कल्याण तालुका
Wikipedia कडून
कल्याण हा ठाणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. कल्याण शहर हे मुंबई नागरी क्षेत्रातील (urbun agglomeration) एक उपनगर आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका याच तालुक्यात समाविष्ट आहे.
[संपादन] कल्याण शहराचा भूगोल
कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे. कल्याण शहर मुंबई शहराच्या ४८ किमी ईशान्येला स्थित आहे. मुंबईत वाढणारी प्रचंड गर्दी व तसेच शासनाचे अनुकूल धोरण या सर्व घटनांमुळे ऒद्यॊगिक क्षेत्रे आणि उद्योजक कल्याण शहराकडे प्रचंड आकर्षित होत आहेत.
मुंबई शहरापासून जवळ आणि त्याचप्रमाणे प्रदूषणाची पातळी कमी आहॆ.
कल्याण जंक्शन हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतूकीसाठी अतिशय महत्वाचे आहे. छत्रपती शिवाजी टर्मीनस येथून सुरु होणारी मध्य रेल्वेची लाईन कल्याण जंक्शन येथे दोन भागांमध्ये विभाजित होते.

