विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.6
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७३४
104
74140
232247
165728
2026-06-15T02:50:30Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232247
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||७०८}}</noinclude>धिक्कार केला होता त्याचा उघड उघड अंगीकार केला आणि जगव्यापकता वाऱ्यावर सोडून दिली. त्याबरोबर भारतीय कम्युनिस्टांनी सावध होऊन, राष्ट्रनिष्ठ होऊन रशियाशी संबंध तोडून टाकावयास हवे होते. पण तसे त्यांनी केले नाही व रशियातील 'इंटरनॅशनल', 'कॉमिटर्न', 'कॉमिनफॉर्म' या शब्दांना भुलून त्यांनी रशियाची गुलामगिरी पतकरली. हिटलर हा उघडपणे कम्युनिझमचा शत्रू होता. पण स्टॅलिनने त्यांच्याशी सख्य केले. तेव्हाही येथील कम्युनिस्टांचे डोळे उघडले नाहीत. पुढे स्टॅलिन हिटलरचा शत्रू झाला व इंग्रजांचा मित्र झाला. तेव्हा कम्युनिस्टांनीही पगडी फिरवली आणि १९४२ च्या लढ्याच्या वेळी काँग्रेसविरुद्ध ब्रिटिश साम्राज्यशाहीचा पक्ष त्यांनी घेतला. कामगारांचे हित, वर्गविग्रह, कम्युनिस्ट क्रांती, ही तत्त्वे त्यांच्यांत राहिलीच नाहीत. रशियाचे जे मत ते यांचे मत, असे होऊन भारतात निर्माण झालेली एक फार मोठी शक्ती वाया गेली. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाला तर नाहीच, पण कामगारांच्या सर्वांगीण उन्नतीलाही तिचा काही उपयोग झाला नाही.<br><br>'''समाजवादी पक्ष'''<br>{{gap}}मार्क्सच्या प्रेरणेने भारतात निर्माण झालेला दुसरा पक्ष म्हणजे समाजवादी पक्ष होय. काँग्रेसचे केवळ राष्ट्रवादी धोरण या पक्षाला अमान्य होते. शेतकरी व कामकरी यांची संघटना करून जमीनदार भांडवलदार वर्गाविरुद्ध लढा केला पाहिजे आणि तो, ब्रिटिशांशी स्वातंत्र्यलढा चालू असतानाच, केला पाहिजे असे या पक्षाचे मत होते. १९३० सालापासूनच जयप्रकाश नारायण, नरेन्द्र देव, अच्युत पटवर्धन, एस. एम. जोशी, पुरुषोत्तमदास त्रिकमदास, ना. ग. गोरे, साने गुरुजी इ. काँग्रेसमधील तरुणांना काँग्रेसचे जमीनदार भांडवलदारधार्जिणे धोरण नापसंत होऊ लागले. म्हणून त्यांनी १९३४ साली 'काँग्रेस समाजवादी पक्षा'ची स्थापना केली. पण स्वातंत्र्यलढा हे मुख्य उद्दिष्ट त्यांनी दृष्टिआड केले नाही. त्यामुळे काँग्रेसमधून फुटून निघावयाचे नाही, असे त्यांनी निश्चित ठरविले. १९४२ च्या काँग्रेसच्या स्वातंत्र्यलढ्यात या पक्षाने फार मोठे कार्य केले. त्यामुळे त्याला व त्याच्या नेत्यांना फार मोठी प्रतिष्ठा लाभली व काँग्रेसचे भावी नेते, अशा दृष्टीने लोक त्यांच्याकडे पाहू लागले. याच वेळी तरुणांच्या संघटना उभारून त्यांना खेड्यांत पाठवून पाटबंधारे घालणे, रस्ते करणे, सहकारी संस्था उभारणे इ. कामे सुरू करून त्यांनी जनजागृतीचे काम सुरू केले. पण स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांशी यांचे मुळीच पटेना. म्हणून ते काँग्रेसमधून बाहेर पडले व त्यांनी समाजवादी पक्ष म्हणून वेगळा पक्ष स्थापन केला. पण दुर्दैव असे की पहिले तेज पुढे त्यांच्यात राहिले नाही. १९५२ च्या निवडणुकीत फारसे यश न मिळाल्यामुळे त्यांचे नेते नाउमेद झाले. अनेक नेते पक्षाला सोडून अन्य क्षेत्रात गेले. सर्व समाजवादी तरुणांना एकत्र करून पक्ष संघटित ठेवील अशी कुवत त्यातील कोणातही नव्हती. त्यामुळे या पक्षाची अगदी वाताहात झाली आणि तो नाममात्र शिल्लक राहिला.<br><noinclude></noinclude>
6m30yymwho7oe6vqk84px6tpvl4twwg
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७३५
104
74150
232248
165738
2026-06-15T02:50:48Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232248
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude><br>'''नेहरूंचा समाजवाद'''<br>{{gap}}पण काँग्रेसला समाजवादी वळण देण्याचे कार्य समाजवादी नेत्यांना जमले नाही तरी, पं. जवाहरलाल नेहरू यांना त्या बाबतीत बरेचसे यश आले. १९२७ साली ते रशियाला गेले होते. त्या भेटीचा त्यांच्या मनावर फार खोलवर संस्कार झाला. केवळ राष्ट्रवाद हा अपुरा व संकुचित असून, समाजाचे व शासनयंत्राचे स्वरूप समाजवादानुसारी बनविल्यावाचून देशाचा उद्धार होणार नाही, असे आपले मत बनल्याचे, त्यांनीच आत्मचरित्रात लिहून ठेविले आहे. तेव्हापासून त्यांनी काँग्रेसमध्ये व समाजात समाजवादी तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याचे कार्य मोठ्या हिरिरीने सुरू केले व ते वीस वर्षे मोठ्या निष्ठेने चालविले. विद्यार्थी परिषदा, प्रांतिक परिपदा यांचे ते वरचेवर अध्यक्ष होत. त्या पीठांवरून ते हे विचार सांगत व गांधीवादावर कडक टीका करीत. ती कशी असे त्यासंबंधीचा एक उतारा वर दिलाच आहे. १९२९ साली ते लाहोरच्या काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्या पदावरूनही, आपण समाजवादी असल्याचे सांगून, जमीनदार भांडवलदार हे विश्वस्त आहेत या महात्माजींच्या विचारावर त्यांनी प्रखर टीका केली. त्यांना विश्वस्त म्हणावयाचे, मग ब्रिटिशांनाच का म्हणू नये, असा मर्मभेदक प्रश्न त्यांनी विचारला आणि शेवटी, स्वातंत्र्य येऊनही, ब्रिटिशांच्या ऐवजी हिंदी सरकार येऊन, त्याने सध्याची मिरासदारी यथापूर्व चालू ठेविली तर त्या तसल्या स्वातंत्र्याला काडीइतकीही किंमत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.<br>{{gap}}पंडितजींची ही मते महात्माजींनाच नव्हे, तर इतर काँग्रेसनेत्यांनाही पसंत नव्हती. पण पंडितजींना त्यांनी काँग्रेसमधून काढून टाकले नाही आणि पंडितजीही काँग्रेसला सोडून समाजवादी पक्षाला मिळाले नाहीत. १९२९ साली काँग्रेस कार्यकारिणीने प्रथम गांधीजींनाच अध्यक्ष म्हणून निवडले होते. पण, पंडितजींची मते माहीत असूनही, गांधीजींनीच आग्रह धरून कार्यकारिणीकडून पंडितजींची निवड करविली. महात्माजींची थोरवी ती हीच. काही झाले तरी काँग्रेस अभंग राखिली पाहिजे, असा त्यांचा निश्चय होता.<br><br>'''वर्गविग्रह-निषेध'''<br>{{gap}}काँग्रेसच्या नेत्यांची जमीनदारी, तालुकदारी यांच्या हक्कांना घटनेच्या मूलभूत तत्त्वांत समाविष्ट करण्यास संमती होती. १९३४ साली, कार्यकारिणीने वर्गविग्रहाचा पुरस्कार करणाऱ्यांचा निषेध केला आणि मालमत्तेची जप्ती करणे हे काँग्रेसच्या अहिंसा धर्माच्या विरुद्ध आहे, असा ठराव केला. यावर टीका करताना, 'मध्यवर्ती कायदेमंडळाच्या आगामी निवडणुकांच्या वेळी, धनिकांची मते मिळविण्याची इच्छा मनात बाळगणाऱ्या सनदशीर गटाच्या प्रेरणेनेच तो ठराव करण्यात आला हे उघड दिसते', असे पंडितजी म्हणाले. दिवसेंदिवस काँग्रेस नेत्यांचा व पंडितजींचा मतभेद तीव्र होऊ लागला, तरी त्यांनी एकमेकांना सोडले नाही. १९३६ साली पंडितजी पुन्हा<noinclude></noinclude>
8tjx24qdmu450bqz8xm95l6xi1kh5uv
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७३६
104
74183
232249
165771
2026-06-15T02:51:18Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232249
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||७१०}}</noinclude>काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्या वेळीही त्यांनी आपली प्रखर मते तशीच मांडली. आणि कार्यकारिणीत जयप्रकाश नारायण, नरेन्द्र देव, अच्युत पटवर्धन या अस्सल समाजवाद्यांना स्थान दिले.<br><br>'''केवळ तत्त्वे'''<br>{{gap}}यानंतर काँग्रेसकडून पंडितजी काहीसे समाजवादी स्वरूपाचे ठरावही करून घेऊ लागले. कराची काँग्रेसने कामगारांच्या हिताचे ठराव केले व खनिज संपत्ती, रेल्वे, जलमार्ग, जहाजे, यांवर सरकारी नियंत्रण नियंत्रण किंवा मालकी असावी, असा ठरावही त्यांनी मंजूर करून घेतला. १९४५ साली जो निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यात तर समाजवादाची जवळजवळ सर्व तत्त्वे मान्य करण्यात आली आहेत. 'राजकीय स्वातंत्र्य हे सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्यावाचून फोल आहे व ते प्रस्थापित करण्यासाठी सर्व महत्त्वाचे उद्योगधंदे राष्ट्राच्या स्वामित्वाचे असले पाहिजेत' अशी निःसंदिग्ध घोषणा त्या वेळचे काँग्रेसने केलेली आहे.<br><br>'''विपरीत तत्त्वज्ञान'''<br>{{gap}}यावरून काँग्रेसला समाजवादी तत्त्वज्ञानाचे वळण पंडितजींनी दिले हे स्पष्ट आहे. पण इतकेच. त्या तत्त्वाप्रमाणे भांडवलदार जमीनदारांशी काँग्रेसने लढा केव्हाही उभारला नाही. ब्रिटिशांशी स्वातंत्र्याचा लढा चालू आहे, तेव्हा त्याच वेळी हा लढा नको, दोन्ही लढे एकदम पेलणार नाहीत, असे काँग्रेसचे नेते म्हणत असत. पण हे विपरीत बोलणे आहे. अस्पृश्य, दीनदलित यांच्याविषयी ते उलट बोलत असत. अस्पृश्यता नष्ट करणे हा काँग्रेसच्या विधायक कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग होता. अस्पृश्यता नष्ट होऊ लागली, भावी काळात आपल्या जीवनाला काही प्रतिष्ठा प्राप्त होईल अशी आशा अस्पृश्यांना, दीनदलितांना वाटू लागली तर ते स्वातंत्र्याच्या लढ्यात उत्साहाने सामील होतील, असे तेव्हा सांगितले जात असे. आणि ते युक्तच होते. आणि म्हणूनच तेच धोरण किसान कामगारांच्या बाबतीत अवलंबावयास हवे होते. उत्तर हिंदुस्थानात बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश येथे फार मोठी जमीनदारी होती. तेथील किसानांना काँग्रेसने जमीनदारांविरुद्ध लढ्यास उद्युक्त केले असते आणि भांडवलदारांविरुद्ध कामगारांना उभे केले असते तर त्यांची शक्ती संघटित होऊन स्वातंत्र्यलढ्यास मिळाली असती. तसे न झाल्यामुळे कम्युनिस्टांनी कामगारशक्ती ही स्वातंत्र्यलढ्याविरुद्ध उभी केली. त्या संघटना काँग्रेसने ताब्यात घेतल्या असत्या तर स्वातंत्र्यलढ्याला तर फायदा झाला असताच, पण स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसच्या पाठीशी एक फार मोठी शक्ती उभी राहिली असती. ते न झाल्यामुळे २५/३० वर्षात दीन- दलितांचे, किसान कामगारांचे प्रश्न सोडविण्यात काँग्रेसला यश आले नाही. ती धनिकांच्याच आहारी गेली.<br><noinclude></noinclude>
mfxa4skrh93xajd0es9glghm28byc1c
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७३७
104
74187
232250
165775
2026-06-15T02:52:33Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232250
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|७११|| आर्थिक साम्राज्यशाही}}</noinclude>{{gap}}असो. ब्रिटिश कालातील भारतातील अर्थव्यवहाराचा इतिहास हा असा आहे. ब्रिटिशांनी येथले उद्योगधंदे नष्ट केले आणि किसानकामगारांचे शोषण करून देश संपूर्ण नागविला. त्याविरुद्ध प्रथम पितामह दादाभाई यांनी पवित्रा घेतला. त्याचाच आधार घेऊन लो. टिळकांनी बहिष्कारयोगाची दीक्षा भारताला दिली. त्याच पायावर महात्माजींनी असहकारितेची अभूतपूर्व चळवळ करून स्वातंत्र्याचा लढा उभारला आणि तो यशस्वी करून दाखविला. या लढ्याच्या काळातच पंडितजींनी समाजवादी तत्त्वे काँग्रेसला स्वीकारावयास लावली आणि कार्यक्रमाची दिशा निश्चित करण्याचा प्रयत्न केला. हे परिवर्तन फार मोठे आहे. दादाभाई, रानडे, टिळक, गांधीजी, पंडितजी यांच्यासारखे अलौकिक नेते या भूमीला लाभले, म्हणूनच हे शक्य झाले. ब्रिटिशांच्या आर्थिक साम्राज्यशाहीतून स्वतःला मुक्त करून घेण्याचे सामर्थ्य भारताला प्राप्त झाले त्याचे श्रेय सर्वस्वी त्यांनाच आहे.<br><br>{{center|■}}<noinclude></noinclude>
14az7dmgazcdyxyvuwhdul4p1ij5v33
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७३८
104
74202
232251
165790
2026-06-15T02:52:50Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232251
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop
|Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf
|Page = 738
|bSize = 407
|cWidth = 315
|cHeight = 234
|oTop = 48
|oLeft = 53
|Location = center
|Description =
}}
<br><br>{{rh|'''<big>३८.</big>'''||'''<big>राजकारण</big>'''}}<br><br>'''अविभाज्य'''<br>{{gap}}ब्रिटिश कालात झालेली धार्मिक क्रांती, समाजपरिवर्तन व ब्रिटिशांची आर्थिक साम्राज्यशाही याचा येथवर विचार केला. आता या कालातला राजकीय इतिहास पाहावयाचा आहे. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. येथल्या राजकारणाची ही जी परिणती झाली ती राजकीय चळवळीमुळे झाली यात शंकाच नाही. पण त्याच कालात झालेल्या धार्मिक व सामाजिक क्रांतीमुळे हे शक्य झाले हे आपण विसरू नये. आधी सामाजिक की आधी राजकीय असा वाद पुढे निर्माण झाला. राजकीय चळवळीच्या मानाने सामाजिक चळवळ गौण आहे, असे दादाभाई सांगत. टिळकांचेही तेच मत होते. सुईमागून दोरा तशा राजकीय सुधारणामागून सामाजिक सुधारणा येतात, असे ते म्हणत. पण स्वातंत्र्यानंतर तसे काही घडले नाही, हे आपण पाहातच आहो. गेल्या तीस वर्षात अपेक्षेच्या शतांशही सामाजिक सुधारणा झाल्या नाहीत. आणि स्वातंत्र्य मिळाले तेसुद्धा ज्या काही सामाजिक सुधारणा, धार्मिक सुधारणा येथे झाल्या त्यावाचून मिळाले नसते, हे मागील प्रकरणांतून सांगितलेच आहे. तेव्हा धर्म, समाजकारण, अर्थव्यवस्था व राजकारण हे सर्व विषय अविभाज्य आहेत, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.<br><noinclude></noinclude>
adx23ofqp3r281rvnvu6vlqq93x9m6c
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७३९
104
74214
232252
165802
2026-06-15T02:53:12Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232252
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|७१३|| राजकारण}}</noinclude><br>'''दोन पक्ष'''<br>{{gap}}ब्रिटिश कालात राजकीय चळवळ झाली ती साधारणपणे १८३२ ते १९४७ पर्यंत झाली. या कालखंडाचे राजकीय इतिहासाच्या दृष्टीने दोन टप्पे पडतात. एक १८७४ पर्यंतचा आणि एक त्यानंतरचा. पहिल्या विभागात ब्रिटिश राज्यकर्त्यांवर विश्वास हे मुख्य सूत्र होते. हिंदुस्थानचा उद्धार ब्रिटिशांकडूनच होणार आहे, या भूमीची प्रगती करण्यासाठी परमेश्वरी योजनेनेच ते आले आहेत, अशा प्रकारची श्रद्धा त्या काळात होती. १८७४ पासून विष्णुशास्त्री, आगरकर, टिळक हे नवे नेतृत्व निर्माण झाले आणि ब्रिटिश हे या भूमीचे शत्रू आहेत, त्यांच्या साम्राज्यशाहीचा संघटित शक्तीने प्रतिकार केल्यावाचून भारताला चांगले दिवस येणार नाहीत, असा या तरुण नेत्यांचा सिद्धांत होता. हे ब्रिटिशांवरील अविश्वासाचे राजकारण होय. पुढे पहिल्या पक्षाला नेमस्त, प्रागतिक किंवा मवाळ असे नाव पडले व दुसरा जहाल, राष्ट्रीय या नावाने ओळखला जाऊ लागला.<br><br>'''ब्रिटिशांवर विश्वास'''<br>{{gap}}पहिल्या विभागातील प्रमुख नेते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, दादाभाई नौरोजी व न्या. मू. रानडे हे होत. यातील पहिले दोघे तात्त्विक चिंतन करून, लेख लिहून, केवळ विचारप्रवर्तन करणारे होते. दुसरे दोघे म्हणजे दादाभाई व रानडे हे तत्त्वचिंतकही होते व प्रत्यक्ष राजकारण करणारेही होते. या सर्वाच्या कार्याचे स्वरूप आता पाहू. 'दिग्दर्शन' या मासिकात १८४० साली बाळशास्त्री लिहितात, 'सांप्रत जेणे करून इंग्लिश लोकांचा अंमल दृढ बसेल, अशी कोणतीही गोष्ट जरी झाली, तरी तिचा खेद मानू नये. कारण इंग्लंडातील सरकार एथील सरकाराकरवी व इंग्लिश लोकांकरवी, या देशचे लोकांस विद्या शिकविण्याविषयी श्रम करीत आहे. या विद्या शिकविण्याने असे होईल की या देशचे लोकांस आपले राज्य करण्याचे सामर्थ्य होईल व कोणी लोकांस आपले राज्य करण्याचे सामर्थ्य असता, ते आपण राज्य न करता दुसऱ्या कोणाच्या ताब्यात राहिले, असे कोठे बखरांमध्ये (इतिहासात) दिसून येत नाही. याप्रमाणे या देशात घडून यावे, यात इंग्लिश लोक व या देशचे लोक या उभयतांचे कल्याण आहे. सुज्ञ इंग्लिश लोक हे जाणतच आहेत. त्यास नेटिव लोकांस सांप्रत इंग्रज लोकांप्रमाणे विद्वान मात्र झाले पाहिजे.'<br><br>'''सर्व बीजे'''<br>{{gap}}यात स्वातंत्र्याची आकांक्षा स्पष्ट झालेली आहे आणि पाश्चात्य विद्या, इंग्रजी यंत्रणा, इंग्रजी संस्था हे त्याचे साधन होय, हा विचारही स्पष्टपणे मांडलेला आहे. ब्रिटिशांवरील विश्वास तो हाच होय. बाळशास्त्रींचा हा विश्वास आंधळा होता, असे<noinclude></noinclude>
jnb7utjdl2awwy73yd0b1s103quwegw
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७४०
104
74219
232253
165807
2026-06-15T02:53:22Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232253
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||७१४}}</noinclude>मात्र नाही. गावठी मालावर भारी जकाती बसवून ब्रिटिश मालावर मुळीच जकाती ठेवल्या नाहीत, यासाठी एल्फिन्स्टनवर त्यांनी टीका केली आहे. त्याचप्रमाणे हिंदी लोकांना कोणत्याही अधिकारपदावर नेमले नाही, याबद्दल त्यांनी टीका केली आहे. १८३३ साली ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश सरकारने नवी वीस वर्षांची सनद दिली. तीत जात, धर्म, प्रांत, देश यांवरून माणसा-माणसांत भेद केला जाणार नाही, सर्वांना योग्यतेप्रमाणे राज्यकारभारात स्थान दिले जाईल, असे आश्वासन दिलेले होते. पण प्रत्यक्षात तसे घडत नव्हते म्हणून, हे क्रूरपणाचे कृत्य आहे, अशी टीका 'दर्पण' या आपल्या पाक्षिकात बाळशास्त्री यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की 'विद्या ही कोणते एका देशातच असत्ये असे नाही आणि मनुष्य येथून तेथून सर्व सारखेच, हे बखरेवरून कळेल.' बाळशास्त्री यांची जी अवतरणे वर दिली आहेत त्यांवरून पुढील राजकीय चळवळीची सर्व बीजे त्यांच्या लेखनांतून दिसतात, हे कळून येईल. प्रारंभकाळीच महाराष्ट्राला असा पुरुष लाभला है भाग्य होय.<br><br>'''ईश्वरी योजना'''<br>{{gap}}दुसरे त्या काळचे विचारवंत म्हणजे लोकहितवादी. 'ईश्वरी योजने' चा सिद्धान्त त्यांनीच प्रथम सविस्तर मांडला. 'पूर्वी हिंदू लोक शहाणे होते. आता त्यांचे शहाणपण नाहीसे झाले आहे. ते शहाणपण हिंदू लोकांस पुन्हा प्राप्त व्हावे एतदर्थ हा मुलुख ईश्वराने त्यांच्या ताब्यात दिला आहे.' असे ते म्हणतात. आणि असा शहाणपणा अंगी येऊन हिंदू लोक स्वतःचा राज्यकारभार करण्यास समर्थ होण्यास दोनशे वर्षे तरी लागतील, असेही त्यांनी सांगून ठेवले आहे. याबरोबरच इतरही अनेक राजकीय तत्त्वे त्यांच्या शतपत्रांतून त्यांनी विशद केलेली आहेत. एक महत्त्वाचे तत्त्व पाहा. 'इंग्रजात एक मेला की दुसरा तयार असतो. हा क्रम मराठी राज्यात नव्हता' या वाक्यात हिंदी समाजाचे खरे दुखणे आणि इंग्रज समाजाचे खरे बळ कशात आहे ते उत्तम रीतीने स्पष्ट झालेले आहे. अनेक कर्ते पुरुष उदयास येणे हाच खरा लोकशाही राज्यपद्धतीचा लाभ होय. आणि म्हणूनच राणी सरकारकडे अर्ज करून हिंदी लोकांनी पार्लमेंट मागून घ्यावे, असे लोकहितवादींनी म्हटले आहे. त्या त्यांच्या पत्रातही अनेक तात्त्विक सिद्धान्त आलेले आहेत. ते म्हणतात, 'या अर्जात लिहावे की हल्लीच्या राज्यपद्धतीपासून आमचा फायदा नाही. तीत आमचे राज्यासंबंधी हक्क चालत नाहीत व हिंदू लोक जसे तसे इंग्रज लोक मनुष्ये आहेत. याकरिता इनसाफ बरोबर होण्याकरिता, इंग्रज व नेटिव यांच्यात जो सांप्रत भेद आहे तो मोडून एकसारखे होण्याकरिता, हिंदुस्थानचे देशात पार्लमेंट ठेवावी व ही सभा मुंबईस भरवावी. या सभेत सर्व जिल्ह्यांतून सर्व जातीचे, भट, गृहस्थ, शास्त्री, परभू, कुळंबी, मुसलमान, इंग्रज इ. सर्व जातींचे जे शहाणे असतील ते नेमावे व त्यांनी राज्य चालवावे.'<br>{{gap}}दुसऱ्या एका पत्रात, 'देश ही मातोश्री आहे,' असे सांगून त्यांनी राष्ट्रनिष्ठेचे<noinclude></noinclude>
syeio4a5aknbntsl8ynhuca8oucb9w0
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६
104
81352
232261
177082
2026-06-15T05:41:10Z
JayashreeVI
4058
232261
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Dipika Chipat" /></noinclude>
{{center|'''सज्जनगड'''}}
{{center|व}}
{{center|समर्थ रामदास.}}
{{gap}}'''आ''' स्त्रियाच्या बोसनिया प्रांतांतील सराजोव्ह या गांवीं 'आस्त्रियाचा युवराज व युवराज्ञी यांचा खून होतो काय, व त्रिखंड पसरलेलें व अप्रत्यक्ष रीतीनें सर्व खंडांस भोवणारे विलक्षण युरोपीय युद्ध सुरू होतें काय ? वर
वर पहाणान्यास या गोष्टी किती आकस्मिक वाटतात; पण युरोपच्या इतिहासाकडे थोड्या बारकाईनें पाहिलें म्हणजे युवराजाचा खून हैं या युद्धाचें निवळ निमित्त होते. खरी कारणें निराळींच होतीं असें कळून आल्याखेरीज रहात नाहीं, व ज्या गोष्टी घडून आल्या त्या ओक- स्मिक नाहींत, असें समजून येतें.<br>
{{gap}}हल्लींच्या युद्धाचें मूळ फार लांबवर पोंचलेलें आहे. त्याचा धागा १८७०।७१ मधल्या जर्मनीच्या फ्रान्सवरील अद्वितीय विजयापर्यंत पोचतो. या जयानें जर्मन जनतेला आत्मविश्वास व आत्मप्रत्यय पटला. असा विश्वास जर्मनीच्या धोरणी मुत्सद्यांमध्ये होताच; पण तो जनतेला पटला नव्हता; व तो जनतेला पटावा, जर्मनीचें सावकाश व नकळत वाढलेलें सामर्थ्य जगाच्या निदर्शनास यावें, या हेतूनेंच हें युद्ध सुरू करण्यांत आलें. या आत्मप्रत्ययानें जर्मनीचें ताबडतोब एकीकरण होऊन जर्मनीचें साम्राज्य बनलें. जर्मन लोक म्हणजे कल्पनासृष्टीत व तत्त्वज्ञानांत गढून जाणारे बिनलढवय्ये लोक असा जो युरोपांत वृथा समज पसरला होता,--<noinclude></noinclude>
nosd7qucrxjsqy19cv8a014t2xitbd4
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२६
104
85890
232240
182084
2026-06-14T12:42:27Z
JayashreeVI
4058
232240
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१२१}}
{{rule}}</noinclude>{{right|लेख नं. २}}
{{center|श्री.}}
येकूण मोईन
मुशाहिरे देवाच्या सेवकास
दर माहे होनु पातशाही
३ पारपत्यगार १
४ पुराणीक २ दर २
पुराणीक १ उपाध्या १
५ हरिदास ४ दर १/-
७ वाजंत्रीस दर १ यक
४ पूजारे २ बी ता॥
श्रीरघुनाथ १ श्रीहणुमंतास १.
-
श्री रघुनाथ देव.
राजेश्री रामदास गोसावी.
{{gap}}स्वस्तिश्री राज्याभिषेक शक ७ रौद्रसवत्सर कार्तीक शस्टी इंदुवासरे क्षत्रिय कुलावतंस श्रीराजाशंभू छत्रपती यांणी राजेश्री कासी रंगनाथ देशाधिकारी व देशलेखक प्रांत जाउळी यांस आज्ञा केली यैसा जे राजेश्री--- -गोसावी.
यांस श्री-
१ माली १ यक.
१ झाडी फेडी करावयास १ यक
२५
- देव वास्तव्ये कसबे चांफल यास प्रतीहि पूजेनिमित्य व नवेदास व देवाच्या सेवकास मोईन इ|| (इस्त-
कबिल) सनद राजेश्री कैलासवासी स्वामी छ. २९ जिल्हेज सन खमससनैन
(मंगळवार १६ मार्च सन १६७४.)
देवाच्या नवेदास प्रतिही सामग्री
वजन टकबंदी
८४६।. तांदुळ बारीक सडीक
८४६।. कणीक
८९२||. दाळी
४४१।. तूप
४४.॥. तूप रु | मीठ
४|६|| ९
दीपास तेल श्रीहनुमतास
प्रतिही वजन टक ८४|||-
देवाच्या पंचामृतास व परिमलद्रव्या-
कारणें दररोज नक्थ खुर्दा १ टका.
***
<br>{{gap}}येकूण दरमाहे होनु पातशाही पंचवीस व दरोज मोईन वजन टकबंदी साडेसात पासरे नवटांक व नक्थ खुर्दा टका येक रास येणेप्रमाणें पेशजी-<noinclude></noinclude>
hdbfbvtbhqdmf0v95psnb85ynuoeet8
232241
232240
2026-06-14T12:43:02Z
JayashreeVI
4058
232241
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१२१}}
{{rule}}</noinclude>{{right|लेख नं. २}}
{{center|श्री.}}
येकूण मोईन
मुशाहिरे देवाच्या सेवकास
दर माहे होनु पातशाही
३ पारपत्यगार १
४ पुराणीक २ दर २
पुराणीक १ उपाध्या १
५ हरिदास ४ दर १/-
७ वाजंत्रीस दर १ यक
४ पूजारे २ बी ता॥
श्रीरघुनाथ १ श्रीहणुमंतास १.
-
श्री रघुनाथ देव.
राजेश्री रामदास गोसावी.
<br>{{gap}}स्वस्तिश्री राज्याभिषेक शक ७ रौद्रसवत्सर कार्तीक शस्टी इंदुवासरे क्षत्रिय कुलावतंस श्रीराजाशंभू छत्रपती यांणी राजेश्री कासी रंगनाथ देशाधिकारी व देशलेखक प्रांत जाउळी यांस आज्ञा केली यैसा जे राजेश्री--- -गोसावी.
यांस श्री-
१ माली १ यक.
१ झाडी फेडी करावयास १ यक
२५
- देव वास्तव्ये कसबे चांफल यास प्रतीहि पूजेनिमित्य व नवेदास व देवाच्या सेवकास मोईन इ|| (इस्त-
कबिल) सनद राजेश्री कैलासवासी स्वामी छ. २९ जिल्हेज सन खमससनैन
(मंगळवार १६ मार्च सन १६७४.)
देवाच्या नवेदास प्रतिही सामग्री
वजन टकबंदी
८४६।. तांदुळ बारीक सडीक
८४६।. कणीक
८९२||. दाळी
४४१।. तूप
४४.॥. तूप रु | मीठ
४|६|| ९
दीपास तेल श्रीहनुमतास
प्रतिही वजन टक ८४|||-
देवाच्या पंचामृतास व परिमलद्रव्या-
कारणें दररोज नक्थ खुर्दा १ टका.
***
<br>{{gap}}येकूण दरमाहे होनु पातशाही पंचवीस व दरोज मोईन वजन टकबंदी साडेसात पासरे नवटांक व नक्थ खुर्दा टका येक रास येणेप्रमाणें पेशजी-<noinclude></noinclude>
3r59mwae0l2z7byrlcmy279a89e1lw2
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२९
104
85893
232239
182087
2026-06-14T12:31:38Z
JayashreeVI
4058
232239
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१२४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>गांव महामूर करावा आणि या अकरा विधियांखेरीज जे गांवीं उत्पन्न होईल ते दिवाणांत द्यावें. यैशी स्वामीने आज्ञा केली ते आज्ञेप्रमाणे तुम्ही त्या महालीच्या कारकुनास लिहून चालवणे ह्मणोन आज्ञा केली होती,
त्याणेप्रमाणे साले गुदस्ता आम्ही ताकीद रोखे दिल्ही कीं इनाम चालवणे पेस्तर सनद सादर होईल यैसे रोखे चालविले होते, तेणे प्रमाणें काम चालिले, परंतु सनद जाहली न्हवती, त्याकरितां श्रीस्वामीने वेदमूर्ति दिवाकर गोसावी या बराबरी सांगोन पाठविले त्यावरून हली सनद राजेश्री साहेबाचे आज्ञेप्रमाणे करून दिल्हे असे इनाम गांवगना बिधे बितपसील
मौजे डेरवण
४११
मौजे सुदन
८११
मौजे जाजगांव
८११
मौजे तांबवे
८११
1
कसबे चाफल देखील
त्रि ॥ ८१८
वाडी कारवजे चासई
1
मौजे चरेगांव
४११
मौजे साल्हे
८११
<br>{{gap}}येकून अर्ध चावर साहा विघे इनाम साही गावासी देविला असे तो चालवणे व सदरहू गावासी वेठ बेगार आणिक कामासी तसवीस ने देणे साहा बाकी? इनामाचे बागाचे कुप काटी व देवाचे यात्रेस वेठ बेगार करावी यास सदरहू दिले असे व हली तुम्ही सुभा करिता तुम्हांस व पेस्तर जो कोणी सुभेदार होईल त्यास हाचि कागद मान्य असे जाणिजे या खेरीज कदीम त्याचा इनाम कारकीर्दी इदलशाही चालत आला असे तो चालवणें बितपसील जमीन चावर विधे ०।१३
मौजे सींगणवाडी,
मौजे चरथोडी
चाफल ८१
माजगाउ ८५
१५
<br>{{gap}}येकूण पाव चावर बारा विधे यथेता आंबराई लाविल्या आहेत व काही सेते आहेति ते बिला कुसुर सालाबाद प्रमाणे चालो देणे बहु लिहिणे तरी सुज्ञ असा या कागदाचे तालीक लेहोन घेउनुं असल परतून देणे दर--<noinclude></noinclude>
bnmq5iqzc0zs1b86mlsw30nsraz126n
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/२६
104
95276
232255
192940
2026-06-15T05:28:33Z
JayashreeVI
4058
232255
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|२१}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>श्रेष्ठीं जें मेळविलें । त्यासाठीं भांडत बैसलें ।
तर मग जाणावें फावलें । गनीमासीं ॥ ६॥
ऐसें सहसा करूं नये । दोघे भांडतां तिस-याचा जय ।
धीर धरून महत्कार्य । समजूनी करावें ॥ ७ ॥
आधींच पडली धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ति ।
या कारणें समस्ती । बुद्धि शोधावी ।। ८ ।।
राजी राखितां जग । मग कार्यभागाची लगबग |
ऐसें जाणोनि सांग | समाधान करावें ॥। ९ ॥
सकल लोक एक करावे । गनिम लोटोनि काढावे ।
एणें करितां कीर्ति धावे । दिगंतरीं ॥ १० ॥
आधी गाजवावे तडाखे । तरी मग भूमंडळ धाके ।
ऐसें न होतां धक्के | राज्यास होती ॥। ११ ॥
समय प्रसंग ओळखावा । राग निपटून सांडावा ।
आला तरी कळों न द्यावा । जनामध्यें ॥ १२ ॥
राज्यामध्यें सकल लोक । सलगी देऊनि करावे साक ।
लोकांचे मनामध्यें धाक । उपजेंचि नये ॥ १३ ॥
बहुत लोक मेळवावे । एक विचारें भरावे ।
कष्ट करोनि घसरावें । म्लेंच्छांवरी ॥ १४ ॥
आहे तितुकें जतन करावें । पुढें आणीक मेळवावें ।
महाराष्ट्रराज्यचि करावें । जिकडे तिकडे ।। १५ ॥
लोक हिंमत धरावी । शर्तीची तरवार करावी ।
चढती वाढती पदवी । पावाल येणें ॥ १६ ॥
शिवराजास आठवावें । जीवित तृणसमान मानावें ।
इहलोकी परलोकीं तरावें । कीर्तिरूपें ॥ १७ ॥
शिवराजाचें आठवावें रूप । शिवराजाचा आठवावा साक्षेप ।
शिवराजाचा आठवावा प्रताप । भूमंडळीं ॥ १८ ॥
शिवराजाचें कैसें बोलणें । शिवराजाचें कैसें चालणें ।
शिवराजाची सलगी देणें । कैसी असे ॥ १९ ॥</poem>}}<noinclude></noinclude>
0d9fireyxgziqihvuzlkno95dixthxd
232256
232255
2026-06-15T05:29:02Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
232256
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|२१}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>श्रेष्ठीं जें मेळविलें । त्यासाठीं भांडत बैसलें ।
तर मग जाणावें फावलें । गनीमासीं ॥ ६॥
ऐसें सहसा करूं नये । दोघे भांडतां तिस-याचा जय ।
धीर धरून महत्कार्य । समजूनी करावें ॥ ७ ॥
आधींच पडली धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ति ।
या कारणें समस्ती । बुद्धि शोधावी ।। ८ ।।
राजी राखितां जग । मग कार्यभागाची लगबग |
ऐसें जाणोनि सांग | समाधान करावें ॥। ९ ॥
सकल लोक एक करावे । गनिम लोटोनि काढावे ।
एणें करितां कीर्ति धावे । दिगंतरीं ॥ १० ॥
आधी गाजवावे तडाखे । तरी मग भूमंडळ धाके ।
ऐसें न होतां धक्के | राज्यास होती ॥। ११ ॥
समय प्रसंग ओळखावा । राग निपटून सांडावा ।
आला तरी कळों न द्यावा । जनामध्यें ॥ १२ ॥
राज्यामध्यें सकल लोक । सलगी देऊनि करावे साक ।
लोकांचे मनामध्यें धाक । उपजेंचि नये ॥ १३ ॥
बहुत लोक मेळवावे । एक विचारें भरावे ।
कष्ट करोनि घसरावें । म्लेंच्छांवरी ॥ १४ ॥
आहे तितुकें जतन करावें । पुढें आणीक मेळवावें ।
महाराष्ट्रराज्यचि करावें । जिकडे तिकडे ।। १५ ॥
लोक हिंमत धरावी । शर्तीची तरवार करावी ।
चढती वाढती पदवी । पावाल येणें ॥ १६ ॥
शिवराजास आठवावें । जीवित तृणसमान मानावें ।
इहलोकी परलोकीं तरावें । कीर्तिरूपें ॥ १७ ॥
शिवराजाचें आठवावें रूप । शिवराजाचा आठवावा साक्षेप ।
शिवराजाचा आठवावा प्रताप । भूमंडळीं ॥ १८ ॥
शिवराजाचें कैसें बोलणें । शिवराजाचें कैसें चालणें ।
शिवराजाची सलगी देणें । कैसी असे ॥ १९ ॥</poem>}}<noinclude></noinclude>
4v720xnckvho3xtnd500zjsfyivvzr0
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/३५
104
110335
232259
229957
2026-06-15T05:38:31Z
JayashreeVI
4058
232259
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{rh|३० |सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{Block center|<poem> देह इंद्रियें आणि प्राण । याचेनि योगें आपण ।
सुखदुःखें शिणे जाण | या नांव आध्यात्मिक ॥</poem>}}
{{gap}}आपल्या सभोवारच्या बाह्यसृष्टीतील वस्तुजातानें होणारा त्रास म्हणजे तो आधिभौतिक ताप होय.
{{block center|<poem>सर्व भूतांचेनि संयोगें । ताप होतां मन भंगे ।
सुख दुःख उपजों लागे । या नांव आधिभौतिक ॥</poem>}}
{{gap}}मरणानंतर भोगाव्या लागणाऱ्या सुखदुःखाला आधिदैविक ताप म्हणतात.
{{block center|<poem>शुभाशुभ कर्मानें जना । देहांतीं यमयातना ।
स्वर्ग नरक भोग नाना । या नांव आधिदैविक ॥</poem>}}
{{gap}}रामदासाच्या मतें वरीलप्रमाणें संसार दुःखमय आहे व तें त्यानीं आडिसनच्याप्रमाणे एका उपमेनें शेवटीं सांगितलें आहे.
{{block center|<poem>संसार म्हणिजे महापूर । माजी जलचरें अपार ।
डंकूं धावती विखार | काळसर्प ॥
आशा ममता देह बेडी | सुसरी करिताती ताडातोडी ।
नेवोनि दुःखाचे सांगडी । माजी घालिती ॥
अहंकारनक्रे उडविलें | नेऊनि पाताळीं बुडविलें ।
तेथूनियां सोडविलें । न वचे प्राणी ॥
काममगरमिठी सुटेना | तिरस्कार लागला तुटेना ।
मद मत्सर वाहेना । भूली पडली ॥
वासना धामीण पडली गळां । घालोनि वेटाळें वमी गरळा ।
जिव्हा लाळी वेळोवेळां । भयानक ॥
माया प्रपंचाचें वोझें । घेऊनि म्हणें माझें माझें ।
बुडतांहि न सोडी फुंजे । कुळाभिमानें ॥
पडिलें भ्रांतीचें अंधारें। नागविलें अभिमानचोरें ।
आलें अहंतेचें काविरें । भूतबाधा ॥
बहुतेक आवर्ती पडले । प्राणि वाहतची गेले ।
जिहीं भगवंतासी बोभाइलें । भावार्थबळें ॥</poem>}}<noinclude></noinclude>
mctsrtfoef5g4726xya61txkd2t79cp
232260
232259
2026-06-15T05:38:56Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
232260
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|३० |सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{Block center|<poem> देह इंद्रियें आणि प्राण । याचेनि योगें आपण ।
सुखदुःखें शिणे जाण | या नांव आध्यात्मिक ॥</poem>}}
{{gap}}आपल्या सभोवारच्या बाह्यसृष्टीतील वस्तुजातानें होणारा त्रास म्हणजे तो आधिभौतिक ताप होय.
{{block center|<poem>सर्व भूतांचेनि संयोगें । ताप होतां मन भंगे ।
सुख दुःख उपजों लागे । या नांव आधिभौतिक ॥</poem>}}
{{gap}}मरणानंतर भोगाव्या लागणाऱ्या सुखदुःखाला आधिदैविक ताप म्हणतात.
{{block center|<poem>शुभाशुभ कर्मानें जना । देहांतीं यमयातना ।
स्वर्ग नरक भोग नाना । या नांव आधिदैविक ॥</poem>}}
{{gap}}रामदासाच्या मतें वरीलप्रमाणें संसार दुःखमय आहे व तें त्यानीं आडिसनच्याप्रमाणे एका उपमेनें शेवटीं सांगितलें आहे.
{{block center|<poem>संसार म्हणिजे महापूर । माजी जलचरें अपार ।
डंकूं धावती विखार | काळसर्प ॥
आशा ममता देह बेडी | सुसरी करिताती ताडातोडी ।
नेवोनि दुःखाचे सांगडी । माजी घालिती ॥
अहंकारनक्रे उडविलें | नेऊनि पाताळीं बुडविलें ।
तेथूनियां सोडविलें । न वचे प्राणी ॥
काममगरमिठी सुटेना | तिरस्कार लागला तुटेना ।
मद मत्सर वाहेना । भूली पडली ॥
वासना धामीण पडली गळां । घालोनि वेटाळें वमी गरळा ।
जिव्हा लाळी वेळोवेळां । भयानक ॥
माया प्रपंचाचें वोझें । घेऊनि म्हणें माझें माझें ।
बुडतांहि न सोडी फुंजे । कुळाभिमानें ॥
पडिलें भ्रांतीचें अंधारें। नागविलें अभिमानचोरें ।
आलें अहंतेचें काविरें । भूतबाधा ॥
बहुतेक आवर्ती पडले । प्राणि वाहतची गेले ।
जिहीं भगवंतासी बोभाइलें । भावार्थबळें ॥</poem>}}<noinclude></noinclude>
0p8omsm4ncpgww3pbbjac5d65uyo6ds
अनुक्रमणिका:मानसशक्तिपरिचय.pdf
106
110684
232267
232236
2026-06-15T07:59:03Z
सुबोध कुलकर्णी
1231
232267
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[d:Q140197117|मानसशक्तिपरिचय]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[d:Q140135740|रामचंद्र विनायक कुलकर्णी]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=[[d:Q140135740{{!}}रामचंद्र विनायक कुलकर्णी]]
|Address=तासगाव, जिल्हा सातारा (आता सांगली), महाराष्ट्र, भारत
|Year=1919
|Key=मानसशक्तिपरिचय
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
kkdkctiugnfl377uzax9fwupe3wue1j
अनुक्रमणिका:मानसशास्त्राची तत्त्वे.pdf
106
110685
232266
232238
2026-06-15T07:58:05Z
सुबोध कुलकर्णी
1231
232266
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[d:Q140197251|मानसशास्त्राची तत्त्वे]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[d:Q140136540|नारायण लक्ष्मण फडके]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=[[d:Q131161266|बळवंत गणेश दाभोलकर]]
|Address=नारायण पेठ, घर क्रमांक ४६८, पुणे शहर, महाराष्ट्र
|Year=1912
|Key=मानसशास्त्राची तत्त्वे
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=2
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
g4mmp7myrgr6w9niplvrqxz1l4ul8l2
अनुक्रमणिका:विद्यार्थ्यांचें आरोग्य.pdf
106
110686
232242
2026-06-14T14:33:14Z
Annni07
6055
नवीन पान ""
232242
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[d:Q140198903|विद्यार्थ्यांचें आरोग्य]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[d:Q130378335|डॉ. गणपत पांडुरंग काळोखे]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=[[d:Q130378335|डॉ. गणपत पांडुरंग काळोखे]]
|Address=चर्नी रोड, गिरगाव, बॉम्बे (मुंबई), महाराष्ट्र
|Year=1915
|Key=विद्यार्थ्यांचें आरोग्य
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=4
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=हा ग्रंथ रावसाहेब श्रीमंत पुंडळीकराव पंडित (उच्च न्यायालयाचे वकील, सिरसी) यांना आदरपूर्वक समर्पित केला आहे. या प्रतीवर 'डेक्कन व्हर्नॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी'च्या ग्रंथालयाचा ऐतिहासिक शिक्का आहे. लेखकाने याची प्रस्तावना आनंद फार्मसी, चर्नी रोड येथे पूर्ण केली.
|Footer=पुस्तकाची मूळ विक्री किंमत ४ आणे एवढी होती.
}}
1lnm3qcybhzubx93ayaksm7dwmzppk3
अनुक्रमणिका:सुख आणि शांती.pdf
106
110687
232243
2026-06-14T15:17:17Z
Annni07
6055
नवीन पान ""
232243
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[d:Q140199029|सुख आणि शांती]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[d:Q130633468|महादेव हरि मोडक]]
|Translator=[[d:Q130633468|महादेव हरि मोडक]]
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=[[d:Q131161266|बळवंत गणेश दाभोलकर]]
|Address=नारायण पेठ, घर क्रमांक ४६८, पुणे शहर, महाराष्ट्र
|Year=1911
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=हा ग्रंथ कै. नारायण वासुदेव दाभोळकर यांच्या स्मृतीस आणि अमळनेरचे प्रतापशेत (मोतीलाल मानकचंद) यांना आदरपूर्वक समर्पित आहे. ग्रंथात 'सुख' आणि 'शांती' या शीर्षकांखाली कठोपनिषदातील श्लोक समाविष्ट आहेत. यात टाइम्स ऑफ इंडियाच्या एका छापील शिफारशीचाही उल्लेख आढळतो.
|Footer=
}}
33ef229gm6xv9qq3mlrkmpwi1b9h1wh
232244
232243
2026-06-14T15:18:10Z
Annni07
6055
232244
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[d:Q140199029|सुख आणि शांती]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[d:Q130633468|महादेव हरि मोडक]]
|Translator=[[d:Q130633468|महादेव हरि मोडक]]
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=[[d:Q131161266|बळवंत गणेश दाभोलकर]]
|Address=नारायण पेठ, घर क्रमांक ४६८, पुणे शहर, महाराष्ट्र
|Year=1911
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=2
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=हा ग्रंथ कै. नारायण वासुदेव दाभोळकर यांच्या स्मृतीस आणि अमळनेरचे प्रतापशेत (मोतीलाल मानकचंद) यांना आदरपूर्वक समर्पित आहे. ग्रंथात 'सुख' आणि 'शांती' या शीर्षकांखाली कठोपनिषदातील श्लोक समाविष्ट आहेत. यात टाइम्स ऑफ इंडियाच्या एका छापील शिफारशीचाही उल्लेख आढळतो.
|Footer=
}}
0g2i13lqlkwg7bx3m0c7w13ka5c788n
अनुक्रमणिका:सामर्थ्य, समृद्धी व शांती.pdf
106
110688
232245
2026-06-14T17:17:04Z
Annni07
6055
नवीन पान ""
232245
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=सामर्थ्य, समृद्धी व शांती
|Language=mr
|Volume=
|Author=[d:Q140135822{{!}}सीताराम शिवराम लोटलीकर]]
|Translator=[d:Q140135822{{!}}सीताराम शिवराम लोटलीकर]]
|Editor=[[d:Q140199884|श्रीकृष्णनीलकंठ चापेकर]] (ग्रंथ निरीक्षक व प्रस्तावना लेखक)
|Illustrator=
|School=
|Publisher=[[d:Q140135822|एस. एस. लोटलीकर]] (नव-विचार-प्रवर्तक मंडळ)
|Address=खानापूर-बेळगाव, कर्नाटक, भारत
|Year=1915
|Key=सामर्थ्य, समृद्धी व शांती
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=2
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=हा ग्रंथ प्रसिद्ध समाजसुधारक श्रीमती ॲनी बेझंट (Mrs. Annie Besant) यांना आदरपूर्वक समर्पित करण्यात आला असून यात त्यांचे एक चित्र जोडलेले आहे. प्रस्तावनेत गोव्याचे स्वनानंद-सम्राट दिगंबरदास शर्मा आणि महानुभव रामचंद्र विनायक कुलकर्णी यांच्याकडून मिळालेल्या अनपेक्षित मदतीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख आहे.
|Footer=यात २१ डिसेंबर १९१५ रोजी बेळगाव येथे जाहीर केलेला 'नव-विचार-प्रवर्तक मंडळाचा' कार्यचालन जाहीरनामा समाविष्ट आहे, ज्याचे सचिव एस. एस. लोटलीकर होते.
}}
[[वर्ग:Marathi-language books]]
ek5nlfqlcv5roizmfhathuhgodt7tzq
232246
232245
2026-06-14T17:17:23Z
Annni07
6055
232246
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=सामर्थ्य, समृद्धी व शांती
|Language=mr
|Volume=
|Author=[[d:Q140135822{{!}}सीताराम शिवराम लोटलीकर]]
|Translator=[[d:Q140135822{{!}}सीताराम शिवराम लोटलीकर]]
|Editor=[[d:Q140199884|श्रीकृष्णनीलकंठ चापेकर]] (ग्रंथ निरीक्षक व प्रस्तावना लेखक)
|Illustrator=
|School=
|Publisher=[[d:Q140135822|एस. एस. लोटलीकर]] (नव-विचार-प्रवर्तक मंडळ)
|Address=खानापूर-बेळगाव, कर्नाटक, भारत
|Year=1915
|Key=सामर्थ्य, समृद्धी व शांती
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=2
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=हा ग्रंथ प्रसिद्ध समाजसुधारक श्रीमती ॲनी बेझंट (Mrs. Annie Besant) यांना आदरपूर्वक समर्पित करण्यात आला असून यात त्यांचे एक चित्र जोडलेले आहे. प्रस्तावनेत गोव्याचे स्वनानंद-सम्राट दिगंबरदास शर्मा आणि महानुभव रामचंद्र विनायक कुलकर्णी यांच्याकडून मिळालेल्या अनपेक्षित मदतीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख आहे.
|Footer=यात २१ डिसेंबर १९१५ रोजी बेळगाव येथे जाहीर केलेला 'नव-विचार-प्रवर्तक मंडळाचा' कार्यचालन जाहीरनामा समाविष्ट आहे, ज्याचे सचिव एस. एस. लोटलीकर होते.
}}
[[वर्ग:Marathi-language books]]
e9lueeiylgyfv4lxax55az0vn5smcs6
232265
232246
2026-06-15T07:56:19Z
सुबोध कुलकर्णी
1231
232265
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[d:Q140200712|सामर्थ्य, समृद्धी व शांती]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[d:Q140135822{{!}}सीताराम शिवराम लोटलीकर]]
|Translator=[[d:Q140135822{{!}}सीताराम शिवराम लोटलीकर]]
|Editor=[[d:Q140199884|श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर]] (ग्रंथ निरीक्षक व प्रस्तावना लेखक)
|Illustrator=
|School=
|Publisher=[[d:Q140135822|एस. एस. लोटलीकर]] (नव-विचार-प्रवर्तक मंडळ)
|Address=खानापूर-बेळगाव, कर्नाटक, भारत
|Year=1915
|Key=सामर्थ्य, समृद्धी व शांती
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=2
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=हा ग्रंथ प्रसिद्ध समाजसुधारक श्रीमती ॲनी बेझंट (Mrs. Annie Besant) यांना आदरपूर्वक समर्पित करण्यात आला असून यात त्यांचे एक चित्र जोडलेले आहे. प्रस्तावनेत गोव्याचे स्वनानंद-सम्राट दिगंबरदास शर्मा आणि महानुभव रामचंद्र विनायक कुलकर्णी यांच्याकडून मिळालेल्या अनपेक्षित मदतीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख आहे.
|Footer=यात २१ डिसेंबर १९१५ रोजी बेळगाव येथे जाहीर केलेला 'नव-विचार-प्रवर्तक मंडळाचा' कार्यचालन जाहीरनामा समाविष्ट आहे, ज्याचे सचिव एस. एस. लोटलीकर होते.
}}
csodqcx738nxyytxd7y9ne9pwynxogh
अनुक्रमणिका:संयोगजन्यरोग.pdf
106
110689
232254
2026-06-15T04:50:04Z
Annni07
6055
नवीन पान ""
232254
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title={{Q140216494|संयोगजन्यरोग ह्यांचें वर्णन व चिकित्सा ह्यांविषयीं ग्रंथ}}
|Language=mr
|Volume=
|Author=[[d:Q140006931|विश्राम रामजी घोले]]
|Translator=[[d:Q140006931|विश्राम रामजी घोले]]
|Editor=गणेश हरी व आपाजी विनायक (ग्रंथ शुद्धीकरण साहाय्य)
|Illustrator=
|School=
|Publisher=[[d:Q140006931|विश्राम रामजी घोले]]
|Address=मुंबई (बॉम्बे), महाराष्ट्र, भारत
|Year=1865
|Key=संयोगजन्यरोग ह्यांचें वर्णन व चिकित्सा ह्यांविषयीं ग्रंथ
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=लेखक हे ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे.जे. हॉस्पिटल येथील 'बॉम्बे मेडिकल एस्टॅब्लिशमेंट'चे सहाय्यक औषधविक्रेते (Assistant Apothecary) होते. हा ग्रंथ ग्रँट मेडिकल कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक डॉ. हर्बर्ट गिराउड, एम.डी. यांना आदरपूर्वक समर्पित आहे. याचे पुनरावलोकन डॉ. भिकाजी अमृत आणि डॉ. सखाराम अर्जुन यांनी केले आहे. या प्रतीवर 'आनंद ना. कुंभार, सोलापूर' यांचे टपाल तिकीट आहे.
|Footer=सहज उपलब्धतेसाठी औषधांची नावे मूळ लॅटिन भाषेत ठेवली आहेत. या पुस्तकांची विक्री तत्कालीन प्रसिद्ध 'आत्माराम सगुण' यांच्या दुकानात होत असे.
}}
[[वर्ग:Marathi-language books]]
45xwgbz0qf9ijpjm6aofejatzi4m4yc
232264
232254
2026-06-15T07:50:00Z
सुबोध कुलकर्णी
1231
232264
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[d:Q140216494|संयोगजन्यरोग ह्यांचें वर्णन व चिकित्सा ह्यांविषयीं ग्रंथ]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[d:Q140006931|विश्राम रामजी घोले]]
|Translator=[[d:Q140006931|विश्राम रामजी घोले]]
|Editor=गणेश हरी व आपाजी विनायक (ग्रंथ शुद्धीकरण साहाय्य)
|Illustrator=
|School=
|Publisher=[[d:Q140006931|विश्राम रामजी घोले]]
|Address=मुंबई (बॉम्बे), महाराष्ट्र, भारत
|Year=1865
|Key=संयोगजन्यरोग ह्यांचें वर्णन व चिकित्सा ह्यांविषयीं ग्रंथ
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=लेखक हे ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे.जे. हॉस्पिटल येथील 'बॉम्बे मेडिकल एस्टॅब्लिशमेंट'चे सहाय्यक औषधविक्रेते (Assistant Apothecary) होते. हा ग्रंथ ग्रँट मेडिकल कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक डॉ. हर्बर्ट गिराउड, एम.डी. यांना आदरपूर्वक समर्पित आहे. याचे पुनरावलोकन डॉ. भिकाजी अमृत आणि डॉ. सखाराम अर्जुन यांनी केले आहे. या प्रतीवर 'आनंद ना. कुंभार, सोलापूर' यांचे टपाल तिकीट आहे.
|Footer=सहज उपलब्धतेसाठी औषधांची नावे मूळ लॅटिन भाषेत ठेवली आहेत. या पुस्तकांची विक्री तत्कालीन प्रसिद्ध 'आत्माराम सगुण' यांच्या दुकानात होत असे.
}}
fdt7mnqrbna5au3ao56z1jnths1186v
अनुक्रमणिका:दुर्व्यसननिषेधाष्टक.pdf
106
110690
232257
2026-06-15T05:35:46Z
Annni07
6055
नवीन पान ""
232257
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[d:Q140217418|पद्यात्मक दुर्व्यसननिषेधाष्टक]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[d:Q140010132|बळवंत खंडूजी पारख]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=[[d:Q140217215|तुकाराम जावजी]]
|Address=मुंबई (बॉम्बे), महाराष्ट्र, भारत
|Year=1896
|Key=पद्यात्मक दुर्व्यसननिषेधाष्टक
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=हे पुस्तक ऐतिहासिक 'निर्णय सागर' छापखान्याचे मालक तुकाराम जावजी यांनी मुद्रित व प्रकाशित केले आहे. १८६७ च्या अधिनियम २५ अन्वये हे पुस्तक नोंदणीकृत असून, प्रकाशकाचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. या प्रतीवर 'राष्ट्रीय ग्रंथालय, कलकत्ता' (National Library, Calcutta) यांचा १३-९-५७ रोजीचा ऐतिहासिक अभिलेखीय शिक्का आहे.
|Footer=पुस्तकाची मूळ विक्री किंमत ६ आणे इतकी होती.
}}
[[वर्ग:Marathi-language books]]
gvc19pulbd4h301z4qg8svp1zr26dez
232258
232257
2026-06-15T05:36:04Z
Annni07
6055
232258
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[d:Q140217418|पद्यात्मक दुर्व्यसननिषेधाष्टक]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[d:Q140010132|बळवंत खंडूजी पारख]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=[[d:Q140217215|तुकाराम जावजी]]
|Address=मुंबई (बॉम्बे), महाराष्ट्र, भारत
|Year=1896
|Key=पद्यात्मक दुर्व्यसननिषेधाष्टक
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=2
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=हे पुस्तक ऐतिहासिक 'निर्णय सागर' छापखान्याचे मालक तुकाराम जावजी यांनी मुद्रित व प्रकाशित केले आहे. १८६७ च्या अधिनियम २५ अन्वये हे पुस्तक नोंदणीकृत असून, प्रकाशकाचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. या प्रतीवर 'राष्ट्रीय ग्रंथालय, कलकत्ता' (National Library, Calcutta) यांचा १३-९-५७ रोजीचा ऐतिहासिक अभिलेखीय शिक्का आहे.
|Footer=पुस्तकाची मूळ विक्री किंमत ६ आणे इतकी होती.
}}
[[वर्ग:Marathi-language books]]
22yt8o8nk7ruyf97211kzijj5mdc46a
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/२८
104
110691
232262
2026-06-15T06:01:51Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रचंड वृक्ष बनला व त्याच्या शाखा व पारंब्या सर्व हिंदुस्तानभर पसरल्या. महाराष्ट्रांतील कविमंडळानें व संतमंडळानें ज्या उपदेशानें महाराष्ट्रांतील जनमनाची मशागत केली त्या उपद..."
232262
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगडं व समर्थ रामदास.|२३}}
{{rule}}</noinclude>प्रचंड वृक्ष बनला व त्याच्या शाखा व पारंब्या सर्व हिंदुस्तानभर पसरल्या. महाराष्ट्रांतील कविमंडळानें व संतमंडळानें ज्या उपदेशानें महाराष्ट्रांतील जनमनाची मशागत केली त्या उपदेशाचे स्वरूप कै. माधवरावानी खालीलप्रमाणे दिले आहे.
<br>{{gap}}प्रथमतः या सर्व मंडळीनीं मराठीची तरफदारी करून ती भाषा ज्ञानदानाची भाषा करून टाकली. त्यापूर्वी सर्व ज्ञान संस्कृत भाषेत सांठविलेलें असे व संस्कृताच्याच द्वारा ज्ञान मिळविण्याची सोय असे. पण या
काविमंडळानें संस्कृतांतले ज्ञानभांडार प्राकृतांत आणलें व बहुजनसमाजांत ज्ञानाचा प्रसार केला. संस्कृत म्हणजे देवानें केलली भाषा व प्राकृत म्हणजे हलकी भाषा हा समज त्यांनीं पार खोडून टाकला.
{{block center|<poem>'एक म्हणती मराठें काय । हें तों भल्यानें ऐकों नये ।
तीं मूर्खे नेणती सोय । अर्थान्वयाची'॥ दासबोध.</poem>}}
{{gap}}या कविमंडळानें जातिभेदाचें प्रस्थ पुष्कळच कमी केलें. आधीं महार मांगापासून सर्व जातींत कवि व संत झाले व ते एकमेकांना आदराने व प्रेमानें वागवीत. सर्व मनुष्यें देवाचीं लेंकरें आहेत. देवापुढे सर्व सारखीं आहेत.
<br>{{gap}}सर्वांना देवाची भक्ति करण्याचा सारखाच अधिकार आहे; या गोष्टी त्यांनी प्रतिपादन केल्या व आपल्या भक्तिपंथांत त्या त्यांनी अंमलांतही आणल्या. त्याचप्रमाणे स्त्रिया व कुटुंब यांबद्दलही त्यांनी आदर उत्पन्न केला. धर्म निव्वळ बाह्यविधींत व कर्मकांडांत नाहीं तर तो तनमनधनेंकरून देवाची भक्ति करण्यांत आहे हे त्यांनीं प्रतिपादन केलें व सर्व देव एकच व तो सर्वा आधी आहे असे दाखवून मूर्तिपूजेचा बडीजाव कमी केला.
{{block center|<poem>"कुलाल पात्रापूर्वी आहे । पात्र कांहीं कुलालं नव्हे ।
तैसा देव पूर्वीच आहे । पाषाण सर्वथा ॥ "</poem>}}
{{gap}}सारांश ज्ञानेश्वरापासून रामदासापर्यंतच्या सर्व साधुसंतांनीं व कवींनीं जनसमाजास ज्ञानी करून सोडलें व त्या योगे त्यांच्या मनांत एकोपा दायित्व यांच्या भावना उद्भूत केल्या. या मंडळींनीं जी अशा तऱ्हेने समाजात धार्मिक व सामाजिक सुधारणा घडवून आणली त्यायोगें शिवा- राजकारणास जोर आला व तें राजकारण सिद्ध होऊ शकलें असें-<noinclude></noinclude>
sfanq5c6xi0c6f8m97sc8t532jdpl78
232263
232262
2026-06-15T06:02:16Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
232263
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगडं व समर्थ रामदास.|२३}}
{{rule}}</noinclude>प्रचंड वृक्ष बनला व त्याच्या शाखा व पारंब्या सर्व हिंदुस्तानभर पसरल्या. महाराष्ट्रांतील कविमंडळानें व संतमंडळानें ज्या उपदेशानें महाराष्ट्रांतील जनमनाची मशागत केली त्या उपदेशाचे स्वरूप कै. माधवरावानी खालीलप्रमाणे दिले आहे.
<br>{{gap}}प्रथमतः या सर्व मंडळीनीं मराठीची तरफदारी करून ती भाषा ज्ञानदानाची भाषा करून टाकली. त्यापूर्वी सर्व ज्ञान संस्कृत भाषेत सांठविलेलें असे व संस्कृताच्याच द्वारा ज्ञान मिळविण्याची सोय असे. पण या
काविमंडळानें संस्कृतांतले ज्ञानभांडार प्राकृतांत आणलें व बहुजनसमाजांत ज्ञानाचा प्रसार केला. संस्कृत म्हणजे देवानें केलली भाषा व प्राकृत म्हणजे हलकी भाषा हा समज त्यांनीं पार खोडून टाकला.
{{block center|<poem>'एक म्हणती मराठें काय । हें तों भल्यानें ऐकों नये ।
तीं मूर्खे नेणती सोय । अर्थान्वयाची'॥ दासबोध.</poem>}}
{{gap}}या कविमंडळानें जातिभेदाचें प्रस्थ पुष्कळच कमी केलें. आधीं महार मांगापासून सर्व जातींत कवि व संत झाले व ते एकमेकांना आदराने व प्रेमानें वागवीत. सर्व मनुष्यें देवाचीं लेंकरें आहेत. देवापुढे सर्व सारखीं आहेत.
<br>{{gap}}सर्वांना देवाची भक्ति करण्याचा सारखाच अधिकार आहे; या गोष्टी त्यांनी प्रतिपादन केल्या व आपल्या भक्तिपंथांत त्या त्यांनी अंमलांतही आणल्या. त्याचप्रमाणे स्त्रिया व कुटुंब यांबद्दलही त्यांनी आदर उत्पन्न केला. धर्म निव्वळ बाह्यविधींत व कर्मकांडांत नाहीं तर तो तनमनधनेंकरून देवाची भक्ति करण्यांत आहे हे त्यांनीं प्रतिपादन केलें व सर्व देव एकच व तो सर्वा आधी आहे असे दाखवून मूर्तिपूजेचा बडीजाव कमी केला.
{{block center|<poem>"कुलाल पात्रापूर्वी आहे । पात्र कांहीं कुलालं नव्हे ।
तैसा देव पूर्वीच आहे । पाषाण सर्वथा ॥ "</poem>}}
{{gap}}सारांश ज्ञानेश्वरापासून रामदासापर्यंतच्या सर्व साधुसंतांनीं व कवींनीं जनसमाजास ज्ञानी करून सोडलें व त्या योगे त्यांच्या मनांत एकोपा दायित्व यांच्या भावना उद्भूत केल्या. या मंडळींनीं जी अशा तऱ्हेने समाजात धार्मिक व सामाजिक सुधारणा घडवून आणली त्यायोगें शिवा- राजकारणास जोर आला व तें राजकारण सिद्ध होऊ शकलें असें-<noinclude></noinclude>
a34ukn9he3fja05hx9unhptqr8ubgxm
अनुक्रमणिका:शिव-चरित्र-निबंधावली.pdf
106
110692
232268
2026-06-15T11:39:04Z
FailedEngineer2027
6067
नवीन पान ""
232268
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=शिव-चरित्र-निबंधावली
|Language=mr
|Volume=
|Author=
|Translator=
|Editor=द. वि. आपटे, न. चिं. केळकर
|Illustrator=
|School=
|Publisher=शिवचरित्र कार्यालय
|Address=
|Year=1922
|Key=शिव-चरित्र-निबंधावली
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=3
|Progress=X
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
nlsm50flva928hc1gdsnc29j98ga4wx