पानिपत
Wikipedia कडून
पानिपत भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.
हे शहर पानिपत जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.दिल्लीपासून ९० कि.मी. वर असून राष्ट्रिय महामार्ग १ वर आहे. हे शहर भारतीय इतिहासाच्या दृष्टिने महत्वपुर्ण आहे. या शहरात तीन युद्धे लढली गेली ज्यामुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण लागले.
[संपादन] इतिहास
या शहराचे संदर्भ महाभारतात आढळतात. ध्रुतराष्ट्राने कुरु साम्राज्याचे विभाजन केले व पांडवांना यमुनेच्या पश्चिमेकडील भाग वाटणी मध्ये दिला. पांडवांनी आपल्या हिमतीवर पाच शहरांची निर्मीती केलि. त्यापैकि एक शहर होते पांडुप्रस्थ तेच आज पानीपत या नावाने ओळ्खले जाते.
इतिहासात पानीपत ला रणभूमी संबोधले जाते. त्याला कारण आहे या शहराच्या आसपास झालेलि तीन युद्धे. या तिन्हि युद्धांमुळे भारतिय इतिहासाला वेगळे वळण मिळाले व असेहि म्हणले जाते कि हि युद्धे झालि नसति अथवा युद्धाचा निर्णय जर वेगळा असता तर आजचा भारत नक्किच वेगळा दिसला असता.
पानिपत चे पहिले युद्ध १५२६ मध्ये दिल्लिचा सुलतान इब्राहिम लोधि आणि बाबर मध्ये लढले गेले. बाबरच्या छोट्या परंतु शिस्तबद्ध सेना आणि तोफां यांच्या बळावर लोधिच्या एक लाखापेक्षा मोठ्या फौजेचा लिलया पराभव केला आणि भारतात मुघल सत्ते चा पाया घातला.
पानिपत चे दुसरे युद्ध १५५६ मध्ये हेमु आणि मुघलांच्यात लढले गेले. यावेळि पुन्हा मुघलांची सरशी झालि व भारतात मुघलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले.
पानिपत चे तिसरे युद्ध १५ जानेवारी १७६१ रोजी मराठे आणि अहमद शहा अब्दाली यांच्यात झाले. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठि हानी झालि. या युद्दामुळे मराठ्याचे लश्करी वर्चस्व संपुष्टात आले. ज्याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफवण्यास झाला.
लेखक विश्वास पाटील यांची पानिपत नावाची एक कादंबरीही प्रसिद्ध आहे.

