विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.46.0-wmf.24 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:गाथा पंचक-गाथा पाचवी-श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा.pdf 106 69927 229303 153170 2026-04-15T13:13:58Z सुबोध कुलकर्णी 1231 229303 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=गाथा पंचक गाथा पाचवी – श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा |Language=mr |Volume= |Author=त्र्यंबक हरी आवटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=त्र्यंबक हरी आवटे |Address=पुणे |Year=1908 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] enwqcmpj774wuunszqo3qq4ft794ro9 अनुक्रमणिका:आर्य-स्त्री-रत्ने.pdf 106 70411 229300 165186 2026-04-15T12:32:26Z कल्पनाशक्ती 3813 229300 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=आर्य-स्त्री-रत्ने |Language=mr |Volume= |Author=यशोदाबाई भट |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=यशोदाबाई भट |Address=मुंबई |Year=1917 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist 3="प्रस्तावना" 5="माझे दोन शब्द" 7="अनुक्रमणिका" 8 ="अभिप्राय" 9="पतीला उद्धारणारी चुडाला"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] qcmluzom130ejxixqlwbnxnco1z0brj हनुमान चालीसा 0 96375 229327 225795 2026-04-16T09:48:21Z Sultansin 6003 229327 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = हनुमान चालीसा | साहित्यिक = तुलसीदास | वर्ष = | विभाग = | मागील = | पुढील = | टिपण = }} <poem><div style="text-align: center;"> '''॥ दोहा ॥''' '''श्रीगुरू चरण सरोज रज, निज मनु मुकुर सुधारि''' '''बरनउ रघुवर बिमल जसु, जो दायकु फल चारि''' ''अर्थ - श्री गुरु महाराजांच्या चरण कमळांच्या रज्जकणाने (धुळीने) आपल्या मनाच्या आरशाला स्वच्छ करून (मनास सुधरावून) श्रीरामाच्या (रघुवीर) पवित्र (निर्मळ) यशाचे वर्णन करत आहोत, जे की चार पुरुषार्थ (चार फळ) धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्रदान करणारे आहे.'' '''बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन कुमार''' '''बल बुधि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार''' ''अर्थ - माझे शरीर आणि बुद्धी दुबळे असल्याचे जाणून हे पवनपुत्र हनुमान! मी आपलं स्मरण करत आहे. आपण मला बळ, चांगली बुद्धी आणि ज्ञान देऊन माझ्या दुःख व दोषांचे नाश करावे.'' ''' चौपाई ''' जय हनुमान ज्ञान गुन सागर जय कपीस तिहुँ लोक उजागर॥१॥ ''अर्थ - ज्ञानाचा अथांग सागर असलेल्या हनुमानाला माझा प्रणाम (हनुमानाचा विजय असो). तिन्ही लोक आपल्या किर्तीमुळे प्रकाशित झाले आहेत.'' राम दूत अतुलित बल धामा अंजनि पुत्र पवनसुत नामा॥२॥ ''अर्थ - अंजनी पुत्र तसेच पवनसुत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामाच्या दुताचे बळ अतुल्य असे आहे.'' महाबीर बिक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी॥३॥ कंचन बरन बिराज सुबेसा कानन कुंडल कुँचित केसा॥४॥ हाथ बज्र अरु ध्वजा बिराजे काँधे मूँज जनेऊ साजे॥५॥ शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महा जगवंदन॥६॥ विद्यावान गुनी अति चातुर राम काज करिबे को आतुर॥७॥ प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मनबसिया॥८॥ सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा॥९॥ भीम रूप धरि असुर सँहारे रामचंद्र के काज सवाँरे॥१०॥ लाय सजीवन लखन जियाए श्री रघुबीर हरषि उर लाए॥११॥ रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत-हि सम भाई॥१२॥ सहस बदन तुम्हरो जस गावै अस कहि श्रीपति कंठ लगावै॥१३॥ सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहीसा॥१४॥ जम कुबेर दिगपाल जहाँ ते कवि कोविद कहि सके कहाँ ते॥१५॥ तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा राम मिलाय राज पद दीन्हा॥१६॥ तुम्हरो मंत्र बिभीषण माना लंकेश्वर भये सब जग जाना॥१७॥ जुग सहस्र जोजन पर भानू लिल्यो ताहि मधुर फ़ल जानू॥१८॥ प्रभु मुद्रिका मेलि मुख माही जलधि लाँघि गए अचरज नाही॥१९॥ दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हरे तेते॥२०॥ राम दुआरे तुम रखवारे होतना आज्ञा बिनु पैसारे॥२१॥ सब सुख लहैं तुम्हारी सरना तुम रक्षक काहु को डरना॥२२॥ आपन तेज सम्हारो आपै तीनों लोक हाँक तै कापै॥२३॥ भूत पिशाच निकट नहि आवै महावीर जब नाम सुनावै॥२४॥ नासै रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा॥२५॥ संकट तै हनुमान छुडावै मन क्रम वचन ध्यान जो लावै॥२६॥ सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा॥२७॥ और मनोरथ जो कोई लावै सोई अमित जीवन फल पावै॥२८॥ चारों जुग परताप तुम्हारा है परसिद्ध जगत उजियारा॥२९॥ साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे॥३०॥ अष्ट सिद्धि नौ निधि के दाता अस बर दीन जानकी माता॥३१॥ राम रसायन तुम्हरे पासा सदा रहो रघुपति के दासा॥३२॥ तुम्हरे भजन राम को पावै जनम जनम के दुख बिसरावै॥३३॥ अंतकाल रघुवरपुर जाई जहाँ जन्म हरिभक्त कहाई॥३४॥ और देवता चित्तना धरई हनुमत सेई सर्व सुख करई॥३५॥ संकट कटै मिटै सब पीरा जो सुमिरै हनुमत बलबीरा॥३६॥ जै जै जै हनुमान गुसाईँ कृपा करहु गुरू देव की नाई॥३७॥ जो सत बार पाठ कर कोई छूटहि बंदि महा सुख होई॥३८॥ जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्ध साखी गौरीसा॥३९॥ तुलसीदास सदा हरि चेरा कीजै नाथ हृदय मह डेरा॥४०॥ दोहा पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप॥ <ref>https://hanumanchalisa.gen.in/</ref> ''हनुमान चालीसा इतिहास''''''तिरप्या मुद्राक्षरातील मजकूर'''''''तिरप्या मुद्राक्षरातील मजकूर''''''ठळक मजकूर''''''' हनुमान चालीसा की रचना 16वीं शताब्दी में महान कवि गोस्वामी तुलसीदास ने की थी। चालीसा लिखने के पीछे कई किंवदंतियाँ प्रचलित हैं, जिनमें सबसे प्रसिद्ध अकबर बादशाह से जुड़ी है। अकबर और तुलसीदास की कहानी: कथा के अनुसार, जब तुलसीदास जी वृंदावन में थे, तब मुगल सम्राट अकबर ने उन्हें अपने दरबार में बुलाया। अकबर ने उनसे भगवान राम के दर्शन कराने को कहा। इस पर तुलसीदास ने कहा कि भगवान राम के दर्शन केवल सच्ची भक्ति से ही हो सकते हैं, न कि किसी के कहने से। कारावास और चमत्कार: इससे क्रोधित होकर अकबर ने तुलसीदास जी को कैद कर लिया। कहा जाता है कि कैद में रहते हुए ही तुलसीदास जी ने भगवान हनुमान का स्मरण करते हुए 'हनुमान चालीसा' की रचना की। जैसे ही चालीसा पूरी हुई, आगरा शहर पर बंदरों के एक बड़े झुंड ने हमला कर दिया। बंदरों ने महल और शहर में भारी उत्पात मचाया, जिससे लोग भयभीत हो गए। रिहाई और सम्मान: अकबर ने इस घटना को तुलसीदास की शक्तियों का चमत्कार समझा और उनसे माफी माँगी। उन्होंने तुरंत तुलसीदास को रिहा कर दिया और शहर को बंदरों के आतंक से मुक्ति मिली। इस घटना के बाद से हनुमान चालीसा की महिमा और भी बढ़ गई। अन्य किंवदंतियाँ: एक और मान्यता के अनुसार, तुलसीदास जी ने रामचरितमानस की रचना के बाद हनुमान जी की प्रशंसा में हनुमान चालीसा लिखी, जिन्होंने उन्हें रामकथा लिखने के लिए प्रेरित किया। चालीसा में हनुमान जी की शक्ति, बुद्धि और भक्ति का गुणगान किया गया है, और यह माना जाता है कि इसके पाठ से सभी संकट दूर हो जाते हैं। </poem> </div style="text-align: center;"> [https://www.hanumangi.com/hanuman-chalisa-marathi-pdf-download/https://hanumanchalisalyrics.co.in/ Hanuman Chalisa Mp3 Lyrics Ringtone ] aqe59nc8nvkehuve0rc97tgrbd131pv पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/१८ 104 96942 229324 195264 2026-04-16T09:43:47Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229324 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( १० )}}</noinclude>स्त्रियांसहवर्तमान सरस्वतीवर स्नानाला आले. राजा, माझे पिते आपली तंबोरी खांद्यावर टाकून, जवळच एका झाडाखालीं निवांत बसले होते. परंतु गंधर्वपत्न्यांची ती जलक्रीडा व अंगाला चिकटून बसलेली ओली वस्त्रें, वगैरे पाहून माझे पिते कामदेवाच्या आधीन झाले. त्याचा परिणाम म्हणजे माझा जन्म एका कुंभांत झाला. आणि म्हणूनच माझें नांव कुंभक असें पडलें. मी नेहमीं तिन्ही लोकीं हिंडतों. माझ्या पित्यामुळे मला देवादिक अत्यंत मान देतात."<br>{{gap}}"मुनिवरा, या दासाला समाधान नाहीं. राज्य व स्त्री यांचा त्याग करून मी येथें आलों. परंतु त्यामुळे माझ्या मनाला शांति न वाटतां तळमळच वाटते. तरी महाराज, या दासाला आपल्या सत्संगाचा लाभ घडवाल काय?"<br>{{gap}}"होय. राजा, जशी आमच्या संगतीची तुला उत्कंठा आहे तशीच मुमुक्षूच्या संगतीवांचून आह्मांला तरी शांतता कोठें वाटते? राजा! तुझ्यासाठीं मी येथे राहतों. नाहीं, मला राहावेंच लागेल."<br>{{gap}}रामा, नंतर कुंभक त्या ठिकाणीं राहिला. तो त्या राजाला नित्य बोध करी. एक दिवस तो राजाला ह्मणाला:-<br>{{gap}}"राजा मी तुला थोडा इतिहास सांगतों. एका महाबलाढ्य अशा हत्तीला पकडण्याचे एकानें योजिलें. एक भला मोठा खड्डा खणून नंतर त्यावर अगदीं पातळ फळ्या टाकल्या, त्यावर थोडी माती पसरली. पुढे पावसाळ्यांत तेथें गवत उगवलें. साहजिकच तें कोवळें लुसलुशीत गवत खाण्यास तो हत्ती तेथें आला. तो तेथे जातो न जातो तोंच तो त्या खड्डयांत पडला. नंतर पारध्यानें त्याला बांधून अंकुशाच्या योगानें त्याला बराच वठणीवर आणला. परंतु पुढे केवळ दैवयोगानें तो हत्ती सुटला. महाताला तें समजतांच तो त्याच्या मागे येवून एका झाडावर बसला. आतां उडी टाकून<noinclude></noinclude> lix6kyymdh6o17si7okzcxk5tmzqmlp पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२४ 104 110011 229295 228792 2026-04-15T12:14:06Z JayashreeVI 4058 229295 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude> {{gap}}"या डेलफाय देवाच्या म्हणण्याचा अर्थ तरी काय? असा मी विचार करूं लागलों. मला तर मुळींच शहाणपण नाहीं, हे मला ठाऊक आहे. तेव्हां देवाच्या म्हणण्याचा अर्थ काय? देव तर खोटे बोलणार नाहीं. कारण तो देवच आहे. शेवटी देवाचें म्हणणें खरें आहे कीं खोटें आहे याचा खालील पद्धतीप्रमाणे मी पडताळा पाहण्याचा निश्चय केला. शहाणपणाबद्दल अत्यंत नाणावलेल्या एका मुत्सद्याकडे मी गेलों व त्याला पुष्कळ प्रकारचे प्रश्न विचारून त्याच्याशी संभाषण केलें, त्यावरून मला असे समजलें कीं, जरी त्याला सर्व लोक ज्ञानी समजतात, व तो आपल्या स्वतःलाही ज्ञानी समजतो, तरी पण तो अज्ञानी आहे व या अज्ञानाची त्याला जाणीव नाहीं. तेव्हां मी व तो या दोघांनाही ज्ञान नाही असे दिसले. माला माझ्या अज्ञानाची मला जाणीव होती, पण त्याला मात्र ती नव्हती. तेव्हां या बाबतींत मी त्याच्यापेक्षां शहाणा खरा, असें अनुभवास आले. पुढे मी एका कवीकडे गेलों. परंतु त्याला आपल्या कवितेबद्दल व आपल्या कवनपद्धतीबद्दल कांहींच ज्ञान नाहीं असे मला दिसून आलें. तेव्हां मी ताडलें की कवींना आपल्या कलेचे ज्ञान नसते, ते कविता करतात खऱ्या, परंतु त्या ज्ञानानें नव्हे तर साहजिक स्फूर्तीनें करतात. पुढे मी कारागिरांकडे गेलों, त्यांना माझ्यापेक्षां जास्त शहाणपण असेल असे मला वाटलें. त्यांना आपल्या कलेबद्दल व धंद्याबद्दल माहिती होती खरी, परंतु या एका प्रकारच्या ज्ञानावरून आपल्याला सर्व त-हेचेंज्ञान आहे असे त्यांना वाटत असे. या बाबतीतही मी त्यांचेपेक्षां बरा, असे मला दिसून आलें. याप्रमाणे देवाच्या जणुं कांहीं आज्ञेनेंच मी आपला व्यवसाय चालविला होता. परंतु यामुळे मी आपल्याला जास्त जास्त शत्रु करीत होतों. ज्याच्या ज्याच्या जवळ संभाषण करून मी त्याला कुंठित करून त्याचें अज्ञान दाखवीत असे, तो तो मनुष्य आपल्या अज्ञानाला दोष न ठेवता मलाच शिव्या देई.! तरुण मंडळी हा वादविवाद पहात असत. तेव्हां त्यांना मी जास्त शहाणा आहे असे वाटे व माझ्या--<noinclude>{{center|१८}}</noinclude> enm5td6urf9d30xbx6wsgep89xzsc87 229296 229295 2026-04-15T12:15:00Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 229296 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude> {{gap}}"या डेलफाय देवाच्या म्हणण्याचा अर्थ तरी काय? असा मी विचार करूं लागलों. मला तर मुळींच शहाणपण नाहीं, हे मला ठाऊक आहे. तेव्हां देवाच्या म्हणण्याचा अर्थ काय? देव तर खोटे बोलणार नाहीं. कारण तो देवच आहे. शेवटी देवाचें म्हणणें खरें आहे कीं खोटें आहे याचा खालील पद्धतीप्रमाणे मी पडताळा पाहण्याचा निश्चय केला. शहाणपणाबद्दल अत्यंत नाणावलेल्या एका मुत्सद्याकडे मी गेलों व त्याला पुष्कळ प्रकारचे प्रश्न विचारून त्याच्याशी संभाषण केलें, त्यावरून मला असे समजलें कीं, जरी त्याला सर्व लोक ज्ञानी समजतात, व तो आपल्या स्वतःलाही ज्ञानी समजतो, तरी पण तो अज्ञानी आहे व या अज्ञानाची त्याला जाणीव नाहीं. तेव्हां मी व तो या दोघांनाही ज्ञान नाही असे दिसले. माला माझ्या अज्ञानाची मला जाणीव होती, पण त्याला मात्र ती नव्हती. तेव्हां या बाबतींत मी त्याच्यापेक्षां शहाणा खरा, असें अनुभवास आले. पुढे मी एका कवीकडे गेलों. परंतु त्याला आपल्या कवितेबद्दल व आपल्या कवनपद्धतीबद्दल कांहींच ज्ञान नाहीं असे मला दिसून आलें. तेव्हां मी ताडलें की कवींना आपल्या कलेचे ज्ञान नसते, ते कविता करतात खऱ्या, परंतु त्या ज्ञानानें नव्हे तर साहजिक स्फूर्तीनें करतात. पुढे मी कारागिरांकडे गेलों, त्यांना माझ्यापेक्षां जास्त शहाणपण असेल असे मला वाटलें. त्यांना आपल्या कलेबद्दल व धंद्याबद्दल माहिती होती खरी, परंतु या एका प्रकारच्या ज्ञानावरून आपल्याला सर्व त-हेचेंज्ञान आहे असे त्यांना वाटत असे. या बाबतीतही मी त्यांचेपेक्षां बरा, असे मला दिसून आलें. याप्रमाणे देवाच्या जणुं कांहीं आज्ञेनेंच मी आपला व्यवसाय चालविला होता. परंतु यामुळे मी आपल्याला जास्त जास्त शत्रु करीत होतों. ज्याच्या ज्याच्या जवळ संभाषण करून मी त्याला कुंठित करून त्याचें अज्ञान दाखवीत असे, तो तो मनुष्य आपल्या अज्ञानाला दोष न ठेवता मलाच शिव्या देई.! तरुण मंडळी हा वादविवाद पहात असत. तेव्हां त्यांना मी जास्त शहाणा आहे असे वाटे व माझ्या--<noinclude>{{center|१८}}</noinclude> 2gnxs8fxjw6t05ch93hk0lqucytke0w पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२५ 104 110012 229298 228793 2026-04-15T12:24:21Z JayashreeVI 4058 229298 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|<u>'''साक्रेटिस.'''</u>}}</noinclude> प्रश्नपद्धतीचें ते आपापसांत अनुकरण करीत व या पद्धतीचा प्रयोग दुस-यावरही करीत. {{gap}}"याप्रमाणे ज्या लोकांचे अज्ञान बाहेर पडे ते लोक आपल्यावर रागावण्याऐवजी मजवर रागावत व सॉक्रेटिस हा तरुणांना बिघडवितो, अशा प्रकारचा आरोप मजवर करीत. हे आरोप तुम्ही लहानपणापासून ऐकत आला आहात व येवढ्याशा थोड्या वेळांत तुमचे दुराग्रह काढुन टाकणे कठीण आहे. परंतु मी जें सांगितलें आहे तें सर्व खरे आहे. मीं कांहीं एक चोरून ठेवलें नाहीं, किंवा कांहींएक गाळलें नाहीं. आहे तसें स्पष्टपणे सांगितलें आहे व हा माझा स्पष्टवक्तेपणाच मला नेहमीं भोंवलाआहे व आतांही तो भोवणार. {{gap}}"आतां मला देशाभिमानी मेलीटसकडे वळलें पाहिजे. याचा आरोप असा आहे, "सॉक्रेटिस हा तरुणांना बिघडविणारा व शहरच्या देवतां- वर भरंवसा न ठेवतां दुसन्याच देवतांवर भरवसा ठेवणारा वाईट मनुष्य आहे.' आतां मी तरुणांना विघडवितों हा आरोर मेलीटसने फारसा विचार न करतां केला आहे असें मी त्याची प्रत्यक्ष तुमच्यापुढे उलट तपासणी करून दाखवितो. ( साक्रेटीस मेलीटसची उलट तपासणी न्यायाधीश सभेपुढे घेतो.) "अथीनियन लोकहो ! पाहिलेत तुम्ही की मेलीटसनें याविषयीं मुळींच विचार केला नाहीं, असें त्याच्या विसंगत विधानांवरून स्पष्ट होत आहे. तोच प्रकार दुसन्याही आरोपाचा आहे. त्यांतही सर्वस्वीं विसंगतपणाच भरलेला आहे. परंतु तुमच्यापैकी कोणी विचारील 'सॉक्रेटिस ! ज्या व्यवसायामुळे तुमच्या जीवावर येऊन बेतली, असा व्यवसाय चालू ठेवण्याचें तुमच्या मनांत येतें कसें १ याला माझें उत्तर म्हणजे माझा सर्व आयुष्यक्रमच होय. कोणत्याही माणसानें आपले कर्तव्यकर्म आपल्या आयुष्याची पर्वा न करतां केलें पाहिजे. मी तीन वेळां तुमच्या सेनापतीच्या हाताखाली काम केलें व या तीनही वेळां मी आपल्या जीवाकडे किंवा सुरक्षितपणाकडे पाहिलें नाहीं. याप्रमाणे सेनापतीची आज्ञा पाळ-<noinclude>{{center|१९}}</noinclude> fpu4um3iceyvrdeo2t33bobp4qo6pge पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/५ 104 110132 229293 2026-04-15T12:02:02Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229293 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|{{x-larger|'''माझे दोन शब्द.'''}}}} {{rule|7em}}<br> {{gap}}प्रसंगानुसार एखादें कार्य घडून येण्यास अगदी क्षुल्लक कारण पुरतें. प्रस्तुत पुस्तक लिहिण्याची कल्पना अशाच क्षुल्लक कारणाने उद्भवली. सुमारे वर्षापूर्वी मी एका मासिकाकरितां गोष्ट लिहिली; व नेहेमीप्रमाणे ती पाठविण्यापूर्वी स्वतःस वाचून दाखविली. गोष्ट वाचून झाल्यानंतर पाच मिनिटें अगदी स्वस्थपणें विचारांत गढल्यासारखें केल्यावरून मी ह्मटलें, "कां, कथानकाच्या मांडणीत कांहीं चुकलें कीं काय"? तेव्हां स्वतः ह्मणाले, "छे, छे, तसें नव्हे. गोष्ट उत्तम साधली आहे. परंतु मी ह्मणतों हीं काल्पनिक चित्रे दाखवून वाचकांच्या मनावर जो परिणाम होईल, त्यापेक्षां आपल्या पौराणिक आर्यस्त्रियांची घडीव चित्रे, अशाच मनोरंजक गोष्टीच्या भाषेत लिहिल्यास जास्त उत्तम होईल. पहा बरें! रा. वासुदेवराव आपट्यांनी लहान मुलांकरितो अशा रितीनें केवढे कार्य केलें.? आपटे आणि किनरे यांच्या सारख्यांनी अशा कथा लिहाव्यात आणि तुमच्या लेखिकावर्गात एकीच्याही हातून असा प्रयत्न होऊं नये?"<Br>{{gap}}"पण भारतभागवतांतील स्त्रीचरित्रे कथापुराणांतून बहुतेक स्त्रीवर्गास माहीतच होतात." मी म्हटलें.<Br>{{gap}}"परंतु आतां कथा पुराणाला जातो कोण? बरें घरच्या घरीं आजीबाईकडून अशा गोष्टी मुलींच्या कानावरून जावयाच्या; परंतु शाळा, अभ्यास, खेळ, इतकें उरकून अशा गोष्टी ऐकावयास मुलींना फुरसत तरी कोठें आहे! तेंच चटकदार भाषेत कोणी गोष्टी लिहील तर मुली व तरुण स्त्रिया सर्वच हौसेनें वाचतील."{{nop}}<noinclude></noinclude> 3t1ukbzemyi857l8ciximxaj5k3vu93 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/६ 104 110133 229294 2026-04-15T12:11:18Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229294 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ६ )}}</noinclude>{{gap}}या साध्या बोलण्यावरून माझे मनानें 'अशा गोष्टी आपण लिहून पाहूं या' अर्से अगदी दृढ घेतलें. नंतर मी चिपळूणकरांचे भारत व भागवताची अनुक्रमणिका चाळली. परंतु त्यांत साधारणतः अप्रसिद्ध असे एकही स्त्रीचरित्र सांपडेना. मला तर वाटे की निदान पहिलें एक चरित्र तरी लोकांच्या दृष्टिक्षेपांत नसावें. तोच मला योगवासिष्ठांतील चुडालेच्या कथेची आठवण झाली; व तेंच मीं प्रथम लिहून काढले; व स्वतःस तें फार आवडून, अशाच भारत-भागवतांतून कथा घेऊन गोष्टीरूपानें लिहिण्याबद्दल प्रोत्साहन दिलें.<br>{{gap}}असें प्रोत्साहन माझ्या परमपूज्य व प्रिय पतीकडून न मिळतें तर मजकडून हा प्रयत्न झाला असता किंवा नाहीं याची शंकाच आहे.<br>{{gap}}माझ्या विनंतीला मान देऊन अत्यंत उद्योगमग्न असतांही मुमुक्षुचे संपादक श्रीयुत रा. रा. लक्ष्मणराव पांगारकर यांनी काळजीपूर्वक हा ग्रंथ वाचून जो अभिप्राय लिहून दिला त्याबद्दल मी त्यांची अत्यंत आभारी आहे. तसेंच आमचे स्नेही श्री. रा. रा. जगन्नाथ रघुनाथ उर्फ नानासाहेव घारपुरे यांनी प्रस्तावना लिहून व छापण्याच्या संबंधानें सर्व व्यवस्था करून जें साहाय्य केलें त्याबद्दल त्यांचे आभार मानून मी मोकळी न होतां कायमची ऋणीच राहीन.<br>{{gap}}शेवटीं ज्या जगच्चालकाच्या कृपेनें हा ग्रंथ लिहून पार पडला त्याची अनन्यभावें करुणा भाकून मी पुरें करतें.<br> <center> {| {{brace table parameters}} |ता. ७।१।१७||{{brace|r|t}}|| |- |भाई जिवनजीची गल्ली||{{brace|r|m}}||{{gap}}'''सौ. यशोदाबाई भट''' |- |ठाकुरद्वार, मुंबई.||{{brace|r|b}}|| |} </center> <br> {{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> 61lcgppiz8u64tmowbsrkdo1ylkgtym पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/७ 104 110134 229297 2026-04-15T12:24:04Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229297 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ७ )}}</noinclude><br> {{center|{{xx-larger|'''अनुक्रमणिका.'''}}}} <br> <center> {| |+ |- | || || पृष्ठे. |- | प्रकरण १ ले || - पतीचा उद्धार करणारी चुडाला || १ |- | २ " || - पतीचें व स्वकुलाचें सत्व राखणारी चांगुणा || २७ |- | ३ " || - पितृकुलरक्षणार्थ आत्मयज्ञ करणारी सुमती || ४४ |- | ४ " || - च्यवन भार्गव व सुकन्या || ६५ |- | ५ " || - महासाध्वी मंदोदरी || ७५ |- | ६ " || - पतिव्रता गांधारी || ८६ |} </center><noinclude></noinclude> 5ax1bnmaxxthhu4ewkocbwvr0gmrm7g पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/८ 104 110135 229299 2026-04-15T12:29:43Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229299 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ८ )}}</noinclude><br> {{center|{{xx-larger|'''अभिप्राय.'''}}}}<br> {{gap}}"आर्यस्त्रीरत्ने" ह्या सौ. यशोदाबाई भट यांच्या ग्रंथांची हस्तलिखित प्रत मी समग्र वाचून पाहिली. ग्रंथ वाचून मला फार आनंद झाला. सांप्रतच्या सुशिक्षित तरुणींच्या व कुमारींच्या हातीं यायला यापेक्षां अधिक कल्याणप्रद ग्रंथ मिळणे कठिण आहे. चूडाला, चांगुणा, सुमती व तिची बहीण शांडिल्या, च्यवन भार्गवाची भार्या सुकन्या, मंदोदरी व गांधारी यांची मनोरंजक व बोधप्रद चरित्रें यांत सभ्य, सोप्या, पण परिणामकारक भाषेत लिहिली आहेत. सीता सावित्री द्रौपदी इ. सतींची चरित्रे सर्वांना माहीतच आहेत. यांतील स्त्रीरत्नांची चरित्रे तितकीं लोकप्रसिद्ध नसली तरी त्यासारखींच आनंददायक व बोधप्रद आहेत. ह्रीं सहाही चरित्रे मिळून कुमारी, मुग्धा, तरुणीं, युवती, प्रौढा व वृद्धा या सर्व अवस्थांतील सच्छील कसें असतें याचा बोध उत्तम प्रकारें होईल. ही चरित्रे स्त्रीपुरुषांना सारखीच उपदेशपर आहेत. तरी तीं विशेषतः स्त्रीवर्गाच्या वाचनांत येतील तर त्यांना सतीत्वाचें दिव्य बोधामृत मिळून त्या संसारास घन्यत्व आणतील.<Br><br> <center> {| {{brace table parameters}} |ता, १३।११।१६||{{brace|r|ht}}||{{gap}}'''लक्ष्मण रामचंद्र पांगारकर.''' |- |मुंबई.||{{brace|r|hb}}|| |} </center> <br> {{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> e2w5u9hisdofj2d1cktu74ew2hr0qgc पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/९ 104 110136 229301 2026-04-15T12:37:25Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229301 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{xx-larger|{{center|'''पतीला उद्धारणारी चुडाला.'''}}}}<br> {{rule|5em}}<br> {{gap}}चुडालेची कथा फार प्राचीन काळची आहे. ही कथा वसिष्ठांनीं श्रीरामचंद्रास सांगितली. श्रीरामप्रभूंनीं आपल्या गुरूंना जेव्हां 'महाराज, मला कांहीं बोध करून पावन करा' असें म्हटलें तेव्हां गुरु वसिष्ठ म्हणाले:- <Br> {{gap}}'रामा, तुला पावन कोण करणार? पावनांचा पावन, वेदांचा वेद, देवांचा देव असा तूं पृथ्वीचा भार हरण करण्यासाठीं, रावणादिकांचा संहार करून पृथ्वीला त्यांच्या कचाट्यांतून सोडविण्यासाठीं, अवतार घेऊन आला आहेस, हें मला माहित आहे. पण जनोद्धाराकरितां त्यांना आपल्या सदाचरणार्ने धडा घालून देण्याकरितां, तूं हे मायेचें पांघरूण घेऊन मला विचारितोसच तर मी थोड्याच कालापूर्वी होऊन गेलेल्या चुडालेची कथा तुला सांगतों.'<Br> {{gap}}असें म्हणून त्यांनीं गोष्ट सांगण्यास आरंभ केला. ते म्हणाले<br>{{gap}}"रामा, स्त्रिया ह्मणजे नरकाचें साधन असा जरी त्यांचेवर ऋषिमुनींनी शेरा मारलेला आहे; तरी त्यांच्याखेरीज मोक्ष नाहीं, संसार सुखावह नाहीं." रामा मी जिचें चरित्र सांगणार आहे, त्या स्त्रीरत्नानें दोन्ही कुलांचा उद्वार तर केलाच केला, परंतु शिवाय इतर स्त्रियांचा, बायकांचा देव, गुरु ह्मणून मानलेल्या पतीचा सुद्धां उद्धार केला.<Br> {{gap}}रामा, शिखिध्वज नांवाचा एक राजा होता. तो न्यायानें उत्तम रीतीनें राज्य करी. त्याच्या पूर्वसुकुतेंकरून एके दिवशीं एक मुनिश्रेष्ठ त्याच्या राजवाड्यांत आले. राजानें त्या मुनीला आसनावर बसवून, भार्या चुडालेसह त्याची पूजा केली; व कांहीं उपदेश करावा, अशी त्याने विनंति केली.{{nop}}<noinclude></noinclude> ckarkaj5l03eq5v1nlzeb5s8tbe7ess पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/१० 104 110137 229302 2026-04-15T12:37:45Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( २ ) मुनीनें त्याचा अधिकार पाहून कांहीं सद्बोध करावा असें ठरविलें. राजापेक्षां चुडालेचा अधिकार अधिक हैं साधूनें ओळखिलें. परंतु त्या मुनीनें दोघांनाही उपदेश केला व कांही..." 229302 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ ( २ ) मुनीनें त्याचा अधिकार पाहून कांहीं सद्बोध करावा असें ठरविलें. राजापेक्षां चुडालेचा अधिकार अधिक हैं साधूनें ओळखिलें. परंतु त्या मुनीनें दोघांनाही उपदेश केला व कांहीं दिवस तेथें वास्तव्य केलें. त्या मुनीचा रोज बोध ऐकतां ऐकतां चुडाला पूर्णत्वाला पोहोंचली. परंतु राजाची मननशक्ति व पूर्वसंस्कार शुद्ध व दृढ नसल्यानें त्याच्या मनावर तेव्हां व्हावा तसा परिणाम झाला नाहीं. रामा, चुडाला बाहेरून व्याव- हारिक जनांप्रमाणें वागे. परंतु अंतर्यामीं ती पूर्ण योगी व पूर्णानंदी झाल्याने तिच्या भावना व तिचें मन हीं तिच्या आटोक्यांत आली. यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचें अलौकिक दिव्य तेज दिसूं लागलें. आपल्या पतीला मायाजाळांत गुरफटलेला पाहून तिला वाईट वाटे. रामा, एक दिवस एकांतांत असतां शिखिध्वज म्हणाला:- - चुडाले, आपण आयुष्याच्या मध्यावर आलो. आतां आपणाला तारुण्याचे दिवस कांहीं पुन्हां यावयाचे नाहींत. परंतु असें असतां, सुंदरी, तारुण्यांत न दिसणारे तेज सांप्रत तुझ्या मुखावर कां दिसतें ? छे, या- पूर्वी तुझ्या ठिकाणीं मी असलें सौंदर्य कधींच पाहिलें नव्हतें. तसेच, यापूर्वी तूं इतकी आनंदी व उल्हासी नव्हतीस. सांग, चुडाले, सांग असा • अप्राप्त ठेवा तरी कोणता तुला लाधला आहे ? मला वाटतें, हें राजवैभव, व मजपासून प्राप्त होणारें सुख, याच गोष्टी तुझ्या ह्या दिव्य तेजास कारणीभूत नसतील ना ?" अरेरे! राजाचें तें खचदार भाषण ऐकून दुसरी अज्ञानी स्त्री खास 'दुःखी झाली असती. परंतु चुडाला - सुख-दुःख-रहित व मानापमान -रहित अशी चुडाला - शांततापूर्वक स्मित करून म्हणाली:- "नाहीं, महाराज नाहीं. मला राजवैभवानें अगर विषयसेवनानें ही स्थिति लाधली नाहीं तर गुरुजींच्या बोधामृतपानानें ही स्थिति लाधली आहे. महाराज, लहान मुली खेळू लागल्या म्हणजे त्यांत एकादशीचा<noinclude></noinclude> n6s23ol4tzf93ig8vjcrak8cpc1o0d7 229316 229302 2026-04-16T08:51:31Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229316 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( २ )}}</noinclude>{{gap}}मुनीनें त्याचा अधिकार पाहून कांहीं सद्बोध करावा असें ठरविलें. राजापेक्षां चुडालेचा अधिकार अधिक हे साधूनें ओळखिलें. परंतु त्या मुनीनें दोघांनाही उपदेश केला व कांहीं दिवस तेथें वास्तव्य केलें. त्या मुनीचा रोज बोध ऐकतां ऐकतां चुडाला पूर्णत्वाला पोहोंचली. परंतु राजाची मननशक्ति व पूर्वसंस्कार शुद्ध व दृढ नसल्यानें त्याच्या मनावर तेव्हां व्हावा तसा परिणाम झाला नाहीं. रामा, चुडाला बाहेरून व्यावहारिक जनांप्रमाणें वागे. परंतु अंतर्यामीं ती पूर्ण योगी व पूर्णानंदी झाल्याने तिच्या भावना व तिचें मन हीं तिच्या आटोक्यांत आली. यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचें अलौकिक दिव्य तेज दिसूं लागलें. आपल्या पतीला मायाजाळांत गुरफटलेला पाहून तिला वाईट वाटे. रामा, एक दिवस एकांतांत असतां शिखिध्वज म्हणाला:-<br>{{gap}}"चुडाले, आपण आयुष्याच्या मध्यावर आलो. आतां आपणाला तारुण्याचे दिवस कांहीं पुन्हां यावयाचे नाहींत. परंतु असें असतां, सुंदरी, तारुण्यांत न दिसणारे तेज सांप्रत तुझ्या मुखावर कां दिसतें? छे, या- पूर्वी तुझ्या ठिकाणीं मी असलें सौंदर्य कधींच पाहिलें नव्हतें. तसेच, यापूर्वी तूं इतकी आनंदी व उल्हासी नव्हतीस. सांग, चुडाले, सांग असा अप्राप्त ठेवा तरी कोणता तुला लाधला आहे? मला वाटतें, हें राजवैभव, व मजपासून प्राप्त होणारें सुख, याच गोष्टी तुझ्या ह्या दिव्य तेजास कारणीभूत नसतील ना?"<br>{{gap}}अरेरे! राजाचें तें खोचदार भाषण ऐकून दुसरी अज्ञानी स्त्री खास दुःखी झाली असती. परंतु चुडाला- सुख-दुःख-रहित व मानापमान-रहित अशी चुडाला- शांततापूर्वक स्मित करून म्हणाली:-<br>{{gap}}"नाहीं, महाराज नाहीं. मला राजवैभवानें अगर विषयसेवनानें ही स्थिति लाधली नाहीं तर गुरुजींच्या बोधामृतपानानें ही स्थिति लाधली आहे. महाराज, लहान मुली खेळू लागल्या म्हणजे त्यांत एकादशीचा<noinclude></noinclude> j8ykhr1rpqiusqzvllat9uc3m26ta4q पान:गाथा पंचक-गाथा पाचवी-श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा.pdf/१ 104 110138 229304 2026-04-15T13:15:55Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान " श्रीनिळोबामहाराज" 229304 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude> श्रीनिळोबामहाराज<noinclude></noinclude> nlouwoi04cxvyn8r3qr71k0jmmbepnv पान:गाथा पंचक-गाथा पाचवी-श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा.pdf/२ 104 110139 229305 2026-04-15T13:16:14Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "॥ श्रीविठ्ठल ॥ गाथा पंच क. गाथा पांचवी. श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा. सांप्रदायिक ब्रह्मीभूत श्री नानामहाराज साखरे ज्ञानेश्वरी भाषांतरकार यांच्या संग्रहांतील पुरा..." 229305 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>॥ श्रीविठ्ठल ॥ गाथा पंच क. गाथा पांचवी. श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा. सांप्रदायिक ब्रह्मीभूत श्री नानामहाराज साखरे ज्ञानेश्वरी भाषांतरकार यांच्या संग्रहांतील पुरातन हस्तलिखित वह्यांवरून पाउ दुरुस्त करून तयार केली. ती त्र्यंबक हरी आवटे यांनीं अभंगांची विषयवार निवड करून पुणे येथील आपल्या “ इंदिरा " छापखान्यांत छापून प्रसिद्ध केली. विजयादशमी शके १८३०. किंमत दीड रुपया.<noinclude></noinclude> k4rt0hrafdj6beiymex0izeophm2bgc पान:गाथा पंचक-गाथा पाचवी-श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा.pdf/३ 104 110140 229306 2026-04-15T13:16:26Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "हा ग्रंथ त्र्यंबक हरी आवटे यांनी पुणे पेठ सदाशिव येथील आपल्या 'इंदिरा' छापखान्यांत छापून पुणे पेठ सदाशिव घर नंबर १८१ येथे प्रसिद्ध केला. सर्व हक्क प्रकाशकानें स्वाधीन ठेविले आहेत." 229306 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>हा ग्रंथ त्र्यंबक हरी आवटे यांनी पुणे पेठ सदाशिव येथील आपल्या 'इंदिरा' छापखान्यांत छापून पुणे पेठ सदाशिव घर नंबर १८१ येथे प्रसिद्ध केला. सर्व हक्क प्रकाशकानें स्वाधीन ठेविले आहेत.<noinclude></noinclude> d0v5ffj0ic39qg0xc5e0br2keg1pvyd पान:गाथा पंचक-गाथा पाचवी-श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा.pdf/४ 104 110141 229307 2026-04-15T13:16:33Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "॥ श्री ॥ श्रीज्ञानदेव महाराज श्रीनामदेवमहाराज श्रीएकनाथमहाराज श्रीतुकाराममहाराज व श्रीनिळोबामहाराज या ईश्वरावतार साधुपुरुषांचीं अमृतवचनें म्हणजे अखिल धर्माचे पुनरुज्जीव..." 229307 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>॥ श्री ॥ श्रीज्ञानदेव महाराज श्रीनामदेवमहाराज श्रीएकनाथमहाराज श्रीतुकाराममहाराज व श्रीनिळोबामहाराज या ईश्वरावतार साधुपुरुषांचीं अमृतवचनें म्हणजे अखिल धर्माचे पुनरुज्जीवन, अखिल शास्त्रांचें ज्ञानभांडार, आणि सकल मानवांचें धर्मनीतिव्यवहारबंधनात्मक गाथापंचक. हा ग्रंथ सांप्रदायिक ह्मीभूत श्रीनानामहाराज साखरे ज्ञानेश्वरी भाषांतरकार यांच्या कृपाप्रसादाने तयार करून त्यांच्याच प्रेरणेने श्रीविठ्ठलस्वरूपीं श्रीगुरु नानामहाराज साखरे यांच्या सेवेशीं अत्यंत लीन होऊन अर्पण करितों.. त्र्यंबक हरी आवटे.<noinclude></noinclude> mjn7a43k7g6hlepkz2mft9a36ynjk83 पान:गाथा पंचक-गाथा पाचवी-श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा.pdf/५ 104 110142 229308 2026-04-15T13:17:05Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान " प्रस्तावना. श्रीनिळोबा महाराज हे वारकरी सांप्रदायांतील साधुवृंदांपैक शेवटचे साधु होत. दक्षिणेत अमदनगर जिल्ह्यांत पारनेर तालु- क्यांत पिंपळनेर म्हणून गांव आहे तेथील हे कुळकर्..." 229308 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude> प्रस्तावना. श्रीनिळोबा महाराज हे वारकरी सांप्रदायांतील साधुवृंदांपैक शेवटचे साधु होत. दक्षिणेत अमदनगर जिल्ह्यांत पारनेर तालु- क्यांत पिंपळनेर म्हणून गांव आहे तेथील हे कुळकर्णी, यांचा जन्म - शक्र उपलब्ध नाहीं. परंतु हे श्रीतुकारामहाराजानंतर प्रसिद्धीस आले, श्रीतुकाराममहाराजांच्या चौदा टाळकरी शिष्यांपैकी हे एक होत. यांची श्रीतुकाराममहाराजावर निस्सीम भक्ति असे. श्रीतुका- राममहाराज एकांतांत असतां श्रीनिळोबाराय म्हणाले की, महाराज, मजवर अनुग्रह करावा; तेव्हां अनुग्रह केल्यावांचून मी निजधामास जाणार नाहीं असें महाराजांनी अभिवचन दिले; परंतु श्रीनिळोबाराय पिंपळनेरास असतांच श्रीतुकाराममहाराज विदेहमोक्षाप्रत प्राप्त झाले. पुढे श्रीनिळोबाराय महाराज देहूस आले, तों त्यांस श्रीतुकोबाराय निजधामास गेल्याचे समजले. तेव्हां त्यांस अत्यंत दुःख झालें. आणि त्यांनी असा निश्चय केला कीं, महाराज प्रत्यक्ष येऊन भेंट देऊन अनुग्रह करतील तरच अन्नप्राणी ग्रहण करीन. याप्रमाणे श्रीतुकोबारायांच्या दर्शनाचाचा ध्यास घेऊन इंद्रायणीच्या तीरीं श्रीनिळोबाराय बेचाळीस दिवस पडून राहिले. हा त्यांचा दृढ मिश्रय पाहून प्रत्यक्ष श्रीविठ्ठल त्यांच्या समाधानाकरितां आले. तेव्हां श्रीनिळोबारायांनी म्हटले:--<noinclude></noinclude> gtblxw9xoxi8tf9uw5kl837480i5a8c पान:गाथा पंचक-गाथा पाचवी-श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा.pdf/६ 104 110143 229309 2026-04-15T13:17:15Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( २ ) येथे तुजलागीं बोलाविलें कोणीं । - प्राथिल्यावांचूनी आलासी कां ॥ १ ॥ प्रल्हादा कैवारी दैत्याशीं दंडाया । स्तंभीं देवराया प्रगटोनी ॥ २ ॥ तैशापरि मजला नाहीं बा संकट । तरी कां फुग..." 229309 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( २ ) येथे तुजलागीं बोलाविलें कोणीं । - प्राथिल्यावांचूनी आलासी कां ॥ १ ॥ प्रल्हादा कैवारी दैत्याशीं दंडाया । स्तंभीं देवराया प्रगटोनी ॥ २ ॥ तैशापरि मजला नाहीं बा संकट । तरी कां फुगट श्रम केला ॥ ३ ॥ निळा ह्मणे आह्मी नोळखूति देवा । तुकयाचा धांवा करीतसों ॥ ४ ॥ काय विलक्षण श्रीनिळोबारायाची गुरुनिष्ठा ही !!! श्री तुको• बारायांनी " देव सारावे परते | संत पुजावे आरते" असें जें म्हटलें आहे, त्या वाक्याचा अर्थ ह्याच पुरुषाच्या अंतःकरणांत यथार्थ ठसला आहे. पहा कीं, श्रीपांडुरंगाने प्रत्यक्ष येऊन दर्शन दिलें असतांही, ज्या पुरुषास तें नको आहे, इतकेंच नाहीं, तर ते उलट देवासच विचारतात कीं, मजवर कांहीं प्रल्हादासारखें संकट आले आहे, असें समजून तूं येथे आलास ? तर तसें नाहीं; आपण विनाकारण येथपर्यंत येण्याचे श्रम घेतले. ह्या प्रसंगास आम्ही देवासही ओळखत नाहीं; तर आमचा स्वामी जो श्रीगुरु तुकोबाराय ह्यांचा धांवा करीत आहों ! हा सर्व अभंग ऐकून कोणत्या गुरु- भक्ताचें अंतःकरण दाटून येणार नाहीं ! असो. खरोखर श्रीतुकाराममहाराजांच्या कृपानुग्रहाचीच आर्तता आहे असा दृढ निश्चय पाहून, येऊनियां कृपावंतें । तुकयास्वामी सद्गुरुनार्थे ॥ १॥ हात ठेविला मस्तकीं । देऊनि प्रसाद केले सुखी ॥२॥ माझी वाढविली मती । गुण वर्णावया स्फुर्ती ॥३॥ निळा ह्मणे मी बोलता । दिसे परि हे त्याची सत्ता ४<noinclude></noinclude> brgwoirebgizubs6geyvtwop8baqiyr पान:गाथा पंचक-गाथा पाचवी-श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा.pdf/७ 104 110144 229310 2026-04-15T13:17:30Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ३ ) प्रत्यक्ष श्रीतुकाराम महाराज प्रगट होऊन त्यांनी श्रीनिळोबाच्या मस्तकीं हात ठेवून प्रसाद दिला आणि श्रीविठ्ठलगुणवर्णन करण्याची स्फुर्ति देऊन श्रीनिळोबारायावर अनुग्रह के..." 229310 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( ३ ) प्रत्यक्ष श्रीतुकाराम महाराज प्रगट होऊन त्यांनी श्रीनिळोबाच्या मस्तकीं हात ठेवून प्रसाद दिला आणि श्रीविठ्ठलगुणवर्णन करण्याची स्फुर्ति देऊन श्रीनिळोबारायावर अनुग्रह केला. गुरूंनी शिष्यावर अनुग्रह केल्यानंतर उपदेश केलेलें ज्ञान को- णच्या संप्रदायानें प्राप्त झालें आहे, तें सांगण्याची श्रेष्ठांची पद्धत आहे; तदनुरूप श्रीतुकोबारायांनीं श्रीनिळोबारायास सांगितलेल्या संप्रदायाचें वर्णन खाली दिल्याप्रमाणे श्रीनिळोबारायांनी केलें आहे. मुख्य महाविष्णु चैतन्याचें मूळ | सांप्रदाय फळ तेथोनियां ॥ १ ॥ हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी । चतुश्लोकी चारी भागवत ॥ २ ॥ तें गुज विधाता सांगे नारदासी । नारदें व्यासासी उपदेशिलें ॥ ३ ॥ राघव चैतन्य केलें अनुष्टान | त्यासी द्वैपायनें कृपा केली ॥ ४ ॥ कृपा करूनि हस्त ठेवियेला शिरीं । बोध तो अंतरीं ठसावला ॥ १ ॥ राघवा चरणीं केशव शरण । बाबाजीशीं पूर्ण कृपा त्याची ॥ ६ ॥ बाबाजीनें स्वप्नीं येऊनि तुकयाला । अनुग्रह दिला निजप्रीति ॥ ७ ॥ जगद्गुरू तुका अवतार नामयाचा । संप्रदाय सकळांचा येथूनियां ॥ ८ ॥ Sp<noinclude></noinclude> eouj5zv56r9vdup3sbpdmzks5fb9fkb पान:गाथा पंचक-गाथा पाचवी-श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा.pdf/८ 104 110145 229311 2026-04-15T13:17:51Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "(2) निळा म्हणे मज उपदेश केला । संप्रदाय दिला सकळ जना ॥ ९॥ याप्रमाणें अनादिसिद्ध महा विष्णुपासून चालत आलेली संप्र दायपरंपरा श्रीनिळोबाराय महाराजापर्यंत कशी आली हें वर दाखवित आहे...." 229311 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>(2) निळा म्हणे मज उपदेश केला । संप्रदाय दिला सकळ जना ॥ ९॥ याप्रमाणें अनादिसिद्ध महा विष्णुपासून चालत आलेली संप्र दायपरंपरा श्रीनिळोबाराय महाराजापर्यंत कशी आली हें वर दाखवित आहे. पुढे ही परंपरा सर्व लोकांत कशी प्रसस्त खेली याचें दिग्दर्शन थोडक्यांत खाली केलें आहे. श्रीतुकोबारायांनी श्रीनिळोबारायावर अनुग्रह केल्यानंतर कांही कालानें श्रीनिकोबारायांनी श्रीतुकोबारायाची प्रार्थना केली आणि म्हटलें कीं, महाराज, तुम्हीं मजवर अनुग्रह केला खरा; परंतु पुढे मी आपला अनुग्रहित वीणा व टाळ कोणास देऊं ? या त्यांच्या विनंतीवरून श्रीतुकोबारायांनी त्यांस पुनः दर्शन देऊन सांगितलें कीं, मोगलाईत शिरूर मुक्काम शंकरस्वामी नांवाचे परम भगवद्भक्त अधिकारी आहेत, यांस तुम्हीं अनुग्रह करावा व आपला वीणा व टाळ त्यांस द्यावा. त्याप्रमाणे श्रीनिळोबारायांनी शंकरस्वामी- वर अनुग्रह केला. तेव्हां शंकरस्वामींनी देह ठेवते वेळीं श्रीतुकोबा- रायाची प्रार्थना करून म्हटलें : आतां हा वीणा व टाळ कोणास द्यावा, त्यावरून त्यांनी सांगितलें कीं, वासीकर मल्लाप्पा यांस द्यावा... त्याप्रमाणे शंकरस्वामींनी वासीकर मल्लाप्पा आप्पा यांजवर अनु- ग्रह करून त्यास आपला वीणा व दाळ दिला. तो अद्याप त्यांच्याच घराण्याकडे चालू आहे. ते आपणास वासकर म्हणवितात. सांप्रत जेवढे म्हणून वारकऱ्यांचे भजनी फंड आहेत तेवढे सर्व वासकरां- च्याच परवानगीनें निरनिराळे झाले आहेत. तरी पण सांप्रतकाली वासकरांसच अग्रस्थान आहे. श्रीनिळोबा महाराजांपर्यंत जे सांप्रदाय परंपरानुयायी भगवद्भक्त संत होऊन गेले त्यांच्या अभंगी अमृतवचनांत भक्तिज्ञानयुक्त - भगवत्प्रसाद असल्यामुळे सर्व वारकरी सांप्रदायिक भक्तमंडळ त्यांच्या वाणीस मोठ्या आदरानें मान देत आहेत.<noinclude></noinclude> 0r39rtkhuq8tk11wh7x5n1guxrtns45 पान:गाथा पंचक-गाथा पाचवी-श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा.pdf/९ 104 110146 229312 2026-04-15T13:18:16Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ५ ) श्री निळोबाराय महाराज यांच्या अभंग वाणीचें निराळे वर्णन करण्यापेक्षां त्यांच्याच अभंगांत त्यांनीं वर्णन केले आहे त्यावरून श्रद्धालु वाचक भक्तांच्या सहज ध्यानांत येईल. श्..." 229312 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( ५ ) श्री निळोबाराय महाराज यांच्या अभंग वाणीचें निराळे वर्णन करण्यापेक्षां त्यांच्याच अभंगांत त्यांनीं वर्णन केले आहे त्यावरून श्रद्धालु वाचक भक्तांच्या सहज ध्यानांत येईल. श्रोते वक्ते होती सुखी । अध्यात्यविखीं भाविक १ ऐसा केला प्रसंग हरी । आरुष वैखरी वदवूनी २ साबर्डेचि परि रुचे ऐसें । केलें सौरसें आपुलिया ३ निळा ह्मणे आपुला भक्त | देवें केला गुणातीत ४ श्रीनिळोबा महाराजांची पुण्यतिथि पिंपळनेर येथें फाल्गुन शुद्ध प्रतिपदेस करितात. त्या वेळीं तेथे मोठा उत्सव होतो. त्यांच्या अभंगांची भूमिका वाचकभक्तांच्या ध्यानांत यावी ह्मणून विषयवारी केली आहे, त्यांत कांहीं न्यून असेल त्याबद्दल वाचकांनी दयार्द्र- दृष्टीनें क्षमा करावी अशी प्रार्थना करितों. विजयादशमी शके १८३०. } यंबक हरी आवटे.<noinclude></noinclude> coan43nrtoul44xr5tryw75trk5j0yt पान:गाथा पंचक-गाथा पाचवी-श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा.pdf/१० 104 110147 229313 2026-04-15T13:18:25Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मजकुराविना */ रिकामे पान बनविले 229313 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude><noinclude></noinclude> je9ftadqla268rxphl7e6c6lygxp42j पान:गाथा पंचक-गाथा पाचवी-श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा.pdf/११ 104 110148 229314 2026-04-15T13:18:47Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "॥ श्रीविठ्ठल ॥ ठी प्रवालब १३७ में नारायण दा. ना. श्रीनिळोबा महाराज यांच्या अभंगांची गाथा. विषयानुक्रमणिका. भाग पहिला. पृष्ठ- १ विषय. मंगलाचरण. बाळक्रीडा. गौळणी. विरहिणी **** **** .... .... श्री..." 229314 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>॥ श्रीविठ्ठल ॥ ठी प्रवालब १३७ में नारायण दा. ना. श्रीनिळोबा महाराज यांच्या अभंगांची गाथा. विषयानुक्रमणिका. भाग पहिला. पृष्ठ- १ विषय. मंगलाचरण. बाळक्रीडा. गौळणी. विरहिणी **** **** .... .... श्रीकृष्णलीला (काला ) **** **** खेळ. गोपीच खेळ. .... **** .... गोपाळांचे खेळ..... काला **** पुंडलीक - भक्तिसामर्थ्य. पंढरी माहात्म्य. श्रीविठ्ठलमाहात्म्य. नाममहिमा. कीर्तनमहिमा. संत महिमा. **** .... करुणाभाक. **** संतकृपा. .... २ .६५ -७७ ८४ ८९ ९० .... ९३ ९८ १०० १०३ १०९ १२६ १३४ १४० १६० .... **** .... संतकृपेचा धन्यवाद. *** १६१ १६५<noinclude></noinclude> qpughl80pphdn10mjeqa75xxi7n8tyr पान:गाथा पंचक-गाथा पाचवी-श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा.pdf/१२ 104 110149 229315 2026-04-15T13:19:06Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( २ ) देवभक्तांचा संवाद. भक्तांपाशीं देवाचें मागणे. देवभक्तांची एकरूपता. भक्तवत्सलता. श्रीसद्गुरु तुकोबाची स्तुति. कवित्व. श्रीविठ्ठल गुणवर्णन. करुणा. प्रेमकलह. मागणें. स्वस्थिति..." 229315 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( २ ) देवभक्तांचा संवाद. भक्तांपाशीं देवाचें मागणे. देवभक्तांची एकरूपता. भक्तवत्सलता. श्रीसद्गुरु तुकोबाची स्तुति. कवित्व. श्रीविठ्ठल गुणवर्णन. करुणा. प्रेमकलह. मागणें. स्वस्थिति .... भाग दुसरा. .... देवाशीं उद्गार. आनंदस्थिति. .... ..... १७० .... १७५ १७७ १८० १९९ २०० .... २०४ २०९ २३० २३६ २४१ **** २५६ जनांशी उद्गार. जनास उपदेश. **** .... २६४ *** .... २७१ भक्तिस्तोम माजविणाऱ्या बाह्य वेष- धान्यांस उपदेश. .... २८० मुमुक्षूंस उपदेश. २८७ अद्वैत. २९२ चांगदेवाचें चरित्र. ३०४ आळंदीमहिमा. ३३३ श्रीज्ञानदेवाची परंपरा.... ३३४ भारत्या. ३३४<noinclude></noinclude> efliv6r0o8qkhil9rqs3bjrzosykpqf पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/११ 104 110150 229317 2026-04-16T08:58:48Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229317 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ३ )}}</noinclude>उपवासही करतात, व द्वादशीचे पारणेही करतात; परंतु ती एकादशी खरी असते काय? द्वादशीही मिथ्याचना? झालें तर मग! मलाही या राजवैभवाचें कौतुक वाटत नाहीं. पतिदेवा! उद्यां हें राज्य जरी विलयास गेलें तरी मला लवमात्रही खेद होणार नाहीं. माझ्या ऐहिक सौख्याच्या भावनांचा गुरुमाउलीच्या कृपेनें नायनाट झाला आहे. माझ्या देवा! आपण त्या ज्ञानौघांत स्नान केलेत ना? मग आपली नाहीं का अशी वृत्ति झाली? आपण अद्याप या नाशवंत जीविताला भुलतां काय? हे राज्यवैभव आपणाला खरें वाटते काय? नका, महाराज नका या मोहांत शिरूं."<br>{{gap}}रामा, स्त्री म्हणजे आपली दासी, ज्ञानानें कमीच, आपलाच अधिकार तिला पावन करून घेण्याचा ही समजूत दृढ असल्यानें, राजा शिखिध्वजाला चुडालेचें तें भाषण ऐकून थोडा रागच आला तो उपहासपूर्वक म्हणाला:-<br>{{gap}}"अरेरे! आज मला पूर्ण प्रचिती आली. चुडाले, तुम्हां बायकांची जातच अशी आहे! बरे. हा त्यांचा नैसर्गिक धर्मच आहे. चुडाले, असत्य भाषण जणूं काय यांच्या पांचवीला पुजलेलें! तुम्ही बायका, एक बोलावयाच्या, दुसरें करावयाच्या आणि मनांत असावयाचे तिसरेंच. आणि अगदीं गुप्तपणानें चौथेंच तुमच्या हातून व्हावयाचें! चुडाले, जर तुझें गुपित मला सांगतेस- मग तें कितीही वाईट असतें तरी मला वाईट वाटले नसते; पण- पण तूं जो हा ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याचा आव आणिलास तो पाहून मला हसूच येतें. वेदांत आणि ब्रह्मज्ञान इतके सोपे आहे काय? युगानुयुगे हटयोग करणाऱ्यांना जें लाधत नाहीं तें ब्रह्म तुझ्या सारख्या यःकश्चित् स्त्रीला सहजगत्या प्राप्त झाले अँ? तें इतकें वाटेवरच लोळू लागले आहे नाहीं? बाकी तूं चतुर खरीच! तुला इतके बेमालूम बोलतां तर आलें कीं नाहीं? तुला विषयसुख स्पर्शही करीत नाहीं ना? सुख दुःख तुला सारखेच नव्हे कां? अस्से. मला तरी हें आजच कळलें.<noinclude></noinclude> dua5csd7lihznabrcqxenasdse6n9r5 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/१२ 104 110151 229318 2026-04-16T09:04:01Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229318 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ४ )}}</noinclude>पण कायहो राणीसाहेब, आपण तर व्यवहाराच्या सर्व गोष्टी पूर्ववत् करितां हें कसें? आपणांला अत्तराचा सुगन्ध येतो काय? छेः! संगीताचे आलाप आपल्या कर्णांना आनंद देत नसतील नाहीं? तें ऐकून आपले चित्त गानलुब्ध होणार नाहींच! चुडाले! मी तुला एकच जाब विचारितों कीं, तूं जर अशी निर्विकार सुखदुःखरहित आहेस तर पूर्वीच्याच प्रमाणें हें वैभवयुक्त आचरण तूं कां करतेस? तुझ्या देहावर हे अलंकार कां? हातांत गोटतोड्या ऐवजी दोरखंडें बांधिलीं तरी तुला तीं सारखींच. नाकांत या सुंदर मोत्यांच्या नथे ऐवजीं गवतांच्या काड्यांचा विणलेला झुबका घालायला काय हरकत आहे? पण कायग चुडाले! आजपर्यतचे हजारों ऋषी आणि मुनि 'मी ब्रह्म ओळखलें' 'मला ज्ञान झालें' असें स्वतः कधीं सांगत नसत. आणि तूं तर त्याचें पुराण, माझ्या पुढे सांगितलेंस हे कसें?"<br>{{gap}}रामा, पतीचें हें भाषण ऐकून चुडालेच्या नेत्रांतून घळघळ अश्रु वाहूं लागले. ते अश्रू राजाच्या बोलण्यामुळे आले होते काय? छे! तीं आंसवें आपल्या भ्रताराचें अज्ञान व तो मायाजाळांत गुरफटलेला आहे हें पाहून आलेलीं होतीं. चुडाला मनांत ह्मणाली:- "अरेरे! गुरुवर्यांनी मला व नाथांना बरोबर बोधामृत पाजलें, पण तें यांच्या कां बरें पचनी पडलें नाहीं? अरेरे! 'पतीवाचून कोणतेंही सुख भोगूं नये' हा पतिव्रतेचा धर्मना! पण मी तर अविनाशी व अलौकिक ब्रह्मानंदाचें सुख एकटीच भोगते. नको नकोच असे. आजपर्यंत मी त्यांच्या बरोबर हें बाह्य वैभव व सुख भोगलें— अरेरे! तें क्षणभंगुर, अशाश्वत तरी होतें! पण हें चिरकालिक सुख मी त्यांच्याविना एकटी कशी भोगूं? नाहीं. नाथा! नाहीं! बस्स हीच प्रतिज्ञा कीं, पतीला ज्ञानामृताचे घुटके पाजशील, तेव्हांच चुडाले, तूं आपले कर्तव्य केलेंस असें होईल! तोंपर्यंत तुझें ज्ञान फुकटच. पण हे व्हावें कसें? होईल-होईल तेंही शक्य होईल. प्रयत्नांती परमेश्वर खास<noinclude></noinclude> t8qoc5g2q5a9t8dd6mdwb6d9f80uh4p पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/१३ 104 110152 229319 2026-04-16T09:08:30Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229319 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ५ )}}</noinclude>मिळणारच. माझ्या गुरुमाऊली, ये-ये; धांवत ये. आणि या आपल्या कन्येच्या मस्तकीं वरदहस्त ठेव. दे- माझे देवते दे- मला या मंगलकार्याच्या यशाला अनंत आशीर्वाद दे. हो- कां नाहीं देणार? मी करणारच रायाचा उद्धार!"<br>{{gap}}चुडालेनें रोज राजाला अनेक रीतीनें बोध करण्याचें सुरू ठेवलें. पण रामा! राजाला वाटेच कीं, ही माझी दासी आणि ही गुरुत्वाचा आव आणून मला उपदेश कशाचा करिते? रामा मुख्यतः विश्वास- विश्वासाच्या बळावरच या सर्व गोष्टी ठसणें अवलंबून आहे. ही गोष्टचुडाला पूर्ण जाणून होती. रामा, माता आपल्या प्रेमळ बाळासाठीं 'चाऊम्यांऊ' चे घास मांडून त्याला कसें जेऊं घालते! त्याप्रमाणें चुडालेनें चालविलें. तिने अनेक परीने अनेक वेळां त्याला बोध करावा. कालांतराने तिचा प्रयत्न सफल झाला- राजाला वैराग्य प्राप्त झालें.<br>{{gap}}राजानें ती गोष्ट पत्नीला कळविली. रामा, पती विरागी झाला तर स्त्रियांना बरे वाटेल काय? पण या साध्वीनें आपण होऊनच पतीला विरागी करण्याची खटपट केली ना? राजाचें भाषण ऐकून आपल्या श्रमाचे सार्थक झाले ह्मणून चुडालेला क्षणभर संतोष वाटला.<br>{{gap}}ती ह्मणाली :- "ठीक ठीक. आजपर्यंत अशाच रीतीनें थोर थोर राजे विरागी होऊन गेले. आतां आपण अंतरीं ज्ञान सांठवा. लोक कल्याणार्थच फक्त राज्य करा."<br>{{gap}}"छे छे. मला हें राज्य नको आणि त्या वैभवाचीही पण जरूर नाहीं. चुडाले, मी वनांत जाईन. सर्वसंग सोडून वनांत गेल्यावर मला ब्रह्मज्ञान लाधेल. या राज्यांत राहून तें घडणें नाहीं. खेरीज तेथे मला उत्तम गुरुही भेटण्याचा संभव आहे."<br>{{gap}}हें राजाचे भाषण ऐकून राणीला पुनः खेद वाटला.{{nop}}<noinclude></noinclude> 56rmuua9i1pn0j4p8dv2dxayeanq1c0 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/१४ 104 110153 229320 2026-04-16T09:12:23Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229320 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ६ )}}</noinclude>{{gap}}रामा, चुडालेसारखा गुरू सोडून राजा वनोवनीं गुरूसाठी हिंडणार हे ऐकून हंसूं नको. बाबारे, असेंच आहे. सहजप्राप्त चिंतामणी टाकून गारगोट्या वेचणारे असेच लोक जगांत फार असतात.<br>{{gap}}चुडाला पुन्हां त्याला म्हणाली:- "कांत! आपण गुरूसाठीं अरण्य कां सेवितां? महाराज, अंतःकरण शुद्धतेच्या पूर्णत्वाला पोहोंचल्यावर गुरु आपल्याकडे धांवत येतात. आपण सर्वसंग त्यागीन म्हणता, पण नुसत्या वस्तूंचा त्याग करून उपयोग काय? नुसती अंगाला राख फांसून ब्रह्मज्ञान मिळतें तर गर्दभ उकिरड्यावर नाहीं का लोळत? महाराज, मनःशुद्धि- मनःशुद्धि फक्त पाहिजे. त्यावांचून सर्व खटाटोप व्यर्थ आहे. नुसत्या त्रिकाल स्नानाने काय बरें होणार? मग जळांत राहणारे जलचर कां बरें उद्धरूं नयेत? तरी आपण मनांतून निर्विकारवृत्ति ठेवून लोककल्याणार्थ राज्यसूत्रे चालवा. यांतच तुम्हीं आपले कर्तव्य केलें असें होईल."<br>{{gap}}रामा, यावर जेव्हां राजा कांहीं बोलला नाहीं, तेव्हां तिला वाटलें. की, पतीला आपलें बोलणें पटलें.<br>{{gap}}एक दिवस रात्रीं ती गाढ झोपी गेली आहे असें पाहून त्या दुर्दैवी राजानें गुपचुपपणें अरण्याचा मार्ग धरला. राणी चुडाला जागी झाली तों शय्येवर पति नाहीं असें पाहून तिनें चाकरांकडून सर्व वाड्याभर शोध केला. पत्ता लागत नाहीं असें पाहून तिनें प्रधानाला बोलावून आणविलें व राजाचें पूर्वोक्त भाषण सांगून ती ह्मणाली:-<br>{{gap}}"बहुधा स्वारी वनांत गेली असावी. तरी चोहोकडे दूत पाठवावे व राज्याच्या हितासाठी ही बातमी गुप्त ठेऊन राज्यकारभार नेहमी प्रमाणें आपण चालवावा." असें सांगून तिनें प्रधानाला निरोप दिला.<br>{{gap}}रामा! राजा राजवाड्यांतून बाहेर पडला तो अरण्यमार्गानें चालू लागला. ज्याला नेहमीं मऊ मऊ रुजाम्यावरून चालण्याची संवय त्यानें<noinclude></noinclude> f2u9vowpo0kl42ye7ejzx18hu8e6j19 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/१५ 104 110154 229321 2026-04-16T09:42:16Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229321 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ७ )}}</noinclude>आज काट्याकुट्यांतून चालावें काय ? रामचंद्रा, अरण्यवास पत्करल्यानें आपणाला ज्ञानप्राप्ति होईल, या कल्पनेला बळी पडलेला तो राजा वस्त्रे भूषणें सांडून मोकळा झाला. अंगाला सुवासिक उट्या, अत्तरें हेंच ज्याला माहीत, त्यानें अंगाला राख फांसली, केसांचा जटामुकुट बांधला, व फक्त लंगोटी नेसून स्वारी हिमालयाच्या पुढें मेरुपर्वताच्या एका दरीत आली. त्या ठिकाणी असे पुष्कळ लोक राहात होते. त्यानेंही तेथें एक गुंफा तयार केली. त्रिकाळ स्नान करावें, फलमूलांचाच आहार करावा, ईश्वरसेवेंत काळ घालवावा, असा त्याचा रोजचा क्रम होता. तथापि त्याच्या चित्ताची तळमळ जाईना. चुडालेसारखी शांति आपणास कशाने प्राप्त होईल! हा निदिध्यास त्याला लागला.<br>{{gap}}रामा! राजाला ज्ञानप्राप्ती झाली नव्हती. त्यायोगें त्याचें चित्त स्थिर नव्हते. तो असमाधानी असल्यानें त्याची अशी स्थिति होणें सहाजिकच होय!<br>{{gap}}रामचंद्रा! प्रधानाकडून राजाचा शोध लागेना तेव्हां चुडाला त्याला ह्मणाली:- "राजनिष्ठ प्रधानजी, धन्याच्या व प्रजेच्या कल्याणाकरितां तुम्हीं चतुराईनें ही वार्ता कोणाला कळू न देतां, राजशकट हाकावा. स्वामींचा शोध मीच लावतें. मी आपणास जेव्हां बोलाविन तेव्हांच मात्र या. सर्व कारभार मी तुमच्यावरच सोंपवितें. माझ्या महालांत मी निवांत बसणार. तेथें कोणीही येवूं नये." नंतर तिनें श्रीगुरूचें ध्यान केले. तत्क्षण प्रगट होऊन योगी म्हणाले:- "शाबास, बेटा शाबास. मला कां आळविलेंस?"<br>{{gap}}"भगवन्! मला योगसिद्धि करून घेणें आहे."<br>{{gap}}"ठीक आहे." असें ह्मणून योगिराजांनीं आसन कसें घालावें, आहार, निद्रा वगैरे अल्प प्रमाणांत ठेवून योगसिद्धि कशी करावी तें कथून आपल्या, देखरेखीखालीं अवघ्या दहा दिवसांतच तिला योगानंदांत पोहा-<noinclude></noinclude> 96zfhg4r5nbin3ixtln6284nno5tbmm पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/१६ 104 110155 229322 2026-04-16T09:42:53Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229322 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ८ )}}</noinclude>वयास शिकविलें. नंतर पतिशोधास उत्सुक अशी ती चुडाला आपल्या घोर प्रयत्नानें पूर्ण योगी बनली. रामा, गुरुकृपा असल्यावर काय उशीर? तिला योगसिद्धि प्राप्त करून देऊन योगी स्वस्थानीं गेले.<br>{{gap}}राणी चूडालेनें पुन्हा एकदां प्रधानाला राज्य कारभार नीट चालविण्याविषयीं सांगून, आपणाला आतां कोणी भेटू नये अशी ताकीद देऊन, आपल्या महालाचे दरवाजे बंद करून तिनें आसन मांडिलें. रामा, त्या योगिनीचें सामर्थ्य काय सांगावें? लिंग देहानें नद्या, पर्वत, गुहा, दऱ्या, फार काय पण स्वर्ग पाताळ वगैरे ठिकाणी तिने पतीचा शोध केला. पण पतीचा पत्ता कोठेंच लागेना. हें पाहून तिला फार वाईट वाटलें. ज्याच्यासाठीं आपण सिद्धि प्राप्त करून घेतल्या, त्याचा पत्ता न लागेल तर माझे श्रम व्यर्थच होणार ना? इतक्यांत तिला सुचलें कीं, इतका हा खटाटोप पाहिजे कशाला! आपण योगसमाधीनें ज्ञानदृष्टीने राजा कोठें आहे ते शोधून काढू! शोधता शोधतां राजा जेथें गुंफा बांधून राहिला होता तें स्थान दिसलें. रामा, राजा आपल्या पूर्वदेहांत आहे हे पाहून तिला इतका आनंद झाला कीं, त्या आनंदभरांत ती नाचूं लागली. तिनें आपल्या पतीचा तो कमंडलू, तें हरणाच्या कातड्याचे आसन, तो जटामुकूट, असले वैभव अवलोकन केलें. तिनें विचार केला कीं, याला कांहीं दिवस असाच येथें राहूं यावें. कारण या रीतीनेंच त्याच्या चित्ताची शुद्धि होईल, आणि मग आपला कार्यभाग करण्यासही ठीक पडेल.<br>{{gap}}नंतर पुन्हा तिनें आपलें चित्त राज्यकारभारांत घालून प्रधानाच्या साह्यानें ती राज्य चालवू लागली. आणखी तीन वर्षांनंतर तिनें पतीकडे जाण्याचे ठरविलें.<br>{{gap}}रामा! राजा अत्यंत उदासीन बनला होता. पूर्वी आपणांस गुरु भेटले. परंतु त्यावेळीं आपण त्यांच्या उपदेशाचे चीज केलें नाहीं, असे विचार<noinclude></noinclude> 8r98k25y949ztp5fpnjd2pkzb9lyb18 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/१७ 104 110156 229323 2026-04-16T09:43:18Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229323 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ९ )}}</noinclude>त्याच्या मनांत येऊन त्याला पश्चात्ताप होई. तो रात्रंदिवस 'गुरुमाऊली गुरुमाऊली.' म्हणून गहिंवरे. त्याचें अंतःकरण त्या गळणाऱ्या अश्रूंनी शुद्ध झालें होतें. परंतु त्याच्या मनाला अद्याप शांती प्राप्त झाली नव्हती. चुडाला आपणाला नित्य परब्रह्मसुखाच्या गोष्टी सांगे, परंतु तिला म्यां दुष्टानें झिडकारिलें. 'आतां पुन्हां मला गुरु भेटतील का? मला पावन करून घेतील का?' अशा प्रश्नांच्या जंजाळांत तो तळमळत होता.<br>{{gap}}इकडे त्याच्या उद्धारासाठी तळमळणारी चुडाला तीन वर्षांनंतर पुरुषवेष घेऊन त्याच्याकडे आली. तिला अष्टसिद्धि प्राप्त झाल्यानें तिला वाटेल तें रूप घेतां येई, व पाहिजे तें करतां येई. रामा, चुडाला येऊन अंतराळीं उभी राहिली. तिला पाहून राजाला वाटलें कीं, आपण गुरूसाठीं तळमळत आहों म्हणून माझा उद्धार करण्यासाठी हे महंत आले आहेत. त्याला अत्यानंद झाला.<br>{{gap}}"या, गुरुराया या." असें म्हणून त्यानें आपल्या गुंफेंत आसनावर तिला बसविलें. रामा, चुडालेला राजाची आपणावर श्रद्धा बसवून घेणें होतें, म्हणून ज्या आसनावर ती बसली होती तें आसन तिनें स्वसामर्थ्यानें अंतराळी राहूं दिलें.<br>{{gap}}राजा म्हणाला:- "महाराज! आपण कोण? मला तर वाटतें कीं आपण प्रत्यक्ष ब्रह्मदेव आहां! किंवा विष्णु? कीं शंकर? महाराज, मी राज्यत्याग करून येथें आलों. माझा उद्धार करा. प्रभो! मला वाटतें, आपण माझ्या तळमळीचा वेग आपल्या ज्ञानसामर्थ्यानें जाणला नाहीं ना? गुरुराज, मनाच्या शांतीसाठीं फोडलेला टाहो ऐकून तर दयाघना, आपण इकडे वळला नाहीं ना? महाराज, मला आपले नांव कळेल का?"<br>{{gap}}"ऐक, राजा ऐक. मी कोणी देव नाहीं. नारदाचा पुत्र जो कुंभक तो मी आहे. राजा, आश्चर्य मानूंं नको! तुला मी थोडा पूर्वेतिहास सांगतों तो ऐक. पूर्वी एका पर्वणीच्या वेळीं देव गंधर्व वगैरे आपापल्या<noinclude></noinclude> 3ok5s7hfzz8i3vih4788169h912r5d5 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/१९ 104 110157 229325 2026-04-16T09:44:14Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229325 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ११ )}}</noinclude>अंकुशाच्या चोंचणीनें पुनः त्यास बांधणार तों हत्तीनें मान हलवली. पारध्याची उडी चुकून तो हत्तीच्या पायाशीं पडला. हत्तीनेंही आपलें स्वातंत्र्य हरण करणाऱ्याला पायानें तुडविण्याचे मनांत आणिलें. परंतु पुन्हां त्याला त्याची दया येऊन सोंडेने त्याला बाजूला फेंकून तो हत्ती स्वच्छंदानें हिंडूं लागला. परंतु पारध्यानें पुनः अत्यंत परिश्रमानें त्या हत्तीला पकडलें. राजा, आपल्यापुढें पडलेल्या शत्रूला जर त्याच वेळीं तो ठार करिता तर त्याला पुन्हा पराधीनता कां आली असती? पण बाबा, हें प्राक्तन! दुसरें काय? त्याच प्रमाणे राजा, एका ब्राह्मणाने ऐकलें कीं, अमूक पर्वतावर एकवीस दिवस अनुष्ठान केलें कीं, चिंतामणी प्राप्त होतो. राजा, तो दरिद्री ब्राह्मण तेथें गेला व तप करूं लागला. राजा, त्याच्या पूर्वपुण्याईनें तिसरेच दिवशीं चिंतामणि मिळाला. परंतु त्याला वाटलें कीं, छे? तो वीस दिवसांनंतर येणार. तेव्हां त्यानें तो चिंतामणी भिरकावून दिला. नंतर एकविसाव्या दिवशीं त्या ब्राह्मणाला एक काचेचा खडा मिळाला. राजा, त्या हर्षात त्यानें घर गांठलें. व चिंतामणि मिळाल्याचे आपल्या पत्नीला सांगून, आपले सर्व द्रव्य दान करून तो वनांत आला. तेथें त्यानें खड्याची पूजा केली व इच्छित मागू लागला. पण तो काचमणी इष्ट वस्तु कशी देणार? तेव्हां यांत मजा अशी झाली कीं, होतें तेंही गेलें व चिंतामणी मिळाला नाहीं तो नाहींच. राजा, स्वस्थ मनानें यांतील गूढ ओळख. पहा आपल्या मनांतला विचार."<br>{{gap}}"नाहीं. दयासागरा मला कांहींच कळलें नाहीं, स्वामिन्, गज कोण? महात कोण? प्रथम धरला कसला, सुटला कसा? बरें, पुन्हां त्यानें पारधी पायाखालीं पडला असतां त्याला मारलें कसें नाहीं? तसेंच चिंतामणि, ब्राह्मण, काचेचा खडा वगैरे मला कांहींच कळलें नाहीं. तरी पुनः सांगा."{{nop}}<noinclude></noinclude> 7xuk89pyxqsgtkg5y5jczotgjfhmalc पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/२० 104 110158 229326 2026-04-16T09:44:46Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229326 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( १२ )}}</noinclude>{{gap}}"ऐक, राजा हे दोन्ही दृष्टांत तुझ्याच पूर्वचरित्राचे आदर्श आहेत. राजा, हत्ती ह्मणजे तूंच तूं मूळचा स्वतंत्र परंतु अज्ञानाच्या खड्डयांत पडून परतंत्र झालास. राजा, पारधी ह्मणजेच अज्ञान. त्या अज्ञानानें तुला संसाराशीं जखडून टाकिलें. परंतु ज्याप्रमाणे हत्तीला सुटण्याची इच्छा झाली, तशीच तुलाही झाली, व त्यामुळे तुझ्या घरीं महामुनीश्वर येऊन त्यांनीं तुला सदुपदेश केला. परंतु तुजपुढें अज्ञान आडवें पडलें. राजा, त्याच वेळीं ज्ञानबलानें त्या अज्ञानरूप शत्रूला मारतास तर पुन्हां बंधन कां पावतास? राजा, अज्ञानामुळेच तुला अविश्वास वाटला ना? तो कोणाबद्दल हें तुझें तूंच आपलें ओळख. आणि ज्याप्रमाणें त्या ब्राह्मणानें अनुष्ठान केलें असतां चिंतामणी मिळतो असें ऐकलें, तसेंच तं गुरुवांचून मुक्ति नाहीं हे दृढ मानल्यानें त्याच्याप्रमाणें तुला चिंतामणि लाधलेला- सत्संग लाधलेला तूं फेटाळलास. राजा हा सत्संग ह्मणजेच तुझी पत्नी चुडाला. राजा तुला वाटे कीं, ही आपली पत्नी- स्त्री- हिला कसलें ब्रह्मज्ञान कळणार? याप्रमाणे चिंतामणि सोडून अरण्यांत येऊन तूं ही यातायात केलीस! राजा, त्या ब्राह्मणाप्रमाणें तुझें द्रव्य- तुझें राज्य- सोडून अरण्यांत आलास. राजा, सांग पाहूं, चुडालेचें न ऐकतां वनांत येऊन तूं अधिक तें काय मिळविलेंस? हो खरेंच. तुला वाटेल कीं, मला चुडाला काय माहीत? परंतु आह्मी येथे बसून कोठें काय चाललें आहे हें जाणतो. राजा, तुला आमच्यासारख्याच्या संगतीचा ध्यास लागलेला समजूनच मी येथें आलों ना?"<br>{{gap}}"महाराज, या दासाला आपल्या सामर्थ्याविषयीं शंका कशी येईल बरें? आपण मला प्रत्यक्ष देव भेटला. या पुढे मी आपले पाय सोडणार नाही. मला आतां पाठीमागें कसलाही पाश नाहीं. राज्य, पत्नी वगैरे सोडून मी येथें आलोंच आहें. आतां स्वामी सांगतील त्या मार्गानें जाऊन जन्माचे सार्थक करावयाचें."{{nop}}<noinclude></noinclude> 54o2tatb5zjimulaa1zwbyfbrwuyub9 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/२१ 104 110159 229328 2026-04-16T09:57:29Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229328 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( १३ )}}</noinclude>{{gap}}यावर जरा हंसून कुंभक ह्मणाले: "पण कायरे, तूं येथें येऊन अधिक तें काय केलेंस? राजा, तेथें तुझ्या डोक्यावर मुकुटाचा भार होता; येथें जटांचा आहे. तेथे सेवकजन सेवा करीत; येथें इंद्रियें करतात. राजा, तेथें तूं पंचपक्कानें खात होतास, येथे फळे खातोसच. म्हणजे तुझ्या मुकेचें शमन- पोट भरल्याचा आनंद सारखाच ना? तेथें गजनीच्या मऊ मऊ गाद्यांची शय्या होती; येथें वाळलेल्या गवतावर निजतोस. पण राजा, झोपेचे सुख तुला सारखेंच कीं नाहीं? तेथें राजवाडा होता; येथें तूं झोपडीच्या छाये खालीं आहेस. तात्पर्य, तुला वाटतें तसें तूं कांही त्यागिलें आहेस, असें मला नाहीं वाटत!"<br>{{gap}}आधींच मनस्तापाने दुर्बळ झालेला राजा सताऊन म्हणाला:- "सांगा, महाराज सांगा. मी कशा कशाचा त्याग करूं? अरेरे! मी या आपल्या सुंदर देहाकडे पाहिलें नाहीं, उन्हांत याला भाजून काढलें. पावसांत भिजविलें. उभा तर उभाच राहिलों. अनेक प्रकारचे कर्म करून देहाचें नुसतें मढे बनवलें! आतां अधिक काय करूं? कसला त्याग करूं?"<br>{{gap}}असें म्हणून त्यानें गळ्यांतील माळा तडातड तोडून टाकल्या. कफनीच्या चिंध्या चिंध्या केल्या. फलमूलांची परडी भिरकावून दिली. पाण्याचा तुंब्याही फेंकून दिला व शेवटीं गुंफा सोडून दूर जाऊन बसला. रामा, तें त्याचें करणें पाहून कुंभक विस्मयानें पाहूं लागला. राजाच्या अज्ञानाची त्याला कींव आली. तो त्याजपाशीं जाऊन म्हणाला:-<br>{{gap}}"राजा हे तूं काय केलेंस? बाबारे, आतां त्वां जरी फळें खाल्ली नाहींस, पाणी प्याला नाहींस, तर काय वृक्ष 'खा' 'पाणी पी' असें म्हणतील? राजा त्या वस्तु मोडून तोडून तूं त्यांचा त्याग काय केलास? अरे, त्या काय तुला चिकटून कां बसल्या होत्या!"{{nop}}<noinclude></noinclude> 5u2y72pgb4p9yyp2gwfmjfr4jya2dni पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/२२ 104 110160 229329 2026-04-16T10:18:58Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229329 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( १४ )}}</noinclude>{{gap}}राजानें बराच विचार करून शेवटीं ठरविलें कीं, आतां काय राहिलें? बायको सोडली, राज्यही त्यागिलें, छत्रेही नाहींत आणि चामरही नाहींत; आतां फक्त हा जीवच काय तो बाकी राहिला आहे तेवढा त्यागून या कटकटींतून सुटावें, म्हणून त्यानें झाडांच्या सालीचा एक फांस तयार केला व तो मानेभोवती खेचला. आतां नेट करून तो ओढणार तोंच कुंभकानें जाऊन त्याला मोकळे केलें. आणि त्याला म्हणाला, 'वेड्या, जीव दिल्यावर मग काय राहिलें? मग तुला सद्गति कशी मिळणार? तुला जें ज्ञान पाहिजे आहे, जें सुख हवें आहे, मनाला शांति मिळावी म्हणून तुझी जी धडपड, ती या प्राणघाताने सिद्धीला जाईल काय? नाहीं. राजा, आपले डोळे उत्तम असावे असें वाटणाऱ्यानें ते फोडण्याला जसें प्रवृत्त व्हावें; जिभेला चव नाहीं म्हणून ती कापून टाकण्याला उयुक्त व्हावें, तशीच ही तुझी कृति आहे. राजा, आजपर्यंत तूं निष्काम कर्म केलेंस राज्याचा मोह सोडून, येथें येऊन शरिराला कष्ट दिलेस. त्या योगानें तुझी चित्तशुद्धिं झाली. परंतु जर तुला खरें ज्ञान पाहिजे असेल, ब्रह्मानंदांत डोलावयाचे असेल तर तो त्याग- त्याचा त्याग- कर, त्याला अंतःकरणांत थारा देऊ नकोस."<br>{{gap}}रामा, पुन्हा पत्नीपति छे, छे— गुरु शिष्यांची जोडी स्नान संध्या करून फलाहार करून बसली. नंतर राजानें पुनः विचारलें:- "महाराज, त्याचा ह्मणजे कशाचा त्याग करूं? हे कृपा करून सांगा."<br>{{gap}}"अहंकार! बाबारे अहंकार. तुला जें हे चालतें बोलतें शरीर मी असें वाटत आहे, तो मीपणा ती 'मी' ची आसक्तिच तुझ्या ज्ञानप्राप्तीच्या आड येत आहे. राजा तूं ह्मणतोस कीं, 'मी' ह्मटल्यावांचून व्यापार चालणार कसा? कबूल. परंतु त्या 'मी' मध्यें जो अहंकार, जो गर्व आहे तो तूं सोडलास आहेस काय? राजा, मघां मी तुला त्याग कर ह्मणतांच तुझ्या अहंकाराच्या उमाळ्यानेंउसळी खाल्लीना? ह्मणूनच तूं प्राणनाशाला<noinclude></noinclude> qr1evcpcqvc7wbm6dphs61fxbip4ks3 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/२३ 104 110161 229330 2026-04-16T10:26:39Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229330 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( १५ )}}</noinclude>तयार झालास. परंतु तूं चुडालेला जेव्हां झिटकारून बोललास कीं, वृद्धपणीं विषयांत दंग असतेस, तेव्हां ती स्त्रीस्वभावाप्रमाणें रडली काय? तिनें तुझी समजावणी करण्यासाठीं तुझे पाय धरले काय? त्यावर अश्रूंचें सिंचन केलें काय? नाहीं. राजा, नाहीं! तें कां बरें? तर तिचें देहावरचें 'मी, मी'पणाचें– अहंकाराचें- पटल नाहींसें झालें होतें. ती ब्रह्मानंदाचे घोट प्याली होती. त्या ठिकाणी कोणी वंदिल्यानें अगर निंदिल्यानें काय होणार होतें? राजा, तूं म्हणशील की मी चांगला हातापायांचा असतांना, शरिराला लागलें किंवा दुखापत झाली तर मनाला तळमळ लागत असतांना शरीर माझें कसें नव्हे? राजा, हा सर्व भ्रम आहे. कसा तो पहा. समज, अंधारांत दोरी पडली असतांना, सर्प म्हणून भ्यालेला प्राणी, जरी दुसऱ्यानें अरे तो सर्प नाहीं, ती दोरी आहे, असें सांगितलें, तरी तो प्राणी त्या दोरीला स्पर्श करण्यास भितो. कारण त्याला ती दोरी सर्पच आहे असा भ्रम झालेला असतो. तो त्याचा भ्रम नाहींसा करण्याचा उपाय म्हणजे दिवा घेऊन त्याला ती दोरी दाखविणें हा होय. राजा, त्याप्रमाणेच या वर वर दिसणाऱ्या मोह, जालाला भुलणाऱ्या मानवाला ज्ञानदीप घेऊन शोधल्याखेरीज आपली चूक समजत नाहीं."<br>{{gap}}रामा, अशा रीतीनें त्या चुडालेनें- त्या कुंभकरूपी चुडालेनें- त्या राजाला गुरूपासून संपादिलेलें ज्ञान सांगितलें. अनेक दृष्टांत दिले व याप्रमाणें राजाला ज्ञानप्राप्ति झाली. परंतु त्याच्या चित्ताला खरें समाधान वाटेना. तेव्हां तिनें त्याला समाधि लावण्यास शिकविलें. त्याची तशी समाधि लागतांच तिला अत्यानंद झाला त्याच्या शरीररक्षणाची व्यवस्था करून त्याच्या अंगावर वस्त्र घालून ती आपल्या मंदिरांत परत आली. तेथें थोडे दिवस राज्यकारभार पाहून ती पुन्हां वनात आली. व राजाची समाधी उतरावी म्हणून त्याला थापटून<noinclude></noinclude> oau7ni3wx7gfpyu5xhgp9cuu6po3mgs पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/२४ 104 110162 229331 2026-04-16T10:34:46Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229331 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( १६ )}}</noinclude>हाका मारून, व संगीत गायन करून पाहिलें. परंतु तो भानावर येईना तेव्हां ती घाबरली. राजा मरण तर नाहींना पावला! अरेरे! मग मला तरी हा देह ठेवून काय करावयाचे आहे? असे मनाला प्रश्न करून तिनें सूक्ष्मरूपानें त्याच्या देहांत प्रवेश केला.<br>{{gap}}त्याचा प्राण आहे, फक्त तो समाधिसुख अनुभवीत आहे, हे पाहून तिला बरें वाटलें.<br>{{gap}}ती बाहेर येऊन कुंभकरूपांत गाऊं लागली. राजा भानावर आला खरा, पण त्याला डोळेही उघडण्याची शक्ति राहिली नव्हती. पण जिच्यापुढे अष्टसिद्धि हात जोडून तयार तेथें काय कमी? कुंभकरूपी चुडालेनें आपला हात राजाच्या अंगावर फिरवितांच त्याला पूर्वीप्रमाणें शक्ति आली.<br>{{gap}}"धन्य! धन्य!! गुरुराज, धन्य समाधी! धन्य तो आनंद!! अरे पण तें सुख, तो आनंद मी केवळ क्षणभरच भोगला. आपण मला त्या समाधींतून कां बरें जागे केलें?"<br>{{gap}}राजाला त्या समाधिसुखानें इतका आनंद झाला कीं, सांगतां सोय नाहीं! त्यानें कुंभकाच्या पायांवर लोळण तर किती वेळां घेतली! अशा रीतीनें बराच काळ झाला. कुंभकानें त्याचें स्वस्वरूप त्याला दाखविलें त्याचा अहंपणा पार लयाला गेला. ते गुरुशिष्य शरीरानें फक्त भिन्न, बाकी एकजीव झाले. नंतर राजाची कसोटी पाहण्याचें चुडालेनें मनांत ठरविलें.<br>{{gap}}माझ्या वाचक भगिनीनों! आजपर्यंत पुरुषांनीं पूर्वकाळापासून तो हल्लींच्या काळापर्यंत बायकांची कसोटी पहाण्याची चाल आहे. अशी उदाहरण किती तरी झालेलीं आहेत, आजलाही होत असतील, पुढेही होतील. परंतु पतीला कसाला लावणारी फक्त चुडालाच. बायांनो! हा अधिकार सर्वांना नाहीं. तो अधिकार यावयाला तसेंच अलोट ज्ञान, चतुरता व अंगीं सामर्थ्य असलें पाहिजे, व मुख्यतः गुरुकृपा पाहिजे. असो.{{nop}}<noinclude></noinclude> t8mqioqgsracjoziezy49x90bq30rj1 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/२५ 104 110163 229332 2026-04-16T10:44:27Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229332 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ ( १७ ) {{gap}}आपला बोध पूर्ण ठसला आहे किंवा नाहीं, हे पहाण्यासाठी चुडालेनें आपल्या सामर्थ्याने एके दिवशीं इंद्रादि देव विमानांतून तेथे आणविले, व ती राजाला म्हणाली:- "राजा, पहा तुझ्या पुण्यप्रभावाने हे इंद्रादि देव विमानांतून आले आहेत. ऊठ ऊठ. अरे! त्यांचा सत्कार करें."<br>{{gap}}नंतर राजानें गुंफेतून बाहेर येऊन देवांना आंत नेलें. त्यांना सत्कारपूर्वक आसनांवर बसविलें.<br>{{gap}}इंद्र म्हणाला:- "राजा, कायरे तुझें हें पुण्य! बाबारे, तुझ्या सामर्थ्यानें आज आम्हांला स्वर्गात कंप सुटला. असा महात्मा एकदां तरी पहावा म्हणून आम्ही तुझ्या भेटीला आलो. चला- आम्हांला आपल्या सहवासाचा लाभ देण्यासाठी आपण स्वर्गाला चला. धन्य हा आश्रम! धन्य कुंभकाचें भाग्य! असा शिष्य गुरूवर ताण करणारा शिष्य-धन्यच आहे येथील सर्व!"<br>{{gap}}याप्रमाणें बोलून राजा काय म्हणतो, तें ऐकण्याकरितां सर्व स्वस्थ बसले. राजाच्या ठिकाणीं बोध परिपूर्ण बाणला होता. 'मीं तूं' पणा रसातळाला गेला होता. देहावरची आसक्ति उडाली होती. अहंकाराची पायमल्ली होऊन ती जागा आत्मबोधानें पटकावली होती.<br>{{gap}}राजा कांहीच बोलत नाहीं, हें पाहून इंद्र पुनः म्हणाला:- "मग काय, येतोस ना राजा? तुझ्या संगतींत काळ जावा अशी आमची सर्वांची फार इच्छा आहे. चला-चला राजेश्वरा! चला."<br>{{gap}}'मी आपल्या सन्निध स्वर्गी असलों काय किंवा येथें असलों काय सारखेंच. आपण जें जें म्हटलें तें तें मला पावल्यासारखेंच आहे. मला स्वर्गादिकाशी काय करावयाचें आहे? मला जें पाहिजे होतें तें या माझ्या गुरुमाउलीनें येथेंच मिळवून दिले आहे. हे देवाधिदेवा, स्वर्ग तरी कोठला आणि नरक तरी कोठला? सारे कल्पनेचे खेळ आहेत. मला या गवतापासून तो सत्यलोकापर्यंत कसलीच इच्छा नाहीं."{{nop}}<noinclude></noinclude> lk48n8fcc1qlyyww3v5se9kykxtrex6 229333 229332 2026-04-16T10:45:13Z कल्पनाशक्ती 3813 229333 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( १७ )}}</noinclude>{{gap}}आपला बोध पूर्ण ठसला आहे किंवा नाहीं, हे पहाण्यासाठी चुडालेनें आपल्या सामर्थ्याने एके दिवशीं इंद्रादि देव विमानांतून तेथे आणविले, व ती राजाला म्हणाली:- "राजा, पहा तुझ्या पुण्यप्रभावाने हे इंद्रादि देव विमानांतून आले आहेत. ऊठ ऊठ. अरे! त्यांचा सत्कार करें."<br>{{gap}}नंतर राजानें गुंफेतून बाहेर येऊन देवांना आंत नेलें. त्यांना सत्कारपूर्वक आसनांवर बसविलें.<br>{{gap}}इंद्र म्हणाला:- "राजा, कायरे तुझें हें पुण्य! बाबारे, तुझ्या सामर्थ्यानें आज आम्हांला स्वर्गात कंप सुटला. असा महात्मा एकदां तरी पहावा म्हणून आम्ही तुझ्या भेटीला आलो. चला- आम्हांला आपल्या सहवासाचा लाभ देण्यासाठी आपण स्वर्गाला चला. धन्य हा आश्रम! धन्य कुंभकाचें भाग्य! असा शिष्य गुरूवर ताण करणारा शिष्य-धन्यच आहे येथील सर्व!"<br>{{gap}}याप्रमाणें बोलून राजा काय म्हणतो, तें ऐकण्याकरितां सर्व स्वस्थ बसले. राजाच्या ठिकाणीं बोध परिपूर्ण बाणला होता. 'मीं तूं' पणा रसातळाला गेला होता. देहावरची आसक्ति उडाली होती. अहंकाराची पायमल्ली होऊन ती जागा आत्मबोधानें पटकावली होती.<br>{{gap}}राजा कांहीच बोलत नाहीं, हें पाहून इंद्र पुनः म्हणाला:- "मग काय, येतोस ना राजा? तुझ्या संगतींत काळ जावा अशी आमची सर्वांची फार इच्छा आहे. चला-चला राजेश्वरा! चला."<br>{{gap}}'मी आपल्या सन्निध स्वर्गी असलों काय किंवा येथें असलों काय सारखेंच. आपण जें जें म्हटलें तें तें मला पावल्यासारखेंच आहे. मला स्वर्गादिकाशी काय करावयाचें आहे? मला जें पाहिजे होतें तें या माझ्या गुरुमाउलीनें येथेंच मिळवून दिले आहे. हे देवाधिदेवा, स्वर्ग तरी कोठला आणि नरक तरी कोठला? सारे कल्पनेचे खेळ आहेत. मला या गवतापासून तो सत्यलोकापर्यंत कसलीच इच्छा नाहीं."{{nop}}<noinclude></noinclude> e29ppz8ssi9c6engyambu8n68nap8c6 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/२६ 104 110164 229334 2026-04-16T10:52:44Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229334 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ ( १८ ) {{gap}}हें राजाचें भाषण ऐकून इंद्रादि देव थक्क झाले.<br>{{gap}}"कुंभका, धन्य आहे तुझी! राजाला याच देहांत आपल्या स्वरूप लीन केलेंस! येतों आतां आम्हीं" असें म्हणून इंद्र इतर देवांसह निघून गेला.<br>{{gap}}इंद्रादि देव गेल्यावर कसून परीक्षा पाहण्यासाठीं कुंभकानें एक विमान निर्माण केलें. व स्वर्ग, नरक, सत्यलोक, पाताळ, कैलास वगैरे सर्व ठिकाणी राजाला फिरवून आणिलें. परंतु राजाला नंदनवन पाहून हर्षही वाटला नाहीं व नरक पाहून दुःखही वाटलें नाहीं. कुभंकानें, 'राजा मला येथें राहावेंसें वाटतें' असें म्हटलें, तर यानें 'हं बरें.' या शब्दाखेरीज त्यानें कांहींच म्हटलें नाहीं. त्याचें चित्त कोठेंच गुंतल्याचे दिसेना. नंतर ते आपल्या गुंफेंत परत आले. त्यावर एकदोन दिवस जाऊं देऊन कुंभकरूपी चुडाला राजाला म्हणाली:- "राजा आज स्वर्गात मोठी सभा भरावयाची आहे. तेव्हां मला तिकडे गेलेच पाहिजे. माझे पिते नारद तेथें येतील व देवही माझी चौकशी करतील."<br>{{gap}}"या चरणांचा वियोग मला कसा सहन होईल? पण महाराज सभेत नसतील तर येथे न्यूनता पडणारच. तरी आई जशी आपल्या तान्ह्याला घरी ठेऊन जाते, पण त्याच्या ओढीनें लौकर परत येते; तसेंच माझ्या गुरुमाउलीनें यावें."<br>{{gap}}"होय बेटा, तुजशिवाय मला एक क्षणही बरा जात नाहीं." असें म्हणून आकाशमार्गानें कुंभक उडाला. राजा तर किती तरी वेळ तिकडेच पहात राहिला.<br>{{gap}}इकडे चुडाला वायुवेगानें आपल्या महालांत येऊन दाखल झाली. प्रधानापाशीं सर्व चौकशी करून व त्याला पुढील व्यवस्था सांगून तिनें आपल्या महालाची दारे बंद करून घेतलीं. अरण्यांत येतांना तिनें पुनरपि कुंभकरूप घेतलें. व राजाला पूर्ण कसाला लावण्यासाठी नवी युक्ति मनांत योजून ती पुन्हां गुंफेंत आली.{{nop}}<noinclude></noinclude> 45xvaiv676xv434lh0p6ubimpe4ffrp 229335 229334 2026-04-16T10:55:29Z कल्पनाशक्ती 3813 229335 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( १८ )}}</noinclude>{{gap}}हें राजाचें भाषण ऐकून इंद्रादि देव थक्क झाले.<br>{{gap}}"कुंभका, धन्य आहे तुझी! राजाला याच देहांत आपल्या स्वरूप लीन केलेंस! येतों आतां आम्हीं" असें म्हणून इंद्र इतर देवांसह निघून गेला.<br>{{gap}}इंद्रादि देव गेल्यावर कसून परीक्षा पाहण्यासाठीं कुंभकानें एक विमान निर्माण केलें. व स्वर्ग, नरक, सत्यलोक, पाताळ, कैलास वगैरे सर्व ठिकाणी राजाला फिरवून आणिलें. परंतु राजाला नंदनवन पाहून हर्षही वाटला नाहीं व नरक पाहून दुःखही वाटलें नाहीं. कुभंकानें, 'राजा मला येथें राहावेंसें वाटतें' असें म्हटलें, तर यानें 'हं बरें.' या शब्दाखेरीज त्यानें कांहींच म्हटलें नाहीं. त्याचें चित्त कोठेंच गुंतल्याचे दिसेना. नंतर ते आपल्या गुंफेंत परत आले. त्यावर एकदोन दिवस जाऊं देऊन कुंभकरूपी चुडाला राजाला म्हणाली:- "राजा आज स्वर्गात मोठी सभा भरावयाची आहे. तेव्हां मला तिकडे गेलेच पाहिजे. माझे पिते नारद तेथें येतील व देवही माझी चौकशी करतील."<br>{{gap}}"या चरणांचा वियोग मला कसा सहन होईल? पण महाराज सभेत नसतील तर येथे न्यूनता पडणारच. तरी आई जशी आपल्या तान्ह्याला घरी ठेऊन जाते, पण त्याच्या ओढीनें लौकर परत येते; तसेंच माझ्या गुरुमाउलीनें यावें."<br>{{gap}}"होय बेटा, तुजशिवाय मला एक क्षणही बरा जात नाहीं." असें म्हणून आकाशमार्गानें कुंभक उडाला. राजा तर किती तरी वेळ तिकडेच पहात राहिला.<br>{{gap}}इकडे चुडाला वायुवेगानें आपल्या महालांत येऊन दाखल झाली. प्रधानापाशीं सर्व चौकशी करून व त्याला पुढील व्यवस्था सांगून तिनें आपल्या महालाची दारे बंद करून घेतलीं. अरण्यांत येतांना तिनें पुनरपि कुंभकरूप घेतलें. व राजाला पूर्ण कसाला लावण्यासाठी नवी युक्ति मनांत योजून ती पुन्हां गुंफेंत आली.{{nop}}<noinclude></noinclude> bx84tj3989kmxuifwzags4j11vfofwn पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/२७ 104 110165 229336 2026-04-16T10:59:27Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ तिला पहातांच, ' गुरु माऊली, गुरु माऊली' असें म्हणून राजानें तिच्या पायांवर लोळण घेतली. चुडालेला मनांत आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. कुंभकानें चेहरा उतरल्यासारखा करून म्ह..." 229336 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{center|( १९ )}}</noinclude>________________ तिला पहातांच, ' गुरु माऊली, गुरु माऊली' असें म्हणून राजानें तिच्या पायांवर लोळण घेतली. चुडालेला मनांत आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. कुंभकानें चेहरा उतरल्यासारखा करून म्हटलें: – “अहारे देवा, आतां काय करूं ? " असें म्हणून त्यानें जमिनीवर गडबडा लोळण्यास • सुरवात केली. मध्येंच कपाळही बडवून घेण्यास कमी केलें नाहीं. राजा घावरून म्हणाला:-' महाराज काय झाले ? ' 66 काय सांगू कपाळ माझें ? राजा, लाज वाटते. पोटांत पीळ पडतो कीं रे ! बाबा, मी आतां सभेहून परत येतांना वाटेंत मला दुर्वास ऋषी भेटले. त्यांनी, " कुंभका, कुंभका येरे " असें म्हटलें. मला दुर्दैवानें काय पहा बुद्धि सुचली । मी म्हटलें " कांहो, अगदी बाईलवेड्या - नवऱ्यासारखेच हाका मारतां ! " मी इतकें म्हणतांच तो कोपी ब्राह्मण संतापून म्हणाला ' मला बाईलवेडा म्हणतोस काय ? ठीक आहे तर यापुढें तूं बाईलच होशील ! ८ 'राजा' मग माझे डोळे उघडले. मी त्यांचे पाय धरले. अभूनें त्यांना न्हाऊं घातलें. क्षमा मागितली. तेव्हां कोठें त्यांनी " बरें तर, नुसता रात्रीचाच तूं बायको होशील. " असा उश्शाप दिला. राजा, मला दुसरें कांहीं नाहीं वाटत, पण तुझा वियोग तर मला एक क्षणभरही रेटत नाहीं. आणि मी स्त्री झाल्यावर आपणाला एकाच अंथरुणावर कसें निजतां येईल १ हायरे देवा ! हे काय केलेंस ! ' महाराज, स्त्री आणि पुरुष यांत काय आहे ? हे कल्पनेचे खेळ • आहेत. अहो गुरुराज, आपणचना माझा सर्व संशय रसातळाला नेलात ? मग आपणाला हैं आजच काय झालें ? छे छे ! हें नुसतें भ्रमाचें पांघरूण आहे. स्वामींना हे कधींच बाधक होत नाहीं. माझी परीक्षा पाहण्यासाठी तर है स्वामींनी चालविलें नाहींना ! आत्मानंदांत सचैल स्नान केल्या-<noinclude></noinclude> ff0f3pnrkgpaydh8cjxxj8n09hr3pvl