hyd_modellversuch|archive-date=2015-06-04|access-date=4 June 2015}}</ref><ref name="cozwa">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.stadt-zuerich.ch/content/dam/stzh/pd/Deutsch/Schutz%20und%20Rettung/Zivilschutz/Publikationen%20und%20Broschueren/3.4.8_Wasseralarm.pdf|title=Wasseralarm Sihlsee|publisher=Stadt Zürich|language=German|access-date=4 June 2015}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|last=Bruen|first=M.|last2=Krahe|first2=P.|last3=Zappa|first3=M.|last4=Olsson|first4=J.|last5=Vehvilainen|first5=B.|last6=Kok|first6=K.|last7=Daamen|first7=K.|year=2010|title=Visualizing flood forecasting uncertainty: some current European EPS platforms—COST731 working group 3|url=http://researchrepository.ucd.ie/bitstream/10197/2330/1/162%20corrected%20version.pdf|journal=Atmospheric Science Letters|volume=11|issue=2|pages=92–99|doi=10.1002/asl.258|doi-access=free}}</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == * {{Commonscat-inline|Sihl}} * Sihl in German, French and Italian in the online Historical Dictionary of Switzerland. * [http://www.momstotszurich.com/2013/04/bike-path-along-sihl-ch-zh.html झिहच्या खालच्या बाजूला असलेल्या सायकल मार्गाचे वर्णन] * [https://web.archive.org/web/20031210235152/http://www.sihlsee.ch.vu/] * http://www.sihlwald.ch [[वर्ग:झ्युरिकचा भूगोल]] [[वर्ग:स्वित्झर्लंडमधील नद्या]] [[वर्ग:झ्युरिकच्या कॅन्टोनमधील नद्या]] [[वर्ग:श्विज कॅन्टोनमधील नद्या]] [[वर्ग:झीह्ल]] prfqrkkvi5em2az2hw12zf7v4dmpj1p वर्ग:झीह्ल 14 366653 2581347 2025-06-20T16:15:09Z Vikrantkorde 7381 सुरुवात 2581347 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 2581470 2581347 2025-06-21T05:46:34Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[वर्ग:झिह]] वरुन [[वर्ग:झीह्ल]] ला हलविला 2581347 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 झिह 0 366654 2581349 2025-06-20T16:15:10Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[झिह]] वरुन [[झीह्ल नदी]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत 2581349 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[झीह्ल नदी]] aof45e56ljz400nml8mn7182zu8x6xd वर्ग:श्विज कॅन्टोनमधील नद्या 14 366655 2581350 2025-06-20T16:15:15Z Vikrantkorde 7381 सुरुवात 2581350 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:झ्युरिच कॅन्टोनमधील नद्या 14 366656 2581351 2025-06-20T16:15:22Z Vikrantkorde 7381 सुरुवात 2581351 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 नितीन घुले 0 366657 2581370 2025-06-20T18:11:17Z Sandesh9822 66586 नवीन पान: '''नितीन गोवर्धन घुले''' (जन्म 20 मे 1986) हा एक भारतीय [[कबड्डी]] खेळाडू आहे. तो २०१० च्या ग्वांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता आहे. २००८ मध्ये झालेल्या आशियाई बीच कबड्डी खेळां... 2581370 wikitext text/x-wiki '''नितीन गोवर्धन घुले''' (जन्म 20 मे 1986) हा एक भारतीय [[कबड्डी]] खेळाडू आहे. तो २०१० च्या ग्वांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता आहे. २००८ मध्ये झालेल्या आशियाई बीच कबड्डी खेळांसह विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तो संघाचा भाग होता. तो लहानपणापासूनच पुण्यातील बोपखेल येथील आदिनाथ स्पोर्ट्स क्लबसोबत खेळू लागला. gv86dmrk429efz1ltkfz6rmgc1lrknj 2581371 2581370 2025-06-20T19:52:33Z अभय नातू 206 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581371 wikitext text/x-wiki '''नितीन गोवर्धन घुले''' (जन्म 20 मे 1986) हा एक भारतीय [[कबड्डी]] खेळाडू आहे. तो २०१० च्या ग्वांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता आहे. २००८ मध्ये झालेल्या आशियाई बीच कबड्डी खेळांसह विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तो संघाचा भाग होता. तो लहानपणापासूनच पुण्यातील बोपखेल येथील आदिनाथ स्पोर्ट्स क्लबसोबत खेळू लागला. [[वर्ग:भारतीय कबड्डी खेळाडू]] 13les783i3vgxcxn4n892epq34v2xpz 2581372 2581371 2025-06-20T19:52:41Z अभय नातू 206 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581372 wikitext text/x-wiki '''नितीन गोवर्धन घुले''' (जन्म 20 मे 1986) हा एक भारतीय [[कबड्डी]] खेळाडू आहे. तो २०१० च्या ग्वांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता आहे. २००८ मध्ये झालेल्या आशियाई बीच कबड्डी खेळांसह विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तो संघाचा भाग होता. तो लहानपणापासूनच पुण्यातील बोपखेल येथील आदिनाथ स्पोर्ट्स क्लबसोबत खेळू लागला. [[वर्ग:भारतीय कबड्डी खेळाडू]] [[वर्ग:इ.स. १९८६ मधील जन्म]] 2lwvh3o8imnctc5pz16wr5h6dciimrm 2581373 2581372 2025-06-20T19:52:46Z अभय नातू 206 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581373 wikitext text/x-wiki '''नितीन गोवर्धन घुले''' (जन्म 20 मे 1986) हा एक भारतीय [[कबड्डी]] खेळाडू आहे. तो २०१० च्या ग्वांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता आहे. २००८ मध्ये झालेल्या आशियाई बीच कबड्डी खेळांसह विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तो संघाचा भाग होता. तो लहानपणापासूनच पुण्यातील बोपखेल येथील आदिनाथ स्पोर्ट्स क्लबसोबत खेळू लागला. [[वर्ग:भारतीय कबड्डी खेळाडू]] [[वर्ग:इ.स. १९८६ मधील जन्म]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 96cnbjtdg7hh9dzshel9891fscbuhyo 2581423 2581373 2025-06-21T03:55:25Z Sandesh9822 66586 2581423 wikitext text/x-wiki '''नितीन गोवर्धन घुले''' (जन्म २० मे १९८६) हा एक भारतीय [[कबड्डी]] खेळाडू आहे. तो २०१० च्या ग्वांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता आहे. २००८ मध्ये झालेल्या आशियाई बीच कबड्डी खेळांसह विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तो संघाचा भाग होता. तो लहानपणापासूनच पुण्यातील बोपखेल येथील आदिनाथ स्पोर्ट्स क्लबसोबत खेळू लागला. [[वर्ग:भारतीय कबड्डी खेळाडू]] [[वर्ग:इ.स. १९८६ मधील जन्म]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 6ay44r4qm9y7c3pmqnelc7w2woujqnm नितीन गोवर्धन घुले 0 366658 2581374 2025-06-20T19:53:01Z अभय नातू 206 पूर्ण नाव 2581374 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[नितीन घुले]] mjiylfqtt0vx03ews5i1bmpjc1lrpyq कॉमिक बुक 0 366659 2581378 2025-06-20T20:46:30Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[कॉमिक बुक]] वरुन [[मसूदा:कॉमिक बुक]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 2581378 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:कॉमिक बुक]] 5wwvzz7hj71ckduvkx393tpuh3mq5j6 लेझर कटर 0 366660 2581380 2025-06-20T20:48:59Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[लेझर कटर]] वरुन [[मसूदा:लेझर कटर]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 2581380 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:लेझर कटर]] n7oi82xqw07kwu7l4eerb4fgpfrlnm5 जस्टिन चाव 0 366661 2581382 2025-06-20T20:51:54Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[जस्टिन चाव]] वरुन [[मसूदा:जस्टिन चाव]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 2581382 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:जस्टिन चाव]] jtw389molwlsc59i99ydex8lcpsc6uy चर्चा:जस्टिन चाव 1 366662 2581384 2025-06-20T20:51:54Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:जस्टिन चाव]] वरुन [[मसूदा चर्चा:जस्टिन चाव]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 2581384 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा चर्चा:जस्टिन चाव]] oaiqchc8vit1m9pkivvotszdalxolcq व्हियोलेता चमोरो 0 366663 2581386 2025-06-20T21:47:38Z अभय नातू 206 लेखनभेद 2581386 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[व्हायोलेटा चमोरो]] mr01arxa268wchyekqcungnn3f24fp1 नागपूर संस्थान 0 366664 2581387 2025-06-20T21:57:42Z अभय नातू 206 नामभेद 2581387 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[नागपूरचे राज्य]] mcab2pxrnlyavf3bp9couyyedg81fgj नागपूरकर भोसले 0 366665 2581389 2025-06-20T21:58:32Z अभय नातू 206 नामभेद 2581389 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[नागपूरचे राज्य]] mcab2pxrnlyavf3bp9couyyedg81fgj नागपूरचे दुसरे मुधोजी भोसले 0 366666 2581390 2025-06-20T22:15:37Z अभय नातू 206 "[[:en:Special:Redirect/revision/1288687609|Mudhoji II of Nagpur]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले 2581390 wikitext text/x-wiki '''मुधोजी दुसरे''' ([[इ.स. १७९६|१७९६]] &#x2013; [[१५ जुलै]], [[इ.स. १८४०|१८४०]]) तथा '''अप्पा साहेब''' हे मध्य [[नागपूर संस्थान|नागपूर संस्थानाचे]] राजे होते. हे १८१६ ते १८१८ पर्यंत सत्तेवर होते. त्यांच्या कारकीर्दीत [[मराठा साम्राज्य]] आणि [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी]] यांच्यातील [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्ध]] झाले. यात [[मराठा साम्राज्य|मराठ्यांच्या]] पराभव झाला आणि त्यांच्याबरोबर मुधोजींची [[नागपूर|नागपूरातून]] हकालपट्टी झाली. १८१६मध्ये [[नागपूरचे दुसरे रघुजी भोसले|दुसऱ्या रघुजींच्या]] मृत्यूनंतर त्यांचा मुलगा [[नागपूरचे परसाजी भोसले|परसाजी]] राजा झाला परंतु लगेचच दुसऱ्या मुधोजींनी त्यांची हत्या करवून स्वतः राजा झाले. याआधी १७९९ सालापासून नागपूर संस्थानात [[ब्रिटिश रेसिडेंट]] होता. सत्तेवर आल्यावर मुधोजींनी नागपुरात [[ब्रिटिश तैनाती सैन्य]] ठेवण्याचे कबूल केले. <ref name="Naravane">{{स्रोत पुस्तक|title=Battles of the Honorourable East India Company|last=Naravane|first=M.S.|publisher=A.P.H. Publishing Corporation|year=2014|isbn=9788131300343|pages=82}}</ref> याचबरोबर मुधोजींवर अनेक जाचक अटी लादण्यात आला. यात [[पुणे|पुण्यातील]] [[पेशवे|पेशव्यांशी]] कोणताही संबंध किंवा पत्रव्यवहारही करायला मनाई होती. १८१७ मध्ये [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटिश]] आणि [[पेशवे|पेशव्यांमध्ये]] [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|युद्ध सुरू झाल्यावर]] अप्पासाहेबांनी ब्रिटिशांशी मैत्री असल्याचा आव भिरकावून दिला आणि पेशव्यांशी कराराची बोलणी सुरू केली. नागपूरच्या सैन्याने ब्रिटिशांवर हल्ला केला आणि [[सिताबर्डीचा किल्ला|सीताबर्डी]]<nowiki/>च्या [[सीताबर्डीची लढाई|येथील लढाईत]] आणि नंतर नागपूर शहराजवळच्या लढाईत त्यांचा पराभव झाला. यानंतरच्या तहात [[बेरार प्रांत|बेरारचा]] उरलेला भाग आणि [[नर्मदा नदी|नर्मदा]] खोऱ्यातील प्रदेश ब्रिटिशांना देण्यात आले. अप्पासाहेबांना पुन्हा गादीवर बसवण्यात आले परंतु काही काळानंतर ते पुन्हा कट रचत असल्याचे कळल्यावर त्यांना पदच्युत करुन [[प्रयागराज|अलाहाबादला]] तुरुंगात पाठवले गेले. तेथे जात असताना मुधोजींनी आपल्याला नेणाऱ्या सैनिकांना लाच देऊन महादेव टेकड्यांध्ये आणि नंतर पंजाबकडे पळ काढला. वाटेत [[जोधपूर संस्थान|जोधपूर]] येथे [[राजा मानसिंग]] यांनी ब्रिटिशांच्या हुकुमाविरुद्ध मुधोजींना आश्रय दिला आणि स्वतः ते जामीन राहिले. अप्पासाहेबांचे [[जोधपूर]]<nowiki/>मध्ये १५ जुलै, १८४० रोजी ४४ वर्षांचे असताना निधन झाले. == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:नागपूरचे राजे]] [[वर्ग:इ.स. १८४० मधील मृत्यू]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:तिसरे आंग्ल-मराठा युद्ध]] n86j4ji21r5r82l7jvjpn5qz0mqxn8f 2581391 2581390 2025-06-20T22:15:39Z KiranBOT II 140753 शुद्धलेखन — योग्य उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#योग्य उकार|अधिक माहिती]]) 2581391 wikitext text/x-wiki '''मुधोजी दुसरे''' ([[इ.स. १७९६|१७९६]] &#x2013; [[१५ जुलै]], [[इ.स. १८४०|१८४०]]) तथा '''अप्पा साहेब''' हे मध्य [[नागपूर संस्थान|नागपूर संस्थानाचे]] राजे होते. हे १८१६ ते १८१८ पर्यंत सत्तेवर होते. त्यांच्या कारकीर्दीत [[मराठा साम्राज्य]] आणि [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी]] यांच्यातील [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्ध]] झाले. यात [[मराठा साम्राज्य|मराठ्यांच्या]] पराभव झाला आणि त्यांच्याबरोबर मुधोजींची [[नागपूर|नागपूरातून]] हकालपट्टी झाली. १८१६मध्ये [[नागपूरचे दुसरे रघुजी भोसले|दुसऱ्या रघुजींच्या]] मृत्यूनंतर त्यांचा मुलगा [[नागपूरचे परसाजी भोसले|परसाजी]] राजा झाला परंतु लगेचच दुसऱ्या मुधोजींनी त्यांची हत्या करवून स्वतः राजा झाले. याआधी १७९९ सालापासून नागपूर संस्थानात [[ब्रिटिश रेसिडेंट]] होता. सत्तेवर आल्यावर मुधोजींनी नागपुरात [[ब्रिटिश तैनाती सैन्य]] ठेवण्याचे कबूल केले. <ref name="Naravane">{{स्रोत पुस्तक|title=Battles of the Honorourable East India Company|last=Naravane|first=M.S.|publisher=A.P.H. Publishing Corporation|year=2014|isbn=9788131300343|pages=82}}</ref> याचबरोबर मुधोजींवर अनेक जाचक अटी लादण्यात आला. यात [[पुणे|पुण्यातील]] [[पेशवे|पेशव्यांशी]] कोणताही संबंध किंवा पत्रव्यवहारही करायला मनाई होती. १८१७ मध्ये [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटिश]] आणि [[पेशवे|पेशव्यांमध्ये]] [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|युद्ध सुरू झाल्यावर]] अप्पासाहेबांनी ब्रिटिशांशी मैत्री असल्याचा आव भिरकावून दिला आणि पेशव्यांशी कराराची बोलणी सुरू केली. नागपूरच्या सैन्याने ब्रिटिशांवर हल्ला केला आणि [[सिताबर्डीचा किल्ला|सीताबर्डी]]<nowiki/>च्या [[सीताबर्डीची लढाई|येथील लढाईत]] आणि नंतर नागपूर शहराजवळच्या लढाईत त्यांचा पराभव झाला. यानंतरच्या तहात [[बेरार प्रांत|बेरारचा]] उरलेला भाग आणि [[नर्मदा नदी|नर्मदा]] खोऱ्यातील प्रदेश ब्रिटिशांना देण्यात आले. अप्पासाहेबांना पुन्हा गादीवर बसवण्यात आले परंतु काही काळानंतर ते पुन्हा कट रचत असल्याचे कळल्यावर त्यांना पदच्युत करून [[प्रयागराज|अलाहाबादला]] तुरुंगात पाठवले गेले. तेथे जात असताना मुधोजींनी आपल्याला नेणाऱ्या सैनिकांना लाच देऊन महादेव टेकड्यांध्ये आणि नंतर पंजाबकडे पळ काढला. वाटेत [[जोधपूर संस्थान|जोधपूर]] येथे [[राजा मानसिंग]] यांनी ब्रिटिशांच्या हुकुमाविरुद्ध मुधोजींना आश्रय दिला आणि स्वतः ते जामीन राहिले. अप्पासाहेबांचे [[जोधपूर]]<nowiki/>मध्ये १५ जुलै, १८४० रोजी ४४ वर्षांचे असताना निधन झाले. == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:नागपूरचे राजे]] [[वर्ग:इ.स. १८४० मधील मृत्यू]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:तिसरे आंग्ल-मराठा युद्ध]] g2qwp6rllj6ykelhseu77bjdzgbqrn0 2581392 2581391 2025-06-20T22:20:16Z अभय नातू 206 "[[:en:Special:Redirect/revision/1288687609|Mudhoji II of Nagpur]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले 2581392 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट राज्याधिकारी|नाव=दुसरे मुधोजी भोसले|पदवी=[[नागपूर संस्थान|नागपूर संस्थानाचे]] राजे|राजधानी=[[नागपूर]]|मृत्यू_दिनांक=[[१५ जुलै]], [[इ.स. १८४०|१८४०]]|राज्यारोहण=१८१६|राज्य_काळ=१८१६-९ जानेवारी, १८१८|जन्म_दिनांक=[[इ.स. १७९६|१७९६]]|मृत्यू_स्थान=[[जोधपूर]]|पूर्वाधिकारी=[[नागपूरचे परसाजी भोसले|परसाजी भोसले]]|उत्तराधिकारी=[[नागपूरचे तिसरे रघुजी भोसले|तिसरे रघुजी]]|धर्म=हिंदू|राजवंश=[[नागपूरचे भोसले]]}} '''मुधोजी दुसरे''' ([[इ.स. १७९६|१७९६]] &#x2013; [[१५ जुलै]], [[इ.स. १८४०|१८४०]]) तथा '''अप्पा साहेब''' हे मध्य [[नागपूर संस्थान|नागपूर संस्थानाचे]] राजे होते. हे १८१६ ते १८१८ पर्यंत सत्तेवर होते. त्यांच्या कारकीर्दीत [[मराठा साम्राज्य]] आणि [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी]] यांच्यातील [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्ध]] झाले. यात [[मराठा साम्राज्य|मराठ्यांच्या]] पराभव झाला आणि त्यांच्याबरोबर मुधोजींची [[नागपूर|नागपूरातून]] हकालपट्टी झाली. १८१६मध्ये [[नागपूरचे दुसरे रघुजी भोसले|दुसऱ्या रघुजींच्या]] मृत्यूनंतर त्यांचा मुलगा [[नागपूरचे परसाजी भोसले|परसाजी]] राजा झाला परंतु लगेचच दुसऱ्या मुधोजींनी त्यांची हत्या करवून स्वतः राजा झाले. याआधी १७९९ सालापासून नागपूर संस्थानात [[ब्रिटिश रेसिडेंट]] होता. सत्तेवर आल्यावर मुधोजींनी नागपुरात [[ब्रिटिश तैनाती सैन्य]] ठेवण्याचे कबूल केले. <ref name="Naravane">{{स्रोत पुस्तक|title=Battles of the Honorourable East India Company|last=Naravane|first=M.S.|publisher=A.P.H. Publishing Corporation|year=2014|isbn=9788131300343|pages=82}}</ref> याचबरोबर मुधोजींवर अनेक जाचक अटी लादण्यात आला. यात [[पुणे|पुण्यातील]] [[पेशवे|पेशव्यांशी]] कोणताही संबंध किंवा पत्रव्यवहारही करायला मनाई होती. १८१७ मध्ये [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटिश]] आणि [[पेशवे|पेशव्यांमध्ये]] [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|युद्ध सुरू झाल्यावर]] अप्पासाहेबांनी ब्रिटिशांशी मैत्री असल्याचा आव भिरकावून दिला आणि पेशव्यांशी कराराची बोलणी सुरू केली. नागपूरच्या सैन्याने ब्रिटिशांवर हल्ला केला आणि [[सिताबर्डीचा किल्ला|सीताबर्डी]]<nowiki/>च्या [[सीताबर्डीची लढाई|येथील लढाईत]] आणि नंतर नागपूर शहराजवळच्या लढाईत त्यांचा पराभव झाला. यानंतरच्या तहात [[बेरार प्रांत|बेरारचा]] उरलेला भाग आणि [[नर्मदा नदी|नर्मदा]] खोऱ्यातील प्रदेश ब्रिटिशांना देण्यात आले. अप्पासाहेबांना पुन्हा गादीवर बसवण्यात आले परंतु काही काळानंतर ते पुन्हा कट रचत असल्याचे कळल्यावर त्यांना पदच्युत करुन [[प्रयागराज|अलाहाबादला]] तुरुंगात पाठवले गेले. तेथे जात असताना मुधोजींनी आपल्याला नेणाऱ्या सैनिकांना लाच देऊन महादेव टेकड्यांध्ये आणि नंतर पंजाबकडे पळ काढला. वाटेत [[जोधपूर संस्थान|जोधपूर]] येथे [[राजा मानसिंग]] यांनी ब्रिटिशांच्या हुकुमाविरुद्ध मुधोजींना आश्रय दिला आणि स्वतः ते जामीन राहिले. अप्पासाहेबांचे [[जोधपूर]]<nowiki/>मध्ये १५ जुलै, १८४० रोजी ४४ वर्षांचे असताना निधन झाले. == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:नागपूरचे राजे]] [[वर्ग:इ.स. १८४० मधील मृत्यू]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:तिसरे आंग्ल-मराठा युद्ध]] lkjwkqf49atf7pzw1v36ugl0guvk01d 2581393 2581392 2025-06-20T22:20:17Z KiranBOT II 140753 शुद्धलेखन — योग्य उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#योग्य उकार|अधिक माहिती]]) 2581393 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट राज्याधिकारी|नाव=दुसरे मुधोजी भोसले|पदवी=[[नागपूर संस्थान|नागपूर संस्थानाचे]] राजे|राजधानी=[[नागपूर]]|मृत्यू_दिनांक=[[१५ जुलै]], [[इ.स. १८४०|१८४०]]|राज्यारोहण=१८१६|राज्य_काळ=१८१६-९ जानेवारी, १८१८|जन्म_दिनांक=[[इ.स. १७९६|१७९६]]|मृत्यू_स्थान=[[जोधपूर]]|पूर्वाधिकारी=[[नागपूरचे परसाजी भोसले|परसाजी भोसले]]|उत्तराधिकारी=[[नागपूरचे तिसरे रघुजी भोसले|तिसरे रघुजी]]|धर्म=हिंदू|राजवंश=[[नागपूरचे भोसले]]}} '''मुधोजी दुसरे''' ([[इ.स. १७९६|१७९६]] &#x2013; [[१५ जुलै]], [[इ.स. १८४०|१८४०]]) तथा '''अप्पा साहेब''' हे मध्य [[नागपूर संस्थान|नागपूर संस्थानाचे]] राजे होते. हे १८१६ ते १८१८ पर्यंत सत्तेवर होते. त्यांच्या कारकीर्दीत [[मराठा साम्राज्य]] आणि [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी]] यांच्यातील [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्ध]] झाले. यात [[मराठा साम्राज्य|मराठ्यांच्या]] पराभव झाला आणि त्यांच्याबरोबर मुधोजींची [[नागपूर|नागपूरातून]] हकालपट्टी झाली. १८१६मध्ये [[नागपूरचे दुसरे रघुजी भोसले|दुसऱ्या रघुजींच्या]] मृत्यूनंतर त्यांचा मुलगा [[नागपूरचे परसाजी भोसले|परसाजी]] राजा झाला परंतु लगेचच दुसऱ्या मुधोजींनी त्यांची हत्या करवून स्वतः राजा झाले. याआधी १७९९ सालापासून नागपूर संस्थानात [[ब्रिटिश रेसिडेंट]] होता. सत्तेवर आल्यावर मुधोजींनी नागपुरात [[ब्रिटिश तैनाती सैन्य]] ठेवण्याचे कबूल केले. <ref name="Naravane">{{स्रोत पुस्तक|title=Battles of the Honorourable East India Company|last=Naravane|first=M.S.|publisher=A.P.H. Publishing Corporation|year=2014|isbn=9788131300343|pages=82}}</ref> याचबरोबर मुधोजींवर अनेक जाचक अटी लादण्यात आला. यात [[पुणे|पुण्यातील]] [[पेशवे|पेशव्यांशी]] कोणताही संबंध किंवा पत्रव्यवहारही करायला मनाई होती. १८१७ मध्ये [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटिश]] आणि [[पेशवे|पेशव्यांमध्ये]] [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|युद्ध सुरू झाल्यावर]] अप्पासाहेबांनी ब्रिटिशांशी मैत्री असल्याचा आव भिरकावून दिला आणि पेशव्यांशी कराराची बोलणी सुरू केली. नागपूरच्या सैन्याने ब्रिटिशांवर हल्ला केला आणि [[सिताबर्डीचा किल्ला|सीताबर्डी]]<nowiki/>च्या [[सीताबर्डीची लढाई|येथील लढाईत]] आणि नंतर नागपूर शहराजवळच्या लढाईत त्यांचा पराभव झाला. यानंतरच्या तहात [[बेरार प्रांत|बेरारचा]] उरलेला भाग आणि [[नर्मदा नदी|नर्मदा]] खोऱ्यातील प्रदेश ब्रिटिशांना देण्यात आले. अप्पासाहेबांना पुन्हा गादीवर बसवण्यात आले परंतु काही काळानंतर ते पुन्हा कट रचत असल्याचे कळल्यावर त्यांना पदच्युत करून [[प्रयागराज|अलाहाबादला]] तुरुंगात पाठवले गेले. तेथे जात असताना मुधोजींनी आपल्याला नेणाऱ्या सैनिकांना लाच देऊन महादेव टेकड्यांध्ये आणि नंतर पंजाबकडे पळ काढला. वाटेत [[जोधपूर संस्थान|जोधपूर]] येथे [[राजा मानसिंग]] यांनी ब्रिटिशांच्या हुकुमाविरुद्ध मुधोजींना आश्रय दिला आणि स्वतः ते जामीन राहिले. अप्पासाहेबांचे [[जोधपूर]]<nowiki/>मध्ये १५ जुलै, १८४० रोजी ४४ वर्षांचे असताना निधन झाले. == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:नागपूरचे राजे]] [[वर्ग:इ.स. १८४० मधील मृत्यू]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:तिसरे आंग्ल-मराठा युद्ध]] 3fr5pr5p281n84qc1nvcpxmhirphdry 2581547 2581393 2025-06-21T08:45:41Z अभय नातू 206 दुवा 2581547 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट राज्याधिकारी|नाव=दुसरे मुधोजी भोसले|पदवी=[[नागपूर संस्थान|नागपूर संस्थानाचे]] राजे|राजधानी=[[नागपूर]]|मृत्यू_दिनांक=[[१५ जुलै]], [[इ.स. १८४०|१८४०]]|राज्यारोहण=१८१६|राज्य_काळ=१८१६-९ जानेवारी, १८१८|जन्म_दिनांक=[[इ.स. १७९६|१७९६]]|मृत्यू_स्थान=[[जोधपूर]]|पूर्वाधिकारी=[[नागपूरचे परसाजी भोसले|परसाजी भोसले]]|उत्तराधिकारी=[[नागपूरचे तिसरे रघुजी भोसले|तिसरे रघुजी]]|धर्म=हिंदू|राजवंश=[[नागपूरचे भोसले]]}} '''मुधोजी दुसरे''' ([[इ.स. १७९६|१७९६]] &#x2013; [[१५ जुलै]], [[इ.स. १८४०|१८४०]]) तथा '''अप्पा साहेब''' हे मध्य [[नागपूर संस्थान|नागपूर संस्थानाचे]] राजे होते. हे १८१६ ते १८१८ पर्यंत सत्तेवर होते. त्यांच्या कारकीर्दीत [[मराठा साम्राज्य]] आणि [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी]] यांच्यातील [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्ध]] झाले. यात [[मराठा साम्राज्य|मराठ्यांच्या]] पराभव झाला आणि त्यांच्याबरोबर मुधोजींची [[नागपूर|नागपूरातून]] हकालपट्टी झाली. १८१६मध्ये [[नागपूरचे दुसरे रघुजी भोसले|दुसऱ्या रघुजींच्या]] मृत्यूनंतर त्यांचा मुलगा [[नागपूरचे परसाजी भोसले|परसाजी]] राजा झाला परंतु लगेचच दुसऱ्या मुधोजींनी त्यांची हत्या करवून स्वतः राजा झाले. याआधी १७९९ सालापासून नागपूर संस्थानात [[ब्रिटिश रेसिडेंट]] होता. सत्तेवर आल्यावर मुधोजींनी नागपुरात [[ब्रिटिश तैनाती सैन्य]] ठेवण्याचे कबूल केले. <ref name="Naravane">{{स्रोत पुस्तक|title=Battles of the Honorourable East India Company|last=Naravane|first=M.S.|publisher=A.P.H. Publishing Corporation|year=2014|isbn=9788131300343|pages=82}}</ref> याचबरोबर मुधोजींवर अनेक जाचक अटी लादण्यात आला. यात [[पुणे|पुण्यातील]] [[पेशवे|पेशव्यांशी]] कोणताही संबंध किंवा पत्रव्यवहारही करायला मनाई होती. १८१७ मध्ये [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटिश]] आणि [[पेशवे|पेशव्यांमध्ये]] [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|युद्ध सुरू झाल्यावर]] अप्पासाहेबांनी ब्रिटिशांशी मैत्री असल्याचा आव भिरकावून दिला आणि पेशव्यांशी कराराची बोलणी सुरू केली. नागपूरच्या सैन्याने ब्रिटिशांवर हल्ला केला आणि [[सिताबर्डीचा किल्ला|सीताबर्डी]]<nowiki/>च्या [[सीताबर्डीची लढाई|येथील लढाईत]] आणि नंतर नागपूर शहराजवळच्या लढाईत त्यांचा पराभव झाला. यानंतरच्या तहात [[बेरार प्रांत|बेरारचा]] उरलेला भाग आणि [[नर्मदा नदी|नर्मदा]] खोऱ्यातील प्रदेश ब्रिटिशांना देण्यात आले. अप्पासाहेबांना पुन्हा गादीवर बसवण्यात आले परंतु काही काळानंतर ते पुन्हा कट रचत असल्याचे कळल्यावर त्यांना पदच्युत करून [[प्रयागराज|अलाहाबादला]] तुरुंगात पाठवले गेले. तेथे जात असताना मुधोजींनी आपल्याला नेणाऱ्या सैनिकांना लाच देऊन महादेव टेकड्यांध्ये आणि नंतर पंजाबकडे पळ काढला. वाटेत [[जोधपूर संस्थान|जोधपूर]] येथे [[जोधपूरचे मानसिंग|राजा मानसिंग]] यांनी ब्रिटिशांच्या हुकुमाविरुद्ध मुधोजींना आश्रय दिला आणि स्वतः ते जामीन राहिले. अप्पासाहेबांचे [[जोधपूर]]<nowiki/>मध्ये १५ जुलै, १८४० रोजी ४४ वर्षांचे असताना निधन झाले. == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:नागपूरचे राजे]] [[वर्ग:इ.स. १८४० मधील मृत्यू]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:तिसरे आंग्ल-मराठा युद्ध]] 2yu2kamifp7t7x1tlj8p9ssfhovcoq9 नागपूरचे भोसले 0 366667 2581394 2025-06-20T22:20:56Z अभय नातू 206 नामभेद 2581394 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[नागपूरकर भोसले]] cdo7vkqyie1og1sk0xo7litxueizyyo नागपूरचे दुसरे मुधोजी 0 366668 2581395 2025-06-20T22:21:32Z अभय नातू 206 नामभेद 2581395 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[नागपूरचे दुसरे मुधोजी भोसले]] r2p58rmw7c90jpzc5rhixyovcz1prsa दुसरे मुधोजी भोसले 0 366669 2581397 2025-06-20T22:22:55Z अभय नातू 206 नामभेद 2581397 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[नागपूरचे दुसरे मुधोजी भोसले]] r2p58rmw7c90jpzc5rhixyovcz1prsa मुधोजी भोसले दुसरे 0 366670 2581398 2025-06-20T22:23:18Z अभय नातू 206 शीर्षकलेखन संकेत 2581398 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[नागपूरचे दुसरे मुधोजी भोसले]] r2p58rmw7c90jpzc5rhixyovcz1prsa तिसरे मल्हारराव होळकर 0 366671 2581400 2025-06-20T22:36:57Z अभय नातू 206 "[[:en:Special:Redirect/revision/1268704562|Malhar Rao Holkar III]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले 2581400 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट राज्याधिकारी|नाव=तिसरे मल्हारराव होळकर|पदवी=महाराज अली जाह, झुब्दत उल-उमरा, बहादुर उल-मुल्क, फरझंद-इ-अर्जमंद, नुस्रत जंग|राज्यारोहण=१८११|राजधानी=[[इंदूर]]|जन्म_दिनांक=१८०६|मृत्यू_दिनांक=१७ ऑक्टोबर, १८३३|वडील=[[यशवंतराव होळकर]]|आई=[[कृष्णाबाई होळकर]]|राजवंश=[[होळकर घराणे]]|धर्म=हिंदू|राज्याभिषेक=नोव्हेंबर, १८११}} '''महाराजाधिराज राजेश्वर श्रीमंत मल्हार राव तिसरा होळकर सातवे सुभेदार बहादूर''' ([[इ.स. १८०६|१८०६]]–[[२७ ऑक्टोबर]], [[इ.स. १८३३|१८३३]]), हे मध्य भारतातील [[इंदूर संस्थान|इंदूरचे]] राजे होते. हे [[यशवंतराव होळकर]] आणि त्यांची पत्नी [[कृष्णाबाई होळकर|कृष्णाबाई]] यांचे एकुलते एक पुत्र होते. हे १८११मध्ये वयाच्या पाचव्या वर्षापासून मृत्यूपर्यंत सत्तेवर होते. यांच्या सत्ताकालात झालेल्या [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धात]] त्यांनी [[पेशवे|पेशव्यांना]] पाठिंबा दिला परंतु ब्रिटिशांनी पेचात पकडल्यावर त्यांनी पेशव्यांची बाजू सोडून दिली. == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:इ.स. १८३३ मधील मृत्यू]] [[वर्ग:इ.स. १८०६ मधील जन्म]] [[वर्ग:होळकर घराणे]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:इंदूरचे राजे]] qjc4ojfnbtwg9b76yc9ncsk1mh7p0aw इंदूरचे तिसरे मल्हारराव होळकर 0 366672 2581401 2025-06-20T22:37:34Z अभय नातू 206 नामभेद 2581401 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[तिसरे मल्हारराव होळकर]] 5g6zhasqcipmf3fusrm9mmxwsni8o4j मल्हारराव होळकर तिसरे 0 366673 2581402 2025-06-20T22:37:50Z अभय नातू 206 नामभेद 2581402 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[तिसरे मल्हारराव होळकर]] 5g6zhasqcipmf3fusrm9mmxwsni8o4j नंदिता महतानी 0 366674 2581413 2025-06-21T03:09:01Z संतोष गोरे 135680 "[[:en:Special:Redirect/revision/1295622376|Nandita Mahtani]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले 2581413 wikitext text/x-wiki {{Infobox person/Wikidata|fetchwikidata=ALL|birth_date=<!-- CITE A RELIABLE SOURCE [[WP:RS]] -->|nationality=Indian|occupation=Fashion designer|spouse={{marriage|[[ Sanjay Kapur]] |1996|2000|end=divorced}}}} '''नंदिता महतानी''' ही एक भारतीय वस्त्रशैली परिकल्पक (फॅशन डिझायनर) आहे. == कारकिर्द == महतानी या हिंदी चित्रपट अभिनेता [[डिनो मोरिया]] सोबत, प्लेग्राउंड नावाची कंपनी चालवतात. <ref>{{स्रोत बातमी|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/dino-morea-nandita-mahtanis-new-venture-a-social-network-for-the-rich-famous/articleshow/50649182.cms|title=Dino Morea & Nandita Mahtani's new venture: A social network for the rich & famous|date=20 January 2016|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> {{When|date=}} महतानी या क्रिकेटपटू [[विराट कोहली|विराट कोहलीचे]] डिझाइन आणि स्टायलिंग करत असतात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/lifestyle/virat-kohli-easiest-and-inspiring-to-work-with-says-designer-nandita-mahtani-1436985.html|title=Virat Kohli Easiest And Inspiring To Work With, Says Designer Nandita Mahtani|date=19 June 2017|website=News18|access-date=2018-03-18}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Reddy|first=Sujata|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/elizabeth-hurley-nandita-mahtani-seema-khan-come-together-for-a-fun-evening/articleshow/50715539.cms|title=Elizabeth Hurley, Nandita Mahtani, Seema Khan come together for a fun evening|date=2016|work=The Economic Times|access-date=2018-03-18}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Alves|first=Glynda|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/designer-nandita-mahtani-offers-a-peek-into-virat-kohlis-wardrobe-says-captain-loves-sunglasses/articleshow/69590856.cms?from=mdr|title=Designer Nandita Mahtani offers a peek into Virat Kohli's wardrobe, says captain loves sunglasses|date=31 May 2019|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> २०२३ मध्ये नंदिताने तिची बहीण अनु हिंदुजासोबत मिळून AN-Y1 हा लक्झरी फॅशन ब्रँड लाँच केला. त्यांचे लक्षवेधी महिलांचे जंपसूट तेव्हापासून सेलिब्रिटी आणि फॅशन इन्फ्लुएंसरवर दिसू लागले आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.an-y1.com/shop/jumpsuits/|title=AN-Y1 Fashion Collection {{!}} Designer Silk Jumpsuits|language=en-GB|access-date=2024-01-23}}</ref> == वैयक्तिक जीवन == महतानी यांचे लग्न १९९६ साली उद्योजक [[संजय कपूर (उद्योजक)|संजय कपूर]] यांच्याशी झाले आणि २००० साली हे जोडपे विभक्त देखील झाले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.india.com/entertainment/who-is-nandita-mahtani-vidyut-jammwals-gorgeous-bride-to-be-4954105|title=Who is Nandita Mahtani, Vidyut Jammwal's Gorgeous Bride-to-be?|date=13 September 2021|website=India.com|access-date=14 September 2021}}</ref> तिने बॉलिवूड अभिनेता [[रणबीर कपूर]] आणि [[डिनो मोरिया]] यांनाही डेट केले होते आणि अभिनेता [[विद्युत जामवाल|विद्युत जामवालशी]] त्यांचीझसोयरिक देखील जुळली होती <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/photos/entertainment/meet-vidyut-jammwal-s-fianc-e-nandita-mahtani-virat-kohli-s-stylist-and-ranbir-kapoor-s-crush-2393624/she-is-ranbir-kapoor-s-crush-2393625|title=Meet Vidyut Jammwal's fiancée Nandita Mahtani - Virat Kohli's stylist and Ranbir Kapoor's 'crush'!|date=13 September 2021|website=ZeeNews.com|access-date=14 September 2021}}</ref> नंदिताची बहीण अनु महतानी हिचा विवाह उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा मुलगा संजय हिंदुजाशी झाला. == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:इ.स. १९७२ मधील जन्म]] [[वर्ग:हिंदी चित्रपट निर्माते]] [[वर्ग:२१व्या शतकातील भारतीय डिझायनर]] [[वर्ग:हयात व्यक्ती]] [[वर्ग:भारतीय महिला फॅशन डिझायनर्स]] 881pzrr46j46uzjqopum4siwgn4ptd0 2581414 2581413 2025-06-21T03:18:25Z संतोष गोरे 135680 2581414 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''नंदिता महतानी''' ह्या एक भारतीय वस्त्रशैली परिकल्पक (फॅशन डिझायनर) आहेत. == कारकिर्द == महतानी या हिंदी चित्रपट अभिनेता [[डिनो मोरिया]] सोबत, प्लेग्राउंड नावाची कंपनी चालवतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/dino-morea-nandita-mahtanis-new-venture-a-social-network-for-the-rich-famous/articleshow/50649182.cms|title=Dino Morea & Nandita Mahtani's new venture: A social network for the rich & famous|date=20 January 2016|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> महतानी या क्रिकेटपटू [[विराट कोहली]]चे परिकल्पन (डिझायनिंग) आणि शैली परियोजन (स्टायलिंग) करत असतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/lifestyle/virat-kohli-easiest-and-inspiring-to-work-with-says-designer-nandita-mahtani-1436985.html|title=Virat Kohli Easiest And Inspiring To Work With, Says Designer Nandita Mahtani|date=19 June 2017|website=News18|access-date=2018-03-18}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Reddy|first=Sujata|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/elizabeth-hurley-nandita-mahtani-seema-khan-come-together-for-a-fun-evening/articleshow/50715539.cms|title=Elizabeth Hurley, Nandita Mahtani, Seema Khan come together for a fun evening|date=2016|work=The Economic Times|access-date=2018-03-18}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=Alves|first=Glynda|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/designer-nandita-mahtani-offers-a-peek-into-virat-kohlis-wardrobe-says-captain-loves-sunglasses/articleshow/69590856.cms?from=mdr|title=Designer Nandita Mahtani offers a peek into Virat Kohli's wardrobe, says captain loves sunglasses|date=31 May 2019|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> २०२३ मध्ये नंदिता आणि त्यांची बहीण अनु हिंदुजा यांनी एकत्रित AN-Y1 हा ''विलासी वस्त्रशैली उत्पादन'' (लक्झरी फॅशन ब्रँड) निर्माण केला. त्यांचे लक्षवेधी महिलांचे जंपसूट तेव्हापासून सेलिब्रिटी आणि फॅशन इन्फ्लुएंसरवर दिसू लागले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.an-y1.com/shop/jumpsuits/|title=AN-Y1 Fashion Collection {{!}} Designer Silk Jumpsuits|language=en-GB|access-date=2024-01-23}}</ref> == वैयक्तिक जीवन == महतानी यांचे लग्न १९९६ साली उद्योजक [[संजय कपूर (उद्योजक)|संजय कपूर]] यांच्याशी झाले आणि २००० साली हे जोडपे विभक्त देखील झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.india.com/entertainment/who-is-nandita-mahtani-vidyut-jammwals-gorgeous-bride-to-be-4954105|title=Who is Nandita Mahtani, Vidyut Jammwal's Gorgeous Bride-to-be?|date=13 September 2021|website=India.com|access-date=14 September 2021}}</ref> तिने बॉलिवूड अभिनेता [[रणबीर कपूर]] आणि [[डिनो मोरिया]] यांनाही डेट केले होते आणि अभिनेता [[विद्युत जामवाल|विद्युत जामवालशी]] त्यांची सोयरिक देखील जुळली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/photos/entertainment/meet-vidyut-jammwal-s-fianc-e-nandita-mahtani-virat-kohli-s-stylist-and-ranbir-kapoor-s-crush-2393624/she-is-ranbir-kapoor-s-crush-2393625|title=Meet Vidyut Jammwal's fiancée Nandita Mahtani - Virat Kohli's stylist and Ranbir Kapoor's 'crush'!|date=13 September 2021|website=ZeeNews.com|access-date=14 September 2021}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.abplive.com/entertainment/bollywood/karisma-kapoor-ex-husband-first-wife-nandita-mahtani-connection-with-virat-kohli-2961794 |title=करिश्मा कपूर की सौतन का है विराट कोहली से कनेक्शन, संजय कपूर से की थी पहली शादी |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी लाइव्ह |प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> नंदिताची बहीण अनु महतानी हिचा विवाह उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा मुलगा संजय हिंदुजाशी झाला. == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:इ.स. १९७२ मधील जन्म]] [[वर्ग:हिंदी चित्रपट निर्माते]] [[वर्ग:२१व्या शतकातील भारतीय डिझायनर]] [[वर्ग:हयात व्यक्ती]] [[वर्ग:भारतीय महिला फॅशन डिझायनर्स]] 6r40fnj4zi41rdie1yy1ux0qeahcvko 2581415 2581414 2025-06-21T03:22:07Z संतोष गोरे 135680 2581415 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''नंदिता महतानी''' ह्या एक भारतीय वस्त्रशैली परिकल्पक (फॅशन डिझायनर) आहेत. == कारकिर्द == महतानी या हिंदी चित्रपट अभिनेता [[डिनो मोरिया]] सोबत, प्लेग्राउंड नावाची कंपनी चालवतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/dino-morea-nandita-mahtanis-new-venture-a-social-network-for-the-rich-famous/articleshow/50649182.cms|title=Dino Morea & Nandita Mahtani's new venture: A social network for the rich & famous|date=20 January 2016|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> महतानी या क्रिकेटपटू [[विराट कोहली]]चे परिकल्पन (डिझायनिंग) आणि शैली परियोजन (स्टायलिंग) करत असतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/lifestyle/virat-kohli-easiest-and-inspiring-to-work-with-says-designer-nandita-mahtani-1436985.html|title=Virat Kohli Easiest And Inspiring To Work With, Says Designer Nandita Mahtani|date=19 June 2017|website=News18|access-date=2018-03-18}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Reddy|first=Sujata|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/elizabeth-hurley-nandita-mahtani-seema-khan-come-together-for-a-fun-evening/articleshow/50715539.cms|title=Elizabeth Hurley, Nandita Mahtani, Seema Khan come together for a fun evening|date=2016|work=The Economic Times|access-date=2018-03-18}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=Alves|first=Glynda|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/designer-nandita-mahtani-offers-a-peek-into-virat-kohlis-wardrobe-says-captain-loves-sunglasses/articleshow/69590856.cms?from=mdr|title=Designer Nandita Mahtani offers a peek into Virat Kohli's wardrobe, says captain loves sunglasses|date=31 May 2019|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> २०२३ मध्ये नंदिता आणि त्यांची बहीण अनु हिंदुजा यांनी एकत्रित AN-Y1 हा ''विलासी वस्त्रशैली उत्पादन'' (लक्झरी फॅशन ब्रँड) निर्माण केला. त्यांचे लक्षवेधी महिलांचे जंपसूट तेव्हापासून ख्यातनाम व्यक्ती आणि परिकल्पक प्रभावक (फॅशन इन्फ्लुएन्सर) यांच्या पसंतीत आल्याचे दिसू लागले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.an-y1.com/shop/jumpsuits/|title=AN-Y1 Fashion Collection {{!}} Designer Silk Jumpsuits|language=en-GB|access-date=2024-01-23}}</ref> == वैयक्तिक जीवन == महतानी यांचे लग्न १९९६ साली उद्योजक [[संजय कपूर (उद्योजक)|संजय कपूर]] यांच्याशी झाले आणि २००० साली हे जोडपे विभक्त देखील झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.india.com/entertainment/who-is-nandita-mahtani-vidyut-jammwals-gorgeous-bride-to-be-4954105|title=Who is Nandita Mahtani, Vidyut Jammwal's Gorgeous Bride-to-be?|date=13 September 2021|website=India.com|access-date=14 September 2021}}</ref> तिने बॉलिवूड अभिनेता [[रणबीर कपूर]] आणि [[डिनो मोरिया]] यांनाही डेट केले होते आणि अभिनेता [[विद्युत जामवाल|विद्युत जामवालशी]] त्यांची सोयरिक देखील जुळली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/photos/entertainment/meet-vidyut-jammwal-s-fianc-e-nandita-mahtani-virat-kohli-s-stylist-and-ranbir-kapoor-s-crush-2393624/she-is-ranbir-kapoor-s-crush-2393625|title=Meet Vidyut Jammwal's fiancée Nandita Mahtani - Virat Kohli's stylist and Ranbir Kapoor's 'crush'!|date=13 September 2021|website=ZeeNews.com|access-date=14 September 2021}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.abplive.com/entertainment/bollywood/karisma-kapoor-ex-husband-first-wife-nandita-mahtani-connection-with-virat-kohli-2961794 |title=करिश्मा कपूर की सौतन का है विराट कोहली से कनेक्शन, संजय कपूर से की थी पहली शादी |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी लाइव्ह |प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> नंदिताची बहीण अनु महतानी हिचा विवाह उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा मुलगा संजय हिंदुजाशी झाला. == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:इ.स. १९७२ मधील जन्म]] [[वर्ग:हिंदी चित्रपट निर्माते]] [[वर्ग:२१व्या शतकातील भारतीय डिझायनर]] [[वर्ग:हयात व्यक्ती]] [[वर्ग:भारतीय महिला फॅशन डिझायनर्स]] iibrhxfy07w1bujc630gcttfrz0yar3 2581416 2581415 2025-06-21T03:23:11Z संतोष गोरे 135680 2581416 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''नंदिता महतानी''' ह्या एक भारतीय वस्त्रशैली परिकल्पक (फॅशन डिझायनर) आहेत. == कारकिर्द == महतानी या हिंदी चित्रपट अभिनेता [[डिनो मोरिया]] सोबत, प्लेग्राउंड नावाची कंपनी चालवतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/dino-morea-nandita-mahtanis-new-venture-a-social-network-for-the-rich-famous/articleshow/50649182.cms|title=Dino Morea & Nandita Mahtani's new venture: A social network for the rich & famous|date=20 January 2016|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> महतानी या क्रिकेटपटू [[विराट कोहली]]चे परिकल्पन (डिझायनिंग) आणि शैली परियोजन (स्टायलिंग) करत असतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/lifestyle/virat-kohli-easiest-and-inspiring-to-work-with-says-designer-nandita-mahtani-1436985.html|title=Virat Kohli Easiest And Inspiring To Work With, Says Designer Nandita Mahtani|date=19 June 2017|website=News18|access-date=2018-03-18}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Reddy|first=Sujata|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/elizabeth-hurley-nandita-mahtani-seema-khan-come-together-for-a-fun-evening/articleshow/50715539.cms|title=Elizabeth Hurley, Nandita Mahtani, Seema Khan come together for a fun evening|date=2016|work=The Economic Times|access-date=2018-03-18}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=Alves|first=Glynda|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/designer-nandita-mahtani-offers-a-peek-into-virat-kohlis-wardrobe-says-captain-loves-sunglasses/articleshow/69590856.cms?from=mdr|title=Designer Nandita Mahtani offers a peek into Virat Kohli's wardrobe, says captain loves sunglasses|date=31 May 2019|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> २०२३ मध्ये नंदिता आणि त्यांची बहीण अनु हिंदुजा यांनी एकत्रित AN-Y1 हा ''विलासी वस्त्रशैली उत्पादन'' (लक्झरी फॅशन ब्रँड) निर्माण केला. त्यांचे लक्षवेधी महिलांचे जंपसूट तेव्हापासून ख्यातनाम व्यक्ती आणि परिकल्पक प्रभावक (फॅशन इन्फ्लुएन्सर) यांच्या पसंतीत आल्याचे दिसू लागले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.an-y1.com/shop/jumpsuits/|title=AN-Y1 Fashion Collection {{!}} Designer Silk Jumpsuits|language=en-GB|access-date=2024-01-23}}</ref> == वैयक्तिक जीवन == महतानी यांचे लग्न १९९६ साली उद्योजक [[संजय कपूर (उद्योजक)|संजय कपूर]] यांच्याशी झाले आणि २००० साली हे जोडपे विभक्त देखील झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.india.com/entertainment/who-is-nandita-mahtani-vidyut-jammwals-gorgeous-bride-to-be-4954105|title=Who is Nandita Mahtani, Vidyut Jammwal's Gorgeous Bride-to-be?|date=13 September 2021|website=India.com|access-date=14 September 2021}}</ref> तिने बॉलिवूड अभिनेता [[रणबीर कपूर]] आणि [[डिनो मोरिया]] यांनाही डेट केले होते आणि अभिनेता [[विद्युत जामवाल|विद्युत जामवालशी]] त्यांची सोयरिक देखील जुळली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/photos/entertainment/meet-vidyut-jammwal-s-fianc-e-nandita-mahtani-virat-kohli-s-stylist-and-ranbir-kapoor-s-crush-2393624/she-is-ranbir-kapoor-s-crush-2393625|title=Meet Vidyut Jammwal's fiancée Nandita Mahtani - Virat Kohli's stylist and Ranbir Kapoor's 'crush'!|date=13 September 2021|website=ZeeNews.com|access-date=14 September 2021}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.abplive.com/entertainment/bollywood/karisma-kapoor-ex-husband-first-wife-nandita-mahtani-connection-with-virat-kohli-2961794 |title=करिश्मा कपूर की सौतन का है विराट कोहली से कनेक्शन, संजय कपूर से की थी पहली शादी |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी लाइव्ह |प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> नंदिताची बहीण अनु महतानी हिचा विवाह उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा मुलगा संजय हिंदुजाशी झाला. == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:महतानी, नंदिता}} [[वर्ग:इ.स. १९७२ मधील जन्म]] [[वर्ग:हिंदी चित्रपट निर्माते]] [[वर्ग:२१व्या शतकातील भारतीय डिझायनर]] [[वर्ग:हयात व्यक्ती]] [[वर्ग:भारतीय महिला फॅशन डिझायनर्स]] 81cpic49f0sye95c05ef2i7i6v1ah18 2581417 2581416 2025-06-21T03:23:51Z संतोष गोरे 135680 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581417 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''नंदिता महतानी''' ह्या एक भारतीय वस्त्रशैली परिकल्पक (फॅशन डिझायनर) आहेत. == कारकिर्द == महतानी या हिंदी चित्रपट अभिनेता [[डिनो मोरिया]] सोबत, प्लेग्राउंड नावाची कंपनी चालवतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/dino-morea-nandita-mahtanis-new-venture-a-social-network-for-the-rich-famous/articleshow/50649182.cms|title=Dino Morea & Nandita Mahtani's new venture: A social network for the rich & famous|date=20 January 2016|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> महतानी या क्रिकेटपटू [[विराट कोहली]]चे परिकल्पन (डिझायनिंग) आणि शैली परियोजन (स्टायलिंग) करत असतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/lifestyle/virat-kohli-easiest-and-inspiring-to-work-with-says-designer-nandita-mahtani-1436985.html|title=Virat Kohli Easiest And Inspiring To Work With, Says Designer Nandita Mahtani|date=19 June 2017|website=News18|access-date=2018-03-18}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Reddy|first=Sujata|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/elizabeth-hurley-nandita-mahtani-seema-khan-come-together-for-a-fun-evening/articleshow/50715539.cms|title=Elizabeth Hurley, Nandita Mahtani, Seema Khan come together for a fun evening|date=2016|work=The Economic Times|access-date=2018-03-18}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=Alves|first=Glynda|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/designer-nandita-mahtani-offers-a-peek-into-virat-kohlis-wardrobe-says-captain-loves-sunglasses/articleshow/69590856.cms?from=mdr|title=Designer Nandita Mahtani offers a peek into Virat Kohli's wardrobe, says captain loves sunglasses|date=31 May 2019|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> २०२३ मध्ये नंदिता आणि त्यांची बहीण अनु हिंदुजा यांनी एकत्रित AN-Y1 हा ''विलासी वस्त्रशैली उत्पादन'' (लक्झरी फॅशन ब्रँड) निर्माण केला. त्यांचे लक्षवेधी महिलांचे जंपसूट तेव्हापासून ख्यातनाम व्यक्ती आणि परिकल्पक प्रभावक (फॅशन इन्फ्लुएन्सर) यांच्या पसंतीत आल्याचे दिसू लागले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.an-y1.com/shop/jumpsuits/|title=AN-Y1 Fashion Collection {{!}} Designer Silk Jumpsuits|language=en-GB|access-date=2024-01-23}}</ref> == वैयक्तिक जीवन == महतानी यांचे लग्न १९९६ साली उद्योजक [[संजय कपूर (उद्योजक)|संजय कपूर]] यांच्याशी झाले आणि २००० साली हे जोडपे विभक्त देखील झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.india.com/entertainment/who-is-nandita-mahtani-vidyut-jammwals-gorgeous-bride-to-be-4954105|title=Who is Nandita Mahtani, Vidyut Jammwal's Gorgeous Bride-to-be?|date=13 September 2021|website=India.com|access-date=14 September 2021}}</ref> तिने बॉलिवूड अभिनेता [[रणबीर कपूर]] आणि [[डिनो मोरिया]] यांनाही डेट केले होते आणि अभिनेता [[विद्युत जामवाल|विद्युत जामवालशी]] त्यांची सोयरिक देखील जुळली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/photos/entertainment/meet-vidyut-jammwal-s-fianc-e-nandita-mahtani-virat-kohli-s-stylist-and-ranbir-kapoor-s-crush-2393624/she-is-ranbir-kapoor-s-crush-2393625|title=Meet Vidyut Jammwal's fiancée Nandita Mahtani - Virat Kohli's stylist and Ranbir Kapoor's 'crush'!|date=13 September 2021|website=ZeeNews.com|access-date=14 September 2021}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.abplive.com/entertainment/bollywood/karisma-kapoor-ex-husband-first-wife-nandita-mahtani-connection-with-virat-kohli-2961794 |title=करिश्मा कपूर की सौतन का है विराट कोहली से कनेक्शन, संजय कपूर से की थी पहली शादी |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी लाइव्ह |प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> नंदिताची बहीण अनु महतानी हिचा विवाह उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा मुलगा संजय हिंदुजाशी झाला. == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:महतानी, नंदिता}} [[वर्ग:इ.स. १९७२ मधील जन्म]] [[वर्ग:हिंदी चित्रपट निर्माते]] [[वर्ग:२१व्या शतकातील भारतीय डिझायनर]] [[वर्ग:हयात व्यक्ती]] [[वर्ग:भारतीय महिला फॅशन डिझायनर्स]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] d6pb7dk8ujq37gyyttiqpxi671r68yd 2581418 2581417 2025-06-21T03:27:17Z संतोष गोरे 135680 2581418 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''नंदिता महतानी''' ह्या एक भारतीय वस्त्रशैली परिकल्पक (फॅशन डिझायनर) आहेत. == कारकिर्द == महतानी या हिंदी चित्रपट अभिनेता [[डिनो मोरिया]] सोबत, प्लेग्राउंड नावाची कंपनी चालवतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/dino-morea-nandita-mahtanis-new-venture-a-social-network-for-the-rich-famous/articleshow/50649182.cms|title=Dino Morea & Nandita Mahtani's new venture: A social network for the rich & famous|date=20 January 2016|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> महतानी या क्रिकेटपटू [[विराट कोहली]]चे परिकल्पन (डिझायनिंग) आणि शैली परियोजन (स्टायलिंग) करत असतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/lifestyle/virat-kohli-easiest-and-inspiring-to-work-with-says-designer-nandita-mahtani-1436985.html|title=Virat Kohli Easiest And Inspiring To Work With, Says Designer Nandita Mahtani|date=19 June 2017|website=News18|access-date=2018-03-18}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Reddy|first=Sujata|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/elizabeth-hurley-nandita-mahtani-seema-khan-come-together-for-a-fun-evening/articleshow/50715539.cms|title=Elizabeth Hurley, Nandita Mahtani, Seema Khan come together for a fun evening|date=2016|work=The Economic Times|access-date=2018-03-18}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=Alves|first=Glynda|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/designer-nandita-mahtani-offers-a-peek-into-virat-kohlis-wardrobe-says-captain-loves-sunglasses/articleshow/69590856.cms?from=mdr|title=Designer Nandita Mahtani offers a peek into Virat Kohli's wardrobe, says captain loves sunglasses|date=31 May 2019|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> २०२३ मध्ये नंदिता आणि त्यांची बहीण अनु हिंदुजा यांनी एकत्रित AN-Y1 हा ''विलासी वस्त्रशैली उत्पादन'' (लक्झरी फॅशन ब्रँड) निर्माण केला. त्यांचे लक्षवेधी महिलांचे जंपसूट तेव्हापासून ख्यातनाम व्यक्ती आणि परिकल्पक प्रभावक (फॅशन इन्फ्लुएन्सर) यांच्या पसंतीत आल्याचे दिसू लागले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.an-y1.com/shop/jumpsuits/|title=AN-Y1 Fashion Collection {{!}} Designer Silk Jumpsuits|language=en-GB|access-date=2024-01-23}}</ref> == वैयक्तिक जीवन == महतानी यांचे लग्न १९९६ साली उद्योजक [[संजय कपूर (उद्योजक)|संजय कपूर]] यांच्याशी झाले आणि २००० साली हे जोडपे विभक्त देखील झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.india.com/entertainment/who-is-nandita-mahtani-vidyut-jammwals-gorgeous-bride-to-be-4954105|title=Who is Nandita Mahtani, Vidyut Jammwal's Gorgeous Bride-to-be?|date=13 September 2021|website=India.com|access-date=14 September 2021}}</ref> तिने बॉलिवूड अभिनेता [[रणबीर कपूर]] आणि [[डिनो मोरिया]] यांच्याशी देखील काहीकाळ प्रेमसंबंध जुळले होते. शिवाय अभिनेता [[विद्युत जामवाल]]शी त्यांची सोयरिक देखील जुळली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/photos/entertainment/meet-vidyut-jammwal-s-fianc-e-nandita-mahtani-virat-kohli-s-stylist-and-ranbir-kapoor-s-crush-2393624/she-is-ranbir-kapoor-s-crush-2393625|title=Meet Vidyut Jammwal's fiancée Nandita Mahtani - Virat Kohli's stylist and Ranbir Kapoor's 'crush'!|date=13 September 2021|website=ZeeNews.com|access-date=14 September 2021}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.abplive.com/entertainment/bollywood/karisma-kapoor-ex-husband-first-wife-nandita-mahtani-connection-with-virat-kohli-2961794 |title=करिश्मा कपूर की सौतन का है विराट कोहली से कनेक्शन, संजय कपूर से की थी पहली शादी |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी लाइव्ह |प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> नंदिताची बहीण अनु महतानी हिचा विवाह उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा मुलगा संजय हिंदुजाशी झाला. == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:महतानी, नंदिता}} [[वर्ग:इ.स. १९७२ मधील जन्म]] [[वर्ग:हिंदी चित्रपट निर्माते]] [[वर्ग:२१व्या शतकातील भारतीय डिझायनर]] [[वर्ग:हयात व्यक्ती]] [[वर्ग:भारतीय महिला फॅशन डिझायनर्स]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] fm86bizbfww4ay843x4t04xqo7irw2s 2581419 2581418 2025-06-21T03:28:27Z संतोष गोरे 135680 2581419 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''नंदिता महतानी''' ह्या एक भारतीय वस्त्रशैली परिकल्पक (फॅशन डिझायनर) आहेत. == कारकिर्द == महतानी या हिंदी चित्रपट अभिनेता [[डिनो मोरिया]] सोबत, प्लेग्राउंड नावाची कंपनी चालवतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/dino-morea-nandita-mahtanis-new-venture-a-social-network-for-the-rich-famous/articleshow/50649182.cms|title=Dino Morea & Nandita Mahtani's new venture: A social network for the rich & famous|date=20 January 2016|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> महतानी या क्रिकेटपटू [[विराट कोहली]]चे परिकल्पन (डिझायनिंग) आणि शैली परियोजन (स्टायलिंग) करत असतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/lifestyle/virat-kohli-easiest-and-inspiring-to-work-with-says-designer-nandita-mahtani-1436985.html|title=Virat Kohli Easiest And Inspiring To Work With, Says Designer Nandita Mahtani|date=19 June 2017|website=News18|access-date=2018-03-18}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Reddy|first=Sujata|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/elizabeth-hurley-nandita-mahtani-seema-khan-come-together-for-a-fun-evening/articleshow/50715539.cms|title=Elizabeth Hurley, Nandita Mahtani, Seema Khan come together for a fun evening|date=2016|work=The Economic Times|access-date=2018-03-18}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=Alves|first=Glynda|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/designer-nandita-mahtani-offers-a-peek-into-virat-kohlis-wardrobe-says-captain-loves-sunglasses/articleshow/69590856.cms?from=mdr|title=Designer Nandita Mahtani offers a peek into Virat Kohli's wardrobe, says captain loves sunglasses|date=31 May 2019|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> २०२३ मध्ये नंदिता आणि त्यांची बहीण अनु हिंदुजा यांनी एकत्रित AN-Y1 हा ''विलासी वस्त्रशैली उत्पादन'' (लक्झरी फॅशन ब्रँड) निर्माण केला. त्यांचे लक्षवेधी महिलांचे जंपसूट तेव्हापासून ख्यातनाम व्यक्ती आणि परिकल्पक प्रभावक (फॅशन इन्फ्लुएन्सर) यांच्या पसंतीत आल्याचे दिसू लागले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.an-y1.com/shop/jumpsuits/|title=AN-Y1 Fashion Collection {{!}} Designer Silk Jumpsuits|language=en-GB|access-date=2024-01-23}}</ref> == वैयक्तिक जीवन == महतानी यांचे लग्न १९९६ साली उद्योजक [[संजय कपूर (उद्योजक)|संजय कपूर]] यांच्याशी झाले आणि २००० साली हे जोडपे विभक्त देखील झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.india.com/entertainment/who-is-nandita-mahtani-vidyut-jammwals-gorgeous-bride-to-be-4954105|title=Who is Nandita Mahtani, Vidyut Jammwal's Gorgeous Bride-to-be?|date=13 September 2021|website=India.com|access-date=14 September 2021}}</ref> महतानी यांचे बॉलिवूड अभिनेता [[रणबीर कपूर]] आणि [[डिनो मोरिया]] यांच्याशी देखील काहीकाळ स्नेहसंबंध जुळले होते. शिवाय अभिनेता [[विद्युत जामवाल]]शी त्यांची सोयरिक देखील जुळली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/photos/entertainment/meet-vidyut-jammwal-s-fianc-e-nandita-mahtani-virat-kohli-s-stylist-and-ranbir-kapoor-s-crush-2393624/she-is-ranbir-kapoor-s-crush-2393625|title=Meet Vidyut Jammwal's fiancée Nandita Mahtani - Virat Kohli's stylist and Ranbir Kapoor's 'crush'!|date=13 September 2021|website=ZeeNews.com|access-date=14 September 2021}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.abplive.com/entertainment/bollywood/karisma-kapoor-ex-husband-first-wife-nandita-mahtani-connection-with-virat-kohli-2961794 |title=करिश्मा कपूर की सौतन का है विराट कोहली से कनेक्शन, संजय कपूर से की थी पहली शादी |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी लाइव्ह |प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> नंदिताची बहीण अनु महतानी हिचा विवाह उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा मुलगा संजय हिंदुजाशी झाला. == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:महतानी, नंदिता}} [[वर्ग:इ.स. १९७२ मधील जन्म]] [[वर्ग:हिंदी चित्रपट निर्माते]] [[वर्ग:२१व्या शतकातील भारतीय डिझायनर]] [[वर्ग:हयात व्यक्ती]] [[वर्ग:भारतीय महिला फॅशन डिझायनर्स]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] huszr90hdq6e5rsdds3agug9axfjjtr 2581420 2581419 2025-06-21T03:29:57Z संतोष गोरे 135680 2581420 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''नंदिता महतानी''' ह्या एक भारतीय वस्त्रशैली परिकल्पक (फॅशन डिझायनर) आहेत. == कारकिर्द == महतानी या हिंदी चित्रपट अभिनेता [[डिनो मोरिया]] सोबत, प्लेग्राउंड नावाची कंपनी चालवतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/dino-morea-nandita-mahtanis-new-venture-a-social-network-for-the-rich-famous/articleshow/50649182.cms|title=Dino Morea & Nandita Mahtani's new venture: A social network for the rich & famous|date=20 January 2016|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> महतानी या क्रिकेटपटू [[विराट कोहली]]चे परिकल्पन (डिझायनिंग) आणि शैली परियोजन (स्टायलिंग) करत असतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/lifestyle/virat-kohli-easiest-and-inspiring-to-work-with-says-designer-nandita-mahtani-1436985.html|title=Virat Kohli Easiest And Inspiring To Work With, Says Designer Nandita Mahtani|date=19 June 2017|website=News18|access-date=2018-03-18}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Reddy|first=Sujata|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/elizabeth-hurley-nandita-mahtani-seema-khan-come-together-for-a-fun-evening/articleshow/50715539.cms|title=Elizabeth Hurley, Nandita Mahtani, Seema Khan come together for a fun evening|date=2016|work=The Economic Times|access-date=2018-03-18}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=Alves|first=Glynda|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/designer-nandita-mahtani-offers-a-peek-into-virat-kohlis-wardrobe-says-captain-loves-sunglasses/articleshow/69590856.cms?from=mdr|title=Designer Nandita Mahtani offers a peek into Virat Kohli's wardrobe, says captain loves sunglasses|date=31 May 2019|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> २०२३ मध्ये नंदिता आणि त्यांची बहीण अनु हिंदुजा यांनी एकत्रित AN-Y1 हा ''विलासी वस्त्रशैली उत्पादन'' (लक्झरी फॅशन ब्रँड) निर्माण केला. त्यांचे लक्षवेधी महिलांचे जंपसूट तेव्हापासून ख्यातनाम व्यक्ती आणि परिकल्पक प्रभावक (फॅशन इन्फ्लुएन्सर) यांच्या पसंतीत आल्याचे दिसू लागले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.an-y1.com/shop/jumpsuits/|title=AN-Y1 Fashion Collection {{!}} Designer Silk Jumpsuits|language=en-GB|access-date=2024-01-23}}</ref> == वैयक्तिक जीवन == महतानी यांचे लग्न १९९६ साली उद्योजक [[संजय कपूर (उद्योजक)|संजय कपूर]] यांच्याशी झाले आणि २००० साली हे जोडपे विभक्त देखील झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.india.com/entertainment/who-is-nandita-mahtani-vidyut-jammwals-gorgeous-bride-to-be-4954105|title=Who is Nandita Mahtani, Vidyut Jammwal's Gorgeous Bride-to-be?|date=13 September 2021|website=India.com|access-date=14 September 2021}}</ref> महतानी यांचे बॉलिवूड अभिनेता [[रणबीर कपूर]] आणि [[डिनो मोरिया]] यांच्याशी देखील काहीकाळ स्नेहसंबंध जुळले होते. शिवाय अभिनेता [[विद्युत जामवाल]]शी त्यांची सोयरिक देखील जुळली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/photos/entertainment/meet-vidyut-jammwal-s-fianc-e-nandita-mahtani-virat-kohli-s-stylist-and-ranbir-kapoor-s-crush-2393624/she-is-ranbir-kapoor-s-crush-2393625|title=Meet Vidyut Jammwal's fiancée Nandita Mahtani - Virat Kohli's stylist and Ranbir Kapoor's 'crush'!|date=13 September 2021|website=ZeeNews.com|access-date=14 September 2021}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.abplive.com/entertainment/bollywood/karisma-kapoor-ex-husband-first-wife-nandita-mahtani-connection-with-virat-kohli-2961794 |title=करिश्मा कपूर की सौतन का है विराट कोहली से कनेक्शन, संजय कपूर से की थी पहली शादी |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी लाइव्ह |प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> नंदिताची बहीण अनु महतानी हिचा विवाह उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा मुलगा संजय हिंदुजाशी झाला. == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == {{कॉमन्स वर्ग|Nandita Mahtani|नंदिता महतानी}} {{DEFAULTSORT:महतानी, नंदिता}} [[वर्ग:इ.स. १९७२ मधील जन्म]] [[वर्ग:हिंदी चित्रपट निर्माते]] [[वर्ग:२१व्या शतकातील भारतीय डिझायनर]] [[वर्ग:हयात व्यक्ती]] [[वर्ग:भारतीय महिला फॅशन डिझायनर्स]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] cao3s6yca4ueg7wq7gt6htkzs6yfc1s 2581428 2581420 2025-06-21T04:08:00Z अभय नातू 206 /* बाह्य दुवे */ 2581428 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''नंदिता महतानी''' ह्या एक भारतीय वस्त्रशैली परिकल्पक (फॅशन डिझायनर) आहेत. == कारकिर्द == महतानी या हिंदी चित्रपट अभिनेता [[डिनो मोरिया]] सोबत, प्लेग्राउंड नावाची कंपनी चालवतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/dino-morea-nandita-mahtanis-new-venture-a-social-network-for-the-rich-famous/articleshow/50649182.cms|title=Dino Morea & Nandita Mahtani's new venture: A social network for the rich & famous|date=20 January 2016|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> महतानी या क्रिकेटपटू [[विराट कोहली]]चे परिकल्पन (डिझायनिंग) आणि शैली परियोजन (स्टायलिंग) करत असतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/lifestyle/virat-kohli-easiest-and-inspiring-to-work-with-says-designer-nandita-mahtani-1436985.html|title=Virat Kohli Easiest And Inspiring To Work With, Says Designer Nandita Mahtani|date=19 June 2017|website=News18|access-date=2018-03-18}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Reddy|first=Sujata|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/elizabeth-hurley-nandita-mahtani-seema-khan-come-together-for-a-fun-evening/articleshow/50715539.cms|title=Elizabeth Hurley, Nandita Mahtani, Seema Khan come together for a fun evening|date=2016|work=The Economic Times|access-date=2018-03-18}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=Alves|first=Glynda|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/designer-nandita-mahtani-offers-a-peek-into-virat-kohlis-wardrobe-says-captain-loves-sunglasses/articleshow/69590856.cms?from=mdr|title=Designer Nandita Mahtani offers a peek into Virat Kohli's wardrobe, says captain loves sunglasses|date=31 May 2019|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> २०२३ मध्ये नंदिता आणि त्यांची बहीण अनु हिंदुजा यांनी एकत्रित AN-Y1 हा ''विलासी वस्त्रशैली उत्पादन'' (लक्झरी फॅशन ब्रँड) निर्माण केला. त्यांचे लक्षवेधी महिलांचे जंपसूट तेव्हापासून ख्यातनाम व्यक्ती आणि परिकल्पक प्रभावक (फॅशन इन्फ्लुएन्सर) यांच्या पसंतीत आल्याचे दिसू लागले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.an-y1.com/shop/jumpsuits/|title=AN-Y1 Fashion Collection {{!}} Designer Silk Jumpsuits|language=en-GB|access-date=2024-01-23}}</ref> == वैयक्तिक जीवन == महतानी यांचे लग्न १९९६ साली उद्योजक [[संजय कपूर (उद्योजक)|संजय कपूर]] यांच्याशी झाले आणि २००० साली हे जोडपे विभक्त देखील झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.india.com/entertainment/who-is-nandita-mahtani-vidyut-jammwals-gorgeous-bride-to-be-4954105|title=Who is Nandita Mahtani, Vidyut Jammwal's Gorgeous Bride-to-be?|date=13 September 2021|website=India.com|access-date=14 September 2021}}</ref> महतानी यांचे बॉलिवूड अभिनेता [[रणबीर कपूर]] आणि [[डिनो मोरिया]] यांच्याशी देखील काहीकाळ स्नेहसंबंध जुळले होते. शिवाय अभिनेता [[विद्युत जामवाल]]शी त्यांची सोयरिक देखील जुळली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/photos/entertainment/meet-vidyut-jammwal-s-fianc-e-nandita-mahtani-virat-kohli-s-stylist-and-ranbir-kapoor-s-crush-2393624/she-is-ranbir-kapoor-s-crush-2393625|title=Meet Vidyut Jammwal's fiancée Nandita Mahtani - Virat Kohli's stylist and Ranbir Kapoor's 'crush'!|date=13 September 2021|website=ZeeNews.com|access-date=14 September 2021}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.abplive.com/entertainment/bollywood/karisma-kapoor-ex-husband-first-wife-nandita-mahtani-connection-with-virat-kohli-2961794 |title=करिश्मा कपूर की सौतन का है विराट कोहली से कनेक्शन, संजय कपूर से की थी पहली शादी |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी लाइव्ह |प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> नंदिताची बहीण अनु महतानी हिचा विवाह उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा मुलगा संजय हिंदुजाशी झाला. == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == {{कॉमन्स वर्ग|Nandita Mahtani|नंदिता महतानी}} {{DEFAULTSORT:महतानी, नंदिता}} [[वर्ग:हिंदी चित्रपट निर्माते]] [[वर्ग:२१व्या शतकातील भारतीय डिझायनर]] [[वर्ग:हयात व्यक्ती]] [[वर्ग:भारतीय महिला फॅशन डिझायनर्स]] [[वर्ग:इ.स. १९७२ मधील जन्म]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] sp9zyqt4i0b9drqnpd80lvmqzlrvr6i 2581451 2581428 2025-06-21T05:28:29Z संतोष गोरे 135680 removed [[Category:हिंदी चित्रपट निर्माते]] - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581451 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''नंदिता महतानी''' ह्या एक भारतीय वस्त्रशैली परिकल्पक (फॅशन डिझायनर) आहेत. == कारकिर्द == महतानी या हिंदी चित्रपट अभिनेता [[डिनो मोरिया]] सोबत, प्लेग्राउंड नावाची कंपनी चालवतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/dino-morea-nandita-mahtanis-new-venture-a-social-network-for-the-rich-famous/articleshow/50649182.cms|title=Dino Morea & Nandita Mahtani's new venture: A social network for the rich & famous|date=20 January 2016|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> महतानी या क्रिकेटपटू [[विराट कोहली]]चे परिकल्पन (डिझायनिंग) आणि शैली परियोजन (स्टायलिंग) करत असतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/lifestyle/virat-kohli-easiest-and-inspiring-to-work-with-says-designer-nandita-mahtani-1436985.html|title=Virat Kohli Easiest And Inspiring To Work With, Says Designer Nandita Mahtani|date=19 June 2017|website=News18|access-date=2018-03-18}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Reddy|first=Sujata|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/elizabeth-hurley-nandita-mahtani-seema-khan-come-together-for-a-fun-evening/articleshow/50715539.cms|title=Elizabeth Hurley, Nandita Mahtani, Seema Khan come together for a fun evening|date=2016|work=The Economic Times|access-date=2018-03-18}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=Alves|first=Glynda|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/designer-nandita-mahtani-offers-a-peek-into-virat-kohlis-wardrobe-says-captain-loves-sunglasses/articleshow/69590856.cms?from=mdr|title=Designer Nandita Mahtani offers a peek into Virat Kohli's wardrobe, says captain loves sunglasses|date=31 May 2019|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> २०२३ मध्ये नंदिता आणि त्यांची बहीण अनु हिंदुजा यांनी एकत्रित AN-Y1 हा ''विलासी वस्त्रशैली उत्पादन'' (लक्झरी फॅशन ब्रँड) निर्माण केला. त्यांचे लक्षवेधी महिलांचे जंपसूट तेव्हापासून ख्यातनाम व्यक्ती आणि परिकल्पक प्रभावक (फॅशन इन्फ्लुएन्सर) यांच्या पसंतीत आल्याचे दिसू लागले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.an-y1.com/shop/jumpsuits/|title=AN-Y1 Fashion Collection {{!}} Designer Silk Jumpsuits|language=en-GB|access-date=2024-01-23}}</ref> == वैयक्तिक जीवन == महतानी यांचे लग्न १९९६ साली उद्योजक [[संजय कपूर (उद्योजक)|संजय कपूर]] यांच्याशी झाले आणि २००० साली हे जोडपे विभक्त देखील झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.india.com/entertainment/who-is-nandita-mahtani-vidyut-jammwals-gorgeous-bride-to-be-4954105|title=Who is Nandita Mahtani, Vidyut Jammwal's Gorgeous Bride-to-be?|date=13 September 2021|website=India.com|access-date=14 September 2021}}</ref> महतानी यांचे बॉलिवूड अभिनेता [[रणबीर कपूर]] आणि [[डिनो मोरिया]] यांच्याशी देखील काहीकाळ स्नेहसंबंध जुळले होते. शिवाय अभिनेता [[विद्युत जामवाल]]शी त्यांची सोयरिक देखील जुळली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/photos/entertainment/meet-vidyut-jammwal-s-fianc-e-nandita-mahtani-virat-kohli-s-stylist-and-ranbir-kapoor-s-crush-2393624/she-is-ranbir-kapoor-s-crush-2393625|title=Meet Vidyut Jammwal's fiancée Nandita Mahtani - Virat Kohli's stylist and Ranbir Kapoor's 'crush'!|date=13 September 2021|website=ZeeNews.com|access-date=14 September 2021}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.abplive.com/entertainment/bollywood/karisma-kapoor-ex-husband-first-wife-nandita-mahtani-connection-with-virat-kohli-2961794 |title=करिश्मा कपूर की सौतन का है विराट कोहली से कनेक्शन, संजय कपूर से की थी पहली शादी |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी लाइव्ह |प्रकाशक= |भाषा=हिंदी |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> नंदिताची बहीण अनु महतानी हिचा विवाह उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा मुलगा संजय हिंदुजाशी झाला. == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == {{कॉमन्स वर्ग|Nandita Mahtani|नंदिता महतानी}} {{DEFAULTSORT:महतानी, नंदिता}} [[वर्ग:२१व्या शतकातील भारतीय डिझायनर]] [[वर्ग:हयात व्यक्ती]] [[वर्ग:भारतीय महिला फॅशन डिझायनर्स]] [[वर्ग:इ.स. १९७२ मधील जन्म]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] cz1tog5qovsavsl3xhbhhhka07tivpy सदस्य चर्चा:प्रदीप भैया आडागळे 3 366675 2581422 2025-06-21T03:54:47Z साहाय्य चमू 25365 नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 2581422 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=प्रदीप भैया आडागळे}} -- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) ०९:२४, २१ जून २०२५ (IST) f2vpb44qukjmufqd6cg4vo9cql6zzny हरिराव होळकर 0 366676 2581424 2025-06-21T04:02:02Z अभय नातू 206 "[[:en:Special:Redirect/revision/1268702882|Hari Rao Holkar]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले 2581424 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट राज्याधिकारी|नाव=हरिराव होळकर|पदवी=इंदूरचे नववे महाराज|राज्य_काळ=१८३४-१८४३|राजधानी=[[इंदूर]]|मृत्यू_दिनांक=२४ ऑक्टोबर, १८४३|पूर्वाधिकारी=[[तिसरे मल्हारराव होळकर]]|उत्तराधिकारी=[[दुसरे खंडेराव होळकर]]|वडील=[[विठोजीराव होळकर]]|जन्म_दिनांक=१७९५|धर्म=हिंदू}} '''हरिराव होळकर''' ([[इ.स. १७९५|१७९५]] - [[इ.स. १८४३|१८४३]]), औपचारिकपणे '''महाराजाधिराज राज राजेश्वर सवाई श्री हरिराव होळकर नववे बहादूर''' ,{{संदर्भ हवा}} हे मध्य भारतातील [[इंदूर संस्थान|इंदूर संस्थानाचे]] राजे होते.हे [[१७ एप्रिल]], [[इ.स. १८३४|१८३४]] पासून [[२४ ऑक्टोबर]], [[इ.स. १८४३|१८४३]] दरम्यान सत्तेवर होते. हे [[तुकोजीराव होळकर]] यांचे नातू होते. १८१९मध्ये [[यशवंतराव होळकर|यशवंतराव होळकरांच्या]] मृत्यूनंतरच्या सत्तासंघर्षात बंड केल्याच्या आरोपाखाली [[मल्हारराव होळकर तिसरे|मल्हारराव तिसरे]] आणि त्यांच्या आई [[कृष्णाबाई होळकर|कृष्णाबाई]] यांनी हरिरावांना [[महेश्वर (मध्य प्रदेश)|महेश्वर]] येथे तुरुंगात टाकलेले होते. मल्हाररावांच्या सद्दीनंतर कृष्णाबाई यांनी [[मार्तंडराव होळकर|मार्तंडराव]] यांना दत्तक घेण्याचा घाट घातल्यावर [[इंदूर]]<nowiki/>मधील सरदारांनी त्याविरुद्ध बंड पुकारले. हे पाहून कृष्णाबाईने हरिरावांना सत्ता देण्याचे कबूल केले. या नंतर कृष्णाबाईंनी हरिरावांना दत्त घेतले व १७ एप्रिल १८३४ रोजी [[जुना राजवाडा (इंदूर)|जुना राजवाडा पॅलेसमध्ये]] औपचारिकपणे सिंहासनावर बसवले. या रस्सीखेचीत [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] तटस्थ राहिली. कालांतराने हरिरावांची प्रकृती बिघडल्याने [[ब्रिटिश रेसिडेंट|ब्रिटिश रेसिडेंटने]] त्यांच्यावर आपला वारस नियुक्त करण्याचा आग्रह धरला. २ जुलै, १८४१ रोजी हरिरावांनी इंदूरजवळी [[जोतशिखरा]] येथील जहागिरदार बापूजीराव होळकर यांचा १ वर्षांचा मुलगा [[दुसरे खंडेराव होळकर|खंडेराव होळकर]] याला दत्तक घेतले. जेव्हा हरिराव प्रकृतीअस्वास्थ्यामुळे सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाले तेव्हा गव्हर्नर जनरल [[लॉर्ड एलेनबरो]] यांनी मार्तंड राव यांच्या समर्थकांनी गोंधळ करू नये म्हणून खंडेरावांना आव्हान देण्यापासून रोखण्यासाठी सक्षम मंत्र्यांची नियुक्ती करुन दिली. == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:इ.स. १८४३ मधील मृत्यू]] [[वर्ग:इ.स. १७९५ मधील जन्म]] [[वर्ग:होळकर घराणे]] [[वर्ग:इंदूरचे राजे]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 2qbjlx9mtkfxw6pqqadsr65kil52jow 2581425 2581424 2025-06-21T04:02:04Z KiranBOT II 140753 शुद्धलेखन — योग्य उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#योग्य उकार|अधिक माहिती]]) 2581425 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट राज्याधिकारी|नाव=हरिराव होळकर|पदवी=इंदूरचे नववे महाराज|राज्य_काळ=१८३४-१८४३|राजधानी=[[इंदूर]]|मृत्यू_दिनांक=२४ ऑक्टोबर, १८४३|पूर्वाधिकारी=[[तिसरे मल्हारराव होळकर]]|उत्तराधिकारी=[[दुसरे खंडेराव होळकर]]|वडील=[[विठोजीराव होळकर]]|जन्म_दिनांक=१७९५|धर्म=हिंदू}} '''हरिराव होळकर''' ([[इ.स. १७९५|१७९५]] - [[इ.स. १८४३|१८४३]]), औपचारिकपणे '''महाराजाधिराज राज राजेश्वर सवाई श्री हरिराव होळकर नववे बहादूर''' ,{{संदर्भ हवा}} हे मध्य भारतातील [[इंदूर संस्थान|इंदूर संस्थानाचे]] राजे होते.हे [[१७ एप्रिल]], [[इ.स. १८३४|१८३४]] पासून [[२४ ऑक्टोबर]], [[इ.स. १८४३|१८४३]] दरम्यान सत्तेवर होते. हे [[तुकोजीराव होळकर]] यांचे नातू होते. १८१९मध्ये [[यशवंतराव होळकर|यशवंतराव होळकरांच्या]] मृत्यूनंतरच्या सत्तासंघर्षात बंड केल्याच्या आरोपाखाली [[मल्हारराव होळकर तिसरे|मल्हारराव तिसरे]] आणि त्यांच्या आई [[कृष्णाबाई होळकर|कृष्णाबाई]] यांनी हरिरावांना [[महेश्वर (मध्य प्रदेश)|महेश्वर]] येथे तुरुंगात टाकलेले होते. मल्हाररावांच्या सद्दीनंतर कृष्णाबाई यांनी [[मार्तंडराव होळकर|मार्तंडराव]] यांना दत्तक घेण्याचा घाट घातल्यावर [[इंदूर]]<nowiki/>मधील सरदारांनी त्याविरुद्ध बंड पुकारले. हे पाहून कृष्णाबाईने हरिरावांना सत्ता देण्याचे कबूल केले. या नंतर कृष्णाबाईंनी हरिरावांना दत्त घेतले व १७ एप्रिल १८३४ रोजी [[जुना राजवाडा (इंदूर)|जुना राजवाडा पॅलेसमध्ये]] औपचारिकपणे सिंहासनावर बसवले. या रस्सीखेचीत [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] तटस्थ राहिली. कालांतराने हरिरावांची प्रकृती बिघडल्याने [[ब्रिटिश रेसिडेंट|ब्रिटिश रेसिडेंटने]] त्यांच्यावर आपला वारस नियुक्त करण्याचा आग्रह धरला. २ जुलै, १८४१ रोजी हरिरावांनी इंदूरजवळी [[जोतशिखरा]] येथील जहागिरदार बापूजीराव होळकर यांचा १ वर्षांचा मुलगा [[दुसरे खंडेराव होळकर|खंडेराव होळकर]] याला दत्तक घेतले. जेव्हा हरिराव प्रकृतीअस्वास्थ्यामुळे सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाले तेव्हा गव्हर्नर जनरल [[लॉर्ड एलेनबरो]] यांनी मार्तंड राव यांच्या समर्थकांनी गोंधळ करू नये म्हणून खंडेरावांना आव्हान देण्यापासून रोखण्यासाठी सक्षम मंत्र्यांची नियुक्ती करून दिली. == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:इ.स. १८४३ मधील मृत्यू]] [[वर्ग:इ.स. १७९५ मधील जन्म]] [[वर्ग:होळकर घराणे]] [[वर्ग:इंदूरचे राजे]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 70b045q3nlekusm6wp9jwqvfeue8pa6 इंदूरचे हरिराव होळकर 0 366677 2581426 2025-06-21T04:02:54Z अभय नातू 206 नामभेद 2581426 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[हरिराव होळकर]] 5slxgpzsbeqtfv6zqdauxec4bzilz14 हरीराव होळकर 0 366678 2581427 2025-06-21T04:03:14Z अभय नातू 206 लेखनभेद 2581427 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[हरिराव होळकर]] 5slxgpzsbeqtfv6zqdauxec4bzilz14 दौलतराव शिंदे 0 366679 2581432 2025-06-21T04:43:13Z अभय नातू 206 "[[:en:Special:Redirect/revision/1295064281|Daulat Rao Sindhia]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले 2581432 wikitext text/x-wiki '''दौलतराव शिंदे''' ([[इ.स. १७७९|१७७९]] - [[२१ मार्च]], [[इ.स. १८२७|१८२७]]) हे मध्य भारतातील ग्वाल्हेर संसथानाचे राजे होते. हे १७९४ पासून १८२७ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत सत्तेवर होते. त्यांच्या कारकिर्दीत [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्यात]] वर्चस्वासाठी संघर्ष आणि विस्तारत असलेल्या [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीशी]] अनेक युद्धे झाली. [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध|दुसऱ्या]] आणि [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धात]] दौलतरावांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बहुतेक भारतीय शासकांनी ब्रिटीश राजवट स्वीकारली असली तरी ग्वाल्हेरने १८३२ पर्यंत आपले स्वातंत्र्य कायम ठेवले आणि १८८६ पर्यंत [[मुघल साम्राज्य|मुघलांसह]] इतर शेजारील राज्यांकडून [[चौथ]] (कर) वसूल करणे सुरू ठेवले. == युद्धे आणि लढाया == दौलतरावांनी अनेक युद्धे आणि लढायांमध्ये भाग घेतला होता -- * [[मालपुराची लढाई]] * [[आसईची लढाई|असयेची लढाई]] * [[अरगावची लढाई]] * [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध|दुसरे]] [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|आंग्ल]]-मराठा युद्ध * [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसरे आंग्ल-मराठा युद्ध]] शिंदे यांनी तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धात आधी [[पेशवे|पेशव्यांना]] पाठिंबा दिला होता परंतु ब्रिटिशांनी त्यांना पेचात पकडल्यावर त्यांनी स्वतःचे राज्य सांभाळून ठेवणे पसंत केले. दौलतराव हे १२ फेब्रुवारी, १७९४ रोजी वयाच्या १५व्या वर्षी महाराजा [[महादजी शिंदे]] यांच्या मृत्यूनंतर सत्तेवर आले. महादजींना वारस नसल्याने त्यांचे मोठे भाऊ [[तुकोजीराव शिंदे]] यांचे नातू असलेल्या दौलतरावांची वर्णी लागली. तुकोजीराव [[पानिपतची तिसरी लढाई|पानिपतच्या तिसऱ्या युद्धा आधी]] ७ जानेवारी, १७६१ रोजी लढाईत मारले गेले होते. == संदर्भ == * हंटर, विल्यम विल्सन, सर, आणि इतर (१९०८). ''इम्पीरियल गॅझेटियर ऑफ इंडिया'', खंड १२. १९०८–१९३१; क्लॅरेंडन प्रेस, ऑक्सफर्ड. * मार्कोविट्स, क्लॉड (संपादन) (२००४). ''आधुनिक भारताचा इतिहास: १४८०-१९५०'' . अँथम प्रेस, लंडन. [[वर्ग:उज्जैनमधील लोक]] [[वर्ग:इ.स. १८२७ मधील मृत्यू]] [[वर्ग:इ.स. १७७९ मधील जन्म]] [[वर्ग:शिंदे घराणे]] [[वर्ग:ग्वाल्हेरचे राजे]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] eincksqwuwyz81xk2a4m2ydlnj60ls9 2581433 2581432 2025-06-21T04:45:03Z अभय नातू 206 वर्ग 2581433 wikitext text/x-wiki '''दौलतराव शिंदे''' ([[इ.स. १७७९|१७७९]] - [[२१ मार्च]], [[इ.स. १८२७|१८२७]]) हे मध्य भारतातील [[ग्वाल्हेर संस्थान|ग्वाल्हेर संस्थानाचे]] राजे होते. हे १७९४ पासून १८२७ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत सत्तेवर होते. त्यांच्या कारकिर्दीत [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्यात]] वर्चस्वासाठी संघर्ष आणि विस्तारत असलेल्या [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीशी]] अनेक युद्धे झाली. [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध|दुसऱ्या]] आणि [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धात]] दौलतरावांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बहुतेक भारतीय शासकांनी ब्रिटीश राजवट स्वीकारली असली तरी ग्वाल्हेरने १८३२ पर्यंत आपले स्वातंत्र्य कायम ठेवले आणि १८८६ पर्यंत [[मुघल साम्राज्य|मुघलांसह]] इतर शेजारील राज्यांकडून [[चौथ]] (कर) वसूल करणे सुरू ठेवले. == युद्धे आणि लढाया == दौलतरावांनी अनेक युद्धे आणि लढायांमध्ये भाग घेतला होता -- * [[मालपुराची लढाई]] * [[आसईची लढाई|असयेची लढाई]] * [[अरगावची लढाई]] * [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध|दुसरे]] [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|आंग्ल]]-मराठा युद्ध * [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसरे आंग्ल-मराठा युद्ध]] शिंदे यांनी तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धात आधी [[पेशवे|पेशव्यांना]] पाठिंबा दिला होता परंतु ब्रिटिशांनी त्यांना पेचात पकडल्यावर त्यांनी स्वतःचे राज्य सांभाळून ठेवणे पसंत केले. दौलतराव हे १२ फेब्रुवारी, १७९४ रोजी वयाच्या १५व्या वर्षी महाराजा [[महादजी शिंदे]] यांच्या मृत्यूनंतर सत्तेवर आले. महादजींना वारस नसल्याने त्यांचे मोठे भाऊ [[तुकोजीराव शिंदे]] यांचे नातू असलेल्या दौलतरावांची वर्णी लागली. तुकोजीराव [[पानिपतची तिसरी लढाई|पानिपतच्या तिसऱ्या युद्धा आधी]] ७ जानेवारी, १७६१ रोजी लढाईत मारले गेले होते. == संदर्भ == * हंटर, विल्यम विल्सन, सर, आणि इतर (१९०८). ''इम्पीरियल गॅझेटियर ऑफ इंडिया'', खंड १२. १९०८–१९३१; क्लॅरेंडन प्रेस, ऑक्सफर्ड. * मार्कोविट्स, क्लॉड (संपादन) (२००४). ''आधुनिक भारताचा इतिहास: १४८०-१९५०'' . अँथम प्रेस, लंडन. [[वर्ग:ग्वाल्हेरचे राजे]] [[वर्ग:शिंदे घराणे]] [[वर्ग:इ.स. १८२७ मधील मृत्यू]] [[वर्ग:इ.स. १७७९ मधील जन्म]] [[वर्ग:उज्जैनमधील लोक]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] quvt6eq75fktuxlkifgmkkbcck0ejwp दौलतराव सिंधिया 0 366680 2581434 2025-06-21T04:45:33Z अभय नातू 206 लेखनभेद 2581434 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[दौलतराव शिंदे]] 5znjuhi3nwmefj2aza4jwjvhrcx2c04 फिलिपिन्समधील धर्म 0 366681 2581436 2025-06-21T04:48:36Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[फिलिपिन्समधील धर्म]] वरुन [[मसूदा:फिलिपिन्समधील धर्म]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 2581436 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:फिलिपिन्समधील धर्म]] 0kq001c3b3j1uwvr7x3qx9kt9ri1737 चर्चा:फिलिपिन्समधील धर्म 1 366682 2581438 2025-06-21T04:48:36Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:फिलिपिन्समधील धर्म]] वरुन [[मसूदा चर्चा:फिलिपिन्समधील धर्म]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 2581438 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा चर्चा:फिलिपिन्समधील धर्म]] mf10op168knadhn9wgffng0o3pl678j २०१७ तैवान अंधारपट 0 366683 2581440 2025-06-21T04:52:55Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[२०१७ तैवान अंधारपट]] वरुन [[मसूदा:२०१७ तैवान अंधारपट]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 2581440 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:२०१७ तैवान अंधारपट]] e4lape4bf0vvtf7iyy1wqfzym19t7gs चर्चा:२०१७ तैवान अंधारपट 1 366684 2581442 2025-06-21T04:52:55Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:२०१७ तैवान अंधारपट]] वरुन [[मसूदा चर्चा:२०१७ तैवान अंधारपट]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 2581442 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा चर्चा:२०१७ तैवान अंधारपट]] a9q1cz9xwbfy2xo7h27ybb46ko7moi2 जे-की संग 0 366685 2581444 2025-06-21T04:59:13Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[जे-की संग]] वरुन [[मसूदा:जे-की संग]] ला हलविला: मोठे बदल अपेक्षित 2581444 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:जे-की संग]] amwcqna9d95a8l4t7esksiymrfieipw तुषार घाडीगावकर 0 366686 2581445 2025-06-21T05:11:48Z संतोष गोरे 135680 नवीन पान: {{निर्माणाधीन}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली... 2581445 wikitext text/x-wiki {{निर्माणाधीन}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. == अभिनय सूची == === मालिका === तुमची मुलगी काय करते लवंगी मिरची हे मन बावरे === चित्रपट === मन कस्तुरी रे भाऊबळी उनाड झोंबिवली === नाटक === संगीत बिबट आख्यान 5zcahqwgqtqdqb3z1mgom27yxna7p1g 2581553 2581445 2025-06-21T09:48:59Z संतोष गोरे 135680 2581553 wikitext text/x-wiki {{निर्माणाधीन}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील [[कणकवली]] येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.<ref name="itv">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiatvnews.com/entertainment/news/tushar-ghadigaonkar-dies-by-suicide-marathi-actor-takes-drastic-step-amid-work-struggles-vitthalrao-reacts-2025-06-21-995630 |title=Tushar Ghadigaonkar dies by suicide: Marathi actor takes drastic step amid work struggles, Vitthalrao reacts |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=इंडिया टीव्ही |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत काम केले होते.<ref name="itv" /> == अभिनय सूची == === मालिका === तुमची मुलगी काय करते लवंगी मिरची हे मन बावरे === चित्रपट === मन कस्तुरी रे भाऊबळी उनाड झोंबिवली === नाटक === संगीत बिबट आख्यान 0tran2yw6oewha9x1g9gd8v0bjg6h2l 2581554 2581553 2025-06-21T09:53:25Z संतोष गोरे 135680 2581554 wikitext text/x-wiki {{निर्माणाधीन}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-actor-tushar-ghadigaonkar-ends-life-due-to-mental-stress-film-industry-mourns-death/articleshow/121986791.cms? |title= मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने मृत्यूला कवटाळलं, तणावातून टोकाचं पाऊल, सिनेसृष्टीला धक्का |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=महाराष्ट्र टाइम्स |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील [[कणकवली]] येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.<ref name="itv">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiatvnews.com/entertainment/news/tushar-ghadigaonkar-dies-by-suicide-marathi-actor-takes-drastic-step-amid-work-struggles-vitthalrao-reacts-2025-06-21-995630 |title=Tushar Ghadigaonkar dies by suicide: Marathi actor takes drastic step amid work struggles, Vitthalrao reacts |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=इंडिया टीव्ही |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१" /> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत काम केले होते.<ref name="itv" /><ref name="मटा१" /> == अभिनय सूची == === मालिका === तुमची मुलगी काय करते लवंगी मिरची हे मन बावरे === चित्रपट === मन कस्तुरी रे भाऊबळी उनाड झोंबिवली === नाटक === संगीत बिबट आख्यान erpqhvuwomhtqdn3hjff44o8dcfcel4 2581555 2581554 2025-06-21T09:53:49Z संतोष गोरे 135680 2581555 wikitext text/x-wiki {{निर्माणाधीन}} {{विकिडेटा माहितीचौकट}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-actor-tushar-ghadigaonkar-ends-life-due-to-mental-stress-film-industry-mourns-death/articleshow/121986791.cms? |title= मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने मृत्यूला कवटाळलं, तणावातून टोकाचं पाऊल, सिनेसृष्टीला धक्का |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=महाराष्ट्र टाइम्स |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील [[कणकवली]] येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.<ref name="itv">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiatvnews.com/entertainment/news/tushar-ghadigaonkar-dies-by-suicide-marathi-actor-takes-drastic-step-amid-work-struggles-vitthalrao-reacts-2025-06-21-995630 |title=Tushar Ghadigaonkar dies by suicide: Marathi actor takes drastic step amid work struggles, Vitthalrao reacts |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=इंडिया टीव्ही |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१" /> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत काम केले होते.<ref name="itv" /><ref name="मटा१" /> == अभिनय सूची == === मालिका === तुमची मुलगी काय करते लवंगी मिरची हे मन बावरे === चित्रपट === मन कस्तुरी रे भाऊबळी उनाड झोंबिवली === नाटक === संगीत बिबट आख्यान jjgdsylojnmdszq3a2t21hb8xru9a7x 2581556 2581555 2025-06-21T10:02:01Z संतोष गोरे 135680 2581556 wikitext text/x-wiki {{निर्माणाधीन}} {{विकिडेटा माहितीचौकट}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-actor-tushar-ghadigaonkar-ends-life-due-to-mental-stress-film-industry-mourns-death/articleshow/121986791.cms? |title= मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने मृत्यूला कवटाळलं, तणावातून टोकाचं पाऊल, सिनेसृष्टीला धक्का |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=महाराष्ट्र टाइम्स |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील [[कणकवली]] येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. त्यांचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेले होते. ते भांडूप मधील हनुमान नगर येथे राहत होते.<ref name="abpmajha">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.abplive.com/entertainment/marathi-tv-actor-tushar-ghadigaonkar-ends-his-life-in-mumbai-reason-behind-decision-revealed-1365355 |title=नैराश्य, कौटुंबिक वाद की आणखी काही; फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी माझा |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.<ref name="itv">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiatvnews.com/entertainment/news/tushar-ghadigaonkar-dies-by-suicide-marathi-actor-takes-drastic-step-amid-work-struggles-vitthalrao-reacts-2025-06-21-995630 |title=Tushar Ghadigaonkar dies by suicide: Marathi actor takes drastic step amid work struggles, Vitthalrao reacts |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=इंडिया टीव्ही |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१" /> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत काम केले होते.<ref name="itv" /><ref name="मटा१" /> घाडीगावकर यांची पत्नी शुक्रवारी बाहेर कामावर गेली असताना त्यांनी दुपारच्यावेळेस पंख्याला लटकावून घेऊन आत्महत्या केली.<ref name="abpmajha" /> == अभिनय सूची == === मालिका === तुमची मुलगी काय करते लवंगी मिरची हे मन बावरे === चित्रपट === मन कस्तुरी रे भाऊबळी उनाड झोंबिवली === नाटक === संगीत बिबट आख्यान jrywro3vo79cr8gcmz8pxtbivmsowc0 2581557 2581556 2025-06-21T10:12:15Z संतोष गोरे 135680 2581557 wikitext text/x-wiki {{निर्माणाधीन}} {{विकिडेटा माहितीचौकट}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-actor-tushar-ghadigaonkar-ends-life-due-to-mental-stress-film-industry-mourns-death/articleshow/121986791.cms? |title= मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने मृत्यूला कवटाळलं, तणावातून टोकाचं पाऊल, सिनेसृष्टीला धक्का |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=महाराष्ट्र टाइम्स |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील [[कणकवली]] येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. त्यांचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेले होते. ते भांडूप मधील हनुमान नगर येथे राहत होते.<ref name="abpmajha">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.abplive.com/entertainment/marathi-tv-actor-tushar-ghadigaonkar-ends-his-life-in-mumbai-reason-behind-decision-revealed-1365355 |title=नैराश्य, कौटुंबिक वाद की आणखी काही; फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी माझा |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.<ref name="itv">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiatvnews.com/entertainment/news/tushar-ghadigaonkar-dies-by-suicide-marathi-actor-takes-drastic-step-amid-work-struggles-vitthalrao-reacts-2025-06-21-995630 |title=Tushar Ghadigaonkar dies by suicide: Marathi actor takes drastic step amid work struggles, Vitthalrao reacts |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=इंडिया टीव्ही |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१" /> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत काम केले होते.<ref name="itv" /><ref name="मटा१" /> घंटा नाद प्रॉडक्शन द्वारे घाडीगावकर यांनी अनेक मालिका व लघुपटासाठी दिग्दर्शन केले होते. आमचा मोरया रे, सारलेला क्षण, भाऊचा धक्का, माझ्या गजानना, बाप्पा, खत आया है या संगीत ध्वनिफिती तसेच चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.<refname="न्यूज18" /> घाडीगावकर यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी त्यांची बाल मैत्रीण सिद्धी सोबत लग्न केले होते.<refname="न्यूज18" >{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://lokmat.news18.com/entertainment/tumchi-mulgi-kay-karte-actor-tushar-ghadigaonkar-wedding-photos-viral-sp-695147.html |title=तुमची मुलगी काय करते' फेम अभिनेत्याने मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=lokmat.news18.com |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> शुक्रवारी सिद्धी बाहेर कामावर गेली असताना त्यांनी दुपारच्यावेळेस पंख्याला लटकावून घेऊन आत्महत्या केली.<ref name="abpmajha" /> == अभिनय सूची == === मालिका === तुमची मुलगी काय करते लवंगी मिरची हे मन बावरे === चित्रपट === मन कस्तुरी रे भाऊबळी उनाड झोंबिवली === नाटक === संगीत बिबट आख्यान goyt0e5fqc0xbavynwwngsxcdtayumb 2581558 2581557 2025-06-21T10:16:03Z संतोष गोरे 135680 2581558 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-actor-tushar-ghadigaonkar-ends-life-due-to-mental-stress-film-industry-mourns-death/articleshow/121986791.cms? |title= मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने मृत्यूला कवटाळलं, तणावातून टोकाचं पाऊल, सिनेसृष्टीला धक्का |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=महाराष्ट्र टाइम्स |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील [[कणकवली]] येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. त्यांचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेले होते. ते भांडूप मधील हनुमान नगर येथे राहत होते.<ref name="abpmajha">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.abplive.com/entertainment/marathi-tv-actor-tushar-ghadigaonkar-ends-his-life-in-mumbai-reason-behind-decision-revealed-1365355 |title=नैराश्य, कौटुंबिक वाद की आणखी काही; फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी माझा |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.<ref name="itv">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiatvnews.com/entertainment/news/tushar-ghadigaonkar-dies-by-suicide-marathi-actor-takes-drastic-step-amid-work-struggles-vitthalrao-reacts-2025-06-21-995630 |title=Tushar Ghadigaonkar dies by suicide: Marathi actor takes drastic step amid work struggles, Vitthalrao reacts |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=इंडिया टीव्ही |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१" /> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत काम केले होते.<ref name="itv" /><ref name="मटा१" /> घंटा नाद प्रॉडक्शन द्वारे घाडीगावकर यांनी अनेक मालिका व लघुपटासाठी दिग्दर्शन केले होते. आमचा मोरया रे, सारलेला क्षण, भाऊचा धक्का, माझ्या गजानना, बाप्पा, खत आया है या संगीत ध्वनिफिती तसेच चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.<refname="न्यूज18" /> घाडीगावकर यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी त्यांची बाल मैत्रीण सिद्धी सोबत लग्न केले होते.<refname="न्यूज18" >{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://lokmat.news18.com/entertainment/tumchi-mulgi-kay-karte-actor-tushar-ghadigaonkar-wedding-photos-viral-sp-695147.html |title=तुमची मुलगी काय करते' फेम अभिनेत्याने मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=lokmat.news18.com |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> शुक्रवारी सिद्धी बाहेर कामावर गेली असताना त्यांनी दुपारच्यावेळेस पंख्याला लटकावून घेऊन आत्महत्या केली.<ref name="abpmajha" /> == अभिनय सूची == === मालिका === तुमची मुलगी काय करते लवंगी मिरची हे मन बावरे === चित्रपट === मन कस्तुरी रे भाऊबळी उनाड झोंबिवली === नाटक === संगीत बिबट आख्यान rdu4udryckf8xihum3ga3ry45xxctg0 2581559 2581558 2025-06-21T10:17:20Z संतोष गोरे 135680 2581559 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-actor-tushar-ghadigaonkar-ends-life-due-to-mental-stress-film-industry-mourns-death/articleshow/121986791.cms? |title= मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने मृत्यूला कवटाळलं, तणावातून टोकाचं पाऊल, सिनेसृष्टीला धक्का |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=महाराष्ट्र टाइम्स |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील [[कणकवली]] येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. त्यांचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेले होते. ते भांडूप मधील हनुमान नगर येथे राहत होते.<ref name="abpmajha">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=https://marathi.abplive.com/entertainment/marathi-tv-actor-tushar-ghadigaonkar-ends-his-life-in-mumbai-reason-behind-decision-revealed-1365355 |title=नैराश्य, कौटुंबिक वाद की आणखी काही; फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी माझा |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.<ref name="itv">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiatvnews.com/entertainment/news/tushar-ghadigaonkar-dies-by-suicide-marathi-actor-takes-drastic-step-amid-work-struggles-vitthalrao-reacts-2025-06-21-995630 |title=Tushar Ghadigaonkar dies by suicide: Marathi actor takes drastic step amid work struggles, Vitthalrao reacts |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=इंडिया टीव्ही |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१" /> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत काम केले होते.<ref name="itv" /><ref name="मटा१" /> घंटा नाद प्रॉडक्शन द्वारे घाडीगावकर यांनी अनेक मालिका व लघुपटासाठी दिग्दर्शन केले होते. आमचा मोरया रे, सारलेला क्षण, भाऊचा धक्का, माझ्या गजानना, बाप्पा, खत आया है या संगीत ध्वनिफिती तसेच चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.<ref name="न्यूज18" /> घाडीगावकर यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी त्यांची बाल मैत्रीण सिद्धी सोबत लग्न केले होते.<ref name="न्यूज18" >{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://lokmat.news18.com/entertainment/tumchi-mulgi-kay-karte-actor-tushar-ghadigaonkar-wedding-photos-viral-sp-695147.html |title=तुमची मुलगी काय करते' फेम अभिनेत्याने मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=lokmat.news18.com |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> शुक्रवारी सिद्धी बाहेर कामावर गेली असताना त्यांनी दुपारच्यावेळेस पंख्याला लटकावून घेऊन आत्महत्या केली.<ref name="abpmajha" /> == अभिनय सूची == === मालिका === तुमची मुलगी काय करते लवंगी मिरची हे मन बावरे === चित्रपट === मन कस्तुरी रे भाऊबळी उनाड झोंबिवली === नाटक === संगीत बिबट आख्यान 4fgxkf85av7nvj9w1dimmh2achujoin 2581560 2581559 2025-06-21T10:17:52Z संतोष गोरे 135680 2581560 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-actor-tushar-ghadigaonkar-ends-life-due-to-mental-stress-film-industry-mourns-death/articleshow/121986791.cms? |title= मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने मृत्यूला कवटाळलं, तणावातून टोकाचं पाऊल, सिनेसृष्टीला धक्का |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=महाराष्ट्र टाइम्स |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील [[कणकवली]] येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. त्यांचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेले होते. ते भांडूप मधील हनुमान नगर येथे राहत होते.<ref name="abpmajha">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=https://marathi.abplive.com/entertainment/marathi-tv-actor-tushar-ghadigaonkar-ends-his-life-in-mumbai-reason-behind-decision-revealed-1365355 |title=नैराश्य, कौटुंबिक वाद की आणखी काही; फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी माझा |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.<ref name="itv">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiatvnews.com/entertainment/news/tushar-ghadigaonkar-dies-by-suicide-marathi-actor-takes-drastic-step-amid-work-struggles-vitthalrao-reacts-2025-06-21-995630 |title=Tushar Ghadigaonkar dies by suicide: Marathi actor takes drastic step amid work struggles, Vitthalrao reacts |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=इंडिया टीव्ही |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१" /> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत काम केले होते.<ref name="itv" /><ref name="मटा१" /> घंटा नाद प्रॉडक्शन द्वारे घाडीगावकर यांनी अनेक मालिका व लघुपटासाठी दिग्दर्शन केले होते. आमचा मोरया रे, सारलेला क्षण, भाऊचा धक्का, माझ्या गजानना, बाप्पा, खत आया है या संगीत ध्वनिफिती तसेच चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.<ref name="न्यूज18" /> घाडीगावकर यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी त्यांची बाल मैत्रीण सिद्धी सोबत लग्न केले होते.<ref name="न्यूज18" >{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://lokmat.news18.com/entertainment/tumchi-mulgi-kay-karte-actor-tushar-ghadigaonkar-wedding-photos-viral-sp-695147.html |title=तुमची मुलगी काय करते' फेम अभिनेत्याने मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=lokmat.news18.com |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> शुक्रवारी सिद्धी बाहेर कामावर गेली असताना त्यांनी दुपारच्यावेळेस पंख्याला लटकावून घेऊन आत्महत्या केली.<ref name="abpmajha" /> == अभिनय सूची == === मालिका === तुमची मुलगी काय करते लवंगी मिरची हे मन बावरे === चित्रपट === मन कस्तुरी रे भाऊबळी उनाड झोंबिवली === नाटक === संगीत बिबट आख्यान == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:घाडीगावकर, तुषार}} ikts5ds7dvsilk32in2n81btlazzn9a 2581561 2581560 2025-06-21T10:18:12Z संतोष गोरे 135680 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581561 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-actor-tushar-ghadigaonkar-ends-life-due-to-mental-stress-film-industry-mourns-death/articleshow/121986791.cms? |title= मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने मृत्यूला कवटाळलं, तणावातून टोकाचं पाऊल, सिनेसृष्टीला धक्का |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=महाराष्ट्र टाइम्स |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील [[कणकवली]] येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. त्यांचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेले होते. ते भांडूप मधील हनुमान नगर येथे राहत होते.<ref name="abpmajha">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=https://marathi.abplive.com/entertainment/marathi-tv-actor-tushar-ghadigaonkar-ends-his-life-in-mumbai-reason-behind-decision-revealed-1365355 |title=नैराश्य, कौटुंबिक वाद की आणखी काही; फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी माझा |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.<ref name="itv">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiatvnews.com/entertainment/news/tushar-ghadigaonkar-dies-by-suicide-marathi-actor-takes-drastic-step-amid-work-struggles-vitthalrao-reacts-2025-06-21-995630 |title=Tushar Ghadigaonkar dies by suicide: Marathi actor takes drastic step amid work struggles, Vitthalrao reacts |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=इंडिया टीव्ही |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१" /> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत काम केले होते.<ref name="itv" /><ref name="मटा१" /> घंटा नाद प्रॉडक्शन द्वारे घाडीगावकर यांनी अनेक मालिका व लघुपटासाठी दिग्दर्शन केले होते. आमचा मोरया रे, सारलेला क्षण, भाऊचा धक्का, माझ्या गजानना, बाप्पा, खत आया है या संगीत ध्वनिफिती तसेच चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.<ref name="न्यूज18" /> घाडीगावकर यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी त्यांची बाल मैत्रीण सिद्धी सोबत लग्न केले होते.<ref name="न्यूज18" >{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://lokmat.news18.com/entertainment/tumchi-mulgi-kay-karte-actor-tushar-ghadigaonkar-wedding-photos-viral-sp-695147.html |title=तुमची मुलगी काय करते' फेम अभिनेत्याने मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=lokmat.news18.com |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> शुक्रवारी सिद्धी बाहेर कामावर गेली असताना त्यांनी दुपारच्यावेळेस पंख्याला लटकावून घेऊन आत्महत्या केली.<ref name="abpmajha" /> == अभिनय सूची == === मालिका === तुमची मुलगी काय करते लवंगी मिरची हे मन बावरे === चित्रपट === मन कस्तुरी रे भाऊबळी उनाड झोंबिवली === नाटक === संगीत बिबट आख्यान == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:घाडीगावकर, तुषार}} [[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]] aol557ywls68c47qfprnd3l7vxv5aqv 2581562 2581561 2025-06-21T10:18:37Z संतोष गोरे 135680 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581562 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-actor-tushar-ghadigaonkar-ends-life-due-to-mental-stress-film-industry-mourns-death/articleshow/121986791.cms? |title= मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने मृत्यूला कवटाळलं, तणावातून टोकाचं पाऊल, सिनेसृष्टीला धक्का |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=महाराष्ट्र टाइम्स |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील [[कणकवली]] येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. त्यांचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेले होते. ते भांडूप मधील हनुमान नगर येथे राहत होते.<ref name="abpmajha">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=https://marathi.abplive.com/entertainment/marathi-tv-actor-tushar-ghadigaonkar-ends-his-life-in-mumbai-reason-behind-decision-revealed-1365355 |title=नैराश्य, कौटुंबिक वाद की आणखी काही; फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी माझा |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.<ref name="itv">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiatvnews.com/entertainment/news/tushar-ghadigaonkar-dies-by-suicide-marathi-actor-takes-drastic-step-amid-work-struggles-vitthalrao-reacts-2025-06-21-995630 |title=Tushar Ghadigaonkar dies by suicide: Marathi actor takes drastic step amid work struggles, Vitthalrao reacts |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=इंडिया टीव्ही |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१" /> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत काम केले होते.<ref name="itv" /><ref name="मटा१" /> घंटा नाद प्रॉडक्शन द्वारे घाडीगावकर यांनी अनेक मालिका व लघुपटासाठी दिग्दर्शन केले होते. आमचा मोरया रे, सारलेला क्षण, भाऊचा धक्का, माझ्या गजानना, बाप्पा, खत आया है या संगीत ध्वनिफिती तसेच चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.<ref name="न्यूज18" /> घाडीगावकर यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी त्यांची बाल मैत्रीण सिद्धी सोबत लग्न केले होते.<ref name="न्यूज18" >{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://lokmat.news18.com/entertainment/tumchi-mulgi-kay-karte-actor-tushar-ghadigaonkar-wedding-photos-viral-sp-695147.html |title=तुमची मुलगी काय करते' फेम अभिनेत्याने मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=lokmat.news18.com |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> शुक्रवारी सिद्धी बाहेर कामावर गेली असताना त्यांनी दुपारच्यावेळेस पंख्याला लटकावून घेऊन आत्महत्या केली.<ref name="abpmajha" /> == अभिनय सूची == === मालिका === तुमची मुलगी काय करते लवंगी मिरची हे मन बावरे === चित्रपट === मन कस्तुरी रे भाऊबळी उनाड झोंबिवली === नाटक === संगीत बिबट आख्यान == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:घाडीगावकर, तुषार}} [[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]] [[वर्ग:मराठी अभिनेते]] r6nvm9bg2x7y6teqtvwxz2ro37up4kj 2581564 2581562 2025-06-21T10:18:59Z संतोष गोरे 135680 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581564 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-actor-tushar-ghadigaonkar-ends-life-due-to-mental-stress-film-industry-mourns-death/articleshow/121986791.cms? |title= मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने मृत्यूला कवटाळलं, तणावातून टोकाचं पाऊल, सिनेसृष्टीला धक्का |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=महाराष्ट्र टाइम्स |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील [[कणकवली]] येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. त्यांचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेले होते. ते भांडूप मधील हनुमान नगर येथे राहत होते.<ref name="abpmajha">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=https://marathi.abplive.com/entertainment/marathi-tv-actor-tushar-ghadigaonkar-ends-his-life-in-mumbai-reason-behind-decision-revealed-1365355 |title=नैराश्य, कौटुंबिक वाद की आणखी काही; फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी माझा |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.<ref name="itv">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiatvnews.com/entertainment/news/tushar-ghadigaonkar-dies-by-suicide-marathi-actor-takes-drastic-step-amid-work-struggles-vitthalrao-reacts-2025-06-21-995630 |title=Tushar Ghadigaonkar dies by suicide: Marathi actor takes drastic step amid work struggles, Vitthalrao reacts |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=इंडिया टीव्ही |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१" /> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत काम केले होते.<ref name="itv" /><ref name="मटा१" /> घंटा नाद प्रॉडक्शन द्वारे घाडीगावकर यांनी अनेक मालिका व लघुपटासाठी दिग्दर्शन केले होते. आमचा मोरया रे, सारलेला क्षण, भाऊचा धक्का, माझ्या गजानना, बाप्पा, खत आया है या संगीत ध्वनिफिती तसेच चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.<ref name="न्यूज18" /> घाडीगावकर यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी त्यांची बाल मैत्रीण सिद्धी सोबत लग्न केले होते.<ref name="न्यूज18" >{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://lokmat.news18.com/entertainment/tumchi-mulgi-kay-karte-actor-tushar-ghadigaonkar-wedding-photos-viral-sp-695147.html |title=तुमची मुलगी काय करते' फेम अभिनेत्याने मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=lokmat.news18.com |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> शुक्रवारी सिद्धी बाहेर कामावर गेली असताना त्यांनी दुपारच्यावेळेस पंख्याला लटकावून घेऊन आत्महत्या केली.<ref name="abpmajha" /> == अभिनय सूची == === मालिका === तुमची मुलगी काय करते लवंगी मिरची हे मन बावरे === चित्रपट === मन कस्तुरी रे भाऊबळी उनाड झोंबिवली === नाटक === संगीत बिबट आख्यान == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:घाडीगावकर, तुषार}} [[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]] [[वर्ग:मराठी अभिनेते]] [[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]] i6kbzh1njqd43acibad2uwvar906es7 2581565 2581564 2025-06-21T10:19:26Z संतोष गोरे 135680 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2581565 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-actor-tushar-ghadigaonkar-ends-life-due-to-mental-stress-film-industry-mourns-death/articleshow/121986791.cms? |title= मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने मृत्यूला कवटाळलं, तणावातून टोकाचं पाऊल, सिनेसृष्टीला धक्का |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=महाराष्ट्र टाइम्स |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील [[कणकवली]] येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. त्यांचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेले होते. ते भांडूप मधील हनुमान नगर येथे राहत होते.<ref name="abpmajha">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=https://marathi.abplive.com/entertainment/marathi-tv-actor-tushar-ghadigaonkar-ends-his-life-in-mumbai-reason-behind-decision-revealed-1365355 |title=नैराश्य, कौटुंबिक वाद की आणखी काही; फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी माझा |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.<ref name="itv">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiatvnews.com/entertainment/news/tushar-ghadigaonkar-dies-by-suicide-marathi-actor-takes-drastic-step-amid-work-struggles-vitthalrao-reacts-2025-06-21-995630 |title=Tushar Ghadigaonkar dies by suicide: Marathi actor takes drastic step amid work struggles, Vitthalrao reacts |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=इंडिया टीव्ही |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१" /> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत काम केले होते.<ref name="itv" /><ref name="मटा१" /> घंटा नाद प्रॉडक्शन द्वारे घाडीगावकर यांनी अनेक मालिका व लघुपटासाठी दिग्दर्शन केले होते. आमचा मोरया रे, सारलेला क्षण, भाऊचा धक्का, माझ्या गजानना, बाप्पा, खत आया है या संगीत ध्वनिफिती तसेच चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.<ref name="न्यूज18" /> घाडीगावकर यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी त्यांची बाल मैत्रीण सिद्धी सोबत लग्न केले होते.<ref name="न्यूज18" >{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://lokmat.news18.com/entertainment/tumchi-mulgi-kay-karte-actor-tushar-ghadigaonkar-wedding-photos-viral-sp-695147.html |title=तुमची मुलगी काय करते' फेम अभिनेत्याने मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=lokmat.news18.com |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> शुक्रवारी सिद्धी बाहेर कामावर गेली असताना त्यांनी दुपारच्यावेळेस पंख्याला लटकावून घेऊन आत्महत्या केली.<ref name="abpmajha" /> == अभिनय सूची == === मालिका === तुमची मुलगी काय करते लवंगी मिरची हे मन बावरे === चित्रपट === मन कस्तुरी रे भाऊबळी उनाड झोंबिवली === नाटक === संगीत बिबट आख्यान == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:घाडीगावकर, तुषार}} [[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]] [[वर्ग:मराठी अभिनेते]] [[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:इ.स. २०२५ मधील मृत्यू]] l4wdjjv4s06hteiobk8szejm4hro3pd 2581578 2581565 2025-06-21T11:24:10Z संतोष गोरे 135680 2581578 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-actor-tushar-ghadigaonkar-ends-life-due-to-mental-stress-film-industry-mourns-death/articleshow/121986791.cms? |title= मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने मृत्यूला कवटाळलं, तणावातून टोकाचं पाऊल, सिनेसृष्टीला धक्का |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=महाराष्ट्र टाइम्स |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील [[कणकवली]] येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. त्यांचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेले होते. ते भांडूप मधील हनुमान नगर येथे राहत होते.<ref name="abpmajha">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=https://marathi.abplive.com/entertainment/marathi-tv-actor-tushar-ghadigaonkar-ends-his-life-in-mumbai-reason-behind-decision-revealed-1365355 |title=नैराश्य, कौटुंबिक वाद की आणखी काही; फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी माझा |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.<ref name="itv">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiatvnews.com/entertainment/news/tushar-ghadigaonkar-dies-by-suicide-marathi-actor-takes-drastic-step-amid-work-struggles-vitthalrao-reacts-2025-06-21-995630 |title=Tushar Ghadigaonkar dies by suicide: Marathi actor takes drastic step amid work struggles, Vitthalrao reacts |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=इंडिया टीव्ही |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१" /> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत काम केले होते.<ref name="itv" /><ref name="मटा१" /> घंटा नाद प्रॉडक्शन द्वारे घाडीगावकर यांनी अनेक मालिका व लघुपटासाठी दिग्दर्शन केले होते. आमचा मोरया रे, सारलेला क्षण, भाऊचा धक्का, माझ्या गजानना, बाप्पा, खत आया है या संगीत ध्वनिफिती तसेच चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.<ref name="न्यूज18" /> घाडीगावकर यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी त्यांची बाल मैत्रीण सिद्धी सोबत लग्न केले होते.<ref name="न्यूज18" >{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://lokmat.news18.com/entertainment/tumchi-mulgi-kay-karte-actor-tushar-ghadigaonkar-wedding-photos-viral-sp-695147.html |title=तुमची मुलगी काय करते' फेम अभिनेत्याने मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=lokmat.news18.com |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> शुक्रवारी सिद्धी बाहेर कामावर गेली असताना त्यांनी दुपारच्यावेळेस पंख्याला लटकावून घेऊन आत्महत्या केली.<ref name="abpmajha" /> == अभिनय सूची == === मालिका === * तुमची मुलगी काय करते, * लवंगी मिरची, * हे मन बावरे === चित्रपट === मन कस्तुरी रे भाऊबळी उनाड झोंबिवली === नाटक === संगीत बिबट आख्यान == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:घाडीगावकर, तुषार}} [[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]] [[वर्ग:मराठी अभिनेते]] [[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:इ.स. २०२५ मधील मृत्यू]] ctwekr5s4zjocrngk0j6yp53a361inb 2581579 2581578 2025-06-21T11:24:54Z संतोष गोरे 135680 2581579 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-actor-tushar-ghadigaonkar-ends-life-due-to-mental-stress-film-industry-mourns-death/articleshow/121986791.cms? |title= मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने मृत्यूला कवटाळलं, तणावातून टोकाचं पाऊल, सिनेसृष्टीला धक्का |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=महाराष्ट्र टाइम्स |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील [[कणकवली]] येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. त्यांचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेले होते. ते भांडूप मधील हनुमान नगर येथे राहत होते.<ref name="abpmajha">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=https://marathi.abplive.com/entertainment/marathi-tv-actor-tushar-ghadigaonkar-ends-his-life-in-mumbai-reason-behind-decision-revealed-1365355 |title=नैराश्य, कौटुंबिक वाद की आणखी काही; फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी माझा |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.<ref name="itv">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiatvnews.com/entertainment/news/tushar-ghadigaonkar-dies-by-suicide-marathi-actor-takes-drastic-step-amid-work-struggles-vitthalrao-reacts-2025-06-21-995630 |title=Tushar Ghadigaonkar dies by suicide: Marathi actor takes drastic step amid work struggles, Vitthalrao reacts |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=इंडिया टीव्ही |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१" /> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत काम केले होते.<ref name="itv" /><ref name="मटा१" /> घंटा नाद प्रॉडक्शन द्वारे घाडीगावकर यांनी अनेक मालिका व लघुपटासाठी दिग्दर्शन केले होते. आमचा मोरया रे, सारलेला क्षण, भाऊचा धक्का, माझ्या गजानना, बाप्पा, खत आया है या संगीत ध्वनिफिती तसेच चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.<ref name="न्यूज18" /> घाडीगावकर यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी त्यांची बाल मैत्रीण सिद्धी सोबत लग्न केले होते.<ref name="न्यूज18" >{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://lokmat.news18.com/entertainment/tumchi-mulgi-kay-karte-actor-tushar-ghadigaonkar-wedding-photos-viral-sp-695147.html |title=तुमची मुलगी काय करते' फेम अभिनेत्याने मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=lokmat.news18.com |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> शुक्रवारी सिद्धी बाहेर कामावर गेली असताना त्यांनी दुपारच्यावेळेस पंख्याला लटकावून घेऊन आत्महत्या केली.<ref name="abpmajha" /> == अभिनय सूची == === मालिका === * तुमची मुलगी काय करते, * लवंगी मिरची, * हे मन बावरे === चित्रपट === * मन कस्तुरी रे * भाऊबळी * उनाड * झोंबिवली * मलाल (हिंदी चित्रपट) === नाटक === संगीत बिबट आख्यान == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:घाडीगावकर, तुषार}} [[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]] [[वर्ग:मराठी अभिनेते]] [[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:इ.स. २०२५ मधील मृत्यू]] 6npk19jzf58531ml3p5ox2lcwk3bwnb 2581580 2581579 2025-06-21T11:25:03Z संतोष गोरे 135680 2581580 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-actor-tushar-ghadigaonkar-ends-life-due-to-mental-stress-film-industry-mourns-death/articleshow/121986791.cms? |title= मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने मृत्यूला कवटाळलं, तणावातून टोकाचं पाऊल, सिनेसृष्टीला धक्का |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=महाराष्ट्र टाइम्स |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील [[कणकवली]] येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. त्यांचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेले होते. ते भांडूप मधील हनुमान नगर येथे राहत होते.<ref name="abpmajha">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=https://marathi.abplive.com/entertainment/marathi-tv-actor-tushar-ghadigaonkar-ends-his-life-in-mumbai-reason-behind-decision-revealed-1365355 |title=नैराश्य, कौटुंबिक वाद की आणखी काही; फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी माझा |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.<ref name="itv">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiatvnews.com/entertainment/news/tushar-ghadigaonkar-dies-by-suicide-marathi-actor-takes-drastic-step-amid-work-struggles-vitthalrao-reacts-2025-06-21-995630 |title=Tushar Ghadigaonkar dies by suicide: Marathi actor takes drastic step amid work struggles, Vitthalrao reacts |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=इंडिया टीव्ही |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१" /> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत काम केले होते.<ref name="itv" /><ref name="मटा१" /> घंटा नाद प्रॉडक्शन द्वारे घाडीगावकर यांनी अनेक मालिका व लघुपटासाठी दिग्दर्शन केले होते. आमचा मोरया रे, सारलेला क्षण, भाऊचा धक्का, माझ्या गजानना, बाप्पा, खत आया है या संगीत ध्वनिफिती तसेच चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.<ref name="न्यूज18" /> घाडीगावकर यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी त्यांची बाल मैत्रीण सिद्धी सोबत लग्न केले होते.<ref name="न्यूज18" >{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://lokmat.news18.com/entertainment/tumchi-mulgi-kay-karte-actor-tushar-ghadigaonkar-wedding-photos-viral-sp-695147.html |title=तुमची मुलगी काय करते' फेम अभिनेत्याने मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=lokmat.news18.com |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> शुक्रवारी सिद्धी बाहेर कामावर गेली असताना त्यांनी दुपारच्यावेळेस पंख्याला लटकावून घेऊन आत्महत्या केली.<ref name="abpmajha" /> == अभिनय सूची == === मालिका === * तुमची मुलगी काय करते, * लवंगी मिरची, * हे मन बावरे === चित्रपट === * मन कस्तुरी रे * भाऊबळी * उनाड * झोंबिवली * मलाल (हिंदी चित्रपट) === नाटक === * संगीत बिबट आख्यान == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:घाडीगावकर, तुषार}} [[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]] [[वर्ग:मराठी अभिनेते]] [[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:इ.स. २०२५ मधील मृत्यू]] hu9bekr4mxwh0wa71lakpzybn2j3nvm ओवरीपाडा मेट्रो स्थानक 0 366687 2581446 2025-06-21T05:24:33Z 103.185.174.191 नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = ओवरीपाडा | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Ovaripada metro station.jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश... 2581446 wikitext text/x-wiki {{रेल्वे स्थानक | नाव = ओवरीपाडा | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Ovaripada metro station.jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] | उंची = | मार्ग = | जोडमार्ग = | अंतर = | इमारत = | फलाट = २ | खोली = | फलाटमजले = | मार्गिका = [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] | वाहनतळ = | सायकलस्टँड = | उद्घाटन = २ एप्रिल २०२२ | बंद = | पुनर्बांधणी = | विद्युतीकरण = | संकेत = | मालकी = | चालक = | विभाग = | आधीचेनाव = | प्रवासीसंख्या = | प्रवासीकालखंड = | प्रवासीसंख्याटक्केफरक = | services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}} {{s-line|system=मुंबई मेट्रो|line=7 |previous=राष्ट्रीय उद्यान|next=दहिसर (पूर्व)}} }} '''ओवरीपाडा''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले. {{मुंबई मेट्रो}} [[वर्ग:लाल मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]] 9d16rrdgxupxryuqetzl8z79t5vzq8w राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्थानक 0 366688 2581447 2025-06-21T05:26:06Z 103.185.174.191 नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = राष्ट्रीय उद्यान | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Rashtriya Udyan metro station (Jan '23).jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता... 2581447 wikitext text/x-wiki {{रेल्वे स्थानक | नाव = राष्ट्रीय उद्यान | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Rashtriya Udyan metro station (Jan '23).jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] | उंची = | मार्ग = | जोडमार्ग = | अंतर = | इमारत = | फलाट = २ | खोली = | फलाटमजले = | मार्गिका = [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] | वाहनतळ = | सायकलस्टँड = | उद्घाटन = २ एप्रिल २०२२ | बंद = | पुनर्बांधणी = | विद्युतीकरण = | संकेत = | मालकी = | चालक = | विभाग = | आधीचेनाव = | प्रवासीसंख्या = | प्रवासीकालखंड = | प्रवासीसंख्याटक्केफरक = | services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}} {{s-line|system=मुंबई मेट्रो|line=7 |previous=देवीपाडा|next=ओवरीपाडा}} }} '''राष्ट्रीय उद्यान''' [[मुंबई मेट्रो]]च्या [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले. {{मुंबई मेट्रो}} [[वर्ग:लाल मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]] 8nkkhpum9su8aj2jor3ixl8vxrd7cgo चंदेश्वर नारायण प्रसाद सिन्हा 0 366689 2581448 2025-06-21T05:26:15Z Aditya tamhankar 80177 नवीन पान: {{माहितीचौकट पंतप्रधान | नाव = चंदेश्वर नारायण प्रसाद सिन्हा | चित्र = | चित्र रुंदी = | पद = [[भारताची संसद|संसद सदस्य (लोकसभा)]] | कार्यकाळ_आरंभ = १७ एप्रिल १९५२ | कार्यकाळ_समाप्ती = ५ एप्रि... 2581448 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट पंतप्रधान | नाव = चंदेश्वर नारायण प्रसाद सिन्हा | चित्र = | चित्र रुंदी = | पद = [[भारताची संसद|संसद सदस्य (लोकसभा)]] | कार्यकाळ_आरंभ = १७ एप्रिल १९५२ | कार्यकाळ_समाप्ती = ५ एप्रिल १९५७ | पंतप्रधान = | मागील = ''नवीन मतदारसंघ'' | पुढील = [[ठाकूर जुगल किशोर सिन्हा]] | मतदारसंघ = [[उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)|उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर]] | जन्मदिनांक = अज्ञात | जन्मस्थान = | मृत्युदिनांक = अज्ञात | मृत्युस्थान = | राष्ट्रीयत्व = भारतीय | पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] | पती = | पत्नी = | नाते = | अपत्ये = | निवास = | शाळा_महाविद्यालय = | व्यवसाय = राजकारणी | धंदा = | धर्म = [[हिंदू]] | सही = | संकेतस्थळ = | तळटीपा = }} '''चंदेश्वर नारायण प्रसाद सिन्हा''' हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी होते. सिन्हा हे १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून तत्कालिन [[बिहार]] राज्याच्या [[उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)|उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर]] मतदारसंघातून [[१ ली लोकसभा|१ल्या]] लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. [[वर्ग:भारतीय राजकारणी]] [[वर्ग:१ ली लोकसभा सदस्य]] [[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]] [[वर्ग:उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूरचे खासदार]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 6kqdc8h0km4zcrfmflgvf5x4tzg38yn 2581449 2581448 2025-06-21T05:27:52Z Aditya tamhankar 80177 2581449 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट पंतप्रधान | नाव = चंदेश्वर नारायण प्रसाद सिन्हा | चित्र = | चित्र रुंदी = | पद = [[भारताची संसद|संसद सदस्य (लोकसभा)]] | कार्यकाळ_आरंभ = १७ एप्रिल १९५२ | कार्यकाळ_समाप्ती = ३१ डिसेंबर १९५२ | पंतप्रधान = | मागील = ''नवीन मतदारसंघ'' | पुढील = [[ठाकूर जुगल किशोर सिन्हा]] | मतदारसंघ = [[उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)|उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर]] | जन्मदिनांक = अज्ञात | जन्मस्थान = | मृत्युदिनांक = अज्ञात | मृत्युस्थान = | राष्ट्रीयत्व = भारतीय | पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] | पती = | पत्नी = | नाते = | अपत्ये = | निवास = | शाळा_महाविद्यालय = | व्यवसाय = राजकारणी | धंदा = | धर्म = [[हिंदू]] | सही = | संकेतस्थळ = | तळटीपा = }} '''चंदेश्वर नारायण प्रसाद सिन्हा''' हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी होते. सिन्हा हे १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून तत्कालिन [[बिहार]] राज्याच्या [[उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)|उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर]] मतदारसंघातून [[१ ली लोकसभा|१ल्या]] लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. [[वर्ग:भारतीय राजकारणी]] [[वर्ग:१ ली लोकसभा सदस्य]] [[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]] [[वर्ग:उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूरचे खासदार]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 9q8wacqwohwjtn4ue142aow2l5tywv9 देवीपाडा मेट्रो स्थानक 0 366690 2581450 2025-06-21T05:27:59Z 103.185.174.191 नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = देवीपाडा | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Devipada metro station entrance A.jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश... 2581450 wikitext text/x-wiki {{रेल्वे स्थानक | नाव = देवीपाडा | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Devipada metro station entrance A.jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] | उंची = | मार्ग = | जोडमार्ग = | अंतर = | इमारत = | फलाट = २ | खोली = | फलाटमजले = | मार्गिका = [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] | वाहनतळ = | सायकलस्टँड = | उद्घाटन = २ एप्रिल २०२२ | बंद = | पुनर्बांधणी = | विद्युतीकरण = | संकेत = | मालकी = | चालक = | विभाग = | आधीचेनाव = | प्रवासीसंख्या = | प्रवासीकालखंड = | प्रवासीसंख्याटक्केफरक = | services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}} {{s-line|system=मुंबई मेट्रो|line=7 |previous=मागाठाणे|next=राष्ट्रीय उद्यान}} }} '''देवीपाडा''' [[मुंबई मेट्रो]]च्या [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले. {{मुंबई मेट्रो}} [[वर्ग:लाल मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]] 423xeu8h8ksgvi31w0iycjj9zl2804n पोईसर मेट्रो स्थानक 0 366691 2581452 2025-06-21T05:29:54Z 103.185.174.191 नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = पोईसर | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Poisar metro station (Jan '23).jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश =... 2581452 wikitext text/x-wiki {{रेल्वे स्थानक | नाव = पोईसर | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Poisar metro station (Jan '23).jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] | उंची = | मार्ग = | जोडमार्ग = | अंतर = | इमारत = | फलाट = २ | खोली = | फलाटमजले = | मार्गिका = [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] | वाहनतळ = | सायकलस्टँड = | उद्घाटन = २ एप्रिल २०२२ | बंद = | पुनर्बांधणी = | विद्युतीकरण = | संकेत = | मालकी = | चालक = | विभाग = | आधीचेनाव = | प्रवासीसंख्या = | प्रवासीकालखंड = | प्रवासीसंख्याटक्केफरक = | services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}} {{s-line|system=मुंबई मेट्रो|line=7 |previous=आकुर्ली|next=मागाठाणे}} }} '''पोईसर''' [[मुंबई मेट्रो]]च्या [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले. {{मुंबई मेट्रो}} [[वर्ग:लाल मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]] k1o1wmi69d5ryd5tlr2k9w4mu69xjsc आकुर्ली मेट्रो स्थानक 0 366692 2581453 2025-06-21T05:31:12Z 103.185.174.191 नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = आकुर्ली | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Akurli metro station.jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = ... 2581453 wikitext text/x-wiki {{रेल्वे स्थानक | नाव = आकुर्ली | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Akurli metro station.jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] | उंची = | मार्ग = | जोडमार्ग = | अंतर = | इमारत = | फलाट = २ | खोली = | फलाटमजले = | मार्गिका = [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] | वाहनतळ = | सायकलस्टँड = | उद्घाटन = २ एप्रिल २०२२ | बंद = | पुनर्बांधणी = | विद्युतीकरण = | संकेत = | मालकी = | चालक = | विभाग = | आधीचेनाव = | प्रवासीसंख्या = | प्रवासीकालखंड = | प्रवासीसंख्याटक्केफरक = | services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}} {{s-line|system=मुंबई मेट्रो|line=7 |previous=कुरार|next=पोईसर}} }} '''आकुर्ली''' [[मुंबई मेट्रो]]च्या [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले. {{मुंबई मेट्रो}} [[वर्ग:लाल मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]] cbnvx4lh4g3nja554o9qfq1vgrfsvvw कुरार मेट्रो स्थानक 0 366693 2581454 2025-06-21T05:32:12Z 103.185.174.191 नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = कुरार | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Kurar metro station (Jan '23).jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [... 2581454 wikitext text/x-wiki {{रेल्वे स्थानक | नाव = कुरार | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Kurar metro station (Jan '23).jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] | उंची = | मार्ग = | जोडमार्ग = | अंतर = | इमारत = | फलाट = २ | खोली = | फलाटमजले = | मार्गिका = [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] | वाहनतळ = | सायकलस्टँड = | उद्घाटन = २ एप्रिल २०२२ | बंद = | पुनर्बांधणी = | विद्युतीकरण = | संकेत = | मालकी = | चालक = | विभाग = | आधीचेनाव = | प्रवासीसंख्या = | प्रवासीकालखंड = | प्रवासीसंख्याटक्केफरक = | services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}} {{s-line|system=मुंबई मेट्रो|line=7 |previous=दिंडोशी|next=आकुर्ली}} }} '''कुरार''' [[मुंबई मेट्रो]]च्या [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले. {{मुंबई मेट्रो}} [[वर्ग:लाल मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]] gjzckgn1r2vn270qngmztahxyas0psf ठाकूर जुगल किशोर सिन्हा 0 366694 2581455 2025-06-21T05:32:33Z Aditya tamhankar 80177 नवीन पान: {{माहितीचौकट पंतप्रधान | नाव = ठाकूर जुगल किशोर सिन्हा | चित्र = | चित्र रुंदी = | पद = [[भारताची संसद|संसद सदस्य (लोकसभा)]] | कार्यकाळ_आरंभ = १ जानेवारी १९५३ | कार्यकाळ_समाप्ती = ५ एप्रिल १९५७... 2581455 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट पंतप्रधान | नाव = ठाकूर जुगल किशोर सिन्हा | चित्र = | चित्र रुंदी = | पद = [[भारताची संसद|संसद सदस्य (लोकसभा)]] | कार्यकाळ_आरंभ = १ जानेवारी १९५३ | कार्यकाळ_समाप्ती = ५ एप्रिल १९५७ | पंतप्रधान = | मागील = [[चंदेश्वर नारायण प्रसाद सिन्हा]] | पुढील = ''मतदारसंघ विसर्जित'' | मतदारसंघ = [[उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)|उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर]] | जन्मदिनांक = १९०८ | जन्मस्थान = दुमारी, [[सितामढी जिल्हा]], [[बिहार|बिहार आणि ओरिसा प्रांत]], [[ब्रिटिश भारत]]<br>(आत्ता दुमारी, [[सितामढी जिल्हा]], [[बिहार]], [[भारत]]) | मृत्युदिनांक = १९८० | मृत्युस्थान = [[पाटणा]], [[बिहार]], [[भारत]] | राष्ट्रीयत्व = भारतीय | पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] | पती = | पत्नी = [[रामदुलारी सिन्हा]] | नाते = | अपत्ये = डॉ. मधुरेंद्र कुमार सिंह (मुलगा) | निवास = | शाळा_महाविद्यालय = टी.एन. महाविद्यालय, [[भागलपूर]] | व्यवसाय = राजकारणी, लेखक | धंदा = | धर्म = [[हिंदू]] | सही = | संकेतस्थळ = | तळटीपा = }} '''ठाकूर जुगल किशोर सिन्हा''' (१९०८ — १९८०) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी होते. जुगल किशोर हे १९५३ साली पोट निवडणूकीत [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून तत्कालिन [[बिहार]] राज्याच्या [[उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)|उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर]] मतदारसंघातून [[१ ली लोकसभा|१ल्या]] लोकसभेचे सदस्य होते. [[उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)|उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर]]चे विद्यमान खासदार [[चंदेश्वर नारायण प्रसाद सिन्हा]] यांच्या राजीनाम्याने सदर मतदारसंघात पोट-निवडणूक घेतली गेली. [[वर्ग:इ.स. १९०८ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९८० मधील मृत्यू]] [[वर्ग:भारतीय राजकारणी]] [[वर्ग:१ ली लोकसभा सदस्य]] [[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]] [[वर्ग:उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूरचे खासदार]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] f85i71659qrfqjk9yngqm5iuq6rms8c 2581457 2581455 2025-06-21T05:33:47Z Aditya tamhankar 80177 2581457 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट पंतप्रधान | नाव = ठाकूर जुगल किशोर सिन्हा | चित्र = | चित्र रुंदी = | पद = [[भारताची संसद|संसद सदस्य (लोकसभा)]] | कार्यकाळ_आरंभ = १ जानेवारी १९५३ | कार्यकाळ_समाप्ती = ५ एप्रिल १९५७ | पंतप्रधान = | मागील = [[चंदेश्वर नारायण प्रसाद सिन्हा]] | पुढील = ''मतदारसंघ विसर्जित'' | मतदारसंघ = [[उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)|उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर]] | जन्मदिनांक = १९०८ | जन्मस्थान = दुमारी, [[सीतामढी जिल्हा]], [[बिहार|बिहार आणि ओरिसा प्रांत]], [[ब्रिटिश भारत]]<br>(आत्ता दुमारी, [[सीतामढी जिल्हा]], [[बिहार]], [[भारत]]) | मृत्युदिनांक = १९८० | मृत्युस्थान = [[पाटणा]], [[बिहार]], [[भारत]] | राष्ट्रीयत्व = भारतीय | पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] | पती = | पत्नी = [[रामदुलारी सिन्हा]] | नाते = | अपत्ये = डॉ. मधुरेंद्र कुमार सिंह (मुलगा) | निवास = | शाळा_महाविद्यालय = टी.एन. महाविद्यालय, [[भागलपूर]] | व्यवसाय = राजकारणी, लेखक | धंदा = | धर्म = [[हिंदू]] | सही = | संकेतस्थळ = | तळटीपा = }} '''ठाकूर जुगल किशोर सिन्हा''' (१९०८ — १९८०) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी होते. जुगल किशोर हे १९५३ साली पोट निवडणूकीत [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून तत्कालिन [[बिहार]] राज्याच्या [[उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)|उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर]] मतदारसंघातून [[१ ली लोकसभा|१ल्या]] लोकसभेचे सदस्य होते. [[उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)|उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर]]चे विद्यमान खासदार [[चंदेश्वर नारायण प्रसाद सिन्हा]] यांच्या राजीनाम्याने सदर मतदारसंघात पोट-निवडणूक घेतली गेली. [[वर्ग:इ.स. १९०८ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९८० मधील मृत्यू]] [[वर्ग:भारतीय राजकारणी]] [[वर्ग:१ ली लोकसभा सदस्य]] [[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]] [[वर्ग:उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूरचे खासदार]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] oj7d9iga7di8j470bbbkz3z9qgaabto दिंडोशी मेट्रो स्थानक 0 366695 2581456 2025-06-21T05:33:24Z 103.185.174.191 नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = दिंडोशी | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Dindoshi metro station (Jan '23).jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश... 2581456 wikitext text/x-wiki {{रेल्वे स्थानक | नाव = दिंडोशी | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Dindoshi metro station (Jan '23).jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] | उंची = | मार्ग = | जोडमार्ग = | अंतर = | इमारत = | फलाट = २ | खोली = | फलाटमजले = | मार्गिका = [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] | वाहनतळ = | सायकलस्टँड = | उद्घाटन = २ एप्रिल २०२२ | बंद = | पुनर्बांधणी = | विद्युतीकरण = | संकेत = | मालकी = | चालक = | विभाग = | आधीचेनाव = | प्रवासीसंख्या = | प्रवासीकालखंड = | प्रवासीसंख्याटक्केफरक = | services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}} {{s-line|system=मुंबई मेट्रो|line=7 |previous=आरे|next=कुरार}} }} '''दिंडोशी''' [[मुंबई मेट्रो]]च्या [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले. {{मुंबई मेट्रो}} [[वर्ग:लाल मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]] n88zw6ao0gkeah6674ox2uezpu722um आरे मेट्रो स्थानक 0 366696 2581458 2025-06-21T05:34:24Z 103.185.174.191 नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = आरे | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Aarey metro station (Jan '23).jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = भ... 2581458 wikitext text/x-wiki {{रेल्वे स्थानक | नाव = आरे | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Aarey metro station (Jan '23).jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] | उंची = | मार्ग = | जोडमार्ग = | अंतर = | इमारत = | फलाट = २ | खोली = | फलाटमजले = | मार्गिका = [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] | वाहनतळ = | सायकलस्टँड = | उद्घाटन = २ एप्रिल २०२२ | बंद = | पुनर्बांधणी = | विद्युतीकरण = | संकेत = | मालकी = | चालक = | विभाग = | आधीचेनाव = | प्रवासीसंख्या = | प्रवासीकालखंड = | प्रवासीसंख्याटक्केफरक = | services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}} {{s-line|system=मुंबई मेट्रो|line=7 |previous=गोरेगाव (पूर्व)|next=दिंडोशी}} }} '''आरे''' [[मुंबई मेट्रो]]च्या [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले. {{मुंबई मेट्रो}} [[वर्ग:लाल मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]] 2eeru7mpd5y4xiklevp11saoes1q2dz गोरेगाव (पूर्व) मेट्रो स्थानक 0 366697 2581459 2025-06-21T05:36:23Z 103.185.174.191 नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = गोरेगाव (पूर्व) | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Goregaon (East) metro station (Jan '23).jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता... 2581459 wikitext text/x-wiki {{रेल्वे स्थानक | नाव = गोरेगाव (पूर्व) | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Goregaon (East) metro station (Jan '23).jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] | उंची = | मार्ग = | जोडमार्ग = | अंतर = | इमारत = | फलाट = २ | खोली = | फलाटमजले = | मार्गिका = [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] | वाहनतळ = | सायकलस्टँड = | उद्घाटन = २० जानेवारी २०२३ | बंद = | पुनर्बांधणी = | विद्युतीकरण = | संकेत = | मालकी = | चालक = | विभाग = | आधीचेनाव = | प्रवासीसंख्या = | प्रवासीकालखंड = | प्रवासीसंख्याटक्केफरक = | services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}} {{s-line|system=मुंबई मेट्रो|line=7 |previous=जोगेश्वरी (पूर्व)|next=आरे}} }} '''गोरेगाव (पूर्व)''' [[मुंबई मेट्रो]]च्या [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २० जानेवारी २०२३ रोजी झाले. {{मुंबई मेट्रो}} [[वर्ग:लाल मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]] cudt3bjku2zuuhnkudn8ff32txlzka7 जोगेश्वरी (पूर्व) मेट्रो स्थानक 0 366698 2581460 2025-06-21T05:37:19Z 103.185.174.191 नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = जोगेश्वरी (पूर्व) | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Jogeshwari (East) metro station (Jan '23).jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता... 2581460 wikitext text/x-wiki {{रेल्वे स्थानक | नाव = जोगेश्वरी (पूर्व) | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Jogeshwari (East) metro station (Jan '23).jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] | उंची = | मार्ग = | जोडमार्ग = | अंतर = | इमारत = | फलाट = २ | खोली = | फलाटमजले = | मार्गिका = [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] | वाहनतळ = | सायकलस्टँड = | उद्घाटन = २० जानेवारी २०२३ | बंद = | पुनर्बांधणी = | विद्युतीकरण = | संकेत = | मालकी = | चालक = | विभाग = | आधीचेनाव = | प्रवासीसंख्या = | प्रवासीकालखंड = | प्रवासीसंख्याटक्केफरक = | services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}} {{s-line|system=मुंबई मेट्रो|line=7 |previous=मोगरा|next=गोरेगाव (पूर्व)}} }} '''जोगेश्वरी (पूर्व)''' [[मुंबई मेट्रो]]च्या [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २० जानेवारी २०२३ रोजी झाले. {{मुंबई मेट्रो}} [[वर्ग:लाल मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]] 6la5e60x31jvy3kga0txxj7y26cb6u7 मोगरा मेट्रो स्थानक 0 366699 2581461 2025-06-21T05:38:26Z 103.185.174.191 नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = मोगरा | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Mogra metro station (Jan '23).jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [... 2581461 wikitext text/x-wiki {{रेल्वे स्थानक | नाव = मोगरा | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Mogra metro station (Jan '23).jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] | उंची = | मार्ग = | जोडमार्ग = | अंतर = | इमारत = | फलाट = २ | खोली = | फलाटमजले = | मार्गिका = [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] | वाहनतळ = | सायकलस्टँड = | उद्घाटन = २० जानेवारी २०२३ | बंद = | पुनर्बांधणी = | विद्युतीकरण = | संकेत = | मालकी = | चालक = | विभाग = | आधीचेनाव = | प्रवासीसंख्या = | प्रवासीकालखंड = | प्रवासीसंख्याटक्केफरक = | services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}} {{s-line|system=मुंबई मेट्रो|line=7 |previous=गुंदवली|next=जोगेश्वरी (पूर्व)}} }} '''मोगरा''' [[मुंबई मेट्रो]]च्या [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २० जानेवारी २०२३ रोजी झाले. {{मुंबई मेट्रो}} [[वर्ग:लाल मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]] fn59q83yv0skfg3poo8gn8cizcmn39d गुंदवली मेट्रो स्थानक 0 366700 2581464 2025-06-21T05:39:14Z 103.185.174.191 नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = गुंदवली | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Gundavali metro station entrance B.jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश... 2581464 wikitext text/x-wiki {{रेल्वे स्थानक | नाव = गुंदवली | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Gundavali metro station entrance B.jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] | उंची = | मार्ग = | जोडमार्ग = | अंतर = | इमारत = | फलाट = २ | खोली = | फलाटमजले = | मार्गिका = [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] | वाहनतळ = | सायकलस्टँड = | उद्घाटन = २० जानेवारी २०२३ | बंद = | पुनर्बांधणी = | विद्युतीकरण = | संकेत = | मालकी = | चालक = | विभाग = | आधीचेनाव = | प्रवासीसंख्या = | प्रवासीकालखंड = | प्रवासीसंख्याटक्केफरक = | services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}} {{s-line|system=मुंबई मेट्रो|line=7 |previous=|next=मोगरा}} }} '''गुंदवली''' [[मुंबई मेट्रो]]च्या [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २० जानेवारी २०२३ रोजी झाले. {{मुंबई मेट्रो}} [[वर्ग:लाल मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]] cqzm166hbw2fxtulzz724mekvyxqcu8 सीताबर्डीची लढाई 0 366701 2581465 2025-06-21T05:40:33Z अभय नातू 206 नवीन 2581465 wikitext text/x-wiki '''सीताबर्डीची लढाई''' [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] आणि [[नागपूरकर भोसले]] यांच्यात २६ डिसेंबर, १८१७ रोजी झालेली लढाई होती. [[तिसरे आंग्ल-मराठा युद्ध|तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धात]] झालेल्या या लढाईत ब्रिटिशांचा विजय झाला आणि भोसल्यांचे [[नागपूर]]वरील वर्चस्व संपले. भोसल्यांनी [[वऱ्हाड|बेरार]]चा मोठा प्रदेश आणि [[नर्मदा|नर्मदेच्या]] खोऱ्यातील आपला प्रदेश ब्रिटिशांच्या स्वाधीन केला आणि त्यांचे वर्चस्व मान्य केले. राजे [[दुसरे मुधोजी भोसले]] यांना अटक करुन [[अलाहाबाद]]ला पाठविण्यात आले. == लढाई == २६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी भोसल्यांच्या सैन्यातील [[अरब]] सैनिकांनी [[सीताबर्डीचा किल्ला|सीताबर्डी किल्ल्याच्या]] ''छोटी टेकरी'' भागावर गोळीबार सुरू केला. रात्रभर हल्ले करुनही त्यांना किल्ल्यात शिरता आले नाही. ब्रिटिशांनी अनेक अरब ठार केले पण त्यांचा कॅप्टन सॅडल लढाईत ठार झाला. पहाटे ५ पर्यंत ब्रिटिशांचे मोजकेच सैनिक उरले होते. थकलेल्या या सैनिकांनी माघार घेतली आणि त्यांच्या जागी [[ब्रिटिश रेसिडेंट]]च्या रक्षकांनी प्रतिकार सुरू ठेवला. सकाळी ९ वाजता अरबांनी छोटी टेकरी काबीज केली व तेथील तोफ बडी टेकरीवर डागली. अरबांचे हे यश पाहून भोसल्यांच्या मुख्य फौजेतील घोडेस्वार आणि सैनिकांनी ब्रिटिशांवर एल्गार केला आणि त्यांच्या निवासी भागात शिरून जाळपोळ केली. [[बेंगाल कॅव्हेलरी]] या ब्रिटिश घोडदळाच्या सरदार कॅप्टन फिट्झजेराल्डने कर्नल स्कॉटकडे प्रतिहल्ला चढवण्याची परवानगी अनेकदा मागितली पण ती नाकारण्यात आली. शेवटी स्कॉटने संदेशवाहकाकरवे त्याला उत्तर पाठवले "त्याच्या जबाबदारीवर आणि मरण्याच्या तयारीवर त्याला प्रतिहल्ला करू दे." हे ऐकून फिट्झजेराल्डने मग ''असू दे माझ्या जबाबदारीवर'' असे उत्तर पाठवित मराठ्यांवर कडाडून हल्ला केला. पहिल्या काही मिनिटांतच त्यांनी मराठ्यांची एक फळी कापून काढली आणि दोन तोफा बळकावल्या. हे पाहून किल्ल्यातील ब्रिटिश फौजेलाही चेव चढला. त्यांनी अरबांना आणि मराठ्यांना टेकडीवरुन खाली ढकलत नेले आणि अजून दोन तोफा पळवून आणल्या. याला उत्तर म्हणून चालून आलेल्या अरबांवर आता कर्नल स्कॉटच्या ताज्या दमाच्या घोडदळाने बाजूने हल्ला केला आणि हा हल्ला मोडून काढला. किल्ल्यावरुन अजून कुमक घेउन ब्रिटिशांनी आसपासच्या प्रदेशातून मराठ्यांना पळवून लावले. दुपारच्या प्रहराच्या सुमारास ही लढाई संपली. ब्रिटिशांनी यात ३६७ सैनिक आणि २ अधिकारी गमावले. == पर्यवसान == यानंतर ब्रिटिशांनी खुद्द नागपूर शहरावर हल्ला केला व अप्पासाहेब भोसल्यांना शरण येण्यास भाग पाडले. त्यांनी भोसल्यांचा मोठा प्रदेश थेट ताब्यात घेतला आणि त्यांना आपले मांडलिक बनवले. खुद्द भोसल्यांना अलाहाबाद येथे पाठवले गेले व नागपूरच्या गादीवर तिसऱ्या रघुजी भोसल्यांना बसवले गेले. [[वर्ग:नागपूर]] [[वर्ग:तिसरे इंग्रज-मराठा युद्ध]] olwuidosuybcgbddl5xihoutbzevv5z 2581466 2581465 2025-06-21T05:40:34Z KiranBOT II 140753 शुद्धलेखन — योग्य उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#योग्य उकार|अधिक माहिती]]) 2581466 wikitext text/x-wiki '''सीताबर्डीची लढाई''' [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] आणि [[नागपूरकर भोसले]] यांच्यात २६ डिसेंबर, १८१७ रोजी झालेली लढाई होती. [[तिसरे आंग्ल-मराठा युद्ध|तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धात]] झालेल्या या लढाईत ब्रिटिशांचा विजय झाला आणि भोसल्यांचे [[नागपूर]]वरील वर्चस्व संपले. भोसल्यांनी [[वऱ्हाड|बेरार]]चा मोठा प्रदेश आणि [[नर्मदा|नर्मदेच्या]] खोऱ्यातील आपला प्रदेश ब्रिटिशांच्या स्वाधीन केला आणि त्यांचे वर्चस्व मान्य केले. राजे [[दुसरे मुधोजी भोसले]] यांना अटक करून [[अलाहाबाद]]ला पाठविण्यात आले. == लढाई == २६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी भोसल्यांच्या सैन्यातील [[अरब]] सैनिकांनी [[सीताबर्डीचा किल्ला|सीताबर्डी किल्ल्याच्या]] ''छोटी टेकरी'' भागावर गोळीबार सुरू केला. रात्रभर हल्ले करूनही त्यांना किल्ल्यात शिरता आले नाही. ब्रिटिशांनी अनेक अरब ठार केले पण त्यांचा कॅप्टन सॅडल लढाईत ठार झाला. पहाटे ५ पर्यंत ब्रिटिशांचे मोजकेच सैनिक उरले होते. थकलेल्या या सैनिकांनी माघार घेतली आणि त्यांच्या जागी [[ब्रिटिश रेसिडेंट]]च्या रक्षकांनी प्रतिकार सुरू ठेवला. सकाळी ९ वाजता अरबांनी छोटी टेकरी काबीज केली व तेथील तोफ बडी टेकरीवर डागली. अरबांचे हे यश पाहून भोसल्यांच्या मुख्य फौजेतील घोडेस्वार आणि सैनिकांनी ब्रिटिशांवर एल्गार केला आणि त्यांच्या निवासी भागात शिरून जाळपोळ केली. [[बेंगाल कॅव्हेलरी]] या ब्रिटिश घोडदळाच्या सरदार कॅप्टन फिट्झजेराल्डने कर्नल स्कॉटकडे प्रतिहल्ला चढवण्याची परवानगी अनेकदा मागितली पण ती नाकारण्यात आली. शेवटी स्कॉटने संदेशवाहकाकरवे त्याला उत्तर पाठवले "त्याच्या जबाबदारीवर आणि मरण्याच्या तयारीवर त्याला प्रतिहल्ला करू दे." हे ऐकून फिट्झजेराल्डने मग ''असू दे माझ्या जबाबदारीवर'' असे उत्तर पाठवित मराठ्यांवर कडाडून हल्ला केला. पहिल्या काही मिनिटांतच त्यांनी मराठ्यांची एक फळी कापून काढली आणि दोन तोफा बळकावल्या. हे पाहून किल्ल्यातील ब्रिटिश फौजेलाही चेव चढला. त्यांनी अरबांना आणि मराठ्यांना टेकडीवरून खाली ढकलत नेले आणि अजून दोन तोफा पळवून आणल्या. याला उत्तर म्हणून चालून आलेल्या अरबांवर आता कर्नल स्कॉटच्या ताज्या दमाच्या घोडदळाने बाजूने हल्ला केला आणि हा हल्ला मोडून काढला. किल्ल्यावरून अजून कुमक घेउन ब्रिटिशांनी आसपासच्या प्रदेशातून मराठ्यांना पळवून लावले. दुपारच्या प्रहराच्या सुमारास ही लढाई संपली. ब्रिटिशांनी यात ३६७ सैनिक आणि २ अधिकारी गमावले. == पर्यवसान == यानंतर ब्रिटिशांनी खुद्द नागपूर शहरावर हल्ला केला व अप्पासाहेब भोसल्यांना शरण येण्यास भाग पाडले. त्यांनी भोसल्यांचा मोठा प्रदेश थेट ताब्यात घेतला आणि त्यांना आपले मांडलिक बनवले. खुद्द भोसल्यांना अलाहाबाद येथे पाठवले गेले व नागपूरच्या गादीवर तिसऱ्या रघुजी भोसल्यांना बसवले गेले. [[वर्ग:नागपूर]] [[वर्ग:तिसरे इंग्रज-मराठा युद्ध]] 1bgguo13k9cy4kmr30xzcugfu838zzw सीताबर्डीचा किल्ला 0 366702 2581467 2025-06-21T05:40:50Z अभय नातू 206 लेखनभेद 2581467 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[सिताबर्डीचा किल्ला]] 1ccqi2fybgzqcewxvrc1d4zxcawteke सिताबर्डीची लढाई 0 366703 2581468 2025-06-21T05:42:55Z अभय नातू 206 लेखनभेद 2581468 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[सीताबर्डीची लढाई]] p6u9zbctn8o1i0ifs6xo6ahcjjgx77f ईशान्य मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७) 0 366704 2581469 2025-06-21T05:46:33Z Aditya tamhankar 80177 नवीन पान: '''उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ''' हा [[भारत]]ातील संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेच्या ५४३ मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ होता. सदर मतदारसंघ हा १९५२ ते १९५७ सालापर्यंत अस्तित... 2581469 wikitext text/x-wiki '''उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ''' हा [[भारत]]ातील संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेच्या ५४३ मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ होता. सदर मतदारसंघ हा १९५२ ते १९५७ सालापर्यंत अस्तित्वात होता. उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर मतदारसंघ [[बिहार]] राज्याचा मतदारसंघ होता. १९५७ सालच्या परिसिमनद्वारे हा मतदारसंघ रद्द करून [[पपरी लोकसभा मतदारसंघ (१९५७-१९७७)|पपरी लोकसभा मतदारसंघात]] विलीन करण्यात आला. ==मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती== ''लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसिमन आदेश, १९५१'' प्रमाणे उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होता : * मुझफ्फरपूर जिल्हा : सीतामढी उप-विभागातील रुनीसैदपूर, पपरी, सोनबरसा, बेला, मुछपकौनी आणि सुरसंद ठाणी * दरभंगा जिल्हा : दरभंगा सदर उप-विभागातील जले ठाणं == उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर मतदारसंघातून निवडून आलेले खासदार == {| class="wikitable" !वर्ष !खासदार ! colspan="2" |पक्ष |- | align="center" colspan="4" | ''[[बिहार|बिहार राज्य]]'' |- | [[१९५१-५२ लोकसभा निवडणुका|१९५२]] | [[दिग्विजय नारायण सिंह]] | style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" | | [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] |- | colspan="4" |''१९५७ नंतर मतदारसंघ बरखास्त''<br>''१९५७ नंतर पहा: [[पपरी लोकसभा मतदारसंघ (१९५७-१९७७)|पपरी लोकसभा मतदारसंघ]]'' |} == निवडणूक निकाल == === १९५२ लोकसभा निवडणूक === {| class="wikitable sortable" style="text-align:left;" |+ [[१९५१-५२ लोकसभा निवडणुका|१९५२ लोकसभा निवडणूक]] : [[उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)|उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ निकाल]] ! colspan="2" | पक्ष ! उमेदवार ! प्राप्त मते ! % ! ±% |- | style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" | | '''[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]''' | '''[[दिग्विजय नारायण सिंह]]''' | '''७०,६०३''' | '''४५.५८%''' | ‌'''−''' |} [[वर्ग:भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ]] [[वर्ग:बिहारमधील भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ]] ntvoj1mxgoq0oxhrgfwxd3urrpzubh8 2581475 2581469 2025-06-21T05:50:37Z Aditya tamhankar 80177 2581475 wikitext text/x-wiki '''उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ''' हा [[भारत]]ातील संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेच्या ५४३ मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ होता. सदर मतदारसंघ हा १९५२ ते १९५७ सालापर्यंत अस्तित्वात होता. उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर मतदारसंघ [[बिहार]] राज्याचा मतदारसंघ होता. १९५७ सालच्या परिसिमनद्वारे हा मतदारसंघ रद्द करून [[पपरी लोकसभा मतदारसंघ (१९५७-१९७७)|पपरी लोकसभा मतदारसंघात]] विलीन करण्यात आला. ==मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती== ''लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसिमन आदेश, १९५१'' प्रमाणे उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होता : * मुझफ्फरपूर जिल्हा : सीतामढी उप-विभागातील रुनीसैदपूर, पपरी, सोनबरसा, बेला, मुछपकौनी आणि सुरसंद ठाणी * दरभंगा जिल्हा : दरभंगा सदर उप-विभागातील जले ठाणं == उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर मतदारसंघातून निवडून आलेले खासदार == {| class="wikitable" !वर्ष !खासदार ! colspan="2" |पक्ष |- | align="center" colspan="4" | ''[[बिहार|बिहार राज्य]]'' |- | [[१९५१-५२ लोकसभा निवडणुका|१९५२]] | [[दिग्विजय नारायण सिंह]] | style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" | | [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] |- | colspan="4" |''१९५७ नंतर मतदारसंघ बरखास्त''<br>''१९५७ नंतर पहा: [[पपरी लोकसभा मतदारसंघ (१९५७-१९७७)|पपरी लोकसभा मतदारसंघ]]'' |} == निवडणूक निकाल == === १९५२ लोकसभा निवडणूक === {| class="wikitable sortable" style="text-align:left;" |+ [[१९५१-५२ लोकसभा निवडणुका|१९५२ लोकसभा निवडणूक]] : [[उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)|उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ निकाल]] ! colspan="2" | पक्ष ! उमेदवार ! प्राप्त मते ! % ! ±% |- | style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" | | '''[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]''' | '''[[दिग्विजय नारायण सिंह]]''' | '''७०,६०३''' | '''४५.५८%''' | ‌'''−''' |- | style="background-color: {{समाजवादी पक्ष (भारत)/meta/color}}" | | [[समाजवादी पक्ष (भारत)]] | राम बहादूर लाल | ३८,०९४ | २४.६०% | ‌− |- | style="background-color: {{किसान मजदूर प्रजा पक्ष/meta/color}}" | | [[किसान मजदूर प्रजा पक्ष]] | राम बहादूर लाल | ३५,२५६ | २२.७६% | ‌− |- | style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" | | [[अपक्ष]] | राम पवित्र तिवारी | १०,९३१ | ७.०६% | ‌− |- | colspan="3"|नोंदणीकृत मतदार |३,२९,८४९ | - |− |- | colspan="3"|झालेले मतदान |१,५४,८८४ |४६.९६% |− |- | style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" | | colspan="2"| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ने जागा '''जिंकली (नवीन जागा)''' |उलटफेर | | |} [[वर्ग:भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ]] [[वर्ग:बिहारमधील भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ]] hn5cb9zqdm6p52mljcczmzxz1fg7o62 2581476 2581475 2025-06-21T05:50:58Z Aditya tamhankar 80177 /* १९५२ लोकसभा निवडणूक */ 2581476 wikitext text/x-wiki '''उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ''' हा [[भारत]]ातील संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेच्या ५४३ मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ होता. सदर मतदारसंघ हा १९५२ ते १९५७ सालापर्यंत अस्तित्वात होता. उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर मतदारसंघ [[बिहार]] राज्याचा मतदारसंघ होता. १९५७ सालच्या परिसिमनद्वारे हा मतदारसंघ रद्द करून [[पपरी लोकसभा मतदारसंघ (१९५७-१९७७)|पपरी लोकसभा मतदारसंघात]] विलीन करण्यात आला. ==मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती== ''लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसिमन आदेश, १९५१'' प्रमाणे उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होता : * मुझफ्फरपूर जिल्हा : सीतामढी उप-विभागातील रुनीसैदपूर, पपरी, सोनबरसा, बेला, मुछपकौनी आणि सुरसंद ठाणी * दरभंगा जिल्हा : दरभंगा सदर उप-विभागातील जले ठाणं == उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर मतदारसंघातून निवडून आलेले खासदार == {| class="wikitable" !वर्ष !खासदार ! colspan="2" |पक्ष |- | align="center" colspan="4" | ''[[बिहार|बिहार राज्य]]'' |- | [[१९५१-५२ लोकसभा निवडणुका|१९५२]] | [[दिग्विजय नारायण सिंह]] | style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" | | [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] |- | colspan="4" |''१९५७ नंतर मतदारसंघ बरखास्त''<br>''१९५७ नंतर पहा: [[पपरी लोकसभा मतदारसंघ (१९५७-१९७७)|पपरी लोकसभा मतदारसंघ]]'' |} == निवडणूक निकाल == === १९५२ लोकसभा निवडणूक === {| class="wikitable sortable" style="text-align:left;" |+ [[१९५१-५२ लोकसभा निवडणुका|१९५२ लोकसभा निवडणूक]] : [[उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)|उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ निकाल]] ! colspan="2" | पक्ष ! उमेदवार ! प्राप्त मते ! % ! ±% |- | style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" | | '''[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]''' | '''[[दिग्विजय नारायण सिंह]]''' | '''७०,६०३''' | '''४५.५८%''' | ‌'''−''' |- | style="background-color: {{समाजवादी पक्ष (भारत)/meta/color}}" | | [[समाजवादी पक्ष (भारत)]] | राम बहादूर लाल | ३८,०९४ | २४.६०% | ‌− |- | style="background-color: {{किसान मजदूर प्रजा पक्ष/meta/color}}" | | [[किसान मजदूर प्रजा पक्ष]] | नरेंद्र प्रसाद | ३५,२५६ | २२.७६% | ‌− |- | style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" | | [[अपक्ष]] | राम पवित्र तिवारी | १०,९३१ | ७.०६% | ‌− |- | colspan="3"|नोंदणीकृत मतदार |३,२९,८४९ | - |− |- | colspan="3"|झालेले मतदान |१,५४,८८४ |४६.९६% |− |- | style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" | | colspan="2"| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ने जागा '''जिंकली (नवीन जागा)''' |उलटफेर | | |} [[वर्ग:भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ]] [[वर्ग:बिहारमधील भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ]] cgeypvbgdpw4e2mbkl0qu4eyfwgqo18 2581485 2581476 2025-06-21T05:55:01Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)]] वरुन [[ईशान्य मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)]] ला हलविला 2581476 wikitext text/x-wiki '''उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ''' हा [[भारत]]ातील संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेच्या ५४३ मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ होता. सदर मतदारसंघ हा १९५२ ते १९५७ सालापर्यंत अस्तित्वात होता. उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर मतदारसंघ [[बिहार]] राज्याचा मतदारसंघ होता. १९५७ सालच्या परिसिमनद्वारे हा मतदारसंघ रद्द करून [[पपरी लोकसभा मतदारसंघ (१९५७-१९७७)|पपरी लोकसभा मतदारसंघात]] विलीन करण्यात आला. ==मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती== ''लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसिमन आदेश, १९५१'' प्रमाणे उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होता : * मुझफ्फरपूर जिल्हा : सीतामढी उप-विभागातील रुनीसैदपूर, पपरी, सोनबरसा, बेला, मुछपकौनी आणि सुरसंद ठाणी * दरभंगा जिल्हा : दरभंगा सदर उप-विभागातील जले ठाणं == उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर मतदारसंघातून निवडून आलेले खासदार == {| class="wikitable" !वर्ष !खासदार ! colspan="2" |पक्ष |- | align="center" colspan="4" | ''[[बिहार|बिहार राज्य]]'' |- | [[१९५१-५२ लोकसभा निवडणुका|१९५२]] | [[दिग्विजय नारायण सिंह]] | style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" | | [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] |- | colspan="4" |''१९५७ नंतर मतदारसंघ बरखास्त''<br>''१९५७ नंतर पहा: [[पपरी लोकसभा मतदारसंघ (१९५७-१९७७)|पपरी लोकसभा मतदारसंघ]]'' |} == निवडणूक निकाल == === १९५२ लोकसभा निवडणूक === {| class="wikitable sortable" style="text-align:left;" |+ [[१९५१-५२ लोकसभा निवडणुका|१९५२ लोकसभा निवडणूक]] : [[उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)|उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ निकाल]] ! colspan="2" | पक्ष ! उमेदवार ! प्राप्त मते ! % ! ±% |- | style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" | | '''[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]''' | '''[[दिग्विजय नारायण सिंह]]''' | '''७०,६०३''' | '''४५.५८%''' | ‌'''−''' |- | style="background-color: {{समाजवादी पक्ष (भारत)/meta/color}}" | | [[समाजवादी पक्ष (भारत)]] | राम बहादूर लाल | ३८,०९४ | २४.६०% | ‌− |- | style="background-color: {{किसान मजदूर प्रजा पक्ष/meta/color}}" | | [[किसान मजदूर प्रजा पक्ष]] | नरेंद्र प्रसाद | ३५,२५६ | २२.७६% | ‌− |- | style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" | | [[अपक्ष]] | राम पवित्र तिवारी | १०,९३१ | ७.०६% | ‌− |- | colspan="3"|नोंदणीकृत मतदार |३,२९,८४९ | - |− |- | colspan="3"|झालेले मतदान |१,५४,८८४ |४६.९६% |− |- | style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" | | colspan="2"| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] ने जागा '''जिंकली (नवीन जागा)''' |उलटफेर | | |} [[वर्ग:भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ]] [[वर्ग:बिहारमधील भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ]] cgeypvbgdpw4e2mbkl0qu4eyfwgqo18 वर्ग:झिह 14 366705 2581471 2025-06-21T05:46:34Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[वर्ग:झिह]] वरुन [[वर्ग:झीह्ल]] ला हलविला 2581471 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[:वर्ग:झीह्ल]] ogi5l0zhm4dxafazyy55vh2mxjslthz तुषार यशवंत घाडीगावकर 0 366706 2581473 2025-06-21T05:49:09Z अभय नातू 206 पूर्ण नाव 2581473 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[तुषार घाडीगावकर]] 7a6kssqnbek8aw3ezjm4oo9895wc52g चंदेश्वर नारायण प्रसाद सिंहा 0 366707 2581474 2025-06-21T05:50:31Z अभय नातू 206 लेखनभेद 2581474 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[चंदेश्वर नारायण प्रसाद सिन्हा]] ire2w6w8oqcq0hogy7k9ybza1wnr3qo गोरेगांव पूर्व मेट्रो स्थानक 0 366708 2581477 2025-06-21T05:51:22Z Khirid Harshad 138639 [[गोरेगाव (पूर्व) मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित 2581477 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[गोरेगाव (पूर्व) मेट्रो स्थानक]] 2h8yxhv1wowk65ixerrwi65w9toni6s अंधेरी (पूर्व) मेट्रो स्थानक 0 366709 2581478 2025-06-21T05:51:44Z Khirid Harshad 138639 [[गुंदवली मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित 2581478 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[गुंदवली मेट्रो स्थानक]] 0iend52kkjg1r5gg6k5kmizn5jrzn3b ओवारीपाडा मेट्रो स्थानक 0 366710 2581479 2025-06-21T05:52:03Z Khirid Harshad 138639 [[ओवरीपाडा मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित 2581479 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ओवरीपाडा मेट्रो स्थानक]] 41jusggwx1ue667rhyugemo4w3dzzah ठाकुर जुगल किशोर सिन्हा 0 366711 2581480 2025-06-21T05:52:11Z अभय नातू 206 लेखनभेद 2581480 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ठाकूर जुगल किशोर सिन्हा]] 0zhysvf3ysnb8jupqx6spa5h1r91zh0 जोगेश्वरी पूर्व मेट्रो स्थानक 0 366712 2581481 2025-06-21T05:52:23Z Khirid Harshad 138639 [[जोगेश्वरी (पूर्व) मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित 2581481 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[जोगेश्वरी (पूर्व) मेट्रो स्थानक]] kpfavb90zsz9lrloreibxmbk947vlpu ठाकूर जुगल किशोर सिंहा 0 366713 2581483 2025-06-21T05:53:54Z अभय नातू 206 लेखनभेद 2581483 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ठाकूर जुगल किशोर सिन्हा]] 0zhysvf3ysnb8jupqx6spa5h1r91zh0 ठाकुर जुगल किशोर सिंहा 0 366714 2581484 2025-06-21T05:54:10Z अभय नातू 206 लेखनभेद 2581484 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ठाकूर जुगल किशोर सिन्हा]] 0zhysvf3ysnb8jupqx6spa5h1r91zh0 उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७) 0 366715 2581486 2025-06-21T05:55:01Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)]] वरुन [[ईशान्य मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)]] ला हलविला 2581486 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ईशान्य मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)]] e9p948j5ma0vq9u96swbodmjiuuehye पोयसर नदी 0 366716 2581489 2025-06-21T05:58:38Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने पुनर्निर्देशन ठेउन लेख [[पोयसर नदी]] वरुन [[पोईसर नदी]] ला हलविला 2581489 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[पोईसर नदी]] cx4wn5zkwy6gg43to42ng9hxeneamrw पोयसर मेट्रो स्थानक 0 366717 2581490 2025-06-21T05:59:25Z Khirid Harshad 138639 [[पोईसर मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित 2581490 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[पोईसर मेट्रो स्थानक]] s5x8lbu8pnox6bwwqj03ru7z4bv3gwk बेलापुर मेट्रो स्थानक 0 366718 2581491 2025-06-21T06:01:18Z Khirid Harshad 138639 [[बेलापूर टर्मिनल मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित 2581491 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[बेलापूर टर्मिनल मेट्रो स्थानक]] k8ynkq5mgsc4gbzog51rteem6o7a2yl पांचनंद मेट्रो स्थानक 0 366719 2581492 2025-06-21T06:03:35Z Khirid Harshad 138639 [[पेठाली - तळोजा मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित 2581492 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[पेठाली - तळोजा मेट्रो स्थानक]] qcjkny6nyywtplhvv2yiwn64ftk03ru सिलम्बम 0 366720 2581494 2025-06-21T06:03:37Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[सिलम्बम]] वरुन [[मसूदा:सिलम्बम]] ला हलविला 2581494 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:सिलम्बम]] 7nhzjagn040ef63td807o33d4q17o1w सिडको सायन्स पार्क मेट्रो स्थानक 0 366721 2581495 2025-06-21T06:04:16Z Khirid Harshad 138639 [[बेलपाडा मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित 2581495 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[बेलपाडा मेट्रो स्थानक]] ikyr7rcmmv5pil3w1ibl91015svoqy4 सीबीडी बेलापुर रेल्वे स्थानक 0 366722 2581496 2025-06-21T06:05:29Z Khirid Harshad 138639 [[सी.बी.डी. बेलापूर रेल्वे स्थानक]] कडे पुनर्निर्देशित 2581496 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[सी.बी.डी. बेलापूर रेल्वे स्थानक]] 0g74p5fmpzv66ya5lsenuispq53xvhk सीबीडी बेलापुर मेट्रो स्थानक 0 366723 2581497 2025-06-21T06:05:53Z Khirid Harshad 138639 [[बेलापूर टर्मिनल मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित 2581497 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[बेलापूर टर्मिनल मेट्रो स्थानक]] k8ynkq5mgsc4gbzog51rteem6o7a2yl आझादनगर मेट्रो स्थानक 0 366724 2581498 2025-06-21T06:07:31Z Khirid Harshad 138639 [[आझाद नगर मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित 2581498 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[आझाद नगर मेट्रो स्थानक]] 48xhqowspah01lblu2otrgy6xzftm0g जागृतीनगर मेट्रो स्थानक 0 366725 2581499 2025-06-21T06:07:54Z Khirid Harshad 138639 [[जागृती नगर मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित 2581499 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[जागृती नगर मेट्रो स्थानक]] l15t83r5n9xhfuc03v62jrn935h8wnb उल्हास नगर 0 366726 2581500 2025-06-21T06:08:19Z Khirid Harshad 138639 [[उल्हासनगर]] कडे पुनर्निर्देशित 2581500 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[उल्हासनगर]] 3111goemdvadxqlczcfmbsfb2dj6di8 कुणाल देशमुख 0 366727 2581502 2025-06-21T06:08:29Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[कुणाल देशमुख]] वरुन [[मसूदा:कुणाल देशमुख]] ला हलविला 2581502 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:कुणाल देशमुख]] 677d8v5kobatdig8wmxfdiy67hzfmw3 उल्हास नगर रेल्वे स्थानक 0 366728 2581503 2025-06-21T06:08:39Z Khirid Harshad 138639 [[उल्हासनगर रेल्वे स्थानक]] कडे पुनर्निर्देशित 2581503 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[उल्हासनगर रेल्वे स्थानक]] py9ihnzoetvofmegco68zb1phnfobdi दिग्विजय नारायण सिंह 0 366729 2581509 2025-06-21T06:15:17Z Aditya tamhankar 80177 नवीन पान: {{माहितीचौकट पंतप्रधान | नाव = दिग्विजय नारायण सिंह | चित्र = | चित्र रुंदी = | पद = [[भारताची संसद|संसद सदस्य (लोकसभा)]] | कार्यकाळ_आरंभ = २३ मार्च १९७७ | कार्यकाळ_समाप्ती = १८ जानेवारी १९८० |... 2581509 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट पंतप्रधान | नाव = दिग्विजय नारायण सिंह | चित्र = | चित्र रुंदी = | पद = [[भारताची संसद|संसद सदस्य (लोकसभा)]] | कार्यकाळ_आरंभ = २३ मार्च १९७७ | कार्यकाळ_समाप्ती = १८ जानेवारी १९८० | पंतप्रधान = | मागील = ''नवीन मतदारसंघ'' | पुढील = [[किशोरी सिन्हा]] | मतदारसंघ = [[वैशाली लोकसभा मतदारसंघ|वैशाली]] | कार्यकाळ_आरंभ2 = १५ मार्च १९७१ | कार्यकाळ_समाप्ती2 = २३ मार्च १९७७ | पंतप्रधान2 = | मागील2 = [[वाल्मिकी चौधरी]] | पुढील2 = [[रामविलास पासवान]] | मतदारसंघ2 = [[हाजीपूर लोकसभा मतदारसंघ|हाजीपूर]] | कार्यकाळ_आरंभ3 = २ एप्रिल १९६२ | कार्यकाळ_समाप्ती3 = १५ मार्च १९७१ | पंतप्रधान3 = | मागील3 = [[अशोक मेहता]] | पुढील3 = [[नवल किशोर सिन्हा]] | मतदारसंघ3 = [[मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ|मुझफ्फरपूर]] | कार्यकाळ_आरंभ4 = ५ एप्रिल १९५७ | कार्यकाळ_समाप्ती4 = २ एप्रिल १९६२ | पंतप्रधान4 = | मागील4 = ''नवीन मतदारसंघ'' | पुढील4 = [[शशीरंजन प्रसाद साह]] | मतदारसंघ4 = [[पपरी लोकसभा मतदारसंघ (१९५७-१९७७)|पपरी]] | कार्यकाळ_आरंभ5 = १७ एप्रिल १९५२ | कार्यकाळ_समाप्ती5 = ५ एप्रिल १९५७ | पंतप्रधान5 = | मागील5 = ''नवीन मतदारसंघ'' | पुढील5 = ''मतदारसंघ विसर्जित'' | मतदारसंघ5 = [[उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)|उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर]] | जन्मदिनांक = २१ नोव्हेंबर १९२४ | जन्मस्थान = धरहरा, [[मुझफ्फरपूर जिल्हा]], [[बिहार|बिहार प्रांत]], [[ब्रिटिश भारत]]<br>(आत्ता धरहरा, [[मुझफ्फरपूर जिल्हा]], [[बिहार]], [[भारत]]) | मृत्युदिनांक = २ ऑगस्ट १९९१ (वय: ६७) | मृत्युस्थान = [[पाटणा]], [[बिहार]], [[भारत]] | राष्ट्रीयत्व = भारतीय | पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]], [[जनता पक्ष]], [[भारतीय लोक दल]] | पती = | पत्नी = जनकनंदिनी देवी | नाते = श्यामनंदन प्रसाद किशोर सिन्हा | अपत्ये = | निवास = | शाळा_महाविद्यालय = | व्यवसाय = राजकारणी, समाजसेवक | धंदा = | धर्म = [[हिंदू]] | सही = | संकेतस्थळ = | तळटीपा = }} '''दिग्विजय नारायण सिंह''' (२१ नोव्हेंबर १९२४ — २ ऑगस्ट १९९१) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी होते. दिग्विजय हे भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेचे ६ वेळा सदस्य राहिले आहेत. ते सर्वप्रथम १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून तत्कालिन [[बिहार]] राज्याच्या [[उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)|उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर]] मतदारसंघातून [[१ ली लोकसभा|१ल्या]] लोकसभेचे सदस्य होते. तसेच सदस्य १९५७ च्या लोकसभा निवडणूकीत [[बिहार]] राज्याच्याच [[पपरी लोकसभा मतदारसंघ (१९५७-१९७७)|पपरी]] मतदारसंघातून [[२ री लोकसभा|२ऱ्या]], १९६२ आणि १९६७ च्या लोकसभा निवडणूकीत [[बिहार]] राज्याच्याच [[मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघ|मुझफ्फरपूर]] मतदारसंघातून [[३ री लोकसभा|३ऱ्या]] व [[४ थी लोकसभा|४थ्या]], १९७१ च्या लोकसभा निवडणूकीत [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन)]] पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून [[बिहार]] राज्याच्या [[हाजीपूर लोकसभा मतदारसंघ|हाजीपूर]] मतदारसंघातून [[५ वी लोकसभा|५व्या]] व अखेरीस १९७७ च्या लोकसभा निवडणूकीत [[भारतीय लोक दल]] पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून [[बिहार]] राज्याच्या [[वैशाली लोकसभा मतदारसंघ|वैशाली]] मतदारसंघातून [[६ वी लोकसभा|६व्या]] लोकसभेसे सदस्य होते. [[वर्ग:इ.स. १९२४ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९९१ मधील मृत्यू]] [[वर्ग:भारतीय राजकारणी]] [[वर्ग:१ ली लोकसभा सदस्य]] [[वर्ग:२ री लोकसभा सदस्य]] [[वर्ग:३ री लोकसभा सदस्य]] [[वर्ग:४ थी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:५ वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]] [[वर्ग:उत्तर-पूर्व मुझफ्फरपूरचे खासदार]] [[वर्ग:पपरीचे खासदार]] [[वर्ग:मुझफ्फरपूरचे खासदार]] [[वर्ग:हाजीपूरचे खासदार]] [[वर्ग:वैशालीचे खासदार]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] hhklnnikafknl73j9ys032sev619vwt हिब्रू विद्यापीठ (जेरुसलेम) 0 366730 2581511 2025-06-21T06:19:18Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[हिब्रू विद्यापीठ (जेरुसलेम)]] वरुन [[मसूदा:हिब्रू विद्यापीठ (जेरुसलेम)]] ला हलविला 2581511 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:हिब्रू विद्यापीठ (जेरुसलेम)]] bs662x8g2jbdy5ntbbtmx6pzutygplo मिमिक्यू 0 366731 2581514 2025-06-21T06:30:30Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[मिमिक्यू]] वरुन [[मसूदा:मिमिक्यू]] ला हलविला 2581514 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:मिमिक्यू]] flf5i3vj3qw02bjjvz32ai7j2mrecok रॉयल भूतान पोलीस 0 366732 2581519 2025-06-21T06:40:24Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[रॉयल भूतान पोलीस]] वरुन [[मसूदा:रॉयल भूतान पोलीस]] ला हलविला 2581519 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:रॉयल भूतान पोलीस]] 222ka4qoaua2388r7ynvwbgwj5enogp चर्चा:रॉयल भूतान पोलीस 1 366733 2581521 2025-06-21T06:40:24Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:रॉयल भूतान पोलीस]] वरुन [[मसूदा चर्चा:रॉयल भूतान पोलीस]] ला हलविला 2581521 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा चर्चा:रॉयल भूतान पोलीस]] t2wlpq1shu309r6mi368d5qg7ho15xz रोशनी थिनकरन 0 366734 2581523 2025-06-21T06:45:57Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[रोशनी थिनकरन]] वरुन [[मसूदा:रोशनी थिनकरन]] ला हलविला 2581523 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:रोशनी थिनकरन]] 7jcs02tvb390cgprw4lp526k8g48jds चर्चा:रोशनी थिनकरन 1 366735 2581525 2025-06-21T06:45:58Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:रोशनी थिनकरन]] वरुन [[मसूदा चर्चा:रोशनी थिनकरन]] ला हलविला 2581525 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा चर्चा:रोशनी थिनकरन]] 3sp2smiupof1nu5j8k6ehfumkd0umei कलात्मक सायकलिंग 0 366736 2581528 2025-06-21T06:52:47Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[कलात्मक सायकलिंग]] वरुन [[मसूदा:कलात्मक सायकलिंग]] ला हलविला 2581528 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:कलात्मक सायकलिंग]] 7yzdp8i9hvtig5yx6dmedmepwpx6w2w कलिका प्रसाद भट्टाचार्य 0 366737 2581530 2025-06-21T06:55:13Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[कलिका प्रसाद भट्टाचार्य]] वरुन [[मसूदा:कलिका प्रसाद भट्टाचार्य]] ला हलविला 2581530 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:कलिका प्रसाद भट्टाचार्य]] f6r05t2p5xoxlt86omfa6fzrox3k64l फॅशन-प्रदर्शन 0 366738 2581532 2025-06-21T06:57:44Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[फॅशन-प्रदर्शन]] वरुन [[मसूदा:फॅशन-प्रदर्शन]] ला हलविला 2581532 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:फॅशन-प्रदर्शन]] d0b0wu6z14fehqe7auzak6mk9pqibqm सिल्व्हियो बेनेडेटो 0 366739 2581534 2025-06-21T07:01:34Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[सिल्व्हियो बेनेडेटो]] वरुन [[मसूदा:सिल्व्हियो बेनेदेत्तो]] ला हलविला: शुद्धलेखन 2581534 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:सिल्व्हियो बेनेदेत्तो]] 0nmt2kj1m01th9hdf3yc2agugrybgq0 महिदपूरची लढाई 0 366740 2581536 2025-06-21T07:31:39Z अभय नातू 206 "[[:en:Special:Redirect/revision/1288356107|Battle of Mahidpur]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले 2581536 wikitext text/x-wiki '''महिदपूरची लढाई''' २१ डिसेंबर १८१७ रोजी [[माळवा]] प्रदेशातील [[महिदपूर]] येथे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचा]] भाग असलेल्या [[इंदूर संस्थान]] आणि [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] यांच्यात झालेली लढाई होती. [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धादरम्यान]] झालेल्या या लढाईत ब्रिटिशांचा विजय झाला व त्यांनी होळकरांना पेशव्यापासून विभक्त केले. याचे पर्यवसान ब्रिटिशांचा पूर्ण विजय होउन भारतात ब्रिटिश सत्ता बळकट होण्यात झाले. <ref name="GazHoshangabad">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=hqE8AAAAIAAJ&pg=PA77|title=Madhya Pradesh District Gazetteers: Hoshangabad|last=Madhya Pradesh (India)|publisher=Government Central Press|year=1827|pages=77–78}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=tuwNoJxH25QC&pg=PA16|title=Geography and Politics in Central India: A Case Study of Erstwhile Indore State|last=Ravindra Pratap Singh|publisher=Concept|year=1987|isbn=978-81-7022-025-1|pages=16}}</ref> २१ डिसेंबर १८१७ रोजी [[थॉमस हिस्लॉप|सर थॉमस हिस्लॉप]]<nowiki/>च्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी होळकरांवर हल्ला केला. होळकरांच्या सैन्याचे नेतृत्त्व ११ वर्षीय [[तिसरे मल्हारराव होळकर|मल्हारराव होळकर तिसरे]], २२ वर्षीय [[हरिराव होळकर]] आणि २० वर्षीय [[भीमाबाई होळकर]] यांच्या नेतृत्वाखालील होळकर होते. रोशन बेगच्या नेतृत्वाखालील होळकर तोफखान्याने ब्रिटिशांवर ६३ [[तोफ|तोफांची]] रांग लावून हल्ला केला. लढाईत ब्रिटिशांचा पराभव निश्चित होता पण नेमक्या त्यावेळी होळकर छावणीतील गफूर खान नावाचा सरदार त्यांना फितूर झाला व आपल्या तुकड्या घेउन त्याने रणांगणातून पलायन केले. यानंतर होळकरांचा निर्णायक पराभव झाला. <ref name="GazHoshangabad">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=hqE8AAAAIAAJ&pg=PA77|title=Madhya Pradesh District Gazetteers: Hoshangabad|last=Madhya Pradesh (India)|publisher=Government Central Press|year=1827|pages=77–78}}<cite class="citation book cs1" data-ve-ignore="true" id="CITEREFMadhya_Pradesh_(India)1827">Madhya Pradesh (India) (1827). [https://books.google.com/books?id=hqE8AAAAIAAJ&pg=PA77 ''Madhya Pradesh District Gazetteers: Hoshangabad'']. Government Central Press. pp.&nbsp;<span class="nowrap">77–</span>78.</cite></ref> लढाई संपल्यावर मल्हारराव, तात्या जोग आणि इतरांनी पळ काढला. <ref name="GazHoshangabad">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=hqE8AAAAIAAJ&pg=PA77|title=Madhya Pradesh District Gazetteers: Hoshangabad|last=Madhya Pradesh (India)|publisher=Government Central Press|year=1827|pages=77–78}}<cite class="citation book cs1" data-ve-ignore="true" id="CITEREFMadhya_Pradesh_(India)1827">Madhya Pradesh (India) (1827). [https://books.google.com/books?id=hqE8AAAAIAAJ&pg=PA77 ''Madhya Pradesh District Gazetteers: Hoshangabad'']. Government Central Press. pp.&nbsp;<span class="nowrap">77–</span>78.</cite></ref> ६ जानेवारी १८१८ रोजी [[मंदसौर]] येथे त्यांनी ब्रिटिशांशी तह केला. या तहात इंग्रजांनी घालून दिलेल्या सर्व अटी होळकरांनी मान्य केल्या. तिसरे आंग्ल-मराठा युद्ध संपल्यावर ब्रिटिशांनी होळकरांचा बराचसा प्रदेश हिसकावून घेतला आणि इंदूर संस्थानाला सेंट्रल इंडिया एजन्सीची एक रियासत केले गेले. [[वर्ग:मराठा साम्राज्य सहभागी असलेल्या लढाया]] [[वर्ग:तिसरे इंग्रज-मराठा युद्ध]] nc0sfwsxppx4o6parwnrwibj5au1xo0 2581538 2581536 2025-06-21T07:34:14Z अभय नातू 206 संदर्भ 2581538 wikitext text/x-wiki '''महिदपूरची लढाई''' २१ डिसेंबर १८१७ रोजी [[माळवा]] प्रदेशातील [[महिदपूर]] येथे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचा]] भाग असलेल्या [[इंदूर संस्थान]] आणि [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] यांच्यात झालेली लढाई होती. [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धादरम्यान]] झालेल्या या लढाईत ब्रिटिशांचा विजय झाला व त्यांनी होळकरांना पेशव्यापासून विभक्त केले. याचे पर्यवसान ब्रिटिशांचा पूर्ण विजय होउन भारतात ब्रिटिश सत्ता बळकट होण्यात झाले. <ref name="GazHoshangabad">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=hqE8AAAAIAAJ&pg=PA77|title=Madhya Pradesh District Gazetteers: Hoshangabad|last=Madhya Pradesh (India)|publisher=Government Central Press|year=1827|pages=77–78}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=tuwNoJxH25QC&pg=PA16|title=Geography and Politics in Central India: A Case Study of Erstwhile Indore State|last=Ravindra Pratap Singh|publisher=Concept|year=1987|isbn=978-81-7022-025-1|pages=16}}</ref> २१ डिसेंबर १८१७ रोजी [[थॉमस हिस्लॉप|सर थॉमस हिस्लॉप]]<nowiki/>च्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी होळकरांवर हल्ला केला. होळकरांच्या सैन्याचे नेतृत्त्व ११ वर्षीय [[तिसरे मल्हारराव होळकर|मल्हारराव होळकर तिसरे]], २२ वर्षीय [[हरिराव होळकर]] आणि २० वर्षीय [[भीमाबाई होळकर]] यांच्या नेतृत्वाखालील होळकर होते. रोशन बेगच्या नेतृत्वाखालील होळकर तोफखान्याने ब्रिटिशांवर ६३ [[तोफ|तोफांची]] रांग लावून हल्ला केला. लढाईत ब्रिटिशांचा पराभव निश्चित होता पण नेमक्या त्यावेळी होळकर छावणीतील गफूर खान नावाचा सरदार त्यांना फितूर झाला व आपल्या तुकड्या घेउन त्याने रणांगणातून पलायन केले. यानंतर होळकरांचा निर्णायक पराभव झाला. <ref name="GazHoshangabad"/> लढाई संपल्यावर मल्हारराव, तात्या जोग आणि इतरांनी पळ काढला. <ref name="GazHoshangabad"/> ६ जानेवारी १८१८ रोजी [[मंदसौर]] येथे त्यांनी ब्रिटिशांशी तह केला. या तहात इंग्रजांनी घालून दिलेल्या सर्व अटी होळकरांनी मान्य केल्या. तिसरे आंग्ल-मराठा युद्ध संपल्यावर ब्रिटिशांनी होळकरांचा बराचसा प्रदेश हिसकावून घेतला आणि इंदूर संस्थानाला सेंट्रल इंडिया एजन्सीची एक रियासत केले गेले. == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} [[वर्ग:मराठा साम्राज्य सहभागी असलेल्या लढाया]] [[वर्ग:तिसरे इंग्रज-मराठा युद्ध]] e48rjw6bfeprw0rav5j982q9r0nbu7r महिदपुरची लढाई 0 366741 2581537 2025-06-21T07:31:54Z अभय नातू 206 लेखनभेद 2581537 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[महिदपूरची लढाई]] 5895my0q1adbtyoc6s9j3ui59ljf849 डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स 0 366742 2581539 2025-06-21T08:28:28Z अभय नातू 206 "[[:en:Special:Redirect/revision/1292592864|Doctrine of lapse]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले 2581539 wikitext text/x-wiki डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८व्या आणि एकोणिसाव्या शतकात आपली भारतातील मांडलिक संस्थाने बळकावण्यासाठी लावलेले धोरण होते. हे धोरण पहिल्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मोठे कारण होते आणि हे युद्ध संपल्यानंतर एक वर्ष, १८५८ पर्यंत लागू होते. [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीने]] [[संस्थान|संस्थानांसाठी]] सुरू केलेले विलिनीकरणाचे धोरण म्हणजे '''लॅप्सचा सिद्धांत''' होता आणि १८५८ पर्यंत, कंपनी राजवट नंतर [[ब्रिटिश राज|ब्रिटिश राजवटीने]] ब्रिटिश राजवट स्थापन केल्याच्या एका वर्षापर्यंत तो लागू होता. हे धोरण [[लॉर्ड डलहौसी|डलहौसीच्या पहिले मार्क्वेस जेम्स ब्राउन-रॅमसे]] तथा लॉर्ड डलहौसीने अधिक प्रमाणात वापरणे सुरू केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर [[भारत सरकार|भारतीय सरकारने]] १९७१ पर्यंत हे धोरण पुनः वापरले आणि त्याद्वारे अनेक संस्थाने भारतीय प्रजासत्ताकात शामिक करुन घेतली. १९७१मध्ये [[इंदिरा गांधी]] सरकारने भारतीय संविधानातील २५ व्या दुरुस्ती अंतर्गत उरलेली सगळी संस्थाने विलीन करुन घेतली. या धोरणानुसार ईस्ट इंडिया कंपनीच्या [[सार्वभौमत्व|आधिपत्याखालील]] कोणत्याही भारतीय संस्थानाचा राजा कंपनीच्या मते''स्पष्टपणे अक्षम'' असेल किंवा ''पुरुष वारसाशिवाय मरण पावला असेल,'' तर ते संस्थान थेट ब्रिटिश भारतात सामील केले जात असे. यामुळे वारस नसलेल्या संस्थानिकांना दत्तक घेउन आपला वंश व सत्ता पुढे चालू ठेवणे अशक्य झाले. <ref name="RCM">{{स्रोत पुस्तक|url=https://archive.org/details/sepoymutiny1857/page/n24/mode/2up|title=The Sepoy Mutiny and The Revolt of 1857|last=Majumdar|first=RC|date=1957|publisher=Srimati S. Chaudhuri|location=Calcutta|page=7|access-date=5 June 2022}}</ref> या धोरणाचा वापर करुन वापर करून, कंपनीने [[सातारा संस्थान|सातारा]] (१८४८), [[जैतपूर संस्थान|जैतपूर]], [[संबलपूर संस्थान|संबलपूर]] (१८४९), [[बाघल संस्थान|बाघल]] (१८५०), [[उदयपूर संस्थान (छत्तीसगड)|उदयपूर (छत्तीसगड)]] (१८५२), [[झांंसी संस्थान|झाशी]] (१८५४), [[नागपूरचे राज्य|नागपूर]] (१८५४), [[तंजावूर मराठा राज्य|तंजोर]] आणि [[अर्काटचे राज्य|आर्कोट]] (१८५५) ही संस्थाने ताब्यात घेतली. [[अवध संस्थान|अवध]] (१८५६) हे या धोरणांतर्गत विलीन झाले असे मानले जाते, परंतु प्रत्यक्षात ते डलहौसीने गैरशासनाच्या बहाण्याने विलीन केले होते. या धोरणाद्वारे कंपनीने आपल्या वार्षिक महसुलात सुमारे चाळीस लाख पौंडांची भर घातली. १८६० मध्ये उदयपूर संस्थान पुन्हा स्थापित केले गेले. ईस्ट इंडिया कंपनीच्या या धोरणाने भारतातील जनतेत असंतोष पसरला. यात ब्रिटिश नोकरीत असलेल्या भारतीय सैनिकांचाही समावेश होता. [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे]] हे एक मोठे कारण समजले जाते. या युद्धानंतर १८५८ ब्रिटिश व्हाईसरॉयने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचे शासन काढन घेतले व त्यावेळी हे धोरण रद्द केले. == या सिद्धांताखाली जोडलेल्या संस्थानांची राज्ये == == स्वतंत्र भारतातील धोरण == १९६४च्या शेवटी [[सिरमौर संस्थान|सिरमूर राज्याचे]] शासक [[राजेंद्र प्रकाश|राजेंद्र प्रकाशचे]] निधन झाले तेव्हा त्यांना एकही मुलगा नव्हता. त्यांच्या ज्येष्ठ विधवेने त्यांच्या मुलीच्या मुलाला दत्तक घेतले. भारत सरकारने हे मान्य केले नाही आणि सिरमूरला भारतीय प्रजासत्ताकात विलीन करुन घेतले. [[अक्कलकोट संस्थान|अक्कलकोट राज्याच्या]] राज्यातही हेच धोरण वापरले गेले. <ref name="succession">{{Cite report|url=https://www.abhilekh-patal.in/jspui/handle/123456789/1785392|title=Succession to the Gaddis of Sirmur and Akalkot|date=1967|publisher=Government of India|page=|access-date=13 September 2021|url-access=registration}}</ref> == संदर्भ == <references /> [[वर्ग:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] [[वर्ग:भारताचा इतिहास]] bn415unv38pz85yks2egvjvdx9oci3i 2581540 2581539 2025-06-21T08:28:30Z KiranBOT II 140753 शुद्धलेखन — अंक व शब्दामधील जागा काढली ([[सदस्य:KiranBOT II/typos#अंक व शब्दामधील जागा|अधिक माहिती]]); शुद्धलेखन — योग्य उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#योग्य उकार|अधिक माहिती]]); शुद्धलेखन — योग्य दीर्घ वेलांटी ([[सदस्य:KiranBOT II/typos#योग्य दीर्घ वेलांटी|अधिक माहिती]]) 2581540 wikitext text/x-wiki डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८व्या आणि एकोणिसाव्या शतकात आपली भारतातील मांडलिक संस्थाने बळकावण्यासाठी लावलेले धोरण होते. हे धोरण पहिल्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मोठे कारण होते आणि हे युद्ध संपल्यानंतर एक वर्ष, १८५८ पर्यंत लागू होते. [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीने]] [[संस्थान|संस्थानांसाठी]] सुरू केलेले विलीनीकरणाचे धोरण म्हणजे '''लॅप्सचा सिद्धांत''' होता आणि १८५८ पर्यंत, कंपनी राजवट नंतर [[ब्रिटिश राज|ब्रिटिश राजवटीने]] ब्रिटिश राजवट स्थापन केल्याच्या एका वर्षापर्यंत तो लागू होता. हे धोरण [[लॉर्ड डलहौसी|डलहौसीच्या पहिले मार्क्वेस जेम्स ब्राउन-रॅमसे]] तथा लॉर्ड डलहौसीने अधिक प्रमाणात वापरणे सुरू केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर [[भारत सरकार|भारतीय सरकारने]] १९७१ पर्यंत हे धोरण पुनः वापरले आणि त्याद्वारे अनेक संस्थाने भारतीय प्रजासत्ताकात शामिक करून घेतली. १९७१मध्ये [[इंदिरा गांधी]] सरकारने भारतीय संविधानातील २५ व्या दुरुस्ती अंतर्गत उरलेली सगळी संस्थाने विलीन करून घेतली. या धोरणानुसार ईस्ट इंडिया कंपनीच्या [[सार्वभौमत्व|आधिपत्याखालील]] कोणत्याही भारतीय संस्थानाचा राजा कंपनीच्या मते''स्पष्टपणे अक्षम'' असेल किंवा ''पुरुष वारसाशिवाय मरण पावला असेल,'' तर ते संस्थान थेट ब्रिटिश भारतात सामील केले जात असे. यामुळे वारस नसलेल्या संस्थानिकांना दत्तक घेउन आपला वंश व सत्ता पुढे चालू ठेवणे अशक्य झाले. <ref name="RCM">{{स्रोत पुस्तक|url=https://archive.org/details/sepoymutiny1857/page/n24/mode/2up|title=The Sepoy Mutiny and The Revolt of 1857|last=Majumdar|first=RC|date=1957|publisher=Srimati S. Chaudhuri|location=Calcutta|page=7|access-date=5 June 2022}}</ref> या धोरणाचा वापर करून वापर करून, कंपनीने [[सातारा संस्थान|सातारा]] (१८४८), [[जैतपूर संस्थान|जैतपूर]], [[संबलपूर संस्थान|संबलपूर]] (१८४९), [[बाघल संस्थान|बाघल]] (१८५०), [[उदयपूर संस्थान (छत्तीसगड)|उदयपूर (छत्तीसगड)]] (१८५२), [[झांंसी संस्थान|झाशी]] (१८५४), [[नागपूरचे राज्य|नागपूर]] (१८५४), [[तंजावूर मराठा राज्य|तंजोर]] आणि [[अर्काटचे राज्य|आर्कोट]] (१८५५) ही संस्थाने ताब्यात घेतली. [[अवध संस्थान|अवध]] (१८५६) हे या धोरणांतर्गत विलीन झाले असे मानले जाते, परंतु प्रत्यक्षात ते डलहौसीने गैरशासनाच्या बहाण्याने विलीन केले होते. या धोरणाद्वारे कंपनीने आपल्या वार्षिक महसुलात सुमारे चाळीस लाख पौंडांची भर घातली. १८६० मध्ये उदयपूर संस्थान पुन्हा स्थापित केले गेले. ईस्ट इंडिया कंपनीच्या या धोरणाने भारतातील जनतेत असंतोष पसरला. यात ब्रिटिश नोकरीत असलेल्या भारतीय सैनिकांचाही समावेश होता. [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे]] हे एक मोठे कारण समजले जाते. या युद्धानंतर १८५८ ब्रिटिश व्हाईसरॉयने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचे शासन काढन घेतले व त्यावेळी हे धोरण रद्द केले. == या सिद्धांताखाली जोडलेल्या संस्थानांची राज्ये == == स्वतंत्र भारतातील धोरण == १९६४ च्या शेवटी [[सिरमौर संस्थान|सिरमूर राज्याचे]] शासक [[राजेंद्र प्रकाश|राजेंद्र प्रकाशचे]] निधन झाले तेव्हा त्यांना एकही मुलगा नव्हता. त्यांच्या ज्येष्ठ विधवेने त्यांच्या मुलीच्या मुलाला दत्तक घेतले. भारत सरकारने हे मान्य केले नाही आणि सिरमूरला भारतीय प्रजासत्ताकात विलीन करून घेतले. [[अक्कलकोट संस्थान|अक्कलकोट राज्याच्या]] राज्यातही हेच धोरण वापरले गेले. <ref name="succession">{{Cite report|url=https://www.abhilekh-patal.in/jspui/handle/123456789/1785392|title=Succession to the Gaddis of Sirmur and Akalkot|date=1967|publisher=Government of India|page=|access-date=13 September 2021|url-access=registration}}</ref> == संदर्भ == <references /> [[वर्ग:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] [[वर्ग:भारताचा इतिहास]] hde3etl7t3sy445aj0exsr3ay0c32v4 2581542 2581540 2025-06-21T08:32:32Z अभय नातू 206 /* या सिद्धांताखाली जोडलेल्या संस्थानांची राज्ये */ 2581542 wikitext text/x-wiki डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८व्या आणि एकोणिसाव्या शतकात आपली भारतातील मांडलिक संस्थाने बळकावण्यासाठी लावलेले धोरण होते. हे धोरण पहिल्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मोठे कारण होते आणि हे युद्ध संपल्यानंतर एक वर्ष, १८५८ पर्यंत लागू होते. [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीने]] [[संस्थान|संस्थानांसाठी]] सुरू केलेले विलीनीकरणाचे धोरण म्हणजे '''लॅप्सचा सिद्धांत''' होता आणि १८५८ पर्यंत, कंपनी राजवट नंतर [[ब्रिटिश राज|ब्रिटिश राजवटीने]] ब्रिटिश राजवट स्थापन केल्याच्या एका वर्षापर्यंत तो लागू होता. हे धोरण [[लॉर्ड डलहौसी|डलहौसीच्या पहिले मार्क्वेस जेम्स ब्राउन-रॅमसे]] तथा लॉर्ड डलहौसीने अधिक प्रमाणात वापरणे सुरू केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर [[भारत सरकार|भारतीय सरकारने]] १९७१ पर्यंत हे धोरण पुनः वापरले आणि त्याद्वारे अनेक संस्थाने भारतीय प्रजासत्ताकात शामिक करून घेतली. १९७१मध्ये [[इंदिरा गांधी]] सरकारने भारतीय संविधानातील २५ व्या दुरुस्ती अंतर्गत उरलेली सगळी संस्थाने विलीन करून घेतली. या धोरणानुसार ईस्ट इंडिया कंपनीच्या [[सार्वभौमत्व|आधिपत्याखालील]] कोणत्याही भारतीय संस्थानाचा राजा कंपनीच्या मते''स्पष्टपणे अक्षम'' असेल किंवा ''पुरुष वारसाशिवाय मरण पावला असेल,'' तर ते संस्थान थेट ब्रिटिश भारतात सामील केले जात असे. यामुळे वारस नसलेल्या संस्थानिकांना दत्तक घेउन आपला वंश व सत्ता पुढे चालू ठेवणे अशक्य झाले. <ref name="RCM">{{स्रोत पुस्तक|url=https://archive.org/details/sepoymutiny1857/page/n24/mode/2up|title=The Sepoy Mutiny and The Revolt of 1857|last=Majumdar|first=RC|date=1957|publisher=Srimati S. Chaudhuri|location=Calcutta|page=7|access-date=5 June 2022}}</ref> या धोरणाचा वापर करून वापर करून, कंपनीने [[सातारा संस्थान|सातारा]] (१८४८), [[जैतपूर संस्थान|जैतपूर]], [[संबलपूर संस्थान|संबलपूर]] (१८४९), [[बाघल संस्थान|बाघल]] (१८५०), [[उदयपूर संस्थान (छत्तीसगड)|उदयपूर (छत्तीसगड)]] (१८५२), [[झांंसी संस्थान|झाशी]] (१८५४), [[नागपूरचे राज्य|नागपूर]] (१८५४), [[तंजावूर मराठा राज्य|तंजोर]] आणि [[अर्काटचे राज्य|आर्कोट]] (१८५५) ही संस्थाने ताब्यात घेतली. [[अवध संस्थान|अवध]] (१८५६) हे या धोरणांतर्गत विलीन झाले असे मानले जाते, परंतु प्रत्यक्षात ते डलहौसीने गैरशासनाच्या बहाण्याने विलीन केले होते. या धोरणाद्वारे कंपनीने आपल्या वार्षिक महसुलात सुमारे चाळीस लाख पौंडांची भर घातली. १८६० मध्ये उदयपूर संस्थान पुन्हा स्थापित केले गेले. ईस्ट इंडिया कंपनीच्या या धोरणाने भारतातील जनतेत असंतोष पसरला. यात ब्रिटिश नोकरीत असलेल्या भारतीय सैनिकांचाही समावेश होता. [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे]] हे एक मोठे कारण समजले जाते. या युद्धानंतर १८५८ ब्रिटिश व्हाईसरॉयने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचे शासन काढन घेतले व त्यावेळी हे धोरण रद्द केले. == या धोरणाखील खालसा झालेली संस्थाने == {{भाषांतर}} {| class="wikitable sortable" |+ ! संस्थान ! खालसा झालेले वर्ष |- | अंगुल | १८४८ |- | [[आर्कोट संस्थान|आर्कोट]] | १८५५ |- |[[अवध संस्थान|अवध]] | १८५६ |- |[[Ahom Kingdom|Assam]] |1838 |- |[[Banda State|Banda]] |1858 |- |[[Guler State|Guler]] |1813 |- |Jaintia |1803 |- |[[Jaitpur State|Jaitpur]] |1849 |- |[[Jalaun State|Jalaun]] |1840 |- |[[Jaswan State|Jaswan]] |1849 |- |[[Jhansi State|Jhansi]] |1853 |- |[[Kachari kingdom|Kachar]] |1830 |- |[[Kangra State|Kangra]] |1846 |- |Kannanur |1819 |- |Kittur |1824 |- |[[Ballabhgarh State|Ballabhgarh]] |1858 |- |Kullu |1846 |- |[[Kurnool State|Kurnool]] |1839 |- |[[Kutlehar State|Kutlehar]] |1825 |- |[[Kingdom of Nagpur|Nagpur]] |1853 |- |[[Sikh Empire|Punjab]] |1849 |- |Ramgarh |1858 |- |[[Sambalpur State|Sambalpur]] |1849 |- |[[Satara State|Satara]] |1848 |- |Surat |1842 |- |[[Siba State|Siba]] |1849 |- |[[Thanjavur Maratha kingdom|Tanjore]] |1855 |- |[[Tulsipur State|Tulsipur]] |1854 |- |[[Udaipur State, Chhattisgarh|Udaipur]] |1852 |} == स्वतंत्र भारतातील धोरण == १९६४ च्या शेवटी [[सिरमौर संस्थान|सिरमूर राज्याचे]] शासक [[राजेंद्र प्रकाश|राजेंद्र प्रकाशचे]] निधन झाले तेव्हा त्यांना एकही मुलगा नव्हता. त्यांच्या ज्येष्ठ विधवेने त्यांच्या मुलीच्या मुलाला दत्तक घेतले. भारत सरकारने हे मान्य केले नाही आणि सिरमूरला भारतीय प्रजासत्ताकात विलीन करून घेतले. [[अक्कलकोट संस्थान|अक्कलकोट राज्याच्या]] राज्यातही हेच धोरण वापरले गेले. <ref name="succession">{{Cite report|url=https://www.abhilekh-patal.in/jspui/handle/123456789/1785392|title=Succession to the Gaddis of Sirmur and Akalkot|date=1967|publisher=Government of India|page=|access-date=13 September 2021|url-access=registration}}</ref> == संदर्भ == <references /> [[वर्ग:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] [[वर्ग:भारताचा इतिहास]] 2ro5r8z07sld4wgicrg3ivvfepknckf 2581543 2581542 2025-06-21T08:35:50Z अभय नातू 206 /* या धोरणाखील खालसा झालेली संस्थाने */ 2581543 wikitext text/x-wiki डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८व्या आणि एकोणिसाव्या शतकात आपली भारतातील मांडलिक संस्थाने बळकावण्यासाठी लावलेले धोरण होते. हे धोरण पहिल्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मोठे कारण होते आणि हे युद्ध संपल्यानंतर एक वर्ष, १८५८ पर्यंत लागू होते. [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीने]] [[संस्थान|संस्थानांसाठी]] सुरू केलेले विलीनीकरणाचे धोरण म्हणजे '''लॅप्सचा सिद्धांत''' होता आणि १८५८ पर्यंत, कंपनी राजवट नंतर [[ब्रिटिश राज|ब्रिटिश राजवटीने]] ब्रिटिश राजवट स्थापन केल्याच्या एका वर्षापर्यंत तो लागू होता. हे धोरण [[लॉर्ड डलहौसी|डलहौसीच्या पहिले मार्क्वेस जेम्स ब्राउन-रॅमसे]] तथा लॉर्ड डलहौसीने अधिक प्रमाणात वापरणे सुरू केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर [[भारत सरकार|भारतीय सरकारने]] १९७१ पर्यंत हे धोरण पुनः वापरले आणि त्याद्वारे अनेक संस्थाने भारतीय प्रजासत्ताकात शामिक करून घेतली. १९७१मध्ये [[इंदिरा गांधी]] सरकारने भारतीय संविधानातील २५ व्या दुरुस्ती अंतर्गत उरलेली सगळी संस्थाने विलीन करून घेतली. या धोरणानुसार ईस्ट इंडिया कंपनीच्या [[सार्वभौमत्व|आधिपत्याखालील]] कोणत्याही भारतीय संस्थानाचा राजा कंपनीच्या मते''स्पष्टपणे अक्षम'' असेल किंवा ''पुरुष वारसाशिवाय मरण पावला असेल,'' तर ते संस्थान थेट ब्रिटिश भारतात सामील केले जात असे. यामुळे वारस नसलेल्या संस्थानिकांना दत्तक घेउन आपला वंश व सत्ता पुढे चालू ठेवणे अशक्य झाले. <ref name="RCM">{{स्रोत पुस्तक|url=https://archive.org/details/sepoymutiny1857/page/n24/mode/2up|title=The Sepoy Mutiny and The Revolt of 1857|last=Majumdar|first=RC|date=1957|publisher=Srimati S. Chaudhuri|location=Calcutta|page=7|access-date=5 June 2022}}</ref> या धोरणाचा वापर करून वापर करून, कंपनीने [[सातारा संस्थान|सातारा]] (१८४८), [[जैतपूर संस्थान|जैतपूर]], [[संबलपूर संस्थान|संबलपूर]] (१८४९), [[बाघल संस्थान|बाघल]] (१८५०), [[उदयपूर संस्थान (छत्तीसगड)|उदयपूर (छत्तीसगड)]] (१८५२), [[झांंसी संस्थान|झाशी]] (१८५४), [[नागपूरचे राज्य|नागपूर]] (१८५४), [[तंजावूर मराठा राज्य|तंजोर]] आणि [[अर्काटचे राज्य|आर्कोट]] (१८५५) ही संस्थाने ताब्यात घेतली. [[अवध संस्थान|अवध]] (१८५६) हे या धोरणांतर्गत विलीन झाले असे मानले जाते, परंतु प्रत्यक्षात ते डलहौसीने गैरशासनाच्या बहाण्याने विलीन केले होते. या धोरणाद्वारे कंपनीने आपल्या वार्षिक महसुलात सुमारे चाळीस लाख पौंडांची भर घातली. १८६० मध्ये उदयपूर संस्थान पुन्हा स्थापित केले गेले. ईस्ट इंडिया कंपनीच्या या धोरणाने भारतातील जनतेत असंतोष पसरला. यात ब्रिटिश नोकरीत असलेल्या भारतीय सैनिकांचाही समावेश होता. [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे]] हे एक मोठे कारण समजले जाते. या युद्धानंतर १८५८ ब्रिटिश व्हाईसरॉयने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचे शासन काढन घेतले व त्यावेळी हे धोरण रद्द केले. == या धोरणाखाली खालसा झालेली संस्थाने == {{भाषांतर}} {| class="wikitable sortable" |+ ! संस्थान ! खालसा झालेले वर्ष |- | [[अंगुल संस्थान|अंगुल]] | १८४८ |- | [[आर्कोट संस्थान|आर्कोट]] | १८५५ |- |[[अवध संस्थान|अवध]] | १८५६ |- |[[अहोम संस्थान|अहोम]] | १८३८ |- | [[बांदा संस्थान|बांदा]] | १८५८ |- |[[गुलेर संस्थान|गुलेर]] |१८१3 |- |Jaintia |1803 |- |[[Jaitpur संस्थान|Jaitpur]] |१८४9 |- |[[Jalaun संस्थान|Jalaun]] |१८४0 |- |[[Jaswan संस्थान|Jaswan]] |१८४9 |- |[[Jhansi संस्थान|Jhansi]] |१८५३ |- |[[कचरी संस्थान|कचर]] |१८३० |- |[[कांगडा संस्थान|कांगडा]] |१८४६ |- |Kannanur |१८१9 |- |Kittur |१८२4 |- |[[Ballabhgarh संस्थान|Ballabhgarh]] |१८५8 |- |Kullu |१८४6 |- |[[Kurnool संस्थान|Kurnool]] |१८३9 |- |[[Kutlehar संस्थान|Kutlehar]] |१८२5 |- |[[Kingdom of Nagpur|Nagpur]] |१८५3 |- |[[Sikh Empire|Punjab]] |१८४9 |- |Ramgarh |१८५8 |- |[[Sambalpur संस्थान|Sambalpur]] |१८४9 |- |[[Satara संस्थान|Satara]] |१८४8 |- |Surat |१८४2 |- |[[Siba संस्थान|Siba]] |१८४9 |- |[[Thanjavur Maratha kingdom|Tanjore]] |१८५5 |- |[[Tulsipur संस्थान|Tulsipur]] |१८५4 |- |[[Udaipur State, Chhattisgarh|Udaipur]] |१८५2 |} == स्वतंत्र भारतातील धोरण == १९६४ च्या शेवटी [[सिरमौर संस्थान|सिरमूर राज्याचे]] शासक [[राजेंद्र प्रकाश|राजेंद्र प्रकाशचे]] निधन झाले तेव्हा त्यांना एकही मुलगा नव्हता. त्यांच्या ज्येष्ठ विधवेने त्यांच्या मुलीच्या मुलाला दत्तक घेतले. भारत सरकारने हे मान्य केले नाही आणि सिरमूरला भारतीय प्रजासत्ताकात विलीन करून घेतले. [[अक्कलकोट संस्थान|अक्कलकोट राज्याच्या]] राज्यातही हेच धोरण वापरले गेले. <ref name="succession">{{Cite report|url=https://www.abhilekh-patal.in/jspui/handle/123456789/1785392|title=Succession to the Gaddis of Sirmur and Akalkot|date=1967|publisher=Government of India|page=|access-date=13 September 2021|url-access=registration}}</ref> == संदर्भ == <references /> [[वर्ग:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] [[वर्ग:भारताचा इतिहास]] av44r7jfucddmt9kxhrq0by92t6xww5 खालसा धोरण 0 366743 2581541 2025-06-21T08:29:01Z अभय नातू 206 नामभेद 2581541 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स]] 15p1h27gqrlggg2nbvrw7d8glwxwblq सीताबर्डी किल्ला 0 366744 2581545 2025-06-21T08:43:07Z अभय नातू 206 लेखनभेद 2581545 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[सिताबर्डीचा किल्ला]] 1ccqi2fybgzqcewxvrc1d4zxcawteke सदस्य चर्चा:निलेश लक्ष्मण चौघुले 3 366745 2581550 2025-06-21T09:03:52Z साहाय्य चमू 25365 नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 2581550 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=निलेश लक्ष्मण चौघुले}} -- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १४:३३, २१ जून २०२५ (IST) s44uqke1cg8e5wztid227161ar76iev अदी फेरोझशाह मर्झबान 0 366746 2581589 2025-06-21T11:45:58Z नरेश सावे 88037 नवीन पान: '''अदी फेरोझशाह मर्झबान ऊर्फ आदी फिरोजशाह मर्झबान''' हे पारशी रंगभूमीवरील लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. <ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार,१२ जून २०२५</ref> 2581589 wikitext text/x-wiki '''अदी फेरोझशाह मर्झबान ऊर्फ आदी फिरोजशाह मर्झबान''' हे पारशी रंगभूमीवरील लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. <ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार,१२ जून २०२५</ref> 99uct2naj6kgfzsk5uic72185q6c8bz मित्तल पटेल 0 366747 2581591 2025-06-21T11:50:31Z संतोष गोरे 135680 "[[:en:Special:Redirect/revision/1267515004|Mittal Patel]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले 2581591 wikitext text/x-wiki '''मित्तल पटेल''' (जन्म {{circa|1981}} ) ह्या [[गुजरात|गुजरातमधील]] एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. शिक्षणानंतर, त्यांनी आदिवासी जमातीतील लोकांना समाजात समाकलित होण्यास मदत करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कामाबद्दल त्यानं २०१८ मध्ये [[नारी शक्ती पुरस्कार|नारी शक्ती पुरस्काराने]] सन्मानित करण्यात आले. == कारकिर्द == पटेल यांचा जन्म {{circa|1981}}[[गुजरात|गुजरातमधील]] [[महेसाणा जिल्हा|मेहसाणा जिल्ह्यातील]] संखलपूर गावात १९८१ साली झाला. त्यांचे आईवडील दोघेही पशुपालनाचे काम करायचे. त्यांचे लग्न झाले आणि त्यांना एक मुलगी झाली. <ref name="TH-17">{{स्रोत बातमी|last=Chandra|first=Kavita Kanan|url=https://www.thehindu.com/society/mittal-patel-has-been-putting-nomadic-and-de-notified-tribes-on-the-map/article22331573.ece|title=Mittal Patel has worked relentlessly to provide the nomadic and de-notified tribes of Gujarat with voter ID cards and social benefits|date=30 December 2017|work=The Hindu|language=en-IN|access-date=26 September 2022|archive-url=https://web.archive.org/web/20220122094749/https://www.thehindu.com/society/mittal-patel-has-been-putting-nomadic-and-de-notified-tribes-on-the-map/article22331573.ece|archive-date=22 January 2022|url-status=live}}</ref> त्यांनी प्रथम भौतिकशास्त्रात पदवी घेतली. नंतर अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठात पत्रकारितेचा अभ्यास पूर्ण केला.<ref name="Ashaval">{{स्रोत बातमी|last=Dave|first=Harita|url=https://ashaval.com/mittal-patel-the-messiah-for-nomadic-and-denotified-tribes-0923619/|title=Mittal Patel: The Messiah for Nomadic and Denotified Tribes|date=12 September 2020|work=Ashaval|access-date=26 September 2022|archive-url=https://web.archive.org/web/20220525071638/https://ashaval.com/mittal-patel-the-messiah-for-nomadic-and-denotified-tribes-0923619/|archive-date=25 May 2022|url-status=live}}</ref> आणि त्यानंतर २००६ मध्ये स्थानिक लोकांसोबत काम करण्यास सुरुवात केली. चार वर्षांनंतर, त्यांनी ''विचारता समुदय समर्थन मंच (VSSM)'' ची स्थापना केली, ही संस्था भटक्यांना मदत करण्याचे काम करते. <ref name="Moneylife">{{स्रोत बातमी|last=Madhavan|first=N.|url=https://www.moneylife.in/article/bringing-nomadic-communities-into-the-mainstream/44001.html|title=Bringing Nomadic Communities into the Mainstream|date=16 November 2015|work=Moneylife|language=en|access-date=26 September 2022|archive-url=https://web.archive.org/web/20170202023631/http://www.moneylife.in/article/bringing-nomadic-communities-into-the-mainstream/44001.html|archive-date=2 February 2017|url-status=live}}</ref> त्यांनी बावा, गडलिया, कांगसिया, मीर, नाथवाडी, सलाट आणि सरनिया जमातींसोबत काम केले. यात या लोकांना लग्न करण्यास, शाळा सुरू करण्यास, जमिनीचे हक्क मिळवण्यास आणि ओळखपत्रे मिळविण्यास मदत करणे अशी कामे करण्यात आली. <ref name="Moneylife" /> गुजरात सरकारने २०१६ पर्यंत ६०,००० आदिवासींना मतदान कार्ड दिले होते. व्हीएसएम बँकेप्रमाने देखील काम करते. तसेच ही संस्था अहमदाबादमध्ये ७०० हून अधिक मुलांसाठी दोन वसतिगृहे चालवते. <ref name="BS">{{स्रोत बातमी|last=Krishna|first=Geetanjali|url=https://www.business-standard.com/article/beyond-business/a-voice-for-nomads-116052001422_1.html|title=A voice for nomads|date=21 May 2016|work=Business Standard|language=en|access-date=26 September 2022|archive-url=https://web.archive.org/web/20220926174718/https://www.business-standard.com/article/beyond-business/a-voice-for-nomads-116052001422_1.html|archive-date=26 September 2022|url-status=live}}</ref> व्हीएसएमच्या सहकार्याने, कालूपूर सहकारी बँकेने १०० आदिवासींना घरे खरेदी करण्यासाठी ५०,००० रुपयांचे सूक्ष्मवित्त कर्ज दिले. तसेच लहान व्यवसायांना २५,००० रुपयांपर्यंतचे कर्ज देखील दिले आहे. <ref name="HT-18">{{स्रोत बातमी|last=Jayaraman|first=Gayatri|url=https://www.hindustantimes.com/india-news/a-cooperative-bank-that-gives-loans-to-gujarat-s-nomadic-tribes-based-on-trust/story-pobeQ2AQRXwB6hGYYt1MTK.html|title=A cooperative bank that gives loans to Gujarat's nomadic tribes based on trust|date=14 February 2018|work=Hindustan Times|language=en|access-date=26 September 2022|archive-url=https://web.archive.org/web/20201109013255/https://www.hindustantimes.com/india-news/a-cooperative-bank-that-gives-loans-to-gujarat-s-nomadic-tribes-based-on-trust/story-pobeQ2AQRXwB6hGYYt1MTK.html|archive-date=9 November 2020|url-status=live}}</ref> गुजरातमध्ये २८ भटक्या जमाती आणि १२ विमुक्त जमाती आहेत. <ref name="TH-17">{{स्रोत बातमी|last=Chandra|first=Kavita Kanan|url=https://www.thehindu.com/society/mittal-patel-has-been-putting-nomadic-and-de-notified-tribes-on-the-map/article22331573.ece|title=Mittal Patel has worked relentlessly to provide the nomadic and de-notified tribes of Gujarat with voter ID cards and social benefits|date=30 December 2017|work=The Hindu|language=en-IN|access-date=26 September 2022|archive-url=https://web.archive.org/web/20220122094749/https://www.thehindu.com/society/mittal-patel-has-been-putting-nomadic-and-de-notified-tribes-on-the-map/article22331573.ece|archive-date=22 January 2022|url-status=live}}<cite class="citation news cs1" data-ve-ignore="true" id="CITEREFChandra2017">Chandra, Kavita Kanan (30 December 2017). [https://www.thehindu.com/society/mittal-patel-has-been-putting-nomadic-and-de-notified-tribes-on-the-map/article22331573.ece "Mittal Patel has worked relentlessly to provide the nomadic and de-notified tribes of Gujarat with voter ID cards and social benefits"]. ''The Hindu''. [https://web.archive.org/web/20220122094749/https://www.thehindu.com/society/mittal-patel-has-been-putting-nomadic-and-de-notified-tribes-on-the-map/article22331573.ece Archived] from the original on 22 January 2022<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">26 September</span> 2022</span>.</cite></ref> या जमाती पारंपारिकपणे चाकूला धार लावणे, कापडाचे वस्त्र विणणे, सापांचे खेळ करणे आणि दोरीवर चालणे अशी काम करतात. <ref name="TIE-22">{{स्रोत बातमी|url=https://indianexpress.com/article/cities/rajkot/gujarat-send-children-to-schools-basic-amenities-assured-cm-patel-tells-nomadic-tribes-7916476/|title=Gujarat: Send children to schools, basic amenities assured, CM Patel tells nomadic tribes|date=14 May 2022|work=The Indian Express|language=en|access-date=26 September 2022|archive-url=https://web.archive.org/web/20220928104326/https://indianexpress.com/article/cities/rajkot/gujarat-send-children-to-schools-basic-amenities-assured-cm-patel-tells-nomadic-tribes-7916476/|archive-date=28 September 2022|url-status=live}}</ref> पटेल यांनी डफर समुदायाच्या सदस्यांशी संबंध प्रस्थापित केले.या समुदायातील लोकांना [[ब्रिटिश राज|ब्रिटिश राजवटीत]] नोंदणीकृत गुन्हेगार म्हणून मानले जात असे. मित्तल यांनी या लोकांना समाजात सामावून घेण्यास मदत करण्याचे काम केले. <ref name="TH-17" /> गुजरातमध्ये ४५ ते ५० डाफर समुदाय (किंवा डांगा) आहेत, ज्यांची लोकसंख्या १८,००० आहे. <ref name="TIE">{{स्रोत बातमी|url=https://indianexpress.com/article/india/gujarat-dafer-community-resolves-to-erase-criminal-tribe-stigma-6149539/|title=Gujarat: Dafer community resolves to erase 'criminal tribe' stigma|date=4 December 2019|work=The Indian Express|language=en|access-date=26 September 2022|archive-url=https://web.archive.org/web/20220127070728/https://indianexpress.com/article/india/gujarat-dafer-community-resolves-to-erase-criminal-tribe-stigma-6149539/|archive-date=27 January 2022|url-status=live}}</ref> २०१८ पर्यंत, गुजरातमधील ९० टक्के आदिवासी लोक भारताचे नागरिक बनले होते. तथापि, पटेलांना अजूनही आदिवासी लोकांना लक्ष्य करणाऱ्या जमावांविरुद्ध कारवाई करावी लागत आहे. <ref name="Statesman">{{स्रोत बातमी|last=Das|first=Rathin|url=https://www.thestatesman.com/india/good-samaritan-mittal-patel-giving-nomads-an-identity-1502670560.html|title=Giving nomads an identity|date=7 August 2018|work=The Statesman|access-date=26 September 2022|archive-url=https://web.archive.org/web/20220928104327/https://www.thestatesman.com/india/good-samaritan-mittal-patel-giving-nomads-an-identity-1502670560.html|archive-date=28 September 2022|url-status=live}}</ref> २०१९ साली, पटेल यांची ओताराम देवासी यांच्यासोबत, [[नीती आयोग|नीती आयोगाच्या]] अंतर्गत एका मंडळावर नियुक्ती करण्यात आली. यामागील मुख्य उद्देश आदिवासी लोकांसाठी कल्याणकारी उपाययोजना सुचवणे होता. <ref name="HT-19">{{स्रोत बातमी|last=Ramachandran|first=Smriti Kak|url=https://www.hindustantimes.com/india-news/key-appointments-to-board-for-denotified-tribes-pending/story-uQwoGDHSVM74tjyFWmaosO.html|title=Key appointments to board for denotified tribes pending|date=15 June 2019|work=Hindustan Times|language=en|access-date=26 September 2022|archive-url=https://web.archive.org/web/20220926174718/https://www.hindustantimes.com/india-news/key-appointments-to-board-for-denotified-tribes-pending/story-uQwoGDHSVM74tjyFWmaosO.html|archive-date=26 September 2022|url-status=live}}</ref> २०२० मध्ये, पटेल यांनी ''"सुरनामा विनान मानवियो"'' नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले. <ref name="Ashaval">{{स्रोत बातमी|last=Dave|first=Harita|url=https://ashaval.com/mittal-patel-the-messiah-for-nomadic-and-denotified-tribes-0923619/|title=Mittal Patel: The Messiah for Nomadic and Denotified Tribes|date=12 September 2020|work=Ashaval|access-date=26 September 2022|archive-url=https://web.archive.org/web/20220525071638/https://ashaval.com/mittal-patel-the-messiah-for-nomadic-and-denotified-tribes-0923619/|archive-date=25 May 2022|url-status=live}}<cite class="citation news cs1" data-ve-ignore="true" id="CITEREFDave2020">Dave, Harita (12 September 2020). [https://ashaval.com/mittal-patel-the-messiah-for-nomadic-and-denotified-tribes-0923619/ "Mittal Patel: The Messiah for Nomadic and Denotified Tribes"]. ''Ashaval''. [https://web.archive.org/web/20220525071638/https://ashaval.com/mittal-patel-the-messiah-for-nomadic-and-denotified-tribes-0923619/ Archived] from the original on 25 May 2022<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">26 September</span> 2022</span>.</cite></ref> तिने ८७ हून अधिक गुजराती तलावांचे पुनरुज्जीवन केले आहे. <ref name="TNIE-19">{{स्रोत बातमी|url=https://www.newindianexpress.com/cities/delhi/2019/oct/24/water-warriors-of-india-get-a-voice-2052251.html|title=Water warriors of India get a voice|date=24 October 2019|work=The New Indian Express|access-date=26 September 2022|archive-url=https://web.archive.org/web/20191026145633/http://www.newindianexpress.com/cities/delhi/2019/oct/24/water-warriors-of-india-get-a-voice-2052251.html|archive-date=26 October 2019|url-status=live}}</ref> == पुरस्कार आणि सन्मान == मित्तल पटेल यांच्या मानवी हक्कांसाठीच्या कार्याची दखल [[नारी शक्ती पुरस्कार|नारी शक्ती पुरस्काराने]] घेण्यात आली. ८ मार्च २०१८ रोजी [[जागतिक महिला दिन|आंतरराष्ट्रीय महिला दिनी]] राष्ट्रपती [[रामनाथ कोविंद]] यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. <ref name="Ashaval">{{स्रोत बातमी|last=Dave|first=Harita|url=https://ashaval.com/mittal-patel-the-messiah-for-nomadic-and-denotified-tribes-0923619/|title=Mittal Patel: The Messiah for Nomadic and Denotified Tribes|date=12 September 2020|work=Ashaval|access-date=26 September 2022|archive-url=https://web.archive.org/web/20220525071638/https://ashaval.com/mittal-patel-the-messiah-for-nomadic-and-denotified-tribes-0923619/|archive-date=25 May 2022|url-status=live}}<cite class="citation news cs1" data-ve-ignore="true" id="CITEREFDave2020">Dave, Harita (12 September 2020). [https://ashaval.com/mittal-patel-the-messiah-for-nomadic-and-denotified-tribes-0923619/ "Mittal Patel: The Messiah for Nomadic and Denotified Tribes"]. ''Ashaval''. [https://web.archive.org/web/20220525071638/https://ashaval.com/mittal-patel-the-messiah-for-nomadic-and-denotified-tribes-0923619/ Archived] from the original on 25 May 2022<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">26 September</span> 2022</span>.</cite></ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:हयात व्यक्ती]] [[वर्ग:नारी शक्ती पुरस्कारविजेते]] [[वर्ग:इ.स.च्या १९८० च्या दशकातील जन्म]] sl6qgz4py2y1ey136ppww2aa9oyk0j9