विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.7
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/३१
104
69252
232386
232371
2026-06-18T14:41:14Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232386
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{{left|(सव्वीस)}} {{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}}
{{gap}}'सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक' हा जोतीरावांचा ग्रंथ त्यांच्या 'मानवविषयक संकल्पनेचे' (Concept of Man) समग्र दर्शन घडवितो. हा ग्रंथ म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा एक एक जाहीरनामाच आहे, जणू विश्वकुटुंबवादाची ती एक गाथाच आहे, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रेरणेस नि बुद्धीस योग्य वाटेल तो धर्म स्वीकारून गुण्यागोविंदाने नांदावे, असे उपदेशिणारी विशाल धर्मसहिष्णुतेची ती जणू नवगीताच आहे! धार्मिक सहिष्णुता, मानवी प्रतिष्ठा आणि मानवी समानता ही मूल्ये या ग्रंथाची मूलाधारप्रेरणा आहे. मानव हीच सामाजिक मूल्यांची आणि समाजधारणेची मापकाठी असावी, हा विचार त्यात प्राणभूत आहे. सर्व भूखंडावरील लोकांनी एकजुटीने, एकमताने, सर्वांचे सारखे हक्क मान्य करून, देशभिमान आणि धर्माभिमान, यांच्या पलीकडे पाहावे, ही या ग्रंथांची प्रमुख शिकवण आहे. हा ग्रंथ अनेक विधायक सूचनांनी ओतप्रोत भरलेला आहे 'गुलामगिरी' हा ग्रंथ लिहून जोतीरावांनी जुन्या समाजरचनेवर, जुन्या अवतारकल्पनांवर, जुन्या मूल्यांवर घणाघाती हल्ला चढविला आणि सत्यशोधक चळवळीचा पाया घातला, तर 'सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक' लिहून त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानमंदिरावर विधायक स्वरूपाचा कळस चढविला.<br>
{{gap}}जोतीरावांनी त्या विषम काळात अस्पृश्यांचे दुःख ज्या आत्मीयतेने वेशीवर टांगले, ती आत्मीयता खरोखर असामान्य म्हटली पाहिजे. जोतीराव हे अस्पृश्य वर्गापैकी नव्हते. ते माळी समाजातले होते. त्या काळच्या मानाने त्यांचे शिक्षणही व्यवस्थित झालेले होते. चार लब्धप्रतिष्ठितांप्रमाणे लोकक्षोभाला भिऊन त्यांनी मध्यमक्रम स्वीकारला असता, तर समाजाने त्यांना डोक्यावर घेतले असते. पण शतकानुशतके माणुसकीला पारख्या झालेल्या समाजाविषयीची त्यांची करुणा जातिवंत होती. अस्पृश्यांना आणि अन्य पददलितांना ते आपल्या कुटुंबातलेच, आपल्या रक्तामांसाचे मानीत. जातिभेद आणि चातुर्वर्ण्य या संस्था त्यांना सर्वस्वी अमान्य होत्या. त्यामुळे अस्पृश्यांची अस्पृश्यता काढून टाकून, त्यांना पंचम वर्ग म्हणावे, की दुसरे काही नाव द्यावे, असा पर्याय वा पळवाट त्यांच्या समानतेच्या तत्त्वज्ञानात बसण्यासारखी नव्हती.<br>
{{gap}}जोतीरावांनी अंगीकारलेल्या कित्येक सुधारणा आज समाजाने स्वीकारल्या आहेत. स्त्रीशिक्षणाविषयी आता मतभेद राहिलेले नाहीत. पतित स्त्रियांचा उद्धार आणि अनाथ अर्भकांचे संवर्धन यांविषयी त्यांनी घालून दिलेला आदर्श आज समाजाने पचवून टाकलेला आहे. केशवपनाचा प्रश्न आज गतार्थ झाला आहे. पण त्या काळी त्यांना नापितांकडून केशवपनाविरुद्ध बंड करवावे लागले नि त्याचे पडसाद लंडनमध्येही उमटले. विधवाविवाहाला उत्साहाने उत्तेजन देताना त्यांना लोकनिंदा सहन करावी लागली. त्या काळच्या सुशिक्षित सुधारकांना जोतीरावांचा पाठिंबा असे. पण कृतीची वेळ येताच बहुतेक प्रसंगी ते लोक कचखाऊ ठरत, म्हणून त्यांच्याविरुद्ध जोतीरावांचा विशेष कटाक्ष दिसतो.<br/><noinclude></noinclude>
devbw6twxu8h15skdyp5hy6bmw19cs4
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/३२
104
69253
232387
230976
2026-06-18T14:42:05Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232387
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /><br/>{{left|संपादकांचे निवेदन}} {{right|(सत्तावीस)}}</noinclude>
जातिभेदाबाबत त्यांची भूमिका सडेतोड होती, उच्च वर्णीय सुधारक या प्रश्नाला प्रायः बगल देत, वा त्याची उपेक्षा करीत. जोतीरावांची अशी भूमिकाच होती की, जातिभेदाचे निर्मूलन झाल्याशिवाय तत्कालीन राष्ट्रसभेने पुढे ठेवलेले एकराष्ट्रीयत्वाचे (One Nation) ध्येय प्रत्यक्षात उतरणे सुतराम अशक्य आहे. जो आपल्या धर्मबांधवांना आणि देशबांधवांना समान मानीत नाही, तो देशभक्त कसला, असा त्यांचा मूलभूत सवाल होता.<br>
{{gap}}भारतात कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी त्यांनीच प्रथम टाहो फोडला. स्त्री-शूद्रांच्या शिक्षणाची सुधारलेल्या इंग्रजी राज्यांतही परवड होत आहे, हे त्यांनीच प्रथम मांडले. शिक्षण हे वरिष्ठ वर्गातून झिरपत झिरपत कनिष्ठ वर्गापर्यंत पोहोचेल, या तत्त्वाला त्यांचा विरोध होता. तसेच स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे, 'गुरूणां माता गरीयसी', या वचनाची थोरवी त्यांना पटलेली होती. भारतीय परंपरेने स्त्री-शूद्रांना एकाच दावणीत बांधून स्त्रियांना शिक्षणापासून वंचित केले होते, त्यांना अज्ञानांधकारात पिचत ठेवले होते. जोतीरावांनी भारतीय स्त्री-शूद्रांस शिक्षणाचे दरवाजे खुले व्हावे, म्हणून सर्वप्रथम जिवाचे रान केले. स्त्रीशिक्षणाच्या बाबतीत जोतीरावांनी जे युगप्रवर्तक कार्य केले, त्याविषयी तत्कालीन परकी सरकारनेही त्यांचा सत्कार केला. हे त्यांनी १८५२ साली केले, हे येथे ध्यानात घेणे अवश्य आहे. तेव्हा न्या. रानडे हे केवळ दहा वर्षांचे होते. सामाजिक धारणेचे कैवारी गोपाळ गणेश आगरकर आणि स्त्रियांच्या विद्यापीठाचे संस्थापक धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या अबलोन्नतीसाठी पुढील काळात झटलेल्या सुधारकांचा तेव्हा जन्मही झालेला नव्हता. उभ्या भारतात स्त्री-शूद्रांच्या उद्धारकार्याचा श्रीगणेशा जोतीरावांनीच केला. समाज सुधारणेचा असा हा गजर प्रथम महाराष्ट्रात झाला. त्यांच्या या कार्यारंभाने महाराष्ट्रात नवयुगाची सुप्रभात झाली; एवढेच नव्हे, तर त्यातूनच भारतीय समाजक्रांतीला प्रारंभ झाला, असे म्हणणे भाग आहे.<br>
{{gap}}शूद्रातिशूद्रांवर विद्या शिकण्याबाबत जी आटोकाट बंदी शतकानुशतके घालण्यात आलेली होती, ती त्यांच्या दुरवस्थेचे आदिकारण होय, असे जोतीरावांचे विचारपूर्वक बनलेले मत होते. इंग्रजी राज्यामुळे या शतकानुशतकाच्या अन्यायाचे परिमार्जन होण्याची संधी प्राप्त झाली होती. पूर्वीच्या सामाजिक चौकटीत ज्या प्रकारची धार्मिक पिळवणूक, सामाजिक विषमता नि अन्याय ही अंगभूत होती, तशी ती नव्या राजवटीत नव्हती. नव्या राजवटीत समानसंधीला वाव होता, शूद्रातिशूद्रांना स्वतःची उन्नती करून घेण्याची आशा निर्माण झाली होती. त्यामुळे इंग्रजी राज्याविषयीची कृतज्ञता त्यांनी अनेकदा व्यक्त केलेली आहे. मात्र त्यावरून जोतीराव हे इंग्रजधार्जिणे होते, असे मुळीच म्हणता येणार नाही. ब्रिटिश राज्य आज ना उद्या जाणार आहे, असे त्यांनी स्पष्टपणे म्हणून ठेवले आहे. ब्रिटिश महाराज्यपालाच्या भेटीप्रीत्यर्थ पुणे नगरपालिकेने खर्च करू नये, असे विरोधी मत, एकंदर बत्तीस सभासदांपैकी एकट्या जोतीरावांनीच व्यक्त केलेले होते. मंडईच्या नव्या इमारतीस<br/><noinclude></noinclude>
ntax47tzmv16xcjyw89g2yfmbrq7215
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/३३
104
69254
232388
230977
2026-06-18T14:43:40Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232388
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{left|महात्मा फुले समग्र वाङ्मय}} {{right|(अठ्ठावीस)}}</noinclude>
रे मार्केट' असे तत्कालीन राज्यपालांचे नाव देण्यात आले होते. तरीसुद्धा त्या इमारतीस
असलेला जोतीरावांचा सक्त विरोध थांबला नाही, त्यामुळे ब्रिटिश अधिकारी त्यांच्यावर
रुष्ट व्हायचे, ते झालेच. तेव्हा निस्पृहता आणि निर्भयता हे त्याच्या अंगचे गुण ब्रिटिश
अधिकाऱ्यांच्या बाबतीत कसे अबाधित होते, याची साक्ष पटल्यावाचून राहत नाही. ड्यूक
ऑफ कनॉट यांच्या सत्कारप्रसंगी त्यांनी केलेले भाषण संस्मरणीय आहे. "आपल्यासमोर
रेशमी कापडे नि अलंकार परिधान केलेले श्रीमंत, सरदार नि जहागिरदार पाहून रयतेविषयी
आपण मत बनवू नये. खरा हिंदुस्थान पहावयाचा असेल, तर मजबरोबर खेड्यांत चला, "
असे त्यांनी युवराजांना स्पष्टपणे सांगितले.<br/>
{{gap}}जोतीरावांनी जातिसंस्था, परंपरागत रूढी, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक विषमता
यांविरुद्धच कार्य केले, असे नाही; तर शिक्षणक्षेत्रातही त्यांनी मोलाचे कार्य केले. हंटर
शिक्षण आयोगाला त्यांनी जे निवेदन सादर केले त्यात त्यांची शैक्षणिक मते स्पष्ट झालेली
आहेत. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले जावे, ही मागणी करणारे जोतीराव हे पहिले
भारतीय होत. प्रशिक्षित शिक्षकांच्या वेतनात वाढ करावी, कनिष्ठ वर्गीयातील शिक्षक
तयार करावे, खेड्यातील मुलांना शेतकीचे आणि तांत्रिक शिक्षण द्यावे, शेतकीच्या प्रत्यक्ष
शिक्षणासाठी 'आदर्श शेता'ची योजना आखावी अशा मौलिक सूचना या निवेदनात त्यांनी
केलेल्या आहेत. आपल्या राष्ट्राच्या भाषेचा प्रश्नही त्यांच्या दूरदृष्टीतून सुटलेला नव्हता.
मातृभाषा (मराठी), हिंदी आणि इंग्रजी, असा त्रिभाषासूत्राचाच तोडगा त्यांनी सुचविलेला
होता.<br/>
{{gap}}'शेतकऱ्यांचा असूड' हा जोतीरावांचा ग्रंथ अनेक दृष्टींनी अपूर्व आहे. या ग्रंथात त्यांनी
शेतकऱ्यांच्या अवनतस्थितीचे विदारक चित्र रेखाटून त्या अवनतस्थितीची मूलगामी
मीमांसा केली आहे. आणि ती सुधारण्यासाठी सर्वांगीण उपाययोजनाही सुचविली आहे.
जमिनीची सुधारणा कशी करावी, धरणे, पाटबंधारे कोठे बांधावे, गुरांची उत्तम निपज
कशी करावी, जमिनीची धूप थांबविण्यासाठी काय करावे, शांततेच्या काळात
शेतीसुधारणेच्या विधायक कार्यासाठी सैनिकांचा उपयोग कसा करता येईल, अन्य
सुधारलेल्या राष्ट्रांत शेती कशी केली जाते, याचे शिक्षण देऊन भारतीय शेतकऱ्यांच्या
मुलांना परदेशांत पाठवून आणणे कसे अगत्याचे आहे, शेतकीची वार्षिक प्रदर्शने भरवून
उत्तम पीक काढणाऱ्या शेतकऱ्यास पारितोषिके देणे कसे उपायकारक ठरणारे आहे.
यांसारख्या विधायक सूचनांबरोबर शेतातून चोऱ्या झाल्यास पोलिसांना दंड का केला
पाहिजे, वाढीविढी करणाऱ्या सावकार व्यापाऱ्यांवर करडी नजर कशी ठेवली पाहिजे,
ब्रिटिश भांडवलदारांचे अवाच्या सव्वा व्याज का बंद केले पाहिजे, शेतीस अवश्य असलेल्या
पशुधनाच्या रक्षणासाठी गोवधबंदी कशी आवश्यक आहे, शेतकऱ्यांच्या मुलांचा नैतिक
अधःपात होऊ नये म्हणून कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत अशांसारख्या<br/><noinclude></noinclude>
qa5gwxuwsygocqf1vu4glnam653w0wk
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/३४
104
69255
232389
230978
2026-06-18T14:44:15Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232389
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{left|संपादकांचे निवेदन}} {{right|(एकोणतीस)}}</noinclude>
संरक्षक सूचनाही या ग्रंथात अनेक आहेत. या सूचनांतील अनुभवी सूक्ष्मपणा ध्यानात घेतला, म्हणजे जोतीरावांचा पारदर्शक दृष्टीचा पुरेपूर प्रत्यय येतो.<br>
{{gap}}सर्वस्वी कंगाल बनलेल्या शेतकऱ्यात असंतोष माजू नये, म्हणून शेतकऱ्याला संरक्षण देण्याच्या दृष्टीने इंग्रज सरकार जे कायदे करीत होते, त्यांचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा, म्हणून जोतीराव जागरूक असत. तत्कालीन सार्वजनिक सभेसारख्या संस्था आणि प्रागतिक वृत्तपत्रे, एकीकडे शेतकऱ्यांविषयी शाब्दिक सहानुभूती दर्शवीत; पण प्रत्यक्षात मात्र सावकार आणि जमीनदार यांच्या बाजूचेच समर्थन करीत. हार्ट डेव्हीसने पुढे मांडलेल्या 'इन्सॉल्व्हन्सी' विधेयकावर प्रागतिक इंदुप्रकाशने विरोधी टीकाच केली होती. या प्रागतिक म्हणविणाऱ्या मंडळींनाही अशा कायद्यांमधून समाजवादाचे भूत भेडसावीत होते. भारतीय शेतकऱ्याच्या दुःखाला जोतीरावांनी वाचा फोडली. त्यांनी कामगारवर्गाचे दुःखही वेशीवर टांगले. जोतीरावांच्या तालमीत तयार झालेल्या सत्यशोधक समाजाच्या पुढाऱ्यांनीच भारतीय चळवळीस प्रारंभ केला, हे ऐतिहासिक सत्य आहे.<br>
{{gap}}सत्यशोधक चळवळ हीच भारतातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेली पहिली चळवळ होती, हेही सत्य इतिहासाला नमूद करावे लागेल. ही चळवळ म्हणजे खेडुतांना शिक्षण नि ज्ञान देऊन, त्याच्या ठायी वसत असलेली अज्ञानाची नि पूर्वग्रहांची जळमटे झटकून टाकून, आधुनिक संस्कृतीचे आणि ज्ञानाचे लोण त्यांच्यापर्यंत पोहोचविणारी एक सामाजिक प्रबोधिनी होती. जोतीरावांच्या काळी सत्यशोधक चळवळीला ब्राह्मणेतर चळवळीचे स्वरूप नव्हते. जोतीरावांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केला नाही. शासनसंस्था, आर्थिक व्यवहारांची साधने, सामाजिक आणि धार्मिक सत्ता ही सर्व ब्राह्मणांच्या हाती असल्यामुळे त्या चळवळीचे स्वरूप वरवर पाहता ब्राह्मणेतरी आहे असे दिसे. जोतीरावांच्या काळानंतर अनेक वर्षांनी त्या चळवळीला ब्राह्मणेतर चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले.<br>
{{gap}}जोतीरावांची भाषा रांगडी आणि तिखट आहे. पल्लेदार आणि गुंतागुंतीची वाक्ये लीलेने पेलीत आणि जळजळीत विशेषणांचे चमकारे ओढीत ती घोडदौड करीत पुढे जाते. त्यांच्या कार्याच्या क्रांतिकारकत्वाची आणि लेखणीच्या बोचक धारदारपणाची प्रतिक्रिया आपणास निबंधमालाकारांच्या त्यांच्यावरच्या टीकेत पाहायला सापडते. मालाकारांच्या लेखणीचे कर्तृत्व आणि स्फूर्तिदायकत्व अजोड होते. त्यामुळे त्यांच्या जोतीरावांवरील टीकेचीच छाप काही काळपर्यंत महाराष्ट्राच्या मनावर बसलेली होती आणि साहजिकच जोतीरावांच्या कार्याविषयीचे गैरसमज वाढीस लागलेले होते. परंतु मालाकारांच्या विचारसरणीत सामाजिक दृष्टिकोणाचा आणि मानवी मूल्यांचा अभाव होता, ही गोष्ट आता उघड झालेली आहे. मालाकारांवर जोतीरावांनी फारसे काही लिहिलेले नाही, त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयी जो एकमेव उल्लेख जोतीरावांच्या लेखनात येतो, तो त्यांना भलेपणा देणाराच आहे, ही गोष्ट येथे स्पष्ट केली पाहिजे.<br/><noinclude></noinclude>
mg7n36o3kuym015n61n1wq1zsbg1g5g
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/३५
104
69256
232390
230979
2026-06-18T14:44:48Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232390
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{left|(तीस)}} {{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}}</noinclude>
जोतीरावांनी पददलितांची सुखदुःखे आपली मानली. त्यांच्या राहणीशी ते समरस झाले. त्यांनी शेतकरी आणि नापितांचे संप घडवून आणले. त्यांच्यामध्ये मिळून मिसळून त्यांच्यात जागृती केली. दलितांमध्ये जातीने जीवन कंठण्यास जाण्याची त्यांची सिद्धता, 'सत्यमेव जयते' हा त्यांचा घोष, अस्पृतेच्या निर्मूलनाचा त्यांनी उचललेला विडा, हातातील काठी, साधे कपडे यांवरून ते काही बाबतीत महात्मा गांधीचे अग्रगामी होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.<br>
{{gap}}सारांश, जोतीराव हे महारमांगादी अस्पृश्य गणल्या गेलेल्या पददलितांचे पहिले उद्धारक, पाच हजार वर्षांच्या भारताच्या इतिहासात मुलींसाठी शाळा स्थापन करणारे पहिले भारतीय म्हणून भारतीय स्त्रीशिक्षणाचे जनक, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे आणि हक्कांचे उद्गाते, शेतकरी नि कामकरी यांच्या दुःखाचे नि दारिद्र्याचे निवारण करण्यासाठी चळवळ उभारणारे पहिले पुढारी आणि चातुर्वर्ण्य आणि जातीभेद या संस्थांवर कडाडून हल्ला चढवून, मानवी समानतेची घोषणा करणारे पहिले लोकनेते होते. आधुनिक भारताचे ते पहिले महात्मा आणि 'सत्यमेव जयते' या दिव्य तेजाने भारलेले पहिले सत्यशोधक होत. अशा या नररत्नाचा गौरव म. गांधीनी 'खरा महात्मा' म्हणून करावा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना ‘समाजक्रांतिकारक' म्हणून प्रशंसावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध नि कबीर यांच्याबरोबर त्यांना गुरुत्वाची पदवी अर्पण करावी, यांतच त्यांच्या थोरवीची भव्यता दिसून येते. 'भारतीय समाजक्रांतीचे जनक' आणि 'भारतातील सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेषित' असा त्यांचा थोडक्यात पण सार्थ उल्लेख करता येईल.<br>
{{gap}}जोतीराव हे एक महान ध्येय आहे, महान स्वप्न आहे. लोकशाही ही मानवी समानतेवर, बंधुतेवर आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर अधिष्ठित असली पाहिजे. जसजसे मानवी समानतेचे तत्त्व भारतीय समाजाच्या अंगी बाणेल, तसतशी भारतीय लोकशाही अभेद्य आणि अभंग होईल. मला जे अधिकार आहेत, ते माझ्या अन्य देशबांधवांनाही असलेच पाहिजेत, असे जेव्हा भारतीय जनपद म्हणू लागेल, तेव्हाच जोतीरावांच्या समग्र ग्रंथात त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले, असे यथार्थपणे म्हणता येईल.<br>
{{gap}}काही किरकोळ गोष्टींचे स्पष्टीकरण येथे केले पाहिजे. जोतीराव हे आपले नाव 'जोतीराव' असेच लिहीत, ग्रंथावरही तसेच प्रसिद्ध करीत. त्यांनी 'ज्योतीराव' किंवा 'ज्योतीबा' अशी स्वाक्षरी केल्याचे आढळत नाही. ते मॅट्रिक झाले होते, असा उल्लेख केला जातो. पण तो बरोबर नाही. मॅट्रिकची परीक्षा घेणारे मुंबई विद्यापीठ १८५७ साली स्थापन झाले. जोतीरावांनी १८४८ सालीच विद्यार्जन संपवून आपल्या जीवितकार्याला प्रारंभ केलेला होता. जोतीरावांची जन्मतिथी उपलब्ध नाही. त्यांच्या नातलगांपैकी एक वृद्धा सांगत असे, "जोतीबा म्हणत असत की, शनिवारवाडा जळाला, त्याच्या आदल्या दिवशी<br/><noinclude></noinclude>
3futledxxll266t4dgnfe7y6t98sbow
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/३६
104
69257
232391
230980
2026-06-18T14:45:17Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232391
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{left|संपादकांचे निवेदन}} {{right|(एकतीस)}}</noinclude>
आपण जन्मलो,” ही माहिती खरी असेल, तर त्यांचा जन्मदिन २० फेब्रुवारी १८२८ हा असावा, असे मानता येईल. पुढे मागे कोणा संशोधकास अधिकृत पुरावा मिळाल्यास त्याला दुजोरा मिळेल, म्हणून हे येथे ग्रंथित करून ठेवण्यात येत आहे. परिशिष्ट म्हणून दिलेल्या कालपटात अधिकृत पुराव्याच्या अभावी आम्ही १८२७ हे रूढ जन्मवर्ष गृहीत धरले आहे, या समग्र वाङ्मयातील शिवाजी महाराजांचा 'पवाडा' जोतीरावांनी 'परमहंस सभेचे अध्यक्ष रामचंद्र बाळकृष्ण राणे यांना अर्पण केलेला आहे. परंतु त्यांचे नाव, राम बाळकृष्ण 'जयकर' असे होते. तेव्हा 'राणे' हे आडनाव चुकीने पडलेले दिसते. 'शेतकऱ्याचा असूड' या ग्रंथनामात 'आसूड' असे प्रचलित रूप नाही. याचे कारण त्या ग्रंथाच्या हस्तलिखितावर मोठ्या अक्षरांत 'असूड' असे शीर्षकवजा लिहिलेले आहे आणि मामा परमानंद यांना लिहिलेल्या पत्रातही तसाच उल्लेख आहे. जोतीराव आपल्या अभंगांना 'अखंड' म्हणून संबोधतात. त्यांची काही पद्यरचना शाहिरी धर्तीची असली, तरी बरीचशी स्फूट रचना मराठी संतपरंपरेतील ‘अभंग’ वृत्तातच आहे. मात्र मानवता, सद्विवेक, सदाचार, समता यातून सार्वजनिक सत्य सांगणारा आपला वेगळा आशय स्पष्ट व्हावा, म्हणून वेगळीक सुचविणारे 'अखंड' असे अन्वर्थक अभिधान त्यांनी योजिलेले दिसते.<br>
{{gap}}जोतीराव फुल्यांच्या समग्र वाङ्मयापैकी काही ग्रंथ पुनर्मुद्रित झालेले असल्यामुळे आम्हाला उपलब्ध होते. तथापि ते मूळ स्वरूपात पुनर्मुद्रित झालेले नव्हते. त्यामुळे शक्यतो त्यांच्या ग्रंथांच्या पहिल्या आवृत्त्या मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कामी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे मराठी संशोधन मंडळ आणि पुणे येथील प्रादेशिक ग्रंथालय यांचे आम्हाला बहुमोल साहाय्य झाले. या उभय संस्थांच्या ग्रंथपालांचे आम्ही आभारी आहोत. महात्मा फुले यांच्या चरित्राची जुळवाजुळव करीत असताना पुष्कळशी सामग्री आणि साधने श्री. धनंजय कीर यांनी कष्टपूर्वक गोळा करून जतन करून ठेवली होती. या साधनां- पैकी काही श्री. पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्यासारख्या थोर जोतीबाभक्ताने पुरविली होती. विशेषतः त्यांच्या साहाय्यविना जोतीरावांच्या अखंडातील अमोल बोल अबोलच राहिले असते. तेव्हा श्री. पंढरीनाथ पाटील यांचे ऋण आम्ही प्रकटपणे मान्य करतो. त्याचबरोबर हा ग्रंथ खराखुरा 'समग्र व्हावा' यासाठी नामदार बाळासाहेब देसाई यांनी दाखविलेली कळकळ आम्ही विसरू शकत नाही. प्रा. गं. बा. सरदार आणि प्रा. राम पटवर्धन यांनी अनुक्रमे 'सत्सार क्रमांक १ (अपूर्ण) 'आणि' सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजाविधी' ह्या स्वतःपाशी असलेल्या दुर्मिळ पुस्तिका आम्हाला आनंदाने उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल आम्ही त्यांचेही ऋणी आहोत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या संस्थेचे प्रमुख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या ग्रंथाच्या प्रकाशनासंबंधी जी प्रथमपासून आस्था दाखविली, तीबद्दल त्यांचे आभार मा आमचे कर्तव्यच आहे. मौज मुद्रणालयाचे श्री. विष्णुपंत भागवत आणि त्यांचे सहकारी<br/><noinclude></noinclude>
hdt67wvomr5n50cc54g8wiy2q9jtp9c
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/३७
104
69258
232392
230981
2026-06-18T14:45:53Z
QueerEcofeminist
918
/* Validated */
232392
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" />{{left|(बत्तीस)}} {{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}}</noinclude>
यांनी मुद्रणाच्या बाबतीत दाखविलेल्या आपुलकीबद्दल त्यांचेही आभार मानावे तेवढे थोडेच.<br>
{{gap}}महात्मा फुले यांच्या जीवनाचा कालपट, त्यांचे हस्ताक्षर, त्यांच्या अद्याप अनुपलब्ध राहिलेल्या वाङ्मयाची माहिती, निवडक संदर्भ सूची आणि शब्दसूची देऊन या ग्रंथाचे संपादन, सर्वसामान्य वाचक आणि विशेष अभ्यासक या उभयतांनाही उपयुक्त व्हावे, असा आम्ही यथाशक्ति प्रयत्न केलेला आहे. ग्रंथसंहिता मूळची ठेविली आहे. अर्थबोधाच्या दृष्टीने अडचण पडू नये म्हणून विरामचिन्हांबाबत मात्र आम्ही स्वातंत्र्य घेतले आहे. क्वचित एखाद दुसरा शब्द चौकटी कंसात देऊन न्यून पूर्ण करून घ्यावे लागले आहे.<br>
{{gap}}ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा गांधी यांच्यासारख्यांचे ग्रंथ हे समाजाचे विचारधन आहे, असे मानून ते जनतेला स्वस्तात उपलब्ध करून देण्याचा उपक्रम महाराष्ट्र शासनाने चालविलेला आहे. जोतीराव फुले यांचे ग्रंथही समाजाचे विचारधन आहे असे मानून पुनर्मुद्रित केल्याबद्दल मराठी जनतेला संतोषच वाटेल. जनताजनार्दनासाठी आरंभिलेल्या या स्तुत्य उपक्रमात सहभागी होता आले, याविषयी आम्हाला कृतज्ञता आणि कृतार्थता वाटत आहे.<br>
{{right|धनंजय कीर.}}
{{right|स. गं. मालशे.}}
{{rule|5em}}<br/><noinclude></noinclude>
rf0a3u8mch0rpugjhllmogzc50kkx5w
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/३८
104
69259
232393
230982
2026-06-18T14:46:39Z
QueerEcofeminist
918
/* Validated */
232393
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" /></noinclude>{{center|निवेदन}}
{{gap}}महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने महात्मा फुले यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने त्यांचे समग्र वाङ्मय प्रकाशित करण्याचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे प्रस्तुत प्रकल्पाची योजना तयार केली. या समग्र वाङ्मय ग्रंथाची पहिली आवृत्ती स्व. धनंजय कीर व स्व. डॉ. स. गं. मालशे या दोन विद्वानांनी सिद्ध केली. त्यानंतर त्याच्या एकूण तीन आवृत्त्या निघाल्या. वाचकांचा उदंड प्रतिसाद या वाङ्मय प्रकल्पाला लाभला. नंतरच्या आवृत्तींसाठी त्यावेळचे मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील विद्वान डॉ. य. दि. फडके यांचे संपादन लाभले व त्यांनी आपल्या साक्षेपी वृत्तीने मूळ आवृत्तीमध्ये काही मजकूर नव्याने समाविष्ट केला. डॉ. य. दि. फडके लिहितात त्याप्रमाणे पहिल्या तीन आवृत्तीतील काही उणिवा दूर करण्याच्या दृष्टीने त्यांनी सुधारित चौथ्या आवृत्तीमध्ये काही अस्सल कागदपत्रांचा अंतर्भाव केलेला आहे. त्याचप्रमाणे सुधारित आवृत्तीमध्ये महात्मा फुले यांच्या लेखांची कालक्रमानुसार मांडणी केली आहे. त्यामुळे ही सुधारित पाचवी आवृत्ती सर्व दृष्टीने परिपूर्ण झाली असल्याचे वाचकांना व अभ्यासकांना आढळून येईल.<br>
{{gap}}पूर्वीच्या पाच आवृत्त्यांप्रमाणेच या सुधारित व अद्ययावत आवृत्तीलाही वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल, याची मंडळाला खात्री आहे.<br>
{{right|(मधु मंगेश कर्णिक )}}
{{left|मुंबई}}
{{right|अध्यक्ष,}}
{{left|दिनांक : १४ जुलै २००६.}}
{{right|महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.}}<br/><noinclude></noinclude>
0r24lcniq7p01q7xsnp6t8b9b27960a
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/३९
104
69260
232394
230983
2026-06-18T14:47:03Z
QueerEcofeminist
918
/* Without text */
232394
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="0" user="QueerEcofeminist" /></noinclude><noinclude></noinclude>
6mlrg7ulygc335wsw2ucniib5cytmfy
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/४०
104
69261
232395
230984
2026-06-18T14:49:53Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232395
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{|
|+ '''अनुक्रमणिका'''
|-
|❐ '''पाचव्या आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन''' || (तीन)
|-
|❐ '''महात्मा फुले यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने'''- || (पाच)
|-
|❐ '''चौथ्या आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन''' || (नऊ)
|-
|❐ '''प्रथम आवृत्तीची प्रस्तावना''' || (बारा)
|-
|❐ '''अध्यक्षांचे निवेदन''' || (एकवीस)
|}
<br/>
छायाचित्रे :-
(१) महात्मा फुले (२) मराठी हस्ताक्षर (३) इंग्रजी हस्ताक्षर<br/>
(४) मोडी हस्ताक्षर, (५ ते १०) उईल पत्र<br/>
(११) चि. यशवंतासह म. फुले (१२) महात्मा फुले वाडा<br/>
(१) नाटक : तृतीय रत्न (१८५५)
(२) पवाडा : छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा (जून १८६९)
(३) पवाडा : विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी (जून १८६९)
(४) ब्राह्मणांचे कसब (१८६९)
(५) गुलामगिरी (१८७३)
(६) पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट (२० मार्च १८७७)
(७) सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक
समारंभाची हकिगत (२४ सप्टेंबर १८७६)
(८) पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध
व वक्तृत्व समारंभ (१२ एप्रिल १८७७)
(९) दुष्काळविषयक विनंतीपत्रक (२४ मे १८७७)
(१०) हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन
(१९ ऑक्टोबर १८८२)
११९-२०१
२०३-२१३
२१५-२३०
२३१-२३४
२३५-२३७
२३९-२५४<noinclude></noinclude>
azafcgwu2jg4mgbdup7ry8x5sizp356
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/३७
104
81442
232377
177205
2026-06-18T12:21:33Z
JayashreeVI
4058
232377
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Dipika Chipat" />{{rh|३२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>ह्मणावें; भोंदू गुरु तसेंच निरनिराळ्या व्यावहारिक ज्ञानाचे व धंद्याचे गुरु हे मोक्षदायी सद्गुरु नव्हेत खरा सद्गुरु-
{{block center|<poem>जो ब्रह्मज्ञान उपदेशी । अज्ञान अंधार निरसी ।
जीवात्मया शिवात्मयाशीं । ऐक्यता करी ॥
भवव्या घालूनि उडी । गोवत्सांस ताडातोडी ।
केली देखोनि शीघ्र सोडी । तो सद्गुरू जाणावा ॥
वासना नदी महापुरीं प्राणी बुडतां ग्लानि करी ।
तेथें उडी घालूनि तारी । तो सद्गुरू जाणावा ॥
प्राणी मायाजाळीं पडिले । संसारदुःखें दुखवले ।
ऐसे जेणें मुक्त केले । तो सद्गुरू जाणावा ॥</poem>}}
{{gap}} सद्गुरूच्या लक्षणानंतर एका समासांत रामदासांनी सत् शिष्यांचें लक्षण दिले आहे त्याचें सार खालील ओव्यांत आलें आहे.
{{block center|<poem>मुख्य सत् शिष्याचें लक्षण | सद्गुरुवचनीं विश्वास पूर्ण ।
अनन्य भावें शरण । त्या नांव सच्छिष्य ।।
शिष्य पाहिजे निर्मळ । शिष्य पाहिजे आचारशीळ ।
शिष्य पाहिजे केवळ । विरक्त अनुतापी ॥
शिष्य पाहिजे निष्टावंत । शिष्य पाहिजे शुचिष्मंत |
शिष्य पाहिजे नेमस्त । सर्व प्रकारी ॥
शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष । शिष्य पाहिजे परमदक्ष ।
शिष्य पाहिजे अलक्ष्य । लक्षी ऐसा ।।
शिष्य पाहिजे अति धीर । शिष्य पाहिजे अति उदार ।
शिष्य पाहिजे अतितत्पर । परमार्थाविषयीं ॥
शिष्य पाहिजे परोपकारी । शिष्य पाहिजे निर्मत्सरी ।
शिष्य पाहिजे अर्थातरीं । प्रवेशकर्ता ॥</poem>}}
{{gap}}पुढें निरनिराळ्या प्रकारचें ज्ञान, खरें ब्रह्मज्ञान व उपदेशाचे स्वरूप यांचे वर्णन असून दशकाच्या शेवटच्या चार समासांत बद्ध, मुमुक्षु, साधक व सिद्ध अशा मनुष्याच्या पायऱ्यांची माहिती दिली आहे. अर्थात् यांत संसारांत गढून गेलेल्या माणसापासून त्याची ज्ञानाच्या योगें मुक्तता--<noinclude></noinclude>
cdeewooidtistxje3qnla2zi9a362xw
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२८
104
85892
232398
182086
2026-06-19T04:50:33Z
JayashreeVI
4058
232398
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१२३}}
{{rule}}</noinclude>यात्रा भरे ते करणे तुरकाचा अगर अगर हर कोण्हाचा उपद्रव न लगे पैसे करून व रामदास गोसावी याचा हरयेक विसी परामृश करीत जाणे देवाकरितां व गोसावियाकरिता ब्राम्हण येउनु तेथे घरे नवी बांधुनु राहताती त्याचा हि परामर्श करीत अंतर पडो ने दणे बहुत लिहीणे तरी तुम्ही सूज्ञ असा छ ७ रविलाखर शुहुर सन सला सबैन व अलफ प हुजुर
{{center|(२३ जुलै १६७२ मंगल)}}
{{rule 3 cm}}
{{right|मर्यादेयं
{{right|विराजते
{{right|लेख नं. ४}}
{{center|श्री}}
{{left|श्रीरघुनाथ}}{{right|श्रीरामदास स्वामी,}}
{{block center|<poem>राजमान्य राजेश्री वेकाजी रुद्र सुभेदार व कारकूनानी महाला
निये ताा तपे कोले गोसावी यास</poem>}}
<br>{{gap}}सेवक दत्ताजी त्रिमल नमस्कार शहुर सन समान सबैन अलफ राजेश्री. छत्रपति साहेबी सनद सति सबैनमध्ये लिहिली ती पैवस्ता (१) छ ११११ माहे रविलावल सन सबामध्यें पावली तेथें अज्ञा केली होती की आपण 'श्री सिवतरी असतां त्याचे भेटीस गेलो होतों ते समई ते हि अज्ञा केली कीं श्री देव यास अकरा गाव इनाम देणें त्यावरून आम्ही त्याचे आज्ञेप्रमाणें ती गोष्टी मान्य केली मागुती यानें स्वामीने चि आज्ञा केली ते गाउ इनामी ह्मणोन देवाचे नावे लिहोन त्या गावीचे उत्पन्न होईल ते देवाचा प्रसाद ह्मणोन तुम्ही राजग्रहीं जमा करणें तुम्ही राजे तुम्हासदेवाचा प्रसाद असावा या करितां दिल्हें आहे त्यापैकी दर गावासी अकरा विधेप्रमाणें इनाम बागा करविल्या त्यामध्यें कांहीं बाग व काही बागा माडावियास खर्च लागेल त्या कारणे सेत यैसे करावे त्यास अवल जमीन पाणिया खालील यैसी पाहोन देवणे वरकड गावांतील प्रज राज राहोन<noinclude></noinclude>
q4apqq3s3v4rvr45cz46rp9umyu5mzf
232399
232398
2026-06-19T04:52:41Z
JayashreeVI
4058
232399
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१२३}}
{{rule}}</noinclude>यात्रा भरे ते करणे तुरकाचा अगर अगर हर कोण्हाचा उपद्रव न लगे पैसे करून व रामदास गोसावी याचा हरयेक विसी परामृश करीत जाणे देवाकरितां व गोसावियाकरिता ब्राम्हण येउनु तेथे घरे नवी बांधुनु राहताती त्याचा हि परामर्श करीत अंतर पडो ने दणे बहुत लिहीणे तरी तुम्ही सूज्ञ असा छ ७ रविलाखर शुहुर सन सला सबैन व अलफ प हुजुर
{{center|(२३ जुलै १६७२ मंगल)}}
{{center|________}}
{{right|मर्यादेयं}}
{{right|विराजते}}
{{right|लेख नं. ४}}
{{center|श्री}}
{{left|श्रीरघुनाथ}}{{right|श्रीरामदास स्वामी,}}
{{block center|<poem>राजमान्य राजेश्री वेकाजी रुद्र सुभेदार व कारकूनानी महाला
निये ताा तपे कोले गोसावी यास</poem>}}
<br>{{gap}}सेवक दत्ताजी त्रिमल नमस्कार शहुर सन समान सबैन अलफ राजेश्री. छत्रपति साहेबी सनद सति सबैनमध्ये लिहिली ती पैवस्ता (१) छ ११११ माहे रविलावल सन सबामध्यें पावली तेथें अज्ञा केली होती की आपण 'श्री सिवतरी असतां त्याचे भेटीस गेलो होतों ते समई ते हि अज्ञा केली कीं श्री देव यास अकरा गाव इनाम देणें त्यावरून आम्ही त्याचे आज्ञेप्रमाणें ती गोष्टी मान्य केली मागुती यानें स्वामीने चि आज्ञा केली ते गाउ इनामी ह्मणोन देवाचे नावे लिहोन त्या गावीचे उत्पन्न होईल ते देवाचा प्रसाद ह्मणोन तुम्ही राजग्रहीं जमा करणें तुम्ही राजे तुम्हासदेवाचा प्रसाद असावा या करितां दिल्हें आहे त्यापैकी दर गावासी अकरा विधेप्रमाणें इनाम बागा करविल्या त्यामध्यें कांहीं बाग व काही बागा माडावियास खर्च लागेल त्या कारणे सेत यैसे करावे त्यास अवल जमीन पाणिया खालील यैसी पाहोन देवणे वरकड गावांतील प्रज राज राहोन<noinclude></noinclude>
33ekd8uxgamt8umu7vtsr4nmumk9nti
232400
232399
2026-06-19T04:56:29Z
JayashreeVI
4058
232400
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१२३}}
{{rule}}</noinclude>यात्रा भरे ते करणे तुरकाचा अगर अगर हर कोण्हाचा उपद्रव न लगे पैसे करून व रामदास गोसावी याचा हरयेक विसी परामृश करीत जाणे देवाकरितां व गोसावियाकरिता ब्राम्हण येउनु तेथे घरे नवी बांधुनु राहताती त्याचा हि परामर्श करीत अंतर पडो ने दणे बहुत लिहीणे तरी तुम्ही सूज्ञ असा छ ७ रविलाखर शुहुर सन सला सबैन व अलफ प हुजुर
{{center|(२३ जुलै १६७२ मंगल)}}
{{center|________}}{{right|मर्यादेयं}}
{{right|विराजते }}
{{right|लेख नं. ४}}
{{center|श्री}}
{{left|श्रीरघुनाथ}}{{right|श्रीरामदास स्वामी,}}
{{block center|<poem>राजमान्य राजेश्री वेकाजी रुद्र सुभेदार व कारकूनानी महाला
निये ताा तपे कोले गोसावी यास</poem>}}
{{gap}}सेवक दत्ताजी त्रिमल नमस्कार शहुर सन समान सबैन अलफ राजेश्री. छत्रपति साहेबी सनद सति सबैनमध्ये लिहिली ती पैवस्ता (१) छ ११११ माहे रविलावल सन सबामध्यें पावली तेथें अज्ञा केली होती की आपण 'श्री सिवतरी असतां त्याचे भेटीस गेलो होतों ते समई ते हि अज्ञा केली कीं श्री देव यास अकरा गाव इनाम देणें त्यावरून आम्ही त्याचे आज्ञेप्रमाणें ती गोष्टी मान्य केली मागुती यानें स्वामीने चि आज्ञा केली ते गाउ इनामी ह्मणोन देवाचे नावे लिहोन त्या गावीचे उत्पन्न होईल ते देवाचा प्रसाद ह्मणोन तुम्ही राजग्रहीं जमा करणें तुम्ही राजे तुम्हासदेवाचा प्रसाद असावा या करितां दिल्हें आहे त्यापैकी दर गावासी अकरा विधेप्रमाणें इनाम बागा करविल्या त्यामध्यें कांहीं बाग व काही बागा माडावियास खर्च लागेल त्या कारणे सेत यैसे करावे त्यास अवल जमीन पाणिया खालील यैसी पाहोन देवणे वरकड गावांतील प्रज राज राहोन<noinclude></noinclude>
2qjsfjiu88hux31h0od61mq3oueirt4
232401
232400
2026-06-19T04:56:59Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
232401
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१२३}}
{{rule}}</noinclude>यात्रा भरे ते करणे तुरकाचा अगर अगर हर कोण्हाचा उपद्रव न लगे पैसे करून व रामदास गोसावी याचा हरयेक विसी परामृश करीत जाणे देवाकरितां व गोसावियाकरिता ब्राम्हण येउनु तेथे घरे नवी बांधुनु राहताती त्याचा हि परामर्श करीत अंतर पडो ने दणे बहुत लिहीणे तरी तुम्ही सूज्ञ असा छ ७ रविलाखर शुहुर सन सला सबैन व अलफ प हुजुर
{{center|(२३ जुलै १६७२ मंगल)}}
{{center|________}}{{right|मर्यादेयं}}
{{right|विराजते }}
{{right|लेख नं. ४}}
{{center|श्री}}
{{left|श्रीरघुनाथ}}{{right|श्रीरामदास स्वामी,}}
{{block center|<poem>राजमान्य राजेश्री वेकाजी रुद्र सुभेदार व कारकूनानी महाला
निये ताा तपे कोले गोसावी यास</poem>}}
{{gap}}सेवक दत्ताजी त्रिमल नमस्कार शहुर सन समान सबैन अलफ राजेश्री. छत्रपति साहेबी सनद सति सबैनमध्ये लिहिली ती पैवस्ता (१) छ ११११ माहे रविलावल सन सबामध्यें पावली तेथें अज्ञा केली होती की आपण 'श्री सिवतरी असतां त्याचे भेटीस गेलो होतों ते समई ते हि अज्ञा केली कीं श्री देव यास अकरा गाव इनाम देणें त्यावरून आम्ही त्याचे आज्ञेप्रमाणें ती गोष्टी मान्य केली मागुती यानें स्वामीने चि आज्ञा केली ते गाउ इनामी ह्मणोन देवाचे नावे लिहोन त्या गावीचे उत्पन्न होईल ते देवाचा प्रसाद ह्मणोन तुम्ही राजग्रहीं जमा करणें तुम्ही राजे तुम्हासदेवाचा प्रसाद असावा या करितां दिल्हें आहे त्यापैकी दर गावासी अकरा विधेप्रमाणें इनाम बागा करविल्या त्यामध्यें कांहीं बाग व काही बागा माडावियास खर्च लागेल त्या कारणे सेत यैसे करावे त्यास अवल जमीन पाणिया खालील यैसी पाहोन देवणे वरकड गावांतील प्रज राज राहोन<noinclude></noinclude>
aiwe08gckghpndgrey0axwkx5nmazxw
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२९
104
85893
232378
232360
2026-06-18T12:42:54Z
कल्पनाशक्ती
3813
232378
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१२४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>गांव महामूर करावा आणि या अकरा बिघियांखेरीज जे गांवीं उत्पन्न होईल ते दिवाणांत द्यावें. यैशी स्वामीने आज्ञा केली ते आज्ञेप्रमाणे तुम्ही त्या महालीच्या कारकुनास लिहून चालवणे ह्मणोन आज्ञा केली होती, त्याणेप्रमाणे साले गुदस्ता आम्ही ताकीद रोखे दिल्ही कीं इनाम चालवणे पेस्तर सनद सादर होईल यैसे रोखे चालविले होते, तेणे प्रमाणें काम चालिले, परंतु सनद जाहली न्हवती, त्याकरितां श्रीस्वामीने वेदमूर्ति दिवाकर गोसावी या बराबरी सांगोन पाठविले त्यावरून हली सनद राजेश्री साहेबाचे आज्ञेप्रमाणे करून दिल्हे असे इनाम गांवगना बिघे बितपसील॥
<center>
{|style="text-align:center; width:80%;"
|+
|-
|मौजे डेरवण ||मौजे जाजगांव ||मौजे चरेगांव
|-
|σ११ ||σ११||σ११
|-
|मौजे सुदन ||मौजे तांबवे ||मौजे साल्हे
|-
|σ११ ||σ११ ||σ११
|}
</center>
1
कसबे चाफल देखील
त्रि ॥ σ१८
वाडी कारवजे चासई
1
४११८११
८११
<br>{{gap}}येकून अर्ध चावर साहा विघे इनाम साही गावासी देविला असे तो चालवणे व सदरहू गावासी वेठ बेगार आणिक कामासी तसवीस ने देणे साहा बाकी? इनामाचे बागाचे कुप काटी व देवाचे यात्रेस वेठ बेगार करावी यास सदरहू दिले असे व हली तुम्ही सुभा करिता तुम्हांस व पेस्तर जो कोणी सुभेदार होईल त्यास हाचि कागद मान्य असे जाणिजे या खेरीज कदीम त्याचा इनाम कारकीर्दी इदलशाही चालत आला असे तो चालवणें बितपसील जमीन चावर विधे ०।१३
मौजे सींगणवाडी,
मौजे चरथोडी
चाफल ८१
माजगाउ ८५
१५
<br>{{gap}}येकूण पाव चावर बारा विधे यथेता आंबराई लाविल्या आहेत व काही सेते आहेति ते बिला कुसुर सालाबाद प्रमाणे चालो देणे बहु लिहिणे तरी सुज्ञ असा या कागदाचे तालीक लेहोन घेउनुं असल परतून देणे दर--<noinclude></noinclude>
jcajzo1g6wbacdv6mpx9uemg9axc4qz
232379
232378
2026-06-18T12:51:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232379
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>गांव महामूर करावा आणि या अकरा बिघियांखेरीज जे गांवीं उत्पन्न होईल ते दिवाणांत द्यावें. यैशी स्वामीने आज्ञा केली ते आज्ञेप्रमाणे तुम्ही त्या महालीच्या कारकुनास लिहून चालवणे ह्मणोन आज्ञा केली होती, त्याणेप्रमाणे साले गुदस्ता आम्ही ताकीद रोखे दिल्ही कीं इनाम चालवणे पेस्तर सनद सादर होईल यैसे रोखे चालविले होते, तेणे प्रमाणें काम चालिले, परंतु सनद जाहली न्हवती, त्याकरितां श्रीस्वामीने वेदमूर्ति दिवाकर गोसावी या बराबरी सांगोन पाठविले त्यावरून हली सनद राजेश्री साहेबाचे आज्ञेप्रमाणे करून दिल्हे असे इनाम गांवगना बिघे बितपसील॥
<center>
{|style="text-align:center; width:80%;"
|+
|-
|मौजे डेरवण ||मौजे जाजगांव ||मौजे चरेगांव
|-
|σ११ ||σ११||σ११
|-
|मौजे सुदन ||मौजे तांबवे ||मौजे साल्हे
|-
|σ११ ||σ११ ||σ११
|}
</center>
{{gap}}येकून अर्ध चावर साहा बिघे इनाम साही गावासी देविला असे तो चालवणे व सदरहू गावासी वेठ बेगार आणिक कामासी तसवीस ने देणे साहा बाकी? इनामाचे बागाचे कुप काटी व देवाचे यात्रेस वेठ बेगार करावी यास सदरहू दिले असे व हली तुम्ही सुभा करिता तुम्हांस व पेस्तर जो कोणी सुभेदार होईल त्यास हाचि कागद मान्य असे जाणिजे या खेरीज कदीम त्याचा इनाम कारकीर्दी इदलशाही चालत आला असे तो चालवणें बितपसील जमीन चावर बिघे ०।१३
<center>
{|style="text-align:center; width:80%;"
|+
|-
|कसबे चाफल देखील ||मौजे सींगणवाडी
|-
|बि ॥ σ१८ ||σ१
|-
|वाडी कारवजे चासई ||मौजे चरथोडी
|-
|चाफल σ१ ||माजगाउ σ५{{gap}}१५
|}
</center>
{{gap}}येकूण पाव चावर बारा बिघे यथेता आंबराई लाविल्या आहेत व काही सेते आहेति ते बिला कुसुर सालाबाद प्रमाणे चालो देणे बहु लिहिणे तरी सुज्ञ असा या कागदाचे तालीक लेहोन घेउनुं असल परतून देणे दर<noinclude></noinclude>
8u7xg4b0wcxrtq12pclk5wq7bdr69ki
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२३
104
110546
232380
230662
2026-06-18T13:05:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232380
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|१२|'''काशी-रामेश्वर यात्रा'''|}}</noinclude>सांप्रदायिक प्रसाद घेऊन त्यांना पांच रुपये दक्षिणा दिली. माझ्या मुलांची, माझ्या बंधूंचे व पुतण्याचे अशीं सर्वांचीं नांवें वहींत लिहून ठेवविलीं व रामेश्वरीं गेल्याची तारीख व माझी सही मीं स्वहस्तानें त्यांच्या वहीवर केली. रामेश्वराच्या यात्रास्थानाचे वर्णन करण्यापूर्वीच पंड्यांची हकीकत व यात्रेकरूंची माहिती लिहून ठेवण्याची पद्धत यांचें वर्णन ओघानें आलें म्हणून तें आधीं केलें. आतां स्थळ वर्णनाकडे वळूं या.<Br>{{gap}}रामेश्वरचें एकमेवाद्वितीय दृश्य म्हणजे रामेश्वराचें '''देवालय''' होय. या देवालयाचें शब्दानें वर्णन करणें शक्य नाहीं. त्याचें बांधकला व मूर्तिकला या दृष्टीनें अपूर्वत्व स्वानुभवानेंच कळण्यासारखें आहे. या देवळाच्या बाहेरच्या प्राकारासभोंवारच्या रस्त्याला सबंध फेरी घालण्यास अर्धातास लागतो. हें देवालय पूर्वाभिमुख असून त्याचें मुख्य व मोठें गोपूर पूर्वेकडेस आहे. पूर्वबाजूस बंगालच्या उपसागराचा अर्धवर्तुळाकार उथळ भाग आलेला आहे. त्याला मोठा घाट बांधलेला आहे. येथलें वाळवंटही सुंदर आहे. पण या भागाचा यात्रेकरू प्रातर्विधि करण्यास उपयोग करीत असल्यामुळें हें सुंदर वाळवंट सहल करण्याच्या निरुपयोगी झालें आहे. इकडे देवळाचे व्यवस्थापक लक्ष घालून हें वाळवंट स्वच्छ व निर्मळ ठेवतील तर आमच्यासारख्या निसर्गप्रिय व व्यावहारिक यात्रेकरूवर व्यवस्थापकांचे उपकार होतील. या पूर्व दरवाजावरचें गोपूर दहा मजली उंच असून गोपुराच्या बांधपद्धतीप्रमाणें निमुळतें होत जाऊन शेवटीं भिंतीची एक बारीक व लांब पडदी बनली आहे. त्यांवर नऊ कळस व शेवटीं एक एका काल्पनिक प्राण्याची मूर्ति बसविलेली आहे. हा सर्व भाग रंगविलेला असून कळसाला सोन्याचा मुलाम दिलेला आहे. या गोपुराचे आधीं व बाहेरच्या प्राकारचे बाहेर एक सभामंडप केला असून तेथें उजव्या बाजूस एक छोटेंसें मारुतीचें देऊळ आहे. दंतकथा अशी आहे कीं रामचंद्रानें या स्थानीं शंकराचें<noinclude></noinclude>
pcn8cfh41g2ces384mqd5xborv3rcfs
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२४
104
110547
232381
230663
2026-06-18T13:08:17Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232381
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader||'''रामेश्वर व सेतुरामेश्वर'''|१३}}</noinclude>लिंग स्थापन करण्याचा बेत करून काशीहून लिंग आणण्यास मारुतीस आज्ञा केली. त्याप्रमाणें मारुती काशीस जाऊन लिंग घेऊन आला, पण त्याला थोडा उशीर लागला व ठरलेला मुहूर्त टळतो म्हणून रामचंद्रांनीं हल्लीं रामेश्वराच्या देवळांत असलेल्या लिंगाची स्थापना केली. यामुळे मारुतीला राग आला. पण रामानें त्यानें आणलेलें लिंगही देवळांत स्थापितलें व मारुतीचा राग शमविण्याकरितां तुझ्या दर्शनावांचून रामेश्वराचें दर्शन यात्रेकरूस होणार नाहीं असा आशीर्वाद दिला. म्हणून पूर्वेकडून देवळांत शिरतांना आधीं मारुतीचें दर्शन घेण्याची रीत पडली. गोपुरांतून आंत शिरलें म्हणजे देवालयाची प्रचंडता व भव्यता पाहून मन थक्क होतें. मोठमोठे नक्षीचे काल्पनिक प्राण्यांच्या मूर्तींनीं शोभायमान झालेले ते उंच खांब व त्यांवरील एक संधी दगडाच्या फारशीचें छप्पर फार भव्य दिसतें. असे भव्य व उंच उंच दगडी प्राकार व नक्षीच्या खांबांनीं सुशोभित केलेले प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग दोन लागतात. पुढें या प्रचंड देवळाला शोभेल असा प्रचंड नंदी लागतो. त्याचे मागें पितळी उंच गरुडस्तंभ उभारला आहे. यानंतर यात्रेकरू शेवटच्या प्रदक्षिणा मार्गाला येतो. येथें मात्र लहानशा जोतावर छोटासा नंदी आहे. प्रचंड देवळाच्या प्रचंड मार्गात तो छोटा नंदी लक्षांत सुद्धां येत नाहीं. नंतर गाभाऱ्याच्या पुढील काळ्या दगडाचा नक्षीदार सभामंडप लागतो. मग आणखी एक प्रवेशद्वार लागतें व शेवटीं गाभाऱ्यांत शंकराची सोन्याने मढविलेली पिंडी दृष्टीस पडते! प्रवेशद्वाराच्या सभोवार व त्याच्या अलीकडील मार्गावर व सभामंडपाच्या गाभाऱ्याकडील भागाला तेलाच्या दिव्यांच्या माळाच माळा लावलेल्या दिसतात. हल्लीं जरी सर्व देवळांत व तीन प्रदक्षिणामार्गांत विजेचे दिवे केले आहेत तरी अजून गाभाऱ्यांत व त्याचेनजीक जनीच तेलाच्या दिव्याची पद्धती चालू आहे. हेंच रामचंद्राने स्थापन केलेलें शिवलिंग! रामेश्वरला फार पुरातन काळापासून जें महात्म्य व पावित्र्य आलें तें या दंतकथेमुळें आलें आहे. दक्षिणेंतील सगळ्या<noinclude></noinclude>
6mm970gx9mqc7d6usnx0gl2qtqbadft
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२५
104
110548
232382
230664
2026-06-18T13:12:01Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232382
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|१४|'''काशी-रामेश्वर यात्रा'''|}}</noinclude>देवळांप्रमाणें या मुख्य देवळाखेरीज किती तरी उपदेवळें या प्राकारांमध्ये आहेत, त्यांत पार्वतीचें स्वतंत्र देऊळ आहे; विष्णूचें देऊळ आहे; राम, लक्ष्मण, सीता, हनुमान या चतुरायतनाचें देऊळ आहे. या देवळांची व देवांची यादी किती देत बसावें. तसेंच या प्राकारांत किती तरी तीर्थे आहेत. एकच तीर्थ मोठें, चांगले बांधलेलें व प्रशस्त आहे; बाकीचीं विहिरीवजा व हौदवजा आहेत. या प्रचंड देवालयाचें काम कित्येक वर्षे व शतकें चालू होतें. हल्लींसुद्धां एका प्रकाराचें काम चालूच आहे. हें देऊळ म्हणजे एक चक्रव्यूह वाटतो यांत शंका नाहीं. गांवाकडून देवळाचें पश्चिम गोपूर दिसतें. हें पूर्व गोपुरापेक्षां बरेच लहान असून पूर्व गोपुराच्या मागाहून बांधलेलें आहे. उत्तर व दक्षिण या दिशेस दरवाजे आहेत पण त्यांवर गोपुरें नाहीत. हल्लीं या देवळाचा कांहीं भाग पडीक झाला आहे. पूर्वी निरनिराळीं देवळें असून तीं मोठ्या प्राकारांनीं एकत्र करून एकाच्या आंत एक असे तीन प्रचंड प्रदक्षिणामार्ग करण्याची कल्पना मागाहूनची असल्यामुळें बांधकलेच्या दृष्टीनें हें देऊळ बांधकला पद्धतीची योजनाहीन खिचडी आहे असें वाटतें. पश्चिमेकडून देवळांत शिरल्यावर प्रथमच फार मोठा प्रशस्त नक्षीचा मार्ग लागतो पण या बाजूने मुख्य गाभाऱ्याकडे जातां येत नाहीं. कारण देवळाचें शेवटले व आंतलें द्वार फक्त पूर्वेसच आहे. यामुळें प्रदक्षिणामार्गानें डावीकडून जाऊन दुसऱ्या प्रवेश मार्गात शिरून मग मुख्य दरवाज्याकडे जावें लागतें. बरें पूर्व दरवाज्यानें देवळांत शिरलें म्हणजे प्रदक्षिणामार्गानें जातांना पश्चिम दाराकडे मनुष्य मुळींच येऊं शकत नाहीं. कारण कांहीं भागाचें काम चालू असल्यामुळें प्रदक्षिणामार्गाची एक बाजू बंद झाल्यासारखी झाली आहे. मीं या देवळांत दोन चारदां फेऱ्या घातल्या. पण नेमकें पश्चिमद्वार व गोपूर मला सांपडूं शकलें नाहीं. देऊळ येवढें विस्तीर्ण आहे कीं मनुष्याची आंत गेल्यावर दिशाभूल होते. आपण आल्या दरवाजानें नेमकें परत जाऊं असें खातरीनें सांगतां येत नाहीं. कारण उत्तरेस व दक्षिणेस जे<noinclude></noinclude>
q55k9mn8hwvsvyh1r1djs7i80k6wuwr
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२६
104
110549
232383
230665
2026-06-18T13:15:24Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232383
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader||'''रामेश्वर व सेतुरामेश्वर'''|१५}}</noinclude>दरवाजे आहेत तिकडेच चटकन मनुष्य येतो व मग पहिले दोन गोपुरांचे दरवाजे सांपडत नाहींत! अशी मोठी विचित्र व विलक्षण रचना या रामेश्वर देवळाची आहे यांत शंका नाहीं.<Br>{{gap}}रामेश्वरांत दुसरें प्रेक्षणीय स्थळ म्हणजे '''गंधमादन''' पर्वत अगर रामघळी हें होय. हें ठिकाण रामेश्वरपासून एक मैल दूर आहे. सर्व रस्ता (रामेश्वरांत दगडी खडीचे रस्ते नाहींतच) वालुकामय आहे. वाळू फार मऊ, बारीक व पांढरट तांबूस बदामी रंगाची आहे. पण या वाळूंत जोडे किंवा शू घालून मुळींच चालतां येत नाहीं. आधीं बुटाची टांच वाळूंत रुतते व चालण्यास त्रास पडतो; शिवाय शू मध्यें वाळू शिरून पायाला ती बोचूं लागते. म्हणून मला शू हातांत घेऊन चालावें लागलें. इकडे सर्व लोक सुशिक्षित सुद्धां अनवाणी कां चालतात याचें इंगित येथल्या माझ्या अनुभवावरून ध्यानांत आलें. या वाळूवर अनवाणी चालणें जास्त सुखावह वाटतें. जणूं कांहीं आपण श्रीमंत बायका घालतात तसे गादीचे जोडे घालूनच चाललों आहों असें वाटतें; इतकी वाळू बारीक, मऊ व गुळगुळीत असते. मात्र हें सुख सकाळीं व सायंकाळीं वाळू गार गार असतांना वाटतें. पण हीच वाळू भर दोनप्रहरीं इतकी तापते कीं चालतांना तापल्या तव्यावर चालल्याप्रमाणें पायाला चटके बसतात. गंधमादन पर्वतापर्यंत एकसारखा वालुकामय प्रदेश आहे. मधून मधून छोटीं छोटीं देवळें आहेत. त्यांत एक बिभीषणाचें देऊळ आहे; एक पार्वतीचें आहे, एक शंकराचें आहे. पण हीं देवळें कसचीं! त्या लहानशा विटांच्या मातीच्या गिलाव्याच्या एक खणी सखल देवळ्या आहेत! गंधमादन पर्वतानजीक एक मारुतीचें व्हरांडा असलेलें किंचित् मोठें देऊळ आहे. समोरच अमृत विहीर म्हणून गोड्या पाण्याची विहीर आहे. त्याचे जरा आधीं अमृत कुंड म्हणून पायऱ्या पायऱ्यांचा मोठा हौद आहे. त्या कुंडाचे नांवावरून नांव सोनुबाई हातीं कथलाचा वाळा या म्हणीची मला<noinclude></noinclude>
ihpuw7objs13ycz309mfuerkr94s4ec
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२७
104
110550
232384
230666
2026-06-18T13:19:14Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232384
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|१६|'''काशी-रामेश्वर यात्रा'''|}}</noinclude>आठवण झाली. रामेश्वरांतील सर्व तीर्थांची एकच स्थिति. हीं सर्व तीर्थे म्हणजे सांचलेल्या पाण्याची डबकीं. येथें भाविक स्नान करीत असतील, पण माझ्यासारख्या माणसाला त्या तीर्थांकडे पहावत नाहीं, मग तीर्थ तोंडांत घालण्याचें किंवा तीर्थात बुडी मारण्याचें नांवच नको. पूर्वी येथें या पाण्यामुळें हिवताप व कॉलरा होई. पण आतां नळाचें चांगलें पाणी आणल्यापासून हें ठिकाण बरेंच निरोगी बनलें आहे. असेंच अर्धातास वाळू तुडवीत गेल्यावर एकदांचा गंध-मादन पर्वत आला. पण या गंध-मादन पर्वताला पर्वत हें नांव शोभत नाहीं. हा वाळूचा मोठा उंचवटा असून त्यावर बरेंच उंच सभोवार पायऱ्या पायऱ्यांचें जोतें बांधलें आहे. त्या जोत्यावर दगडी सभामंडप व देऊळ आहे. हें देऊळ हेमाडपंती पद्धतीचें आहे. येथल्या देवळांत दगडावर कोरलेल्या रामाच्या पादुका आहेत. येथें रामचंद्राने लंकेला जाण्याचा पूल तयार होईपर्यंत वानर सैन्यासकट तळ दिला होता अशी दंतकथा आहे. या देवळावर पायऱ्यांनीं जातां येणारी चुनेगच्ची कठड्याची मोकळी गच्ची आहे; त्याचे मधोमध मंडपासारखा एक आच्छादिलेला चौथरा आहे. येथून दूरवर सर्वत्र समुद्रच समुद्र दिसतो व रामेश्वर हें दोन सागरांच्या संगमावरचें त्रिकोणी बेट आहे हें व हा सर्वभाग विलक्षण सपाट व वालुकामय आहे हें स्पष्टपणें दिसून येतें. हिरवीनिळी समुद्राच्या पाण्याची सभोवार एक धारच धार दिसते. मध्यें पांढऱ्या शुभ्र वाळूचें मैदान, तुरळक तुरळक नारळीचीं, पालमिरा पामचीं व इतर झाडें दिसतात, व कोठेंकोठें थोडी हिरवट गवताळ जमीन दिसते. असा हा मोठा विलक्षण प्रांत आहे. या ठिकाणाला इतकें महत्त्व रामायणांतील रामचरित्रांतील लंकेवरील स्वारीच्या दंतकथेवरून आलें आहे यांत शंका नाहीं.<br>{{gap}}दुसरे दिवशीं पहाटेस साडेचाराच्या गाडीनें मी '''सेतुरामेश्वरावर''' '''स्नान''' करण्याकरितां निघालों तो धनुष्कोडीस साडेसहा वाजतां आलों.<noinclude></noinclude>
rpxpqeb14gpv4v9p4rf4roertdrenul
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/३०
104
110551
232385
230667
2026-06-18T13:24:08Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232385
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader||'''रामेश्वर व सेतुरामेश्वर'''|१७}}</noinclude>धनुष्कोडी हें रामेश्वर बेटाचें दक्षिणेकडील दोन समुद्रांचे संगमांत घुसलेलें टोंक आहे. येथील समुद्र या पिढीच्या आठवणींतसुद्धां दूरदूर चालला आहे असें सांगतात. येथून सेतुरामेश्वर- रामानें सेतू बांधण्यास सुरुवात केली तें दोन समुद्रांच्या दरम्यानचें संगमस्थान- तीन मैल दूर आहे. बैलगाड्या भाड्यानें केव्हां केव्हां मिळतात, पण त्यांनीं जाण्यांत अर्थ नाहीं. हा वालुकामय प्रदेश पायीं चालणेंच चांगला. मागें गंधमादन पर्वताचे वर्णनांत सांगितल्याप्रमाणें पायीं चालण्याचा त्रास तर होत नाहीं; पण नवा अनुभव म्हणून एक मोठी मौजच वाटते. मात्र ही वालुकाचाल फार ऊन होण्याच्या पूर्वीच पुरी करणें चांगलें. म्हणून रामेश्वराहून पहाटेच्या गाडीनें जाऊन स्नानविधी करून परत पावणे आकराच्या गाडीनें रामेश्वरास येणेंच फार सोयीस्कर आहे. कारण या संगमावर उतरण्याची किंवा राहण्याची चांगलीशी सोय नाहीं. सेतुरामेश्वरास- सागर संगमस्थानास-जातांना मी आरबी समुद्राच्या वालुकामय पण जरा बांधासारख्या वर असलेल्या वाळवंटाकडून गेलों, तों त्या मोरपिशी काळासर निळसर समुद्रावर लाटांवर लाटा येत होत्या. पांढऱ्या फेसावरून लाटा दूरवरून सावकाशपणें येतातशा दिसत पण जवळ येऊं लागल्या कीं त्या प्रचंड व उग्र स्वरूप धारण करीत! जणूं कांहीं सिंहाची एक पलटणची पलटण आपली आयाळ व केंस उभारून मोठा जबडा पसरून उड्या टाकीत धरणी मातेला खायला येत असून सिंहगर्जना करीत वाळवंटावर चाल करून येत आहे असें भासें. ज्याप्रमाणें सिंहाची उडी श्वापदावर नेमकी न पडतां चुकून अलीकडे पडावी त्याप्रमाणें एखादी लाट वाळवंटावर येण्याचे आधींच फुटे व मग आवाज न करतां हळूच येऊन वाळूवर आदळे. याप्रमाणें या ठिकाणीं आरबी समुद्राचें उग्र व रौद्र स्वरूप दिसलें तर बंगालच्या उपसागराचें सौम्य स्वरूप दिसलें. याचें पाणी आधी रमणीय पोपटी रंगी आहे, याच्या लाटा प्रचंड नसून त्या फार आवाज न करतां वाळवंटाला<noinclude></noinclude>
dyckqvi8enw49gwnbzelmrfsunne57v
पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/२५
104
110633
232407
232045
2026-06-19T06:42:18Z
Annni07
6055
232407
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||यम, नियम, आसन आणि प्राणायाम|३}}</noinclude>{{gap}}{{gap}}'''ब्रह्मादयोपि त्रिदशाः पवनाभ्यासत्पराः ।'''<br>{{gap}}{{gap}}'''अभूवन्नंतकभयात्तस्मात्पवनमभ्यसेत् ॥ ५ ॥'''<br>{{gap}}अर्थ—मोठमोठे ज्ञानी, ज्ञानानेंच मोक्ष होतो, असें सर्वकाल ह्मणत असून, तुझी योग हेंच मुक्तीचें साधन आहे असें ह्मणतां, तर ज्ञान्यांचें ह्मणणें खोटें कीं काय ? शंकर ह्मणतात, ज्ञानी ज्ञानानेंच मोक्ष मिळतो, असें ह्मणतात तें खोटें नव्हे, व मी योगानें मोक्ष मिळतो असें ह्मणतों तेंही खोटें नाहीं. पहा, कीं व्यवहारांत सर्व लोक, तलवारीनें जय मिळतो, असें ह्मणतात हें खोटें नाहीं. परंतु शूर पुरुषानें मोठ्या धैर्यानें व युक्तीनें लढाई करावी, तेव्हांच त्याला जय मिळतो. तसेंच, योगरहित कितीही ज्ञान असलें तरी तें मोक्ष देणारें होत नाहीं. पार्वति ! फार काय सांगूं ? मोठा ज्ञानी, तसाच अतिविरक्त असून धर्मज्ञ व जितेंद्रिय जरी पुरुष असला, तरी तो मोक्षाधिकारी होत नाहीं. देवालाही योगावांचून मोक्ष मिळत नाहीं. ह्मणून ब्रह्मादिक देवही योगाभ्यासत्पर झाले. यासाठीं, मनुष्यानें यमाचें भय निवारण होण्यासाठीं—मोक्षप्राप्तीसाठीं—योगाभ्यासच केला पाहिजे असें मी तुला सांगतों.<br>{{gap}}{{gap}}'''वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव, दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।'''<br>{{gap}}'''अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥१॥'''<br>{{right|( भगवद्गीता )}}<br>{{gap}}अर्थ—सर्व वेद, सर्व यज्ञ, सर्व तपें, दानें हीं जें फळ देतात तें सर्व जाणून त्या सर्वांत श्रेष्ठ अशा उत्कृष्ट पदाप्रत योगी पावतो.<br>{{gap}}{{gap}}'''आलोड्य सर्वशास्त्राणि विचार्य च पुनः पुनः ।'''<br>{{gap}}{{gap}}'''एकमेव सुनिष्पन्नं योगशास्त्रं परं मतम् ॥ १ ॥''' {{right|( शि० सं० )}}<br>{{gap}}अर्थ—सर्व शास्त्रें पाहून व वारंवार विचार करून पाहिलें, पण त्यांत परममान्य व निश्चयानें सर्व फल देणारें एक योगशास्त्रच मला आढळलें.<noinclude></noinclude>
lfxhanvuujhsypbujg9hb0oil48xpjg
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/३६
104
110702
232374
232330
2026-06-18T12:04:46Z
JayashreeVI
4058
232374
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|३१|</noinclude>{{block center|<poem>देवें आपण घालोनि उडी । तयांसि नेलें पैलथडी ।<br> येर तीं अभाविकें बापुडीं । वाहताच गेलीं ॥</poem>}}
{{gap}}वरील उपमेंत दुःखमय संसाराचें चित्र असून त्यांतून सुटण्याचा उपा- यही सूचित केला आहे, व याच उपायाचें पुढील चार दशकांत सविस्तर वर्णन केलें आहे. अशा या मायामय व दुःखमय संसारांतून सुटण्यास
मार्ग काय ?
<br>{{gap}}प्रथमतः मनुष्यानें नवविधा भक्ति करण्यास शिकावें; देवाच्या कथा ऐकाव्या; आपण स्वतः कीर्तन करावें; देवाचें सदोदित नामस्मरण करावें; सद्गुरूची सेवा करावी; देवपूजा नित्य करावी; देवाला नमस्कार घालावे; देवालयांत कामे करावीं, देवाशीं आपल्या प्रेमळ व भाविक वागण्यानें सख्य करावें व शेवटीं देव व आपण यांच्या ऐक्याबद्दल विचार करून तें ज्ञान आत्मसात् करावें. अशा प्रकारचें वर्तन म्हणजे नवविधा भक्ति होय. नंतर चारी मुक्तींचें थोडक्यांत असें वर्णन दिले आहे.
{{block center|<poem>लोकीं रहावें सलोकता । समीप असावें ते समीपता । स्वरूपींच व्हावें सरूपता । तिसरी मुक्ति ।। देवस्वरूप जाहला देही । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीं । स्वरूपतेचें लक्षण पाहीं । ऐसें असे ॥
सुकृत आहे तें भोगिती । सुकृत सरतां लोटूनि देती । आपण देव ते असती । जैसे तैसे ॥
म्हणोनि तीन मुक्ति नाशवंत । सायुज्य मुक्ति ते शाश्वत । तीही निरूपिली सावचित्त । ऐक आतां ॥
ब्रह्मांड नासेल कल्पांतीं । पर्वतांसहित जळेल क्षिती ।
तेव्हां अवघेचि देव जाती । मुक्ति केंच्या तेथें ॥
तेव्हां निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ति ते अचळ ।
सायुज्य मुक्ति ते केवळ । जाणिजे ऐसी ॥
नवविधाभक्ति व मुक्तिचतुष्टय यांचें वर्णन झाल्यावर स्वाभाविकपणें
रामदास ही मुक्ति कशी मिळवावयाची या प्रश्नाकडे
सबंध पांचव्या दशकांत याचेंच विवेचन आले आहे.
वळले आहेत व
सद्गुरु कोणास<noinclude></noinclude>
fs11mw93tgjvu89gw0cicz8r4bewoa1
232375
232374
2026-06-18T12:12:23Z
JayashreeVI
4058
232375
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|३१|}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>देवें आपण घालोनि उडी । तयांसि नेलें पैलथडी ।<br> येर तीं अभाविकें बापुडीं । वाहताच गेलीं ॥</poem>}}
{{gap}}वरील उपमेंत दुःखमय संसाराचें चित्र असून त्यांतून सुटण्याचा उपा- यही सूचित केला आहे, व याच उपायाचें पुढील चार दशकांत सविस्तर वर्णन केलें आहे. अशा या मायामय व दुःखमय संसारांतून सुटण्यास
मार्ग काय ?
<br>{{gap}}प्रथमतः मनुष्यानें नवविधा भक्ति करण्यास शिकावें; देवाच्या कथा ऐकाव्या; आपण स्वतः कीर्तन करावें; देवाचें सदोदित नामस्मरण करावें; सद्गुरूची सेवा करावी; देवपूजा नित्य करावी; देवाला नमस्कार घालावे; देवालयांत कामे करावीं, देवाशीं आपल्या प्रेमळ व भाविक वागण्यानें सख्य करावें व शेवटीं देव व आपण यांच्या ऐक्याबद्दल विचार करून तें ज्ञान आत्मसात् करावें. अशा प्रकारचें वर्तन म्हणजे नवविधा भक्ति होय. नंतर चारी मुक्तींचें थोडक्यांत असें वर्णन दिले आहे.
{{block center|<poem>लोकीं रहावें सलोकता । समीप असावें ते समीपता ।<br> स्वरूपींच व्हावें सरूपता । तिसरी मुक्ति ।।<br> देवस्वरूप जाहला देही । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीं ।<br> स्वरूपतेचें लक्षण पाहीं । ऐसें असे ॥
सुकृत आहे तें भोगिती । सुकृत सरतां लोटूनि देती ।<br> आपण देव ते असती । जैसे तैसे ॥
म्हणोनि तीन मुक्ति नाशवंत ।<br> सायुज्य मुक्ति ते शाश्वत ।<br> तीही निरूपिली सावचित्त । ऐक आतां ॥
ब्रह्मांड नासेल कल्पांतीं । पर्वतांसहित जळेल क्षिती ।
तेव्हां अवघेचि देव जाती । मुक्ति केंच्या तेथें ॥
तेव्हां निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ति ते अचळ ।
सायुज्य मुक्ति ते केवळ । जाणिजे ऐसी ॥</poem>}}
{{gap}}नवविधाभक्ति व मुक्तिचतुष्टय यांचें वर्णन झाल्यावर स्वाभाविकपणें रामदास ही मुक्ति कशी मिळवावयाची या प्रश्नाकडे वळले आहेत व सबंध पांचव्या दशकांत याचेंच विवेचन आले आहे. सद्गुरु कोणास--<noinclude></noinclude>
b5qf0ljtbx51xqovaze0g0c3394fxn7
232376
232375
2026-06-18T12:13:14Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
232376
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.| ३१|}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>देवें आपण घालोनि उडी । तयांसि नेलें पैलथडी ।<br> येर तीं अभाविकें बापुडीं । वाहताच गेलीं ॥</poem>}}
{{gap}}वरील उपमेंत दुःखमय संसाराचें चित्र असून त्यांतून सुटण्याचा उपा- यही सूचित केला आहे, व याच उपायाचें पुढील चार दशकांत सविस्तर वर्णन केलें आहे. अशा या मायामय व दुःखमय संसारांतून सुटण्यास
मार्ग काय ?
<br>{{gap}}प्रथमतः मनुष्यानें नवविधा भक्ति करण्यास शिकावें; देवाच्या कथा ऐकाव्या; आपण स्वतः कीर्तन करावें; देवाचें सदोदित नामस्मरण करावें; सद्गुरूची सेवा करावी; देवपूजा नित्य करावी; देवाला नमस्कार घालावे; देवालयांत कामे करावीं, देवाशीं आपल्या प्रेमळ व भाविक वागण्यानें सख्य करावें व शेवटीं देव व आपण यांच्या ऐक्याबद्दल विचार करून तें ज्ञान आत्मसात् करावें. अशा प्रकारचें वर्तन म्हणजे नवविधा भक्ति होय. नंतर चारी मुक्तींचें थोडक्यांत असें वर्णन दिले आहे.
{{block center|<poem>लोकीं रहावें सलोकता । समीप असावें ते समीपता ।<br> स्वरूपींच व्हावें सरूपता । तिसरी मुक्ति ।।<br> देवस्वरूप जाहला देही । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीं ।<br> स्वरूपतेचें लक्षण पाहीं । ऐसें असे ॥
सुकृत आहे तें भोगिती । सुकृत सरतां लोटूनि देती ।<br> आपण देव ते असती । जैसे तैसे ॥
म्हणोनि तीन मुक्ति नाशवंत ।<br> सायुज्य मुक्ति ते शाश्वत ।<br> तीही निरूपिली सावचित्त । ऐक आतां ॥
ब्रह्मांड नासेल कल्पांतीं । पर्वतांसहित जळेल क्षिती ।
तेव्हां अवघेचि देव जाती । मुक्ति केंच्या तेथें ॥
तेव्हां निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ति ते अचळ ।
सायुज्य मुक्ति ते केवळ । जाणिजे ऐसी ॥</poem>}}
{{gap}}नवविधाभक्ति व मुक्तिचतुष्टय यांचें वर्णन झाल्यावर स्वाभाविकपणें रामदास ही मुक्ति कशी मिळवावयाची या प्रश्नाकडे वळले आहेत व सबंध पांचव्या दशकांत याचेंच विवेचन आले आहे. सद्गुरु कोणास--<noinclude></noinclude>
772z72ppzkwqkprwv8m9tjb5srt3nyx
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४
104
110705
232402
232358
2026-06-19T05:15:18Z
JayashreeVI
4058
232402
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{xx-larger|{{center|'''अनुक्रमणिका.'''}}}}
{|
|+
|-
| १ || पुण्याहून सज्जनगडचा प्रवास. || १
|-
| २ || सज्जनगडाचे सद्यःकालीन व पूर्वकालीन स्वरूप. || १४
|-
| ३ || रामदासांच्या महातीबद्दलची भिन्न मतें || २२
|-
| ४ || दासबोधाच्या १ ते ७ दशकांचा सारांश व त्यातील वाचनीय वाचनें || २६
|-
| ५ || आठवा ज्ञानदशक || ३७
|-
| ६ || दशक ९ ते १५ || ३९
|-
| ७ || दशक १६ ते २० || ५९
|-
| ८ || समग्र दासंबोधाचे सिंहावलोकन || ७३
|-
| ९ || रामदासांचे संक्षिप्त चरित्र || ८०
|-
|१० || रामदास व शिवाजी यांचा संबंध || ९७
|-
| ११ || परिशिष्ट || १२०
{{center |________}}
|}
१
१
# २
१४
. ३ रामदासांच्या महतीबद्दलचीं भिन्न मतें.
२२
४
दासबोधाच्या १ ते ७ दशकांचा सारांश व त्यांतील वाचनीय वचनें.
२६
५
आठवा ज्ञानदशक.
६
दशक ९ ते १५.
७
दशक १६ ते २०.
<
समग्र दासबोधाचें सिंहावलोकन.
९
१०
रामदासांचें संक्षिप्त चरित्र.' रामदास व शिवाजी यांचा संबंध.
....
३७
....
....
३९
५९
a
७३
८०
९७
११ परिशिष्ट.
...
....
....
१२०<noinclude></noinclude>
jjjgcvdfay3f2nrg3eqbclummifuko4
232403
232402
2026-06-19T05:16:40Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
232403
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{xx-larger|{{center|'''अनुक्रमणिका.'''}}}}
{|
|+
|-
| १ || पुण्याहून सज्जनगडचा प्रवास. || १
|-
| २ || सज्जनगडाचे सद्यःकालीन व पूर्वकालीन स्वरूप. || १४
|-
| ३ || रामदासांच्या महातीबद्दलची भिन्न मतें || २२
|-
| ४ || दासबोधाच्या १ ते ७ दशकांचा सारांश व त्यातील वाचनीय वाचनें || २६
|-
| ५ || आठवा ज्ञानदशक || ३७
|-
| ६ || दशक ९ ते १५ || ३९
|-
| ७ || दशक १६ ते २० || ५९
|-
| ८ || समग्र दासंबोधाचे सिंहावलोकन || ७३
|-
| ९ || रामदासांचे संक्षिप्त चरित्र || ८०
|-
|१० || रामदास व शिवाजी यांचा संबंध || ९७
|-
| ११ || परिशिष्ट || १२०
{{center |________}}
|}
१
१
# २
१४
. ३ रामदासांच्या महतीबद्दलचीं भिन्न मतें.
२२
४
दासबोधाच्या १ ते ७ दशकांचा सारांश व त्यांतील वाचनीय वचनें.
२६
५
आठवा ज्ञानदशक.
६
दशक ९ ते १५.
७
दशक १६ ते २०.
<
समग्र दासबोधाचें सिंहावलोकन.
९
१०
रामदासांचें संक्षिप्त चरित्र.' रामदास व शिवाजी यांचा संबंध.
....
३७
....
....
३९
५९
a
७३
८०
९७
११ परिशिष्ट.
...
....
....
१२०<noinclude></noinclude>
8x7uhjuxmsjax0tpybr2263bbjvlo4n
232404
232403
2026-06-19T05:19:17Z
JayashreeVI
4058
232404
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{xx-larger|{{center|'''अनुक्रमणिका.'''}}}}
{|
|+
|-
| १ || पुण्याहून सज्जनगडचा प्रवास. || १
|-
| २ || सज्जनगडाचे सद्यःकालीन व पूर्वकालीन स्वरूप. || १४
|-
| ३ || रामदासांच्या महातीबद्दलची भिन्न मतें || २२
|-
| ४ || दासबोधाच्या १ ते ७ दशकांचा सारांश व त्यातील वाचनीय वाचनें || २६
|-
| ५ || आठवा ज्ञानदशक || ३७
|-
| ६ || दशक ९ ते १५ || ३९
|-
| ७ || दशक १६ ते २० || ५९
|-
| ८ || समग्र दासंबोधाचे सिंहावलोकन || ७३
|-
| ९ || रामदासांचे संक्षिप्त चरित्र || ८०
|-
|१० || रामदास व शिवाजी यांचा संबंध || ९७
|-
| ११ || परिशिष्ट || १२०
{{center |________}}
|}<noinclude></noinclude>
nykdrr60wtao26w04puakohwoqa1ymp
अनुक्रमणिका:पापी-पुण्य.pdf
106
110710
232396
2026-06-18T16:59:10Z
FailedEngineer2027
6067
नवीन पान ""
232396
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=पापी-पुण्य
|Language=mr
|Volume=
|Author=[[Author:भार्गवराम विठ्ठल वरेरकर]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=विठ्ठल नारायण परब
|Address=मुंबई
|Year=1931
|Key=पापी-पुण्य
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
5zmx0u71cqrqtkq17hwgr7dl09suap9
अनुक्रमणिका:सन १८५७.pdf
106
110711
232397
2026-06-18T17:29:58Z
FailedEngineer2027
6067
नवीन पान ""
232397
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=सन १८५७
|Language=mr
|Volume=
|Author=[[Author:नारायण केशव बेहेरे]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=मंगेश नारायण कुळकर्णी
|Address=मुंबई
|Year=1927
|Key=सन १८५७
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
e139dhkh00h4xq1fqp7movqerll8r2i
पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/२६
104
110712
232405
2026-06-19T06:18:19Z
Annni07
6055
/* मुद्रितशोधन */
232405
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|४||{{center|योगसोपान—पूर्वचतुष्क.}}}}</noinclude>{{center|{{gap}}{{gap}}'''योगशास्त्रास पात्र व अधिकारी कोण.'''}}
{{center|ब्राह्मणक्षत्रियविशां स्त्रीशूद्राणां च पावनम् ।}}
{{center|शांतये कर्मणामन्यद्योगान्नास्ति विमुक्तये ॥ १ ॥}}
{{center|युवा वृद्धोऽतिवृद्धो वा व्याधिष्ठो दुर्बलोऽपि वा ।}}
{{center|अभ्यासात्सिद्धिमाप्नोति सर्वयोगेष्वतंद्रितः ॥ २ ॥ ( ह० प्र० )}}
{{gap}}'''अर्थ'''—ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व स्त्रिया तसेंच तरुण, वृद्ध, अति वृद्ध, व्याधिष्ठ व दुर्बलेंद्रिय या सर्वांस याचा अधिकार असून अभ्यासानें त्यांस त्याची सिद्धि होते. त्यांच्या मनास शांति व त्यांस मुक्ति देणारें योगावांचून दुसरें साधन नाहीं.
{{center|{{gap}}{{gap}}'''योगाभ्यासास पात्रता केव्हां येते.'''}}
{{center|कृतविद्यो जितः शांतः सत्यधर्मपरायणः ।}}
{{center|गुरुशुश्रूषणरतः पितृमातृपरायणः ॥ १ ॥}}
{{center|विध्युक्तकर्मसंयुक्तः शुचिर्भूत्वा समाहितः ।}}
{{center|त्रिकालस्नानसंयुक्तः स्वधर्मनिरतः सदा ॥ २ ॥ ( या० सं० )}}
{{gap}}'''अर्थ'''—जाणतेपणा संपादन करून, इंद्रियें जिंकून, शांति धरून, सत्यधर्म ( आर्यधर्म ) परायण असून, गुरु–आई–बाप यांच्या सेवेंत तत्पर, तसाच आश्रमधर्माने युक्त व त्रिकाल स्नानानें शुचिर्भूत होऊन स्वधर्माचे ठिकाणीं रममाण असा पुरुष योगारंभास पात्र होतो.
{{center|'''योगविद्या कोणास द्यावी व कोणास देऊं नये.'''}}
{{center|शठाय भक्तिहीनाय न देयं यस्य कस्यचित् ।}}
{{center|दत्ते च सिद्धिहानिः स्यात्सत्यं वच्मि च चंड ते ॥ १ ॥}}
{{center|शिश्नोदररतायैव न देयं वेषधारिणे ।}}<noinclude></noinclude>
acqse7txvuk6t2acnekimjsw98wagux
232406
232405
2026-06-19T06:33:54Z
Annni07
6055
232406
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|४||{{center|योगसोपान—पूर्वचतुष्क.}}}}</noinclude>{{center|{{gap}}योगशास्त्रास पात्र व अधिकारी कोण.}}
{{center|ब्राह्मणक्षत्रियविशां स्त्रीशूद्राणां च पावनम् ।}}
{{center|शांतये कर्मणामन्यद्योगान्नास्ति विमुक्तये ॥ १ ॥}}
{{center|युवा वृद्धोऽतिवृद्धो वा व्याधिष्ठो दुर्बलोऽपि वा ।}}
{{center|अभ्यासात्सिद्धिमाप्नोति सर्वयोगेष्वतंद्रितः ॥ २ ॥ ( ह० प्र० )}}
{{gap}}अर्थ—ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व स्त्रिया तसेंच तरुण, वृद्ध, अति वृद्ध, व्याधिष्ठ व दुर्बलेंद्रिय या सर्वांस याचा अधिकार असून अभ्यासानें त्यांस त्याची सिद्धि होते. त्यांच्या मनास शांति व त्यांस मुक्ति देणारें योगावांचून दुसरें साधन नाहीं.
{{center|{{gap}}योगाभ्यासास पात्रता केव्हां येते.}}
{{center|कृतविद्यो जितः शांतः सत्यधर्मपरायणः ।}}
{{center|गुरुशुश्रूषणरतः पितृमातृपरायणः ॥ १ ॥}}
{{center|विध्युक्तकर्मसंयुक्तः शुचिर्भूत्वा समाहितः ।}}
{{center|त्रिकालस्नानसंयुक्तः स्वधर्मनिरतः सदा ॥ २ ॥ ( या० सं० )}}
{{gap}}अर्थ—जाणतेपणा संपादन करून, इंद्रियें जिंकून, शांति धरून, सत्यधर्म ( आर्यधर्म ) परायण असून, गुरु–आई–बाप यांच्या सेवेंत तत्पर, तसाच आश्रमधर्माने युक्त व त्रिकाल स्नानानें शुचिर्भूत होऊन स्वधर्माचे ठिकाणीं रममाण असा पुरुष योगारंभास पात्र होतो.
{{center|योगविद्या कोणास द्यावी व कोणास देऊं नये.}}
{{center|शठाय भक्तिहीनाय न देयं यस्य कस्यचित् ।}}
{{center|दत्ते च सिद्धिहानिः स्यात्सत्यं वच्मि च चंड ते ॥ १ ॥}}
{{center|शिश्नोदररतायैव न देयं वेषधारिणे ।}}<noinclude></noinclude>
t6jtn644jzxiexy4fz3sa9porm6u8cm
232408
232406
2026-06-19T06:48:23Z
Annni07
6055
232408
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|४|योगसोपान—पूर्वचतुष्क.|}}</noinclude>{{center|{{gap}}'''योगशास्त्रास पात्र व अधिकारी कोण.'''}}
{{center|'''ब्राह्मणक्षत्रियविशां स्त्रीशूद्राणां च पावनम् ।'''}}
{{center|'''शांतये कर्मणामन्यद्योगान्नास्ति विमुक्तये ॥ १ ॥'''}}
{{center|'''युवा वृद्धोऽतिवृद्धो वा व्याधिष्ठो दुर्बलोऽपि वा ।'''}}
{{center|'''अभ्यासात्सिद्धिमाप्नोति सर्वयोगेष्वतंद्रितः ॥ २ ॥ ( ह० प्र० )'''}}
{{gap}}'''अर्थ—'''ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व स्त्रिया तसेंच तरुण, वृद्ध, अति वृद्ध, व्याधिष्ठ व दुर्बलेंद्रिय या सर्वांस याचा अधिकार असून अभ्यासानें त्यांस त्याची सिद्धि होते. त्यांच्या मनास शांति व त्यांस मुक्ति देणारें योगावांचून दुसरें साधन नाहीं.
{{center|{{gap}}'''योगाभ्यासास पात्रता केव्हां येते.'''}}
{{center|'''कृतविद्यो जितः शांतः सत्यधर्मपरायणः ।'''}}
{{center|'''गुरुशुश्रूषणरतः पितृमातृपरायणः ॥ १ ॥'''}}
{{center|'''विध्युक्तकर्मसंयुक्तः शुचिर्भूत्वा समाहितः ।'''}}
{{center|'''त्रिकालस्नानसंयुक्तः स्वधर्मनिरतः सदा ॥ २ ॥ ( या० सं० )'''}}
{{gap}}'''अर्थ—'''जाणतेपणा संपादन करून, इंद्रियें जिंकून, शांति धरून, सत्यधर्म ( आर्यधर्म ) परायण असून, गुरु–आई–बाप यांच्या सेवेंत तत्पर, तसाच आश्रमधर्माने युक्त व त्रिकाल स्नानानें शुचिर्भूत होऊन स्वधर्माचे ठिकाणीं रममाण असा पुरुष योगारंभास पात्र होतो.
{{center|'''योगविद्या कोणास द्यावी व कोणास देऊं नये.'''}}
{{center|'''शठाय भक्तिहीनाय न देयं यस्य कस्यचित् ।'''}}
{{center|'''दत्ते च सिद्धिहानिः स्यात्सत्यं वच्मि च चंड ते ॥ १ ॥'''}}
{{center|'''शिश्नोदररतायैव न देयं वेषधारिणे ।'''}}<noinclude></noinclude>
661s1otcxytbpb0uufwjlym8jkm21o1
पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/२७
104
110713
232409
2026-06-19T07:11:26Z
Annni07
6055
/* मुद्रितशोधन */
232409
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||यम, नियम, आसन आणि प्राणायाम.|५}}</noinclude>{{center|ऋजवे शांतचित्ताय गुरुभक्तिपराय च ।}}
{{center|कुलीनाय प्रदातव्यं भोगमुक्तिप्रदायकम् ॥ २ ॥}}
{{gap}}'''अर्थ'''—घेरंड ऋषि चंडकापालिकास सांगतात कीं, ही हठविद्या शठ व
भक्तिहीन पुरुषास सांगू नये. सांगितली असतां सांगणाराची सिद्धिहानि
निश्चयानें होते. केवळ पोट भरण्यावर व विषयसेवनावर ज्याची दृष्टि
आहे, तसेंच केवळ वेषधारी ( वंचक ) यांस योगविद्या देऊं नये.
सरळ व शांत चित्ताचा असून जो कुलीन, तसाच गुरुभक्तिपरायण
अशा मनुष्यास भोग ( प्रापंचिक सुख ) आणि मुक्ति ( मोक्ष ) देणारी
योगविद्या अवश्यमेव द्यावी.
{{center|'''योगाला विघ्नें कोणतीं.'''}}
{{center|'''आलस्यं प्रथमो विघ्न उपभोगो द्वितीयकः ।'''}}
{{center|'''कीर्तिस्तृतीयकः प्रोक्त औदासीन्यं चतुर्थकम् ॥ १ ॥'''}}
{{center|'''विघ्नाश्चत्वार एव हि प्राप्नुवंति पुनः पुनः ।'''}}
{{center|'''तस्मात्प्रबलधैर्येण योगी विघ्नान्निवारयेत् ॥ २ ॥'''}}
{{gap}}'''अर्थ'''—योगाभ्यासास आळस हें प्रथम विघ्न, विषयोपभोग हं दुसरें
विघ्न, लोकांत कीर्ति होणें हें तिसरें विघ्न, व औदासीन्य उत्पन्न होणें
हें चवथें विघ्न आहे व हीं वारंवार येणारीं आहेत. यासाठीं अभ्यासानें
व मोठ्या धैर्यानें हीं चारही विघ्नें निवारण करून अभ्यास करावा.
{{center|'''योगनाशक गोष्टी.'''}}
{{center|'''अत्याहारः प्रयासश्च प्रजल्पो नियमग्रहः ।'''}}
{{center|'''जनसंगश्च लौल्यं च षड्भिर्योगो विनश्यति ॥ १ ॥ ( ह० प्र० )'''}}
{{gap}}'''अर्थ'''—अति आहार, विशेष श्रम, फार बोलणें, उपोषणें करणें ( एका-
दशी इत्यादि आवश्यक उपोषणांखेरीज ), योगाभ्यासी नव्हेत अशा<noinclude></noinclude>
af4feto5bqem3js7lsi6ulg2kxhnmcx
पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/२८
104
110714
232410
2026-06-19T07:40:47Z
Annni07
6055
/* मुद्रितशोधन */
232410
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|६|योगसोपान-पूर्वचतुष्क.|}}</noinclude>लोकांची संगति करणें व मनाची अस्थिरता, या गोष्टी योगास नष्ट करणाऱ्या आहेत. यासाठीं योगाभ्यासी यानें यांपासून दूर असावें.
{{center|योगसाधक गोष्टी.}}
{{center|उत्साहात्साहसाद्धैर्यात्तत्त्वज्ञानाच्च निश्चयात् ।<br>जनसंगपरित्यागाच्च षड्भिर्योगः प्रसिध्यति ॥ १ ॥}}
{{center|अर्थ—उत्साह, साहस, धैर्य, योगाभ्यासानें मोक्ष मिळणार असा भावनात, यावज्जीव अभ्यास चालविण्याचा निश्चय, विषयी लोकांच्या संगतीचा त्याग या सहा गोष्टी योगाभ्यासास विशेष सिद्धि देणाऱ्या आहेत.}}
{{center|योगारंभीं पाळावयाचे नियम.}}
{{center|वह्निस्त्रीपथिसेवानामादौ वर्जनमाचरेत् ॥ ( ह० प्र० )}}
अर्थ—योगाभ्यास करावयाचा म्हणजे प्रथम अग्निसेवा म्हणजे शेकत बसणें वगैरे, स्त्रीसेवा म्हणजे स्त्रियांची संगत—एकांतीं भाषण इत्यादि, आणि अतिमार्गक्रमण करणें हें सर्व वर्ज करावें.
{{center|वर्जयेद्दुर्जनप्रान्तं वह्निस्त्रीपथिसेवनम् ।<br>प्रातःस्नानोपवासादि कायक्लेशविधिं तथा ॥२१॥ ( गो० सं० )}}
अर्थ—दुर्जन ज्यांत आहेत असा प्रांत, अग्नि, अति थंडीचे दिवसांत मर्यादित शेकणें, स्त्रीविषयाचा अतिरेक, महायात्रादि शिवाय मार्ग चालणें, प्रातःस्नान, उपवास व शरीरास कष्ट होतील असें कोणतेंही काम या सर्वांचा गृहस्थाश्रमीं त्याग करावा.
{{center|योगसिद्धि कोणास होते.}}
{{center|न वेषधारणं सिद्धेः कारणं न च तत्कथा ।<br>क्रियैव कारणं सिद्धेः सत्यमेतन्न संशयः ॥ १ ॥ ( ह० प्र० )}}<noinclude></noinclude>
azy69d8p1xnxv9ip9z6q0cmx49k2gn3
पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/२९
104
110715
232411
2026-06-19T08:21:03Z
Annni07
6055
/* मुद्रितशोधन */
232411
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||यम, नियम, आसन आणि प्राणायाम.|७}}</noinclude>{{gap}}'''अर्थ'''—केवळ योग्याच्या वेषानें किंवा योगकथा वर्णन करून योग-
सिद्धि होत नाहीं, तर योगक्रियाच केली पाहिजे म्हणजे योगसिद्धि होते.
{{center|क्रियायुक्तस्य सिद्धिः स्यादक्रियस्य कथं भवेत् ।}}
{{center|न शास्त्रपाठमात्रेण योगसिद्धिः प्रजायते ॥ १ ॥ ( ह० प्र० )}}
{{gap}}'''अर्थ'''—योगक्रिया करणाराला सिद्धि होते ; क्रिया न करणाराला आणि
केवळ योगशास्त्रपठण करणाराला सिद्धि होत नाहीं.
{{rule}}
{{center|'''योगाचें प्रथमांग.'''}}
{{center|'''यम.'''}}
{{center|अहिंसा सत्यमस्तेयं ब्रह्मचर्य क्षमा धृतिः ।}}
{{center|दयार्जवं मिताहारः शौचं चैव यमा दश ॥ १ ॥ ( या० सं० )}}
{{gap}}'''अर्थ'''—१ अहिंसा २ सत्यम् ३ अस्तेयम् ४ ब्रह्मचर्यम् ५ क्षमा ६ धृतिः
७ दया ८ आर्जवम् ९ मिताहारः १० शौचम् हे दहा यम आहेत. त्या
प्रत्येकाचें लक्षण क्रमानें दिलें आहे.
{{center|'''अहिंसा.'''}}
{{center|कर्मणा मनसा वाचा सर्वभूतषु सर्वदा ।}}
{{center|अक्लेशजननं प्रोक्तमहिंसात्वेन योगिभिः ॥ १ ॥}}
{{gap}}'''अर्थ'''—काया, वाचा आणि मन यांहीं कोणाही जीवास केव्हांही क्लेश न
होऊं देणें यासच अहिंसा म्हणतात. ही संपादिल्यास व्याघ्र-सर्प-वृश्चि-
कादि दुष्ट प्राणीही दंशादि करीत नाहींत.
{{center|'''सत्यम्.'''}}
{{center|सत्यं भूतहितं प्रोक्तं नायथार्थाभिभाषणम् ॥}}<noinclude></noinclude>
ml6swctofe8afzjaov4ojx464ffopiq
पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/१०६
104
110716
232412
2026-06-19T08:34:30Z
Annni07
6055
/* मुद्रितशोधन */
232412
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{center|'''विक्रीस तयार.'''}}
{{rule}}
{{center| }}
{{right|रु० आ०}}
योगवासिष्ठ ( श्रीरंगनाथ स्वामीकृत ){{right|२{{gap}}८}}
योगवासिष्ठ ( माधवदासकृत ){{right|१{{gap}}८}}
योगवासिष्ठ भाषांतर ३ भाग ( चिपळूणकर ){{right|१५{{gap}}०}}
योगवासिष्ठ भाषांतर २ भाग ( यंदे ){{right|१०{{gap}}०}}
ज्ञानेश्वरी ( कुंटे ){{right|२{{gap}}८}}
ज्ञानेश्वरी ( साखरेबुवा ){{right|८{{gap}}०}}
ज्ञानेश्वरी ( चित्रशाळा ){{right|२{{gap}}०}}
अमृतानुभवरहस्य, ( राजारामबुवा ){{right|२{{gap}}८}}
अमृतानुभवरहस्य, ( साखरेबुवा ){{right|१{{gap}}८}}
श्रीदासबोध ( पोथी ){{right|२{{gap}}०}}
श्रीदासबोध सार्थ ( पांगारकर ){{right|४{{gap}}०}}
श्रीदासबोध ( बुकपॉकेट ){{right|१{{gap}}४}}
श्रीदासबोध ( बुकपॉकेट धुळें ){{right|२{{gap}}०}}
टपाल खर्च निराळा.<br>
'''हीं व दुसरीं सर्व प्रकारचीं पुस्तकें मिळण्याचा पत्ता—'''
{{x-larger|{{right|'''तुकाराम पुंडलिक शेट्ये,'''}}}}
{{right|'''बुकसेलर्स आणि पब्लिशर्स,'''}}
{{right|माधवबाग—मुंबई, नं० ४}}<noinclude></noinclude>
qo0f81h4g6mxab0k2su2d42ftwdyl6b
पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/१०५
104
110717
232413
2026-06-19T11:26:46Z
Annni07
6055
/* मुद्रितशोधन */
232413
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||योगसोपान—प्राणायाम प्रकरण.|८}}</noinclude>{{gap}}'''अर्थ'''—भुजंगाकार—नागमोडीच्या आकारानें—शयन करणारी “ कुंड
लिनी ” नांवाची शक्ति आहे. हिच्या वरती दहा आणि खालती दहा
नाड्या सर्व शरीरांत आहेत. ( कुंडलिनीचें चित्र आसन प्रकरणाच्या
सुरुवातीला दिलें आहे )
{{border|{{center|'''योगसोपान पूर्वचतुष्क संपूर्ण.'''}}}}<noinclude></noinclude>
oewxj3zkf3rhoxq2j3gan596j5y9y18
पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/१०४
104
110718
232414
2026-06-19T11:32:48Z
Annni07
6055
/* मुद्रितशोधन */
232414
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|८२|योगसोपान—प्राणायाम प्रकरणं.|}}</noinclude>{{gap}}प्राणायाम करीत असतांना इंद्रियांना कंप सुटला तर मध्यम प्राणा-
यामाची सिद्धि झाली असें समजावें.
{{gap}}प्राणायाम करीत असतांना “ मांडुकी वृत्ति ” म्हणजे कुल्यासह
आसन हालूं लागलें म्हणजे उत्तम प्राणायामाची सिद्धि झाली असें
समजावें.
{{center|'''क्रियाशुद्धि हीच योगाची सिद्धि.'''}}
{{center|'''इडापिंगलादि नाडी.'''}}
{{center|इडा वामे स्थिता भागे पिंगला दक्षिणा स्मृता ।}}
{{center|सुषुम्ना मध्यदेशे तु गांधारी वामचक्षुषि ॥}}
{{right|( शि० स्व० )}}
{{gap}}'''अर्थ'''—इडानाडी वामभागीं आहे. पिंगला नाडी दक्षिणभागीं आहे.
सुषुम्ना मध्यप्रदेशीं आहे व गांधारी वामनेत्राचे ठिकाणीं आहे.
{{gap}}इडा नाडी वामभागीं असल्यामुळें डाव्या नाड्या त्या सर्व इडा
समजाव्या. पिंगला नाडी दक्षिणभागीं असल्यामुळें उजव्या नाड्या सर्व
पिंगला समजाव्या. इडेच्या ठिकाणीं चंद्र व पिंगलेच्या ठिकाणीं सूर्य
व सुषुम्नेच्या ठिकाणीं शंभु स्वरूप आहे.
{{gap}}इडा, पिंगला व सुषुम्ना ह्या नाड्या प्राणमार्गाचा आश्रय करून अस-
तात व ह्या मुख्य आहेत. आणि प्राण, अपान, व्यान, उदान व समान
हे पांच प्राणवायु नाड्यांना आश्रयभूत आहेत.
{{center|'''कुंडलिनी.'''}}
{{center|नाडीस्था कुंडलीशक्तिर्भुजंगाकारशायिनी ।}}
{{center|ततो दशोर्ध्वगा नाड्यो दशैवाधः प्रतिष्ठिताः ॥}}<noinclude></noinclude>
7akd0okt40i9uo9wouix2hfvguf7lb6
232415
232414
2026-06-19T11:33:37Z
Annni07
6055
232415
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|८२|योगसोपान—प्राणायाम प्रकरणं.|}}</noinclude>{{gap}}प्राणायाम करीत असतांना इंद्रियांना कंप सुटला तर मध्यम प्राणा-
यामाची सिद्धि झाली असें समजावें.
{{gap}}प्राणायाम करीत असतांना “ मांडुकी वृत्ति ” म्हणजे कुल्यासह
आसन हालूं लागलें म्हणजे उत्तम प्राणायामाची सिद्धि झाली असें
समजावें.
{{center|'''क्रियाशुद्धि हीच योगाची सिद्धि.'''}}
{{center|'''इडापिंगलादि नाडी.'''}}
{{center|इडा वामे स्थिता भागे पिंगला दक्षिणा स्मृता ।}}
{{center|सुषुम्ना मध्यदेशे तु गांधारी वामचक्षुषि ॥}}
{{right|( शि० स्व० )}}
{{gap}}'''अर्थ'''—इडानाडी वामभागीं आहे. पिंगला नाडी दक्षिणभागीं आहे.
सुषुम्ना मध्यप्रदेशीं आहे व गांधारी वामनेत्राचे ठिकाणीं आहे.
{{gap}}इडा नाडी वामभागीं असल्यामुळें डाव्या नाड्या त्या सर्व इडा
समजाव्या. पिंगला नाडी दक्षिणभागीं असल्यामुळें उजव्या नाड्या सर्व
पिंगला समजाव्या. इडेच्या ठिकाणीं चंद्र व पिंगलेच्या ठिकाणीं सूर्य
व सुषुम्नेच्या ठिकाणीं शंभु स्वरूप आहे.<br>
{{gap}}इडा, पिंगला व सुषुम्ना ह्या नाड्या प्राणमार्गाचा आश्रय करून अस-
तात व ह्या मुख्य आहेत. आणि प्राण, अपान, व्यान, उदान व समान
हे पांच प्राणवायु नाड्यांना आश्रयभूत आहेत.
{{center|'''कुंडलिनी.'''}}
{{center|नाडीस्था कुंडलीशक्तिर्भुजंगाकारशायिनी ।}}
{{center|ततो दशोर्ध्वगा नाड्यो दशैवाधः प्रतिष्ठिताः ॥}}<noinclude></noinclude>
dzrltrl7g2fn6pi3kmhq9bfkh0mu1wo
पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/१०३
104
110719
232416
2026-06-19T11:47:20Z
Annni07
6055
/* मुद्रितशोधन */
232416
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||योगसोपान—प्राणायाम प्रकरणं.|८१}}</noinclude>करावा. ह्याला भस्रिका म्हणतात. ह्याच्या योगानें वात, पित्त, कफ
यांचा नाश होऊन जठराग्नि प्रदीप्त होतो.
{{center|'''भ्रामरीविधिः ।'''}}
{{gap}}आसनबद्ध होऊन मुख बंद करून दोन्ही ( इडा पिंगला ) नाड्यांनीं
भुंग्या सारखा नाद करीत पूरक करावा. नंतर कुंभक करून पुनः भुंग्या
सारख्या नादानें रेचक करावा. ह्याच्या योगानें मनास अतुल आनंद
प्राप्त होतो.
{{center|'''मूर्छा.'''}}
{{gap}}आसनबद्ध होऊन भरपूर पूरक करावा. नंतर जालंधरबंध करून मग
सावकाश रेचन करावें. ह्याच्या योगानें मनास मूर्छा उत्पन्न होऊन
उत्तम सुख होतें.
{{center|'''प्लाविनी.'''}}
{{gap}}मत्स्यासन करून पोटांत पूरकानें भरपूर वायु भरावा व कुंभक
करावा. असें केल्यानें योगी कमलपत्राप्रमाणें पाण्यावर तरला जातो. हें
अभ्यासाचें फळ आहे.
{{gap}}ह्या प्राणायाम प्रकरणांतील कुंभकादिकांची सिद्धि होण्यास त्या त्या
क्रमानें मनःपूर्वक झटून अभ्यास केला पाहिजे. एक एक प्रकारचा कुंभक
करून तो तो सिद्ध झाला म्हणजे दुसरा करावा. एकदमच सर्व प्रकारचे
करण्याचा प्रयत्न केल्यास एकही सिद्ध होणार नाहीं, हें साधकानें पक्कें
ध्यानांत ठेवावें.
{{center|'''प्राणायाम-सिद्धिलक्षण.'''}}
{{gap}}प्राणायाम करीत असतांना घाम आला तर कनिष्ठ प्राणायामाची सिद्धि झाली असें समजावें.<noinclude>{{center|८}}</noinclude>
azrf78iq2myzgp5ioj8xdu7va3upvx2
पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/१०२
104
110720
232417
2026-06-19T11:50:04Z
Annni07
6055
/* मुद्रितशोधन */
232417
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|८०|योगसोपान—प्राणायाम प्रकरणं.|}}</noinclude>{{center|'''सूर्येभेदन विधिः ।'''}}
{{gap}}उजव्या नाकपुडीनें—पिंगलेनें—पूरक करून यथाशक्ति कुंभक करावा
आणि डाव्या नाकपुडीनें—इडेनें—रेचक करावा. हाच क्रम नित्य ठेवावा.
ह्याला सूर्यभेदन म्हणतात. ह्यापासून जरेचा नाश होतो. अपमृत्यु टळतो.
कुंडलिनीची जागृति होते. जठराग्नीची वृद्धि होते. शरीरांत सूर्यासारखें
तेज उत्पन्न होतें.
{{center|'''उज्जायीविधिः ।'''}}
{{gap}}मुख बंद करून एकदम दोन्ही नाकपुड्यांनीं सावकाश पूरक करून,
यथावकाश कुंभक करावा व इडेनें सावकाश रेचक करावा. ह्याला
उज्जायी म्हणतात. ह्याच्या योगानें कफदोष, क्रूर वायु, अजीर्ण, आम-
वात, क्षय, कास, ज्वर व प्लीहा इत्यादिकांचें निवारण होतें, व आंगांत
उष्णता उत्पन्न होतें.
{{center|'''सीत्कारीविधिः ।'''}}
{{gap}}दातांच्या दोन्ही कवळ्यांच्या मध्यें जीभ ठेवून, बाहेरील वायु
जोरानें ओढून मुखांत घ्यावा. तो गार असतो. नंतर कुंभक करून इडा
व पिंगला दोहींनीं रेचक करावा. ह्याला सीत्कारी म्हणतात. ह्याच्या
योगानें अतुल रूप प्राप्त होतें. शरीरांत थँडोसा येतो.
{{center|'''शीतलीविधिः ।'''}}
{{gap}}दोन्ही ओठांच्या बाहेर पक्ष्याच्या चोंचीसारखी जीभ करून साव-
काश पूरक करून कुंभक करावा व इडापिंगलांनीं रेचक करावा. ह्याला
शीतलीविधि म्हणतात. ह्याच्या योगानें गुल्म, प्लीहा, ज्वर, पित्त इत्या-
दिकांचा नाश होतो व क्षुधा, तृषा ह्यांची शांति रहाते.
{{center|'''भस्रिकाविधिः ।'''}}
{{gap}}पद्मासन करून इडेनें पूरक व पिंगलेनें रेचक, कुंभकरहित एकदम{{nop}}<noinclude></noinclude>
9w3hcsgz4a38gq0xq6bac7t4s4l5yej