आजोबागड
Wikipedia कडून
| किल्ला | |
|---|---|
| नाव | आजोबागड |
| उंची | |
| प्रकार | गिरिदुर्ग |
| चढाईची श्रेणी | मध्यम |
| ठिकाण | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
| जवळचे गाव | माळशेज |
| डोंगररांग | बालाघाट |
| सध्याची अवस्था | |
बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला आजोबाचा डोंगर एखाद्या पुराण पुरुषासारखा दिसतो. या गडाची ३,००० फुट उभी भिंत ही प्रस्तरारोहकांसाठी एक आव्हान व आगळे-वेगळे लक्ष्य आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
पुराणकथेनुसार, याच गडावर बसुन वाल्मिकींनी रामायण लिहिले. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकींना 'आजोबा' म्हणत असत, म्हणूनच या गडाचे नाव आजोबागड असे पडले. गडावर वाल्मिकींचा आश्रम व समाधी आहे.
[संपादन] छायाचित्रे
[संपादन] गडावर जाण्याच्या वाटा
कल्याण - मुरबाड - माळशेज - डोळखांब या मार्गाने डेणे या गावी यावे. गावातुन जाताना मधे एक पठार लागते. पठारावर तीन वाटा एकत्र येतात. यातील एक बैलगाडीची वाट सरळ वाल्मिकींच्या आश्रमाजवळ घेउन येते. दुसरी वाट कात्राबाईच्या डोंगरातून पुढे कुमशेत या गावास जावुन मिळते, तर तिसरी वाट जंगलात जाते. या वाटेने जाणेच सोयिस्कर.
[संपादन] सूचना
गडावर सापांचे वास्तव्य असल्याने, योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

