रत्नागिरी
Wikipedia कडून
रत्नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे.
| रत्नागिरी | |
| जिल्हा | रत्नागिरी |
| राज्य | महाराष्ट्र |
| लोकसंख्या | ७०,३३५ २००१ |
| दूरध्वनी संकेतांक | ०२३५२ |
| टपाल संकेतांक | ४१५६१२ |
| वाहन संकेतांक | MH-०८ |
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
रत्नागिरीचा किल्ला विजापूरच्या आदिलशाही सल्तनतीने बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची डागडुजी करून तो वापरात आणला. इ.स. १७३१मध्ये सातार्याचा छत्रपतींनी हा किल्ला जिंकला व इ.स. १८१८मध्ये पेशव्यानी तो इंग्रजांच्या स्वाधीन केला.
[संपादन] ओळख
हे शहर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ते भारताच्या पश्चिम किनार्यावरील एक बंदर आहे. रत्नागिरी शहर पूर्णपणे डोंगराच्या उतारावर वसलेले आहे.
ब्रम्हदेशचा राजा थिबा ह्याला इंग्रजांनी रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत ठेवले होते. त्याचे निवासस्थान थिबा पॅलेस हे आता रत्नागिरीतील मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र आहे.
रत्नागिरी हे लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थळ आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनासुद्धा इंग्रजांनी रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. तेथे त्यांनी अनेक समाजपयोगी कामे केली. त्यांच्या पुढाकाराने निर्माण झालेले पतित पावन मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले केलेले भारतातील पहिले मंदिर आहे.
शहराची लोकसंख्या ७०,३३५(सन २००१) इतकी असून सरासरी साक्षरता ८०% आहे.
[संपादन] प्रमुख व्यवसाय
मासेमारी आणि नारळ, पोफळी, कोकम व आंब्याच्या बागा हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. फिनोलेक्स इंडस्ट्रीज, नर्मदा सिमेंट आणि जे.के. फाईल्स हे रत्नागिरीमधील मुख्य उद्योग आहेत.
रत्नागिरीचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे.
[संपादन] शिक्षणसंस्था
फिनोलेक्स इंजिनीयरिंग कॉलेज, शासकीय पॉलिटेक्निक, फिशरीज कॉलेज आणि गोगटे महाविद्यालय ह्यामुळे रत्नागिरी हे उच्चशिक्षणाचे कोकणातील प्रमुख केंद्र बनले आहे.
[संपादन] वाहतुकीची साधने
रत्नागिरी शहरात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस. टी.)ची शहर वाहतूक आहे. रत्नागिरी हे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विविध शहरांशी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळच्या (एस. टी.) बससेवेने जोडलेले आहे. कोकण रेल्वेवरील ते एक महत्त्वाचे स्थानक आहे.
[संपादन] पर्यटनस्थळे
टिळक स्मारक, पतित पावन मंदिर, थिबा पॅलेस, रत्नागिरी किल्ला, दीपस्तंभ, भगवती बंदर, भाट्ये चौपाटी, काळा समुद्र.
हेसुद्धा पहा
[संपादन] बाहेरील दुवे
| महाराष्ट्र राज्य | |
|---|---|
| जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशिम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
| मुख्य शहरे | • औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • मुंबई • सोलापूर • |

