पन्हाळा
Wikipedia कडून
पन्हाळगड हा कोल्हापुरातील महत्वाचा कील्ला.पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात.पन्हाळ्याला साधारण १२०० वर्षांचा इतिहास आहे.राजा भोजाने हा किल्ला बांधला.इथेच छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकुन पडले होते.शेवटी गुप्तहेरांनी शोधुन काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरुन सटकले.पुढे पावनखिंडीत(घोडखिंड)नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जौहरच्या सैन्याला आपल्या प्राणांचे बलिदान देउन थोपविले.

