विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.46.0-wmf.23 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:Gangajal cropped.pdf/138 104 20809 229186 69160 2026-04-13T05:57:40Z सुबोध कुलकर्णी 1231 229186 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />{{right|गंगाजल / १४५}}</noinclude>आविष्कार यांत मूलत:च फरक असतो. अनुभव घेत असताना त्या अनुभवांची संगती लावणे आणि भाष्पनिरूपणांसह सर्व अनुभव पुन्हा अनुभवाच्याच पातळीवर शिल्लक राहणे, ही प्रक्रिया म्हणजे चिंतनशील मनाचा एक धर्म असतो. चिंतनशील मन हे प्रत्येक घटनेवर निरूपण करीतच असते, त्याची संगती लावीत असते. त्या ठिकाणी असणारा विचार नेहमीच सर्वस्वी नवा असतो असे नाही, पण तो अनुभवाचा भाग असतो. आणि ज्या वेळी पूर्वसिद्ध विचार सजवून मांडिलेले असतात, त्या वेळी विचारांना सोयीस्कर होतील असे प्रसंग हुडकून एकत्र आणिलेले असतात. सजावटीसाठी सावडून आणलेल्या सामग्रीलाही अनुभवाच्या पातळीवर जिवंत होता येणे शक्य नसते, आणि या प्रसाधनाशी मूळ विचार एकरूप होणेही शक्य नसते, चिंतनशील मन नुसता विचार करीत नसते, तर तो विचार त्या व्यक्तिमत्वाने रंगलेलाही असतो. इरावतींचे मन हे असे चितनशील मन असल्यामुळे त्यांचा निबंध ललित आणि वैचारिक यांच्या सीमारेषेवर वावरत असतो. कित्येकदा तो वैचारिकाच्या बाजूने अधिक झुकतो आणि मग विचार म्हणून ती मांडणी कितीही रेखीव झाली, तरी ती आपला जिवन्तपणा हरवून बसते. कित्येकदा हा निबंध आपल्याच अनुभवाची संगती लाविताना हरवून जातो आणि मग विविध अनुभवांच्या संगतीचे सूत्र हरवल्यामुळे विस्कळित वाटू लागतो. पण हे दोन्ही प्रकार त्यांच्या लिखाणात पुन:पुन्हा घडतात हे मान्य केले, तरी त्यामुळे या निबंधाचा वेगळेपणा संपत नाही. मी निबंध शब्द वापरतो आहे खरा, पण इरावतींच्या सगळ्याच लिखाणाचे स्वरूप नेहमीच निबंधासारखे असेल, असे नाही. कधी तो निबंध असतो, कधी त्या नुसत्याच आठवणी असतात. कधी प्रवासवर्णन असते, कधी त्यात निरनिराळ्या व्यक्तिरेखा असतात; या ललितनिबंधात इरावतींच्याबरोबर त्यांच्या मुली, जावई, मुले, पती, मित्र हे सगळे डोकावून जातात. कित्येकदा तर ही नावे नुसती नावे म्हणून शिल्लक राहत नाहीत. तीही आपापले व्यक्तिमत्त्व घेऊन इरूच्या वाङमयात हक्काने प्रवेश करितात. {{gap}}ही कल्पिताची सृष्टी आहे. तिला वास्तवाचे निदान स्थलकालनिबद्ध वास्तवाचे संदर्भ नसावे, हे बंधन इरावतीबाईंनी कधी पाळलेले दिसत नाही. आणि या स्थलकालनिबद्ध वास्तविक सत्याने त्यांच्या वाङमयातील सार्वत्रिक सत्याला कधी अडथळा आणिलेला दिसत नाही. स्थलकालाच्या<noinclude></noinclude> ki8a6hzl6riea7s87m67rm4eoc0tigt पान:Gangajal cropped.pdf/142 104 20813 229187 68391 2026-04-13T05:57:55Z सुबोध कुलकर्णी 1231 229187 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />{{right|गंगाजल / १४९}}</noinclude>लावून केवळ मनाची समृद्धी वाढवू नये, तर विचारांना एक दिशा द्यावी, अशी अपेक्षा असते. इरावती जर समोर दिसणारे अनुभव नाकारून पुढे गेल्या असत्या, तर आपल्या मर्यादित वर्तुळात एखादी संगती त्यांना शोधताही आली असती. पण समोर दिसणारे दाहक सत्य नाकारणे त्यांच्या स्वभावात नव्हते, आणि हे सत्य जर स्वीकारायचे असेल, तर त्या संदर्भात विचारांचे शेवटचे टोक गाठले पाहिजे, अशी त्यांची तयारी नव्हती. कदाचित याचे कारण हेही असेल की, भारतीय स्त्रीच्या उपजत मनाप्रमाणे त्यांनी दु:खांची अपरिहार्यता स्वीकारलेली होती. प्राकृतिक दु:खे, सांस्कृतिक दु:खे आणि सामाजिक दु:खे हा सर्व यातनांचा भोग माणसाला अपरिहार्य आहे, याची जाणीव अगदी तरुणपणापासून त्यांच्या मनात वावरत असताना दिसते. बिहारमध्ये आपल्या कामानिमित्ताने फिरताना त्यांना आढळून आले की, गंगेच्या सुपीक खोर्‍यात चार भिंतींच्या कोंडवाड्यात बायका केवळ स्वयंपाक करून, यजमानांची वाटच पाहत बसतात. मुलीने विचारले, "जन्मभर असे वाट पाहत कुजतच बसायचे काय?" बाईंनी भारतीय स्त्रीच्या दु:ख अपरिहार्य मानणाच्या थंड मनाने उत्तर दिले, “नाही, त्यांना फार वेळ कुजत बसावे लागत नाही. आजार त्यापूर्वीच त्यांनी सुटका करतात." {{gap}}दु:ख टाळण्याकडे आणि ते टाळल्यानंतर डोळे झाकून घेऊन स्वप्नात रमण्याकडे बाईंची कधी प्रवृत्ती नव्हती. जी दु:खे आहेत, ती आहेत, ती नाहीत म्हणून चालणार नाही, याचीही त्यांना जाणीव होती आणि ही दु:खे कधी संपणारी नाहीत, याचीही त्यांना जाणीव होती. एकेक अनुभव त्यांना थेट दु:खाच्या गाभ्याजवळ घेऊन जात असे. या दु:खाच्या गाभ्याजवळ आपण पशुंच्या कितीतरी जवळ आहोत, अशी त्यांना अचानक आठवण येई. वारक-यांच्या तांड्याबरोबर हरिनामाचा गजर करीत जातानासुद्धा अचानकच कुठेतरी न टळणारे दु:ख एखाद्या म्हातारीचे रूप घेऊन त्याच्यासमोर उभे राही. सहजगत्या एखाद्या वृद्धेला नातवंडांच्याविषयी प्रश्न विचारावा, तर तिचे डोळे मिटत, तोंड भेसूर दिसू लागे. सारे शरीर भीतीने थरथरत असे. कुत्रीच्या पिलाला जेव्हा जनावर चावले, तेव्हा तीही अशीच भीतीने थरथरत होती, याची आठवण हे मानवी दु:ख पाहताना बाईंना येते. कुठे उत्खननासाठी जावे, तो एखादा युद्धात मारलेल्या माणसाचा सांगाडा सापडत असे, आणि मग अचानक अशी हुरहूर लागायची की, याच्या<noinclude></noinclude> 468kyyb3u05xokca22phh9sqo9ubmuw पान:Gangajal cropped.pdf/143 104 20814 229191 68392 2026-04-13T06:00:05Z सुबोध कुलकर्णी 1231 229191 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />१५० / गंगाजल</noinclude>शेजारी एखादी जिवंत तरुणी मारून पुरलेली असावी. स्त्रीजात गरजेनुसार वापरायची. स्त्री म्हणजे केवळ कातडीची थैली. पुरुष हा पुत्ररूपाने पुन्हा जन्मतच असतो. मूल पित्याचे, आई फक्त साधन, असे सांगणारी भारतीय सांस्कृतिक परंपरा कितीही यातनामय असली, तरी ती इरावतींना जवळची होती. कारण ती त्यांची स्वत:ची परंपरा होती. {{gap}}चौफेर उपस्थित असलेल्या या दु:खाच्या अस्तित्वाने बाई सदैव घेरलेल्या आहेत. मध्येच कुठेतरी मारी-कुट्टीसारखी एखादी कुरूप स्त्री असते. तिच्या केसाच्या मळसूत्राकार गुंडाळीत थकवा येईपर्यंत उवा फिरत असतात. वेड्यांच्या दवाखान्यात ती परिचारिका म्हणून असते. वास्तविक जग विसरून जे मिळविता आले नाही, ते मिळाल्याच्या भ्रांतीत वेडे वावरत असतात; आणि असेच एक खोटे स्वप्नसाम्राज्य निर्माण करून मारी-कुट्टी आपल्या अर्थशून्य जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न करीत असते. कुठे देवळांच्या भोवताली पसरलेले निरनिराळ्या रोगांचे जंगल असते. कुठे ही दु:खे सांस्कृतिक रूप धारण करतात; आणि त्यांचे स्वरूप सांस्कृतिक कारणांमुळे अधिक उत्कट व्हायला लागते. मुले मोठी होतात; आणि मग त्यांना स्वत:च्या जीवनाची गती लागते. म्हातार्‍या माणसांना एकाएकी आठवण येते की, आता आपली गरज संपलेली आहे. गरज संपल्यानंतरही टिकून राहण्याचा केविलवाणा अट्टाहास कमी यातनांना जन्म देत नाही! तर कुठे मानवी प्रयत्नांची सगळी व्यर्थताच समोर दिसू लागते. किंकाळी फोडणार्‍या मुलाच्या मदतीला आपण गेलो, हेही व्यर्थच. असे मदतीला आपण गेलो नसतो, तर तेही व्यर्थच! समाजाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करून आपला एकटेपणा विझविला, तरी तोही प्रयत्न व्यर्थ ठरतो, आणि आपल्या एकाकीपणात रमावयाचे असे म्हटले, तर ते रमणेही व्यर्थ ठरते. अशा प्रकारच्या नानाविध दु:खांनी, मृत्यूच्या व भीतीच्या जाणिवांनी, निसर्गात मूलभूत असणारे क्रौर्य आणि त्या क्रौर्याच्या प्रतिकारार्थ नेहमी- नेहमी लुळी पडणारी संस्कृती, अशा जाणिवांनी इरावतींचे अस्तित्व घेरलेले आहे. {{gap}}या दु:खांकडे पाहताना इरावतींनी मरणाची अपरिहार्यता स्वीकारलेली आहे. शरीराच्या आणि मनाच्या वाढीबरोबर येणारी माणसांची ताटातूट हीही एक अटळ घटना म्हणून मान्य केली आहे. सांस्कृतिक दु:खाचा अटळपणातर इरावतींना मान्य करणे भागच होते. कारण त्या व्यथेच्या<noinclude></noinclude> efp73ckudtbqnn2wsufweahwjlbwlvm पान:Gangajal cropped.pdf/144 104 20815 229188 68393 2026-04-13T05:58:09Z सुबोध कुलकर्णी 1231 229188 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />{{right|गंगाजल / १५१}}</noinclude>भोगातूनच माणसाची माणुसकी शिल्लक राहते. ही विविध दु:खांची अपरिहार्यता स्वीकारीत स्वीकारीत इरावतींचे मन सामाजिक दु:खांकडे आणि विकृतींकडेसुद्धा एक अपरिहार्य व्यथा म्हणूनच पहावयाला शिकले आहे. निदान सामाजिक दु:खांतून माणसाची सुटका करिता येईल, असाही विश्वास त्यांना वाटत नाही; मात्र दु:खाच्या या चौरस जाणिवेने त्यांच्या श्रद्धा ढासळलेल्या नाहीत; मन खचलेले नाही; भट्टीत तापविल्यामुळे सोने अधिकच उजळ व्हावे. त्याप्रमाणे वेदनेच्या भट्टीत दर क्षणी जळताना इरावतींचे मन अधिक उदार आणि सुसंस्कृत झाले आहे. {{gap}}वेदनेचा स्पर्श नसणारे एक अप्रौढ बालमन घेऊन सगळ्याच घटनांकडे कुतूहलाने पाहत, त्यांचे कौतुक करीत इरावर्तीचा प्रवास सुरू होतो. हा प्रवास शरीराचा आहे, तसा मनाचाही आहे. संशोधनाच्या निमित्ताने चांदागोंदियांच्या जंगलांपासून गुजरात-राजस्थानच्या वाळवंटांपर्यंत, हिमालयाच्या पायथ्याशी असणाच्या डोंगरांपासून बिहारच्या मैदानापर्यंत अणि आसामच्या जंगलांपासून कुर्गपर्यंत हा शरीराचा अखंड प्रवास चालू आहे. या प्रवासात संकेतांची बंधने आरंभापासूनच गळून पडलेली होती. युरोपच्या वातावरणात ज्यांची लग्ने झाली त्या मुलींना सासरच्या अनेक अनोळखी व्यक्तींचे मुके घ्यावे लागतात. असे अपरिचितांचे मुके घेणे चांगले, की भारतीय नववधूला अनेक अपरिचितांना नमस्कार करावा लागतो तसे नमस्कार करणे चांगले, येथपासून दर ठिकाणी थांबत त्या विचार करीत जातात. हा विचार करताना कधी जंगलांच्या, तर कधी वाळवंटांच्या, कधी सतत चालणाच्या नादांच्या, तर कधी न भंगणाऱ्या शांततेच्या अशा अनेक आठवणी त्यांच्या मनात जाग्या होत राहतात. त्या निसर्गाला संवेदनक्षम मनाने शब्दबद्ध करीत, भोवतालच्या समाजाचे समाज म्हणून चित्रण करीत, प्रवासात आढळणाच्या व्यक्तींची एक जिवंत माणूस म्हणून ओळख करून घेत, सुखाचे आणि दु:खाचे नानाविध प्रकार पाहत हा शरीराचा अखंड प्रवास चालू आहे. या प्रवासात निरनिराळ्या व्यक्ती भेटतात. समाज दिसतात, निसर्गाची विविध चित्रे येतात; पण हा प्रवासाचा एक भाग झाला. {{gap}}ह्याबरोबर त्यांच्या मनाचा प्रवास चालू आहे. दर ठिकाणी थांबून त्या स्वत:च्याच मनाला 'हे असे का?' हा प्रश्न विचारीत असतात. स्त्रियांना आधारासाठी जो बळकट पुरुष लागतो, ती गरज शिक्षणाने मृदू झालेला पुरुष<noinclude></noinclude> jk31iyu5tojlfsilo8b01heedudjz53 पान:Gangajal cropped.pdf/145 104 20816 229189 68389 2026-04-13T05:58:23Z सुबोध कुलकर्णी 1231 229189 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />१५२ / गंगाजल</noinclude>भागवू शकेल काय?', 'माणूस वास्तविक जीवनातील दुःखे स्वप्नात विसरू शकेल काय?', 'माणुसकीची मूल्ये एका पिढीत धुळीला मिळतात, ती पुन्हा उभी करिता येतील काय?', 'स्त्रीराज्य जरी झाले, तरी ते पुरुषांच्या अखंड चिंतनात रमलेले असते; अशी ही स्त्री खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकेल काय?', 'स्वाभिमान आणि सुखे यांत स्वाभिमान संभाळण्यासाठी दुःखांना निमंत्रण देणारी माणसे मठ्ठ म्हणता येतील काय?', 'म्हातार्‍यांना जगवीत बसणे चांगले, की प्रत्येकाने वेळेवर मरणे चांगले?', 'सुप्त इच्छा दाबता येतील काय?'- हे आणि असे अनेक प्रश्न त्यांचे मन उपस्थित करिते, आणि या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करिते. हळूहळू कुतूहलाची जागा गांभीर्य आणि वेदना घेतात; आणि क्रमाने बाईंचे लिखाण जास्तच अंतर्मुख होऊ लागते. आणि मग त्या अधिक मूलभूत प्रश्न उपस्थित करू लागतात. या प्रश्नांची उत्तरे त्यांची त्यांनाही सापडण्याचा संभव नसतो. असा एक मनाचा प्रवासही सतत चालू आहे. आणि या मनाच्या प्रवासात समाजशास्त्र आणि मानसशास्त्र मधूनमधून त्यांना जास्तच घोटाळ्यात टाकण्याचा प्रयल करितात. {{gap}}या अशा अखंड प्रवासात अखंड सहचर म्हणून बाईंच्या जवळ महाभारत आहे. कधी त्या महाभारताच्या व्यक्तींत आपले जीवन पाहण्याचा प्रयत्न करितात; कधी जुन्या मूल्यांच्या आधारे महाभारतातील व्यक्तीच्या वागणुकीचे समर्थन त्या करू लागतात; कधी नव्या मूल्यांच्या आधारे महाभारतातील व्यक्तींवर त्या दोषारोप करू लागतात; त्यांच्यासाठी महाभारत हे अन्वायार्थ लावण्याचे म्हणून केवळ शिल्लक असणारे इतिहासाचे साधनसाहित्य नाही; किंवा महाभारत हे वंदनीय अशा संस्कृतीने निर्माण केलेले एक पुराणकथेचे मूर्त रूपही नव्हे. महाभारतातील व्यक्ती या जणू त्यांच्या भोवताली सतत वावरत आहेत. बाई जशा आपल्या मुलाबाळांना, सासू-सासऱ्यांना, पतीला, आई-वडिलांना विसरू शकत नाहीत, तसे त्यांच्या भोवती महाभारत आहे. गांधारी किंवा कुंती ही त्यांच्यासाठी जणू शेजारिणीसारखी पात्रे आहेत. त्यांची भलावणी केल्याशिवाय किंवा त्यांच्याविषयी तक्रार केल्याशिवाय बाईंना राहवतच नाही. त्या दिल्लीवरून पाठणकोटला जरी जात असल्या, तरी त्याच रस्त्याने सौंदर्यवती गोरीपान दमयंती, हीन-दीन अशी भटकत-भटकत आपल्या मावशीच्या घरी गेली, हे त्यांना चटकन आठवते.<noinclude></noinclude> s2u0ubp53z7wz7h772k1tt9xjhwdqd3 पान:Gangajal cropped.pdf/146 104 20817 229184 68388 2026-04-13T05:55:40Z सुबोध कुलकर्णी 1231 229184 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />{{right|गंगाजल / १५३}}</noinclude>{{gap}}बाईंनी 'युगान्त' हे पुस्तक फार नंतर लिहिले; पण महाभारतावर ठिकठिकाणी भाष्य करण्याची त्यांची प्रथा आरंभापासून आहे. महाभारताच्या जोडीला कधी रामायण तर कधी भागवत असते. पण ते नेहमीचे सहकारी म्हणून नाही; ते ग्रंथ मधूनमधून येतात. मध्येच त्यांना आठवते की, आश्रमात वाढलेल्या अनाथ महत्वाकांक्षी शकुंतलेने 'दुष्यन्त कोण?' हे जाणून त्याच्या गळ्यात मिठी मारली आणि हस्तिनापूरच्या गादीची स्वामिनी होण्याचा धाडसी डाव टाकला. हे सांगत असताना महाभारतातील शाकुंतलावर एक नवीन भाष्य निर्माण होण्याची शक्यता दिसू लागते. अशी विविध भाष्ये बाईंच्या ललित-निबंधांत आलेली आहेत. जे सामान्यत्वे कुणा पुरुषाच्या लक्षात येणार नाही, अशा महाभारतातील जागा इरावतींच्या नारी-मनाला सहज स्पर्श करून जातात आणि मग त्यांना असे वाटते की, अंबिका आणि अंबालिका यांच्याशी व्यासांचा नियोगसंबंध झालाच नाही. भीष्माच्या संमतीने एका कोळ्याच्या पोरीने आपल्या सुनांच्यावर उगविलेला हा सूड आहे. राजवाड्यातील या कन्यकांवर अत्याचार झालेला आहे. कुठे कुंतीचा विचार करिताना कुंतीच्या शहाणपणात त्यांना तत्कालीन समाजाच्या वेडगळ श्रद्धेची बीजे आढळू लागतात. {{gap}}माद्रीला जेव्हा दोन मुले होतात, तेव्हा कुंतीला असे वाटते, की माद्रीने आपल्याला फसविले. तिने दोघांना आवाहन केले, म्हणून तिला जुळे झाले. जुळे मूल होण्याचा संबंध दोन पुरुषांशी रत होण्याशी आहे, ही तत्कालीन वेडगळ श्रद्धा आणि त्या श्रद्धेला सर्वमान्य सत्य समजून त्यावर आपला सावधपणा उभारणारी कुंती यांचा विचार करतानाच एकदम इरावतीबाई सीतेपर्यंत जाऊन पोहोचतात. सीतेलाही जुळे झाले होते. त्या वेळेच्या समजुतीनुसार यामुळे सीतेचा व्यभिचारीपणा सिद्ध झाला, त्या सीतेला धरित्रीच्या पोटात कायमचे लुप्त होण्याशिवाय दुसरा मार्ग होता तरी कोणता? याच कुंतीविषयी पुन्हा एकदा इरावतींनी विचार केला, आणि खरोखरच कुंतीची संतती नियोगाची समजावी काय, हाही विचार त्यांच्या मनात आला. 'राजधानीच्या बाहेर, वडीलधाऱ्या मंडळींना न विचारिता जे पडले, त्या साऱ्याला नियोगच म्हणावयाचे काय?' असा एक प्रश्न बाईंच्या मनात केव्हातरी तरळून गेला आहे. {{gap}}पण या भाष्यांच्या बरोबर मधूनमधून जैन वाङ्मयातील माहितीचा<noinclude></noinclude> g0cmqccskiun3pijc7opaua1y5vjq9d पान:Gangajal cropped.pdf/147 104 20818 229185 68390 2026-04-13T05:55:56Z सुबोध कुलकर्णी 1231 229185 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />१५४ । गंगाजल</noinclude>स्वीकार करण्याचीही त्यांची पद्धत आहे. कुणीतरी एक पूईगंधा सतत पुरुष सहवासासाठी तळमळत वारली. मरताना तिच्या डोळ्यांसमोर एका रूपवती वेश्येच्या भोवती घोटाळणारे पाच तरुण होते. 'हे ईश्वरा! तिला पाच जण मिळावेत, आणि मला एकही मिळू नये काय?' हा विचार करिताना पूईगंधेचा प्राण गेला. ती पुढच्या जन्मी द्रौपदी झाली. तिला पाच नवरे प्राप्त झाले. ही जैन वाङमयातील माहिती बाईंनी पूरक म्हणून वापरलेली आहे. अशी जैन माहिती पुन्हा द्वारकेच्या संदर्भातही त्यांनी वापरलेली आहे. ही द्वारका कवींना भगवंतांच्या वैभवाचे प्रतीक वाटली; बाईंना द्वारका कृष्णाच्या कायम पराजयाचे स्मृतिचिन्ह वाटते. {{gap}}यामध्ये महाभारताचे जे सततचे चिंतन चालू आहे, जी विविध स्पष्टीकरणे चालू आहेत, त्यांपेक्षाही बाई सतत महाभारताच्या सहवासात जगत आहेत, ही गोष्ट मला महत्वाची वाटते. न संपणाऱ्या सततच्या सज्जनपणाची प्रतिनिधिभूत पात्रे, न संपणाऱ्या द्वेषाची कहाणी, मनात जळत असणारी दुःखे सतत जपणारे सज्जन, भीष्माच्या रूपाने पापाच्या संरक्षणार्थ उभे असणारे पुण्य आणि पुण्याच्या समर्थनार्थ दर क्षणी कोणतेही पाप करण्यास उद्युक्त होणारा कृष्ण ही गुंतागुंतीची, मनस्वी व्यक्तींची कहाणी ज्यात आहे, तो ग्रंथ बाईंच्या सहवासात निरनिराळे अर्थ दाखवू लागतो. पण महाभारतात शेवटी सारेच व्यर्थ झालेले आहे. जयही पराजयाइतकाच कटू झाला आहे. कर्ते आणि नाकर्ते सर्वांनाच एका विशाल शून्यामध्ये महाभारताने बुडवून टाकिले आहे. सगळे कर्म करीत असताना दर टप्प्यावर 'याचा अर्थ काय?' 'त्याचा अर्थ काय?' असे विचारीत सगळेच निरर्थक ठरविणारा आणि प्रत्येक व्यक्तीचे जीवन मात्र सार्थ करणारा महाभारतासारखा ग्रंथ बाईंचा अखंड सहचर आहे. या आधारामुळेच बाईंचा प्रवास चालू असताना त्या थकत नाहीत; त्यांचे प्रश्न संपत नाहीत; आणि कोणतेही दुःख त्यांच्या मनाला खच्ची करू शकत नाही. {{gap}}या पार्श्वभूमीवर बाईंच्या दोन व्यक्तिरेखा पाहिल्या पाहिजेत. त्यातली एक त्यांच्याच सासऱ्यांची, म्हणजे महर्षी कर्व्यांची होती. जीवनातल्या नायकांच्या विषयी आपल्या समजुतीही स्वप्नरंजनातच रमलेल्या अशा आहेत. या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने एका नायकाच्या नायकत्वाची मीमांसाच जणू इरावती करीत आहेत, असे वाटू लागते. ज्याचे सार्वजनिक जीवन सर्व समाजासाठी आहे, तो माणूस घरालाच पारखा होऊन जातो. माया आणि<noinclude></noinclude> sf62398fikbiai5m80a37tvoupjqyj7 229190 229185 2026-04-13T05:58:50Z सुबोध कुलकर्णी 1231 229190 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />१५४ / गंगाजल</noinclude>स्वीकार करण्याचीही त्यांची पद्धत आहे. कुणीतरी एक पूईगंधा सतत पुरुष सहवासासाठी तळमळत वारली. मरताना तिच्या डोळ्यांसमोर एका रूपवती वेश्येच्या भोवती घोटाळणारे पाच तरुण होते. 'हे ईश्वरा! तिला पाच जण मिळावेत, आणि मला एकही मिळू नये काय?' हा विचार करिताना पूईगंधेचा प्राण गेला. ती पुढच्या जन्मी द्रौपदी झाली. तिला पाच नवरे प्राप्त झाले. ही जैन वाङमयातील माहिती बाईंनी पूरक म्हणून वापरलेली आहे. अशी जैन माहिती पुन्हा द्वारकेच्या संदर्भातही त्यांनी वापरलेली आहे. ही द्वारका कवींना भगवंतांच्या वैभवाचे प्रतीक वाटली; बाईंना द्वारका कृष्णाच्या कायम पराजयाचे स्मृतिचिन्ह वाटते. {{gap}}यामध्ये महाभारताचे जे सततचे चिंतन चालू आहे, जी विविध स्पष्टीकरणे चालू आहेत, त्यांपेक्षाही बाई सतत महाभारताच्या सहवासात जगत आहेत, ही गोष्ट मला महत्वाची वाटते. न संपणाऱ्या सततच्या सज्जनपणाची प्रतिनिधिभूत पात्रे, न संपणाऱ्या द्वेषाची कहाणी, मनात जळत असणारी दुःखे सतत जपणारे सज्जन, भीष्माच्या रूपाने पापाच्या संरक्षणार्थ उभे असणारे पुण्य आणि पुण्याच्या समर्थनार्थ दर क्षणी कोणतेही पाप करण्यास उद्युक्त होणारा कृष्ण ही गुंतागुंतीची, मनस्वी व्यक्तींची कहाणी ज्यात आहे, तो ग्रंथ बाईंच्या सहवासात निरनिराळे अर्थ दाखवू लागतो. पण महाभारतात शेवटी सारेच व्यर्थ झालेले आहे. जयही पराजयाइतकाच कटू झाला आहे. कर्ते आणि नाकर्ते सर्वांनाच एका विशाल शून्यामध्ये महाभारताने बुडवून टाकिले आहे. सगळे कर्म करीत असताना दर टप्प्यावर 'याचा अर्थ काय?' 'त्याचा अर्थ काय?' असे विचारीत सगळेच निरर्थक ठरविणारा आणि प्रत्येक व्यक्तीचे जीवन मात्र सार्थ करणारा महाभारतासारखा ग्रंथ बाईंचा अखंड सहचर आहे. या आधारामुळेच बाईंचा प्रवास चालू असताना त्या थकत नाहीत; त्यांचे प्रश्न संपत नाहीत; आणि कोणतेही दुःख त्यांच्या मनाला खच्ची करू शकत नाही. {{gap}}या पार्श्वभूमीवर बाईंच्या दोन व्यक्तिरेखा पाहिल्या पाहिजेत. त्यातली एक त्यांच्याच सासऱ्यांची, म्हणजे महर्षी कर्व्यांची होती. जीवनातल्या नायकांच्या विषयी आपल्या समजुतीही स्वप्नरंजनातच रमलेल्या अशा आहेत. या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने एका नायकाच्या नायकत्वाची मीमांसाच जणू इरावती करीत आहेत, असे वाटू लागते. ज्याचे सार्वजनिक जीवन सर्व समाजासाठी आहे, तो माणूस घरालाच पारखा होऊन जातो. माया आणि<noinclude></noinclude> byl7sgg9e8b4v840gdb2tkjxb47kw58 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/108 104 63378 229192 157756 2026-04-13T06:00:35Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229192 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|८० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>बाजूस ठेवून केवळ प्रेमाने प्रेरित होऊन कार्य करा. येथे प्रेम हा शब्द न कळण्याजोगा आहे. पूर्ण स्वतंत्रतेशिवाय खरें प्रेम उत्पन्न होणे अशक्य आहे. तुम्ही एखाद्याला गुलाम ह्मणून विकत घेतले आणि हातापायांत बिड्या ठोकून त्यास कामास लाविलें तर, काम केले पाहिजे ह्मणून तो काम करील; परंतु तुमच्याबद्दल त्याच्या मनांत प्रेम उत्पन्न होणे कधी तरी शक्य आहे काय? तसेंच स्वतःच्या इंद्रियांचा जो दासानुदास बनून गेला आहे त्याच्या चित्तांत प्रेमाचा उद्भव होणे शक्य नाही. इंद्रियसुखार्थ कोणाचाहि बळी द्यावयास तो मागेपुढे पाहणार नाही. अशा मनुष्याने केवढालेहि उद्योग केले तरी तात्विकदृष्ट्या खऱ्या कर्माची योग्यता त्याच्या उद्योगास येऊ शकतच नाही. त्याने स्वतःकरितां केलेले उद्योग असोत अथवा आपल्या आप्तेष्टांकरितां ह्मणून केलेली कामें असोत, त्यांची किंमत खऱ्या कर्माच्या योग्यतेच्या मानाने पाहिली तर जवळजवळ शून्य इतकीच असते. यासाठी प्रत्यक्ष अथवा परंपरेनें जोपर्यंत आमची कर्मे स्वसुखाभिलाषाने प्रेरित होऊन केली जात आहेत, तोपर्यंत ती कर्मे त्या गुलामाच्या कर्मासारखींच आहेत. खऱ्या प्रेमाने प्रेरित होऊन केलेल्या कर्माचा मोबदला आपणांस सुखसंवेदनांच्या रूपाने मिळत असतो. ज्यापासून आपल्या चित्तास शांतीचा आणि तज्जन्य सुखाचा लाभ होत नाही असें एकहि प्रेमप्रेरित कार्य नाही. चिरकालिक चैतन्य, चिरकालिक ज्ञान आणि चिरलिक प्रेम यांचा सदैव एकत्र वास असतो; जणूं काय ही तिन्ही एकजीवच होऊन गेली आहेत, या तिहींपैकी कोणतेंहि एक तुह्मांस कोठे आढळले तर बाकीची दोन तेथें अवश्य सांपडलीच पाहिजेत. वस्तुतः एकाच मूलरूपाची ती तीन अंगे आहेत. त्या मूलरूपास सच्चिदानंद असें नांव आहे या मूलरूपापैकी सत् हे आपणांस प्रत्यक्ष सृष्टीच्या रूपाने नटलेले आढळते; चित् हे सृष्टपदार्थांच्या ज्ञानाच्या रूपाने दिसते आणि प्रत्येक सजीव हृदयांत जे प्रेम अंशतः दिसते त्याची उत्पत्ति आनंदापासून झाली आहे. यासाठी खऱ्या प्रेमापासून दुःखाची उत्पत्ति संभवतच नाही. खरें प्रेम करणाऱ्याला अथवा ज्या वस्तूवर त्याचे प्रेम जडलं आहे त्या वस्तूला त्या प्रेमापासून दुःख होईल ही गोष्ट सर्वथैव अशक्य आहे. हे जर खरे तर प्रेम करणारा आणि त्याचा प्रेमविषय ही दोघेहि दुःखांत चूर झाल्याचे आपणांस हरघडी दिसते, हे कसे असा प्रश्न येथे उद्भवतो. याच्या उत्तरासाठी जगांत सर्वत्र आढळणारे असे एखादें उदाहरण आपण घेऊ. एका पुरुषाचे एका स्त्रीवर अत्यंत प्रेम असते; इतकें की ध्यानी, मनी, स्वप्नी तिच्या<noinclude></noinclude> ofpcu6hwd4x4xqm1rbw50ne73nuxoof पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/109 104 63379 229193 157757 2026-04-13T06:04:16Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229193 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|८१ }} {{rule}}</noinclude>शिवाय दुसरें त्याला काहीच दिसत नाही. अहाहा! स्वर्गीय प्रेम! स्वर्गीय प्रेम!! परंतु जरा थांबा. या प्रेमाचे आपण सशास्त्र पृथक्करण करूं ह्मणजे त्याचे खरे स्वरूप आपणांस समजून येईल. तिनें सदोदित जवळ असावें, जवळच उभे राहावें, जवळच खावें आणि प्यावें असें त्यास वाटते; ह्मणजे तिने जवळ जवळ या स्वारीचा गुलामच बनून राहिले पाहिजे. तिला जणूं काय स्वतंत्र अशी काही हालचालच नाही. तिच्या तोंडांतून पडणारा प्रत्येक शब्द झेलण्यास हा तयार असतो. या कृतीचा खरा अर्थ ह्मणजे तिला स्वतःचा गुलाम करून हा स्वतः तिचा गुलाम बनतो. आतां या दोन गुलामांच्या प्रेमाचे खरे स्वरूप कितपतसे चिरस्थायी असणार बरें! ती कोठे क्षणभर बाहेर गेली तर याने वेड्यावांकड्या कल्पना करून स्वतःस दुःखी करून घ्यावे. मित्र हो, हे खऱ्या प्रेमाचे स्वरूपच नव्हे. इंद्रियजन्यसुखाच्या अभिलाषाने वेडावलेल्या मनुष्याची ती एक लहर आहे. आणि तो बोलून चालून वेडा झालेला असल्यामुळे भ्रमानें तें प्रेम आहे असा त्यास भास होतो आणि त्या लहरीच्या भरांत स्वर्गीय प्रेम ह्मणून तो नाचूं लागून दुसऱ्यासहि आपणासारखाच क्षणभर वेडा करतो. जर याच्या ह्मणण्याप्रमाणे एखादी गोष्ट करण्याचे तिने नाकारले तर याची तबियत बिघडली! खऱ्या प्रेमापासून उद्भवणाऱ्या चैतन्यतरंगांतून दुःख कधीहि आपली वाट काढूं शकणार नाही. ज्या ठिकाणी दुःखाची उत्पत्ति होतांना आढळते तें खरें प्रेमच नव्हे. ती वास्तविक भलतीच कांहीं वस्तु असून भ्रमाने प्रेम ह्मणून तिला आपण कवटाळित असतो. ज्या दिवशी कोणत्याहि वस्तूवर अथवा प्राण्यावर तुमचें खरें प्रेम जडेल- मग तें स्त्रीवर असो, पुत्रावर असो अगर दुसऱ्या कोणावर असो- त्या दिवशी तुह्मांस विश्वव्यापी प्रेमाची गुरुकिल्ली सांपडेल व त्याच दिवशी अलिप्तपणा ह्मणजे काय याचाहि बरोबर उलगडा होईल.<br> {{gap}}भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला ह्मणतात, ''''न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन । नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतंद्रीत: । ममवानुवर्तते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् । संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः॥'''' याचा भावार्थ असा आहे की 'मला या जगापासून काही प्राप्त करून घ्यावयाचे आहे ह्मणून मी कर्म करित नाही; परंतु या जगावर माझें प्रेम असल्यामुळे त्याच्या बऱ्यासाठी मी कर्म करतो. मी कर्म न केले तर हे लोकहि कर्म न केल्यामुळे अनेक प्रकारें नाश पावतील.' यावरून प्रेम आणि अलिप्तपणा यांची<noinclude><br>{{gap}}स्वा. वि. ६</noinclude> 6s959f4a5a1wdsmg0lsteo4yh7fmuql पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/110 104 63380 229194 157758 2026-04-13T06:06:36Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229194 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|८२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>बरीच कल्पना आपणांस होते. स्वतःला कसलीच इच्छा नसतां केवळ प्रेमाने वश होऊन भगवान् कर्म करतो ह्मणूनच तें कर्म अलिप्तपणाने होते. त्यांत इंद्रियजन्यसुखाच्या अभिलाषाची यत्किंचित् छटा उत्पन्न झाली की अलिप्तता आणि प्रेम या दोहोंचाहि बरोबरच नाश होतो. इंद्रियसुखार्थ प्रेम करणाऱ्या मनुष्याचे लक्ष्य बहुधा जडविषयापलीकडे जात नाही. एखाद्या पुरुषाचे अमूक स्त्रीवर प्रेम जडलें असें आपण ह्मणतो; परंतु वस्तुस्थिति पाहिली तर ते प्रेम त्या स्त्रीच्या शरीरावर जडलेले असते. तो तिच्या निरनिराळ्या अवयवांचे चिंतन करतो. ह्मणजे प्रेम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विकाराचे स्वरूप, जड विषयांत जें आकर्षण नित्य असते त्या आकर्षणाच्याच स्वरूपाचे आहे. लोखंडाचे जसें लोहचुंबकावर प्रेम असते, तसेंच मनुष्यांतील प्रेमाचेंहि वास्तविक स्वरूप असते. यामुळे एखाद्या यःकश्चित् कारणानेंहि अशा प्रेमाचा विपर्यास होऊन त्यांतून दुःखाची उत्पत्ति होते. खऱ्या प्रेमाचे स्वरूप याहून फार निराळे आहे. ते जडविषयाशी कधीहि संलग्न होऊन राहत नाही; तर जडविषयांपलीकडे असलेल्या चैतन्यरूपांत तें एकजीव होऊन राहते. खरें प्रेम करणारी अशा प्रकारची दोन मनुष्ये हजारों मैलांवर एकामेकांपासून निराळी असली तरी त्यांच्या प्रेमांत अंतर पडत नाही; तें कधीं नष्ट होत नाही, अथवा त्यांतून दुःखाचीहि उत्पत्ति होत नाही.<br> {{gap}}अशा प्रकारची अलिप्तता स्वतःच्या ठिकाणी आणणे ही गोष्ट सोपी नाही. याचा क्षणोक्षणी अभ्यास केला तर एक आयुष्य पुरे होईपर्यंत याची प्राप्ति झाली तर होईल; परंतु याची प्राप्ति झाल्याबरोबर खरें प्रेम आणि मुक्ति ही प्राप्त होतात. सध्या आपणाभोंवती पक्केसे दिसत असलेले जगाचे पाश खटाखट तुटून पडतात आणि सृष्टीचें खरें स्वरूप काय आहे याचा आपणांस बोध होतो. आपणांसाठी शृंखला बनविण्याचे काम सृष्टि सोडून देते यानंतर जे काही आपण करतो त्यांची भलीबुरी फळे आपणांस सेवन करावी लागत नाहीत. आपल्या कृतीचे फळ गोड आहे की कडू आहे, हे पाहण्याची आपणांस जरूरच राहिलेली नसते.<br> {{gap}}वास्तविक विचार केला तर आपण ज्यांना 'आपले' असें ह्मणत असतो त्यांवर तरी आपले खरे प्रेम असते काय? खुद्द आपले आपल्या मुलांवरील प्रेमहि खरोखर प्रेम या नांवास पात्र नसते. त्यांत कोठेंना कोठे स्वार्थांचा अंश असतोच. सूक्ष्म विचार करून पाहिले तर आपली दृष्टि स्वार्थापलीकडे<noinclude></noinclude> tjn3cnf624c3ovyktwvpwznm45ewbj8 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/111 104 63381 229195 157759 2026-04-13T06:08:56Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229195 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|८३ }} {{rule}}</noinclude>फारशी कधी गेलेलीच नसते. ''''केवळ लोकांसाठी, केवळ देशासाठी'''' अशी भाषा आपण तोंडाने वापरीत असतां अंतःकरणाच्या अगदी खोल भागांत कीर्तीची अपेक्षा दडून बसलेली असते. ज्या ठिकाणी कसल्या तरी प्रकारची फलाशा असते तेथे खऱ्या प्रेमाचा प्रवेशच होऊ शकत नाही; आणि जेथें खरें प्रेम नाहीं तेथें अलिप्तता तरी कशी येणार? तसेंच जेथें अलिप्तता नाही तेथे मुक्तीहि नाहीं; अशी ही परंपरा आहे. यासाठी आपण जेव्हां कोणतेंहि कर्म करतो तेव्हां तें केवळ कर्तव्य या दृष्टीने केले पाहिजे. त्यांत प्रतिफलाची कोणतीच आशा असतां उपयोगी नाही. असें कर्म करण्याची संवय जसजशी पक्की होत जाईल तसतशी आपल्या अंगी खरी अलिप्तता येईल.<br> {{gap}}आपल्या इंद्रियसुखाभिलाषाचे आपण नित्य गुलाम असतो असें पूर्वी सांगितलेच आहे. ज्याप्रमाणे गुलाम होऊन काम केल्यामुळे तें काम फलरूपाने आपणास बाधक होते, तसेच आपल्या इंद्रियांवर ताबा चालवून त्यांचा धनी होऊन-निरपेक्षपणाने केलेले कर्म, मोक्षदायक होतें. ''''वशे हि यस्योंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता।'''' असें भगवान् श्रीकृष्णाचे वचन आहे. हक्क आणि न्याय हे शब्द व्यवहारांत आपल्या कानांवरून अनेक वेळां जात असतात; परंतु खऱ्या दृष्टीने पाहतां या शब्दांना लहान पोरांच्या बडबडीपेक्षा अधिक महत्व कोणी देतोसें दिसत नाही. मानवी जातीचा नित्य व्यवहार अवलोकन केला तर तींत मुख्य असे दोन मनोधर्म आढळतात. एक सामर्थ्य आणि दुसरी दया. मनुष्याच्या सामान्य वर्तणुकीत यांपैकी कोणत्या तरी एका मनोधर्माचे प्राबल्य आढळतें. दया विसरून जेव्हां आपलें सामर्थ्य मनुष्य प्रगट करूं लागतो तेव्हां त्याची स्वार्थबुद्धि अत्यंत बळावलेली असते. अगदी सामान्य प्रतीच्या मनुष्याचा व्यवहार पाहिला असतां तो आपल्या ठिकाणी असलेल्या सामर्थ्याचा उपयोग एकसारखा करीत असतो असे आढळून येईल. दया ही क्वचित् आढळणारी चीज आहे. दयाशील अंतःकरण ह्मणजे प्रत्यक्ष स्वर्गच आहे. ज्याच्या अंतःकरणांत दयेचा विपुल सांठा आहे असा मनुष्य खरोखर परम भाग्यवान आहे. खरी न्यायबुद्धि जगांत फार थोडी आढळते; यासाठी हक्क आणि न्यायपद्धति यांची रचना दयेच्या पायावर केलेली असावी. आपल्या धर्मबुद्धीच्या वाढीला आड येणारा फार मोठा अडथळा ह्मटला ह्मणजे आपल्या कर्मापासून प्रतिफलाची अपेक्षा करणे हा होय. अशा अपेक्षेमुळे केवळ धर्मबुद्धीची वाढ खुंटते इतकेंच नाही, तर तीमुळे आपणांवर अनंत दुःखपरंपराहि<noinclude></noinclude> lbhitlf1u6rocawegmka0nm9kzu1rp6 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/112 104 63382 229196 157760 2026-04-13T06:11:26Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229196 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|८४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>कोसळतात. कोणत्याहि प्रकारच्या फलाची अपेक्षा न करतां कर्म करून ते ईश्वरास अर्पण करणे हा साकार परमेश्वराच्या पूजनाचा अत्यंत श्रेष्ठ असा विधि आहे. आपण देवाला वाहिलेले जिन्नस जसे परत घेत नाही तसेंच कर्म करीत असतां ती सर्व- बरी अथवा वाईट- परमेश्वरास अर्पण करावी. कर्म करीत असतां ही गोष्ट नित्य लक्षांत बाळगली तर आपल्या चित्तास हळू हळू तशी संवय लावता येईल. प्रत्येक कर्म 'कृष्णार्पण' ह्मटले ह्मणजे कोणत्याहि मनुष्याकडून प्रतिफळ मिळावें ही इच्छाच आपणांस करता येत नाही. श्रीकृष्ण ह्मणतात ''''यत्करोषि यदश्रानसी यज्जुिहोपि ददासि यत् । यत्तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥'''' स्वतः परमेश्वरहि अशाच प्रकारें नित्य कर्म करूनहि फलाची अपेक्षा न केल्यामुळे नित्यमुक्त असतो. अशा रीतीने कर्म करणारा मनुष्य एखाद्या मोठ्या शहरांतील अत्यंत पापी लोकांच्या वस्तीत राहिला तरी पाप त्याला स्पर्शहि करू शकणार नाही. कमळाचें पान जसें पाण्यांत राहूनहि ओलें होत नाही, तसेंच असा मनुष्य प्रत्यक्ष पापकूपांत राहिला तरी त्याला पापाचा स्पर्श होऊ शकत नाही. ''''ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः । लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा ॥'''' असें गीतेत सांगितले आहे.<br> {{gap}}यासंबंधी महाभारतातील एक कथानक तुम्हांस सांगतो. कौरव व पांडव यांजमधील युद्ध संपून कौरवांचा निःपात झाल्यावर राज्यपद प्राप्त झालेल्या पांडवांनी एक मोठा यज्ञ केला. त्या यज्ञांत गोरगरिबांस मोठमोठी दाने करण्यांत त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. तें दानशौर्य पाहून लोकांनी तर तोंडांत बोटच घातले. असा यज्ञ आमच्या ऐकण्यांतहि झाला नाही असें जो तो ह्मणूं लागला. तो यज्ञ समाप्त होण्याचे वेळी एक मुंगुस तेथें आला. त्याचे अर्धे शरीर सुवर्णाचें होतें; व बाकीचे अर्धे नेहमीप्रमाणे साधे होते. तेथें आल्याबरोबर यज्ञाच्या जागी जाऊन तो मुंगुस गडबडा लोळू लागला; व लोळतां लोळतां ह्मणूं लागला, “काय हो, हे लोक किती खोडसाळ आहेत तरी! मला सांगतात की येथे मोठा यज्ञ झाला! परंतु येथे यज्ञ झाल्याचे कांहींच चिन्ह नाही!" लोक ह्मणाले "मूर्खा, येथे यज्ञच झाला नाही असें कसें ह्मणतोस? आज या हस्तिनापुरांत गरीब असा कोणीच राहिला नाही. कारण यज्ञांतील दान घेऊन प्रत्येकजण गबर होऊन बसला आहे. असे असतां तूं यज्ञ न झाल्याचे सांगतोस त्या अर्थी तूं पक्का वेडाच असला पाहिजेस." यावर मुंगुस ह्मणाला, "मी सांगतो ती गोष्ट ऐका. एका लहानशा खेड्यांत एक गरीब ब्राह्मणाचे कुटुंब होते.<noinclude></noinclude> egadj1fjmweqsgk62xk698md49enuq2 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/113 104 63383 229197 157761 2026-04-13T06:14:23Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229197 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|८५ }} {{rule}}</noinclude>ब्राह्मण, त्याची पत्नी आणि मुलगा व सून अशी त्या कुटुंबांत चार माणसें होती. त्या गरीब ब्राह्मणास जी कांहीं थोडी प्राप्ति अध्यापनामुळे होत असे तींत त्या कुटुंबाचा कसाबसा निर्वाह चाले. अशा स्थितीत एकेवेळी तीन वर्षे अवर्षण पडल्यामुळे मोठा दुष्काळ पडून त्या बिचाऱ्या ब्राह्मणाच्या यातनांस पारावार नाहीसा झाला. अशा स्थितीत कित्येक दिवस उपवास पडला असतां एके दिवशी थोडें सातूचे पीठ त्या ब्राह्मणास मिळाले. त्या पिठाचे त्याने चार भाग केले. त्याच्या भाकरी तयार करून त्या आतां खाणार इतक्यांत दारांत एक अतिथि येऊन उभा राहिला. ''''अतिथि देवो भव'''' अशी धर्माज्ञा असल्यामुळे तो ब्राह्मण अतिथीस ह्मणाला, 'यावें महाराज, भोजनाची तयारी आहे.' असें ह्मणून त्याने आपलें ताट त्या अतिथीपुढे ठेविलें. अतिथीने त्या अन्नाचा एकच घांस करून झटले, 'भल्या गृहस्था, मी दहा दिवसांचा उपवासी आहे. तुमच्या या थोड्याशा अन्नाने माझी क्षुधा अधिक प्रदीप्त मात्र झाली.' त्या अतिथीचे हे भाषण ऐकून ब्राह्मणपत्नी पुढे येऊन ह्मणाली, 'महाराज, हा माझा भागहि आपण भक्षण करावा.' ब्राह्मणाने तिला तसे न करण्याविषयी सांगितले. पण ती धर्मनिष्ठ स्त्री ह्मणाली, 'आपण गृहस्थाश्रमी आहों, त्या अर्थी क्षुधिताला अन्न देणे हा आपला धर्म आहे.' अतिथीने तेंहि अन्न भक्षण केले; तरी त्याची क्षुधा शांत होईना. तेव्हां ब्राह्मणपुत्र ह्मणाला, 'महाराज हा माझा भाग घेऊन मजवर अनुग्रह करावा; पित्याच्या धर्माचरणांत सहाय होणे हा पुत्रधर्म आहे.' अतिथीने तोहि भाग भक्षण केला तरी त्याचे समाधान झाले नाही. तेव्हां ब्राह्मणस्नुषेनें आपलाहि भाग त्याला दिला. तो भाग खाऊन अतिथि तृप्त झाला व त्या कुटुंबास आशीर्वाद देऊन चालता झाला. त्याच रात्रीं क्षुधेनें तें सर्व कुटुंब मरण पावलें. तो अतिथि जेवला त्या ठिकाणी, भाकरीचे कांहीं कण पडले होते त्यांत लोळल्यामुळे माझें अर्धे शरीर सुवर्णाचें झालें हें तुह्मी पाहतच आहां. असाच यज्ञ आणखी कोठे होत असेल तर पाहावा ह्मणून सर्व जगभर मी फिरलों, परंतु असा यज्ञ कोठेच न झाल्यामुळे माझें अर्धे शरीर अद्यापि सुवर्णाचे झाले नाही. येथे मोठा यज्ञ झाला असें ऐकल्यामुळे मी येथे आलों, तरी माझें शरीर अद्यापि सुवर्णाचे झाले नाही. यावरून मी की येथे यज्ञ झालाच नाही."<br> {{gap}}मित्रहो, हिंदुस्थानांतील हे सुवर्णयुग आतां काळाच्या पोटांत गडप झाले आहे. आर्यभूच्या पोटी खरी पुत्ररत्ने आतां कमीच निपजतात. मी नवीनच इंग्रजी<noinclude></noinclude> c0lmb4oep2nfnpqiyi2izw8labymszt पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/114 104 63384 229198 157762 2026-04-13T06:19:13Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229198 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|८६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>शिकू लागलो होतो त्या वेळी एक इंग्रजी गोष्टींचे पुस्तक माझ्या वाचनात आले होते. त्यांतील एक गोष्ट मला आठवते ती अशी:- एका गांवीं एक मुलगा राहत होता. तो कोठे कामावर लागलेला होता. त्याला मिळणाऱ्या वेतनांतला कांहीं भाग तो आपल्या आईला देत असे; आणि या त्याच्या कृतीचे वर्णन लेखकानें मोठ्या कौतुकानें तीन चार पाने केले होते. तुह्मांस खरेंच सांगतों की आमच्या हिंदु मुलांस या गोष्टीचे तात्पर्य समजणे फार जड जाईल. 'जो तो आपापल्या पुरता' ही तुमची ह्मण त्यावेळी मला ठाऊक नव्हती, ह्मणून त्यावेळी त्या गोष्टीचे महत्व माझ्या ध्यानांत नीटसे आले नव्हते; परंतु तें आतां मला समजलें. आईबाप उपाशी मेले आणि बायकापोरांनी भीक मागितली तरी स्वतः अजीर्ण होईपर्यंत जेवणारे लोक मला तुमच्या या देशांत प्रथमच आढळले! छे! छे! कोणत्याहि गृहस्थाश्रमी मनुष्याने असलें राक्षसी ध्येय आपल्या पुढे ठेवू नये.<br> {{gap}}आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून कर्मयोगाचे रहस्य तुमच्या ध्यानांत बरेंच आले असेल. देहपात होण्याची वेळ आली तरी आश्रमधर्मापासून पराङ्मुख न होतां आणि कसलीहि बडबड न करतां कोणाच्याहि मदतीस पुढे होणे हा कर्मयोगाने सुचविलेला एक महत्वाचा मुद्दा आहे. हजारों लोकांनी तुह्मांला फसविलें तरी मागणारा कोणी भेटला की जवळ असेल तर ते त्यास द्यावयाचे हा तुमचा धर्म आहे. आपल्या दानाचा आपल्या तोंडानें कधींच उच्चार करूं नये, आणि दान घेणाराकडून नुसत्या कृतज्ञतेचीहि अपेक्षा करूं नये. संन्याशापेक्षांहि गृहस्थाश्रम किती कठीण आहे याची तुह्मांस आतां चांगलीच कल्पना झाली असेल. खरा त्यागी होऊन कांहींच न करतां राहणे हे जितकें कठीण आहे, तितकेंच-किंबहुना त्याहून अधिक असें गृहस्थाश्रमधर्माने राहणे हे आहे.<br> {{rule|6em}} <br> {{center|{{x-larger|प्रकरण ४ थें}}}} {{center|'''कर्तव्य.'''}} {{gap}}कर्तव्य ह्मणजे काय याचा विचार कर्मयोगाच्या विवेचनांत करणे अवश्य आहे. मला कोणतीहि गोष्ट करावीशी वाटली तर तें माझें कर्तव्य आहे की नाही याचा प्रथम विचार करून नंतर तें कर्म मी करीत असतो. नीतिविषयक कल्पना निरनि-<noinclude></noinclude> 9dqcfx60zyxvrovwrzav92kw8yfzk92 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/115 104 63385 229199 157763 2026-04-13T06:21:05Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229199 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|८७ }} {{rule}}</noinclude>राळ्या देशांत निरनिराळ्या प्रकारच्या असतात हे मी पूर्वी सांगितलेच आहे. त्याच प्रमाणे निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या कर्तव्यविषयक कल्पना प्रचलित असतात. कुराणांत ज्या गोष्टी कराव्या ह्मणून सांगितले आहे त्या करणे हे माझें कर्तव्य असें मुसलमान ह्मणेल. हिंदु ह्मणेल की वेदाची जी अनुज्ञा तें माझें कर्तव्य. तसेंच बायबलांत सांगितल्याप्रमाणे वागणे हे माझें कर्तव्य असे एखादा ख्रिश्चन मनुष्य ह्मणेल. निरनिराळ्या काळी, निरनिराळ्या देशांत आणि निरनिराळ्या परिस्थितीस अनुरूप अशा कर्तव्याच्या कल्पना प्रचलित असल्याचे इतिहासादि ग्रंथांवरून दिसून येते. जिचे प्रत्यक्ष स्वरूप अमुक ह्मणून दाखवितां येत नाही अशा कोणत्याहि भावरूप कल्पनेची निश्चित व्याख्या सांगणे कठीण आहे. कर्तव्य ही कल्पनाहि अशाच विषयांपैकी आहे. रोजच्या सामान्यव्यवहारांत घडून येणाऱ्या कारणकार्यांवरून आपल्या कर्तव्याची फक्त कल्पना मात्र आपणांस करता येते. आपल्या डोळ्यांसमोर ज्या ज्या गोष्टी घडत असतात त्या अवलोकन केल्याबरोबर त्या त्या प्रसंगी आपले कर्तव्य काय आहे, याची जाणीव आपोआपच आपल्या ठिकाणी उत्पन्न होते. हे कदाचित् आपल्या उपजत बुद्धीने होत असेल अथवा पूर्वानुभवहि कदाचित् याचे कारण असेल. तें कसेंहि असले तरी ही जाणीव जागृत झाल्याबरोबर मन त्या गोष्टीचा आपोआप विचार करू लागते. एखाद्या विशिष्ट प्रसंगी ज्या प्रकारे वागणे आपले कर्तव्य आहे असें आज आपल्या मनांत येते तसाच प्रसंग उद्या आला तर कदाचित् आजच्या अगदी उलट वागणे हेच कर्तव्य आहे असे आपल्या मनांत येण्याचा संभव आहे. कर्तव्य ह्मणजे काय असा प्रश्न केला तर 'आपल्या सदसद्विवेकबुद्धीस अनुसरून वागणे' असें उत्तर सामान्यतः बहुतेकांकडून आपणांस मिळेल. परंतु या उत्तराने सर्व प्रसंगी निर्वाह होतो असें नाही. उदाहरणार्थ: एखाद्या ख्रिस्ती मनुष्याजवळ गोमांसाचा काही पदार्थ असला आणि तो त्याने कोणा क्षुधार्तास दिला नाही अथवा स्वतःहि क्षुधार्त असतां भक्षण केला नाही, तर तो ख्रिस्ती मनुष्य स्वतःच्या दृष्टीने कर्तव्यभ्रष्ट ठरेल. उलटपक्षी एखाद्या हिंदूजवळ तें गोमांस असलें आणि केवळ भुकेने जीव गमावण्याची वेळ आली ह्मणूनच त्याने तें भक्षण केले अथवा अशा वेळी दुसऱ्यास दिले तर आपण कर्तव्यभ्रष्ट झालों असें त्या हिंदूस खचित वाटेल. गाईच्या पूज्यतेसंबंधी ज्या गोष्टी लहानपणापासून त्याने ऐकिलेल्या असतात, त्यांचा परिणाम चित्तावर होऊन गोमांस भक्षण करणे ह्मणजे घोर पातक असें त्यास वाटले तर त्यांत<noinclude></noinclude> ardqu8yqlm5djcwnmnv4ewktryx8ik5 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/116 104 63386 229200 157793 2026-04-13T06:23:07Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229200 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|८८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>नवल नाही. अठराव्या शतकात हिंदुस्थानांत ठग या नांवाचे लोक राहत असत. मनुष्ये मारणे हाच त्यांचा जन्मजात व्यवसाय होता. यामुळे खून करणे हेच आपले कर्तव्य आहे असे प्रत्येक ठगास वाटे. जो सर्वात अधिक खून करील तो सर्वोत अधिक पुण्यवान् असें ते समजत. एखादा मनुष्य रस्त्याने जात असतां त्याने आपली बंदुक रोखून दुसऱ्या एखाद्या मनुष्याचा प्राण घेतला तर त्याला साहजिकपणे आपल्या कृत्याबद्दल वाईट वाटेल निदान तसें वाटण्याचा बराच संभव आहे; परंतु तोच एखाद्या पलटणीत शिपाई असला आणि लढाईत त्याने वीस मनुष्ये मारली तर अशा वेळी आपण आपल्या जन्मभूमीची मोठीच कामगिरी बजाविली असें वाटून त्यास मोठा आनंद होईल. यावरून केवळ कृत्यावरूनच कर्तव्याचे क्षेत्र निश्चित होत नाही. यामुळे अमुक एक कृत्य कर्तव्य आणि अमुक एक अकर्तव्य असें निश्चितपणे सांगतां येणे शक्य नाही; तथापि कर्तव्य कशास ह्मणतां येईल याचे विवेचन भावरूपाने करता येण्याजोगे आहे. ज्या कृत्याने आपले हृदय शुद्ध होऊन त्यांत परमेश्वराचा उदय होण्यास अवसर सांपडतो तें पुण्यकर्म असून आपले कर्तव्य आहे. तसेच ज्या कृत्याच्या योगानें अंतःकरण मलीन व दुष्ट होण्याचा संभव असतो तें दुष्कृत्य असून त्याज्य आहे असे समजावें. ही पापपुण्याची अथवा कर्माकर्माची भावरूप व्याख्या झाली; तरी हिजवरून अमुक कृत्य करावें अथवा अमुक कृत्य करूं नये असें विधिनिषेधात्मक वचन सांगणे शक्य नाही. असें आहे तरी सर्व काळी, सर्व स्थळी आणि सर्व धर्माचें जीबद्दल एकमत झालेले दिसतें अशी पापपुण्याची एकच व्याख्या आहे. ती '''' परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् । '''' या संस्कृत उक्तींत उत्तमप्रकारे व्यक्त झाली आहे.<br> {{gap}}धर्म कोणता आणि अधर्म कोणता याविषयींचे विवेचन भगवद्गीतेत वर्णधर्मानुसारें केले आहे. वर्णानुरोधानें प्रत्येकाचे गुणकर्म व मनोधर्म कोणत्या प्रकारचे असण्याचा संभव आहे याचा साधारण निर्णय होतो. यामुळे ज्या परिस्थितीत आणि वर्णात आपला जन्म झाला असेल त्या वर्णाला त्या परिस्थितीत कोणती कर्मे अभिमत होतात याचा विचार करून त्यांतून स्वतःला कल्याणप्रद आणि मनःशुद्धिकर अशी कर्मे निवडून काढतां येतात; तथापि सर्व देशांत आणि सर्व काळी एकाच प्रकारच्या स्थितीतील निरनिराळ्या समाजांत पापपुण्याच्या कल्पना एकसारख्याच असत नाहीत. ही वस्तुस्थिति लक्ष्यांत न आल्यामुळे एक राष्ट्र दुसऱ्याचा द्वेष करते. अमेरिकन चालीरीतींप्रमाणे<noinclude></noinclude> pfzqcbu4cauj43l1ix9rhof90qm70d0 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/117 104 63387 229201 157794 2026-04-13T06:24:04Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229201 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|८९ }} {{rule}}</noinclude>वागणे आपले कर्तव्य आहे असे एखादा अमेरिकन ह्मणतो. तसेंच एखादा हिंदु आपल्या चालीरीती सर्वोत्कृष्ट असतात, आणि त्या चालींप्रमाणे न वागणारा तो पापी होय असें ह्मणत असतो. अशा प्रकारची चूक तुमच्या आमच्या सारख्या सामान्य मनुष्याच्या हातून होणे साहजिक आहे; तथापि असल्या क्षुल्लक वाटणाऱ्या चुकीचे फार वाईट परिणाम होतात. शिकागो प्रदर्शनांत मी प्रथमच गेलों असतां पाठीमागून एका अमेरिकन गृहस्थाने माझ्या पटक्याचे टोंक धरून ओढले. मी मागे वळून पाहिले तेव्हां त्याच्या पोषाखावरून तो सभ्य गृहस्थ असावा असे मला वाटले. मी त्याच्याशी भाषणास सुरवात केल्याबरोबर मला इंग्रजी भाषा येते असे पाहून तो गृहस्थ फार ओशाळला. त्याच प्रदर्शनांत दुसऱ्या वेळी एका गृहस्थाने मला धक्का दिला. मी त्याला तसे करण्याचे कारण इंग्रजीत विचारले तेव्हां तोहि फार खजील झाला, आणि 'असा पोषाख का करतां' असें कांहीं पुटपुटत स्वारीने तेथून पाय काढला. सामान्यतः कोणत्याहि मनुष्याला दुसऱ्या मनुष्याबद्दल वाटणारा आत्मभाव, या गृहस्थांच्या मते जणूं काय भाषेत किंवा पोषाखांतच असतो. आरंभी असल्या गोष्टी अगदी क्षुल्लक वाटल्या तरी त्यांचे परिणाम कित्येक वेळां फारच वाईट होत असतात. बलिष्ठ राष्ट्र एखाद्या दुर्बल राष्ट्राचा छळ, कित्येक वेळां याच प्रकारच्या क्षुल्लक कारणासाठी करीत असतात. केवळ भिन्न चालीरीती पाहून त्यांच्या मनांतील सहानुभूतीचा झरा जणूं काय आटूनच जातो. फार कशाला, माझा पोषाख पाहून बुजलेला गृहस्थ कदाचित् खरोखरच चांगल्या स्वभावाचा असेल; आपल्या आप्तेष्टांशी व मुलाबाळांशी तो फार चांगल्या प्रकारे वागत असेल; तसेंच आपली इतर लौकिक कर्तव्येहि तो चांगल्या रीतीने पार पाडीत असेल; परंतु आपल्या चालीपेक्षां निराळ्या चालीचा पोषाख दृष्टीस पडतांच त्याचा चांगुलपणा एकदम कोठे नाहीसा झाला! मनुष्य परठिकाणी गेला ह्मणजे तेथील लोकांकडून त्याला अनेक प्रकारचा उपसर्ग पोहोचतो असें सर्वत्र आढळते आणि असे होण्याचे कारण पाहिले तर, त्या त्या देशांतील चालीरीती त्याला माहित नसल्यामुळे, त्याला स्वतःचे संरक्षण करणे दुरापास्त होते, इतकेच. पण यामुळे आपल्या देशास परत जातांना परकीयांबद्दल अत्यंत अनिष्ट ग्रह आणि द्वेष तो बरोबर घेऊन जातो. जहाजांवरील खलाशी, सैन्यांतील शिपाई आणि बारीकसारीक व्यापारी परक्या देशांत गेले ह्मणजे किती विक्षिप्तपणे वागतात हे तुह्मांस ठाऊकच असेल. ज्या गोष्टी<noinclude></noinclude> kcuylz9oizgu93yw4jp1a2a43rr2asd साहित्यिक चर्चा:लोहिया शैला 103 109382 229232 226672 2026-04-13T08:25:53Z QueerEcofeminist 918 /* पान वगळणे */ Reply 229232 wikitext text/x-wiki == पान वगळणे == @[[सदस्य:QueerEcofeminist|QueerEcofeminist]], [[साहित्यिक:शैला लोहिया]] हे पान अस्तित्वात असल्याने [[साहित्यिक:लोहिया शैला]] हे पान वगळावे ही विनंती. धन्यवाद! [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १७:५९, २३ नोव्हेंबर २०२५ (IST) :झाले @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] वगळले [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] १३:५५, १३ एप्रिल २०२६ (IST) s7bip9bl6onxzhxzk9n5r61hd48fks5 अनुक्रमणिका:तुकारामवचनामृत.pdf 106 110098 229202 2026-04-13T08:13:16Z सुबोध कुलकर्णी 1231 नवीन पान 229202 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=तुकारामवचनामृत |Language=mr |Volume=अध्यात्मग्रंथमाला - ग्रंथांक ३ |Author=रामचंद्र दत्तात्रेय रानडे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher= |Address=पुणे |Year=1925 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} tbr18fb5lbpfzcb6d9nmmw6g5aa3fbd पान:तुकारामवचनामृत.pdf/१ 104 110099 229203 2026-04-13T08:13:45Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "अध्यात्मग्रंथमाला " तैसें अध्यात्मशास्त्रीं इये। अंतरंगचि अधिकारिये । परि लोकु वाक्चातुयें । होईल सुखिया ।। " 00. ग्रंथांक ३ ज्ञानेश्वरी.. १८.१७५० तुकारामवचनामृत रा. द. रानडे, एम्. ए..." 229203 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>अध्यात्मग्रंथमाला " तैसें अध्यात्मशास्त्रीं इये। अंतरंगचि अधिकारिये । परि लोकु वाक्चातुयें । होईल सुखिया ।। " 00. ग्रंथांक ३ ज्ञानेश्वरी.. १८.१७५० तुकारामवचनामृत रा. द. रानडे, एम्. ए. किंमत रुपये<noinclude></noinclude> exhlwyi193uzxsndk2sv1kyzuo5c791 पान:तुकारामवचनामृत.pdf/२ 104 110100 229204 2026-04-13T08:13:51Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "पुस्तकें मिळण्याची ठिकाणें Academy of Philosophy and Religion, Post Deccan Gymkhana, Poons. २ अध्यात्मविद्यापीठ, पोट निंबाळ, जिल्हा विजापूर. 3 आयंभूषण प्रेस, पुणे. गणेश प्रिंटिंग वर्क्स, शनिवार पेठ, पुणे. सर्व बकसेलर्स,..." 229204 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>पुस्तकें मिळण्याची ठिकाणें Academy of Philosophy and Religion, Post Deccan Gymkhana, Poons. २ अध्यात्मविद्यापीठ, पोट निंबाळ, जिल्हा विजापूर. 3 आयंभूषण प्रेस, पुणे. गणेश प्रिंटिंग वर्क्स, शनिवार पेठ, पुणे. सर्व बकसेलर्स, पुणे, मुंबई, नागपूर, बगेरे. हे पुस्तक रा. गणेश काशिनाथ गोखले यांनी गणेश प्रिंटिंग प्रेस, जमखंडीकर यांचा वाडा ( पार्ने २७/२०५), रा. अनंत विनायक पटवर्धन यांनी आर्यभूषण छापखाना (प्रस्तावना, पान २१-२५) यांमध्ये पुणे येथें छापिलें व तें प्रो. रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांनी पर्णे येथें प्रसिद्ध केलें.<noinclude></noinclude> 5shat1k6di612b7llqmufmbxg8xrcdv पान:तुकारामवचनामृत.pdf/३ 104 110101 229205 2026-04-13T08:13:59Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तुकारामवचनामृत. - प्रस्तावना. ऐतिहासिक. १. श्री तुकाराममहाराजांच्या चरित्रासंबंधानें ऐतिहासिक दृष्ट्या तीनच प्रभ फार महत्त्वाचे आहेत : (१) तुकाराम महाराजांचा जन्म केव्हां झाला, (..." 229205 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तुकारामवचनामृत. - प्रस्तावना. ऐतिहासिक. १. श्री तुकाराममहाराजांच्या चरित्रासंबंधानें ऐतिहासिक दृष्ट्या तीनच प्रभ फार महत्त्वाचे आहेत : (१) तुकाराम महाराजांचा जन्म केव्हां झाला, (२) - त्यांस गुरुपदेश केव्हा मिळाला, आणि ( ३ ) त्यांचें निर्याण केव्हां झालें ? या संतशिरोमणि साधूच्या चरित्रासंबंधी या तीन्हीं गोष्टींबद्दल अद्याप विद्वानांमध्यें - मतभेद आहे ही मोठ्या खेदाची गोष्ट होय. तुकाराममहाराजांच्या जन्मासंबंधी - तीन निरनिराळीं मतें प्रचलित आहेत : ( १ ) रा. राजवाडे यांनी वांइकडील एका `वारक-याच्या घरांतील तुकारामांच्या वंशावळीवरून तुकाराम महाराजांचा जन्म शके १४९० साली झाला असें ठरविलें आहे; (२) रा. भारदे यांनी देहू व पंढरपूर येथील तुकारामांच्या वंशावळीनुरूप तुकारामांचा जन्मकाल शके १५२० ह्रा धरला आहे; ( ३ ) रा. पांगारकर यांनी महिपतीच्या वचनांच्या आधारें तुका- रामांचें वय शके १५५१ च्या दुष्काळांत निम्मे म्हणजे एकवीस वर्षांचे होते असें धरून तुकारामांचा जन्मकाल शके १५३० असा ठरविला आहे. रा. राजवाडे यांच मत खरे मानल्यास, तुकारामांनी ज्यावेळी देह ठेविला त्यावेळी, म्हणजे त्यांच्या ८२ थ्या वर्षी, त्यांची बायको गरोदर होती ही गोष्ट असंभवनीय दिसते. रा. भारदे यांनी ज्या वंशावळींवर विश्वास टाकला आहे त्या फारशा जुन्या आहेत असें दिरुत नाहीं; तथापि त्या देहू व पंढरपूर येथील आहेत ही गोष्ट ध्यानांत ठेविली पाहिजे. रा. पांगारकर यांच्या म्हणण्यास शके १५५१ मध्ये तुकारामांचें वय एकवीस<noinclude></noinclude> 7map1xbn1tr3tgm9sqrxkgfzjtw3oo3 पान:तुकारामवचनामृत.pdf/४ 104 110102 229206 2026-04-13T08:14:09Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तुकारामवचनामृत- वर्षांचें असावें हें अनुमानच सबळ पुरावा आहे. तथापि शके १५२० अगस् १५३० ही दोनच सालें तुकारामांच्या जन्मासंबंधी विचारणीय आहेत यांत शंका नाहीं. तुकाराम महाराजांच..." 229206 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तुकारामवचनामृत- वर्षांचें असावें हें अनुमानच सबळ पुरावा आहे. तथापि शके १५२० अगस् १५३० ही दोनच सालें तुकारामांच्या जन्मासंबंधी विचारणीय आहेत यांत शंका नाहीं. तुकाराम महाराजांच्या गुरुपदेशाचा शक कोणता याच गुलही दोन निर- निराळीं मतें प्रसिद्ध आहेत. तुकारामांनी आपल्या एका अभंगांत ( क्रमांक १ ) माघ शुद्ध १० गुरुवारी स्वप्नांत आपल्यास गुरूपदेश झाला असें लिहिलें आहे. आतां माघ शुद्ध १० गुरुवार शके १५४१ मध्येही येतो, व शके १५५४ मध्येही येतो. भारदे यांच्या मताप्रमाणे तुकारामांचा जन्म शके १५२० साली झाला असे मानल्यास शके १५४१ मध्ये माघ शुद्ध १० स तुकारामांस गुरुपदेश झाला है. म्हणणें योग्य ठरतें, व रा. पांगारकर यांच्या मताप्रमाणे तुकारामांचा जन्म शके १५३० साली झाला असें मानल्यास शके १५५४ मध्ये त्यांस गुरुपदेश झाला असावा असें मानण्यास हरकत नाही. ज्याप्रमाणें तुकारामांचा जन्म व गुरुपदेश यांच्या तारखा भानगडीच्या आहेत, त्याप्रमाणेच त्यांच्या निर्याणाच्या तारखेसंच- धीही थोडीबहुत भानगड आहे; पण ही भानगड पूर्वीच्या भानगडीइतकी मोठी. नाहीं. प्रश्न इतकाच आहे, की तुकारामांचे निर्वाण शके १५७१ साली झाले असे समजावें, कां शके १५७२ साली झालें असें समजावें ? संताजी जगनाडे यांचा मुलगा बाळाजी यानें आपल्या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वहीत स्वदस्तुर सके १५७२ वीती नाम संवछरे फळगुन वदी २ द्वीतीया वार सोमवार " रोजी तुकाराम महाराजांचं निर्याण झालें असें लिहिलें आहे.... देहू येथें पूजेतील तुकारामांच्या अभंगाची जी वही आहे तीत १५७१ वीरोधीनां सबछरे शीमगा वद्य द्वितीयाः वार सोमवार " रोजी तुका- रामांचें निर्याण झालें असें लिहिलें आहे. कोणत्याही एका गोष्टीचा काल ठरवि- तांना तीथ, वार, पक्ष, महिना, शक, इत्यादिकांचा बरोबर जम बसणें हैं. किती कठीण आहे हैं आमच्या इतिहासज्ञ वाचकांस सांगणे नकोच. रा. पांगारकर यांच्या मताप्रमाणें शके १५७१ फाल्गुन वद्य द्वितीया शनिवार रोजी तुकाराम- बैकुंठास गेले, व रा. वि. ल. भावे यांच्या मताप्रमाणें (गत ) १५७२ बिकृतसंवत्सर फाल्गुन वद्य द्वितीया सोमवारी तुकारामानी प्रयाण केलें असें होतें. या एकंदर हकीकतीवरून पाहतां भक्तशिरोमणि तुकाराम महाराजांच्या चरित्रासंबंधानें ऐति- हासिक पुरावा जितका सचळ पाहिजे तितका उपलब्ध नाही याबद्दल फार वाईट वाटतें. 46 " सके<noinclude></noinclude> p5nc5skenb1shwexfodqz04g8f0klzd पान:तुकारामवचनामृत.pdf/५ 104 110103 229207 2026-04-13T08:14:17Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रस्तावना. तुकारामांचें आत्मचरित्र. २. ऐतिहासिक पुराव्यासंबंधानें अशी जरी स्थिति आहे तथापि तुकाराम महाराजांच्या चरित्रांतील गोष्टींसंबंधी मात्र खात्रीची व विश्वासनीय माहि..." 229207 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>प्रस्तावना. तुकारामांचें आत्मचरित्र. २. ऐतिहासिक पुराव्यासंबंधानें अशी जरी स्थिति आहे तथापि तुकाराम महाराजांच्या चरित्रांतील गोष्टींसंबंधी मात्र खात्रीची व विश्वासनीय माहिती उपलब्ध आहे. ही माहिती म्हणजे खुद्द तुकाराम महाराजांच्या अभंगांतूनच मिळालेली `आहे. तुकारामांचे अभंग म्हणजे तुकारामांचें एक व्यावहारिक व पारमार्थिक आत्म- चरित्रच होय. प्रथम आपल्यास येथें त्यांच्या व्यावहारिक म्हणजे बाह्यचरित्रा- बद्दलच चर्चा करावयाची आहे. त्यांच्या परमार्थिक म्हणजे अंतचरित्रासंबंधीं थोडक्यांतच पुढे बोलूं. तुकाराममहाराज कुणची जन्मल्याबद्दल आनंद मानतात (क्र. ३ ), व आनुवंशिक संस्कारामुळे पंढरीची वारी करण्याचे भाग्य मला प्राप्त झाले आहे असे ते लिहितात ( क्र. ४). त्यांस जरी महाजनकीचें वतन होतें तथापि दुष्काळांत ते सगळे आटले जाऊन त्यांची पहिली स्त्री रखुमाबाई व मुलगा हीं दुष्काळांत अन्न अन्न करितां मेली, व देवानें त्यांस मायाविरहित केलें (क्र. ९ )- ज्या साली हा दुष्काळ पडला तें साल रा. पांगारकर यांनी आपल्या - नेहमीच्या शोधक बुद्धीस अनुसरून गॅझेटियरवरून व इतर साधनांवरून शके १५५१ - १५५२ असें ठरविलें आहे. तुकारामांचे वडील च - मातोश्री ही तत्पूर्वीच निवर्तलीं होतीं. दुष्काळांतच तुकारामांची गुरेढोरें मरुन दिवाळेंही निघाले, व यामुळे जगांत अपमान झाल्यानें तुकारामांस संसार वमन- प्राय वाटावयास लागला ( क्र. ६). त्यांची दुसरी बायको जिजाबाई ही फार - कर्कशा असल्यानें जनांमध्ये त्यांची फार दुर्दशा व्हावयास लागली ( क्र. ६). "जो उठतो तो टाळकुटतो, यांच्या नांवानें यांची बायकापोरें रडत आहेत' असें तुकारामांची बायको त्यांच्याबद्दल व त्यांच्या संतांबद्दल बोलू लागली (क. ८). अशा - वेळी जे चार पैसे तुकारामांच्या गांठीं होते ते खर्चून तुकारामांनी एक लहानसें देऊळ बांधलें ( क्र. ६ ); पण तेंही भंगून गेलें असावें असें दिसतें ( क्र. २९ ). गांवांतील लोक व पाटील यांनीं तर न्यायाच्या कचेरीपुढंच तुकारामांस खेचलें (क्र. ५). अशा स्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे हरिभजनावांचून नाहीं असा संकल्प करून तुकाराम प्रथम एकादशी व कीर्तन करावयास लागले. तथापि त्यांचें अभ्यासाकडे असावें तसें लक्ष नव्हतें. विश्वासानें व आदरानें ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, इत्यादि संतांची वचनें पाठ करून ते प्रथम धुपद धरावयास लागले, व नंतर कीर्तन<noinclude></noinclude> 422e8j03haq5uokmcuar0aq3vvjdl9f पान:तुकारामवचनामृत.pdf/६ 104 110104 229208 2026-04-13T08:14:27Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "60 8 तुकारामवचनामृत. करावयास लागले ( क्र. २९ ). आपल्या इष्टमित्रांचें वचन तुकारामांनी मानिलं नाही; त्यांनी चहुमतास धाब्यावर बसविलें ( क्र. २९ ); व भामनाथ, भंडारा, इत्यादि डोंगरांच्या एक..." 229208 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>60 8 तुकारामवचनामृत. करावयास लागले ( क्र. २९ ). आपल्या इष्टमित्रांचें वचन तुकारामांनी मानिलं नाही; त्यांनी चहुमतास धाब्यावर बसविलें ( क्र. २९ ); व भामनाथ, भंडारा, इत्यादि डोंगरांच्या एकांतांत शिरून ते भजन करावयास लागले (क्र. २८). अशाच वेळीं त्यांस गुरूंचा उपदेश झाला. माघ शुद्ध १ ० गुरुवारी स्वप्नांत त्यांस दृष्टांत होऊन त्यांच्या गुरूंनी आपली. परंपरा राघवचेतन्य, केशवचेतन्य, यांपासून आली आहे असें सांगून आपले नांव बाबाजी असे सांगितले, व तुकारामांस "रामकृष्णहरि" हा मंत्र दिला ( क्र. १ ).. हा मंत्र सोपा व तुकारामांच्या आवडीचा असल्यानें संसारसागर तरण्यास ही एक नौकाच आहे असें त्यांस वाटले (क्र. २ ). तुकारामांची शिष्यीण बहिणाबाई हिने राघवचैतन्य हे ज्ञानदेवांचे शिष्य जे सच्चिदानंदद्याचा त्यांचे शिष्य होत असे. लिहिले आहे. यावरून पाहतां तुकारामाची परंपरा एकाप्रकारें ज्ञानदेवांपासूनच आली आहे असे म्हणण्यास हरकत नाही. कांहींच्या मतें चाचाजी चैतन्य हेच केशवचैतन्य असून कांहींच्या मते हे दोघे भिन्न आहेत. तुकारामांनी आपले. गुरु बाबाजी यांचा उल्लेख आणखी दोन तीन ठिकाणी केला असून एके ठिकाणी आपल्यास ' बाबाजीसद्गुरुदास असे म्हटले आहे (क्र. २७ 1) व दुसरे ठिकाणी आपल्यास गुरूचें स्थूलदर्शन झालें नाहीं तरी हरकत नाहीं, त्यांच्या रूपनें मिळालेलें सूक्ष्मदर्शन हे स्थूलदर्शनाइतकेंच महत्त्वाचें आहे असें त्यांनी म्हटले आहे:- 66 11 ज्योतिचा प्रकाश पाहेन तुझे पाय । स्टुळामाजि काय आहे माझे ॥ सूक्षमांश जरि कारण ते आशे । निळबिंदु वशे शामवर्ण ॥ ममुरे प्रमाण मोतियाचे परी आहे दशवे द्वारी निजरूप ॥ | डोळिया न दिसे हातानें धरवेना। हेचि खूण जाणा संतामाजि ॥ तुका म्हणे माझे तोडिलें बंधन । सद्गुरु निधान बाबाजीनें ॥ ३. याच सुमाराम तुकारामांस नामदेवांचे स्वप्नामध्ये दर्शन होऊन नामदेवांनी त्यांस आपली शतकोटि अभंगांची प्रतिज्ञा पुरी करण्यास सांगितलें असें तुकारामांनी लिहिलें आहे (क्र. ११) नामदेवांबरोबर विठ्ठलाचेहि स्वप्रदर्शन झाल्याचें तुकाराम सांगतात (क्र. १२ ). आपण जी अभंगरचना केली ती आपली नमून देवाच्या कृपेचीच आहे, या अभंगांचे प्रयोजन काय हे मला समजत नाहीं,. माझ्या हातून होईल तितकी बडबड मी केली आहे असें तुकाराम सांगतात (क्र.१३). तुकारामांचें प्रसादपूर्ण व भक्तिरसपरिप्लुत कवित्व रामेश्वरभट या नांवाचा एक दशग्रंथी<noinclude></noinclude> 56t3javqtnn9kz9wwnvveo10uexgfz7 पान:तुकारामवचनामृत.pdf/७ 104 110105 229209 2026-04-13T08:14:35Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रस्तावना. ब्राह्मण होता त्याच्यानें पाहवेना. म्हणून त्याचें समाधान करण्याकरितां तुकारामांनी आपलें कवित्व नदीत बुडविलें व तेरा दिवस निश्यक उपवास केला (ऋ. १५)- अशा वेळी आपल्यास..." 229209 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>प्रस्तावना. ब्राह्मण होता त्याच्यानें पाहवेना. म्हणून त्याचें समाधान करण्याकरितां तुकारामांनी आपलें कवित्व नदीत बुडविलें व तेरा दिवस निश्यक उपवास केला (ऋ. १५)- अशा वेळी आपल्यास बालवेशानें देवाचें दर्शन झाल्याचे तुकारामांनी लिहिलें आहे. (क्र. १६ ). तुकारामांचा द्वेष केल्यामुळे रामेश्वरभट्टाच्या शरीरांत फार व्यथा उत्पन्न झाली व ज्ञानेश्वरांच्या स्वप्नांतील अनुज्ञेप्रमाणे तुकारामांस शरण गेल्यावरच त्याची ती व्यथा कमी झाली ( क्र. २५). जो परमार्थाचें वर्म समज- यापूर्वी तुकारामांची निंदा करीत असे, त्यानेंच परमार्थप्राप्तीनंतर भक्तिज्ञान- राया तुकारामांइतका श्रेष्ठ पुरुष आपण पाहिलाच नाहीं अशी ग्वाही दिली आहे (क्र. २६). एकदा आपले प्रियशिष्य शिवचा कासार यांचे घरी लोहगांवास तुकाराम कीर्तनास गेले असतां शिवचांच्या बायकोनें त्यांच्या अंगावर आधणाचें पाणी ओतलें. त्यामुळे जणूं कांहीं शरीरास वणवाच लागल्याप्रमाणें तुकारामांस व्यथा झाली ( क्र. २३ ); तथापि ईश्वराची करुणा भाकिल्यामुळे तो दाह शांत झाला, असें तुकाराम सांगतात (क्र. २४). शिवाजी महाराजांनी एकदा जडजवाहीर देऊन आपल्या एका कारकुनास तुकारामांकडे पाठविलें असतां 'मुंगी आणि राव, सोन व माती, आम्हांस सारखींच आहेत' असें त्यांनी त्यास उत्तर दिलें (क्र.३४). तुका- रामांच्या देहावसानाचे अगोदरच कांही वर्षे शिवाजीनें तोरणा किल्ला घेतला होता; तसेंच शिवाजीचें पुण्यास नेहमी जाणें येणें असे; यावरून तुकारामांची व शिवाजीची भेट खात्रीने झाली असावी असें दिसतें. शिवाजी एकदां तुकारामांच्या कीर्तनास बसला असतां अकस्मात् मुसलमानांचा हल्ला आलेला पाहून "मी आपल्या मरणाला भीत नाहीं; या जनांस दुःख झालें असतां मात्र मला तें पाहवणार नाहीं ( क्र. ३२), अशी तुकारामांनी देवाची प्रार्थना केली. कर्मधर्मसंयोगाने काहीं कारणानें एकदम मुसलमानांचा वेढा उठला, व इकडे तुकाराम व शिवाजी यांची सुटका झाली; व हरिदासांच्या वान्यासही परचक्र राहणार नाहीं ( क्र. ३१) अशी त्यांची खात्री पटली. तुकाराम महाराजांचे “ पाइकीचे अभंग " म्हणून जे प्रसिद्ध आहेत ते शिवाजीसच अनुलक्षून लिहिले असावेत असें जें रा. पांगारकर यांनी लिहिलें आहे तें यथार्थ दिसते. परमार्थ अगर प्रपंच बहादुरी केल्याखेरीज होत नाहीं असा या अभंगांचा सारांश आहे. तुकारामांनी शिवाजीस "सद्गुरु श्रीराम- दासांचें भूषण । तेथें घाली मन चळों नको" असा उपदेश केल्याबद्दलचाही एक अभंग आहे. हा अभंग तुकारामांचाच आहे किंवा नाहीं याबद्दल थोडी शंका आहे. "<noinclude></noinclude> pbhq75gp63539pwj4m6dstu2p3uc6ki पान:तुकारामवचनामृत.pdf/८ 104 110106 229210 2026-04-13T08:14:44Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "६ तुकारामवचनामृत. तथापि रामदास शके १५६६ मध्ये कृष्णातीरी आले; शके १५७१ च्या आषाढ- मासी ते पंढरपुरात विठ्ठलदर्शनास गेले होते, व शके १५७२ साली तुकारामांनी देह ठेविला; या गोष्टी लक्..." 229210 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>६ तुकारामवचनामृत. तथापि रामदास शके १५६६ मध्ये कृष्णातीरी आले; शके १५७१ च्या आषाढ- मासी ते पंढरपुरात विठ्ठलदर्शनास गेले होते, व शके १५७२ साली तुकारामांनी देह ठेविला; या गोष्टी लक्षांत घेतल्यावर रामदासांची व तुकारामांची भेट झालोच नव्हती असें म्हणतां येणार नाहीं. निदान, रामदासांचें नांव तरी तुकारामांनी ऐकले असले पाहिजे, व शिवाजीचा ओढा रामदासांच्याकडे आहे असे समजून त्यास तदनुरूप उपदेश केला असला पाहिजे. असो. तुकाराम आपल्या स्वतःच्या कबुलीजबाबाप्रमाणे पंढरीसांप्रदायाचे कळस बनले होते ही गोष्ट सिद्ध आहे. एका वारीस ते आजारी असल्याने त्यांच्याने पंढरीस जाववेना. त्यावेळी त्यांनी जे हृदयस्पर्शी अभंगरूप पत्र लिहिलें आहे तें फारच वाचनीय आहे. आणखी एका प्रसंगी एका ब्राह्मणास ज्ञानेश्वरांचा दृष्टांत झाल्यामुळे तो तुकारामां- कडे आला. त्यावेळी "देवापाशी मोक्षाचे गांठोडें नाहीं; आपण इंद्रियांचा जय करून, देहभावास ओस पाडून, देवास आळविलें असतां, त्याची प्राप्ति होईल, ज्यास गोविंदाचें ध्यान लागले त्याची कायाही गोविंदरूपच होते; आपण अल्पमात्र आहों असें समजून संकोच पावूं नकोस; या सर्व ब्रह्मांडाचें आपोशन घे, " असा तुकारामांनी त्या ब्राह्मणास उपदेश केला (क्र. ३५-१९ ); व ज्ञानेश्वरांबद्दल आपण त्यांच्या पायाची वहाण आहों असें सांगून आपली अनु- पम नम्रता प्रकट केली, आणि जे चार शब्द मी वेडेवांकुडे बोललो असेन त्याबद्दल ज्ञानेश्वरांनी आपल्यास क्षमा करावी असें ज्ञानेश्वरांजवळ मागणे मागितले (क्र. ४०-४१). तुकारामांच्या देहावसानाचा समय आला तेव्हां गरुडासमवेत देवाचें मला दर्शन होत आहे, व ते मला बकुंठाप्रत बोलावीत आहेत, असें सांगून तुकारा- मांनी देह ठेविला (क्र. ४२--४३ ). ज्यानें गोविंदाचें ध्यान केलें त्याची “कायाही गोविंदरूप " च होते या तुकारामांच्या उक्तीप्रमाणें, अगर " सदेह सच्चिदानंद | कां नोहावे ते " ( १८. १६४५ ) या ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे तुकाराम सदेह वैकुंठास गेले असें म्हणण्याचा परिपाठ पडला असावा. ४. येथपर्यंत तुकारामांच्या चरित्रांतील बाह्य प्रसंग आपण त्यांच्या अभंगांच्या आधारे जितके आपल्यास पाहतां येतील तितके पाहिले. आतां आपण त्यांच्या अंतश्चरित्राकडे वळू. याबद्दलची माहिती तुकारामांच्या अभंगांत इतकी भरपूर आहे की त्याबद्दल इतर पुराव्याचा विचार करण्याचें कारण नाही. परमार्थास प्रारंभ केल्यावर तुकारामांच्या मनाची स्थिति साधकदशेंत कशी होती, साधन<noinclude></noinclude> f4w5a1ira4gk8aozmi3w38z2xcj6qkx पान:तुकारामवचनामृत.pdf/९ 104 110107 229211 2026-04-13T08:14:53Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रस्तावना. करितां करितां शेवटची पायरी लोकर गांठतां येईना म्हणून त्यांच्या अंतःकरणांत भयंकर तळमळ कशी उत्पन्न होऊन राहिली, ईश्वरकृपेनें त्यांस परमार्थसाक्षात्कार शेवटीं कसा..." 229211 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>प्रस्तावना. करितां करितां शेवटची पायरी लोकर गांठतां येईना म्हणून त्यांच्या अंतःकरणांत भयंकर तळमळ कशी उत्पन्न होऊन राहिली, ईश्वरकृपेनें त्यांस परमार्थसाक्षात्कार शेवटीं कसा झाला, व एकदां सिद्धावस्थेवर आरूढ झाल्यावर त्यांनी जनास उप- देश कसा केला, चाबद्दलचा भरपूर पुरावा त्यांच्या अभंगांत सांपडण्यासारखा आहे. तुकारामांच्या अभंगांचें Psychology of Mysticism च्या दृष्टानें अद्याप "फारसें अध्ययन कोणी केलेलें नाहीं. ईश्वरसाक्षात्काराच्या मार्गात मनांत ज्या अनंत वृत्ति उठतात व जे अनंत अनुभव येतात त्यांचें निररीक्षण करून ईश्वर- प्राप्तीचा हा अंतर्मार्ग काय आहे याबद्दल तुकारामांच्या चरित्रापासून आपल्यास - पुष्कळ बोध घेतां येण्याजोगा आहे. अशा प्रकारचे ग्रंथ इंग्रजी भाषेत व इतर युरोपियन भाषेत पुष्कळ झालेले आहेत. आपल्या महा- राष्ट्रभाषेत मात्र अशा प्रकारचे ग्रंथ अद्याप झाले नाहींत. तुकारामांचें अंतश्चरित्र लिहावयाचें म्हटले म्हणजे त्याबद्दल एक स्वतंत्र ग्रंथच लिहावा - लागेल. या प्रस्तावनेत ही गोष्ट करितां येणें शक्य नाहीं. म्हणून अगदी थोडक्यांत तुकारामांच्या या अंतश्चरित्राचा परामर्ष आपण येथे घेऊ. तुकारामांनी ज्यावेळी आपल्या साधकदशेस प्रारंभ केला त्यावेळी त्यांनी प्रथम आळसाला व लज्जेला रामराम ठोकला (क्र. ४४ ), व एकांतांत जाऊन एकाच आसनावर बसून योगिराजाप्रमाणे त्यांनी साधन आरंभिले (क. ४५ ). एकदम -लौकिकाबाहेर जाऊन त्यांनी भेटीसरसें लोकांस नमन केलें ( क्र. ४६). शरीरास विपत्ति होवोत अगर विटंबना होवो, त्यांची त्यांनी परवा बाळगली नाहीं ( क्र. ४८). अशा स्थितीतच, मृत्यूची भेट जवळ आली असतां, अगर एकमेकांची -दहनें पहात असतां, परमार्थास प्रवृत्त होणें हैं एकच शहाणपणाचे लक्षण आहे असा त्यांनी मनाचा निश्चय केला ( क्र. ५१ ). काळाची उडी पडली असतां - देशाचा राजा आपल्यास मृत्युभयापासून सोडविणार नाहीं ( क्र. ५५ ). या - इहलोकींच्या देहाच्या साधनानें सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेता येते; या - कारणानें देहाचें सार्थक केलें पाहिजे असें त्यांनी ठरविलें ( क्र. ५८ ). जेथें जेथें देव जाईल, तेथें तेथें त्यानें मलाच पहावें असा तुकारामांनी आपला भाव विस्तृत केला ( क्र. ६१ ). “ माझिये जातीचे मज भेटो कोणी " या न्यायानें संत- संगतीचा त्यांस अखंड ध्यास लागून राहिला ( क्र. ६४). संतांच्या पायींच्या मोचे, चहाणा, अगर त्यांच्याजवळचें मांजर, सुणा, झालों तरी चालेल, पण संतांची<noinclude></noinclude> dalpiu3v3to01xhkq426zlxgvk765mc पान:तुकारामवचनामृत.pdf/१० 104 110108 229212 2026-04-13T08:15:03Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "८ तुकारामवचनामृत. मला अखंड संगति लाभो अशी त्यांनी इच्छा चाळगिली ( क्र. ६६ ). व अशा रीतीनें मागच्या भयानं जागृत होऊन तुकारामांनी आपली साधकदशा आरंभिली ( क्र. ६० ). ५. साधकदशेच्या मार्गात..." 229212 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>८ तुकारामवचनामृत. मला अखंड संगति लाभो अशी त्यांनी इच्छा चाळगिली ( क्र. ६६ ). व अशा रीतीनें मागच्या भयानं जागृत होऊन तुकारामांनी आपली साधकदशा आरंभिली ( क्र. ६० ). ५. साधकदशेच्या मार्गात विघ्नं भयंकर आहेत ही गोष्ट प्रत्येक साधकाच्या अनुभवाचीच आहे. नानाप्रकारचे विकल्प, नानाप्रकारचे चिकट प्रसंग, नाना- प्रकारच्या शंका, साधकाच्या मनांत उद्भवतात, व मृगजळाप्रमाणे साध्य लांबच आहे असे वाटून क्षणोक्षणी त्याची निराशा होत असते. ही निराशेची स्थिति म्हटली म्हणजे आत्मरुपी सूर्योदयापूर्वीची भिन्न काळोखी रात्र होय. या स्थितीत जागृत राहून जो सूर्योदयाची पहांट पाहतो त्यासच आपले अंतिम साध्य गांठतां येतें. तथापि या स्थितीत असतांना मात्र मनाची भयंकर तळमळ चालू असते हैं. तुकारामांच्या अनुभवावरून कळून येईल. तुकारामांमध्यें साधकाचा खरेपणा अस ल्याने देवाची भेट त्यांस झाली नाही असे त्यांचं मनच त्यांस साक्ष देत होतें (क्र. ६९). जातीचे मी कडे वाणी असल्याने देवास मला फसवितां येणार नाहीं अशी त्यांची खात्री होती (क्र. ७० ). स्वप्नांतही कसें देवाचें दर्शन होत नाही (क्र. ७१ ), अगर जागृतावस्थेत देवाचा आभासही कसा होत नाहीं ( क्र. ७२), याबद्दल त्यांस आश्चर्य वाटत होते. देवाचें सप्तही पाताळांखालचें व सप्तही स्वर्गीवरचें अवाढव्य रूप जरी मला दिसले नाही ( क्र. ७४ ), तथापि उद्धवअकूरांस रुक्मांगदप्रल्हादांस ( क्र. ७५ ) जें सानरूप त्यानं दाखविलें, ते मला त्याने दाखवावं अशी त्यांनी देवाची प्रार्थना चालविली. देवाचे दर्शन झाल्यास त्याचे स्पर्शन व संभाषणही होईल अशी त्यांनी आशा बाळगली (क्र. ७६ ). जो जो भेटेल त्यास देवाची प्राप्ति मला होईल काय असं विचारण्याचा त्यांनी सपाटा चालविला (क्र. ८२ ). मी इंद्रियाधीन झालों असल्याने (क्र. ८७) माझें मन निव्वळ रहात नाहीं ( क्र.०६ ), याबद्दल त्यांनी देवाची काकुळती भाकिली. पूर्वीच्याप्रमाणेही भाव माझ्या अंत:-- करणांत राहिला नाही (क्र.८९ ), व मी जणूं कांहीं बहुरूप्याचे सोंग घेतले आहे (क्र. ९१ ), असे त्यांस वाटावयास लागले. कायावाचामनानें मी अदित कृत्यें केलीं आहेत; निंदा, द्वेष, विश्वासघात, लक्ष्मीमद, पितृवचनाची अवज्ञा, इत्यादि नाना दोष आपल्यास घडले असे वाटून त्यांचं मन त्यांस खाऊं लागले ( क्र. ९२ ). देवास आपला देहभाव समर्पिला असतांही पुनः आपल्यास दोषाचे दर्शन का व्हावे याबद्दल त्यांस वाईट वाटू लागले (क्र. ९६). देव आपला अंगिकार<noinclude></noinclude> m7he9rpg0k1jvogu3ktei4uvjfw9qzh पान:तुकारामवचनामृत.pdf/११ 104 110109 229213 2026-04-13T08:15:10Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रस्तावना. ९ करील की नाही याबद्दल त्यास शंका वाटावयास लागली ( क्र. ९९ ). आपण यातिहीन असून वर संतांनी स्तुति केल्याकारणानें पोटांत शूळ उठलेल्या मनुष्यास वर चंदनानें लिंपावें, अगर त..." 229213 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>प्रस्तावना. ९ करील की नाही याबद्दल त्यास शंका वाटावयास लागली ( क्र. ९९ ). आपण यातिहीन असून वर संतांनी स्तुति केल्याकारणानें पोटांत शूळ उठलेल्या मनुष्यास वर चंदनानें लिंपावें, अगर ताप आलेल्या मनुष्यापुढे मिष्टान्नें वाढावीं, अगर मध्यास वरून वरून शृंगारावें, त्याप्रमाणे तुकारामांची स्थिति झाली (क्र. १०३--१०४). लोकांनी वाळीत टाकलें तर एकांत तरी मिळेल असें त्यांस वाटावयास लागलें ( क्र. १०७ ). आपल्या गांवींचें कोणी न भेटल्यामुळे आपली भाषा कोणाशी बोलावी असें त्यांस होऊन गेलें ( क्र. १०८ ). शिष्टांचे अनुभव ऐकल्याबरोबर तर त्यांच्या मनास तळमळ सुटली ( क्र. ११०. ) पांडुरंगास आपली आठवण देण्याबद्दल त्यांनी संतांची याचना चालविली ( क्र. ११५ ). मी तुझे दारीचा कुतरा आहे; तूं मला मोकलून देऊ नकोस, असे त्यांनी देवांस विनविलें ( क्र. ११६ ). आपल्या बळानें आपल्यास बाहेर येतां येत नसल्याने ईश्वरास 'राख' म्हणून त्यांनी प्रार्थना चालविली ( क्र. ११७) तृपाक्रांत मनुष्यावर जसा. जलाचा वर्षाव व्हावा ( क्र. १२० ), अगर उपवासी मनुष्यापुढें ज्याप्रमाणे मिष्टान्ने वाढून यावी ( क्र. १२१ ), त्याप्रमाणें देवाच्या कृपेची त्यांनी वांच्छा केली. मी. बाहेर जैसे बोलतो तसाच माझा आंतील भाव असल्यास तूं मजवर कृपा कर, त्यांनीं देवास विनविलें (क. १२३ ) इतके झाले तरी देवाचें चित्त द्रवेना त्यामुळे तुझी व माझी आतां फारकत होईल असें चिन्ह दिसावयास लागले आहे असें ते देवास म्हणाले (क्र. १२४ ). तुला भक्त फार असल्यानें मजसारख्या हनि मनुष्यावर तूं कृपा कशास करशील असे उपरोधिक शब्द ते देवास बोलू लागले: ( क्र. १२५ ). खापरावर घातलेल्या लाहीप्रमाणे माझे चित्त तडफडत आहे, असें. त्यांनीं देवास विनविलें ( क्र. १२६ ) इतके असूनही देवास करुणा येईना... तेव्हां देवामध्येही सामर्थ्य नाहीं, व देवाच्या भक्तीमध्येही सामथ्यं नाहीं, असें त्यांस वाटावयास लागले ( क्र. १२९ ) निराकार देवास आम्हीं आकार देतों हा आमचा उपकार देव विसरला असें ते म्हणावयास लागले (क्र. १३०). शेवटी देवावर त्यांनी शिव्यांचा वर्षाव " असें सुरू केला. 'गाढव कुतरा ऐसा मज ठावा। बैल तूं देवा भारवाही " असें ते म्हणं ळागले. माझ्या भांडखोर तोंडास खवळविल्यामुळे तुझी मी आतां अबू घेईन असे ते देवास बोलू लागले (क्र. १३२ ). तूं हा लटकाच पसारा मांडला आहेस (क्र. १३३ ); तूं स्वतः भिकारी असून आपल्या दासांसही भिकारी करितोस (क्र.-<noinclude></noinclude> 2m1iqmf60onwgf4n6jfbrg7pgxkr053 पान:तुकारामवचनामृत.pdf/१२ 104 110110 229214 2026-04-13T08:15:18Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "१० तुकारामवचनामृत. * १३४ ); तुझा दास म्हणविण्याची आतां मला लाज वाटते (क्र. १३७ ); अशा - देवाविषयींच्या भावना तुकारामांच्या मनांत उत्पन्न व्हावयास लागल्या. इतका हृदयस्थ असूनही तुला मा..." 229214 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>१० तुकारामवचनामृत. * १३४ ); तुझा दास म्हणविण्याची आतां मला लाज वाटते (क्र. १३७ ); अशा - देवाविषयींच्या भावना तुकारामांच्या मनांत उत्पन्न व्हावयास लागल्या. इतका हृदयस्थ असूनही तुला माझी करुणा कशी येत नाहीं; तूं आपल्या निर्गुण नांचा- प्रमाणेच निष्ठुर आहेस (क्र. १३९ ); तूं आपलें धन जतन करून कोणास देणार ( क्र. १४० ) ! असा ते देवाबरोबर वाद घालूं लागले. तुझें नाम न घेतां तुझें कुळ मी आतां चुडवीन ( क्र. १४१ ) अशी त्यांनी देवास धमकीही दिली. - शेवटी देवाचे दर्शन होईना, तेव्हां माझ्या मतें देव मेला आहे ( क्र. १४३ ), ज्याला असेल त्याला असो ( क्र. १४४ ), असें ते उच्चरवानें प्रतिपाडूं लागले. आतां आपला देह करवतावर घालून कापुं, अगर अम्मीवर घालून जाळूं, असें - त्यांस होऊन गेलें ( क्र. १४५ ); व शेवटी देव प्राप्त होईना म्हणून ते आत्मघात करण्यासही प्रवृत्त झाले ( क्र. १४६ ). + , ६. अशा स्थितीत तुकारामांस देवाचें एकदम दर्शन झालें. "देह पडो का देव जोडो या भावनेनें जो देवाच्या प्राप्तीचा यत्न करितो त्याचा देव अंत - पहात नाहीं. “ सर्व अर्पावें शेवटीं । प्राण तोही बेंचाबा " अशी उदार भावना धर- -ल्यावर देवाचें दर्शन होण्यास वेळ लागत नाही. अशाच रीतीनें तुकारामांस देवाचें • श्रीमुख दिसलें ( क्र. १४७ ). देवाचें श्रीमुख दिसल्यावर ब्रह्मींची छाया पडल्यानें तुकारामांचा देहभाव पालटून गेला; आजपर्यंत जुनाट जुगादीचे नाणे उपलब्ध • झालें नव्हतें, त्याचे कारण मूळचा ठाव चुकला होता हैं होय ( क्र. १४८ ). आर्ता · पद्मनाभ जोडल्यावर भाग्य उजळल्यासारखें तुकारामांस वानूं लागलें (क्र. १४९ ). आजपर्यंत क्षणोक्षणी काळ जिंकीत गेल्याने, व मार्गे न पाहतां पुढे पाहिल्यानें, झालेल्या श्रमांचें चीज झाले असे तुकारामांस वाटावयास लागलें ( क्र. १५१ ) भक्ताचा अंगिकार आपण यातिहीन मतिहीन असल्यानें देवानें केलेला पाहून तुकारामांस आनंद झाला (क. १५३). आज फारां दिवसांची भेट झाल्यानें मनसोक्त आत्मसुखांत लीन व्हावें असें त्यांस वाटू लागलें ( क्र. १५३ ). एवढा लाभ एकाएकीं कां झाला याचें कारणही तुकारामांस कळेना क. १५५ ). कितीही आत्मसुखाचा उपभोग घेतला तरी तुकारामांची इच्छाच तृप्त होईना (क्र. १५७ ). अंगी बह्मरस ठसावल्यानें तुकारामांची भाष -तुकारामांसच अनावर झाली; व एका लाभापेक्षां दुसरा लाभ श्रेष्ठ आहे असें वाटून तुकाराम हांवभरी भरले (क्र. १५९ ). अंधार नाहींसा होऊन जगदाकार<noinclude></noinclude> 356ilzvrqm7jacrbvixfycjxbk1e9od पान:तुकारामवचनामृत.pdf/१३ 104 110111 229215 2026-04-13T08:15:26Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रस्तावना. ११ तेजोमय होऊन गेला (क्र. १६१) कोटिचंद्राच्या तेजाप्रमाणं चकाकणारे देवाचें श्रीमुख अनंत माणकांच्या कोंदणांत देदीप्यमान हिरा शोभावा त्याप्रमाणे शोभूं लागलें ( क्र. १..." 229215 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>प्रस्तावना. ११ तेजोमय होऊन गेला (क्र. १६१) कोटिचंद्राच्या तेजाप्रमाणं चकाकणारे देवाचें श्रीमुख अनंत माणकांच्या कोंदणांत देदीप्यमान हिरा शोभावा त्याप्रमाणे शोभूं लागलें ( क्र. १६२ ). दिवस व रात्र यांमधील भेद नाहीसा होऊन अखंड ज्योत लागून गेली (क. १६३). निजरूपामध्ये तुकाराम निजल्यानें अनाहताचे हल्लर वाजूं लागले (क्र. १६४ ) अनाहतांत मन गुंतल्यानं वृत्तीचा उद्गमच होईना; तुकारामांचे शब्द हे त्यांचे नसून त्यांच्या तोंडून ते देव बोलवितो असें झालें तें मुख शब्दानें वर्ण गेलें असतां या लोकांस खरें मुद्धां वाटेना (क्र. १६५).. जिकडे 'तुकाराम जातील तिकडे देव त्यांचा पाठलाग करूं लागला (क्र. १६६ ). स्वरूपानुसंधानांत कार्यव्यापृतत्वाचा लोप होऊन हरि हा भोवताला भावत आहे. असें तुकारामांस दिसूं लागलं ( क्र. १६७). आतां मी तुजकडे पाहीपर्यंत तू. असाच माझ्या दृष्टीपुढे उभा रहा, असें ते देवास बोलू लागले (क्र. १६० ).. जणूं कांहीं तुकाराम आपल्याच पोटास आले असें नवल वर्तून गेलें. दोहकिडे- पाहिलें असतां तुकारामांस आपणच आहों अशी भावना उत्पन्न झाली (क. १७१).... ज्याप्रमाणे नभ आणि जळ एक व्हावें, व याच्या लहरी त्याच्यांत व त्याच्या लहरी याच्यांत मिसळून जाव्या, त्याप्रमाणे देवभक्तसंगम झाला ( क्र. १७३ ). एकदां देवाचें रूप डोळ्यांस दिसल्यानें मन भ्रमिष्टाप्रमाणं वर्ते लागलें (क्र. १७४); जणूं कांही एखादा संचारच अंगीं झाला आहे ( क्र. १७५ ) ! आतां स्वरूपानु- भवावांचून दुसरें कामच नसल्यामुळे आपण फावल्या त्या चेष्टा करूं असें 'तुकाराम म्हणूं लागले ( क्र. १८० ). अशा स्थितीत देवाची पूजा तरी कशी संभवणार ? उदक, गंध, पुष्प, परिमळ, तांबूल, अक्षता, धातु, नेवेद्य, धूप, दीप, सगळं राम- कृष्णहरिरूप होऊन गेल्याने (क्र. १८४) "सर्व खल्विदं ब्रह्म" याचा अनुभव तुका- रामांस आला. ज्याप्रमाणें दिवा हातांत घेऊन हुडकलें असतां अंधार दिसणार नाही, त्याप्रमाणे एकदां देवदर्शन झाल्यानंतर तुकारामांस भयभीति उरली नाहीं.. ( क्र. १८८ ). कामक्रोधांनी घर खाली केल्यावर विट्ठलानें आंत संचार केला ( क्र. १८९ ) स्वामीच्या सत्तेनें कळिकाळ हाताखाली आला ( क्र. १९२ ). ज्याने जगास खावयाचे त्याच्या माथ्यावर तुकारामांनी पाय दिला ( क्र. १९४ ).. तुकारामांनी ज्या वेळी आपले मरण आपल्या डोळ्यांनी पाहिले, त्या वेळी झालेला सोहळा अनुपम्य होय. तीन्हीं त्रिभुवनें आनंदानें भरून सर्वात्मकपणानें तुकारामांस भोग प्राप्त झाला ( क्र. १९६ ). शरीराची प्रेतयात्रा झाली तेव्हां कामक्रोधमायाः<noinclude></noinclude> 89bycibli94dts2ivb8kbq97h8vxcf3 पान:तुकारामवचनामृत.pdf/१४ 104 110112 229216 2026-04-13T08:15:34Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "१२ तुकारामवचनामृत. रडूं लागल्या, वैराग्याच्या शेणींनीं शरीर पेटल्यावर ज्ञानाम्नीचा भडका होऊन महा- वाक्यरुपी चोंच जगांत झाली; कुळनामरूपास तिळांजुळि देऊन तुकारामांनी ज्याचे शर..." 229216 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>१२ तुकारामवचनामृत. रडूं लागल्या, वैराग्याच्या शेणींनीं शरीर पेटल्यावर ज्ञानाम्नीचा भडका होऊन महा- वाक्यरुपी चोंच जगांत झाली; कुळनामरूपास तिळांजुळि देऊन तुकारामांनी ज्याचे शरीर त्यास समर्पिलें ( क्र. १९७). अशा रीतीनें तुकाराम मनांत निर्भर बनल्यानं पित्याचें जें धन तें त्यांस सहजच मिळालें ( क्र. २०२). वडिलांनी आपल्या खांद्यावर वाहून शेवटी तुकारामांस एकाएकी मिराशीचा धनी केलें (क्र.२०३). तुकारामांच्या हातांत भांडाराची किल्ली आल्यानें पाहिजे तो वाण त्यांजकडे उपलब्ध होऊं लागला ( क्र. २०४ ). ज्यानें जें मागावें तें त्यास प्राप्त होऊन, 'नाही' असें उत्तर येईनासें झालें ( क्र. २०० ). देव व भक्त यांच्या कुळाचें परस्पर उच्चारण होऊन तुकारामांस सामरस्याचा अभिषेक झाला, व उन्मनीरूप दिव्य एकछत्रा- खाली अनुहत नौबत वाजत असतां तुकयास्वामीनें आपल्या दासास निजपदीं स्थापिलं ( क्र. २०७ ). आतां तुकारामांचे बोल हे देवाचे बोल नव्हेत असें कोण म्हणेल ? ( क्र. २०९). भावारूढ तुका ही विठोबाचीच मुद्रा असल्यानें त्यास जे मानणार नाहींत त्यांस शासन अवश्य घडेल ( क्र. २१० ० ). अभाविक लोकांस मात्र तुकारामांचे शब्द हे देवाचे शब्द होत असें कळेना ( क्र. २११ ). अणू- पेक्षां अणु, व मोठ्यापेक्षां मोठें, रूप घेऊन तुकाराम केवळ आतां उपकाराकरितां जगांत जिवंत राहिले (क्र. २१७ ). धर्माचे पालन करून पाषांडाचें खंडण करणे येवढेच काम तुकारामांस शिल्लक राहिलें ( क्र. २१० ). मागें बहुतां जन्मीं त्यांनी हेंच कार्य केलें होतें ( क्र. २१९ ) ज्यावेळी मेरुशिखरास शुक जाऊन त्यानें समाधि लावली, त्यावेळीही तुकाराम तेथे हजर होते ( क्र. २२३ ). आतां 'मागील झाले ते होवो; यापुढे तरी दुश्चरिताकडे वळू नका ( क्र. २२६ ). तुम्हांस मी पातकांपासून मुक्त केलें आहे; केवळ विठ्ठलाचे नाम घ्या म्हणजे झाले; असा आतां तुकारामांनी लोकांस उपदेश चालविला ( क्र. २२७ ). आम्ही बैकुंठवासी असून साच भावानें वर्तण्याकरितां व संतांचे मार्ग झाडण्याकरितां, आमचा . जन्म आहे; कळिकाळास दरारा बसवून आम्ही आतां भक्तीचा डांगोरा पिटू, असें तुकाराम म्हणू लागले (क्र. २२९ ).<noinclude></noinclude> thsnbsr199sf3ckyfyegzf46i2hueq5 पान:तुकारामवचनामृत.pdf/१५ 104 110113 229217 2026-04-13T08:15:43Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रस्तावना. तुकारामांचा उपदेश . १३ ७. तुकाराम स्वानुभवाधिष्ठित झाल्यावर त्यांच्या तोंडचे जे शब्द निघाले त्यांची किंमत विशेषच आहे हे सांगावयास नको. ज्या मनुष्याची निरहंकार वृत्..." 229217 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>प्रस्तावना. तुकारामांचा उपदेश . १३ ७. तुकाराम स्वानुभवाधिष्ठित झाल्यावर त्यांच्या तोंडचे जे शब्द निघाले त्यांची किंमत विशेषच आहे हे सांगावयास नको. ज्या मनुष्याची निरहंकार वृत्ति झाली त्याच्या तोंडचे शब्द हे त्याचे नसून त्याच्या तोंडून ते देव बोलावतो असें तुकारामांनीच सांगितले आहे. तुकारामांस स्वानुभवप्राप्त झाल्यावर त्यांनी निरनि- रान्त्या गोष्टींविषयी लोकांस कसा उपदेश केला हैं आतां आपल्यास पाहणें आहे. प्रथम 'साधकाने आपले वर्तन कसे ठेवावे याबद्दल त्यांनी जे विचार प्रकट केले आहेत ते फार मननीय आहेत. साधकाची दशा उदास असून त्यानें निद्रेस जिंकावें, भोजन परि- मित करावें, एकांती लोकांती स्त्रियांशी संभाषण करूं नये (क्र. २३०); आश्रमास • स्थान कोठें तरी कोपीगुहा वगैरे करून रहावें; फारसे शब्द न बोलतां इंद्रियांचे दमन करावें; अंतःकरणांत नारायण सांठवावा ( क्र. २३१ ); कंदमुळे खाऊन रहावें ( क्र. २३२ ); अभ्यासाने विषही सेवनांत पडतें; ओले मूळ खडकाचें सुद्धां अंग भेदून जातें ( क्र. २३३ ), भुजंगास मुद्रां साधनाने हातावर खेळवितां येतें; म्हणून असाध्य साधण्यास अभ्यास अवश्य केला पाहिजे, असें तुकारामांचें मत आहे ( क्र. २३४ ). सर्व कोल्हाळ चुकवून एकांतांत आनंदाचे स्थळ गांठावें, व आळस व निद्रा यांस रामराम ठोकावा ( क्र. २३५ ) प्रपंच व परमार्थ दोन्हीं एकदम करतां येणें शक्य नाही असे तुकारामांचे मत आहे, दोन पेवांवर हात ठेवूं गेलें असतां एकदम अधःपातच व्हावयाचा (क्र. २३६ ). संसाराच्या संगानें परमार्थाची इच्छा करणे म्हणजे ढेकणांच्या बाजेवर सुख मिळ- विण्याची इच्छा करण्यासारखेच आहे (क्र. २४३ ). ज्यांच्या योगानें नारायणांत अंतराय घडेल असे बापमाय, प्रियापुत्रबंधु, यांचा संबंध सोडावा ( क्र. २३८ )- सर्व लिगार्डे सारून पुढे गेलेल्यांचे माग उमटलेले पाहून आपण त्या वाटेनें जावें ( क्र. २४० ); नाशिवंत देह जाणार आहे असे समजून परमार्थास तांतडी करावी ( क्र. २४१ ); झाडें ओरसून, पाला खाऊन, वल्कलें नेसून, देवाच्या प्राप्तीसाठीं एकांतांत रहावें ( क्र. २४२ ); सुखदु:ख समान लेखावें, कधीं पाणी वहावें, तर कधीं पलंगावर शयन करावें; कधीं सज्जनांचा संग होईल, तर कधीं दुर्जनांचा चोग घडला असतांही स्वस्थ बसावें ( क्र. २४९ ); लप्नघडी अगर परोपकार<noinclude></noinclude> csg4fnuryp5zlradj17kdwpn9y9ib27 पान:तुकारामवचनामृत.pdf/१६ 104 110114 229218 2026-04-13T08:15:50Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "१४ तुकारामवचनामृत. होत असतांही असत्य भाषण करूं नये (क्र. २५० ); बाहेर कायेचें प्रक्षालन न करितां आंतून मनाचें प्रक्षालन केलें पाहिजे ( क्र. २५१ ); सोवळेपण पत्करा- वयाचेंच तर कामक्रोध..." 229218 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>१४ तुकारामवचनामृत. होत असतांही असत्य भाषण करूं नये (क्र. २५० ); बाहेर कायेचें प्रक्षालन न करितां आंतून मनाचें प्रक्षालन केलें पाहिजे ( क्र. २५१ ); सोवळेपण पत्करा- वयाचेंच तर कामक्रोधांवांचून राहण्याचे सावळेपण पत्करावे (क. २५१ ); अंत:- करण रिकामें करून, षड्र्मीचा अंत पुरवून, एका देवाचेंच ध्यान करावें; कारण जेथें आस खुंटते, तेथें देवाचा वास होतो ( क्र. २५३ ); एखाद्या गुरूच्या शब्दानेही देवाचा अंतराय घडत असेल तर त्या गुरुचंही वचन मानूं नये; सारांश, देव जोडण्याकरितां अधर्म लागला तरी करावा, व देव ज्यायोगे अंतरेल अशा प्रकारचे धर्मही आचरूं नयेत असें तुकारामांचे मत आहे. ( क्र. २५६ ). संसारांत निश्चिंती मिळवून मग एकांतांत भजन करू असे कोणी म्हणेल तर त्याची आशा व्यर्थ आहे; विषयसगार्ने यांत केवळ कुचंबणाच होईल ( क्र. २५८ ). जडभारी पडले असत दासानें हरीच स्मरण करावें; कारण, नामाचे स्मरण केलें असतां विघ्नं बारा वाटा पळून जातील (क्र. २५९ ); आणि देवावांचून आपल्यास दुसरा कोणताच व्यव- साय नाहीं असें समजून ध्यानी, मनी, जागृती, स्वप्नी, अखंड एका देवाचेंच चिंतन करावें ( क्र. २६० ), असें तुकाराम सांगतात. ८. गुरु कसा असावा याबद्दल तुकारामांचे विचार मनन करण्यासारखे आहेत. जो आपल्या शिष्यांपासून सेवा घेत नाहीं, व त्यांस देवासारखे मानतो, त्याचाच उपदेश फलद्रूप होतो असे तुकारामांचं म्हणणं आहे ( क्र. २६१ ). अंगांत कोणत्याही प्रकार संतचिन्हे उमटलो नसतां जो लोकांस उपदेश यावयास लागला, त्याची स्थिति आपणांस पोहावयास येत नसतां दुसन्यास कांसेस लावणाऱ्याप्रमाणें होऊन दोघांसही एकदम अधोमज्जन प्राप्त होतें (क्र. २६२). कांहीं गुरु आपल्या शिष्यांस दृष्टि टवकारून, रंग लावून, झगमग पाहण्यास शिकवितात; पुष्कळ गुरु पाखंड मांडून गुरूपदेश हैं एक जीविकेचे साधनच करतात; कांहीं गुरु तर आपलाच जप करवितात (क्र. २६३); ब्रह्मामध्ये यातिकुळाचा विचार करण्याचे कारण नाहीं असें कांहीं प्रतिपादितात; कांही लोक अनामिकास आत्मिक मानतात; कित्येक गुरु टाणेटोणे करून काही विप्रांस शिष्य करतात; उपदेश देऊन द्रव्य घेणें हा किन्येकांस एक व्यवहारच होऊन बसलेला असतो (क्र. २६४). कित्येक आपली पात्रापात्रता, शिष्यांची पात्रापात्रता, याविषयी विचार न करितां उपदेश देतात; अधिकारावांचून बलात्काराने उपदेश देणें म्हणजे जेथे ओल नाही अशा जांगत<noinclude></noinclude> 3m7eq19ec0xjnhhaveozyqxs704mox3 पान:तुकारामवचनामृत.pdf/१७ 104 110115 229219 2026-04-13T08:15:58Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रस्तावना. १५ बीज व्यर्थ वेचण्यासारखे आहे; याचमुळे तुकाराम मेघवृष्टीनें उपदेश करावा असें - सांगतात ( क्र. २६५ ). 9 11 ९. खन्या गुरूपासून नामस्मरणाचा मार्ग मिळाल्यावर त्यापासूनच देवा..." 229219 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>प्रस्तावना. १५ बीज व्यर्थ वेचण्यासारखे आहे; याचमुळे तुकाराम मेघवृष्टीनें उपदेश करावा असें - सांगतात ( क्र. २६५ ). 9 11 ९. खन्या गुरूपासून नामस्मरणाचा मार्ग मिळाल्यावर त्यापासूनच देवाची प्राप्ति होते असे तुकाराम रोखठोक सांगतात. एके ठिकाणी निवांत बसून चित्त शुद्ध करून " रामकृष्णहरि हा मंत्र उच्चारला असतां अंतःकरणांत गोपाळ निश्वयानें येऊन राहील असे तुकारामांचे अभिवचन आहे (क्र. २६६ ); सर्व साधनां- मध्ये नामसंकीर्तन हेंच सोपे साधन आहे, त्यानं सर्व पातकांचें भस्म होऊन - नारायण घरास सुखाने चालत येतो; यावांचून दुसरे साधन असल्यास देवाचीच शपथ आहे असें तुकाराम सांगतात (रु. २६०) नाम उच्चारलें असतां पुढे जगजेठी उभा राहील तरच तें नाम सबीज होय ( क्र. २६० ). सर्व वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये, व पुराणांमध्यें देवास शरण जाऊन निजानडेनें नाम घेणं हाच एक मार्ग सांगितला आहे (क्र. २७१ ). सात दिवसांचा उपवासी जरी मनुष्य झाला तरी त्यानें नाम- स्मरण सोडूं नये; मस्तक फुटो अगर शरीर तुटो, नामाचा गजर सोडूं नये; अशा निर्धारानें जो नामस्मरण करतो त्यासच देवाची प्राप्ति होते (क्र. २७४). नामस्मरण करीत असतां जिभेवर अमृताचा स्राव होतो; नाना प्रकारचे लाभाचे शकुन होतात; पोट भरल्याप्रमाणें तोंडांतून आनंदाचे उद्गार निघतात (क्र. २७५ ) शरीर शीतळ होनें प्रेमरसाने अंगकांति पुष्ट होते (क्र. २७६); चित्त धुवून निघतें (क्र. २७७); च पडूर्मीचा जय होतो (क्र. २७८ ). वाट चालत असतां, धंदा करीत असतां, ग्रासोग्रासीं जो नर नामस्मरण करतो तो जीवन्मुक्त होय असें जाणावें (क्र. २७९). समुद्रवलयांकित पृथ्वीचें दान केले असतां जें पुण्य प्राप्त होतें तें पुण्यही नामस्मर- 'णाच्या तोडीस येत नाहीं ( क्र. २८० ). या नामस्मरणानें न कळणारें कळों येईल, न दिसणारें दिखूंं लागेल, न बोलतां येण्याजोगें बोलतां येईल; असे अपार लाभ शेतील (क्र. २८१). नामस्मरण हाच निर्वाणींचा बाण आहे असें समजून आपली वाचा व्यर्थ वेंचू नये (क्र. २८२ ) उठाउठीं सारासार विचार केला असतां सर्व संकट निरसतील (क्र. २८३ ) बह्मरस काढा घेऊन विठोबाच्या नामाचें पथ्य केलें • असतां भवरोगही नाहीसा होईल, मग इतर रोगांची किंमत ती काय (क्र.२८४) १ देह हा भोगाचे अधीन आहे असे समजून व हा सर्व पसारा क्षणभंगुर आहे अशी खात्री "पडून, नारायणाचे चित्तांत ध्यान करावें ( क्र. २८५ ). त्यामुळे शेवटी अविनाशसुख प्राप्त होईल, इहपरलोकांमध्ये जय मिळेल, व इतर जनांवर उपकार करण्याच<noinclude></noinclude> 78pknt5nqmwalo90fb3v1bio241bxzp पान:तुकारामवचनामृत.pdf/१८ 104 110116 229220 2026-04-13T08:16:06Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "१६ तुकारामवचनामृत. सामथ्य प्राप्त होईल ( क्र. २८६ ). या नामाचें इतकें महत्त्व आहे की ते देवासा सुद्धां कळत नाहीं. कुमुदिनीचा परिमळ तिला मुळींच माहीत नसतां भ्रमर जसा त्याचा उपभोग घे..." 229220 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>१६ तुकारामवचनामृत. सामथ्य प्राप्त होईल ( क्र. २८६ ). या नामाचें इतकें महत्त्व आहे की ते देवासा सुद्धां कळत नाहीं. कुमुदिनीचा परिमळ तिला मुळींच माहीत नसतां भ्रमर जसा त्याचा उपभोग घेतो, त्याप्रमाणे देवाच्या नामाचें महत्त्व देवास माहीत नसून भक्तांसच माहीत असतें, असें तुकाराम म्हणतात ( क्र. २८९ ). १०. नामस्मरणाप्रमाणेंच कीर्तनाचे महत्त्वही फार मोठे आहे. नामदेवांच्यानंतर तुकारामांसारखा साक्षात्कारी कीर्तनकार झाला असेल किंवा नाहीं याची शंकाच आहे. कथा केली तर अशी करावी, तुकाराम म्हणतात, की ज्यामुळे कीर्तनांत रंगून देव आपल्यापुढे उभा राहील. भावाने कीर्तन करणे हे आपण तरण्याचें, व दुसऱ्यांस तारण्याचें, एक मोठे साधनच आहे ( क्र. २९० ). ज्याचा हरिकथेवर विश्वास नाहीं त्याचे कान केवळ उंदराचे बीळ होत ( क्र. २९१ ). ज्याप्रमाणे. व्याधीनें पीडलेला मनुष्य आपोआप वैद्याच्या घराकडे जातो, अगर गूळ पाहि.. ल्याबरोबर ज्याप्रमाणें मुंगी त्याकडे धांव घेते, त्याप्रमाणें ज्याला स्वहित करण असेल तो हरिकथेकडे धांवून जातो ( क्र. २९२ ). कथाकीर्तन करण्यास मुख्य सामुग्री म्हणजे देहांतील बळ हीच होय, यामुळे मरेपर्यंत माझी गायें शिथिल होऊं देऊं नकोस, असें तुकारामांनी देवाजवळ मागणे मागितलें आहे (क्र. २९३).. हरिकथा ही एक ऊर्ध्ववाहिनी गंगा आहे, अगर देवभक्तनाम यांचा ती त्रिवेणी संगम आहे असे म्हटले असताही चालेल ( क्र. २९४ २९५ ). द्रव्य घेऊन कथा करण म्हणजे पातकाचें द्वार उघडें राखण्यासारखंच आहे. देव एक साह्य असला म्हणजे. पुरे, माझी कथा करवा असें मी कोणास म्हणेन तर माझी जिव्हाच झडूं दे, असे तुकाराम म्हणतात ( क्र. २९६ ). जेथे आपण कीर्तन करावें तेथें अन्न घेऊ. नये, कपाळास बुक्का लावू नये, गळ्यांत माळ घालूं नये, तट्टावृषभास दाणा मांगूं नये; कारण या कामी द्रव्य घेणारे व देणारे दोघेही नरकापत जातात (क्र. २९७).. प्रेमानें कीर्तन चालविलें असतां अंगात अद्भुतशक्तीचा संचार होतो ( क्र. २९८).. समाधीचें सुख ओवाळून टाकावें अशा प्रकारचा आनंद या कीर्तनांत उत्पन्न होतो ( क्र. २९९ ). सुदर्शन सभोवती फिरत असल्याने कळिकाळाचा रिघाव तेथें होत नाहीं (क्र. ३००). भीतीची शंकाही मनांत न बाळगतां भक्तानें कर्तिन करावें, म्हणजे देव आपोआप पुढें धांवत येतो, असें तुकाराम म्हणतात ( क्र. ३०२ ). ११. नामस्मरण व कीर्तन यांच्या चर्चेनंतर तुकारामांच्या मतें भक्तीचें सर्वसाधारण स्वरूप कसें होतें तें आपण आतां पाहूं. भक्तिमार्ग हाच सर्वोत<noinclude></noinclude> ghmx8q8yr4ci5ro6cnnw7cuik9hja00 पान:तुकारामवचनामृत.pdf/१९ 104 110117 229221 2026-04-13T08:16:13Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रस्तावना. १७ -सोपा पंथ आहे असें त्यांचं मत असून (क्र. ३०५ ), सर्व ठिकाणीं देव पाहणं हीच भक्ति आहे असें त्यांस वाटत होते (क्र. ३०४ ) देव सगुणही नाहीं निर्गुणही नाही; त्याचं खरं स्वरूप अ..." 229221 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>प्रस्तावना. १७ -सोपा पंथ आहे असें त्यांचं मत असून (क्र. ३०५ ), सर्व ठिकाणीं देव पाहणं हीच भक्ति आहे असें त्यांस वाटत होते (क्र. ३०४ ) देव सगुणही नाहीं निर्गुणही नाही; त्याचं खरं स्वरूप अगम्य आहे, असें तुकाराम म्हणतात (क्र. ३०६). देवानें सुस्वर कंठ दिला नसला, तथापि अंतःकरणांत भक्ति ठेवून कशाही रीतीनें आपण रामकृष्णहरींचे भजन करावें ( क्र. ३०७ ). याचें कारण, भोळ्या - लोकांच्या ताब्यांत देव जसा असतो, तसा तो ज्ञान्यांच्याकडे नसतो (क्र. ३०९). अंतरांमध्यें खरी भक्ति उत्पन्न झाल्यावांचून बाह्याचार करणे हें केवळ मूर्खपणाचे होय (क्र. ३१० 1). सती जाणान्या स्त्रीस ज्याप्रमाणे अनि पाहून आनंदाचे - रोमांच उठतात, त्याप्रमाणे ईश्वरप्राप्तीच्या मार्गातील विघ्नें पाहून आपल्यास आनंद व्हावा (क्र. ३११ ). पतंग हा जसा नीट दीपावर जाऊन पडतो, त्याप्रमाणे ईश्वर- प्राप्तीविषयी आपण धैर्याने प्रयत्न करावा ( क्र. ३१२ ). कारंजा ज्याप्रमाणें देर उडतो, त्याप्रमाणे स्वहिताच्या जिव्हाळ्यानें आपण देवाकडे धांव घेतली पाहिजे ( क्र. ७१ ३ ). उन्मनींत ज्याप्रमाणें योगिराजास निंदास्तुति ऐकू येत नाहीत, अगर जळाआंत ज्याप्रमाणें पद्मपत्र अलिप्त असतें, त्याप्रमाणेंच भक्तिमान् • पुरुषानें व्यवहारांत न सांपडतां देवाकडे लक्ष दिले पाहिजे (क्र. ३१५ ). १२. ईश्वरप्राप्तीमध्ये जातिधर्माचें कारण नाहीं; कोणत्याही योनीत अगर कोणत्याही देशांत हरीच्या दासांनी जन्म घेतला तरी त्यांच्या योगाने तीन्ही लोक पावन होतात. व्यर्थ अभिमानाने नाडून जाऊं नका, अंत्यजादि योनिसुद्धां . हरिभजनाने तरून गेल्या आहेत ( क्र. ३१६) कस्तुरीचें बाह्यरूप जरी हीन असले तथापि तिचें मोल फारच असतें ( क्र. ३१७) आपल्या हातून पूर्व कसलीही कर्म झालीं' 'असली तरी अनुतापाने हरीचें स्मरण केलें असतां तीं दूर झालीच पाहिजेत ( क्र. ३१८ 1 ) हरिनाम संकीर्तन ज्यास आवडत नाहीं तो ब्राह्मण असला तरी ब्राह्मण नव्हे ( क्र. ३१९ ). परंतु शांति, क्षमा, दया, यांनीं भूषित रामकृष्णनामाचा उच्चार करणारा अंत्यजही ब्राह्मण होय (क्र. ३२०). याच्या उलट तुकारामांनी दुसरे एके ठिकाणी असेही म्हटले आहे की ब्राह्मण जरी कर्मभ्रष्ट झाला तरी त्यास श्रेष्ठ समजावें ( क्र. ३२१ ); व मन उन्मन - हृईपर्यंत या गोष्टींची सोय पाळावी लागते ( क्र. २२), असें तुकाराम .म्हणतात.<noinclude></noinclude> ino5whoszo7xl98adx22sot53riraiq पान:तुकारामवचनामृत.pdf/२० 104 110118 229222 2026-04-13T08:16:22Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "१८ तुकारामवचनामृतः १३. तुकारामांचा पंढरीसांप्रदाय असल्याने त्यांनी पंढरीचं महत्त्व वाढवावें है; साहजिकच आहे. संतांनी हें पलीकडे लावलेलें निशाण पाहून याच वाटेनें चला, तम्हांस..." 229222 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>१८ तुकारामवचनामृतः १३. तुकारामांचा पंढरीसांप्रदाय असल्याने त्यांनी पंढरीचं महत्त्व वाढवावें है; साहजिकच आहे. संतांनी हें पलीकडे लावलेलें निशाण पाहून याच वाटेनें चला, तम्हांस पांडुरंग खात्रीनें भेटेल, असें तुकाराम गर्जून सांगतात ( क्र. ३२५ ).. याच मार्गाने मागील साधुसंत गेले आहेत, उगाच आडवाटेने जाऊं नका ( क्र. ३२६ ). चंद्रभागेच्या तीरास तारूं लागलें आहे; आता हैं अमुप धन तुम्ही खुशाल लुटा; मी तुम्हांजवळ हमाल झालों आहे ( क्र. ३२८ ), असें तुकाराम म्हणतात. या पंढरीच्या राजास जाणत्यांपेक्षां नेणत्यांची आवड जास्त आहे. तो तुमचा शीण घेऊन तुम्हांस सुख देईल. ( क्र. ३२९ ) आत्मप्राप्तीच्या मार्गात अनुभवास येणारी अंतरींची ज्योतच विठ्ठलरूपानें विटेवर विनटली आहे (क्र. ३३०). हातांत प्रेमरूपी पाश घेऊन तुमचें सर्व लुबाडण्याकरितां हा चार पंढरीस उभा आहे. पुंडलिकानें याला थारा दिला नसता तर तो येथें आलाच नसता; त्याला आपण जाऊन धरूं असें तुकाराम म्हणतात (क्र. ३३२ ). हा पंढरीचा देव म्हणजे एक मोठे भूतच आल्यांगेल्यांस तें पछाडते, व तेथे जो जातो त्याचा परतून येण्याचा मार्ग बंद करतें; तुकाराम अशाच रीतीनें पंढरीस जाऊन त्यांचे जन्मास जाणें येणें खुंटून गेलें, असें त्यांनी म्हटले आहे (क्र. ३३५ ). आहे; १४. भक्तिमार्गास सगुणाची जितकी चाड असते तितकी निर्गुणाची असत नाहीं, हें तुकारामांच्या विचारांवरून व अनुभवावरून दिसून येईल. आम्हांस अरुपस्थितीची चाड नसून स्वरूपस्थितीची चाड आहे असें त्यांनी वारंवार म्हटलें आहे,. अरूपस्थितीने तूं खुशाल ब्रह्मज्ञानी लोकांस पिसें लाव, परंतु आम्हां भक्तांचा प्रेमरस तूं खंडू देऊ नकोस, असे त्यांनी देवाजवळ मागणे मागितलें आहे ( क्र. ३३७ ). आम्हीं मोक्षपदावर लाथ मारली असून निराकार देवास आम्हीं आकार घ्यावयास लावतों, हें आम्हां भक्तांचें केवढे सामथ्यं होय ( क्र. ३८ )? जो भ्रमर काष्ठाचा गुमान करीत नाहीं तो सुमनांमध्यें सहज सांपडतो; त्याप्रमाणें आमच्या सुमनांमध्ये देवास सहजच भीतीनें आकार घ्यावा लागतो (क. ३३९ ).. हिरा शोभण्यास ज्याप्रमाणें तो कोंदणांत बसवावा लागतो, त्याप्रमाणें देवास महत्त्व येण्यास आम्हां भक्तांची त्यास जरूर आहे (क्र. ३४० ). आम्ही देव झालों असे जे म्हणतात ते खरोखर पतन पावतात, देवाने मोठेमोठे दैत्य मारले आहेत, तुमच्यानें तृणही मोडवत नाही ( क्र. ३४१ ) जो मी देव देखिला अशी बढाई-<noinclude></noinclude> 2vs7lcnrma5dmpgncq2uz6p83vq1c8y पान:तुकारामवचनामृत.pdf/२१ 104 110119 229223 2026-04-13T08:16:29Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रस्तावना. १९ मारतो, तो लटक्यांचा राजा असें समजावें ( क्र. ३४३ ) अद्वैतांत आम्हां भक्तांचें समाधान नसून देवभक्तपणाच्या सुखाचा सोहळाच आम्हांस श्रेष्ठ वाटतो ( क्र. ३४४ ). वैकुंठींच्..." 229223 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>प्रस्तावना. १९ मारतो, तो लटक्यांचा राजा असें समजावें ( क्र. ३४३ ) अद्वैतांत आम्हां भक्तांचें समाधान नसून देवभक्तपणाच्या सुखाचा सोहळाच आम्हांस श्रेष्ठ वाटतो ( क्र. ३४४ ). वैकुंठींच्या वासापेक्षां कथाकाळींचा रस हाच अद्भुत आहे, तुझ्या नामाचा महिमा आम्हां भक्तांस जसा कळतो तसा तुला कळत नाहीं, असें तुकाराम देवास म्हणतात ( क्र. ३४८ ) यामुळेच भक्तांस गर्भवासाची पर्वा वाटत नाहीं; मात्र त्यांस संतसंगति असली म्हणजे झालें ( क्र. ३४९ ). जो हैं शरीर चालवितो, मानसाच्या अहंवृत्तीमध्ये जो अंतर्भूत असतो, ज्याच्यावांचून वृक्षाचें पानही हालत नाहीं, अशा देवाचें भजन कोणी विसरूं नये (क्र. ३५१ )- बुद्धीचा दाता, व विश्वाचा चालक, जो परमात्मा त्यावर सर्व भार घालून स्वस्थ रहावें (क्र. ३५३ ). ज्याप्रमाणे वानरांकडून देवाने समुद्रावर शिळा तारविल्या त्याप्रमाणें आपण केवळ निमित्तमात्र असून देव सर्वकर्ता आहे असें समजावें ( क्र. ३५४ ). दारोंदारी कुत्र्याप्रमाणें हिंडण्यापेक्षां मागणें तें एका देवापाशींच मागावें (क्र. ३५५ ). जगति सज्जनदुर्जनांचा भेद विसरूं नये; विंचू, सर्प, हे नारायण खरे, पण त्यांस दुरूनच नमस्कार करावा ( क्र. ३५९ ). पृथ्वीच्या पोटांत हिरा व गार दोन्हीं निर्माण होतात, म्हणून त्यांस समसमान लेखतां येणार नाही; त्याप्रमाणें संत व असंत हे केव्हाही एक होऊं शकत नाहींत ( क्र. ३६०), असें तुकाराम म्हणतात. १५. देवभक्तांमधील संबंध अनिवर्णनीयस्वरूपाचा आहे. जो भक्त मना- पासून देवाची सेवा करतो त्यास देवास भ्यावें लागत नाहीं ( क्र. ३६१ ). भक्ता-. जवळ ज्या ज्या शक्ति असतील त्या त्या त्यानें ईश्वरास समर्पण कराव्या (क्र. ३६२), देवावर भक्ताने भार घातला असतां त्याची तो उपेक्षा करीत नाहीं, (क्र. ३६४). सर्व लौकिकाची चाड सांडून मात्र भक्तानें देवास आळविण्यास तयार झाले पाहिजे; झाडाचा पाला ओरबाडून, चिंध्यांचे वसन गुंडाळून, निर्वाण मांडून, देवाचें ध्यान केलें असतां देव भक्ताची उपेक्षा करीत नाहीं ( क्र. ३६६ ). देवाचा भक्त कोणी वायां गेला नाहीं या भावनेनें तर भक्त देवाच्यामागे लागतात (क्र. ३६८ ). भक्तानें धैर्य धरिलें असतां नारायणाचें त्यास खचित साहाय्य मिळतें ( क्र. ३६९ ). पाहिलें असतां कोठें न दिसून देव मध्यंच एकदम उडी घालतो ( क्र. ३७१ ). मागें पुढें सर्व ठिकाणीं काळाच्या सपाट्यांत आपण सांपडलों असतां पळून न<noinclude></noinclude> r3phbnq9217n54gy9ksesh8mvke8m1g पान:तुकारामवचनामृत.pdf/२२ 104 110120 229224 2026-04-13T08:16:36Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "२० तुकारामवचनामृत. जातां देवास मोठ्याने आळविलें असतां देव आपल्यास खांद्यावर वाहील (क्र. ३७३) - देव ज्यास राखण्याची इच्छा करतो त्यास मारण्यास कोण समर्थ आहे (क्र. ३७४)! कड्याकपाटांत..." 229224 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>२० तुकारामवचनामृत. जातां देवास मोठ्याने आळविलें असतां देव आपल्यास खांद्यावर वाहील (क्र. ३७३) - देव ज्यास राखण्याची इच्छा करतो त्यास मारण्यास कोण समर्थ आहे (क्र. ३७४)! कड्याकपाटांत योगिराज ध्यानास बसले असतां त्यांची तहानभूक देवास राखावी लागते (क्र. ३७७). आपण गडबड न करितां योग्य काळी देव आपले रक्षण करील असे समजून स्वस्थ रहावें ( क्र. ३७९ ). १६. संतांची लक्षणे सांगण्यास तुकारामांइतका अधिकारी कोण आहे ? ज्यांनी आपले सर्व आयुष्य संतांच्या मार्गांत घालविलें, त्यांस संत व असंत यां- मधील भेद खचित माहीत असला पाहिजे. हिरे व गारा दुरून सारख्याच दिस- तात; पण ज्यावेळेस त्यांवर घाव बसावा त्यावेळेसच त्यांची परीक्षा होते. त्याप्रमाण संत व असंत निवडून काढण्यास योग्य प्रसंग यावे लागतात ( क्र. ३८४ ). केवळ कवित्वाने संत होत नाहीत; संतांच्य आप्तपणानें संत होत नाहींत, भोंपळा धरून, कीर्तन करून, प्रवचनें सांगून, माळामुद्रांची भूषणें घालून, किंवा भस्म धारण करूनही संत होत नाहींत देहभाव जोपर्यंत निरसला नाही, तोपर्यंत संतपण मिळणे कठीण आहे (क. ३८५ ). उगाच एखाद्या बाईनें चिरगुटे घालून पोट वाढविलें, तर जोपर्यंत तिच्या स्तनांत दूध नाहीं, च पोटांत पोर नाही, तोपर्यंत तिचे सर्व डोहाळे व्यथंच होत (क्र. ३८६). ऐरणीवर ठेविला असतां घणाचा जो घाव सोशील तोच हिरा (क्र. ३९०), अशा संतांचें देह धरण्याचे कारण म्हटले म्हणजे जडजीवांस उद्धरणें हेंच होय ( क्र. ३८९ ). केवळ भूतभविष्यवर्तमान सांगून अगर वाचासिद्ध होऊन संतपण मिळत नाही (क्र. ३९३ ). ज्यानें देवास उच्चस्थानावर उभे राहून पाहिलें त्यास कोणाचीही भीति वाटणें शक्य नाहीं (क्र. ३९५ ). त्यास या जगांत सोयरेपिशुन कोणी नसून अवघे माहेर घनदाट भरल्याप्रमाणे दिसतें ( क्र. ३९८ ). असे संत प्रसंगी मेणाहूनही मऊ, पण कदाचित् वज्यापेक्षांही कठोर, असे होतात ( क्र. ४०० ० ). जडभारी पडलें असतांही ते आपल्या नेमास टळत नाहीत ( क्र. ४०१ ) जीव दान दिल्याखेरीज अशाप्रकारचे संतपण मिळणे अशक्य आहे (क्र. ४०२ ). तीर्थात केवळ धोंडापाणी असून अशा संतांमध्येच केवळ देव असतो ( क्र. ४०५ ). रवि, दीप, हिरा, अशी बाहेरची दृश्ये घेऊन काय करावयाचीं ! हे संत अदृश्य दर्शनं दाखवितात ( क्र. ४०६ ). आपल्या उदारपणाने ते अमुल्यधनाचें आल्यागेल्यांस दान करितात ( क्र. ४०७ ) मागें हजारों लोकांनी जरी हैं<noinclude></noinclude> pp4xi4sn1qjiswcrbcz9g5nr5jy03ms पान:तुकारामवचनामृत.pdf/२३ 104 110121 229225 2026-04-13T08:16:46Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रस्तावना. २१ जुनाट भांडार लुटलें आहे, तरी ते अद्याप सरले नाहीं ( क्र. ४०८ ). या संतांची भेट झाल्यास पाप, ताप, दैन्य नाहींसें होतें हें सांगावयास नको (क्र.४१०). अशा प्रकारच्या संतांचा..." 229225 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>प्रस्तावना. २१ जुनाट भांडार लुटलें आहे, तरी ते अद्याप सरले नाहीं ( क्र. ४०८ ). या संतांची भेट झाल्यास पाप, ताप, दैन्य नाहींसें होतें हें सांगावयास नको (क्र.४१०). अशा प्रकारच्या संतांचा छळ जर खलदुर्जन करूं लागले, तर हत्तीच्या मांगें - लागून भुंकणाऱ्या श्वानाप्रमाणें ते आपल्यास हास्यापद करून घेतात ( क्र. ४११), असें तुकाराम महाराजांचें म्हणणें आहे. १७. अशा श्रेष्ठ संतांमध्यें व देवांमध्ये कोणताही भेद नाहीं; प्रतिमा या केवळ निमित्तमात्र होत; निराकारांत सर्व दिशा ओस भासतात, पण येथें सर्व इच्छा पुरतात ( क्र. ४१३ ). देव व भक्त ही निराळी भाषा रहातच नाहीं, पाप व पुण्य हैं केवळ बहुरुप्याचेंच सोंग आहे असें वाटतें ( क्र. ४१६ ). बीजाच्या पोटीं तरुवर, व तरुवराच्या शेवटीं बीज, हैं अखंड चाललेच आहे (क्र. ४१७ ). तथापि भक्तांची मोज अशी आहे, की ते अभेदस्थितीत जाऊनही अंगीं भेद दाखवितात ( क्र. ४१८ ). जो प्रत्यक्ष अशारीतीनें देवस्वरूप बनेल, त्यासच या गोष्टी खऱ्या वाटणार आहेत; इतरांना ही केवळ रेमट कहाणी वाटेल ( क्र. ४१९). आणखी एकाप्रकारें पाहूं गेलें असतां, भक्तच देवापेक्षां श्रेष्ठ ठरतील ( क्र. ४२० ); कारण ज्याच्या पोटांत चौदा भुवने आहेत तो यांच्या कंठांत सांठविला जातो - (क्र.४२३) असे तुकाराम म्हणतात. १८. आतां आपण तुकारामांची निर्गुणशिकवण कशी होती तें थोडक्यांत पाँहूं. जगव्यापक जनार्दन हा या जगाच्या अंतर्यामांमध्यें एक सूत्रच आहे असं उपनिषत्कारांप्रमाणे तुकारामांचे मत होतें ( क्र. ४२७ ). आपल्या पोटास मागणाऱ्या शेंदय हृदय देवतांना विचारतो कोण ( क्र. ४२६) १ हा देह आपला नव्हे अशी ज्याची खात्री पटली, त्यासच देवाचें व आपले ऐक्य कळून येणार आहे (क्र. ४२८ ). लोकांमध्ये देव आहे असें सांगावें, पण अंतःस्वरूपाने आपण देव बनल्यावर देवपणा निराळा असा कोठें राहिला ( क्र. ४२९ ) ! आकाश आकाशांत मिसळून जातें, मधला घटमठ हा व्यवहार खोटा ठरतो; बीज बीजांत सामावत, मध्ये आलेलें पत्रपुष्प खोटें होय (क्र. ४३१), अशा रीतीनें पाहिलें असतां देव फटकळ, देव्हारा फटकळ, भक फटकळ, व अंगाराही फटकळच आहे (क. ४३२ ). लटके तुकाराम लटक्या भावानें लटक्या मनुष्याबरोबर ही केवळ लटकी चर्चा करीत आहेत ( क्र. ४३३ ).<noinclude></noinclude> bixa8o7kldv4a7a9xsqdcimpv1lxtm1 पान:तुकारामवचनामृत.pdf/२४ 104 110122 229226 2026-04-13T08:17:00Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "२२ तुकारामवचनामृत. १९. अशा रीतीने तत्त्वज्ञानाच्या जोरावर जरी निर्गुणस्थिति अशी मांडतां आली, तरी या स्थितीस पोंचण्यास ईश्वरसाक्षात्कारामधूनच गेलें पाहिजे; नाहीं तर या सर्व गो..." 229226 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>२२ तुकारामवचनामृत. १९. अशा रीतीने तत्त्वज्ञानाच्या जोरावर जरी निर्गुणस्थिति अशी मांडतां आली, तरी या स्थितीस पोंचण्यास ईश्वरसाक्षात्कारामधूनच गेलें पाहिजे; नाहीं तर या सर्व गोष्टी दंतकथेप्रमाणे वाटतील ( क्र. ४४० ). येथे केवळ साधनानेंच काम होतें असें नाहीं; देवाची कृपा झाल्यावांचून स्वरूपसाक्षात्कार होणे कठीण आहे (क्र. ४४२). जितका आंब्याच्या झाडास मोहोर येतो तितकीं त्यास फळें लागत नाहीत; फळे लागतात त्यांपैकी सर्व पक्व होत नाहीत; आणि पक्व झालेल्या फळांमध्येसुद्धां आढीमध्यें जीं कुजत नाहींत तींच फळें उपयोगास येतात. शेवटचें वैभव भोगण्याचें भाग्य फार थोड्यांसच लाभतें. तुकाराम म्हणतात की तोच आपला गडी म्हणण्यास हरकत नाहीं, कीं ज्यास पैलतीरास पोंचण्याचें भाग्य प्राप्त झालें ( क्र. ४४१ ), शुकसनकादिकांनी बाहु उभारून सांगितल्याप्रमाणें परीक्षि- तीस सातच दिवसांत देवाचा साक्षात्कार झाला, यावरून उठाउठीं स्मरणाचा धांवा केल्यावर देवास धीर धरवत नाहीं असें सिद्ध होतें ( क्र. ४४४ ). देवाच्या ध्यानानें चक्षु दिव्य होतात ( क्र. ४४३ ); मनासहित काया पालटते (क्र. ४४५ ); व स्वरूपानुभवाबद्दल इंद्रियांमध्ये परस्पर भांडण लागतें ( क्र. ४४८ ). लाजेला थारा न देतां (क्र. ४५० ), अंतरांत कळवळा उत्पन्न होऊन, ज्यावेळीं नेत्रांतून जळ वाहू लागतें ( क्र. ४५१ ), त्या वेळींच मन स्थिर होऊन तीन्हीं लोकांमध्यें आनंद भरलेला दिसतो ( क्र. ४५२ ). नामरूपाची गांठ पडल्यावर इतर सर्व गोष्टी खोट्याशा वाटतात ( क्र. ४५३ ). रक्त, श्वेत, कृष्ण, पति, प्रभेचें अंजन डोळ्यांत पडल्यावर देशकालवस्तुभेद नाहीसा होऊन विश्वाकार आत्मा प्रकट होतो (क्र. ४५४ ), अणुरेणूपर्यंत सर्वत्र प्रकाश भरलेला दिसतो ( क्र. ४५५ ); वनपट्टणांत एकभाव होऊन जिकडे तिकडे देवाचे स्वरूप दिसावयास लागतें ( क्र. ४५७). अशा स्थितींत देवाच्या चरणांवर आपण माथा ठेवावा तो उचलूंच नये; कारण मन ढवळलें असतां रूपही वितळून जाईल ( क्र. ४५६ ). ज्यास अशा रीतीनें सर्वदा अच्युताचें ध्यान लागलें, त्याचा देहही पवित्र होतो; त्याच्या चिंतनानें दोषी लोक तरून जातात; देवही त्याच्या मार्गे लागून त्याच्या चरणींचे रज:- कण आपल्या शिरावर घेतो ( क्र. ४५९) हरिकीर्तन करीत जाणान्या भक्ताबरोबर देवही भ्रमण करतो ( क्र. ४६० ). निजून भक्तानें गायन केलें असतां देव तें उभ्यानें ऐकतो; भक्त बसून कीर्तन करील तर दुव डोलूं लागतो; आणि भक्तानें उभे राहून नामस्मरण केल्यास गोविंद नाचावयास<noinclude></noinclude> d8z3ekkp1vartu4ui6jfxxp0bswhhlr पान:तुकारामवचनामृत.pdf/२५ 104 110123 229227 2026-04-13T08:17:09Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रस्तावना. २३ लांगतो ( क्र. ४६२ ). अंतःकरणांत सांठवला राहून देव बाहेर धाकुटी मूर्ति धारण करून भक्तापुढे उभा राहतो; भक्तानें कांहींतरी मागावें म्हणून देव त्याच्याकडे पाहतो; ह्याच..." 229227 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>प्रस्तावना. २३ लांगतो ( क्र. ४६२ ). अंतःकरणांत सांठवला राहून देव बाहेर धाकुटी मूर्ति धारण करून भक्तापुढे उभा राहतो; भक्तानें कांहींतरी मागावें म्हणून देव त्याच्याकडे पाहतो; ह्याच्या मनांत ज्या ज्या इच्छा उत्पन्न होतील त्या त्या तो पूर्ण करतो; तथापि भक्त आपला जीवभाव देवाच्या पायीं ठेवून त्याजजवळ कांहींच मागत नाहींत ( क्र. ४६४ ). अशी स्थिति प्राप्त झाल्यावर नंतर भक्तांस झालेल्या श्रमाचें कौतुक वाटावें हें साहजिकच आहे; ते केवळ चार दिवस खेळीमेळीकरितां या जगांत राहतात (क्र. ४६८ ). २०. तुकारामांनी आपली शिकवण जशी मागें लिहिल्याप्रमाणे अभंगांनून उघड मांडली आहे, त्याप्रमाणे त्यांनी रूपकांतूनही आपली शिकवण गुप्तरूपाने लिहिली आहे. तुकारामांच्या सर्व रूपकांचा येथें विचार करण्यास जागा नाहीं. आपण त्यांचीं दोनतीनच रूपकें येथें पाहू. मार्गे शिवाजीस उपदेश म्हणून "पाइकीचे अभंग” तुकारामांनी सांगितले आहेत असे आपण लिहिलेंच आहे. ते अभंग एका प्रकारचें रूपकच होत. परमार्थात प्रपंचाप्रमाणे शिपाईगिरी केल्याखेरीज इष्ट वस्तु साध्य होत नाहीं असा या अभंगांचा सारांश आहे. जो पाईक जिवावर उदार होतो. त्याचा भार स्वामी वाहतो; युद्धामध्यें स्वामीच्या पुढे जाऊन जो अंगावर बाण साहतो त्यासच त्याच्या अंगावरची शस्त्रास्त्रे शोभा देतात; त्रेलोक्यनायकाचे असे पाईक पुष्कळ आहेत, ज्या पाईकास धनी मानतो त्यास सर्व जग भितें; ज्या- प्रमाणे पाईकाचें बळ असेल त्याप्रमाणें त्याचें मोल वाढते; व पाईक झाल्यावांचून पाईकास ओळखतां येणें अशक्य आहे, असें तुकारामांनीं आपल्या अभंगांत म्हटले आहे. त्याप्रमाणेंच विठ्ठलनामाचें शेत करा; येथें वेठी, सारा, द्यावा लागत नाहीं; निदमुन्यानं शेत राखलें जाणे शक्य नाही; आगटी पेटवून शेतकऱ्यानें जानें राहिलें पाहिजे; शेत मुगीस आले तरी पीक जतन करावयास पाहिजे; गोफणीस गुंडा घालून पांखरांची थांटें उडवून दे; एकंदरीत "सोंकर, सोंकर, सोहंकर", पीक हातास आल्यावर ज्याचा भाग त्यास देऊन भूस टाकून आंतील कण निवडून घे; - कण निवडल्यावर मुसळ आधारांत धरून त्यांवर सांवरून धोर घाव घाल, अनाहत गजराचीं कांकणें बाजुं दे; आरशाप्रमाणें रूप प्रकटलें असतां पाक सिद्ध झाला असें समज ( क्र. ४६९-४७२), असें तुकारामांनी म्हटलें आहे. आणखी एक रूपक देऊन हैं प्रकरण संपवूं. चौक भरून कुळस्वामिनीस पाचारण कर, तिच्या पुढें रजतमाची धुपारती घाल; पंचप्राणरूपी आरती ओवाळ, मनरुपी मेंढयास 2<noinclude></noinclude> sec3r8ncqmj6xxoa1a9xk1086wy4f5c पान:तुकारामवचनामृत.pdf/२६ 104 110124 229228 2026-04-13T08:17:16Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "२४ तुकारामवचनामृत. मुठीनें मार; अनाहताच्या मोठ्या नगाऱ्याचा गजर झाला असतां देवता अंगति संचरेल, व शरीराचें आरोग्य करील; तिला केलेले सर्व नवस ती पुरवलि; अंधळ्यांस डोळे, पांगळ्यांस..." 229228 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>२४ तुकारामवचनामृत. मुठीनें मार; अनाहताच्या मोठ्या नगाऱ्याचा गजर झाला असतां देवता अंगति संचरेल, व शरीराचें आरोग्य करील; तिला केलेले सर्व नवस ती पुरवलि; अंधळ्यांस डोळे, पांगळ्यांस पाय, वांझेस पुत्र ती देईल; ज्या काळाने बसुदेवाची सात बाळे खाल्ली त्या काळास खाण्याजोगे ती आतां आपलें उग्ररूप प्रकट करील; तथापि ती आमच्या कुळींची कुळदेवता असल्यानें माते- प्रमाणें ती आमचें रक्षणच करील असे तुकाराम म्हणतात (क्र. ४७४४७६). २१. ज्या संतांस परमार्थाचं चिकट वर्म कळते, त्या संतांस व्यवहार कळणार नाहीं, असें कधी होणं शक्य नाही. तुकाराम इतके मोठे सत्पुरुष होते, तथापि त्यांचें व्यवहारचातुर्यही फार अलौकिक होते. काष्टपाषाणमृत्तिकारूपीही स्त्रियांचा संग नको असे ते म्हणतात; कारण अग्नि जरी साधु झाला तरी त्याचा फार सहवास केला असतां तो दहनच करील (क्र. ४७८ ). या जगाचे मोठे आश्चर्य चाटतें, तुकाराम म्हणतात, की संतांकडून दृष्टि टाकून हे लोक परीस मात्र आदरानें न्याहाळतात; कथेमध्यें निद्रा घेऊन हे लोक स्त्रियांशी संभाषण करीत असतां मात्र जागतात ( क्र. ४७९ ). वरचा दिखाऊ रंग कधी कामास यावयाचा नाहीं; करणीचें नाणें वृद्धांच्या मनांस येणें शक्य नाहीं ( क्र. ४८१ ). ज्यास आपल्या अंगी मोठेपणा आणावयाचा आहे त्याने कठीण यातना भोगिल्याच पाहिजेत ( क्र. ४८२ ). कल्पतरूखाली बसून भलतें फळ मागू नये, कारण एखादे वेळी आपले इच्छेप्रमाणें एखादा अनर्थच घडावयाचा ( क्र. ४८४ ). गुरूनें मेघवृष्टीनें उपदेश करावा, व सहसा शिष्य करूं नये; कारण शिष्य केल्यास त्याच्या अर्धकर्माचा वांटा त्यास भोगावा लागतो (क. ४९२ ). अधिकाराप्रमार्णे लोकांस उपदेश द्यावा; मुंगीवर हत्तीचं ओझें घालण्यांत अर्थ नाहीं; पारध्याजवळ फांसे, जाळी, कुन्हाडी, वगैरे सर्व उपकरणें असावीत; परंतु निरनिराळ्या प्रसंगी निर- निराळ्या साधनांचा त्यानें उपयोग करावा ( क्र. ४९३ ) संतसंगतींत फारसा वास करूं नये, कारण त्यांचे दोष कदाचित् आपल्या अंतःकरणांत चिंचले असतां त्यांचे क्षालन व्हावयाचें नाहीं ( क्र. ४९४). संसारयात्रेस आलेल्या लोकांनी तोट्याचा सौदा करूं नये ( क्र. ४९५ ). खरें पारखूनच गांठी बांधावें ( क्र. ४९६ ). देव मिळण्यास रुकामोल कांहीं यावा लागत नाहीं; - आइत्या घरपुसून आलेल्या देवास परतें घालवू नये ( क्र. ४९८ ). जगामध्ये<noinclude></noinclude> evy449hdjxzt619rlrtlqzcgtaekjhb पान:तुकारामवचनामृत.pdf/२७ 104 110125 229229 2026-04-13T08:17:29Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रस्तावना. २५ आपलें वर्म कळू देऊ नये; कारण वर्म समजल्यास विनाकारण लोक पाठी लाग- तील ( क्र. ४९९ ). हृदयांत देवाचें चिंतन करणें याखेरीज दुसरा कोणताच शकुन मानूं नये; ज्याला हरिनामाचा छ..." 229229 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>प्रस्तावना. २५ आपलें वर्म कळू देऊ नये; कारण वर्म समजल्यास विनाकारण लोक पाठी लाग- तील ( क्र. ४९९ ). हृदयांत देवाचें चिंतन करणें याखेरीज दुसरा कोणताच शकुन मानूं नये; ज्याला हरिनामाचा छंद लागला त्याला सर्वकाळ सर्व दिशा कल्याणकारकच होत ( क्र. ५००), अशा प्रकारचा सदुपदेश तुकारामांनी सर्व . लोकांस केला आहे. २२. या ग्रंथाचे कामी रा. सा. वासुदेवराव दामले, प्रो. शंकर वामन दांडेकर, रा. शंकर गणेश म्हैसाळकर, रा. शंकर केशव धर्माधिकारी, व रा. जगन्नाथ रघु- नाथ लेले या सर्वांची जी मदत झाली आहे, त्याबद्दल मी त्या सर्वांचा फार आभारी आहे. गणेश छापखान्याच्या मालकांनी व आर्यभूषण छापखान्याच्या मालकांनी फार मेहनत घेऊन है पुस्तक काळजीपूर्वक छापून दिलें याबद्दल मी त्यांचाही फार आभारी आहे. रा. द. रानडे<noinclude></noinclude> 154jaoggg44julp8o0hpj813yd4l7t3 अनुक्रमणिका चर्चा:अध्यात्मग्रंथमाला ग्रंथांक ३ तुकारामवचनामृत.pdf 107 110126 229230 2026-04-13T08:21:13Z सुबोध कुलकर्णी 1231 /* हे पान वगळावे */ नवीन विभाग 229230 wikitext text/x-wiki == हे पान वगळावे == @[[सदस्य:QueerEcofeminist|QueerEcofeminist]] शीर्षक चुकीचे असल्याने फाईल हलवली. आता दुवा बदलला आहे - https://commons.wikimedia.org/wiki/File:तुकारामवचनामृत.pdf ; सबब हे पान वगळावे ही विनंती. [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १३:५१, १३ एप्रिल २०२६ (IST) mynfvr3q5l0vvw1eauuw0tzkw13jma2 229231 229230 2026-04-13T08:24:27Z QueerEcofeminist 918 /* हे पान वगळावे */ Reply 229231 wikitext text/x-wiki == हे पान वगळावे == @[[सदस्य:QueerEcofeminist|QueerEcofeminist]] शीर्षक चुकीचे असल्याने फाईल हलवली. आता दुवा बदलला आहे - https://commons.wikimedia.org/wiki/File:तुकारामवचनामृत.pdf ; सबब हे पान वगळावे ही विनंती. [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १३:५१, १३ एप्रिल २०२६ (IST) :झाले @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], वगळले आहे [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] १३:५४, १३ एप्रिल २०२६ (IST) jagc0akav11lxfv8ujvyj7boo8watxd