विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.46.0-wmf.21 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/136 104 27680 228718 75162 2026-03-27T14:29:09Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 228718 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude> <big>'''पालकत्व'''</big> <br><br> {{gap}}आज जे पालक आहेत, ते सन १९६० नंतरच्या दशकात जन्मलेले आहेत. ते जन्मले तेव्हा स्वातंत्र्याचे तप उलटून गेलं होतं. भारतात प्रगतीच्या पाऊलखुणा उमटत होत्या. त्यांच्यापूर्वी जे पालक जन्मले त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून आपलं ध्येय प्राप्त केलं. त्यामुळे त्यांनी आपल्या पाल्यास भरभरून दिलं. त्यांची पिढी आज पालकत्व पेलत आहे. स्वातंत्र्याचा खरा लाभ उपभोगलेला वर्ग आज पालक म्हणून सज्ज झाला आहे. <br>{{gap}}आज पालकत्वाची एक कल्पना रूढ होताना दिसते आहे. मुलांनी मागेल ते देणं म्हणजे पालकत्व निभावणं. अलीकडे पालक पोस्टमन झालेत. फक्त 'देणं' (डिलिव्हरी करणं) त्यांना माहीत आहे. पालकत्व म्हणजे 'देणं' नव्हे तर 'पेलणं' असतं. खलिल जिब्रान नावाचा एक अरबी कवी होता. तो इंग्रजीत लिहायचा. त्याचं एक सुंदर काव्य आहे. 'प्रोफेट' त्याचं नाव. मराठीत त्याचे अनेक अनुवाद उपलब्ध आहेत. त्यानं पालकत्वाबद्दल विस्तारानं लिहिलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार मुलं आपण जन्माला घातली तरी ती आपली नसतात. ती स्वतंत्र जीवन घेऊन जन्मतात. त्यांचे स्वप्न, वृत्ती, विचार सारं त्यांचं घेऊन ती जन्मतात. पालकांचे कार्य धनुष्यासारखं असतं. धनुष्यानं फक्त बाण सोडायचा असतो. दिशा द्यायची असते. अगदी गतीही द्यावी. पण लक्षात असू द्या बाणाचं लक्ष्य स्वतःचं असतं. म्हणून पालकांनी मुलांवर विचार, स्वप्नं लादू नयेत. <br>{{gap}}एकदा का हे पक्क स्पष्ट झालं की मग पालकत्व पेलणं, निभावणं सोपं असतं. आपली मुलं ही काही आपल्या छापाच्या मूर्ती नव्हेत. आपण त्यांना सुविधा, संस्कार, संधी द्यायची. संधीचं सोनं करायची जबाबदारी<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१३५}}</noinclude> oblf0dgd8l3s5fhlt26vp9tfsrfay8c 228719 228718 2026-03-27T14:29:36Z कल्पनाशक्ती 3813 228719 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude> <big>'''पालकत्व'''</big> <br><br> {{gap}}आज जे पालक आहेत, ते सन १९६० नंतरच्या दशकात जन्मलेले आहेत. ते जन्मले तेव्हा स्वातंत्र्याचे तप उलटून गेलं होतं. भारतात प्रगतीच्या पाऊलखुणा उमटत होत्या. त्यांच्यापूर्वी जे पालक जन्मले त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून आपलं ध्येय प्राप्त केलं. त्यामुळे त्यांनी आपल्या पाल्यास भरभरून दिलं. त्यांची पिढी आज पालकत्व पेलत आहे. स्वातंत्र्याचा खरा लाभ उपभोगलेला वर्ग आज पालक म्हणून सज्ज झाला आहे.<br>{{gap}}आज पालकत्वाची एक कल्पना रूढ होताना दिसते आहे. मुलांनी मागेल ते देणं म्हणजे पालकत्व निभावणं. अलीकडे पालक पोस्टमन झालेत. फक्त 'देणं' (डिलिव्हरी करणं) त्यांना माहीत आहे. पालकत्व म्हणजे 'देणं' नव्हे तर 'पेलणं' असतं. खलिल जिब्रान नावाचा एक अरबी कवी होता. तो इंग्रजीत लिहायचा. त्याचं एक सुंदर काव्य आहे. 'प्रोफेट' त्याचं नाव. मराठीत त्याचे अनेक अनुवाद उपलब्ध आहेत. त्यानं पालकत्वाबद्दल विस्तारानं लिहिलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार मुलं आपण जन्माला घातली तरी ती आपली नसतात. ती स्वतंत्र जीवन घेऊन जन्मतात. त्यांचे स्वप्न, वृत्ती, विचार सारं त्यांचं घेऊन ती जन्मतात. पालकांचे कार्य धनुष्यासारखं असतं. धनुष्यानं फक्त बाण सोडायचा असतो. दिशा द्यायची असते. अगदी गतीही द्यावी. पण लक्षात असू द्या बाणाचं लक्ष्य स्वतःचं असतं. म्हणून पालकांनी मुलांवर विचार, स्वप्नं लादू नयेत.<br>{{gap}}एकदा का हे पक्क स्पष्ट झालं की मग पालकत्व पेलणं, निभावणं सोपं असतं. आपली मुलं ही काही आपल्या छापाच्या मूर्ती नव्हेत. आपण त्यांना सुविधा, संस्कार, संधी द्यायची. संधीचं सोनं करायची जबाबदारी<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१३५}}</noinclude> rerg7xpuhgr1d6gupek5j2re8rvk8fv पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/137 104 27681 228720 75172 2026-03-27T14:33:33Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 228720 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>मुला-मुलींची. आपल्याला एखादी गोष्ट मूल असताना मिळाली नाही, म्हणून आपण आपल्या पाल्यास तत्परतेने देतो. पण ती देताना जाणीव करून देतो का? उपकाराच्या भावनेने पाल्यास काहीच देऊ नये. जे द्यावं, ते कर्तव्यभावानं. पाल्याच्या बाबतीत तुम्ही निष्काम कर्मयोग आत्मसात केला पाहिजे. द्या आणि विसरून जा. पालकांनी पाल्याच्या बाबतीत फकीर असायला हवं. 'नेकी कर और समुंदर में डाल’, 'कर्तव्य कर नि विसरून जा.' मुलांकडून अपेक्षा करू नका. तो पाणी पाजेल, तो म्हातारपणात आपली काठी होईल, मुलगी आपण दाखवू त्या स्थळाशी लग्न करेल. मुलांच्या भविष्याची स्वप्न पहा, पण आग्रह करू नका. सक्ती तर नकोच नको.<br>{{gap}}चांगले पालक आपल्या पाल्याच्या वाढीबरोबर आपली भूमिका बदलतात. पालक, शिक्षक, मार्गदर्शक, मित्र, निरीक्षक, सल्लागार, त्रयस्थ असा भूमिकेतील बदल जे आत्मसात करतात, त्यांच्या हाती मुलं लागतात. मुलांच्या वाढीबरोबर आपल्याला बदलता आलं पाहिजे. 'सावध ऐका पुढच्या हाका' या न्यायानं मुलाला केव्हा सांगायचं नि त्याचं केव्हा ऐकायचं याचं तारतम्य पालकांना हवं. जन्मभर मी मुलाचा बाप, मी आई असं असत नाही.<br>{{gap}}मुलांना लहानपणी प्रेम देणं, संगोपन करणं, अगदी लाड करणं मुलाची गरज असते. कुमार वय संस्कारांचं असतं. किशोर वयात चांगलं नि वाईट यातला फरक समजावयाला हा. तरुणपणात ध्येय द्यावं, फुलवावं. विकासाच्या सर्व संधी देण्यासाठी जिवाचं रान करावं पण या वयात बंधनांचा कासरा हळूहळू सोडायला शिकावं. मुलांचं वय धोक्याचं झालं की संवाद सुरू ठेवावा. लादणं कमी करावं. मुलं कॉलेजात जाऊ लागली की जोजवणं कमी करावं. जबाबदारी द्यावी. तो मिळवून शिकेल असं पहावं. सारं ऐतं दिलं की मुलं मस्तवाल होतात. परिस्थिती असली तरी मिळवून खायला शिकवा. आपल्याकडे पालक मुलांचा संसारही पेलताना मी पाहतो. मग ती त्यांचे जीवन केव्हा जगणार? त्यांना त्यांचे जीवन जगू द्या. तुम्ही मदतनीस राहा.<br>{{gap}}आजचे पालक अनुभवत असताना मला जे वाटलं ते लिहिलं. तुम्हाला काय वाटतं?<br> {{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१३६}}</noinclude> ej8vnzy6xom6diwjx7y69m5hw6520e9 पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/138 104 27682 228721 75181 2026-03-27T14:36:11Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 228721 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude> <big>'''परीक्षांचा महापूर'''</big><br> {{gap}}आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. त्या पाठोपाठ दहावी, मग विद्यापीठ, शाळा, कॉलेजांच्या अनेक परीक्षा येत आहेत. आजचा काळ हा परीक्षांचा झालाय खरा! अगदी बालवाडीच्या प्रवेशालाही सीईटी (प्रवेश परीक्षा) द्यावी लागत आहे. पालकांना द्यावी लागणारी मुलाखत ही त्यांची सत्वपरीक्षाही असते नि अग्निपरीक्षाही! जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास असतो परीक्षांचा चक्रव्यूह. त्यातून कोणीच, कधी सुटला नाही. एखाद्या परीक्षेस जाणं, भिडणं वाघाच्या गुहेत जाणं असतं! पूर्वी नव्हे तितकी स्पर्धा... जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली ती परीक्षांच्या महापुरामुळे! प्रवेश परीक्षा, चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, वार्षिक परीक्षा, वधू परीक्षा, रक्त परीक्षा, थुंकी परीक्षा, लघवी परीक्षा, नाडी परीक्षा... एक का शंभर परीक्षा!<br>{{gap}}अलीकडे मी सारखा विचार करतो आहे... हे परीक्षांचं पीक फोफावलं कसं? पूर्वी मनुष्य अज्ञानी होता. तो अकुशल होता. अक्षमही होता तो. त्यावेळी त्याला कोणत्याच परीक्षेला तोंड द्यावं लागायचं नाही. श्रमाच्या घामानं शेत भिजायचं. आईच्या मायेनं घराची भिंत सारवली जायची. ताई अंगण सारवायची. चिमणी नि चुलीच्या धुराने घर काजळी धरायचं तेव्हा परीक्षा नव्हती नि काळजी पण! सारं कसं शांत, मुलायम, सुखद होतं! आज सारं कसं झगझगीत, चकचकीत लागतं. असतं ही ते तसं पण आत-आत असतं एक उद्ध्वस्तपण, अस्वस्थपण, हे सारं आधुनिकतेच्या हव्यासातून, ध्यासातून आलं. परीक्षेचा जन्म हा हव्यासाच्या स्पर्धेतून जन्मला.{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१३७}}</noinclude> erlpnfmxd2ivdj5j8dpdsis0weud1me पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/139 104 27683 228722 75200 2026-03-27T14:40:57Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 228722 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}आज पालकांना आपली मुलं रेसचे घोडे करण्याचा ध्यास लागला आहे. त्यांना टक्क्यांचे टट्टू हवेत. ‘मूल्यवान माणूस' कुणासच नको आहे. सगळ्यांना हवी आहेत यंत्र... प्रत्येकाच्या कानात एकच मंत्र घुमतो आहे... 'पळा रे पळा, पाहू कोण पुढे पळतो ते'. आपणास पळणारे नि पाळता येणारे वळू हवे आहेत. स्वतंत्र विचार करणारा माणूस आपली अडचण बनतो आहे, असा माझा अनुभव आहे.<br>{{gap}}परीक्षेला पर्याय शोधून कौशल्य, स्मरणशक्तीला फाटा देऊन उपयोजन महत्त्वाचे. भाषेचा उपयोग गाळलेले शब्द भरण्याऐवजी वगळलेली माणसं जोडण्याची कला म्हणून कसा करता येईल याचे आव्हान आपणापुढे ठाकलेले आहे. धोतर व साडीऐवजी पँट वापरणं यालाच जर आपण आधुनिकता म्हणणार असू तर गफलत झाली म्हणून समजा. परीक्षेतून उपयोगिता वाढली पाहिजे. परीक्षेतून कौशल्य विकसित व्हायला हवं. परीक्षेतून मिळवलेल्या टक्क्यांचा उपयोग समाजाची गुणवत्ता वाढविण्यासाठी, गरिबी, विषमता, अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी झाला तर ते योग्य संक्रमण, परिवर्तन होय. पण आज स्थिती उलट आहे. विद्यार्थी सातवी पास झाला की गाव, दहावी पास झाला की तालुका, बारावी पास झाला की जिल्हा, पदवीधर झाला की राज्य नि पदव्युत्तर परीक्षा... विद्यापीठाची परीक्षा पास झाला की देश सोडतो. परीक्षा जोडण्याचे साधन न होता तोडण्याचे हत्यार होते आहे. ही काळजी करण्याची बाब आहे.<br>{{gap}}परीक्षेनं माझ्यातला 'माणूस' मोठा होतो का, हा खरा प्रश्न आहे. शिक्षणानं येणारं संक्रमण वैभवी तेव्हा असतं जेव्हा माणूस शिकूनही उपयोगी, नम्र भाव, नाते जपणारा राहतो. हिंदी कवी कुँवर बेचैन आपल्या एका कवितेत म्हणतात,<br> {{gap}}'साडी-टाई बदले, या घर बदले<br> {{gap}}प्रश्नचिन्ह नित और बडा हो जाता<br> {{gap}}कारण केवल यही, दिखावों से जुड हम<br> {{gap}}तोड रहे अनुभूति, 'भावना से नाता'<br><br> {{gap}}असा माझाही अनुभव आहे. तुमचा? {{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center |जाणिवांची आरास/१३८}}</noinclude> 2iwivfhy2qti9ewq2xn5sz3yu3lxei2 पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/140 104 27684 228723 74873 2026-03-27T14:42:58Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 228723 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br><br><br><br> {{center|<big>'''सगुण निर्गुण'''</big>}} <br><br><br><br><br><br><noinclude>{{center|जाणिवांची आरास/१३९}}</noinclude> djhc8lnxhrbu6gbx91nojjb0dwjfvfb पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/141 104 27685 228724 74877 2026-03-27T14:43:43Z कल्पनाशक्ती 3813 /* मजकुराविना */ 228724 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude>{{center|जाणिवांची आरास/१४०}}</noinclude> rdodahoerob39ja6lotugxnm9zvnhx1 पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/142 104 27686 228725 74885 2026-03-27T14:47:14Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 228725 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><big>'''सार्वजनिक सत्यधर्म'''</big><br> {{gap}}दोन दिवसांमध्ये एक रात्र असते की, दोन रात्रींमध्ये एक दिवस? असा प्रश्न केला तर काही उत्तर देतील की, 'दोन दिवसांमध्ये एक रात्र असते' तर काही 'दोन रात्रींमध्ये एक दिवस असतो.' असो. दोन्ही उत्तरे सापेक्ष असल्याने बरोबरच. ज्यांचे उत्तर दोन दिवसांमध्ये एक रात्र असे आहे, ते आशावादी होत. त्यांना जगातले उज्ज्वल अधिक दिसते. ज्यांचे उत्तर दोन रात्रींमध्ये एक दिवस आहे त्यांना निराशावादी म्हणावे लागेल. कारण त्यांना अंधार अधिक दिसतो आणि उजेड कमी. माझे उत्तर मात्र वेगळे आहे. ते आहे, 'एक दिवसानंतर एक रात्र असते.' हे प्रश्नाचे वस्तुनिष्ठ उत्तर. उत्तराचं असं का व्हावं? तर माणसं जीवनातील प्रश्न आपला वकूब, दृष्टिकोन आदींनी ठरवतात नि त्या अनुषंगाने ते सोडवतही असतात.<br>{{gap}}आशावादी माणसं सकारात्मक असतात. "जग बदल घालुनि घाव' यावर त्यांचा विश्वास असतो. तसेच, ‘बाबा, जग हे बदलायचे' अशी त्यांची धडपड असते. ‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून श्रमिकांच्या तळहातांवर तरलेली आहे.' या तत्त्वज्ञानावर त्यांचा विश्वास असतो. अशी माणसं जीवनाबद्दल आश्वस्त असतात. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे' यावर त्यांचा विश्वास असतो. अपेक्षा नि कृती अशा दोन्ही पातळीवर ही माणसं रचनात्मक दृष्टी ठेवतात. अशी माणसं प्रयत्नवादी व प्रयत्नशील असतात. 'ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान' अशी नसणारी ही माणसं एकतर अल्पसंतुष्ट नसतात नि दैववादीही. पूजापाठ, व्रतवैकल्ये, कर्मकांडाने या जगात काही मिळत नसते. मिळते ते सारे कर्मयोगावर.{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१४१}}</noinclude> or0k906ai9vib6bafgb1wuv2o9rbc9d पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/143 104 27687 228726 74916 2026-03-27T14:50:36Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 228726 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}शेतकरी बी पेरून घरी बसत नाही. खुरपणी, छाटणी, पाणी देणं, खत घालणं, फवारणी करणं, राखण करणं असं हर प्रयत्नांनी तो पीक पदरी पाडून घेतो. माणसाचं आशावादी असणं दुसरे तिसरे काही असत नाही. ती असते त्याच्या मनाची ठेवण व वागण्याची पद्धत, ज्याला अलीकडे आपण जीवनशैली म्हणतो.<br>{{gap}}निराशवादी टोकाचा नकारात्मक विचार करतात. छोट्या संकटाला आकाश कोसळले समजले जाणारे भित्र्या सशासारखे असतात. झाडाचं पान पडलं तरी आकाश कोसळल्याच्या भ्रमाने जीव मुठीत घेऊन पळतात. हताश, निराश, उदास माणसं स्वतः निष्क्रिय होतात व दुसऱ्याला काळजीच्या दरीत लोटत राहतात. अशांना सहानुभूती देण्यापेक्षा धैर्य देण्याबरोबरच सक्रिय करणंही महत्त्वाचं. उलटपक्षी वस्तुनिष्ठ माणसं 'जीवन त्यांना कळले हो' पठडीतली असतात. ती आशेने हरळत नाहीत नि निराशेने हताश होत नाहीत. ती व्यक्तिगत भावभावनांच्या कल्लोळ, गलबल्यात स्वतःस न विसर्जित करतात, न हारतात. 'अत्त दीप भव' म्हणत ती स्वतः अंधाऱ्या वाटेवर पणतीच्या उजेडात चालतात. त्यांच्या हातातल्या मेणबत्तीची मशाल कधी झाली हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. अशी माणसं सतत अंतर्मुख होऊन सिंहावलोकन करत विहंगमावलोकनाने नवी स्वप्नं कवटाळत ती सत्यात उतरवत राहतात. ते पूर्वग्रहदूषित असत नाहीत नि दुसऱ्यावर फुकाचा भरवसाही ठेवत नाहीत. वास्तवाचं भान हा त्यांच्या जगण्याचा आधार असतो आणि भरोसाही. भावनेपेक्षा तर्कावर जगणारी ही माणसं खाली जमीन नि वर आकाशाचं भान ठेवून जीवन घडवतात. 'मी' आणि 'तू' याच्या पलीकडे आपण असा सामूहिक सद्भाव व सभ्यता जोपासणारी ही तटस्थ माणसं. त्यांच्या वेदना नि संवेदना दोन्ही क्षितिजे विश्वव्यापी. अशा माणसांना मग दगडातल्या देवापेक्षा माणसातली माणुसकी महत्त्वाची वाटते. 'जे जे आपणासि ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकलजन' असा त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म असतो. {{right|■ ■}}{{nop}} जाणिवांची आरास/१४२<noinclude></noinclude> 18trsi1941ec0hwj0verotev8rpa36x 228729 228726 2026-03-27T14:58:43Z कल्पनाशक्ती 3813 228729 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}शेतकरी बी पेरून घरी बसत नाही. खुरपणी, छाटणी, पाणी देणं, खत घालणं, फवारणी करणं, राखण करणं असं हर प्रयत्नांनी तो पीक पदरी पाडून घेतो. माणसाचं आशावादी असणं दुसरे तिसरे काही असत नाही. ती असते त्याच्या मनाची ठेवण व वागण्याची पद्धत, ज्याला अलीकडे आपण जीवनशैली म्हणतो.<br>{{gap}}निराशवादी टोकाचा नकारात्मक विचार करतात. छोट्या संकटाला आकाश कोसळले समजले जाणारे भित्र्या सशासारखे असतात. झाडाचं पान पडलं तरी आकाश कोसळल्याच्या भ्रमाने जीव मुठीत घेऊन पळतात. हताश, निराश, उदास माणसं स्वतः निष्क्रिय होतात व दुसऱ्याला काळजीच्या दरीत लोटत राहतात. अशांना सहानुभूती देण्यापेक्षा धैर्य देण्याबरोबरच सक्रिय करणंही महत्त्वाचं. उलटपक्षी वस्तुनिष्ठ माणसं 'जीवन त्यांना कळले हो' पठडीतली असतात. ती आशेने हरळत नाहीत नि निराशेने हताश होत नाहीत. ती व्यक्तिगत भावभावनांच्या कल्लोळ, गलबल्यात स्वतःस न विसर्जित करतात, न हारतात. 'अत्त दीप भव' म्हणत ती स्वतः अंधाऱ्या वाटेवर पणतीच्या उजेडात चालतात. त्यांच्या हातातल्या मेणबत्तीची मशाल कधी झाली हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. अशी माणसं सतत अंतर्मुख होऊन सिंहावलोकन करत विहंगमावलोकनाने नवी स्वप्नं कवटाळत ती सत्यात उतरवत राहतात. ते पूर्वग्रहदूषित असत नाहीत नि दुसऱ्यावर फुकाचा भरवसाही ठेवत नाहीत. वास्तवाचं भान हा त्यांच्या जगण्याचा आधार असतो आणि भरोसाही. भावनेपेक्षा तर्कावर जगणारी ही माणसं खाली जमीन नि वर आकाशाचं भान ठेवून जीवन घडवतात. 'मी' आणि 'तू' याच्या पलीकडे आपण असा सामूहिक सद्भाव व सभ्यता जोपासणारी ही तटस्थ माणसं. त्यांच्या वेदना नि संवेदना दोन्ही क्षितिजे विश्वव्यापी. अशा माणसांना मग दगडातल्या देवापेक्षा माणसातली माणुसकी महत्त्वाची वाटते. 'जे जे आपणासि ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकलजन' असा त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म असतो. {{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१४२}}</noinclude> m3cnc3973bwzkdcqtjt0ulm7c8kdqnd पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/144 104 27688 228727 74922 2026-03-27T14:54:35Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 228727 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude> {{x-larger|'''सर्वांभूति समानत्व'''}}<br><br> {{gap}}एक पंडित होते. नावेतून रोज पलीकडच्या मंदिरात मंत्रोच्चार करीत देवदर्शनार्थ जात असत. नावाडी अडाणी होता. एक दिवस न राहून त्याने पंडितास विचारले, 'तुम्ही रोज काय पुटपुटत असता, ते मला काही कळत नाही. सांगाल का?' पंडित म्हणाले, 'अरे मी संस्कृत मंत्र म्हणतो. तुला संस्कृत नाही येत? तुझं अर्ध आयुष्य वाया गेलं म्हणायचं.' हे ऐकून नावाड्याला आपण अडाणी राहिलो याचे शल्य वाटत राहिले. असेच काही दिवस गेले. नदीला पूर आलेला. नावाडी नेहमीप्रमाणे पंडिताला पैलतीरी घेऊन निघालेला. नदीपात्राच्या मध्यावर असताना नावेची तळातील जीर्ण फळी पाण्याच्या जोराने उचकटली नि नाव बुडू लागली. नावाडी पंडीत महोदयांना पाण्यात उडी टाका नि पोहायला लागा म्हणून समजावू लागला. पंडिताने विचारले, 'पोहायचं म्हणजे काय करायचं?' नावाडी उडी टाकत म्हणाला, 'तुम्हाला पोहायला येत नाही? मग तर तुमचं संपूर्ण आयुष्यच वाया गेलंय म्हणून समजा.'<Br>{{gap}}कोण ज्ञानी नि कोण अज्ञानी याचा आपण तपास करू लागू तर लक्षात येते की, प्रत्येक ज्ञानाचा संबंध जीवन जगण्याशी असतो. ज्ञान आहे, पण उपयोग नाही असे ज्ञान काय कामाचे? वर्तमानात तुम्ही कितीही शिकलेले असा, जर तुम्हाला संगणकीय ज्ञान नसेल तर तुम्ही अज्ञानीच. काळाप्रमाणे ज्ञानाचे स्वरूप बदलते. पूर्वी मंत्रोच्चार, पठण, श्रवण म्हणजे ज्ञान होते. नंतर लेखन, वाचन, अंकमोड म्हणजे ज्ञान झाले. वर्तमानात तेच माहिती, तंत्रज्ञान साधनाद्वारे सुदूर पोहोचविता येणे ही ज्ञानीपणाची पूर्वअट होऊन गेली. असे असले तरी जीवनातील छोटी, मोठी कामे करणाऱ्यांचे महत्त्व<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१४३}}</noinclude> cj7tcyy5w9btwbjcxo8cskctgxvv4hc पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/145 104 27689 228728 74929 2026-03-27T14:57:30Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 228728 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>कमी झालेले नाही. ज्ञानी समाज जितकी यंत्रे बनवेल, जितका तो यंत्रवत आणि यंत्रमय बनेल, तितके मूलभूत हस्तकौशल्याचे महत्त्व वाढेल. आजचे ज्ञान हा त्याचाच आविष्कार नाही का?<Br>{{gap}}ज्ञान हे पैसे मिळवायचे साधन की जगण्याची कला? याची फारकत होणे वर्तमानाची शोकांतिका आहे. भारतीय समाजात विशेषतः ज्ञान, श्रम व कौशल्य यातील वाढत्या दरीनेच येथील केवळ विषमतेची दरी रुंदावलेली नाही तर शिक्षित माणसं मानसिकदृष्ट्या अडाणी व अल्पशिक्षितांना हीन, दीन, अस्पृश्य मानतात हा वर्तमानाचा सामाजिक महारोग होय. फळांनी लगडलेली फांदी ओझ्याने उन्नत न होता नम्र होते, या निसर्ग नियमाची पायमल्ली विषण्ण करणारी आहे. भारतीय समाजमानसात कमी शिकलेल्यांबद्दलचा तुच्छ भाव आपल्या सरंजामी वृत्तीचेच प्रतीक होय. शिक्षण माणसास सभ्य करण्याचे साधन व माध्यम म्हणून आपण वापरत नाही, ही आपली शोकांतिका होय.<Br>{{gap}}नुसती कल्पना करून पाहा की गवंडी, प्लंबर, सुतार, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, नर्स, लाइनमन, ऑपरेटर, शेतमजूर, मीटर रीडर नाहीत. जग सारं डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्राध्यापक, नट, नेत्यांनी भरलेलं आहे. सर्वत्र नुसते संपादक आहेत. पत्रकार, कॅमेरामन, अँकर, प्रिंटर, कंपोझिटर नाहीत. यंत्रात सर्व भाग महत्त्वाचे तसेच समाजातील सर्व प्रकारची माणसे तितकीच महत्त्वाची. भेद, दुजाभाव, श्रेष्ठ-कनिष्ठता, उजवा-डावा असे भेद-फरक आपल्या मानसिक घडणीचा राहिलेला दोषच. 'सर्वांभूति समानत्व' हे प्रगल्भ समाजाचे लक्षण होय. प्राप्त ज्ञानाचा विवेकी वापर, निरअहंकारी वर्तन, 'मी' नव्हे 'आपण' असा सर्वग्राही, सर्वव्यापी, समाज व्यवहार नि सभ्यता म्हणजे सज्ञानता अशी ज्ञानाची व्यापकता आपण सुशिक्षित समाजाच्या वर्तन व्यवहारात रूजवू शकू तर तो खरा मानव विकास नाही का ठरणार? केवळ भौतिक समृद्धीचं साधन म्हणून आपण ज्ञानाकडे पाहात राहिलो तर माणसाचा मिडास होण्यास वेळ लागणार नाही. शिक्षितांच्या मनुष्यलक्ष्यी होण्याचा प्रवास ज्या दिवशी सुरू होईल तो दिवस सोनियाचा म्हणायचा. {{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१४४}}</noinclude> 5s6ahij7234i27347dr7w835t8v8i0g पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/146 104 27690 228730 74942 2026-03-27T15:03:43Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 228730 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude> {{x-larger|'''सात समंध मानेवर'''}}<Br><br> {{gap}}ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी विंदा करंदीकर यांच्या 'मृद्गंध' कवितासंग्रहात 'हे आइन्स्टीन!' शीर्षकाची कविता आहे. तिच्या काही ओळी अशा, {{gap}}'हे आइन्स्टीन!<Br>{{gap}}'कोण', 'काय',<Br>{{gap}}'कसे', 'कुठे',<Br>{{gap}}'का' - असे<Br>{{gap}}सात समंध<Br>{{gap}}माझ्या मानेवर!<Br>{{gap}}हे समंध समस्त मानव जातीच्या मानगुटीवर अनादि, अनंत काळापासून बसलेले आहेत. समंध म्हणजे भूत. भूत एकदा मानेवर बसले की उतरत नसते म्हणे! कोण, काय, कसे, कुठे, कधी, किती, का ही तशी प्रश्नात्मक सर्वनामे; पण शब्दांनी साऱ्या ज्ञान, विज्ञान विकासाचा पाया घातला. आपल्या भाषेत शब्दांचे अस्तित्व नसते तर आपण अद्याप अश्मयुगात असतो. माणसाला प्रश्न पडणे वा प्रश्नात माणूस पडणे यात समस्त मानव जातीचा विकास सामावलेला आहे.<Br>{{gap}}'कोण' हा प्रश्न कोऽऽहम? पासून आला. माणूस विचार करायला लागला म्हणजे काय? तर तो अंतर्मुख झाला नि स्वतःला प्रश्न केला की, मी कोण? शोध घेता घेता त्याच्या लक्षात आले की, कालपटलाच्या अनंत प्रवासात 'मी' म्हणणारा अहंकारी मनुष्य कःपदार्थच असतो. आकाशगंगेत असंख्य तारे असतात तशी पृथ्वीतलावर असंख्य माणसे. त्यातला एक तू.<noinclude>{{center|जाणिवांची आरास/ १४५}}</noinclude> 0a3izac39b1bkw2ictoc3lu3cww3mhv पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/147 104 27691 228731 74952 2026-03-27T15:07:38Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 228731 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>तुला अमर व्हायचं तर मनुष्याचा महात्मा, तत्त्वज्ञ, वैज्ञानिक, साहित्यिक, कवी, कलाकार व्हायला हवं. नाही तर तू सामान्यातील एक. <Br>{{gap}}'काय' प्रश्नाने साऱ्या जगाचे रहस्य उलगडलेस. काय हवं, काय नको या विधिनिषेध विवेकाने जंगली माणसाला सभ्य, सुसंस्कृत बनवलंस. नीती, आदर्श, संस्कार, सभ्यता, संस्कृती या साऱ्या संकल्पनांचा उदय 'काय' या प्रश्नातून झालेला आहे. 'कसे' आणि 'कुठे' तसे गौण प्रश्न. पण त्यांनीही स्थल, काल महात्म्य अधोरेखित केलं आहे. हे शब्द नसते तर पृथ्वीचा शोध लागला नसता. कोलंबस, वास्को दि गामा यांनी पृथ्वी प्रदक्षिणा करून जगातले नानाविध देश, भाषा, संस्कृती, ज्ञान-विज्ञान शोधून काढले म्हणून समस्त मानव समाज निरंतर उन्नत होतोय.<Br>{{gap}}'कधी' या प्रश्नाने कालभान दिले. या कालभानामुळेच माणसाला गतीचा बोध झाला. गतीने सूर्यमंडळाला गवसणी घातली. गॅलिलिओ, सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल, तुकाराम आणि आज डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी, माणूस गती स्वीकारत नाही. फक्त तो क्षमा मागतो. असहिष्णू व्यवहार केवळ क्षमाप्रार्थनेने दुरुस्त होत नसतात. पोपच्या क्षमा याचनेपेक्षा सर्वसामान्यांचं प्रगल्भ, स्वप्रज्ञ होणं महत्त्वाचं. 'कधी' प्रश्नाला बगल देणारा समाज सदैव देववादी नि दैववादी राहिल्याचा इतिहास आहे. प्रबोधन पर्व सात समंधांचा पिच्छा पुरवत स्वतःला उसवत विवेकवादी बनवत राहते. आइन्स्टीन मोठा का? तर त्यानं जगाला सापेक्षता समजावून निरपेक्ष केलं.<Br>{{gap}}'किती' प्रश्न वर्तमानाचं चलनी नाणं होऊन बसलं आहे. माणसाने नाणे जन्माला घातले हा अंकज्ञानाचा गैरवापर होय. अर्थशास्त्र किती? प्रश्न विचारते. तो गरज सूचक होय. गरजेपेक्षा संग्रह म्हणजे विषमता, अत्याचाराचे मूक समर्थनच. सत्ता आणि संपत्ती दोन्ही किती शब्दाच्या पायावर उभी असते. मताच्या जागी मन आणि नाण्याच्या जागी माणूस पाहतात ते राज्यकर्ते. सर्वसंग परित्याग करणाच्या गौतम बुद्धाने जीवनातून 'किती शब्द बहिष्कृत करत तो स्वतः हद्दपार झाला होता. 'कफनी' आणि 'कफन' यातलं अंतर त्यालाच समजलं. आज आपण काय पाहतो? 'का?' या प्रश्नाचे उत्तर मात्र तुम्हीच शोधायचे. {{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/ १४६}}</noinclude> rffkx8vp5jh32q7339fw3s3psvdmefo पान:स्त्री - जीवन.pdf/१७० 104 109964 228715 228698 2026-03-27T12:03:50Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228715 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५८ ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण }} {| |-</noinclude>{{nopt}} |- | माझे घर मोठें {{gap}}{{gap}} पन्नास येती जाती<br>हाती रुपयांची वाटी {{gap}}{{gap}} गोपूबाळाच्या || <br>{{gap}} १६५ |- | मोठेमोठे लोक {{gap}}{{gap}} उठून उभे राहती<br>लोडाशी जागा देती {{gap}}{{gap}} माझ्या बाळा || <br>{{gap}}१६६ |- | मोठे मोठे लोक {{gap}}{{gap}} सामोरे येतात<br>स्वागत करितात {{gap}}{{gap}} माझ्या बाळाचें || <br>{{gap}}१६७ |- | मोठे मोठे लोक {{gap}}{{gap}} सरकारें अडवीले<br>एक्या शब्दे सोडवीले {{gap}}{{gap}} माझ्या बाळें || <br>{{gap}}१६८ |- | कचेरीच्या पुढें {{gap}}{{gap}} हिरवा कंदील डोलतो<br>नवा साहेब बोलतो {{gap}}{{gap}} माझा बाळ || <br>{{gap}}१६९ |- | कचेरीच्या पुढें {{gap}}{{gap}} हिरवा कंदील कोणाचा<br>नवा साहेब पुण्याचा {{gap}}{{gap}} माझा बाळ || <br>{{gap}}१७० |- | कचेरीच्या पुढे {{gap}}{{gap}} काय गुलाबा तुझी हवा<br>वास घेणार गेले गांवा {{gap}}{{gap}} दादाराया || <br>{{gap}}१७१ |- | बारा बैल वहाती {{gap}}{{gap}} एवढा कोण शेती<br>चार गांवाची ग खोती {{gap}}{{gap}} गोपू बाळाची || <br>{{gap}}१७२ |- | बारा ग बैलांची {{gap}}{{gap}} दावण आली घरा<br>निजला जागा करा {{gap}}{{gap}} गोपूबाळ || <br>{{gap}}१७३ |- | बारा बैल वहाती {{gap}}{{gap}} बाप्पाजींच्या नांगराला<br>जिरेसाळ डोंगराला {{gap}}{{gap}} पेरीयेली || <br>{{gap}}१७४ |- | आवाज मोठा आला {{gap}}{{gap}} मोठा गाडा घडघडला<br>खोतीचा गल्ला आला {{gap}}{{gap}} बाप्पाजींचा || <br>{{gap}}१७५ |- | बाप्पाजी काकाजी {{gap}}{{gap}} करा भाताचा व्यापार<br>मोत्यांचा चंद्रहार {{gap}}{{gap}} द्यावा मज || <br>{{gap}}१७६ |- | नाचण्यांनो तुम्ही {{gap}}{{gap}} कोंकणीचे राजे<br>त्यानें भाई माझे {{gap}}{{gap}} सावकार || <br>{{gap}}१७७<noinclude>{{nopt}} |}</noinclude> 9fd2fqmgjubiv218gtls7orki7nunpr पान:स्त्री - जीवन.pdf/१७१ 104 109965 228716 228699 2026-03-27T12:10:39Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228716 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १५९ }} {| |-</noinclude>{{nopt}} |- | नाचण्यांनो तुम्ही {{gap}}{{gap}} कोंकणीचें गहूं<br>अंतर नका देऊ {{gap}}{{gap}} भाईरायाला || <br>{{gap}}१७८ |- | सभेमध्यें ग बसले {{gap}}{{gap}} उंच पगडी लहानथोर<br>सभेमध्ये माझे दीर {{gap}}{{gap}} शोभतात || <br>{{gap}}१७९ |- | पशानें पायली {{gap}}{{gap}} सवाईची दिढी झाली<br>कंठी छातीला भीडली {{gap}}{{gap}} दादारायांच्या || <br>{{gap}}१८० |- | पिकलेला अननस {{gap}}{{gap}} हिरवा त्याचा देठ<br>खोतांना आली भेट {{gap}}{{gap}} अप्पारायांना || <br>{{gap}}१८१ |- | पाटील पट्टी करी {{gap}}{{gap}} येतील सचणीला<br>हिरवी शाल खोतीणीला {{gap}}{{gap}} अक्काबाई || <br>{{gap}}१८२ |- | माझ्या ओटीवरी {{gap}}{{gap}} खोतापाटलांची दाटी<br>तुमच्या नावासांठीं {{gap}}{{gap}} बाप्पाजी हो || <br>{{gap}}१८३ |- | हातींच्या आंगठ्या {{gap}}{{gap}} कशाने झीजल्या<br>राशी मोहरांच्या मोजील्या {{gap}}{{gap}} गोपू बाळानें || <br>{{gap}}१८४ |- | माझ्या ओटीवरी {{gap}}{{gap}} चांदीचे गडवे पेले<br>मैत्र तुझे पाणी प्याले {{gap}}{{gap}} गोपू बाळा || <br>{{gap}}१८५ |- | माझ्या ओटीवर {{gap}}{{gap}} सतरंज्या लोळती<br>मैत्र तुझे रे खेळती {{gap}}{{gap}} गोपू बाळा || <br>{{gap}}१८६ |- | माझ्या ओटीवर {{gap}}{{gap}} कशाचा केर झाला<br>जाई मोडून तुरा केला {{gap}}{{gap}} भाईरायाला || <br>{{gap}}१८७ |- | माझ्या ओटीवर {{gap}}{{gap}} कागदाचा केर<br>लिहिणार सुभेदार {{gap}}{{gap}} मामाराया || <br>{{gap}}१८८ |- | माझ्या ओटीवर {{gap}}{{gap}} कागद किती पाहू<br>लिहिणार माझे भाऊ {{gap}}{{gap}} कारभारी || <br>{{gap}}१८९ |- | अंगांत सदरा कोट {{gap}}{{gap}} पायांत कुलपी बूट<br>तुझ्या चालण्याची ऐट {{gap}}{{gap}} गोपू बाळा || <br>{{gap}}१९०<noinclude>{{nopt}} |}</noinclude> ivdfmntnwk5kyfe0ndfz6m0j8at4pfb अनुक्रमणिका:मराठी रियासत (३-स्थिरबुद्धी राजाराम ).pdf 106 109973 228717 2026-03-27T12:27:28Z सुबोध कुलकर्णी 1231 नवीन पान 228717 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=मराठी रियासत (४. स्थिरबुद्धी राजाराम) |Language=mr |Volume= |Author=गोविंद सखाराम सरदेसाई |Translator= |Editor= |Illustrator=एस. व्ही. परुळेकर, मुंबईवैभव प्रेस, सँढर्स्टरोड, गिरगांव, मुंबई-४ |School= |Publisher=केशव भिकाजी ढवळे, श्रीसमर्थ-सदन, गिरगांव |Address=मुंबई |Year=1936 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} hsqyxi2bfl3kj4c6ewuldmnzwzdf27i पान:स्त्री - जीवन.pdf/१७२ 104 109974 228732 2026-03-28T09:25:13Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228732 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६० ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | लहानसा कारकून {{gap}}{{gap}} साहेबाच्या डावीकडे<br>पहिल्या पगाराचे तोडे {{gap}}{{gap}} उषाताईला || <br>{{gap}}१९१ |- | लहानसा कारकून {{gap}}{{gap}} साहेबापुढे उभा<br>तुमच्या स्वारीजोगा {{gap}}{{gap}} गोपूबाळ || <br>{{gap}}१९२ |- | लहानसा कारकून {{gap}}{{gap}} साहेबाला आवडला<br>पगार वाढवीला {{gap}}{{gap}} गोपूबाळाचा || <br>{{gap}}१९३ |- | लहानसा कारकून {{gap}}{{gap}} साहेबाची खुशी<br>पहिल्या पगाराची ठुशी {{gap}}{{gap}} उषाताईला || <br>{{gap}}१९४ |- | लहानसा कारकून {{gap}}{{gap}} बैसे साहेबाच्या कडे<br>पहिल्या पगाराचे पेढे {{gap}}{{gap}} वांटीयेले || <br>{{gap}}१९५ |- | माझ्या अंगणांत {{gap}}{{gap}} बैसलासे हिरा<br>सखे तुझा ग नवरा {{gap}}{{gap}} उषाताई || <br>{{gap}}१९६ |- | कचेरीच्या पुढें {{gap}}{{gap}} आंवळीचें झाड<br>सांवळा सुभेदार {{gap}}{{gap}} गोपूबाळ || <br>{{gap}}१९७ |- | दळणाची पाटी {{gap}}{{gap}} अखंड जात्यावरी<br>अन्नछत्र तुझ्या घरीं {{gap}}{{gap}} गोपू बाळा || <br>{{gap}}१९८ |- | कारागीरी टोपी {{gap}}{{gap}} आली दारावरी<br>गोपूबाळ पारावरी {{gap}}{{gap}} मोल करी || <br>{{gap}}१९९ |- | शेरभर सोनें {{gap}}{{gap}} लेखणीच्या टांका<br>हिशोब देतो बापा {{gap}}{{gap}} गोपू बाळ || <br>{{gap}}२०० |- | मंदिरीं सप्ताह {{gap}}{{gap}} भागवत चाले<br>बाप्पाजी तेथे गेले {{gap}}{{gap}} ऐकावया || <br>{{gap}}२०१ |- | मंदिरीं सप्ताह {{gap}}{{gap}} झालासे आरंभ<br>मामंजी त्यांत दंग {{gap}}{{gap}} ऐकावया || <br>{{gap}}२०२ |- | हरदास आले {{gap}}{{gap}} पुण्याचे वांईचे<br>अलोट लोकांचे {{gap}}{{gap}} जाती थवे || <br>{{gap}}२०३<noinclude>{{nopt}} |}</noinclude> qxt4rtbuzhbra07gab3l4t0ttxqblv3 पान:स्त्री - जीवन.pdf/१७३ 104 109975 228733 2026-03-28T09:31:53Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228733 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १६१}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | आले हरदास {{gap}}{{gap}} राजधानीहून<br>ऐकाया कीर्तन {{gap}}{{gap}} संत जाती || <br>{{gap}}२०४ |- | संत आले गांवा {{gap}}{{gap}} दर्शना चला जाऊं<br>घरी नका कंथा राहूं {{gap}}{{gap}} सखी सांगे || <br>{{gap}}२०५ |- | संत आले गांवा {{gap}}{{gap}} चला त्यांची करूं सेवा<br>हेत माझा पुरवावा {{gap}}{{gap}} एवढा की || <br>{{gap}}२०६ |- | दागीना मागत्यें {{gap}}{{gap}} म्हणून म्हणतां वेडी<br>कोण माझी हौस फेडी {{gap}}{{gap}} तुम्हांवीण || <br>{{gap}}२०७ |- | काळी चंद्रकळा {{gap}}{{gap}} घेऊन मला द्यावी<br>हौस माझी पुरवावी {{gap}}{{gap}} तुम्ही कंथा || <br>{{gap}}२०८ |- | काळी चंद्रकळा {{gap}}{{gap}} शोभेल गोऱ्या अंगा<br>म्हणाल आली रंभा {{gap}}{{gap}} स्वर्गांतून || <br>{{gap}}२०९ |- | नको हो पैठणी {{gap}}{{gap}} नको मला शालू शेले<br>भाळ असो भरलेलें {{gap}}{{gap}} कुंकवानें || <br>{{gap}}२१० |- | नको मज बिंदी {{gap}}{{gap}} नको तो चंद्रहार<br>पुरे एक अलंकार {{gap}}{{gap}} मंगळसूत्र || <br>{{gap}}२११ |- | दागिना मागत्यें {{gap}}{{gap}} एक आज तुम्हांपाशीं<br>जन्मोजन्मीं ठेवा {{gap}}{{gap}} दासीला या पायापाशी || <br>{{gap}}२१२ |- | दागिना मागत्यें {{gap}}{{gap}} कंथा नाहीं म्हणू नका<br>पत्नी प्रेमाची भुकेली {{gap}}{{gap}} नको तिला पैसा रुका || <br>{{gap}}२१३ |- | दागिना मागत्ये {{gap}}{{gap}} परस्त्रीला माना माता<br>कंथा आपण साधूं या {{gap}}{{gap}} संसारांत परमार्था || <br>{{gap}}२१४ |- | देशील रे देवा {{gap}}{{gap}} देशील तें थोडें<br>मी मागतें रोकडें {{gap}}{{gap}} हळदीकुंकू || <br>{{gap}}२१५ |- | पुतळ्यांची माळ {{gap}}{{gap}} पडते निऱ्यांवरी<br>कंथाच्या राज्यावरी {{gap}}{{gap}} उषाताई || <br>{{gap}}२१६<noinclude>{{nopt}} |} <br>{{gap}}स्त्रीजी... ११</noinclude> g5nbspm2qxzkn9m8hqvuph3dth7f2kn पान:स्त्री - जीवन.pdf/१७४ 104 109976 228734 2026-03-28T09:35:56Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228734 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६२ ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | आयुष्य मी चिंती {{gap}}{{gap}} सासुबाईच्या हो नीरीं<br>माझ्या कुंकवाची चिरी {{gap}}{{gap}} जन्मवेरी || <br>{{gap}}२१७ |- | देई देवा मज {{gap}}{{gap}} देशील तितुकें पुरे<br>अक्षय माझे चुडे {{gap}}{{gap}} जन्मवेरी || <br>{{gap}}२१८ |- | देई देवा मज {{gap}}{{gap}} संततीला सोनें<br>विश्रांतीला बाळ तान्हें {{gap}}{{gap}} मांडीवरी || <br>{{gap}}२१९ |- | देई देवा मज {{gap}}{{gap}} हळदीचें तेज<br>कुंकवाचें राज्य {{gap}}{{gap}} जन्मवेरी || <br>{{gap}}२२० |- | देवाच्या देऊळीं {{gap}}{{gap}} उभी मी जागत्यें<br>आयुष्य मागत्यें {{gap}}{{gap}} चुडेयांना || <br>{{gap}}२२१ |- | माझे हे की चुडे {{gap}}{{gap}} वज्री घडवीले<br>साक्ष ठेवीयेले {{gap}}{{gap}} चंद्रसूर्य || <br>{{gap}}२२२ |- | माझे हे की चुडे {{gap}}{{gap}} बत्तीस बंदांचे<br>तेतिस कोटी देवाजींचे {{gap}}{{gap}} आशीर्वाद || <br>{{gap}}२२३ |- | चुडेयांच्या बळें {{gap}}{{gap}} न भीं कवणाला<br>लंकेच्या रावणाला {{gap}}{{gap}} देईन जाप || <br>{{gap}}२२४ |- | माझे चुडेयांचें {{gap}}{{gap}} सोनें आहे सुरतेचें<br>वडिलांच्या पारखीचें {{gap}}{{gap}} दादारायांच्या || <br>{{gap}}२२५ |- | माझे चुडेयांचें {{gap}}{{gap}} सोनें बरफीची वडी<br>पारख्यांना शालजोडी {{gap}}{{gap}} बाप्पाजींना || <br>{{gap}}२२६ |- | सासुरवाशिणीचें {{gap}}{{gap}} तोंड दिसे हंसतमुख<br>तिला भ्रताराचें सुख {{gap}}{{gap}} उषाताईला || <br>{{gap}}२२७ |- | गळ्यांत मंगळसूत्र {{gap}}{{gap}} गळा दिसे तालेदार<br>कंथ तुझा सुभेदार {{gap}}{{gap}} उषाताई || <br>{{gap}}२२८ |- | काळी गळेसरी {{gap}}{{gap}} देवाने मला दिली<br>भूषणासाठी केली {{gap}}{{gap}} सोनीयाची || <br>{{gap}}२२९<noinclude>{{nopt}} |}</noinclude> 9u6aphse5rrkc84ghaop2g5y28lnhyz पान:स्त्री - जीवन.pdf/१७५ 104 109977 228735 2026-03-28T09:42:38Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228735 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १६३ }} {| |-</noinclude>{{nopt}} |- | आमच्या वैनीबाई {{gap}}{{gap}} गंगाबाई कोठे गेल्या<br>उन्हाने कोमेजल्या {{gap}}{{gap}} जाईजुई || <br>{{gap}}२३० |- | भोळा की भ्रतार {{gap}}{{gap}} माझ्या उषा ग बाईचा<br> तिनें पिंपळ दारींचा {{gap}}{{gap}} पूजीयेला || <br>{{gap}}२३१ |- | शेजी देई फूल {{gap}}{{gap}} सखी घाली ना केसांत<br>आपुल्या कंथाच्या {{gap}}{{gap}} नेऊन देतसे हातांत || <br>{{gap}}२३२ |- | शेजी देई फूल {{gap}}{{gap}} सजवाया वेणी<br>नेऊन देतसे {{gap}}{{gap}} निज कंथाला कामिनी || <br>{{gap}}२३३ |- | कंथ ग रुसला {{gap}}{{gap}} कशाने समजवावा<br>हातानें विडा द्यावा {{gap}}{{gap}} उषाताई || <br>{{gap}}२३४ |- | भ्रताराचा राग {{gap}}{{gap}} दुधासारखा उतूं गेला<br>हंसूनी शांत केला {{gap}}{{gap}} उषाताईनें || <br>{{gap}}२३५ |- | तोंडांत तोंड घाली {{gap}}{{gap}} राघूची लाल चोंच<br>आवडीची मैना तूंच {{gap}}{{gap}} उषाताई || <br>{{gap}}२३६ |- | तोंडांत तोंड घाली {{gap}}{{gap}} उषाबाई चेडी<br>आली राघवाची उडी {{gap}}{{gap}} दादारायांची || <br>{{gap}}२३७ |- | दादाराया घोड्यावर {{gap}}{{gap}} वयनीबाई माडीवरी<br>तेथून खूणा करी {{gap}}{{gap}} विड्यासाठी || <br>{{gap}}२३८ |- | तांबडे पागोटें {{gap}}{{gap}} बांधीतो सोडीतो<br>राणीला खुणावीतो {{gap}}{{gap}} दादाराया || <br>{{gap}}२३९ |- | माडीखाली माडी {{gap}}{{gap}} माडीखाली झरा<br>तेथें तोंड धुतो हिरा {{gap}}{{gap}} उषाताईचा || <br>{{gap}}२४० |- | माडीखाली माडी {{gap}}{{gap}} माडीला चंदन ताटल्या<br>तबकीं तुझ्या पाटल्या {{gap}}{{gap}} उषाताई || <br>{{gap}}२४१ |- | माडीखाली माडी {{gap}}{{gap}} माडीखाली शिडी<br>पुतळी आहे जाडी {{gap}}{{gap}} उषाताईची || <br>{{gap}}२४२<noinclude>{{nopt}} |}</noinclude> n307yha4bvk6vqwf12umj25e8bwvml2 पान:स्त्री - जीवन.pdf/२०६ 104 109978 228736 2026-03-28T09:43:44Z कल्पनाशक्ती 3813 /* मजकुराविना */ 228736 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude> 6pewiyyebyc8m42d8lu6xlv59f2mxdm पान:स्त्री - जीवन.pdf/२०५ 104 109979 228737 2026-03-28T09:44:02Z कल्पनाशक्ती 3813 /* मजकुराविना */ 228737 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude> 6pewiyyebyc8m42d8lu6xlv59f2mxdm पान:स्त्री - जीवन.pdf/२०४ 104 109980 228738 2026-03-28T09:51:21Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228738 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br> <center> {{xx-larger|{{bar|2}} '''प्रकाशित''' {{bar|2}}}}<br><br> '''जीवनाचा पाया<br>विवाहितांचे नंदनवन<br>स्त्रियांचे हक्क व सुधारणा<br>फासिझम<br>समाधीवरली फुलें<br>जलधारा<br>अविवाहितांचे प्रश्न<br> शोभा<br>मानलेली मुलें<br>{{bar|1}} आगामी {{bar|1}}<br>मंगळागौरीच्या रात्री<br>तीन प्रवासी<br>मुलांसाठीं फुलें'''<br><br>{{x-larger|'''प्रकाश मंडळ, पुणें २.'''}} <br><br><br>{{nop}}<noinclude></noinclude> lmkdgcn0zyivfzdt301f8k88bx64bj8 पान:स्त्री - जीवन.pdf/२०३ 104 109981 228739 2026-03-28T09:52:13Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ चवथें] सुखदुःखाचे अनुभव [१९१ माझे ओटीवर बुकांचें कीं ओझें वकील नांव तुझें अप्पाराया ५९४ चौपी माझें घर कितीदा काढू माझे भाग्यवंत दीर घरी आले ५९५ माझा नव्हे कोणी माझ्या बहि..." 228739 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ चवथें] सुखदुःखाचे अनुभव [१९१ माझे ओटीवर बुकांचें कीं ओझें वकील नांव तुझें अप्पाराया ५९४ चौपी माझें घर कितीदा काढू माझे भाग्यवंत दीर घरी आले ५९५ माझा नव्हे कोणी माझ्या बहिणी बाळेचा हिरा मोहनमाळेचा गोपूबाळ ५९६ माझा नव्हे कोणी माझ्या बहिणीचा होशी मला मावशी म्हणशी माझ्या ग घरांत माझ्या घराचें अभीष्ट नदीपलीकडे चंदूबाळा ५९७ सदा येती आप्त इष्ट चिंतितात ५९८ कोणाच्या मोच्या गायी आजोबा आजीबाई दान देती ५९९ नदी पलीकडे 1 कोणाची वांसरें तेथें तुझें ग सासरें चिठी बरोबर उषाताई ६०० आंग्रे द्या पाठवून उषाताईला ६०१ त्यांत ठेवावे लिहून लेकी झाल्या लोकी हातींचे काम घेती. लेकी झाल्या लेकुरवाळ्या देवाची देते वाणें सुना झाल्या लेकी मायबाईच्या ६०२ सुनांना आली न्हाणें आक्काबाई ६०३ नातवंडे पंतवंडे भरली ओसरी देवाची बैसली आजीबाई ६०४ नातवंडांची आजी पतवंडांना दूध पाजी दैवाची आहे माझी आजीबाई ६०५<noinclude></noinclude> 84e8g9bjmwh9t2tluaqfq1yyyn3v33f सदस्य चर्चा:Sonaljamdare123 3 109982 228740 2026-03-28T11:46:11Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 228740 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Sonaljamdare123}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १७:१६, २८ मार्च २०२६ (IST) q94j9wmq5a7im4lb7h4nf4ray3qng70