विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.46.0-wmf.22
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:Yugant.pdf/45
104
20208
228933
163317
2026-04-04T11:18:02Z
कल्पनाशक्ती
3813
228933
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{right|युगान्त / २५}}</noinclude>{{Block center|<poem><br><br><br>{{x-larger|'''दोन <br><br><br><br>गांधारी'''<ref><small>{{gap}}या लेखात आलेल्या गोष्टींपैकी फक्त खालील गोष्टी महाभारताच्या संशोधित आवृत्तीत आहे.<br>
१. नवरा आंधळा म्हणून गांधारीने डोळे बांधले, २. गांधारीला खूप मुले झाली, व ती सगळी युद्धात मेली, ३. गांधारी, धृतराष्ट्र व कुंती वणव्यात मेली.<br>
{{gap}}या लेखात दाखवल्याप्रमाणे या तिघांच्या बरोबर न मरता विदुर महाभारतात त्यांच्या आधीच मेलेला आहे.<br ></small></ref>}}<br><br><br><br></poem>}}
<big>१ -</big>
{{gap}}डोंगराळ प्रदेश संपून उत्तर-भारताचे न संपणारे, कंटाळवाणे, विस्तीर्ण मैदान लागले होते. मार्गातला अडथळा काय तो नद्यांचा, नाहीतर अधून-मधून लागणाऱ्या अरण्यांचा. कधी रथात बसून, मधूनमधून पायी, किंवा शिबिकेतून राजकन्येचा प्रवास चालला होता. तिच्याबरोबर सखी म्हणून तिच्यापेक्षा वयाने थोडी मोठी दासी होती. माहेर सोडताना राजकन्येची समजूत तिनेच घातली. नाना तऱ्हेच्या गोष्टी सांगून मार्गावरील रमणीय स्थळे दाखवून ती गांधारीचे चित्त प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करीत होती. घरची माणसे नव्हती, पण राजपुत्र शकुनी बरोबर आला होता. तोही बहिणीची<noinclude><hr>{{reflist}}</noinclude>
jogayuwyryfyy6hbvt7veyw3ayu226j
228934
228933
2026-04-04T11:19:40Z
कल्पनाशक्ती
3813
228934
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{right|युगान्त / २५}}</noinclude>{{Block center|<poem><br><br><br>{{x-larger|'''दोन <br><br><br><br>गांधारी'''<ref>{{gap}}या लेखात आलेल्या गोष्टींपैकी फक्त खालील गोष्टी महाभारताच्या संशोधित आवृत्तीत आहे.<br>१. नवरा आंधळा म्हणून गांधारीने डोळे बांधले, २. गांधारीला खूप मुले झाली, व ती सगळी युद्धात मेली, ३. गांधारी, धृतराष्ट्र व कुंती वणव्यात मेली.<br>{{gap}}या लेखात दाखवल्याप्रमाणे या तिघांच्या बरोबर न मरता विदुर महाभारतात त्यांच्या आधीच मेलेला आहे.</ref>}}<br><br><br><br></poem>}}
<big>१ -</big>
{{gap}}डोंगराळ प्रदेश संपून उत्तर-भारताचे न संपणारे, कंटाळवाणे, विस्तीर्ण मैदान लागले होते. मार्गातला अडथळा काय तो नद्यांचा, नाहीतर अधून-मधून लागणाऱ्या अरण्यांचा. कधी रथात बसून, मधूनमधून पायी, किंवा शिबिकेतून राजकन्येचा प्रवास चालला होता. तिच्याबरोबर सखी म्हणून तिच्यापेक्षा वयाने थोडी मोठी दासी होती. माहेर सोडताना राजकन्येची समजूत तिनेच घातली. नाना तऱ्हेच्या गोष्टी सांगून मार्गावरील रमणीय स्थळे दाखवून ती गांधारीचे चित्त प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करीत होती. घरची माणसे नव्हती, पण राजपुत्र शकुनी बरोबर आला होता. तोही बहिणीची<noinclude><hr>{{reflist}}</noinclude>
lm41o6dtgjwn72j92pkgjc26x51p0az
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/10
104
27554
228930
113955
2026-04-04T10:33:00Z
कल्पनाशक्ती
3813
228930
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Punekar Yashashree" /></noinclude>'''अनुक्रम'''<br><br>
'''* गुड मॉर्निग'''
१. सार्थकता/१५
२. चैतन्यरथातला बंडखोर आत्मा/१७
३. प्रस्तुत की अप्रस्तुत/१९
४. बिहारी सोशिकता२१
५. शहारणारे शहर/२३
६. मोलकरीण नव्हे ‘मोल' करी/२५
७. जाणीवांची आरसपाणी वर्तमानपत्रे/२७
८. घोडा आणि माणूस/२९
९. आज पहली तारीख है/३१
१०. कॉफी हाऊस/३३
११. साबरमती नहीं सब्र मति/३५
१२. वाचनवेडा राजाराम/३७
१३. तीन सार्वजनिक अण्णा/३९
१४. भाषा आणि व्यवहार/४१
१५. झाडू कामगार साहित्यिक/४३
१६. मलमपट्टी प्रशासन/४५
१७. आमचा काय गुन्हा?४७
१८. दुहेरी संवेदनेचे आव्हान/४९
१९. बंदीजन? नव्हे बंधुजन/५१
२०. आठवणींचे पाझर/५३
२१. गती, व्यस्तता की हव्यास व्यग्रता ?/५५
२२. सुरू जाहला लगबगीचा महिना/५७<noinclude></noinclude>
a1ab18sjtyxn8ttj9oyo3t6kvphvpeh
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/148
104
27692
228899
74965
2026-04-04T09:18:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228899
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br>
'''माणूस'''<br>
<br>{{gap}}माणूस हा मला नेहमी हिमनगासारखा वाटत आला आहे. दिसतो छोटा, असतो मोठा. माणूस जसा नि जितका असतो, त्यापेक्षा कमी दिसतो नि समजतो. मनुष्य संबंधातले सारे ताणतणाव निर्माण होतात, ते असण्या नि दिसण्याच्या गफलतीतून. माणसाचं असणं... त्याचा शोध, वेध घेऊ पहाल तर कठीण! माणूस एकच असतो पण समाजजीवनात त्याला संबंधपूर्ततेचा भाग म्हणून वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागतात. पुरुष हा मुलगा, बाप, काका, मामा, भाचा, पुतण्या, शिष्य, प्रियकर, नवरा, बॉस, नेता काहीही असतो. म्हणजे एकच पुरुष एका जन्मात असंख्य भूमिका निभावतो. तीच गोष्ट स्त्रीची. ती मुलगी, मावशी, आई, ताई, आत्या, शिष्या, सहकारी, सचिव, वरिष्ठ, नर्तकी, अभिनेत्री, वैज्ञानिक असू शकते. पुरुष किंवा स्त्री एक मनुष्य म्हणून किती चेहरे, मुखवटे घेऊन फिरत असतात. त्यामुळे, एक माणूस एकास प्रिय तर त्याचवेळी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस अप्रिय ठरतो. माहेरची मुलगी सासरी गेली की ती तिथे सून असते. माहेरी ती वळणाची असली तरी सासरच्यांच्या लेखी ती बिनवळणाची ठरू शकते. हे काय गौडबंगाल आहे माणसाचं? याचा शोध घेता लक्षात येतं की एकच माणूस अनेकांशी भूमिका, नाते, जबाबदारी, संबंध लक्षात घेऊन नटासारख्या भूमिका वठवत असतो. ते समाजाने त्याच्यावर लादलेलं पारंपरिक ओझं असतं. आपल्याकडे संबंधाच्या भूमिकांनुसार आपलं वागणं ठरतं. सारे प्रश्न त्यातूनच निर्माण होतात.<br>{{gap}}माणसाचं वागणं शोभादर्शकातल्या प्रतिमांसारखं असतं, असं मला वाटतं. म्हणजे एकाच वेळी शोभायमान परंतु भ्रामक, जागा बदलली की,<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१४७}}</noinclude>
ae96g3yynmpsc5br3xokuecmj1yka2d
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/149
104
27693
228900
74974
2026-04-04T09:21:21Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228900
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आकृती बदलणं जसं अटळ ठरतं तसं माणूस स्वभाव, वृत्ती, बोलणं, भूमिका, तत्त्वज्ञान बदलतो. बदलातली ही भ्रामकता माणसात स्वाभाविकच विसंगती निर्माण करते. तो दुसऱ्याकडून जे अपेक्षितो तसं दुसऱ्याशी तो वागतोच असे नाही. त्यामुळेच किंबहुना एकाच माणसाच्या स्वभावाची वर्णने अनेक. ते वर्णन अनुभव, प्रचीती, प्रत्ययांवर अवलंबून असते. घरी मुलांना अतिशय प्रेमळ वाटणारा बाप कार्यालयातील कर्मचारी तसेच सहका-यांना खाष्ट, कठोर वाटू शकतो. किंबहुना, एकच माणूस वेगवेगळ्या स्थळी, काळी, प्रसंगी भिन्न रूप, रंग, वृत्ती घेऊन वागतो आणि जगतो. माणूस समाजशील होण्यातून आलेलं हे परिवर्तन परंपरा म्हणून किंवा दायित्व म्हणून तो निभावत असतो. हे सारं त्याच्यासाठी अटळ होऊन जातं.<br>{{gap}}मग, प्रश्न असा पडतो की नेमका माणूस कळायचा तरी कसा? ते कळणं ही महाकठीण गोष्ट आहे खरी! माणसातील खऱ्याचा शोध ‘क्ष किरण' टाकले तरी लागणे अशक्य. कारण माणूस म्हणजे केवळ हाडामासाचा गोळा नाही. तसेच तो केवळ स्नायू व मज्जातंतूचा पुंजका नाही. त्याला कोणत्याही इतर सजीव प्राण्यापेक्षा दोन शक्ती अधिकच्या लाभल्या आहेत. एक विचार करण्याची शक्ती नि दुसरी त्याच्या मनात निर्माण होणारी भावना. भावना प्राण्यांना पण असतेच. परंतु, माणसाने तार्किक विकास घडवून आणला, त्यातून त्याने अनेक नवनव्या गोष्टींची निर्मिती केली आहे. त्यात संस्कृती ही सर्वांत मोठी गोष्ट त्याने साकारली आहे. प्राणिसंस्कृतीच्या रीतीभाती, सवयी आणि माणसाच्या रूढी, परंपरा, संबंध नाते यांच्या मूलभूत अंतर आहे. प्राण्यांमध्ये नर आणि मादी एवढेच नाते असते. माणसाने अपत्यजन्माच्या विकासात संबंधांना रुढी, परंपरांनी बांधून प्राण्याचा मनुष्य केला आहे. पण त्याच्यात झालेले बदल हे वरवरचे असल्याने त्याच्यात कधी कधी मूळ वृत्ती उफाळून येतातच. त्यामुळे, असे सांगितले गेले आहे की माणसांचे आंतरिक बदल महत्त्वाचे. आंतरिक वृत्ती, स्वभावाचे परिष्करण जो माणूस भूमिका, भान म्हणून स्वीकारतो, तो आत-बाहेर एक असतो. माणसाचं आत-बाहेर एक असणं आदर्श असलं तरी कठीण! ते अवघड आहे. आपल्यातला हिंस्त्रपणा त्याने मारला, त्यामुळे खरंच का माणूस अहिंसक झाला?<br>
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१४८}}</noinclude>
ezkbz0vwttgzzo3wlbfwpb8n5usxxi9
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/150
104
27694
228901
74981
2026-04-04T09:31:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228901
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br>
'''जगणं'''
<br>{{gap}}माझ्या लहानपणी व माझी मुले लहान असतानाही रडणं थांबविण्यासाठी कचकडी खुळखुळा होता. तो बाळाचे रडणे थांबवून त्याला हसरा करायचा. आता त्या खुळखुळ्याची जागा मोबाईलने घेतली आहे. कचकडी खुळखुळा बाळ लहान असेपर्यंत उपयोगी होता. मात्र, हा नवा खुळखुळा माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत हाती राहतोय, असं दिसतंय. कचकडी खुळखुळ्यात नाद निर्माण करणारे खडे भरलेले असायचे. मात्र, मोबाईलनामक खुळखुळ्यात नादाला लावणारे ॲप्स भरलेले असतात. लहानपणी हा खुळखुळा व्हिडिओ गेम्सचा नाद लावतो. ते गेम त्याला गाणी, गोष्टी, खेळ शिकवतात. थोडा मोठा झाल्यावर हा खुळखुळा त्याला फोन करायला शिकवतो. पाचवीत गेला की, तो व्हॉट्स ॲप वापरू लागतो. आठवीला गेला की, 'मिस कॉल' देऊ लागतो. अकरावीत व्हिडिओ क्लिप बघू आणि पाठवू लागतो. कॉलेजला गेली की, युवापिढी रात्र-रात्र जागून चॅट करू लागते. माणूस मिळवू लागला की, मग तोंड लपवून 'फेसबुक'वर बाता मारू लागतो. लग्न झाले की फेक अकाऊंटवरून हृदय नि मन मोकळं करत राहतो. कधी लाइक, कधी कॉमेंट असं व्यक्त-अव्यक्त आभासी जगात जगू लागतो. गुड मॉर्निग, गुड इव्हिनिंग, स्वीट ड्रीम्स, काँग्रेट्स करत लक्षात येतं की, हे सारं झूट! अवतीभवती संदेश, शुभेच्छा, सहवेदनांचा पाऊस; पण प्रत्यक्ष नक्षत्र मात्र कोरडेच! आभासी जगात वाढलेली पिढी कोरडे जग जगताना मी अनेकदा पाहतो.<br>{{gap}}या आभासी जगाने एक नवी संस्कृती जन्माला घातली आहे. या संस्कृतीचे भाकित ॲरिस्टॉटल यांनी केले होते. अगदी अलीकडेच बाबा<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१४९}}</noinclude>
ficxov1350ow1jhifki3k6l8h8ox023
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/151
104
27695
228902
74982
2026-04-04T09:34:22Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228902
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आमटेंनी ‘ज्वाला आणि फुले' मध्ये ते अधोरेखित केलं आहे. 'मे-फ्लाय संस्कृती' तिचे नाव! मे-फ्लाय ही उडत्या किड्यांची प्रजाती. माशी, नाकतोडा, टोळ, पंख मुंगी हे सारे या प्रजातीत मोडतात. मे-फ्लाय प्रवर्गातील एक किडा अल्पकालिक असतो म्हणे. त्याला तोंड व पोट नसते. असते फक्त विलासी इंद्रिय अन् तसलेच मनही! तो रक्तहीन असला तरी रतिप्रवीण असतो म्हणे. त्याचे आयुष्य चोवीस तासांचेही असत नाही. तीन तासांचे तारुण्य घेऊन जन्माला येणारा तो किडा फक्त पुनरूत्पादनासाठी जन्मतो. संभोग झाला की मरतो. एकदम 'सर्जिकल स्ट्राइक'च म्हणाना. संभोग जबरी असतो. त्यात शृंगारक्रिया असत नाही. जीवनास्वाद नसतो. असते ओरबाडणे, भोगणे, मरणे नि मारणे. जगणे नसतेच.<br>{{gap}}माणूस मे-फ्लाय होणे हे आभासी, चंगळवादी, भोगवादी जीवनशैलीचे अपत्य होय. तुम्ही ठरवायचे की, तुम्हाला एटीएम जन्माला घालायचे आहे की माणूस! माणूस जन्माला घालायचा असेल, घडवायचा असेल तर जरा हवा येऊ द्या. घरी माणसे, पै-पाहुणे आले पाहिजेत. ते राहिले पाहिजेत. तुम्हीही इतरांच्या घरी जात-येत रहा. गतीत ते शक्य नाही, याची मला जाणीव आहे; पण गतीत उसंत शोधा. उसंत स्वतःसाठी वापरू नका. निवांत म्हणजे स्मशान! आयुष्यात पाण्याचा खळखळाट ऐका.<br>{{gap}}वाचा, बोला, ऐका, लिहा, पाहा. नुसते आभासी संदेशन, प्रक्रिया, प्रतिसादांनी मिळणारे सुख, समाधान, शांती हीसुद्धा आभासी असते. स्वतःपलीकडचे जग उघड्या डोळ्यांनी पहा. मुलांचे एकारलेपण उन्हाळी शिबिरांसाठी केवळ पैसे मोजून भरून निघणार नाही. त्यासाठी त्यांना वेळ द्या. दिले की संपले, असे पालकपण कारखान्याच्या मालकासारखे असते. आव्हानांना सामोरे जाणारे जीवन प्रत्यक्ष जगा नि पाल्यांना जगू द्या.<br>{{gap}}खरे पाहिले तर खुळखुळा, मोबाईल हे सारे त्या त्या काळातले आभासी भावच! माणूस भावाचा भुकेला असतो. आभासी, भोगी संस्कृतीच्या जागी वास्तव, संवेदी, जिवाभावाची संस्कृती जपायची तर प्रसंगी जीव देऊन भाव, संबंध, नाते जपणे, जोपासणे म्हणजेच खरे जगणे!<br>
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१५०}}</noinclude>
j2zs7hptcq64dhgvsyf038xfbhj9n20
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/152
104
27696
228903
74986
2026-04-04T09:36:52Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228903
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br>
'''स्वातंत्र्य'''
<br>{{gap}}स्वातंत्र्य हे जीवनमूल्य आहे. ते राष्ट्र, मानव समाज अशा संघटित जीवनात जितके महत्त्वाचे, त्यापेक्षा व्यक्तिगत जीवनात त्याचे महत्त्व असाधारण! माणसाला उपजतच स्वातंत्र्य आवडते. अगदी लहान मुलांनाही. म्हणून तर आपण टीव्ही, व्हिडिओ गेम बंद करून अभ्यास कर म्हटले की त्याला राग येतो. मुले मोठी होऊ लागली की, मित्र-मैत्रिणी हे त्याचे स्वातंत्र्य असते. कारण तिथे त्यांना मन मोकळे करता येते. खरंतर मुलांना घरी मोकळा श्वास घेता आला पाहिजे. मुक्त संवाद करता आला पाहिजे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर यांची गोष्ट सांगितली जाते. अध्यक्ष झाल्यावरसुद्धा ते रविवारचे भोजन कुटुंबासमवेत घेत. त्या दिवशी घरचे सर्वजण उपस्थित असत. जेवणाच्या टेबलावर सर्व समान! अध्यक्ष झाल्यावर नातूसुद्धा त्यांना 'मिस्टर हॉवर' म्हणून बोलावत असे. आधी स्वातंत्र्य, समता, बंधुता घरात नांदली पाहिजे. नंतर ती समाज नि देशात पाझरायला हवी.<br>{{gap}}स्वातंत्र्याचा पायाच समानता आहे. घरातील स्त्री-पुरुष एकमेकांशी मनातलं बोलतात की औपचारिक संवाद राहतो, यावर घराचं घरपण अवलंबून असतं. आई-मुलगा, मुलगी-वडील, सासू-सून, मुलगी-सून हे दोन ध्रुव असतील तर तिथं स्वातंत्र्य, समता नसते. मग बंधुतेचा प्रश्नच निर्माण होत नाही. एका निबंधकाराने घराचं घरपण बोलणे, ऐकणे नि सहन करणे अशा तीन शब्दांवर टिकून असल्याचे लिहून ठेवले आहे. मनात येणारे विचार मोकळेपणाने व्यक्त करा; पण दुसऱ्यास दुखवू नका. दुसऱ्याचे उदारपणे ऐका. पटले नाही तर दुर्लक्ष करा. वरील दोन क्रियांमध्ये आपणाला<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१५१}}</noinclude>
rr0zhaml5788n640g021pcailxm9we9
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/153
104
27697
228904
74990
2026-04-04T09:41:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228904
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>दुसरा सहन करतो, स्वीकारतो, हे लक्षात ठेवून इतरांना सहन करा नि स्वीकारा. मग पहा, मतभेद राहिले तरी मनभेद नाही होत. तिथे शहाणपण, सामंजस्य, समन्वय नांदतो. मतभेदपूर्ण सहजीवन, सहअस्तित्व म्हणजे समाजशीलता होय.<br>{{gap}}स्वातंत्र्याची संकल्पना एकतर्फी असू शकत नाही. स्वातंत्र्य केवळ आपलं नि दुसऱ्याचं मानणं हा स्वार्थ झाला. सर्वांचे स्वातंत्र्य मानणे, म्हणजेच व्यापक उदारता. स्वातंत्र्य म्हणजे नुसता हक्क नाही, तर ते कर्तव्यही असते. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. तुम्हाला आविष्कार स्वातंत्र्य आहे; पण दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर ही त्याची पूर्वअट असते. नाही तर मग आपणास वेगवेगळ्या वनवासास तोंड द्यावे लागते. जगात सारे बदल व परिवर्तने ही स्वातंत्र्यापासून जन्माला आली आहेत. म्हणून स्वातंत्र्याचा संकोच हा निषेधार्ह ठरतो.<br>{{gap}}मी म्हणतो तेच खरे, अशी वृत्ती अहंकारातून जन्म घेते. प्रत्येकाचे स्वतःचे मत असते. सामाजिक जीवनात बहुमताला किंमत असते. शहाणा माणूस बहुमत प्रमाण मानून एकान्त पसंत करतो. ही एकप्रकारची समाजसहिष्णुताच असते. स्वातंत्र्य हा एकाधिकार नाही. स्वातंत्र्याची दुसरी बाजू म्हणजे समोरची व्यक्ती नि समाज. बऱ्याचदा घर, समाज, राष्ट्र आदींसंदर्भात कर्ता अधिकारी असतो. त्याला अधिकारपद लाभते ते कर्तव्य करतो म्हणून किंवा करेल म्हणून. बऱ्याचदा अधिकारपदी गफलत होते. कर्तव्यदक्ष असतानाही अन्य आकांक्षी कर्तव्यदक्षांबद्दल गैरसमज पसरवतो. सामाजिक मन माध्यमांवर स्वार असते. म्हणून माध्यमांचा विवेक आजच्या काळात महत्त्वाचा. आज जगभर सर्वाधिक नाजूक गोष्ट कोणती विचाराल तर त्याचे नाव स्वातंत्र्य! स्वातंत्र्य म्हणजे जुलूम नि गुलामीचा ऱ्हास. स्वातंत्र्य लाभायला हवे. लादलेले स्वातंत्र्य कोणतीच निर्मिती करू शकत नाही. निर्मितीशून्य स्वातंत्र्य हे अपराधभाव जन्माला घालते. स्वातंत्र्य म्हणजे स्वाभिमान प्रज्वलित करणारे स्फुल्लिंग होय. स्वातंत्र्यात भय, दरारा, दहशत असता कामा नये. स्वातंत्र्य ही दुसऱ्याच्या डोळ्यात पाहण्याची गोष्ट होय. दुसऱ्याच्या डोळ्यात तुमची प्रतिमा सहिष्णुतेची असेल तर समजावे, या जगात मुंगीलाही अभय आहे.<br>
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१५२}}</noinclude>
5h4n5y83edsk4y8f1wmmn3n7vlel2ek
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/154
104
27698
228905
75003
2026-04-04T09:43:51Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228905
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br>
'''देणान्याचे हात'''
<br>{{gap}}माणसाच्या ज्या मूलभूत वृत्ती आहेत, त्यात संग्रह एक आहे. मनुष्य भविष्याची गरज म्हणून जसा संग्रह करतो, तसा तो लोभामुळेही करतो. गरजेपेक्षा अधिक संग्रह समाजात विषमता निर्माण करतो. माणसं संग्रह करतात स्थावर, तर जंगम संपत्ती चंचल, गतिशील. गरजेपेक्षा अधिक संग्रह माणसाला चैन पडू देत नाही. संपत्तीचा विनियोग, उपभोग विवेकाने करणारी माणसं अतिरिक्त संपत्ती दान करतात. दान करण्यामागे दया, साहाय्य, पुण्य, उदारता असे अनेक भाव असतात. धर्मात दानाचे महत्त्व आहे. त्यामागे पुण्यप्राप्तीची आकांक्षा असते. अपेक्षेने केलेल्या दानाची किंमत शून्य असते. दान निरपेक्ष, निःस्वार्थ हवं. दानामागे परताव्याची अपेक्षा असता कामा नये. 'नेकी कर और समुंदर में डाल' इतकं ते निरिच्छ हवं.<br>{{gap}}दान त्याग असायला हवा. त्यागात गरज असताना साहाय्याची उदारता असते. त्यागपूर्ण दान श्रेष्ठ, शिवाय ते देव, धर्म, दैवादी भावनेपेक्षा समाजहितार्थ करणे अधिक महत्त्वाचे. मंदिराच्या जीर्णोद्धारापेक्षा जिवंत माणसाचा विकास केव्हाही श्रेष्ठ, दानाचे अनेक प्रकार आहेत. अन्नदान, धनदान, वस्त्रदान, नेत्रदान, रक्तदान, देहदान इत्यादी. सर्वांत श्रेष्ठ सर्वस्व दान. त्याला मोठी हिंमत लागते. तुम्ही 'स्व'चं विसर्जन करू शकाल, तेव्हाच ते शक्य आहे. संतपदास पोहोचण्याची ती कसोटी होय. मानवी जीवनात दानास इतके महत्त्व का? असा विचार करू लागाल तर लक्षात येईल की, माणूस सहसा कोणतीही गोष्ट सोडायला तयार होत नाही. सत्ता, संपत्ती, पद, अधिकार या अशा गोष्टी आहेत की, ज्या मोहात माणूस अडकतो. हवं असताना सोडणं हे प्रगल्भतेचे लक्षण, काळजी, गरज,<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१५३}}</noinclude>
4ta4si1iv82425e6tmjpyu8jvue2puq
228911
228905
2026-04-04T09:50:45Z
कल्पनाशक्ती
3813
228911
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br>
'''देणाऱ्याचे हात'''
<br>{{gap}}माणसाच्या ज्या मूलभूत वृत्ती आहेत, त्यात संग्रह एक आहे. मनुष्य भविष्याची गरज म्हणून जसा संग्रह करतो, तसा तो लोभामुळेही करतो. गरजेपेक्षा अधिक संग्रह समाजात विषमता निर्माण करतो. माणसं संग्रह करतात स्थावर, तर जंगम संपत्ती चंचल, गतिशील. गरजेपेक्षा अधिक संग्रह माणसाला चैन पडू देत नाही. संपत्तीचा विनियोग, उपभोग विवेकाने करणारी माणसं अतिरिक्त संपत्ती दान करतात. दान करण्यामागे दया, साहाय्य, पुण्य, उदारता असे अनेक भाव असतात. धर्मात दानाचे महत्त्व आहे. त्यामागे पुण्यप्राप्तीची आकांक्षा असते. अपेक्षेने केलेल्या दानाची किंमत शून्य असते. दान निरपेक्ष, निःस्वार्थ हवं. दानामागे परताव्याची अपेक्षा असता कामा नये. 'नेकी कर और समुंदर में डाल' इतकं ते निरिच्छ हवं.<br>{{gap}}दान त्याग असायला हवा. त्यागात गरज असताना साहाय्याची उदारता असते. त्यागपूर्ण दान श्रेष्ठ, शिवाय ते देव, धर्म, दैवादी भावनेपेक्षा समाजहितार्थ करणे अधिक महत्त्वाचे. मंदिराच्या जीर्णोद्धारापेक्षा जिवंत माणसाचा विकास केव्हाही श्रेष्ठ, दानाचे अनेक प्रकार आहेत. अन्नदान, धनदान, वस्त्रदान, नेत्रदान, रक्तदान, देहदान इत्यादी. सर्वांत श्रेष्ठ सर्वस्व दान. त्याला मोठी हिंमत लागते. तुम्ही 'स्व'चं विसर्जन करू शकाल, तेव्हाच ते शक्य आहे. संतपदास पोहोचण्याची ती कसोटी होय. मानवी जीवनात दानास इतके महत्त्व का? असा विचार करू लागाल तर लक्षात येईल की, माणूस सहसा कोणतीही गोष्ट सोडायला तयार होत नाही. सत्ता, संपत्ती, पद, अधिकार या अशा गोष्टी आहेत की, ज्या मोहात माणूस अडकतो. हवं असताना सोडणं हे प्रगल्भतेचे लक्षण, काळजी, गरज,<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१५३}}</noinclude>
ea8d2yzpql8p19utr5fq9keuxrxlzlz
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/155
104
27699
228906
75010
2026-04-04T09:46:09Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228906
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>जबाबदारी म्हणून संग्रह करणे शहाणपणाचे. तेच तत्त्व दानासही लागू आहे. दुसऱ्याची काळजी, गरज हे आपण आपले कर्तव्य मानतो का? यावरच माणूसपण अवलंबून असते.<br>{{gap}}असताना कोणीही दान करील. नसतानाही दान करता आलं पाहिजे. स्वतः भुकेला राहून कुणाची भूक भागवाल तर ते उच्चकोटीचे दान. अशा दानात परम संतोष भरलेला असतो. दुसऱ्याचं दुःख आपलं वाटणं म्हणजे संवेदनशीलता. ती उसनी नाही घेता वा आणता येत. ती असायला हवी नि असते. ती जाणीवेतून येते. 'चमडी देगा लेकिन दमडी नहीं,' म्हणणारी माणसं नुसती कंजूष असत नाहीत तर ती निष्ठुरही असतात. ती स्वतःच्या इच्छा, आकांक्षाचे बळी देऊन जे धन जोडतात, त्याचा पायाच मुळी हिंसक असतो. मग त्याची परिणतीही हिंसक होते.<br>{{gap}}तुम्ही दुसऱ्याला साधने देता तेव्हा तो काही मोठा दानधर्म असतो, असे नाही. तुमचे दातृत्व लोक गृहीत धरून काही सामाजिक संकल्प करत असतील, उपक्रम हाती घेत असतील तर दातृत्व तुमची वृत्ती झाली आहे, असे समजायला हरकत नाही. दुसऱ्याचे होणे हे स्वविसर्जन खरे उच्चकोटीचे दान. निसर्ग जसा असतो तसे माणसाने असायला हवे. 'देणाऱ्याचे हात' घेण्याची कल्पना हे जगातले सर्वोत्तम अनुकरण म्हणायला हवे. मिडास, कुबेर व्हायचं की कर्ण हे ठरवता आले पाहिजे. शत्रूवर हल्ला करताना आपण कदाचित मरू हे माहीत असूनही जो सैनिक प्राणाची बाजी लावतो, तो आपल्या जीवनाचा हेतूपूर्वक बळी देतो, म्हणून बलिदान श्रेष्ठ असते. अनाथ, अंध, अपंगांना दान चांगलेच पण, त्याहीपेक्षा त्यांना सनाथ करणे, प्रज्ञाचक्षु, दिव्यांग बनवणे लाख मोलाचे. ते केवळ देण्याने घडत नाही. ते होण्याने शक्य असते. आपणाला दुसऱ्याचं कोणी होता आलं तर समजावं, 'त्यांना जीवन कळले हो!' असं जीवनाचं आकलन होणं म्हणजे जीवन सार्थकी लागणं.<br>
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१५४}}</noinclude>
m6pa289favni308gz36h0heiel78in5
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/156
104
27700
228907
75016
2026-04-04T09:46:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228907
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br>
'''भारतीय असणं'''
<br>{{gap}}माणूस एखाद्या देशाचा नागरिक असतो म्हणजे काय? या प्रश्नाची चर्चा मी नेहमी हक्काच्या परिघात फिरताना अनुभवतो. हक्काच्या लढाईइतकीच कर्तव्य भावना महत्त्वाची. कारण भारतासारख्या खंडप्राय देशात तर कर्तव्यपरायणता अधिक महत्त्वाची. कारण भारत हा वैविध्यपूर्ण देश. ज्या देशात एकवंशी समाज असतो, तिथं त्या राष्ट्राचं एकात्म होणे भारताच्या तुलनेने सोपे असते. त्या राष्ट्रामध्येही छोटे छोटे भेद असतातच; पण भारतातील नागरिकत्वास वेगळे परिमाण आहे. हा देश आकारलाच मुळी विविध वंशांतून. निग्रो, पठण, द्रवीड, आर्य, ग्रीक, शक, हूण, कुशाण, कंगोल, मुस्लिम, तुर्क असे कितीतरी प्रकारचे, वंशाचे लोक भारतात आले. त्यांच्यात शतकानुशतके रोटी-बेटी व्यवहार होत राहिले. म्हणून भारतात स्थापना व विकासकाळापासून बहुवंशीय समाज दिसून येतो. बहुवंशातून बहुवर्ण साकारले. वर्णाचे जातीत रूपांतर झाले. आज आपल्या भारतीय समाजात विविध जाती, पोटजाती दिसतात त्याचे मूळ कारण आपलं बहुवंशीय असणे आहे. तीच गोष्ट धर्माची. हिंदू, मुस्लिम, जैन, बुद्ध, पारशी, शीख असे धर्मवैविध्यही इतिहासकाळापासून इथे नांदतेय. भाषा, संस्कृती, सण, दागिने, पोशाख, चालीरितींचे वैविध्य इथल्या आसेतू हिमालय पसरलेल्या निसर्गातून पाझरलंय. म्हणून इथे विविधतेतही एकता दिसून येते. इथली एकता सुरक्षित ठेवणं आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे.<br>{{gap}}भारतावर इतिहासकाळापासून अनेक स्वाच्या, आक्रमणं झाली. अनेकांनी हा देश विशिष्ट धर्म, संप्रदायाचा बनविण्याचे प्रयत्न केले; पण त्याला यश<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१५५}}</noinclude>
1tm52fitpwyewl46qdtu2y3tjjwlynq
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/157
104
27701
228908
75020
2026-04-04T09:47:51Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228908
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आले नाही. कारण दैनंदिन जीवनात जगत असताना इथले नागरिक बंधुता घेऊन जगतात. इथे गणेशोत्सव असो अथवा ईद हिंदू-मुस्लिम मिळून साजरे करतात. हे एकत्व खरं तर आपल्या भाषा, शिक्षण, साहित्यातून अधिक प्रकर्षाने व प्रगल्भपणे जोपासता येईल; पण आपण प्रांतवादाच्या संकीर्णतेमुळे त्याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणजे असे की, आपल्या प्रत्येक प्रांताच्या सीमेवर बहुभाषी, बहुलिपी, बहुसांस्कृतिक प्रांत असतात. आपण त्यांचा अभ्यास करायला हवा. आपण पर्यटक म्हणून भारतभ्रमण करतो; पण एक नागरिक म्हणून करतो का? गुजराथी, कन्नड, तेलगू, हिंदी या आपल्या भाषा भगिनी. त्यांचा अंतर्भाव आपल्या शिक्षणात व्हायला हवा. आपण राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची म्हणून भारतीय साहित्य, भारतीय भाषा, भारतीय लिपी, भारतीय संस्कृती असे विषय उच्च शिक्षणात समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, साहित्यशास्त्र यात आणले पाहिजेत. असे लोकशिक्षणच इथल्या संकीर्ण राजकारणास छेद देऊन भारत एकात्म करेल.<br>{{gap}}आपल्या देशातील अनेक राजकीय पक्ष, विचारधारा या भेदावर उभ्या असतानाही आपण आपल्या राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही ही मूल्ये का स्वीकारली तर त्यामागे देश एक ठेवण्याचे भान आहे. देशाचे पूर्वीचे नाव 'हिंदुस्तान' असताना आपण 'भारत' स्वीकारले. त्यामागेही सर्वसमावेशकता, सहिष्णुता, समन्वय वृत्ती आहे हे नागरिक म्हणून आपणाला विसरता येणार नाही. गोवंश पूजणारा नि गोमांस भक्षण करणारा समाज शतकांपासून इथे गुण्यागोविंदाने नांदतो. त्यामुळे शत्रू इथे येण्यास धजावत नाही. शाकाहार-मांसाहार,आर्य-अनार्य, काळे-गोरे, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत इथे सारखेच. म्हणून 'मेरा भारत महान!'<br>{{gap}}जर्मन कवी व नाटककार गटे जर्मन होते; पण कालिदासाचं 'शाकुंतल' नाटक त्यांनी वाचले होते. रवींद्रनाथ टागोर बंगाली; पण नरसी मेहता, सुब्रह्मण्यम भारती, तिरूवळ्ळूवर आदी कवींचे साहित्य, काव्य त्यांनी मुखोद्गत केले होते. आचार्य विनोबा भावे यांना अनेक भारतीय भाषा यायच्या. साने गुरुजींना म्हणून तर 'आंतरभारती' नि रवींद्रनाथांना 'विश्वभारती'चं स्वप्न पडलं होतं, ते भारतात राष्ट्रीय एकात्मता नांदावी म्हणूनच!<br>
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१५६}}</noinclude>
7w1u84pne94s0ukrqqegzvgt340sww1
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/158
104
27702
228909
75026
2026-04-04T09:48:41Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228909
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br>
'''विवेकबुद्धी'''
<br>{{gap}}हे काय प्रकरण आहे? ही क्षमता आहे, वृत्ती आहे, व्यवस्था आहे की काय आहे? सत्, असत्, विवेक नि बुद्धी अशा चार वेगवेगळ्या स्थिती, घटकांचा संयोग म्हणजे एक सार्वजनिक विचार, व्यवस्था होय. ती भूतकाळात होती, वर्तमानात आहे नि भविष्यातही राहील. विज्ञान अनेक चमत्कारिक शोध लावतो आहे. ते मनुष्यहितकारी असतात तोवर ठीक; पण अशी कल्पना करा की, मानवी कल्पात (क्लोन) फेरफार करून विज्ञानाने माणसाची मतीच गुंग करून टाकली तर? मग सत्, असत्, विवेक, बुद्धी हे सारे शब्द, त्यांचे अर्थ, संदर्भ मुळासकट संपून इतिहासजमा होतील ना? पण तसे काही होण्यापूर्वीच वर्तमानात एक चाणाक्ष यंत्रणा विज्ञानाच्या आधाराशिवाय असा कायाकल्प घडवून आणत असल्याचे लक्षात येते. या यंत्रणेचा लक्ष्य गट आहे बुद्धिवादी वर्ग. म्हणजे उदाहरणार्थ शिक्षक घेऊ, त्याला तुम्ही सेवाशाश्वती दिली की, तो स्वप्रज्ञ होतो. त्याला मत, मन, मनगट येतं. म्हणून मग काय करायचं तर त्याची शाश्वतीच हिरावून घ्यायची. शासन, संस्था, सत्ता अशा मोक्याच्या जागेवर बोक्यासारखं लक्ष ठेवून सतत ते सर्व आपल्या मुठीत राहील असं पाहायचं. सार्वजनिक पैसा, साधन, संपत्ती अगदी लोकशाही मार्गांनी अशी कवेत ठेवायची की, त्याने श्वासही आपल्याला विचारूनच घ्यायचा. सर्वत्र जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पाठीचा कणा नसलेले, मतांचा विकास होणार नाही असे लीन संप्रदायी समाज निर्माण करायचे. बाबावाद जसा डोळे मिटा, हात जोडा, नतमस्तक व्हा, विचार करायचे सोडा, फक्त मी तुमच्या ध्यानी, मनी, रंध्रा, श्वासात आहे असे कल्पा. स्वविसर्जन करा 'तो’ 'मीच' ओ<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१५७}}</noinclude>
2sbkggraasv7pddy98ncgaab1fv7nkn
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/159
104
27703
228910
75037
2026-04-04T09:49:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228910
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>माना... असं सांगत सद्सद्विवेकबुद्धी हिरावून घेऊन माणसास अस्तित्वहीन, सदाशरण करून टाकतात तसे वर्तमानात घडते आहे.<br>{{gap}}शिक्षण, प्रशासन, सहकार, माध्यम, बँक, उद्योग, व्यापार जिथे म्हणून विचार करून व्यवहार करायची शक्यता असते तिथे सत्यअसत्याशी मन केले ग्वाही, नाही मानियले बहुमता' असा स्वतंत्र विचार व कृती होणार नाही हे निरंतर डोळ्यात तेल घालून पाहिलं जाणं यासारखं मनुष्य विकास खुटविणारं दुसरं अस्त्र-शस्त्र नाही. ज्या देश, समाजात सार्वजनिक सत्ता, संपत्ती, साधनांवर अगदी वैध मार्गांनी एकाधिकार मिळवून व्यक्तिगत प्रतिष्ठा, वर्धन, प्रतिमापूजन होत राहणे हे काही समाजहिताचे असत नाही. सत्-असत्, न्याय-अन्याय, नैतिक-अनैतिक, विधी-निषेध यात तारतम्य नि विवेकाधारे फारकत करण्याचं स्वातंत्र्य असणं म्हणजे ती व्यवस्था अंतिमतः मनुष्य कल्याणकारी असणं होय. आपण इतिहासाच्या प्रवासात राजेशाही, हकूमशाही, सरंजामशाही, जमीनदारी नष्ट करून राजा जागी प्रजा आणली. याचा अर्थ बहुमत मान्यता व सन्मान आणला. जर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात घराणेशाहीमार्गे तेच जुने तंत्र येणार असेल तर तो प्रबोधनपर्वाचा पराभवच मानायला हवा.<br>{{gap}}आदर्श समाजरचनेत सर्वसामान्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीस शाबूत ठेवण्याचे आश्वासन असतं. तिथे मग सत् असत्मधून तर्क, विवेक, बुद्धीच्या आधार नि कसोट्यांवर निर्णय शक्यता निर्माण होते. 'माती जागवेल त्याला मत' अशी व्यवस्था असली की आत्महत्येची वेळ येत नाही. 'माझ्या मना बन दगड' असं बुद्धीजीवी वर्गाला वाटू लागणं म्हणजे विचारप्रक्रिया कुंठित होणं. 'मुठी वळू नका, मनगटे सरसावू नका' असे सांगितले जाऊ लागले की, समजावे 'मुकी बिचारी कुणी हाका'चा काळ येतो आहे. सामान्य माणसाचं मन प्रफुल्लित, आश्वासक राहणं हे। समाजजीवनात अत्याधिक महत्त्वाचं असतं. ते व्यापक हित धोरणातूनच शक्य असते. त्यासाठी समाजधुरीण, सत्ताधारी, साहित्यिक, संपादक, शिक्षक, कलाकार या सर्वांचा सद्सद्विवेक समानपणे जागृत व सक्रिय असणे तितकेच महत्त्वाचे असते.<br>
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१५८}}</noinclude>
hx2hvcp8enrzqy73sgmrhrjoull78ij
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/160
104
27704
228912
75043
2026-04-04T10:03:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228912
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br>
'''विश्वबंधुत्व'''
<br>{{gap}}मध्यंतरी माझ्या मोबाइलवर कुणीतरी इंग्लंडमधील मँचेस्टर एरिनापुढे झालेल्या मानवी बाँबहल्ल्याची क्लिप पाठविली होती. त्या हल्ल्यात दहशतवाद्यांसह २३ नागरिक मारले गेले. शंभर-सव्वाशे जखमी झाले. त्यानंतर काही दिवसांनी एका मुस्लिम युवकाने भर रस्त्यात उभे राहून छापडीवर (कार्डबोर्ड) फलक लिहून आवाहन केले होते, 'मी मुस्लिम आहे, मला आलिंगन द्या.' इंग्लंडमध्ये आलिंगन हा सद्भावाचा शिष्टाचार समजण्यात येतो. झालं असं की लोकांनी रांगा लावून त्याला आलिंगन दिलं. त्यात आबाल, वृद्ध, दिव्यांग, स्त्री-पुरुष होते. त्यात एक असा सद्गृहस्थही होता की त्याचा भाऊ या बाँब हल्ल्यात मृत झाला होता.<br>{{gap}}जर्मनची राजधानी बर्लिनमध्ये ख्रिश्चन प्रोटेस्टंट पंथाचे एक चर्च होते. सेंट योहान्स चर्च त्याचे नाव. नुकतीच त्या चर्चमध्ये एक मशीद सुरू करण्यात आली आहे. खरं वाटत नाही ना? कधी कधी सत्य कल्पनेपेक्षा सुंदर असते नि शिवही! विशेष म्हणजे त्यांचे जे नव्याने नामकरण करण्यात आलेले आहे ना ते आहे 'इब्न रश्द गोएथ' हे दोन विचारवंत, साहित्यिकांचं संयुक्त नाम होय. पैकी इब्न रश्द (१९२६-१९९८) हा स्पेनमध्ये जन्मलेला पाश्चात्य विचारवंत. धर्म व तत्त्वज्ञानाची सांगड त्यांनी घातली. दुहेरी सत्याचा सिद्धान्त मांडला. सत्य हे धार्मिक असते तसे तात्त्विकह. मुस्लिम असून त्यांनी कॅथलिक पंथीय धर्मविवेचन करून विश्वमान्यता मिळवली. योहान वॉल्फगाड् फॉन ग्यॉटड (१७५0-१८३२) त्याला आपण गटे म्हणून ओळखतो. हा जर्मन कवी, कादंबरीकार, संशोधक, प्रशासक, समीक्षक होता. 'फाऊस्ट' हे त्यांचं जर्मन महाकाव्यात्मक नाटक वैश्विक साहित्यकृती म्हणून प्रसिद्ध आहे.{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१५९}}</noinclude>
o6ouzz0cj05u3pn6qjsyrgiee5td9c0
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/161
104
27705
228913
75048
2026-04-04T10:07:01Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228913
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}गोव्याचे एक प्रसिद्ध भाषांतरकार ८२ वर्षांचे सुरेशबाबा गुंडू आमोणकर. कोकणी भाषेत ते हिंदू-ख्रिस्ती धर्माचे व इंग्रजी, संस्कृत, मराठी, कोंकणीचे समन्वयक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी फादर स्टीफन कृत 'ख्रिस्तपुराण' चा नुकताच कोंकणीमध्ये अनुवाद केला आहे. त्याची पृष्ठे १०७० आणि वजन सहा किलो. यापूर्वी त्यांनी धम्मपद, श्रीमद् भागवत, तिरुकुळ्ळकर, झेन कथा, जपुजी साहब अशा बौद्ध, हिंदू, शीख धर्मग्रंथांची तसेच तमीळ, चिनी साहित्याची कोंकणीमध्ये भाषांतरे केली आहेत.<br>{{gap}}जग हे निसर्गाचे प्रतिबिंब आहे. निसर्ग हा अनेक रंगांनी भरलेला म्हणून इथली प्राणिसृष्टी बहढंगी. इथे डायनासोर-अमिबा असतो नि हत्ती-मुंगीपण! इथे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अस पंचतत्त्व मीलन पाषाण युगापासून नातं आहे. दिवस-रात्र षड्ऋतू यांचा जीवनक्रम अद्याप कोणी बदलू शकला नाही. म्हणून जगात सांस्कृतिक वैविध्य दिसून येते. मानववंशशास्त्र असे सांगते की वंश-वैविध्य हे निसर्ग प्रभावी परिमाण नि परिणाम होय. भाषा, रंग, रूप, सण, रूढी, परंपरा वैविध्य म्हणून जग सुंदर! या सुंदर जगास आपल्या लहरींनी एकरंगी, एकदंगी करण्याचे प्रयत्न इतिहासात कमी का झाले? तलवारीच्या बळावर सारं जग इस्लामी बनवण्याची आकांक्षा इथे हरली. धर्मातरांनी सर्व जग ख्रिश्चन करण्याचे मनसुबे ब्रिटिशांना मनातल्या मनात गिळावे लागले. भारताचा परत हिंदुस्थान' करण्याचे मनोरथ हा या क्रमाचाच भाग असला तरी भारत हा पूर्वापार बहुधर्मीय, बहुवंशीय, बहुसांस्कृतिक देश राहिला आहे. तो पूर्वीपासून इथल्या उपजत संपन्नतेमुळे ह्युआन सांगचं जसं आकर्षण होता, वास्को-डी-गामाला पडलेली भारताची भुरळही तशीच होती. फ्रान्समध्ये नुसती ट्युलीपची फुलं नि भारतात फक्त कमळ फुलेल, असं होणार नाही. चीनचं आकाश पिवळे नि पाकिस्तानचं हिरवं असं नाही घडणार. जोवर माणूस 'माणूस' राहील तोवर त्याला विश्वबंधुत्व, सहअस्तित्व, समन्वय, सहिष्णुता यांची तहान व ओढ लागणारच आणि ती कोणी थांबवू शकणार नाही, कारण तिचा उगम निसर्गाच्या वैविध्यात आहे.<br>
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१६०}}</noinclude>
j48twlx1p0abk7pdycnpmnpu7pdookg
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/162
104
27706
228914
75054
2026-04-04T10:08:00Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228914
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br>
'''कर के देखो...'''
<br>{{gap}}मानवी उत्क्रांतीच्या काळात आपली शेपूट झडून गेली. त्यामुळे जात झडून जाणे सहजशक्य आहे, असे मला वाटते. जात निर्मूलनाबाबत आपण गंभीर असू तर छोट्या छोट्या कृती करणे शक्य आहे. नव्या पिढीच्या नोंदी जात रकाना काढून टाकणे, रकाना पाहिला तर तिथे 'मनुष्य' अशी नोंद करणे. याचाच विस्तार करून ‘मानव धर्म' लिहून पूर्ण करणे उचित ठरेल. कोणत्याही व्यापक बदलाची सुरुवात अभिलेख नोंद असते. मग जेवढे जातीय परिघातले व्यवहार टाळणे म्हणजे अस्पृश्यता न मानणे, जातीत विवाह न करणे, जातीय संघटनांचे सदस्य न होणे, आंतरराष्ट्रीय, आंतरधर्मीय, आंतरप्रांतीय व्यवहार समर्थन व सकारात्मक कृती करणे, आपले विवाह आंतरव्यवहारी होतील असे पाहणे. रोटी-बेटी व्यवहारातूनच जात, धर्म निर्मूलन शक्य आहे.<br>{{gap}}आपण व आपला व्यवहार जातीय होतो का ते पाहायच्या छोट्या छोट्या कसोट्या आहेत. तुम्ही जातीय कर्मकांड मिरवता का? तिला धर्मीय जोड असते का? जाती, धर्माची चिन्हे, प्रतिके आपण गळ्यात, मनात मिरवतो का? जात, धर्म विशिष्ट समाजातच तुमचा वावर असतो का? तुमचे निवासस्थान जातीय वा धार्मिक विशेष वसाहतीत आहे का? पूर्वापार असणे, वडिलार्जित असणे भाग अलाहिदा, निवडीत स्वातंत्र्य असते तेव्हा आपण व्यापकता, उदारता दाखवतो, पाळतो का? आपल्या रोजच्या संपर्क, संवादात आपण भिन्न जात, धर्म, लिंग, भाषा, प्रांत कसोटीवर बहुभाषी, बहसांस्कृतिक, बहप्रांतीय भान बाळगतो का? त्यांची आणखी चपखल रोजच्या कृतीतील गोष्ट तपासायची, पडताळायची म्हणजे<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१६१}}</noinclude>
2s6xrebhzfyhd5uhsng5b1gnv9ebz8s
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/163
104
27707
228915
75057
2026-04-04T10:08:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228915
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आपल्या मोबाइल्सवरील कॉन्टॅक्टस्, मेसेज, चॅट्स तपासून पहा. काँटॅक्टमध्ये किती विभिन्न जात, धर्मीयांशी आपला संपर्क, संवाद असतो वा संदेशन, संप्रेषण असते? आपण जात, धर्म पुरस्कार करणाच्या पोस्ट लाइक करतो का कमेंट देतो? त्यावरूनही आपण जातीय, धर्मीय आहोत का लक्षात येते.<br>{{gap}}‘जात नाही ती जात' अशी व्याख्या करणारे जात समर्थकच मानायला हवेत. ‘जात जाऊ शकते' मानणारे उदारमतवादी, मानवतावादी, वैश्विक मानायला हवेत. जातभेद भारतातच आहेत. अन्यत्र वंशभेद, धर्मभेद आहेत. तिथे अनेक सकारात्मक कृतीतून यावर त्यांनी विजय मिळवला आहे. आपणही आरक्षण, अल्पसंख्य विकास आदीमधून तशी सकारात्मकता दाखवतो आहोत. त्याला आपण घटनात्मक दर्जाही बहाल केला आहे. मध्यंतरी भारत सरकारने गॅसवरील सबसिडी स्वेच्छेने सोडण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देणारे भारतीय अनेक कोटी निघाले. भारतीयांची ही सकारात्मक कृती म्हणजे सामाजिक, न्याय व परिवर्तनाच्या दृष्टीने उचललेले स्वेच्छा पाऊलच होते. शांत क्रांती बदलांच्या पावलांसारखी अदृश्य; पण परिणामकारक असते. जनांच्या प्रवाहाचा विचार न करता नेहमी प्रवाहाविरुद्ध पोहण्यातूनच नव्या समाजसुधारणा घडत आल्या आहेत. तसे मग स्वेच्छा जात-त्याग हा उपायही प्रभावी ठरू शकतो. जात । सापशिडीसारखी असते. ती कधी तुमचा विकास करते, तर कधी घात. जातीचे फासे नेहमी विधायकच पडतात हा गैरसमज आहे. तिचे तोटेच अधिक.<br>{{gap}}माणुसकीचा व्यवहार जातीपलीकडचा असतो. म्हणून कबीरदासांनी लिहून ठेवले आहे की, “जाति न पुछो साधू की, पूछ लीजियो ज्ञान.' सभ्य माणसाची ओळख जातीवरून करण्यापेक्षा त्याच्या ज्ञान, सभ्यता, चारित्र्यावरून व्हायला हवी. या अशा गोष्टी आहेत की, त्रिकालाबाधित. ज्ञान देऊन संपत नाही, सभ्यता दाखवून कमी होत नाही. चारित्र्यासारखा पारदर्शी दुसरा गुण नाही. म्हणून म्हणतो जात सोडून, वजा करून, जगून तर पहा. लक्षात येईल, तो एक टॅबू आहे, टॅग आहे, ट्रेडमार्क नक्की नाही. सोडून पहा. जात झडून जाणे शक्य आहे... कर के देखो...!<br>
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१६२}}</noinclude>
o9fwbm0u7d6b2yzekx746ddsbn3p593
228916
228915
2026-04-04T10:10:09Z
कल्पनाशक्ती
3813
228916
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आपल्या मोबाइल्सवरील कॉन्टॅक्टस्, मेसेज, चॅट्स तपासून पहा. काँटॅक्टमध्ये किती विभिन्न जात, धर्मीयांशी आपला संपर्क, संवाद असतो वा संदेशन, संप्रेषण असते? आपण जात, धर्म पुरस्कार करणाच्या पोस्ट लाइक करतो का कमेंट देतो? त्यावरूनही आपण जातीय, धर्मीय आहोत का लक्षात येते.<br>{{gap}}'जात नाही ती जात' अशी व्याख्या करणारे जात समर्थकच मानायला हवेत. 'जात जाऊ शकते' मानणारे उदारमतवादी, मानवतावादी, वैश्विक मानायला हवेत. जातभेद भारतातच आहेत. अन्यत्र वंशभेद, धर्मभेद आहेत. तिथे अनेक सकारात्मक कृतीतून यावर त्यांनी विजय मिळवला आहे. आपणही आरक्षण, अल्पसंख्य विकास आदीमधून तशी सकारात्मकता दाखवतो आहोत. त्याला आपण घटनात्मक दर्जाही बहाल केला आहे. मध्यंतरी भारत सरकारने गॅसवरील सबसिडी स्वेच्छेने सोडण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देणारे भारतीय अनेक कोटी निघाले. भारतीयांची ही सकारात्मक कृती म्हणजे सामाजिक, न्याय व परिवर्तनाच्या दृष्टीने उचललेले स्वेच्छा पाऊलच होते. शांत क्रांती बदलांच्या पावलांसारखी अदृश्य; पण परिणामकारक असते. जनांच्या प्रवाहाचा विचार न करता नेहमी प्रवाहाविरुद्ध पोहण्यातूनच नव्या समाजसुधारणा घडत आल्या आहेत. तसे मग स्वेच्छा जात-त्याग हा उपायही प्रभावी ठरू शकतो. जात सापशिडीसारखी असते. ती कधी तुमचा विकास करते, तर कधी घात. जातीचे फासे नेहमी विधायकच पडतात हा गैरसमज आहे. तिचे तोटेच अधिक.<br>{{gap}}माणुसकीचा व्यवहार जातीपलीकडचा असतो. म्हणून कबीरदासांनी लिहून ठेवले आहे की, 'जाति न पुछो साधू की, पूछ लीजियो ज्ञान.' सभ्य माणसाची ओळख जातीवरून करण्यापेक्षा त्याच्या ज्ञान, सभ्यता, चारित्र्यावरून व्हायला हवी. या अशा गोष्टी आहेत की, त्रिकालाबाधित. ज्ञान देऊन संपत नाही, सभ्यता दाखवून कमी होत नाही. चारित्र्यासारखा पारदर्शी दुसरा गुण नाही. म्हणून म्हणतो जात सोडून, वजा करून, जगून तर पहा. लक्षात येईल, तो एक टॅबू आहे, टॅग आहे, ट्रेडमार्क नक्की नाही. सोडून पहा. जात झडून जाणे शक्य आहे... कर के देखो...!<br>
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१६२}}</noinclude>
6wp9x0jmn6fdbb09fem1nbpi3owbmjx
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/164
104
27708
228917
75063
2026-04-04T10:11:36Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228917
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br>
'''लीन संप्रदाय'''
<br>{{gap}}मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत, शिकत, स्वावलंबी झालो. या प्रवासात अनेकांचे साहाय्य झाले. त्यांच्याबद्दल माझ्या मनात निरंतर कृतज्ञतेचा भाव होता नि आहे. पण मी असे अनुभवले आहे की, प्रतिकूल परिस्थितीत साहाय्य करणारी माणसं ते निरपेक्षपणे करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात.<br>{{gap}}अलीकडे मी काय पाहतो, तर नोकरदार दिवसेंदिवस दीन होताहेत. कारखाने, बँका, उद्योग, व्यापारात हे मी समजू शकतोद्धपण त्याहीपेक्षा गैर मला सार्वजनिक पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत अस्वस्थ करतो. 'शिक्षकदिनी संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यांपर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून आम्ही सर्वांचा सत्कार करतो!' असे सांगून शिक्षक दिनी एका संस्थेने मला व्याख्यानाला आमंत्रित केले; पण मी तेथे काय पाहिले तर एक छापील प्रमाणपत्र व फूल अध्यक्षांच्या हस्ते सर्वांना दिले. संस्थेचे अध्यक्ष असल्याने प्रचार्यांपासून शिपायापर्यंत सर्वजण अध्यक्षांच्या पुढे नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.<br>{{gap}}समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. सहकारी साखर कारखाने, डेअरी, बँका, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे सर्वत्र हा सार्वजनिक सोपस्कार बनत त्याचे रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१६३}}</noinclude>
hlrzleoe1w3m7ogqkslhbedwdrs8rg2
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/165
104
27709
228918
75069
2026-04-04T10:13:29Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228918
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>नाम्या' असं जीर्ण त्यांनी आयुष्यभर जगायचं. काडीचं कर्तृत्व नसताना संस्थापकांचा, अध्यक्षांचा नातू, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर दुसरीकडे शिपाई, लिपिक, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.<br>{{gap}}विशेषतः समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं या समाजाला जागतिकीकरणाने दिलेला अभिशाप आहे. माध्यमातील नोकरदारही याला अपवाद राहिलेले नाहीत. समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिमंद व मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यांसारखे सामाजिक अधःपतन दुसरे कोणते असू शकते? सध्या सर्वत्र लीन संप्रदाय वाढतो आहे. तो सामाजिक, सार्वत्रिक, सांसर्गिक प्रादुर्भाव वाटावा इतका त्याचा झपाट्याने प्रसार होतो आहे. त्यात खेदाची बाब म्हणजे, हा सारा खटाटोप सार्वजनिक साधनसंपत्तीच्या बळावर व्यक्तिप्रतिष्ठा जोपासण्याकामी खर्च पडतोय.<br>{{gap}}यासाठी जनजागृती, जनसंगठन, जनमतसंग्रह आदी उपायांची चर्चा कालौघात होईलच; पण याला हस्तक्षेप म्हणून त्वरित व्यवस्था बदलाच्या दृष्टीने समाजमनाने अंतर्मुख होऊन सक्रिय व्हायला हवे. समाजजीवनात विश्वस्तवृत्तीचा विकास होणे हा त्यावरचा खरा उपाय आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक सर्वच क्षेत्रांत सर्वोच्चपदी जाणारी व्यक्ती 'इदं न मम' म्हणणारी असेल तर 'मी तो भारवाही हमाल' अशी निरीच्छता त्याच्या ठायी येणार; पण त्यासाठी मोठ्या मूल्यसंस्कार व नैतिक पाठराखणीची गरज असते. मार्क्सवाद काय नि गांधीवाद काय, विचार म्हणून सर्वच वाद आदर्श असतात; पण वादाची सत्ता आली की, वादी विश्वस्त न राहता सत्ताधारी बनतात. यासाठी माणसाची जडणघडण महत्त्वाची. बुद्धीप्रामाण्य नागरिकांची निर्मिती शिक्षण व संस्कारातून होते. त्यासाठी घर, समाज, गाव, राज्य, राष्ट्र अशा सर्वच स्तरांवर त्याविषयीची भावसाक्षरता आणि संवेदनासूचकांक जपणे हे खरे लोकशिक्षण होय. त्यासाठी स्वतंत्र माणसाची घडण हे उद्दिष्ट हवे.<br>{{gap}}'पेड-पौधे है बहुत बौने (बुटके) तुम्हारे, रास्तों में एक भी बरगद (वड) नहीं है।'<br>{{gap}}कवी दुष्यंत कुमारांच्या या ओळी उगीचंच आठवत राहतात नि अस्वस्थता वाढत राहते.<br>
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१६४}}</noinclude>
suqsfrzjtpv7l9yt6eyv36ff0if1sth
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/166
104
27710
228919
75075
2026-04-04T10:15:32Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228919
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br>
'''स्वर्ग हवा तर'''
<br>{{gap}}माझ्या निरीक्षणातील भारतीय मी नोंदवत आहे. हे सर्वसाधारण भारतीय होत. यातील प्रत्येक प्रकारात सन्माननीय अपवाद आहेत, याची मला पूर्ण कल्पना आहे. आपणास रस्त्यात पडलेला रुपया ओलांडून जाता येत नाही. आपण तो बिनदिक्कतपणे इकडे तिकडे न पाहता उचलतो. आपणास सार्वजनिक जीवनात शिस्त पाळणे जीवावर येते. ट्राफिक सिग्नल असलेल्या चौकात आपण किती उतावीळ असतो! समोरचा नियम पाळणारा असेल तर चक्क हॉर्न वाजवून त्यालाही नियम मोडायला भाग पाडतो. ओळ पाळणे आपणास कमीपणाचे वाटते. म्हणून जिथे ओळ असते, तिथे घुसखोरी अगदी होतेच होते. शिक्षणाचा व आपल्या जगण्याचा संबंध कमी. शिक्षण आपल्या लेखी मिळकतीचे साधन व माध्यम! घरी पुस्तके अपवादानेच. घर म्हणजे भौतिक संपन्न वस्तू व साधनांचे संग्रहालय, वेळेचा अपव्यय करावा तर तो आपणच. तासन्तास गप्पा, टीव्ही पाहणे, भटकणे, चैन करणे यात आपणास काही गैर वाटत नाही.<br>{{gap}}पैसे घेऊन मतदान करणे तर अनेकांची वृत्तीच होऊन गेली आहे. कार्यालयातले कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होणार नाही, याची आपणास खात्री असल्याने लाच देणे, घेणे हा गुन्हा न वाटता तो आपल्याला शिष्टाचार वाटतो. पेट्रोल पंपावर आपण जितके पैसे मोजतो, तितके पेट्रोल आपल्याला बहुतेकदा मिळतच नाही आणि आपण तसा आग्रहसुद्धा धरत नाही.<br>{{gap}}बऱ्याचदा रिक्षावाले मीटरपेक्षा अधिक पैसे मागतात नि आपण देतो. 'अडला नारायण' म्हणून आपला व्यवहार पदोपदी. 'परस्त्री मातेसमान' हा<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१६५}}</noinclude>
i8mncgm3woozn4bllrx2e6vjiwkvvl2
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/167
104
27711
228920
76467
2026-04-04T10:16:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228920
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आपला आदर्श दुसऱ्याकडून पाळला जावा, अशी आपली अपेक्षा असते. आपण स्वतः कोरडा पाषाण. आपल्यासारखे स्थितिस्थापक आपणच. सिंगापूरला गेलो की शिस्तबद्ध, मुंबईत पाऊल ठेवताच मूळ भारतीय. स्वच्छता दुसऱ्याने पाळावी. आपण सालं, कपटे, कचरा, बडके गुपचूप टाकतो. ते 'चलता है' म्हणून. कर भरणे हा आपणास तोटा वाटतो. चुकवणे म्हणजे मिळवणे हे आपले जीवन तत्त्वज्ञान व ध्येयही!<br>{{gap}}कामात कुचराई आपल्या दृष्टीने क्षम्य; पण दुसऱ्याने केली की, आपण तडक फाशीची भाषा वापरतो. स्वजातीचा वृथा अभिमान व परजातीची असूया आपल्यात मुरलेलीच म्हणायची. तीच गोष्ट धर्माची. दया, क्षमा, शांती म्हणजे बुळेपणा आणि अरेरावी, दांडगाई म्हणजे पुरुषार्थ, असे आपण मानतो. मी म्हणजे कोण, दुसरा 'किस झाड की पत्ती!' वाचाळता आपला स्थायिभाव. कृतिशीलता अपवादाने! आपण दाखवतो। तसे नसतो. जे असतो ते जगास दिसत नाही म्हणून बरे! 'एकमेकां साह्य करू' आपणास तोंडपाठ असते. पण अपघात दिसताच आपण पळ काढतो. खरे संवेदनशीलच मदतशील असतात. जिवाभावचे नाते, जगणे, ते अल्पशिक्षित अधिक जगतात. शिक्षित आत्मकेंद्री, स्वार्थी अधिक.<br>{{gap}}आता पुरुषाने बाळाला जन्म दिला म्हणजे निसर्गचक्र बदलले हे नक्की झालं. निसर्ग हरला, माणूस जिंकला! आता कोणताही शोध लागणे सहज शक्य. म्हणजे असे की, आपल्या मनात काय आहे ते पडद्यावर दिसू शकेल. मनात आणायचा अवकाश! पण काही गोष्टी अशक्य नसल्या तरी अवघड होत जातील. म्हणजे माणूस सत्शील राहणे, सदाचारी होणे, बुद्धिप्रमाण वागणे, दैववादी न होणे, विवेक व विज्ञानाच्या कसोटीवर जगणे आदी. त्या सर्व गोष्टी सोप्या नि सहज करायचा एकच उपाय आहे. जे विधायक, हितकारी, वैध आहे असे आपण शिकतो, जाणतो ते आचरणात आणू. दुसरा काय करतो, याचा विचार न करता आपले आचरण दुसन्यास अनुकरणीय वाटावे, असे वागू. आपल्या नैतिक कसोटीवर दृढ राह. पहा, एक दिवस असा येईल, लोक म्हणतील, अरे सत्ययुग आले तर. आपली जन्मभूमी स्वर्ग झाल्याचा आनंद मिळवायचा असेल तर स्वतःच सत्यवान झाले पाहिजे नि सावित्रीपण!<br>
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१६६}}</noinclude>
gssl25n8agpa4lg9m1pfyiz27qov4x1
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/168
104
27712
228921
76483
2026-04-04T10:17:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228921
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br>
'''संस्कृती, सभ्यता'''<br>
{{gap}}संस्कृती आणि सभ्यता हे शब्द मानवी समाजात खरेतर एक दुसऱ्याचे पर्यायवाची होते; पण आज ते विरुद्धार्थी म्हणून वापरले जात आहेत. संस्कृती म्हणजे मानवी समाजाची जीवनपद्धती होय. संस्कृतीत शिष्टाचार, पोशाख, खानपान, भाषा, साहित्य, विचार, धर्म, तत्त्वज्ञान, कर्मकांड, कायदे, कला यांचा संगम असतो. या सर्व गोष्टी ज्या काळात संस्कृतीत आदर्शवत असतात, तेव्हा सभ्यता अस्तित्वात असते. कालपरत्वे संस्कृतीत बदल होतात. 'जुनं ते सोनं' हे तत्त्व सर्व बाबतीत लागू नसतं. माणूस समज नि अनुभवाने समृद्ध होतो तसतसा तो सुधारतो, आधुनिक होतो.<br>
{{gap}}सिंधू, हडप्पापासून ते आजच्या जागतिकीकरणापर्यंतच्या संस्कृतीचा प्रवास पाहता काय दिसते? पूर्वी संस्कृती एका छोट्या प्रदेशावर साम्राज्य करायी. आज ती जगावर राज्य करायला निघाली आहे. पूर्वी राष्ट्राराष्ट्रांच्या संस्कृती भिन्न असत. आज संपर्कसाधने, तंत्रज्ञान, उद्योग-व्यापारांचे महत्त्वाकांक्षी वाढते साम्राज्य यामुळे पूर्वीच्या व्यापक संस्कृती लयाला जाऊन छोट्या-छोट्या संस्कृती उदयास आल्या. त्या स्वार्थ नि अर्थ या दोन खांबावर उभ्या आहेत. आदिवासी संस्कृती आजही काही प्रदेशांत तग धरून आहे. जल, जमीन, जंगल हेच तिचे स्थावर-जंगम होते. मग भाषा नि साहित्याने तिच्यावर आक्रमण केले आणि लोकसंस्कृती निर्माण झाली. तिचे रूपांतर नागर संस्कृतीत झाले. त्यातून महानगरी संस्कृती उदयाला आली. ती जागतिकीकरणाचे अपत्य होय. या संस्कृतीने स्वतःची शिष्टता, शिक्षण, तंत्र, रहिवास विकसित केला तो बुद्धीच्या आधारे, कमी श्रमात अधिक लाभ उकळायच्या शहाणपणाच्या जोरावर. ते शहाणपण बाह्य<noinclude>{{center |जाणिवांची आरास/१६७}}</noinclude>
cp8m71g77d3up37oet7o8su6mzvswvh
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/169
104
27713
228922
76488
2026-04-04T10:18:05Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228922
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>प्रभावी व आतून पोखरलेले असते, हे आता कालौघात लक्षात येऊ लागले आहे. ती अभिजात संस्कृती पूर्वीही नव्हती, आजही नाही. केवळ बहुजन नव्हे तर सर्वजन हितकारी संस्कृती खरी आदर्श संस्कृती.<br>
{{gap}}कालपरत्वे सरंजामी, माध्यम, सिनेमा, दूरदर्शन, फॅशन, प्रादेशिक आदी संस्कृती उदयास आल्या. या संस्कृतींचा एककलमी कार्यक्रम आहे, ‘सब घोडे बारा टक्के करायचे. म्हणजे काय तर आपल्याला हवी तशी माणसं घडवायची. पूर्वी माणूस विचार करायचा म्हणे! का तर तो वाचायचा. नव्या संस्कृतींनी माणसाचं वाचन तोडलं ते त्याने विचार करू नये म्हणून.आपली पुढची किंवा त्याही पुढची पिढी पहा. ती सक्तीच्या क्रमिक पुस्तकांशिवाय काही वाचत नाहीत. तिला नुसतं नव्या संस्कृतींनी ‘सुशेगात केले आहे. खाओ, पिओ और मजा करो!' त्यांना पत्र लिहिता येत नाही, आपुलकीनं बोलता येत नाही. कुणाच्या घरी जायचं म्हणजे अंगावर काटा. नातेवाईक एकतर बारशाला येतात, नाहीतर बाराव्याला. तेही हाताची घडी नि तोंडावर बोट, तेरी भी चूप और मेरी भी! झाकली मूठ सव्वा लाखाची, उघडली तर फुकाची.<br>
{{gap}}सभ्यता म्हणजे आपलेपणा. सभ्यता म्हणजे नम्रता. सभ्यता म्हणजे दुसऱ्याचे कोणीतरी आपण होणे, असणे. सभ्यता म्हणजे सुसंस्कृतता, सहिष्णुता. सभ्यता म्हणजे द्वेषमुक्ती व परमताचा आदर, सद्भाव, सभ्यता म्हणजे परकाया प्रवेश. आपल्याला जे हवं असतं, ते दुसऱ्यालाही मिळालं पाहिजे अशी जाणीव व भावना. सभ्यता म्हणजे आपपर भेदातीतता. ‘फायर ते फ्राइड' असा माणसाचा विकास म्हणजे भौतिकापेक्षा भावनेच्या ओलाव्याचा आलेख उंचावणं व ओलाव्याचा प्रदेश रुंदावणं. स्त्री-पुरुष अंतर मिटून दोन्ही माणसाचीच रूपे आहेत असे समजून वागणे, बोलणे, विचार करणे. त्यासाठी तुमचे सेलिब्रेटी कोण हवेत? राजकारणी, नट-नट्या की साहित्यिक, कलाकार, समाजसेवी? जो समाज वाचतो, लिहितो, विचार करतो तो प्रगल्भ-सभ्यता जन्माला घालतो. प्रबोधनपर्वात युरोपात अशी सभ्यता निर्माण झाली. आपल्याकडे त्यानंतर समाजसुधारणा घडून आल्या. त्या सर्व आपण हरवून बसलो आहोत, ते सभ्यतेस आपण तिलांजली दिली म्हणून.<br>
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center |जाणिवांची आरास/१६८}}</noinclude>
lrckk8rv37v2nq4m5vy6tgtwkouk3zi
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/170
104
27714
228923
76503
2026-04-04T10:19:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228923
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br><br><br><br>
{{center |'''सुखद धक्का'''}}
<br><br><br><br><br><br><br>{{nop}}<noinclude>{{center |जाणिवांची आरास/१६९}}</noinclude>
mz0jowy1iem4y4q8fs4s4uibnm5ftqx
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/171
104
27715
228924
76528
2026-04-04T10:20:14Z
कल्पनाशक्ती
3813
/* मजकुराविना */
228924
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude>{{center |जाणिवांची आरास/१७0}}</noinclude>
fr3kvb99s87rtjws7220npuu7fyrhl8
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/172
104
27716
228925
76538
2026-04-04T10:24:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228925
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br>
'''दिल्याने मिळत राहते...'''<br>
{{gap}}डोक्यावर सूर्य घेत डोंगर सर करावा नि शिखरावर पोहोचताच अनपेक्षित अपरा सृष्टीचं नयनरम्य दृश्य दिसावं, तसं आयुष्यातही घडतं. मी हजार-दोन हजार वस्तीच्या एका गावी हिंदीचा शिक्षक म्हणून रुजू झालो तो काही नोकरी मिळत नव्हती म्हणून नव्हे!<br>
{{gap}}सन १९५६ ते १९७० हा काळ शिक्षकांच्या दृष्टीने खडतर होता. अल्प पगार तोही अनियमित; पण शिक्षण पूर्ण नि तेही नियमित. मध्यंतरी मी वि. स. खांडेकरांचे एक वस्तुसंग्रहालय केले. मराठीस भारतीय ज्ञानपीठाचे प्रथम पारितोषिक मिळवून देणारे प्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर महाराष्ट्र-गोवा सीमेवरील शिरोडा या छोट्या गावात शिक्षक म्हणून गेले. ते शिरोडा खेडे आहे, त्याची खात्री करून, म्हणजे वीज नाही, पाणी नाही, रस्ता नाही, पोस्ट नाही असं गाव. गावातील लोकांचे उपजीविकेचे एकमेव साधन निसर्गाधारित शेती. उपचार सोयी नाहीत. त्या वस्तुसंग्रहालयात मी वि. स. खांडेकर मुख्याध्यापक असलेल्या ट्यूटोरियल इंग्लिश स्कूलचं शिक्षकांचे हजेरी पत्रक लावलंय. मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक सर्व दिवस हजर. ही असते शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रती बांधिलकी, तो आदर्श माझ्यापुढे होता. कारण मी खांडेकरांनी स्थापन केलेल्या आंतरभारती विद्यालयात शिकलो. त्या शाळा नि शिक्षिकांनी माझ्यातला शिक्षक घडवला. पुढे त्याच शाळेत मला शिक्षक होता आलं.<br>
{{gap}}सन १९७१ ते २०१० अशी चार दशके मी शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य असा नित्य चढता आलेख चढत राहिलो. १९७१ साली हाती ‘ॲपोइंटेड, स्टार्ट इमिजिएटली' अशा ३० तारा म्हणजे नोकरी नियुक्तीपत्रे<noinclude>{{center |जाणिवांची आरास/१७१}}</noinclude>
bwgvvdtsgymuzrvrx1fn4j9sbl7uyo3
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/173
104
27717
228926
76542
2026-04-04T10:25:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228926
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>होती. पुणे, मुंबई, नाशिक, चौक, चाफळ, रत्नागिरी अशा गावांतून नोकरीची आमंत्रणं असताना मी पिंपळगाव (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथे शिक्षक म्हणून रुजू झालो. जेव्हा पिंपळगाव हे दुसरे शिरोडेच होते. १९७१ ते ७९ या आठ वर्षांत मी समर्पित, सेवाभावी शिक्षक होतो. याची प्रचिती मला परवा एका सुखद धक्क्याने दिली. मी सन १९७३ मध्ये मुक्त सैनिक हायस्कूल कोल्हापूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत होतो, तेव्हाची सर्व मुले अचानक मला न सांगता; पण परस्पर चौकशी करून दत्त. १० मुले व १० मुली. सन १९७३ मध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिकणारे ते विद्यार्थी, तेव्हा ते १५ वर्षांचे नि मी २३ वर्षांचा तरुण शिक्षक. त्यांच्या नि माझ्या वयात ७-८ वर्षांचेच अंतर. परवा आले ते त्यांची साठी साजरी करायला. म्हणजेच काय, तर पाया पडायला नि मी शिकवलेली एक कविता 'जग हे असार सुनती हूँ, मुझको सुखसार दिखलाता है' महादेवी वर्मांची कविता साठीतल्या साच्या मुला-मुलींनी एका तालसुरात म्हटली. तेव्हा ४० वर्षांनंतर ते १५ वर्षांचे होते नि मी २३ वर्षांचा एक साम्य होतं.<br>
{{gap}}मी आयुष्यभर हिंदीचा प्रचार करत राहिलो. कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता अन् परवा अचानक महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने १ लाख रुपयांचा 'अखिल भारतीय महाराष्ट्र भारती जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणेने सुवर्णमहोत्सव पुरस्कार देऊन सन्मानित केले. तोही एक सुखद धक्काच म्हणायचा. अनपेक्षित पुरस्कार हे तुमच्या दीर्घ समर्पणाचे फलित असते. आजपर्यंत १० लाखाचे पुरस्कार मिळाले, पुरस्कार ठेवून धन मात्र समाजासाठी समर्पित केले.<br>
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center |जाणिवांची आरास/१७२}}</noinclude>
6yyyzpqbq5rbzb9r0haugpgubzs5f5h
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/174
104
27718
228927
77283
2026-04-04T10:27:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228927
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि अंकुश जाधव" /></noinclude>'''<big>पूर्व प्रसिद्धी सूची</big>'''{{rule}}
'''* गुड मॉर्निग (दै. लोकमत, २००६)<br>'''
'''१. सार्थकता (दि. ५ जानेवारी, २००६)<br>'''
'''२. चैतन्यरथातला बंडखोर आत्मा (दि. १२ जानेवारी २००६ <br>'''
'''३. प्रस्तुत की अप्रस्तुत (दि. १९ जानेवारी, २00६)<br>'''
'''४. बिहारी सोशिकता (दि. २६ जानेवारी, २00६)<br>'''
'''५. शहारणारे शहर (दि. २ फेब्रुवारी, २00६)'''<br>'''
'''६. मोलकरीण नव्हे ‘मोल' करी (दि. ९ फेब्रुवारी, २00६)<br>'''
'''७. जाणिवांची आरसपानी वर्तमानपत्रे (दि. ९ फेब्रुवारी, २00६)<br>'''
'''८. घोडा आणि माणूस (दि.२३ फेब्रुवारी, २00६)<br>'''
'''९. आज पहली तारीख है (दि. १ मार्च, २००६)<br>'''
'''१०. कॉफी हाऊस (दि. ९ मार्च, २००६)<br>'''
'''११. साबरमती नहीं सब्र मति (दि. १६ मार्च, २00६)<br>'''
'''१२. वाचनवेडा राजाराम (दि. २३ मार्च, २00६) <br>'''
'''१३. तीन सार्वजनिक अण्णा (दि. ३0 मार्च, २00६)<br>'''
'''१४. भाषा आणि व्यवहार (दि. ६ एप्रिल, २00६)<br>'''
'''१५. झाडू कामगार साहित्यिक (दि. १३ एप्रिल, २००६)<br>'''
'''१६. मलमपट्टी प्रशासन (दि. २० एप्रिल, २००६)<br>'''
'''१७. आमचा काय गुन्हा? (दि. २७ एप्रिल, २००६)<br>'''
''''''१८. दुहेरी संवेदनेचे आव्हान (दि. ४ मे, २००६)<br>'''
'''१९. बंदीजन? नव्हे बंधुजन (दि. ११ मे, २००६)<br>''''''
'''२०. आठवणींचे पाझर (दि. १८ मे, २00६)<br>'''
'''२१. गती, व्यस्तता की हव्यास व्यग्रता ? (दि. २५ मे, २००६)<br>'''
'''२२. सुरू जाहला लगबगीचा महिना (दि. १ जून, २00६)<br>'''
'''२३. मोबाईलच्या करामती (दि. ८ जून, २००६)<br>'''
'''२४. फोटो आणि तारतम्य (दि. १५ जून, २००६)<br>'''
'''२५. एकविसाव्या शतकातील आचारसंहिता (दि. २२ जून, २00६)<br>'''
'''२६. अश्वत्थाम्याची वणवण (दि. २९ जून, २००६)'''{{nop}}<noinclude>{{center |जाणिवांची आरास/१७३}}</noinclude>
d3lk45pgnr1im30t5i5e2s16nfvuz3m
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/175
104
27719
228928
77280
2026-04-04T10:28:57Z
कल्पनाशक्ती
3813
228928
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि भूषण कुलकर्णी" /></noinclude>'''२७.{{gap}}अस्वस्थ प्राजक्त नि नवा अगस्ती''' (दि. ५ जुलै, २००६)<br>
'''२८.{{gap}}शिक्षक : पेशा, व्यवसाय की धर्म?''' (दि. १२ जुलै, २००६)<br>
'''२९.{{gap}}झिदान झिंदाबाद?''' (दि. १९ जुलै, २००६)<br>
'''३०.{{gap}}अ.ब.क.''' (दि. २६ जुलै, २००६) <br>
'''३१.{{gap}}एका जंगलाची कथा''' (दि. ३ ऑगस्ट, २००६)<br>
''' ३२.{{gap}} संस्था आणि माणूस''' (दि. १० ऑगस्ट, २००६)<br>''' ३३.{{gap}} 'लोकमत समाचार'च्या निमित्ताने...''' (दि. २४ ऑगस्ट, २००६)<br> '''३४. {{gap}}आकांक्षांचे हेलिकॉप्टर''' (दि. १७ ऑगस्ट, २00६)<br>''' ३५.{{gap}} उत्सव-विवेक''' (दि. ३१ ऑगस्ट २00६)<br>'''३६.{{gap}} देते व्हा, देत रहा''' (दि. ७ सप्टेंबर, २००६)<br>''' ३७.{{gap}} मातृहृदयी नानासाहेब गद्रे''' (दि. १४ सप्टेंबर, २00६)<br>''' ३८.{{gap}} सेवा : सुरक्षा आणि शाश्वती''' (दि. २१ सप्टेंबर, २००६)<br>''' ३९.{{gap}} अंधारातला काजवा''' (दि. २८ सप्टेंबर, २00६)<br>''' ४0.{{gap}} महात्मा गांधींना अनावृत्त पत्र '''(दि. ५ ऑक्टोबर, २00६)<br>''' ४१.{{gap}} माय टीचर गुटखा''' (दि. १२ ऑक्टोबर, २००६)<br>''' ४२.{{gap}} 'अक्षरधारा' घरोघरी''' (दि. १९ ऑक्टोबर, २00६)<br>''' ४३.{{gap}} लकी बझार''' (दि. २६ ऑक्टोबर, २००६)<br>''' ४४.{{gap}} 'सेझ' नव्हे सेज '''(दि. २ नोव्हेंबर, २००६)<br>''' ४५.{{gap}} बाललीला वर्णन''' (दि. ९ नोव्हेंबर, २००६)<br>''' ४६.{{gap}} मारीच आणि माणूस''' (दि. १६ नोव्हेंबर, २००६)<br>''' ४७.{{gap}} असंवाद''' (दि. २३ नोव्हेंबर, २00६)<br>''' ४८.{{gap}} वेदनेचे वेद झाले''' (दि. ३० नोव्हेंबर, २००६)<br>''' ४९.{{gap}} महाराष्ट्रीयांचा ‘अंतर्नाद''''(दि. ७ डिसेंबर, २००६)<br>''' ५0.{{gap}} देव, माणूस आणि आरसा''' (दि. ४ डिसेंबर, २००६)<br> '''५१.{{gap}} विकास की विस्तार ?''' (दि. २१ डिसेंबर, २००६) <br>'''५२.{{gap}} मराठी माती नि मन '''(दि. २८ डिसेंबर, २00६)<br><br>
'''* {{gap}}अनुभव''' (दै. तरूण भारत - २00८)<br>''' ५३.{{gap}} नवे वारे '''(दि. १० जानेवारी, २००८){{nop}}<noinclude>{{center |जाणिवांची आरास/१७४}}</noinclude>
0ytvq380ox8zqevg2pz21uvlfvkiwoi
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/176
104
27720
228929
76988
2026-04-04T10:30:18Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228929
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>'''५४.{{gap}} नॅनोचं वादळ''' (दि. १७ जानेवारी, २००८)<br>''' ५५.{{gap}} राजकारणमुक्त गाव''' (दि. २४ जानेवारी, २00८)<br>''' ५६. {{gap}}मर्दानगी और कंडोम''' (दि. ३१ जानेवारी, २००८)<br>''' ५७.{{gap}} सुमारांची सद्दी '''(दि. ७ फेब्रुवारी, २00८)<br>''' ५८. {{gap}}दैन्य हटविणारा अगस्ती '''(दि. १४ फेब्रुवारी, २00८)<br>''' ५९. {{gap}}पालकत्व '''(दि. २३ फेब्रुवारी, २००८) <br>'''६०. {{gap}}परीक्षांचा महापूर''' (दि. २८ फेब्रुवारी, २००८)<br>
'''* {{gap}}सगुण-निर्गुण''' (दै. महाराष्ट्र टाइम्स - २०१७)<br>''' ६१.{{gap}} सार्वजनिक सत्यधर्म '''(दि. २८ एप्रिल, २०१७)<br>''' ६२.{{gap}} सर्वांभूति समानत्व''' (दि. ५ मे, २०१७) <br>'''६३. {{gap}}सात समंध मानेवर''' (दि. १२ मे, २०१७)<br>''' ६४.{{gap}} माणूस '''(दि. १९ मे, २०१७)<br> '''६५.{{gap}} जगणं''' (दि. २६ मे, २०१७)<br>''' ६६.{{gap}} स्वातंत्र्य '''(दि. २ जून, २०१७) <br>'''६७.{{gap}} देणान्याचे हात '''(दि. ९ जून, २०१७)<br>''' ६८.{{gap}} भारतीय असणं '''(दि. १६ जून, २०१७) <br>'''६९.{{gap}} विवेकबुद्धी '''(दि. २३ जून, २०१७)<br>''' ७0.{{gap}} विश्वबंधुत्व '''(दि. ३0 जून, २०१७)<br>''' ७१. {{gap}}कर के देखो... '''(दि. ७ जुलै, २०१७)<br>''' ७२.{{gap}} लीन संप्रदाय '''(दि. १४ जुलै, २०१७) <br>'''७३.{{gap}} स्वर्ग हवा तर '''(दि. २१ जुलै, २०१७)<br>''' ७४.{{gap}} संस्कृती, सभ्यता '''(दि. २८ जुलै, २०१७)<br>
'''* {{gap}}सुखद धक्का '''(दै. पुण्यनगरी - २०१७)<br>''' ७५.{{gap}} दिल्याने मिळत राहते... '''(दि. १५ मे, २०१७)<br><br>
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center |जाणिवांची आरास/१७५}}</noinclude>
afwv2c485uxf98wk05phzznhcmcwt95
युगान्त
0
32367
228931
163250
2026-04-04T11:14:05Z
कल्पनाशक्ती
3813
228931
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = युगान्त
| साहित्यिक = इरावती कर्वे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील =
| पुढील = [[युगान्त/ शेवटचा प्रयत्न|शेवटचा प्रयत्न]]
| वर्ष = २०१५
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="Yugant.pdf" from="1" to="20"/>
bkixi68zw4n42fjdkhtn48djgi7t6u8
युगान्त/ शेवटचा प्रयत्न
0
32378
228932
163253
2026-04-04T11:14:21Z
कल्पनाशक्ती
3813
228932
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = युगान्त
| साहित्यिक = इरावती कर्वे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[युगान्त/ शेवटचा प्रयत्न|शेवटचा प्रयत्न]]
| पुढील = [[युगान्त/गांधारी|गांधारी]]
| वर्ष = २०१५
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="Yugant.pdf" from="21 " to="44 "/>
qjrbvr9nnuvbddjmq7o1px8atnwq70t
पान:स्त्री - जीवन.pdf/११
104
109752
228892
228470
2026-04-03T12:35:00Z
कल्पनाशक्ती
3813
228892
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ९ )}}</noinclude>प्रेमाची अमर ओंवी तिने मला दिली. मरतां मरतांहि माझ्या वैनीनें अमर स्त्री वाङ्मय दिलें. तिच्या आत्म्याला प्रणाम.<br>{{gap}}"स्त्रीजीवन" या नांवाऐवजी "स्त्रीहृदय" असें नांव असतें तर चांगलें झालें असतें असें कांहीं मित्र म्हणाले. परंतु आधीं "स्त्रीजीवन" हे नांवच छापले गेले. त्यांची सूचना अधिक यथार्थ होती. स्त्रीजीवन हे पुस्तक मुलींच्या शाळांतून तरी सर्वत्र जाईल व आपल्या मायबहिणी असें अमर वाङ्मय निर्मीत हें पाहून मुलींना स्फूर्ति येईल व नवीन जीवनावर त्या नवीन वाङ्मय निर्मितील अशी मी आशा बाळगतो.<br>{{gap}}स्त्रीजीवनांतील "बहीणभाऊ" व "मायलेकरें" या ओव्यासंबधींचे रसपरिचयात्मक लेख मन्वन्तर मासिकानें आधीं प्रसिद्ध करून जनतेचें लक्ष वेधून घेतलें याबद्दल त्यांचे आभार मानतो. हनुमान प्रेसचे चालक मालक व कामगार ह्यांचेहि पुस्तक लौकर व सुबक छापून दिल्याबद्दल आभार. चित्रकार श्री. गोविंद कुरवाळेकर या तरुण चित्रकारानी सुंदर चित्र काढून दिलें, त्यांचेहि गोड आभार व प्रकाशमंडळ पुणे याचे चालक श्री. दयार्णव कोपर्डेकर यांच्या उत्साही पत्नी चि. सौ. कमल कोपर्डेकर स्त्रियांच्या अभिमानानें हें पुस्तक प्रकाशावयास पुढे आल्या म्हणून त्यांनाहि धन्यवाद.
{| {{brace table parameters}}
|२४।२।४०||{{brace|r|ht}}||{{gap}}'''साने गुरुजी.'''
|-
|लिमयेवाडी, सदाशिव पेठ, पुणे २.||{{brace|r|hb}}||
|}
<br>
{{rule|5em}}
<br>
{{center|{{x-larger|'''अनुक्रमणिका'''}}}}
<center>
{|
|+
|-
! !! विषय !! {{gap}}{{gap}}पृष्ठ
|-
| ( १ ) || [[स्त्री-जीवन/बहिणभाऊ|बहिणभाऊ]] || {{right|१}}
|-
| ( २ ) || [[स्त्री-जीवन/मायलेकरें|मायलेकरें]] || {{right|३५}}
|-
| ( ३ ) || [[स्त्री-जीवन/मुलगी|मुलगी]] || {{right|९८}}
|-
| ( ४ ) || [[स्त्री-जीवन/सुखदुःखाचे अनुभव|सुखदुःखाचे अनुभव]] || {{right|१२९}}
|}
</center>
{{nop}}<noinclude></noinclude>
7em53rbausab5883j42l2kiiun3uie9
पान:स्त्री - जीवन.pdf/१५७
104
109949
228887
228655
2026-04-03T12:25:22Z
कल्पनाशक्ती
3813
228887
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथें]|सुखदुःखाचे अनुभव|[ १४५}}
{{block center/s}}</noinclude>नातवंडांची आजी{{gap}}{{gap}}पंतवंडांना दूध पाजी<br>दैवाची आहे माझी{{gap}}{{gap}}आजीबाई ॥
{{block center/e}}
{{gap}}असे एकत्र कुटुंबपद्धतीतील हें वर्णन आहे. घर म्हणजे जसें गोकुळ. मुलां- बाळांनी, लेकीसुनांनी, गडी माणसांनी गजबजलेले. भांडणें तंडणे आहेत. परंतु त्यांतहि शेवटीं संयम येऊन सारे पुन्हां गोड व्हायचे, समाधान मिळावयाचें. असो, आतां तुम्ही प्रत्यक्षच त्या ओव्या वाचा.<br>
{{center|{{x-larger|'''सुखदुःखाचे अनुभव : ओंव्या'''}}}}
<center>
{|-
| सासरी सासुरवास{{gap}}{{gap}}माहेरी माहेरवास<br>सत्तेचा परी घास{{gap}}{{gap}}सासऱ्यास || <br>{{gap}}१
|-
| सासरचे बोल{{gap}}{{gap}}कडु कारल्याचा पाला<br>गोड बोलून दिली मला{{gap}}{{gap}}बाप्पाजीनी || <br>{{gap}}२
|-
| सासरचे बोल{{gap}}{{gap}}जसे कारल्याचे वेल<br>गोड कधी का होतील{{gap}}{{gap}}कांहीं केल्या || <br>{{gap}}३
|-
| सासरचे बोल{{gap}}{{gap}}जशा रेशमाच्या गांठी<br>सैल कर माझ्यासाठी{{gap}}{{gap}}भाईराया || <br>{{gap}}४
|-
| सासरचे बोल{{gap}}{{gap}}जशा रेशमाच्या गांठी<br>माने बसल्या न सुटती{{gap}}{{gap}}कांहीं केल्या || <br>{{gap}}५
|-
| सासरचे बोल{{gap}}{{gap}}जसा वळचणीचा वांसा<br>लागतो ठसाठसा{{gap}}{{gap}}येताजातां || <br>{{gap}}६
|-
| सासरचे बोल{{gap}}{{gap}}जसे पाण्याचे शिंतोडे<br>पहावें माझ्याकडे{{gap}}{{gap}}भाईराया || <br>{{gap}}७
|-
| सासरचे बोल{{gap}}{{gap}}कडू काडेकिराईत<br>जरी नाहीं गिळवत{{gap}}{{gap}}गोड मानी || <br>{{gap}}८<noinclude>{{nopt}}
|}
<br>{{gap}}स्त्रीजी... १०</noinclude>
k7ep74obrxi3thgm4rqzqio4jz7feqx
पान:स्त्री - जीवन.pdf/२०३
104
109981
228886
228739
2026-04-03T12:23:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228886
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १९१}}
{|
|-</noinclude>{{nopt}}
|-
| माझे ओटीवर {{gap}}{{gap}} बुकांचें कीं ओझें<br>वकील नांव तुझें {{gap}}{{gap}} अप्पाराया || <br>{{gap}}५९४
|-
| चौसुपी माझें घर {{gap}}{{gap}} कितीदा काढू केर<br>माझे भाग्यवंत दीर {{gap}}{{gap}} घरी आले || <br>{{gap}}५९५
|-
| माझा नव्हे कोणी {{gap}}{{gap}} माझ्या बहिणीबाळेचा<br>हिरा मोहनमाळेचा {{gap}}{{gap}} गोपूबाळ || <br>{{gap}}५९६
|-
| माझा नव्हे कोणी {{gap}}{{gap}} माझ्या बहिणीचा होशी<br>मला मावशी म्हणशी {{gap}}{{gap}} चंदूबाळा || <br>{{gap}}५९७
|-
| माझ्या ग घरांत {{gap}}{{gap}} सदा येती आप्त इष्ट<br>माझ्या घराचें अभीष्ट {{gap}}{{gap}} चिंतितात || <br>{{gap}}५९८
|-
| नदीपलीकडे {{gap}}{{gap}} कोणाच्या मोऱ्या गायी<br>आजोबा आजीबाई {{gap}}{{gap}} दान देती || <br>{{gap}}५९९
|-
| नदीपलीकडे {{gap}}{{gap}} कोणाची वांसरें<br>तेथें तुझें ग सासरें {{gap}}{{gap}} उषाताई || <br>{{gap}}६००
|-
| चिठी बरोबर {{gap}}{{gap}} आंबे द्या पाठवून<br>त्यांत ठेवावे लिहून {{gap}}{{gap}} उषाताईला || <br>{{gap}}६०१
|-
| लेकी झाल्या लोकी {{gap}}{{gap}} सुना झाल्या लेकी<br>हातींचे काम घेती {{gap}}{{gap}} मायबाईच्या || <br>{{gap}}६०२
|-
| लेकी झाल्या लेकुरवाळ्या {{gap}}{{gap}} सुनांना आली न्हाणें<br>दैवाची देते वाणें {{gap}}{{gap}} आक्काबाई || <br>{{gap}}६०३
|-
| नातवंडे पंतवंडे {{gap}}{{gap}} भरली ओसरी<br>दैवाची बैसली {{gap}}{{gap}} आजीबाई || <br>{{gap}}६०४
|-
| नातवंडांची आजी {{gap}}{{gap}} पतवंडांना दूध पाजी<br>दैवाची आहे माझी {{gap}}{{gap}} आजीबाई || <br>{{gap}}६०५
|}
<br>
</Center>
{{rule|5em}}
{{nop}}<noinclude></noinclude>
3usw2prbrmdu5r0yrmefby6yi5utd0g
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२१
104
110008
228881
228875
2026-04-03T12:05:49Z
JayashreeVI
4058
228881
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}<br>
{{right|{{rule|2em|align=right|height=2px}}}}
{{dhr|2cm}}</noinclude>{{gap}}वादींच्या भाषणांत सॉक्रेटिसाच्या शिष्यांच्या दुष्कृत्यांचा पुष्कळ उल्लेख होता व त्यावरून सॉक्रेटिसाचें शिक्षण तरुणांना बिघडविणारें आहे असे वादींचें म्हणणें होतें. वादींनीं आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ कांहीं पुरावा सादर केला होता किंवा नाहीं हें कळण्यास साधन नाहीं. नंतर सॉक्रेटिसाची उत्तर देण्याची पाळी आली. त्याचें भाषण अत्यंत साधें, पण अकृत्रिम वक्तृत्वपूर्ण होतें. सॉक्रेटिस म्हणालाः—<br>
{{gap}}'अथीनियन नागरिकहो! माझ्या प्रतिपक्षीयांनी तुमच्या मनावर आपल्या भाषणाने काय परिणाम केला आहे, हे मला सांगतां येत नाहीं. माझ्या संबंधानें विचाराल तर मी कोण आहे हें मी बहुतेक विसरून गेलो आहे, इतके त्यांचें भाषण मोहक भ्रामक आहे, तरी पण त्यांच्या भाषणांत सत्याचा अंश क्वचितच सांपडेल! परंतु त्यांच्या असत्य विधानांपैकीं मला ज्याबद्दल विशेष आश्चर्य वाटलें तें विधान हे:- त्यांनी तुम्हांला सांगितलें कीं, मी मोठा वस्ताद वक्ता आहे व तुम्हांला तेव्हांच भुरळ घालीन! आतां या विधानाचा खोटेपणा मी आपल्या तोंडांतून एक शब्द काढल्याबरोबर दिसून येईल व तुम्हांला समजेल कीं, माझ्यांत मुळींच वक्तृत्व नाहीं! खरे बोलणारा तो मोठा वस्ताद वक्ता असा जर
यांचा अर्थ असला तर मात्र गोष्ट निराळी! या अर्थानें मीं कबूल करतों कीं, मी त्यांच्यापेक्षा जास्त मोठा वक्ता आहे. कारण मी खरें खरें तेंच सांगतों व आतां सांगणार आहे. मोहक भाषेनें शृंगारलेले नाटकी भाषण करणें मला आतां शोभत नाहीं. मी आपली कैफीयत आधी तयार केली नाहीं. मला जे आयत्या वेळीं शब्द सुचतील त्या शब्दांतच मी बोलणार आहे. मला आतां सत्तरावें वर्ष लागले आहे. न्यायसभेत पाऊल टाकंण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. यामुळे येथल्या भाषणपद्धतीशीं मी अगदीं अनभिज्ञ आहे. ज्याप्रमाणें तुम्ही परकी देशांतील मनुष्याला आपल्या भाषेत आपल्याच तऱ्हेने बोलूं द्याल त्याचप्रमाणे माझ्या नेहमींच्या पद्धतीने आपण मला बोलूं द्यावें अशी विनंति आहे. माझी बोलण्याची भाषाशैली कशी आहे-ती चांगली असेल अगर वाईट असेल-<noinclude>{{center|१५}}</noinclude>
sc77ahv0iik60a5eu2mjlby0ay4xkdg
228882
228881
2026-04-03T12:06:55Z
JayashreeVI
4058
228882
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}<br>
{{right|{{rule|6em|align=right|height=2px}}}}
{{dhr|2cm}}</noinclude>{{gap}}वादींच्या भाषणांत सॉक्रेटिसाच्या शिष्यांच्या दुष्कृत्यांचा पुष्कळ उल्लेख होता व त्यावरून सॉक्रेटिसाचें शिक्षण तरुणांना बिघडविणारें आहे असे वादींचें म्हणणें होतें. वादींनीं आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ कांहीं पुरावा सादर केला होता किंवा नाहीं हें कळण्यास साधन नाहीं. नंतर सॉक्रेटिसाची उत्तर देण्याची पाळी आली. त्याचें भाषण अत्यंत साधें, पण अकृत्रिम वक्तृत्वपूर्ण होतें. सॉक्रेटिस म्हणालाः—<br>
{{gap}}'अथीनियन नागरिकहो! माझ्या प्रतिपक्षीयांनी तुमच्या मनावर आपल्या भाषणाने काय परिणाम केला आहे, हे मला सांगतां येत नाहीं. माझ्या संबंधानें विचाराल तर मी कोण आहे हें मी बहुतेक विसरून गेलो आहे, इतके त्यांचें भाषण मोहक भ्रामक आहे, तरी पण त्यांच्या भाषणांत सत्याचा अंश क्वचितच सांपडेल! परंतु त्यांच्या असत्य विधानांपैकीं मला ज्याबद्दल विशेष आश्चर्य वाटलें तें विधान हे:- त्यांनी तुम्हांला सांगितलें कीं, मी मोठा वस्ताद वक्ता आहे व तुम्हांला तेव्हांच भुरळ घालीन! आतां या विधानाचा खोटेपणा मी आपल्या तोंडांतून एक शब्द काढल्याबरोबर दिसून येईल व तुम्हांला समजेल कीं, माझ्यांत मुळींच वक्तृत्व नाहीं! खरे बोलणारा तो मोठा वस्ताद वक्ता असा जर
यांचा अर्थ असला तर मात्र गोष्ट निराळी! या अर्थानें मीं कबूल करतों कीं, मी त्यांच्यापेक्षा जास्त मोठा वक्ता आहे. कारण मी खरें खरें तेंच सांगतों व आतां सांगणार आहे. मोहक भाषेनें शृंगारलेले नाटकी भाषण करणें मला आतां शोभत नाहीं. मी आपली कैफीयत आधी तयार केली नाहीं. मला जे आयत्या वेळीं शब्द सुचतील त्या शब्दांतच मी बोलणार आहे. मला आतां सत्तरावें वर्ष लागले आहे. न्यायसभेत पाऊल टाकंण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. यामुळे येथल्या भाषणपद्धतीशीं मी अगदीं अनभिज्ञ आहे. ज्याप्रमाणें तुम्ही परकी देशांतील मनुष्याला आपल्या भाषेत आपल्याच तऱ्हेने बोलूं द्याल त्याचप्रमाणे माझ्या नेहमींच्या पद्धतीने आपण मला बोलूं द्यावें अशी विनंति आहे. माझी बोलण्याची भाषाशैली कशी आहे-ती चांगली असेल अगर वाईट असेल-<noinclude>{{center|१५}}</noinclude>
nbpb30nazqbzavsj0pwkggcweyoe98q
228883
228882
2026-04-03T12:07:37Z
JayashreeVI
4058
228883
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}<br>
{{right|{{rule|8em|align=right|height=2px}}}}
{{dhr|2cm}}</noinclude>{{gap}}वादींच्या भाषणांत सॉक्रेटिसाच्या शिष्यांच्या दुष्कृत्यांचा पुष्कळ उल्लेख होता व त्यावरून सॉक्रेटिसाचें शिक्षण तरुणांना बिघडविणारें आहे असे वादींचें म्हणणें होतें. वादींनीं आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ कांहीं पुरावा सादर केला होता किंवा नाहीं हें कळण्यास साधन नाहीं. नंतर सॉक्रेटिसाची उत्तर देण्याची पाळी आली. त्याचें भाषण अत्यंत साधें, पण अकृत्रिम वक्तृत्वपूर्ण होतें. सॉक्रेटिस म्हणालाः—<br>
{{gap}}'अथीनियन नागरिकहो! माझ्या प्रतिपक्षीयांनी तुमच्या मनावर आपल्या भाषणाने काय परिणाम केला आहे, हे मला सांगतां येत नाहीं. माझ्या संबंधानें विचाराल तर मी कोण आहे हें मी बहुतेक विसरून गेलो आहे, इतके त्यांचें भाषण मोहक भ्रामक आहे, तरी पण त्यांच्या भाषणांत सत्याचा अंश क्वचितच सांपडेल! परंतु त्यांच्या असत्य विधानांपैकीं मला ज्याबद्दल विशेष आश्चर्य वाटलें तें विधान हे:- त्यांनी तुम्हांला सांगितलें कीं, मी मोठा वस्ताद वक्ता आहे व तुम्हांला तेव्हांच भुरळ घालीन! आतां या विधानाचा खोटेपणा मी आपल्या तोंडांतून एक शब्द काढल्याबरोबर दिसून येईल व तुम्हांला समजेल कीं, माझ्यांत मुळींच वक्तृत्व नाहीं! खरे बोलणारा तो मोठा वस्ताद वक्ता असा जर
यांचा अर्थ असला तर मात्र गोष्ट निराळी! या अर्थानें मीं कबूल करतों कीं, मी त्यांच्यापेक्षा जास्त मोठा वक्ता आहे. कारण मी खरें खरें तेंच सांगतों व आतां सांगणार आहे. मोहक भाषेनें शृंगारलेले नाटकी भाषण करणें मला आतां शोभत नाहीं. मी आपली कैफीयत आधी तयार केली नाहीं. मला जे आयत्या वेळीं शब्द सुचतील त्या शब्दांतच मी बोलणार आहे. मला आतां सत्तरावें वर्ष लागले आहे. न्यायसभेत पाऊल टाकंण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. यामुळे येथल्या भाषणपद्धतीशीं मी अगदीं अनभिज्ञ आहे. ज्याप्रमाणें तुम्ही परकी देशांतील मनुष्याला आपल्या भाषेत आपल्याच तऱ्हेने बोलूं द्याल त्याचप्रमाणे माझ्या नेहमींच्या पद्धतीने आपण मला बोलूं द्यावें अशी विनंति आहे. माझी बोलण्याची भाषाशैली कशी आहे-ती चांगली असेल अगर वाईट असेल-<noinclude>{{center|१५}}</noinclude>
6okspz40zm8kz9e4tmlr6pwuz2kc679
228884
228883
2026-04-03T12:13:28Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
228884
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}}<br>
{{right|{{rule|4em|align=right|height=2px}}}}
{{dhr|2cm}}</noinclude>{{gap}}वादींच्या भाषणांत सॉक्रेटिसाच्या शिष्यांच्या दुष्कृत्यांचा पुष्कळ उल्लेख होता व त्यावरून सॉक्रेटिसाचें शिक्षण तरुणांना बिघडविणारें आहे असे वादींचें म्हणणें होतें. वादींनीं आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ कांहीं पुरावा सादर केला होता किंवा नाहीं हें कळण्यास साधन नाहीं. नंतर सॉक्रेटिसाची उत्तर देण्याची पाळी आली. त्याचें भाषण अत्यंत साधें, पण अकृत्रिम वक्तृत्वपूर्ण होतें. सॉक्रेटिस म्हणालाः—<br>
{{gap}}'अथीनियन नागरिकहो! माझ्या प्रतिपक्षीयांनी तुमच्या मनावर आपल्या भाषणाने काय परिणाम केला आहे, हे मला सांगतां येत नाहीं. माझ्या संबंधानें विचाराल तर मी कोण आहे हें मी बहुतेक विसरून गेलो आहे, इतके त्यांचें भाषण मोहक भ्रामक आहे, तरी पण त्यांच्या भाषणांत सत्याचा अंश क्वचितच सांपडेल! परंतु त्यांच्या असत्य विधानांपैकीं मला ज्याबद्दल विशेष आश्चर्य वाटलें तें विधान हे:- त्यांनी तुम्हांला सांगितलें कीं, मी मोठा वस्ताद वक्ता आहे व तुम्हांला तेव्हांच भुरळ घालीन! आतां या विधानाचा खोटेपणा मी आपल्या तोंडांतून एक शब्द काढल्याबरोबर दिसून येईल व तुम्हांला समजेल कीं, माझ्यांत मुळींच वक्तृत्व नाहीं! खरे बोलणारा तो मोठा वस्ताद वक्ता असा जर
यांचा अर्थ असला तर मात्र गोष्ट निराळी! या अर्थानें मीं कबूल करतों कीं, मी त्यांच्यापेक्षा जास्त मोठा वक्ता आहे. कारण मी खरें खरें तेंच सांगतों व आतां सांगणार आहे. मोहक भाषेनें शृंगारलेले नाटकी भाषण करणें मला आतां शोभत नाहीं. मी आपली कैफीयत आधी तयार केली नाहीं. मला जे आयत्या वेळीं शब्द सुचतील त्या शब्दांतच मी बोलणार आहे. मला आतां सत्तरावें वर्ष लागले आहे. न्यायसभेत पाऊल टाकंण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. यामुळे येथल्या भाषणपद्धतीशीं मी अगदीं अनभिज्ञ आहे. ज्याप्रमाणें तुम्ही परकी देशांतील मनुष्याला आपल्या भाषेत आपल्याच तऱ्हेने बोलूं द्याल त्याचप्रमाणे माझ्या नेहमींच्या पद्धतीने आपण मला बोलूं द्यावें अशी विनंति आहे. माझी बोलण्याची भाषाशैली कशी आहे-ती चांगली असेल अगर वाईट असेल-<noinclude>{{center|१५}}</noinclude>
aw6nepfgjgcbzhf1fo298aseiwqpztb
228895
228884
2026-04-03T12:39:07Z
JayashreeVI
4058
228895
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}}<br>
{{right|{{rule|3em|align=right|height=2px}}}}
{{dhr|2cm}}</noinclude>{{gap}}वादींच्या भाषणांत सॉक्रेटिसाच्या शिष्यांच्या दुष्कृत्यांचा पुष्कळ उल्लेख होता व त्यावरून सॉक्रेटिसाचें शिक्षण तरुणांना बिघडविणारें आहे असे वादींचें म्हणणें होतें. वादींनीं आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ कांहीं पुरावा सादर केला होता किंवा नाहीं हें कळण्यास साधन नाहीं. नंतर सॉक्रेटिसाची उत्तर देण्याची पाळी आली. त्याचें भाषण अत्यंत साधें, पण अकृत्रिम वक्तृत्वपूर्ण होतें. सॉक्रेटिस म्हणालाः—<br>
{{gap}}'अथीनियन नागरिकहो! माझ्या प्रतिपक्षीयांनी तुमच्या मनावर आपल्या भाषणाने काय परिणाम केला आहे, हे मला सांगतां येत नाहीं. माझ्या संबंधानें विचाराल तर मी कोण आहे हें मी बहुतेक विसरून गेलो आहे, इतके त्यांचें भाषण मोहक भ्रामक आहे, तरी पण त्यांच्या भाषणांत सत्याचा अंश क्वचितच सांपडेल! परंतु त्यांच्या असत्य विधानांपैकीं मला ज्याबद्दल विशेष आश्चर्य वाटलें तें विधान हे:- त्यांनी तुम्हांला सांगितलें कीं, मी मोठा वस्ताद वक्ता आहे व तुम्हांला तेव्हांच भुरळ घालीन! आतां या विधानाचा खोटेपणा मी आपल्या तोंडांतून एक शब्द काढल्याबरोबर दिसून येईल व तुम्हांला समजेल कीं, माझ्यांत मुळींच वक्तृत्व नाहीं! खरे बोलणारा तो मोठा वस्ताद वक्ता असा जर
यांचा अर्थ असला तर मात्र गोष्ट निराळी! या अर्थानें मीं कबूल करतों कीं, मी त्यांच्यापेक्षा जास्त मोठा वक्ता आहे. कारण मी खरें खरें तेंच सांगतों व आतां सांगणार आहे. मोहक भाषेनें शृंगारलेले नाटकी भाषण करणें मला आतां शोभत नाहीं. मी आपली कैफीयत आधी तयार केली नाहीं. मला जे आयत्या वेळीं शब्द सुचतील त्या शब्दांतच मी बोलणार आहे. मला आतां सत्तरावें वर्ष लागले आहे. न्यायसभेत पाऊल टाकंण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. यामुळे येथल्या भाषणपद्धतीशीं मी अगदीं अनभिज्ञ आहे. ज्याप्रमाणें तुम्ही परकी देशांतील मनुष्याला आपल्या भाषेत आपल्याच तऱ्हेने बोलूं द्याल त्याचप्रमाणे माझ्या नेहमींच्या पद्धतीने आपण मला बोलूं द्यावें अशी विनंति आहे. माझी बोलण्याची भाषाशैली कशी आहे-ती चांगली असेल अगर वाईट असेल-<noinclude>{{center|१५}}</noinclude>
ofkvdcaj0uno8sybtlppaszq470t6fi
228896
228895
2026-04-03T12:39:58Z
JayashreeVI
4058
228896
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}}<br>
{{right|{{rule|3em|align=right|height=1px}}}}
{{dhr|1cm}}</noinclude>{{gap}}वादींच्या भाषणांत सॉक्रेटिसाच्या शिष्यांच्या दुष्कृत्यांचा पुष्कळ उल्लेख होता व त्यावरून सॉक्रेटिसाचें शिक्षण तरुणांना बिघडविणारें आहे असे वादींचें म्हणणें होतें. वादींनीं आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ कांहीं पुरावा सादर केला होता किंवा नाहीं हें कळण्यास साधन नाहीं. नंतर सॉक्रेटिसाची उत्तर देण्याची पाळी आली. त्याचें भाषण अत्यंत साधें, पण अकृत्रिम वक्तृत्वपूर्ण होतें. सॉक्रेटिस म्हणालाः—<br>
{{gap}}'अथीनियन नागरिकहो! माझ्या प्रतिपक्षीयांनी तुमच्या मनावर आपल्या भाषणाने काय परिणाम केला आहे, हे मला सांगतां येत नाहीं. माझ्या संबंधानें विचाराल तर मी कोण आहे हें मी बहुतेक विसरून गेलो आहे, इतके त्यांचें भाषण मोहक भ्रामक आहे, तरी पण त्यांच्या भाषणांत सत्याचा अंश क्वचितच सांपडेल! परंतु त्यांच्या असत्य विधानांपैकीं मला ज्याबद्दल विशेष आश्चर्य वाटलें तें विधान हे:- त्यांनी तुम्हांला सांगितलें कीं, मी मोठा वस्ताद वक्ता आहे व तुम्हांला तेव्हांच भुरळ घालीन! आतां या विधानाचा खोटेपणा मी आपल्या तोंडांतून एक शब्द काढल्याबरोबर दिसून येईल व तुम्हांला समजेल कीं, माझ्यांत मुळींच वक्तृत्व नाहीं! खरे बोलणारा तो मोठा वस्ताद वक्ता असा जर
यांचा अर्थ असला तर मात्र गोष्ट निराळी! या अर्थानें मीं कबूल करतों कीं, मी त्यांच्यापेक्षा जास्त मोठा वक्ता आहे. कारण मी खरें खरें तेंच सांगतों व आतां सांगणार आहे. मोहक भाषेनें शृंगारलेले नाटकी भाषण करणें मला आतां शोभत नाहीं. मी आपली कैफीयत आधी तयार केली नाहीं. मला जे आयत्या वेळीं शब्द सुचतील त्या शब्दांतच मी बोलणार आहे. मला आतां सत्तरावें वर्ष लागले आहे. न्यायसभेत पाऊल टाकंण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. यामुळे येथल्या भाषणपद्धतीशीं मी अगदीं अनभिज्ञ आहे. ज्याप्रमाणें तुम्ही परकी देशांतील मनुष्याला आपल्या भाषेत आपल्याच तऱ्हेने बोलूं द्याल त्याचप्रमाणे माझ्या नेहमींच्या पद्धतीने आपण मला बोलूं द्यावें अशी विनंति आहे. माझी बोलण्याची भाषाशैली कशी आहे-ती चांगली असेल अगर वाईट असेल-<noinclude>{{center|१५}}</noinclude>
oqly20zgp7qt1i7t2dkvo42aa6k42f2
228897
228896
2026-04-03T12:40:43Z
JayashreeVI
4058
228897
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}}<br>
{{right|{{rule|2em|align=right|height=1px}}}}
{{dhr|1cm}}</noinclude>{{gap}}वादींच्या भाषणांत सॉक्रेटिसाच्या शिष्यांच्या दुष्कृत्यांचा पुष्कळ उल्लेख होता व त्यावरून सॉक्रेटिसाचें शिक्षण तरुणांना बिघडविणारें आहे असे वादींचें म्हणणें होतें. वादींनीं आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ कांहीं पुरावा सादर केला होता किंवा नाहीं हें कळण्यास साधन नाहीं. नंतर सॉक्रेटिसाची उत्तर देण्याची पाळी आली. त्याचें भाषण अत्यंत साधें, पण अकृत्रिम वक्तृत्वपूर्ण होतें. सॉक्रेटिस म्हणालाः—<br>
{{gap}}'अथीनियन नागरिकहो! माझ्या प्रतिपक्षीयांनी तुमच्या मनावर आपल्या भाषणाने काय परिणाम केला आहे, हे मला सांगतां येत नाहीं. माझ्या संबंधानें विचाराल तर मी कोण आहे हें मी बहुतेक विसरून गेलो आहे, इतके त्यांचें भाषण मोहक भ्रामक आहे, तरी पण त्यांच्या भाषणांत सत्याचा अंश क्वचितच सांपडेल! परंतु त्यांच्या असत्य विधानांपैकीं मला ज्याबद्दल विशेष आश्चर्य वाटलें तें विधान हे:- त्यांनी तुम्हांला सांगितलें कीं, मी मोठा वस्ताद वक्ता आहे व तुम्हांला तेव्हांच भुरळ घालीन! आतां या विधानाचा खोटेपणा मी आपल्या तोंडांतून एक शब्द काढल्याबरोबर दिसून येईल व तुम्हांला समजेल कीं, माझ्यांत मुळींच वक्तृत्व नाहीं! खरे बोलणारा तो मोठा वस्ताद वक्ता असा जर
यांचा अर्थ असला तर मात्र गोष्ट निराळी! या अर्थानें मीं कबूल करतों कीं, मी त्यांच्यापेक्षा जास्त मोठा वक्ता आहे. कारण मी खरें खरें तेंच सांगतों व आतां सांगणार आहे. मोहक भाषेनें शृंगारलेले नाटकी भाषण करणें मला आतां शोभत नाहीं. मी आपली कैफीयत आधी तयार केली नाहीं. मला जे आयत्या वेळीं शब्द सुचतील त्या शब्दांतच मी बोलणार आहे. मला आतां सत्तरावें वर्ष लागले आहे. न्यायसभेत पाऊल टाकंण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. यामुळे येथल्या भाषणपद्धतीशीं मी अगदीं अनभिज्ञ आहे. ज्याप्रमाणें तुम्ही परकी देशांतील मनुष्याला आपल्या भाषेत आपल्याच तऱ्हेने बोलूं द्याल त्याचप्रमाणे माझ्या नेहमींच्या पद्धतीने आपण मला बोलूं द्यावें अशी विनंति आहे. माझी बोलण्याची भाषाशैली कशी आहे-ती चांगली असेल अगर वाईट असेल-<noinclude>{{center|१५}}</noinclude>
svfdo5rx08mnq7a2ftsu8gzkq697dpi
228898
228897
2026-04-03T12:41:37Z
JayashreeVI
4058
228898
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}}<br>
{{right|{{rule|4em|align=right|height=1px}}}}
{{dhr|1cm}}</noinclude>{{gap}}वादींच्या भाषणांत सॉक्रेटिसाच्या शिष्यांच्या दुष्कृत्यांचा पुष्कळ उल्लेख होता व त्यावरून सॉक्रेटिसाचें शिक्षण तरुणांना बिघडविणारें आहे असे वादींचें म्हणणें होतें. वादींनीं आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ कांहीं पुरावा सादर केला होता किंवा नाहीं हें कळण्यास साधन नाहीं. नंतर सॉक्रेटिसाची उत्तर देण्याची पाळी आली. त्याचें भाषण अत्यंत साधें, पण अकृत्रिम वक्तृत्वपूर्ण होतें. सॉक्रेटिस म्हणालाः—<br>
{{gap}}'अथीनियन नागरिकहो! माझ्या प्रतिपक्षीयांनी तुमच्या मनावर आपल्या भाषणाने काय परिणाम केला आहे, हे मला सांगतां येत नाहीं. माझ्या संबंधानें विचाराल तर मी कोण आहे हें मी बहुतेक विसरून गेलो आहे, इतके त्यांचें भाषण मोहक भ्रामक आहे, तरी पण त्यांच्या भाषणांत सत्याचा अंश क्वचितच सांपडेल! परंतु त्यांच्या असत्य विधानांपैकीं मला ज्याबद्दल विशेष आश्चर्य वाटलें तें विधान हे:- त्यांनी तुम्हांला सांगितलें कीं, मी मोठा वस्ताद वक्ता आहे व तुम्हांला तेव्हांच भुरळ घालीन! आतां या विधानाचा खोटेपणा मी आपल्या तोंडांतून एक शब्द काढल्याबरोबर दिसून येईल व तुम्हांला समजेल कीं, माझ्यांत मुळींच वक्तृत्व नाहीं! खरे बोलणारा तो मोठा वस्ताद वक्ता असा जर
यांचा अर्थ असला तर मात्र गोष्ट निराळी! या अर्थानें मीं कबूल करतों कीं, मी त्यांच्यापेक्षा जास्त मोठा वक्ता आहे. कारण मी खरें खरें तेंच सांगतों व आतां सांगणार आहे. मोहक भाषेनें शृंगारलेले नाटकी भाषण करणें मला आतां शोभत नाहीं. मी आपली कैफीयत आधी तयार केली नाहीं. मला जे आयत्या वेळीं शब्द सुचतील त्या शब्दांतच मी बोलणार आहे. मला आतां सत्तरावें वर्ष लागले आहे. न्यायसभेत पाऊल टाकंण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. यामुळे येथल्या भाषणपद्धतीशीं मी अगदीं अनभिज्ञ आहे. ज्याप्रमाणें तुम्ही परकी देशांतील मनुष्याला आपल्या भाषेत आपल्याच तऱ्हेने बोलूं द्याल त्याचप्रमाणे माझ्या नेहमींच्या पद्धतीने आपण मला बोलूं द्यावें अशी विनंति आहे. माझी बोलण्याची भाषाशैली कशी आहे-ती चांगली असेल अगर वाईट असेल-<noinclude>{{center|१५}}</noinclude>
q762gykrzk0pmuoyc34i219bnyhme19
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२२
104
110009
228889
228790
2026-04-03T12:32:35Z
JayashreeVI
4058
228889
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}
{{left|rule|6em|height=2px}}}}
{{dhr|2cm}}</noinclude>त्याकडे आपण लक्ष्य देऊ नका. परंतु मी म्हणतों तें न्याय्य आहे किंवा नाहीं है आपण पहा. कारण ज्याप्रमाणें खरें बोलणे हे वकिलाचे कर्तव्य कर्म आहे; त्याप्रमाणेच न्याय्य कोणते हे ठरविणें न्यायाधिशाचे काम आहे."
<br>{{gap}}माझ्या प्रतिपक्षीयांचे दोन वर्ग आहेत. एक जुने एक नवे. मेलीटस व त्याचे स्नेही हे नवे आहेत. त्यांचे मला इतके भय वाटत नाहीं, परंतु माझे जुने प्रतिपक्षी हे याच्यापेक्षाही जास्त प्रबल आहेत. कारण यांनी आज कैक वर्षे तुमच्या कानीकपाळी माझी नालस्ती केली आहे. तुमच्या कोवळ्या मनावर त्यांच्या मतांचा दृढ परिणाम झालेला आहे. शिवाय हे प्रतिपक्षी असंख्य आहेत. व त्यांची मला नांवेंही ठाऊक नाहींत. यामुळे त्यांना पुढे उभे करून त्यांची उलट तपासणी करून माझ्या म्हणण्याचे समर्थन करणे मला शक्य नाहीं. तरी पण ते माझे जुने प्रतिपक्षी आहेत म्हणून त्यांच्या आरोपाचे खंडन प्रथमतः करून मग मी मेलीटस व त्याचे स्नेही यांचेकडे वळणार आहे.
<br>{{gap}}जणू काय माझे प्रतिपक्षी येथे माझ्या समोर आहेत असें धरून मी
त्यांचा आरोप आपल्याला सांगतों. ते म्हणतात, 'सांक्रेटिस हा एक फार वाईट मनुष्य आहे. कारण तो पृथ्वीवरील व आकाशांतील वस्तुजाताचा शोध करतो; तसेच त्याला वाईट व असत्य यांना चांगल्याचें व सत्याचं आभासरूप देण्याची कला अवगत आहे व या सर्व गोष्टी तो तरुणाना शिकवितो.' नाटकांतून माझे असेच असत्य चित्र काढले आहे,
परंतु अशा प्रकारचें ज्ञान मला मुळींच नाहीं! अशा प्रकारचें ज्ञान मनुषयास मिळणे शक्य असल्यास तें वाईट नाहीं, परंतु असले ज्ञान मला नाहीं हें खास! माझी पुष्कळ भाषणें आपल्यापैकी पुष्कळांनी ऐकली असतील, त्यांनी मी अशा विषयावर कधी बोललों आहे काय याबद्दल आठवण करून पहावी, म्हणजे माझ्या म्हणण्याच्या खरेपणाला त्यांची
मनोमय साक्ष पटेल.
<br>{{gap}}"तसेंच मी तरुणांस शिकवितों व त्यांचेकडून गुरुदक्षिणा घेतों, असें
तुम्ही ऐकले असेल, परंतु तेही अगदी खोटें आहे! असें जर मला करता--<noinclude>{{center|१६}}</noinclude>
neeu0x3ytza9bw78f91pzm30obmyzf3
228890
228889
2026-04-03T12:33:58Z
JayashreeVI
4058
228890
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}<br>
{{left|{{rule|6em|height=2px}}}}
{{dhr|2cm}}</noinclude>त्याकडे आपण लक्ष्य देऊ नका. परंतु मी म्हणतों तें न्याय्य आहे किंवा नाहीं है आपण पहा. कारण ज्याप्रमाणें खरें बोलणे हे वकिलाचे कर्तव्य कर्म आहे; त्याप्रमाणेच न्याय्य कोणते हे ठरविणें न्यायाधिशाचे काम आहे."
<br>{{gap}}माझ्या प्रतिपक्षीयांचे दोन वर्ग आहेत. एक जुने एक नवे. मेलीटस व त्याचे स्नेही हे नवे आहेत. त्यांचे मला इतके भय वाटत नाहीं, परंतु माझे जुने प्रतिपक्षी हे याच्यापेक्षाही जास्त प्रबल आहेत. कारण यांनी आज कैक वर्षे तुमच्या कानीकपाळी माझी नालस्ती केली आहे. तुमच्या कोवळ्या मनावर त्यांच्या मतांचा दृढ परिणाम झालेला आहे. शिवाय हे प्रतिपक्षी असंख्य आहेत. व त्यांची मला नांवेंही ठाऊक नाहींत. यामुळे त्यांना पुढे उभे करून त्यांची उलट तपासणी करून माझ्या म्हणण्याचे समर्थन करणे मला शक्य नाहीं. तरी पण ते माझे जुने प्रतिपक्षी आहेत म्हणून त्यांच्या आरोपाचे खंडन प्रथमतः करून मग मी मेलीटस व त्याचे स्नेही यांचेकडे वळणार आहे.
<br>{{gap}}जणू काय माझे प्रतिपक्षी येथे माझ्या समोर आहेत असें धरून मी
त्यांचा आरोप आपल्याला सांगतों. ते म्हणतात, 'सांक्रेटिस हा एक फार वाईट मनुष्य आहे. कारण तो पृथ्वीवरील व आकाशांतील वस्तुजाताचा शोध करतो; तसेच त्याला वाईट व असत्य यांना चांगल्याचें व सत्याचं आभासरूप देण्याची कला अवगत आहे व या सर्व गोष्टी तो तरुणाना शिकवितो.' नाटकांतून माझे असेच असत्य चित्र काढले आहे,
परंतु अशा प्रकारचें ज्ञान मला मुळींच नाहीं! अशा प्रकारचें ज्ञान मनुषयास मिळणे शक्य असल्यास तें वाईट नाहीं, परंतु असले ज्ञान मला नाहीं हें खास! माझी पुष्कळ भाषणें आपल्यापैकी पुष्कळांनी ऐकली असतील, त्यांनी मी अशा विषयावर कधी बोललों आहे काय याबद्दल आठवण करून पहावी, म्हणजे माझ्या म्हणण्याच्या खरेपणाला त्यांची
मनोमय साक्ष पटेल.
<br>{{gap}}"तसेंच मी तरुणांस शिकवितों व त्यांचेकडून गुरुदक्षिणा घेतों, असें
तुम्ही ऐकले असेल, परंतु तेही अगदी खोटें आहे! असें जर मला करता--<noinclude>{{center|१६}}</noinclude>
3ktp95fwbqxbmkwf63hyvvzepyh8n7e
228891
228890
2026-04-03T12:34:48Z
JayashreeVI
4058
228891
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />
{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}<br>
{{left|{{rule|6em|height=2px}}}}
{{dhr|2cm}}</noinclude>त्याकडे आपण लक्ष्य देऊ नका. परंतु मी म्हणतों तें न्याय्य आहे किंवा नाहीं है आपण पहा. कारण ज्याप्रमाणें खरें बोलणे हे वकिलाचे कर्तव्य कर्म आहे; त्याप्रमाणेच न्याय्य कोणते हे ठरविणें न्यायाधिशाचे काम आहे."
<br>{{gap}}माझ्या प्रतिपक्षीयांचे दोन वर्ग आहेत. एक जुने एक नवे. मेलीटस व त्याचे स्नेही हे नवे आहेत. त्यांचे मला इतके भय वाटत नाहीं, परंतु माझे जुने प्रतिपक्षी हे याच्यापेक्षाही जास्त प्रबल आहेत. कारण यांनी आज कैक वर्षे तुमच्या कानीकपाळी माझी नालस्ती केली आहे. तुमच्या कोवळ्या मनावर त्यांच्या मतांचा दृढ परिणाम झालेला आहे. शिवाय हे प्रतिपक्षी असंख्य आहेत. व त्यांची मला नांवेंही ठाऊक नाहींत. यामुळे त्यांना पुढे उभे करून त्यांची उलट तपासणी करून माझ्या म्हणण्याचे समर्थन करणे मला शक्य नाहीं. तरी पण ते माझे जुने प्रतिपक्षी आहेत म्हणून त्यांच्या आरोपाचे खंडन प्रथमतः करून मग मी मेलीटस व त्याचे स्नेही यांचेकडे वळणार आहे.
<br>{{gap}}जणू काय माझे प्रतिपक्षी येथे माझ्या समोर आहेत असें धरून मी
त्यांचा आरोप आपल्याला सांगतों. ते म्हणतात, 'सांक्रेटिस हा एक फार वाईट मनुष्य आहे. कारण तो पृथ्वीवरील व आकाशांतील वस्तुजाताचा शोध करतो; तसेच त्याला वाईट व असत्य यांना चांगल्याचें व सत्याचं आभासरूप देण्याची कला अवगत आहे व या सर्व गोष्टी तो तरुणाना शिकवितो.' नाटकांतून माझे असेच असत्य चित्र काढले आहे,
परंतु अशा प्रकारचें ज्ञान मला मुळींच नाहीं! अशा प्रकारचें ज्ञान मनुषयास मिळणे शक्य असल्यास तें वाईट नाहीं, परंतु असले ज्ञान मला नाहीं हें खास! माझी पुष्कळ भाषणें आपल्यापैकी पुष्कळांनी ऐकली असतील, त्यांनी मी अशा विषयावर कधी बोललों आहे काय याबद्दल आठवण करून पहावी, म्हणजे माझ्या म्हणण्याच्या खरेपणाला त्यांची
मनोमय साक्ष पटेल.
<br>{{gap}}"तसेंच मी तरुणांस शिकवितों व त्यांचेकडून गुरुदक्षिणा घेतों, असें
तुम्ही ऐकले असेल, परंतु तेही अगदी खोटें आहे! असें जर मला करता--<noinclude>{{center|१६}}</noinclude>
a5bm0gkrt0hdk7j25ix8axhsnhu9mpc
228893
228891
2026-04-03T12:35:29Z
JayashreeVI
4058
228893
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />
{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}<br>
{{left|{{rule|6em|height=2px}}}}
{{dhr|2cm}}</noinclude>त्याकडे आपण लक्ष्य देऊ नका. परंतु मी म्हणतों तें न्याय्य आहे किंवा नाहीं है आपण पहा. कारण ज्याप्रमाणें खरें बोलणे हे वकिलाचे कर्तव्य कर्म आहे; त्याप्रमाणेच न्याय्य कोणते हे ठरविणें न्यायाधिशाचे काम आहे."
<br>{{gap}}माझ्या प्रतिपक्षीयांचे दोन वर्ग आहेत. एक जुने एक नवे. मेलीटस व त्याचे स्नेही हे नवे आहेत. त्यांचे मला इतके भय वाटत नाहीं, परंतु माझे जुने प्रतिपक्षी हे याच्यापेक्षाही जास्त प्रबल आहेत. कारण यांनी आज कैक वर्षे तुमच्या कानीकपाळी माझी नालस्ती केली आहे. तुमच्या कोवळ्या मनावर त्यांच्या मतांचा दृढ परिणाम झालेला आहे. शिवाय हे प्रतिपक्षी असंख्य आहेत. व त्यांची मला नांवेंही ठाऊक नाहींत. यामुळे त्यांना पुढे उभे करून त्यांची उलट तपासणी करून माझ्या म्हणण्याचे समर्थन करणे मला शक्य नाहीं. तरी पण ते माझे जुने प्रतिपक्षी आहेत म्हणून त्यांच्या आरोपाचे खंडन प्रथमतः करून मग मी मेलीटस व त्याचे स्नेही यांचेकडे वळणार आहे.
<br>{{gap}}जणू काय माझे प्रतिपक्षी येथे माझ्या समोर आहेत असें धरून मी
त्यांचा आरोप आपल्याला सांगतों. ते म्हणतात, 'सांक्रेटिस हा एक फार वाईट मनुष्य आहे. कारण तो पृथ्वीवरील व आकाशांतील वस्तुजाताचा शोध करतो; तसेच त्याला वाईट व असत्य यांना चांगल्याचें व सत्याचं आभासरूप देण्याची कला अवगत आहे व या सर्व गोष्टी तो तरुणाना शिकवितो.' नाटकांतून माझे असेच असत्य चित्र काढले आहे,
परंतु अशा प्रकारचें ज्ञान मला मुळींच नाहीं! अशा प्रकारचें ज्ञान मनुषयास मिळणे शक्य असल्यास तें वाईट नाहीं, परंतु असले ज्ञान मला नाहीं हें खास! माझी पुष्कळ भाषणें आपल्यापैकी पुष्कळांनी ऐकली असतील, त्यांनी मी अशा विषयावर कधी बोललों आहे काय याबद्दल आठवण करून पहावी, म्हणजे माझ्या म्हणण्याच्या खरेपणाला त्यांची
मनोमय साक्ष पटेल.
<br>{{gap}}"तसेंच मी तरुणांस शिकवितों व त्यांचेकडून गुरुदक्षिणा घेतों, असें
तुम्ही ऐकले असेल, परंतु तेही अगदी खोटें आहे! असें जर मला करता--<noinclude>{{center|१६}}</noinclude>
av12e7whtcgrqjj5bym9w0sj2tmq4wd
228894
228893
2026-04-03T12:36:48Z
JayashreeVI
4058
228894
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />
{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}<br>
{{left|{{rule|6em|height=2px}}}}
{{dhr|1cm}}</noinclude>त्याकडे आपण लक्ष्य देऊ नका. परंतु मी म्हणतों तें न्याय्य आहे किंवा नाहीं है आपण पहा. कारण ज्याप्रमाणें खरें बोलणे हे वकिलाचे कर्तव्य कर्म आहे; त्याप्रमाणेच न्याय्य कोणते हे ठरविणें न्यायाधिशाचे काम आहे."
<br>{{gap}}माझ्या प्रतिपक्षीयांचे दोन वर्ग आहेत. एक जुने एक नवे. मेलीटस व त्याचे स्नेही हे नवे आहेत. त्यांचे मला इतके भय वाटत नाहीं, परंतु माझे जुने प्रतिपक्षी हे याच्यापेक्षाही जास्त प्रबल आहेत. कारण यांनी आज कैक वर्षे तुमच्या कानीकपाळी माझी नालस्ती केली आहे. तुमच्या कोवळ्या मनावर त्यांच्या मतांचा दृढ परिणाम झालेला आहे. शिवाय हे प्रतिपक्षी असंख्य आहेत. व त्यांची मला नांवेंही ठाऊक नाहींत. यामुळे त्यांना पुढे उभे करून त्यांची उलट तपासणी करून माझ्या म्हणण्याचे समर्थन करणे मला शक्य नाहीं. तरी पण ते माझे जुने प्रतिपक्षी आहेत म्हणून त्यांच्या आरोपाचे खंडन प्रथमतः करून मग मी मेलीटस व त्याचे स्नेही यांचेकडे वळणार आहे.
<br>{{gap}}जणू काय माझे प्रतिपक्षी येथे माझ्या समोर आहेत असें धरून मी
त्यांचा आरोप आपल्याला सांगतों. ते म्हणतात, 'सांक्रेटिस हा एक फार वाईट मनुष्य आहे. कारण तो पृथ्वीवरील व आकाशांतील वस्तुजाताचा शोध करतो; तसेच त्याला वाईट व असत्य यांना चांगल्याचें व सत्याचं आभासरूप देण्याची कला अवगत आहे व या सर्व गोष्टी तो तरुणाना शिकवितो.' नाटकांतून माझे असेच असत्य चित्र काढले आहे,
परंतु अशा प्रकारचें ज्ञान मला मुळींच नाहीं! अशा प्रकारचें ज्ञान मनुषयास मिळणे शक्य असल्यास तें वाईट नाहीं, परंतु असले ज्ञान मला नाहीं हें खास! माझी पुष्कळ भाषणें आपल्यापैकी पुष्कळांनी ऐकली असतील, त्यांनी मी अशा विषयावर कधी बोललों आहे काय याबद्दल आठवण करून पहावी, म्हणजे माझ्या म्हणण्याच्या खरेपणाला त्यांची
मनोमय साक्ष पटेल.
<br>{{gap}}"तसेंच मी तरुणांस शिकवितों व त्यांचेकडून गुरुदक्षिणा घेतों, असें
तुम्ही ऐकले असेल, परंतु तेही अगदी खोटें आहे! असें जर मला करता--<noinclude>{{center|१६}}</noinclude>
2fxzonwxch4otd3x78cmnj17a1rrapi
पान:स्त्री - जीवन.pdf/२०२
104
110061
228885
2026-04-03T12:19:01Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228885
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१९० ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}}
{|
|-</noinclude>{{nopt}}
|-
| गोपूबाळ वसंतबाळ {{gap}}{{gap}} हे दोघे जोडीचे<br>शेले चुनाडीचे {{gap}}{{gap}} पांघुरले || <br>{{gap}}५८१
|-
| शंकर बाळ मोरू बाळ {{gap}}{{gap}} हे दोघे जोडीचे<br>माझ्या आवडीचे {{gap}}{{gap}} दोन हिरे || <br>{{gap}}५८२
|-
| शंकर बाळ मधु बाळ {{gap}}{{gap}} हे दोघे गडी गडी<br>जशी भीमार्जुनांची जोडी {{gap}}{{gap}} घरामध्ये || <br>{{gap}}५८३
|-
| एका छत्रीखाली {{gap}}{{gap}} कोण ग चालती<br>मामेयाच्या संगें {{gap}}{{gap}} भाचे बाहेर निघती || <br>{{gap}}५८४
|-
| गंगुबाई रंगुबाई {{gap}}{{gap}} या दोघी मावश्याभाच्या<br>डोकीवरी कुंच्या {{gap}}{{gap}} रेशमाच्या || <br>{{gap}}५८५
|-
| धाकटी वैनी मोठी वैनी {{gap}}{{gap}} भांडती कडाकडा<br>मध्यें साखरेचा खडा {{gap}}{{gap}} गोपूबाळ || <br>{{gap}}५८६
|-
| धाकटी वैनी मोठी वैनी {{gap}}{{gap}} जावांचा ग जोडा<br>कोथिंबीरी चुडा {{gap}}{{gap}} भरीयेला || <br>{{gap}}५८७
|-
| भांडशी भांड गड्या {{gap}}{{gap}} तुझ्या तोंडाची जाते वाफ<br>भल्या बापाची मी लेक {{gap}}{{gap}} नेदीं जाप || <br>{{gap}}५८८
|-
| शेजारी भांडतो {{gap}}{{gap}} करीतो हमरीतुमरी<br>बोले ना उषाताई {{gap}}{{gap}} थोरामोठ्याची ग नारी || <br>{{gap}}५८९
|-
| साखरेचे लाडू {{gap}}{{gap}} वाटेच्या पाहुण्यांना<br>श्रीधरपंत मेहुण्यांना {{gap}}{{gap}} एकादशी || <br>{{gap}}५९०
|-
| सांवळे मेहुण्यांना {{gap}}{{gap}} समयी नाहीं दिली<br>चंद्रज्योत उभी केली {{gap}}{{gap}} शांताताई || <br>{{gap}}५९१
|-
| मनोहरपंत मेहुणे {{gap}}{{gap}} आपल्या आईचे बाळक<br>दिली पुतळी ठळक {{gap}}{{gap}} कमळाताई || <br>{{gap}}५९२
|-
| हातीं दौतलेखणी {{gap}}{{gap}} कलमदानीं गोंडे<br>कारकून हिंडे {{gap}}{{gap}} बाप्पाजींचा || <br>{{gap}}५९३<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
r8fco2dkxzm7ysym4ep1m1912vu30qh
स्त्री-जीवन/सुखदुःखाचे अनुभव
0
110062
228888
2026-04-03T12:27:32Z
कल्पनाशक्ती
3813
नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = स्त्री-जीवन | साहित्यिक = साने गुरुजी | अनुवादक = | विभाग = | मागील = [[स्त्री-जीवन/मुलगी|मुलगी]] | पुढील = | वर्ष = १९४० | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="स्त्री - ज..."
228888
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = स्त्री-जीवन
| साहित्यिक = साने गुरुजी
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[स्त्री-जीवन/मुलगी|मुलगी]]
| पुढील =
| वर्ष = १९४०
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="स्त्री - जीवन.pdf" from=141 to=204 />
sxtnqwaf62hjdh1j2ow4myyl53plvnv