विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.46.0-wmf.26 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk सदस्य:James500 2 73454 229741 164417 2026-04-30T07:50:18Z James500 4666 /* */ Remove template 229741 wikitext text/x-wiki {{#babel:en}} [[en:User:James500]] eu13so1xoub6xvcjld6yea9o5qsrodx पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१८ 104 74818 229739 196686 2026-04-29T15:49:01Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229739 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{xxx-larger|{{center|'''चांदण्यांतील गप्पा.'''}}}} {{rule|11em}} {{xx-larger|{{center|'''गोष्ट पहिली'''}}}} {{x-larger|{{center|'''"शिसवी पेटी."'''}}}} {{gap}}'''फा'''ल्गुन मास संपत आला. वसंताची पूर्व चिन्हें दिसूं लागलीं. बहुतेक वृक्ष- वेलींनी आपल्या जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन सुंदर सुंदर रंगांची वस्त्रे परिधान केली व कांही करीत आहेत; -जणूं काय युवयुवति एखाद्या मोठया समारंभास जाण्यासाठी नटूनथटून तयार झाल्या आहेत, अथवा वसंतरूप फार थोर पाहुणा आपले घरी येणार म्हणून थाटमाट करून त्या त्याची वाटच बघत आहेत! घरधनी व घनिनी यांनी सुंदर पोषाख केल्यामुळे ती आनंदात आहेत असें पाहून आश्रितसमुदायही आनंदित दिसत आहे. पिढ्यान्पिढ्या आश्रय करून राहिलेला पक्षिगण मोठ्या गडबडीनें इकडून तिकडे तिकडून इकडे जात येत आहे. त्यांच्याही अंगावर चित्रविचित्र रंगांचे पोषाख दिसत आहेत. कोणाचा तांबडा, कोणाचा हिरवा, कोणाचा पिवळा, कोणाचा निळा, कोणाचा पारवा, कोणाचा पांढरा शुभ्र, कोणाचा बुट्टीदार; कोणीं डोक्यावर तुरा खोवला आहे; कोणीं विडे खाऊन तोंडे लाल केली आहेत; कोणी तोंडास व पायांस हळद फांसली आहे; कोणी आपल्या पायांस मेंदी लावली आहे, याप्रमाणे ज्याने त्यानें आपआपल्या आवडीप्रमाणे आपणास शृंगारले आहे.<BR>{{gap}}सकाळी व दुपारी मंजुळ सूर काढून हा नटवा पक्षिगण गात आहे. त्या निरनिराळ्या पक्ष्यांची निरनिराळी गाणीं ऐकिलीं असतां 'आज यांनी एकमेकांवर ताण करण्याचें मनांत आणिले आहे की काय?? असा भास होत आहे.{{nop}}<noinclude></noinclude> ssu23ryjh8l752q2deyxzojsml6yfn8 पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१९ 104 74819 229740 196687 2026-04-29T15:58:06Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229740 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|२|चांदण्यांतील गप्पा|}}</noinclude>{{gap}}पर्वताकडे दृष्टि फेंकेली असतां तो रखरखीत, झाड पान वेल यांविरहित उघडाबोडका दिसत आहे. जशीं शेजारी शेजारी दोन घरें असून एका घरावर दरवडा पडून किंवा त्यास आग लागून त्याचा नाश होतो, व दुसन्या घरीं अकल्पित कारणानें लक्ष्मीस ऊत येतो, त्याप्रमाणे वनभूमि व डोंगर या दोन शेजाऱ्यांची स्थिति भासते. संसारांत हा असाच नेहमींचा अनुभव आहे. एकाचा भाग्योदय होतो तोंच दुसऱ्याच्या विनाशकाळास आरंभ होतो. एक अत्यंत दरिद्रावस्थेतून निघून हत्तीच्या अंबारीत बसतो, तोंच दुसरा दारिद्र्यरूप पंकांत xxxxx अशी दैवगति विचित्र आहे. थोरांना दारिद्र्य फार दुःख देतें. नेहमीं श्रीमंतींत व ऐषआरामांत वागलेल्याला दारिद्र्य आले असता त्याचे चाकरनोकर, आप्तइष्ट, सर्व त्यास सोडून जातात, व त्या दारिद्र्याचें दुःख तो बापडा एकटाच भोगीत असतो. त्याच्या निकटसंबंध्यांना त्याच्याप्रमाणेच दुःख होते; तथापि त्याला सोडून जाणे त्यांस भाग पडते.<BR>{{gap}}दरिद्री पुरुषाच्या कन्येप्रमाणे भासणारी ही नदी पाहा! 'आपला तरी भार पित्यावर कशाला टाकावा?' असें मनांत आणून त्याचा निरोप घेऊन ती मोठ्या कष्टानें आपल्या पतिगृहाचा मार्ग क्रमीत आहे! क्षीणतेमुळे मार्ग चालण्यास कठीण पडून ठिकठिकाणीं बिचारी विश्रांति घेत घेत व दम टाकीत टाकीत चालली आहे, कोठें कोठें तर कोणा दुष्टापासून आपणास उपद्रव होऊं नये म्हणून ती दडपत व लपत चालली आहे, असे वाटत आहे. इतके करूनही बिचारीचें संरक्षण करण्यास अथवा तिचेबरोबर जाऊन तिला पतिगृहीं पोंचविण्यास कोणी नसल्यामुळेच जणों कोठें खड्ड्याचा, कोठें डबक्याचा, अथवा एखाद्या वांकणाचा तिनें आश्रय केला असतां, दुष्ट बगळे वाटमाऱ्याचे महा नीच कृत्य अंगीकारून बिचारीचे थोडेसे शिल्लक राहिलेले व तिचे फार आवडते असे मत्स्यादि अलंकार भराभर ओरबाडून घेऊन तिला ताप देत आहेत! ज्यांस आपण आजपर्यंत जीवन देऊन प्रेमाने वाढविले व पोशिलें, ते तीरस्थ वृक्ष आपल्यास या संकटकाळी खास उपयोगी पडतील अशा आशेने त्यांच्या बुंधांचा आश्रय करण्यास जो ती बिचारी गेली, तो तेही त्या दुष्ट बकांना लपण्यास आश्रय देऊन चोरांना सामील झाल्याचें तिला आढळले. उपकारकर्त्यावर संकट आले असता प्रसंगी उपयोगी पडणारा जगांत विरळा! ज्यांवर आपण उपकार केल तच प्रसंगी आपणावर शस्त्र धर-<noinclude></noinclude> hn3jt6bozxj0ezt3oltdd81heebzysb पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६४ 104 110269 229734 229698 2026-04-29T12:00:28Z JayashreeVI 4058 229734 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /> <u>'''तीन तत्त्वज्ञानी.'''</u></noinclude>व्हरचा वृत्तांत' या जगप्रसिद्ध ग्रंथाचा कर्ता स्विफ्ट हा बाक्लेप्रमाणेंच आयरिशमन असून याच शाळेंत शिकलेला होता. या शाळेत बाक्लेनें चार वर्षे काढली. या प्रदेशामध्ये सृष्टिदेवीचें मनोहर रूप दृग्गोचर होत असल्यामुळे बाक्लेला सृष्टिसौंदर्याची गोडी लागली, व त्याची अवलोकनशक्ति सूक्ष्म झाली. याचें प्रत्यंतर त्याच्या ग्रंथांत वारंवार दिसून येतें. सन १७०० मध्ये बाक्ले हा मॅट्रिक्युलेशन परीक्षा पास झाला, व पुढील शिक्षणाकरितां तो आयर्लंडची राजधानी जी डब्लिन तेथल्या युनिव्हर्सिटीतील ट्रिनिटी कॉलेजांत दाखल झाला. येथे त्यानें विद्यार्थी व शिक्षक या नात्यानें आपल्या आयुष्याचीं तेरा वर्षे काढली. कॉलेजांत त्याच्या बुद्धीचा झपाट्याने विकास होऊं लागला व त्याला आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय ज्ञानाची गोडी लागली. त्यानें कॉलेजांत असतांना वेळोवेळीं आपल्या वाचनावरून सुचलेल्या विचारांचे, तसेंच त्यावरून सुचलेल्या प्रश्नांचें व स्वयंस्फूर्तीनें मनांत आलेल्या कल्पनांचें टिपण करून ठेवलेलें आहे. ही ची बाक्लेची टिपणवही त्याच्या मृत्यूनंतर कांहीं वर्षांनी छापली गेली. या टिपणवहीवरून त्याचे आध्यात्मिक विचार कसकसे बनत गेले, व शेवटीं जें तत्वज्ञान त्याने जगाला शिकविलें त्याचा उगम त्याच्या मनांत कशा तऱ्हेनें झाला, हें फार चांगल्या तऱ्हेनें दिसून येते. कॉलेजांतील बाक्लेच्या आयुष्यक्रमावरून त्याच्या भावी मोठेपणाची चिन्हें दिसून येतात. त्याच्या वेळच्या विद्यार्थ्यांना ते एक विलक्षण कोडेच वाटे. त्याच्यापासून दूर दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तो एक अजागळ विद्यार्थी वाटे, व त्याप्रमाणे त्याची ते थट्टाहि करीत; पण बाक्लेचा निकट संबंध असलेल्या विद्यार्थ्यांना मात्र त्याची बुद्धिमता, त्याची ज्ञानतृष्णा व त्याची उद्यमप्रियता पाहून बाक्लेचें कौतुक वाटत असे. प्रत्यक्ष सत्यज्ञान मिळविण्याकरितां तो आपला जीवहि धोक्यांत घालण्याला कसा तयार असे, याबद्दलची एक मौजेची गोष्ट बाक्लेच्या चरित्रकारांनी लिहून ठेविली आहे, ती येथे सांगण्यासारखी आहे. {{gap}}बाक्लें व कँटिरिनी ('हा प्रसिद्ध इंग्लिश ग्रंथकार गोल्डस्मिथ याचा--<noinclude>{{center|१८}}</noinclude> szv6kloy1tkhs0v66ubpihptber234u 229735 229734 2026-04-29T12:01:08Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 229735 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /> <u>'''तीन तत्त्वज्ञानी.'''</u></noinclude>व्हरचा वृत्तांत' या जगप्रसिद्ध ग्रंथाचा कर्ता स्विफ्ट हा बाक्लेप्रमाणेंच आयरिशमन असून याच शाळेंत शिकलेला होता. या शाळेत बाक्लेनें चार वर्षे काढली. या प्रदेशामध्ये सृष्टिदेवीचें मनोहर रूप दृग्गोचर होत असल्यामुळे बाक्लेला सृष्टिसौंदर्याची गोडी लागली, व त्याची अवलोकनशक्ति सूक्ष्म झाली. याचें प्रत्यंतर त्याच्या ग्रंथांत वारंवार दिसून येतें. सन १७०० मध्ये बाक्ले हा मॅट्रिक्युलेशन परीक्षा पास झाला, व पुढील शिक्षणाकरितां तो आयर्लंडची राजधानी जी डब्लिन तेथल्या युनिव्हर्सिटीतील ट्रिनिटी कॉलेजांत दाखल झाला. येथे त्यानें विद्यार्थी व शिक्षक या नात्यानें आपल्या आयुष्याचीं तेरा वर्षे काढली. कॉलेजांत त्याच्या बुद्धीचा झपाट्याने विकास होऊं लागला व त्याला आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय ज्ञानाची गोडी लागली. त्यानें कॉलेजांत असतांना वेळोवेळीं आपल्या वाचनावरून सुचलेल्या विचारांचे, तसेंच त्यावरून सुचलेल्या प्रश्नांचें व स्वयंस्फूर्तीनें मनांत आलेल्या कल्पनांचें टिपण करून ठेवलेलें आहे. ही ची बाक्लेची टिपणवही त्याच्या मृत्यूनंतर कांहीं वर्षांनी छापली गेली. या टिपणवहीवरून त्याचे आध्यात्मिक विचार कसकसे बनत गेले, व शेवटीं जें तत्वज्ञान त्याने जगाला शिकविलें त्याचा उगम त्याच्या मनांत कशा तऱ्हेनें झाला, हें फार चांगल्या तऱ्हेनें दिसून येते. कॉलेजांतील बाक्लेच्या आयुष्यक्रमावरून त्याच्या भावी मोठेपणाची चिन्हें दिसून येतात. त्याच्या वेळच्या विद्यार्थ्यांना ते एक विलक्षण कोडेच वाटे. त्याच्यापासून दूर दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तो एक अजागळ विद्यार्थी वाटे, व त्याप्रमाणे त्याची ते थट्टाहि करीत; पण बाक्लेचा निकट संबंध असलेल्या विद्यार्थ्यांना मात्र त्याची बुद्धिमता, त्याची ज्ञानतृष्णा व त्याची उद्यमप्रियता पाहून बाक्लेचें कौतुक वाटत असे. प्रत्यक्ष सत्यज्ञान मिळविण्याकरितां तो आपला जीवहि धोक्यांत घालण्याला कसा तयार असे, याबद्दलची एक मौजेची गोष्ट बाक्लेच्या चरित्रकारांनी लिहून ठेविली आहे, ती येथे सांगण्यासारखी आहे. {{gap}}बाक्लें व कँटिरिनी ('हा प्रसिद्ध इंग्लिश ग्रंथकार गोल्डस्मिथ याचा--<noinclude>{{center|१८}}</noinclude> 5g581na8f4gjk9h6vgvo1ipmj0wsknd पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६५ 104 110270 229736 229699 2026-04-29T12:18:08Z JayashreeVI 4058 229736 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /> {{right|<u>'''जॉर्ज बाक्ले.'''</u>}}</noinclude>पुढे मेहुणा झाला ) या नांवाचा त्याचा सोबती असे दोघेजण एकदां फांशीची शिक्षा अमलांत येत असतां ती पाहण्याला गेले. बाक्लें तेथून परत आला, तो उदास अशा मनःस्थितींत आला; पण फांसावर चढविला जात असतांना त्या गुन्हेगाराला काय संवेदना होत असतील, याबद्दल बाक्लेचा सारखा विचार चालला होता. आपल्या या विलक्षण जिज्ञासेबद्दल बाक्लेनें कँटिरिनीजवळ गोष्ट काढली, व दोघां मित्रांचे असें ठरलें कीं, फांशीं जातांना काय वाटतें, याबद्दल प्रथम बाक्लेनें प्रयोग करून पहावा, आणि मग कँटिरिनीनें तोच प्रयोग आपल्यावर करावा. मी खूण केली कीं मला फांसावरून सोडवा असें बाक्लेनें सांगितलें होतें. ठरल्याप्रमाणें वरच्या तक्तपोशीला दोरखंड बांधून बाक्लेनें आपल्या मानेला त्याचा शेवट बांधला, व खालची खुर्ची कॅंटिरिनीला काढून घेण्याला सांगितलें, खुर्ची काढून घेतांक्षणींच बाक्लेला बेशुद्धी येऊन ठरलेली खूण करण्याचे सामर्थ्य राहिलें नाहीं. पण खुणेची अधिक वाट न पाहतां त्याच्या मित्रानें त्याला फांसावरून सोडविलें नाहीं तर बाक्ले खराखुराच फांशी जाण्याची पाळी आली होती! दोरी सोडल्यावर बाक्ले भूमीवर निश्चेष्ट पडला. कांहीं वेळानें सावध झाल्यावर बाक्ले एकदम म्हणाला "वाहबारे कँटिरिनी! माझा गळपटा तूं चुरडलास!" {{gap}}बाक्लेच्या प्रयोगानंतर अर्थातच कॅंटिरिनीला त्याप्रमाणें स्वतःवर प्रयोग करून घेण्याची इच्छा झाली नाहीं! या गोष्टीवरून बाक्लेचा धाडशी स्वभाव, त्याची ज्ञान मिळविण्याची हौस आणि विशेषतः त्याचा आध्यात्मिक ज्ञानाकडे ओढा, हीं चांगली दिसून येतात. {{gap}}बाक्लेचा ट्रिनिटी कॉलेजांतील शिक्षणक्रम चांगल्या तऱ्हेने पार पडला. त्याला १७०२मध्ये शिष्यवृत्ति मिळाली. १७०४मध्ये तो बी.ए. ची परीक्षा पास झाला, व १७०७ मध्यें त्यानें एम्. ए.ची पदवी मिळविली. पररीक्षेत त्यानें असामान्य विद्वत्ता दाखविली, म्हणून त्याला युनिव्हर्सिटी फेलोशिप देण्यांत आली. १७०७ पासून १७१२ अखेर बाक्ले ट्रिनिटी कॉलेजांत शिक्षकाचें काम करीत होता. १७०९ मध्ये त्यानें उपाध्या-<noinclude>{{center|५९ }}</noinclude> tjm0loh2cu3dygyzk3cqd57c9j0l9wq 229737 229736 2026-04-29T12:18:32Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 229737 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /> {{right|<u>'''जॉर्ज बाक्ले.'''</u>}}</noinclude>पुढे मेहुणा झाला ) या नांवाचा त्याचा सोबती असे दोघेजण एकदां फांशीची शिक्षा अमलांत येत असतां ती पाहण्याला गेले. बाक्लें तेथून परत आला, तो उदास अशा मनःस्थितींत आला; पण फांसावर चढविला जात असतांना त्या गुन्हेगाराला काय संवेदना होत असतील, याबद्दल बाक्लेचा सारखा विचार चालला होता. आपल्या या विलक्षण जिज्ञासेबद्दल बाक्लेनें कँटिरिनीजवळ गोष्ट काढली, व दोघां मित्रांचे असें ठरलें कीं, फांशीं जातांना काय वाटतें, याबद्दल प्रथम बाक्लेनें प्रयोग करून पहावा, आणि मग कँटिरिनीनें तोच प्रयोग आपल्यावर करावा. मी खूण केली कीं मला फांसावरून सोडवा असें बाक्लेनें सांगितलें होतें. ठरल्याप्रमाणें वरच्या तक्तपोशीला दोरखंड बांधून बाक्लेनें आपल्या मानेला त्याचा शेवट बांधला, व खालची खुर्ची कॅंटिरिनीला काढून घेण्याला सांगितलें, खुर्ची काढून घेतांक्षणींच बाक्लेला बेशुद्धी येऊन ठरलेली खूण करण्याचे सामर्थ्य राहिलें नाहीं. पण खुणेची अधिक वाट न पाहतां त्याच्या मित्रानें त्याला फांसावरून सोडविलें नाहीं तर बाक्ले खराखुराच फांशी जाण्याची पाळी आली होती! दोरी सोडल्यावर बाक्ले भूमीवर निश्चेष्ट पडला. कांहीं वेळानें सावध झाल्यावर बाक्ले एकदम म्हणाला "वाहबारे कँटिरिनी! माझा गळपटा तूं चुरडलास!" {{gap}}बाक्लेच्या प्रयोगानंतर अर्थातच कॅंटिरिनीला त्याप्रमाणें स्वतःवर प्रयोग करून घेण्याची इच्छा झाली नाहीं! या गोष्टीवरून बाक्लेचा धाडशी स्वभाव, त्याची ज्ञान मिळविण्याची हौस आणि विशेषतः त्याचा आध्यात्मिक ज्ञानाकडे ओढा, हीं चांगली दिसून येतात. {{gap}}बाक्लेचा ट्रिनिटी कॉलेजांतील शिक्षणक्रम चांगल्या तऱ्हेने पार पडला. त्याला १७०२मध्ये शिष्यवृत्ति मिळाली. १७०४मध्ये तो बी.ए. ची परीक्षा पास झाला, व १७०७ मध्यें त्यानें एम्. ए.ची पदवी मिळविली. पररीक्षेत त्यानें असामान्य विद्वत्ता दाखविली, म्हणून त्याला युनिव्हर्सिटी फेलोशिप देण्यांत आली. १७०७ पासून १७१२ अखेर बाक्ले ट्रिनिटी कॉलेजांत शिक्षकाचें काम करीत होता. १७०९ मध्ये त्यानें उपाध्या-<noinclude>{{center|५९ }}</noinclude> 1x6h373kjmln7jzyztsquo1tp19918l पान:प्राचीन भारतीय शिक्षणपद्धती.pdf/१८ 104 110271 229738 2026-04-29T12:24:05Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ऐच्छिक संस्कार आवश्यक कसा झाला ? मानीत व ती न घेणान्यास म्हणजे यज्ञ न करणान्यास व्रात्य असें संबो- धीत, हैं दिसून येईल. १ मनु (२, ३९ ), याज्ञवल्क्य (१,३७-३८) इत्यादि स्मृतींमध्य..." 229738 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ ऐच्छिक संस्कार आवश्यक कसा झाला ? मानीत व ती न घेणान्यास म्हणजे यज्ञ न करणान्यास व्रात्य असें संबो- धीत, हैं दिसून येईल. १ मनु (२, ३९ ), याज्ञवल्क्य (१,३७-३८) इत्यादि स्मृतींमध्ये, उपनयन न करणान्यास 'व्रात्य' ही अपमानास्पद संज्ञा दिली 'आहे; पण वैदिक कालीं ही संज्ञा फक्त यज्ञ न करणाराला लावीत. उप- नयन न करणान्यास व्रात्य म्हणत असल्याचा पुरावा सापडत नाही. प्रथम प्रथम उपनयन हा अत्यन्त आवश्यक संस्कार नव्हता; उप- नयनामुळे वैदिक वाङ्मयाच्या पवित्र पुस्तकालयामध्यें प्रवेश करण्याची मुभा मिळत असल्यामुळे तो संस्कार योग्य मनुष्यांच्या बाबतींतच करीत, इतरांचा तो होत नसे, हें वरील विवेचनावरून दिसून येईल. पुढे वैदिक वाङ्मय जसजसें अधिकाधिक वाढू लागलें तसतसे समाजामधील शक्य तितक्या जास्त मनुष्यांच्या मदतीशिवाय तें जतन करून ठेवणें शक्य नाही हें समाजधुरीणांना कळून येऊ लागले. २ सद्वर्तनी लोकांनीच वेदाभ्यास करावा हें चांगलें व वेदद्वेष्ट्या लोकांच्या हातीं वेद जाणें म्हणजे मोठीच आपत्ति होय, हे सर्वांनाच मान्य होते; पण संस्काराच्या प्रभावाने, व ब्रह्मचर्याश्रमांतील पवित्र वातावरणामुळे, अनिष्ट प्रवृत्तीचे लोकही सद्वर्तनी होण्याचा पुष्कळच संभव होता. सर्व त्रैवणिक समाजाचें सहकार्य जरूर तर सक्तीने मिळविल्याशिवाय दिवसेंदिवस वाढून अफाट बनलेलें वैदिक वाङमय कालाच्या तावडींतून बचावणें शक्य नाही, हें घडघडीत दिसूं लागल्यामुळे समाजधुरीणांनी उपनयन हा नितांत आवश्यक संस्कार करावा असें ठरविलें. यामुळेच उत्तरकालीन स्मृतींमध्यें ज्याचें उपनयन योग्य काली झाले नसेल तो व्रात्य, त्याशीं कोणीही कसलाही व्यवहार करूं नये, अशा तऱ्हेचीं वचनें आढळतात. उपनयनानेच मनुष्यास खरें 'द्विजत्व' प्राप्त होतें, तें न केलें तर त्यास विवाहादि संस्कार करण्यास बिलकुल अधिकार नाही, अशा तऱ्हेची विचारसरणीही उपनयन संस्कार १ हॅ श्रुतिवचन पराशर माधव, पुस्तक १ भाग १ पृ. १६५ मध्ये माधवाचा. र्यांनी उद्धृत केलेले आढळते. २ वेद लिहून ठेवणें हैं एक मोठे पाप मानले जात असल्यामुळे पिढ्यानपिढ्या . ते मुखोद्गत करणे हाच एक उपाय वेद जतन करण्यास राहिला होता. न. भा. ९.... २<noinclude></noinclude> nsow9ntisfitj1e0c3tvcm60axr8k55