विष्णूचे अवतार
Wikipedia कडून
हिंदु मिथकशास्त्रानुसार भगवान विष्णु हे भूतलावर अनेक वेळा मनुष्यरूपात जन्म घेतात. त्यातील प्रत्येक जन्म हा अवतार समजला जातो, तसेच काही अवतार हे पूर्ण स्वरूपात तर काही अंश स्वरूपात मानले जातात. हा लेख विष्णूंच्या अवतारांची थोडक्यात माहिती देईल.
[संपादन] पार्श्वभूमी
[संपादन] नेमका कोणाचा अवतार
भगवान विष्णू हे भूतलावर अवतार घेतात ही संकल्पना हिंदु पुराणांपासून प्रचलित आहे. त्यापैकी पद्म पुराण, विष्णु पुराण, मत्स्य पुराण, वराह पुराण, नृसिंह पुराण, इत्यादि स्रोतांमधून अनेक संदर्भ सापडतात. यामध्ये अनेक गुंतागुंतीच्या कथा आणि उपकथा असून काही पुराणांमध्ये विरोधाभासही आढळतो, उदा. नृसिंह अवतार हा शिव पुराण शिवाचा सांगते तर विष्णु पुराण आणि पद्म पुराण विष्णूचा सांगते.
[संपादन] अवतार घेण्यामागील कारणे
पुराणांमधील विविध स्रोतांमधून योग्य उदाहरणांची निवड करून भगवान विष्णूंची अवतार घेण्यामागील प्रेरणा शोधता येऊ शकते. या संदर्भात किमान दोन कथा सांगितल्या जातात.
[संपादन] भूतलावरील अराजक
भगवान विष्णूंना हिंदु त्रिमूर्तींपैकी एक मानतात. ब्रम्हा सृष्टिनिर्मिती करतात, विष्णू त्या सृष्टीचे पालक आहेत, तर शिव त्यातील जिवांचा विनाश करतात. थोडक्यात जन्म, जीवन आणि मृत्यू याचे त्रिमूर्ती हे द्योतक आहे. भूतलावर अराजक माजल्यास सृष्टिपालक या नात्याने विष्णू अवतार घेतात आणि विस्कटलेली समाजव्यवस्थेची घडी पुन्हा एकवार बसवितात. हे चक्र अनंत काळापासून सतत चालू आहे आणि पुढे अनंत काळापर्यंत चालूच राहील. या बाबतीत अधिक माहितीसाठी हिंदु संस्कृतीतील सृष्टीचक्र हा लेख पहावा.
[संपादन] उपकथा
सृष्टिनिर्मितीनंतर काही काळाने भूतलावर सर्वत्र अराजक माजले. त्यावेळी भूदेवीने त्रस्त होऊन देवांचा प्रमुख इंद्र यास मदतीची याचना केली. तेव्हा इंद्राने सर्व देवांची सभा बोलाविली आणि सर्वांच्या मतानुसार भगवान विष्णूंना विनंती करण्यात आली की त्यांनी भूदेवीचे संकट दूर करावे. परंतु त्यासाठी पृथ्वीवर मनुष्य जन्म घेणे अनिवार्य होते. तसेच केवळ एकदा जन्म घेऊन अराजकाचे संकट कायमचे संपणारे नव्हते तर ती गरज पुनःपुनः निर्माण होणारी आहे. त्याप्रमाणे विष्णूंनी भूदेवीला वचन दिले की ते प्रत्येक वेळेस अवतार घेऊन तिचे दुःख नाहीसे करतील. अशा प्रकारे अवतारांचे चक्र सुरू झाले. या उपपत्तीनुसार अवतारांची संख्या जरी अगणित असली तरी कोणत्याही दोन सलग प्रलयांमधील काळात दहा अवतार होतात.
[संपादन] ऋषींचा शाप
दुसरी कथा यापासून वेगळी आहे आणि तिचा आधार केवळ एकाच स्रोतात आहे (बहुधा भागवत). या कथेनुसार भगवान विष्णूचा एक भक्त असलेला राजा (बहुधा राजा अंबरिष) एकदा एकादशीचे व्रत सोडण्यासाठी द्वादशीच्या दिवशी पूजेस बसला होता. त्यावेळेस दुर्वास ऋषी तेथे आले. त्यांनी राजाला थोडा वेळ वाट पाहण्यास सांगितले आणि ते स्नानास निघून गेले. ऋषी जाऊन बराच वेळ झाला आणि पूजेची वेळ टळून जात होती. द्वादशीला ते व्रत सोडणे अनिवार्य असल्याचे राजाला सांगण्यात आले होते आणि त्याप्रमाणे राजाने पूजेस प्रारंभ केला. तेवढ्यात ऋषींचे तेथे आगमन झाले आणि राजाला पूजा करताना बघून क्रुद्ध झालेल्या ऋषींनी राजास शाप दिला की 'भूतलावर दहा वेळा जन्म घेतल्यानंतरच तो मोक्षास पात्र होईल'. तेव्हा भगवान विष्णू तेथे प्रकट झाले. दुर्वास ऋषींनी, अंबरिष राजाने आणि सर्वांनी त्यांना वंदन केले. राजाला दिलेला शाप हा अन्याय्य असल्याचे सांगून तसेच दिलेला शाप परत घेता येत नसल्याने शेवटी भगवंतांनी तो शाप स्वतःवर घेतला. यामुळे त्यांना दहा वेळा पृथ्वीवर जन्म घेणे प्राप्त झाले आणि त्यामुळे अंती सर्वांचेच कल्याण झाले.
[संपादन] नेमकी संख्या
सद्यस्थितीत अवतारांची नेमकी संख्या दहा मानली जाते. तथापि ही केवळ एकच संख्या नसून बारा, सोळा पासून चोवीस, तीस पर्यंत संख्या सांगितल्या जातात. यामागील कारणे अनेक आहे. जसे की पूर्णावतार आणि अंशावतार यांची एकत्रित संख्या. तसेच काही वेळा इतर देवतांचे अवतार विष्णूंच्या अवतारांमध्ये गणले जातात. परंतु किमान दहा ही सध्या विष्णु अवतारांची सर्वमान्य संख्या आहे. अवतार कितीही मानले तरी त्या अवतारांमध्ये ह्या दशावतारांचा समावेश असतोच. अवतारांचा नेमका कालक्रम काही सूचींमध्ये चुकीचा असण्याची शक्यता आहे. त्याची खात्री असल्यास त्याप्रमाणे दुरुस्ती करावी अथवा विष्णूचे अवतार येथे संदेश ठेवावा.
[संपादन] दहा अवतार (दशावतार)
- मत्स्य
- कूर्म
- वराह
- नृसिंह (नरसिंह
- वामन
- राम (परशुराम, जामदग्न्य)
- रामचंद्र (दाशरथी राम)
- कृष्ण
- गौतम बुद्ध (किंवा पांडुरंग
- कल्कि
[संपादन] बारा अवतार
दशावतार +
[संपादन] सोळा अवतार
बारा पूर्णावतार अधिक काही अंशावतार मिळून सोळा अवतार गृहीत धरले आहेत.
बारा अवतार +
- हयग्रीव (पूर्णावतार)
- हनुमान (अंशावतार) (शिव-विष्णु अंशावतार)
- लक्ष्मण (अंशावतार) (शेष-विष्णु अंशावतार)
- बलराम (अंशावतार) (शेष-विष्णु अंशावतार)
[संपादन] चोवीस अवतार
[संपादन] एक सूची
सोळा अवतार अधिक काही अंशावतार मिळुन चोवीस अवतार गृहीत धरले आहेत.
- हयग्रीव (पूर्णावतार)
- दत्तात्रेय (ब्रम्हा-विष्णु-शिव अंशावतार)
- आदि शंकराचार्य (शिव-विष्णु अंशावतार)
- नृसिंह सरस्वती (मूलतः दत्तात्रेय अवतार. पण दत्तात्रेय हे ब्रम्हा-विष्णु-शिव अंश असल्यामुळे विष्णु अंशावतार)
- भगवान व्यास (अंशावतार)
- धन्वंतरी (अंशावतार)
- मोहिनी (पूर्णावतार)
[संपादन] दुसरी सूची
दहा पूर्णावतार +
- आदि पुरूष (पूर्णावतार)
- सनतकुमार (अंशावतार)
- नारद (अंशावतार)
- नर नारायण (अंशावतार)
- कपिल मुनी (अंशावतार)
- दत्तात्रेय (अंशावतार)
- यज्ञ (अंशावतार)
- ऋषभ (अंशावतार)
- पृथु (अंशावतार)
- कश्यप ऋषी (अंशावतार)
- धन्वंतरी (अंशावतार)
- मोहिनी (अंशावतार)
- हयग्रीव (पूर्णावतार)
[संपादन] तीस अवतार
दहा पूर्णावतार +
- आदि पुरूष (पूर्णावतार)
- सनतकुमार (अंशावतार)
- नारद (अंशावतार)
- नर नारायण (अंशावतार)
- अजित (पूर्णावतार)
- हयग्रीव (पूर्णावतार)
- कपिल मुनी (अंशावतार)
- दत्तात्रेय (अंशावतार)
- यज्ञ (अंशावतार)
- ऋषभ (अंशावतार)
- पृथु (अंशावतार)
- कश्यप ऋषी (अंशावतार)
- धन्वंतरी (अंशावतार)
- मोहिनी (पूर्णावतार)
- हनुमान (शिव-विष्णु अंशावतार)
- लक्ष्मण (शेष-विष्णु अंशावतार)
- व्यास (अंशावतार)
- बलराम (अंशावतार) (शेष-विष्णु अंशावतार)
- आदि शंकराचार्य (शिव-विष्णु अंशावतार)
- नृसिंह सरस्वती (मूलतः दत्तात्रेय अवतार. पण दत्तात्रेय हे ब्रम्हा-विष्णु-शिव अंश असल्यामुळे विष्णु अंशावतार)
[संपादन] दशावतार तसेच इतर अवतार
[संपादन] मत्स्य
दशावतारांमध्ये हा पहिला अवतार.
भूदेवीच्या विनंतीच्या कथेनुसार अराजक दूर करण्यास विष्णूंनी प्रथम प्रलय आणण्याचे ठरविले. या प्रलयामध्ये केवळ काही मोजक्या चांगल्या व्यक्ती वाचणार होत्या आणि त्यामध्ये राजा चाक्षुष प्रमुख होता. हाच राजा पुढे मनु नावाने प्रसिद्ध झाला. या प्रलयामध्ये भगवान विष्णूंनी महाकाय माशाचे रूप घेतले आणि राजाला वाचविले. त्याची संतती आणि पिढ्या आज 'मानव' किंवा 'मनुष्य' म्हणून ओळखल्या जातात. दोन मनूंमधील काळास 'मन्वंतर' म्हणतात. या संदर्भात सविस्तर कथा मत्स्यावतार या लेखात मिळेल.
[संपादन] कूर्म
[संपादन] अजित
[संपादन] वराह
आधिक माहितीकरिता वराह अवतार लेख वाचा.

